हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 210 ☆ कविता – बापू का सपना… ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित – “कविता  – बापू का सपना। हमारे प्रबुद्ध पाठकगण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे.।) 

☆ काव्य धारा # 210 ☆ कविता – बापू का सपना ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

बापू का सपना था—भारत में होगा जब अपना राज ।

गाँव-गाँव में हर गरीब के दुख का होगा सही इलाज ॥

*

कोई न होगा नंगा – भूखा, कोई न तब होगा मोहताज ।

राम राज्य की सुख-सुविधाएँ देगा सबको सफल स्वराज ॥

*

पर यह क्या बापू गये उनके साथ गये उनके अरमान।

रहा न अब नेताओं को भी उनके उपदेशों का ध्यान ॥

*

गाँधी कोई भगवान नहीं थे, वे भी थे हमसे इन्सान ।

किन्तु विचारों औ’ कर्मों से वे इतने बन गये महान् ॥

*

बहुत जरूरी यदि हम सबको देना है उनको सन्मान ।

हम उनका जीवन  समझें, करे काम कुछ उन्हीं समान ॥

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “प्रेषित…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “प्रेषित…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

प्रेषित निघून जातात कालातीत विचारांचे ठसे ठेवत.

आम्ही मात्र काळाच्या पडद्यावर रक्तलांच्छित ठसे ठेवतो.

*

ते सुळावर चढतात आमच्या कल्याणा साठी.

त्यांच्या विचारांना आम्ही सुळी देतो स्वार्थासाठी.

*

ते आपलाच क्रूस वागवतात खांद्यावर स्वतःच्याच.

आम्ही जबाबदारीचे ओझेही पेलत नाही स्वतःच्याच.

*

मृत्यूनंतरही ते पुन्हा प्रकटतात आमच्या भल्यासाठी.

मारेकरी मात्र सतत जन्म घेतात क्रौर्यासाठी.

*

एकदा क्रूरपणे त्यांना प्रत्यक्ष मारण्यासाठी,

 मग अधिक क्रूरपणे विचारांना मारण्यासाठी.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओढ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ ओढ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

संध्याकाळच्या वेळेस पक्ष्यांची माळ घरट्याकडे परतत होती,

दूरवर राहिलेल्या घरट्याला कवेत घेऊ पाहत होती.

चुकलेला, राहीलेला असेल मागे कोणी

म्हणाली, ” पुरे आता, फिरा माघारी, नका थांबू आणि,

*

अनुभवलेल्या गोष्टींचे भांडार होते तिच्यापाशी,

भविष्यासाठी असेच शिकणार होते ते प्रत्येक दिवशी.

अंगातला थकवा रात्रीच्या विसाव्याने घालवून,

प्रसन्न मनाने ते उदया परत उडणार होते आनंदून.

*

पण त्यासाठी आज घरी परतणे अनिवार्य होते,

काहींचे कुटुंब येण्याची त्यांच्या वाट पाहत होते,

सांगायचे होते काहींना आज त्यांनी काय पाहीले,

जे घरी राहून न गेलेल्यांचे अनुभवायचे राहीले.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – गीता आणि समत्व – भाग – ५ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ गीता जशी समजली तशी… – गीता आणि समत्व – भाग – ५ ☆ सौ शालिनी जोशी

आपले जीवन विरोधी गोष्टींनी युक्त आहे. इथे सुख आहे आणि दुःखही आहे. तसेच राग- द्वेष, लाभ-अलाभ, जय- पराजय, शीत- उष्ण असे द्वैत आहे. यापैकी एक गोष्टच एका वेळी साध्य असते. आपली स्वाभाविक ओढ सुखाकडे. ते हातात आल्यावर निसटून जाईल की काय भीती आणि सुख मिळवण्यासाठी केलेले श्रम दुःखच निर्माण करतात. सुखाचे दुःख कसे होते कळतच नाही. जयाच्या उन्मादात पराजय पुढे ठाकतो. साध्याच्या वाटेवर अडचणी येतात, सध्याचे असाध्य होते. असा हा लपाछपीचा खेळ म्हणजे जीवन. माणूस यातच गुंततो आणि खऱ्या शाश्वत सुखाला मुकतो. अशा वेळी या दोन्ही गोष्टी कशा सांभाळाव्या आणि आनंदी जीवन कसे जगावे याचा उपाय गीता सांगते. तो म्हणजे समत्व,समानता.

सुख म्हणजे इंद्रियांना अनुकूल आणि इंद्रियांना प्रतिकुल ते दुःख. (ख- इंद्रिय). या दोन्हीचा परिणाम मनावर होऊ द्यायचा नाही. मन स्थिर असेल तर बुद्धी ही स्थिर राहते. कार्याविषयी दृढभाव निर्माण होतो. इंद्रियांच्या प्रतिक्रिया नाहीत. हळहळ नाही, हुरळून जाणे नाही. सुखदुःख येवो, यश मिळो अथवा न मिळो अशा विरुद्ध परिस्थितीतही मनाची चलबिचल न होता स्थिर राहणे हेच गीतेत सांगितलेले समत्व. गीता म्हणते,’ सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यतेl’ म्हणजेच ‘सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जयाजयौl’ अशी ही स्थिती. शीत- उष्ण, शुभ -अशुभ, राग- द्वेष, प्रिय-अप्रिय, निंदा-स्तुती, मान- अपमान असे प्रसंग येतच असतात. कोणतीही वेळ आली तरी जो सुखाने हर्षित होत नाही. दुःखाने खचून जात नाही त्यालाच समत्व साधले. अशा बुद्धीने केलेले कर्म हे निष्काम होते. कर्मातील मनाचा असा समतोलपणा हाच निष्काम कर्मयोग आणि हे ज्याला साधलं तोच श्रेष्ठ भक्त, गुणातीत, जीवनमुक्त.

हेच समत्व वस्तू व प्राणीमात्रांविषयी, सर्व भूतान् विषयी असावे असे गीता सांगते. वस्तू विषयी म्हणजे ‘समलोष्ठाश्मकांचन:’ (६/८)अशी स्थिती. दगड,माती आणि सोन या तीनही विषयी समत्व. माणसाला सोन्याची आसक्ती असते. ती नसणे म्हणजे ‘धनवित्त आम्हा मृत्तिके समान’. असा माणूस अनासक्त असतो. तसेच व्यक्तीविषयी समत्व ही गीता सांगते ‘सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबंधुषु l साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यतेl(६/९). निरपेक्ष मित्र,उदासीन, मध्यस्थ, द्वेष करणारा, हितकारक बंधू, पापी आणि साधू पुरुष यांचे विषयी समभाव असणारा ब्राह्मण, गाय, कुत्रा, चांडाळ यातही समत्व पाहतो. कुणाच्या द्वेष करत नाही. वरवर ते भिन्न दिसले तरी सर्वांमध्ये एकच परमेश्वर आहे या भावनेने सर्वांचा योग्य आदर करणे हीच समत्वबुद्धी. भगवंत स्वतःही समत्त्वाचे आचरण करतात. ‘समोsहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योsस्ति न प्रिय:l’ ‘सर्व भूतात मी समभावाने व्यापून आहे. मला कोणी अप्रिय नाही आणि प्रिय नाही. हा भेद माझ्या ठिकाणी नाही. आत्मरूपाने मी सर्वांना व्यापून आहे.

सर्व भूतात भगवंत तोच माझ्यात आहे आणि मी त्यांच्यात हा सर्व भुतात्मभाव. ‘ जे जे देखे भूत ते ते भगवंत’ मान्य झाली की राग द्वेष कुणाच्या करणार ? सर्वत्र एकच परमात्मा पाहणे हेच समत्व. असे समत्व प्राप्त झाले की दृष्टिच बदलते. गत काळाचा शोक नाही, भविष्याची चिंता नाही. वर्तमानात सर्वांशी समत्वाने व्यवहार. प्राप्त कर्म उत्कृष्टपणे करणे हाच स्वधर्म होतो. शत्रु- मित्र आणि लाभ-अलाभ इत्यादी सर्व भेद स्वार्थापोटी. पण जेथे स्वार्थच नाही तिथे सर्वच समत्व. दोषांची निंदा नाही, गुणांचे स्तुती नाही दोन्ही सारखेच. आपपर भाव नाही. अशीही भेद रहित अवस्था म्हणजे सर्व सुख, मोक्ष.

असा हा जीवनाला आवश्यक विचार गीता सांगते. त्रासदायक गोष्टी टाळून शांत व सुखी जीवनाचा मार्ग दाखवते. अध्यात्माची दृष्टी देते. अर्जुनालाही युद्धातील जय पराजया विषयी समत्व सांगितले. युद्धात समोर येणारा कोणीही असला तरी शत्रूच असतो. ही समत्वबुद्धी सांगून अशा समत्व योगाने कर्म हेच कौशल्य असेही सांगितले. असे निष्काम बुद्धीने केलेल्या कर्माचे अकर्म होते. ते पाप पुण्य द्यायला शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे अर्जुनाबरोबर सर्वांनाच गीता नवीन विचार देते. सत्कर्म, स्वधर्म, समत्व हा गीतेचा पायाच आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ V. R. S. ची किमया… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ V. R. S. ची किमया…☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

जय माता की.. अंबामाताकी जय.. दुर्गामाताकी जय…

बाल्कनीत उभा राहून मी रस्त्यावरची मिरवणूक पहात होतो. नवरात्र चालू होतं. दररोजच रात्री अशा छोट्या मोठ्या मिरवणुकीने लोक टेकडीवरच्या देवीच्या दर्शनाला जातात.

आज का कोण जाणे, पण हा देवीचा जयजयकार ऐकून, मला आमच्या शाखेतल्या श्री. मानमोडे साहेबांची एकदम आठवण झाली. काहीही कारण नसताना.

अगदीच काही कारण नाही असंही म्हणता येणार नाही म्हणा. त्याचं काय आहे की, हे आमचे मानमोडे साहेब, वय ५४ वर्षे ७ महिने, हे आमच्या शाखेतले एक जबाबदार अधिकारी. अतिशय साधे, शांत, सज्जन, पापभिरू, आनंदी गृहस्थ. गेली ३१ वर्षे, अगदी मनापासून नोकरी करत आलेले.. काळाच्या ओघात मिळत गेली ती प्रमोशन्स स्वीकारत आता डेप्युटी मॅनेजर पदापर्यंत पोहोचलेले…

दर गुरुवारी बँकेतल्या दत्ताच्या फोटोला, चतुर्थीला गणपतीच्या फोटोला हार आणि नैवेद्याला नारळ मानमोडे साहेबांचाच, हा जणू Book of Instructions मधला भाग, एवढे हे देवभक्त. अगदी टेबलाच्या ड्रॉवरमध्येही देवादिकांचे छोटे फोटो कायम ठेवलेले, अगदी सहज दिसतील असे. त्या देवाच्या कृपेनेच आत्तापर्यंत सर्व आलबेल आहे ही त्यांची गाढ श्रध्दा.

असं सगळं अगदी व्यवस्थित शांतपणे चालू होतं. आणि अचानक बँकेत एक झंझावात आला. V. R. S. नावाचा… अधिकाऱ्यांसाठी वय वर्षे ५५ च्या पुढे असण्याची अट होती. त्याचे फायदे, तोटे, घरच्या गरजा, सर्वांचा आपापल्या परीने सारासार विचार करून अनेकांनी त्यासाठी अर्ज केले. मानमोडेसाहेबही त्यात होते.

सर्वांची सहनशक्ती पुरेशी ताणून झाल्यावर, बँकेने retire होणा-या लोकांची यादी जाहीर केली. पण इथे मात्र देवाने मानमोड्यांची प्रार्थना कबूल केली नाही. जन्मायला काही महिने उशीर केल्याचे कारण देवून त्यांचा अर्ज reject झाला. आणि ते retire होऊ शकले नाहीत.

आणि इथूनच बँकेतल्या वातावरणाला, प्रत्येकाच्या कामाला, कामाच्या ताणाला वेगळंच परिमाण मिळालं. आमच्या शाखेतले ११ पैकी ७ अधिकारी V. R. S. मध्ये निवृत्त झाले. सुखाने-आनंदाने- बरंच मोठं डबोलं घेऊन घरी गेले. आणि कामाचं डबोलं मात्र इतरांच्या डोक्यावर अलगद ठेवून गेले. आधी एक नवीन आव्हान म्हणून.. किंवा खरं तर दुसरा काही पर्यायच नाही म्हणून, राहिलेल्यांना काम करणं भागच होतं. काळ हेच सर्वांवर औषध या नियमाने, राहिलेल्या लोकांमध्येच कामकाजाची घडी बसवावीच लागत होती. हळूहळू सगळेच जण या बदलालाही सरावले. इतके की, काही बदललंय हेही विस्मरणात जावं लागलं.

पण आमचे मानमोडे मात्र हळूहळू जणू आमूलाग्र बदलू लागले. शारीरिक कुवतीपेक्षा खूपच जास्त काम करावं लागत होतं त्यांना. त्यांच्या आवडत्या देव-देवतांसाठीही त्यांना पुरेसा वेळ देता येईनासा झाला त्यांना. ते सतत अस्वस्थ वाटू लागले. हळूहळू शरीरही त्रास देऊ लागले. सर्व अवयव आपले महत्त्व पटवून देऊ लागले. मानदुखी, पाठदुखी, बी. पी. आणि काय काय… रोज नवीन नवीन भेटीगाठी होऊ लागल्या. डॉक्टरांकडचे हेलपाटे वाढले.

आणि काही दिवसातच, V. R. S. मुळे झालेल्या बदलानेही तोंडात बोट घालावे असा एक आश्चर्यकारक बदल आमच्या मानमोडेसाहेबांमध्ये झालेला दिसू लागला. ड्रॉवरमधल्या देवांच्या फोटोंवर हळूहळू गोळ्यांच्या स्ट्रिप्स साठत होत्या. वाढत होत्या. आता देव पूर्ण झाकले गेले. मानमोडे वारंवार सगळ्या गोळ्या, मलमं जागेवर आहेत की नाही पाहू लागले. जणू नाही पाहिलं तर अचानक लुप्त होतील ती. हळूहळू तर, पूर्वी देवाला करायचे, तसा त्या औषधांनाच येता-जाता नमस्कार करू लागले ते. इकडे देवांच्या फोटोंचे हार पार वाळून वाळून गेले. प्रसाद-बिसाद तर लांबच. मानमोड्यांच्या डोक्यावर काही परिणाम वगैर तर झाला नाही ना अशी कुशंका भेडसावू लागली आम्हाला ! नाही म्हटलं तरी, आम्हा सर्वांचा, आमच्याही नकळत जीव होता ना त्यांच्यावर !

शेवटी आम्ही सर्वांनी मिळून ठरवलंच की त्यांच्याशी बोलायचं. त्यांना मन मोकळं करायला लावायचंच. आणि एका शनिवारी आम्ही ३-४ जण काही ना काही निमित्त काढून त्यांच्या टेबलाशी जमलो. काम उरकत आणल्याने मानमोडेही जरा relaxed वाटत होते.

आणि आम्ही बोलता बोलता विषय काढला. आमची काळजी बोलून दाखवली. विचारू लागलो की ते एवढे बदललेत कसे? का? त्यांची देवभक्ती गेली कुठे? देवांची जागा औषधांनी घेऊन सुध्दा, ते परत पूर्वीसारखे शांत कसे वाटायला लागलेत हल्ली? ते मनाने तर खचले नाहीत ना? देवावरचा त्यांचा विश्वास तर उडला नाही ना? तसं असेल तर हे सगळं कशामुळे? V. R. S. मध्ये नाव नाही म्हणून? की दुप्पट तिप्पट काम पडतंय ते झेपत नाहीये म्हणून? की अनेक शारीरिक व्याधी साथीला आल्यात म्हणून?

आम्ही आमची खंत बोलून दाखविली मात्र, मानमोडे जोरजोरात हसायलाच लागले. आम्ही नुसतेच एकमेकांकडे बघत राहिलो. हसणं थांबल्यावर साहेब शांतपणे पण आत्मविश्वासपूर्ण बोलू लागले…

‘‘अरे, तुम्हाला माझी इतकी काळजी वाटते हे पाहून माझं मन अगदी भरून आलंय. आता मला सांगावंच लागेल तुम्हाला सगळं…” आम्ही जिवाचे कान करून ऐकू लागलो.

‘‘काही दिवसांपूर्वी मला साक्षात्कार झाला. असे दचकू नका. स्वप्नात येऊन देव बोलला माझ्याशी स्वत:! अहो खरंच. आमच्या बोलण्याचा सारांश सांगू का तुम्हाला? ऐका. आपण पूर्वीपासून ऐकत आलोय ना की देव वेगळ्यावेगळ्या रूपात आपल्या भक्तांच्या हाकेला धावतो ते. एकनाथांसाठी तो श्रीखंड्या झाला. जनीबरोबर दळणं दळली त्याने. कबिराचे शेले विणले. अरे पण या कलियुगात भक्तांच्या हाका इतक्या वाढल्या की देव जरी झाला तरी किती रुपं घेणार तो? नाही का! सांगा की. मग त्यानं अशी वेगवेगळी रुपं घ्यायचं आणि माणूस म्हणून भक्तांना मदत करण्याचं थांबवलंच आहे आताशा. निदान क्षुल्लक गोष्टींसाठी कुणी धावा करत असेल तर तो स्वत: नाहीच धावून येऊ शकणार यापुढे. अरे, असं आSSS वासून काय पहाताय माझ्याकडे? खरंच सांगतोय मी. आता माझंच उदाहरण घ्या ना. मी पूर्वीसारखा देवभक्त राहिलो नाही असं वाटतंय ना तुम्हाला? पण तसं काही नाहीये रे! मी पूर्वीचाच आहे. तसाच देवभक्तही आहे. फक्त देवाचं रूप बदललंय हे माझ्या लक्षात आलंय आणि तुम्हाला वाटतंय की मी बदललोय. ”

आता मात्र आम्ही पारच बुचकळ्यात पडलो. मानमोड्यांना भ्रम तर झाला नाही ना ही आमच्या मनातली शंका बहुदा आमच्या चेहे-यावर दिसत असावी. कारण आम्हालाच समजावत मानमोडे साहेब पुढे बोलू लागले… ‘‘अरे खरंच सांगतो मी नाही बदललो. पण माझ्या देवाचं रूप मात्र बदललंय ! या नव्या रूपात देव क्षणोक्षणी माझ्या हाकेला धावून येतोय. म्हणून मी निश्चिंत आहे आता. नाही ना कळत? अरे असे घाबरू नका. मी पूर्ण शुध्दीवर आहे म्हटलं. थांबा, आता मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो सविस्तर…”

आता साहेब जरासे सावरून बसले आणि आम्हालाच भांबावल्यासारखं वाटायला लागलं. आम्ही ऐकू लागलो…

‘‘असं पहा, गेल्या ५-६ महिन्यांपासून, माझं मानमोडे नाव सार्थ व्हावं या सद्हेतूने, खरंच माझी मान मोडेपर्यंत बँक मला कामाला लावतीये! पण माझी त्याबद्दल तक्रार नाही. हल्ली वरचेवर पाठ, कंबर दुखते. पण तरीही माझी तक्रार नाही. इतकंच काय, अहो तीन तीन assignments सांभाळता सांभाळता माझं बी. पी. ही वाढू लागलंय, रोज डोकंही दुखतंय. पण तरी मी चिंता करत नाही. अधूनमधून साखर वाढते, छातीचे ठोके अनियमित होतात पण तरीही मी.. माझं मन शांत रहातं ! का? कारण मला साक्षात्कार झालाय ना! अहो कसला काय? थोडं डोकं चालवा कधी तरी! अरे आता माणसांमध्ये देव शोधण्याचे दिवस नाही राहिले पूर्वीचे. आता देव निर्जीव वस्तूंच्या रूपानेही भेटतो म्हटलं ! सतत, आणि पूर्वीपेक्षा जास्त वेळा भेटतो मला तर तो. कुठे? अहो कुठे काय? त्याची किती रूपं गच्च भरलीयेत माझ्या ड्रॉवरमध्ये….. या गोळ्यांच्या, मलमांच्या रूपात ! आता तरी आलं की नाही काही ध्यानात?”

ड्रॉवर पुढे ओढून मानमोड्यांनी आतल्या देवदेवतांना एक उडता नमस्कार केला आणि ते पुढे बोलू लागले…

‘‘अहो, इतके महिने, काय वाट्टेल ते झालं तरी हा कामाचा गाडा मी ओढू शकतोय तो कोणाच्या जीवावर! आं! सांगा ना, या माझ्या कलियुगीन देव-देवतांचा तर धावाही नाही करावा लागत. उलट माझ्या दिमतीलाच जणू ते तयारच आहेत माझ्या ड्रॉवरमध्ये. या औषधांच्या रूपात! मग आता मला कसली काळजी? आता आणखी परत V. R. S. येऊ दे, परत त्यात मी reject होऊ दे. काही problem नाही. काम सहापट वाढू दे. No problem at all, कितीही काम पडू दे, कितीही दुखणी येऊ देत. चिंता नाही. माझा हा देव माझ्या मदतीला already धावून आलेलाच आहे. आणि सर्व संचारी आहे ना तो! माझ्या ड्रॉवरमध्ये राहतोय, माझ्या बॅगेत रहातोय. घरातल्या औषधाच्या पेटीत तर रहातोयच – अगदी ‘घरजमाई’ असल्यासारखा. आणि हो, माझ्या original देवात आणि माझ्यात आणखी एक गुपीत आहे बरं का! पण आता सांगूनच टाकतो तुम्हाला…

त्या देवाने मला promise केलंय, की जेव्हा मी त्याच्या या वर्तमानरूपांना कंटाळेन ना तेव्हा तो स्वत: येऊन, अगदी गुपचुप मला त्याच्या घरी घेऊन जाईल. मी जेथे असेन तेथून, अगदी on duty असलो तरीही. आणि अगदी या कानाचं त्या कानालाही कळू न देता… तेव्हा आता बोला. आणखी काय पाहिजे मला. तेव्हा हे पहा, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. मी पूर्वीसारखाच आता शांत आहे, आनंदी आहे आणि हो, देवभक्तही आहे. पटली ना खात्री?”

हे इतकं सगळं ऐकून बहुधा आम्हालाही जाणवलं की, अरेच्चा, असं असेल, तर मग आपल्यालाही भेटतोच आहे की देव अधून मधून, या नव्या रूपात !

आमच्या चेहे-यावरचे झरझर बदलणारे भाव आणि नकळत ‘हो-हो’ म्हणणारी आमची हलती मान पाहून मानमोडे खूष झाले. त्यांच्या या देवाला आणखी भक्त मिळाले, मिळतच रहाणार याची खात्री वाटण्यासारखीच परिस्थिती होती ना !

आमच्या या असल्या अवस्थेत, मग हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवून, मानमोडे साहेबांनी जणू order च सोडली. हं, आता म्हणा माझ्या बरोबर…

मान दुखतेय? जय moov… जय Voreran

डोकं दुखतंय? जय जय झंडू बाम… जय डिस्प्रिन…

पाठ दुखतेय? जय ब्रूफेन

ताप आलाय? जय क्रोसीन

बी. पी. वाढतंय? जय जय स्टॅमलो… जय कार्डोज

साखर वाढली? जय इन्सुलिन, जय जय Glynase 

पित्त वाढलं? जय जय जेल्युसिल, जय भोले सूतशेखर

कंबरदुखी? जय जय लम्ब्रील

आणि हो… विसरू नका…

देवाची ही इतकी रूपं एकाचवेळी अनुभवण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल…

बोला V. R. S. की जय…

स्टेट बँक माता की जय…

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुझे आहे तुजपाशी – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “तुझे आहे तुजपाशी – –” ☆ श्री जगदीश काबरे

मोगो नावाचा एक चिनी मुलगा. तो बिचारा दगड फोडायचं काम करायचा. हाताला फोड यायचे. उन्हातान्हात दगड फोडून अंगाला घामाच्या धारा लागायच्या. लोकांना कसली भन्नाट कामं करायला मिळतात आणि आपल्याच नशिबी काय ही दगडफोडी, असं तो नेहमी मनात म्हणे आणि दुःखी होई.

एकदा त्याचं दुखणं एका देवदुतानं ऐकलं. त्याचे दयावून त्याने त्याला विचारलं की, “का तू इतका उदास?”

मोगो म्हणतो, “देवानं माझ्यावर अन्याय केलाय. हे असलं काम दिलंय मला. तू विचार देवाला की, का त्यानं असं केलं?” 

देवदूत देवाकडं जातो विचारतो, “का या तरुणावर अन्यायकेला तुम्ही?” 

देव म्हणतो, “ठीक आहे. आजपासून त्याला जे काम आवडेल ते त्याला मिळेल. “

त्याच दिवशी मोगो दगड फोडताना एक श्रीमंत माणूस पाहतो. तो असतो हिर्‍यांचा व्यापारी. मोगोला वाटतं, ‘असं नशीब पाहिजे होतं आपलं. ‘ 

देवदूत तथास्तू म्हणतो आणि मोगो एकदम बडा व्यापारी होतो. एका महालात हिरे-जवाहरात लोळू लागतो. पण नेमका त्या वर्षी उन्हाळा फार असतो. काही दिवसात तो कंटाळतो. त्याला वाटतं, ‘या पैशाला काही अर्थ नाही. आपण थेट सूर्याइतकं पॉवरफूल व्हायला हवं. ‘

त्याच क्षणी त्याचं सूर्यात रूपांतर होतं… सर्वोच्च स्थान! सारं जग त्याच्याभोवती फिरू लागतं. उन्हाळा सरून पावसाळा येतो. ढग सूर्याला ग्रासून टाकतात. मोगोला तर पृथ्वीही दिसेनाशी होते. त्याला वाटतं, ‘सूर्यापेक्षा ढग जास्त पॉवरफूल आहे. ‘ 

मग काय तो ढग होतो… बरसतो. पण पाहतो तर काय, सगळं जग भिजतंय पण एक टणक खडक मात्र कोरडाच. पाण्यानं तो न फुटतो न हलतो. मोगो म्हणतो, ही खरी ताकद. त्याक्षणी तो खडक होतो.

काही दिवसांत एक माणूस येतो खडक फोडायला लागतो. मोगो पुन्हा ओरडतो आणि म्हणतो, ‘देवा मला खडक फोडणारा कर, तो खरा स्ट्राँग!’ 

झालं, मोगो पुन्हा दगडफोड्या होतो.

मग मोगो देवदुताला विचारतो, “म्हणजे मीच खरा पॉवरफूल आहे की काय?”

देवदूत हसतो आणि म्हणतो, “तुला मनापासून तुझं काम आवडलं, त्यात सुख वाटलं तर तूच खरा पॉवरफूल. नाहीतर तू कुणीही झालास तरी असमाधानीच राहशील. “

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चल अकेला… चल अकेला… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ चल अकेला… चल अकेला… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ओ. पी. नय्यर

“मी कंपोजर म्हणून जन्माला आलो.. कंपोजर म्हणुनच देह ठेवणार”

हे उद्गार आहेत ओ. पी. नय्यरचे. ओपीचा जन्म लाहोरचा. जगण्याची ऐट बघावी तर लाहोरमध्ये असा तो काळ. मदन गोपाल नय्यर या सरकारी हुद्देदाराच्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा संगीत क्षेत्रात नाव काढील असं खरं तर कोणालाही वाटलं नसेल. लाहोरच्याच शाळेत तो शिकला. माध्यम उर्दू. अभ्यासात त्याचं लक्ष कधीच नव्हतं. छंद गाणी म्हणण्याचा.

असंच एकदा लाहोर रेडिओ वर गाणं म्हणण्याची त्याला संधी मिळाली. तेव्हा त्याचं वय होतं अवघं आठ.

… आणि मग त्याला रेडिओवर कामं मिळतंच गेली. कधी लहान मुलांच्या कार्यक्रमात तर कधी कोरसमध्ये. त्याकाळी लाहोर फिल्म इंडस्ट्री जोरात होती. त्याला एक दोन चित्रपटात कामेही मिळाली. घरच्यांचा अर्थातच विरोध. पोरगं वाया गेलं.. गाणं बजावण्याच्या मागे लागलं ही भुमिका.

तो मॅट्रीक झाला. जेमतेमच मार्क मिळाले. लाहोरमधल्या यथातथा कॉलेजमध्ये एडमीशन मिळाली. आता त्याला वेड लागले इंग्रजी चित्रपट बघण्याचे. त्यातील पात्रांचे रहाणीमान,स्टाईलच्या तो प्रेमात पडला. त्यानेही आपली स्टाईल बदलली. सिल्कचा फुल स्लीव्ह शर्ट, ट्राऊजर,पायात चकचकीत शुज,आणि डोक्यावर हैट.

देशाची फाळणी झाली आणि सगळंच बदलुन गेलं. तो मुंबईत आला. काही चित्रपट मिळत गेले. पण हवं तसं यश काही मिळत नव्हतं. पण ‘आरपार’ आला आणि ओपीचं नशीब बदललं. एकामागोमाग एक हिटस्. फिल्म इंडस्ट्रीने अक्षरशः त्याला डोक्यावर घेतलं. यश.. पैसा.. किर्ती कशालाच कमी नाही. मोती माणकांचा पाऊस पडत होता. ओपी म्हणतो..

माझ्या पुरुषार्थावर नियती भाळली. तिच्या जुगारी, लहरी स्वभावावर मी फिदा. आमचं हे ‘लव अफेअर’ दहा वर्ष टिकलं. ही दहा वर्ष मी अक्षरशः सोन्याचे मढवुन काढली. यश.. पैसा.. किर्ती.. सुंदर, बुध्दिमान ललनांचा सहवास.. सगळं सगळं उपभोगलं. यथेच्छ.

आणि मग त्याच्या लक्षात येत गेलं. मोठे निर्माते आपल्याला टाळताहेत. काही बी ग्रेड.. सी ग्रेड चित्रपट मिळाले. त्यातही एखाद दुसरं गाणं हिट जायचं.

ओपीने काळाची पावलं ओळखली. काही प्रॉपर्टीज विकल्या. शेअर्स मध्ये पैसे अडकवले. मरीन ड्राईव्ह वरचा प्रशस्त फ्लॅट ठेवला. देवाला विनवले..

शेवटपर्यंत माझी ऐट सांभाळ.

आणि मग तो फिल्म इंडस्ट्रीपासुन अलगदपणे दुर झाला. नवीन आयुष्य सुरु झाले. सकाळी जरावेळ हार्मोनियम घेऊन बसायचे. त्यानंतर देवाचा जप. एका वहीत तो ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे’ असं लिहीत. पण उर्दूत. ओपीला देवनागरी लिपी लिहीता वाचता येत नव्हती. कारण शिक्षण झालेलं उर्दू माध्यमात.

संध्याकाळ तो पेशंट तपासे. हो तो आता किंचितसा डॉक्टर झाला होता. झालं काय कि.. एकदा त्याला कसलासा त्रास होत होता. आशा भोसले आणि सुधीर फडके त्याला घेऊन गेले डॉ. फाटकांकडे. डॉ. फाटक होमिओपॅथीत निष्णात. त्यांच्या औषधाने ओपींना आराम वाटला. ओपीने डॉक्टरांचे शिष्यत्व पत्करले. होमिओपॅथीची ओळख झाली. आणि मग संध्याकाळी दोन तीन पेशंटस् तपासु लागले. पण मोफत.

फी साठी नाही.

कधी रात्री जेवण झाल्यावर मरीन ड्राईव्ह वर जाऊन बसावे.. तर कधी इंग्रजी चित्रपटाला. रिगल.. लिबर्टी.. इरॉस ही आवडती थिएटर्स. जायचं ते थाटात. एकदम चार पाच तिकिटं खरेदी करायची. आजुबाजुच्या खुर्च्या रिकाम्या. त्यावर कोट.. हॅट ठेवायची. पाय लांब करायचे.. आणि चित्रपट एंजॉय करायचा.

१६ जानेवारी म्हणजे ओपीचा जन्मदिवस. आदल्या दिवशी भरपूर मिठाया.. ड्राय फ्रुटस् आणुन ठेवायचा. दिवसभर चाहत्यांची गर्दी. पहिला बुके येणार एच. एम. व्ही. कडुन.

संध्याकाळी गाण्यांची मैफल जमायची कोणी कोणी येत.. ओपीची गाणी म्हणत. कधी सुरात.. कधीच बेसुरातही. पण ओपीला ते आवडे.

असेच एकदा एका नवोदित गायकाने गाणं म्हणायला सुरुवात केली.

‘चल अकेला.. चल अकेला.. ‘

आणि ओपीला तो दिवस आठवला……

एस. मुखर्जी ‘संबंध’ बनवत होते. गाणी होती कवी प्रदिप यांची. संगीत ओपी. त्यादिवशी प्रदिप यांनी गाणं लिहुन आणलं. हेच ‘चल अकेला.. चल अकेला.. ‘ आणि मुखर्जींकडे हट्ट धरुन बसले. याला चाल मीच लावणार.. गाणारही मीच.

ओपीने ते गाणं वाचलं. आणि त्यांच्या लक्षात आलं. प्रदिप या चांगल्या गाण्याचा विचका करणार. ते चिडले. आणि घरी निघून आले. ते गाणं डोक्यात घोळत होतंच. शब्द कसदार होते. अर्थ प्रवाही होता. पियानोवर बसले आणि एक अफलातुन चाल त्यांच्याकडून तयार झाली.

थोड्या वेळाने त्यांच्या मागोमाग प्रदिप आणि मुखर्जी ओपींकडे आले. त्यांची समजूत घालायला. आल्यानंतर प्रदिप यांनी ते गाणं.. ती चाल ऐकली आणि म्हणाले..

“ओपी तुम्ही माझ्या गाण्याचं लखलखतं झुंबर करुन टाकलंय”

ओपीने नंतर ते गाणं रेकॉर्ड केलं. मुकेशच्या आवाजात. वास्तविक मुकेश ओपीकडे फारसा गायला नाही. पण या गाण्यासाठी मुकेशच हवा हा आशा भोसलेचा हट्ट.

“या गाण्याचं मुकेश सोनं करील” 

हा आशाचा अंदाज सहीसही खरा ठरला.

————————————-

या गीतातील शब्द खरे ठरतील.. तेही आपल्या आयुष्यात हे ओपीला ठाऊकच नव्हते. निवृत्तीनंतरचं सुखासीन आयुष्य सुरु होतं. पण नशीब पालटलं. कौटुंबिक वाद सुरु झाले. प्रत्यक्ष बायको, मुलांनीच इस्टेटीवरुन त्याच्यावर दावा ठोकला. आणि ओपी कोसळला.

कोणताही विरोध न करता त्याने आपला फ्लॅट सोडला. अंगावरच्या कपड्यानिशी ओपी बाहेर पडला. सोबत घेतला फक्त हार्मोनियम.. जो त्याने लाहोरला पहिल्या कमाईतून घेतला होता. आणि घेतल्या नोटेशन्सच्या वह्या.

सगळं सोडुन दुर विरारला एका साध्या तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये रहायला आला. दुर तिकडे लाहोरला पर्वत पहाडांच्या मुलखात जन्माला आलेला.. मुंबईत सागर किनारी स्थिरावलेला.. यश,किर्ती सगळं काही मिळवलेला ओंकार प्रसाद नय्यर. शेकडो गाणी ज्याने आपल्या सुरांनी मढवली.. त्याच्या आयुष्याची आता संध्याकाळ झाली होती. अगदी 

‘लागले नेत्र रे पैलतीरी’

ही अवस्था. वारंवार जुने दिवस आठवताना त्याच्या लक्षात आले..

मागे नसतं पहायचं आठवणीत शिरताना..

पावलं जड पडतात

तिथुन मागे फिरताना.

आणि मग साऱ्या जुन्या आठवणींना त्याने मागे सारले. आपला जुना.. लाडका हार्मोनियम पुढे ओढला. आणि तेच गीत पुन्हा पुन्हा आळवु लागला…

‘चल अकेला चल अकेला चल अकेला…

तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला.. ‘

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मला जरा आराम हवा आहे…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मला जरा आराम हवा आहे” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

“आई मला जरा आराम हवा आहे.. “

शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आईला म्हणाली.

“अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामच करायचा आहे.. “

मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला.

“आई थोडा वेळ दे आरामाला, ऑफिस च्या कामातून थकून गेलीये मी पार.. “

अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग आरामच करायचा आहे..

मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला.

“अहो इतकी काय घाई आहे, एखादा वर्ष थांबू ना जरा.. “

“अगं मुलं होऊन गेली वेळेवर की टेन्शन नाही, नंतर आरामच करायचा आहे… “

मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला..

“अगं तुलाच जागरण करावं लागेल, मला ऑफिस आहे उद्या.. थोडे दिवस फक्त, मुलं मोठी झाली की आरामच करायचा आहे.. “

ती बाळासाठी रात्रभर जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला.

“अहो मुलं आता शाळेत जायला लागली, जरा निवांत बसू द्या की मला.. “

“मुलांकडे नीट लक्ष दे, त्यांचा अभ्यास घे, नंतर आरामच करायचा आहे… “

ती मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहून गेला..

“आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली, आता जरा निवांत झाले मी.. “

“आता यांच्या लग्नाचं पाहावं लागेल, ती एक जबाबदारी पार पाडली की मग आरामच करायचा आहे.. “

तिने कंबर कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहून गेला..

“मुलं संसाराला लागली, आता मी आराम करणार.. “

“अगं आपली सुधा गर्भार आहे, माहेरी बाळंतपण करायचंय ना तिचं.. “

मुलीचं बाळंतपण आवरलं आणि आराम करायचा राहून गेला..

“चला, ही पण जबाबदारी पार पडली, आता आराम. “

“सासूबाई मला नोकरी परत जॉईन करायची आहे.. आरव ला सांभाळाल का?”

नातवाच्या मागे दमली आणि आराम करायचा राहून गेला..

“चला नातू मोठा झाला, आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या.. आता मी आराम करणार.. “

“अगं ऐकलं का, गुडघे दुखताय माझे, उठवलं जात नाही.. Bp वाढलाय वाटतं, डायबिटीस पण आहे.. डॉकटर ने वेळेवर पथ्यपाणी करायला सांगितलंय बरं का.. “

नवऱ्याची सेवा करायला उरलं सुरलं आयुष्य गेलं.. आणि आराम करायचा राहूनच गेला..

एक दिवशी देवच आला खाली, आराम करायचाय ना तुला? तिने हात जोडले आणि देव घेऊन गेला.. अखेर तिला आराम मिळाला, अगदी दिर्घकाळाचा.. !!!

सर्व स्त्रियांना समर्पित
👌💐 👍💐👌

लेखक  : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “मन में है विश्वास” – लेखक : विश्वास नांगरे पाटील ☆ परिचय प्रा. भरत खैरकर ☆

प्रा. भरत खैरकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “मन में है विश्वास” – लेखक : विश्वास नांगरे पाटील ☆ परिचय प्रा. भरत खैरकर 

i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodr...

पुस्तक : “मन मे हैं विश्वास”

लेखक : विश्वास नांगरे पाटील

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे.

मूल्य – 300  रु

तरुणपण घोडचुकामधे, प्रौढत्व संघर्षात आणि म्हातारपण पश्चातापात जावू नये असं वाटत असेल तर बालपणापासूनच आयुष्याची इमारत उभारायला, मजबूत करायला सुरुवात झाली पाहिजे. न थांबता,न थकता, न हरता पेकाट मोडेपर्यंत व बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास केला पाहिजे. मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखात बळ निर्माण करण्याची लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची जिद्द व त्यासाठी अविरत संघर्ष करण्याची तयारी आजच्या तरुणांमध्ये असली पाहिजे. ज्या दिव्यांमध्ये खैरातीच तेल आहे, त्या दिव्याचा उजेडही मला नको अशी भावना त्यांच्या मनात हवी.

“अभ्यास करून मोठा साहेब हो.” असं सांगणार्‍या बाबांसाठी जिद्दीने पेटून उठलेला विश्वास पुढे मोठा पोलीस अधिकारी झाला. कोणतीही गोष्ट गुद्धयांनी नाही, मुद्दयाने सोडवायची शिकवण बालपणीच विश्वासला मिळाली होती. ‘ दुखायचं दुखतं कळ काढ ‘, निसर्ग सगळं काही वेळेत दुरुस्त करतो.

तारुण्याच्या काळात संपत्ती व सत्ता एकत्र आल्यावर अनर्थ घडू शकतात, म्हणून विद्यार्थ्याने अभ्यास काळात संयम, विवेक आणि धीर सोडू नये.

संपत्तीचा मोह आणि सत्तेचा माज कधीही चढू द्यायचा नाही ! ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे,देहामध्ये शक्ती आहे,मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीत विवेक आहे, हृदयामध्ये करूणा आहे, मातृभूमी वर प्रेम आहे, इंद्रीयांवर संयम आहे. माणूसपण स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे,इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचं बळ आहे, सिंहासारखा जो निर्भय आहे, ध्येय उच्च आहे. व्यसनमुक्त जीवन आहे, जीवनात शिस्त आहे,निती आहे, ज्याचे चारित्र्य शुद्ध आहे, असा आदर्श युवक स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला आहे. रस्ता कठीण असला तरी ध्येय गाठण्यासाठी हा एकच मार्ग आहे. ह्याच मार्गाने मनात दीर्घ “विश्वास” ठेवून जर एखादा युवक मार्गक्रमण करतो तर यश निश्चितच आहे.

काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. बचतीची व काटकसरीची सवय लहानपणापासून असणे चांगले आहे. वेगवेगळी आत्मचरित्रे वाचून आपला आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी तर त्यांचा गाव म्हणजे एक विद्यापीठच

असतं! जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट घेणार नाही, ही खूणगाठ मनाशी बांधणे गरजेचे आहे.

स्पर्धा परीक्षांबाबत कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता प्रत्येक क्षणाची,प्रत्येक कणाची आणि मनाची चाचणी घेणे गरजेचे आहे. पेनाने ” पेन” होईस्तोवर लिहिलं तर यश तुमचेच आहे. पराकोटीचा संयम आणि मनावर कठोर नियंत्रण ह्यामुळे कोणतेही यश आपण मिळवू शकतो,असा विश्वास लेखक या पुस्तकात मांडत आहे.

” इस दुनिया में आप किसलिए आए हो? ” ह्या प्रश्नाचं दिलेलं हे उत्तर मिळवण्यासाठी “मन में है विश्वास” हे पुस्तक वाचणे अत्यंत गरजेच आहे. जसं घोड्यावर मांड टाकली की स्वार किती दमाचाआहे हे कळतं. तसंच विद्यार्थ्यांचे असतं. त्याची बैठक किती आहे, ह्यावर त्याचं स्पर्धा परीक्षेचे यश अवलंबून असतं. आयत्या मिळालेल्या घबाडाला बळी पडायचं नाही, लढायचं, उठायचं, दोन द्यायचे,दोन घ्यायचे, तरच यश तुमचेच आहे. स्वतःच्या नजरेतून स्वतः कधी उतरायचं नाही हा गुरुमंत्र ह्या पुस्तकातून लेखकाने दिला आहे. प्रत्येक घरी हे पुस्तक असणं गरजेचे आहे.

परिचय –  प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #264 ☆ महाकुंभ – रिश्ते-नाते… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख महाकुंभ – रिश्ते-नाते…। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 264 ☆

☆ महाकुंभ – रिश्ते-नाते… ☆

महाकुंभ देश में हरिद्वार, उज्जैन, नासिक व प्रयागराज चार स्थानों पर बारह वर्ष के पश्चात् आयोजित किया जाता है। यह विश्व का सबसे बड़ा आध्यात्मिक व अद्वितीय मेला है जो क्रमानुसार चारों तीर्थ-स्थानों पर आयोजित किया जाता है। कुंभ मेला चार प्रकार का होता है–कुंभ, अर्द्धकुंभ, पूर्णकुंभ व महाकुंभ में खगोलीय कारणों के आधार पर भिन्नता होती है। अर्द्धकुंभ मेला 6 वर्ष पश्चात् हरिद्वार व प्रयागराज में लगता है और महाकुंभ पूर्णकुंभ के पश्चात् 144 वर्ष में एकबार लगता है।

ज्योतिष के अनुसार गुरू बृहस्पति प्रत्येक राशि में मेष से मीन तक गोचर करने में 12 वर्ष लगते हैं। इसी कारण 12 वर्ष पश्चात् महाकुंभ का आयोजन होता है। देव-असुर युद्ध 12 दिन अर्थात् मृत्यु लोक के 12 वर्ष तक हुआ और अमृत कलश से चंद बूंदे प्रयागराज, हरिद्वार, नासिक व उज्जैन में गिरी और उन्हीं स्थानों पर कुंभ का आयोजन होने लगा।

महाकुंभ 2025 का आयोजन 13 जनवरी से 26 फरवरी तक प्रयागराज में होगा। आस्था के संगम में जो भी डुबकी लगाता है; उसे आध्यात्मिक ऊर्जा, आत्मशुद्धि व मोक्ष की प्राप्ति होती है। महाकुंभ मेला इस वर्ष 45 दिन तक चलेगा। यह पौष पूर्णिमा से प्रारंभ होकर महाशिवरात्रि तक चलेगा। सर्वप्रथम साधु-संतों का शाही स्नान होता है। तत्पश्चात्सब लोग मिलकर प्रेम से डुबकी लगाते हैं तथा पुण्य प्राप्त करते हैं। उस समय उनके हृदय में केवल आस्था, श्रद्धा व भक्ति भाव व्याप्त रहता है। वे स्व-पर, राग-द्वेष व रिश्ते-नातों से ऊपर उठ जाते हैं। उनके हृदय में वसुधैव कुटुंबकम् का भाव व्याप्त रहता है। वास्तव में घर-परिवार में प्रेम, सौहार्द, समन्वय व सामंजस्यता स्थापित करना श्रेयस्कर है।

यदि हम इसे परिभाषित करें तो मिलजुल कर रहना, एक-दूसरे की भावनाओं को समझना व सम्मान देना ही महाकुंभ है। इस स्थिति में मानव तुच्छ स्वार्थों व संकीर्ण मानसिकता का त्याग कर बहुत ऊँचा उठ जाता है। संवेदनशीलता हमारे मनोभावों को संस्कारित वह शुद्धता प्रदान करती है और वे संस्कार हमें संस्कृति से प्राप्त होते हैं। संस्कृति हमें सत्यम्, शिवम्, सुंदरम् की ओर ले जाती है और जीने की राह दर्शाती है। इससे हमारे हृदय में दैवीय भाव उत्पन्न होते हैं। हम मानव-मात्र में सृष्टि-नियंता की सत्ता का आभास पाते हैं।

ब्रह्म सत्यम्, जगत् मिथ्या की अवधारणा से तो आप सब परिचित होंगे। माया के कारण यह संसार हमें मिथ्या भासता है। माया रूपी ठगिनी पग-पग पर हाट लगाय बैठी है तथा इसने सबको अपने मोह-पाश में बाँध रखा है। प्रकृति पल-पल रंग बदलती है। “मौसम भी बदलते हैं, दिन-रात बदलते हैं/ यह समाँ बदलता है, जज़्बात बदलते हैं/ यादों से महज़ दिल को मिलता नहीं सुक़ून/ ग़र साथ हो सुरों का, नग़मात बदलते हैं।”

समय परिवर्तनशील है, निरंतर चलता रहता है। सुख-दु:ख दोनों का चोली दामन का साथ है तथा एक के जाने के बाद दूसरा दस्तक देता है। संसार में सब मिथ्या है, कुछ भी स्थायी नहीं है। “यह किराए का मकान है/ कौन कब तक ठहरेगा/ खाली हाथ तू आया है बंदे/ खाली हाथ तू जाएगा।” इस नश्वर संसार में कुछ भी सदा  रहने वाला नहीं है। इसलिए मानव को आत्मविश्वास रूपी धरोहर को थामे निरंतर आगे बढ़ना चाहिए। ‘एकला चलो रे’ की राह पर चलकर मानव अपने लक्ष्य की प्राप्ति कर सकता है।

मानव के लिए सबके साथ मिलकर रहना बहुत कारग़र है। आजकल रिश्ते-नाते सब स्वार्थ में आकण्ठ डूबे हुए हैं। कोई किसी का हितैषी और विश्वास के क़ाबिल नहीं है। रिश्तों को मानो दीमक चाट गई है। घर-आँगन में उठी दरारें दीवारों का रूप धारण कर रही हैं। संबंध- सरोकार समाप्त हो गए हैं। परंतु कोरोना ने हमें घर-परिवार व रिश्ते-नातों की महत्ता समझाई और हम पुन: अपने घर में लौट आए। बच्चे जो बरसों से कहीं दूर अपना आशियाँ बना चुके थे, अपने परिवार में लौट आए। इतना ही नहीं, हम अपनी संस्कृति की और लौटे और हैलो-हाय व हाथ मिलाने का सफ़र समाप्त हुआ। हम दो गज़ दूरी से नमस्कार करने लगे। पारस्परिक सहयोग की भावना ने हृदय में करवट ली तथा एक अंतराल के पश्चात् दूरियाँ समाप्त होने के पश्चात् ऐसा लगा कि वह समय हमारे लिए वरदान था। कोरोना के समय हम केवल अपने परिवार व रिश्तेदारों से ही नहीं जुड़े बल्कि जनमानस के प्रति हमारे हृदय में करुणा, सहानुभूति, सहयोग, त्याग व सौहार्द का भाव जाग्रत हुआ। मानवता व मानव-मात्र के प्रति प्रेम हमारे हृदय में पल्लवित हुआ। अंत में मैं यही कहना चाहूंगी कि यदि आपके हृदय में मनो-मालिन्य व ईर्ष्या-द्वेष का भाव व्याप्त है तो आपके महाकुंभ में स्नान करने का कोई औचित्य नहीं है। जहाँ आस्था, प्रेम, करुणा, सौहार्द, सहानुभूति, त्याग व श्रद्धा का भाव व्याप्त है, वहीं महाकुंभ है और मन का प्रभु सिमरन व चिंतन में लीन हो जाना महाकुंभ का महाप्रसाद है।

सो! महाकुंभ के महात्म्य को समझिए व अनुभव कीजिए। अपने माता-पिता में गुरुजनों का सम्मान कीजिए और असहाय व वंचित लोगों की सेवा कीजिए। जो आपके पास है, उसे दूसरों के साथ बांटिए, क्योंकि “दान देत धन ना घटै, कह गये भक्त कबीर।” हम जो भी दूसरों को देते हैं, लौटकर हमारे पास आता है, यह संसार का नियम है। इसलिए लोगों के हृदय में अपना घर बनाइए। सुख-दु:ख में समभाव से रहिए तथा सुरसा की भांति बढ़ती हुई इच्छाओं पर अंकुश लगाइए। सहज जीवन जीते हुए परहित करना सर्वश्रेष्ठ व सर्वोत्तम कार्य है, जो मुक्ति-प्रदाता है।

‘यह जीवन बड़ा अनमोल/ मनवा राम-राम तू बोल।’ मानव जीवन चौरासी लाख योनियों के पश्चात् मिलता है। इसलिए ‘एक भी साँस न जाए वृथा/ तू प्रभु सिमरन कर ले रे। अंतकाल यही साथ जाए रे।’ यही मोक्ष की राह दर्शाता है। ‘जो सुख अपने चौबारे/ सो! बलख न बुखारे।’ इसके माध्यम से मानव को अपने घर को स्वर्ग बनाने की सीख दी गई है, क्योंकि घर में ही महाकुंभ है। सब पर स्नेह, प्यार व दुलार लुटाते चलो। दुष्प्रवृत्तियों को हृदय से निकाल फेंकिए। अनहद नाद में अवगाहन कर अलौकिक आनंद को प्राप्त कीजिए। प्रकृति सदैव तुम्हारे अंग-संग रहेगी तथा पथ-प्रदर्शन करेगी। एक-दूसरे के प्रति समर्पण भाव, निष्काम कर्म व त्याग महाकुंभ से भी बढ़कर है, क्योंकि स्नान करने से तो शरीर पावन होता है, मन तो आत्म-नियंत्रण, आत्म-चिंतन व आत्मावलोकन करने से वश में होता है। ‘मन चंगा, तो कठौती में गंगा’ अर्थात् यदि मन पावन है, पंच विकारों से मुक्त है तो उसे किसी तीर्थ में जाने की आवश्यकता नहीं है। वैसे भी मन को मंदिर की संज्ञा दी गई है। मुझे स्मरण हो रही हैं स्वरचित गीत की पंक्तियाँ जो उपरोक्त भाव को प्रेषित करती हैं– ‘मैं मन को मंदिर कर लूँ/ देह को मैं चंदन कर लूँ/ तुम आन बसो मेरे मन में/ मैं हर पल तेरा वंदन कर लूँ।’ सो! चंचल मन को एकाग्र कर ध्यान लगाना अत्यंत दुष्कर कार्य है। परंतु जो भी ऐसा करने में सफल हो जाता है, जीते-जी मुक्ति प्राप्त कर लेता है।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares