मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खेळ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ खेळ… ☆  प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

संध्याकाळी

आयुष्याच्या गडद सावल्या लांबत गेल्या संध्याकाळी

आठवणींच्या तळ्यात सगळ्या मिसळत गेल्या संध्याकाळी

 

स्वप्नामधल्या ठोस प्रतिमा आदर्शाच्या मनात होत्या

काळासोबत फिरता फिरता वितळत गेल्या संध्याकाळी

 

सहजपणाने जगतानाही संघर्षाला भिडणे झाले

चालत असता अवघड वाटा चकवत गेल्या संध्याकाळी

 

अनंतकोटी ब्रम्हांडाची ओळख पुरती झाली नाही

जगण्यामधल्या मोहक बाबी फसवत गेल्या संध्याकाळी

 

अंधारातच अंदाजाने दिशा शोधल्या मानवतेच्या

मग प्रेमाच्या प्रकाश रेषा उजळत गेल्या संध्याकाळी

 

संसाराचा खेळ मांडला तो तर होता प्रभावशाली

प्रतिमा त्याच्या डोळ्यादेखत सरकत गेल्या संध्याकाळी

 

सुखदुःखाची करत बोळवण तडजोडीच्या घटना घडल्या

झंजावाती वादळात त्या उधळत गेल्या संध्याकाळी

 

खरे काय ते अखेर कळले अनुभवले ते मृगजळ होते

लोचनातल्या आसवधारा बरसत गेल्या संध्याकाळी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

अल्प परिचय 

बॅंकेतून रिटायर झाल्यावर काही वर्षे एका खाजगी कंपनीत काम केले.

कामाच्या व्यस्ततेमुळे मागे पडलेली वाचनाची आवड परत सुरू केली. कविता लेखनाची सुरुवात झाली. कवितेचे रसग्रहण हा प्रांत ही आवडू लागला आहे.

? काव्यानंद ?

☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या निशिगंध या काव्यसंग्रहात कवीने प्रेम विषयक विविध भाव वेगवेगळ्या कवितांतून वाचकांसमोर उलगडले आहेत. उदात्त ,शाश्वत ,समर्पित प्रेम तर कधी विरहाग्नीत होरपळणारे तनमन ,प्रतारणेतून अनुभवाला येणारे दुःख ,कधी प्रेमाच्या अतूटपणाबद्दल असलेला गाढ विश्वास आणि त्या विश्वासातून एकमेकांकडे मागितलेले वचन अशा विविध प्रेमभावना अत्यंत तरल पणे व तितक्याच बारकाव्याने आणि समर्थपणे काव्य रसिकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत. या संग्रहातील वचन देई मला ही कविता अशीच प्रेमात गुंतलेल्या, रमलेल्या, प्रेमावर विश्वास असलेल्या प्रियकराचे भावविश्व आपल्यासमोर साकारते.

साधारणतः प्रियकर प्रेयसीला विसरतो अशी मनोधारणा असते.या कवितेचे वैशिष्ट्य असे की येथे प्रेयसी विसरेल अशी शंका प्रियकराच्या मनात आहे.रुढ मनोभावनेला छेद देणारी ही कविता लक्षवेधी ठरते.

कवितेतील प्रेयसी जर  कवितेतील प्रियकराला विसरली तर त्याच्या स्मृतीत तिने एक तरी अश्रू ढाळावा एवढी माफक अपेक्षा करणारा प्रियकर कवीने काव्य रसिकांसमोर शब्दांतून उभा केला आहे .

☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

 विसरलीस जर कधी जीवनी एक वचन तू देइ मला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।ध्रु।।

 

प्रीत तरल ना देहवासना ही आत्म्याची साद तुला

एकरूप मी तव  हृदयाशी क्षण न साहवे द्वैत मला

पवित्र असता प्रेम चिरंतन विसरणार मी कसे तुला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।१।।

 

जगायचे ते तुला आठवत मरणही यावे तुज साठी

कधी न सुटाव्या शाश्वत अपुल्या प्रेमाच्या रेशिमगाठी

मृत्यूनंतर येउ परतुनि प्रेमपूर्तीची आंस मला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।२।।

 डॉ निशिकांत श्रोत्री

निशिगंध – रसग्रहण

प्रेम विश्वात रममाण असणाऱ्या प्रियकराच्या मनात उगीच शंका येते आणि तो प्रेयसीला म्हणतो की जर कधी जीवनात तू मला विसरलीस तरी एक वचन मात्र तू मला दे .ती विसरणार नाही याची खात्री विसरलीस जर या शब्दातून व्यक्त होते. तसेच पुढे तो म्हणतो की तू विसरलीस आणि जर कधी मी तुझ्या स्मृतीत डोकावलो म्हणजे त्याचा आठव जरी तिच्या मनात आला तर एक अश्रू मात्र तू ढाळ. भला हा शब्द अश्रूशी  निगडीत करताना तिच्या मनात त्याच्याविषयी कुठलाही गैरभाव ,गैरसमज नसावा हे सूचित केले आहे. विरह किंवा वियोग जर का झाला तर तो केवळ परिस्थितीमुळे होईल त्याच्या वर्तनाने नाही असा विश्वास या कवितेतून आपल्यासमोर व्यक्त केला गेला आहे .विसरली तरी प्रेयसी कडून वचन मागणारा, कधी तरी तिच्या स्मृतीत डोकावण्याची ,झाकण्याची मनोमन खात्री बाळगणारा हा प्रियकर मनाला मोहवून जातो.

ध्रुवपदामध्ये विसरलीस जर कधी ,तरी एक वचन दे, हा विरोधाभास मनाला भावतो.तसेच अश्रूला भला हे अत्यंत वेगळे विशेषण वापरले आहे.प्रियकराच्या सात्विक प्रेमाची साक्ष पटवणारा हा समर्पक शब्द कवितेतील आशयाला पुष्टी देतो.

 पहिल्या कडव्यात तो म्हणतो माझी प्रीत ही तरल निष्कलंक आहे .त्या भावनेत देहवासना,कामवासना नाही. तर ही आत्म्याची आत्म्याला साद आहे .तो खात्रीपूर्वक म्हणतो की तो तिच्या हृदयाशी एकरूप झाला आहे. ही समरसता, हे तादात्म्य आहे ते मनोमन झालेले आहे. त्यात अंतर नाही. त्यातले बंधन अनाठायी नाही.त्यामुळे कुठलेही ,कसलेही द्वैत अगदी क्षणा पुरते ही त्याला सहन होणार नाही.त्यांच्यातले प्रेम हे पवित्र तसेच चिरंतन आहे याची ग्वाही त्याच्या मनाला आहे त्यामुळे तो तिला कधीच विसरणार नाही हे ही तो स्पष्ट करतो. आणि असे असूनही जर कधी ती विसरली तर तो तिच्याकडून एकच वचन मागतो त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक भला अश्रू तिने ढाळावा.

देह व आत्मा यांचा उल्लेख प्रीतिला आध्यात्मिक उंची देतो.द्वैत व अद्वैत यांचा सुस्पष्ट व सुसंस्कृत विचार प्रेमाचा अर्थपूर्ण आविष्कार घडवतो.जे पवित्र ते चिरंतन हा साक्षात्कार प्रीतीच्या भावनेला पटणारा. एकरूप व द्वैत या विरोधाभासातून प्रीतिचे खरे स्वरूप प्रकटते. तुला, मला, भला अशा यमक सिध्दीने कवितेला सुंदर गेयता लाभली आहे.त्यामुळे कवितेतील भावार्थ सहजपणे लक्षात येतो.कवितेशी वाचकांची समरसता प्रस्थापित होते.

दुसऱ्या कडव्यात  प्रेयसीच्या केवळ एका अश्रूची  माफक अपेक्षा ठेवणारा तो म्हणतो की जे जगायचं ते तिला आठवत जगायचं आणि जर मरण आलं तर तेही तिच्यासाठी यावं असं त्याला वाटतं. सर्वस्व ,आपले जीवन तिच्यावर ओवाळून टाकण्याची त्याची मानसिक तयारी आहे. त्याच वेळी शाश्वत असलेल्या प्रेमाच्या रेशीमगाठी कधी न सुटाव्यात अशी योग्य व रास्त अपेक्षा तो बाळगून आहे .त्यांच्या प्रेमावर त्याची अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे त्याला खात्री आहे जर कधी मृत्यू आला तर परत येऊन म्हणजे जणू काही पुनर्जन्म घेऊन आपण या इहलोकी परतू .कारण त्याला या प्रेमपूर्तीची आस आहे.स्वतः चे प्रेयसी वरील पवित्र,शाश्वत,निरंतर प्रेम याची कल्पना,जाण तिला देता देता प्राक्तनी कदाचित येईल अशा विरहाचा विचार त्याला सर्वथैव बैचेन करतो. त्यामुळे व्यथित तो प्रेयसीच्या प्रेमाविषयी खात्री असूनही साशंकता व्यक्त करतो.पण ती व्यक्त करताना ही त्यात तिच्या शाश्वत प्रेमाचा अर्थपूर्ण उल्लेख करतो.एकमेकांच्या सान्निध्यात जगत असताना चिरंतन प्रेमभावनेची जाण असूनही शाश्वत मरणाचे भान त्याला आहे.मृत्युने वियोग घडला तरी पुनर्जन्मी पुन्हा भेट होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.तुजसाठी, रेशिमगाठी हे यमक साधले आहे.रेशिमगाठी शब्द वापरून प्रीतिची मुलायमता अधोरेखित केली आहे.

 संपूर्ण कवितेत प्रीत भावनेला सुयोग्य पणे व्यक्त करताना समर्पक व सुलभ शब्द योजना कवीने केली आहे.त्यामुळे प्रीतिचा तरल, पवित्र शाश्वत भाव मनाला स्पर्शून जातो.भावनेचा खरेपणा व त्यातली आर्तता मनाला भिडते.साहित्यिक अलंकारांचा अट्टाहास न ठेवता भावनेचा प्रांजळ पणा जपण्याचे भान कवीने ठेवले आहे. कवीची साहित्यविषयक, भाषाविषयक व काव्य विषयक सजगता यातून प्रतीत होते.साधी पण भावुकतेत न्हालेली ही कविता सर्वांना आवडेल अशीच आहे.

© सुश्री नीलिमा खरे

३-१०-२०२२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हयातीचा दाखला…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

?जीवनरंग ?

☆ “हयातीचा दाखला…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

दुपारची वेळ असेल.

साधारण दोन अडीचची वेळ.

बाहेर रणरणतं ऊन.

नीरव का काय ती शांतता.

उभी सोसायटी दुपारच्या झोपेत गुंगून आडवी झालेली..

मी सुद्धा.

जवळ जवळ सगळी मंडळी घरीच.

लाॅकडाऊनची कृपा.

दुसरं काय ?

जरा डुलकी लागतेय तर सेलफोन कोकलला.

फोन घेऊन मी बाल्कनीत गेलेलो.

गॅलरीच्या एका कोपर्यात रेंज जरा व्यवस्थित येते.

ठण्णकन् आवाज झाला.

पहिल्या मजल्यावरच्या एका बाल्कनीच्या दारावर,

एक दगड जोरात आदळला.

तसा फार काही मोठा दगड नव्हता.

असेल लिंबाएवढा.

अरे पण काय हे ?

आवाजानं बाल्कनीचा दरवाजा ऊघडला गेला.

तणतणत एक म्हातारा बाहेर आला.

खाली वाकून ओरडू लागला.

एक दहा बारा वर्षाचा पोरगा असेल.

सायकलवर टांग टाकून रफू चक्कर झाला.

म्हातारा आपला हवेतल्या हवेत बोंबलतोय.

त्याला कळतच नाहीये कुणी दगड मारलाय ते ?

बाकी सोसायटीला याच्याशी काहीही घेणंदेणं नाहीये.

एक तर कंपाऊडबाहेरून दगड आलाय.

आपल्या बाल्कनीत तर नाही ना पडला ?

छोड्डो यार..

सोसायटी फक्त या कुशीवरनं त्या कुशीवर.

ढारफूस….

मीही फारसं लक्ष दिलं नाही.

द्वाड पोरगं असेल एखादं.

दोन दिवसांनंतरची गोष्ट.

डिट्टो तसाच फोन आलेला.

डिट्टो तीच वेळ.

मी डिट्टो तसाच गॅलरीत ऊभाय..

अन् रिपीट टेलीकास्ट.

सायकलवालं तेच द्वाड पोरगं.

नेम धरून दगड मारलेला.

म्हातारा तणतणत बाल्कनीत आलेला.

पोरगं छू मंतर.

च्यामारी…

हे रोज होतंय की काय ?

पुढल्या दिवशी मी मुद्दामहून गॅलरीत उभा.

बरोब्बर त्याच वेळी.

ठरवल्यासारखं सगळं तसंच घडतंय.

मला म्हातार्याची कीव आली.

सहन करण्याच्या पलीकडे आहे हे सगळं.

आज मी तयारीतच होतो.

धडाधड पायर्या खात जिना ऊतरलो.

गाडीला किक् मारून सोसायटीच्या गेटबाहेर..

फार लांब जाणं शक्यच नव्हतं.

लाॅकडाऊन चालूय.

दोन तीन सोसायटी मागे टाकल्या.

किधर कू गया वो ?

एका सोसायटीच्या आत शिरणारं ते पोरगं दिसलं.

मी तिकडे गाडी दामटली.

सोसायटीत शिरेपर्यंत पोरगं गायब.

लगोलग वाॅचमनला गाठला.

ए -202.

तिथं पोचलो आणि बेल दाबली.

दरवाजा ऊघडला गेला.

पोराच्या बापानं दरवाजा ऊघडला.

पोरगं पॅसेजच्या पडद्यामागे लपलं.

बाप चांगला माणूस वाटला.

त्याला सगळा किस्सा सांगितला.

त्याला खरंच काही माहिती नव्हतं.

तो पेटलाच एकदम.

पडद्यामागनं पोराला खेचला त्यानं.

तो त्याला तुडवणार…

एवढ्यात,

त्या पोराची आई मधे पडली.

“थांबा.

सलीलची काहीही चूक नाहीये यात.

मीच सांगितलं होतं त्याला तसं करायला.

तो म्हातारा बाप आहे माझा.

मागच्या वर्षी आई गेली.

तेव्हापासून एकटेच राहतात ते.

माझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये त्यांना.

एकुलती एक मुलगी मी त्यांची.

पळून जाऊन लग्न केलं होतं मी.

राग अजूनही गेला नाहीये त्यांचा…”

पोरग्याची आई डोळे पुसत बोलतच होती.

“इतके दिवस मेरठला होतो आम्ही.

आत्ता सहा महिन्यापूर्वीच आलो इथं.

मुद्दामहून त्यांच्या घराजवळ जागा बघितली.

माझा आवाज ऐकला की फोन बंद करतात.

मी फोन करेन की काय भिती वाटते त्यांना.

आता तर फोन वापरणंच बंद केलंय.

जीव तुटतो माझा..

दगड मारणं चुकीचंच आहे मान्य.

ते तणतणत बाहेर आले की बरं वाटतं.

सगळं ठीकेय म्हणायचं.

हयातीचा दाखला मिळतो मला.

कोरोनाच्या राक्षसाची भिती वाटते हो फार.

मी तरी काय करू सांगा हो ?”

मला काही बोलताच येईना.

“ताई, ती दगडफेक बंद करायला सांगा आधी.

नसतं काही प्रकरण व्हायचं.

तुम्ही काळजी करू नका.

मी लक्ष ठेवीन त्यांच्याकडे.

तसं काही वाटलं तर लगेच कळवीन तुम्हाला.”

बापाची लाडाची (?) लेक.

ओल्या डोळ्यांनी हसली.

मी बाहेर पडलो.

काल संध्याकाळी म्हातार्याला गाठला.

खाजवून खरूज काढल्यासारखा तोच विषय काढला.

म्हातारा चवताळला.

शिव्या घातल्यानी पोरीच्या नावाने.

ती मेलीय माझ्यासाठी.

शेवटी…

ढसाढसा रडला.

त्याला म्हणलं.

“दोन्ही मुलगेच मला.

लेकीसाठी जीव तडफडतो.

देवानं दिलेलं दान का आथाडताय ?

विसरून जा सगळं.

जावई भला माणूस आहे तुझा..”

म्हातारा खांदेओल रडला.

“मला घेऊन जातोस तिच्याकडे ?”

आजच सकाळी आठ वाजता.

तिच्या घराची बेल वाजवली.

म्हातारा लपाछपी खेळत असल्यासारखा,

दरवाज्याच्या अलीकडेच लपलेला.

ती दार ऊघडते.

मी एवढंच म्हणतो…

“तुझा हयातीचा दाखला घेऊन आलोय.”

पुढचा धपांडी ईष्टाॅपचा कार्यक्रम बघायला ,

मी तिथे थांबतच नाही.

मन वढाय वढाय !

* माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही *

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्ट्रॅटॅजिक प्लॅनिंग…. ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ स्ट्रॅटॅजिक प्लॅनिंग…☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

Strategic Planning

तुम्हाला ठाऊक आहे का ??जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्याना ‘ Strategic Planning ‘ चा वस्तुपाठ म्हणून कोणत्या लढाई बद्दल शिकवले जाते..???

जगाच्या इतिहासात अशी लढाई पुन्हा झाली नाही…

२५ फेब्रुवारी

तो फक्त २८ वर्षांचा तरुण सेनापती होता.  त्याचा शत्रू वयाने, अनुभवाने दुप्पट, वर कसलेला सेनापती. त्या तरुण वीराकडे सैन्य फक्त २५,००० आणि त्याच्या शत्रूकडे ४०,००० आणि ६५० तोफांचा त्या काळातील सर्वोत्तम तोफखाना.

नेमका तो तरुण सेनानायक राज्यापासून दूर दक्षिण दिशेला असताना, शत्रूच्या राजाने खुद्द राजधानीवर चाल केली, आपल्या बलाढ्य फौज व तोफखान्यासह…शत्रूची ही अपेक्षा की तो तरुण त्याची राजधानी वाचवण्यासाठी धावत येईल आणि आपल्या तावडीत सापडेल….पण…पण …घडले भलतेच : तो तरुण वायूवेगाने दक्षिणेतून निघाला आणि अचानक शत्रूच्या राज्यात आतपर्यंत शिरला, नुसता धुमाकूळ घालत लुटालूट सुरू केली. शत्रूला आता त्याच्या मागे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. तो राजधानी जिंकण्याचा विचार सोडून त्या तरुण वादळामागे धावला, पण वादळच ते…कधी खानदेश, तर कधी मराठवाडा तर अचानक गुजरात अशी शत्रूची आपल्यामागे फरपट करत होते..त्यातून अचानक बातमी आली – ते वादळ माळव्यात शिरले. आता शत्रूची खाशी राजधानीच मारणार …शत्रूला वेगवान हालचाली करता येत नव्हत्या म्हणून त्याने त्याचा तोफखाना मागे सोडून दिला आणि त्या वादळाचा पाठलाग सुरू केला पण हाती काहीच लागेना. 

अन तश्यातच बातमी आली, शत्रूचा मागे सोडलेला तोफखाना त्या तरुण पोराने लुटून नेला…शत्रू आता पूर्ण हताश होऊन मराठवाड्यातल्या एका गावापाशी थांबला. दिवस उन्हाळ्याचे होते, रणरणता मराठवाड्याचा उन्हाळा, पाण्यासाठी नुसती घालमेल झालेली. शत्रूचे सैनिक जेव्हा पाणी आणायला जवळच्या तलावाजवळ पोचले तर पाहतात तो काय? ते तरुण वादळ आणि त्याचे सैन्य तलावाची वाट अडवून उभे…पाणीच तोडले, आधीच दमछाक आणि आता पाणी तोडले. 

अखेर व्हायचे तेच झाले…तो बलाढ्य, अनुभवी शत्रूराजा एका तरुण पोराला शरण आला. शत्रूचा सम्पूर्ण पराजय, तोही आपला एकही सैनिक न गमावता…

जगाच्या इतिहासात अशी लढाई झाली नाही…आजही जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांना ही लढाई Strategic Planning चा वस्तुपाठ म्हणून शिकवली जाते.

२५ फेब्रुवारी १७२८ – पालखेडची लढाई

तो बलाढ्य शत्रू  :- निजाम उल मुल्क 

वय : ५७,

ते तरुण वादळ :- श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे 

वय : २८ फक्त….

आपल्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा असा जाज्वल्य इतिहास माहीत असायलाच हवा…

पण आपले दुर्दैव की पेशवे म्हणजे  बाहेरख्याली. पेशवे म्हणजे मौजमजा करणारे, असं काहीस समोर आणलं जातं. पेशवे ब्राह्मण होते म्हणून त्यांचा  तेजस्वी इतिहास जाणून बुजून झाकून ठेवून विकृतपणा समोर आणला जातो. हे आपल्या गौरवशाली इतिहास असलेल्या देशासाठी घातक आहे…

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. ! …जयंत जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…! …जयंत जोशी  ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

“आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. !

….एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो. जो जातो तो सुटतो , पण परीक्षा असते मागे राहणाऱ्याची…. कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार ? हे तर भगवंतालाच माहीत… 

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं, अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !

आता प्रश्न असा असतो की ही आसवं, हे रडणं थांबवायचं कुणी…? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?…. 

निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची….

थोडक्यात काय तर….दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडील होता आलं पाहिजे…..!

लक्षात ठेवा, लहानपणी आई वडिलांनी नेहमी मुलांचे अश्रू पुसलेले असतात, आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात, स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात,

परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात.

म्हणूनच आता ही आपली जबाबदारी असते… त्यांच्या सारखंच निस्वार्थ प्रेम करण्याची….

असं झालं तरच ते आणखी जास्त आयुष्य समाधानाने जगू शकतील.  नाहीतर ” तो माणूस म्हणजे वडील ” किंवा ” ती स्त्री म्हणजे आई ” तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !

आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही, 

तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची …….सर्वांची असते !

फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच, ही माणसं जगू शकतील !

आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ……

म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या ! केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा. त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !

उद्या हा प्रसंग प्रत्येकावर येणार आहे याची जाणीव ठेवून नेहमी त्यांच्याशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

लक्षात असूद्या,आई वडील हेच आपले खरे दैवत, त्यांची जिवंतपणीच काळजी घ्या, ते गेल्यावर तुमचे चारिधाम अथवा लाखोंचे दान देखील तुमच्या कामी येणार नाही…..!!

लेखक : जयंत जोशी 

संग्राहिका : वीणा छापखाने 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #163 – 49 – “ख़्वाब में तेरे जागते हुए सोते हैं…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “ख़्वाब में तेरे जागते हुए सोते हैं…”)

? ग़ज़ल # 49 – “ख़्वाब में तेरे जागते हुए सोते हैं …” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

मैंने तो सच कहा तुम्हें बहाने लगे,

इश्क़ है तुम्हें कहने में ज़माने लगे।

नज़दीक आओ ज़रा पी लें इन्हें,

वस्ल में  ये आँसू क्यों बहाने लगे।

ख़्वाब में तेरे जागते हुए सोते हैं,

सोने दो यार  क्यों जगाने लगे।

हम समझे थे  तुम्हें नातजुर्वेकार,

बातों में यार तुम बड़े सयाने लगे।

बेकार का झगड़ा है  ये वस्ल-जुदाई,

शुकूं मिला जाम पे जाम चढ़ाने लगे।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈




English Literature – Poetry ☆ ‘शब्दकोश’… श्री संजय भारद्वाज (भावानुवाद) – ‘Paradoxical Dictionary…’ ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. Presently, he is serving as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad is involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi poem “शब्दकोश   .  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)

श्री संजय भारद्वाज जी की मूल रचना 

?  शब्दकोश ??

वह लिखती रही विरह,

मैं बाँचता रहा मिलन,

चलो शोध करें,

दृष्टि बदलने से

शब्द का अर्थ

बदल जाता है क्या?

…और पता नहीं कैसे

मेरे पास बदले अर्थों का

एक शब्दकोष

संचित हो गया है..!

© संजय भारद्वाज

 English Version by – Captain Pravin Raghuvanshi
? Paradoxical Dictionary ??

She kept writing

about the separation,

and I professed

about the union…

Let’s brainstorm,

if changing the vision,

changes the meaning

of the word?

…And, I don’t know

as to how I have got

a huge dictionary of

changed meanings…!

~Pravin

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈




हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – परिसीमा ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री महालक्ष्मी साधना सम्पन्न हुई 🌻

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – परिसीमा ??

उभरते हैं

फ़र्श पर ,

दीवार पर

भित्तिचित्र,

माँडने-पगल्ये

लोकशैली,

मॉडर्न आर्ट,

आदिम से लेकर

अधुनातन अभिव्यक्ति,

झट मोबाइल कैमरा

क्लिक करता हूँ,

बाल उत्साह से

परिणाम निरखता हूँ,

अपनी बेचारगी पर

खीज़ उठता हूँ,

इमेज के नाम पर

कोरा फर्श, कोरी दीवार,

जब देखता हूँ,

तब…,

सूक्ष्म और

स्थूल का अंतर

जान जाता हूँ,

मन की आँख से

दिखते चित्र

कैप्चर नहीं कर सकता कैमरा

मान जाता हूँ….!

© संजय भारद्वाज

संध्या 6:27 बजे, 10.10.22

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈



हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 40 ☆ मुक्तक ।। भाई बहन के अटूट बंधन का प्रतीक भाई दूज का पर्व ।।☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं।  आप प्रत्येक शनिवार श्री एस के कपूर जी की रचना आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण मुक्तक ।।भाई बहन के अटूट बंधन का प्रतीक भाई दूज का पर्व।।)

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 40 ☆

☆ मुक्तक  ☆ ।।भाई बहन के अटूट बंधन का प्रतीक भाई दूज का पर्व।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆ 

।। 1।।
भाई बहन के प्रेम स्नेह, का प्रतीक है भाई दूज।

एक तिलक की ताकत का, का यकीन है भाई दूज।।

सदियों से यही विश्वास, चलता चला आया है।

इसी अटूट बंधन की एक, लकीर है भाई दूज।।

।। 2।।
बहुत अनमोल पवित्र रिश्ता, भाई बहन का होता है।

बहन के हर दुख सुख में, भाई बहुत ही रोता है।।

रक्षा बंधन या त्यौहार हो, यह भाई दूज का।

जो निभाता नहीं ये रिश्ता वो, अपना सब कुछ खोता है।।

।।3।।
निस्वार्थ निश्चल प्रेम का एक, उदाहरण है भाई दूज का दर्प।

अनमोल रिश्तों की लड़ी का, उदाहरण है भाई दूज का गर्व।।

भावना संवेदना का प्रतीक, यह एक टीका और तिलक।

भाई बहन के अमूल्य रिश्तों, काआइना है भाईदूज का पर्व।।

।।4।।
रोली चावल चंदन टीके का, थाल सजा कर लाई हूं।

अपने प्यारे भैया की मूरत, दिल में बसा कर लाई हूं।।

‘मेरे भैया रक्षा करना मेरी सारी, उम्र कि सौगंध तुमको देनी है।

एक तिलक में प्यार का सारा, संसार लगा कर लाई हूं।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈



हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 106 ☆ गजल – “समय…”☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित एक गजल – “समय…” । हमारे प्रबुद्ध पाठकगण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।) 

☆ काव्य धारा #106 ☆  गजल – “समय…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

जग में सबको हँसाता है औ’ रूलाता है समय

सुख औ’ दुख को बताता है औ’ मिटाता है समय।

 

चितेरा एक है यही संसार के श्रृंगार का

नई खबरों का सतत संवाददाता है समय।

 

बदलती रहती है दुनियाँ समय के संयोग से

आशा की पैंगों पै सबकों नित झुलाता है समय।

 

भावनामय कामना को दिखाता नव रास्ता

साध्य से हर एक साधक को मिलाता है समय।

 

शक्तिशाली है बड़ा रचता नया इतिहास नित

किन्तु जाकर फिर कभी वापस न आता है समय।

 

सिखाता संसार को सब समय का आदर करें

सोने वालों को हमेशा छोड़ जाता है समय।

 

है अनादि अनन्त फिर भी है बहुत सीमित सदा

जो इसे है पूजते उनको बनाता है समय।

 

हर जगह श्रम करने वालों को है इसका वायदा

एक बार ’विदग्ध’ उसको यश दिलाता है समय।

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈