मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… वासंती – भाग – ३७/२  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… वासंती  – भाग – ३७/२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

वासंती

(भाऊने पसंत केलेली शंभरावी, सुंदर वासंती आज पर्यंत ज्या कुटुंबात फक्त प्रेमाचीच कारंजी उसळली, एकमेकांसाठी कठीण परिस्थितीतही सारी भक्कमपणे उभी राहिली त्या कुटुंबात वासंतीचे अस्तित्व एका उसवू पाहणाऱ्या ठिगळासारखे जाणवायला लागलं.) – इथून पुढे 

सुरुवातीला तिची दबक्या आवाजातली भाऊशी कुरबूर सुरू झाली. भाऊ दुर्लक्ष करायचा म्हणून मग मोठ्या आवाजात खोलीच्या बाहेर भांडणं आली. सारं घर हादरलं.

वासंतीला वेगळं व्हायचं होतं. तिच्या मनासारखं घर तिला थाटायचं होतं. इथे राहणं तिला अजिबात आवडत नव्हतं पण भाऊ असहाय्य होता. एक तर कुटुंबावर त्याचं अतिशय प्रेम होतं आणि दुसरा व्यावहारिक मुद्दा म्हणजे स्वतंत्र घर घेण्यापासून ते चालवण्यापर्यंत लागणारं आर्थिक सामर्थ्य त्याच्यात नव्हतं. इथे कमावणाऱ्या पाठच्या भावांच्या साथीने एकत्र राहणं नक्कीच अवघड नव्हतं. शिवाय एकमेकात जिव्हाळा होता. नाना तर्‍हेने त्याने वासंतीला हे पटवण्याचा प्रयत्न केला पण तिचं म्हणणं एकच, ” तुमच्याच जीवावर तुमचे भाऊ मोठे झाले ना मग आता त्यांनी तुम्ही त्यांच्यावर खर्च केलेले धन द्यावं की परत तुम्हाला! या निमित्ताने त्यांनी त्याची परतफेड करायला हवी. ” भाऊच काय वासंतीच्या या बोलण्याने सारं घर कळवळलं. वासंतीने नात्यातला सारा गोडवाच शोषून घेतला. त्यानंतर सगळंच हळूहळू तुटत गेलं. वासंतीने कुठल्याच नात्याचा, कुणाच्या वयाचा आदर बाळगलाच नाही. तिच्यासाठी ते घर, घरातली माणसं म्हणजे जणू काही एक उकिरडा होता, नरक होता. ती केव्हाही कुणालाही मनाला येईल ते जिभेला बांध न घालता, वारेमाप बोलत सुटायची. भाऊ तर तिच्यासाठी एकदम फोडणीतून बाजूला काढलेल्या कढीपत्यासारखा होता. येता जाता ती त्याला म्हणायची, ” मुलांना जन्म देताना तरी विचार करायचा? त्यांचं भविष्य घडवण्याची क्षमता नाही तुमच्यात तर कशाला संसार मांडलात? भावांचेच संसार ओढायचे होते ना आयुष्यभर! उपयोग काय हो तुमच्या हुशारीचा? पुढे येण्यासाठी काही मेहनत केलीत का? यापुढे तरी कराल का? माझ्या आई बापाने काय पाहिलं तुमच्यात कोण जाणे! अशा अडाणी, स्वार्थी कुटुंबात त्यांनी मला ढकलून दिलं! ”

मग दिवस असो, करकरीत संध्याकाळ असो, तिथे फक्त भांडण, रडणं, अबोला आणि भयाण मौनातील अमंगल, अशुभ शांतता!

एकंदरच दिघे कुटुंबाची स्वस्थता हरपली. चार भिंतीतली प्रतिष्ठा पणाला लागली. घर म्हणजे असतं एक विसाव्याचं स्थान. थकूनभागून आल्यानंतर सुखसंवाद घडवणारं ठिकाण असतं पण ते सारं उध्वस्त होत होतं. कुणालाच घरी परतावंसं वाटत नव्हतं. जिथे एकेकाळी सुखद वारे वाहत होते तिथे तप्त लाव्हा रसाचीच धग जाणवायला लागली होती. केवळ एका व्यक्तीमुळे. भाऊने पसंत केलेली ही शंभरावी सुंदर मुलगी वासंती हिच्यामुळे. वासंती आमच्या घराची खलनायिका ठरली. माणसं, नाती पर्यायाने कुटुंब पार दुभंगलं. जिजीचं दुसरं भाष्यही खरं ठरलं. “चापू चापू दगड लापू. ”अतिचिकित्सेचं कडू फळ!

भाऊचं वासंती वर फार प्रेम होतं ते जाणवायचं पण तो तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, महत्त्वाकांक्षापूर्तीसाठी अपुरा ठरला. एक हुशार, देखणा, कुटुंब बांधून ठेवण्यासाठी धडपडणारा भाऊ अखेर व्यसनाधीन झाला. नैराश्याच्या गर्तेत लोटला गेला. वासंतीचे माहेरी जाणं, तिथेच मुलांना घेऊन महिनो नि महिने राहणं आताशा वाढलं होतं. ती माहेरच्या आधाराने भाऊला धमक्याही द्यायची म्हणे!

एकदा भाऊ माझ्या आईजवळ म्हणाला होता, ” मालू वहिनी तू आमच्या घरातली आदर्श व्यक्ती! तू तर एका श्रीमंत बापाची मुलगी पण आमच्या “जनाचा” संसार कसा छान सांभाळलास! आज “जना” जो काही आहे तो केवळ तुझ्यामुळे. जिजी आमची मावशी असूनही तू आम्हाला जवळची वाटतेस.

माझंच नशीब असं फुटकं का ग? ” तेव्हा आई त्याला म्हणाली होती, ” असं बोलू नकोस. आपल्याही काही चुका असतील. वासंतीला समजावून घेण्यात आपणच कमी पडत असू. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि वासंतीतही अनेक गुण आहेत रे! कला आहेत. दिवाळीत ती रांगोळ्या किती सुंदर काढते! तुमचे “जना” तर तिच्या हातच्या पोळ्या आणि वालाच्या बिरड्याचं इतकं कौतुक करत असतात! नीटनेटकं कसं राहावं ते तिच्याकडूनच शिकावं. संसाराच्या तिच्या काही वेगळ्या कल्पना असतील. तुमच्यातल्या मतभेदामुळे आणि भिन्न वृत्तीमुळे नात्यांमध्ये या दर्‍या निर्माण झाल्यात. त्या बुजण्यापेक्षा अधिक खोल होत आहेत पण अजूनही वेळ गेलेली नाही भाऊ. खरं म्हणजे तुझी जबाबदारी आहे हे सारं नीट करण्याची. सगळ्याच काही मराठी चित्रपटातल्या सुलोचना नसतात हे लक्षात ठेव. “ त्या दिवशी भाऊने आईला अक्षरश: साष्टांग नमस्कार घातला आणि तो मुकाटपणे निघून गेला.

आज मी जेव्हा या घटनांचा दुसऱ्या बाजूने विचार करते तेव्हा मला आईचे हे शब्द आठवतात. बालमनावर असे मी म्हणणार नाही कारण त्यावेळी आम्ही अर्धवट वयात होतो.. आमच्यावर हेच रुजले होते की वासंती म्हणजे भांडकुदळ, बेलाभांड, शिवराळ, घरभेदी स्त्री. प्रथम दर्शनी तिच्या सौंदर्याने प्रभावित झालेल्या आम्हाला नंतरच्या भागात मात्र ती परीकथेतील कुरूप, दुष्ट, चेटकीण भासायला लागली होती. आमच्या घरातला “वासंती” हा एक अत्यंत नकारात्मक घटक ठरला होता. जिने भाऊचं जीवन उध्वस्त केलं होतं.

पुष्कळ दिवस, महिने, वर्ष सरली. खूप बदल झाले. पपी, बाळू चतुर्भुज झाले. त्यांचे संसार मार्गाला लागले. आमच्या लाडक्या कुमुदआत्याचं निधन झालं. वासंतीचं अस्तित्व जरी ठिगळ लावल्यासारखं विसंगत होतं तरी तेही कायमस्वरूपी राहिलं. स्टेशन रोडवरचं त्यांचं घर रीडेव्हलपमेंटला गेलं आणि कालांतराने प्रत्येक भावाला स्वतंत्र दोन-तीन खोल्यांचे असे मोठे फ्लॅट्स मिळाले. वेगळं होण्याचं वासंतीचे एकेकाळचं स्वप्न अशा रीतीने पूर्ण झालं म्हणायला हरकत नाही. या व्यवहारात कुमुदआत्याच्या परिवाराची मात्र होरपळ झाली. ज्या जावयाने आप्पांवर शेकलेल्या गंभीर प्रकरणातून त्यांची सहीसलामत सुटका केली आणि आयुष्यभर पत्र्याचे छत असलेल्या माळ्यावर आनंदाने राहण्याचे पत्करले त्यांची मात्र घराच्या या व्यवहारात दखल घेतली गेली नाही हे गैर झाले. गुलाबमावशी आणि आप्पांचीही वाटणी झाली. बाळूने आणि बाळूच्या बायकोने मात्र डीमेन्शिया झालेल्या गुलाबमावशीला मरेपर्यंत सांभाळले.

वासंती बदलली की नाही माहीत नाही पण निवळली असं वाटायचं पण तरीही वासंतीची “घरभेदी” प्रतिमा कुटुंबीयांच्या मनावरून पुसली जाणं जरा अशक्यच होतं. कुटुंबाचे तुकडे तिच्यामुळेच झाले हा दगडावरचा ठसा ठरला.

माझ्या लग्नानंतर मी माहेरी आले असताना वासंतीला भेटायला गेले होते. भाऊ घरात नव्हताच पण ती होती. वयानं थकलेली जाणवत होती. तिच्या देहावरच्या लावण्य खुणा विझलेल्या दिसत होत्या. डोळ्याखालची काळी वर्तुळं त्यात भर घालत होती. तिला भेटायला जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे किरण, संजय, अमिता. आम्हा सर्वांनाच त्यांच्याविषयी उपजत ओढा होता. अखेर ती आमची भावंडच होती ना!

माझं पहिलं लक्ष गेलं ते वासंतीच्या दारात रेखलेल्या सुरेख रांगोळीवर. रांगोळी.. छोटीशीच पण कलात्मक. दारावर तोरण होतं. वसंतीने माझं अगदी प्रेमाने स्वागत केलं. तिने स्वतःच्या हाताने उत्कृष्ट स्वयंपाक माझ्यासाठी रांधला होता. तिच्या हातच्या साध्या वरण-भातालाही काय स्वाद होता! मी तिला तसं म्हटल्यावर तिचे डोळे पाणावले. म्हणाली, ” तुझ्या पप्पांना मी केलेला प्रत्येक पदार्थ आवडायचा आणि ते तोंडभरून कौतुक करायचे. ”

मी काही बोलले नाही पण मला एक सहज आठवलं. त्यावेळी पप्पा वासंतीचे कौतुक करत असताना गुलाब मावशी एकदा म्हणाली होती, ” चांगलं न व्हायला काय झालय? तेल बघा केवढं घातलंंय! ” असो!

ता तो साराच भूतकाळ होता.

वासंतीकडून परतताना तिने माझी ओटी भरली. तिने स्वतः गुंफलेला मोगर्‍याचा गजरा माझ्या केसात माळला आणि म्हणाली, ” अशीच येत जा बरं का! पुढच्यावेळेस जावईबापूंना घेऊन ये. ”आज हे सारं तुम्हाला सांगताना, लिहिताना माझे डोळे भरून आलेत. अनेक घटनांची प्रतिबिंबे त्या पाण्यात तरळत आहेत. आयुष्याचे इतके टप्पे ओलांडल्यानंतर, नानाविध अनुभव घेतल्यानंतर, अनेक व्यक्तींचे स्वभाव, जीवनं जवळून, लांबून पाहिल्यानंतर मनाच्या पातळीवर परिपक्व झाल्यानंतर एकच वाटतं आपण कुणाही बद्दल पटकन इतके निर्णयात्मक का होतो…?

का नाही थांबत? का नाही वाट पहात?

अलिप्तपणे का विचार करू शकत नाही…?

– समाप्त –

– क्रमश: भाग ३७

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिल ढूंढता है… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ दिल ढूंढता है… ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर

“मौसम” चित्रपटातील संजीवकुमारवर चित्रीत झालेलं हे गुलजार लिखित गाणं, मला फार भावलं…. चित्रपटातील नायक तीस वर्षांपूर्वी जिथं जिथं नायिकेसोबत फिरलेला असतो, तिथं तिथं उतारवयात जातो तेव्हा त्याला नायिकेसोबत, तारुण्यातील तो स्वतः देखील दिसू लागतो… वर्तमानात तो भूतकाळातील एकेक गोष्टी अनुभवतो…

आज मी वयाची पासष्टी पूर्ण करुन सहासष्टीमध्ये पाऊल टाकलंय.. माझीही अवस्था, पडद्यावरील संजीव कुमारसारखीच झालेली आहे… वयाच्या पाचव्या वर्षापासूनच्या घडून गेलेल्या गोष्टी, प्रसंग व घटना मला आजही स्वच्छ आठवताहेत…

मी चालू लागतो.. भरत नाट्य मंदिराजवळचं पावन मारुतीचं छोटं मंदिर दिसतं.. इथंच माझं बालपण गेलं. एक वर्षाचा असल्यापासून ते माझं लग्न होईपर्यंतची आयुष्यातील माझी सत्तावीस वर्षं याच परिसरात गेली..

मी चार वर्षाचा असताना आई बाहेर गेली होती म्हणून ती कुठे दिसते आहे का? हे पाहण्यासाठी फिरत फिरत मी महाराष्ट्र मंडळापर्यंत पोहोचलो.. माझा रस्ता चुकलेला पाहून, एका हवालदाराने मला पेरुगेट पोलीस चौकीत नेऊन बसविले… काळजीपोटी माझी आई शोधत शोधत त्या चौकीत पोहोचली.. तेव्हा मी निवांत स्टुलावर बसलेलो होतो.. मी आत्ता चौकीत डोकावलं तर, कंठ दाटून आलेल्या आईने मला उचलून कडेवर घेतलेलं दिसत होतं…

भावे प्राथमिक शाळेत मी पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत होतो.. परवा सकाळी तिथून जाताना मला तिसरीच्या वर्गातील मुलं व मुली रांगेनं रस्त्याच्या कडेने, विजय टाॅकीजकडे ‘देवबाप्पा’ चित्रपट पहाण्यासाठी जाताना दिसली.. त्यात मी देखील होतो… मोठा झाल्यावर मी चित्रपटांच्याच जाहिराती करणार असल्याची ती ‘नांदी’ होती…

मी चालत चालत टिळक रोडवरील माझ्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये पोहोचलो.. सहावीत असताना मी आजारी पडलो होतो.. बरा झाल्यानंतर मी शाळेत गेलो तरी आई मला घरुन डबा घेऊन येत असे.. वर्गात तास चालू असताना मित्रांनी माझ्या आईला पाहिलं की, सरांना ते सांगायचे.. मग मी बाहेर येऊन ग्राऊंडच्या बाजूला फरशीवर बसून डबा खात असे.. येताना तिने गरम पाणी भरुन तांब्या व फुलपात्रही आणलेलं असे… आज ती माउली या जगात नाही.. मात्र आता, तिच्यासमोर मला जेवताना पाहून, माझे डोळे भरुन आलेले आहेत…

शाळा झाल्यानंतर बीएमसीसी मध्ये प्रवेश घेतला.. मित्रासोबत परवाच्या रविवारी काॅलेज जवळून जाताना त्याला मी थांबवलं.. तो गाडी स्टॅण्डला लावून मोबाईलमध्ये हरवून गेला.. मी काॅलेजच्या दरवाजासमोर जाऊन उभा राहिलो… समोर पाहतो तर ‘मंथन’ या हस्तलिखित मासिकाचे संपादक मंडळातील सर्वजण, माझ्यासह फोटोसाठी उभे राहिलेले दिसत होते.. त्या फोटोनंतर मी मित्रांचे फोटो काढू लागलो.. माझ्या ‘पाॅंचवा मौसम’ या कथेतील नायिका, ‘रेवती’ इथेच मला भेटली होती…

काॅलेजनंतर नाटक, चित्रपटांच्या जाहिराती करण्याचा व्यवसाय, मी खालकर तालीम जवळील ‘गुणगौरव’ या इमारतीत सुरु केल्यावर अनेक ज्येष्ठ कलाकार व निर्मात्यांशी जवळून संपर्क आला.. काही दिवसांपूर्वी मी तिथून जाताना, माझ्या टीव्हीएस फिफ्टीवरुन शरद तळवलकरांना चिमणबागेतील त्यांच्या घरी सोडताना स्वतःलाच पाहिले…

अरविंद सामंत यांनी ‘थरथराट’ चित्रपटाचे काम करुन घेतल्यानंतर त्यांनी, त्यांच्या लक्ष्मी रोडवरील ऑफिसमध्ये बसून इथेही काम करत जा असे मला सांगितले होते.. गेल्या आठवड्यात मी त्या ऑफिसवर गेलो… तेव्हा अरविंद सामंत खुर्चीवर बसलेले दिसले.. त्यांच्या समोर मी बिल घेऊन उभा होतो.. त्यांनी त्यांची व्हीआयपीची सूटकेस बंद केली व मला पुढच्या शुक्रवारी आल्यावर मी बिलाचा चेक देईन असे सांगितले… मला मनातून त्यांचा खूपच राग आला होता, ते ओळखून अरविंद हसले व म्हणाले.. ‘चिडका दोस्त’…

माझा मुलगा भावे स्कूल शाळेत शिकला.. काही दिवसांपूर्वी मला घरी जाण्यास उशीर झाला होता.. रात्रीचे साडेदहा वाजले होते.. सहलीला गेलेल्या मुलांची बस अजूनही आलेली नव्हती.. पावसाची रिपरिप चालू होती व शाळेच्या फाटकापाशी मी छत्री घेऊन मुलाची वाट पाहताना दिसलो….

काही दिवसांपूर्वी अप्पा बळवंत चौकात गेलो होतो तेव्हा संस्कृती प्रकाशनाची इमारत दिसली… इथे मी काही वर्षे अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे साकारली… मी पहात होतो, मानपत्रांच्या दोन फ्रेम्स घेऊन मी संस्कृतीचा जिना चढत होतो…

गेल्या महिन्यात मी टिळक रोडवरील साहित्य परिषदेच्या बसस्टाॅपवर उभा होतो.. मागे वळून पाहिलं तर मसापच्या सभागृहात माझ्याच विवाहाचा स्वागत समारंभ चालू होता… गावाहून आलेले नातेवाईक, सदाशिव पेठेतील शेजारी व बरीच मित्रमंडळी दिसत होती…

पंधरा दिवसांपूर्वी केके मार्केट समोरील ‘वाशिष्ठी’ बिल्डींग जवळून जाताना माझे लक्ष गॅलरीकडे गेले.. कोरोनाच्या काळात ‘फेसबुक लेखक’ म्हणून घडणारा, एकाग्र चित्ताने मोबाईलवर टाईपिंग करीत असलेला मी दिसलो….

गेल्याच महिन्यात माझ्या उजव्या डोळ्याचं मोतिबिंदूचं ऑपरेशन झालं.. एक महिनाभर नारायण पेठेतील ऑफिस बंद होतं… नेहमीच्या ग्राहकांना महिन्यानंतर काम करु शकेन, असं व्हाॅट्सअपवर कळवलं होतं… कालच मी नवीन चष्मा करुन घेतला व ऑफिसमध्ये येऊन बसू लागलो… दिवसभरात कुणी आलं नाही की, नैराश्य यायचं… अशावेळी आतापर्यंत मला दिसणारा ‘तो’ समोर आला व म्हणाला, ‘सुरेश, हा महिनाभराचा काळ खरं तर स्वल्पविराम होता.. पूर्णविराम नक्कीच नव्हता, पुन्हा तुझी कामं चालू होतील…. All the best!!!

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कीटकभक्षी मांसाहारी वनस्पती” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “कीटकभक्षी मांसाहारी वनस्पती…☆ श्री जगदीश काबरे ☆

सस्तन प्राण्यांमध्ये जसे शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे प्राणी आढळतात त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी वनस्पती असतात. आश्चर्य वाटले ना! पण हे खरे आहे. कारण निसर्गाचा नियमच आहे ‘जिवो जीवस्य जीवनम्’…

कीटकभक्षी वनस्पती म्हणजे अशा वनस्पती ज्या कीटक आणि इतर प्राण्यांना खाऊन स्वतःचे पोषण मिळवतात, विशेषतः अशा ठिकाणी जिथे मातीमध्ये पुरेसा नायट्रोजन नसतो.

अशा काही कीटक भक्षी वनस्पतींची उदाहरणे पाहूया…

1) व्हीनस फ्लायट्रॅप (Venus flytrap): या वनस्पतीची पाने सापळ्यासारखी असतात आणि कीटक येताच ती लगेच बंद होतात.

2) पिचर प्लांट (Pitcher plant): या वनस्पतींच्या पानांचे रूपांतरण भांडे किंवा घडासारखे होते, ज्यात कीटक अडकतात.

3) सनड्यू (Sundew): या वनस्पतींवर चिकट रोम असतात, जे कीटकांना पकडतात.

कीटकभक्षी वनस्पतींची वैशिष्ट्ये:

1) या वनस्पती नायट्रोजन आणि इतर पोषक तत्वे मातीतून पुरेसे शोषू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना कीटकांकडून पोषण मिळवण्याची गरज भासते.

2) या वनस्पती विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर करतात, जसे की चिकट रोम, बंद होणारी पाने, किंवा भांडे किंवा कीटकांना पकडण्यासाठी घडासारखे रचना असते.

3) या वनस्पती कीटक आणि इतर लहान प्राण्यांना खाऊन त्यांना आवश्यक असलेला पोषणयुक्त आहार मिळवतात.

4) या वनस्पती दमट वातावरण आणि भरपूर प्रकाश असणाऱ्या ठिकाणी वाढतात.

खालील व्हिडिओत कीटक भक्षी वनस्पतींची पाने कीटकांना कसे पकडतात हे दाखवले आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की, मानव प्राणी सोडल्यास जगात कोणीही शाकाहाराचे स्तोम माजवत नाही. जगण्यासाठी आवश्यक असेल त्या सगळ्या मार्गांचा प्राणी आणि वनस्पतींकडून उपयोग केला जातो. कारण ते खानपानाच्या संबंधात आहाराला माणसासारखे देवाधर्माचे, माणुसकीचे व भूतदयाचे भंपक लेबल लावण्याएवढे ढोंगी नसतात.

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “आजी आणि नातवंडं…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “आजी आणि नातवंडं…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

आजी आणि नातवंडं यांच्या नात्यावरची श्री संदीप खरे यांची सुंदर कविता आणि तिला दिलेलं उत्तर:

आजी म्हणते काढल्या खस्ता

जन्मभर मी केले कष्ट

तू म्हणजे त्या सगळ्याची

शेवट गोड असलेली गोष्ट

*

सगळं कथा पुराण झालं

देव काही दिसला नाही

कुशीत येतोस तेव्हा कळतं

कृष्ण काही वेगळा नाही… 

– श्री संदीप खरे

 

ह्या  कवितेला नातवाने दिलेले  उत्तर :

प्रश्न खूप पडतात ग, आज्जी,

देशील का मज उत्तरं त्यांची?

ठाऊक आहेत देवकी-यशोदा,

पण… आज्जी होती का कृष्णाची?

*

खाण्यासाठी चोरून माखन

उगाच करी सवंगड्यांसी गोळा?

खडीसाखरेवरती आज्जी

देई न त्या लोण्याचा गोळा?

*

बांधून ठेवी माय यशोदा

उखळासी करकच्चून त्याला,

धावूनी का ग गेली नाही

आज्जी त्याला सोडविण्याला?

*

कधी ऐकले, त्यास आजीने

दिला भरवुनी मऊ दूधभात?

निळ्या मुखावर का ना फिरला

सुरकुतलेला थरथरणारा हात?

*

असेल मोठ्ठा देव, तरी पण

आज्जी त्याला नव्हती नक्की,

म्हणूनी सांगतो मी सर्वांना …

कृष्णापेक्षा मीच लकी

*

कवी: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आधुनिक भस्मासुर” – लेखक : मंदार गद्रे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आधुनिक भस्मासुर” – लेखक : मंदार गद्रे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : आधुनिक भस्मासुर  

… अकाली जीवनशैलीच्या आजारांचं वास्तव आणि उपाय

लेखक : मंदार गद्रे 

 (औषधांपासून मुक्ती देणारा ‘डॉक्टर’)

पृष्ठे: १८४

मूल्य: २७०₹ 

लेखकाचे मनोगत

जीवनशैलीचे आजार जगभरात धुमाकूळ घालतायत. आज जवळपास प्रत्येक घरामध्ये हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, पीसीओडी, फॅटी लिव्हर, किडनीचे विकार, विस्मरण बळावले आहेत. या सर्व आजारांशी लढताना जगभरातच सामान्य माणूस आणि वैद्यकीय यंत्रणा यांच्या नाकी नऊ आलेले आहेत. आणखी एक चिंतेची बाब अशी की हे सर्व चित्र दिवसेंदिवस बिघडतच चाललं आहे.

या आजारांमागचं जीवशास्त्र स्पष्ट समजून घेण्याची आज मोठी गरज आहे. त्याशिवाय ‘हा पदार्थ खा किंवा तो टाळा’ या प्रकारच्या वरवरच्या सल्ल्यांपेक्षाही मूलभूत असं मानवी आहाराचं शास्त्र मांडण्याची नितांत गरज आहे.

हे आजार जिथून निर्माण झाले, तिथेच ते सोडवण्याची उत्तरंही शोधावी लागतील. नाहीतर, कुठेतरी रानात हरवलेली वस्तू, केवळ उजेड आहे म्हणून रस्त्यावरच्या दिव्याखाली शोधण्याचीच चूक आपण करू खरं तर करतोच आहोत.

जीवनशैलीच्या आजारांवरची औषधं ही मुख्यतः लक्षणांवर तात्पुरता उपाय करणारी आहेत. म्हणजे आग लागलेली आहे, त्यातून काळा धूर येतो आहे, तर तो धूर इकडे-तिकडे पसरवून त्याचा त्रास कमी करणे असलं काम ही औषधं करतात. अश्या पंख्यांचा एक मर्यादित उपयोग जरूर असतो, पण म्हणून आपण असे पंखे लावून आग तशीच ठेवत नाही! ती विझवण्याच्या मागे लागतो! त्याचमुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की जीवनशैलीच्या आजारांशी लढण्यासाठी, औषधं-शस्त्रक्रिया ही मुख्य उत्तरं नाहीतच!

‘जीवनशैलीत योग्य बदल करा’ हे आपण शेकडो वेळा ऐकलं असेल. पण म्हणजे नक्की काय, आणि महत्त्वाचं म्हणजे तसं का-याचं स्पष्ट उत्तर आपल्याला मिळतच नाही. मतप्रदर्शनाच्या मार्गाने हे सल्ले आपल्याला दिले जातात, आणि विज्ञानाचा विद्यार्थी ह्या नात्याने माझं त्यामुळे कधीही समाधान झालं नाही. माझी ही जिज्ञासा मला मानवी उत्क्रांती, जैव रसायन, आंतरिक आरोग्य अश्या अनेक वाटांनी घेऊन गेली. ह्या प्रवासात जे सापडलं ते सुसंगतपणे मांडावं, ह्या सर्व विषयातलं सौंदर्य बाकीच्यांपर्यंत पोचवावं अश्या तीव्र इच्छेने हे पुस्तक लिहून झालं आहे.

आरोग्याची समस्या सोडवण्यासाठी मी अश्या दृष्टिकोनाच्या शोधात होतो ज्यातून योग्य उपाय सहज समजून यावेत. हे उपाय विज्ञानाचा मजबूत आधार असलेले, आणि रोजच्या आयुष्यात करण्याजोगे असावेत. पण हे उपाय नुसतेच न सांगता त्यामागचा दृष्टिकोन आणि विचारसंगती सांगावी म्हणून हा लेखनप्रपंच!

मानवी आहार आणि वर्तनातली मूलभूत आणि चिरकाल टिकणारी अशी काही तत्त्वं आहेत आणि ती वापरून जीवनशैलीच्या रोगांची आगच मुळातून विझवता येते! आपलं जैव-रसायन समजावून घेऊन, आहार आणि वर्तनात योग्य बदल करून, शरीराला अश्या स्थितीला नेता येतं की जिथे हे रोग शरीरात राहू शकत नाहीत! रोग परतणं, आणि त्यामुळे लक्षणांवर दिलेली औषधं सुटणं हे केवळ परिणाम आहेत. मुख्य काम हे शरीराला आतून स्वस्थ-सुदृढ करण्याचं आहे! या विषयाचा खोलवर अभ्यास करून आता हेच काम मी करतो. गंमत म्हणजे माझ्याकडे डॉक्टर मंडळीही त्यांच्या शरीरातली अशी आग विझवायला येतात! आंतरिक आरोग्याचा अभ्यासक म्हणून मी डॉक्टरांचाही डॉक्टर झालोय-औषधांपासून मुक्ती देण्याचं काम करतोय. आरोग्यावरच्या पुस्तकाचा लेखक माझ्यासारखा अभियंता कसा याचं खरं उत्तर हेच आहे.

अनुक्रमणिका ::: 

१. सत्यकथा

२. आपली नेमकी समस्या काय आहे?

     पहिली अडचणः जीवनशैलीच्या आजारांचं भयानक वास्तव 

     दुसरी अडचणः माहितीचा भडिमार तिसरी अडचणः मूलभूत विचाराचा अभाव

३. आरोग्य म्हणजे नक्की काय?

आंतरिक आरोग्याची कसोटी

. शरीराकडे आपण कसं पाहतो? संप्रेरकांची निरोगी क्रिया आणि बिघडलेली क्रिया

. ग्लुकोज, इन्सुलिन आणि इन्सुलिन विरोध

     शरीरातली समस्थिती (Homeostasis) इन्सुलिन विरोध

. रोगांच्या मुळाशी जातांना 

७. इन्सुलिन आणि जीवनशैलीचे आजार

. इन्सुलिन आणि लठ्ठपणा

. आपण इथवर कसे आलो?

१०. इन्सुलिन विरोध आणि उच्च रक्तदाब

११. कोलेस्टेरॉल बद्दल थोडंसं..

१२. इन्सुलिन आणि हृदयविकार

१३. इन्सुलिन आणि थायरॉईड

१४. इन्सुलिन आणि पीसीओडी

१५. इन्सुलिन आणि मूत्रपिंडांचे आजार

१६. इन्सुलिन आणि फॅटी यकृत (Fatty Liver)

१७. इन्सुलिन आणि अल्झायमर्स, विस्मरण

१८. इन्सुलिन आणि अकाली वृद्धत्व

१९. मानवी आहाराचा मूलभूत आराखडा

२०. आपण अन्नाकडे कसं बघतो?

२१. अ) काही प्रमुख गैरसमज : स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, आणि कर्बोदकं 

     आ) काही प्रमुख गैरसमज मीठ, तंतुमय पदार्थ, फळं

२३. काही तंत्र आणि मंत्र

२४. दीर्घ आजारांचं (आणखी!) व्यापक चित्न कीटोजेनिक (कीटो) डाएट म्हणजे काय?

२५. धोक्याची घंटा आणि काही चांगल्या बातम्या! हळूहळू बदलणारे जागतिक चित्र

भारतातील आंतरिक आरोग्याच्या चळवळीचे जनक : dLife चे अनुप सिंग!

– – – अनुपचा कमी-कर्बोदकं (Low-Carb) पॅटर्न! dLife चा प्रवासः आज आणि उद्या!

शेवटी – माझ्या काही केसेस!

….

वर मुद्दामच पुस्तकाची अनुक्रमणिकाही दिलेली आहे जी पुस्तकातल्या तपाशीलाबाबत पुरेशी बोलकी आहे.

या पुस्तकात लेखक मंदार गद्रे यांनी व्यक्त केलेले त्यांचे मनोगत वाचल्यावर पुस्तकाचा वेगळा परिचय करून देण्याची गरजच उरत नाही असं मला खात्रीने म्हणावसं वाटतं.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 97 – मुक्तक – चिंतन के चौपाल – 3 ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे। 

इस सप्ताह से प्रस्तुत हैं “चिंतन के चौपाल” के विचारणीय मुक्तक।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 97 – मुक्तक – चिंतन के चौपाल – 3 ☆ आचार्य भगवत दुबे ✍

महापुराण कहानी दादी, 

हैं ममतालु सुहानी दादी, 

इनकी सेवा मंगलकारी, 

शुभ चिन्तक वरदानी दादी।

0

सबल भुजा का बल भाई है, 

धड़कन की हलचल भाई है, 

देता है खुशियों की फसलें 

धरा, गगन, बादल भाई है।

0

हरा-भरा परिवार जहाँ है, 

ममता प्यार दुलार जहाँ है, 

सुख का सिन्धु वहीं लहराता 

बच्चों का संसार जहाँ है।

0

बेटी है वरदान सरीखी, 

संस्कृति की पहचान सरीखी, 

माता-बहनें पूज्य रही हैं 

भारत में भगवान् सरीखी।

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Company of ‘God and Godly’… ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present Capt. Pravin Raghuvanshi ji’s amazing poem “~ Company of ‘God and Godly’ ~.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.) 

? ~ Company of ‘God and Godly’??

In the  company  of God  and Godly, we find our way,

To ignite  the  spark, that  burns throughout the day

The fire  of truth, that  keeps flickering  deep inside,

Guides us on our journey, with a gentle, loving stride

 *

In the God’s sacred space, where saintly people reside,

We find our inner  light, and  a loving,  peaceful Guide

The  divine enlightenment,  shines  like  morning  dew,

Illuminating our path, showing what is eternally true

 *

In the company  of  Godly, hearts take cosmic flights,

And the flame of pure love, that burns within, ignites

May we seek Godly company, to bask in its loving light,

And may our souls, be filled with peace & pure delight

~Pravin Raghuvanshi

 © Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune
23 March 2025

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पुजारी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – पुजारी ? ?

मैं और वह

दोनों काग़ज़ के पुजारी,

मैं फटे-पुराने,

मैले-कुचले,

जैसे भी मिलते

काग़ज बीनता, संवारता,

करीने से रखता,

वह इंद्रधनुषों के पीछे भागता,

रंग-बिरंगे काग़ज़ों के ढेर सजाता,

दोनों ने अपनी-अपनी थाती

विधाता के आगे धर दी,

विधाता ने

उसके माथे पर अतृप्त अमीरी

और मेरे भाल पर

समृद्ध संतुष्टि लिख दी..!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 12 अप्रैल 2025 से 19 मई 2025 तक श्री महावीर साधना सम्पन्न होगी 💥  

🕉️ प्रतिदिन हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमन्नाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें, आत्मपरिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 171 – महावीर जयंती विशेष – जैन धर्म में है बसा…  ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है महावीर जयंती  पर आपकी एक  कविता “जैन धर्म में है बसा…” । आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 171 – महावीर जयंती विशेष – जैन धर्म में है बसा… ☆

जैन धर्म में है बसा, जीवों का कल्यान।

भारत ने सबको दिया, जीने का वरदान।।

 *

राम कृष्ण गौतम हुए, महावीर की भूमि।

योग धर्म अध्यात्म से, कौन रहा अनजान।।

 *

धर्मों की  गंगोत्री, का है  भारत केन्द्र।

जैन बौद्ध ईसाई सँग, मुस्लिम सिक्ख सुजान।

 *

ज्ञान और विज्ञान का, भरा यहाँ भंडार।

सबको संरक्षण मिला, हिन्दुस्तान महान।। 

 *

चैत्र शुक्ल त्रयोदशी को, जन्मे कुंडल ग्राम।

वैशाली के निकट ही, मिला हमें वरदान।।

 *

राज पाट को छोड़कर, वानप्रस्थ की ओर।

सत्य धर्म की खोज कर,किया जगत कल्यान।।

 *

सन्यासी का वेषधर, निकल चले अविराम।

छोड़ पिता सिद्धार्थ को, कष्टों का विषपान।। 

 *

प्राणी-हिंसा देख कर, हुआ बड़ा संताप।

मांसाहारी छोड़ने, शुरू किया अभियान।।

 *

अहिंसा परमोधर्म का, गुँजा दिया जयघोष।

जीव चराचर अचर का, लिया नेक संज्ञान।।

 *

मूलमंत्र सबको दिया , पंचशील सिद्धांत।

दया धर्म का मूल है, यही धर्म की जान।

 *

हिंसा का परित्याग कर, अहिंसा अंगीकार।

प्रेम दया सद्भाव को, मिले सदा सम्मान।।

 *

चौबीसवें  तीर्थंकर, माँ त्रिशला के पुत्र।

महावीर स्वामी बने, पूजनीय भगवान।।

 *

वर्धमान महावीर जी, बारम्बार प्रणाम ।

त्याग तपस्या से दिया, सबको जीवन दान।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 176 ☆ “कुछ यूं हुआ उस रात” – लेखिका … सुश्री प्रगति गुप्ता ☆ चर्चाकार – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हमप्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’  जी के आभारी हैं जो  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक के माध्यम से हमें अविराम पुस्तक चर्चा प्रकाशनार्थ साझा कर रहे हैं । श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका दैनंदिन जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है आपके द्वारा सुश्री प्रगति गुप्ता  जी द्वारा लिखित कथा संग्रह “कुछ यूं हुआ उस रातपर चर्चा।

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 176 ☆

☆ “कुछ यूं हुआ उस रात” – लेखिका … सुश्री प्रगति गुप्ता ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

पुस्तक चर्चा

कहानी संग्रह … “कुछ यूं हुआ उस रात”

लेखिका … सुश्री प्रगति गुप्ता

प्रभात प्रकाशन नई दिल्ली

पृष्ठ १३८

मूल्य २५० रु

आई एस बी एन ९७८९३५५२१८७२८

चर्चा … विवेक रंजन श्रीवास्तव, ओल्ड मिनाल रेजीडेंसी, भोपाल

कुछ यूं हुआ उस रात” प्रतिष्ठित तथा अनेक स्तरों पर सम्मानित कथाकार प्रगति गुप्ता की १३ कहानियों का संग्रह है। आधुनिक समाज में मानवीय संबंधों की जटिलताओं को उजागर करती प्रतिनिधि कहानी “कुछ यूं हुआ उस रात” को पुस्तक का शीर्षक दिया गया है। “यह शीर्षक स्वयं में एक रहस्य और अनिश्चितता का संकेत देता है। यह कहानी तिलोत्तमा नामक पात्र के इर्द-गिर्द घूमती है, जो रात को फोन पर एक लड़की से बात करती है। यह बातचीत उसके लिए एक तरह का आधार बन जाती है, जो उसके अकेलेपन को कम करने में मदद करती है। हालांकि, एक दिन वह पाती है कि उस लड़की का फोन बंद है, और वह सोचने लगती है कि क्या वह लड़की वास्तविक थी या केवल उसकी कल्पना का हिस्सा थी। यह घटना तिलोत्तमा को भावनात्मक रूप से विचलित करती है। कहानीकार ने नायिका के मनोभावों को गहराई से चित्रित करने में सफलता अरजित की है। जिससे पाठक मन कहानी की विषयवस्तु सेजुड़ जाता है। अकेलेपन और संबंधों की तलाश से जूझता आज का महानगरीय मनुष्य तकनीक का उपयोग करके अपने अकेलेपन को कम करने की कोशिश करता दिखता है। हाल ही भुगतान के आधार पर मन पसंद वर्चुअल पार्टनर मोबाईल पर उपलब्ध करने के साफटवेयर विकसित किये गये हैं। यह थीम आज के डिजिटल युग में बहुत प्रासंगिक है। आधुनिकता की चकाचौंध में लोग इतने एकाकी हो गये हैं कि मनोरोगी बन रहे हैं। आत्मीयता की तलाश तथा सच्चे संबंधों तक तकनीक से तलाश रहे हैं। कहानी में फोन को एक ऐसे माध्यम के रूप में दिखाया गया है जो संबंध बनाने में मदद करता है, लेकिन उसे टिकाऊ बनाने में असमर्थ होता है। इसी थीम पर मैने एक कहानी रांग नम्बर पढ़ी थी।

तिलोत्तमा के चरित्र के माध्यम से लेखिका ने भावनात्मक संवेदनशीलता को बड़ी सूक्ष्मता से चित्रित किया है। उसका द्वंद्व और असमंजस पाठकों के मन में गहरा प्रभाव छोड़ता है, और कहानी को विचारोत्तेजक रचना बनाता है।

प्रगति गुप्ता की लेखन शैली सरल और प्रभावशाली है। उनकी भाषा में सहजता है जो पाठकों को कहानियों के कथानक से जोड़ने में मदद करती है। अभिव्यक्ति संवादात्मक और प्रवाहमय शैली में है। वे कहानियों में सकारात्मक प्रासंगिक थीम्स उठाती है और पाठकों को सोचने पर मजबूर करती है। यह कहानी संग्रह पिछली पीढ़ी के प्रेमचंद जैसे पारम्परिक ग्रामीण परिवेश के लेखकों की कहानियों से तुलना में अधिक आधुनिक और तकनीक-केंद्रित प्रतीत होता है। संग्रह में “कुछ यूं हुआ उस रात” केअतिरिक्त, अधूरी समाप्ति, कोई तो वजह होगी, खामोश हमसफर, चूक तो हुई थी, टूटते मोह, पटाक्षेप, फिर अपने लिये, भूलने में सुख मिले तो भूल जाना, वह तोड़ती रही पत्थर, सपोले, समर अभी शेष है, और कल का क्या पता शीर्षक से कहानियां संग्रहित हैं जो एक अंतराल पर रची गई हैं। कहानियों के शीर्षक ही कथावस्तु का एक आभास देते हैं। प्रगति गुप्ता मरीजों की काउंसलिंग का कार्य करती रही हैं, अतः उनका अनुभव परिवेश विशाल है। उनके पास सजग संवेदनशील मन है, अभिव्यक्ति की क्षमता है, भाषा है, समझ है अतः वे उच्च स्तरीय लिख लेती हैं। उन्हें वर्तमान कहानी फलक पर यत्र तत्र पढ़ने मिल जाता है। चूंकि वे अपनी कहानियों में पाठक को मानसिक रूप से स्पर्श करने में सफल होती हैं अतः उनका नाम पाठक को याद रहा आता है। उनके नये कहानी संग्रहों की हिन्दी कथा जगत को प्रतीक्षा रहेगी।

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

समीक्षक, लेखक, व्यंगयकार

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३, मो ७०००३७५७९८

readerswriteback@gmail.कॉम, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares