मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ही खंत.. की सल ??… (अनुवादित कथा)  हिन्दी लेखक : श्री प्रबोध कुमार गोविल ☆  भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

ही खंत.. की सल ??… (अनुवादित कथा)  हिन्दी लेखक : श्री प्रबोध कुमार गोविल ☆  भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

नव्वद वर्षांच्या म्हातार्‍या डोळ्यात चमक आली. काठी धरून चालताना हाताला जाणवणारा कंप कमी होत गेला. ‘हे इकडे… ते तिकडे… ती ओळच्या ओळ… ’ म्हणत म्हातारा उदास हसू, हसू लागला. सुरकुतलेल्या तोंडात केवळ एकच कुदळीसारखा टोकदार पिवळट तपकिरी दात, एकछत्री राज्य करीत होता. बोलताना थुंकीचे दोन-चार शिंतोडे उडले. मुलाने कानाशी माशी उडताना जसे पंख्यासारखे हात हलवतो, तसे हात हलवले.

दूर कुठल्या तरी गावात रहाणारा तो मुलगा, सहा महिन्यापूर्वी या महालासारख्या लांब-रुंद बंगल्यात माळी म्हणून कामाला लागला होता. याच बंगल्यात याच कामासाठी त्याचे आजोबा, त्याच्यापूर्वी पन्नास वर्षे झिजले होते. पन्नास वर्षांनंतर या सेवकाची क्षीण होत चाललेली दृष्टी आणि कमकुवत होत जाणारी हाडे-फासळ्या यांनी त्याच्या शरिराला रिटायर होण्याची धमकी दिली, तेव्हा मालक मंडळींनीही त्याला माळी कामातून मुक्त केले.. पण अनेक वर्षे केलेले काम फुकट गेले नाही. त्याने विनंती करून करून आपल्या जागी आपल्या नातवाला काम द्यायला लावले होते, म्हणून आज म्हातारा, कुणा येणार्‍या – जाणार्‍या बरोबर नातवाची खबरबात घ्यायला आणि आपल्या मालकाचा उंबरठा पुजायला, आणि नातवाचा खांदा पकडून, त्या विराट बगीचाला न्याहाळायला आला होता. त्या बगीचामध्ये तो तन-मनाने, नखशिखांत खपला होता.

आपल्या नातवाला आपण केलेलं महत्वाचं काम दाखवता दाखवता, तो अगदी उत्तेजित झाला होता. कोणकोणत्या जमिनीचा त्याने कसा कायापालट केला. कोणकोणती झाडे वृक्ष लावले, कोणत्या फुलांनी मालक-मालकिणीचं मन कसं जिंकलं, कुठल्या मातीत त्याचा किती घाम जिरला, सगळं आपल्या नातवाला सांगण्यात दाखवण्यात तो मग्न झाला. मुलाचा चेहरा मात्र अगदी सपाट, भावहीन होता.

मालक मंडळी आता बंगल्यात नव्हती. नातू आपल्या खांद्याचा आधार देऊन बागेत फिरवत होता. म्हातारा आपल्या जुन्या स्मृतींच्या पोत्यातून टपकणार्‍या आठवाणी गोळा करत सांगत होता, कुठली काटेरी झाडे-झुडुपे काढून त्याने तिथे वटवृक्ष उभे केले होते. विपरीत परिस्थितीतही परिश्रम करून फुले फुलवली होती. पन्नास वर्षे म्हणजे काही थोडी-थोडकी नाही. इतक्या दिवसात तर प्रदेशाची नावे बदलतात. रंगरूप बदलतं. म्हातार्‍याजवळ तर एका-एका वितीच्या, त्याने केलेल्या काया-पालटाचा लेखा-जोखा होता. पण यातून त्याच्याकडे काही जमा-जोड झालेला नव्हता. या सगळ्या उपटा-उपटीत आणि नव्याने लावालावीत त्याच्या जीवनाचे काय झाले? त्याचं शरीर, त्याचं वय कसं, कधी मातीमोल होत गेलं, त्यालाच कळलं नाही.

तरुण नातवावर या गोष्टीचा खास असा काही परिणाम झाला नाही. तो आजाच्या गोष्टी ऐकता ऐकता, पुढल्या खेळाडूप्रमाणे भविष्याच्या पटावर आपलं मन गुंतवत होता. तो गावात काही वर्षं शाळेत गेला होता. त्याला पुस्तक वही-मास्तर- दफ्तर-घंटा याची पुसटशी आठवण आहे. तिथे त्याला सांगण्यात आलं होतं की थेंबा-थेंबाने घडा भरतो आणि ज्ञानसागराच्या काठाशी बसलं की जवळच्या कमंडलूत गंगा सामावली जाते. पण त्याच्या भूतकाळात काही सामावले गेले नाही. सामावले गेले, ते फक्त यार-दोस्तांबरोबर घेतलेले विडीचे झुरके, गुटख्यांच्या पिचकार्‍या, मास्तरांचा मार आणि शाळेच्या परिसरातून, बंगल्याच्या बागेत गवत काढण्यासाठी केलेली उचलबांगडी.

आजाने नातवाला संगितले, की त्याला इथे दरमहा चौदा रुपये मिळायचे आणि तो गाव, आजी, घर-दार, कुटुंब सगळं विसरून एकाग्रतेने तन-मन ओतून काम करायचा. वाळवंटात तो नंदनवन फुलवायचा प्रयत्न करायचा. बगीचा सुंदर, मोहक करण्याची स्वप्ने बघायचा.

खूप दिवसांनंतर आपल्या घरातील कुणाला तरी बघण्याचा मुलाचा उत्साह हळूहळू कमी होऊ लागला होता. पण त्याच्या उदासीनतेमुळे आजोबांचा उत्साह जराही कमी झालेला नव्हता. ते अजूनही उत्साहाने थबथबत, खुशीने बोलत होते. जसा काही त्यांनी तिथे काम करताना आपला घाम गाळला नव्हता, उलट वयावर चढलेली चांदी मातीला भेट दिली होती.

चालता-बोलता दोघेही मागच्या बाजूच्या खोलीत आले. ती खोली आता आजोबांच्या नातवाला, म्हणजे नव्या माळ्याला रहाण्यासाठी दिली होती. आजोबा थोडे हैराण झाले. ‘तुला खोली? मी उन्हाळा, थंडी, पाऊस, सदा-सर्वकाळ त्या झाडाखाली एका बांबूच्या खाटल्यावर झोपत होतो. कधी कधी पाऊस जोराचा असेल, तर चौकीदारही तिथेच यायचा… खोलीतल्या भिंतीला असलेल्या एका खुंटीवर दोन-तीन जीन्स टांगलेल्या बघून आजोबांना आश्चर्य वाटले. ते नातवाला म्हणाले, ‘इथे तुझ्यासोबत आणखी कोण रहातं?’

‘कुणीच नाही. हे माझेच कपडे आहेत. ’ मुलगा बेपर्वाईने म्हणाला. आजोबांनी खाली वाकून एकदा आपले गुढग्यापर्यंत वर गेलेले मळके धोतर पाहिले. पण त्यांना रहावले नाही. ‘काय रे हे घट्ट विलायती कपडे घालून तू झाडातील तण कसे काढतोस?’

मुलाला त्यांचं बोलणं नीट कळलंच नाही. ‘ते तर नर्सरीवाले करूनच जातात. बिया, झाडं तेच लावतात. ’ हे ऐकून आजोबा अन्यमनस्क झाले.

मुलाने एक चमकदार काचेच्या बाटलीतून आज्याला पाणी दिले. आजा हैराण झाला. ‘ बेटा, मालकांच्या कुठल्याही गोष्टीला न विचारता हात लावता कामा नये. ‘.. आता हैराण होण्याची पाळी मुलावर आली. तो त्याच सपाट चेहर्‍याने म्हणाला, ‘हे सगळं मालकांनीच दिलंय. ‘ आजोबांना आता खोलीच्या खिडकीतून एक शुष्क, निष्पर्ण झाड दिसले. ‘बघ. बघ. हे झाड. याला पहिल्यांदा फळे लागली, तेव्हा मला त्यावर्षी होळीला घरी जाता आले नाही. माझ्या मागे कुणी झाडावर फळे टिकू दिली असती का? मी घरी जाऊ शकलो नाही, तेव्हा मग तुझ्या आजीने दोन शेर जौ ( एक धान्य- याची भाकरी करतात. ) आणि गुळाचा तुकडा कुणाच्या तरी हाती पाठवला होता.

मुलाला हे सगळं बोलणं असंगत वाटलं. त्याच्या खोलीत असलेल्या जुन्या सोफ्यावर, कागदात गुंडाळलेला अर्धा पिझ्झा होता. सकाळी नाश्त्याच्या वेळी मालकिणीने तो त्याला दिला होता. म्हातार्‍याचे डोळे डगमगत्या नावेसारखे झालेले पाहून मुलगाही नाही सांगू शकला, की त्याला दर दोन-चार दिवसांनी डायनिंग टेबलावर उरलेली मासळी मिळते आणि त्याचबरोबर अधून –मधून जूसचा डबाही मिळतो.

मुलाला आपल्या शाळेतल्या मास्तरांची आठवण झाली. ते म्हणायचे, ’रोज रोज कुणाला मासे देण्यापेक्षा त्याला मासे पकडायला शिकवा. ’ आपल्या आजोबांच्या तोंडावरील सुरकुत्या पाहून तो विचार करू लागला, की या सुरकुत्या केवळ मासे पकडत रहाण्याचाच परिणाम आहेत.

आजोबा जेव्हा-तेव्हा उत्साहाने बोलू लागत. ‘ही तुझी मालकीण सून बनून या घरात आली, त्यानंतर मी वर्षभर तिला पाहिलेही नाही. आम्हाला चहा, पाणी देई कोठीचा आचारी. खुरपी, कुदळ काढून द्यायचा घरचा नोकर. घरातील बाल-बच्चे षठी-सहामासी मोटारीच्या काचेतून जरूर दिसायचे. ’

यावर मुलाने गप्प रहाणंच पसंत केलं. त्याच्याजवळ बोलण्यासारखं काही नव्हतंच. त्याने कधी खड्डा खणला नव्हता. कधी शेतात बियाणं रुजत घातलं नव्हतं. रोपे लावली नव्हती. तण काढले नव्हते. नर्सरीचा माणूस येऊन हे सगळं करून जात होता. दिवसभर पाण्याचे फवारे सोडत स्प्रिंकलर चालू असायचे. हां धाकटी आणि मधली मुलगी अनेकदा छोट्या-मोठ्या कामासाठी त्याला बोलवायची. हाताचा अनेकदा स्पर्श व्हायचा, पण या गोष्टी काय आजोबांना सांगण्यासारख्या आहेत? नातू बराच वेळ काही बोलला नाही. ते पाहून आजोबा काहीसे खजील झाले, पण पुन्हा म्हणाले, ‘टोपल्याच्या टोपल्या फळे झाडांवरून निघायची. सगळ्या वस्तीत वाटली जायची. घरात महिनो न महीने खाल्ली जायची. ’

.. यावेळी मुलाच्या भात्यातून बाण निघाला. म्हणाला, ‘आता हे असलं काही खात नाहीत. घरात मॉलमधून सगळी इंपोर्टेड फळे येतात. ‘

मुलाने आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि आपल्या नव्यासारख्या दिसणार्‍या रंगीत गंजिफ्रॉकच्या खिशात ठेवला, तेव्हा आजोबांना राहवलं नाही. ‘किती देतात रे हे तुला?’ मुलाच्या लक्षात आलं, आजोबांच्या डोक्यात कसला तरी किडा वळवळतोय. छोट्याशा गोष्टीचा गाजावाजा होऊ न देण्याच्या गरजेपोटी मुलगा म्हणाला, ‘घरात इतके लोक आहेत, सगळे काही ना काहे देत असतात. माझा हा मोबाईल मालकिणीच्या धाकट्या मुलीने काही दिवसांपूर्वी जुना झाला, म्हणून मला दिला होता. ’ आजोबांनी आपल्या नातवाच्या धष्ट-पुष्ट, कमावलेल्या शरीराकडे नजर टाकली. त्याला आपल्या घरच्या शाश्वत गरिबीची आठवण झाली.

आजोबांचे मन खोलीतून बाहेर पडून बागेत विहरू लागलं. अखेर त्या बागेची माती त्यांच्या घामामुळेच ओलसर झाली होती. बागेतील पानापानावर, झाडा-झुडपांवर त्याचा इतिहास विखुरलेला होता. त्याने आपली दिवस-रात्र, , तारुण्य-म्हातारपण, आपली सुख-दु:खे, आपला घर-परिवार, सगळं मन मारून, धुळीप्रमाणे या जमिनीवर शिंपडली आणि बदल्यात मिळालं जीवन हरवल्याचं सर्टिफिकेट. आज त्यांच्या जीवनभराच्या पिकाला भोगणार्‍या आळ्या लागल्या आहेत. त्यांचा इतिहासच कुणी खातय.

खोलीचा दरवाजा उघडून मुलगा बाहेर आला. त्याने सफेत झक्क बूट घातले होते. आजोबादेखील जाण्यासाठी चुळबुळ करू लागले. मालक लोकांचा काय भरवसा? रात्रीर्यंत येणार नाहीत.

मुलगा मेन गेटपर्यंत आजोबांना पोचवायला आला. बाहेर रस्त्यावर आजोबांना, त्याने एका दुकानात शिरताना पाहिले. त्याने पाहिले, ते औषधांचे दुकान होते. मुलाला आश्चर्य वाटले – आजोबा आजारी आहेत? त्यांनी सांगितलं का नाही? मुलगा त्यांना काही विचारणार, एवढ्यात दुकानदाराचे पैसे देऊन तो परतला. त्याने एक छोटसं पाकीट मुलाला दिलं. मुलगा शरमेने पाणी पाणी झाला. आजोबा म्हणाला, ‘आज-काल अनेक तर्‍हेचे आजार पसरलेत. तू तर परगावी. कुठल्या अडचणीत सापडू नको. ’

मुलाला संकोच वाटतोयसं बघून आजोबा पुन्हा किलबिलले, ‘विचार कसला करतोयस? आजोबा आहे मी तुझा. घे ! हे पाकीट घे.’

मूळ हिन्दी कथा – ’इतिहास भक्षी‘

मूळ लेखक – श्री प्रबोध कुमार गोविल

मो. 9414028938

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदाचे डोही… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ आनंदाचे डोही…  ☆ श्री सुनील देशपांडे

सध्या वयाच्या पंचाहत्तरी मधून मार्गक्रमण चालू आहे. ७५ नंतर पूर्वी वानप्रस्थाश्रम असे म्हणत. हळूहळू व्यावहारिक जगतापासून दूर होणे जमले पाहिजे. किंबहुना जीवनातील व्यवहारांपासून दूर होता आले पाहिजे असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

‘आता उरलो उपकारापुरता’ असे पूर्वी म्हणत पण आता म्हणावेसे वाटते ‘आता उरलो समाजापुरता. ’ मृत्यूनंतर हळूहळू सगळे आपल्याला विसरतातच. परंतु या वयापासून जिवंतपणी सुद्धा माणसे विसरू लागतात.

माझे सासरे एकदा मला म्हणाले ‘ मी मेल्यावर तुम्ही माझ्याविषयी चार चांगले शब्द बोलाल. माझ्यावर कविता कराल. पण ती ऐकायला मी कुठे असेन ? त्याचा काय उपयोग? माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल माझ्यावर एक कविता जिवंतपणी करून मला ऐकवा तेवढी माझी शेवटची इच्छा समजा’ खरोखरच मी दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर कविता लिहून त्यांना ऐकवली. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद पाहणे हा एक स्वर्गीय अनुभव होता.

मला आता सर्वच परिचितांना सांगावेसे वाटते. ज्यांना प्रेमापोटी नाती जपायची आवड व इच्छा असेल त्यांनी मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी कधीतरी येऊन जावे.

‘सुनील गेला’ असा फोन येईल तेव्हा तुम्ही ‘ताबडतोब निघतोच आहे’ असे म्हणून गडबडीने यावयास निघाल हे मला नको आहे. मुळातच मी देहदानाची इच्छा व्यक्त केलेली असल्यामुळे मृत्यूनंतर कोणी भेटायला यावे इतका वेळ असणारच नाही. दुसरे म्हणजे मृत्यूनंतर ‘भेटणे’ शक्यच नाही. त्याला आपण पारंपरिक भाषेत दर्शन म्हणतो. हे कसले दर्शन? माणसाचे जिवंतपणी दर्शन न घेता मृत्यूनंतर दर्शन घेणे हे विडंबन आहे असे मला वाटते. मृत्यूनंतर सहा तासाच्या आत देहदान करावयाचे असते. त्यामुळे अगदीच जवळचे चार नातेवाईक किंवा मित्र यांनी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी यावे याशिवाय त्यात दुसरे काही साध्य नाही.

माझ्या एका मित्राच्या सासर्‍यांनी जिवंतपणी श्राद्धविधी अर्थात ‘साक्षात स्वर्ग दर्शन’ या नावाचा विधी त्यांचे गावी केला. सगळ्यांच्या गाठीभेटी गळाभेटी आणि सहभोजन असा मस्त समारंभ करण्यात आला. हीच आपली अंतिम भेट म्हणून सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा प्रत्यक्ष मृत्यू झाला आणि देहदान सुद्धा झाले. ही संकल्पना मला खूप भावली.

परंतु एखादा दिवस ठरवून त्या दिवशी सर्वांना बोलावणे हा इतरांच्या सोयी गैरसोयीचा भाग असतो. बऱ्याच वेळा इच्छा असून सुद्धा तो दिवस सोयीचा नसतो. तसेच खूप जास्त माणसे एका वेळेला जमली की कुणाशीच नीट संवाद होत नाही.

म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते…. 

… वर्षामध्ये जेव्हा केव्हा जमेल, शक्य होईल तेव्हा येऊन भेटावे.

अर्थात त्यात औपचारिकता नको. जुळलेले भावबंध असतील तरच भेटीत आनंद असतो.

सोशल मीडियावर मेसेज टाकून मी जिवंत असल्याची खबरबात सातत्याने देत असतोच.

अर्थात मृत्यू कधी कोणाला सांगून येत नसतो. कोणत्या क्षणाला तो येईल कुणी सांगावे? म्हणूनच  मी गुणगुणत असतो…..

… ‘ न जाने कौनसा पल मौत की अमानत हो, हर एक पल की खुशी को गले लगाते चलो ’.

त्यामुळे प्रत्येक क्षणाक्षणाचं सुख मी उपभोगत असतो. कुणाच्या येण्याने त्या सुखाला आणखी एक आनंदाची झालर लाभेल.

….. जे काही आयुष्याचे क्षण शिल्लक असतील त्या क्षणांमध्ये अधिकाधिक आनंद जोडता यावा आणि जिवंतपणीच स्वर्ग सुखाचा अनुभव घेता यावा ही मनापासून इच्छा.

‘ जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा ’.. या अनुभवापासून दूर होत.

आता फक्त अनुभूती हवी आहे… 

… ‘आनंदाचे डोही आनंद तरंग…’

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भोजन आणि संगीत… लेखक : डॉ. अनिल वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ भोजन आणि संगीत… लेखक : डॉ. अनिल वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

… एक अभ्यासपूर्ण लेख – 

🎼 🎤🎻🎹 🎷🥁

रविवारी पुणे ओपीडी मधे कोणत्या रुग्णाला सांगितले नक्की आठवत नाही.

काय सांगितले ते आठवत आहे.

स्वयंपाक करत असताना, भोजन करत असताना आणि भोजन झाल्यानंतर १ तास ‘मंद स्वरातील’ संगीत घरी लावत जा.

 

इथे आपल्याला म्युझिक, डीजे, मॅश अप नको आहे. भावगीत, भक्तीगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, वाद्यांचा शांत आवाज पुरेसे आहे.

त्याने काय होईल ?? रुग्णाचा प्रश्न! 

दोन महिने न चुकता करा आणि मला तुम्हीच सांगा… माझे उत्तर! 

संगीत – स्वर यांचा आणि आपल्या शरीरातील दोष स्थितीचा ‘थेट’ संबंध आहे.. त्या विषयी….

शरीरातील दोषांची साम्यावस्था आणि शरीराचा बाहेरच्या घटनांना मिळणारा प्रतिसाद यात पंचज्ञानेंद्रिय पैकी कानाशी बराच जवळचा संबंध असतो.

प्रकाश आणि आवाज याचा वेग प्रचंड असतो.

कित्येक मैल दूर वीज पडली तर आपला जीव घाबरा होतो.

चार रस्ते सोडून कोठे करकचून ब्रेक कोणी मारला तर आपण काळजी करतो.

घरी कोणी मोठ्याने बोलले तर नाजूक मनाच्या लोकांना चक्कर येते… इत्यादी! 

पूर्वी जेव्हा लग्न हा संस्कार असायचा, इव्हेन्ट नसायचा तेव्हा बिस्मिल्ला साहेबांची सनई आपले स्वागत करायची.

आता योयो किंवा बादशाह, डीजे किंवा ढोल पथक आपले वेलकम करते.

संस्कारापेक्षा भपका जास्त.

शांती पेक्षा गोंगाट जास्त.

याने काय होते ? मूळ हेतुकडे दुर्लक्ष होऊन विनाकारण हृदयात धडधड वाढते.

पुढील वर्ग पहा – 

१. जेवण बनवत असताना फोनवर बोलणारे.

२. जेवण करत असताना फोन वर बोलणे – व्हिडीओ पाहणे – टीव्ही पाहणे – इमेल्स पाहणे इत्यादी.

३. जेवण करत असताना भांडणे / मोठ्याने बोलणे, समोर असलेल्या प्रदार्थाबद्दल वाईट बोलणे.

४. गप्पा मारत जेवणे.

५. जेवण झाल्यावर ऑफिस चे काम / घरकाम / बाहेर जाणे इत्यादी.

या पाच प्रकारात आपण कोठे ना कोठे बसत असतो. अगदी रोज.

चार घास खायला मर मर करायची आणि चार घास युद्धभूमीवर बसून खायचे..

डोकं शांत नाही. जेवणाकडे लक्ष नाही. जिभेवर नियंत्रण नाही. ही अनारोग्य निर्माण करणारी तिकडी! 

संगीत हे नादावर आधारलेले आहे.

अग्नी आणि वायू यांच्या योगाने उत्पन्न होणाऱ्या ध्वनीला ‘नाद ‘ म्हणतात.

आपल्या हृदयात २२ नाडी आहेत असं मानले जाते. या क्रियाशील नाड्यानी हृदय आणि शरीर याचे संचलन होते.

याच आधारावर संगीतात २२ श्रुती मानल्या आहेत. या एका पेक्षा एक वरच्या पट्टीत आहेत.

बावीस श्रुती मधून बारा स्वर.

हिंदुस्थानी संगीतातील सात मुख्य स्वरांपैकी षड्ज आणि पंचम हे स्वर अचल असतात. ऋषभ, गांधार, धैवत आणि निषाद हे स्वर शुद्ध आणि कोमल या दोन चल स्वरूपांत व्यक्त होतात, तर मध्यम हा स्वर शुद्ध आणि तीव्र असा स्पष्ट होतो. याप्रमाणे हिंदुस्थानी संगीतातील पायाभूत सप्तक पुढीलप्रमाणे :

– षड्ज (सा),

– कोमल ऋषभ (रे),

– शुद्ध ऋषभ (रे),

– कोमल गांधार (ग),

– शुद्ध गांधार (ग),

– शुद्ध मध्यम (म),

– तीव्र मध्यम (म),

– पंचम (प),

– कोमल धैवत (ध),

– शुद्ध धैवत (ध),

– कोमल निषाद (नी),

– शुद्ध निषाद (नी) 

– आणि षड्ज (सा).

यातील षड्ज म्हणजे सहा स्वरांना जन्म देणारा सूर्य.

श्रवणेंद्रिय मार्फत ऐकलेले जे ब्रह्मरंध्र पर्यंत पोहोचून त्या नादाचे विविध प्रकार होतात त्यांना श्रुती म्हणतात.

तीन सप्तक – 

१. मंद सप्तक – हृदयातून निघणारा आवाज 

२. मध्य सप्तक – कंठातून निघणारा आवाज 

३. तार सप्तक – नाभी पासून निघून ब्रह्म रंध्र पर्यंत जाणारा आवाज.

आपल्या दोषांची स्थिती दिवसभरात बदलत असते. सकाळी कफ वाढतो. दुपारी पित्त आणि रात्री वात वाढतो.

रागवर्गीकरणाची आणखी एक पद्धत म्हणजे समयाश्रित राग ही होय.

हिंदुस्थानी संगीतात परंपरेनुसार अमुक एक राग अमुक वेळेला प्रस्तुत करावा, असा संकेत आहे. याकरिता रागांचे तीन वर्ग मानले आहेत : रे, ध, शुद्ध असणारे राग रे, ध कोमल असणारे राग आणि ग, नी कोमल असणारे राग.

यात शुद्ध मध्यम व तीव्र मध्यम या स्वरांना समयानुसार मिळवून, पहाटे ४ ते ७ व दुपारी ४ ते ७ अशावेळी संधिप्रकाशसमयी सामान्यतः रे कोमल व ध शुद्ध घेणारे राग गाइले जातात.

सकाळी ७ ते १० व 

रात्री ७ ते १० असे दुसरे समयाचे विभाजन असून,

रात्री १० ते ४ व 

दुपारी १० ते ४ असे तिसरे विभाजन आहे. शरीरातील दोषांचे संतुलन करायची क्षमता या रागात, संगीतात आहे.. ! 

आपल्याला कायम उद्दीपित करणारे संगीत ऐकायची सवय झाली आहे.

बेशरम रंग असेल किंवा काटा लगा व्हाया बदनाम मुन्नी ते शीला ची जवानी.. स्पोटिफाय वर हेच ऐकणे सुरु असते.

मी संगीतातील तज्ज्ञ नाही. मी संगीत शिकलेलो नाही.

ठराविक आवाजाला शरीर प्रतिक्रिया देते हे सत्य आहे.

स्वयंपाक करत असताना कानावर भिगे होठ तेरे पडत असेल तर सात्विक मेनू पण तामसिक गुणांचा होतो.

जेवण करत असताना कानावर रडकी गाणी पडत असतील तर राजसिक वाढ होते.

आपण काय खातोय यापेक्षा आपण कोणत्या वातावरणात खातोय हे महत्वाचे असते! 

वर उल्लेख केलेले संगीत आपल्या वृत्ती स्थिर करतात.

आपण जे काम करत आहोत त्यात एकाग्र करण्यास मदत करतात.

आपण जे खाल्ले आहे ते पचवायला मदत करतात… !

क्राईम पेट्रोल बघत जेवण करणारे कालांतराने आक्रमक होतात असे माझे निरीक्षण आहे! 

कोणाला यावर विश्वास बसत नसेल तर दोन महिने हे करून बघावे.

मी स्वतः स्वयंपाक करत असताना, जेवताना, रुग्ण तपासणी करत असताना गीत रामायण, मनाचे श्लोक, क्लासिकल इत्यादी ऐकत असतो.

आपल्याला कोठे ‘कुंडी ना खडकाओ राजा सीधे अंदर आओ राजा’ असे स्टंट करायचे आहेत.

आजूबाजूचे वातावरण सात्विक असेल तरच खाल्लेले अन्न सात्विक गुणाचे होते.

नाहीतर फक्त सलाड चरून कायम शिंग मारायची खुमखुमी असलेले मेंढे आपल्या आजूबाजूला शेकड्याने आहेतच की..

🎼 🎤 🎼

लेखक : डॉ. अनिल वैद्य

 …. एक संगीत प्रेमी…

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ब्रेडची टोपली… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ ब्रेडची टोपली… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

काल दुपारी मी परत तिच्या घराबाहेर ब्रेडच्या टोपल्या बघितल्या. शेजारी पाटी लिहिली होती, “ज्यांना खरोखर जरूर आहे, त्यांनीच फक्त हवे तेवढे ब्रेडचे लोफ घ्यावेत. आज मी एवढेच देऊ शकते. संपले असतील तर दार वाजवून अजून आहेत का विचारू नये. ”

दोन मोठ्या टोपल्यात साधारण २५-३० ब्रेडचे लोफ होते. मी गेले कित्येक महिने चालायला जाताना त्या ब्रेडच्या टोपल्या बघत होते. मला हे नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याची फार इच्छा होती, म्हणून मी तिचं दार वाजवलं. बराच वेळ कुणी दार उघडलं नाही. मी परत जायला निघाले.. तेवढ्यात त्या घराच्या खिडकीतून आवाज आला, “काय हवंय?”

मी म्हणाले, “या ब्रेडबद्दल कुतूहल होतं. बाकी काही नाही. मला ब्रेडची जरूर नाही. ”

तिनं दार उघडलं. साधारण पन्नाशीतली एक बाई नर्सच्या पोशाखात दारात दिसली. “तू पत्रकार आहेस का? कुठल्या वर्तमानपत्रासाठी लिहिणार असशील, तर मला बोलायचं नाही. ”

“नाही नाही.. मी पत्रकार नाही. मी नेहमी चालायला येते या रस्त्यावर. ही ब्रेडची टोपली तुम्ही ठेवता? कुणासाठी? मी काही मदत करू शकते का?” मी म्हणाले.

ती म्हणाली, ”मी जवळच्या हॅास्पिटलमधे नर्स म्हणून काम करते. काही वर्षांपूर्वी एक पेशंट ॲडमिट झाला. तो लहान असताना त्याच्या घरची अत्यंत गरीबी होती. वडील पाव, बिस्कीटं तयार करणारे बेकर होते. त्यामुळे तो पण ब्रेड, पेस्ट्री उत्तम बनवत असे. वडील गेल्यावर, १५-१६ वर्षांचा असल्यापासून तो एका टोपलीत ब्रेड भरून गावात हिंडून विकत असे. त्यातून बरा पैसा मिळू लागल्यावर पै पै जमवून त्याने स्वत:ची बेकरी सुरू केली. हळूहळू सर्वांनाच या बेकरीचे पदार्थ खूप आवडू लागले. त्याच्या हातात चार पैसे आले. खाण्याची मारामार संपली. घरही घेतलं. गाड्या घेतल्या.

या गावानं आपल्याला खूप काही दिलं, या भावनेनं त्यानं गरजूंसाठी ताजे ब्रेडचे लोफ दर रविवारी दोन तीन टोपल्या भरून घराबाहेर ठेवायला सुरूवात केली. तासाभरात ते लोफ गरजू लोकांनी नेलेले असत. काही लोक टोपलीत चार पैसे टाकत, एखादी थॅंक्यू नोट टाकत, तर कधी बाहेर ब्रेडला जेवढे पैसे पडतात तेवढे टाकत. एकदा कुणीतरी एक चांदीची बांगडी सुध्दा टाकली होती.

त्याचा संसार सुखाने चालला होता. मुलंबाळं चांगली निघाली. या टोपलीतील ब्रेड नेणाऱ्यांच्या दुव्यांमुळे आपलं दारिद्र्य संपलं, भरभराट झाली असं त्याला वाटायचं. काही संकटं आली, पण ती दूर झाली. वयाच्या ७६ वर्षी तो अल्पशा आजाराने गेला. त्याची बायको पण वर्षात गेली. त्याने ICU मधे असताना मला विचारले, ”मी तुझ्या नावाने काही पैसे ठेवत आहे. दर आठवड्याला गरजू लोकांसाठी तू ब्रेडची टोपली ठेवशील का? मला एके काळी ब्रेडचा एक तुकडा मिळायची मारामार होती. ते इतरांच्या नशिबी येऊ नये, म्हणून मी हे आयुष्यभर करत आलो आहे. माझी मुलं म्हणतात की याची जरूर नाही. म्हणून तुला विचारत आहे.. मुलांना समजत नाही की देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही. ”

मी ‘हो’ म्हणाले. कुठेही त्याच्या नावाचा उल्लेख नसावा आणि वर्तमानपत्रात बातमी, फोटो काही नसावेत, एवढीच त्याची अट होती. त्यानं दिलेले पैसे वापरून मी दर रविवारी दाराबाहेर ब्रेड ठेवू लागले. गेल्या वर्षी त्यानं दिलेले पैसे संपले. मी माझ्या पैशांनी कधी पाच, दहा, पंधरा ब्रेड ठेवू लागले. लोकं ब्रेड घेतात व जमेल ते आणि भरपूर प्रेम या टोपलीत टाकतात. मलाही हे लोकांचं प्रेम आवडू लागलं. मागच्या वर्षीच्या वादळात जेव्हा माझ्या घरावर मोठं झाडं पडलं, तेव्हा पाच पन्नास लोक आले व त्यांनी सर्व सफाई करून माझं घर पूर्ववत करून दिलं. माझ्या अडचणी पण कमी होत गेल्या. कारण देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही. ”

मला खूप कौतुक वाटलं. ती म्हणाली, “त्यानं ही प्रथा सुरू केली आहे ती आपण चालू ठेवू. मला काही देऊ नको, पण तुझ्या घराबाहेर एक ब्रेडची बास्केट ठेव, म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती लाभेल आणि तुला जेव्हा एखादा असा माणूस भेटेल, जो न चुकता ही प्रथा चालवेल, फक्त त्यालाच ही गोष्ट करायला सांग. कुणाला सांगायचे हे तुझं तुला कळेल, जसं मला तुझ्याशी बोलताना कळलं. ”

मी काही ब्रेडचे लोफ विकत घेतले व माझ्या घराबाहेर एका बास्केटमधे ठेवले. केवळ देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही म्हणून नाही.. पण त्या निनावी व्यक्तीने मरणानंतरही कुणाला ब्रेडचा एक तुकडा मिळण्याची भ्रांत पडू नये ही इच्छा व्यक्त केली म्हणून!

पैशाचा प्रश्नच नाही. कारण..

…देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही.

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी.

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मार्जाराचे आर्जव ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

🌹 मार्जाराचे आर्जव 🌹 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आज माझी प्रिय सखी

बसे उंच मजवर रागावून,

अपराध काय घडे माझा

नकळे माझ्या हातून !

*

करुनी तुझी प्रेमाराधना

रग लागली हाता पाया,

वाकुल्या दावीत गवाक्षात

सावरून बसलीस काया !

*

मधू इथे आणि चंद्र तिथे

चालती प्रेमचाळे मानवात,

डोळे मिटून दूध पिणारी

असे आपली मार्जार जात !

*

बघता फासला दोघातला

विरह संपेल तव उडीत,

मिलन होता दोघे चाखू

गोडी प्रणयाची थंडीत !

…… गोडी प्रणयाची थंडीत !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #264 – कविता – ☆ खबर उड़ी हम नही रहे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

 

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी द्वारा गीत-नवगीत, बाल कविता, दोहे, हाइकु, लघुकथा आदि विधाओं में सतत लेखन। प्रकाशित कृतियाँ – एक लोकभाषा निमाड़ी काव्य संग्रह 3 हिंदी गीत संग्रह, 2 बाल कविता संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 कारगिल शहीद राजेन्द्र यादव पर खंडकाव्य, तथा 1 दोहा संग्रह सहित 9 साहित्यिक पुस्तकें प्रकाशित। प्रकाशनार्थ पांडुलिपि – गीत व हाइकु संग्रह। विभिन्न साझा संग्रहों सहित पत्र पत्रिकाओं में रचना तथा आकाशवाणी / दूरदर्शन भोपाल से हिंदी एवं लोकभाषा निमाड़ी में प्रकाशन-प्रसारण, संवेदना (पथिकृत मानव सेवा संघ की पत्रिका का संपादन), साहित्य संपादक- रंग संस्कृति त्रैमासिक, भोपाल, 3 वर्ष पूर्व तक साहित्य संपादक- रुचिर संस्कार मासिक, जबलपुर, विशेष—  सन 2017 से महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9th की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में एक लघुकथा ” रात का चौकीदार” सम्मिलित। सम्मान : विद्या वाचस्पति सम्मान, कादम्बिनी सम्मान, कादम्बरी सम्मान, निमाड़ी लोक साहित्य सम्मान एवं लघुकथा यश अर्चन, दोहा रत्न अलंकरण, प्रज्ञा रत्न सम्मान, पद्य कृति पवैया सम्मान, साहित्य भूषण सहित अर्ध शताधिक सम्मान। संप्रति : भारत हैवी इलेक्ट्रिकल्स प्रतिष्ठान भोपाल के नगर प्रशासन विभाग से जनवरी 2010 में सेवा निवृत्ति। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता खबर उड़ी हम नही रहे…” ।)

☆ तन्मय साहित्य  #264 ☆

☆ खबर उड़ी हम नही रहे…… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

(पिछले दिनों एक साथी के साथ घटी घटना से प्रेरित एक मुक्तछंद रचना)

यहाँ-वहाँ बात चली लगी भली

पर मौका चूक गए

खबर उड़ी, हम नहीं रहे।

रेडियो, टी.वी. सोशल मीडिया

अखबारों में

शहर-शहर गाँव और

गलियों बाजारों में

किंतु, कुछ देर बाद हो गया

इसका खंडन, जीवित है

आएँ न झूठी अफवाहों में

सूचना अधिकृत आयी

मरे नहीं रामदीन

बात यह अपुष्ट थी

क्षमा सहित खंडन मंडन करके

गलती दुरुस्त की

पर सारे घटनाक्रम से व्यथित

हमने जब खुद अपने को देखा

चेहरे पर आई दुख की रेखा

साबूत पा कर हमको ये लगा

सम्भवतः नियति भी रुष्ट थी।

 

सोचा, गर हम अभी चले जाते

इस जर्जर तन से मुक्ति पाते

फिर श्रद्धांजलियों के सागर में

हर्षित हो

पुण्यमयी डुबकियाँ लगाते

अपनी यश-कीर्ति पर

गर्वित हो इतराते, ऐसे में

सचमुच ही मरण शोक भूलकर

स्वर्गीय सुख को पाते।

मृत्यु के बाद अहो!

सुख का एहसास हुआ

अपने परायों

सबसे ही मिलती दुआ

मृत्यु पर्व पावन में

अगणित सी खुशियाँ

जो मिलना एक मुश्त थी

सम्भवतः नियति भी रुष्ट थी

 

सोचा, गर असल में ही

मृत्यु को पा लेते, योजना बना लेते

फिर लेते जन्म कहीं

नये देह आवरण को देख-देख

मन ही मन मुदित

कहीं पालने में किलकाते

शैशव में स्मृतियाँ होती अब की

याद कर इन्हें रोते-मुस्काते,

किंतु साध रह गई अधूरी सी

जाते-जाते फिर से रह गए

मायावी मोह पाश में

फिर से बँध गए

मन को समझाने में लगे रहे

पर कहाँ नियंत्रण में आता है

अपनी ही चाल चले जाता है

माया मृगतृष्णाएँ, इसके दायें बायें

उकसाती उलझाती

और अधिक जीने का

लालच दे भरमाती

भीतर में वर्षो से छिपी हुई

मन के द्वारा कल्पित

अंतर में लिखी हुई

इच्छाएँ  दुष्ट थी

सम्भवतः नियति भी रुष्ट थी।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 88 ☆ सपने सोये… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “सपने सोये…” ।

✍ जय प्रकाश के नवगीत # 88 ☆ सपने सोये… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

देहरी रोई

घर आँगन आँचल भीगा

छप्पर छानी तक रोये।

 

सिंहासन पर

बैठा राजा

जाँच रहा परचे

किसने कितनी

करी कमाई

खुशियों पर खरचे

किस्मत सोई

रातों में काजल भीगा

आँखों में सपने सोये।

 

डरा डरा सा

हर पल जीता

आशंकित जीवन

कब बँट जाये

गंगा जमुनी

तहजीबों का मन

नफरत बोई

नहीं कहीं बादल भीगा

राहों में काँटे बोये।

 

शिथिल बाजुओं

पर हैं साधे

शेष अशेष उमर

जीता मरकर

घटनाओं में

घायल पड़ा शहर

पीर निचोई

दर्दों में पल पल भीगा

किसने किसके दुख धोये।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – समानांतर ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – समानांतर ? ?

समानांतर चले

पर समानांतर में भी

कितना अंतर रहा,

उसने मेरा लिखा पढ़ा,

मैं उसे पढ़कर लिखता रहा..!

?

© संजय भारद्वाज  

प्रात: 9:11 बजे, 21 जनवरी 2024

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 मकर संक्रांति मंगलवार 14 जनवरी 2025 से शिव पुराण का पारायण महाशिवरात्रि तदनुसार बुधवार 26 फरवरी को सम्पन्न होगा 💥

 🕉️ इस वृहद ग्रंथ के लगभग 18 से 20 पृष्ठ दैनिक पढ़ने का क्रम रखें 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

 

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – संस्मरण ☆ दस्तावेज़ # 11 – 50 साल पहले जबलपुर का परिदृश्य और साइंस कॉलेज से ग्रेजुएशन – ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

श्री जगत सिंह बिष्ट

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

(ई-अभिव्यक्ति के “दस्तावेज़” श्रृंखला के माध्यम से पुरानी अमूल्य और ऐतिहासिक यादें सहेजने का प्रयास है। श्री जगत सिंह बिष्ट जी (Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker) के शब्दों में  “वर्तमान तो किसी न किसी रूप में इंटरनेट पर दर्ज हो रहा है। लेकिन कुछ पहले की बातें, माता पिता, दादा दादी, नाना नानी, उनके जीवनकाल से जुड़ी बातें धीमे धीमे लुप्त और विस्मृत होती जा रही हैं। इनका दस्तावेज़ समय रहते तैयार करने का दायित्व हमारा है। हमारी पीढ़ी यह कर सकती है। फिर किसी को कुछ पता नहीं होगा। सब कुछ भूल जाएंगे।”

दस्तावेज़ में ऐसी ऐतिहासिक दास्तानों को स्थान देने में आप सभी का सहयोग अपेक्षित है। इस शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है श्री जगत सिंह बिष्ट जी का एक ऐतिहासिक दस्तावेज़ 50 साल पहले जबलपुर का परिदृश्य और साइंस कॉलेज से ग्रेजुएशन।) 

☆  दस्तावेज़ # 11 – 50 साल पहले जबलपुर का परिदृश्य और साइंस कॉलेज से ग्रेजुएशन ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆ 

काफी उथल-पुथल का समय था। एक संत, आचार्य विनोबा भावे, जबलपुर को संस्कारधानी घोषित करके जा चुके थे और दूसरे संत, आचार्य रजनीश, जिनका मिजाज़ कुछ अलग था, संभोग से समाधि की ओर जाने का मार्ग बता रहे थे। महर्षि महेश योगी के भावातीत ध्यान का भी प्रवर्तन हो रहा था। यह नगरी अभी इतनी प्रगतिशील नहीं हुई थी कि टॉर्च बेचने वाले जादूगरों के अलावा अन्य बुद्धिजीवियों को स्वीकार कर सके। व्यंग्यकार हरिशंकर परसाई को ‘वैष्णव की फिसलन’ लिखने के परिणामस्वरूप अपने हाथ-पांव तुड़वाने पड़े थे।

रॉबर्टसन कॉलेज तब तक गवर्नमेंट साइंस कॉलेज कहलाने लगा था। बगल में, महाकौशल आर्ट कॉलेज था। सिविल लाइंस के पचपेड़ी में इनके विशालकाय परिसर थे। निकट ही, मध्यप्रदेश के पूर्व मुख्यमंत्री, इंदिरा गांधी के राजनीतिक सलाहकार और ‘कृष्णायन’ ग्रन्थ के रचयिता, पंडित द्वारिकाप्रसाद मिश्र का निवास था। थोड़ा आगे चलकर, जबलपुर यूनिवर्सिटी थी, जिसका नामकरण अब रानी दुर्गावती विश्वविद्यालय हो गया है।

सेठ गोविंददास लंबे समय तक जबलपुर के सांसद रहे। उन्होंने हिंदी की सेवा की और ‘केरल के सुदामा’ तथा अन्य रचनाओं का अपनी कलम से सृजन किया। मुझे तो उस वक्त शहर के सबसे बड़े विद्वान दर्शनाचार्य गुलाबचंद्र जैन प्रतीत होते थे क्योंकि पाठ्यक्रम में उन्हीं की लिखी पुस्तकें पढ़ाई जाती थीं! सेठ गोविंददास के बाद, विश्वविद्यालय के छात्र संघ के अध्यक्ष, शरद यादव, अगले सासंद चुने गए।

जब हमने कॉलेज में दाखिला लिया (1971), तो उसके तुरंत बाद पाकिस्तान से दूसरा युद्ध हुआ और बांग्लादेश स्वतंत्र हुआ। जनरल नियाज़ी और उसके साथ आत्म-समर्पण करने वाले पाक सैनिकों को कॉलेज के पास ही आर्मी एरिया में कैद रखा गया था। हम रांझी से साइकिल में, गन कैरेज फैक्ट्री होते हुए, सेंट्रल स्कूल के परिसर के अंदर से शॉर्टकट लेकर, कॉलेज की पिछली ओर साइकिल स्टैंड में पहुंचते थे। कुछ समय तक वेस्टलैंड खमरिया से, प्रदीप मित्रा का साथ मिला। लंबे रास्ते में हम कार्ल मार्क्स के साम्यवाद और अमेरिका में पूंजीवाद की चर्चा करते थे। मुझे तो इन विषयों की कोई खास समझ नहीं थी लेकिन प्रदीप, फर्ग्यूसन कॉलेज पूना और आई आई टी कानपुर होते हुए, अमेरिका पहुंचकर वहां प्रोफेसर बन गया।

कॉलेज में पढ़ाई का अनुकूल वातावरण था और प्रोफ़ेसर बहुत योग्य थे। प्रोफेसर हांडा हमें गणित पढ़ाते थे। वह बहुत लंबे थे। गर्दन टेढ़ी कर कार चलाते थे। क्लास के अंत में पूछते, “एनी क्वेशचन?” जब हम ‘न’ में सिर हिलाते, तो वो बोलते, “नो क्वेशचन, वैरी इंटेलीजेंट!” छोटे कद के, अत्यंत प्रखर, डॉ प्रेमचंद्र, गणित के हमारे दूसरे प्रोफेसर थे। उनकी मूछें बहुत आकर्षक थीं। वे ‘इक्वेशन’ और ‘इक्वल टू’ का बहुत अजीबोगरीब और नाटकीय उच्चारण करते थे। ऐसा करने में, उनकी मूछें, तराजू के दो पलड़ों की तरह ऊपर-नीचे झुक जाती थीं – एक नीचे की तरफ और दूसरी ऊपर की ओर!

केमिस्ट्री के प्रोफेसर डॉ महाला और मिश्रा सर सादगी की प्रतिमूर्ति लेकिन गहन विद्वान थे। महाला सर तो ब्लैकबोर्ड के सामने बीचोंबीच खड़े होकर, दोनों तरफ दाएं और बाएं हाथ से एक जैसा लिखते थे। सहस्त्रबुद्धे सर पुलिस अधिकारी की तरह कड़क थे, हम उनसे डरते थे। फिजिक्स डिपार्टमेंट के प्रोफेसर एस के मिश्रा और निलोसे सर बहुत सौम्य थे। उन्हें विषय का गहरा ज्ञान था। पालीवाल सर अप्लाइड मैथेमेटिक्स के अंतर्गत स्टेटिस्टिक्स पढ़ाते थे। उनका पढ़ाने का ढंग मज़ेदार था। वो पढ़ाते वक्त, कलाई को स्पिन गेंदबाज की तरह घुमाते थे, आँखें भी गोलगोल नचाते थे और उनकी जीभ भी घिर्रघिर्र करती थी। वे जब कक्षा को ‘कोरिलेशन’ का गणितीय पाठ पढ़ा रहे होते तो छात्र उस युग की तारिकाओं, शर्मीला टैगोर, वहीदा रहमान, तनूजा और डिंपल कपाड़िया के सौंदर्य का आपस में कोरिलेशन ढूंढ रहे होते।

जबलपुर उन दिनों फिल्म डिस्ट्रीब्यूशन की महत्वपूर्ण टेरिटरी हुआ करती थी। राजकपूर की ‘मेरा नाम जोकर’ फ्लॉप हुई तो उन्होंने, नुकसान की भरपाई के लिए, एक बोल्ड फिल्म ‘बॉबी’ बना डाली जिसने सारे रिकॉर्ड तोड़ डाले। इस शहर में, ‘दो रास्ते’ और ‘जय संतोषी मां’ जैसी फिल्मों ने सिल्वर जुबली मनाई। पुराने समय में तो श्याम टॉकीज, श्रीकृष्णा, सुभाष, प्लाजा, विनीत और लक्ष्मी टॉकीज जैसे ही पुराने सिनेमा हॉल थे। फिर, कुछ अच्छे बने जैसे ज्योति टॉकीज, आनंद और शीला टॉकीज। प्रेमनाथ की एम्पायर टॉकीज और डिलाइट टॉकीज का अपना ऑडियंस था। वहां हमने ‘द गंस ऑफ नेवरोन’, ‘एंटर द ड्रैगन’ और चार्ली चैपलिन की फिल्में देखीं। डिलाइट में एक बार हंगेरियन फिल्म फेस्टिवल भी आयोजित हुआ था।

हमारे सहपाठी थे – विजय कुमार चौरे, इंद्र कुमार दत्ता, जी पी दुबे, पी पी दुबे, अरविंद हर्षे, विजय कुमार बजाज, प्रवीण मालपानी (सेठ गोविंददास के नाती), रविशंकर रायचौधुरी, प्रदीप मित्रा, आशीष बैनर्जी… और मैं, जगत सिंह बिष्ट। एक नाम मैं भूल रहा हूं। उनकी उम्र हमसे कुछ अधिक थी और वो शायद सिहोरा के आसपास से आते थे। उनका स्वभाव अत्यंत मृदु था। दो छात्र यमन से पढ़ने आए थे – अब्दुल रहमान सलेम देबान और उमर बशर। हमारी कक्षा में दो ही छात्राएं थीं – मंजीत कौर और  उमा देवी। हम सब शुद्ध, सात्विक और दूध के धुले थे। न जाने किस मनचले ने कन्याओं की बेंच की ओर, चुपके से प्रेमपत्र खिसका दिया। तत्पश्चात वह प्रतिदिन उत्तर की प्रतीक्षा करता। कुछ दिन खामोशी रही। आखिर उस तरफ से, उस लड़के को एक पर्ची पहुंची, जिसमें लिखा था – “ईश्वर आपको सद्बुद्धि दे!”

कॉलेज परिसर में एक छोटी सी कैंटीन थी जिसमें चाय और समोसे मिलते थे। कभी कभी हम कुछ दोस्त इंडियन कॉफी हाउस (सदर या सिटी) जाकर डोसा और कॉफी का लुत्फ़ उठाते थे। शायद इसी के लिए, हमें हर महीने स्कॉलरशिप मिलती थी। प्रिंसिपल के ऑफिस के बाहर ही बाबू लोग बैठते थे। हमें तो कोई परेशानी नहीं होती थी लेकिन अरविंद को अपने पिताजी को लेकर आना पड़ता था क्योंकि वो इतना मासूम लगता था कि बाबू उसके हाथ में पैसे देने से हिचकिचाते थे। तत्कालीन प्रिंसिपल, कालिका सिंह राठौर बहुत सख़्त थे। अनुशासन का पालन न करने वाले को ऐसी डांट लगाते थे कि वो तौबा करने लगता था।

इस बार मैं न्यूज़ीलैंड गया तो बेटे ने अपने दोस्त रौनक से मिलवाया। बातों ही बातों में मालूम हुआ कि उसके पापा भी जबलपुर के हैं और साइंस कॉलेज से पढ़े हैं। निकुंज श्रीवास्तव नाम है उनका। मॉडल स्कूल और साइंस कॉलेज में पढ़े हैं। हम दोनों ने स्कूल 1971 में पास किया और दोनों ही 1974 में ग्रेजुएट हुए। कॉलेज में सेक्शन जरूर अलग अलग थे। मिलते ही, पहली बात उन्होंने पूछी, “तुमने कॉलेज में घोड़े की आवाज़ सुनी थी?” मैंने कहा, “हां, कई बार।” बोले, “वो मैं ही था!” मैंने पूछा, “आपको एक बार सस्पेंड भी कर दिया था न?” बोले, “हां, एक बार नहीं, सात बार सस्पेंड हुआ हूं!” ज़बरदस्त शख्सियत है उनकी! लगता है, मेले में बिछुड़ गए थे हम। अब मिले हैं। उनसे मिलकर बहुत आनंद आता है। लगता है, अभी भी वही कॉलेज के दिन चल रहे हैं। वही उमंग, वही मस्ती। ढेर सारे किस्से हैं उन दिनों के जाे एक के बाद एक याद आते हैं। हरि अनंत, हरि कथा अनंता।

♥♥♥♥

© जगत सिंह बिष्ट

Laughter Yoga Master Trainer

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # 92 ☆ बुराई किसकी करूँ, किसकी  मैं करूँ तारीफ़… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “बुराई किसकी करूँ किसकी  मैं करूँ तारीफ़“)

☆ साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # 92 ☆

✍ बुराई किसकी करूँ, किसकी मैं करूँ तारीफ़… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

करम जमाने पे ये बे हिसाब जिसका है

सवाल उसने  किया है जबाब जिसका है

 *

अब ऐसे हुस्न पर इतरा रही है ये दुनिया

नतीजा दोस्तो मिस्ले तुराब जिसका का है

 *

उसे लुटेरों का कोई भी डर नहीं होगा

अदब का इल्म का आला निसाब जिसका है

 *

बुराई किसकी करूँ किसकी  मैं करूँ तारीफ़

उसी के ख़ार शुगुफ्ता गुलाब जिसका है

 *

दखल किसी का नहीं उसकी कारसाजी में

अँधेरे  करता है वो आफ़ताब जिसका है

 *

उसी की मिहर से तू साँस ले रहा है यहाँ

करम उसी का है तुझ पर इताब जिसका है

 *

उसे न नाम कोई और दो जहां वालो

रसूले हक़ का जहां में ख़िताब जिसका है

 *

अरुण उसी ने ख़िज़ाँ की भी रुत बनाई है

फिजां में फूल पे आया शबाब जिसका है

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

सिरThanks मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares