(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य शृंखला में आज प्रस्तुत है सामाजिक विमर्श पर आधारित विचारणीय लघुकथा “जल संरक्षण”।)
☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 213 ☆
🌻लघुकथा 🌻 कुंभ स्नान 🌻
सारा विश्व, भारतवर्ष प्रयागराज में आस्था के प्रतीक कुंभ महोत्सव में मांँ गंगा स्नान महत्व को अपना धर्म – कर्म की राह में एक कदम आगे बढ़ा रहा है। जय- जयकार करते सभी सोशल मीडिया, चैनल भक्ति से सराबोर दैनिक समाचार पत्र, और जगह जगह कुंभ जाने की इच्छा।
श्री राम और रामायण पर आस्था और पूर्ण विश्वास रखने वाली श्रेया का विधिवत चौपाई का पठन करना प्रतिदिन का उसका नियम था।
वह कर्म का लेख और भाग्य विधाता को सर्वोपरि मान कर अपने जीवन में आने वाली सभी कठिनाईयाँ सब सहती जा रही थी। ।
घर के आसपास रिश्ते- नाते, अडोसी – पड़ोसी, कुटुंब परिवार सभी कुंभ जाने की बात कर रहे थे। ठिठुरती ठंड में पतिदेव पेपर पढ़ने में तल्लीन।
चाय लेकर सोची वह भी याचना करके देखे की कुंभ ले चले। धीरे से दबी जुबान में श्रेया ने कहा – – सुनिए सभी कुंभ स्नान को प्रयागराज जा रहे हैं क्या? हम लोग भी जाएंगे।
कुटिलता भरी मुस्कान लिए अत्यधिक कड़वाहट भरे शब्दों का इस्तेमाल करते सौरभ उठा बाथरूम से भरी बाल्टी का पानी श्रेया के ऊपर डालते बोला – – हो गया पतिदेव के हाथ से कुंभ स्नान। इस जन्म तुम आराम से स्वर्ग पहुँच जाओगी। ठंड की सिहरन से श्रेया कांपने लगी।
पास के मंदिर में घंटी की आवाज और जोर-जोर से रामायण की चौपाई सुनाई दे रही थी—-
(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” आज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)
☆ आलेख # 116 ☆ देश-परदेश – ठंड बहुत है ☆ श्री राकेश कुमार ☆
इन शब्दों के उपयोग से हम अपनी लेट लतीफी पर पर्दा डालने का कार्य करते हैं। मौसम को हथियार बनाना सब से आसान जो होता हैं।
कुछ दिन पूर्व जयपुर से दिल्ली प्रातः काल टैक्सी से यात्रा करनी थी। जयपुर से जाने वाले वर्तमान में परिचितों के लिए मिठाई के स्थान पर विश्व प्रसिद्ध कचौरी चाहे प्याज,कोटा या दाल वाली को ही प्राथमिकता देते हैं। मेजबान भी मीठे के नाम से परहेज करते हैं।
घर के पास के कचौरी निर्माता को फोन पर जानकारी प्राप्त की कितने बजे कचौरी उपलब्ध हो जाएगी। उसने साढ़े सात पर सभी वैरायटी की गारंटी ली। सुबह जब आठ बजे उसके यहां पहुंचे तो बोला अभी तो आधा घंटा और लगेगा। उसने भी ठंड का हवाला दे कर हमारे गुस्से को ठंडा कर दिया। हमने भी तर्क दिया क्या ठंड अचानक आ गई है ? वो हंसते हुए बोला इतनी देरी तो स्वाभाविक हैं। रात को दुकान बंद करने के समय बहुत देरी हो जाती हैं। आजकल लोग निशाचर हो गए हैं। स्विगी वाले “कचोरीखोरों” को रात्रि ग्यारह बजे तक घर पहुंच सेवा देने में तत्पर रहते हैं। आप जैसे बुजुर्ग ही सुबह सुबह हमारी दुकान पर आकर बहस कर दिमाग खाते हैं।
हमारी समझ में आ गया, इसे अवश्य बस कंडक्टर और सेवानिवृत आई ए एस के थप्पड़/ झगड़े वाली कहानी की जानकारी होगी। हम भी आधे घंटे तक इंतजार कर कचौरी ले कर आ गए। अब ठंड बहुत बढ़ गई, मोबाइल पर उंगलियां नहीं चल रहीं हैं।
बीज हा शब्द माहित नसेल असा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही. सर्वसाधारणपणे कोणत्याही वनस्पतीच्या बी ला बीज असे म्हटले जाते. इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं फार तर Seed अस म्हणतील, पण त्यामागील मर्म मात्र सर्वांना ठाऊक आहे.
आपला देश कृषिप्रधान आहे. पूर्वी “उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी” असे सूत्र समाजात प्रचलित होते. स्वाभाविकच शेती करणाऱ्याला समाजात खूप मोठा आणि खराखुरा मान होता. दुष्काळ काय सध्याच पडायला लागले असे नाही, ते याआधीही कमी अधिक प्रमाणात होतेच. त्याकाळात शेतकरी जरी पारंपारिक पद्धतीने शेती केली जात होती. शेतकरी आपल्या बियाण्याची पुरेशी काळजी घेत असत. शेती नैसर्गिक पद्धतीने केली जायची, श्रद्धेनी केली जायची. रासायनिक शेती नव्हतीच. आपली शेती तेव्हा पूर्णपणे गोवंशावर आधारित होती. त्यामुळे तेव्हा जे काही कमी अधिक अन्नधान्य शेतकऱ्याला मिळायचं ते *’सकस’*असायचे, ते पचविण्यासाठी आणिक हाजमोला खाण्याची गरज पडत नव्हती. एका अर्थाने मागील पिढ्या धष्ठपुष्ट होत्या. शिवकाळातील कोणत्याही सरदाराचा पुतळा किंवा छायाचित्र बघितले तर ते आपल्या सहज लक्षात येईल.
कोणत्याही कर्माचे फळ हे त्या कर्माच्या हेतूवर अवलंबून असते. शरीरावर शस्त्रक्रिया करणारा तज्ञ मनुष्याचे पोट फाडतो, आणि एखादा खुनी मनुष्यही पोट फाडतो. दुर्दैवाने शस्त्रक्रिया करताना रुग्णास मृत्यू आला तर त्या तज्ञास शिक्षा होत नाही, पण खून करणाऱ्यास शिक्षा होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वीच्या काळी बलुतेदार पद्धती असल्यामुळे शेतकरी धान्य फक्त स्वतःसाठी, अधिकाधिक फायद्यासाठी न पिकवता संपूर्ण गावासाठी पिकवायचा आणि तेही देवाचे स्मरण राखून. आपली समाज रचना धर्माधिष्ठित होती. इथे ‘धर्म’ हा धर्म आहे, आजचा ‘धर्म’ (religion) नाही. धर्म म्हणजे विहीत कर्तव्य. समाजातील प्रत्येक घटक आपापले काम ‘विहीत कर्तव्य’ म्हणून
करायचा. त्यामुळे त्याकाळी प्रत्येक काम चांगले व्हायचे कारण एका अर्थाने तिथे भगवंताचे अधिष्ठान असायचे.
मधल्या काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले. देश स्वतंत्र झाला. विकासाची नविन परिमाणे अस्तित्वात आली आणि ती कायमची समाजमनात ठसली किंवा जाणीवपूर्वक ठसवली गेली. जूनं ते जुनं (टाकाऊ) आणि नवीन तितके चांगले असा समज समाजात जाणीवपूर्वक दृढ करण्यात आला. भारतीय विचार तेवढा मागासलेला आणि पाश्चिमात्य विचार मात्र पुरोगामी (प्रागतिक) असा विश्वास समाजात जागविला गेला. विकासाचा पाश्चात्य विचार स्वीकारल्याचे दुष्परिणाम आज आपण सर्वजण कमीअधिक प्रमाणात अनुभवत आहोत. अधिकाधिक धान्य उत्पादन करण्याच्या नादात रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून आणि गोकेंद्रित शेती न करता आपण इंधन तेलावर आधारित परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च करणारी ‘श्रीमंत’ शेती करू लागलो आणि वसुंधरेचे नुसते आपण नुसते दोहन केले नाही तर तिला ओरबाडून खायला सुरुवात केली. त्यामुळे पुढील पिढीला जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता आणि भूगर्भातील पाण्याचा तुटवडा अशा कितीतरी भयानक गोष्टी भेट म्हणून जन्मताच वारसाहक्काने दिल्या असे म्हटले तर वावगे होऊ नये. ह्यातून आज तरी कोणाची सुटका नाही.
ह्या सर्व गोंधळात आपण बीज टिकविण्याचे सोयीस्कररित्या विसरलो. जिथे बीजच खराब तिथे पीक चांगले येईल अशी अपेक्षा करणे हा मूर्खपणाच ठरणार, नाही का? “शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी ।।” असे संतांनी सांगितले असताना आपण ते ‘संतांनी’ सांगितले आहे म्हणून दुर्लक्ष केले आणि हीच आपली घोडचूक झाली असे म्हणता येईल. आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच. खराब झालेले बीज फक्त शेतातील बियाण्याचे नाही तर आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला त्याची प्रचिती येते.
समाजातील सज्जनशक्तीबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून असे म्हणावेसे वाटते की खूप शिक्षक पुष्कळ आहेत पण चांगला शिक्षक शोधावा लागतो, शाळा भरपूर आहेत पण चांगली शाळा शोधावी लागते, डॉक्टर भरपूर आहेत पण चांगला डॉक्टर शोधावा लागतोय, वकील पुष्कळ आहेत पण चांगला वकील शोधावा लागतोय, अभियंते भरपूर आहेत पण चांगला अभियंता शोधावा लागतोय. आज ही परिस्थिती समाजपुरुषाच्या प्रत्येक घटकास कमीअधिक प्रमाणात लागू आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे चित्र बदलण्याचे कार्य आज आपणा सर्वांना करायचे आहे. कारण संकट अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहचले आहे. हे सर्व ऐकायला, पहायला, स्वीकारायला कटू आहे पण सत्य आहे. आपण आपल्या घरात कोणते बीज जपून ठेवत आहोत किंवा घरात असलेले ‘बीज’ खरेचं सात्विक आहे की त्यावरील फक्त वेष्टन (टरफल) सात्विक आहे याचीही काळजी घेण्याची सध्या गरज आहे. वरवर दिसणारे साधे पाश्चात्य शिष्ठाचार आपल्या संस्कृतीचा बेमालूमपणे ऱ्हास करीत आहेत. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा आणि आपल्या घरात शिवाजीचा मावळा सुद्धा जन्मास येऊ नये असे जोपर्यंत आईला वाटेल तो पर्यंत यात काहीही फरक पडणार नाही.
संत ज्ञानेश्वरांच्या काळात देखील असेच अस्मानी आणि सुलतानी संकट होते. राष्ट्राचा विचार करताना दोनचारशे वर्षांचा काळ हा फार छोटा कालखंड ठरतो. माऊलींपासून सुरु झालेली भागवत धर्माची पर्यायाने समाज प्रबोधनाची चळवळ थेट संत तुकारामांपर्यंत चालू राहिली. ह्या सर्व पिढ्यानी सात्विकता आणि शक्तीचे बीज टिकवून ठेवले त्यामुळे त्यातूनच शिवाजी राजांसारखा हिंदू सिंहासन निर्माण करणारा स्वयंभू छत्रपती निर्माण झाला. “बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी।।” म्हणणारे तुकोबाराय सुद्धा हेच सूत्र (शुद्ध बीज टिकविले पाहिजे) वेगळ्या भाषेत समजावून सांगत आहेत. समर्थांच्या कुळातील मागील कित्येक पिढ्या रामाची उपासना करीत होत्या, म्हणून त्या पावनकुळात समर्थ जन्मास आले. कष्टाशिवाय फळ नाही, नुसते कष्ट नाही तर अखंड साधना, अविचल निष्ठा, तितिक्षा, संयम, धैर्य अशा विविध गुणांचा संचय करावा लागतो तेव्हा कुठे ‘ज्ञानेश्वर’, ‘तुकाराम’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘सावरकर’, ‘भगतसिंग’, डॉ. हेडगेवार जन्मास येत असतात.
मृग नक्षत्र लागले की आपल्याकडे पाऊस सुद्धा कमी अधिक प्रमाणात सुरु होतो. शेतकऱ्यांची बियाणे पेरायची झुंबड उडते. शेतकरी आपले काम श्रद्धेनी आणि सेवावृत्तीने करीत असतात. आपणही त्यात आपला खारीचा वाटा घ्यायला हवा. आपल्याला देशभक्तीचे, माणुसकीचे, मांगल्याचे, पावित्र्याचे, राष्ट्रीय चारित्र्याचे, सांस्कृतिक स्वातंत्र्याचे, तसेच समाजसेवेचे बीज पेरायला हवे आहे आणि त्याची सुरुवात स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून करायची आहे.
विकासाच्या सर्व कल्पना मनुष्यकेंद्रीत आहेत आणि ती असावयासच हवी. पण सध्या फक्त बाह्यप्रगती किंवा भौतिक प्रगतीचा विचार केला जात आहे. पण जोपर्यंत मनुष्याचा आत्मिक विकास होणार नाही तोपर्यंत भौतिक विकासाचा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसणार नाहीत. मागील शतकात लॉर्ड मेकॉले नावाचा एक ब्रिटिश अधिकारी भारतात येऊन गेला. संपूर्ण भारतात तो फिरला. नंतर त्याने ब्रिटिश संसदेत आपला अहवाल सादर केला. त्यात तो स्वच्छपणे सांगतो की संपूर्ण भारतात मला एकही वेडा आणि भिकारी मनुष्य दिसला नाही. सर्व जनता सुखी आहे. आणि ह्याला एकच कारण आहे ते म्हणजे इथली विशिष्ठ कुटुंब रचना आणि कुटुंबातील जेष्ठांचा आदर करण्याची पद्धत (‘एकचालकानुवर्तीत्व’).
आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरजच नाही, वृद्धाश्रमांच्या संख्येवरूनच ते आपल्या लक्षात येईल. हे एक उदाहरण झाले. अश्या बऱ्याच गोष्टीत आपण पाश्चात्य लोकांस मागे टाकले आहे.
एक छान वाक्य आहे. “लहानपणी आपण मुलांना मंदिरात घेऊन गेलो तर तीच मुलं म्हातारपणी आपल्या तीर्थयात्रा घडवतात”.
‘मुलं एखादवेळेस ऐकणार नाहीत पण अनुकरण मात्र नक्की करतील हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. मुलांनी अनुकरण करावे असे वातावरण आपण आपल्या नविन पिढीला देऊ शकलो तर हे खूप मोठे राष्ट्रीय कार्य होईल. त्यासाठी समाजात नवीन आदर्श प्रयत्नपूर्वक निर्माण करावे लागतील आणि असलेल्या आदर्शाना समाजासमोर प्रस्तुत करावे लागेल. आपल्या मुलांकडून माणुसकीची अपेक्षा करण्याआधी आपण त्यांना आपल्या आचरणातून माणुसकी शिकवावी लागेल. आपल्याकडे विवाहसंस्कार सुप्रजा निर्माण करण्यासाठी आहे. तो फक्त ‘सुख’ घेण्यासाठी नक्कीच नाही, पण याचा विचार विवाहप्रसंगी किती कुटुंबात केला जातो ?, मुख्य ‘संस्कार’ सोडून बाकी सर्व गोष्टी दिमाखात पार पाडल्या जातात, पण विवाह संस्था आणि गृहस्थाश्रम म्हणजे काय हे कोणी सांगत नाही. ते शिकविणारी व्यवस्था आज नव्याने निर्माण करावी लागेल.
हिंदू संस्कृती पुरातन आहे. जशी आपली ‘गुणसूत्रे’ आपण आपल्या पुढील पिढीस सुपूर्द करीत असतो तसेच ‘नीतीसूत्रे’ही पुढील पिढीस देण्याची निकड आहे. अर्थात नितीसुत्रे देताना मात्र आचरणातून अर्थात ‘आधी केले मग सांगितले’ या बोधवचनाचे स्मरण ठेऊन द्यावी लागतील आणि हा महान वारसा जपण्याची प्रेरणा सुद्धा. आपल्या पुढील पिढीला आपल्या वडिलांची कीर्ती सांगावीशी वाटेल असे आपण जगायचा प्रयत्न करायला हवा. पाऊस पडल्यावर सर्व वसुंधरेस चैतन्य प्राप्त होते, बहुप्रसवा असलेली वसुंधरा हिरवा शालू पांघरते, या सृजनातून सर्व प्राणीमात्रांना वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य प्राप्त होत असते. या आल्हाददायी वातावरणाचा मानवी मनावरदेखील सुखद परिणाम होत असतो.
या आल्हाददायी, मंगलमयी वातावरणामुळे आपल्या विचारांनासुद्धा नवसंजीवनी प्राप्त व्हावी आणि ‘सुसंस्कारांचे, सात्विकतेचे बीज संवर्धित आणि सुफलीत’ करण्याचे कार्य आपणा सर्वांकडून घडावे अशी श्रीरामचरणी प्रार्थना करतो.
☆ आणि… कविता जिवंत राहिली…भाग – १ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे☆
तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता. निर्भय तिच्या पोटात वाढत होता. माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता. मी कंत्राटी कामगार होतो, आणि वेळ अशी आली होती, घरातलं सगळं राशन संपलं होतं. गॅस संपून आठ दिवस झाले होते. स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती. टीव्ही चा रिचार्ज संपला होता. त्यामुळे टीव्ही ही बंद होता. रोजचं येणारं दूध बंद केलं होतं. घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता.
तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते. तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता. गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे. तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे. दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही. उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती आणि माझ्यासोबत लढत होती.
परंतु आजची परिस्थितीच भयंकर होती. घरात थोडेसे तांदूळ शिल्लक राहिले होते. बाकीचे सगळे डब्बे रिकामे झाले होते. एका वेळची सोय होणार होती. आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो. पण माझा फोन कुणीच उचलत नव्हतं. कारण त्यांना माहीत होतं, हा पैसे मागायलाच फोन करतोय. सगळ्यांकडून उसने घेऊन झाले होते. त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. एकाने फोन उचलला आणि मी बोलायच्या आधीच तो म्हणाला “नितीन थोडेफार पैसे असले तर दे ना, ” मी काहीच उत्तर दिलं नाही, फोन कट केला आणि कुणालाच फोन करून काही होणार नाही, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनात विचार करून मी खाली अंथरलेल्या चटईवर बसलो.
तिची अंघोळ झाली होती. आम्ही पुण्यात पिंपळे निलख मध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. टीव्ही बंद असल्यामुळे तिला करमत नव्हतं. तिचा मूड ठीक करण्यासाठी मी कधीतरी तिच्या आवडीचं “सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे” हे गाणं गुणगुणत असायचो. मी गाणं गायला सुरवात केली, पण ती एकटक खाली मान घालून चटईवर बोट फिरवत होती. तिने लक्षच दिलं नाही. माझ्या कवितेवर ती फार प्रेम करते म्हणून कवितेच्या ओळी म्हणायला सुरवात केली तेव्हा, तिने झटकन माझ्याकडे रागाने पाहिलं. मी मान खाली घातली. घराच्या उंबऱ्यावर भूक हंबरडा फोडायला लागली की घराच्या आत जगातलं कोणतंच संगीत आणि कोणतीच कविता मनाला आनंद देऊ शकत नाही हे कळलं.
आम्ही बराच वेळ एकमेकांशी काहीच बोललो नाही. ती मान खाली घालून चटईवर बोटाने कोणती न उमटणारी अक्षरे गिरवत कुणास ठाऊक. सात महिन्याची गरोदर असणारी, एक नवा जन्म पोटात वाढवू पाहणारी, आई होण्याच्या उंबरठ्यावर असणारी दिपाली आमच्या बाळासाठी कदाचित एखादं नाव पुन्हा पुन्हा गिरवत असावी. मी तिच्या बोटाकडे एकटक पाहत होतो.
ती स्वत:ला सावरत हळूहळू उठली आणि दार उघडून बाहेर गेली. मी काहीच बोललो नाही. तिने शेजारच्या घरातून पेपर वाचण्यासाठी मागून आणला. कारण घरातली सगळी रद्दी या आठवड्यात तिने वाचून संपवली होती. रविवार होता. पेपरला पुरवण्या होत्या. तिचा चेहरा थोडासा खुलला आणि ती पुन्हा खाली बसली.
मी एकटक तिच्या डोळ्यात पाहत होतो आणि ती पेपरची पाने चाळू लागली. आणि अचानक ती जोरात ओरडली. “ओ चंदनशिवे, हे बघा काय आलंय पेपरला. “
मी म्हणलं “काय दिपाली”?
तर तिने मला विचारलं “काय ओ चंदनशिवे, तुम्ही कवी आहात ना?”
मी पार गळून गेलेल्या आवाजात म्हणलं, “हो आहे, पण काय करणार कवी असून, आणि कविता तरी काय करणार आहे माझी”
तिने हाताला गच्च धरून जवळ ओढलं आणि माझ्या समोर ते पेपरचं पान धरलं आणि त्या पानावर असलेली जाहिरात मला आजही आठवतेय. !! ‘अंशुल क्रियेशन प्रस्तुत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली काव्यवाचन स्पर्धा. !! रोख रकमेची तीन बक्षिसे. ‘ खाली पत्ता होता चिंचवड, पुणे, आणि संपर्क साधा म्हणून मोबाईल नंबर दिलेला होता.
मी ती जाहिरात बघितली. दिलेल्या नंबरवर फोन केला. नाव सांगितलं. नावनोंदणी केली आणि मी दिपालीकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसायला लागली होती. ती म्हणाली, “चंदनशिवे, घरात शेवटचे सत्तर रुपये आहेत. ते मी तुम्हाला देतेय. या स्पर्धेत जा. आजच स्पर्धा आहे ही. तिथं कविता म्हणा, आणि त्यातलं सगळ्यात मोठी रक्कम असणारं बक्षिस घेऊनच घरी या. पण एक सांगते, आज जर तुम्ही बक्षिस नाही मिळवलं तर संध्याकाळी या घरात फक्त नितीन चंदनशिवे आत येईल. कवी नितीन चंदनशिवे पुन्हा या जगात कुठं दिसला नाही पाहिजे. ” तिच्या या वाक्याने माझ्या पोटातलं काळीजच कुणीतरी मुठीत गच्च आवळून धरल्यागत वाटायला लागलं.
ती पुढे म्हणाली, “जर माझ्या संसाराला तुमची कविता राशन मिळवून देऊ शकत नसेल तर ती कविता मला या घरात नकोय. ” सात महिन्याची गरोदर असणारी, सर्वसामान्य गृहिणीसारखी सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दिपालीचं त्यावेळी काही चुकलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. मी ते तिचं आवाहन स्वीकारलं. तिने घरातले जपून ठेवलेले सत्तर रुपये माझ्या हातात देताना माझा हात घट्ट आवळून धरला आणि मला आतल्या आत हुंदका आला. मी अंगात कपडे घातले. तिच्या डोळ्यात बघितलं आणि निघालो.
मी चिंचवडला आलो. बसच्या तिकीटला दहा रुपये गेले होते. तिथं प्रवेश फी पन्नास रुपये होती ती भरली. ती भरत असताना माझ्या मनाच्या वेदना नाही मांडता येणार. परत जाण्यासाठी दहा रुपये शिल्लक राहिले होते. मी ते जपून ठेवले. बाजूला सर्वांसाठी नाष्ट्याची सोय केली होती. मला खावंसं वाटलं नाही, कारण ती घरात उपाशी होती. मी मनातल्या मनात हादरून गेलो होतो. मी स्पर्धेला आलो होतो खरा पण, आतल्या आत माझ्या कवितेची माझ्या पत्नीशी स्पर्धा सुरू झालेली होती. कारण इथं जिंकलो तरच माझ्या अंतरंगात कविता आयुष्यभर जिवंत राहणार होती, आणि हरलो तर, फक्त शरीर घेऊन मेलेल्या मढ्यागत जगणं समोर दिसत होतं.
स्पर्धा सुरू झाली. बराच वेळ होत चालला होता. इतरांच्या कविता मला ऐकूच येत नव्हत्या, कारण डोळ्यासमोर फक्त माझी गरोदर असणारी बायको दिसत होती, आणि उपाशी पोटाने तिने मला मारलेली “ओ चंदनशिवे” ही हाक ऐकू येत होती.
माझं नाव पुकारलं गेलं. मी स्टेजवर जायला निघालो. तेव्हा मी आयुष्यातला फार मोठा जुगार खेळायला चाललो होतो आणि डावावर कविता लावली होती. अन तेवढ्यात पायऱ्या चढून वर जाताना, स्टेजवर बाबासाहेबांचा आणि रमाईचा एकत्र असलेला फोटो दिसला. अंगावर काटा आला. अंग थरथर कापलं. विज चमकावी तसं मेंदूत काहीतरी झालं. रमाईला आणि बाबासाहेबांना डोळे भरून बघून घेताना अंगात बळ येत गेलं. इतकं बळ आलं की त्या क्षणाला मी जगातली कुठलीही स्पर्धा जिंकू शकत होतो.
आमच्या घरी रविवार हा विशेष दिवस असायचा. म्हणजे तसा तो सगळ्यांकडेच असावा कारण एकतर सुट्टीचा वार आणि सगळे घरात. थोडा निवांतपणा, रोजच्या दिनक्रमापेक्षा वेगळा पण मला एक मात्र आठवतंय की, ” चला रविवार आहे म्हणून गादीत पांघरूण घेऊन उशिरापर्यंत लोळत राहूया. ” हे मात्र नव्हतं. या उलट कधीकधी तर पप्पा शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी सगळ्यांना सांगून ठेवायचे, ” उद्या प्रत्येकाने पहाटे चार वाजता उठायचे. आपल्याला कशेळीच्या पुलावर जायचे आहे आणि तिथून हजारो वर्षांनी प्रकटलेल्या एका धूमकेतूचे दर्शन घ्यायचे आहे. निसर्गातले दुर्लभ देखावे पाहण्यातली मजा काही औरच असते. ”
आणि आम्ही सारे पहाटेच्या अंधारात चालत कशेळीच्या पुलावर जात असू आणि तिथून आकाश दर्शनाचा महानंद घेत असू. अशा अनेक सुंदर पहाटा (पहाटचे अनेक वचन) आम्ही अनुभवलेल्या आहेत. निसर्गाच्या तत्त्वाशी झालेली तादात्म्यता किती सुखाची असते हे जरी तेव्हा कळत नसलं तरी जाणवलं होतं. मोकळ्या आभाळाखाली उभे राहून अंधारात चमचमणारं आकाश दर्शन किती सुंदर असतं हे केवळ शब्दांच्या पलिकडे आहे.
आज जेव्हा मी घराच्या गच्चीतून कधीतरी पहाटे आकाश निरखण्याचा प्रयत्न करते तेव्हा काहीसं गढुळ, धुरकट, बिनताऱ्यांचंं आकाश बघताना कुठेतरी मन द्रवतं. माणूस निसर्गापासून दूर जात चालला आहे का?” हा प्रश्न वेदनादायी वाटतो.
असो!
तर आमचे अनेक रविवार अशा रितीने सुरू व्हायचे. जेवणाच्या मेनू पासून सारंच विशेष असायचं. संध्याकाळी सेंट्रल मैदानात मस्त रमतगमत फिरायला जायचं. तिथल्या खुरट्या पण गारवा देणाऱ्या गवतावर रिंगण करून बसायचं. सोबत खाण्यासाठी उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा किंवा ओवा, मीठ घालून उकळलेल्या चवळीच्या शेंगा नाहीतर वाफवलेल्या शिंगाड्यांचा आस्वाद घ्यायचा. पप्पांकडून अनेक गमतीदार किस्से ऐकायचे. एकेकांच्या मस्त नकला करून ते आम्हाला हसवायचे. काही गल्लीतले सवंगडीही बरोबर असायचे. मग त्यांच्यासोबत लंगडी, रिंग नाहीतर कांदाफोडी सारखे मजेदार खेळही रंगायचे. कधी गाणी तर कधी भेंड्या. मज्जाच मज्जा. त्यावेळी मॉल नव्हते. टाईम झोन सारखे ढॅण ढॅण, कानठळ्या बसणारे कर्कश्श नादमय बंदिस्त क्रीडा विभाग नसायचे. बर्गर, पास्ता, पिझ्झा यांची तोंडओळख ही नव्हती पण सेंट्रल मैदानातला रविवारचा तो हल्लाबोल मात्र विलक्षण असायचा. जडणघडणीतला एक महत्त्वाचा भाग होता तो! संध्याकाळ उलटल्यानंतर सोबतीला आकाशातली आकाशगंगा असायची. सप्तर्षी, व्याध, ध्रुवतारा, कृत्तिका, अनुराधा आमच्याबरोबर जणू काही फेर धरायच्या. आजही माझ्या नातींना मी आकाशात नथीच्या आकड्यासारखा दिसणारा कृत्तिकेचा तारकापुंज दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांना मजा वाटत नाही असे नाही पण त्या त्यात गुंतत नाहीत हे मात्र खरं. शिवाय आता त्यांच्यासाठी प्लॅनेटोरियम्स आहेतच. बायन्याक्युलर्स, टेलिस्कोप सारखी आधुनिक उपकरणे आहेत पण दोन डोळ्यांनी अथांग आभाळ पाहण्याचे सुख काय असतं हे त्यांना कसं सांगू?
रविवारची दुपार मात्र थोडी वेगळी असायची. तरीही त्या दुपारींना मी सुस्त दुपार असे विशेषण लावणार नाही. त्याचे कारण म्हणजे माझी आई. आई अतिशय व्यवस्थित. स्वच्छता, टापटीप याविषयी अत्यंत जागरूक, सतत आवराआवरी करणारी एक शिस्तप्रिय व्यक्ती होती. त्या बाबतीत पप्पा मात्र थोडे शिथिल होते म्हणजे ते व्यवस्थित नव्हते असं मी मुळीच म्हणणार नाही पण त्यांचा व्यवस्थितपणा आणि आईचा व्यवस्थितपणा यांच्या व्याख्याच वेगळ्या होत्या आणि त्या एकमेकांना छेद देणाऱ्या होत्या. पप्पांची पुस्तके, लेखनाचा पसारा म्हणजे कागद, पेन, पेन्सिली वगैरे …त्यांचे संदर्भ ग्रंथ, फाइल्स, वाचकांची पत्रे अशा अनेक गोष्टी घरभर पसरलेल्या असत. पप्पांची विद्वत्ता, त्यांचा लौकिक, लोकप्रियता, व्यासंग, अभ्यास हे सगळं मनोमन मान्य करूनही आईला हा सगळा पप्पांचा पसारा वाटायचा. ती अनेकदा तळमळीने तो आवरूनही ठेवायची. कशा पद्धतीने तो ठेवला गेला पाहिजे यावर पप्पांची शिकवणी घ्यायची. त्यावरून त्यांचे वादही व्हायचे. पप्पांचे एकच म्हणणे असायचे, ” मला हवी ती, हवी तेव्हा कुठलीही वस्तू या जंजाळातच सापडते. तू कशाला आवरतेस?”
आम्ही कुणीही कुणाचीच बाजू घ्यायचो नाही पण एखाद्या रविवारी दुपारी पप्पाच फर्मान काढायचे, ” चला ग पोरींनो! आज आपण हे भलं मोठं काचेचं पुस्तकांचं कपाट आवरूया. जरा नीटनेटकं लावूया. ”
हे कपाट आवरणं म्हणजे एक उपक्रम होता म्हणण्यापेक्षा एक महान सोहळाच होता असं मी म्हणेन. पप्पांचा पुस्तक संग्रह विशाल होता. कितीतरी जुनी क्लासिक मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषेमधील अनेक विषयांची पुस्तके त्यात होती. एकेक पुस्तक हातात घेतल्यावर ते म्हणायचे, “पाहिलं? हे कालिदासाचे मेघदूत. काव्यानंद आणि काव्यभावाचा उच्चांक म्हणजेच हे मेघदूत. मग भर दुपारी आमच्या त्या अरुंद घरात साक्षात अलकापुरी अवतारायची. कुबेर, यक्ष आमच्या दारात उभे राहायचे. प्रेमिकेसाठी व्याकुळ झालेला यक्ष, आषाढातला पाऊस आणि त्या मेघदूताचे दर्शन आम्हाला तेव्हाच घडायचे. हातात कालिदासाचे मेघदूत आणि पप्पांच्या मुखातून आलेले सहजोद्गार..
नीत्वा मासान्कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठ
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणत गजप्रेक्षणीयं ददर्श।।
आम्ही ऐकत बसायचो. कपाटातून एका मागून एक पुस्तकं निघायची. शाकुंतल, मालविकाग्नीमित्र, चक्रधर, भवभूती, मोरोपंत …एकेकांना पप्पा रांगेत अत्यंत मानाने जमिनीवर पसरलेल्या चादरीवर ठेवत. मध्येच मृच्छकटिक नाटकाची गोष्टही ते सांगायचे. आर्या वृत्तातल्या केकावल्या रंगायच्या.
।। सुश्लोक वामनाचा
अभंगवाणी तुकयाची
ओवी ज्ञानेशाची
आर्या मयुरपंतांची।।
मोरोपंतांचीच एक मिश्कील काव्यरचना त्यांनी आम्हाला वाचून दाखवली.
स्वस्त्री घरात नसता कंडु शमनार्थ रंडीरा खावी।
तीही घरात नसता स्वहस्ते चिबुल्ली दाबावी।।
वाचकहो! हे फालतु काव्य नाही बरंका?
अहो मोरोपंतच ते.. त्यांचं काव्य अस्सलच.
कंडु म्हणजे घशातली खवखव.
रंडीरा म्हणजे खडीसाखर.
चिबुल्ली म्हणजे पडजीभ.
या ओळींचा अर्थ एव्हढाच की घरांत कुणी नसताना खोकल्याची उबळ आली तर खडीसाखर खावी, तीही नसेल तर मग स्वत:च्या हाताने पडजीभेवर दाब द्यावा.
पपांच्या तोंडून हे सारं ऐकताना आम्ही खरोखरच रमून जायचो.
मग कपाट आवरणं दूरच रहायचं.
पप्पा त्या कपाटातून बाहेर आलेल्या पुस्तकांच्या गराड्यातत पार रंगून गेलेले असायचे. एकेकीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणायचे. ” हे पहा! हे बर्नाड शॉचे पिग्मॅलियन नाटक. त्याची कल्पकता तर पहा! एका ग्रीक दंतकथेवरून सुचलेलं हे सुंदर विनोदी अंगाने जाणारं पण प्रेमाविष्काराचं सुरेख नाटक. एक उत्कृष्ट शिल्पकार त्याच्या स्वतःच्याच निर्मितीच्या प्रेमात कसा पडतो ते सांगणारी ही एक ग्रीक दंतकथा आणि या कथेचा आधार घेऊन एका प्रोफेसर आणि ग्रामीण फुलराणीची ही अप्रतिम प्रेमकहाणी म्हणजेच हे बर्नार्ड शाॅचे पिग्मॅलियन नाटक.
भर दुपारी ही कथा इतकी रंगायची की आम्ही कपाट आवरण्याविषयी पूर्णपणे विसरलेलेच असायचो.
शेक्सपियरची जुलिएट, डेस्डेमोना, हॅम्लेट, ते काल्पनिक भूत, ऑथेल्लो, ब्रूटस सारेच आमच्या या सोहळ्यात हळूहळू सहभागी व्हायचे.
मध्येच पपा मला म्हणायचे, ” लंडनला राणीच्या देशात जाऊ आणि शेक्सपियरच्या स्ट्रॅटफॉर्डला नक्की भेट देऊ बरं का बाबी!
मग मी म्हणायचे!” काय पप्पा आधी कबूल केल्याप्रमाणे बेळगावला तर न्या. मध्येच हे लंडन कुठून आलं?”
“अगं जाऊ की! आणि समजा मी नसलो तरी तुम्ही जालच आयुष्यात कधीतरी. त्यावेळी एक वेडा वाचक म्हणून त्याच्याशी माझी ओळख करून द्या. ” पप्पांची भविष्यवाणी खरी ठरली पण आमच्या धोबी गल्लीतल्या घरातलं पप्पांमुळे निर्माण झालेलं ते स्ट्रॅटफोर्ड मला आजही आठवतं आणि तेच खरं वाटतं.
अँटन चेकाव हा एक पप्पांचा आवडता लेखक. त्याची “नेकलेस” ही कथा ते इतकी रंगवून सांगायचे की आकाशातून ऐकणारा तो प्रत्यक्ष लेखकही सुखावत असेल.
WHEN ALL AT ONCE I SAW A CROWD
A HOST OF GOLDEN DAFFODILS
BESIDE THE LAKE BENEATH THE TREES
FLUTTERING AND DANCING
IN THE BREEZE.
वर्ड्सवर्थची “डॅफोडील” ही अशीच अलगद कपाटातून बाहेर यायची. त्यासोबत बालकवींची फुलराणी असायची.
आईच्या बाळा ठावे
प्रेमाच्या गावा जावे
मग ऐकावे या बोला
राजहंस माझा निजला…ही गोविंदाग्रजांची कविता म्हणून दाखवताना पप्पांच्या डोळ्यातून अक्षरशः पाण्याचा पूर व्हायचा.
जे कृष्णमूर्ती म्हणजे चैतन्यवादी तत्त्वचिंतक. पप्पांच्या विचारांवर त्यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांची तत्त्वचिंतनपर लिहिलेली अनेक पुस्तके पप्पांनी संग्रही ठेवली होती. काही पुस्तकांचे मराठी अनुवादही पप्पांनी केले होते. अनेक लेख त्यांचे मासिकातून प्रसिद्ध झाले होते. या सर्वांची कात्रणे पपांनी जपून ठेवलेली होती. कपाट लावण्याच्या निमित्ताने तीही बाहेर आली आणि काही काळ आम्ही “जे कृष्णमूर्ती” यांच्या विचार प्रवाहात नकळत गुंतून गेलो.
शैक्षणिक पुस्तकांच्या राशीत छुंदाला गोखले यांचं अंकगणित हे पुस्तक दिसलं. ते बघताच पपा तिला म्हणाले,
“बाजूलाच ठेव ते. उद्यापासून रोज यातली पाच गणितं तरी सोडवायचीच.
कपाट आवरणं फक्त निमित्त! त्या काही वेळात आमच्या घरात जणू काही विश्व साहित्य संमेलन भरलेलं असायचं. तमाम, गाजलेले, देश विदेशातले मृत अथवा जिवंत लेखक- लेखिका त्यांच्या साहित्यांचा एक सुंदर मेळावाच तिथे भरलेला असायचा. त्या साहित्य गंगेच्या प्रवाहात आम्ही आनंदे विहार करायचो.
तिथे फक्त पुस्तकंच नसायची तर अनेक जपून ठेवलेले आठवणींचे कागदही असायचे. त्यात उषाने अगदी लहान असताना काढलेल्या प्रमाणबद्ध रेषांची चित्रं असायची, छुंदाने सोडवलेल्या एखाद्या कठीण गणिताचा वहीतला कागद असायचा, ” मला फक्त सुखात राहायचे आहे” अशी मी कधीतरी लिहिलेली कागदावरची ओळही जपलेली असायची. कपाट आवरताना एका कागदावर स्थिर झालेली पप्पांची नजर मला दिसली आणि मी विचारले, ” काय बघता एवढं त्या कागदावर?”
“बाबी! हे माझ्या बापाचं हस्ताक्षर आहे. मी चार महिन्यांचा असताना त्यांनी हे जग सोडले. मी माझा बाप पाहिला नाही अनुभवला नाही. या हस्ताक्षरात मी माझा बाप अनुभवतो. ”
काळजात चुकलेला तो ठोका आजही माझ्या आठवणीत तसाच्या तसाच आहे.
आई म्हणायची, ” पसारा आवरा तो. ” कसला पसारा आणि कसा आवरायचा? मुळातच याला पसारा का म्हणायचं?
संध्याकाळ झालेली असायची. भराभर आम्ही सारी पुस्तकं कपाटात ठेवून द्यायचो. खरं म्हणजे पूर्वीपेक्षाही ते कपाट आता अधिकच भरलेलं दिसायचं पण आम्हाला ते तसंच नीटनेटकं वाटायचं.
आज हे सारं काही आठवून लिहिताना जाणवतं, मनाच्या बंद तिजोरीत ही मौल्यवान संस्कार भूषणं अजूनही तशीच आहेत. ज्यांनी आमच्या जगण्यातला आनंद वाढवला, टिकवला.
☆ “विंग कमांडर आशिष वर्धमान : एक चमत्कार …” लेखक : अज्ञात ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
जय हिंद !
आज तुम्हाला एका चमत्कारिक व्यक्तीची ओळख करून देत आहे. हे खरोखरच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.. ते आहेत विंग कमांडर श्री. आशिष वर्धमानजी.
युक्रेनमध्ये युद्धाच्या भयावह परिस्थितीत त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना वाचवताना अकरा गोळ्या झेलल्या. त्यांच्या शौर्याची गाथा असीम आहे. विंग कमांडर आशीष वर्धमान यांनी युक्रेनच्या झेंडा ऑपरेशनदरम्यान त्यांच्या शरीरात रुतलेल्या अकरा गोळ्या स्वतःच्या हाताने काढल्या. ते चार वर्षे कोमामध्ये होते. त्यांचे हृदय प्रत्यारोपण झाले, तसेच पाय कृत्रिम लावण्यात आले. चार वर्षांच्या दीर्घ उपचारांनंतर ते पहिल्यांदा भारतात परतले आहेत.
त्यांचे मोठे बंधू कारगिल युद्धात शहीद झाले आहेत. त्यांची पत्नी विजयवाडा येथे कलेक्टर आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव श्री अशोक पाटनी आहे, जे आर. के. मार्बल्सचे मालक आहेत.
आशीष वर्धमान यांची माहिती म्हणजे एकामागोमाग एक आश्चर्यचकित करणारी माहिती आहे. ते स्वतः वंडर सिमेंटसारख्या प्रसिद्ध कंपनीचे मालक आहेत. श्रीराम मंदिराच्या नव्याने बांधकामासाठी लागलेला संगमरवर हा आर. के. मार्बल्सने मोफत दिला आहे. श्री अशोक पाटनी यांना दानधर्माच्या बाबतीत भामाशाह असे म्हणतात.
इतक्या सगळ्या गोष्टी असूनही विंग कमांडर आशीष वर्धमान अत्यंत साधे आणि विनम्र आहेत. ते सांगतात की त्यांच्या उपचारांवर कोट्यवधी रुपये खर्च झाले, जे रशियन दूतावास आणि भारत सरकारने केले. भारत सरकारचे मनापासून कौतुक करताना ते हास्याने भरलेली त्यांची चमत्कारिक जीवनगाथा सांगतात.
ते गलवान घाटीतही युद्धरत होते. भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांना राष्ट्रचिन्ह जडवलेली अंगठी दिली होती.
आगामी 26 जानेवारी रोजी माननीय राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात येणार आहे. 18 जानेवारी रोजी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सोनी टीव्हीवर अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्यांचा थेट प्रसारण होणार आहे. तुम्ही नक्की पाहा.
☆ “आत्मविश्वास… एक बहुमूल्य संपत्ती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. तदुसऱ्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.
या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे.
आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.
जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.
आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.
ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही.
ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही.
तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.
ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचे जीवन विसंवादात आहे.
तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड, तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.
याचा विचार करा, कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त “ईश्वरी कृपा” आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे. म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा.
पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, “आत्मविश्वास”
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून… !!!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈