मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 116 ☆ कादंबरी ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 116 ?

☆ कादंबरी ☆

मंदिरी आराधना

सागरी आराधना

 

कोण जाणे कोणती

सावरी आराधना

 

कृष्ण राधे सारखी

पावरी आराधना

 

मत्स्यमा-या नेहमी

म्हावरी आराधना

 

पौर्णिमेला जागते

जागरी आराधना

 

दीपपूजेच्या दिनी

शर्वरी आराधना

 

एकदा लाभो मला

भर्जरी आराधना

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राहूनच  गेलेलं  काही – भाग 2 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

सौ. दीपा नारायण पुजारी

? विविधा ?

☆ राहूनच  गेलेलं  काही – भाग 2 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

प्रिय माहेरघरास,

सप्रेम नमस्कार,

तुला आश्चर्य वाटलं ना? आज कशी काय आठवण झाली हिला? असं नक्कीच म्हणत असशील. म्हण, म्हण. तेव्हढा हक्क आहे तुला. आठवण व्हायला विसरावं लागतं. मी तुला मुळ्ळीच विसरले नाहीय. हे तुला पक्कं ठाऊकाय. हं, एक सल ऊरात आहे. तुझ्या कुशीत शिरायला, तुला ऊराऊरी भेटायला मी किती वर्षात आले नाही!

थांब, थांब, लग्गेच गट्टी फू नको हं करु. गळाभेट जरी वरचेवर होत नसली तरी मी तुझ्याशीच  तर बोलत असते सारखी. आणि मी येत नाही तुझ्याकडं, आले तरी लगेचच माघारी फिरते याला तूच तर जबाबदार आहेस. तूच शिकवलंस ना, आपलं घर, आपलं काम, हेच प्रमाण. उगाचच इथं तिथं रेंगाळायच नाही. काम झालं रे झालं की घरी परत.

पण खरंच राहूनच गेलं तुझ्या अंगणात झिम्मा खेळणं. आठवतं तुला हादग्याची खिरापत, गोल फेर धरून म्हंटलेली गाणी, पाटावर काढलेला हत्ती आणि भिंतिवरच्या हदग्याच्या चित्राला घातलेल्या माळा? या माळांनी मला झाडांची ओळख करून दिली. या गाण्यांनी लय दिली, ठेका दिला. खिरापत वाटण्यात गंमत होती.

ती ओळखण्यात तर अधिकच मज्जा. हादग्याच्या विसर्जनावेळी माझा वाढदिवस. खूप साऱ्या मैत्रिणी, आईच्या हातची श्रीखंड पुरी, बटाट्याची चविष्ट भाजी असा साधासा मेन्यू. (त्याकाळातील जंगी मेन्यू. कारण बटाट्याची भाजी सणासुदीलाच केली जात असे.) नवा फ्रॉक, घर दणाणून सोडणाऱ्या आवाजात हदग्याची गाणी. पुन्हा नाही च धरला तसा मैत्रिणींसोबत फेर. अनेक वाढदिवस आले आणि गेले. पुन्हा तुझ्या कडं नाही येऊ शकले रे वाढदिवसाला हदग्याची गाणी म्हणायला.

हं, राहूनच गेली माझी भातुकली तुझ्या खिडकीत. इवली इवली चूल बोळकी, गूळ दाण्याचे लाडू, पण बरीचशी आंबटगोड चव रेंगाळत राहिलीय हं अजूनही. कालपरवापर्यंत सांभाळून ठेवलेली लेकीची भातुकली कामवालीच्या मुलीला देऊन टाकली. वाटत होतं त्या खेळाच्या रुपात बालपण आहेच माझं, माझ्या पक्व मनात.लेक म्हणाली देखील, ‘आई, माझ्या पेक्षा तूच रमलीस माझ्या खेळात.’

भरतकामाचे टाके, वीणकामाच्या सुया, गजगे, जिबलीची एक्कय दुख्खय, दोरीच्या उड्या…  वय वाढलं, काळ बदलला, खेळ बदलले… मन तेच आहे.परसदार नाही राहिलं, तरी तिथल्या बंबाची ऊब तीच आहे. किती दिवस झाले ना? लग्नानंतर पहिल्या वर्षी सणवार, होसमौज होत राहिली. तुझी माझी भेट होत राहिली. मला बघून तू खूष व्हायचास. मेंदीच्या पानावर रेंगाळणारं मन प्रोढ झालं. मी आई झाले.तुझ्या ऊबदार कुशीत आईकडून आईपण शिकले. माझ्यातली आई मोठी झाली. इकडं सासरी जबाबदारी वाढत गेली. मी क्वचित कधीतरी येत असे तुझ्याकडं.

परत जाण्याची गडबड दांडगी असे.तुझ्या कुशीत शिरून, तुझ्या मांडीवर डोके ठेवून पडावं, तुझ्याशी हितगुज करावं असं वाटत होतं. पण वेळ कुठं होता?….

नंतर फारशी  कधी राहिलेच नाही तुझ्या गारव्यात.माझ्या मैत्रिणी यायच्या माहेरपणाला. मी त्यात नसायचीच. कारणं काय अनेक. कधी मुलांच्या शाळा- सुट्ट्या यांच न सुटणारं सापशिडीवजा वेळापत्रक, कधी त्यांच्या आजापणाची लंगडी सबब! तर कधी माझ्या नणंदांच माहेरपण. राहून गेलंय माहेरवाशीण म्हणून आराम करणं. राहून गेलंय तुझ्या कानात सासरचं कौतुक सांगणं!! अभिमानानं सख्यांना मुलांची प्रगती सांगणं!!

आई खूपदा बोलवायची,’येत जा गं. मुलांना घेऊन.’नाही जमलं, आता वाटतं, आपणच जमवलं नाही का? आई- मावशीनं कसं जपलं त्यांचं माहेरपण? आणि आमचं आजोळ? मला का नाही जमलं? नंतर नंतर ती म्हणायची आता तुला ये म्हणणार नाही. तुला वाटलं तर ये. मी हसून मान झटकत असे… वेळ कुठं होता?..

पुढं मुलं मात्र कॉलेजच्या शिक्षणासाठी आजी आजोबांपाशी काही काळ राहिली. लेक मित्रांना घेऊन जात असे आजीकडं वरणभात चापायला.लेकीनं तर आजीची कॉफी जगप्रसिद्ध केली. रात्री त्या दोघांच्या बरोबर गप्पा मारत जेवत तेंव्हा नकळतच माझ्याच मुलांचा मला हेवा वाटत असे.आजही आजोबांच घर त्यांच्या मनात वेगळंच स्थान टिकवून आहे. तेंव्हाही मला वेळ… नव्हताच.

ती कधी बोलली नाही. बाबांच्या शेवटच्या आजारपणात तिला वाटलं नसेल का मी चार दिवस रहावं. तिला मदत करावी. थोडा शीण हलका करावा. मलाही वाटत असे, जावं चार दिवस, बाबांच्या बरोबर जुन्या आठवणीत रमावं. तशी उभ्या उभ्या एखाद्या दिवशी येत होते मी. सलगपणे चार दिवस काही राहू शकले नाही.  रात्री उशिरापर्यंत तिच्याबरोबर जागून बाबांची सेवा केली नाही मी.वेळ.. होता. नक्कीच होता.. पण..

खरंच राहूनच गेलं रे,

तुझ्या साठी वेळ देणं

तुझ्या अंगणात बागडणं

तुझ्या सुरात गाणं

तुझ्या तालात नाचणं

राहूनच गेलं

तुझ्या गळ्यात गळे घालून बेधुंद हसणं

तुझ्या कुशीत शिरून हमसून हमसून रडणं

          

तुझ्या कुशीत, तुझ्या सावलीत विश्रांती घेण्याच्या प्रतिक्षेत,

 

तुझीच दीपा

क्रमशः ….

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभुलैय्या…. भाग-2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ रंगभुलैय्या…. भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र-इथे सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियरची पोस्ट क्रिएट होणाराय हे सौरभनं मला पूर्वीच सांगितलेलं होतं. आपल्या संपूर्ण टीममधे आपल्या दोघांचेच परफॉर्मन्स आणि म्हणूनच ॲपरेझल्स चांगले होते.टीमलिडर म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विचार करता प्रमोशन मलाच मिळणार हे मी गृहित धरलेलं होतं. ते तुला मिळालं याचा आनंद आहेच अश्विनी.पण फरक पडला आहे तो माझ्या आईच्या कॅन्सर डिटेक्शनमुळे…” बोलता-बोलता समीरचा आवाज आणि डोळे भरून आले. तो बोलायचा थांबला. अश्विनी तो सावरायची वाट पाहत राहिली.)

“….. तुला माहित आहे अश्विनी, माझ्या दादा-वहिनीनी स्वतः काटकसरीत राहून माझं शिक्षण केलेय. बाबा हयात नसल्याची उणीव दोघांनीही मला कधीच भासून दिली नव्हती.पण मग माझं म्हणून कांही कर्तव्य आहेच ना? अगं,इथं आग्रहानं मला माझ्यासाठी फ्लॅट बुक करायला लावताना सुरुवातीच्या रकमेची मदत दादाने स्वतः कर्ज काढून केलीय. स्वतः मात्र अजून ते सर्वजण भाड्याच्या तुटपुंज्या घरातच रहात आहेत. या अशा परिस्थितीत आईच्या ट्रीटमेंटचा खर्च ते कुठून करणार ? कांहीही झालं तरी तो मीच करायला हवा ना? या क्षणी तू मघाशी म्हणालीस तसं ‘ हे प्रमोशन इज अ रुटीन मॅटर फाॅर यू. ‘ पण माझ्यासाठी ते तसं नाहीय.ती आज माझी निकडीची गरज आहे. प्रमोशन नंतरच्या हायर पॅकेजमधून मी आईच्या ट्रीटमेंटचा खर्च भागवू शकेन. आणि म्हणूनच खूप आॅकवर्ड वाटत असूनही मी तुला ही रिक्वेस्ट करतोय.आणि तसंही माझ्या प्रमोशननंतर तू माझ्या टीममधेच असशील आणि त्यामुळे तुमच्या संसारातल्या अडचणींसाठी तुला लागणारी कन्सेशनस् मी तुला सहजपणे देऊ शकेन.सो इट्स अ प्रॅक्टिकल डील फाॅर यू ऑल्सो..”

समीरचं सगळंच बोलणं कन्व्हिन्सिंग होतं पण शेवटच्या ‘डील’ या शब्दातली लालूच अश्विनीला रूचणारी नव्हती.

“तू हे सौरभसरांना बोललायस सगळं?”

“त्याचा काय संबंध?” समीर उखडलाच.”प्रमोशन स्वीकारणारी किंवा नाकारणारी तूच आहेस ना? सौरभला विचारण्याचा प्रश्न येतोच कुठं? सेकंड प्रायाॅरिटीवर माझंच नांव आहे हे सौरभनंच मला सांगितलंय. सो यू नीड नाॅट वरी फाॅर दॅट..”

समीरचं बोलणं खटकलं तरी अश्विनी शांत राहिली.या परिस्थितीत समीरच्या मन:स्थितीचा विचार करता त्याला सगळं माफ होतं तिच्या दृष्टीनं.ती गप्प बसलेली पाहून समीर बावचळला.

“अश्विनी,माझ्या या व्यक्तिगत अडचणीत तू आणि अभिखेरीज मला कुणाचेही उपकार नकोयत. होय. अगदी सौरभचेसुद्धा.ही इज एक बीग फ्रॉड…!”

” शट अप समीर. तू काय बोलतोयस समजतंय कां तुला?”

“होs मी खरं तेच बोलतोय. मी चांगलाच ओळखून आहे त्याला. तू एरवी दाद देत नाहीस ना म्हणून तुला पटवायला हे प्रमोशनचं गाजर त्यानं तुझ्या पारड्यात टाकलंय. तू सरळ स्वभावाची आहेस गं, पण सगळं जग तसं नसतं हे लक्षात ठेव..”

“बास समीर. इनफ. सौरभ सर काय विचार करत असतील ते त्यांचं त्यांच्याबरोबर. पण निदान हे मला ऐकवताना तरी तू दहादा विचार करायला हवा होतास. हे सगळं बोलून तू माझाही अपमान केलायस समीर..” अश्विनीचे डोळे भरूनच आले एकदम.

“हे बघ अश्विनी, तू शांत हो. माझी गरज म्हणून मी तुला प्रमोशन नाकारायची गळ घातली होती. मला गरज नसती तरीही सौरभबद्दल मी हे तुला सांगितलंच असतं. एक मित्र म्हणून तुला जागं करणं हे माझं कर्तव्यच होतं. प्रमोशन नाकारणं किंवा स्वीकारणं हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल अश्विनी. आणि तो मला मान्य करावाच लागेल. तुझं सहकार्य असो किंवा नसो यापुढची माझी लढाई मलाच लढावी लागेल आणि मी ती अखेरपर्यंत लढेन. मी हार मानणार नाही हे नक्की.”

तो बोलला आणि ताडकन् उठून निघून गेला. अश्विनी सून्न होऊन बसून राहिली कितीतरी वेळ.तिला कुणाचा तरी आधार हवा होता… आणि त्यासाठी तिचं वेड मन अर्थातच अभिकडे धाव घेत होतं…..!

————

“अभिs…”

” हं “

“ऐक ना. आज समीर म्हणत होता….”

टीव्हीवरुन लक्ष काढून घेत अभि तिच्याकडे पहात राहिला.

“काय म्हणालीस?”

“तू टीव्ही म्यूट कर बघू आधी. मला शांतपणाने बोलायचंय तुझ्याशी.”

“ठीक आहे.बोल.”

“मी काय करू रे प्रमोशनचं?”

“कमाल आहे. हे तू मला का विचारतेस? तुला झेपणार नाही असं वाटतंय कां? तसं असेल तर घेऊ नकोस ना..”

अश्विनी उघडलीच एकदम.

“न झोपायला काय झालं? पण…समीर..”

“समीरचं काय?”

“त्याने त्याच्या फिनान्शियल प्रॉब्लेमसाठी मला प्रमोशन रिफ्यूज करायची गळ घातलीय. आणि…”

“आय नो.समीर बोललाय माझ्याशी”

“तुझ्याशी ? कधी ?”

“दुपारी तुमचं बोलणं झालं त्यानंतर लगेच त्याचा फोन आला होता”

अश्विनी सावध झाली.

“आणखी काय सांगितलंय त्यानं ?”

” आणखी काहीच नाही. हे एवढंच. खरंतर मीही तेव्हा खूप बिझी होतो. तसं त्याला सांगितलं तर म्हणाला,अश्विनी तुझ्याशी बोलेल सगळं. आणि तिने प्रमोशन रिफ्यूज नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही दोघं माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका असं म्हणाला.”

“अभि, मला खरंच वाटतंय, त्यानंं कधी नव्हे ते माझ्याकडे कांही मागितलं आणि मी नाही म्हंटलं असं नको ना व्हायला ?अभि, माझ्या जागी तू असतास तर तू काय केलं असतंस?”

अभि हसलाच एकदम. आणि एकाएकी गंभीर झाला.

“तुझ्या जागी मी असतो तर समीरनं मला हे असं विचारलंच नसतं “

“कां?”

“कां काय? कारण त्याच्या इतकाच मीही अॅंबिशिअस आहे हे त्याला ठाऊक आहे”

“आणि मी ? मी नाहीये?”

“आहेस ना? मग विचारात कां पडलीयस? निर्णय घे आणि मोकळी हो.”

“हो.मला निर्णय घ्यावाच लागेल. पण तूही त्यासाठी मदत कर ना मला. तू या प्रश्नापासून इतका अलिप्त कां रहातोयस?”

अश्विनी काकुळतीनं म्हणाली. अभिने तिला थोपटलं. तिने मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहिलं.

“अश्विनी, हा प्रश्न तुझा आहे. तो तूच सोडवायला हवा “

“अभि…?तू..तू बोलतोयस हे? अरे, आपल्या संसारात असा एखादा प्रश्न फक्त माझा किंवा तुझा असूच कसा शकतो? तो आपलाच असायला हवा ना ? “

अभि स्वतःशीच हसला.

“बरोबर आहे तुझं. पण हा प्रश्न आपल्या संसारातला नाहीये. तो तुझ्या ऑफिसमधला आणि फक्त तुझ्याशीच संबंधित आहे. आणि म्हणूनच त्याचे उत्तरही तूच शोधायला हवं असं मला वाटतं”

त्या एका क्षणापुरतं का होईना तिला वाटलं,अभिनं आपल्याला एकटं सोडलंय. दुसर्‍याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. ती जागची उठली.

“अश्विनी..”ती थबकली. तिचे डोळे भरून आले एकदम.

“बैस अशी” तो गंभीर होता. अलगद डोळे पुसत ती अंग चोरून बसली.

“तू कधी विचार केलायस?…म्हणजे या प्रमोशनसाठी सौरभने तुलाच एवढं स्ट्राॅंग रेकमेंड का केलं असावं याचा?”

“हे असे प्रश्न तुला आणि समीरलाच पडू शकतात.मला नाही. कारण माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे‌”

“प्रश्न विश्वासाचा नाहीये. विश्वास तर माझाही तुझ्यावर आहेच. पण मला सांग, समीर तुझ्याइतकाच कॉंम्पिटंट असताना आणि तो सौरभचा खास मित्र असतानाही समीरला डावलून त्यानं तुलाच रेकमेंड करावं याचं आश्चर्य नाही वाटत तुला?”

“तुला नेमकं काय म्हणायचंय अभि?”

“मला काहीच म्हणायचं नाहीये.तुझ्या समोरच्या प्रश्‍नाचा तू एकांगी विचार करतेयस. म्हणून प्रत्येक प्रश्नाला इतरही अनेक कंगोरे असू शकतात हे फक्त तुला सुचवावं असं वाटतं.”

“सौरभ सर तसे नाहीयेत अभि.इतके दिवस मी त्यांच्याबरोबर काम करतेय. ही बीहेव्ज व्हेरी डीसेंटली”

“मे बी यू आर ट्रू. कॅन बी अदरवाइज आॅल्सो. डिसेन्सी ही एखाद्याची बिव्हेविंग-स्ट्रॅटेजीही असू शकते. माणसांचे वरवर दिसणारे रंग पक्के असतातच असे नाही. ते विरूनही जाऊ शकतात. तुला अनोळखी असला तरी आपल्या इंडस्ट्रीत हा ‘रंगभुलैया’ थोडा अधिकच फसवा आहे. तेव्हा तुझी गृहितं तू एकदा नीट तपासून बघ. तरच पुढची गणितं बरोबर येतील.”

अभिशी बोलून गुंता सुटेल असं तिला वाटलं होतं. पण गुंता अधिकच वाढला. 

क्रमशः……

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रसंग पहिला – साधारण सहा महिन्यांपूर्वीचा…

नेहमीप्रमाणे याचकांच्या भेटीला निघालो असताना, पुण्याच्या मध्यवर्ती गजबजलेल्या भागात एका सरकारी ऑफिसच्या गेट बाहेर, दाढी वाढलेल्या आणि अत्यंत गलिच्छ अवतारात, उकिरड्यात झोपलेल्या बाबांना विव्हळताना पाहिलं.

जवळ जाऊन पाहिलं तर पायाला भली मोठी जखम झाली होती आणि त्यात अक्षरशः किडे वळवळत होते.

बाबांची ओळख झाली, त्यांची व्यथा समजून घेतली. 

यानंतर किडे बाहेर काढण्याची वेगवेगळी औषधे वापरून रस्त्यावर ड्रेसिंग करत राहिलो. जखम बरी झाली झाली… म्हणता म्हणता पुन्हा बिघडायची.

मला जाणवलं की, हे किडे रस्त्यात अशी मला दाद देणार नाहीत…. रस्त्यावरचे किडेच ते….!

आपल्या आजूबाजूलाही असतात असे अनेक किडे…. दुसऱ्यांची आयुष्य पोखरणारी….!

तर यांना माझे मित्र डॉ. शोएब शेख यांच्या मॉडर्न हॉस्पिटल पुणे येथे ऍडमिट केलं.  इथल्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन बाबांचा पाय वाचवला. 

दवाखान्यात होते, तोवर अन्नपूर्णा प्रकल्पातून जेवणाची सोय लावून दिली.

मला आपलं एकच सुख… बाबा जोपर्यंत ॲडमिट आहेत तोपर्यंत हॉस्पिटलमुळे निवारा तरी आहे…. दोन वेळच्या जेवणाची सोय तरी होतेय. किमान रस्त्यावर तरी आता यांना पडून राहावं लागत नाही. 

एके दिवशी हॉस्पिटल मधून फोन आला, येत्या काही दिवसात बाबांना डिस्चार्ज करत आहोत, त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे, त्यांना घेऊन जावे. 

डिस्चार्ज झाल्यानंतर मी त्यांना कुठे घेऊन जाणार होतो ?  परत त्याच रस्त्यावर ?  त्याच जागेवर ?? त्याच उकिरड्यात सोडून येऊ?? त्यांच्या मुलानेही हेच केलं होतं…. मी पण तेच करू ??? 

प्रसंग दुसरा – पुण्यामध्ये एक प्रसिद्ध बाग आहे. अनेक दानशूर मंडळी येथे अन्नदानाचे काम करत असतात.

इथे भीक मागणारी मंडळी मला एक गठ्ठा भेटतात,  मी इथेही वार लावून येत असतो. 

एके दिवशी बागेशेजारच्या फुटपाथवर एक आजोबा पडलेले दिसले. जवळ गेल्यानंतर कळलं यांना Paralyais झाला आहे , वाचा जवळपास गेली आहे. 

आता यांच्याशी बोलायचं कसं ?  यांचा भूतकाळ कसा जाणून घ्यायचा ? 

ज्यांना बोलता येत नाही,  ते किमान हातवारे करून, खाणाखुणा करून काहीतरी सांगतात, त्यातून काहीतरी दिशा मिळते.

परंतु पॅरालिसीस झालेल्या या बाबांकडे हे दोन्ही मार्ग नव्हते….  ना ते खाणाखुणा करु शकत,  ना स्वतःची वेदना शब्दात मांडू शकत….!

पण वेदनेला शब्दांची गरज नसते…. संवेदनेला भाषा नसते….! 

निष्प्राण डोळ्याने माझ्याकडे बघत मला बोबड्या बोलीत काहीतरी ते सांगण्याचा प्रयत्न करायचे….. परंतु मला काहीही कळायचं नाही.

ते जमिनीवर पडून असायचे…. मी यांच्याकडे गेलो कि काही न बोलता यांच्या डोळ्यातून टपटप आसवं गळायची…. आपल्याला पाहून कुणाची तरी आसवे टपकली तर समजावे, आपल्या बरोबर तो त्याचा गतकाळ वाटू इच्छितोय….! 

मी जवळ बसलो कि माझा हात धरायचा ते प्रयत्न करायचे….. बुडता माणूस जसा मिळेल तो आधार शोधतो तसा….

मला कळलं, हे माझ्यात आधार शोधत आहेत….!

एकदा त्यांनी हाताची पाच बोटं तोंडाकडे नेत मला इशारा केला…. मला कळलं, यांना भूक लागली आहे, मी बाजूच्या हॉटेलमधून काहीतरी मागवलं…. आणि त्यांच्या तोंडापुढे  नेलं…. पण त्यांनी तोंड फिरवलं….

मला काहीच कळेना….

यानंतर त्यांनी मनगटावर बोट ठेवलं…. आणि पुन्हा हाताची पाच बोटं तोंडाकडे नेत, माझ्याकडे बोट दाखवलं ….

ओह…. त्यांना म्हणायचं होतं…. खूप वेळ झालाय पोरा, तू जेवून घे…..!

मी त्यांच्या या बीन बोललेल्या वाक्यावर रडलो होतो तेव्हा …!!!

जो स्वतः उपाशी आहे, तो दुसऱ्याला म्हणतो…. जेवून घे….! खूप मोठं मन लागतं याला…..

असं हे बीन शब्दाचं, बीन भाषेचं आमचं नातं….! 

माझ्या आजोबांसारखा….. आजोबांसारखा कसला…. आजोबाच की….! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक १८ – भाग १ – मोरोक्को__ रसरशीत फळांचा देश ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक १८ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ मोरोक्को –  रसरशीत फळांचा देश  ✈️

मोरोक्को हे आफ्रिका खंडाचे उत्तर टोक आहे पण भौगोलिक दृष्ट्या ते युरोपला जवळचे आहे. स्पेनहून आम्हाला मोरोक्को इथे जायचे होते. मोरोक्कोला विमानाने जाता येतेच पण आम्हाला जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून प्रवास करायचा होता. भूमध्य सागर व अटलांटिक महासागर हे जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने जोडलेले आहेत असा शालेय पुस्तकात वाचलेला भूगोल अनुभवायचा होता.

स्पेनच्या दक्षिण टोकाला असलेल्या अल्गिशिरास बंदरात पोहोचलो. तिथून बोटीने प्रवास केला.’टॅ॑जेर मेड’ या आठ मजली बोटीचा वेग चांगलाच जाणवत होता. बंदर सोडल्यावर जवळजवळ लगेचच भूमध्य सागरातून उगवलेला, मान उंचावून बघणारा, उंचच- उंच सुळक्यासारखा डोंगर दिसू लागला.हाच सुप्रसिद्ध ‘जिब्राल्टर रॉक’! हवामान स्वच्छ, शांत असल्याने जिब्राल्टर रॉकचे जवळून दर्शन झाले.

हा जिब्राल्टर रॉक फार प्राचीन, जवळ जवळ वीस कोटी वर्षांपूर्वीचा मानला जातो. जिब्राल्टरचा एकूण विस्तार फक्त साडेसहा चौरस किलोमीटर आहे. त्यात हा १४०८ फूट उंच डोंगर आहे. हा संपूर्ण डोंगर चुनखडीचा आहे. पाणी धरून ठेवण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे इथे सदोदित हिरवी वृक्षराजी बहरलेली असते.  डोंगराच्या पश्चिमेकडील उतारावर जिब्राल्टर हे छोटेसे गाव वसलेले आहे. बोटीतून आपल्याला तिथल्या हिरव्या- पांढऱ्या, बैठ्या इमारती व हिरवी वनराजी दिसते. सभोवतालच्या सागरात असंख्य छोट्या पांढऱ्या बोटी दिसत होत्या.उंच उसळणाऱ्या डॉल्फिन माशांचे  दर्शनही झाले. या खडकाचे उत्तरेकडील भूशिर (आयबेरिअन पेनिन्सुला ) हे एका अगदी चिंचोळ्या पट्ट्याने स्पेनच्या भूभागाला जोडले गेले आहे. तर दक्षिणेला अरूंद अशी ही जिब्राल्टरची सामुद्रधुनी आहे.

अत्यंत मोक्याची अशी भौगोलिक परिस्थिती लाभल्यामुळे ऐतिहासिक काळापासून  हे ठिकाण आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. आठव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत इथे उत्तर आफ्रिकेतील म्हणजे मोरोक्कोतील मूरिश लोकांची लोकांची राजवट होती. त्यांनी या खडकाचे जाबेल तारिक म्हणजे तारिकचा खडक असे नामकरण केले. त्याचे जिब्राल्टर असे रुपांतर झाले. नंतर सतराव्या शतकापर्यंत हे ठिकाण स्पेनच्या ताब्यात होते.इ.स.१७०४ मध्ये ते ब्रिटिश साम्राज्याचा भाग झाले.ते आजपर्यंत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आहे. या महत्वपूर्ण ठिकाणी  ब्रिटनचा नाविक व व हवाई तळ आहे.

जेमतेम चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या जिब्राल्टरमध्ये ब्रिटिश, स्पॅनिश, ज्यू,, आशियाई, पोर्तुगीज असे सर्व वंशाचे लोक आहेत. त्यामुळे इथे चर्च, मॉस्क, देऊळ, सिनेगॉग सारे आहे. जिब्राल्टरमध्ये शेती नाही किंवा खनिजांचे उत्पन्नही नाही. पण हा जगातला सर्वात व्यस्त असा सागरी मार्ग आहे. भूमध्यसागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या या सागरी मार्गावर दर सहाव्या मिनिटाला एक व्यापारी बोट बंदरात येते अथवा तिथल्या बंदरातून सुटते. या अवाढव्य बोटींची देखभाल,दुरुस्ती करणे,इंधन भरणे अशा प्रकारची अनेक कामे इथल्या डॉकयार्डमध्ये होतात. पर्यटन हाही एक व्यवसाय आहे.

बोटीने दोन तास प्रवास करून आम्ही मोरोक्को मधील टॅ॑जेर बंदरात पोहोचलो. बंदरातून गाईडने आम्हाला समुद्रकिनारी नेले. या ठिकाणाला ‘केप पार्टल’ असे नाव आहे. भूमध्य सागर आणि अटलांटिक महासागर इथे मिळतात असे त्याने सांगितले. तिथल्या समुद्राचा रंग निळसर हिरवा होता. काही भागाचा रंग ढगांच्या सावलीमुळे, धुक्यामुळे काळपट वाटत होता. पण दोन वेगळे समुद्र ओळखता येत नाहीत. मला आपल्या ‘गंगासागर’ ची आठवण झाली. गंगा नदी कोलकात्याजवळील ‘सागरद्वीप’ या बेटाजवळ बंगालच्या उपसागराला मिळते. त्या ठिकाणाला ‘गंगासागर’ म्हणतात. ते बघताना गाईड म्हणाला होता, ‘समोर तोंड केल्यावर तुमच्या उजव्या हाताला बंगालचा उपसागर आहे व डावीकडून गंगा येते. त्या विशाल जलाशयातून आपल्याला सागर व सरिता वेगळे ओळखता येत नाहीत. तसेच इथे झाले असावे.

टॅ॑जेरला वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान लाभले आहे. त्याचप्रमाणे इतिहासाच्या एका फार मोठ्या कालखंडाचे हे शहर साक्षीदार आहे. युरोप व अरब देशातील कलाकार, राजकारणी, लेखक, उद्योगपती यांचे हे आवडते ठिकाण आहे. मुस्लिम, ख्रिश्चन,ज्यू अशी संमिश्र वस्ती असल्याने  इथे बहुरंगी सांस्कृतिक वातावरण आहे. शहरात मशिदी, चर्च याबरोबर सिनेगॉगही आहे. ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’ या चित्रपटाचे थोडे चित्रिकरण इथे केले आहे.

केप स्पार्टलजवळील टेकड्यांवर वसलेला कसबाह विभाग ऐश्वर्यसंपन्न आहे. इथल्या भव्य राजवाडयासारख्या बंगल्यांना किल्ल्यासारखी भक्कम तटबंदी आहे. आतल्या हिरव्या बागा फळाफुलांनी सजल्या होत्या.  सौदी अरेबिया व कुवेत येथील धनाढ्य व्यापाऱ्यांचे हे बंगले आहेत असे गाईडने सांगितले. इथल्या सुलतानाचा सतराव्या शतकात बांधलेला भव्य पॅलेस   व गव्हर्नर पॅलेसही इथेच आहे. इथून समुद्राचे सुंदर दर्शन होते .जुन्या शहरात ग्रॅ॑ड सोक्को म्हणजे खूप मोठे मार्केट आहे.

भाग-१ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 15 – सजल – कैसी यह लाचारी है… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है सजल “कैसी यह लाचारी है… । आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 15 – सजल – कैसी यह लाचारी है…  ☆ 

समांत- आरी

पदांत- है

मात्राभार- 14

 

कैसी यह लाचारी है।

विकट समस्या भारी है।।

 

फिदा पड़ोसी पर होते ,

मजहब से ही यारी है।

 

आतंकी सब सखा बने,

मानवता भी हारी है ।

 

काश्मीर में शांति आई,

खिली वहांँ फुलवारी है।

 

लोकतंत्र में भ्रष्टाचार,

जनता से मक्कारी है।

 

गहरी जड़ें वंशवाद की,

नेता की बलिहारी है।

 

जन सेवक कहलाते जो,

गाड़ी-घर सरकारी है।

 

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

01-01- 2022

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)-  482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 103 – “खामोशी की चीखें” – डा संजीव कुमार ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हम प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’जी के आभारी हैं जिन्होने  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक से यह स्तम्भ लिखने का आग्रह स्वीकारा। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है।  उनका पारिवारिक जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है  डा संजीव कुमार जी के काव्य संग्रह  “खामोशी की चीखें” की समीक्षा।

 पुस्तक चर्चा

पुस्तक : खामोशी की चीखें (काव्य संग्रह)

कवि – डा संजीव कुमार

प्रकाशक : इंडिया नेट बुक्स, नोएडा

मूल्य २२५ रु, अमेजन पर सुलभ

प्रकाशन वर्ष २०२१

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 103 – “खामोशी की चीखें” – डा संजीव कुमार ☆  

खामोशी की चीख शीर्षक से ही  मेरी एक कविता की कुछ पंक्तियां हैं…

“खामोशी की चीख के

सन्नाटे से,

डर लगता है मुझे

मेरे हिस्से के अंधेरों,

अब और नहीं गुम रहूंगा मैं

छत के सूराख से

रोशनी की सुनहरी किरण

चली आ रही है मुझसे बात करने. “

कवि मन अपने परिवेश व समसामयिक संदर्भो पर स्वयं को अभिव्यक्त करता है यह नितांत स्वाभाविक प्रक्रिया है. हिमालय पर्वत श्रंखलायें सदा से मेरे आकर्षण का केंद्र रही हैं. मुझे सपरिवार दो बार जम्मू काश्मीर के पर्यटन के सुअवसर मिले. बारूद और संगिनो के साये में भी नयनाभिराम काश्मीर का करिश्माई जादू अपने सम्मोहन से किसी को रोक नही सकता.वरिष्ठ कवि पिताजी प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ने वहां से लौटकर लिखा था.. “

लगता यों जगत नियंता खुद है यहाँ प्रकृति में प्राणवान

मिलता नयनो को अनुपम सुख देखो धरती या आसमान 

जग की सब उलझन भूल जहाँ मन को मिलता पावन विराम 

हे धरती पर अविरत स्वर्ग काश्मीर तुम्हें शत शत प्रणाम “

आतंकी विडम्बना से वहां की जो सामाजिक राजनैतिक दुरूह स्थितियां विगत दशकों में बनी उनसे हम सभी का मन उद्वेलित होता रहा है. किन्तु ऐसा नही है कि काश्मीर की घाटियां पहली बार सेना की आहट सुन रही है, इतिहास बताता है कि सदियों से आक्रांता इन वादियों को खून से रंगते रहे हैं. लिखित स्पष्ट क्रमबद्ध इतिहास के मामले में काश्मीर धनी है, नीलमत पुराण में उल्लेख है कि आज जहां काश्मीर की प्राकृतिक छटा बिखर रही है, कभी वहाँ विशाल झील थी, कालांतर में झील का पानी एक छेद से बह गया और इससुरम्य घाटी का उद्भव हुआ. इस पौराणिक आख्यान से प्रारंभ कर,  १२०० वर्ष ईसा पूर्व राजा गोनंद से राजा विजय सिन्हा सन ११२९ ईस्वी तक का चरणबद्ध इतिहास कवि कल्हण ने “राजतरंगिणी ” में लिपिबद्ध किया है. १५८८ में काश्मीर पर अकबर का आधिपत्य रहा, १८१४ में राजा रणजीत सिंह ने काश्मीर जीता, यह सारा संक्षिपत इतिहास भी डा संजीव कुमार ने  “खामोशी की चीखें” के आमुख में लिखा है, जो पठनीय है. श्री यशपाल निर्मल, डा लालित्य ललित, व डा राजेशकुमार तीनो ही स्वनामधन्य सुस्थापित रचनाकार हैं जिन्होने पुस्तक की भूमिकायें लिखीं है.

पुस्तक में वैचारिक रूप से सशक्त ५२ झकझोर देने वाली अकवितायें काश्मीर के पिछले दो तीन दशको के सामाजिक सरोकारो, जन भावनाओ पर केंद्रित हैं. यद्यपि कविता आदिवासी व कोरोना दो ऐसी कवितायें हैं जिनकी प्रासंगिकता पुस्तक की विषय पृष्ठभूमि से मेल नहीं खाती, उन्हें क्यो रखा गया है यह डा संजीव कुमार ही बता सकेंगे.

डा संजीव कुमार स्त्री स्वर के सशक्त व मुखर हस्ताक्षर हैं. वे काश्मीरी महिलाओ पर हुये आतंकी अत्याचारो के खिलाफ संवेदना से सराबोर एक नही अनेक रचनाये करते दिखते हैं.

उदाहरण स्वरूप..

लुता चुकी हूं,

अपना सब कुछ,

अपना सुहाग,

अपना बेटा, अपनी बेटी,

अपना घर,

पर पता नही कि मौत क्यों नही आई ?

ये वेदना जाति धर्म की साम्प्रदायिक सीमाओ से परे काश्मीरी स्त्री की है. ऐसी ही ढ़ेरो कविताओ को आत्मसात करना हो तो “खामोशी की चीखें” पढ़ियेगा, किताब अमेजन पर भी सुलभ है.  

 

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’, भोपाल

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – वह ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – वह  ??

‘वह’ शृंखला की एक और कविता प्रसूत हुई। पाठकों के साथ साझा कर रहा हूँ।

 

उसके भीतर

बसती है एक बतक्कड़,

बहुत कुछ, सब कुछ

उससे कहना चाहती है वह,

किस्से-कहानी, आपबीती-जगबीती

सिर्फ उसे सुनाना चाहती है वह,

फिर सुनकर उसका रूखापन

अनमनी-सी चुप हो जाती है वह !

 

©  संजय भारद्वाज

अपराह्न 1:48 बजे, 9.1.20 2 2

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 
मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ गुड़ – भाग-1 ☆ श्री राकेश कुमार

श्री राकेश कुमार

(ई- अभिव्यक्ति में श्री राकेश कुमार जी का स्वागत है। भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।”

आज प्रस्तुत है स्मृतियों के झरोखे से अतीत और वर्तमान को जोड़ता हुए रोचक आलेख “गुड़” की श्रृंखला  का पहला भाग।)   

☆ आलेख ☆ गुड़ – भाग -1 ☆ श्री राकेश कुमार ☆

आज स्थानीय समाचार पत्र में एक ब्रांडेड गुड़ का विज्ञापन छपा था “डॉ. गुड़” तो अचंभा लगा कि गुड़ जैसे खाद्य पदार्थ को विज्ञापन की क्या आवश्यकता आ गई ? ब्रांड का नाम ही रखना था तो “वैद्य गुड़” कर सकते थे। ये तो वही बात हो गई गुरु (वैद्य) गुड़ रह गया चेला (डॉ.) शक्कर हो गया। माहत्मा गांधी ने सही कहा था “अंग्रेज देश में ही रह जाए परंतु अंग्रेज़ी वापिस जानी चाहिए”, लेकिन हुआ इसका विपरीत अंग्रेज़ तो चले गए और अंग्रेज़ी छोड़ गए।

देश में हापुड़ को गुड़ की मंडी का नाम दिया गया है। दक्षिण भारत में तो अंका पली का डंका बजता हैं। उत्तर भारत को सबसे बड़ा आई टी केंद्र गुरुग्राम भी तो गुड़ का गांव (गुड़गांव) ही था। कुछ वर्ष पूर्व दैनिक पेपर में अनाज और अन्य जिंसों की भाव तालिका प्रतिदिन छपा करती थी, आज की युवा पीढ़ी क्रय करने से पूर्व मूल्य पर कम ही ध्यान देती हैं।

हर चमकने वाली वस्तु सोना नहीं होती है, यही बात शक्कर (चीनी) पर भी लागू होती है। गुड़ सोना है,और चीनी चांदी है। हालांकि ये बात शुगर लॉबी वालों को हज़म नहीं होगी, उनके निज़ी स्वार्थ जो  जुड़े हैं। खांडसारी कुटीर उद्योग को तो शुगर इंडस्ट्री कब का चट कर गई।

अब लेखनी को विराम देता हूँ, गुड़ की चाय पीने के बाद दूसरा भाग लिखूंगा।

अगले सप्ताह पढ़िए गुड़ की चाय पीने के बाद का अगला भाग ….. 

© श्री राकेश कुमार 

संपर्क –  B  508 शिवज्ञान एनक्लेव,निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान) 

मोबाईल 9920832096

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 109 – लघुकथा – अधिकार ☆ श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

श्रीमती  सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। । साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य  शृंखला में आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित विचारणीय लघुकथा  “अधिकार”। इस विचारणीय रचनाके लिए श्रीमति सिद्धेश्वरी सराफ जी की लेखनी को सादर नमन।) 

☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी  का साहित्य # 109 ☆

? लघुकथा – अधिकार ?

एक छोटे से गांव में अखबार से लेकर तालाब, मंदिर और सभी जगहों पर चर्चा का विषय था कि कमला का बेटा गांव का पटवारी बन गया है।

कमला ने अपने बेटे का नाम बाबू रखा था। कमला का बचपन में बाल विवाह एक मंदबुद्धि आदमी से करा दिया गया था। दसवीं पास कमला पहले ही दिन पति की पागलपन का शिकार हो गई और फिर मायके आने पर घर वालों ने भी अपनाने से इंकार कर दिया। पड़ोस में अच्छे संबंध होने के कारण उसने अपनी सहेली के घर शरण ली।

फिर आंगनबाड़ी में आया के रूप में काम करने लगी। अपना छोटा सा किराए का मकान ले रहने लगी।

कहते हैं अकेली महिला के लिए समाज का पुरुष वर्ग ही दुश्मन हो जाता है। गांव के ही एक पढे-लिखे स्कूल अध्यापक ने सोचा मैं इसको रख लेता हूं। इसका तो कोई नहीं है मेरी तीन लड़कियां है। उसका खर्चा पानी इसके खर्च से आराम से चलेगा और पत्नी को भी पता नहीं चलेगा।

गुपचुप आने जाने लगा। कमला मन की भोली अपनी तनख्वाह पाते ही उसे दे देती थी। सोचती कि मेरा कोई तो है जो सहारा बन रहा है।

धीरे-धीरे गांव में बात फैलने लगी मजबूरी में दोनों को शादी करनी पड़ी। एक वर्ष बाद कमला को पुत्र की प्राप्ति हुई, परंतु उसके दुख का पहाड़ तो टूट पड़ा। बच्चा जब साल भर का हुआ तब उसे शाम ढलते ही दिखाई नहीं देता था।

कमला ने सोचा मेरे तो भाग्य ही फूटे हैं। आदमी अब तो दूरी बनाने लगा कि खर्चा पानी इलाज करवाना पड़ेगा।

धीरे-धीरे दोनों अलग हो होने लगे वह फिर अपने परिवार के पास चला गया। रह गई कमला अकेले अपने बाबू को लेकर। समय पंख लगा कर उड़ा जैसे तैसे दूसरों की मदद से पढ़ाई कर बाबू बी.काम. पास हुआ।

तलाक हो चुका था, कमला और अध्यापक का। पटवारी फार्म भरने के समय वह चुपचाप पिताजी के नाम और माता जी के नाम दोनों जगह कमला लिखा था। हाथ में पटवारी की नियुक्ति का कागज ले जब वह घर जा रहा था। रास्ते में पिताजी ने सोचा शायद बेटा माफ कर देगा, परंतु बाबू ने पिताजी की तरफ देख कर गांव वालों के सामने कहा…. मरे हुए इंसान का अधिकार खत्म हो जाता है। अपने लिए मरा शब्द और अधिकार बाबू के मुंह से, सुनकर कलेजा मुंह को आ गया।

आरती की थाल लिए कमला कभी अपने बाबू को और कभी उसके नियुक्ति पत्र में लिखें शब्दों को देख रही थीं । अश्रुं की धार बहने लगी सीने से लगा बाबू को प्यार से आशीर्वाद की झड़ी लगा दी। पूरे अधिकार से स्वागत करते हुए कमला खुश हो गई।

 

© श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares