मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’… कवि – कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? काव्यानंद ?

☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’… कवि – कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

#विशेष कविता रसग्रहण उपक्रम#

…आज मी तात्यांची म्हणजेच कवि कुसुमाग्रज अर्थात वि.वा शिरवाडकरांची, आगगाडी व जमीन ही कवितेच रसग्रहण करत आहे. 

सन 1942 साली पहिला प्रसिध्द झालेल्या विशाखा या कविता संग्रहातील ही कविता आहे. कवितेच्या शेवटी कविता लेखनाचा काल 1938 नि स्थल पुणे अस दिलेल आहेत.

तात्यांनी अहि-नकुल,हा काठोकाठ कटाह भरा, जा जरा पूर्वेकडे, गुलाम, शेवटचे पान ,आव्हान,कुतूहल, भक्तिभाव, बालकवी ,आणि आगगाडी व जमीन या सारख्या कविता लिहिल्या…त्यांच्या विशाखा या कविता संग्रहाला भाऊसाहेब तथा वि.स.खांडेकरांनी अर्ध्यदान स्वरुपात प्रस्तावाना लिहली आहे .ते म्हणतात त्यांची  प्रतिमा ही लुकलुक करणारी चांदणी नाही,ती चमचम करणारी बिजली आहे,आपली कविता ही मुरली नाही,ती तरवार आहे याची योग्य  जाणीव त्यांना आहे.या तरवारीला कल्पकतेच्या सुंदर आणि बळकट मुठीची जोडही सुदैवाने मिळालेली आहे,त्यामुळे अनुभूतीच्या कुठल्याही प्रदेशात त्यांची प्रतिभा रणरागिणीच होईल. आणि भविष्यवाणी पुढे तंतोतंत खरी ठरलेली आपण पाहिलीच आहे…

☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’ ☆

नको गं ! नको गं ! आक्रंदे जमीन

पायाशी लोळत विनवी नमून-   2

 *

धावसी मजेत वेगात वरून

आणिक खाली मी चालले चुरुन !

 *

छातीत पाडसी कितीक खिंडारे

कितीक ढाळसी वरून निखारे !   2

 *

नको गं ! नको गं ! आक्रंदे जमीन

जाळीत जाऊ तू बेहोष होऊन.

 *

ढगात धुराचा फवारा सोडून

गर्जत गाडी ती बोलली माजुन- 2

 *

दुर्बळ ! अशीच खुशाल ओरड

जगावे जगात कशाला भेकड !

 *

पोलादी टाचा या छातीत रोवून

अशीच चेंद्त धावेन ! धावेन ! 2

 *

चला रे चक्रानों,फिरत गरारा

गर्जत पुकारा आपुला दरारा !

 *

शीळ अन कर्कश गर्वात फुंकून

पोटात जळते इंधन घालून ! 2

 *

शिरली घाटात अफाट वेगात

मैलांचे अंतर घोटात गिळीत !

 *

उद्दाम गाडीचे ऐकून वचन

क्रोधात इकडे थरारे जमीन ! 2

 *

“दुर्बळ भेकड !”त्वेषाने पुकारी

घुमले पहाड घुमल्या कपारी !

 *

हवेत पेटला सूडाचा धुमारा

कोसळे दरीत पुलाचा डोलारा ! 2

 *

उठला क्षणार्ध भयाण आक्रोश

हादरे जंगल कापले आकाश

 *

उलटी पालटी होऊन गाडी ती

हजार शकले पडली खालती ! 2

या कवितेचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे सरल सरल दोन भाग पडलेले दिसतात. पूर्वार्धात जमीन आगगाडीची विनवणी करताना दिसतेय.. तू अशी धाड धाड दाण दाण करत तूही पोलादी चाक माझ्या अंगावरुन नेऊ नकोस त्याने माझ्या मातीचा ,आजूबाजूच्या परिसरसराची धूळधाण होते.शिवाय तू अशी जोशात जातेस तेव्हा ते जळते लालभडक निखार्‍यानीं अंग अंग पोळून निघते. तूला जायाला मज्जाव करत नाही पण तुझ्याइतकी सशक्त नाही.तेव्हा माझा तू सहानुभूतीने विचार कर.माझं अस्तित्व टिकल तरच तुझ्या असण्याला फिरण्याला अर्थ आहे. या ठिकाणी जमीन ही शोषित वर्गाच्या प्रतींनिधीचे प्रतीक दाखवले आहे. मजुरांची कामगारांची मालकवर्गाने काळजी घेतली तर मालकांचा व्यवसाय अव्यहात टिकेल अन्यथा…

तर उत्तरार्धात आगगाडी जमिनीच्या विणविणीची अवहेलना करते. दुर्बल भेकड म्हणून तिचा अवमान करते.पायाची वाहाण पायीच बरी असते. आपल्या उद्दाम, सहानुभूतीशून्य वागण्याने जमिनीला चेंदून टाकण्यास तयार होते. प्रचंड वेगाने आगीचे लोळ फुत्कारत घाटाला गिळत पुढे पुढे निघते. मालक वर्ग कामगार वर्गाची एनकेण प्रकारे पिळवणूक करत राहतो. कामगरांच्या सुख्दुखाशी त्याच काहीएक देण घेण नसत.

आणि शेवटी अन्यायाने,अपमानाने,कष्टाने त्रस्त झालेली जमीन सूडाचा बदला म्हणून आगगाडीच्या वाटेवरचा खींडितला पूल जेव्हा पाडून टाकते तेव्हा गुरमीत असलेलली पण बेसावध आगागडीचा अपघात होतो.मोठी जीविहहाणी बरोबर साधनसंपत्तीचा सर्वनाश होतो. कामगार जेव्हा पेटून उठतो तेव्हा संप,दंगल,क्रांतीचा,बंड करून उठतो आणि मालकाला दे धरणीमाय करून सोडतो. भांडवलशाही विरूध्द समाजवादाची लढाईच चित्रचं या कवितेत दाखवलेले दिसते.

कुसुमाग्रज हे मानवतेचे कवि आहेत.आजच्या सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या कवितेतून इतर काव्यांप्रमाणे नुसता धुमसत नाही ,तो अग्निरसाचा वर्षाव करीत सुटतो.विषमता,पिळवणूक,गांजणूक आणि अन्याय यांच्याविषयीची बहुजनसमाजाची चीड कुसुमाग्रजांनी अत्यंत उत्कट आणि सुंदर स्वरुपात आपल्या काव्यातून व्यक्त केली आहे.

आगगाडी व जमीन  या कवितेत कवीची कल्पकता व त्याची प्रेरकता यांच्यामध्ये जणूकाही शर्यतच लागली आहे !दलितवर्गावर होणार्‍या जुलूमाचे आणि त्याच्या प्रतिक्रियेचे या कवितेतील चित्रण अत्यंत प्रभावी आहे.क्षणाक्षणाने आणि कणाकणाने सुधारणा होऊन मानव जात सुखी होईल हा भोळा आशावाद दुर्बल ठरतो आणि क्रांतीचे निशाण हातात घेतलेल्या समतादेवीकडे समाजाचे डोळे लागतात. ‘हा काठोकाठ कटाह भरा, जा जरा पूर्वेकडे, गुलाम,बंदी आणि आगगाडी व जमीन  या तेजस्वी कवनांतून कुसुमाग्रजांनी क्रांतीच्या दर्शनाचा मानवजातीला लागलेला ध्यास मोठ्या तन्मयतेने वर्णन केला आहे.त्यांची कल्पकता प्रत्येक वेळी नव्या नव्या सुंदर रूपकांचा आश्रय करून या ध्यासाचे चित्रण करते, अश्याप्रकारच्या सर्व कवितांतून  कुसुमाग्रज एकच तुतारी फुंकत आहेत असेच मला वाटत राहते…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बूमरँग” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “बूमरँग” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

शेवटी काल मी माझे प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेतला. प्रयत्न होता तो बायकोला टू व्हीलर शिकवण्याचा. यासाठी मी सगळे प्रयत्न केले.

तुला जमेल… तु शिकशील… तु करून दाखवशील… सोप्पं आहे ते… वाटतं तितकं कठीण नाही… मी आहे नां… फोर व्हीलर सारखं खूप किचकट नाही… किती दिवस तू माझ्यावर किंवा रिक्षावर अवलंबून राहशील… अशा प्रोत्साहन देणाऱ्या अनेक वाक्यांपैकी काही मी मनापासून ऐकवली… तर काही मनात नसतांना सुध्दा…

आता नवीन गाड्या आहेत. किक फार कमी वेळा मारावी लागते. बटन दाबलं की सुरू होते. पाय जमिनीवर टेकतील इतकीच उंची असते. आणि एक्सीलरेटर हळूहळू वाढवलं कि आपोआप पुढे जाते. असा अभ्यासक्रमाचा काही भाग तोंडी सांगून झाला होता.

थोडफार प्रात्यक्षिक सुध्दा सुरू झालं होतं. पण त्यात गाडी शिकण्यापेक्षा सुरुवातीला अडचण आली ती साइड मिररची…

ते गोल गोल आरसे काढून टाका, आणि दुसरे चांगले चौकोनी, उभे, आणि स्लिम असतील ते लावा… पहिली सुचना…

आता काय झालं मला काही सुचेना… का?… असं विचारण्याची मी हिंमत केली. तसंही बऱ्याचदा का?… असं हिंमत करुनच विचारावं लागतं…

त्या गोल आरशात मी गोल गोलच दिसते…

अगं पहिला मुद्दा तो आरसा आपल्या स्वत:ला पाहण्यासाठी नसतोच. मागून कोण येतय हे पाहण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी असतो. आणि असंही बाहेर पडतांना तु मोठ्या, पूर्ण उंचीच्या, आणि गोल नसलेल्या आरशात पाहूनच बाहेर पडतेस नां. मग परत त्या छोट्या आरशात स्वत:ला पाहण्याची काय गरज… आणि आरसा जे आहे तसंच काहीसं दाखवण्याचा प्रयत्न करतो… शेवटचं वाक्य मी हळूच म्हंटल. तरीसुद्धा माझा चेहरा चौकोनी आणि तिचा गोल झाला आहे असं उगाचच पण खरं तेच वाटल…

मागून कोण येतंय हे पाहण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी आरसा असतो हे वाक्य तिला पाठ झाल्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या प्रात्यक्षिकात ती गाडी चालवत असतांनाच तिने गाडीचा वेग कमी केला, आणि थोडी बाजूला करून उभी राहिली…

आता काय झालं?… माझा प्रश्न..

काही नाही, आरशात एक बाई मागून येते आहे ती दिसली… म्हणून…

तीला पुढे जायचं असेल तर ती जाईल नां… तितकी जागा आहे… पण तु वेग कमी करत बाजूला गाडी थांबवली हे मस्त…

प्रश्न तिला जायला जागा आहे का नाही याचा नाहीच… तिची साडी मस्त आहे… कुठली आहे… आणि पदर कसा आहे हे बघायचं आहे‌… त्या बाईंच सोडा, पण या आरशात साडी काही नीट दिसलीच नाही…

मी निरुत्तर…

पण या थांबण्यामुळे तिने साडी सह बाईंकडे… आणि मी त्या… बाईंसह साडीकडे पाहून घेतलं…

पण या कारणांमुळे मी माझे प्रयत्न सोडले असं नाही. त्याला कारण वेगळंच होतं…

आज सुटिचा दिवस होता. रोज दोघांच सकाळी कामावर जाणं. सकाळचं जेवण डब्यात. यामुळे घरी नाश्ता हा प्रकार जवळपास नसतोच. आज मी सहज म्हटलं. खायला जरा पोहे करा… वर मस्त नारळाचा किंवा खोबऱ्याचा किस… कोथिंबीर… लिंबू… मजा येइल…

त्यावर उत्तर आलं… हं तो वरचा डबा घ्या… पोहे आहेत त्यात… चाळणीने चाळून घ्या… थोडे भिजवा… दोनचार मिरच्यांचे तुकडे करा… बाकी फोडणी, मीठ, हळद हे मी सांगते… आणि खोबऱ्याचं पण बघते…

एखाद्या गोष्टीचं खोबरं होण म्हणजे काय असतं, ते मला समजलं…

येवढ्यावरच ते बोलणं थांबलं नाही, तर फक्त रिक्षेचा उल्लेख सोडला तर माझी वाक्य…

तुला जमेल… तु शिकशील… तु करून दाखवशील… सोप्पं आहे ते… वाटतं तितकं कठीण नाही… मी आहे नां… हि वाक्य तशीच, तेवढ्याच तन्मयतेने आणि उत्साहाने मलाच ऐकून दाखवली…

यात परत फोर व्हीलर सारखं किचकट नाही, या माझ्या वाक्याप्रमाणे पाकातले चिरोटे करण्याइतकं किंवा अनारशा सारखं किचकट नाही… असं पण ऐकाव लागलं.

आणि मी माझे शिकवण्याचे प्रयत्न सोडून द्यायचे ठरवलं… तिला फक्त गाडी शिकवायची होती… पण मला बरंच काही शिकावं लागलं असतं… शिकवणं कठिण असेल पण शिकणंही सोप्पं नसतं…

आता काय?… तिने पोहे करायला घेतले आहेत… आणि पोहे खाऊन झाल्यावर तिला एका ठिकाणी जायचं आहे तिथे सोडायला मी…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रिटर्न गिफ्ट… – अज्ञात (अर्थात आपल्यातलाच कोणीतरी एक) ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ रिटर्न गिफ्ट… – अज्ञात (अर्थात आपल्यातलाच कोणीतरी एक) ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

माझ्या नातवाने मला आज निरूत्तर केले. दररोज रात्री तो कितीही उशीरा घरी आला तरी माझ्या जवळ १०-१५ मिनिटे शांतपणे बसल्याशिवाय तो जेवत नाही. माझा मुलगा आणि सुनबाई ह्या बाबतीत माझ्याकडे सतत तक्रार करताना म्हणतात की मी त्याला लाडावून ठेवलं आहे. आता तर त्याचं लग्न देखील झालं आहे. घरी आल्यावर लवकर जेवून त्याने त्याच्या बायकोसमवेत वेळ घालवला पाहिजे. पण तसं होत नाही. आज अखेर तो नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत आल्यावर मी त्याला तशी विनंती देखील केली. पण त्याचं उत्तर ऐकून मला गहिवरून आलं. मी निरूत्तर झालो. त्याला जवळ घेऊन मी घट्टपणे कवटाळून धरलं. माझ्या आजारपणाचा मला क्षणभर विसर पडून मी मनसोक्तपणे रडलो. पण माझ्या नातवाचा माझ्यात अडकलेला जीव पाहून मी सुखावलो देखील.

माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो मला म्हणाला, ” आबा, रोज मला घरी आल्यावर भेटायला यायची गरज नाही असं जे आज तुम्ही म्हणालात ते आजचं आणि शेवटचंच. ह्या बाबतीत मी काय करायचे ते माझे मलाच ठरवू दे प्लीज. तुम्ही आईबाबांचं नका ऐकू. तुमचं माझं नातं नुसतं आजोबा नातवाचं नसून त्यात बऱ्याच आठवणी दाटीवाटीने बसलेल्या आहेत.

माझी आठवण जिथं पर्यंत मागे जाते तेंव्हापासून तुम्ही माझ्या सोबत आहात. अगदी लहानपणापासून आईबाबांचा हट्ट होता की मी वेगळ्या स्वतंत्र खोलीत झोपावे. मला तेव्हा एकटं झोपायला खूप भिती वाटायची. पण मी डोळे मिटेस्तोवर तू मला कपाळावर थोपटत श्लोक म्हणायचास. तुझा तो रेशमी स्पर्श झाला की किती बरं वाटायचं. त्यानंतर शाळेला जाताना बसस्टॉपवर तू मला सकाळी सोडायला आणि दुपारी आणायला यायचास. घरी आल्यावर शाळेतील मजा माझ्या तोंडून ऐकताना तू रंगून जायचास. मी मोठा होत गेलो पण माझ्यासाठी तू तोच राहिलास. मोठ्या शाळेत स्पोर्ट्स डे असो किंवा गॅदरिंग तू येतच राहिलास घरचा प्रतिनिधी म्हणून.

पुढे काॅलेज ऍडमिशन साठी फाॅर्म च्या लाईनीत उभा राहिलास. काॅलेजच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून संध्याकाळी माझ्यासोबत फोटो काढून घेतलास. माझी फायनल एक्झॅम असताना माझ्यासाठी रात्र रात्र जागून सोबत केलीस. डोळ्यांवरची पेंग जाण्यासाठी मला काॅफी बनवून द्यायचास. दोन वर्ष पदव्युत्तर शिक्षणासाठी मी परदेशी जायचं ठरवलं. मी तुझ्यापासून लांब रहाणार ही कल्पना सहन न झाल्याने एक दिवस तू स्वतःला खोलीत कोंडून घेतलंस. मी निघायच्या दिवशी मात्र मला हसत हसत निरोप दिलास पण हट्टाने मला विमानतळावर सोडायला आलास. तिथे तू मला मारलेली मिठी मी नाही विसरू शकणार.

आबा लहानपणी जेव्हा भिती वाटायची तेव्हा तू सोबत केलीस, माझ्या शैक्षणिक कालखंडातील प्रत्येक टप्प्यावर तू हिमालयासारखा माझ्या मागे उभा राहिलास. जेव्हा कधी निराश झालो तेव्हा मला सावरायला तू खंबीरपणे उभा राहिलास. परदेशातून शिकून आल्यावर नोकरीच्या पहिल्या दिवशी घरी आल्यावर हक्काने मला घेऊन प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन माझ्यासाठी प्रार्थना केलीस. आठवायचं म्हटलं तर कितीतरी गोष्टी आठवतील. तू खरंच सावली सारखी सोबत केलीस माझी. मी कमी वेळात आज जी काही प्रगती करून सुखी आयुष्य जगतोय ह्याच्या मागे तुझाच आधार आणि आशिर्वाद होता रे. म्हणूनच नोकरी सुरू झाली त्या दिवशीच मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला. रोज घरी आल्यावर न चुकता तुझी विचारपूस करण्यासाठी तुला भेटायचेच. उशीर झाला तरी हरकत नाही. तुला झोप लागली असली तरी सुद्धा तुझ्या बेडजवळ थोडा वेळ बसून जायचं. माझी आणि केतकीची पहिली भेट झाली तेव्हा मी तुझ्या बद्दल सगळं सांगितलं तिला. मग तिनेच हट्ट केला म्हणून एक दिवस तुला बाहेर हाॅटेलात घेऊन गेलो तिच्यासाठी. आज आमचं लग्न झालं असलं तरीसुद्धा मी तुला आल्यावर भेटायला पाहिजे असा तिचा देखील आग्रह असतो.

आबा आजवर तु माझ्यासाठी जे जे केलंस त्याबदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून मी तुला रोज भेटतो. तुझी विचारपूस करतो. तुझ्या कपाळावर हात ठेवला की दिवसभराचा थकवा आणि टेन्शन क्षणांत दूर होतं. म्हणूनच मी शेवटपर्यंत भेटतच रहाणार. तू आई बाबांचं ऐकून मला तुला भेटण्यापासून परावृत्त करू नकोस प्लीज.

आबा तु माझा श्वास आहेस. तुझ्या शिवाय जगणं ही कल्पनाच मी करु शकत नाही. तुझ्या आजारपणात तू खूप थकला आहेस. उलट आता तर मी आणखी थोडा वेळ तुझ्या सोबत घालवयचा विचार करतो आहे. म्हणूनच माझी कळकळीची विनंती आहे तुला की माझ्या रिटर्न गिफ्टचा तू आनंदाने स्विकार करावास आणि मला एका ऋणातून मुक्त होण्यासाठी मदत करावीस “.

खरंच गेल्या जन्मीची पुण्याई म्हणून की काय असा नातू माझा जीव की प्राण बनला आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण त्याने दिलेली रिटर्न गिफ्ट स्विकारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.

” राजे तुमची रिटर्न गिफ्ट मला मान्य आहे ” त्याचे दोन्ही हात माझ्या छातीजवळ धरुन मी म्हणालो आणि त्याच आनंदात त्याने माझ्या कपाळावर त्याचे ओठ अलगद ठेवून मला गुड नाईट करत तो माझ्या खोलीबाहेर पडला.

लेखक : अज्ञात (अर्थात आपल्यातलाच कोणीतरी एक) 

लेखिका : सुश्री प्राची गडकरी

मो.  ९९८७५६८७५०

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्दांची वादळं… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

? मनमंजुषेतून ?

☆ शब्दांची वादळं… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

सुमारे तीस – पस्तीस वर्षांपूर्वीची घटना आहे ही. आता मी जनसामान्यांबरोबरच साहित्यिकांमध्ये देखील प्रथितयश कवी म्हणून ओळखला जाऊ लागलो होतो. तरीही आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे थोरच नाही का !

पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात भरलेल्या कवी संमेलनात मी माझी ‘शब्दांची वादळं’ ही कविता सादर करायला व्यासपीठावर उभा होतो. हे सुनीत आहे. मी पहिलाच चरण म्हटला,

‘शब्दांची अनेक वादळं आली, कधी तसा डगमगलो नाही ‘.

आणि अचानक माझ्या मागून, व्यासपीठाच्या मागील भागातून ‘वाः! सुंदर’ अशी दाद मिळाली. मी चमकून, तरीही कृतज्ञतेने मागे वळून पाहिले; आणि काय सांगू तुम्हाला, ही दाद मिळाली होती विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या दोन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्यांकडून ! माझ्या अंगावर शहारे आले आणि मोठ्या उत्साहात मी ती संपूर्ण कविता सादर केली. कवितेला टाळ्यांच्या कडकडाटाचा प्रतिसाद तर मिळालाच; शिवाय मेनका प्रकाशनच्या पु. वि. बेहेरे यांनी माझा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची इच्छा प्रकट केली. साहजिकच या काव्यसंग्रहाचे नाव आहे ‘ शब्दांची वादळं ‘!

आज घेऊन आलो आहे ही शब्दांची वादळं कविता: – – 

☆ शब्दांची वादळं ☆

शब्दांची अनेक वादळं आली कधी तसा डगमगलो नाही 

नजरांचे कुत्सित झेलले बाण विचलित असा झालोच नाही

आपण बरे आपले बरे ही वृत्ती कधी सोडली नाही

मार्ग आपला शोधत राहिलो कानावरचं मनावर घेतलंच नाही

नजर माझी वाईट म्हणत त्यांच्या वाटे गेलोच नाही 

नजरेसमोर आले त्यांना मात्र कधी टाळले नाही 

बोलणाराची वृत्तीच वाईट त्याचा बाऊ केलाच नाही

अनुभवाचे बसले चटके दुर्लक्ष करता आलं नाही 

*

अपयशाचा धनी झालो माझ्या, त्यांच्या खोटं नाही

सावली माझी वैरीण झाली, शुभ तिला ठाऊक नाही 

नजर माझी अशुभ म्हणता सत्याला या पडदा नाही

दृष्टी माझी टाळून जाता मांगल्याला अडचण नाही 

भीती आता माझी मलाच अपयशाला वाण नाही 

नको आरसा म्हणून मला असली दृष्ट सोसवत नाही

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिव… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ शिव… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

# जगाने ऐश्वर्य उपभोगावे म्हणून स्वतः स्मशानात राहतो तो शिव असतो…

# जगाला मांगल्याचे अमृत मिळावे म्हणून जो स्वतः हलाहल कंठी धारण करतो तो शिव असतो…

# पत्नीचे वाहन व्याघ्र, एका मुलाचे वाहन उंदीर, एकाचे मोर आणि स्वतःचे वाहन नंदी असताना, तसेच स्वतः कंठी व्याल {सर्प } धारण करतो ( अर्थात परस्पर विरोधी वाहनं/स्वभाव असताना… ) आणि तरीही गुण्या गोविंदाने स्मशानात आपला संसार थाटतो आणि आदर्श संसार करतो, तो शिव असतो…

# सर्व विद्यांचा निर्माता, सर्व कलांचा निर्माता, सर्व गुरूंचा गुरू असताना, सर्वांपासून अलिप्त राहून स्मशानात कायम ध्यानस्थ राहू शकतो, तो शिव असतो…

# आपल्याला असलेले सर्व ज्ञान जगाला प्राप्त व्हावे म्हणून सर्वप्रथम आपल्या पत्नीला देतो, तो शिव असतो…

# साऱ्या विश्वाचा पसारा सांभाळताना, त्यातूनच वेळ काढून आपल्या पत्नीशी निवांत गप्पा मारतो, तो शिव असतो…

( कोणत्याही कथेच्या आधी शिव पार्वती संवाद झाल्याचे आपल्याला आढळेल…! )*

# जो स्वतः शिव असताना, जगाचा आद्यगुरू असताना, अखंड रामनाम स्मरण करीत असतो, तो शिव असतो…

# जो देव दानव, मानव, भूतखेते सर्वांना पूज्य असतो, तो शिव असतो…!

# जो कधीही सत्याची कास सोडत नाही, त्यामुळे तो शिव होतो आणि जसा असतो तसा तो सुंदर दिसतो…

“सत्यम् शिवम् सुंदरम्”

भगवान शंकर महाराज की जय !!! सद्गुरू नाथ महाराज की जय!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – २” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(”हम सभी सहीसलामत वापस आयेंगे… और यहीपर फिर एक फोटो लेंगे!” पण या वाक्यातील सत्यता सर्वजण जाणून होते… लढाई होती ती.. खेळ नव्हे!  दुर्दैवाने यांमधील काही जण परतले नाहीत… त्यात शेरशहा होते !) – इथून पुढे — 

या संपूर्ण मोहिमेत डॉक्टर आढाव सैन्यासोबत अगदी काही मीटर्स अंतरावर वर होते. पंधरा सोळा हजारांपेक्षाही अधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर जखमी झालेल्या जवानांना तेथून खाली रुग्णालयात आणणे केवळ अशक्यच होते. हेलिकॉप्टरचा उपयोग नव्हता… एकच उपाय होता तो म्हणजे जखमीला पाठीवर किंवा स्ट्रेचरवर घालून खाली घेऊन येणे… आणि त्यावेळी गोळीबार तर सुरूच असणार होता. अशा भयावह परिस्थितीमध्ये डॉक्टर जर काही मीटर्सवर उपलब्ध असेल तर? आणि डॉक्टर राजेश आढाव साहेब नेमके तेथेच आणि लगेच उपलब्ध होते! महा भयावह थंडी, त्यात अंधार. उजेड दिसेल असे काही करण्याची अनुमती नव्हती. कारण रात्रीच्या अंधारात या दिसणा-या प्रकाशाच्या दिशेने गोळीबार होण्याची शक्यता अधिक होती. आणि तसे होतही होते. जीवघेण्या थंडीमुळे सलाईनच्या नळ्या, त्यातील द्रव गोठून जात होते. मग त्यासाठी एखाद्या खडकावर अंगातले कोट टाकून आडोसा करायचा… त्याखाली स्टोव पेटवून सलाईन गरम करून पातळ करायची… त्याच अंधारात सैनिकांच्या गोठून गेलेल्या शरीरांत रक्तवाहिन्या शोधायच्या आणि त्यांत सलाईन लावायचे… जखमा शिवायच्या…. सैनिकांना… ”मैं हूं ना!” म्हणत धीर द्यायचा… वरून गोळीबार सुरु आहे.. बॉम्ब फुटत आहेत…. आणि इथे डॉक्टर प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताहेत… आणि त्यात यांना भरपूर यशही मिळते आहे…. एकदा तर असेच उपचार करीत असताना राजेश साहेबांच्या हाताला शत्रूने डागलेल्या बॉम्बगोळ्याने जखम झाली.. रक्त वाहू लागले… डॉक्टर साहेबांनी स्वत:च आपल्या हाताला बँडेज बांधले… आणि इतरांवर उपचार सुरूच ठेवले… एक अप्रतिम इतिहास घडत होता!

कॅप्टन विक्रम बात्रा हे तर जणू डॉक्टर राजेश यांचे जिवलग मित्रच बनले होते. काहीवेळा पूर्वीच एका जवानाने बात्रा साहेबांचा निरोप आणला होता… ते पुढे वरच्या बाजूला सुमारे पंचवीस मीटर्सवर दबा धरून बसलेले होते… काही वेळातच वर चढत जाऊन शत्रूवर हल्ला करायचा होता… बात्रा साहेबांचे डोके दुखू लागले होते.. तेथील हवामानात प्राणवायू कमी असल्याने असे होत असते. डॉक्टर साहेबांनी प्रत्येक सैनिकाकडे आणीबाणीच्या प्रसंगी वापरायची औषधे दिली होती… बात्रा साहेबांनी तेथूनच ओरडून विचारले… ”डॉक्टरसाहब.. कौन सी गोली चलेगी!” डॉक्टर साहेबांनी तेथूनच ओरडून सांगितले… ”विटामिन सी काम करेगी!” आणि बात्रा साहेबांना खरेच आराम पडला.

पहाटेचे चार वाजले असतील. कॅप्टन नवीन नागप्पा साहेब बात्रा साहेबांच्या समवेत लढत होते.. त्यांच्या दोन्ही पायांच्या बरोबर मध्ये एक बॉम्बगोळा पडून फुटला… त्यांचे दोन्ही पाय प्रचंड निकामी झाले…. त्यांना पाहून बात्रा साहेबांनी धाव घेतली त्या तसल्या गोळीबारात… जखमी झालेल्या नवीन नागप्पा साहेबांना त्यांनी उचलून खांद्यावर घेतले… म्हणाले… ”तुम शादीशुदा हो.. family वाले हो… तुम्हारा बचना जरुरी है! असे म्हणून त्यांनी नवीन यांना सुरक्षित जागी आणून ठेवले… आणि स्वत: लढायला पुढे गेले!

काही वेळाने एका जवानाने नवीन साहेबांना खांद्यावर लादून डॉक्टर साहेबांकडे आणले… नवीन साहेब मोठ-मोठ्याने हुंदके देत देत रडत होते… डॉक्टरसाहेबांना खूप आश्चर्य वाटले… जखमा तर मी व्यवस्थित बांधल्या आहेत… वेदनाशामक इंजेक्शनही दिले आहे.. मग तरीही हा अधिकारी एवढा तळमळतो का आहे? मग त्यांच्या लक्षात आलं… हे शरीराच्या वेदनांचे दु:ख नव्हते.. काळजाचे दु:ख होते…. ”डॉक्टर साहेब… आपला शेरशहा आपण गमावला…!” हे ऐकताच, नवीन त्यांना तुम्ही जाऊ नका… तेथे धोका आहे… गोळीबार सुरु आहे”. असे सांगत असतानाही डॉक्टरसाहेब त्या जागेपर्यंत पळत गेलेच…. त्यांनी बात्रा साहेबांना उचलण्यासाठी त्यांच्या पाठीखाली हात घातला… तिथे फक्त एक पोकळी होती.. रक्तमाखली! सिंह निघून गेला होता… पण त्याच्या चेह-यावर मोठे हास्य होते!

सैनिक म्हणाले… त्यांनी आमचा सिंह मारला… आता आम्हांलाही जगण्याचा अधिकार नाही… दुस-याच दिवशी बात्रा साहेबांच्या बलिदानाचा प्रतिशोध घेण्यासाठी आपल्या सैन्याने पुन्हा एकदा जोरदार प्रतिहल्ला चढवला.. तो ही दिवसा उजेडी… पाकड्यांना असा दिवसा हल्ला केला जाईल याची कल्पनाच नव्हती… ते मस्त स्वयंपाक करत होते, आराम फर्मावत होते… भारतीय सैनिक त्यांच्यावर चालून गेले…. तेथे होते तेवढ्या शत्रूला त्यांनी कंठस्नान घातले.. आणि ते शिखर ताब्यात घेतले…. कित्येक पाकिस्तानी मारले गेले… डॉक्टरसाहेब सैनिकांसोबत होतेच. त्यांच्य मनात तर डरपोक पाकिस्तानी सैन्याबद्दल प्रचंड राग होता… त्यांनी त्यांच्या हातात असलेली एके-४७ रायफल सज्ज करून तिच्यातून मृत पाक सैनिकांच्या देहांवर गोळ्या डागल्या… !

इतक्या कठीण परिस्थितीमध्ये देशासाठी प्राण पणाला लावणा-या सैनिकांचे डॉक्टरसाहेबांना अतिशय कौतुक वाटे. यातला कुणीही मरणाला घाबरत नव्हता. एरव्ही डॉक्टर साहेबांना प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घालणारा जवान, बास्केट बॉलचा निष्णात कोच असे एरव्ही अन्य भूमिकांत असणारे अनेक जण आज अचानक लढवय्ये बनून शत्रूवर चाल करून निघाले होते.

रात्रीच्या अंधारात एका खडकावर आपला उजवा जखमी हात डाव्या हाताने धरून एक जवान बसला होता… डॉक्टर साहेब त्याच्यापर्यंत पोहोचले… त्याचा आपला एकच प्रश्न.. ”डॉक्टरसाब… मेरा हात फिरसे जुड जायेगा ना? नहीं तो मुझे वापस घर जानाही नहीं है!” डॉक्टर साहेबांनी पाहिले… केवळ कातडीच्या आधारे त्याचा तो हात लटकत होता… तरीही त्यांनी त्याला धीर दिला… ”क्यों नहीं… जरूर ठीक हो जायेगा.. और जुडेगा जरूर!

आणि त्यानंतर तो सैनिक काहीसा ग्लानीत गेला. डॉक्टरांनी मोठ्या कौशल्याने त्याच्या जखमा बांधल्या… रक्तस्राव बंद केला…. त्याला जरूर ती औषधे दिली… आज तो जवान एके ठिकाणी बास्केट बॉल प्रशिक्षक आहे. जेंव्हा केंव्हा त्याची भेट होते.. तेंव्हा तो म्हणतो… ”डॉक्टर साहब, आप सब से बुरे डॉक्टर हों! अगर उस दिन आप मुझसे झूठ नहीं बोलते तो मै उस दिन जिंदाही नहीं रहता!” अर्थात हे सर्व बोलणे त्याचा जीव वाचवल्याबद्दल केलेले कृतज्ञतेचे बोल होते.

एक असाच जखमी सैनिक आला.. पण स्वत:च्या पायाने चालत आला होता… म्हणाला… ”साब, सर में गोली लगी है!” डॉक्टर त्यावेळी आणखी दोन केसेस पहात होते…. ते म्हणाले… ”आप बैठो… आपका तीसरा नंबर… आपके नाम में राम है.. आपको कुछ नहीं होगा!” त्याला वाटलं ज्या अर्थी डॉक्टर मला तिस-या क्रमांकावर बसवताहेत.. याचा अर्थ माझ्या जखमा गंभीर नाहीत… मी उगाच घाबरून गेलो होतो ! खरंच तसंच झालं होतं…. त्याच्या डोक्याला एक गोळी चाटून गेली होती ! डॉक्टरसाहेबांनी त्याला धीर नसता दिला तर तो कदाचित घाबरल्याने आणखीन गंभीर झाला असता!

– क्रमशः भाग दुसरा

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “गेले मीच उद्धरून…” – कवी : केशवानंद ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “गेले मीच उद्धरून…” – कवी : केशवानंद ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

एके दिवशी तुकोबा 

असे तीरावरी आले..

अन् इंद्रायणीलागी थोडे 

हसून म्हणाले…

*

तुला द्यायचीच होती 

माझी गाथा परतुन..

मग पहिल्याच दिशी,

दिली का न तू आणून?

*

उगा मला तिष्ठविले असे 

तुझिया काठाला

दिस चवदा असा तू माझा

अंत का पाहिला.. ?

*

बोले इंद्रायणी मग..

तुम्ही भक्तांचे भूषण

अशा जगाच्या गुरुचा 

अंत मी कसा पाहीन.. ?

*

ऐका तुकोबा..

कधीच कोणा कळली न मात..

काय घडले सांगते 

खोल माझिया डोहात..

*

अशी गाथा त्या दिवशी 

आली डोहाच्या तळाशी..

जणू कुबेराचे धन 

आले माझिया हाताशी..

*

असा अमृताचा घट 

येता सहजी चालून..

कोणी देईल का ??

थोडी चव घेतल्या वाचून ?

*

तशी गाथा अवचित 

माझ्या हाताला लागली..

सारे विसरून जग 

मीही वाचाया घेतली..

*

पुरे चवदा दिवस केले 

तिचे पारायण

आणि मगच तुकोबा..

दिली तुम्हा परतून.. !

*

तुम्ही आभाळाएव्हढे..

अंत मी काय पाहीन..

गाथा तारी जगताला 

तिला मी काय तारीन ?

*

सारे जग शुद्ध होते..

बुडी माझ्यात घेऊन..

गाथा वाचून तुमची 

गेले मीच उद्धरून

कवी : केशवानंद

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “संभाजी” – लेखक – श्री विश्वास पाटील – परिचय – श्री आदित्य पाटील ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “संभाजी” – लेखक – श्री विश्वास पाटील – परिचय – श्री आदित्य पाटील ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : संभाजी 

लेखक : श्री विश्वास पाटील  

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे 

पृष्ठ: ८६८  

मूल्य: ७९५ ₹

स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी राजे ह्यांचं आयुष्य एकूणच वादळ होतं. एका युगपुरुषांच्या पोटी जन्म घेऊन, जिजाऊमातासारख्या एका युगस्त्रीच्या सहवासात लहानाचे मोठे होणाऱ्या छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्याभोवती बदनामीची वलयं फिरत राहिली. राज्यकारभारयांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यातील हस्तक्षेप, गृहकलह‌, फंदफितुरी या युद्धाच्या आयुष्यात वादळासारख्या वावरत होत्या. वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचा मृत्यू, कोणत्या वयात बोट भरून चालला शिकवणाऱ्या आजीचा मृत्यू ह्यांसारखी असंख्य संकट पार करत शंभूराजांनी आपलं नाव इतिहासात अजरामर केलं.

विश्वास पाटील लिखित संभाजी ही कादंबरी खऱ्या अर्थाने संभाजीराजांच्या आयुष्याची सर्वांगांनी ओळख करून देते. अनेक इतिहासकार संभाजी राजांचे चरित्र मलीन करण्यात व्यस्त होते, अनेक लेखक यांना बदफैली ठरवत असताना अनेक सुजाण लेखक, इतिहासकारांनी संभाजी राजांच्या चरित्राला न्याय दिला. त्याचेच एक उदाहरण म्हणजे ही कादंबरी. शिवरायांच्या घरातील अंतर्गत वाद ते संभाजीराजांनी रणांगणी चौखूर नाचवलेला घोडा सगळंच वर्णन अगदी ओघवत्या आणि रसाळ भाषेत लेखक विश्वास पाटील यांनी केलं आहे.

छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या औरंगजेबाला संभाजीराजांनी एक किल्ला लढवण्यासाठी सहा ते सात वर्ष झुंज दिली. जंजिर्‍याच्या सिद्दीला धाकात ठेवलं, पोर्तुगीजांना पुरतं नेस्तनाबूत केलं. पण मराठ्यांच्या फंद फितुरीमुळे वैरयाने डाव साधला आणि संभाजी राजे इतिहासात अमर झाले.

एकूणच कादंबरी मोठी आहे परंतु वाचनाची आणि मनाची पकड इतिहास सहज घेते की अवघ्या पंधरा दिवसात मी कादंबरीचा फडशा पाडला. मात्र शेवटची शंभर-दीडशे पानं माझी नेत्रकडा कोरडी ठेवू शकली नाहीत.

सरतेशेवटी इतकेच सांगू इच्छितो – बदनामी बदफैलीच्या काळ्याकुट्ट ढगांनी कितीही झाकोळण्याचा प्रयत्न केला तरीही सुर्यरूपी शंभू चरित्र कायमच जनमानसांत प्रेरणारुपी प्रकाश देत राहील.

सर्व शिव शंभू भक्त आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने ही कादंबरी वाचायला हवी.

परिचय : आदित्य पाटील 

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 278 ☆ कथा – पीढ़ियां ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम विचारणीय कथा – ‘पीढ़ियां‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 278 ☆

☆ कथा-कहानी ☆ पीढ़ियां

शंभुनाथ की सारी योजना मांजी और बाबूजी के हठ की वजह से अधर में लटकी है। लड़की वाले पढ़े-लिखे समझदार हैं। समझाने से मान गये। उतनी दूर तक लाव-लश्कर लेकर जाना सिर्फ पैसे का धुआं करना था। लड़की का फूफा इसी शहर में रहता है। उसी की मार्फत बात हुई थी। शंभुनाथ वरपक्ष को समझाने में सफल हो गये कि लड़की वाले चार छः रिश्तेदारों के साथ यहीं आ जाएं और सादगी से शादी संपन्न हो जाए। ज़्यादा तामझाम की ज़रूरत नहीं। दो-चार दिन में रिसेप्शन हो जाए, जिसमें दोनों पक्ष के लोग शामिल हो जाएं। इस तरह जो पैसा बचे, उसे लड़का-लड़की के खाते में जमा कर दिया जाए।

शंभुनाथ का तर्क था कि आजकल बारातों में तीन दिन बर्बाद करने की किसी को फुर्सत नहीं। आज आदमी घंटे घंटे के हिसाब से जीता है। इतना टाइम बर्बाद करना और कष्टदायक  यात्रा में उन्हें ले जाना रिश्तेदारों की प्रति ज़ुल्म है।

लेकिन मां और बाबूजी सहमत नहीं होते। उनकी नज़र में शादी-ब्याह समाज को जोड़ने का बहाना है। रिश्ते नये होते हैं, उन पर बैठी धूल छंटती है, उन्हें नया जीवन मिलता है। जिन रिश्तेदारों से मिलना दुष्कर होता है, उनसे इसी बहाने भेंट हो जाती है। एक रिश्तेदार आता है तो उसके माध्यम से दस और रिश्तेदारों की कुशलता की खबर मिल जाती है। कई बार गलतफहमियां दूर करने का मौका भी मिल जाता है। पहले लोग लंबे पत्र लिखकर हाल-चाल दे देते थे। अब टेलीफोन की वजह से जानकारी का छोटा सा छोर ही हाथ में आता है। जितनी मिलती है उससे दस गुना ज़्यादा जानने की ललक रह जाती है। ज़्यादा बात करो तो खर्च की बात सामने आ जाती है।

शंभुनाथ का तर्क उल्टा है। उनके हिसाब से अब रिश्तों में कोई दम नहीं रहा। रिश्ते सिर्फ ढोये जाते हैं। अब किसी को किसी के पास दो मिनट बैठने की फुर्सत नहीं है। कोई दुनिया से उठ जाए तो रिश्तेदार रस्म-अदायगी के लिए दो-चार घंटे को आते हैं, फिर घूम कर अपनी दुनिया में गुम हो जाते हैं।

बाबूजी के गले के नीचे यह तर्क नहीं उतरता। उनका कहना है कि दुनिया के लोग अगर एक दूसरे से कटते जा रहे हैं तो ज़रूरी नहीं है कि हम उसी रंग में रंग जाएं। समझदार आदमियों का फर्ज़ है कि जितना  बन सके दुनिया को बिगड़ने से रोकें।

उधर मांजी का तर्क विचित्र है। उनके कानों में चौबीस घंटे ढोलक की थाप और बैंड की धुनें घूमती हैं। शादी-ब्याह के मौके चार लोगों को जोड़ने और दिल का गुबार निकालने के मौके होते हैं। उनके हिसाब से सब रिश्तेदारों को चार-छ: दिन पहले इकट्ठा हो जाना चाहिए और चार-छः दिन बाद तक रुकना चाहिए। फिर जो बहुत नज़दीक के लोग हैं वे एकाध महीने रहकर सुख-दुख की बातें करें। पन्द्रह-बीस दिन तक घर में गीत गूंजें। युवा लड़के लड़कियों के जवान चेहरे देखने का सुख मिले और चिड़ियों की तरह सारे वक्त बच्चों की किलकारियां गूंजती रहें। युवाओं की बढ़ती लंबाई और वृद्धों के चेहरे की बढ़ती झुर्रियों का हिसाब- किताब हो।

मांजी की लिस्ट में कुछ ऐसी महिलाएं हैं जिनका आना हर उत्सव में अनिवार्य है, यद्यपि  शंभुनाथ के हिसाब से वे गैरज़रूरी हैं। इनमें सबसे ऊपर कानपुर वाली बुआ हैं जिनसे रिश्ता निकट का नहीं है लेकिन जो नाचने और गाने में माहिर हैं। उनके आने से सारे वक्त उत्सव का माहौल बना रहता है। दूसरी सुल्तानपुर वाली चाची हैं जो भंडार संभालने में अपना सानी नहीं रखतीं। एक और मिर्जापुर वाली दीदी हैं जो पाक-कला में  निपुण हैं।वे आ गयीं तो समझो खाने पीने की फिक्र ख़त्म। मांजी  की नज़र में इन सबको बुलाये बिना काम नहीं चलेगा। शंभुनाथ का कहना है कि अब शहर में पैसा फेंकने पर मिनटों में हर काम होता है, इसलिए रिश्तेदारी ज़्यादा पसारने का कोई अर्थ नहीं है। रिश्तेदार दो दिन के काम के लिए आएगा तो बीस दिन टिका रहेगा।

बाबूजी की लिस्ट में भी कुछ नाम हैं। एक नाम चांद सिंह का है जो साफा बांधने में एक्सपर्ट है। अब बिलासपुर में नौकरी करता है लेकिन उसे नहीं बुलाएंगे तो बुरा मान जाएगा। अब तक परिवार की हर शादी में उसे ज़रूर बुलाया जाता रहा है। एक  रामजीलाल हैं जो मेहमाननवाज़ी की कला में दक्ष हैं। टेढ़े से टेढ़े मेहमान को संभालना उनके लिए चुटकियों का काम है। शंभुनाथ बाबूजी के सुझावों को सुनकर बाल नोंचने लगते हैं।

मांजी के लिए नृत्य-गीत, शोर-शराबे, हंसी-ठहाकोंऔर और गहमा-गहमी के बिना शादी में रस नहीं आता। मेला न जुड़े तो शादी का मज़ा क्या? उनकी नज़र में शादी सिर्फ वर-वधू का निजी मामला नहीं है, वह एक सामाजिक कार्यक्रम है। वर-वधू के बहाने बहुत से लोगों को जुड़ने का अवसर मिलता है।

बाबूजी और मांजी बैठकर उन दिनों की याद करते हैं जब बारातें तीन-तीन दिन तक रूकती थीं और बारातों के आने से पूरे कस्बे में उत्सव का वातावरण बन जाता था। तब टेंट हाउस नहीं होते थे। दूसरे घरों से खाटें और बर्तन मांग लिये जाते थे और कस्बे के लोगों के सहयोग से सब काम निपट जाता था। अब दूसरे घरों से सामान मंगाने में हेठी मानी जाती है। अब लोग इस बात पर गर्व करने लगे हैं कि उन्हें किसी चीज़ के लिए दूसरों के सामने हाथ नहीं फैलाना पड़ता। बाबूजी कहते हैं कि समाज पर निर्भरता को पर-निर्भरता मान लेना सामाजिक विकृति का प्रमाण है।

मांजी और बाबूजी को समझाने में अपने को असफल पाकर शंभुनाथ ने अपने दोनों भाइयों को बुला लिया है।

पहले उन दोनों को समझा बुझाकर  तैयार किया, फिर तीनों भाई तैयारी के साथ पिता- माता के सामने पेश हुए। नयी तालीम और नयी तहज़ीब के लोगों के सशक्त, चतुर तर्क हैं जिनके सामने मांजी, बाबूजी कमज़ोर पड़ते जाते हैं। वैसे भी मां-बाप सन्तान से पराजित होते ही हैं। अन्त में मांजी और बाबूजी चुप्पी साध गये। मौनं सम्मति लक्षणं।

यह तय हो गया कि शादी बिना ज़्यादा टीम-टाम के होगी। सूचना सबको दी जाएगी। जो आ सके, आ जाए। सारा कार्यक्रम एक-दो दिन का होगा। उससे ज़्यादा ठहरने की किसी को ज़रूरत नहीं होगी। शंभुनाथ का छोटा बेटा तरुण इस चर्चा से उत्साहित होकर सुझाव दे डालता है— ‘जिसको न बुलाना हो उसको देर से कार्ड भेजो। आजकल यह खूब चलता है।’ उसके पापा और दोनों चाचा उसकी इस दुनियादारी पर खुश और गर्वित हो जाते हैं।

बाबूजी और मांजी अब चुप हैं। निर्णय की डोर उनके हाथों से खिसक कर बेटों के हाथ में चली गयी है। इस नयी व्यवस्था में कानपुर वाली बुआ, सुल्तानपुर वाली चाची, मिर्जापुर वाली दीदी, चांद सिंह और रामजीलाल के लिए जगह नहीं है। इन सब की जगह यंत्र-मानवों ने  ले ली है जो आते हैं, काम करते हैं और भुगतान लेकर ग़ायब हो जाते हैं।

बाबूजी चुप बैठे खिड़की से बाहर देखते हैं। उन्हें लगता है दुनिया तेज़ी से छोटी हो रही है। लगता है बहुत से चेहरे अब कभी देखने को नहीं मिलेंगे। उन्हें अचानक बेहद अकेलापन महसूस होने लगता है। माथे पर आये पसीने को पोंछते वे घबरा कर खड़े हो जाते हैं।

छोटा बेटा उन्हें अस्थिर देखकर पूछता है, ‘क्या हुआ बाबूजी? तबीयत खराब है क्या?’ बाबूजी संक्षिप्त उत्तर देते हैं, ‘हमारी तबीयत ठीक है बेटा, तुम अपनी फिक्र करो।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ – लघुकथा – अनजान प्रदेश – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे।

आज प्रस्तुत है आपकी एक कहानी के पीछे की अप्रतिम विचारणीय लघुकथा “– अनजान प्रदेश –” ।

~ मॉरिशस से ~

☆ कथा कहानी  ☆ — अनजान प्रदेश — ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

एक जहाज समुद्र में कहीं खो गया था। उसमें दो सौ यात्री थे। व्यापक रूप से खोज की जा रही थी, लेकिन जहाज का कहीं पता चलता नहीं था। इतनी बड़ी घटना का कोई गवाह न होना दुख को और बढ़ाता था। गवाह का प्रसंग होने से लोगों का ध्यान एक पक्षी पर जाता था। लोग जब भी खोज के लिए समुद्र में जाते थे उन्हें वह पक्षी दिखाई देता था। पक्षी खोज में लगे हुए लोगों की बड़ी सी नाव के ऊपर उड़ने का इतना अभ्यस्त हो गया था कि नाव के मस्तूल पर आ बैठता था। दंत कथा के हिसाब से अर्थ बनाएँ तो वह अर्थ इस तरह से होता वह पक्षी लोगों के साथ खोज कार्य में सहयोगी था।

पक्षी के साथ संपर्क गाढ़ा होते जाने की प्रक्रिया में उन लोगों को लगता था वह कुछ बोलना चाहता है। पर उसकी भाषा तो उसकी अपनी थी जिसे समझ पाना किसी के वश में होता नहीं था। यदि पक्षी लुप्त जहाज से संबंधित किसी घटना का जिक्र करना चाहता हो तो लोगों को बड़ा कुतूहल होता था। वे आपस में तय करते थे उन्हें पक्षी की भाषा के मर्म तक पहुँचना होगा। दो – चार बार नाव से यहाँ आने पर कुछ लोगों ने कहा उन्होंने पक्षी की भाषा कुछ – कुछ सीख ली। अब वह दिन दूर नहीं जब पक्षी की पूरी भाषा अपनी समझ में आने लगेगी।

वे लोग दो – चार दिन से अधिक खोज के लिए जाने वाले नहीं थे। उस पक्षी का आकर्षण हुआ कि दो – तीन दिन की उनकी सीमा टूट गयी और वे समुद्र में इस तरह से बार – बार जाने लगे कि खोया हुआ जहाज मिलने पर ही उनके खोज – कार्य में विराम लगेगा। पर यह जोश हुआ तो उस पक्षी के बल पर। वे समूह में इतने लोग थे और पक्षी अकेला था। उन्हें किसी कोण से थोड़ा आतंक भी महसूस हुआ। समुद्र में दो सौ लोग एक जहाज में लापता हुए थे और एक पक्षी मानो उतने लोगों का प्रतिनिधित्व करता था।

आतंक से ही यह छन कर आया कि अपनी भाषा के रहते पक्षी की भाषा में समर्पित होना तो बहुत ही दूरंदेशी सोच का परिणाम है। उन्होंने आपस में तय किया खोज – कार्य में अब अंकुश लगाते हैं। उन्होंने तालियाँ बजा कर अंकुश का समर्थन किया। पक्षी की भाषा कुछ – कुछ सीख लेने का जो लोग दावा करते थे अब उस दावे को छोड़ा। वे तट पर लौटे। उन लोगों की भाषा कमोबेश एक ही तरह से हुई — वहाँ मानो पक्षी का ‘समुद्र’ था और यहाँ इन लोगों की अपनी ‘जमीन’ थी।

— समाप्त  —

© श्री रामदेव धुरंधर

28 — 02 — 2025

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares