( श्री प्रह्लाद नारायण माथुर जी अजमेर राजस्थान के निवासी हैं तथा ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी से उप प्रबंधक पद से सेवानिवृत्त हुए हैं। आपकी दो पुस्तकें सफर रिश्तों का तथा मृग तृष्णा काव्य संग्रह प्रकाशित हो चुकी हैं तथा दो पुस्तकें शीघ्र प्रकाश्य । आज से प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा जिसे आप प्रति बुधवार आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता वक्त कभी रुकता नहीं )
Amazon India(paperback and Kindle) Link: >>> मृग तृष्णा
☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 14 – वक्त कभी रुकता नहीं ☆
जीवन वक्त के पीछे चलता है, वक्त कभी रुकता नहीं,
हम वक्त को नजरअंदाज करते है वक्त कभी नजरअंदाज करता नही ||
जीवन-चक्र वक्त का गुलाम है, वक्त कभी टूटता नही,
मत करो नजरअंदाज वक्त को,वक्त कभी वापिस लौट कर आता नहीं ||
दिन रात चलता है वक्त, वक्त घड़ी देखकर चलता नहीं,
चकते-चलते जीवन रुक जाता है मगर वक्त कभी रुकता नहीं ||
हिम्मत हारने से कुछ नहीं होता, वक्त के साथ हम चलते नहीं,
ये हमारी फिदरत है वक्त के भरोसे रह जिंदगी में कुछ करते नही ||
हम भले बुरे में वक्त का बंटवारा करते, वक्त कभी कुछ कहता नहीं,
अच्छा बुरा वक्त हमारी सोच है, वक्त अपना बंटवारा करता नहीं ||
वक्त के संग जिंदगी गुजार ले, वक्त जिंदगी के लिए रुकता नहीं,
जिंदगी झुक जाएगी वक्त के आगे, वक्त जिंदगी के आगे कभी झुकता नहीं ||
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में एक समसामयिक विषय पर आधारित विचारणीय कविता कोरोना। सुश्री प्रभा जी ने इस कविता के माध्यम से वैश्विक महामारी पर गंभीर विमर्श किया है। आज इस वाइरस के कारण मानवजाति के अस्तित्व पर प्रश्नचिन्ह लग गया है। मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे। आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
लेखन – कविता लेखन, कथाव इतर.-दिवाळी अंक, प्रातिनिधिक संग्रह.
पुरस्कार/अलंकरण – (1) निसर्ग मित्र शिक्षक पुरस्कार-०१० (2) रविकिरण सेवाश्री पुरस्कार–२०११ (3) युवाशक्ति सामाजिक संस्था नाशिक. आदर्श शिक्षक पुरस्कार-२०११ (4) सांगली जिल्हा काँग्रेस सेवादल, आदर्श शिक्षक पुरस्कार-२०११ (5) महाराष्ट हरितसेना सदस्य-२०१७ (6) समीक्षक. म्हणून. म.रा मा.उच्च.मा. शिक्षण मंडळ,पुणे,५. इ.१०वी साठी (7) ग्रीन ओलम्पियाड परीक्षा उत्तम नियोजक म्हणून सन्मानित (नवी दिल्ली)-२०१७ (8) स्वाध्याय पुस्तक लेखन इ.१०वी.पुणे बोर्ड (9) राज्यस्तरिय ,जिल्हास्तरिय तज्ज्ञ मार्गदर्शक मराठी विषय (10) नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली,वेस्ट कल्चरल झोन आयोजित सांगली निर्मितीक्षम नाट्य प्रशिक्षण (11) नेपथ्य आणि प्रकाश योजना, कार्यशाळा उपस्थित, अखिल भारतीय नाट्यशास्त्र विद्यामंदिर समिती, सांगली-२००६ (12) समाजरत्न साहित्य पुरस्कार-२०१८ सम्राट फौडेशन, सांगली (13) उत्कृष्ट काव्य लेखन,रंगीत काव्यधारा साहित्य मंच, वासिम-२०१८ (14) साहित्यसेवा साहित्य समुहातर्फे लीनाक्षरी पुरस्कार व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक, माहूरगड, नांदेड-२०१९ (15) कविभूषण पुरस्कार, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव २०१९, नांदेड (16) अनेक काव्य स्पर्धेत परीक्षक (17) अर्धांगी कविता संग्रहासाठी प्रस्तावना लेखन (18)काव्यस्पंदन संस्थेचा महाराष्ट्र भूषण,नवरत्न पुरस्कार पुणे
☆ कवितेचा उत्सव ☆ बाल कामगार! ☆ श्री मुबारक बाबू उमराणी ☆
☆ जीवनरंग : लघुकथा – जमाना ☆ श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆
शेजारच्या घरून कशाचा तरी आवाज आला. सर्वांनी ऐकला. एक -दुसर्याकडे साशंक नजरेनी पाहीलं. परंतु पुढच्याच क्षणी सगळे आपापल्या कामांत गुंतले. फक्त एक दादू सोडून. दादू बेचैन होऊन गेले. शेवटी आपल्या जागेवरून उठले आणि बाहेर गेट कडे जायला निघाले तर मुलगा अनुलोम विचारू लागला, ‘‘बाबा, कुठे निघालात?’’
दादूंनी आवाजाच्या देशेने आपले बोट दाखविले.
‘‘तिकड़े काही नाही आहे …. तुम्ही बसा आपल्या जागी.’’
थोड्या वेळानी पुन: शेजारुन आवाज! वाटलं जसं कोणी आलमारी तोडत आहे ! दादू पुन्हा हबकले. इकडे-तिकडे बघायला लागले. सर्व आपाल्या कामात मशगूल. आवाजं येत राहीला. कधी भांडे पडण्याचा, तर कधी तोड़-फोड़ होत असल्याचा. दादू बेचैन होत राहीले.
दुसर्या दिवशी सकाळी शेजारी परत आले तर त्यांना घराचे कुलुप तुटलेले दिसले. आंत प्रवेश केल्यावर घरांत चोरी झाल्याचे ध्यानांत आले. पोलीस आलेत. शेजार म्हणून अनुलोम कडे ही विचारपुस व्हायला लागली.
‘‘तुम्ही लोकं काही सांगू शकता काय?’’
‘‘नाही सर, आम्हाला ही आजच कळले. वाटतय कोणीतरी चोर असावा…’’
‘‘तुम्ही काही आवाज वगैरे ऐकला किवा संशय येईल असे कोणी…?’’
‘‘जी, आम्ही कांहीच सांगू शकत नाही. आम्ही सर्व उशिरापर्यंत टी. वी. बघत होतो. कोणीच काही आवाज वगैरे ऐकला नाही…’’
अनुलोम उत्तरं देत होता. हॉल मधे एकीकडे बसलेले दादू वारंवार खुर्चीवरून उठू पाहत होते.
पोलीस परतले. अनुलोम हातात एक गोळी आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन दादू जवळ आला. गोळी दादू च्या हाथावर ठेवत म्हणाला, ‘‘फक्त गोळ्या खात राहिल्यानी बी. पी. कमी होणार नाही आहे. तुम्ही आपली ही सवय सोडा. आता जमाना पूर्वीसारखा राहीला नाही.’’
उषा शाळेतून बाहेर पडली तेव्हां दोन वाजायला आले होते. ऊन रणरणत होतं. तशी शाळा घरापासून जवळच होती. पण आज तिला थकल्यासारखं वाटत होतं
तीन वर्षांपूर्वी ती नोकरीला लागली. शाळा म्हणजे बालवाडीच होती. पगारही बेताचाच होता पण तिथं तिचा वेळ चांगला जात होता. आता दोन्ही मुली मोठ्या झाल्या होत्या मोठीचं तर लग्नही झालं होतं. धाकटी नोकरीला लागली होती. त्यातून अरूण घरी नेहमी उशीरा येत असे.उषाला घर खायला उठू लागलं. तिच्या मनानं उचल खाल्ली. अधूनमधून भाजीला जाताना तिनं ती शाळा पाहिली होती. एक दिवस धाडस करुन ती आत गेली.आणि नोकरीसाठी अर्ज देऊन आली. आश्र्चर्य म्हणजे महिन्याभरात नोकरी मिळूनही गेली. शाळेत बायकांबरोबर ती रमली. एकमैकींच्या सुखदु:खात त्या वाटेकरी झाल्या.
विचारांच्या नादात उषा घरी पोहोचली. फ्लॅटचं कुलूप काढून आत जाताच बरं वाटलं. हातपाय धुवून तिनं ताट वाढून घेतलं. पण जेवावसं वाटेना.सारखा सुमाचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. रोज दोघी शेजारी बसत.गेले काही दिवस सुमा अस्वस्थ होती. आज द़ोघीच असताना उषा तिला म्हणाली ” सुमा,काही होतंय का गं?”
” छे! गं , कुठं काय?”
उषा तिच्या पाठीवर हात ठेवत बोलली, “तू नेहमी सारखी वाटत नाहीस. चेहरा बघ किती उतरलाय तुझा .”
त्यासरशी सुमा हुंदके देत रडायला लागली. तिनं जे सांगितलं ते ऐकून उषाला धक्काच बसला. सुमाच्या नवऱ्यानं दुसऱ्या एका बाईशी लग्न केलं होतं. आणि सुमाला सरळ घराबाहेर काढलं होतं. तात्पुरती ती एका नातेवाईकांकडे रहात होती. पण पुढे काय हा प्रश्र्न आहे वासून उभा होता. कोर्टात जाण्याएवढं आर्थिक आणि मानसिक बळही नव्हतं.
आता जेवताना उषाला ते सारं आठवत होतं. अरुणनं आपल्यालाही असंच घराबाहेर जा म्हणलं तर असा विचार मनात येऊन ती हादरली. गेली काही वर्षं अरुण अलिप्तपणे वागतोय असं तिला सतत वाटत होतं. एकदा धाडस करून तिनं त्याच्या आॅफिसात महिन्यापूर्वी चौकशी केली. आॅफिसमधल्याच एका अविवाहितेसोबत …….सारा प्रकार कळताच उषाच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. अरुणला याबाबत जाब विचारण्यासाठी ती संधीची वाट बघत होतो.पण आज सुमाची हकिगत ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. अरुणला जाब विचारला आणि तो घराबाहेर जा म्हणला तर कुठं जाणार आपण!बाहेरचं सगळं वखवखलेलं जग अंगावर येईल.या घरात केव्हढी सुरक्षितता आहे.संसाराच्या या सुरक्षित चौकटीसाठी किती बायका असे अन्याय निमूटपणे सोसत असतील. आणि तीही आता सोसत राहणार आहे.उषानं असह्हायपणे डोकं टेबलावर टेकून अश्रुंना वाट करुन दिली.
माझ्या समोर खिडकीत आंब्याचं झाड आहे. ३५/४० वर्षे जुनं. इतकी वर्षे त्याला मी बघते आहे. त्याची सारी भाषा मला कळते. मी तेंव्हा दोन रोपं लावली.. शेजारी शेजारी!
एकाच वाफ्यात बरं.. हेतू हा की एक तरी जगावं. मला वाटलं मी खूप शहाणी….! एक जगेल.. एक मरेल …? कदाचित…
अहो ते काय माणूस आहे विश्वासघात करायला…? झाडं जास्त शहाणी निघाली. त्यांनी माझी फजिती केली. दोन्ही बिया रूजल्या. कोण आनंद झाला मला….!
तशी मी निसर्ग वेडीच आहे.. सारा निसर्गच माझ्याशी बोलतो.
अंगणात खूप फुलझाडं लावली होती मी.. दोन्ही कोया फुटल्या. लाल चुटूक पाने वर बघू लागली. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.दिसामासी मी त्याच्याकडे बघत असे. ती बिचारी निसर्ग नियमाने वाढत होती. एकाच वाफ्यात दोन कोया ! खरंतर मी त्यांच्यावर अन्यायचं केला होता.
शेजारी शेजारी दोन झाडे जोमात कशी वाढतील ? माझ्याकडून चूक झाली होती.
मग एक जोमात नि एक हळूहळू वाढू लागले. मोठे डेरेदार… नि छाटे बारकुटले…!
मध्येच मला वाटले, शेजारीच तर आहेत, बांधून टाकू.. एकजीव होतील. मनात यायचा अवकाश नि घेतली दोरी नि टाकले बांधून… पण ते कसले वस्ताद.. !
बागेत झेंडू खूऽऽऽऽऽऽप बहरला होता… कमरे एवढे एक एक झाडं… पिवळ्या लाल फुलांनी मुसमुसणारे…नजरेचे पारणं फिटावं असा कधी न पाहिलेला झेंडूचा बहार… लोक यायचे नि चकित व्हायचे…
हं तर काय…? आंबे ना ? बांधले होते… पण….? त्यांनी स्वतंत्र अस्तित्व ठेवलं… ठीक आहे, वाढा बाबांनो तुम्हाला पाहिजे तसे… मोठे झाले पण… आंबे काही येईनात… पुन्हा माझ्या जीवाची घालमेल….! आणि एका हिवाळ्यात मोहोर आलाच.. झाडे म्हणजे साधू संतच.. सर्व ताप सहन करून जगाची चिंता करणारे…ब्र न काढता सोसणारे जटाधारी साधूच…! माणसांची व झाडांची दिसामासी वाढ होते. संस्कारांचे खतपाणी माणसांनाही मिळतेच.. पण किती माणसात ते मुरते..? आणि कितीकांत विरून जाते…!
पण झाडांना द्या न द्या..त्यांची देण्याची वृत्ती अभूतपूर्व.. अनाकलनीय आहे. मारा.. तोडा.. छाटा… देतांना सर्वांना न्याय सारखांच… दात्याला नि दुष्टाला सारखाच न्याय… सारखीच सावली…खरेच, रोज आपल्या बरोबरीनेच वाढणाऱ्या झाडांचा गुण आपण घेतला तर……..!
हं… तर.. मोहोरा बरोबर फांद्यांना…?
अहो..घोसच्या घोस लागले…खरंच घोस लटकले…हिरवेगार आंबे वाढू लागले पण पिवळे काही होईनात…? साईजही छोटी गावठी आंब्याचीच.. अंदाजाने उतरवले. खूप गोड नव्हते..ते घोस पाहूनच एव्हढी खूष होते की मला काही वाटले नाही… हळू हळू समज वाढत गेली. काय करावे ?
हं… कलम करावे कां… झाले.. मनात विचार आला नि कार्यवाही सुरू.. माझा भाचा योगेश कृषी खात्यात नोकरीला आहे..
बोलावले… योगेश कलम करायचे का झाडांवर… ? योगेशने हापूस, सिंधू. रत्ना केसर च्या काड्या आणून कलम करायचे ठरवले… पण त्या साठी आपण हाता पायाची नखं काढतो , केस कापतो तसे काही छाटणीचे संस्कार करावे लागणार होते ते केले… म्हणाला, आता डिऱ्या फुटतील, करंगळी एवढ्या जाड झाल्या की कलम बांधू… मी पहात होते.. डिऱ्या फुटल्या.. जाड झाल्या नि मग एक कलम तज्ञ बोलवून दोन्ही झाडांवर कलमं बांधली… मोठे मजेशिर दिसत होते दोघे… पट्ट्या लावलेले जखमेबहादूर… मग ठरल्या प्रमाणे निवडक काड्यांची ती कलमे रूजली काही मेली पण ८० टक्के जगली…सर्जरी यशस्वी झाली…!
आता मात्र दोघेही जोमात…बरोबरीनेच वाढू लागले..डेरेदार भरगच्च.. नि हिरवीगार.. व्वा.. आणि तुम्हाला खरं सांगते… माझ्या आंब्या सारखा मधूर,रसाळ आंबा बाजारात मिळत नाही.. एक एक आंबा अर्धा किलोचा.. एका किलोत फक्त तीनचं….जून मध्ये मोजकेच १००/२०० आंबे निघतात. पहिला पाड पडला की मी उतरवून घेते नि… माझे नातलग, नोकर चाकर सर्वांना वानवळा पाठवते… पक्षी पोपट वटवाधळेही आंबे खातात नि मी तृप्त मनाने त्यांच्याकडे बघते. हो.. पहिला वाटा त्यांचाच.. मग आपला.. पूर्ण जून जुलै आमची आमरस पुरणपोळी पुऱ्यांची मेजवानी चालते..दररोज चपाती बरोबर खातोच… मी तर लहानपणी खाल्लेल्या रस शेवयाच खाते… अहाहा…काय मजा येते नुसत्या गिळायला… एकदा खाऊन पहाच.. मग कळेल मी काय म्हणते ते… उन्हाळयात आंबे नातवंडांवर सावली धरून असतात.. मुले मनसोक्त अंगणात खेळतात… किती कृतज्ञता व्यक्त करावी त्यांच्या विषयी…! मला नेहमी वाटतं आपण झाडां सारखं वागायचं ठरवलं तर…… जगात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही… नक्कीच… हो ना… तुम्हालाही असंच वाटतं ना….
लहानपणापासून मी इतकेदा हा शब्दप्रयोग ऐकलाय की माझी समजूत होती तो एक बहुमानच आहे.
साधारण ५ वीत असताना मी एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. झकास पाठांतर केले होते. पण नेमके स्पर्धेच्या दिवशी इतका ताप आला की घरी झोपूनच रहावे लागले. संध्याकाळी जागी झाले तर आई कुणाला तरी सांगत होती “तापामध्ये सगळे भाषण म्हणत होती. हौस फेडून घेतली.”
गॅदरिंग च्या नाचामध्ये भाग घ्यायची कोण हौस ! पण माझ्या उंची आणि जाडीमुळं सोळा जणींच्या ग्रुप डान्समध्ये सोळावा नंबर माझा. बहुदा मला नाचही नीट येत नसावा. पण हौस ना! नाच झाल्यावर बाई म्हणाल्या, ” नाचायची हौस फिटली ना एकदा छान झाले. ”
कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र मी एकदम चिडीचूप झाले. मोठी मुलं मुली पाहून घाबरूनच होते. मात्र स्टडीटूर मुळे माझी फिरण्या ची हौस भागली. किटकशास्त्र विषय असल्यामुळे जंगलामध्ये रात्रीच्या वेळी फिरून किडे गोळा करायला फिरायला मिळाले. मुख्य काम मुलेच करायची. आम्ही मुली दबकत दबकत एकमेकींचा हात धरून टॉर्चच्या उजेडामध्ये भटकंती केली आणि हौस भागवून घेतली.
लग्न झाल्यानंतर स्वप्नांचा हौसेचा झोका डळमळीत झाला. पण अशी कच खाणारी नव्हते मुळी मी. काही वर्षांनी ट्यूशन घेण्याची माझी हौस भागवायला मी सुरु केली. दोनचार मुले आली तरीत्यांना शिकवायचेच असा चंग बांधला. बारावीचे दोन भाऊ जीवशास्त्र शिकण्यासाठी माझ्याकडे येऊ लागले. मी मनापासून ज्ञानदानाचे काम करत होते. अचानक दोघांचे येणे थांबले. १५ दिवसांनी माझे स्टुडण्टस् हजर! इतके दिवस न येण्याचे कारणमी विचारले. ” मॅडम, आजी, बाबांची आई गेली. ”
त्यानंतर काही दिवसांनी मुलांचे वडिल अभ्यासाची चवकशी करायला आले. मी सांगितले “मध्यंतरी पंधरा दिवस गेलेना, आता करतील”. ते म्हणाले, ” कसले १५ दिवस गेले?” .. मी म्हंटले, “अहो, मुलांची आजी गेली म्हणून त्यांनी सांगितल” ताडकन उठत आश्चर्याने आणि संतापाने ते म्हणाले, ” काय सांगता? माझ्या आईला घालवलं कार्ट्यांनी ? चांगलं फोडूनच काढतो आता ss” म्हणून रागाने निघून गेले. एकूण माझ्या ट्यूशनची हौस फिटली.
आता मात्र मी घरीच असते. साठी बुद्धी नाठी न होऊ देता मस्त रहाते. कोरोनाने तर आता घरीच बसवले आहे. तरी माझी एक हौस मी फेडून घेते आहे. कशाची? प्रश्न पडला ना? सांगते! रोज काहीना काही खमंग ‘चमचमीत’ गरमागरम पदार्थ करायचा अन् यथेच्छ ताव मारायचा एकदा तिखट एकदा गोड ! त्याचा परिणाम मला परवा दिसला. परवा सहज घराच्या पुढच्या दाराशी उभी होते. तर मला जाणवलं, मी आख्खी या दारामधून बाहेर जाऊ शकत नाही. आतामात्र माझी खाण्याची हौस फिटली हं !
हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
अध्याय १७
(आहार, यज्ञ, तप और दान के पृथक-पृथक भेद)
(ॐ तत्सत्के प्रयोग की व्याख्या)
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः।
प्रवर्तन्ते विधानोक्तः सततं ब्रह्मवादिनाम्।।24।।
ब्रह्मवादी इससे ही सब ‘ओम‘ का कर उच्चार
यज्ञ, दान, तप, कर्म का करते हैं व्यवहार ।।24।।
भावार्थ : इसलिए वेद-मन्त्रों का उच्चारण करने वाले श्रेष्ठ पुरुषों की शास्त्र विधि से नियत यज्ञ, दान और तपरूप क्रियाएँ सदा ‘ॐ’ इस परमात्मा के नाम को उच्चारण करके ही आरम्भ होती हैं।।24।।
Therefore, with the utterance of “Om” are the acts of gift, sacrifice and austerity as enjoined in the scriptures always begun by the students of Brahman.।।24।।
प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं राजभाषा दिवस के अवसर पर आपके अप्रतिम दोहे । )
(सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी सुप्रसिद्ध हिन्दी एवं अङ्ग्रेज़ी की साहित्यकार हैं। आप अंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय /प्रादेशिक स्तर के कई पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं । हम आपकी रचनाओं को अपने पाठकों से साझा करते हुए अत्यंत गौरवान्वित अनुभव कर रहे हैं। सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार शीर्षक से प्रत्येक मंगलवार को हम उनकी एक कविता आपसे साझा करने का प्रयास करेंगे। आप वर्तमान में एडिशनल डिविजनल रेलवे मैनेजर, पुणे हैं। आपका कार्यालय, जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है।आपकी प्रिय विधा कवितायें हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण रचना “ सबको जाना ही है”। )
आप निम्न लिंक पर क्लिक कर सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी के यूट्यूब चैनल पर उनकी रचनाओं के संसार से रूबरू हो सकते हैं –