हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 59 – देश-परदेश – COVID Returns ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “COVID Returns” की अगली कड़ी।)

☆ आलेख # 59 ☆ देश-परदेश – COVID Returns ☆ श्री राकेश कुमार ☆

इससे पहले कि बॉलीवुड का कोई फिल्म निर्माता इस नाम से अपनी फिल्म का टाइटल रजिस्टर्ड करवाए, हम अपना लेख सुरक्षित कर लेना चाहते हैं।

हमारे देश में विगत तीन दिन से गूगल में कोविड के पुराने वायरल वीडियो सबसे अधिक डाउनलोड किए गए हैं। व्हाट्स ऐप/मुखग्रंथ और क्या ट्विटर ऐसे मैसेजों की सुनामी आ गई है।

राई का पहाड़ बनाने में हमारे देशवासियों का पूरे विश्व में कोई सानी नहीं है। शायद यूएनओ ने भी इसको मान लिया होगा।

हमने भी इस बाबत युद्ध स्तर पर तैयारी आरंभ करते हुए नाक/मुंह छिपाने वाले मास्क के पुराने स्टॉक की खोजबीन में पाया बहुत सारे मास्क तो जूते साफ करने में कार्यरत हैं, और कुछ एक दूसरे से जोड़कर कपड़े सुखाने की रस्सी का रोल निभा रहे हैं।

कमांडो कार्यवाही करते हुए रस्सी को खोलकर कुछ मास्क तो पुनः उपयोग लायक कर लिए गए हैं।

हैंड सैनिटाइजर नामक तरल पदार्थ की प्लास्टिक बॉटल में सरसों का तेल भरा हुआ मिला, जाड़े के मौसम में सीमित उपलब्ध साधनों से अधिकतम सदुपयोग करने में भी भारतीय नारी का कोई जवाब नहीं हैं।

काढ़ा बनाने में लगने वाला कच्चे मॉल के भावों में वृद्धि आसमान छू चुकी हैं। सब्जी मंडी से अदरक ऐसे गायब हो गई है, जैसे गधे के सिर से सींग चले गए थे।

बैंक से पेंशन लोन उठाकर तीन माह का अग्रिम राशन से भी घर भर दिया है,ताकि लॉक डाउन की स्थिति में भूखे  ना रहना पड़ जाए।

घर के पास में एक छोटा सा नर्सिंग होम है, कोविड की प्रथम और द्वितीय लहर के समय उसने पास के एक और मकान को किराए पर लेकर एक्सटेंशन काउंटर खोल कर मोटी रकम हज़म कर ली थी।

नर्सिंग होम के मालिक ने पुनः उस मकान मालिक से किराए पर मकान ले लिया है। इसको अंग्रेजी  में प्रोएक्टिव संज्ञा से नवाजा जाता है। कार्यालयों में भी प्रोएक्टिव कर्मचारियों की बड़ी मांग रहती है। किसी भी कार्य में सफलता प्राप्त करने के लिए इस प्रकार की योग्यता का होना आवश्यक होता है, इसी के तहत अपने समूह के लिए कोविड वापसी की तैयारी का लेख प्रेषित कर रहा हूँ।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान)

मोबाईल 9920832096

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आधार छत्रीचा… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आधार छत्रीचा… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

टिपावे थेंब पाण्याचे घुमे गंधार छत्रीचा

कुठे ऐकायला येई कसा ओंकार छत्रीचा

असावे ऊन टळटळते ढगांची पालखी नाही

जपाया देह उघड्यावर मिळे आधार छत्रीचा

प्रियेला भेटण्यासाठी नसावा एक आडोसा

जरासे ओठ लपवाया खरा संस्कार छत्रीचा

मुलांची पाहता वदने कळाले माय बापाला

सरावा पावसाळा अन् उगा हा भार छत्रीचा

कुणाला लाभते छत्री छताचे मोलही कळते

कुठे वृद्धाश्रमी छ्त्री सुना व्यवहार छत्रीचा

अम्हाला काळजी नाही सुखी वृद्धाश्रमी दोघे

कधी झुकणार ना आम्ही असे निर्धार छत्रीचा

छतावाचून घरट्याची करावी कल्पना नुसती

कडी कुलुपाविना दारे असे उपकार छत्रीचा

गझलनंदा

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #213 ☆ चप्पल… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 213 ?

☆ चप्पल… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

ही चप्पल पायामधली, बघ काय सांगते आहे

तू रुबाबात फिरताना, ती धूळ चाटते आहे

ती झिजते तुझ्याचसाठी, तू डोंगर चढतो तेव्हा

तू कोचावर बसता ती, दारात थांबते आहे

ती असता नवीन कोरी, तो पसंत करतो तिजला

मापातच असल्यानंतर, ती त्यास भावते आहे

पायात घालण्यापुरती, ही किंमत आहे माझी

का उसवत गेल्यावरती, मी धाप टाकते आहे

तो नवी घेऊन आला, तेव्हाच जाणले मीही

तो टाळत जातो मजला, मी त्यास टाळते आहे


या माझ्या अस्तित्वाला, किंमत कुठलीही नाही

पाहून वेग मी त्याचा, वेगात चालते आहे

मी कोल्हापुरची राणी, बहुमान वाटला होता

पायाची दासी झाले, तो धर्म पाळते आहे

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राॅबर्ट फ्राॅस्ट यांच्या कवितेचे शताब्दी वर्ष -२०२२ ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

श्री सुबोध अनंत जोशी

परिचय:

शिक्षण – एम्.ए., एम्.फील.

निवृत्त उपप्राचार्य, निवृत्त असोसिएट प्रोफेसर,इंग्रजी विभाग ,मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.

एम्.फील साठी यु.जी.सी. ची संशोधन  शिष्यवृत्ती.

संशोधक  व विद्यार्थी उपयुक्त  पुस्तके:

  1. A comparative study of Robert ब्राउनिंग and Diwakar
  2. Literary perceptions

संपादन:

  1. गोपुर दिवाळी अंक 1980
  2. झेप- गौरवग्रंथ 2003
  3. संवेदना – अनाथ मुलांमुलींवरील
  4. कथासंग्रह  1984

लेखमालिका :

  1. भारतीय स्वातंत्र्य वीरांनी तुरुंगातून  लिहीलेली पत्रे
  2. प्रेरणादायी पुस्तके

वृत्तपत्रे, मासिके यांतून नियमित लेखन-कथा, कविता, पुस्तक परिचय  इत्यादी.

विद्यापीठ अनुदान मंडळ संमत दोन संशोधन प्रकल्प पूर्ण.

विविध संशोधन नियतकालिकांतून संशोधन निबंध प्रकाशित.

?  विविधा ?

☆ राॅबर्ट फ्राॅस्ट यांच्या कवितेचे शताब्दी वर्ष -२०२२ ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

Stopping by Woods on a Snowy Evening. (1922.)

राॅबर्ट फ्राॅस्ट यांच्या कवितेचे शताब्दी वर्ष -२०२२.-त्या निमित्त:

रॉबर्ट फ्रॉस्ट(१८७४-१९६३) हा अमेरिकन कवी,परंतु त्यांच्या कविता प्रथम इंग्लंडमध्ये प्रकाशित झाल्या.  निसर्ग वर्णन,अमेरिकन बोलीभाषेचा वापर, ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे चित्र ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. ज्यावेळी औद्योगीकरणाला सुरुवात झाली होती, त्याचवेळी रॉबर्ट फ्राॅस्ट लिहीत होते. तरी देखील औद्योगिक शहराबद्दल, आयुष्याबद्दल  त्यांनी  फारसं लिहीलं नाही. त्यांच्या बऱ्याच कविता स्मरणरंजन विषयक(sweet nostalgia)  आहेत.The Road not taken,Birches,Mending Wall, Nothing Gold can Stay, Stopping by Woods on a Snowy Evening या त्यांच्या लोकप्रिय कविता होत.New Hampshire या काव्यसंग्रहासाठी त्यांना पुलिट्झर प्राईझ मिळाले होते.

Stopping by Woods on a Snowy Evening ही चार कडव्याची चिमुकली कविता आहे.या कवितेचे अनेक अर्थ, अन्वयार्थ काव्य समीक्षकांनी सांगितले आहेत आणि ते साहजिक आहे .कारण एखाद्या सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कवितेची चिकित्सा अनेक जण अनेक प्रकाराने करतात. खरे तर, प्रत्येकाने स्वतंत्र बुद्धीने स्वतंत्र दृष्टीने ही कविता समजून घ्यावी.

ही एक साधीसुधी भावकविता आहे.  निवेदक  आपला एक छोटा अनुभव सांगतो आहे. तो घोडागाडीतून जंगलातून जात आहे आणि त्याला पहिला प्रश्न पडतो” हे कोणाच्या मालकीचे जंगल आहे ? ” त्या जंगलाचा मालक निवेदकाच्या परिचयाचा असावा.म्हणून तो सांगतो की त्या मालकाचे घर गावात आहे आणि  तो इथे थांबला आहे हे त्या मालकाला माहीत होणार नाही. पुढच्या ओळीत निवेदक सांगतो की ते जंगल बर्फाने भरून जात आहे  आणि ते बर्फाळलेले जंगल पाहण्यासाठीच कवीला तेथे थांबावे असे वाटत आहे.इथे सृष्टिसौंदर्य एवढे मंत्रमुग्ध करणारे आहे की थोडा वेळ तरी तेथे थांबून ते सौंदर्य न्याहाळावेसे कवीला वाटते.

दुसऱ्या कडव्यात आपण थांबल्याबद्दल आपल्या घोड्याला काय वाटलं असेल याची तो कल्पना करतो.(निवेदक घोडागाडीतून प्रवास करत आहे.) कोणतेही शेतघर जवळ नाही. असं असलं तरी गोठून गेलेलं तळं आणि जंगल यामध्ये आपण त्या अंधारलेल्या संध्याकाळी थांबलोय हे त्या घोड्याला चमत्कारीक वाटत असणार  अशी तो कल्पना करतो.खरे तर हे सर्व कवीच्या मनातलेच विचार आहेत.घोड्याच्या माध्यमातून तो आपल्या भावना वाचकांपर्यंत पोचवितो.

तिसऱ्या कडव्यात निवेदक सांगतो  की घोडा मान हलवतो आणि तिथे लावलेल्या घंटीची किणकिण होते.निवेदकाची कल्पना अशी की मान हलवून घोडा विचारतो आहे की तिथे अवेळी, संध्याकाळी जंगलाजवळच्या वाटेवर थांबणं चुकीचं तर नाही ना?  या ध्वनीव्यतिरिक्त दुसरा ध्वनी तेथे उमटत असतो तो म्हणजे वाऱ्याच्या झोताचा आणि बर्फवृष्टीचा. कवीची अशी ही दोन मने आहेत. एक मन त्याला तिथे थांबायला सांगते, तिथल्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घ्यायला सांगते आणि दुसरे मन हे घोड्याच्या मनात काय चालले आहे अशी कल्पना करून त्याचे मन त्याला तिथे न थांबण्याचा सल्ला देत असते. त्याच्या मनाची स्थिती काहीशी अशी द्विधा झालेली आहे.परतु अशी दोलायमान अवस्था फार वेळ राहणे शक्य नसते. नंतरच्या, चौथ्या आणि शेवटच्या कडव्यात कवी ठामपणे सांगतो की जंगल सुंदर, घनदाट,अंधारं आहे, परंतु  मला मी दिलेल्या वचनांची पूर्तता  करायची आहे.झोपण्यापूर्वी कितीतरी अंतर मला  पार करायचे आहे.

The woods are lovely,dark and deep

But I have promises to keep

And miles to go before I sleep

And miles to go before I sleep.

तिथे न थांबता पुढे जाण्याचा आणि  आपल्या इप्सितस्थळी जाण्याचा निर्धार कवीने व्यक्त केला आहे आणि तोच त्याचा अंतिम निर्णय आहे असे  त्यानं केलेल्या पुनरूक्तीवरून स्पष्ट होते.

But I have promises to keep ही ओळ समुद्रात अचानक एखादी मोठी लाट उचंबळून यावी तशी येते आणि या ओळीपासून मूड बदलतो. आता ही निसर्गकविता रहात नाही. ही एकच ओळ अशी आहे की त्यात शंभर टक्के भौतिक, व्यवहारिक गरजेची निकड स्पष्ट केली आहे.बाकीचे शब्द आणि शब्दप्रयोग प्रतिमांच्या रूपात वापरलेले आहेत.Promises to keep हा खूप अर्थघन शब्दप्रयोग आहे.व्यवहारी जगात माणूस वचनबद्ध  असतो. कुटुंब,समाज,देश अशा अनेक घटकांशी आपली बांधिलकी असते.कौटुंबिक, सामाजिक,कायदेशीर, नैतिक अशा कित्येक नियमांचे पालन आपल्याला करावे लागते.ही वचनबद्धता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असते.त्यासाठी खूप कांहीं करावे लागते.खूप संघर्ष करावा लागतो.विसावा घ्यायचा तो नंतरच.किंबहुना,आपला मृत्यू ही झोप असे मानले तर मृत्यूपूर्वी आपली कर्तव्ये पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.”कर्मण्येवाधिकारस्ते” हाच तो संदेश आहे आणि या संदेशामुळेच या चार ओळी  जगप्रसिद्ध झाल्या आहेत . यशस्वी आयुष्याचे सूत्र या ओळीमध्ये आहे. कवितेचा हा ध्वन्यार्थ  आपल्या मनावर गारुड करतो. वाच्यार्थ एवढाच होता की सुंदर जंगल पहात थांबावं वाटतं पण तसं केलं तर झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचता येणार नाही.वाच्यार्थापेक्षा ध्वन्यार्थातला  उदात्त संदेश आपल्या मनाला खूप भावतो.

या संदेशामुळेच ही कविता कित्येक वर्षे शालेय विद्यार्थ्यांपासून जगप्रसिद्ध व्यक्तीपर्यंत सर्व थरातील वाचकांना आवडत आली आहे. निसर्ग कविता म्हणून  या कवितेकडे पाहता येते.निसर्गातील सौंदर्य woods, snow अशा प्रतीकातून, तर भयाची जाणीव dark, deep अशा प्रतीकात्मक शब्दातून कवी व्यक्त करतो.निसर्गातले सौंदर्य आणि त्याला जोडून येणारी किंचित् भयाची जाणीव यामधून अचानक उसळी घेते स्वकर्तव्याची जाणीव.यामुळेच And miles to go before I sleep या ओळीबरोबर  ही कविता फक्त निसर्ग कविता रहात नाही.  प्रौढ वाचक  या कवितेतील  संदेश आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात. कर्तव्यपूर्ती हे लक्ष्य असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या  भारतीय नेत्याला हा संदेश मृत्यूपूर्वी आपल्या टेबलावरील कागदावर लिहून ठेवावा असे वाटणे साहजिकच आहे.

एक रचना (structure) म्हणून देखील या कवितेचा अभ्यास करता येईल. Mcleish या समीक्षकाने कवितेने कांहीही सांगू  नये, ती एक रचना असावी,असे म्हटले आहे.(A poem should not mean but be) एक रचना म्हणून या कवितेचा असल्यास केला तर असे दिसेल की या कवितेत रुबायतचा Stanza form आणि डॅन्टे या इटालियन कवीच्या कवितेतील terza Rima वापरून नाविन्यपूर्ण काव्यरचना केली आहे.

कवितेत निवेदक स्वतःशीच बोलतो आहे म्हणजे एक प्रकारे हे स्वगतच आहे आणि ते स्वगत कुजबूज या स्वरूपातले. त्यामुळेच त्याचे शब्द संभाषणात्मक आहेत. सॅम्युअल कोलरीजने कवितेची व्याख्या A lyrical, linguistic shorthand अशी केली आहे.ही कविता तशीच आहे.भावमधुर आणि अल्पाक्षरी.काहींच्या मते ही संपूर्ण कविता म्हणजे जीवनमृत्यूचे  रूपक आहे . बर्फाने भरलेले जंगल म्हणजेच मृत्यू आणि घोडा गाडी म्हणजे आयुष्य अशी कल्पना केली आहे.कवितेतील प्रेरणादायी संदेश मनाला सर्वात जास्त भावतो. यामुळेच काव्य म्हणजे जीवनाचे भाष्य(Poetry is the criticism of life) ही मॅथ्यू अर्नोल्ड यांनी केलेली काव्याची व्याख्या  या कवितेला चपखलपणे लागू पडते.

१९२२ या वर्षी राॅबर्ट फ्राॅस्ट यांनी लिहिलेल्या, Stopping by Woods on a Snowy Evening या कवितेला  २०२२ साली  शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.एवढे मार्गक्रमण करूनही ही चिमुकली कविता काव्यरसिकांच्या मनात घर करून राहिली आहे.जीवनाचे सूत्र सांगणा-या अशा कविता स्थलकालातीत असतात हे खरे!

ले. सुबोध अनंत जोशी

सांगली

मो 9423661068.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग २ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग २ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले  –  ‘शंभर तर पन्नासपेक्षा जास्त आहेत ना,’ हमीदने विचारले.  ‘कुठे पन्नास आणि कुठे शंभर? पन्नास तर एका थैलीतच मावतात. शंभर दोन थैल्यातसुद्धा मावणार नाहीत!’  – आता इथून पुढे)

आता वस्ती दाट होऊ लागलीय. इदगाह (मुसलमानांचे नमाज पढायचे मोकळे मैदान)ला जाणार्‍यांचे वेगवेगळे समूह दृष्टीला पडताहेत. एकापेक्षा एक भडक वस्त्र त्यांनी परिधान केली आहेत. कोणी एक्क्यावरून , टांग्यातून येताहेत. कुणी मोटारीतून येताहेत. सगळ्यांनी अत्तर लावलय. सगळ्यांच्या मनात हर्ष आहे. आनंद आहे. ग्रामीण बालकांचा हा छोटासा  गट आपल्या विपन्नतेच्या बाबतीत अजाण आहे. संतोष आणि धैर्य यात मग्न होऊन तो पुढे चालत होता. मुलांसाठी नगरातल्या अनेक गोष्टी नवीन होत्या. जिकडे बघत, तिकडे बघतच रहात. मागून वारंवार हॉर्न वाजला , तरी तिकडे त्यांचं लक्षच नसायचं. हमीद तर एकदा मोटारीखाली येतायेताच वाचला.

एवढ्यात इदगाह नजरेस पडला. वर चिंचेच्या मोठ्या वृक्षाची घनदाट छाया. खाली पक्की फारशी घातलेली. त्यावर जाजम टाकलेलं. रोजा (उपास) करणार्‍याच्या ओळी, एकामागून एक किती लांबर्यंत गेल्या आहेत. अगदी पक्क्या जागेच्याही पलीकडे. तिथे तर जाजमही नाही आहे. मागून येणारे मागच्या बाजूला ओळीत उभे आहेत. पुढे जागा नाही. या ग्रामिणांनीही नमाज पढण्यापूर्वी हात-पाय धुतले आहेत आणि मागच्या ओळीत उभे आहेत. किती सुंदर संचलन आहे. किती सुंदर व्यवस्था. लाखो मस्तकं एकाचा वेळी गुढगे मोडून नमस्कारासाठी  झुकताहेत. मग सगळेच्या सगळे उभे रहातात. पुन्हा एक साथ झुकतात. मग आपल्या गुढग्यांवर बसतात. किती तरी वेळा हीच क्रिया होते. असं वाटतं विजेचे लाखो दिवे एकाच वेळी प्रदीप्त झालेत आणि एकाच वेळी विझलेत आणि हाच क्रम चालू आहे. किती अपूर्व दृश्य होतं ते. या सामूहिक क्रिया, विस्तार, आणि अनंतता, हृदयाला श्रद्धा, गर्व आणि आत्मानंदाने भरून टाकत होत्या. जणू बंधुभावाच्या एका सूत्रात, या सगळ्या आत्म्यांना एका माळेत ओवून टाकलय.

नमाज पढून झालीय. लोक आता आपापसात एकमेकांना मिठ्या मारताहेत. आलिंगन देताहेत. मग मिठाई आणि खेळण्यांच्या दुकानाकडे धाव घेतली जाते. ग्रामिणांचं दलही मुलांपेक्षा काही कमी उत्साही नाही. हा बघा फिरता पाळणा. एक पैसा देऊन चढून बसा. कधी आसमानात जातोयसं वाटेल. कधी जमीनीवर पडतोयसं. हे चक्र आहे. लाकडाचे हत्ती, घोडे, उंट छड्यांना लटकलेले आहेत. एक पैसा द्या आणि पंचवीस चक्रांची मजा अनुभवा. महमूद, मोहसीन, नूरे, आणि सम्मी सगळे या उंट घोड्यांवर बसताहेत. हमीद दूर उभा आहे. त्याच्याजवळ तीनच पैसे आहेत. आपल्या खजिन्याचा तिसरा हिस्सा, तो थोड्याशा चकरा घेण्यासाठी नाही देऊ शकत.

सगळे चक्रावरून उतरले. आता खेळणी घ्यायची. किती तर्‍हेची खेळणी आहेत. शिपाई आहे. गवळण आहे. राजा आहे. वकील आहे. पाणी देणारा पाखालवाला पाणक्या, धोबीण, साधू, आणखी किती तरी खेळणी ….. सुंदर सुंदर खेळणी आहेत. महमूद शिपाई घेतो. त्याने खाकी वर्दी, लाल पगडी घातलीय आणि खांद्यावर बंदूक आहे. असं वाटतय, की आत्ता कवायतीला निघालाय. पाणक्याने पखालीचं तोंड हाताने धरून ठेवलय. किती प्रसन्न दिसतोय. नूरेला वकिलाबद्दल प्रेम आहे. किती विद्वत्ता झळकतेय त्याच्या तोंडावर. काळा कोट, त्याखाली सफेद अचकन, अचकनच्या पुढे खिशात घडयाळ, त्याची सोनेरी साखळी आणि एका हातात कायद्याचे पुस्तक. असं वाटतय, एवढ्यातच न्यायालयातून उलटतपासणी घेऊन किंवा खटल्यात आशिलाची बाजू मांडून येतोय. ही सगळी दोन दोन पैशांची खेळणी आहेत. हमीदजवळ फक्त तीन पैसे आहेत. इतकी महाग खेळणी  तो कशी घेऊ शकेल? खेळणी हातातून पडली, तर मोडून जातील. थोडंसं पाणी पडलं, तर रंग धुऊन जाईल. असली खेळणी घेऊन तो काय करणार? काय उपयोग मग त्यांचा?

मोहसीन म्हणाला, ‘ माझा पाणक्या सकाळ-संध्याकाळ पाणी देईल.’

महामूद म्हणाला, ‘माझा शिपाई घराचा पहारा करील. कुणी चोर आला, तर बंदुकीच्या फैर्‍या झाडील.’

नूरे म्हणाला, ‘ माझा वकील खूप खटले लढेल.’

सम्मी म्हणाला, ‘ माझी धोबीण रोज कपडे धुवेल.’

हमीद खेळण्यांना नावे ठेवू लागला. ‘मातीची तर आहेत. पडली तर चक्काचूर होऊन जातील.’ तो असं म्हणाला खरं, पण लालचावलेल्या डोळ्यांनी खेळण्यांकडे बघतही होता. ती काही काळ हातात घेऊन बघावी, असंही त्याला वाटतय. अभावितपणे हात पुढेही करतोय. पण मुलं इतकीही त्यागी नाहीत. विशेषत: खेळणी इतकी नवी नवी असताना. हमीदची लालसा तशीच रहातेय.

खेळण्यानंतर मिठाईची दुकाने लगातात. कुणी रेवडी घेतलीय. कुणी गुलाबजाम. कुणी सोहन हलवा. सगळे मजेत खाताहेत. हमीद त्यांच्या टोळी पासून वेगळा आहे. बिचार्‍याजवळ फक्त तीन पैसे आहेत. काही घेऊन खात का नाही? लालचावलेल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे बघतो आहे.

मोहसीन म्हणतोय, ‘हमीद रेवडी घे. किती मस्त आहे बघ. ‘

हमीदला संशय येतोय, ही केवळ क्रूर थट्टा आहे. मोहसीन काही इतका उदार नाही. तरीही तो अभावितपणे त्याच्याकडे जातो. मोहसीन पुड्यातून एक रेवडी काढून हमीदच्या दिशेने हात पुढे करतो. हमीद हात पसरतो. मोहसीन रेवडी आपल्या तोंडात टाकतो. महमूद, नूरे, सम्मी टाळ्या वाजवाजवून खूप हसतात. हमीद खजील होतो.

मोहसीन म्हणतो, ‘आता या वेळी नक्की देईन. अल्लाह कसम घे.’

हमीद म्हणतो ‘ठेव तुझ्याकडे. माझ्याकडे काय पैसे नाहीत?

सम्मी म्हणतो, ‘तीन पैसे तर आहेत. त्यात काय काय घेणार?’

त्यावर महमूद  म्हणतो, ‘माझ्याकडून  गुलाबजाम घे. हमीद मोहसीन बदमाश आहे.’

हमीद  म्हणतो, ‘मिठाई काही खूप चांगली गोष्ट नाही. त्यामुळे काय काय अपाय होतात, याबद्दल पुस्तकात खूप लिहिलंय. ‘त्यावर मोहसीन म्हणतो, ‘ पण मनात म्हणतच असणार, मिळाली तर खावी.’

त्यावर महमूदचं म्हणणं असं की, ‘याची चलाखी लक्षात येतेय, जेव्हा आपले सगळे पैसे खर्च होतील, तेव्हा हा काहीतरी घेईल आणि आपल्याला टूक टुक करत खाईल.’

मिठाईनंतर काही लोखंडाच्या वस्तूंची दुकानं लागतात. काही गिलिटाच्या आणि नकली दागिन्यांची दुकाने लागतात. मुलांना काही याचं आकर्षण नाही. ते सगळे पुढे जातात. हमीद लोखंडाच्या वस्तूंच्या दुकानाशी थांबतो. तिथे खूपसे चिमटे ठेवलेले आहेत. त्याला आठवतं दादीजवळ चिमटा नाही. तव्यावरून  रोटया काढते, तेव्हा हात भाजतो. जर त्याने चिमटा घेऊन दिला, तर तिला केवढा आनंद होईल. मग तिची बोटं भाजणार नाहीत. घरात एक कामाची वस्तू येईल. खेळण्याचा काय फायदा? उगीचच पैसे खर्च होतात. थोडा वेळ खूश होतात. नंतर तिकडे कुणी डोळे वर करून बघतसुद्धा आही. घरी जाताच तुटतील. फुटतील. किंवा जी लहान मुले जत्रेला आली नाहीत, ती जिद्दीनं ओढून घेतील आणि या ओढाताणीत खेळणी फुटतील. चिमटा किती कामाचा आहे. रोटया तव्यावरून काढा. चुलीत शेका . कुणी विस्तव मागायला आलं, तर झटपट निखारा चुलीतून काढूनं त्याला द्या. अम्माला कुठे फुरसत आहे की बाजारात जाऊन चिमटा आणावा आणि इतके पैसे तरी मिळतात कुठे? रोज बिचारी हात भाजून घेते.

ईदगाह  क्रमश: भाग २ 

मूळ हिंदी  कथा 👉 ‘ईदगाह…’ – मूळ लेखक – मुंशी प्रेमचंद 

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विश्वरूप दर्शनाचे दोन परिणाम ! — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

??

विश्वरूप दर्शनाचे दोन परिणाम !  भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

कुरूक्षेत्राच्या मध्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला संपूर्ण गीता सांगितली. तरी अर्जुनाच्या मनात काही शंका बाकी होत्या. शेवटी कृष्णाने अर्जुनाला आपले विराट विश्वरूप दाखवले. या विश्वरूपासमोर मात्र अर्जुनाचे उरलेसुरले सर्व अहंकार गळून पडले. तो श्रीकृष्णाला पूर्णपणे शरण गेला. त्यानंतर अर्जुन केवळ श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार वागला. शेवटी म्हणतात ना, ‘चमत्काराला नमस्कार असतो !’

खरे तर श्रीकृष्णाने अर्जुनाआधी आणखी एका व्यक्तीला आपल्या विश्वरूपाचे दर्शन दिले होते. 

चक्रवर्ती सम्राट पांडूच्या अकाली मृत्यूनंतर त्याची मुले मोठी होईपर्यंत हस्तिनापूराचे राज्य धृतराष्ट्राला विश्वस्त म्हणून सांभाळायला दिले गेले होते. पण युधिष्ठिराचा अभिषेक करायची वेळ आल्यावर कौरवांनी वारणावताच्या लाक्षागृहात पांडव आणि कुंतीच्या हत्येचा प्रयत्न केला. विदुराच्या सल्ल्यानुसार ते तात्पुरते भूमिगत झाल्यावर घाईघाईने दुर्योधनाचा युवराज म्हणून अभिषेक केला गेला. द्रौपदीच्या स्वयंवरात पांडवांचे खरे रूप समोर येऊन पांडव हस्तिनापूरला परत आल्यावर पांडूचे राज्य त्यांना परत देण्याऐवजी राज्याच्या वाटण्या केल्या गेल्या. अर्ध्या राज्याच्या नावावर पांडवांना खांडववनासारखी बंजर भूमी दिली गेली. पांडवांनी त्यातही नंदनवन फुलवले. राजसूय यज्ञात पांडवांना मिळालेले यश पाहून असुयेने आंधळा झालेल्या दुर्योधनाने धूर्त शकुनीच्या सांगण्यावरून कपटी द्यूतक्रिडेचे आयोजन केले. द्युतक्रिडेदरम्यान पांडव बंधूंचे घोर अपमान झाले. सर्वात मोठा अधर्म म्हणजे भर सभेत द्रौपदीची विटंबना झाली. त्यानंतर पांडवांना वनवासात धाडले गेले. पांडवांचा बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास संपल्यावरही पांडवांनी स्वकष्टाने उभे केलेले इंद्रप्रस्थाचे राज्य दुर्योधन त्यांना परत करण्याची लक्षणे दिसेनात. कौरवांनी केलेले हे सर्व अधर्म पांडव विसरलेले नव्हते. पांडव स्वतः प्रचंड शूर होते. पांडवांना सासरचा म्हणजे पांचाळनरेश द्रुपदाचा आधार होता. आता मत्स्यराज विराटही त्यांचे व्याही झालेले होते. साक्षात श्रीकृष्ण त्यांच्यामागे खंबीरपणे उभा होता. त्यात कौरवांकडून पांडवांचे इंद्रप्रस्थ परत न देण्याचा आडमुठेपणा केला गेला. युद्धाचे ढग दाटू लागले. 

श्रीकृष्णाने तोपर्यंत केलेल्या अलौकिक कामांमुळे लोक एव्हाना त्याला परमेश्वर म्हणू लागले होते. कौरव-पांडव युद्ध हे केवळ इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूरात होणार नव्हते, तर भारतातील बहुतेक राजे दोन्हीपैकी एक पक्ष निवडून युद्धात सामील होणार होते. या युद्धाच्या व्याप्तीमुळे लाखो लोक मारले जाणार होते. फक्त श्रीकृष्णाच्या अंगी युद्ध टाळण्याची शक्ती होती. भीष्म, द्रोण, विदूर आणि धृतराष्ट्र यांच्यासारखे ज्येष्ठ कौरव श्रीकृष्णाला देवासमान मानत त्याचा प्रचंड आदर करत होते. पांडव तर कधीच श्रीकृष्णाचे भक्त झालेले होते. दोन्ही पक्षांना समजावून सांगून युद्ध टाळण्याची क्षमता फक्त श्रीकृष्णात होती. पण श्रीकृष्णाने आता काही हालचाल केली नसती तर ‘अंगी क्षमता असूनही युद्धातील रक्तपात टाळला नाही’ असा बोल समाजाने त्याला लावला असता. तसेच सरळमार्गी पांडवांना, खास करून युधिष्ठिराला, कौरव किती आडमुठे आहेत हेही दाखवून देणे गरजेचे होते. त्यामुळे युद्ध टाळण्यासाठीचा शेवटचा प्रयत्न म्हणून श्रीकृष्ण शांती प्रस्ताव घेवून हस्तिनापूरला गेला. भीष्म, द्रोण, आणि कृपाचार्यांसारख्या महानुभावांनी श्रीकृष्णाचे हस्तिनापुरात यथासांग स्वागत केले. हस्तिनापूरच्या दरबारात श्रीकृष्णाने शांती प्रस्ताव मांडला. पांडव द्युतसभेत झालेले सर्व अपमान विसरून कौरवांशी सख्य करतील. बदल्यात कौरवांनी ठरल्या- -प्रमाणे पांडवांचे इंद्रप्रस्थचे राज्य त्यांना परत करावे अशी मागणी श्रीकृष्णाने केली. पण दुर्योधन इंद्रप्रस्थचे राज्य परत करायला अजिबात तयार नव्हता. श्रीकृष्णाने दरबाराला हर त-हेने धर्म काय हे समजावून सांगितले. पण दुर्योधनाच्या हट्टासमोर कुणाचेच काही चालले नाही. त्यावर श्रीकृष्णाने दरबाराला अजून एक प्रस्ताव दिला. हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ या दोन साम्राज्यातील केवळ पाच गावे पांडवांना दिली तरी युद्ध आणि रक्तपात टळेल असे श्रीकृष्णाने दरबाराला सुचवले. यावर दुर्योधनाने ते प्रसिद्ध उद्गार काढले, “सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमीही पांडवांना मिळणार नाही.” 

यावर श्रीकृष्ण ठामपणे म्हटला, “आता मात्र अहंकाराचा आणि अधर्माचा कळस झाला. आता युद्ध आणि कुरूकुलाचा नाश अटळ आहे.”  यानंतर श्रीकृष्णाने मूर्ख दुर्योधनाच्या अहंकाराला, त्या अहंकारातून निर्माण होणाऱ्या त्याच्या महत्वाकांक्षांना , आणि त्या महत्वाकांक्षापुढे अगतिक होऊन दुर्योधन करत असलेल्या अधर्माला आवर न घातल्याबद्दल संपूर्ण दरबाराला बोल लावला. 

– क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्या भल्या मोठ्या लष्करी विमानाचा महाकाय दरवाजा उघडला. कॅप्टन समरपालसिंग ‘८, राजपुताना रायफल्स’च्या योद्ध्यांची तुकडी घेऊन याच विमानाने दक्षिण सुदान देशात निघाले होते….. संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय शांतिसेनेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी.  

२०११ मध्ये सैन्यात अधिकारी म्हणून भरती झाल्याबरोबर पहिल्याच वर्षी समरपालसिंग साहेबांना सियाचीन मध्ये कर्तव्याची संधी मिळाली होती. आणि त्यानंतर केवळ दोनच वर्षांत त्यांना आंतरराष्ट्रीय शांतिसेनेत भारतीय तुकडीचे प्रमुख म्हणून नेमणूक मिळाली होती. तसा हा एक मोठा बहुमानच!

आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून समरपाल सिंग सैन्यात दाखल झाले होते. समरपाल या नावाचा एक अर्थ आहे युद्धाने किंवा युद्धभूमीने संगोपन केलेलं बालक, अर्थातच लढवय्या! आणि दुसरा अर्थ आहे युद्धगीत! एका योद्ध्याला हे नाव किती शोभून दिसते!

दक्षिण सुदान! जगाच्या पाठीवरील सर्वांत नवा अधिकृत देश! त्यांची निम्मी लोकसंख्या तिशीच्या आतली आहे. ९ जुलै, २०११ रोजी हा देश अस्तित्वात आला आणि १३ जुलै, २०११ रोजी या देशाला सार्वभौम देश म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली. 

सुदानचा इतिहास तसा खूपच रक्तरंजित आहे. इथे आणि एकूणच आफ्रिकेत विविध जमातींच्या टोळ्यांचे राज्य आहे. जगातील अगदीच अविकसित राष्ट्रे या भागात जगतात. जंगल, जनावरे यांच्यावर उपजिविका असते. काही ठिकाणी तेलाचे साठे, खनिज संपत्तीही आहे

परंतू सामान्य लोकांचे पोट जनावरांचे मांस, दूध यांवर जास्त अवलंबून आहे. त्यांच्या उपजिविकेसाठी अनिवार्य असलेल्या जनावरांसाठी गवताची कुरणं आणि पाणी यांसाठी या टोळ्या एकमेकांशी भिडतात. शिवाय चालीरीती, वंशश्रेष्ठत्व या भावना आहेतच. अज्ञान, अंधश्रद्धा, गरीबी, रोगराई मोठ्या प्रमाणात आहे. 

प्रत्येक टोळी हिंसेच्याच जंगली मार्गाने जगत असते. यात आजवर लाखो माणसं कीडामुंगीसारखी मेली आहेत, मुले अनाथ झाली आहेत. भुकेने कहर केला आहे आणि मानवी देहावर गिधाडे, जंगली श्वापदे तुटून पडताना दिसतात. परिस्थिती आपल्या आकलनापलीकडे भयावह आहे! 

सुदानमध्ये तशा अनेक टोळ्या आहेत. परंतू डिंका आणि नुअर या टोळ्या मोठ्या आहेत आणि शस्त्रसज्ज आहेत. त्यात डिंका जास्त शक्तिशाली मानली जाते. जगातील अनेक भागांतून इथे चोरट्या मार्गाने शस्त्रे पाठवली जातात. अगदी आठ-दहा वर्षांच्या पोराच्या हातात एके-४७ सारखी घातक शस्त्रे असतात‌ त्या पोरांच्या स्वत:च्या उंचीएवढी या हत्यारांची उंची आणि वजन असते.

हल्ल्यासाठी जाताना हे सर्व अतिरेकी दारूच्या, अंमली पदार्थांच्या नशेत धुंद असतात. एका टोळीने दुसऱ्या टोळीतील गावांवर सशस्त्र हल्ला चढवायचा, लुटायचं, संपत्ती बळकवायची, जाळपोळ, बलात्कार आणि नरसंहार करायचा…. आणि लहान मुलांचे अपहरण करायचे. ही अपहृत बालके आपली म्हणून सांभाळायची… त्यामुळे टोळीची लोकसंख्या वाढते म्हणून! ‘नरेची केली किती हीन नर…’ या उक्तीची जिवंत प्रचिती म्हणजे यांचा संघर्ष! 

पण जगाची सुरक्षितता, मानवता या दृष्टीकोनातून जगाला या संघर्षापासून स्वत:ला अलिप्त ठेवता येत नाही. म्हणून या संघर्षरत भागांत संयुक्त राष्ट्रसंघाचे सैन्य शांततारक्षणासाठी पाठवले जाते. या शांतिसेनेत भारताचा वाटा खूप मोठा आहे. भारतीय सैन्य आपले सर्वोत्तम अधिकारी आणि जवान आफ्रिकेत पाठवते. जागतिक पातळीवरील सामरिक आणि राजनैतिक समीकरणासाठी हा त्याग अत्यावश्यक ठरतोच शिवाय नैतिक कर्तव्याच्या परिभाषेतही या कृतीचा समावेश होतो. म्हणून आजवर भारतीय सैनिकांनी या मोहिमांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे भाग घेतला असून पाकिस्तान, चीन या शत्रूंशी लढताना दाखवलेलं शौर्य तिथेही दाखवण्यात कसूर केलेली नाही. 

दोन संघर्षरत टोळ्यांमधील संघर्ष थांबवणे आणि इतर मानवतावादी कार्यात हातभार लावणे हे मुख्य काम असते या सेनेचे. परंतू दुर्दैवाने ज्यांच्या रक्षणासाठी हे शूरवीर तिथे तैनात असतात त्यांच्यावरच तिथले राक्षसी टोळीवाले प्राणांतिक हल्ले करतात आणि या वीरांचे बळी जातात! 

त्यादिवशी भारतात उतरलेल्या त्या लष्करी विमानातूनच आपले सैनिक दक्षिण सुदानकडे समरपालसिंग साहेबांच्या नेतृत्वात झेपावणार होते. पण या दिवशी समरपाल साहेबांकडे आणखी एक जबाबदारी दिली गेली होती…… दक्षिण सुदानवरून आलेलं अतिशय महत्त्वाचे काही सन्मानाने ताब्यात घेणे! 

कोणत्याही भारतीय खांद्यांना पृथ्वीपेक्षाही जड होतील अशा लाकडी पेट्या….. एक भारतीय लष्करी अधिकारी आणि चार लष्करी जवानांच्या शवपेट्या! ज्या विमानातून या शवपेट्या आल्या आणि जेथून या शवपेट्या आल्या… त्याच विमानातून त्याच ठिकाणी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी ८, राजपुताना रायफल्सचे शेकडो जवान निघालेले होते… शिस्तीत, एका रांगेत आणि शस्त्रसज्ज! 

डिसेंबर, २०१३. लेफ्टनंट कर्नल महिपालसिंग राठौर हे त्यावेळी शांतिसेनेच्या तुकडीतील भारतीय सैन्याचे नेतृत्व करीत होते. महिपालसिंग साहेबांचा तेथील कार्यकाल समाप्त होत आलेला असतानाच त्यांना आणखी एक महिना कर्तव्यावर राहण्याचा आदेश मिळाला होता. अफ्रिकन बंडखोरांबरोबर एका आठवड्यापूर्वी झालेल्या चकमकीत ते थोडक्यात बचावले होते. 

आणि आज…. त्यांच्या समवेत असलेल्या आणि जंगलातून जात असलेल्या ३२ सैनिकांचा समावेश असलेल्या वाहनताफ्यावर २०० सशस्त्र अतिरेक्यांच्या टोळीने अचानक मोठा हल्ला चढवला! तुफान गोळीबार होत असताना महिपालसिंग साहेबांनी आणि सोबतच्या भारतीय जवानांनी प्रतिकारास आरंभ केला. साहेबांनी एक दोन नव्हे तर तब्बल बारा अतिरेकी ठार मारले! साहेब रायफल मधील मॅगझीन बदलत असताना त्यांच्यावर अगदी समोरून अतिरेक्याने गोळ्या झाडल्या, त्यातील काही साहेबांच्या छातीत उजव्या बाजूने घुसून बाहेर पडल्या. त्यांच्यापासून केवळ तीस मीटर्सच्या अंतरावरील नर्सिंग असिस्टंट त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत साहेबांची जीवनज्योत त्या परकीय युद्धभूमीवर मालवली होती. 

महिपालसिंग साहेबांनी कारगिल संघर्षातही मर्दुमकी गाजवली होती. साहेबांसमवेत असलेले नायब सुबेदार शिवकुमार पाल, हवालदार हिरालाल, हवालदार भरत सिंग आणि शिपाई नंदकिशोर हे सुद्धा वीरगतीस प्राप्त झाले! 

महिपालसिंग साहेबांचा एक मुलगा पुढे एन.डी.ए. मधून लष्करी अधिकारी झाला तर मुलगी हवाईदलात फ्लाईट लेफ्टनंट झाली. त्यांची सैनिकी परंपरा पुढे सुरू आहे…. हिंदुस्थानाला शूरवीरांची खाण म्हणतात ते खरेच !

त्या महाकाय विमानाचा कार्गोचा दरवाजा उघडला गेला… कॅप्टन समरपाल लगबगीने पुढे झाले. त्यांनी शवपेट्यांसोबत आलेल्या जवानांच्या डोळ्यांत पाहिले…. आसवं वहात नव्हती पण ज्वालामुखीत खदखदणाऱ्या लाव्ह्यासारखी उचंबळत मात्र होती…… जवानांची हृदयं जखमी होती….. पण भारतीय सैन्याची शान राखताना बलिदान दिलेल्या सहकाऱ्यांविषयी अत्यंत आदराची भावनाही दिसत होती प्रत्येकाच्या हालचालीत. 

विमानातून शवपेटया सन्मानाने खाली उतरवल्या गेल्या… हुतात्मा वीरांना श्रध्दांजली वाहिली गेली आणि सैनिकांची ही तुकडी त्याच विमानात स्वार झाली…. मृत्यूशी झुंजायला… आदेशाचं पालन करायला. यात आपण मरू, आई-वडील निपुत्रिक होतील, पत्नी विधवा होईल, मुलं अनाथ होतील…. त्याला इलाज नाही! सैनिक बलिदानासाठीच तर निर्माण झालेला असतो.. इथं भावनांपेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ! 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आनंद…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आनंद…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

काहीच पुरेसं नसूनही

हसतखेळत आनंदात राहणारे बघितले आहेत.

पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५% मिळवून ही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले.

जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायासे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.

जिभेच्या कॅन्सर मुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक, उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.

बाल्कनीतून किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनर ही बघितला आहे.

फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमध्ये  तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंबही बघितलं आहे.

हे नको खायला- असं होईल, ते नको प्यायला- तसं होईल ह्या टेंशन मधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत  बिनधास्त खाऊनही काही नाही होत यार म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.

आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं. पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात, आता त्याला कोण काय करणार. प्रत्येकाला कधी, कुठे, कशात आनंद, सुख, समाधान मिळेल ते सांगता नाही येत. पण त्यांना ज्यात आनंद मिळेल ते त्याने करावे. कोणाला निसर्गात फिरण्यात आनंद मिळतो, तर कोणाला फक्त डोंगर दऱ्या चढण्यात आनंद मिळतो, कोणाला फक्त घरात लोळत राहण्यात तर कोणी कायम हसत खेळत मजेत राहण्यात आनंद मानतात.

आनंदी असण्याचे प्रत्येकाचे मोजमाप वेगवेगळे आहे.

कोणी वस्तू खरेदी करून आनंदी होतं. कोणी भटकंती करून आनंद मिळवतं . कोणाला नवनवीन पदार्थ करण्यात आनंद मिळतो तर कोणाला खाऊ घालण्यात आनंद वाटतो.

जितक्या व्यक्ती तितक्या प्रत्येकाच्या तऱ्हा असतात.

या सगळ्या आनंद व्यक्त करण्याच्या वाटा झाल्या.

मी आनंदी आहे. कसल्याही प्रकारच्या त्रासाशिवाय निरोगी आयुष्य जगतेय म्हणून. आई बाबा प्रत्येक निर्णयात सोबत असतात म्हणून. जीव लावणारी भावंडं आहेत म्हणून. ते प्रेम करणारे निस्वार्थ प्रेम करतात म्हणून. थोडाही चेहरा उतरला तर “तू ठीक तर आहेस ना” विचारणारी मित्र आहेत म्हणून. आणखी काय हवं?

अडचणी कुणाच्या आयुष्यात नसतात? आणि सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टी मला तरी नकोत! सतत आनंद वा मनाला समाधान देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या कधी लक्षात सुद्धा आलेल्या नसतात, त्यांची किंमत अशावेळीच तर कळते.

एक निरोगी शरीर, जे लढण्यासाठी समर्थ असेल. बास्स. जास्त काहीच नको. माझ्यासाठी तोच आनंद आणि तेच समाधान!

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गतवैभवाचे साक्षीदार… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– गतवैभवाचे साक्षीदार…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

ओस पडले जुने वाडे,

ओस पडली जुनी घरं |

गत वैभवातल्या वास्तूंना

अखेरची लागली घरघर |

 

पिढयांपिढयांचे,

गोकुळ सुखात नांदले |

भूतकाळाच्या आठवणीत,

घर एकटेच रुदले |

 

पाहिले लग्न सोहळे,

अंगणी उठल्या पंगती |

अखेरच्या घटका मोजताना,

कोणी नाही संगती |

 

ऊन पावसाळे झेलले,

सुख दुःखाचे भोगले प्रसंग |

जीर्ण झाल्या भिंती,

चिरे पावत चाललेत भंग |

 

भजन कीर्तने ऐकली,

श्रवण केल्या हरी कथा |

एक एक सोडून गेला,

एक एक खांबाची व्यथा |

 

पडके वाडे, पडकी घरे ,

वारसांना ना घेणं-ना देणं |

पूर्वजांच्या ठेवी दुर्लक्षित,

जमेना वास्तूकडे वळणं |

 

गत वैभवाचे साक्षीदार,

गावोगावी पहायला मिळतात |

थकलेल्या वास्तूच्या वेदना,

कुणाला कितीशा हो कळतात |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 164 – गीत – नासमझी का है अभिनय… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका भावप्रवण गीत –नासमझी का है अभिनय।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 164 – गीत – नासमझी का है अभिनय…  ✍

 वैसे तो सब समझ गया हूँ, नासमझी का है अभिनय।

 

जिस बगिया में फूल खिले हैं

वहाँ भीड़ भौंरों की होगी

आँखों के अंकुश से बचकर

आमद भी औरों की होगी

मालिक मौसम रूठ न जाये, मुझको केवल इतना भय ।

 

हम तो हैं रस्ते के राही

फूल तुम्हारे बाग तुम्हारा

खुशबू खुद न्योता देती है

फूलों जैसा गात तुम्हारा

अपमानित मधुमास हुए तो पतझरों की होगी जय।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares