मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राजवैद्य — भाग-१ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ राजवैद्य — भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

आनंदराव गाडीतून उतरून हॉटेलच्या पायऱ्या चढू लागले, तर शिर्के साहेब त्यांची गॅलरीत बसून वाट बघत होते. त्यांना पायऱ्या चढताना पाहून शिर्के साहेब म्हणाले ” गुड इव्हिनिंग आनंदराव, लॉन वरच बसू, हवा छान आहे.

“गुड इव्हिनिंग शिर्के साहेब, चालेल.” असं म्हणून दोघे हॉटेलच्या lawn मध्ये ठेवलेल्या खुर्चीत बसले.

“झाली का काम?” आनंदरावांनी शिर्के साहेबांना विचारले.

“अजून दोन दिवस लागतील, कारखान्याचे मुख्य डायरेक्टर दिल्लीला गेले आहेत, शनिवार पर्यंत येतील’.”

“हो, ते खासदार आहेत ना या भागातले, सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे ते शनिवारीच येतील.”

“बरं मग शिर्के साहेब, तुम्ही आमच्या गावात आलात, बोला काय घेणार? या हॉटेलला इम्पोर्टेड मिळते.”

“नाही आनंदराव, मी ड्रिंक घेत नाही. आश्चर्य आहे, तुमच्या व्यवसायानिमित्त तुम्हाला देशात आणि प्रदेशात फिरावे लागते. तरी पण तुम्ही ड्रिंक घेत नाही याचे आश्चर्य वाटते “.

काय आहे आनंदराव, पूर्वी मी ड्रिंक घेत होतो. पण गेली काही वर्षे मला लिव्हर चा त्रास सुरू आहे,.

“मग तुम्ही उपचार केलेत असतील!”

“उपचार? भारतातील सर्व लिव्हर स्पेशालिस्ट कडे आणि इंग्लंड मध्ये डॉक्टर स्टीफन कडे जाऊन उपचार घेतो आहे.”

“मग डॉक्टरांचे काय म्हणणे?”

“भारतातील बहुतेक डॉक्टर्स माझे लिव्हर जन्मतः खराब आहे. त्यावर निश्चित असे बरे करण्याचे उपाय नाहीत. लिव्हर ट्रान्स प्लांट करणे अशक्य आहे. कारण ऑपरेशन करताना अमोनिया वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच डॉक्टरांचे म्हणणे आहे लिव्हरची काळजी घेत चला. सध्या डॉक्टर स्टीफन यांच्याकडून आलेल्या इम्पोर्टेड गोळ्यांवर माझे चालू आहे. त्यामुळे कंट्रोल मध्ये आहे. माझ्या डॉक्टर्सनी सांगितले आहे, दारूचा एक थेंब जरी पोटात गेला तरी तरी खेळ खल्लास होईल.. म्हणून म्हणतो आनंदराव तुम्हाला काय हवं ते मागवा”. “नाही शिर्के साहेब, तुम्ही माझे पाहुणे आहात. तुम्ही ड्रिंक घेत नसताना मी मागवू शकत नाही. आपण लिंबू पाणी घेऊ.”. असं म्हणून आनंदरावांनी दोघांसाठी लिंबू पाणी मागवले.

आनंदराव शिर्के साहेबांना म्हणाले “तुम्ही एवढे उपचार केलेत, मग एकदा राजवैद्यांचा मत घेऊ. आमच्या राज्यवैद्यांकडे काही आश्चर्यकारक आयुर्वेदिक औषधे आहेत. तसं ते फारसे कुणाला माहित नाही. पण आम्ही दोघे एका कल्चरर क्लब मध्ये एकत्र असतो. त्यामुळे आमची मैत्री आहे.”

“राजवैद्य? कोण हे राजवैद्य?”

“शिर्के साहेब, आमचा हा जिल्हा म्हणजे पूर्वी संस्थान होते. राज घराण्याची गादी होती इथे. म्हणजे अजूनही आहे पण त्यावेळचा मान वेगळा होता. 60-70 वर्षांपूर्वी आमच्या महाराजांच्या पदरी हे राजवैद्य होते. महाराजांच्या खास मर्जीतले. त्याकाळी महाराजांना शरीरभर गळू आले होते. असह्य वेदना सुरू होत्या. अनेकांनी उपचार केले. अगदी मिशनरी डॉक्टर नी उपचार केले. मग कुणीतरी बातमी दिली मलकापूर भागात एक वैद्य आहे, त्यांचे कडे अनेक रोगांवरची औषधे आहेत. राज घराण्याने त्यांना बोलावले. त्यांनी पंधरा दिवसासाठी औषध लावायला व पोटात घ्यायला दिले. आश्चर्य म्हणजे आठ दिवसानंतर एक एक गळू फुटून साफ झाले. महिन्याभरात महाराज खडखडीत बरे झाले. त्या वैद्यांना महाराजांनी या शहरात आणले आणि राजवैद्य बनवले. त्या राज्यवैद्याने महाराजांची आणि महाराजांच्या कुटुंबाची अखेरपर्यंत सेवा केली. सगळीकडे नाव कमावले. महाराजांच्या शेवटच्या आजारपणात या वैज्ञानिक त्यांच्यावर उपचार केले. त्यामुळे या संस्थांच्या सर्व लोकांना त्यांचे बद्दल मोठा आदर होता.”

“आणि आता?” शिर्के साहेबांनी विचारले.

“आता राज्य वैद्य यांचे नातू आहेत. बापूसाहेब त्यांचं नाव. त्यांना पण आयुर्वेदाची चांगली माहिती आहे. पण आता काळ बदलला. इंग्लिश औषधे भारतात आली आहेत. डॉक्टर्स ऍलोपथी शिकून आले आहेत. ते ऍलोपॅथी औषधे वापरतात. त्यामुळे राजवैद्य मागे पडले.”

“पण आयुर्वेदिक डॉक्टर्स पण आहेत ना भारतभर?”

“आयुर्वेदिक डॉक्टर्स पण इंग्लिश औषधे वापरतात. ते शिकतात आयुर्वेदिक पण औषधे वापरतात ऍलोपॅथिक. अजून काही वैद्यपूर्ण आयुर्वेदिक औषधे वापरतात. पण आयुर्वेद मध्ये सुद्धा आता मोठ्या मोठ्या कंपन्या उतरले आहेत. त्यांच्याकडे मोठे कारखाने आहेत. आमचे बापूसाहेब वैद्यराज मात्र मागे मागे राहिले. ‘ कारण त्यांना पैशाचे पाठबळ नाही मी आमच्या वैद्य राज्यांना बोलावतो ते नाडी परीक्षा करतात. आणि मग औषध देतात”.

“हो बोलवा तुमच्या राज्य वैद्य ना, त्यांचे कडून काही फायदा होतो का पाहू.”

“दुसरे दिवशी आनंद रावांनी बापूसाहेब राजवैद्ययाना फोन केला. बापूसाहेब आले. त्यांची शिर्के साहेबांची भेट झाली. त्यांनी शिर्के साहेबांचे सोनोग्राफी रिपोर्ट पाहिले. नाडी परीक्षा केली. आणि यावर एक जालीम औषध मिळते का बघतो असे म्हणून ते गेले.

बापूसाहेबांच्या लक्षात आले, शिर्के साहेबांवर उपचार करण्यासाठी केरबाचे औषध मिळवणे आवश्यक आहे. नुसत्या आपल्या औषधाने शिर्के साहेबांची लिव्हर व्यवस्थित होणार नाही.

बापूसाहेब स्कूटर वरून निघाले ते 15 किलोमीटर वरील भडगाव या गावी पोहोचले. एका जंगलाजवळ त्यांनी आपली स्कूटर ठेवली. आणि लहानशा पायवाटेने जंगल चढू लागले. पंधरा-वीस मिनिटे चढण चढल्यावर त्यांना शिळ्यामेंढ्या चढताना दिसायला लागल्या. तसं त्यांनी “केरबा, केरबा” अशा हाका मारायला सुरुवात केली. दहा-बारा वेळा हाका मारल्यानंतर “जी जी” उत्तर मिळाले. आणि दोन मिनिटात त्यांच्यासमोर केरबा धनगर उभा राहिला.

“आव बापूसाब, तुमी सवता, सुरवं कुनिकडे उगवला मनायचं”.

“आर मित्रा, तुझी लय आठवण आली न्हवं” बापूसाहेब उदगारले.

“मित्र म्हणताय हे तुमच मोठेपण बापूसाहेब, तुमी कुठं आमी कुठं, तुमी आमचे राजवीद्य, तुमास्नी आमच्या महाराजणं पदवी दिली न्हवं”.

“आर पदवी दिली आमच्या आजोबांना, मला न्हवं”.

“बरं बापूसाहेब, का आला व्हता गरिबाकडं!”

 केरबा, आमचा एक दोस्त आहे आनंदराव, त्याचे साडू मुंबईचे शिर्के, ते इकडं आपल्या गावात आलेत कामासाठी, त्या शिर्केंच यकृत खराब झालंय, यकृत समजतय न्हवं (बापूसाहेबांनी पोटाजवळ हात ठेऊन लिव्हर दाखवले).

“समजलं कीं, कावीळ व्हते न्हाई का?’, पण तुमी काविली वर दवा देताय न्हवं”.

आर, नुसती कावीळ असती किंवा बारीक सारीक काय बी असत, तर मी इलाज केला असता, पर या पवण्याचं पूर यकृत खराब झालाय, त्यासाठी माझ्या कडे इलाज न्हाई बाबा, तेला तुझी मुळी हवी, माग दादा डॉक्टर साठी ती मुळी तू दिलेली ‘.

“दादा डागदार तसा भला माणूस, किती लोकांचे परान वाचवले त्याने, माझ्या आजा न दाखवलेली मुळी तुमच्या कडच्या औषतून दिली तुमी, पन माझ्या आज्यान मला बोलून ठेवलंय “या मुळीचा बाजार करू नको केररबा, म्हणून मी तस कुणला ह्या मुळी च सांगत न्हाई आणि पैस भी घेत न्हाई”.

“होय, मला माहित आहे ते, पण आनंदरावांचे हे पाहुणे भले माणूस आहेत. मी त्यांना शब्द दिला आहे, माझ्यासाठी एकदा तू ती मुळी मला दे”.

“होय बापूसाहेब, राजवीद्य हाय तुमी आमचे, आमच्या म्हरंजाचे राजवीद्य, तुमास्नी मी न्हाई म्हणु शकत न्हाई”.

“उद्या राती पर्यत मुळी पोच करतो, तुमच्या कविलीच्या दावंय मध्ये घालून द्या.”

बर, म्हणून बापूसाहेब घरी आले, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी केरबाने ती मुळी आणून दिली. बापूसाहेबांनी ती मुळी आपल्या नेहमीच्या लिव्हर वरील औषधात मिसळली. त्यांच्या फॅक्टरीतल्या मुलीला सांगून त्याच्या दोन महिन्यासाठी च्या गोळ्या तयार केल्या आणि दुसऱ्या दिवशी शिर्के साहेबांच्या हवाली केल्या.

शिर्के साहेब मुंबईला जाताना बरोबर त्या गोळ्या घेऊन गेले आणि नियमित घेऊ लागले. त्यांची इतर पत्ते चालू होतीच.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आला श्रावण…

‘श्रावण मासी हर्ष मानसी l

हिरवळ दाटे चोहिकडे l.

शाळेत आमचा कवितांचा एक तास असायचा. सुंदर कवितांना सुरेल चालींचा, आस्वाद होता. ऊन पावसाच्या खेळात बरसणाऱ्या श्रावण सरी, हिरवाईने नटलेली सृष्टी, गुलाबी गारवा झेलत आम्ही सरमिसळ टिपेला पोहोचणाऱ्या आवाजात, कविता म्हणायचो. सोमवारी शाळा लवकर सुटायची कारण श्रावणी सोमवारी संध्याकाळी उपास सुटायचा असतो ना! दुपारपासूनच आईची लगबग चालू असायची. गरमागरम वरण भातावर तुपाची धार, मऊसूत पोळ्या इतर पदार्थांबरोबर कधी गव्हाची किंव्हा इतर प्रकारची खीर कधीतरी एखादा गोड पदार्थपण असायचाच. पंचपक्वानांना लाजवील असं ते भरगच्च भरलेल् ताट, ती चव अजूनही आठवते, आणि जिभेवर रेंगाळतिय. माझे वडिल ति. नाना शिवभक्त होते. त्यांना जुन्या गोष्टी सांगायच्या छंद होता हाडाचे मूरलेले, प्रतिष्ठित, इतिहास भूगोलाचे शिक्षक होते नां ते! रुक्ष विषयही रसाळवाणीने सहज सोपा करून सांगायची त्यांची हातोटी होती 1740 ते 61 चा काळ होता तो, बाळाजी पेशव्यांच्या काळात हिंदू धर्माला संजीवनी मिळाल्यामुळे पुण्यात विविध देवतांची मंदिरे उभी राहू लागली. पेशवे शिवभक्त होते त्यांनी लिहिलेल्या पत्रात सुरुवातीला श्री शंकर प्रसन्न. असा मायना असायचा त्यांची शिवभक्ती जागृत, ज्वाज्वल्य होती. अर्थात राजधानीच्या ह्या पुणे शहरात शिवमंदिरे भरपूर होती. चिमाजी अप्पांचं नदीकाठचं ओंकारेश्वर मंदिर, थोरल्या बाजीरावांच्या भगिनी, देहू बाईंनी बांधलेलं अमृतेश्वर, मंडई जवळ रामेश्वर मंदिर, धडपळे यांचा पाषाण महादेव, कर्वे रोडचे पेशवेकालीन मृत्युंजयेश्वर, अजून ऐकताय नां मंडळी!पुण्यात सगळीकडे ईश्वरच ईश्वर भरलेला होता. कॉग्रेस हाऊस समोरचं सिद्धेश्वर, वृद्धेश्वर, सदाशिव पेठेतला महादेव, तसंच नागेश पेठेतलं अति प्राचीन नागेश्वर मंदिर,. दमला नाहीत नां नावं वाचून ? अहो भाग्यवान आहात तुम्ही! त्यानिमित्ताने महादेवाचं नामसमरण होतंय आपल्याकडून. हो की नाही,? आता आणखी एक मंदिर राहिलं बरं का, सोमवारांतलं सोमेश्वर मंदिर. अशी एक का अनेक मंदिरे श्रावण सोमवारी शिवभक्तांमुळे फूलून जायची. धवल पुष्पांनी आणि बिल्वदलांनी महादेवाची पिंड झाकून जायची. अशा अनेक महादेवाच्या प्राचीन अति प्राचीन मंदिराची ओळख नानांनी आम्हाला करून दिली आणि संस्काराचं शिवभक्तीचं बीज बालपणीचं आमच्या मनामध्ये रुजवलं. पृथ्वीवर तर आपण राहतोच पण स्वर्ग आणि पाताळ हे शब्द बालवयात आमच्यासाठी नविन होते, त्यामुळे पाताळेश्वर मंदिर बघण्याची मनांत आतुरता होती. ते सगळ्यांनाच बघायला मिळावं म्हणून शाळेतर्फे ट्रीप काढण्याचं नानांनी मुख्यध्यापकांना सुचवलं. एक अनुभवी, कर्तव्यनिष्ठ आदर्श ज्येष्ठ शिक्षक म्हणून माझ्या वडिलांच्या शब्दाला मान होता मुख्यध्यापिका बापटबाईंनी ही कल्पना सहर्ष उचलून धरली आणि आम्ही पांढऱ्या गणवेशानी जंगली महाराज रस्त्याच्या टोकाचं, अति प्राचीन पाताळेश्वर गाठलं. मनांत धाकधूक होती कारण तिथे म्हणे नाग लोकांची वस्ती असते. एखादा नाग पायाखाली आला तर — कल्पनेनीच बोबडी वळली. अति प्रमाणात, नको इतके पौराणिक सिनेमा पाह्यलाचा दुष्परिणाम दुसरं काय!कारण त्यावेळी नागराज, नागकन्या पाताळ लोक असे सिनेमे आम्ही जरा जास्तच पाहत होतो. पाताळेश्वरला आत खाली खोल उतरतांना मनात आलं शिव शंकराच्या गळ्यात नाग असतात म्हणे, तसा इथे महादेवाच्या पिंडीभोवती एखादा नाग विळखा घालून बसला तर नसेल ना ? नको रे बाबा! महादेवाच्या पिंडीचे लांबूनच दर्शन घेतलेलं बरं! बालमनांत भीती दडुन बसली होती. ह्या भीतीने पिंडीचे दर्शन घेण्यापेक्षा बेलफुला आड नागोबा तर लपले नाहीत ना?इकडेच आमचं लक्ष होतं. बाल बुद्धी कशीअसते नाही कां कधी कुठे भरकटेल सांगता येत नाही. पण एकंदरीत गुहेसारखं गुढ असं हे मंदिर आम्हाला फारच आवडलं. तिथले बांधकाम, नंदी, पिंड बघून शिल्पकलेचा अति प्राचीन सुंदर असा अप्रतिम आणि अजूनही जपला गेलेला वारसा मनांत खोलवर ठसला. महादेवाबरोबर त्या स्थापत्य कलेला आणि पूर्वजांनाही नमस्कार करून आम्ही बाहेर पडलो. चारी बाजूंनी दगडी बांधकाम असल्याने अंत्यन्त सुखद गारवा तिथे होता. पुढे मोठे झाल्यावर, जंगली महाराजांचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर, आपोपचं या पवित्र पुरातन शांत पातळेश्वराकडे आमची पावलं हमखास वळायची. ट्रीपला गेलो होतो तेव्हां नुकतीच इंग्रजी शब्दांची ‘ जान पेहचान ‘ झाली होती म्हणून एका अति चाणाक्ष मुलीनी प्रश्न विचारला होता, ” सर पाताळ म्हणजे बेसमेंट नां?आणि ईश्वर म्हणजे गॉड हो नां?तिच्या इंग्रजी ज्ञानाचे कौतुक वाटून सर गालांतल्या गालांत हंसले. पुढची गंमत तर ऐका, तिची पुढची उडी म्हणजे ती म्हणाली, “सर मग आपण या टेम्पलला बेसमेंट नाव ठेवूया का?” कट्टर देशप्रेमी असलेले सर ताडदिशी म्हणाले, “मुळीच नाही! इंग्रजांच् अतिक्रमण, त्यांची सत्ता आपण धुडकावून लावली आहे, आणि आता आपण स्वातंत्र्य मिळवलय. केवळ ज्ञान म्हणून आपण त्यांची भाषा शिकतोय, याचा अर्थ असा नाही की आपली मातृभाषा, आपली पुरातन संस्कृती आपण बदलायला पाहिजे. मला हे पटतच नाही. तुम्ही तुमची मातृभाषा जपलीच पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा आपली भारतीय संस्कृती आपण कायम मनात जतन करून ठेवलीच पाहिजे स्वतंत्र् झालोत नां आपण? मग आपली संस्कृती कां सोडायची? ती आपणच टिकवून ठेवली पाहिजे. ” सरांच्या शब्दा शब्दातून देशाभिमान ओसंडून वाहत होता. सरांनी आम्हाला मोलाची शिकवण दिली होती. ते पुढे म्हणाले, ” देशाभिमान जागृत ठेवा भारत मातेच्या सुसंस्कृत कन्या आहात तुम्ही. आदर्श भारतीय नागरिक म्हणून, आपल्या देशात आपल्या पूर्वजांचा, पूर्व संस्कृतीचा मान राखून, ताठ मानेनी जगा ” किती सुंदर, श्रद्धा भक्ती आणि देशाभिमानाचा संदेश सहजपणे पाताळेश्वराच्या साक्षीने गुरूंनी आमच्या मनात रुजवला होता. “तस्मै श्री गुरवे नमः”.

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जंववरी रे तंववरी…” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

“जंववरी रे तंववरी…” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

कुठल्याही गडाचा घेरा पायी चालत पालथा घालणं, हा वरकरणी रिकामटेकडा उद्योग वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र तसं नसतं. आपण फिरायला लागलो की, आपल्याला खूप शिकायला मिळतं. माणसांकडे, त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन नक्की बदलले जातात.

पन्हाळा ते विशाळगड असा पावनखिंड ट्रेक आम्ही सगळे करत होतो. त्यावर्षी ऐन मे महिना असूनही दोन दिवस सलग मुसळधार पाऊस पडत होता. वाटेत लागणाऱ्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांमधल्या आयाबहिणींची त्या पावसात प्रचंड धावपळ सुरु होती. जंगलातल्या अशाच एका वाटेवरल्या घरापुढं आम्हीं थांबलो. सरपणासाठी दिवसभर जंगल फिरुन गोळा केलेला लाकूडफाटा पावसात भिजू नये, म्हणून त्या घरातली सगळी माणसं प्रयत्न करत होती. सलग दोन दिवस अविश्रांत पाऊस पडल्यानंतर भिजलेलं सरपण कोरडं पडणार कधी अन् घरात चूल पेटणार कधी? 

आमच्या गटात एक सातवीत शिकणारा मुलगा होता. “दादा, हे लोक गॅस वर स्वयंपाक का करत नाहीत?” असा त्याचा प्रश्न. त्या घरातली एक मुलगी म्हणाली, “तो सिलेंडर खालून इथपर्यंत आणणार कोण? सिलेंडरची गाडी इथपर्यंत येत नाही. सिलेंडर बदली करायला रोज खालच्या रस्त्यांवर जाऊन उभं राहावं लागतं. गाडी नेमकी कधी येणार हे सांगता येत नाही. ” दुसरा एक जण त्यावर म्हणाला, “पण तुम्हाला ऑनलाईन बुक करता येईल. त्यावर आधीच मेसेज येतो, सिलेंडर कधी येणार आहे ते समजतं. तेव्हाच आपण जायचं. ” ती मुलगी म्हणाली, ” आमच्या इथं मोबाईल इंटरनेट चालत नाही. रिकामा सिलेंडर एकवेळ कसातरी खाली घेऊन जाऊ. पण भरलेला सिलेंडर वर कसा आणणार? त्याला फार शक्ती पाहिजे. जेव्हा कुणाची गाडी, बैलगाडी खालून वर येणार, तेव्हाच आमचा सिलेंडर वर येणार. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून जड सिलेंडर वर आणता येत नाही. ” आम्हीं सगळे ते उत्तर ऐकून गप्पच झालो. त्या परिस्थितीत उत्तर काढणं किती कठीण असतं हे हळूहळू मुलांच्या लक्षात येत होतं. कळत्या वयात संवेदनशीलता योग्य जाणिवेतून विकसित झाली तर उत्तम असतं. तिला पूर्वग्रह किंवा पोकळ अभिनिवेशाची बाधा झाली तर व्यक्तीच काय, समाजाचं सुद्धा नुकसान व्हायला वेळ लागत नाही.

आम्ही दरवर्षी निरनिराळ्या गडांच्या पायथ्याला असणाऱ्या वाड्या वस्त्यांमधून राहतो. अगदी निर्धास्तपणे राहतो, स्वतःचंच घर असल्यासारखे वावरतो. स्वच्छंद भटकंती करतो, गप्पांचे फड रंगवतो. वीस-पंचवीस जणांच्या सामान-सुमानानं घरं आणि त्या समोरची अंगणं भरुन जातात. पण आजतागायत आमच्या सोबतच्या एवढ्या अवाढव्य सामानातून एक साधं फुटण्याचं पाकीटसुद्धा गायब झालेलं नाही. उलट यापूर्वी मुक्कामी राहिलेल्या माणसांच्या टोप्या, गॉगल्स, मोबाईल चार्जर्स, पॉवर बँका, स्विस नाईफ असल्या कितीतरी अति महागड्या गोष्टी सुद्धा त्यांनी वर्षानुवर्षं निरिच्छपणे एका पिशवीत भरून ठेवलेल्या असतात. अशाच एका कुटुंबात मी व्हॅनगार्ड ची दुर्बीण सुती कापडात गुंडाळून ठेवलेली पाहिली. तीस -चाळीस हजार रुपये किंमतीची ती वस्तू गेली दोन वर्षं त्या कुटुंबात आहे. कुणाची आहे, ठाऊक नाही. पण दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचा नाही, हा संस्कार पक्का रुजलेला असल्यानं इथल्या माणसांना असले मोह होतच नाहीत. आपण करमणूक किंवा निवांतपणा म्हणून त्यांच्या परिसरात एक-दोन दिवस राहणं सोपं आहे. पण त्यांचं आयुष्य कायमस्वरूपी जगणं हे फार मोठं आव्हान आहे.

मागे एकदा एका अनुभूती मध्ये आम्ही आमच्यासोबत भारत-भारती चा पुस्तक संच नेला होता आणि रात्री मुक्कामी सगळीकडे अंधार करुन कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात भारतातल्या स्त्री क्रांतिकारकांच्या कथा त्या त्या गावातल्या मुलामुलींना वाचून दाखवत असू. भगिनी निवेदिता, राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुस्तिका वाचत असू. मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, खुदीराम बोस, डॉ. रामन, डॉ. विश्वेश्वरय्या, यांच्या गोष्टी गावातल्या मुलामुलींना सांगताना फार वेगळा आणि प्रेरणादायी अनुभव आला.

एखाद्या वस्तीत दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी थांबलो तर, कोंबड्या पकडण्याचा खेळ एकदम भारी रंगायचा. एखाद्याला वजन कमी करायचं असेल तर हा खेळ एकदम मस्त आहे. झाडावरून एखादा फणस उतरवून त्याचा अगदी मनसोक्त आनंद घेणं, विटीदांडू किंवा गोट्या खेळणं, कैऱ्या पाडणं हा तर अगदी स्वाभाविक उद्योग. कनकेश्वर किंवा रायरेश्वर ते जांभळी पर्यंत जाणारी नेसणीची वाट किंवा केंजळगडाचा पायथा.. करवंदांना तोटा नाही. कोल्हापुरात दाजीपूर किंवा राधानगरी परिसरात भटका, तिथं जांभळं मुबलक.. ! कितीही खा हो, त्या फळांचा मालक फक्त एकच. तो म्हणजे निसर्ग.. !

एका वर्षी तर फार मजा आली. आम्ही प्रतापगड उतरून शिवथरघळीच्या वाटेवर होतो. वाटेत रस्ताभर कैऱ्याच कैऱ्या दिसत होत्या. पण संधी मिळत नव्हती. वरंधा उतरुन शिवथर घळीच्या जवळ पोचलो अन् संधी मिळाली. एका काकांना गूळ लावून आठ दहा कैऱ्या काढून घेतल्या. त्यातल्या तीन-चार पाडाच्या होत्या. आमच्यातल्या एकाचं डोकं बरोब्बर चाललं. त्यानं फोल्डिंग सुरी काढली आणि त्यातल्या कच्च्या कैऱ्या बारीक चिरल्या. एका छोट्या पातेल्यात काढल्या, त्यांना साखर, मीठ, तिखट लावलं आणि झाकून ठेवल्या. सॅक मधून दोन लिंबं काढली. चॉपर काढून कांदे, टोमॅटो, काकडी बारीक कापून घेतली. आणि कोरडी भेळ काढून मोठ्या पातेल्यात सगळं एकत्र करायला घेतलं. झकास भेळ तय्यार.. ! एकट्यानंच पंचवीस जणांसाठी भेळ केली आणि तीही फक्त पंधरा मिनिटांत.. ! चारही बाजूंना नुसत्या डोळ्यांच्या भुवया उंचावल्या तरी अवाढव्य डोंगर दिसतात, अशा ठिकाणी एका भल्यामोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसून आम्ही भेळ खात होतो. आजूबाजूला खारी, साळुंक्या, चिमण्या अगदी निर्धास्तपणे बागडत होत्या. व्वा.. ! ती दुपार आणि ती भेळ मी कधीही विसरु शकणार नाही.

एखाद्या विस्तीर्ण पठारावर आपली छोटीशी राहुटी टाकून, समोर शेकोटी पेटवून, मंद वाहत्या गारव्यात, शाल पांघरून मस्त गप्पा मारत बसणं, हा अनुभव जोवर आपण घेत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यातली श्रीमंती कळणार नाही. एरवी रात्रभर जागरण करत मोबाईल फोनमध्ये डोकं खुपसून बसणारा सुद्धा अशा वातावरणात रात्री साडेनऊ – दहा वाजता गाढ झोपी गेलेला असतो. रात्रभर शेकोटी ऊब देत राहते. पहाटे चाराच्या सुमाराला पक्ष्यांचा किलबिलाट सुरु झाला की, आपोआप डोळे उघडतातच.. ! रात्र-रात्र झोपच लागत नाही असं रडगाणं गाणारे सुद्धा अशा वातावरणात चटकन निद्रादेवीच्या अधीन होतात.. !

अनुभूती मध्ये मोबाईल फोन, स्मार्ट फोन, आयपॉड, कॅमेरा अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत असलेल्या चालत नाहीत, त्याचाच मोठा लाभ सहभागी असणाऱ्यांना होतो. आपले डोळे, कान खऱ्या निसर्गाचा अनुभव आणि आनंददायक प्रत्यय घ्यायला लागतात. आजवर कधीही न जगलेलं खरंखुरं जगणं अनुभवायला लागतात. साहजिकच, आपल्यालाच आपल्या आनंदमय कोषाचा नव्यानं परिचय व्हायला सुरुवात होते. हीच तर खरी अनुभूती… !

यांत्रिक सुखात आळसावलेल्या आणि सुखासीन आयुष्य जगणाऱ्या आपल्या मुलांच्या मनांना आणि शरीरांना आलेलं जडत्व हाच तर त्यांचा खरा शत्रू आहे. यंदाच्या सुट्टीत हे व्हर्च्युअल जडत्वाचं जोखड आपल्या मुलांच्या खांद्यावरून उतरवून टाकायला हवं. त्यांनी स्वतः पलिकडचं थोडं तरी जग पहायला हवं, जगायला हवं. त्यातून त्यांना मिळणारी समृद्धता आणि अनुभवांची श्रीमंती इतकी वेगळी आणि अक्षय्य टिकणारी असेल, की आयुष्यभर ही शिदोरी त्यांना आनंद देत राहील.

हॉटेलिंग, शॉपिंग, सोशल मीडिया, वातानुकूलित आराम हेच खरं आयुष्य असा आपला समज असतो. पण हा असा नवा अनुभव मिळाला की, ही जुनी बेगडी कागदी सजावट पाचोळ्यासारखी उडून जाते. ज्ञानोबारायांचं एक फार सुंदर भारुड आहे – 

“जंववरी रे तंववरी जंबुक करी गर्जना ।

जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥”

माऊली म्हणतात – कोल्हा मोठमोठ्या गर्जना करत असतो. पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला सिंहाचं दर्शन होत नाही तोपर्यंतच..

आपल्या मुलांचं तसंच काहीसं असतं. वरवर दिसणाऱ्या चकचकाटानं त्यांना मोहिनी घातलेली असणारच. पण कुठपर्यंत? जोपर्यंत साध्या आणि निसर्गाशी तादात्म्य पावणाऱ्या जीवनशैलीशी त्यांची ओळख होत नाही तोपर्यंतच.. !

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ते’ सात पृथ्वीवासी -… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

‘ते’ सात पृथ्वीवासी – ☆ श्री संदीप काळे ☆

कल्याण जवळच्या मुरबाडमध्ये रेखा दळवी नावाच्या आजी राहतात. गेल्या दोन वर्षांपासून ‘त्या’ माझे लेख वाचून सातत्याने मला फोन करून, एकदा मी त्यांना भेटावे अशी विनंती मला करीत होत्या. परवा मी आजींना भेटण्यासाठी खास मुरबाडला गेलो होतो. कोणीच नसणाऱ्या आजींनी पुस्तकांना आपलेसे करून स्वतःचे आयुष्य प्रचंड समृद्ध करून घेतले आहे. माझी ७२ च्या ७२ पुस्तके आजीबाईंकडे पाहून मी एकदम अवाक झालो.

आजींची भेट घेऊन निघताना रस्त्यात अनेक मुले वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये दंग झाली, असे दृश्य मी पाहत होतो. कोणी मातीचे दागिने बनवत होते. कुणी मातीची भांडी तयार करत होते. कुणी मोठे शिल्प साकारत होते. कोणी चित्र काढत होते. कुणी फोटोग्राफी करत होते. कुणी तबल्यावर गाणं म्हणत रियाज करत होते. कुणी नाटकाची तालीम करीत होते. तिथे असणारा प्रत्येकजण कला, संस्कृती आणि मातीला धरून काम करीत होता. त्याच्या चेहऱ्यावर जो उत्साह होता त्याचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही, असे होते. मी तिथे गेलो, त्या सर्वांच्या कामामध्ये सहभागी झालो. ते जे काही प्रवास करीत होते तो प्रवास समजून घेतल्यावर मी एकदम थक्क झालो.

मी आमीर खानचा ‘रंग दे बसंती’ चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटात आमीर खानचे सर्व मित्र चिरंतर बदलासाठी मोठी लढाई लढतात. आणि अपेक्षित बदल त्यांच्या पदरात पडतो. ‘क्रांती’ची सुरुवात एक व्यक्ती करत असतो, आणि त्या ‘क्रांती’ची छोटी ठिणगी सगळीकडे जम बसवते. तसा एकदम बदल होत नाही, पण जो बदल होतो तो चिरंतर टिकणारा होतो. असेच ‘सेम टू सेम’ या सात मित्रांनी केले आहे.

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी असणारे, कलाकार या नात्यातून एका ठिकाणी गुंतलेले सात मित्र कलेसाठी, शाश्वत जगण्याच्या लढाईसाठी एकत्रित येतात. ते जे निर्माण करू पाहत होते, त्याचा होणारा इतिहास हा सोनेरी अक्षराने लिहिला जाणार, याचा कधी कोणी विचारही केला नसेल.

मी ज्या ठिकाणी होतो, तिथे असणारी मौर्विका मला सांगत होती, “प्रत्येक गावात, भागात असणारी कला, तिथली संस्कृती हे तिथली ओळख आहे. ती कायम टिकली पाहिजे. कलेमुळे शिक्षण घेण्यासाठी रुची वाढेल यासाठी अद्भुत प्रयोग आम्ही युवकांनी सुरू केले. ज्यातून हजारो मुले कला संस्कृतीकडे वळली. ” 

एक एक गाव काबीज करीत या सर्व तरुणांना आता अवघा देश काबीज करायचा आहे. आजही अनेक शाळांत, अनेक गावांत या युवकांना निमंत्रित केले जात आहे.

प्रतीक जाधव, मौर्विका ननोरे, राहुल घरत, कल्पेश समेळ, निखिल घरत, प्रतीक्षा खासणीस, निनाद पाटील या सात जनांनी कलेसाठी राज्यभर हाती घेतलेले काम कौतुकाचा विषय ठरले आहे. हे सात जण कला विश्व चळवळीचे नायक आहेत. हे सातही जण मोठे कलाकार आहेत. चित्रकार, फोटोग्राफर, नाट्यकलावंत इतिहासाचा उपासक आदी कलेतले हे उच्चशिक्षित आहेत.

या चळवळीची सुरुवात झाली, प्रतीक जाधव (8928682330) यांच्या चार वर्ष झालेल्या कला प्रवासातून. प्रतीक यांनी २०१९ ते २०२४ या दरम्यान देशभर सायकलवरून प्रवास केला. या प्रवासातून त्यांनी देशभरात असणारी कला, संस्कृती पाहिली, तिचा शोध घेतला. प्रतीक म्हणाला, “मी मूळचा बीडचा, पण आता मुंबईकर झालो. माझे वडील श्रीराम जाधव हे शिक्षक होते. मी सातवीत असताना बाबांचा अपघाती मृत्यू झाला. मी ११ वीमध्ये असतांना माझी आई पंचफुला जाधव हिचे कॅन्सरने निधन झाले. मी एकटाच राहिलो होतो. बाकी नातेवाईकांचा मला आधार होता, पण लहानपणापासून स्वतःच्या पायावर उभे राहून जगायची सवय लागली.

मला चित्रकला, शिल्पकलेमध्ये प्रचंड रुची होती, मी त्यात उच्च शिक्षण घेतले. तेच ते शहरातले जगणे, तीच ती नोकरी हे मला नको होते. त्यातून माझी सायकल यात्रा निघाली. मी सायकलवर भारत का फिरलो तर माझ्याकडे प्रवास करायला पैसे नव्हते. मी जेव्हा चार वर्षांनी परत आलो तेव्हा, काहीतरी वेगळे करायचे या हेतूने आम्ही ‘अर्थियन आर्ट फाऊंडेशन’ सुरू केले. “

मी प्रतीकला मध्येच म्हणालो, “‘अर्थियन’ म्हणजे काय?”

तेव्हा प्रतीक म्हणाले, “’अर्थियन’ या शब्दाचा अर्थ ‘पृथ्वीवासी’ असा होतो. निसर्गाशी सुसंगत राहण्यावर आणि मानवांना जोडण्यासाठी माणसा माणसांतील दुभंगलेपण दूर करण्यासाठी आम्ही माणुसकीसाठी गती घेऊ पाहत आहोत. आमच्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ” प्रतीक सांगत होता, आणि मी सारेकाही ऐकत होतो.

हे सात मित्र एकत्रित आले आणि त्यांनी कला जोपासण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी रचना आखली आणि मग त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.

मी आणि प्रतीक बोलत असताना बाजूला एक मुलगा मातीचा मुखवटा बनवत होता. प्रतीक मला म्हणाला, “दादा, हा विजय पाते, गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्याशी जोडला गेला आहे. विजयला पूर्वी शाळेत जाण्यात, अभ्यास करण्यात रुची नव्हती. पण जेव्हापासून विजय आमच्या कार्यशाळेत सहभागी झाला, तेव्हापासून त्याच्या शाळा आणि अभ्यासातली रुची वाढली. असे हजारो मुलांविषयी झाले. मुलांना जर कलेमध्ये रुची निर्माण झाली तर आपोआप ते अभ्यासात, शाळेत नक्की रुची दाखवतील. ”

प्रतीक जे जे सांगत होता, ते सारे बरोबर होते. सर्व प्रकारच्या कलेत रुची वाढावी यासाठी मुरबाड जवळच्या पळू येथे ‘अर्थियन’ आर्ट फाऊंडेशनची सुरुवात झाली. येथे उभे केलेलं कला केंद्र गावागावांत उभे राहिले पाहिजे, असे ते मॉडेल होते. येथे मुलांसाठी होणाऱ्या कार्यशाळा, हेरिटेज वॉक, कला सादरीकरण, कला प्रदर्शन, भित्तीचित्रे, स्वछता मोहीम, हे सारेकाही पाहण्यासारखे होते.

त्या साऱ्यांना मला काय दाखवू काय नाही असे झाले होते. पळू या गावामध्ये या सर्व मित्रांनी कला केंद्रासाठी जंग जंग पछाडून तीन एकर जागा घेतली. त्यासाठी अनेकांनी आर्थिक मदत केली. पळू सारखाच उपक्रम आसपासच्या वैशाखरे, सिंगापूर, मांडवत या गावात सुरू केले होते. मी जिथे जिथे या सर्व टीमसोबत गेलो तिथे तिथे या सर्वानी प्रचंड जीव ओतून काम केले होते.

मी प्रतीक आणि मौर्विका यांना म्हणालो, “तुमच्याकडे जे काही होते ते पदरमोड करून तुम्ही हे सारे उभारले. एक पुढची पिढी घडवण्याचे काम तुम्ही करताय, आता पुढे कसे करणार?”

त्यावर मौर्विका म्हणाली, “माहित नाही. काम खूप मोठे आहे, ते पूर्ण होणार आहे, पैशांची प्रचंड अडचण आहे. आणि अडचण आहे म्हणून कोणते काम थांबत नाही. “

या सर्व टीम मधील असलेली तळमळ कमालीची होती. या सर्वांना स्वतःविषयी काही देणेघेणे नाही, सामाजिक क्रांती करायची आहे आणि ती गतीने करायची आहे, हेच या सर्वांचे ध्येय आहे.

आम्ही जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा त्यांच्या बोलण्यातून खूप मोठा सामाजिक आशय माझ्यापुढे साकारत होता. प्रतीक म्हणाला, “जगायला सर्वात महत्वाचे काय लागत असेल तर तो आनंद, समाधान असतो. शहरात हा आनंद तुम्हाला मिळणार नाही. गावातल्या प्रत्येकाच्या वागणुकीमध्ये तुम्हाला या आनंदाची झलक सतत दिसेल. मीठ आणि पेट्रोल सोडून आम्ही सर्व काही घरी बनवू शकतो. आणि आम्ही ते करतोय. या निर्मितीचा प्रत्येक विषय हा कलेशी संबंधित आहे, जो आम्ही प्रत्यक्षात उतरवतो.

परवा मला एका आजीचा फोन आला. आजी म्हणाल्या, ‘माझ्या मुलीच्या नावाने तुम्हाला काही पैसे पाठवते, ती आता या जगात नाही. तिलाही कलाकार व्हायचे होते’, असे म्हणत आजी रडायला लागली. असे मदत करणारे अनेक भावनिक हात पुढे येत आहेत. “

त्यांचे काम समजून घ्यावे तेव्हढे कमी होते. अवघा दिवस घालवल्यावर मी माझ्या परतीच्या प्रवासाला निघालो. मी विचार करत होतो, इतिहासामध्ये जसा औरंगजेबाला प्रश्न पडला होता, ‘माझ्या अवघ्या टीममध्ये जर एक छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखा माणूस असता तर मी अजून मोठा इतिहास घडवला असता’, तसा प्रश्न या सर्वांना भेटल्यावर, त्यांचे काम पाहिल्यावर मलाही पडला होता.

या सात पृथ्वीवासी उत्साहाने, नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या तरुणांप्रमाणे जर आपल्या राज्यातल्या प्रत्येक गावात एक तरुण जरी पुढे आला तरी रोज नवा इतिहास लिहिला जाईल. माती संस्कृतीसाठी मोठे काम उभे राहणे आवश्यक आहे. असे मोठे काम राज्यातल्या प्रत्येक गावात उभारले जाईल. बरोबर ना.. ! 

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ऊन ऊन खिचडी, साजूकसं तूप…  – कवी : मो. दा. देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ऊन ऊन खिचडी, साजूकसं तूप…  – कवी : मो. दा. देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

ऊन ऊन खिचडी साजूकसं तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख.

 

एक नाही दोन नाही माणसं बारा,

घर कसलं मेलं त्यो बाजारच सारा.

सासूबाई – मामंजी, नणंदा नि दीर,

जावेच्या पोराची सदा पिरपिर.

पाहुणेरावळे सण नि वार,

रांधा वाढा जीव बेजार.

दहांमध्ये दिलं ही बाबांची चूक,

वेगळं राहायचं भारीच सुख…

 

सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ,

प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू,

अन् एवढासा जीव झाला तरी विंचू तो विंचू.

चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,

वीतभर लाकडाला हातभर झिलपी.

बाबांची माया काय मामंजींना येते?

पाणी तापवलं म्हणून साय का धरते?

बहीण अन् जाऊ यात अंतरच खूप,

वेगळं राहायचं भारीच सुख….

 

दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,

दोघांत तिसरा म्हणजे डोळ्यांत कचरा.

दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,

गुलुगुलु बोलायचं नि दूर दूर फिरायचं.

आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,

फिटतील साऱ्या आवडी निवडी.

दोघांचा असा स्वयंपाकच काय?

पापड मेतकूट अन् दह्याची साय,

त्यावर लोणकढं साजूक तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख….

 

रडले पडले नि अबोला धरला,

तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.

पण मेलं यांचं काही कळतच नाही,

महिन्याचा पगार कसा पुरतच नाही.

साखर आहे तर चहा नाही,

तांदुळ आहेत तर गहू नाही.

ह्यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी,

घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी.

बाळ रडलं तर ते खपायचं नाही,

मिनिटभर कसं त्याला घ्यायचंही नाही.

 

स्वयंपाक करायला मीच,

बाळ रडलं तरी घ्यायचं मीच.

भांडी घासायची मीच,

अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.

जिवाच्या पलीकडे काम झालं खुप,

वेगळं राहायचं कळायला लागलं सुख….

 

सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या,

सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या.

मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,

बाजारहाट करायला भावजी जायचे.

कामात जावेची मदत व्हायची,

नणंद बिचारी ऊर नि पुर निस्तरायची.

आत्ता काय कुठल्या हौशी नि आवडी,

बारा महिन्याला एकच साडी.

थंडगार खिचडी, संपलं तूप,

अन् वेगळं व्हायचं कळलं सुख!

 

कवी: प्रा. मो. दा. देशमुख

प्रस्तुती:सौ. वर्षा राजाध्यक्ष

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 48 – मंदिर ऑफलाइन, भक्ति ऑनलाइन ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ ☆

डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

(डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ एक प्रसिद्ध व्यंग्यकार, बाल साहित्य लेखक, और कवि हैं। उन्होंने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज, और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने, और समन्वय करने में महत्वपूर्ण कार्य किया है। उनके ऑनलाइन संपादन में आचार्य रामचंद्र शुक्ला के कामों के ऑनलाइन संस्करणों का संपादन शामिल है। व्यंग्यकार डॉ. सुरेश कुमार मिश्र ने शिक्षक की मौत पर साहित्य आजतक चैनल पर आठ लाख से अधिक पढ़े, देखे और सुने गई प्रसिद्ध व्यंग्यकार के रूप में अपनी पहचान स्थापित की है। तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (तेलंगाना, भारत, के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से), व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान (आदरणीय सूर्यबाला जी, प्रेम जनमेजय जी, प्रताप सहगल जी, कमल किशोर गोयनका जी के करकमलों से), साहित्य सृजन सम्मान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों से और अन्य कई महत्वपूर्ण प्रतिष्ठात्मक सम्मान प्राप्त हुए हैं। आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य रचना मंदिर ऑफलाइन, भक्ति ऑनलाइन)  

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 48 – मंदिर ऑफलाइन, भक्ति ऑनलाइन ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ 

(तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)

आज का युग “डिजिटल भक्तों” का है। हर व्यक्ति के हाथ में स्मार्टफोन है और हर स्मार्टफोन में “भक्ति ऐप”। इन ऐप्स में भगवान की आरती, मंत्र और पूजा विधि उपलब्ध है। भक्त अब मंदिर जाने की बजाय वर्चुअल दर्शन करते हैं। भगवान भी डिजिटल हो गए हैं। यह युग तकनीक का है, जहां भक्ति भी इंटरनेट पर निर्भर हो गई है। भक्तों को अब घंटों लाइन में लगने की जरूरत नहीं, बस एक क्लिक और भगवान आपके सामने स्क्रीन पर प्रकट हो जाते हैं। यह सुविधा देखकर भगवान भी सोच में पड़ गए हैं कि आखिर उनकी भक्ति का स्वरूप इतना बदल कैसे गया।

एक दिन भगवान विष्णु ने नारद से कहा, “नारद, देखो तो, ये भक्त मेरे नाम पर क्या कर रहे हैं?” नारद ने हंसते हुए जवाब दिया, “प्रभु, ये तो डिजिटल भक्ति है। भक्त अब आपकी मूर्ति के सामने नहीं आते, बल्कि स्क्रीन पर आपका लाइव स्ट्रीमिंग देखते हैं।” यह सुनकर भगवान विष्णु को जिज्ञासा हुई और उन्होंने धरती पर जाकर स्थिति देखने का निश्चय किया। जब वे एक भक्त के घर पहुंचे तो देखा कि वह पूजा कर रहा था लेकिन उसकी नजर मोबाइल स्क्रीन पर थी। भगवान ने पूछा, “वत्स, मेरी मूर्ति कहां है?” भक्त ने उत्तर दिया, “प्रभु, मूर्ति की क्या जरूरत? आपके वर्चुअल दर्शन कर रहा हूं। यहां आपका 4के वीडियो है!”

भगवान विष्णु ने नारद से कहा, “नारद, यह तो अच्छा है। अब मुझे धरती पर जाने की जरूरत ही नहीं पड़ेगी। भक्तों को सिर्फ इंटरनेट चाहिए और मैं उनके पास हूं।” नारद ने मुस्कुराते हुए कहा, “प्रभु, यह तो तकनीक का चमत्कार है। अब आपकी भक्ति भी डिजिटल हो गई है। लेकिन सोचिए अगर इंटरनेट बंद हो जाए तो क्या होगा?” भगवान ने सोचा कि तकनीक ने भक्ति को सुविधाजनक बना दिया है लेकिन साथ ही इसे निर्भरता में बदल दिया है।

तभी एक दूसरा भक्त आया और बोला, “प्रभु, आपके दर्शन के लिए मेरा इंटरनेट पैक खत्म हो गया है। कृपा करके थोड़ा डेटा दे दीजिए!” यह सुनकर भगवान विष्णु चौंक गए। उन्होंने नारद से कहा, “नारद, अब मुझे ‘डिजिटल डेटा’ का अवतार लेना पड़ेगा!” नारद ने हंसते हुए कहा, “प्रभु, अब भक्तों की भक्ति आपके प्रति नहीं बल्कि डेटा पैक के प्रति अधिक हो गई है।”

© डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

संपर्क : चरवाणीः +91 73 8657 8657, ई-मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 240 ☆ शुभस्थ शीघ्रम… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना शुभस्थ शीघ्रम। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 239 ☆ शुभस्थ शीघ्रम

मौन मुखरित हो रहें हैं

शब्द के बोले बिना ।

भाव जैसे शून्य लगते

नैन के खोले  बिना ।।

*

धड़कने भी बात करतीं

आस अरु उम्मीद की ।

राह पर चलना सरल क्या

खाय हिचकोले बिना ।।

प्रतिष्ठा का वस्त्र जीवन में कभी नहीं फटता, किन्तु वस्त्रों की बदौलत अर्जित प्रतिष्ठा, जल्दी ही तार- तार हो जाती है.

सुप्रभात में आया ये मैसेज बहुत ही सुंदर संदेश दे रहा है। लोग कहते हैं चार दिन की जिंदगी है मौज- मस्ती करो क्या जरूरत है परेशान होने की। कुछ हद तक बात सही लगती है। मन क्या करे सुंदर सजीले वस्त्र खरीदे, पुस्तके खरीदे, सत्संग में जाए, फ़िल्म देखे या मोबाइल पर चैटिंग करे?

प्रश्न तो सारे ही कठिन लग रहे हैं, एक अकेली जान अपनी तारीफ़ सुनने के लिए क्या करे क्या न करे? सभी प्रश्नों के उत्तर गूगल बाबा के पास रहते हैं सो मैंने भी उन्हीं की शरण में जाना उचित समझा, प्रतिष्ठा कैसे बढ़ाएँ सर्च करते ही एक से एक उपाय सामने आने लगे, यू ट्यूब पर तो बौछार है ऐसे वीडियो की। हमारे मन में अहंकार कहीं न कहीं छुपा बैठा होता है जो जैसे ही अवसर पाता है निकल भागता है, सो वो भी हाज़िर हो गया, उसने तुरंत दिमाग़ को संदेश दिया कि क्या सारी उमर गूगल बाबा की चाकरी में निकाल दोगे, चलो अभी यू ट्यूब पर एकाउंट बनाओ और जल्दी से मोटिवेशनल वीडियो पोस्ट करो और हाँ सभी के व्हाट्सएप एप नम्बरों पर ये लिंक ब्राडकास्ट करना न भूलना।

अब जाकर दिल को सुकून आया कि सुबह जो मैसेज पढ़ा उसे कितनी जल्दी अमल में लाया, वाह ऐसे ही लोग सम्मान पाते हैं जो तुरंत कार्य सिद्धि में जुट जाते हैं।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – महाकाव्य ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – महाकाव्य ? ?

तुम्हारा चुप,

मेरा चुप,

कितना

लम्बा खिंच गया,

तुम्हारा एक शब्द,

मेरा एक शब्द,

मिलकर

महाकाव्य रच गया!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 12 अप्रैल 2025 से 19 मई 2025 तक श्री महावीर साधना सम्पन्न होगी 💥  

🕉️ प्रतिदिन हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमन्नाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें, आत्मपरिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Divine Realm… ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present Capt. Pravin Raghuvanshi ji’s amazing poem “~ Divine Realm… ~.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.) 

? ~ Divine Realm… ??

In the ego’s garden, sorrow and pain  and thrive,

In the realm of self, optimism and peace survive

 *

Let go of ego, then sorrow & sufferings fade away

Vanishes like mist, as the Sunlight comes to  stay

 *

Become a heart  that’s  free from vain and pride,

Surrender  yourself, as  God’s  will be your guide

 *

Breathe in His spirit, to let the Divine will unfold,

A pious life, where His blessings  never grow old

 *

Lord will protect you, with His gentle loving care,

Infuse peace and serenity that’s beyond compare

 *

In  the stillness of your heart, a melody will flow,

lasting harmony will prevail, in resplendent glow

~Pravin Raghuvanshi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune
16 April 2025

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 346 ☆ लघु कथा – “पत्तों की जादूगरनी…” ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 346 ☆

?  लघु कथा – पत्तों की जादूगरनी…  ? श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

 किले से शहर जाने वाली सड़क, दिन भर पर्यटकों की आमादरफ्त होती रहती थी।

अपनी आजीविका के लिए मालिन हरिया सड़क किनारे कभी फूलों से तो कभी पेड़ पौधों की टहनियों से अनोखी कलाकृति बनाया करती थी। पर्यटक बरबस रुकते, जो तेज रफ्तार आगे निकल जाते वे भी लौटने पर मजबूर हो जाते। लोग उसके आर्ट की प्रशंसा करते, सेल्फी लेते, फोटो खींचते। इनाम में हरिया को इतना तो मिल ही जाता कि उसकी गुजर बसर हो जाती, यह हरिया मालिन की कला का जादू ही था।

हर दिन एक नई योजना हरिया के हुनर में होती थी। कभी छींद के पत्तों से वह पंखा बना लेती तो कभी नारियल के खोल की गुड़िया बनाकर बेचा करती थी। कभी टेसू के फूलों से सजावट करती, तो कभी गेंदें के फूलों की बड़ी सी रंगोली डालती।

एक संस्था ने हरिया के ईको आर्ट की प्रदर्शनी भी शहर में लगवाई थी, जिसकी खूब चर्चा अखबारों में हुई थी।

हरिया को भी लोगों के प्रोत्साहन से नया उत्साह मिलता, वह कुछ और नया नया करती।

आज हरिया ने हरी पत्तियों से कला का ऐसा जादू किया था कि तोतों की ढेर सारी आकृतियां बिल्कुल सजीव बन पड़ी थीं। “पत्तों की जादूगरनी” सड़क किनारे अपनी कला का जादू बिखेर रही थी, मन ही मन संतुष्ट और प्रसन्न थी।

© श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

म प्र साहित्य अकादमी से सम्मानित वरिष्ठ व्यंग्यकार

संपर्क – ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798, ईमेल [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares