(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)
We present his awesome poem Taboos…We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.
(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में सँजो रखा है।आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता – “आदिवासी औरतें”।)
☆ कविता # 155 ☆ “आदिवासी औरतें” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆
(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# भोजन के पैकेट… #”)
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १९ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
प्रिया तेंडुलकर
प्रिया तेंडुलकर या सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची कन्या. पण ही त्यांची खरी ओळख नव्हे. कारण त्यांनी स्वतःचे विचार, अभिनय आणि लेखन यातून नाट्य, चित्र व साहित्य क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.
अंकुर, देवता, माहेरची माणसं, राणीनं डाव जिंकला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार इत्यादी चित्रपटातून त्यांनी कामे केली. शाम बेनेगल दिग्दर्शित ‘अंकुर’ हा त्यांचा पहिला चित्रपट.
त्या भारतातील पहिल्या टी.व्ही. स्टार म्हणून ओळखल्या जातात. ‘रजनी’ ही त्यांनी काम केलेली दूरदर्शन मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. या व्यतिरिक्त प्रिया तेंडूलकर शो, जिम्मेदार कौन, किस्से मिया बिबी के, हम पाॅच या मालिकात त्यांनी काम केले होते. ‘दामिनी’ ही त्यांची मराठी मालिकाही खूप गाजली होती.
एक हट्टी मुलगी, गिधाडे, ती फुलराणी या मराठी नाटकातही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
फर्स्ट पर्सन हे त्यांचे आत्मचरित्र. असंही, पंचतारांकित या नावाची ललित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. शिवाय जन्मलेल्या प्रत्येकाला, जावे तिच्या वंशा, ज्याचा त्याचा प्रश्न हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांच्या कर्तृत्वास सलाम.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विचार–पुष्प – भाग ३५ परिव्राजक १३.गुजरातचे दिवस ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
खेत्री म्हणजेच खेतडीहून स्वामीजी पुन्हा अजमेरला आले. श्री हरविलास सारडा यांच्याकडून तीन चार दिवसांनी ते बेबार इथं गेले असता, शामजी कृष्ण वर्मा अजमेरहून कामानिमित्त बेबारला आले होते, तेंव्हा ते स्वामीजींना बरोबर घेऊनच आले. हरविलास यांनी शामजींना स्वामीजींचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आणि त्यांची देशभक्ती याबद्दल सर्व सांगितलं होतं. शामजींच्या घरी स्वामीजी पंधरा दिवस राहिले होते. तिथे स्वामीजींचा शामजींबरोबर धार्मिक आणि तत्वज्ञानवर संवाद होत असे. हरविलास यांचे राजस्थानमध्ये समाज सुधारणेचे मोठे काम होते तर, राजकीय क्षेत्रातल्या सर्वात जहाल क्रांतिकारकांच्या चळवळीला मदत करणारे पंडित शामजी कृष्ण वर्मा. (आपल्याला शामजी कृष्ण वर्मा हे व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रात आपल्याला भेटले आहे.) या दोघांची भेट आणि झालेली वैचारिक देवाण घेवाण आश्चर्यकारकच आहे.
यानंतर स्वामीजी अबुच्या मार्गाने निघाले असता त्यांना तिथे ब्रम्हानंद आणि तुरीयानंद भेटले. यावेळी स्वामीजी फार उदास होऊन त्यांना म्हणाले, “ राजस्थान मधले लोकांचे दारिद्र्य पाहून माझे अंतकरण फाटून गेले आहे. त्यामुळे मला धड रात्री नीट झोप पण लागत नाही”. आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रु वाहू लागले. ते जरी खेत्रीला राजवाड्यात राहिले होते, तरी त्यांचा गावातील लोकांचा संपर्क आला होता. रोज कुठे ना कुठे खेडेगावात पण प्रवास झाला होता. तेंव्हा ग्रामीण भागातल्या लोकांचे दर्शन झाले होते. शेतकरी आणि झोपड्यातून राहणारी मुलेबाळे त्यांनी पहिली होती. अंगावर पुरेसे कपडे नाहीत, पोट खपाटीला गेलेलं, चेहरे निस्तेज हे दारिद्र्याचं दृश्य त्यांच्या अंतकरणाला भिडलं होतच. राजा अजीतसिंग यांच्याशी बोलताना सामान्य माणसापर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल. शिक्षण हे दारिद्र्य कमी करण्यास कसं उपयोगी पडेल यावर चर्चा होत असत आणि एखादा छोटासा संस्थानिक आपल्या प्रजेचा कल्याणकारी विचार करेल तर हजारो माणसांचं जीवन तरी सुखी होईल हे स्वामीजींना समजत होतं म्हणून ते तशी दृष्टी देण्याचा प्रयत्न संस्थांनीकांच्या भेटीत सगळीकडेच करत होते.
राजस्थान मधला प्रवास आटोपता घेऊन स्वामीजी आता गुजरातेत अहमदाबादला आले. काही दिवस भिक्षा मागून मिळेल तिथे राहिले नंतर, उपन्यायाधीश श्री बालशंकर उमियाशंकर यांच्याकडे राहिले, जैन साधूंची भेट घेतली. त्यांच्या बरोबर जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. पुढे लिमडी संस्थानला ते आले. लिमडीचे राजे, श्री ठाकुर जसवंतसिंग स्वामीजींच्या दर्शनाने प्रसन्न झाले. स्वामीजींना त्यांनी राजवाड्यातच काही दिवस ठेऊन घेतलं, ठाकुर जसवंतसिंग इंग्लंड आणि अमेरिकेचा प्रवास करून आले होते. त्यामुळे त्यांच्या विचारांना आधुनिकतेचा स्पर्श झाला होताच. पण तरी सुद्धा भारताच्या सनातन धर्माचा त्यांना अभिमान होता. त्यामुळे स्वामीजींचे विचार त्यांना पटले होते. वेदान्त विचारांचा प्रसार करण्यासाठी स्वामीजींनी पाश्चात्य देशात जावे ही कल्पना त्यांनीच प्रथम स्वामीजींना सुचवली असं म्हणतात. लिमडीहून जुनागडला जाताना ठाकुरांनी स्वामीजींना परिचय पत्र दिले.
भावनगर व सिहोरला राहून ते जुनागड इथं आले. इथल्या वास्तव्यात ते जुनागड संस्थानचे दिवाण श्री हरीदास बिहारीदास देसाई यांच्याकडे राहिले होते. इथला परिसर स्वामीजींच्या विचारांना अनुकूल होता. काही शतकांपूर्वी नरसी मेहता हे संत इथे होऊन गेले होते. शहरापासून जवळच गिरनार पर्वताचा पायथा इथं होता. तिथे जाण्याच्या मार्गावरच अनेक टेकड्यांवर पसरलेली हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांची मंदिरे होती. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी सम्राट अशोकाने लिहिलेला प्राचीन शिलालेख दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देत होता. त्यावर, प्रजेला सन्मार्गाने जाण्याचे आवाहन करणारी वचने कोरली होती. धर्म वचनांचा असा नम्रतेने पुरस्कार करणारा सम्राट अशोक खरं तर भारताचा एक वारसाच होता आणि हा इतिहास आपण कसा विसरून गेलो आहोत याची तिथल्या लोकांना स्वामीजींनी आपल्या विवेचनातून जाणीव करून दिली होती.
दिवाण साहेब स्वामीजींबरोबर अनेकांच्या भेटी आणि चर्चा घडवून आणत होतेच. हे संवाद मध्यरात्री पर्यन्त रंगत. स्वामीजींनी इथे, येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याचा युरोप वर झालेला परिणाम तिथली संस्कृती राफेलची चित्रकला, धर्मोपदेशक, त्यांच्या संघटना, यामागे कशी येशू ख्रिस्ताची प्रेरणा आहे हे लोकांना समजून संगितले. युरोपमध्ये झालेली धर्मयुद्धे सांगितली. त्याच बरोबर भारतीय संस्कृतीतली तत्वे कशी युरोप मध्ये पोहोचली आहेत हे सांगीतले. मध्य आणि पश्चिम आशियाचा इतिहास सांगितला आणि जगत अध्यात्म विचारात आपल्या भारतीय संस्कृतीचा कसा महत्वाचा आणि फार मोठा वाटा आहे हे पण सांगीतले. स्वदेशीचा अभिमान आणि श्रीरामकृष्ण यांचा परिचयही तिथल्या सुशिक्षित लोकांना करून दिला. सर्वंकष विचार करणार्या अशा व्यक्तीचा सहवास लाभला आणि भेट झाली यात जुनागड च्या लोकांना धन्यता न वाटली तरच नवल होतं.
इथून स्वामीजी वेगवेगळ्या स्थळांना भेटी देऊन आले. भूज, कच्छ, वेरावळ आणि वेरावळ पासून जवळच असलेला, प्राचीन इतिहासाशी नातं सांगणारं प्रभासपट्टण इथे गेले. तेंव्हा त्यांनी गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले सोमनाथचे भग्न मंदिर पाहिले. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले छोटे मंदिर पाहिले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेल यांनी खंबीर धोरण स्वीकारून उभं केलेलं सोमनाथ मंदिर आज आपल्याला दिसतं.
प्रभास पट्टणहून स्वामीजी पोरबंदरला आले. हे ही एक संस्थान होते. तिथले प्रशासक श्री शंकर पांडुरंग पंडित यांच्या नावाने स्वामीजींना जुनागडहून परिचय पत्र दिल्याने स्वामीजी त्यांच्याकडे उतरले होते. हे पंडित वेदवाङ्ग्मयाचे अधिकारी व्यक्ति होते. त्यावेळी त्यांचे वेदांचे भाषांतराचे काम चालू होते. स्वामीजींची ओळख झाल्यावर सुरूवातीला त्यांनी स्वामीजींची कठीण भागाचे भाषांतर करण्यासाठी मदत घेतली. पण नंतर स्वामीजी या कामात खूप रमले. भाषांतरासाठी मदत म्हणून ते तिथे राहिले.
शंकर पांडुरंग पंडित हे मोठे विद्वान होते. युरोपातील अनेक देशात ते प्रवास करून आले होते. त्यांना फ्रेंच आणि जर्मन भाषा येत होत्या. त्यांचं स्वतच मोठं ग्रंथालय होतं. याचं आकर्षण स्वामीजींना वाटलं होतं. पंडितांनी स्वामीजींना पहिल्या भेटीत सांगितलं होतं की, कितीही दिवस रहा आणि ग्रंथालयाचा हवा तेव्हढा वापर करा. या ओढीने स्वामीजी पुन्हा पोरबंदरला येऊन भाषांतरा साठी राहिले आणि त्यांची वेदांचा अभ्यास करण्याची फार दिवसांची इच्छा पण पूर्ण झाली.
स्वामीजींचे विचार अनेक वेळा ऐकल्यानंतर पंडित त्यांना म्हणाले होते, “स्वामीजी, आपल्या देशात तुमच्या विचारांचं चीज होणार नाही. तुम्ही पाश्चात्य देशात गेलं पाहिजे. भारतीय परंपरा आणि संस्कृती जाणण्याची जिज्ञासा असणारी माणसं तिकडं आहेत. तुम्ही तिथं जाऊन आपल्या धर्मातली सनातन तत्व स्पष्ट केलीत तर, त्याचा प्रभाव पाश्चात्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फ्रेंच भाषेचा अभ्यास केलात तर युरोप मध्येही खूप उपयोग होईल. यावर स्वामीजी म्हणाले, “मी एक संन्यासी आहे, माझ्या दृष्टीनं पूर्व काय आणि पश्चिम काय दोन्ही सारखी आहेत. तशी वेळ आली तर मी पश्चिमेकडे जाईन”.
आधुनिक दृष्टी असलेल्या, जग पाहिलेल्या आणि हिंदुधर्माचा उत्तम व्यासंग असणार्या पंडितांची ओळख आणि भेट आणि वेदांचं भाषांतर करण्याची कष्टाची का असेना मिळालेली संधी यामुळे इथला स्वामीजींचा प्रवास फलदायी झालेला दिसतो.
अनुभूति म्हणजे अनुभवच पण अलौकिक वाटावा असा अनुभव. सुखद आश्चर्याचा स्पर्श जाणवणारा आणि असह्य दु:खावर अनपेक्षितपणे फुंकर घालावी तशी वेदना शमवणारा ! अनुभूतीचे असे स्पर्श त्या अनुभवात लपलेल्या अनुभूतीच्या चैतन्यदायी प्रकाशाचेच स्पर्श असतात. असा अनपेक्षित स्पर्श जाणवताच मनोमन होणारे विश्लेषण अनुभूतीची साक्ष पटवणारे असते.
क्वचितच कधीतरी अकल्पितपणे एखादा क्षण जणू आपली परीक्षा पहायला आल्यासारखा समोर येऊन जेव्हा उभा रहातो तेव्हा त्या नेमक्या क्षणी आपल्या नैसर्गिक प्रतिक्रियेला आणि कृतीला अनन्यसाधारण महत्त्व असते. हे असे प्रसंग मोजकेच असले तरी ते आपला कस पहाणारे असतात. त्या कसोटीला उतरणारे अर्थातच अनुभूतीत लपलेल्या अलौकिक आनंदाचे धनी होतात!
मी स्वतःला असा भाग्यवान समजतो कारण अशा अलौकिक आनंदाचे दान अनेक प्रसंगात माझ्या वाट्यास आलेले आहे. त्या अनुभूतीच्या आनंदाचे ठसे मी मनोमन जपून ठेवलेले आहेत!
मी युनियन बँकेच्या सोलापूर (कॅंप) ब्रॅंचचा मॅनेजर म्हणून नुकताच चार्ज घेतला होता तो १९८८ मधला हा प्रसंग. मला अतिशय गूढ, अकल्पित,अतर्क्य अशी अनुभूती देणारा !
त्याचीच ही अनुभव कथा!
‘आनंदाचे ठसे…’ – भाग – २
(पूर्वसूत्र – एका गंभीर बनू शकणाऱ्या प्रश्नाचं हे सहज सोपं उत्तर होतं. म्हणून मग आठवड्यातले दोन दिवस बँकेत येताना मी स्वतःच लिटिल फ्लॉवर काॅन्व्हेंट स्कूलमधे जाऊन स्वतः कॅश मोजून घेऊन कॅश व स्लीप बँकेत घेऊन येऊ लागलो)
काही दिवस हे सुरळीत सुरू राहिलं आणि तो अनपेक्षित प्रसंग घडला. एका शुक्रवारची गोष्ट. रिजनल ऑफिसच्या अचानक आलेल्या फोननुसार शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता मला ब्रॅंच-मॅनेजर्स मीटिंगसाठी कोल्हापूरला जावं लागणार होतं.रविवारी पौर्णिमा असल्याने सोलापूरला परतण्यापूर्वी माझ्या नित्यनेमानुसार नृसिंहवाडीला दत्तदर्शन घेऊन येणंही शक्य होणार होतं. मीटिंगची आवश्यक ती तयारी रात्री उशीरपर्यंत बसून पूर्ण केली.शनिवारी पहाटे उठून मी बॅग घेऊनच बाहेर पडलो आणि ‘लिटिल फ्लॉवर’मधे जाऊन पैसे मोजून ताब्यात घेतले.पैसे आणि स्लिप ब्रॅंचमधे जाऊन सुजाता कडे सोपवली.
“सुजाता नीट मोजून घे मगच मी निघतो”मी तिला सांगितलं.
ती ‘हो’ म्हणाली. मी केबिनमधे आलो. थोडा वेळ वाट पाहिली. मग न रहावून बॅग घेऊन बाहेर आलो.
“सर, खरंच निघा तुम्ही”
सुजाता म्हणाली तेव्हा माझी सुटका झाली.
कोल्हापूरची मीटिंग चांगली झाली. नृसिंहवाडीचं दत्त दर्शन निर्विघ्नपणे पार पडलं. घरी सर्वांना भेटणं,गप्पा मारणं, फिरणं झालं आणि नेहमीच्या चक्रात अडकण्यासाठी मी रविवारी रात्री उशिराची सोलापूरची बस पकडली. पहाटे साडेपाचच्या सुमाराला घरी पोचलो. साडेआठला ब्रॅंचमधे. रात्रभराच्या जागरणाचा शीण सोबत असल्याने उत्साह फारसा नव्हताच. पण जो होता तो उसना उत्साहही नाहीसा करणारं एक अशुभ आक्रित ब्रॅंचमधे माझी वाट पहात होतं.मी केबिनमधे जाताच माझीच वाट पहात असलेले सुहास गर्दे माझ्यापाठोपाठ केबिनमधे आले.
“गुड मॉर्निंग सर”
“गुड मॉर्निंग.कांही विशेष?”
“विशेष काही नाही सर. पण शनिवारी थोडा घोळच झाला होता”
माझ्या मनात कुशंकेची पाल चुकचुकली.
“कसला घोळ?”
“लिटिल फ्लॉवरच्या कॅशमधे ८५० रुपये शॉर्ट होते.”
“अहो भलतंच काय?कसं शक्य आहे हे?”
“सर,खरंच.५० रुपयांच्या सतरा नोटा कमी होत्या”
एव्हाना सुजाता समोर येऊन खाली मान घालून उभी होती.
“सुजाता, हे काय म्हणतायत?”
“हो सर. ८५० रुपये शॉर्ट होते” तिचे डोळे नेहमीप्रमाणे पाझरू लागले. ती उभीच्या उभी थरथरू लागली. मला संताप अनावर होऊ लागला. मी काही न बोलता डोकं गच्च धरून क्षणभर तसाच बसून राहिलो. संतापाने भरलेल्या जळजळीत नजरेने तिच्याकडे पहात तिला जायला सांगितलं. डोळे पुसत ती केबिन बाहेर गेली. मी व्यवस्थित पैसे मोजून तिच्याकडे दिलेले असताना ८५० रुपये कमी येतीलच कसे? एखाद दुसरी नोट कमी असणंही शक्य नव्हतं आणि चक्क १७ नोटा कमी? मनातला संशयी विचार सुजाताच्या पाठमोऱ्या आकृतीचा पाठलाग करीत राहिला. तिची आर्थिक चणचण,कौटुंबिक प्रश्न,थोड्याच दिवसात येऊ घातलेलं तिचं बाळंतपण.. सगळंच माझ्या मनातल्या संशयाला पुष्टी देत होतं. पण संशयाचा काटा मनात रुतण्यापूर्वीच मी तो उपटून दूर भिरकावून दिला. ‘नाहीs सुजाता असं कांही करणं शक्यच नाही..’ मनाला ठामपणे बजावून सांगितलं. पण मग ‘साडेआठशे रुपये गेले कुठे ‘हा प्रश्न होताच.
“सुहास, मला पूर्ण खात्री आहे. मी ती कॅश दोनदोनदा मोजून घेतली होती. त्या कॅशमधे फरक असणं शक्यच नाही. दुसऱ्या कुठल्यातरी रिसीटमधे चूक असेल. कांहीतरी गफलत नक्कीच झाली असेल.हा प्रश्न धसाला लावलाच पाहिजे”
“त्याची खरंच काही गरज नाहीये सर. प्रॉब्लेम आता मिटलाय.पैसे वसूल झालेत.”.
“वसूल झाले म्हणजे?कसे? कुणी भरले?”
“सर, मी ‘लिटिल फ्लॉवर’ला फोन करून त्याच दिवशी सांगितलं.तुम्ही मीटिंगसाठी कोल्हापूरला गेला आहात हेही बोललो. त्यांनी आढेवेढे न घेता लगेच पैसे पाठवले सर”
ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं, कसं रिअॅक्ट व्हावं समजेचना.मिस् डिसूझाना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा, पण माझाच हात थरथरू लागला. डायल न करताच मी रिसिव्हर ठेवून दिला. सुहास गर्देने बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं पण जाताना मात्र त्याच्याही नकळत तो मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून गेलाय असंच मला वाटू लागलं. कारण पैसे मोजून घेणारा मी होतो! मी शांतपणे डोळे मिटून मान मागे टेकून बसलो. स्वस्थता नव्हतीच. माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयग्रस्त नजरेने माझ्याकडेच पहातायत असा भास मला झाला आणि मी दचकून भानावर आलो. खूर्ची मागे सरकवून ताडकन् उभा राहिलो. काहीतरी करायला हवं होतं पण काय करावं ते सुचत नव्हतं. अस्वस्थ मनाला प्रकाश दाखवू पहाणारा एक विचार सळसळत वर झेपावला आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो.
“सुजाता, मी त्या दिवशी ‘आधी कॅश मोजून घे मगच मी जातो” असं तुला सांगितलं होतं ना?” तिने भेदरून माझ्याकडे पाहिलं. माझा चढलेला आवाज ऐकून सर्व स्टाफ मेंबर्स चमकून माझ्याकडे पहात राहिले. सुहास गर्देची बसल्या जागी चुळबूळ सुरू झाली.
“सुहास, कॅश शॉर्ट आहे हे तुमच्या कधी लक्षात आलं?”
“सर, सुजाताच्या काउंटरला शनिवारी खूप गर्दी होती.त्यामुळे तुम्ही दिलेली कॅश बरोबरच असणार म्हणून तिने ती न मोजता तशीच बाजूला सरकवून ठेवली होती आणि सगळ्यांत शेवटी ती मोजली तेव्हा त्यात पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी असल्याचं लक्षात आलं”
“म्हणून मागचा पुढचा विचार न करता तुम्ही थेट मिस् डिसोझांना फोन केलात?”
“साॅरी सर “
त्यांच्यासमोर डोके आपटून घेण्यात काही अर्थच नव्हता. मिस् डिसोझांना तातडीने फोन करणं गरजेचं होतं पण माझं धाडस होईना. स्वतःच एखादा भयंकर गुन्हा केल्यासारखं मलाच अपराधी वाटू लागलं. त्यांना समक्ष जाऊन भेटणंच गरजेचं होतं. तेही आत्ताच. या क्षणी. पण जाऊन सांगणार काय? रिक्त हस्तानं जाणंही योग्य वाटेना. पगार व्हायला अजून बरेच दिवस अवकाश होता. त्या काळी ८५० रुपये ही कांही फार किरकोळ रक्कम नव्हती. आपल्या सेव्हिंग खात्यात पुरेसा बॅलन्स असेल? हा विचार मनात आला आणि मी खसखन् आमचं स्टाफ लेजर ओढलं. माझ्या सेव्हिंग खात्याचा फोलिओ ओपन केला. पाहिलं तर नेमका ८५५ रुपये बॅलन्स होता. त्या काळी पाच रुपये मिनिमम बॅलन्स ठेवायला लागायचा. मी लगोलग विथड्राॅल स्लिप भरून ८५० रुपये घेतले आणि बाहेरचा रस्ता धरला.
मिस् डिसोझांच्या कपाळावर सूक्ष्म आठी होती. चेहऱ्यावरचं स्मितहास्य विरून गेलं होतं. नेहमीची शांत नजर गढूळ झाली होती. त्यांनी समोर बसण्याची खूण केली.
“येस्..?”त्यांनी त्रासिकपणे विचारलं.”
“मी मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलो होतो मॅडम. आज पहाटेच आलो. सकाळी ब्रॅंचमधे गेलो तेव्हा सगळं समजलं. माय स्टाफ शुड नॉट हॅव रिकव्हर्ड दॅट अमाऊंट फ्रॉम यू. आय अॅम रियली सॉरी फॉर दॅट”
मी काही न बोलता शांतपणे माझ्या खिशातले ८५० रुपये काढले. ते अलगद त्यांच्यापुढे ठेवले.
“व्हॉट इज धिस?”
“त्यांनी तुम्हाला फोन करून ते पैसे रिकव्हर करायला नको होते. बट दे वेअर इनोसंट. त्यांची चूक मला रेक्टिफाय करू दे. प्लीज. तुमच्याकडून मी पैसे मोजून माझ्या ताब्यात घेतले त्या क्षणीच तुमच्यापुरता तो व्यवहार पूर्ण झाला होता. पुढची जबाबदारी मीच स्वीकारायला हवी.सो प्लीज अॅक्सेप्ट इट”
त्यांच्या कपाळावरच्या आठ्या एकदम विरून गेल्या. गढूळ नजर स्वच्छ झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं प्रसन्न स्मितहास्य पाहून मी समाधानाने उठलो.निघणार तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं.
“वेट अ मिनिट. लिसन मि.लिमये, फॉर मी हा प्रश्न फक्त पैशाचा कधीच नव्हता. हिअर इज ह्यूज अमाऊंट ऑफ इनफ्लो फ्रॉम अॅब्राॅड रेग्युलरली. तेव्हा ८५० रुपये ही रक्कम माझ्यासाठी खूप लहान होती. पण प्रश्न तत्त्वाचा होता. विश्वासाचा होता. तरीही विथ एक्स्ट्रीम डिससॅटिस्फॅक्शन त्यादिवशी मी त्यांच्या मागणीनुसार आठशे पन्नास रुपये पाठवले होते कारण त्या क्षणी आय डी नॉट वॉन्ट टू मेक इट अॅन इश्यू. इट्स नाईस यू हॅव कम पर्सनली.सोs नाऊ धीस मॅटर इज ओव्हर फाॅर मी. प्लीज डोन्ट वरी फॉर माय लॉस.आय ॲम शुअर माय गॉड वील गिव्ह इट बॅक टू मी इन वन वे आॅर अदर”
त्या मनापासून बोलत होत्या. पण मला ते स्वीकारता येईना.
“मॅडम प्लीज. मलाही असाच ठाम विश्वास वाटतो आहे. माय गॉड ऑल्सो वीर स्क्वेअर अप माय लाॅस इन धीस आॅर दॅट वे. मी आत्ता हे पैसे स्वतः देतो आहे ते केवळ कर्तव्य भावनेने आणि फक्त माझ्या स्वतःच्या समाधानासाठी. मला त्याचीच गरज आहे मॅम. प्लीज अॅक्सेप्ट इट…प्लीज”
त्या हसल्या.अव्हेर न करता त्यांनी ते पैसे स्वीकारले. तरीही ८५० रुपये गेले कुठे ही रुखरुख माझ्या मनात होतीच. पण तीही फार काळ टिकली नाही. कारण मी परत बँकेत येताच सुहास गर्दे सुजाताला घेऊन माझ्यापाठोपाठ माझ्या केबिनमधे आले. सगळी चूक सुजाताची होती आणि तिला ती कन्फेस करायची होती.
समोरची गर्दी कमी झाल्यावर त्या दिवशी सुजाताने लिटिल फ्लॉवरची कॅश मोजायला घेतली.पन्नास रुपयांची पॅकेटस् मोजायला सुरुवात करणार तेवढ्यात पेट्रोल पंपाचा माणूस नेहमीप्रमाणे ड्राफ्ट काढण्यासाठी कॅश भरायला आला. शनिवारचा हाफ डे.कॅशअवर्स संपत आलेले. त्याला तातडीने ड्राफ्ट हवा होता. सुजाता भांबावली. तिच्या रुटीन मेडिकल चेकअपची अपॉइंटमेंट असल्याने काम आवरून तिलाही निघण्याची घाई होती. त्यामुळे लिटिल फ्लॉवरची कॅश पूर्ण न मोजता तशीच बाजूला सारून तिने पेट्रोल पंपाची कॅश मोजायला घेतली. त्यात एक रुपयापासून शंभर रुपयांपर्यंतच्या नोटांचा खच. ती कॅश मोजून झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं त्यात ८५० रुपये जास्त आहेत. तिने पुन्हा सगळी कॅश मोजून खात्री करून घेतली आणि मग शिक्का मारलेली रिसीट आणि जास्तीचे आलेले ८५० रुपये पेट्रोल पंपाच्या माणसाला परत केले. त्यानंतर लिटिल फ्लाॅवरची कॅश मोजायला घेतल्यावर तिच्या लक्षात आलं की ती ८५० रुपयांनी कमी आहे. अर्धवट मोजून आधी बाजूला सरकवून ठेवताना त्यातल्या पन्नास रुपयांच्या सतरा नोटा अनवधानाने पेट्रोल पंपाच्या कॅशमधे मिक्स झाल्या होत्या. म्हणूनच ती कॅश ८५० रुपयांनी जास्त येत होती. हे जाणवलं तेव्हा सुजाता घाबरुन गेली होती.
“पेट्रोल पंपावरचा माणूस रोज बँकेत येणाराच आहे ना?”
“नाही सर. रोज दिवाणजी येतात.शनिवारी ते नसल्याने दुसरा नोकर आला होता”
“हो पण मग प्रॉब्लेम काय? पेट्रोल पंपाचे मालक आपल्या ओळखीचे आहेत ना?”
सुहास गर्दे मान खाली घालून बोलू लागले,
“हो सर.मी इतर दोघा तिघांना घेऊन शनिवारी आधी त्यांच्याकडेच गेलो होतो सर पण.. पण त्या नोकराने सरळ हात वर केले.८५० रुपये सुजाताने दिलेच नव्हते म्हणाला. मालकांनी दमात घेतल्यावर पॅन्टचे खिसे उलटे करून दाखवू लागला. रडून भेकून कांगावा सुरू केलान्”
“म्हणून तुम्ही मिस डिसोझांना फोन केलात? ती चूक कॅश काउंटिंगमधल्या चुकीपेक्षाही जास्त गंभीर होती सुहास..” कशी ते मी त्यांना समजावून सांगितलं. तिथं मी गेल्यावर जे घडलं त्या सगळ्याची त्यांना कल्पना दिली. ऐकताना सुजाताची मान शरमेने खाली गेली होती. तिचे डोळे भरून आले होते. ती असहाय्यपणे उठली. थोडी रेंगाळली. मग केबिनचं दार ढकलून जड पावलांनी बाहेर गेली. पुन्हा आत आली आणि मुठीत घट्ट आवळून धरलेली शंभर रुपयांची नोट माझ्यापुढे करून उभी राहिली.
“सर”.. तिचा आवाज भरून आला. “तुम्ही होतात म्हणून त्यावेळी मला सांभाळून घेतलंत. माझ्याऐवजी तुम्ही स्वतः पैसे भरलेत. त्यावेळेस खरंतर ते मी भरायला हवे होते पण तेव्हा तेवढे पैसे नव्हते माझ्याजवळ. पण आता दर महिन्याला असे थोडे थोडे करून मी ते परत करणाराय सर”.
मी मनातून थोडासा हललो. याच सुजाताबद्दल क्षणभर कां होईना पण माझ्या मनात संशय निर्माण झालेला होता या कल्पनेनेच मला अस्वस्थ वाटू लागलं.
नकळत घडत गेलेल्या प्रसंगांच्या या दीर्घ मालिकेचा हा समाधानकारक समारोप आहे असं मला वाटलं पण ते तसं नव्हतं. मी सुजाताची समजूत काढली. तिने पैसे परत करायची आवश्यकता नाहीय हे तिच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते पटेना. माझे म्हणणं नाईलाजाने स्वीकारल्यासारखी ती उठली. मला वाटलं या सगळ्याच प्रकरणाला मी अतिशय योग्य पद्धतीने पूर्णविराम दिलाय. पण तो पूर्णविराम नव्हता तर अर्धविराम होता हे मला खूप नंतर समजलं. कारण प्रत्येकाच्याच विचारांचा आणि मनोभूमिकांचा कस पहाणाऱ्या या प्रसंगाचे धागेदोरे भविष्यात घडू पहाणाऱ्या एका अतर्क्याशी जोडले गेलेले आहेत हे त्या क्षणी मला तरी कुठे ज्ञात होतं?
☆ बाबा…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
हाफ चड्डीत सायकलच्या पुढच्या दांडीवर एका बाजूला दोन पाय टाकून तिरका बसायचो आणि बाबा अंगातला सगळा जोर लावून पायडल मारत सायकल पुढे न्यायचे. त्यावेळी मला फक्त सायकलला झूम करून येणारा वेगच समजायचा आणि मन सुखावून जायचं.. त्यामागे बाबांनी दातओठ खाऊन लावलेला तो जोर कधी जाणवलाच नाही! संसाराचा सगळा गाडा त्यांनी आणि आईनी असाच जोर लावून पुढे नेला. मला समजला तो माझ्या आयुष्याला मिळत राहिलेला वेग… समजली ती फक्त माझी होत असलेली प्रगती – शारीरिक वाढीतली, खेळातली, स्पर्धांमधली, शिक्षणातली, व्यवहारज्ञानातली… आणि मी अभिमानानं सुखावत गेलो… त्यामागे आई-बाबांनी लावलेला जोर त्यांनी कुठून आणि कसा आणला हे समजलंच नाही.
ते वयच नव्हतं बहुदा, हे असलं काही समजून घेण्याचं. पण कालचक्राला सगळं समजतही असतं आणि उमजतही! प्रत्येक गोष्टीत बाबांना गृहीत धरणारा, ते आहेत, ते बघतील, ते करतील असं म्हणणारा मी अलगद स्वतः बाबांच्या भूमिकेत कधी शिरलो, समजलंच नाही.
तेव्हा आम्ही फरशीवरच्या बाजारात गणपती बाप्पा आणायला जायचो. ही मूर्ती घेऊ की ती घेऊ असं व्हायचं. वेगवेगळ्या मूर्ती बघत असताना त्यातून आपल्या घरी कुठली न्यायची याची निवड माझं ‘वय’ करायचं तर बाबांचा अनुभव आणि सुजाणपणा ती निवड करायचा. ” पण बाबा ती कित्ती मस्त आहे? ती मूर्ती का नको? ” असा हट्ट करणारा, प्रसंगी रडणारा मी, ” अरे! ही बघ ही घेऊया. ती छान आहे, पण ती नाही चालणार आपल्याकडे.” हे उत्तर ठामपणे कधी देऊ लागलो समजलंच नाही.
” बाबा आज मी करू देवपूजा ?” ” बाबा आज मी करू बाप्पांची आरती? ” अशी हट्टपूर्वक विनंती करणारा मी कधी या सगळ्या गोष्टींना सरावलो समजलंच नाही.
–आणि “अजून थोडा मोठा झालास की कर “, “अरे हात दुखतील तुझे ताम्हन धरून, थोडा मोठा झालास की करायचीच आहे आरती,” असं म्हणणारे बाबा, अलगद आरतीच्या वेळी गर्दीत सगळ्यात मागे जाऊन कधी उभे राहू लागले तेही समजलंच नाही.
आज वयाच्या अशा नेमक्या टप्प्यावर आलोय की सगळा पट उलगडल्यासारखा वाटतोय. मला पडणारे प्रश्न माझ्या मुलाला पडू लागलेत, मी करायचो तो हट्ट मुलगी करू लागलीये. आणि त्यावेळी बाबा द्यायचे तशी उत्तरं माझ्या तोंडी आलीयेत.
आजही बाप्पा आणायला आम्ही एकत्र जातो. ‘ सायकल ‘ची जागा आता ‘ फोर व्हीलर ‘ नं घेतलीये. पण ” तुम्ही या घेऊन, मी हिच्याबरोबर घरी थांबून स्वागताची तयारी करतो,” असं बाबा कधी म्हणायला लागले समजलंच नाही.
आरतीचं ताम्हन मला जड होईल, असा विचार करणाऱ्या बाबांना, आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं जड होऊ लागलंय. त्यांचा तो जोर कधी, कसा निघून गेला समजलंच नाही..
बाबा … मला सायकलच्या दांडीवर बसवून वेगात पायडल मारण्याचा तो जोर तुम्ही कुठून, कसा आणला होतात, आणि तो कधी, कसा निघून गेला समजलंच नाही. पण तो जोर गेला कुठे?– याचा उलगडा झालाय मला..
तो सगळा जोर तुम्ही माझ्या मनगटात भरलाय आणि ती सगळी जिद्द मला वारसा म्हणून दिलीये हे आता मला नक्की समजलं आहे!
आजही मला तुम्ही खूप आवडता…. अगदी गणपती बाप्पांइतकेच !!!!
{सर्व बाबा लोकांना समर्पित.}
लेखक – अज्ञात
संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈