मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मृत्यूमुखातील ते पंधरा दिवस !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“मृत्यूमुखातील ते पंधरा दिवस ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्यांना त्याच्यावर संशय होताच… पण त्यांच्या संशयाबाबतच ते काहीसे साशंक होते! कारण तो तर त्यांच्यासारखाच.. नखशिखांत अतिरेकी. भारतीय सैनिकांच्या रक्ताची तहान असलेला नवतरुण. त्याच्या भावाचा इंडियन आर्मीच्या गोळ्यांनी खात्मा झाला होता म्हणून त्याचा त्याला सूड उगवायचा होता. त्याच्याकडे हल्ल्याची संपूर्ण योजना कागदावर आणि डोक्यात अगदी तयार होती. कुणाचाही या योजनेवर विश्वास बसावा अशी ती योजना होती. भारतीय सैनिकांचा तळ नेमका कुठे आहे, तिथे एकावेळी किती सैनिक असतात, शस्त्रास्त्रे कोणती वापरली जातात… त्यांच्या गस्तीचे मार्ग कोणते इ. इ. सारी माहिती नकाशांसह अगदी अद्ययावत होती. फक्त योग्य वेळ साधून हल्ला चढवायचा अवकाश…. निदान त्यावेळे पुरती का होईना… भारतीय सेना हादरून जावी! पण या कामासाठी त्याला आणखी मदत हवी होती. म्हणून त्याने या दोघांना भेटण्याचा गेली दोन वर्षे प्रयत्न चालवला होता. शेकडो खब-यांच्या माध्यमातून या दोघांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला होता… आणि आता कुठे त्यात त्याला यश आले होते! हे दोघे होते पाकिस्तानी हिज्बुल मुजाहिदीन नावाच्या कुप्रसिद्ध अतिरेकी संघटनेचे कमांडर… अबू तोरारा आणि अबू सब्झार. या दोघांनी अनेक अतिरेकी कारवाया करून अनेकांचे बळी घेतले होते आणि शेकडो काश्मिरी तरुणांना अतिरेकाच्या मार्गावर ओढले होते. त्याची आणि या दोघांची भेट झाली आणि त्याच्या चेह-यावर एक निराळाच आनंद पसरला… मक्सद सामने था! त्यांना वाटले आणखी एक बळीचा बकरा गवसला.. याला तर भडकावण्याची गरज नाही… याच्या डोक्यात तर भारताविषयी पुरेपूर द्वेष भरलेला आहे आधीच. त्यांनी त्याचे स्वागत केले. तो त्यांच्यासमवेत डोंगरात, जंगलात लपून राहिला. भारतीय सैनिक आपला नेमका कुठे शोध घेत आहेत, हे त्याला पक्के ठाऊक होते. त्यांच्या हाती लागू नये, म्हणून त्याने या आपल्या नव्या दोस्तांना उत्तम मार्गदर्शनही केले. त्यामुळे तो त्यांच्या आणखी मर्जीत बसला.

इफ्तेखार… त्याच्या या नव्या नावाचा अर्थच मुळी होता महिमा! अर्थात कर्तृत्वातून प्राप्त होणारे महात्म्य.. मोठेपणा! हे नाव स्वीकारून त्याला फार तर आठ पंधरा दिवस झाले असतील नसतील… पण या अल्पावधीत त्याने त्याचे कुल, त्याचा देश आणि त्याच्या गणवेशात असणाऱ्या आणि येऊ पाहणाऱ्या लाखो लोकांच्या मनात कायम आदराचे स्थान मिळेल अशी कामगिरी केली. त्याचे पाळण्यातलं नाव मोहित… म्हणजे मन मोजणारा श्रीकृष्ण. तो होताच तसा राजस.. खेळकर आणि खोडकर.

खेळात प्रवीण आणि अभ्यासात हुशार. घराण्यात सैनिकी सेवेची तशी कोणतीही ठळक परंपरा नसताना या पोराने घरी सुतराम कल्पना न देता सैन्याधिकारी सेवेत प्रवेश करण्यासाठीचा अर्ज भरला.. परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाला. तोपर्यंत घरच्यांनी त्याला दिल्लीतून थेट महाराष्ट्रात श्री गजानन महाराजांच्या शेगाव नगरीत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात धाडून दिले होते. वर्ष होते १९९५. सैन्याधिकारी पदासाठी होणार असलेल्या मुलाखतीचे पत्र त्याच्या घरच्यांच्या हाती पडले.. पण त्यांनी त्याला काहीही कळवलं नाही! पोराने सरळ आपलं इंजिनिअर व्हावं आणि आपली म्हातारपणाची काठी व्हावं असा त्यांचा उद्देश असावा. पण आपण परीक्षा तर दिली आहे.. उत्तीर्ण तर होणारच असा त्याला इतका विश्वास होता की त्याने थेट संबंधित कार्यालयात दूरध्वनी करून निकालाची माहिती मिळवली… भोपाळ येथे होणार असलेल्या मुलाखतीसाठी त्याला बोलावणं आलं होतं. श्री संत गजानन महाराज इंजीनियरिंग कॉलेजातून बेडविस्तर गुंडाळून साहेब थेट घरी आले. आणि तेथून भोपाळची रेल्वे पकडली. आपल्या आत्मविश्वासपूर्ण वागण्या बोलण्याने त्याने मुलाखतीत बाजी मारली. त्याला पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळाला होता… एक उमदा प्रशिक्षणार्थी सज्ज होता. एन. डी. ए. मधली कारकिर्द तर एकदम उत्तम झाली. घरी चिंटू असलेला मोहित इथे ‘माईक’ बनला! मोहित यांनी बॉक्सिंग, स्विमिंग, हॉर्स रायडिंग मध्ये सर्वोत्कृष्ट पातळी गाठली. नर्मविनोदी स्वभाव आणि दिलदार असल्याने मोहित एन. डी. ए. मध्ये मित्रांचे लाडके बनले होते.

एन. डी. ए. दीक्षान्त समारंभात देशसेवेतील प्रथम पग पार करून मोहित शर्मा आपल्या अंतिम ध्येयाकडे निघाले. इंडियन मिलिटरी अकादमी मध्ये दाखल होताच मोहित यांनी आपले नेतृत्वगुण विकसित करायला आरंभ केला. त्यांना Battalion Cadet Adjutant हा सन्मान प्राप्त झाला. तत्कालीन राष्ट्रपती महामहीम श्री. के. आर. नारायनन साहेबांना भेटण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली होती. इथले प्रशिक्षण पूर्ण करून साहेब सेनेत दाखल झाले.

मोहित हे १९९९ मध्ये लेफ्टनंट मोहित शर्मा म्हणून हैदराबाद येथील ५, मद्रास मध्ये दाखल झाले. येथील कार्यकाळ यशस्वी झाल्यानंतर मोहित साहेब पुढे ३३, राष्ट्रीय रायफल्स मध्ये कर्तव्यावर गेले. तेथेही त्यांनी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडशन अर्थात सेनाप्रमुखांचे प्रशस्तीपत्र पटकावले… एक उत्तम अधिकारी आकार घेत होता!

अतिरेकी विरोधी मोहिमेत त्यांना स्पेशल फोर्सेस सोबत काम करायची संधी मिळाली आणि ते त्या कामावर मोहित झाले… तिथे प्रत्यक्ष कारवाई करण्याची जास्त संधी होती… त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी स्पेशल फोर्सेस मध्ये प्रवेश मिळवून अतिशय आव्हानात्मक Para Commando पात्रता प्राप्त केली. वर्ष २००४ उजाडले. काश्मीर खो-यात पाकिस्तानी अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आता समोरासमोरची लढाई उपयोगाची नव्हती… गनिमी कावा करावा लागणार होता. यासाठी सेनेने मोहित यांना पसंती दिली. मोहित साहेबांनी दाढी, केस वाढवले. काश्मिरी, हिंदी भाषा तर त्यांना अवगत होत्याच. अतिरेक्यांची बोलीभाषा त्यांनी आत्मसात केली. खब-यांचे जाळे विणले गेले. अतिशय संयमाने परिस्थिती हाताळत यांनी त्या दोघांचा अर्थात तोरारा आणि सब्झारचा माग काढलाच… आणि मेजर मोहित शर्मा भूमिगत होऊन इफ्तेखार भट बनून अतिरेक्यांच्या गोटात सामील झाले… कुणाला संशय येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होतीच… पण जीव मात्र धोक्यात होता…. किंचित जरी संशय आला असता तर गाठ मृत्यूशी होती. अबू तोरारा आणि अबू सब्झार यांनी या त्यांच्या नव्या शिष्याची इफ्तेखार बट ची योजना समजावून घेतली आणि तयारीसाठी ते तिघे भारत-पाक ताबा रेषेच्या पार, पाकिस्तानात गेले. तिथून सारी सूत्र हलवायची होती. त्यादिवशीची सायंकाळ झाली आणि काहवा (काश्मिरी चहा) पिण्याची वेळसुद्धा. इफ्तेखार त्यांच्यात ज्युनिअर. त्यानेच चहा बनवणे अपेक्षित असल्याने त्याने तीन कप कहावा बनवला आणि ते तीन कप घेऊन तो या दोघांच्या समोर गेला. थंडी मरणाची असल्याने इफ्तेखारने अंगभर शाल लपेटली होती. अबू तोरारा याने इफ्तेखारकडे रोखून पाहिले… भारतीय सेनेची इतकी सविस्तर माहिती याला आहे यात त्याला काहीतरी काळेबेरे वाटत होते… त्याने थेट विचारले… तुम कौन हो असल में? हा एकच प्रश्न जीवन आणि मरणाची सीमारेषा ओलांडणार होता.. इफ्तेखारणे तोराराच्या डोळ्याला थेट नजर भिडवली… कितनी बार बताना पडेगा? अगर यकीन न होता हो तो उठा लो अपनी रायफल और मुझे खतम कर दो! असं म्हणत त्याने त्याच्या खांद्यावर लटकवलेली एके ४७ खाली आपटली. या त्याच्या बेबाक उत्तरावर ते दोघेही सटपटले! आपला संशय खोटा निघाला आणि या गड्याला राग आला तर एवढी मोठी मोहीम रद्द करावी लागेल.. पाकिस्तानी मालक नाराज होतील, अशी भीती त्यांना वाटणे साहजिकच होते! त्या दोघांनी कहावा चे कप उचलले आणि ते मागे वळण्याच्या बेतात असताना काहीसे बेसावध होते.. त्यांच्या खांद्यांवर एके ४७ होत्याच…. त्या खाली घेऊन झाडायला त्यांना काही सेकंद लागले असतेच… ही संधी गमवाली तर पुन्हा कधी मिळेल ते सांगता येणार नाही… इफ्तेखार याने विचार केला…. क्षणार्धात आपल्या शालीखाली कमरेला लावलेले पिस्टल बाहेर काढले… ते आधीच लोड होते… आणि para commando चे प्रशिक्षण प्रत्यक्ष व्यवहारात वापरून दाखवले… दोन गोळ्या छाताडात आणि एक डोक्यात.. अचूक. काही सेकंदात दोन अतिशय खतरनाक अतिरेकी त्यांच्या शेवटच्या प्रवासाला निघून गेले! इफ्तेखार निवांतपणे तिथल्या बाजेवर बसले… कहावा संपवला. आणि रात्र होण्याची वाट पाहू लागले… त्यांनी भारतीय सेनेच्या इतिहासातील एक आगळेवेगळे अभियान यशस्वी पार पाडले होते! रात्रीच्या अंधारात हे इफ्तेकार भारतीय सीमेमध्ये सुखरूप परतले. या त्यांच्या अजोड कामगिरीबद्दल सेनेने त्यांचा विशेष सन्मान केला. दोन मोठे अतिरेकी गमावल्यावर आणि ते अशा रीतीने गमावल्यावर पाकिस्तानी हिजबुल मुजाहिदीन पुरते हादरून गेले होते… यह इंडियन आर्मी है! ही घोषणा त्यांच्या कानांमध्ये खूप दिवस घुमत राहिली. आणि इकडे अवघ्या भारतीय सेनेते आनंदाची एक लाट पसरली होती. मेजर मोहित शर्मा यांची ही कामगिरी न भूतो अशीच होती. मोहित साहेबांना यासाठी सेना मेडल देण्यात आले.

ते जेंव्हा सुट्टीवर घरी पोहोचले तेंव्हा रेल्वे स्टेशनवर त्यांना उतरून घ्यायला आलेले त्यांचे बंधू आणि आई-वडील त्यांना ओळखू शकले नव्हते… एवढा एखाद्या अतिरेक्यासारखा त्यांचा शारीरिक अवतार झाला होता!

पुढे त्यांची बदली बेळगावच्या आर्मी कमांडो ट्रेनिंग सेंटर मध्ये कमांडो इंन्स्ट्रक्टर म्हणून झाली… एवढ्या कमी सेवाकाळात या पदावर पोहोचणे एक मोठी बाब होती. दरम्यानच्या काळात रीशिमा यांचेशी मोहित विवाहबद्ध झाले. रीशिमा त्या वेळी आर्मी सप्लाय कोअर मध्ये कार्यरत होत्या. त्यांचे वडील, भाऊ हे सैन्यात आहेत.

२००८ मध्ये अतिरेक्यांनी पुन्हा डोके वर काढले. एकावेळी सुमारे दहा अतिरेकी भारतात घुसल्याची खबर आपल्या सुरक्षा दलांना मिळाली. त्यांच्याविरोधात तातडीने ऑपरेशन हाती घेणे गरजेचे होते. अशावेळी अनुभवी अधिका-याची आवश्यकता ओळखून सैन्याने मेजर मोहित साहेबांना काश्मिरात बोलावणे धाडले. प्रत्यक्ष रणभूमीवर मोहित साहेब जास्त रमत असत. त्यांच्यासाठी ही तर एक चांगली बातमी होती. सेनेची योजना आकार घेत होती. मोहित साहेबांच्या पुतणीचा वाढदिवस आणि अशाच काही कारणासाठी साहेबांना घरी जाण्यासाठी रजा मंजुर झाली होती. पण त्याच वेळी त्यांच्या एका कनिष्ठ अधिका-याच्या भावाचा अपघाती मृत्यू ओढवला. पण मोहीम अगदी तातडीने हाती घेण्याची वेळ असल्याने त्या कनिष्ठ अधिका-याची रजा मंजूर होण्यात समस्या आली. ही बाबत मेजर मोहित यांना समजताच त्यांनी स्वत:ची रजा रद्द करून त्या कनिष्ठ अधिका-यास रजा मिळेल अशी तजवीज केली आणि स्वत: मोहिमेवर निघाले.

उत्तर काश्मीर खो-यातील कुपवारा सेक्टरमधील हापरुडा जंगलात दहा अतिरेकी टिपायचे आहेत… कामगिरी ठरली… मेजर साहेबांनी आपली सैन्य तुकडी सज्ज केली. योजना आखून त्या सैनिकांची वेगवेगळ्या तुकड्यांत विभागणी केली आणि स्वत: नेतृत्व करीत रात्रीच्या अंधारात ते त्या जंगलात शिरले. अतिरेकी मोक्याच्या जागा धरून लपून बसले होते. तरीही मेजर साहेब पुढे घुसले… रात्रीचे बारा वाजले असावेत. त्यांच्यावर अचानक अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. अतिरेकी शस्त्रसज्ज होते. साहेबांसोबतचे चार कमांडो गंभीर जखमी झाले. साहेबांनी गोळीबार अंगावर झेलत दोन जखमी सैनिकांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यांनी हातगोळे फेकत आणि अचूक गोळीबार करीत दोन अतिरेक्यांना यमसदनी धाडले. परंतू अतिरेक्यांच्या गोळ्यांनी त्यांच्या शरीराचा वेध घेतला होता. पण मेजर साहेबांनी जखमांकडे साफ दुर्लक्ष केले आणि ते अतिरेक्यांच्यावर चालून गेले. उरलेले आठ अतिरेकी गोळीबार करीत होतेच… साहेबांनी त्यांना सामोरे जात त्यांच्यावर हल्ला चढवला… साहेबांच्या शरीरावर बुलेट प्रुफ jacket होते, परंतू हे jacket फक्त पुढून आणि मागून सुरक्षितता देते… त्याच्या बाजूच्या भागांतून गोळ्या आत शिरल्याने ते जबर जखमी झाले होते. पण त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला… आपल्या इतर साथीदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी आपली जागा सोडली नाही. एक जवान rocket डागण्याच्या तयारीत असताना त्याच्या हाताला गोळी लागल्याने त्याचा हात निकामी झाला. मोहित साहेबांनी कवर फायर घेत तिथपर्यंत पोहोचून ते rocket फायर केले. त्यामुळे अतिरेकी पुढे येऊ शकले नाहीत. यात खूप वेळ गेला… छातीत गोळ्या घुसलेल्या असतानाही साहेबांनी आणखी अतिरेक्यांचा खात्मा केला… आणि मगच देह ठेवला. त्यांच्यासोबत हवालदार संजय भाकरे (1 PARA SF, SM), हवालदार संजय सिंग (1 PARA SF, SM),

हवालदार अनिल कुमार (1 PARA SF, SM), पॅराट्रूपर शबीर अहमद मलिक (1 PARA SF, KC) आणि पॅराट्रूपर नटेर सिंग (1 PARA SF, SM) हे देशाच्या कामी आले. या मोहिमेत अतिरेक्यांकडून 17 असॉल्ट रायफल, 4 अंडर-बॅरल ग्रेनेड लाँचर, 13 एके मॅगझिन, 207 AK ammunition, 19 UBGL ग्रेनेड, 2 ग्रेनेड, 2 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, 1 थुराया रेडिओ सेट आणि भारतीय चलनी नोटा हस्तगत करण्यात आल्या… यावरून अतिरेकी किती तयारीने आले होते, हे समजू शकते! 

मेजर मोहित शर्मा यांच्या असीम पराक्रमासाठी देशाने त्यांना शांतता काळातील सर्वोच्च सैन्य पुरस्कार, अशोक चक्र (मरणोत्तर) प्रदान केले. त्यांच्या पत्नी, ज्या आता मेजर पदी आहेत, त्यांनी २६ जानेवारी, २०१० रोजी तत्कालीन राष्ट्रपती महोदया श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अशोक पुरस्कार स्वीकारला. मेजर मोहित यांच्या भावाची मुलगी, अनन्या मधुर शर्मा त्यांचे बलिदान झाले तेंव्हा एक दोन वर्षांची होती. तिने त्यांच्यापासून पुढे प्रेरणा घेत एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळवले. मेजर साहेबांचे वडील राजेंद्रप्रसाद आणि मातोश्री सुशीला शर्मा यांना त्यांच्या लेकाचा खूप अभिमान वाटतो. दिल्लीतील राजेन्द्रनगर मेट्रो स्टेशनला मेजर मोहित शर्मा यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. २१ मार्च हा त्यांचा बलिदान दिवस. त्यानिमित्त ह्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न.

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “राधा… राधा…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “राधा… राधा…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

प्रसन्न एका सकाळी,

कृष्ण समवेत अष्टपत्नी,

रमले होते हास्यविनोदात सकळी…

 

दुग्ध प्राशन करण्या घेतला प्याला,

चटका कृष्णाच्या बोटाला बसला,

कृष्णमुखातून एकच बोल आला, “राधा-राधा”!!..

 

साऱ्या राण्यांनी प्रश्न एकच केला,

“स्वामी, का सदैव आपल्या मुखी, राधा?

काय असे त्या राधेत, जे नाही आमच्यांत?… “

 

काहीच न बोलला तो मेघश्याम,

मुखावर विलासत केवळ आर्त भाव,

जणू गेला गढून राधेच्या आठवणीत…

.

.

.

काळ काही लोटला…

कृष्ण देवेंद्राच्या भेटीस निघाला,

निरोप देण्या प्रिया साऱ्या जमल्या,

कृष्णाने पुसले,

 “काय प्रिय करु तुम्हाला?”

 

सत्यभामेची इच्छा एक,

 दारी असावा तो स्वर्गीय पारिजात,

सातजणींनी मागणे काही मागितले,

कृष्णाने रुक्मिणीस पुसले,

“सांग, तुझे काय मागणे?”

 

चरणस्पर्श करण्या रुक्मिणी झुकली,

कृष्णाची मऊसूत पाऊले पाहून थबकली,

नकळत वदली,

“स्वामी, इतके अवघड जीवन,

तरी पाऊले आपली कशी इतकी कोमल?”

 

कृष्ण केवळ हसला,

अन् “राधा राधा” वदला,

रुक्मिणीने मग हट्टच धरला,

 “प्रत्येक वेळी का राधा राधा?

या प्रश्नाचे उत्तर,

हेच प्रिय माझे आता…

 

सांगाच आम्हास आज,

कृष्णाच्या मुखी का ‘राधा राधा?’

हे कृष्णा,

निद्रेत तुझा श्वासही बोलतो राधा राधा!

का असे इतकी प्रिय ती राधा?”

 

कृष्ण वदला,

“हाच प्रश्न मी राधेलाही होता पुसला,

सोडून वृंदावन जेव्हा निरोप तियेचा घेतला.

पुन्हा न भेटणे या जगती आता,

 हे ठावे होते तिजला.

 

ह्ळूच धरून हनुवटीला,

पुसले राधेला,

‘सांग राधे,

आयुष्याची काय भेट देऊ तुजला?

मी सोडून, काहीही माग तू मजला. ‘

 

‘कान्हा,

ऐक, दिलेस तू वचन मजला,

नाही बदलणे आता शब्द तुजला,

जे मागीन मी, ते द्यायचेच तुजला…

 

कान्हा,

वर एकच असा दे तू मजला…

 

पाऊल प्रत्येक तुझे,

 माझ्या हृदयीच्या पायघड्यांवर पडू दे,

सल इवलासा जरी सलला तुझ्या अंतरी वा शरीरी,

तर क्षत त्याचा उमटू दे रे माझ्या शरीरी… ‘

 

 ‘राधे, राधे, काय मागितलेस हे?

आयुष्याचे दुःख माझे,

का पदरात घेतलेस हे?

सारे म्हणती, राधा चतुर शहाणी,

का आज अशी ही वेडी मागणी?’

 

गोड हसून, हृदय राधेचे बोलले,

‘कान्हा, नाहीच कळणार तुला माझी चतुराई.

तुझ्यापासून वेगळे अस्तित्व आता राधेला नाही.

 

कान्हा,

तुझ्या प्रत्येक पावलाची चाहूल,

हृदय माझे मजला देईल.

अन् शरीरी उमटता क्षत प्रत्येक,

क्षेम तुझे मला कळवेल.

 

कृष्ण आणि राधा,

नाही आता वेगळे,

दोन तन जरी,

 तरी एकजोड आत्मे’ “

 

साऱ्याच होत्या स्तब्ध, ऐकत,

अश्रूधारा कृष्णाच्याही डोळ्यात,

तनमनात केवळ,

 नाम राधेचे होते घुमत.

 

“प्रियांनो,

पाऊल प्रत्येक माझे,

हृदय राधेचे तोलते,

घाव सारेच माझे राधा सोसते,

म्हणून चरण माझे राहिले कोमल ते…

 

प्रत्येक पाऊल ठेवता,

हृदय राधेचे दिसते,

सल तनमनात उठता वेदना राधेची जाणवते,

अन् म्हणून प्रत्येक श्वासात राधा वसते…

 

प्रियांनो,

प्रेम तुम्ही केले,

प्रेम मीही केले,

पण

राधेच्या प्रेमाची जातच वेगळी…

ती एकच एकमेव राधा आगळी…

 

जोवरी राहील मानवजात,

तोवरी राधा म्हणजे प्रेमाचे दुसरे नाव…

राधा म्हणजे केवळ प्रेमभाव…

राधा म्हणजे प्रेमाचा एक गाव…

प्रत्येकाच्या अंतरीचा कोवळा भाव…

मला ही वंदनीय माझी राधा…

कृष्णाच्याही आधी बोला ‘राधा राधा’.

 

राधा-राधा….

राधा-राधा….

कवी: अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वर्णीम पहाट… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? स्वर्णीम पहाट… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

चैतन्य चराचरी

झाली सोनेरी पहाट 

तम गेले लया

सुवर्ण फुले फुलली…

 

साधन नीत ज्याचे

अंतरीचा भानू उदेला

सत्कर्म नीत ज्याचे 

सुवर्ण फुले फुलली..

 

सदगुरुमय हृदय ज्याचे

तमाची रात्र‌ संपलीच

संपलीच चिंता, आता 

सुवर्ण फुले फुलली…

 

मन प्रसन्न ज्याचे

वाणीतही गोडवा

गुरुसेवा हेचि कर्म

सुवर्ण फुले फुलली…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #276 – कविता – ☆ खोज रहा सुख को दर-दर है… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी द्वारा गीत-नवगीत, बाल कविता, दोहे, हाइकु, लघुकथा आदि विधाओं में सतत लेखन। प्रकाशित कृतियाँ – एक लोकभाषा निमाड़ी काव्य संग्रह 3 हिंदी गीत संग्रह, 2 बाल कविता संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 कारगिल शहीद राजेन्द्र यादव पर खंडकाव्य, तथा 1 दोहा संग्रह सहित 9 साहित्यिक पुस्तकें प्रकाशित। प्रकाशनार्थ पांडुलिपि – गीत व हाइकु संग्रह। विभिन्न साझा संग्रहों सहित पत्र पत्रिकाओं में रचना तथा आकाशवाणी / दूरदर्शन भोपाल से हिंदी एवं लोकभाषा निमाड़ी में प्रकाशन-प्रसारण, संवेदना (पथिकृत मानव सेवा संघ की पत्रिका का संपादन), साहित्य संपादक- रंग संस्कृति त्रैमासिक, भोपाल, 3 वर्ष पूर्व तक साहित्य संपादक- रुचिर संस्कार मासिक, जबलपुर, विशेष—  सन 2017 से महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9th की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में एक लघुकथा ” रात का चौकीदार” सम्मिलित। सम्मान : विद्या वाचस्पति सम्मान, कादम्बिनी सम्मान, कादम्बरी सम्मान, निमाड़ी लोक साहित्य सम्मान एवं लघुकथा यश अर्चन, दोहा रत्न अलंकरण, प्रज्ञा रत्न सम्मान, पद्य कृति पवैया सम्मान, साहित्य भूषण सहित अर्ध शताधिक सम्मान। संप्रति : भारत हैवी इलेक्ट्रिकल्स प्रतिष्ठान भोपाल के नगर प्रशासन विभाग से जनवरी 2010 में सेवा निवृत्ति। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता खोज रहा सुख को दर-दर है…” ।)

☆ तन्मय साहित्य  #276 ☆

☆ खोज रहा सुख को दर-दर है… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

कैसे बने संतुलन मन का

कभी इधर तो कभी उधर है

अस्थिर-चंचल-विकल, तृषित यह

खोज रहा सुख को दर-दर है।

*

ठौर ठिकाना सुख का कब

बाहर था जो ये मिल जायेगा

यहाँ-वहाँ  ढूँढोगे कब तक

हाथ नहीं कुछ भी आयेगा,

रुको झुको झाँको निज भीतर

अन्तस् में ही सुख का घर है,

खोज रहा सुख को दर-दर है।

*

अगर-मगर में बीता दिवस

सशंकित सपने दिखे रात में

लाभ लोभ की लिये तराजू

गुणा-भाग प्रत्येक बात में

कितना तुला, तुलेगा कितना

इसकी कुछ भी नहीं खबर  है,

खोज रहा सुख को दर-दर है।

*

सत्ता सुख ऐश्वर्य प्रतिष्ठा

कीर्ति यश सम्मान प्रयोजन

चलते रहे प्रयास निरंतर

होते रहे नव्य आयोजन,

सुख संतोष प्रेम पा जाते

पढ़ते यदि ढाई आखर है,

खोज रहा सुख को दर-दर है।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 100 ☆ जाएँ तो कहाँ? ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “जाएँ तो कहाँ?” ।)       

✍ जय प्रकाश के नवगीत # 100 ☆ जाएँ तो कहाँ? ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

हम परिन्दों के लिए

डालते रहे दाना और पानी

और वे बिछाते रहे जाल

फँसाते रहे हैं सदा मछलियाँ

चुगते रहे हैं सबका दाना

बुन लिया गया है

उनके द्वारा ऐसा ताना-बाना

जिस तरह बुनती है मकड़ी

अपना जाल

और जब कोई कीट उलझता है

उस चक्रव्यूहनुमा जाल में

तब होता है शुरु शोषण

तब हम चाह कर भी नहीं निकल पाते

यह एक ऐसा व्यामोह है

जिसे ओढ़कर विवश हैं हम

और आने वाली पीढ़ियाँ

जीवन के इस संघर्ष में अपनी

जिजीविषा को लेकर जाएँ तो कहाँ?

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – दृष्टिहीन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – दृष्टिहीन ? ?

(2013 में प्रकाशित कवितासंग्रह ‘योंही’ से)

मैं देखता हूँ रोज़

दफ़्न होता एक बच्चा,

मैं देखता हूँ रोज़

टुकड़े-टुकड़े मरता एक बच्चा,

पीठ पर वज़नी बस्ता लटकाए,

बोझ से कंधे-सिर झुकाए,

स्कूल जाते, स्कूल से लौटते,

दूसरा बस्ता टांकते;

ट्यूशन जाते, ट्यूशन से लौटते,

घर-समाज से

किताबें चाटते रहने की हिदायतें पाते,

टीवी देखते परिवार से

टीवी से दूर रहने का आदेश पाते

रास्ते की टूटी बेंच पर बैठकर 

ख़त्म होते बचपन को निहारते,

रोज़ाना की डबल शिफ्ट से जान छुड़ाते,

शिफ्टों में खेलने-कूदने के क्षण चुराते,

सुबह से रात, रात से सुबह

बस्ता पीठ से नहीं हटता,

भरसक कोशिश करता

दफ़्न होना नहीं रुकता,

क्या कहा-

आपने नहीं देखा..!

हर नेत्रपटल

दृश्य तो बनाता है,

संवेदना की झिल्ली न हो

तो आदमी देख नहीं पाता है..!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 12 अप्रैल 2025 से 19 मई 2025 तक श्री महावीर साधना सम्पन्न होगी 💥  

🕉️ प्रतिदिन हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमन्नाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें, आत्मपरिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Whispers of Silence… ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present Capt. Pravin Raghuvanshi ji’s amazing poem “~ Whispers of Silence ~.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.) 

?~ Whispers of Silence… ~ ??

Sometime, let sprightly colours
dance in soul’s soothing rain,
Let the myriad rainbow hues
make your heart whole again

*

With countless vibrant tones,
Paint the life’s canvas bright,
Let your divine beauty shine
with your inner most light

*

Sometime, craft a soulful
picture with words unsaid,
Let masterpiece of stark silence,
and emotions be deeply fed

*

Let brushstrokes of stillness
create a splendid scene,
Where beauty of unseen reigns,
making it supremely serene

*

Sometime, listen to the rich
voice of deep reticence,
A gentle whisper that brings
a sense of gratifying essence

*

In the quietude of nights,
when words are few and still,
Let inner silence’s wisdom shine,
and wisdom’s voice fulfill

*

Sometime, read the mystic
missive of silence so deep,
A letter from the soul,
penned in quiet sound sleep

*

Sometime in the stillness,
hear the heartbeat of divine,
A language that transcends
words, and makes us align

~Pravin Raghuvanshi

 © Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune
23 March 2025

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – संस्मरण ☆ दस्तावेज़ # 23 – महाकुंभ 2025 – एक अविस्मरणीय अनुभव- ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

श्री जगत सिंह बिष्ट

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

(ई-अभिव्यक्ति के “दस्तावेज़” श्रृंखला के माध्यम से पुरानी अमूल्य और ऐतिहासिक यादें सहेजने का प्रयास है। श्री जगत सिंह बिष्ट जी (Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker) के शब्दों में  “वर्तमान तो किसी न किसी रूप में इंटरनेट पर दर्ज हो रहा है। लेकिन कुछ पहले की बातें, माता पिता, दादा दादी, नाना नानी, उनके जीवनकाल से जुड़ी बातें धीमे धीमे लुप्त और विस्मृत होती जा रही हैं। इनका दस्तावेज़ समय रहते तैयार करने का दायित्व हमारा है। हमारी पीढ़ी यह कर सकती है। फिर किसी को कुछ पता नहीं होगा। सब कुछ भूल जाएंगे।”

दस्तावेज़ # 23 – महाकुंभ 2025 – एक अविस्मरणीय अनुभव ☆ श्री जगत सिंह बिष्ट  ☆

कुछ अनुभव ऐसे होते हैं जो मन पर स्थायी छाप छोड़ जाते हैं। वे केवल दृश्य नहीं होते, वे जीवन के भाव बन जाते हैं। महाकुंभ 2025 के अवसर पर तीर्थयात्रा हमारे लिए ऐसा ही एक अनुभव थी—एक दिव्य यात्रा, जो शरीर से अधिक आत्मा को स्पर्श कर गई।

हम तीर्थराज प्रयागराज पहुंचे, जहां गंगा, यमुना और सरस्वती के त्रिवेणी संगम पर पवित्र महाकुंभ का आयोजन हो रहा था। यह कोई सामान्य आयोजन नहीं था, बल्कि जीवन में एक बार मिलने वाला दुर्लभ संयोग था, क्योंकि ग्रह-नक्षत्रों का ऐसा संयोग अब 144 वर्षों बाद ही होगा। यह जानकर ही मन रोमांचित हो जाता है कि हम इस दुर्लभ अवसर के साक्षी बन पाए।

हमने स्नान से पहले ही तय कर लिया था कि हमें सूर्योदय से पहले संगम तक पहुंचना है। सुबह-सुबह अंधेरे में हमने ई-रिक्शा लिया और फिर एक युवक की मोटरसाइकिल पर पीछे बैठकर बोट क्लब तक पहुंचे। ठंडी हवा, गहराता अंधकार और भीतर उठती श्रद्धा की लहरें—सब मिलकर एक अद्भुत वातावरण बना रहे थे।

(महाकुंभ 2025 के अवसर पर संगम में अप्रतिम सूर्योदय का विहंगम दृश्य )

नाव की यात्रा अपने आप में एक ध्यान-साधना बन गई थी। गंगा की लहरों पर तैरती हमारी छोटी सी नाव, आकाश में लालिमा बिखेरता सूरज, और बादलों के बीच से झांकती किरणें—यह सब किसी स्वप्न जैसा लग रहा था। नाव चलाने वाला नाविक साधारण पर बहुत अनुभवों से भरा हुआ था। उसके चेहरे पर शांति थी, बातों में अपनापन। वह वर्षों से यही करता आया था—श्रद्धालुओं को संगम तक ले जाना और वापस लाना। उसकी हर बात में जीवन की सादगी और गहराई थी।

(महाकुंभ 2025 के अवसर पर पवित्र गंगा, यमुना और सरस्वती के संगम पर नाव यात्रा का अद्भुत अनुभव )

नाव धीरे-धीरे संगम की ओर बढ़ रही थी, और हमारा मन जैसे विचारों से मुक्त होता जा रहा था। जल का विशाल विस्तार, उसकी गहराई और तेज बहाव ने हमें भीतर तक छू लिया। जब हम संगम पहुंचे और डुबकी लगाई, तो वह सिर्फ एक स्नान नहीं था। वह एक आत्मिक अनुभव था। जैसे वर्षों से जमी हुई कोई चिंता, कोई संशय उसी क्षण जल में घुलकर बह गया हो। डुबकी लगाने के बाद एक अनकही शांति भीतर उतर आई। हमें यह जानकर संतोष हुआ कि हम केवल दर्शक नहीं रहे, हमने इन पुण्य पलों को जिया है।

(महाकुंभ 2025 के अवसर पर यमुना नदी पर साइबेरियाई पक्षी)

इसके बाद हम जब वापसी कर रहे थे, तो मन बार-बार उसी प्रश्न में उलझता रहा—क्या सच में यह केवल परंपरा है, या इसके पीछे कोई और गहरा आकर्षण है? तभी हमें संगम घाट की ओर बढ़ती वह अंतहीन मानव श्रृंखला दिखी। लोग पैदल चले आ रहे थे—महिलाएं, पुरुष, बुज़ुर्ग, बच्चे—हर उम्र, हर वर्ग के लोग। चेहरों पर थकावट नहीं, बस एक अपूर्व आस्था का भाव।

इनमें से कई लोग पढ़े-लिखे नहीं थे, साधनहीन थे, लेकिन उनके विश्वास में कोई कमी नहीं थी। न उनके पास रहने की निश्चित व्यवस्था थी, न भोजन की। फिर भी वे चले आ रहे थे—क्यों? क्योंकि उन्हें भरोसा था कि ईश्वर रास्ता बनाएगा, और धर्म की राह में कोई अकेला नहीं होता। यह आस्था देख कर हमारी आंखें नम हो गईं। हम सोचने लगे—क्या यही वह अदृश्य शक्ति है जो करोड़ों लोगों को इस महासंगम की ओर खींच लाती है?

प्रशासन ने अपनी ओर से व्यवस्थाएं की थीं—रास्ते में रैन बसेरे बनाए गए थे, जहां तीर्थयात्री निशुल्क ठहर सकते थे। जगह-जगह भंडारे लगे थे, जहां सेवाभाव से भोजन मिल रहा था। अस्थायी शौचालयों की भी व्यवस्था थी, ताकि लोगों की बुनियादी ज़रूरतें पूरी हो सकें। जो लोग ये साधन जुटाने में असमर्थ थे, उनके लिए यह किसी वरदान से कम नहीं था। पर फिर भी जब करोड़ों लोग एक साथ किसी छोटे शहर में उतरते हैं, तो किसी भी तैयारी की सीमाएं झलकने लगती हैं।

हम भी भीड़ के साथ-साथ पैदल चलते रहे, धूप तेज़ हो चुकी थी लेकिन लोग रुक नहीं रहे थे। हमने कोशिश की कि उनके मन को समझें, उनकी भावनाओं को महसूस करें, पर एक गहराई थी जिसे शब्दों में नहीं बांधा जा सकता। उलटे हमारी अपनी जिज्ञासा और बढ़ती चली गई, और साथ ही अध्यात्म के प्रति आस्था भी।

एक लम्बी यात्रा के बाद हम एक डिजिटल म्यूज़ियम पहुंचे, जहां महाकुंभ 2025 को आधुनिक तकनीक के माध्यम से दर्शाया गया था। वहां छोटे-छोटे वृत्तचित्रों के माध्यम से कुंभ मेले का इतिहास और उसका महत्व बताया गया। यह देखना सुखद अनुभव था कि परंपरा और तकनीक कैसे साथ चल सकते हैं।

शाम को बोट क्लब क्षेत्र के काली घाट पर लेज़र और ड्रोन शो का भी आनंद लिया। रौशनी और रंगों से सजी वह प्रस्तुति जैसे कुंभ की भव्यता को एक नए रूप में जीवंत कर रही थी।

संगम क्षेत्र और टेंट सिटी भीड़ से खचाखच भरी थी, लेकिन हम भाग्यशाली रहे कि प्रयागराज के सिविल लाइंस इलाके में हम ठहरे थे। यह क्षेत्र अपेक्षाकृत शांत था और वहां अच्छे रेस्टोरेंट, शॉपिंग आउटलेट्स और पीवीआर सिनेमा हॉल भी मौजूद थे। हमने विशेष रूप से ‘एल चिको’ रेस्टोरेंट में भोजन का आनंद लिया, जो हमारे दिन की थकान को सुकून में बदल गया।

प्रयागराज से रवाना होने के पहले हमने तय किया कि पास के ऐतिहासिक अमर शहीद चंद्रशेखर आज़ाद पार्क में श्रद्धा सुमन अर्पित करें, जहां देशभक्ति की वह ज्वाला आज भी जीवित लगती है।

इस पूरी यात्रा के अंत में हमारे मन में एक ही भाव रह गया— 

“हे ईश्वर, इस महाकुंभ की आध्यात्मिक ऊर्जा से हमारे जीवन में शांति, प्रेम और समरसता बनी रहे।”

© जगत सिंह बिष्ट

Laughter Yoga Master Trainer

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ अपनी दौलत, शोहरत पे गुरूर न करना… ☆ श्री हेमंत तारे ☆

श्री हेमंत तारे 

श्री हेमन्त तारे जी भारतीय स्टेट बैंक से वर्ष 2014 में सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृत्ति उपरान्त अपने उर्दू भाषा से प्रेम को जी रहे हैं। विगत 10 वर्षों से उर्दू अदब की ख़िदमत आपका प्रिय शग़ल है। यदा- कदा हिन्दी भाषा की अतुकांत कविता के माध्यम से भी अपनी संवेदनाएँ व्यक्त किया करते हैं। “जो सीखा अब तक,  चंद कविताएं चंद अशआर”  शीर्षक से आपका एक काव्य संग्रह प्रकाशित हो चुका है। आज प्रस्तुत है आपकी एक ग़ज़ल – अपनी दौलत, शोहरत पे गुरूर न करना।)

✍ अपनी दौलत, शोहरत पे गुरूर न करना… ☆ श्री हेमंत तारे  

राहों की तीरगी को मिटाते रहना

चराग़ रखा है साथ जलाते रहना

*

कोई रूठे अपना तो ग़ज़ब क्या है

उसे मनाना, मनाना, मनाते रहना

*

फ़िर बरपा है कहर तपिश का यारों

तुम परिंदों को  पानी पिलाते रहना

*

तनकीद के पहले गिरेबां में झांक लेना

आसां नही इतना सही राह बताते रहना

*

अपनी दौलत, शोहरत पे गुरूर न करना

रब से डरना,  फकीरों को खिलाते रहना

*

मिल जाए गर कोई नाख़ुश, नाउम्मीद तुम्हें

हमदर्द हो जाना और होंसला दिलाते रहना

*

सीखने को बहुत कुछ है ‘हेमंत’ जमाने में

बदकिस्मत हैं वो जो सीखे हैं रुलाते रहना

(तीरगी = अंधकार, तनकीद = उपदेश देना)

© श्री हेमंत तारे

मो.  8989792935

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साहित्यिक स्तम्भ ☆ ग़ज़ल # 103 ☆ दौलते और शुहरतें सब हैं… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण ग़ज़ल “दौलते और शुहरतें सब हैं“)

☆ साहित्यिक स्तम्भ ☆ ग़ज़ल # 103 ☆

✍ दौलते और शुहरतें सब हैं… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

बादलों जैसे कभी आवारगी अच्छी नहीं

नौजवानों की हवा से दोसती अच्छी नहीं

 *

ख़ुश नहीं होता  शिवाले वो सजाने से कभी

मार के हक़ गैर का ये रोशनी अच्छी नहीं

 *

ढाई ग़ज़ हो चाहिए आख़िर ज़मीं इंसान को

चाहतें दुनिया की दौलत की कभी अच्छी नहीं

 *

ये बढाती रक्त का है चाप ये सच मानिए

हर समय मुझसे तेरी नाराज़गी अच्छी नहीं

 *

हर कली पर रीझना औ तोड़ने की सोचना

यार ऐसी हुस्न की दीवानगी अच्छी नहीं

 *

दौलते और शुहरतें सब हैं न अपनापन मगर

गांव से इस शहर की ये ज़िन्दगी अच्छी नहीं

 *

 ये गुज़ारिश औरतों से सख़्त  अपना दिल करें

दिल के दुखते आँख में होना  नमी अच्छी नहीं

 *

दौरे हाजिर के मसाइल ज़ीस्त की लिख कशमकश

सागरो मीना हरम पर शायरी अच्छी नहीं

 *

हारकर तक़दीर से दुनिया से नाता तोड़ना

कुछ न हासिल हो अरुण ये बेख़ुदी अच्छी नहीं

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

सिरThanks मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares