मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चक्री वादळ… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

? इंद्रधनुष्य ? 

☆ चक्री वादळ… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

चक्रीवादळाच्या नावांचा रंजक इतिहास  – कॅटरिना, नर्गिस, नीलम, निलोफर अन् लैला… संकलन – श्री साहेबराव माने. पुणे.

कॅटरिना, नर्गिस, निलोफर, लैला ही नावे आहेत चक्रीवादळाची. या चक्रीवादळांना अनेक मजेशीर नावे असून, त्यांचा इतिहासही रंजक आहे. किनारपट्टीवरच्या लोकांना वादळाचा धोका कळावा म्हणून अशी नावे देण्याचा ट्रेंड सुरू झाला. बंगालच्या उपसागरात येणार्‍या वादळाचे बारसे घालण्याचे काम पूर्वी आठ देश करीत असत; पण आता एकूण 14 देश करतात. आता आलेल्या  चक्रीवादळाला तोक्ते हे नाव म्यानमार देशाने दिले आहे.

हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील नावे ठरविण्याचा अधिकार भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड या आठ देशांना जागतिक हवामान संघटनेने बहाल केला.  भारताने अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू अशी मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेतील नावे दिली, तर पाकिस्तानने नर्गिस, निलोफर, नीलम, लैला अशी अभिनेत्रींची नावे दिली. कॅटरिना हे नाव अमेरिकेने दिले आहे.

आठ देशांनी दिली 64 नावे ः  भारत : अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू. बांगलादेश : ओनिल, ओग्नी, निशा, गिरी, हेलन, चंपाला, ओखी, फनी. मालदीव : हिब्रू, गोनू, ऐला, कैला, मादी, रोनू, मेकुनू, हिक्का. म्यानमार : प्यार, येमयीन, फॅन, ठाणे, नौक, कँट, दाय, कायर, तोक्ते.ओमान : बाझ, सीदर, वर्ड, मृजन, हुडहुड, नाडा, लुबन, महा. पाकिस्तान : पुनूस, नर्गिस,  लैला, नीलम, निलोफर, वरध, तितली, बुलबुल. श्रीलंका : माला, रश्मी, बंडू, वियारू, अशोबा, मरूथा, गज, पवन. थायलंड : मुकदा, खाई-मूक, फेट, फायलीन, कोमेन, मोरा, फेथाई, आंफन  बंगालच्या उपसागरात गतवर्षी आलेल्या आंफन महाचक्रीवादळाला  थायलंड देशाने नाव दिले. 20 वर्षांतील हे सर्वात मोठे हे वादळ होते. जी वादळं प्रचंड नुकसान करून जातात, त्यांची नावे यादीतून कायमची काढली जातात. 2005 साली अमेरिकेतील न्यू एरोलिना प्रांतात आलेल्या ‘कॅटरिना’ वादळाने प्रचंड नुकसान केले, त्यामुळे ते नाव यादीतून काढले आहे. भारताने गती, तेज, मुरासू, आग, व्योम, जहर, प्रोबाहो, नीर, प्रभंजन, गुरूनी, अंबुद, जलाधी, वेग अशी 13 नवी नावे दिली आहेत.

तोक्ते म्हणजे सुरेल आवाजाचा सरडा..

यंदाच्या हंगामाची सुरुवात तोक्ते नावाच्या चक्रीवादळाने होत आहे. हे नाव म्यानमार देशाने दिले आहे. तेथे तोक्ते नावाचा सरडा सुरेल आवाज काढतो. त्यावरून हे नाव दिले आहे. या वादळाचा वेग ताशी 160 ते 175 कि. मी. राहू शकतो.

संकलन – श्री साहेबराव माने. पुणे.

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ – देसाई गढी – ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

? इंद्रधनुष्य ? 

☆ – देसाई गढी – ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले …. लढाई सुरू झाली… एक  छोटीशी घडी… मावळे लढतायेत…पण गढी काही मिळेना… एक दिवस गेला …आठ दिवस गेले … पंधरा दिवस….तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला… आणि जिंकली…. कोण होते त्या गढीत… कोण लढल एवढे चिवटपणे….. ती होती साविञी देसाई ….

ही लढवत होती ती गढी….

गढी ताब्यात आली… सावित्री कैद झाली …. राजे गढीत गेले .. गादीवर स्थानापन्न झाले… आणि सावित्रीला समोर आणले गेले … ती घाबरलेली.. गांगरलेली…आता माझ कस होणार …. तिला एक लहान मुल होत . त्याची काळजी लागली. मला शिवाजी मारणार . माझ बाळ अनाथ होणार . आता मी काय करू. राज्यांच्या समोर रडायला लागली …

महाराज मला मारा …

ठार मारा… पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या .

हे तीचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला… तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली … बाळ आणले … राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीच काळीज धडधडत होते .. आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार .. काय करावे.

तेवढयात राजांनी आज्ञा दिली. सावित्री ला बंधमुक्त केले. ती धावत राज्यांच्या पायावर झुकली. माझ्या लेकराला मारू नका……..

 

आणि या शञूच्या बाईसाठी..

शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.

ताई………….

ताई  … कोण म्हटले मी तुम्हाला मारणार … या बाळाला मारणार … मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला.

आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय… काही तरी दिले पाहिजे ना…

 

ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय… आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..

अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.

राजा.. मी तुला शञू समजले..

मी वैरी समजले..

पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला…

धन्य शिवाजी राजा..

धन्य त्याचे माता पिता..

 

ही कथा इथच संपत नाही

शिवाजी निघुन गेले. पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले.

यात गादीवर शिवाजी बसले आहेत..लहान मुल मांडीवर आहे. राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. अस शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पहायला मिळते.

 

हेच शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे…

 

किती महान माझा शिवाजी राजा होता हो..

 

शिवरायांना सख्खी बहिण नव्हती

पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .

आणि तुम्हाला सांगायची गरज नाही

काय नात आहे हे भाऊ बहिणीचे…

आणि काय नात आहे शिवाजी राजाच.

माझा शिवाजी भाऊ बहिणीच प्रेम शिकवून गेला .

 

किती बर होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर…

वादाच्या पलिकडले शिवाजी …

बहिणीचा भाऊ शिवाजी …

 

माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर …

कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .

निर्भया सारखी प्रकरणे होणार नाहीत .

कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तीचा शिवभक्त भाऊ उभा असेल .

 

मध्यरात्री कामावरून सुटणारी तरूणी बिनधास्त असेल

कारण तिला विश्वास असेल

हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.

शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे.

माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे

 

प्रत्येक भावाने प्रत्येक गृपवर पाठवावा

हि विनंती ..

जय श्रीराम.

? ?

आहारात ‘सत्व’,

वागण्यात ‘तत्व’,

आणि

बोलण्यात ‘ममत्व’

असेल

तरच जीवनाला ‘महत्त्व’ येते.

?? ??

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ थोडक्यात..पण महत्त्वाचे ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ इंद्रधनुष्य ☆ थोडक्यात..पण महत्त्वाचे ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

एका वर्षाचे महत्त्व अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला विचारावे, एका महिन्याचे महत्त्व मातृत्वाच्या वाटेवर असलेल्या महिलेला विचारावे, एका सप्ताहाचे महत्त्व साप्ताहिकाच्या संपादकास विचारावे,एका दिवसाचे  महत्त्व मजुरी न मिळालेल्या मजुरास विचारावे, एका तासाचे महत्त्व आपले अर्धे राज्य देऊन एक तास मृत्यू लांबविण्याचा आग्रह धरणाऱ्या सिकंदराला विचारावे, एका मिनिटाचे महत्त्व वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळण्याच्या एक मिनिट आधी सुरक्षितपणे बाहेर पडणाऱ्या भाग्यवंताला विचारावे आणि एका सेकंदाचे महत्त्व केवळ एका सेकंदामुळे सुवर्णपदक न मिळू शकलेल्या ऑलिंपिकमधील धाव स्पर्धकाला विचारावे.

 

संग्राहक – श्रीमती अनुराधा फाटक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इन्द्रधनुष्य ☆ जागतिक कविता दिन-21 मार्च ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ इन्द्रधनुष्य ☆ जागतिक कविता दिन-21 मार्च ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित☆ 

शब्दांच्याही पल्याड असते माझी कविता

केवळ रसिकालाही दिसते माझी कविता

दिसते म्हणजे तशीच असते असेही नाही

आभासाच्या  गावी वसते माझी कविता.

?  ?  ?  ?

मी शब्दांसंगे अविरत भांडत असतो

अन् अर्थांचा मी काथ्या कांडत असतो

जे मुशीतुनी तावून सुलाखून निघते

ते कांचन मी बाजारी मांडत असतो.

               –  इलाही जमादार  

अशी असावी कविता, फिरून

तशी नसावी कविता, म्हणून

सांगावया कोण तुम्ही, कवीला

आहात मोठे ?–पुसतो तुम्हाला.

      – कवी   केशवसुत.

असे कितीतरी नामवंत कवी आणि त्यांच्या कवितांचा उल्लेख करता येईल.

‘Poetry is the spontaneous overflow of powerful feelings’ हे William Wordsworth यांचे सुप्रसिद्ध  विधानही आपणा सर्वांना माहित आहे. या सर्वांचा उल्लेख आज करण्याचे कारण म्हणजे आज जागतिक कविता दिन साजरा होत आहे.

साहित्यातील काव्यप्रकाराचा सन्मान करण्याचा आजचा दिवस ! युनेस्कोच्या पॅरिस येथे झालेल्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आणि 21/03/1999 पासून दरवर्षी 21 मार्च जागतिक कविता दिन म्हणून साजरा होऊ लागला. “कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते” असे युनेस्कोच्या महासचिवानी म्हटले आहे. भाषिक विविधतेला समर्थन आणि लुप्त झालेल्या भाषा ऐकण्याची  संधी  उपलब्ध करून देणे हा ही यामागचा उद्देश आहे. युनेस्कोने आपल्या जाहीरनाम्यात “to give fresh recognition and impetus to National, Regional and International poetry movements” असे म्हटले आहे.

आजचा दिवस म्हणजे जगातील  सर्व कवी, कवयित्री आणि काव्यप्रेमी रसिक यांच्या सन्मानाचा दिवस! चला,आपण सर्वजण त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काव्यरसाच हा मधुघट काठोकाठ भरून ठेवूया.

संकलन 

श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोंगरे  सदन ☆ संग्राहक – सुश्री मानसी आपटे

 ☆ इंद्रधनुष्य ☆ डोंगरे  सदन ☆ संग्राहक – सुश्री मानसी आपटे ☆ 

शंभर वर्षांपूर्वी चिनी सुतारांकडून बांधलेलं घर…

नगर शहरातील बुरूडगल्लीतील ‘डोंगरे सदन’ ही शंभरी ओलांडलेली वास्तू प्रख्यात विदुषी पंडिता रमाबाई यांचे चुलतभाऊ कृष्णराव वासुदेव डोंगरे यांनी बांधली आहे. विशेष म्हणजे या घराचं लाकूडकाम चिनी सुतारांनी केलं आहे आणि हे वैभव कृष्णरावांच्या नात कांचन चांदोरकर आणि त्यांच्या कुटुंबानं सुरेख सांभाळलं आहे.

आपल्या आजोबांच्या आठवणी सांगताना कांचन चांदोरकर म्हणाल्या, कृष्णराव मूळचे कर्नाटकातील गंगामूळचे. गावी होणाऱ्या जाचामुळे त्यांना रमाबाईंनी पुण्याजवळच्या केडगाव येथे मुक्ती मिशनमध्ये बोलवलं. तेथील अनेक इमारतींचं बांधकाम कृष्णरावांच्या देखरेखीखाली झालं. पुढे ते नगरला स्थायिक झाले. नगरमधील अनेक इमारतींचे काम त्यांनी केलं. क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूलची कौलारू वास्तू त्यांनीच बांधली. सध्या धरती चौक म्हणून अोळखला जाणारा भाग सव्वाशे वर्षांपूर्वी बाभळींनी व्यापलेला होता. साहेबराव निसळांकडून जागा विकत घेऊन कृष्णरावांनी तिथं १९१८ ते २० दरम्यान घर बांधलं. तेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं. अनेक देशातील युद्धबंदी नगरच्या किल्ल्यातील लष्करी छावणीत होते. त्यातील चांगली वर्तणूक असलेल्यांना दिवसभर बाहेर काम करण्याची मुभा ब्रिटिश सरकारनं दिली होती. त्यात काही चिनी सुतार होते. त्यांचं कौशल्य हेरून कृष्णरावांनी त्यांच्याकडून मलबारी सागवानी लाकडात आपल्या घराचं बांधकाम करून घेतलं. चुन्यातील अतिशय सुबक आणि आखीव-रेखीव काम अजूनही जसंच्या तसं आहे.

चांदोरकर कुटुंबानं काळानुसार या धाब्याच्या घरात थोड्या सुधारणा केल्या. मधले काही लाकडी खांब काढून फरशी बदलण्यात आली. धुळीचा त्रास टाळण्यासाठी खिडक्यांना काचा लावण्यात आल्या, गॅलरी बंदिस्त करण्यात आली. तथापि, हाॅलमधील लाकडी खण तसेच ठेवण्यात आले आहेत.

नामवंतांच्या मैफली

प्रसिद्ध गायक-अभिनेते पंडितराव नगरकर, पंडित वालावलकर यांच्यासह अनेक नामवंत गायकांच्या मैफली ‘डोंगरे सदन’मध्ये झाल्या आहेत. कांचन यांच्या वडिलांना संगीताबरोबरच फोटोग्राफी व यंत्रांच्या दुरूस्तीची आवड होती. वाद्ये तर ते लीलया दुरूस्त करत. त्यांच्याकडे मोठा आॅर्गनही होती. चांदोरकर कुटुुंबाकडे आकाराने सर्वात छोट्या बायबलची प्रत आहे.

सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जगात सर्वात सिनिअर बनण्याचा मान भारताचे यष्टीरक्षक रघुनाथ चांदोरकर यांना मिळाला आहे. ‘डोंगरेसदन’ मध्ये राहणारे नगरचे रणजीपटू बाबा चांदोरकर यांचे ते थोरले भाऊ. दोघेही भाऊ रणजी खेळले. कर्जतला जन्मलेल्या व सध्या डोंबिवलीला राहणाऱ्या रघुनाथरावांनी मागील वर्षी शंभरी अोलांडली. न्यूझीलंडचे अॅलन बर्जेस यांच्या निधनानंतर ते सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू बनले आहेत.

संग्राहक – सुश्री मानसी आपटे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लस कशी तयार झाली ☆ संग्राहक – विमल माळी

 ☆ इंद्रधनुष्य ☆ लस कशी तयार झाली ☆ संग्राहक – विमल माळी ☆ 

१७८८ सालची एका तरुणाची ही गोष्ट. इंग्लंडमधल्या ग्लुस्टरशायरला एका साथीनं घेरलं. ती साथ आली की माणसं त्यावेळी मृत्युपत्राची वगैरे भाषा सुरू करायची. सगळे दु:खात, फक्त एक जमात गवळी. त्या तरुणाच्या घरी जो गवळी यायचा, त्याला या आजाराची कसलीही चिंता वाटत नव्हती. त्या तरुणाला आश्चर्य वाटलं. तो त्या गवळ्याकडे गेला. त्याचं घर आणि गोठा बघायला. यांना ही बाधा का होत नसावी. तिथं त्याला थेट उत्तर काही मिळालं नाही. पण शक्यता दिसली. त्या गवळ्याच्या गाईंना तोच आजार झाला होता. अंगावर फोड. ते पिकणं. पू वगैरे सगळं माणसांसारखंच.

त्या तरुणाला लक्षात आलं. या गाईंना झालेल्या रोगाच्या संपर्कात आल्यामुळे गवळ्यांच्या शरीरांत या रोगाबाबत प्रतिकारशक्ती तयार होत असावी. पण हे सिद्ध करायचं म्हणजे गाईंच्या अंगावरच्या फोडांचे जंतु माणसांच्या अंगात सोडायचे. त्यासाठी तयार कोण होणार?अखेर बऱ्याच परिश्रमांनंतर १४ मे १७९६ या दिवशी अशी एक संधी त्याच्यापुढे चालून आली. त्याच्या गावचा एक शेतकरी तयार झाला. सारा या त्याच्या गवळ्याच्या तरुण मुलीच्या अंगावर त्याच्या गाईप्रमाणे फोड आलेले होते. आणि त्यातले काही पिकलेही होते. तो तरुण तिच्याकडे गेला. लाकडाची एक छोटी ढलपी घेतली. तिच्या अंगावरचे पिकलेले फोड उकरून त्यातला पू त्यानं त्यावर गोळा केला. तिचा भाऊ जेम्स याच्या पायावर धारदार चाकूनं छोटीशी जखम त्यानं केली. रक्त आल्यावर साराच्या जखमेतला पू त्याच्या जखमेत भरला आणि वरनं मलमपट्टी केली. शेतकऱ्याला बजावलं. याच्यावर लक्ष ठेव. काही झालं तर मला सांगायला ये.

दोनच दिवसांनी शेतकरी त्याच्याकडे आला. मुलाच्या अंगात ताप होता. तो तरुण खुश झाला. सुरुवात तरी त्याच्या मनासारखी झाली. आणखी दोन दिवसांनी जेम्सच्या तोंडाची चव गेली. खूप अशक्तपणा जाणवायला लागला. पण पुढच्या दोन दिवसांत ही सर्व लक्षणं दूर झाली आणि जेम्स बरा झाला.

त्या तरुणाच्या प्रयोगाचा महत्त्वाचा टप्पा आता सुरू झाला. आता त्याला जेम्सच्या शरीरात खरेखुरे आजार जंतू सोडायचे होते. हा प्रयोग यशस्वी झाला तर तुझा मुलगाच काय सारी मानवजातच या साथीच्या विळख्यातून सुटेल. शेतकऱ्यानं विचारलं, ‘आणि अपयश आलं तर?’ तो तरुण शांतपणे म्हणाला, ‘खुनाच्या आरोपाखाली मला शिक्षा होईल.’

त्या तरुणानं मरणासन्न रुग्णाच्या फोडांमधला पू तशाच पद्धतीनं जेम्सच्या शरीरात घुसवला. पुढचे आठवडाभर तो आणि शेतकरी त्या पोरावर डोळ्यात लक्ष ठेवून होते. दोन दिवसांनी त्याला परत ताप आला. अंगावर पुरळ आलं. काळजी वाढली. पण दोन दिवसांनी तापात उतार पडला. त्या तरुणाच्या लक्षात आलं की अशा पद्धतीनं या आजाराबाबत लोकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार करता येते.

आपल्या या प्रयोगाचे निष्कर्ष त्यानं रॉयल सोसायटीला कळवले. त्यांनी लक्षच दिलं नाही सुरुवातीला. पण तो तरुण प्रयोग करत राहीला. आणखी २३ जणांवर त्यानं याच पद्धतीनं प्रयोग केले. सगळ्यांचे निष्कर्ष असेच होते. एका बाजूला तो हे सगळं रॉयल सोसायटीला कळवत गेला. पण दुसरीकडे त्यानं स्वत: हे सगळं छापायचं ठरवलं. लॅटिन भाषेत गाईच्या त्या आजाराचं नाव वॅक्सिनिया. त्यानं नवा शब्द तयार केला “वॅक्सिन” म्हणजे लस.

नंतर तो तरुण आयुष्यभर लसींसाठीच जगला. पैसे नाही फार कमावले त्यानं. पण नाव मात्र मिळवलं. घर बांधलं. अंगणात स्वतसाठी एक झोपडं उभारलं. नाव दिलं लसगृह. तिथं गरीबांना तो मोफत लस टोचायचा. पुढे त्याच्या या तंत्राचा लौकिक लवकरच सर्वदूर पसरला. अनेक ठिकाणी युरोपात लोकं स्वत:मधे जिवंत विषाणू टोचून घ्यायला लागले. १८०० साली त्यानं ही सगळी माहिती आणि सोबत एक लशीचा नमुना आपले मित्र प्रा. बेंजामीन वॉटरहाउस यांना पाठवला. प्रा. बेंजामीन अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवायचे. त्यांनी हे तंत्र आपल्या न्यू इंग्लंड परगण्यात वापरून बघितलं. न्यूयॉर्कच्या जवळ असलेल्या या परगण्यात ती साथ होती. हे तंत्र तिथं कामी आलं. प्रा. बेंजामीन यांनी आख्ख्या कुटुंबाला या तंत्रानं वाचवलं.

हे जमतंय असं लक्षात आल्यावर त्यांनी याची माहिती दिली थेट थॉमस जेफर्सन यांना. हे जेफर्सन म्हणजे अमेरिकेचे नंतर अध्यक्ष झाले ते. त्यांनी कसलाही विचार न करता आपल्या मुलाबाळांसकट सगळ्यांवर हा प्रयोग करून पाहिला. तो अर्थातच यशस्वी झाला. तेव्हा त्याचं महत्त्व जाणणाऱ्या या द्रष्टय़ा नेत्यानं त्या तरुणाला अत्यंत उत्कट पत्र लिहिलं. इथे या भूतलावर हा असाध्य रोग होता, तो तुझ्या प्रयत्नामुळे हद्दपार झाला. पुढच्या पिढय़ा तुझ्या ऋणी राहतील. जेफर्सन यांचे शब्द खरे झाले. त्यांच्या पत्रानंतर साधारण दोन शतकांनी, १९८० साली पृथ्वीवरनं या आजाराचं  पूर्ण उच्चाटन झालं.

हा आजार म्हणजे देवी. आणि त्या तरुणाचं नाव एडवर्ड जेन्नर.

आत्ता त्याची ही गोष्ट आठवायचं काही एक कारण आहे. ते म्हणजे ऑक्सफर्ड इथल्या एडवर्ड जेन्नर संशोधन केंद्रात सध्या जगाला ग्रासून राहिलेल्या करोना आजारावरच्या संभाव्य लशीच्या मानवी चाचण्या सुरू होतायत. आजच तिथे पहिल्यांदा कोणी तरी आपल्या शरीरात कोविड-१९ चा विषाणू टोचून घेईल. त्यातून लस तयार होईलही.

हे श्रेय त्या एडवर्ड जेन्नर याच असेल.

संग्राहक – विमल माळी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-1 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

 ☆ इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-1 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

छत्रपती शाहू महाराजांकडे जवळपास अडीचशे हत्ती होते. पैकी “गजराज मोती” हा महाराजांचा विशेष आवडता हत्ती होता. शिवाय तो अत्यंत भव्य व रुबाबदार होता, त्याचे शुभ्र वळणार दात दिलखेचक होते त्यामुळे तो छत्रपतींचा मानाच्या अंबारीचा हत्ती होता. गजराज मोती माजात आलेला असल्यामुळे राधानगरी येथे त्याला साठमारीच्या मैदानात उतरविण्यात आले. साठमारांनी व्यूहरचना केली व मोतीचा माज उतरविण्यासाठी ते पुढे सरसावले. खुद्द महाराज हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते. साठमार रुमाल नाचवित मदमस्त मोतीला छेडू लागले. मोती प्रचंड चवताळला व एका साठमाराला हेरुन भयानक चित्कार करीत त्याच्या मागे धावू लागला. उपस्थितांच्या पोटात भितीने गोळा उठला. काहीतरी विपरीत घडणार असे महाराजांसह सर्वांनाच वाटू लागले. साठमार वायुवेगाने पुढे पळत होता व जोराचा चित्कार करीत चवताळलेला मोती त्याच्या मागे धावत होता. “मोतीने साठमाराला सोंडेत पकडले. गरगर फिरवून त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली एक तंगडी धरुन सोंडेने दुसरी तंगडी फासकटली.” असे भेसूर चित्र उपस्थितांच्या मनपटलावर तरळले तोच साठमार चपळाईने समोरच्या दिंडीत घुसला. त्याचा मागून वायुवेगाने धावत येणारा मोती जोराने बुरुजावर आदळला त्यासरशी कडाड् कड असा मोठा आवाज झाला. त्यातच काळीज चिरुन जाणारा मोतीचा आर्त चित्कार पाठोपाठ उमटला. मोतीच्या तोंडातून रक्ताचा लोट वाहत होता. मोतीचा एक दात मोडला होता. दाताच्या आतील मांसल गोळा लोंबकळत होता. ते भयानक दृश्य पाहवत नव्हते. तोच गगनभेदी टाहो फुटला, “महाराज घात झाला. माझ्या मोतीचा दात तुटला.” असा आक्रोश करीत अंबादास माहूत मैदानात धावला. पिसाळलेल्या हत्तीसमोर जात असलेला भावनाविवश अंबादास पाहून महाराजांना धोक्याची जाणीव झाली. “अंबादास थांब. मोती पिसाळलाय, त्याच्यासमोर जाऊ नकोस.” असे म्हणतच महाराजांनीही मैदानात उडी ठोकली. तोपर्यंत अंबादास मोतीच्या सोंडेला बिलगून अश्रू ढाळीत उभा होता. प्रचंड पिसाळलेला तो भव्य गजराज मोतीसुद्धा सोंडेने अंबादासला वेढा घालून अश्रू ढाळीत शांतपणे उभा होता. तशाही स्थितीत हत्ती-माहूताचे प्रेम पाहून व आपल्या आवडत्या मोतीची भेसूर जखम पाहून महाराजांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. पण हत्ती पिसाळलेला होता. या स्थितीत तो काहीही करु शकतो हे जाणून महाराजांनी अंबादासला बाजूला घेतले व हत्तीला चिमटे लावून ठाणबंद केले. त्याच्या जखमेवर प्राथमिक उपचार केल्यानंतरच महाराजांनी मैदान सोडले.

दुसऱ्या दिवशी पहाटे महाराज व्हेटर्नरी सर्जन सावर्डेकर यांना घेऊन हत्तीठाणावर आले. डॉ. सावर्डेकरांनी मोतीला तपासले. तुटक्या दाताच्या पोकळीतील लोंबकळणारे मांस त्यांनी कापून टाकले. “तुटक्या दाताची वाढ होते काय?” महाराजांनी विचारले.

“नाही” डॉक्टरांनी सांगितले.

“दुसरा काही मार्ग?”

“दुसरा कुठलाच मार्ग नाही. दात मोडल्यामुळे दात्र्या पडल्या आहेत. त्या भारी खूपत असणार. तोंडातील जखम व खुपणाऱ्या दात्र्यांमुळे हत्ती सदा विव्हळत राहणार.”

“मग त्या दात्र्या तरी काढून टाका.” महाराज म्हणाले. त्यावर त्या काढता येणार नाहीत शिवाय यापुढे हत्तीवर इलाज करता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले.

क्रमशः…

संग्राहक – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सकारात्मक विचार… ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

☆  इंद्रधनुष्य ☆ सकारात्मक विचार… ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

एका स्त्री ची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपला दिवभराचा आनंद एका वहीत लिहीत असे.

एका रात्री तिने लिहीले की….

★ मी फार सुखी समाधानी आहे.

माझा पती रात्रभर फार मोठयाने घोरतो कारण काय तर त्याला गाढ म्हणजेच सुखाची झोप लागते. ही ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे.

माझा मुलगा सकाळी माझ्याशी भांडतो की त्याला रोज रात्रभर मच्छर – खटमल झोपून देत नाही. म्हणजेच तो रात्री घरी असतो,आवारागर्दीत नसतो, वाईट वागत नाही. ही ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे.

दर महिन्याला लाईट बिल,गैस,  पेट्रोल, पाणी वगैरेची बिलं भरताना दमछाक होते खरी. म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहे, त्या वस्तू वापरात आहेत. जर ह्या वस्तू माझ्याकडे नसत्या तर तर हे जगणे किती अवघड झाले असते. ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे.

दिवस संपे पर्यत माझे थकून फार हाल होतात. पण माझ्याकडे दिवसभर काम कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे. आणि ज्यांच्यासाठी मेहनत करावी अशी माणसे आहेत. हीच माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे

रोज मला घरातील केर कचरा काढून घर साफ स्वच्छ करावे लागते. आणि दरवाजा खिडक्या साफ कराव्या लागतात. खरंच देवाची माझ्यावर खूप कृपा आहे की माझ्याकडे स्वतःचे मोठे घर आहे. ज्याच्याकडे घर,छत नाही त्याचे काय हाल होत असतील.

★ मी फार सुखी समाधानी आहे.

कधीतरी लहान मोठा आजार होतो. पण लगेच बरी होते. माझे आरोग्य चांगले आहे ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे

प्रत्येक सणाला भेट देताना माझी पर्स रिकामी होते. म्हणजेच माझ्या जवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. माझे नातेवाईक, मित्र, ज्यांना मी भेट देऊ शकते. जर हे लोक नसते तर जीवन कीती वैराण झाले असते. ही ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे

रोज पहाटे अलार्म वाजला, की मी उठते. म्हणजे मला रोज नवी सकाळ बघायला मिळते. ही ईश्वराचीच कृपा आहे.

जगण्याच्या या फॉर्मुल्यावर अंमल करत  माझ्या ईश्वराचे मी आभार मानते.

ब्रह्मांडात जी ऊर्जा ठासून भरलेली आहे (Cosmic energy), तिचा एक नियम आहे- की तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात, तुमच्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील.

“सुख शोधून सापडत नसते त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते.”

“Gratefulness” is the Best Prayer. ??

संग्राहक – सौ. स्मिता पंडित

9422409713

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जलचरांचं स्थलांतर – भाग ४ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ जलचरांचं स्थलांतर –  भाग ४ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

३. डाल्फिन-

स्क्वीड माशांचा थवा हे डाल्फिनचं अन्न. जेव्हा हे मासे वसंत ऋतूत उत्तरेकडे जातात, तेव्हा डाल्फिन त्यांच्या मागोमाग जातात. हिवाळ्यात ते पुन्हा दक्षिणेकडे येतात, तेव्हा डाल्फिनही त्यांच्या मागोमाग दक्षिणेकडे येतात.

अलास्कन कॅरिब्यू –

सागरकाठच्या किनारपट्टीच्या जमिनीवरून अलास्कन कॅरिब्यूंचा कळप फिरतो. जमिनीवरील गवत आणि पाण्यालगतंचं शेवाळं ते खातात. वसंत ऋतूत ते उत्तरेकडच्या किनारपट्टीलगत फिरतात. तिथे पानगळीला सुरुवात होताच ते पुन्हा दक्षिणेकडच्या सदाहरित जंगलाकडे येतात. ते १६०० कि. मी. पर्यंतचा प्रवास करतात.

नवे जीव जन्माला घालण्यासाठी स्थलांतर

बेडूक उन्हाळ्यात बागेत जमिनीवर राहतात. पण उन्हाळ्याच्या मागोमाग ते जवळच्या तळ्याकाठी,  पाण्याचा साठा असेल,  तिथे जातात आणि त्यांची अंडी पाण्यात घालतात. अंडी फुटली, की त्यातून बाहेर येणार्‍या जिवांना ताडपोल म्हणतात. त्यांना कल्ले असतात. नंतर त्यांचे पाय आणि फुफ्फुसे तयार होतात. पूर्ण वाढ झालेले बेडूक तळ्यातून बाहेर येतात आणि जमिनीवर राहतात.

मगर आणि सुसर

मगरी आणि सुसरी, त्यांचं बहुतेक आयुष्य पाण्यात घालवतात. पण त्यांची अंडी घालण्याची वेळ झाली की मादी नदीच्या पाण्यातून बाहेर येते. दलदलीच्या पाणथळ किनार्‍यावर येते. गवत रानटी झुडुपे वगैरेचा उपोग करून घरटे तयार करते. तिथे अंडी घालते. अंडी फुटून पिलं बाहेर येईर्यंत त्यांचे रक्षण करते.

 समुद्री कासव

हिरव्या रंगाची समुद्री कासवं त्यांची अंडी जमिनीवर घालतात. त्यासाठी ती समुद्रातून बाहेर येऊन विशिष्ट ठिकाणापर्यंत सरपटत जातात. ब्राझीलमधील किनारपट्टीच्या पाण्यातील हिरवी कासवं दर दोन-तीन वर्षांनी आपलं नित्याचं वसतीस्थान सोडून दक्षिणेकडे अटलांटिक समुद्रातील आसेंशन आयलंड बेटाकडे जातात. हे बेट ८८ चौ. कि. मीटर क्षेत्रफळाचे आहे. पण त्यासाठी कासवं १६०० कि. मी.चा प्रवास करून तिथे पोचतात.

मीलन काळात माद्या प्रवाहातून पोहतात. त्या काळात त्या अनेकदा अंडी घालतात. त्याच किनार्‍यावर त्या पुन्हा पुन्हा अंडी घालतात. अंडी फुटली, की लहान कासवं स्वत:चं स्थलांतर सुरू करतात. ती पाण्यात पोहू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढी शक्ती नसते. पण त्यांचं तोंड नेहमी पाण्याकडे असतं .अर्थात अनेक जण अन्य भुकेल्यांचं भक्ष्य बनतात. पण काही कासवं समुद्रात पोचतात. त्यांच्या जन्मदात्यांच्या मूळ मुक्कामी परत येतात. त्यापूर्वी त्यांनी ते ठिकाण कधीही पाहिलेले नसते. ते पुरेसे वयस्क झाले,  म्हणजे पुन्हा असेन्शन बेटाकडे येतात आणि आपली अंडी समुद्राकाठी वाळूवर घालतात. या एकाकी बेटावर ती का येतात? त्यांना ते बेट कसं सापडतं, याचं उत्तर शास्त्रज्ञांना अजूनपर्यंतसापडलेले नाही.

समाप्त

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जलचरांचं स्थलांतर – भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ जलचरांचं स्थलांतर –  भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

 १. उत्तरेकडील फर सील

उत्तरेकडील फर सील प्रत्येक वर्षी स्थलांतराच्या वेळी खूप लांबवरचा प्रवास करतात.  सीलची मादी जवळ जवळ ९६०० कि.मी. एवढा प्रवास करते. मे ते नोहेंबर सीलची नवी पिल्लं प्रिबिलॉफ आयलंडवर जन्माला येतात. हे बेट दक्षिण-पश्चिम अलास्का येथे आहे. नर आणि मादी दोघेही त्या बेटापासून दूर पोहत जातात. नर अलास्का गल्फमध्ये थांबतात. पण माद्या खूप लांबचा प्रवास करतात. जवळ जवळ ४८०० कि.मी. एवढा प्रवास करून दक्षिण कॅलिफोर्निया इथे येतात.

२. व्हेलचं स्थलांतर

मार्च-एप्रीलच्या दरम्यान दक्षिण कॅलिफोर्निया येथे सॅन डिआगो बे जवळ करड्या रंगाच्या (ग्रे) व्हेलचं स्थलांतर बघायला मिळते. हे भले मोठे सस्तन प्राणी खरं तर मासे, १९,२०० कि.मी. एवढी राउंड ट्रीप घेतात. ते आपला उन्हाळा, उत्तर पॅसिफिकमहासागरात घालवतात. तिथे क्रीलसारखे छोटे जलचर आणि समुद्री प्राणी खातात. नंतर पानगळीच्या दिवसात ते पुन्हा आपल्या स्थलांतराला सुरुवात करतात. दक्षिण दिशेला , दक्षिण कॅलिफोर्नियाकडील खार्‍या पाण्याच्या सरोवरांकडे ती जातात. गर्भवती माद्या आपला प्रवास आधी पूर्ण करतात. डिसेंबरमध्ये त्या आपल्या पिलांना जन्म देतात. ही पिले ४ मीटर लांबीची असतात. एखाद्या महिन्यानंतर अन्य माद्या तिथे येतात. आणि त्यांचे नराशी मीलन होते. मार्चमध्ये सर्व व्हेल उत्तरेकडे आपल्या उन्हाळी अन्नदात्या क्षेत्रात आपला परतीचा प्रवास सुरू करतात. सन डिअ‍ॅगोच्या किनार्‍यापासून सुमारे दीड किलो मीटर अंतर ठेवून ते प्रवास करतात. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात अगणित व्हेल पोहत जाताना पाहण्यासाठी किनार्‍यावर गर्दी करतात.

३. माशांचे स्थलांतर  – ईल आणि सालमन

गोड्या पाण्यातील ईल मासे आणि पॅसिफिक महासागरातील सायमन या माशांचे स्थलांतर एकमेकांच्या अगदी विरुद्ध असते. पानगळीच्या दिवसात उत्तर अमेरिकन आणि युरोपियन ईल त्यांच्या गोड्या पाण्यातून अटलांटिक महासागरातील बर्म्युडा बेटाजवळील, सरगॅसो समुद्राकडे स्थलांतर करतात. तेथील निरुपयोगी झाडात ते आपली अंडी घालतात आणि नंतर मरतात. अंडी फुटून जेव्हा छोटे जीव बाहेर येतात, तेव्हा ते बोटाच्या नखांएवढे असतात. त्यांना लाव्र्हा असं म्हणतात. या छोट्या लाव्र्हा प्रवाहाबरोबर आपल्या मूळ प्रदेशाकडे वाहू लागतात. या  माठ्या होत जाणार्‍याया ईलपैकी उत्तर अमेरिकेकडून आलेल्या ईलची पिल्ले युनायटेड स्टेटस आणि कॅनडाकडे पोहत जातात. हे स्थलांतर पूर्ण व्हायला जवळ जवळ एक वर्ष लागतं. तरुण युरोपियन ईल सरगॅसोच्या वेगळ्या भागातून प्रवाहाबरोबर पोहू लागतात आणि ते युरोपकडे येतात. त्यांचा प्रवास लांबचा असतो आणि मूळ ठिकाणी पोचायला त्यांना २/३ वर्षे लागतात. जेव्हा ते वेगवेगळ्या काठाने पोहत आपल्या मूळ ठिकाणी परत येत असतात, तेव्हा छोट्या लाव्र्हांमध्ये बदल होत जातो. ते बारीक, निमुळते आणि पारदर्शक होत जातात.  त्यांना ग्लास ईल असे म्हणतात. नंतर ते मोठे होतात आणि त्यांचा रंग काळा होतो. ते काठाशी पोचतात, तेव्हा त्यांना एलव्हर्स असे म्हणतात. नर एलव्हर्स खार्‍या पाण्याच्या बंदरालगतच्या दलदलीच्या प्रदेशात राहतात आणि माद्या पोहत वरच्या बाजूला गोड्या पाण्याकडे येतात. खूप वर्षानंतर त्यांच्या जन्मदात्यांप्रमाने ते पुन्हा गोड्या पाण्यातून खार्‍या सॅरॅगॉन समुद्राकडे आपलं रहस्यमय स्थलांतर सुरू करतात.

पॅसिफिक सालमनचं स्थलांतर याच्या अगदी विरुद्ध असतं. आपलं सगळं आयुष्य खार्‍या पाण्याच्या समुद्रात घालवल्यानंतर, हे मासे जवळ जवळ ३२०० कि. मी. चा प्रवास करून गोड्या पाण्याच्या प्रवाहात अंडी घालण्यासाठी येतात. त्यांना यावेळी, धबधबे, नदीच्या उताराच्या बाजूला वाहणारे वेगवान प्रवाह इ. अडथळ्यांना तोंड देत पोहावं लागतं. शरद ऋतूत, अनेक अडथळे पार करून अंडी देण्याच्या जागी आलेले सालमन अंडी देतात आणि मरून जातात. अंडी फुटतात आणि छोटे सालमन समुद्राच्या दिशेने जाऊ लागतात. काही काळानंतर ते पुन्हा, जिथे त्यांचा जन्म झाला,  त्याच गोड्या पाण्याच्या प्रवाहाकडे परत येतात .त्यांना परतीचा मार्ग कसा सापडतो?  नक्की माहीत नाही, पण शास्त्रज्ञांना वाटतं,  त्यासाठी त्यांना त्यांच्या घ्राणेंद्रियांचा उपयोग होत असावा.

क्रमश:…

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print