मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गणेशविद्या – भाग 2- प्रा. अनिल गोरे ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ? 

☆ गणेशविद्या – भाग 2 – प्रा. अनिल गोरे ☆ प्रस्तुती – सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

कोणीही केलेल्या संशोधनाची नोंद त्या संशोधकाच्या नावाने करण्याची पद्धत सध्या आहे. पूर्वी अशी पद्धत नव्हती. कोणी संशोधन केले, कविता रचली तर त्याबाबतच्या लिखित आशयातच संशोधकाचे, कवीचे नाव गुंफण्याची अथवा त्या संबंधी नामानिधान किंवा संज्ञांमध्येच संबंधिताचे नाव गुंफण्याची पद्धत होती.

शल्याने शरीर कापून त्यात दुरुस्तीची पद्धत सुरु केली, त्या पद्धतीला शल्यकर्म म्हणतात. रुग्णांची नियोजनपूर्वक देखभाल पद्धत शुश्रुताने सुरु केली, त्या पद्धतीला शुश्रूषा म्हणतात. डिझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या इंधनाला त्याचे नाव आहे. सुखकर्ता दुखहर्ता…. या आरतीत दास रामाचा वाट पाहे म्हणून रामदासांनी ओळख दिली. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, तुका म्हणे, येणे वरे ज्ञाना सुखिया झाला, केशवासी नामदेव भावे ओवाळिती, कहत कबीर सुन भाई साधू या ओळींतून जनार्दन स्वामी, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, कबीर यांनी आपले नाव गुंफले.

देवनागरी वर्णाक्षरांच्या सध्याच्या स्वरुपात ग, ण, श ही अक्षरे इतरांपेक्षा वेगळी असून त्यांच्या बाराखडीत पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे! ग, ण, श यांच्या बाराखडीत पहिल्या स्थानी सुट्टा काना असणे हाच, ही वर्णव्यवस्था गणपतीने निर्माण केल्याचा संकेत मानून या लिपीला गणेशविद्या म्हणतात.

देवनागरी लिपीत १८ स्वर, ३६ व्यंजने असून स्वरांचा मानवी मुखाशी तर व्यंजनांचा मानवी मणक्यांशी संबंध आहे. कान या मराठी शब्दाची सुरूवात क अक्षराने होते. चेहरा व दोन कान दिसतात तसे क अक्षरचिन्ह दिसते. ड, ळ अक्षरांनी डोळा शब्द बनतो. उघडा डोळा, भिवई, पापणी मिळून ड चा भास होतो. दोन डोळे एकत्र पाहताना ळ चा भास होतो. झोपलेल्या माणसाचे नाक पाहून न चा भास होतो. घसा तपासताना वैद्यबुवांना घ दिसतो.

मानवाला प्राथमिक अवस्थेत ज्या वस्तूंना नावे देण्याची गरज भासली, ती नावे लिहिण्यासाठी देवनागरी अक्षरांना त्या वस्तूंचे आकार दिले असावेत. मुखाशी संबंधावरून ३६ व्यंजनांचे दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य, अनुनासिक हे पाच प्रकार आहेत.  वेगवेगळी व्यंजने उच्चारताना वेगवेगळ्या मणक्याजवळ संवेदना जाणवतात.

व्याकरणकार पाणिनीने देवनागरी वर्ण आणि मानवी मणके यातील हा संबंध सूचित केला आहे. कोणत्या मणक्याचा कोणत्या अक्षराशी संबंध आहे याबाबत पाणिनीने जे सुचवले त्याचा आधार घेऊन मी ते एका चित्रात दाखवले आहे. मानवी शरीराशी, मानवी जीवनाशी देवनागरी लिपीचा घनिष्ठ संबंध असल्याने मानवी उच्चारांना अचूक लेखनाची जोड देण्यास आवश्यक सोयी देवनागरी लिपीत, जोडाक्षर पद्धतीत आहेत.

कोणत्याही मानवी भाषेतील ९९.९९ टक्के शब्द या लिपीतून हुबेहूब लिहिता येत असल्याने ही लिपी जगाची भाषिक एकात्मता साधू शकेल. लेखन, उच्चारात सर्वाधिक सुसंगतीसाठी ही जगातील सर्वोत्तम लिप्यांपैकी एक आहे. देवनागरी लिपीचिन्हांत आणि बंगाली, गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ, उडिया, तेलुगू, मल्याळी लिपीचिन्हांत थोडा बदल जाणवतो पण सर्व भारतीय लिप्यांमध्ये लक्षणीय एकात्मता आहे !

लिपीचिन्हांतील या बदलांची कारणे भौगोलिक, राजकीय आहेत. लिखाणासाठी भारताच्या उत्तरेत भूर्जपत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे वापरत. भूर्जपत्राला पुरेशी उंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्रा, रफार, रुकार, उकार, अनुस्वार, चंद्र, हलन्त उपचिन्हे वर्णाक्षरांच्या वर, खाली लिहिता येत.

ताडपत्रावर उंची कमी, रुंदी अधिक म्हणून दक्षिणी लिप्यांमध्ये ही उपचिन्हे वर्णाक्षरांच्या डावी, उजवीकडे लिहिणे सोयीचे होते. अनेक देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणी लिपीतील अक्षरे मिळतात. शत्रूला संदेश समजू नये म्हणून काही भारतीय राजांनी स्वत:ला व त्याच्या अधिकार्‍याना, प्रजाजनांना समजणारी, पण इतरांना न समजणारी भाषा, लिपी तयार केली.

देवनागरी लिपीशी बरेच साम्य आणि किरकोळ बदलाने नव्या लिप्या झाल्या. अनेक भारतीय लिप्यांतून लिहिताना कमी जागा, कमी कागद, कमी शाई वापरली जाते. कागद कमी लागल्यास जंगलतोड कमी होते. शाईत शिसे किंवा जड धातू वापरतात. शाई कमी लागल्यास शिशाचे व जड धातूंपासून होणारे प्रदूषण कमी होते.

समाप्त 

ले : प्रा. अनिल गोरे 

संग्राहक : कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गणेशविद्या – भाग 1- प्रा. अनिल गोरे ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ? 

☆ गणेशविद्या – भाग 1 – प्रा. अनिल गोरे ☆ प्रस्तुती – सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

गणपतीने ज्या वर्णसंचातून महाभारत लिहिले असे मानतात त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे. त्या  संचासाठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. त्या चिन्हांच्या सध्याच्या संचाला देवनागरी लिपी म्हणतात. ही लिपी वेगाने तसेच उच्चारानुसार लिखाणासाठी अत्यंत सोयीची आहे.

यातील अ ते ज्ञ अक्षरे वळणदार, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ० ते ९ अंक देखणे आहेत. कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरुवातीला टेकवलेली लेखणी अंक लिहून होईपर्यंत उचलावी लागत नाही. या लिपीतील चिन्हे १८ स्वर, ३३ व्यंजने व ३ संयुक्त व्यंजने यांचे प्रतिनिधित्व करतात.

५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वरुपात लाखो स्वतंत्र अक्षरसमूह चिन्हे लिहिता येतात. भारतीय भाषांसाठी योजलेल्या लिप्या वगळता जगातील इतर अनेक लिप्यांमध्ये अशी संपन्नता नाही. गणपतीने म्हणजे देवाने ही लिपी नागरिकांसाठी बनविली या समजुतीने तिला देवनागरी लिपी म्हणतात.

ही समजूत कशी झाली याबाबत एक आख्यायिका प्रचलित आहे.

महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्यासाठी गणपतीला पाचारण केले. गणपतीने त्यांना एक अट घातली की, व्यासांनी महाभारत इतक्या सलगपणे सांगावे की, लिहिताना खंड पडू नये. व्यासांनी ही अट मान्य करतानाच एक अपेक्षा व्यक्त केली की, गणपतीने ध्वनीवर आधारित तसेच उच्चार आणि लेखन यात संपूर्ण सुसंगती असेल अशा वर्णसंचात लेखन करावे. गणपतीने महाभारत लेखन करताना असा नवा वर्णसंच निर्माण केला. उच्चार मुखातून बाहेर पडत असले तरी उच्चाराचा संबंध  शरीरातील कोणत्या भागांशी आहे का याचा गणपतीने अगोदर वेध घेतला. वेगवेगळे ध्वनी उच्चारताना मानवी शरीरातील पाठीच्या वेगवेगळ्या मणक्यांत तसेच मुखात संवेदना जाणवतात असे गणपतीच्या लक्षात आले. प्रत्येक मणक्याशी अशा प्रकारे जोडल्या गेलेल्या प्रत्येक स्वतंत्र ध्वनीसाठी गणपतीने एक चिन्ह निर्माण केले. अशा प्रत्येक चिन्हाला एक वर्ण म्हणतात. मानवी मणक्यांची संख्या ३३ आहे म्हणूनच गणपतीने आरेखित केलेली मणक्यांशी संबंधित वर्ण चिन्हे देखील ३३ होती. या ३३ वर्णांनाच आपण सध्या व्यंजने म्हणतो. या व्यंजनांचा उच्चार होताना जीभ मुखात कोठे ना कोठे टेकते असे लक्षात आल्यामुळे व्यंजनांचे कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य असे पाच प्रकार गणपतीला आढळले. या शिवाय काही उच्चारांचा मणक्यांशी संबंध नसून मुखाशी असलेल्या संबंधातही एक वैशिष्ट्य आहे हे गणपतीच्या लक्षात आले. या उच्चारांच्या वेळेस जीभ मुखात कोठेही टेकत नाही असे गणपतीला आढळले. अशा वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारांसाठी गणपतीने जी वेगळी चिन्हे निर्माण केली त्यांना आपण आता स्वर म्हणतो. हे स्वर १६ आहेत. गणपतीने अशा प्रकारे ३३ चिन्हे व्यंजनांसाठी आणि सोळा चिन्हे स्वरांसाठी निर्माण केली. या चिन्हांचे दृश्य रूप काळाच्या ओघात बदलत गेले. गणपतीने कल्पिलेल्या सर्व वर्णांसाठी त्यानेच आरेखित केलेल्या चिन्हांमध्ये अनेक वेळा बदल झाले आणि त्या ४९ चिन्हात पुढील काळात आणखी ३ चिन्हांची भर पडून सध्या आपण वापरत असलेल्या ५२ चिन्हांच्या सध्याच्या रूपाला आपण देवनागरी लिपी म्हणतो. वाचन आणि लेखन अधिक वेगाने होण्यासाठी गणपतीने या चिन्हांपैकी काही अर्धी आणि एक पूर्ण जोडून जोडाक्षर निर्मितीही केली. जोडाक्षर हे  देवनागरी लिपीचे महत्वाचे वैशिष्ट्य असून ते अनेक भारतीय लिप्यांमध्ये आढळते. मानवी शरीरातील भागांशी उच्चारांच्या असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे मानवी बोलणे ९९.९९% प्रमाणात अचूक व नेमके लिहिणे देवनागरी लिपीतून जमते.

ही लिपी खरेच देवाधिदेव गणपतीने बनविली का? यावर आस्तिक, नास्तिकांचा वाद सुरु आहे, पण ही जगातील अत्यंत उपयुक्त लिप्यांपैकी एक महत्वाची लिपी आहे याबाबत दुमत नाही. ही लिपी जगातील बहुतेक सर्व भाषांमधील आशय उमटवण्यासाठी वापरता येते. सुमारे दोनशे भाषांमधून त्या प्रत्येक भाषेतील दहा हजारांपेक्षा अधिक लोक ही लिपी दैनंदिन स्वरूपात वापरतात.

क्रमशः….

ले : प्रा. अनिल गोरे 

संग्राहक : कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सारागढीची लढाई.. भाग 2 – श्री राजेश खवले ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ सारागढीची लढाई.. भाग 2 – श्री राजेश खवले ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

(चौकीच्‍या तटबंदीवरून होणारा मारा इतका तीव्र होता की, अफगाणांना  सारागढीच्‍या तटापर्यंत पोहोचणे मुळीच जमत नव्‍हते.) इथून पुढे ——

थोडयाच वेळात ईश्‍वरसिंह गोळी लागुन गतप्राण झाला. हेलीकोग्राफ हाताळणारा गुरुमुखसिंह या सर्व घडामोडी लोखार्टच्‍या किल्‍ल्यावर स्थित कर्नल हटन याला कळवत होता.

वारंवार हल्‍ले करुनही अफगाण -पश्‍तूनांना यश येत नव्‍हते. आता शत्रुने एक आगळीच युक्‍ती लढविली. त्‍यांनी सारागढीच्‍या आजूबाजूला असणा-या झुडूपांना आग लावून दिली. त्‍यातून धुरांचे प्रचंड लोट निर्माण झाले. त्‍या धुरामध्‍ये स्‍वतःला लपवत दोन पश्‍तून सैनिक सारागढीच्‍या तटबंदीजवळ येवून पोहोचले. टोकदार अशा चाकुंनी त्‍यांनी तटबंदीचे दगड उकरून काढायला सुरुवात केली. भिंतीतला चुना उकरुन त्‍यांनी काही दगड मोकळे केले, लवकरच त्‍यांनी तटबंदीला भगदाड पाडले. तटबंदीला भगदाड पडल्‍यामुळे शीख सैनिकांना भगदाडाकडे वळावे लागले. दरवाजावरील सुरक्षा त्‍यामुळे कमकुवत झाली. शेवटी भगदाडातून शत्रुने चौकीत प्रवेश केला. शीख सैनिक प्राणपणाने लढत होते. त्‍यांनी हातघाईची लढाई सुरु केली. शत्रुचे सहाशेहून जास्‍त सैनिक मारल्‍या गेले. लढता लढता सर्व शीख सैनिक कामी आले. हेलीकोग्राफ हाताळणारा एकटा गुरुमुखसिंह तेवढा बाकी होता. त्‍याने कर्नल हटनकडून हेलीकोग्राफ बंद करण्‍याची परवानगी घेतली. संदेशवहनाची सामग्री एका चामडयाच्‍या पिश्‍वीत गुंडाळली. रायफलला संगीन लावून तो शत्रूवर तुटुन पडला. मृत्‍युने त्‍याला कवेत घेण्‍यापुर्वी त्‍याने शत्रुचे २० सैनिक ठार केले. ‘सवा लाखशे एक लढावू’ म्‍हणजे काय असते ते सारागढीच्‍या २१ शीख सैनिकांनी जगाला दाखवून दिले.

सारागढीच्‍या लढाईत सर्व २१ शीख सैनिक शहीद झाले. शत्रूने सारागढीला आग लावून दिली. सारागढी नष्‍ट केल्‍यानंतर अफगाणांनी आपला मोर्चा किल्‍ले गुलीस्‍तानकडे वळविला. पण तोपर्यंत अधिकची कुमक किल्‍ले गुलिस्‍तानपर्यंत पोहोचली होती. दोनच दिवसांनी म्‍हणजे १४ सप्‍टेंबर, १८९७ रोजी शीख रेजिमेंटने तोफांचा भयंकर मारा करून सारागढी पुन्‍हा जिंकून घेतली.

सारागढीची लढाई सामुहिक शौर्याचे अत्‍यंत प्रखर उदाहरण आहे. युनेस्‍कोने एकमताने ठरविलेल्‍या सामुहिक शौर्याच्या आठ घटनांमध्‍ये सारागढीच्‍या लढाईचा समावेश होतो. सारागढीच्‍या लढाईत प्राणांची आहूती देणारे सर्व २१ सैनिक पंजाबच्‍या (भारत) फिरोजपूर जिल्‍हयातील होते. या सर्व सैनिकांची नावे नूद असणारा स्‍तंभ सारागढी येथे उभारण्‍यात आला आहे. या सर्व सैनिकांना मरणोत्‍तर ‘इंडीयन ऑर्डर ऑफ मेरीट’ ने सन्‍मानीत करण्‍यात आले. हा सध्‍याच्‍या ‘परमवीरचक्र’ पुरस्‍काराच्‍या बरोबरीचा तत्‍कालीन सन्‍मान होता. एकाच लढाईतील सर्व सैनिकांना इतका मोठा सन्‍मान मिळाल्‍याची ही जगातील एकमेव घटना आहे. कमांडींग ऑफिसरने पंजाबच्‍या गव्‍हर्नरला या लढाईची हकिकत कळविली. अशा प्रकारे या लढाईची बातमी ब्रिटीश सरकारपर्यंत जावून पोहोचली. ब्रिटीश पार्लमेंटमध्‍ये जेव्‍हा सारागढीच्‍या लढाईची हकिकत सांगण्‍यात आली तेव्‍हा शहिदांच्‍या सन्‍मानार्थ सर्व सदस्‍य उभे राहिले होते.

आजच्‍या शिख रेजिमेंटद्वारा १२ नाव्‍हेंबर हा दिवस ‘रेजिमेंटल बॅटल ऑनर’ दिवस म्‍हणून पाळल्‍या जातो. थर्मापीलीच्‍या खिंडीत लढणारे ग्रिक सैनिक आणि सारागढी लढविणारे शिख सैनिक यांच्‍या शौर्याची धार सारखीच आहे. चुहार सिंह यांनी सारागढीच्‍या लढाईत शहिद झालेल्‍या शिख सैनिकांचा गौरव करणारी ‘खालसा बहादूर’ ही पोवाडयासारखी दिर्घ कविता पंजाबी भाषेत रचली आहे. 

आयुष्‍य म्‍हणजे एक लढाईच आहे. ही लढाई शौर्याने आणि धैर्याने लढावी लागते. सध्याच्या कोरोना विषाणूने ग्रासलेल्या वातावरणात याचा प्रत्यय सातत्याने येत आहे. आयुष्‍याच्‍या लढाईत ज्‍यांना यश प्राप्त करावयाचे आहे त्‍यांनी सारागढी लढविणा-या त्‍या एकविस शिख सैनिकांचा आदर्श आपल्‍या नजरेपूढे सतत ठेवला पाहिजे. सारागढीच्‍या शिख सैनिकांप्रमाणे जे लढतील ते आयुष्‍याच्‍या लढाईत निश्चितच विजयी होतील.

समाप्त 

श्री राजेश खवले 

संग्राहक : सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सारागढीची लढाई.. श्री राजेश खवले ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ सारागढीची लढाई.. श्री राजेश खवले ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

जीवनाची लढाई जिंकण्‍यासाठी सारागढीच्‍या शिख सैनिकांप्रमाणे लढा ! 

सध्‍याच्‍या पाकिस्‍तानातील समाना पर्वतरांगेतील कोहाट जिल्‍हयातील सारागढी हे एक छोटेसे गाव होते. २० एप्रिल, १८९४ रोजी कर्नल जे कुक यांच्‍या अधिपत्‍याखाली ब्रिटीश सैन्‍यातील ३६ वी शीख रेजिमेंट निर्माण करण्‍यात आली. ऑगस्‍ट १८९७ मध्‍ये या शीख  रेजिमेंटच्‍या पाच कंपन्‍या ले.कर्नल जॉन हटन यांच्‍या अधिपत्‍याखाली उत्‍तर-पश्चिम प्रांत अर्थात खैबर-पश्‍तुनखॉ येथील समाना टेकडया, कुराग, संगर, सहटोपधार आणि सारागढी येथे हलविण्‍यात आल्‍या.

या भागात महाराजा रणजीतसिंग यांच्‍या कार्यकाळात बांधण्‍यात आलेल्‍या किल्‍यांची एक शृंखला होती. यामध्‍ये लोखार्टचा किल्‍ला आणि किल्‍ले गुलिस्‍तान हे अत्‍यंत महत्‍वपूर्ण होते. लोखार्टचा किल्‍ला हिंदुकुश पर्वतातील समाना डोंगररांगात, तर गुलिस्‍तान किल्‍ला सुलाईमान पर्वतरांगेत स्थित होता. या दोन किल्‍ल्‍यामधील अंतर फक्‍त काही मैल होते. हे किल्‍ले जवळ-जवळ असले तरी मध्‍ये उंचवटा असल्‍यामुळे एका किल्‍ल्‍यावरून दुसरा किल्‍ला दिसत नसे. दोन्‍ही किल्‍ल्‍यामध्‍ये संदेशवहन व्‍हावे म्‍हणून मधल्‍या उंचवट्यावर सारागढीची चौकी बांधण्‍यात आली होती. हेलीकोग्राफीच्‍या माध्‍यमातून हे संदेशवहन करण्‍यात येत असे. ग्रीकभाषेत ‘हेलीआस’ म्‍हणजे सूर्य. ‘ग्राफीन’ म्‍हणजे लिहिणे. हेली‍कोग्राफीमध्‍ये मोर्स कोडचा वापर करुन आरशाद्वारा सूर्यकिरणे परावर्तीत करुन संदेश पाठविला जात असे. ही सांकेतिक भाषा सॅम्‍युअल मोर्सने (१७९१-१८७२) शोधून काढली होती. मोर्स हा अमेरीकी चित्रकार आणि संशोधक होता.

सारागढीची चौकी उंच खडकावर बांधण्‍यात आली होती. तिच्‍याभोवती तटबंदी होती. हेलिकोग्राफी संदेशवहनाकरीता एक उंच मनोरादेखील बांधण्‍यात आला होता. या भागात अफगाण,  पश्‍तून, आफ्रीदी टोळया सक्रीय होत्‍या. ब्रिटीश सैन्‍यावर आणि चौक्‍यांवर त्‍या वारंवार हल्‍ले करत असत. १८९७ च्‍या सुमारास अफगाणांचे सार्वत्रिक उठाव या भागाकरीता नित्‍याचे झाले होते.

३ आणि ९ सप्‍टेंबर, १८९७ रोजी अफगाण  टोळयांनी किल्‍ले गुलिस्‍तान जिंकून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. पण किल्‍ले लोखार्टमधील सैनिक किल्‍ले गुलिस्‍तानच्‍या मदतीला धावून गेले. त्‍यांनी अफगाण  टोळयांना हुसकावून लावले. लोखार्टचे सैनिक परत जातांना त्‍यांनी सारागढीची सुरक्षा मजबूत केली. तेथे एक हवालदार आणि २० सैनिक तैनात केले. हे सर्व शीख सैनिक होते.

१२ सप्‍टेंबर, १८९७ रोजी सुमारे १० हजार अफगाण -पश्‍तुनांनी सारागढीच्‍या चौकीवर हल्‍ला केला. यावेळी गुरुमुखसिंग नावाचा सैनिक हेलीकोग्राफ हाताळत होता. लोखार्ट किल्‍ल्‍यावर कर्नल हटन स्थित होता. गुरुमुखसिंहाने हेलीकोग्राफच्‍या सहाय्याने कर्नल हटनला हल्‍ल्‍याची बातमी कळविली. परंतु आपण तातडीने मदत करण्‍यास असमर्थ आहोत असा उलट संदेश हेलीकोग्राफीद्वारा हटनने पाठविला. आता सारागढीच्‍या त्‍या  २१ सैनिकांना लढणे किंवा शरण जावून चौकीचे दरवाजे खूले करून देणे असे दोनच पर्याय उपलब्‍ध होते. एक शीख सैनिक विरुध्‍द शत्रुचे ५०० सैनिक असा हा सामना होता. त्‍या २१ सैनिकांचा प्रमुख होता ‘हवालदार ईश्वरसिंह’.  त्‍याने आणि त्‍याच्‍या सहकारी सैनिकांनी रक्‍ताचा शेवटचा थेंब सांडेपावेतो लढण्‍याचा निर्धार केला.

अफगाणांनी सारागढीवर जोरदार गोळीबार सुरु केला. त्‍यात भगवानसिंह या सैनिकाला गोळी लागून तो गंभीररित्‍या जखमी झाला. अफगाणांचा नेता सारागढीतील शीख सैनिकांना सारखा ओरडून सांगत होता की, ” तुम्‍ही शरण या, चौकीचे दरवाजे उघडा तुम्‍हाला काहीही इजा होणार नाही.”  पण शीख सैनिक बधले नाहीत. हवालदार ईश्‍वरसिंहाने अतुलनीय शौर्याचा प्रत्‍यय आणून देत उर्वरीत सैनिकांना आतल्‍या तटबंदीतून लढायला पाठविले, आणि स्‍वतः पुढच्‍या तटबंदीवरून शत्रूवर ‘मार्टीनी-हेन्‍री’ रायफलीनी गोळया चालवायला सुरुवात केली. त्‍याने कित्‍येक अफगाणांना  ठार केले. चौकीच्‍या तटबंदीवरून होणारा मारा इतका तीव्र होता की, अफगाणांना सारागढीच्‍या तटापर्यंत पोहोचणे मुळीच जमत नव्‍हते.

क्रमशः….

श्री राजेश खवले 

संग्राहक : सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆  तुमच्या तुमच्या परीनं जगा ….. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य?

☆ तुमच्या तुमच्या परीनं जगा ….. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित ☆ 

खूप मोठं आहे हो आयुष्य ,

 छान निवांत जगा , कशाची घाई आहे ..?

तुमच्या तुमच्या परीनं जगा ,

तुम्हाला जमेल तसं जगा ,

उगीच बाकीचे पळतायेत

म्हणून तुम्ही पळत सुटू नका ,

त्यांना गर्दी असेल ,जाऊ द्या त्यांना ,

तुम्ही तुमची क्षमता ओळखून जगा , 

समाधान मिळवत जगा ,

वाटेत मिळेल ते सुख गोळा करत जगा ,

अचानक पुढ्यात येणाऱ्या

 दुःखांचा धैर्याने सामना करत जगा ,

शेवटी आज न उद्या

तुम्हीपण तिथेच पोहोचणार आहात ,

आयुष्याचा उपभोग घेत जगा ,

सुखाने हुरळून जाऊ नका ,

दु:खाने खचून जाऊ नका ,

दुःख आहे म्हणून तर सुख आहे , 

दुःख असल्याशिवाय सुखी होता येत नाही ,

दु:ख नको म्हणून सुखाच्या

शोधात धडपड करून शिखर

गाठणाऱ्यांच्या अपेक्षा तरी

कुठे पूर्ण होतात..?

तिथून मागे वळून पाहतांना

उमजतं त्यांना

खरं सुख खालीच होतं

दुःखाच्या अवती भोवती खेळत असलेलं..!

सुखदुःखांना सोबत घेऊन

आयुष्याचा आस्वाद घेत जगा हो–

आयुष्य खरच खूप सुंदर आहे ,

पॅकबंद खिडक्यांना उंची पडदे

लावलेली नॉन स्टॉप ए सी ट्रेन

तुम्हाला अपेक्षित स्थळी लवकर

पोहोचंवेलही.  पण त्यात ती मजा नाही

जी सर्वसामान्यांच्या नॉन एसी ट्रेन मधे 

मोकळ्या खुल्या खिडक्यातून खेळत्या हवेत

बाहेरची मौज बघत ,

येणाऱ्या स्टेशन्स वर  ,नवीन प्रवाश्यांची नजरभेट घेत , 

डब्यात मुक्त संचार करणाऱ्या

विक्रेत्यांच्या चहा भेळेत आहे ..!

लहानसहान गोष्टीतला आनंद घेत जगा ,

फार पैसा लागत नाही ,

सावकाश जगा. कशाची घाई आहे..?

जास्त पैसा = जास्त सुख

हे समीकरण  नाहीये हो बरोबर..!

 

संग्राहक : स्मिता पंडित 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सामंजस्य – गदिमाडगुळकर आणि मजरुह_सुलतानपुरी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

सामंजस्य – गदिमाडगुळकर आणि मजरुह_सुलतानपुरी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

मला कमालच वाटते देवाची! आणि दैवाचीही! एकाच वर्षी, एकाच महिन्यात, एकाच दिवशी… दोन बाळं जन्माला आली. एक महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात, तर दुसरं पार तिथे उत्तर प्रदेशातील निझामाबादेत. एकाचा जन्म हिंदू कुळातील… तर दुसर्‍याचा जन्म मुस्लिम घराण्यात. पण अखेर उमेदीच्या काळात, दोघेही कार्यरत झाले एकाच क्षेत्रात. एकाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली, तर दुसर्‍याने हिंदी चित्रपटसृष्टी दणाणून. एकाला मराठीचा ‘वाल्मीकी’ म्हणून ओळखत लोक, तर दुसर्‍याला इस जमानेका ‘गालिब’. खोर्‍याने गीतं लिहिली दोघांनीही, अगदी आपापल्या शेवटच्या श्वासापर्यंत. अर्थातच एक गेला ह्या इहलोकीची यात्रा संंपवून अंमळ लवकरच, त्या दुसर्‍याच्या मानाने.

एकाने लिहिलं…

‘तुझ्यावाचुनीही रात जात नाही

जवळी जरा ये हळू बोल काही

हात चांदण्यांचा घेई उशाला

अपराध माझा असा काय झाला ?’

 

तर दुसर्‍याने लिहिलं…

 

‘रातकली एक ख्वाब में आई

और गले का हार हुई

सुबह को जब हम नींद सें जागे

आँख तुम्ही सें चार हुई’

 

म्हणजे ही दोन गाणी अनुक्रमे ‘मुंबईचा जावई’ आणि, ‘बुढ्ढा मिल गया’ ह्या चित्रपटांतली. हे दोन्ही चित्रपट आले तेव्हा, ह्या दोघांनीही वयाची पन्नाशी ओलांडलेली. असे अगणित चमत्कार उतरलेयत ह्या दोघांच्या, सिद्धहस्त लेखणीतून… स्वतःच्या त्या त्या वेळच्या वयाला न जुमानता.

हेच बघा , आणिक एकेक वानगीदाखल…

‘सुटली वेणी, केस मोकळे

धूळ उडाली, भरले डोळे

काजळ गाली सहज ओघळे

या सार्‍याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा’

आणि

‘ये है रेशमी ज़ुल्फों का अँधेरा

न घबराइए

जहाँ तक महक है मेरे गेसुओं की

चले आइये…’

१  ऑक्टोबर रोजी ह्या दोघांचा जन्मदिन आहे… आणि दोघांचंही जन्मवर्ष एकच… १९१९.

 

# गदिमाडगुळकर
# मजरुह_सुलतानपुरी

 

आपापल्या आकाशात… स्वयंतेजाने तळपलेल्या ह्या दोन्ही सूर्यांना, आपल्या मनःपूर्वक अभिवादनाचं अर्ध्य.

 

प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नेहमी स्वयंपाकघरात पिठाची पिशवी ठेवा ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ नेहमी स्वयंपाकघरात पिठाची पिशवी ठेवा ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर ☆ 

नेहमी स्वयंपाकघरात पिठाची पिशवी (अट्टा) ठेवा आणि ती कुठे आहे हे सर्वांना कळवा.

(कृपया शेवटपर्यंत वाचल्याशिवाय हटवू नका)

“हा स्वतः भाजलेल्या स्त्रीचा खरा जीवन अनुभव आहे …”.——

काही वेळापूर्वी, मी कॉर्न उकळत होतो आणि कॉर्न तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी उकळत्या पाण्यात थोडे थंड पाणी ओतले.  चुकून मी माझा हात उकळत्या पाण्यात बुडवला …. 

माझा एक मित्र जो व्हिएतनामी पशुवैद्यकीय डॉक्टर होता घरी आला होता.  म्हणून मी वेदनेने ओरडत असताना त्याने मला विचारले की माझ्याकडे घरी (गव्हाच्या) पिठाची  पिशवी आहे का?

मी थोडे पीठ ओतले  आणि त्याने माझा हात पिठात टाकला आणि मला सुमारे 10 मिनिटे थांबायला सांगितले.

त्याने मला सांगितले की व्हिएतनाम मध्ये एक मुलगा होता जो एकदा जळला होता.  त्याच्यावर आग लागल्याने आणि घाबरून कोणीतरी आग विझवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्या संपूर्ण शरीरावर पिठाची पोती ओतली.  पण केवळ जाळच विझवला गेला नाही तर मुलावर भाजल्याचा कोणताही मागमूस नव्हता !!!!

माझ्या स्वतःच्या बाबतीत, मी माझा हात पिठाच्या पिशवीत 10 मिनिटांसाठी ठेवला आणि नंतर काढला आणि त्यानंतर मला जळण्याच्या कोणत्याही लाल खुणाही दिसल्या नाहीत.  शिवाय, पूर्णपणे वेदना नाही.

आज मी पिठाची पिशवी फ्रिजमध्ये ठेवली आणि प्रत्येक वेळी मी भाजल्यावर पीठ वापरते.  वास्तविक थंड पीठ खोलीच्या तपमानापेक्षा खूप चांगले आहे.

मी पीठ वापरते आणि मला कधी भाजल्याचा मागमूसही नाही!

एकदा माझी जीभ पोळली होती आणि त्यावर सुमारे 10 मिनिटे पीठ ठेवले होते …. वेदना थांबल्या.

त्यामुळे नेहमी तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये कमीत कमी पिठाचे पिशवी ठेवा.

????✌️

पीठात उष्णता शोषण्याची क्षमता असते आणि त्यात मजबूत अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात.  अशा प्रकारे, जळलेल्या रुग्णाला 15 मिनिटांच्या आत लागू केल्यास ते मदत करते.

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी फायदेशीर अशी एखादी गोष्ट शेअर करते, तेव्हा ती इतरांबरोबर शेअर करण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे.  म्हणून हे इतरांसोबत शेअर करा. 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जयतु संस्कृतम् जयतु भारतम् ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ जयतु संस्कृतम् जयतु भारतम् ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

भारतातील अती महत्वाच्या संस्थांची  घोषवाक्ये संस्कृत मधील आहेत. अवश्य  वाचा. 

  • भारत सरकार ? सत्यमेव जयते
  • लोक सभा ? धर्मचक्र प्रवर्तनाय
  • उच्चतम न्यायालय ? यतो धर्मस्ततो जयः
  • आल इंडिया रेडियो ? सर्वजन हिताय सर्वजनसुखाय‌
  • दूरदर्शन ? सत्यं शिवं सुन्दरम्
  • गोवा राज्य ? सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्।
  • भारतीय जीवन बीमा निगम ? योगक्षेमं वहाम्यहम्
  • डाक तार विभाग ? अहर्निशं सेवामहे
  • श्रम मंत्रालय ? श्रम एव जयते
  • भारतीय सांख्यिकी संस्थान ? भिन्नेष्वेकस्य दर्शनम्
  • थल सेना ? सेवा अस्माकं धर्मः
  • वायु सेना ? नभःस्पृशं दीप्तम्
  • जल सेना ? शं नो वरुणः
  • मुंबई पुलिस ? सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
  • हिंदी अकादमी ? अहं राष्ट्री संगमनी वसूनाम्
  • भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी ? हव्याभिर्भगः सवितुर्वरेण्यम्
  • भारतीय प्रशासनिक सेवा अकादमी ? योगः कर्मसु कौशलम्
  • विश्वविद्यालय अनुदान आयोग ? ज्ञान-विज्ञानं विमुक्तये
  • नेशनल कौंसिल फॉर टीचर एजुकेशन ? गुरुर्गुरुतमो धाम
  • गुरुकुल काङ्गडी विश्वविद्यालय ? ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाघ्नत
  • इन्द्रप्रस्थ विश्वविद्यालय ? ज्योतिर्व्रणीत तमसो विज्ञानन
  • काशी हिन्दू विश्वविद्यालय: ? विद्ययाऽमृतमश्नुते
  • आन्ध्र विश्वविद्यालय ? तेजस्विनावधीतमस्तु
  • बंगाल अभियांत्रिकी एवं विज्ञान विश्वविद्यालय, शिवपुर ? उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत
  • गुजरात राष्ट्रीय विधि विश्वविद्यालय ? आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः
  • संपूणानंद संस्कृत विश्वविद्यालय ? श्रुतं मे गोपाय
  • श्री वैंकटेश्वर विश्वविद्यालय ? ज्ञानं सम्यग् वेक्षणम्
  • कालीकट विश्वविद्यालय ? निर्भय कर्मणा श्री
  • दिल्ली विश्वविद्यालय ? निष्ठा धृति: सत्यम्
  • केरल विश्वविद्यालय ? कर्मणि व्यज्यते प्रज्ञा
  • राजस्थान विश्वविद्यालय ? धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा
  • पश्चिम बंगाल राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विश्वविद्यालय ? युक्तिहीने विचारे तु धर्महानि: प्रजायते
  • वनस्थली विद्यापीठ ? सा विद्या या विमुक्तये।
  • राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद् ? विद्याsमृतमश्नुते।
  • केन्द्रीय विद्यालय ? तत् त्वं पूषन् अपावृणु
  • केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ? असतो मा सद्गमय
  • प्रौद्योगिकी महाविद्यालय, त्रिवेन्द्रम ? कर्मज्यायो हि अकर्मण:
  • देवी अहिल्या विश्वविद्यालय, इन्दौर ? धियो यो नः प्रचोदयात्
  • गोविंद बल्लभ पंत अभियांत्रिकी महाविद्यालय, पौड़ी ? तमसो मा ज्योतिर्गमय
  • मदनमोहन मालवीय अभियांत्रिकी महाविद्यालय गोरखपुर ? योगः कर्मसु कौशलम्
  • भारतीय प्रशासनिक कर्मचारी महाविद्यालय, हैदराबाद ? संगच्छध्वं संवदध्वम्
  • इंडिया विश्वविद्यालय का राष्ट्रीय विधि विद्यालय ? धर्मो रक्षति रक्षितः
  • संत स्टीफन महाविद्यालय, दिल्ली ? सत्यमेव विजयते नानृतम्
  • अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ? शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम्
  • विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपुर ? योग: कर्मसु कौशलम्
  • मोतीलाल नेहरू राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान,इलाहाबाद ? सिद्धिर्भवति कर्मजा
  • बिरला प्रौद्योगिकी एवं विज्ञान संस्थान, पिलानी ? ज्ञानं परमं बलम्
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान खड़गपुर ? योगः कर्मसुकौशलम्
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई ? ज्ञानं परमं ध्येयम्
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपुर ? तमसो मा ज्योतिर्गमय
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान चेन्नई ? सिद्धिर्भवति कर्मजा
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रुड़की ? श्रमं विना न किमपि साध्यम्
  • भारतीय प्रबंधन संस्थान अहमदाबाद ? विद्या विनियोगाद्विकास:
  • भारतीय प्रबंधन संस्थान बंगलौर ? तेजस्वि नावधीतमस्तु
  • भारतीय प्रबंधन संस्थान कोझीकोड ? योगः कर्मसु कौशलम्
  • सेना ई एम ई कोर ? कर्म हि धर्म:
  • सेना राजपूताना राजफल ? वीर भोग्या वसुन्धरा
  • सेना मेडिकल कोर ? सर्वे संतु निरामया: ..
  • सेना शिक्षा कोर ? विद्यैव बलम्
  • सेना एयर डिफेन्स ? आकाशस्थ शत्रुन् जहि
  • सेना ग्रेनेडियर रेजिमेन्ट ? सर्वदा शक्तिशालिनः
  • सेना राजपूत बटालियन ? सर्वत्र विजयेम
  • सेना डोगरा रेजिमेन्ट ? कर्तव्यम् अन्वात्मा
  • सेना गढवाल रायफल ? युद्धाय कृतनिश्चयः
  • सेना कुमायू रेजिमेन्ट ? पराक्रमो विजयते
  • सेना महार रेजिमेन्ट ? यशसिद्धि
  • सेना जम्मू काश्मीर रायफल ? प्रस्थ रणवीरता
  • सेना कश्मीर लाइट इंफैन्ट्री ? बलिदानं वीरलक्ष्यम्
  • सेना इंजीनियर रेजिमेन्ट ? सर्वत्र
  • भारतीय तट रक्षक ? वयम् रक्षामः
  • सैन्य विद्यालय ? युद्धं प्रगायय
  • सैन्य अनुसंधान केंद्र ? बलस्य मूलं विज्ञानम्

– – – – – – – – – –

सिलसिला यहीं ख़त्म नहीं होता,

  • नेपाल सरकार ? जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी
  • इंडोनेशिया-जलसेना ? जलेष्वेव जयामहे (इंडोनेशिया) – पञ्चचित
  • कोलंबो विश्वविद्यालय- (श्रीलंका) ? बुद्धि: सर्वत्र भ्राजते
  • मोराटुवा विश्वविद्यालय (श्रीलंका) ? विद्यैव सर्वधनम् पेरादे पञ्चचित
  • पेरादेनिया विश्वविद्यालय ? सर्वस्य लोचनशास्त्रम्

जयतु संस्कृतम् जयतु भारतम् ।

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ख-या इंजिनियर तर सगळ्या महिलाच ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ ख-या इंजिनियर तर सगळ्या महिलाच ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर ☆ 

ख-या इंजिनिअर तर सगळ्या महिलाच——.

ख-या इंजिनिअर तर सगळ्या महिलाच आहेत—-.

डब्याचं झाकण उघडत नसेल तर कोणत्या बाजूने दणका घालायचा ते तिलाच माहिती—-..

निसटणारी पक्कड कशी पकडायची——…

डुगडुगणारं पोळपाटाचा पाट स्थिर कसा करायचा——…

गळणारा नळ बंद करताना कसा हळुच रिव्हर्स करायचा——.

गॅस शेगडी कमी जास्त करताना मध्येच बंद पडत असेल तर, बंद न पडू देता कशी वापरायची—–..

संपलेल्या पावडरच्या डब्यातून शेवटच्या कणापर्यंत हातावर आपटून कशी पावडर काढायची——..

अशा एक ना अनेक कुशलतेची कामं करणाऱ्या—— 

——— समस्त महिला इंजिनिअर्स  ना खूप  खूप शुभेच्छा

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अशिक्षित डॉक्टर.. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ अशिक्षित डॉक्टर.. सर्जन मिस्टर हॅमिल्टन ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

अशिक्षित_डॉक्टर.. सर्जन मिस्टर हॅमिल्टन

एक केपटाउनचा अशिक्षित माणूस. जो एकही इंग्रजी शब्द वाचू किंवा लिहू शकत नव्हता.

ज्याने आयुष्यात कधी शाळेचा चेहरा पाहिला नव्हता.

त्याला मानद मास्टर ऑफ मेडिसिन देऊन सन्मानित करण्यात आले.

केपटाऊन मेडिकल युनिव्हर्सिटी जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

असे म्हटले जाते की जगातील पहिले बायपास ऑपरेशन या विद्यापीठात झाले.

2003 मध्ये——एका सकाळी जगप्रसिद्ध सर्जन प्राध्यापक डेव्हिड डेंट यांनी विद्यापीठाच्या सभागृहात घोषणा केली.—- “आज आम्ही सर्वात जास्त शस्त्रक्रिया करणाऱ्या माणसाला वैद्यकशास्त्रातील मानद पदवी देत आहोत “

——या घोषणेने हॅमिल्टन चे नाव जाहीर केले आणि संपूर्ण सभागृह उभे राहिले.  

हॅमिल्टन सर्वांना शुभेच्छा या विद्यापीठाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे स्वागत होते.

हॅमिल्टनचा जन्म केपटाऊनमधील दुर्गम गावात सनीतानी येथे झाला.  

त्याचे आईवडील मेंढपाळ होते. लहानपणी त्यांनी शेळीचे कातडे घातले आणि दिवसभर अनवाणी डोंगरांवर फिरले.  वडील आजारी पडल्यानंतर हॅमिल्टन केपटाऊनला आले.

त्यावेळी विद्यापीठाचे बांधकाम चालू होते.  तो विद्यापीठात मजूर म्हणून रुजू झाला.  

त्याने तेथे अनेक वर्षे काम केले. दिवसभराच्या कामानंतर तो, जे काही पैसे मिळेल ते घरी पाठवायचा आणि तो स्वत: मोकळ्या मैदानात झोपायचा. त्यानंतर त्याला टेनिस कोर्टचे मैदानात  देखभाल कामगार म्हणून नियुक्त करण्यात आले.  हे काम करता करता तीन वर्षे निघून गेली.

मग— त्याच्या आयुष्याला एक विचित्र वळण लागले आणि तो वैद्यकीय शास्त्रातील अशा टप्प्यावर पोहचला, ज्याला अजून कोणी पोहोचले नव्हते.—-

 –ती सोनेरी सकाळ होती. प्रोफेसर रॉबर्ट जॉयस जिराफांवर संशोधन करत होते.  

त्यांनी ऑपरेटिंग टेबलवर बेशुद्ध जिराफ ठेवला. पण ऑपरेशन सुरू होताच जिराफने डोके हलवले.  जिराफची मान घट्ट पकडण्यासाठी त्यांना एका बळकट माणसाची गरज होती.  

प्राध्यापक  थिएटरमधून बाहेर आले. लॉनवर एक मजबूत निरोगी तरुण काम करीत आहे, हे पाहून प्राध्यापकाने त्याला बोलावले आणि जिराफ पकडण्याचे आदेश दिले. ऑपरेशन आठ तास चालले.

ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांनी चहा आणि कॉफीचा ब्रेक घेतला. तर हॅमिल्टन जिराफची मान पकडून उभा होता. ऑपरेशन संपल्यावर हॅमिल्टन शांतपणे निघून गेला.

दुसऱ्या दिवशी प्राध्यापकाने पुन्हा हॅमिल्टनला बोलावले.  तो आला आणि जिराफची मान पकडून उभा राहिला.  त्यानंतर ती त्याची रोजची दिनचर्या बनली. हॅमिल्टनने अनेक महिने दुप्पट काम केले आणि कधीही जास्त पैसे मागितले नाहीत आणि तक्रार केली नाही. प्राध्यापक रॉबर्ट जॉयस त्याच्या चिकाटी आणि प्रामाणिकपणामुळे प्रभावित झाले आणि हॅमिल्टनला टेनिस कोर्टमधून ‘ लॅब असिस्टंट ‘ म्हणून बढती मिळाली.  

आता त्याने विद्यापीठाच्या ऑपरेटिंग थिएटरमध्ये शल्यचिकित्सकांना मदत करण्यास सुरुवात केली.  ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू राहिली.

1958 मध्ये त्यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आले.– या वर्षी डॉ.ख्रिश्चन बर्नार्ड विद्यापीठात आले आणि हृदय प्रत्यारोपणाचे ऑपरेशन सुरू केले. हॅमिल्टन त्यांचे सहाय्यक बनले.

या ऑपरेशन दरम्यान ते सहाय्यक ते अतिरिक्त सर्जन बनले. आता डॉक्टर ऑपरेशन करायचे आणि ऑपरेशन नंतर हॅमिल्टनला शिवणकामाचे काम देण्यात आले.  त्याने उत्तम टाके केले.  

त्याची बोटे स्वच्छ आणि तीक्ष्ण होती.  तो दिवसाला पन्नास लोकांना शिलाई करायचा.  

ऑपरेटिंग थिएटरमध्ये काम करत असताना त्याला शल्य चिकित्सकांपेक्षा मानवी शरीर अधिक समजले.  म्हणून वरिष्ठ डॉक्टरांनी त्याला शिकवण्याची जबाबदारी सोपवली.

त्यांनी आता कनिष्ठ डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे तंत्र शिकवायला सुरुवात केली.  तो हळूहळू विद्यापीठातील सर्वात महत्वाचा व्यक्ती बनला.  ते वैद्यकीय शास्त्राच्या अटींपासून अपरिचित होते. परंतु सर्वात कुशल सर्जन असल्याचे सिद्ध झाले.

त्यांच्या आयुष्यात तिसरा टर्निंग पॉईंट 1970 साली आला, जेंव्हा या वर्षी यकृतावर संशोधन सुरू झाले आणि त्यांनी शस्त्रक्रियेदरम्यान यकृताची धमनी ओळखली, ज्यामुळे यकृत प्रत्यारोपण सुलभ झाले. त्याच्या निरीक्षणांनी वैद्यकीय विज्ञानातील महान माणसांना आश्चर्यचकित केले.

आज जेव्हा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एखाद्या व्यक्तीचे यकृताचे ऑपरेशन होते आणि रुग्ण त्याचे डोळे उघडतो, नव्या आशेने पुन्हा जिवंत होतो, तेव्हा या यशस्वी ऑपरेशनचे श्रेय थेट “हॅमिल्टन” ला जाते.

हॅमिल्टनने प्रामाणिकपणा आणि चिकाटीने हे स्थान मिळवले.  ते केपटाऊन विद्यापीठाशी 50 वर्षे संबंधित होते.  त्या 50 वर्षात त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही.

हा माणूस  रात्री तीन वाजता घरातून निघायचा, विद्यापीठाकडे 14 मैल चालत जायचा आणि अगदी ठीक सहा वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश करायचा.  लोक त्यांची घड्याळे त्यांच्या वेळेनुसार दुरुस्त करत असत.

त्याला हा सन्मान मिळाला, जो वैद्यकीय शास्त्रात कोणालाही मिळाला नाही.

वैद्यकीय इतिहासाचे ते पहिले निरक्षर शिक्षक होते.—-

आपल्या आयुष्यात 30,000 शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणारे ते पहिले निरक्षर सर्जन होते.

2005 मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना विद्यापीठात पुरण्यात आले.

यानंतर—— 

पदवी मिळाल्यानंतर त्याच्या थडग्याला भेट देणे, 

छायाचित्र काढणे आणि नंतर त्यांच्या सेवेच्या कामावर जाणे, हे विद्यापीठाने शल्य चिकित्सकांना अनिवार्य केले.

“तुम्हाला माहित आहे का की त्याला हे पद कसे मिळाले?”

“फक्तहो.”

ज्या दिवशी त्याला जिराफची मान पकडण्यासाठी ऑपरेटिंग थिएटरमध्ये बोलावण्यात आले होते, 

जर —–त्याने त्या दिवशी नकार दिला असता, जर तो म्हणाला असता, ‘मी मैदान देखभाल कामगार आहे, माझे काम जिराफची मान पकडणे नाही ”   तर… विचार करा !

तेथे फक्त एक “होय” आणि अतिरिक्त आठ तासांची मेहनत होती ज्यामुळे त्याच्यासाठी यशाची दारे उघडली गेली आणि तो सर्जन झाला.

“जेव्हा आपल्याकडे काम शोधावे लागते, तेव्हा आपल्यापैकी बरेच जण आपले संपूर्ण आयुष्य नोकरीच्या शोधात घालवतात”

‘जगातील प्रत्येक नोकरीचा एक निकष आहे आणि नोकऱ्या फक्त त्या लोकांसाठी उपलब्ध आहेत जे निकष पूर्ण करतात. जर आपल्याला काम करायचे असेल, तर आपण काही मिनिटांत जगातील कोणतेही काम सुरू करू शकतो आणि कोणतीही शक्ती देखील आपल्याला रोखणार नाही.’

—-हॅमिल्टनला हे रहस्य सापडले होते, त्याने नोकरीऐवजी काम करण्याला महत्त्व दिले.  

अशा प्रकारे त्याने वैद्यकीय विज्ञानाचा इतिहास बदलला.

कल्पना करा, जर त्याने सर्जनच्या नोकरीसाठी अर्ज केला असता तर तो सर्जन बनू शकला असता का? कधीही नाही.– पण,त्याने जिराफची मान पकडली आणि सर्जन झाला.

बेरोजगार लोक अपयशी ठरतात कारण आम्ही फक्त नोकरी शोधतो, काम नाही.  

ज्या दिवशी आपण हॅमिल्टन प्रमाणे काम करायला सुरुवात करू, आपण यशस्वी आणि महान मानव बनू.

धन्वंतरीना समर्पित…

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares