मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रवींद्रनाथ ठाकूर यांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन – –☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “रवींद्रनाथ ठाकूर यांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन – –☆ श्री जगदीश काबरे ☆

स्वतःच्या शैक्षणिक अनुभवावरून भारतीय मनाशी व परंपरेशी सहजपणे नाते प्रस्थापित करू शकणारी शिक्षणपद्धती अस्तित्वातच नाही हे रवींद्रनाथ ठाकूरांना तीव्रतेने जाणवू लागले होते. म्हणून या विषयावर चिंतन करता त्यांना आढळून आले की, ब्रिटिश शासनकर्त्यांनी निर्माण केलेल्या या इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे एकतर मुलांवर बालपणीच परकीय भाषेचा ताण येतो, परीक्षेचा धसका निर्माण होतो आणि मुख्य म्हणजे या शिक्षणपद्धतीमुळे देशातील शहरे व खेडी यांच्यात दुफळी निर्माण होऊ लागली आहे.

रवींद्रनाथांनी शिक्षणपद्धतीवर चिंतन करून शंभरापेक्षा जास्त निबंध लिहिले आहेत. यापैकी पहिला निबंध ‘शिक्षार हेरफेर’ (शिक्षणात फेरबदल) हा लेख त्यांच्या वयाच्या एकतिसाव्या वर्षी म्हणजेच १८८२ मध्ये प्रसिद्ध झाला. या निबंधामधील केंद्रगत विचारानुसारच त्यांनी पुढे नऊ वर्षांनंतर म्हणजे १९०१ सालच्या डिसेंबर महिन्यात त्यांच्या शिक्षणसंस्थेची सुरुवात केली. ‘शिक्षार हेरफेर’ या निबंधात रवींद्रनाथांनी स्पष्टपणे त्यांची मते नोंदवली आहेत ती अशी :

इंग्रजांनी सुरू केलेली वसाहतवादी शिक्षणपद्धती मुलांच्या मानसिक शक्तीचा ऱ्हास करणारी व त्यांच्या स्वाभाविक प्रवृत्तींना दाबून टाकणारी असल्यामुळे मुलांना ती आनंददायक वाटत नाही. शिवाय हे शिक्षण इंग्रजीतून देण्यात येत असल्यामुळे ती मुलांच्या भावभावनांची व कल्पनाशक्तीची वाढच खुंटवून टाकते. या शिक्षणाचा त्यांच्या जीवनाशी काहीही संबंध नसल्यामुळे ती वरवरची, दिखाऊ व फक्त उपजीविकेचे साधन पुरवणारी ठरते, तीतून कोणत्याही प्रकारचा आत्मिक विकास होत नाही. कारकून तयार करणारी ही शिक्षणपद्धती फक्त पोशाखी विद्या आहे. खेड्यांशी व लोकपरंपरेशी तिचा सुतराम संबंध नाही. भारतीय माणसे तयार करू शकणारी शिक्षणपद्धती कशी असावी याचा आपणच विचार केला पाहिजे, शासनकर्ते आपल्या समाजासाठी हा विचार करणार नाहीत, तशी अपेक्षा करणेसी योग्य नाही. आपणच आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून नवी पद्धत शोधून काढली पाहिजे. 

एकोणिसाव्या शतकाल भारतात प्रचलित असलेली केवळ पौरोहित्याचे शिक्षण देणारी जुनाट व पाठांतरावर आधारलेली शिक्षणपद्धतीही रवींद्रनाथांना मान्य नव्हती आणि इंग्रजांनी सुरू केलेली पद्धतीही मान्य नवहती त्यामुळे अगदी स्वतंत्रपणे विचार करूनच त्यांनी प्राचीन साहित्याचा अभ्यास करून नवा शिक्षणदानाचा प्रयोग १९०१ साली सुरू केला.

या प्रयोगात पहिली अट होती ती म्हणजे निदान प्राथमिक शिक्षण व शक्यतोवर सर्वच शिक्षण मातृभाषेतूनच देण्यात आले पाहिजे. शिक्षण मातृभाषेतून देण्यात आले पाहिजे हे रवींद्रनाथांचे मत सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम होते. हा मातृभाषेचा आग्रह त्यांच्या प्रत्येक शिक्षणविषयक निबंधात अग्रस्थानी असतो. पुनरावृत्तीचा दोष पत्करूनही प्रत्येक निबंधात त्यांनी शिक्षणात मातृभाषेचे माध्यम असावे या त्यांच्या मताशी कधीही तडजोड केली नाही. कारण त्यांच्या मते मातृभाषा ही मातृस्तन्यासारखी असते. मातृस्तन्य पचवण्यासाठी बाळाला काहीही कष्ट व त्रास सहन करावा लागत नाही. सहजपणे शरीराची वाढ होत जाते व एकदा शरीर बळकट झाले की मग इतर अन्न ग्रहण करण्याची क्षमताही नैसर्गिकपणे वृद्धिंगत होते. शिक्षणपद्धतीही अशीच असावी. आधी परिचित वातावरणाशी नाळ जोडणारी, हळूहळू विकसित होत अपरिचित ज्ञानालाही स्वतःत सामावून घेण्याची शक्ती निर्माण करणारी. हेच चिरंतन सत्य आहे अशी रवींद्रनाथांची दृढ धारणा होती.

शिक्षण हे केवळ आर्थिक उन्नतीसाठी नव्हे तर आत्मिक ऐश्वर्यासाठी असावे. शिक्षणाचा मुख्य उद्देश चिंतन-मननशक्ती, कल्पनाशक्ती व कर्मशक्तीचा विकास करणे, हा असावा. शिक्षणाने माणसामाणसांमधील भेद वाढवू नयेत, हे भेद शक्यतोवर कमी करण्याचा सतत प्रयत्न करावा, हाच वैचारिक मूलस्रोत रवींद्रनाथांच्या सर्व-त्यांच्याच निबंधांमधून अखंडीतपणे प्रवाहित होताना दिसतो. कारण पाठांतराधिष्ठित पौरोहित्याचे पंतोजीछाप शिक्षण देणाऱ्या शिक्षणपद्धतीने जातिभेद नाहीसा करण्याचे प्रयत्न केले नाहीत आणि मेकॉलेप्रणीत इंग्रजी शिक्षणाने देशातील माणसांचे शिक्षित व अशिक्षित असे विभाजन केले. हा तथाकथित शिक्षित वर्ग समाजापासून तुटत गेला, स्वदेशापासून तुटतोच आहे. ज्या शिक्षणपद्धतीमध्ये बहुजन समाजाच्या पारंपरिक प्रज्ञेचा आदर नाही, निसर्गाचा आदर नाही, लोककलांचा समावेश नाही व जे काही आहे तेही इंग्रजी माध्यमातून असल्यामुळे फक्त शहरातल्या पैसेवाल्या लोकांनाच परवडू शकते अशी शिक्षणपद्धती भारतीय समाजाला पोषक ठरू शकत नाही. या इंग्रजांच्या पद्धतीत विज्ञान शिक्षण दिले जाते. पण ते विद्यार्थ्यांमध्ये जीवनाकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याइतके त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे अंधविश्वास, रूढिग्रस्तता कमी होत नाही. खेड्यांची उन्नत्ती करण्याचे प्रयत्नच होत नाहीत. हीच रवींद्रनाथांच्या शिक्षणविषयक चिंतनाची दिशा होती. 

अशा सर्व चिंतन मननातून १९०१ साली त्यांनी कलकत्त्यापासून १४५ मधील दूर असलेल्या निसर्गरम्य बोलपूर या लहान गावाबाहेरची जागा नैसर्गिक वातावरणात शिक्षण व्हावे म्हणून शाळेसाठी निवडली आणि शांतिनिकेतन सुरू केले. त्या शाळेचा आज वटवृक्ष झालेला आपण पाहत आहोत. आज शांतीनिकेतन मधून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी जगभर आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण कर्तृत्वाने शांतिनिकेतनची पताका फडफडवत आहेत. रवींद्रनाथ टागोर ( ठाकूर ) हे किती द्रष्टे होते हेच यावरून सिद्ध होते.

☘️☘️

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फक्त दोनशे रुपयांची उधारी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

फक्त दोनशे रुपयांची उधारी लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी संभाजीनगरात येतो… !!

एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतो का? 

या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल.

मात्र संभाजीनगरातील काशिनाथ गवळी यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचा रहिवासी तब्बल तीस वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची..

सध्या केनियाचा रहिवासी असलेला रिचर्ड शिक्षणासाठी संभाजीनगरात होता. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल 30 वर्षांनी परत आला. तब्बल तीस वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि संभाजीनगरातील काशिनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून संभाजीनगरच्या गवळी कुटुंबीयांना झाली. खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण संभाजीनगरात झालं होतं. मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते संभाजीनगरात एकटे रहायचे. खाण्याची-राहण्याची सगळीच अडचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडेनगरमध्ये काशिनाथ गवळी यांचं किराणाचं दुकानं होतं. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायचीय रिचर्डही त्यापैकीच एक. रिचर्डला काशिनाथ काकांनी मदत केली आणि त्याला रहायला घर मिळालं. इतकंच नाही, तर खाण्यापिण्याच्या वस्तूही तो काशिनाथ काकांच्या दुकानातूनच घ्यायचा. 1989 मध्ये त्याने संभाजीनगरात सोडलं त्यावेळी काशिनाथ काकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती. रिचर्ड मायदेशी परतला. तिकडे राजकारणात जाऊन त्याने मोठं पदही मिळवलं, मात्र भारताची आठवण त्याला कायम यायची. त्यात खास करुन काशिनाथ काका यांनी केलेली मदत आणि त्यांच्या 200 रुपये उधारीची जाणीव त्याला होती. गेली 30 वर्ष त्याला भारतात यायला जमलं नाही,

मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्याची पावलं आपसूकच संभाजीनगरकडे वळली आणि त्यानं शोध घेतला तो काशिनाथ काकांचा. तब्बल दोन दिवस त्याने काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली. ही भेट रिचर्डसाठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली. काकांना पाहून तो रडायला लागला. खर तरं काकांच्या नीटसं लक्षातही नव्हतं. मात्र रिचर्डने ओळख दिली आणि काकांना सगळं आठवलं. ही भेट म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आल्याचं रिचर्डने सांगितलं. आणि पैसै परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारतानेच शिकवला असल्याचंही तो आवर्जून सांगतो. काकांनी त्यावेळी मदत केली, त्यांचे फार उपकार माझ्यावर आहेत, अनेक वर्ष त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करु, हे सुचत नव्हतं, मात्र यावेळी भारतात आलो आणि थेट त्यांचं घरचं गाठलं. त्यांना भेटून आनंद झाला, पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे, असं लोक म्हणतात, मात्र हे मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे, अशा शब्दात रिचर्डने आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक वर्ष रिचर्ड गवळी कुटुंबाबद्दल सांगत होता, मात्र भेट काही शक्य होत नव्हती. अखेर यावेळी ती झाली, याचा रिचर्डला आनंद आहेच मात्र मलाही अभिमान असल्याचं रिचर्डची पत्नी मिशेल टोंगी यांनी सांगितलं. काशिनाथ काकांचा उल्लेख त्याने बरेच वेळा केला होत, मात्र आज भेट झाल्याचा आनंद वाटला. नवऱ्याच्या प्रामाणिकपणाचा निश्चितच अभिमान असल्याचं मिशेल म्हणतात.

काशिनाथ गवळी यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात टोंगी दाम्पत्याचं स्वागत केलं. मराठमोठ्या पद्धतीनं टॉवेल-टोपी आणि साडी देऊन त्यांनी दोघांचा सत्कार केला. रिचर्डने त्यांच्या घरी जेवणही केलं. अजूनही काशिनाथरावांचं प्रेम कायम असल्याची भावना रिचर्डने व्यक्त केली. त्याने काशिनाथकाकांना केनियाला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे.

प्रामाणिकपणा कोणी कोणाला शिकवू शकत नाही, तो रक्तातच असावा लागतो.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆अर्जुनाचे बाण आणि बीजगणित — माहिती संग्राहक : श्री चंद्रकांत बर्वे ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ अर्जुनाचे बाण आणि बीजगणित — माहिती संग्राहक : श्री चंद्रकांत बर्वे ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

भास्कराचार्य (ई. सन १११४ ते ११८५) मध्ययुगीन भारतातील एक महान गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यात झाला. गणितातील वेगवेगळ्या गणना (Differential Calculus) शोधून काढणाऱ्या गणितीय शास्त्रज्ञांचे ते पूर्वाधिकारी होते, अगदी न्यूटन आणि लीबनीझ यांच्याही पूर्वी ५०० वर्षे.

भास्कराचार्य यांनी गणितावर आधारित संस्कृत भाषेत ४ ग्रंथ लिहिले. त्यातील एकाचे नाव आहे लीलावती, ज्याच्यात गणितासंबंधित काही कोडी आहेत, गहन प्रश्न आहेत, ज्यावर अनेक विद्वानानी संशोधन करून उत्तर मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. हे कोड्यांसारखे प्रश्न श्लोकांच्या रूपात आहेत व त्यामुळे ते समजून घेणे सुद्धा कठीण वाटते. ह्या कोडीस्वरूप प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी ह्या श्लोकांचा व्यवस्थित अर्थ समजून घेणे अत्यावश्यक आहे.

हा खाली दिलेला श्लोक वाचा

पार्थ: कर्णवधाय मार्गणगणं क्रुद्धो रणे संदधे

तस्यार्धेन निवार्य तच्छरगणं मूलैश्चतुभिर्हयान् |

शल्यं षड्भिरथेषुभिस्त्रिभिरपि च्छत्रं ध्वजं कार्मुकम्

चिच्छेदास्य शिरः शरेण कति ते यानर्जुनः संदधे || ७६ ||

ह्या श्लोकाचा सरळ अर्थ म्हणजे जणू काही खाली दिलेला प्रश्नच आहे,

अर्जुन आणि कर्ण यांच्यातील महाभारत युद्धामध्येअर्जुनाने काही बाण सोडले, सोडलेल्या काही बाणांपैकी

  • अर्धे बाण कर्णाने मारलेले बाण थांबविण्यासाठी खर्ची पडले.
  • एकूण बाणांच्या वर्गमूळाच्या ४ पट बाण, कर्णाच्या रथाच्या घोड्यांना नियंत्रणात आणण्यासाठी वापरले गेले.
  • ६ बाण कर्णाचा सारथी शल्य याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले गेले. (शल्य हा नकुल आणि सहदेव यांचा मामा होता)
  • कर्णाच्या रथावरील छत्र व झेंडा, तसेच कर्णाचे धनुष्य, यावर ३ बाण मारले गेले.
  • शेवटी एका बाणाने कर्णाचा वध करण्यात आला.

तर मग ह्या युद्धात अर्जुनाने किती बाण सोडले?

योग्य समीकरणाने ह्या प्रश्नातील गणिताचे उत्तर नक्कीच मिळू शकेल.

एकूण बाणांची संख्या X आहे असे धरून चालूया

बाणांसंबंधी जी काही विधाने वर केलेली आहेत त्यांना गणितरूपात असे मांडता येईल

X = X/2 + 4√X + 6 + 3 + 1

वरील गणित सोडवले तर अर्जुनाने सोडलेल्या एकूण बाणांची संख्या X = १०० अशी येते.

परंतु असे उत्तर काढल्यावर प्रश्न इथेच थांबत नाही. ह्या श्लोकात बरीच काही गुप्त माहिती आहे. आपण जर खोलात जाऊन विचार केला तर बरीच काही गुप्त माहिती आपण शोधू शकतो.

  • कर्णावर मात करण्यासाठी अर्जुनासारख्या अतिरथी योद्ध्याला ५० बाण वापरावे लागले. यावरून आपल्याला कर्णाच्या युद्ध कौशल्याची महती कळते.
  • रथ चालविणाऱ्या घोड्यांना थांबविण्यासाठी ४० बाण वापरावे लागले, यावरून त्या घोड्यांना रणभूमीवर लढण्यासाठी किती प्रशिक्षण दिले असेल हे आपल्या लक्षात येते.
  • घोड्यांसाठी ४० बाण खर्च झाले, पण शल्य (रथाचा सारथी) फक्त ६ बाणांनी शरण आला, यावरून आपल्याला कळते की शल्य हा अर्जुनाच्या बाजूनेच होता.
  • कर्णाचा रथ आणि धनुष्य नियंत्रणात आणण्यासाठी फक्त ३ बाण लागले, यावरून कर्ण किती हतबल असहाय्य होता हे कळते.
  • आणि एकदा सर्व काही नियंत्रणात आले की शत्रूला नेस्तनाबूत करायला एकच बाण पुरेसा होता हे लक्षात येते.

तर अशी लढाई जिंकण्यासाठी आवश्यक असलेले नियम व कौशल्ये यांची कार्यप्रणाली असे सांगते की सर्वप्रथम शत्रूची लढाऊशक्ती संपवा, दुसरे म्हणजे शत्रूची वाहन साधने, उदाहरणार्थ रथ घोडे वगैरेंची हालचाल थांबवा आणि तिसरे म्हणजे त्याचा रथ, त्याची वाहतुकीची साधने नष्ट करून, नादुरुस्त करून, त्याला असहाय्य करा व अशातऱ्हेने सरते शेवटी शत्रूचा निःपात करा

आपण हाच श्लोक जर अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिला तर

  • संपूर्ण मुक्ती मिळविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्यातील कामना आसक्ती यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. हे जरा कठीण आहे व म्हणून याला ५० बाण वापरावे लागतील.
  • त्यानंतर पंचज्ञानेंद्रिये, तसेच पाच घोड्यांनी सूचित केलेले पंचविषय किंवा पंचतन्मात्रा नियंत्रणात आणा, याला लागणारे ४० बाण सुचवतात की हे सुद्धा कठीण आहे.
  • पंचज्ञानेंद्रियांवर नियंत्रण आणल्यावर आत्मतत्त्वाने सूचित केलेल्या मन बुद्धी चित्त आणि अहंकार यावर नियंत्रण आणण्याच्या दिशेने वाटचाल सुरु होईल.
  • कामना आसक्ती वगैरेचा त्याग केलात, जुने सगळे विसरलात, तर मोक्षप्राप्ती सहजसुलभ होऊ शकेल.

ही आपल्याला पूर्वजांनी दिलेली सनातन धर्मातील देणगी आहे. मूल्यांसहित विद्या – एका श्लोकात किती गहन अर्थ भरला आहे.

 

माहिती संग्राहक : चंद्रकांत बर्वे 

प्रस्तुती :  श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १७ — श्रद्धात्रयविभागयोगः — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १७ — श्रद्धात्रयविभागयोगः — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अर्जुन उवाच 

ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः । 

तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ १ ॥

कथित अर्जुन 

शास्त्रविधी विरहित श्रद्धेने जे अर्चन करिती

सात्विक राजस वा तामस काय तयांची स्थिती ॥१॥

श्रीभगवानुवाच 

त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा । 

सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ॥ २ ॥

कथित श्रीभगवान 

देह स्वभावज श्रद्धा पार्था असते तीन गुणांची

ऐक कथितो सात्विक राजस तामस या गुणांची ॥२॥

*

सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत । 

श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ ३ ॥

*

स्वभाव मनुजाचा श्रद्धामय तसे तयाचे रूप

अंतरी असते श्रद्धा जागृत अंतःकरणानुरूप ॥३॥

*

यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः । 

प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ ४ ॥

*

सात्विक भजती देवांना यक्षराक्षसांसि राजस

प्रेत भूतगणांचे पूजन करिताती ते असती तामस ॥४॥

*

अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः । 

दम्भाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥ ५ ॥

*

त्याग करुनिया शास्त्राचा घोर तपा आचरती

युक्त कामना दंभाहंकार बलाभिमान आसक्ती ॥५॥

*

कर्शयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः । 

मां चैवान्तःशरीरस्थं तान्विद्ध्यासुरनिश्चयान्‌ ॥ ६ ॥

*

कृशावती कायास्थित सजीव देहांना 

तथा जेथे स्थित मी आहे त्या अंतःकरणांना

मतीहीन त्या नाही प्रज्ञा असती ते अज्ञानी

स्वभाव त्यांचा आसुरी पार्था घेई तू जाणूनी ॥६॥

*

आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः । 

यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु ॥ ७ ॥

*

भोजनरुची प्रकृतीस्वभावे तीन गुणांची

यज्ञ तप दानही असती तीन प्रकाराची

स्वभावगुण असती या भिन्नतेचे कारण

कथितो तुजला भेदगुह्य ग्रहण करी ज्ञान ॥७॥

*

आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः । 

रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ ८ ॥

*

आयु सत्व बल आरोग्य प्रीति वर्धकाहार

सात्विका प्रिय स्थिर रसाळ स्निग्ध हृद्य आहार ॥८॥

*

कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः । 

आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ ९ ॥

*

अत्युष्ण तिखट लवणयुक्त शुष्क कटु जहाला

दुःख शोक आमयप्रद भोजन प्रिय राजसाला ॥९॥

*

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्‌ । 

उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्‌ ॥ १० ॥

*

नीरस उष्ट्या दुर्ग॔धीच्या अर्ध्याकच्च्या शिळ्याप्रती

नच पावित्र्य भोजनाप्रति रुची तामसी जोपासती ॥१०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय नवदर्शनांतील नास्तिक दर्शनांचे वेगळेपण” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय नवदर्शनांतील नास्तिक दर्शनांचे वेगळेपण☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय दर्शनशास्त्रात एकूण नऊ दर्शने आहेत ज्यांना “नवदर्शने” असेही म्हणतात. ही नऊ दर्शने आणि त्यांचे सूत्रकर्ते ऋषी खालीलप्रमाणे आहेत:

  1. न्याय दर्शन (न्यायशास्त्र)-महर्षी गौतम
  2. वैशेषिक दर्शन (वैशेषिकशास्त्र)-महर्षी कणाद
  3. सांख्य दर्शन (सांख्यशास्त्र)-महर्षी कपिल
  4. योग दर्शन (योगशास्त्र)-महर्षी पतंजलि
  5. मीमांसा दर्शन (मीमांसाशास्त्र)-महर्षी जैमिनि
  6. वेदांत दर्शन (वेदांतशास्त्र)-महर्षी व्यास (बादरायण)
  7. चर्वाक दर्शन (चर्वाकशास्त्र)-महर्षी बृहस्पति
  8. बौद्ध दर्शन (बौद्ध मतशास्त्र)- गौतम बुद्ध
  9. जैन दर्शन (जैन मतशास्त्र)- आदिनाथ आणि महावीर

ही नऊ दर्शने प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातील विविध वैचारिक शाखांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये वास्तविकता, ज्ञान, धर्म, नैतिकता, आणि मुक्ती या विषयांवर विविध दृष्टीकोनांनी विस्तृतपणे विवेचन केलेले दिसते. या महर्षींना प्रत्येक दर्शनाचे सुत्रकर्ते म्हणतात. कारण त्यांनी त्या त्या दर्शनीक तत्त्वज्ञानाचे मूलभूत सिद्धांत सुत्रबद्ध केले. याचा अर्थ या दर्शनांमधील विचार या ऋषींच्या आधीही अनेक वर्षे अस्तित्वात होतेच. त्या विचारांना संकलित करून एकत्रितपणे सूत्रबद्ध करून त्या ऋषींनी त्यांची मांडणी केली म्हणून त्यांना त्या त्या दर्शनाचे सूत्रकर्ते संबोधले जाते.

भारतीय दर्शनशास्त्रातील नऊ दर्शने ही आस्तिक आणि नास्तिक या दोन वर्गात विभागली जातात:

आस्तिक दर्शने (६):

  1. न्याय दर्शन
  2. वैशेषिक दर्शन
  3. सांख्य दर्शन
  4. योग दर्शन
  5. मीमांसा दर्शन
  6. वेदांत दर्शन

नास्तिक दर्शने (३):

  1. चर्वाक दर्शन
  2. जैन दर्शन
  3. बौद्ध दर्शन

लक्षात घ्या, येथे आस्तिक आणि नास्तिक या शब्दांचा आज आपण जो अर्थ गृहीत धरतो आहोत तो नाहीये. आज आपण ढोबळमानाने आस्तिक म्हणजे ‘देव मानणारे’ आणि नास्तिक म्हणजे ‘देव न मानणारे’ असा अर्थ घेतो. पण

आस्तिक दर्शने वेदांच्या अधिकारित्वाला मान्यता देतात, तर नास्तिक दर्शने वेदांच्या अधिकारित्वाला मान्यता देत नाहीत. याचा अर्थ ‘वेद मानणारे’ ते आस्तिक आणि ‘वेद न मारणारे’ ते नास्तिक असा आहे.

~~~

सांख्य दर्शन हे जरी अस्तिक दर्शनात घेतलेले असले तरीही सांख्यदर्शन हे एक असे दर्शन आहे जे वेदांच्या अधिकारित्वाला मान्यता देते, परंतु ते आत्मा, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांना वेगळ्या प्रकारे मानते. सांख्यदर्शनात, पुरुष (आत्मा) आणि प्रकृति (निसर्ग) या दोन मूलभूत तत्वांचे अस्तित्व मानले जाते. पुरुष हे ज्ञानाचे स्वरूप आहे, तर प्रकृति ही विश्वाची उत्पत्ती आणि विकासाचे कारण आहे. सांख्यदर्शनात पुनर्जन्माची संकल्पना नाही, परंतु ते आत्म्याच्या अस्तित्वाला मान्यता देते. आत्मा हा पुरुष स्वरूपाचा असतो आणि तो प्रकृतीच्या प्रभावाखाली येत नाही. ते वेदांच्या अधिकारित्वाला मान्यता देते आणि ईश्वराचे अस्तित्व मान्य करते. म्हणून सांख्यदर्शन आस्तिक आहे. परंतु त्याची ईश्वराची संकल्पना वेगळी आहे. सांख्यदर्शनात ईश्वर हा निर्गुण आणि निराकार मानला जातो. अशाप्रकारे सांख्यदर्शनाचे तत्वज्ञान इतर आस्तिक दर्शनांपेक्षा वेगळे आहे.

~~~

जैन आणि बौद्ध दर्शने पुनर्जन्म आणि मोक्ष मानतात, परंतु ती नास्तिक दर्शने मानली जातात कारण ती वेदांच्या अधिकारित्वाला मान्यता देत नाहीत. जैन आणि बौद्ध दर्शने वेदांच्या अपौरुषेयत्वाला (दैवी उत्पत्ती) मान्यता देत नाहीत. त्याऐवजी त्यांनी त्यांचे एक वेगळे स्वतंत्र तत्वज्ञान तयार केलेले आहे. जैन आणि बौद्ध दर्शने पुनर्जन्म आणि मोक्ष मानतात, परंतु त्यांच्या स्वतंत्र तत्वज्ञानातून.

~~~

बौद्ध दर्शनाच्या तत्त्वज्ञानात आत्म्याला कुठेही जागा नाही. त्यामुळे आत्मा अमर आहे ही त्यांच्या लेखी खुळी समजूत आहे. त्यांचा पुनर्जन्म हा चैतन्याच्या प्रवाहाच्या स्वरूपात असतो आणि मोक्षाला त्यांनी निर्वाण म्हणजेच मुक्ती म्हटले आहे. बौद्धांनुसार पुनर्जन्म हा आत्म्याचा पुनर्जन्म नाही, तर शरीर आणि मनाच्या संयोगाचा पुनर्जन्म आहे.

बौद्ध दर्शनात पुनर्जन्माचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:

  1. अनात्मवाद: बौद्धांनुसार आत्मा हा एक अविनाशी आणि अनंत असा वास्तविक तत्व नाही. त्याऐवजी, शरीर आणि मन हे क्षणिक आणि बदलणारे आहेत.
  2. प्रतीत्यसमुत्पाद: बौद्धांनुसार पुनर्जन्म हा कारण आणि परिणाम (कर्म) यांच्या आधारे ठरवला जातो. प्रत्येक कृतीचे परिणाम त्याच्या भविष्यातील जन्मांवर परिणाम करतात.
  3. विज्ञान: बौद्धांनुसार पुनर्जन्म हा विज्ञानाच्या आधारे ठरवला जातो, ज्यामध्ये मनाची अवस्था आणि कर्माचे परिणाम यांचा समावेश होतो.
  4. संस्कार: बौद्धांनुसार पुनर्जन्म हा संस्कारांच्या आधारे ठरवला जातो. बौद्ध पुनर्जन्माचे उद्दिष्ट म्हणजे निर्वाण प्राप्त करून दुःखाच्या चक्रातून मुक्ती करून घेणे होय. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पुस्तकामध्ये निर्वाण या शब्दाचा अर्थ सदाचारी म्हणजेच निर्दोष जगणे असा घेतलेला आहे. त्यामुळे जिवंतपणीच माणूस निर्वाणपदाला पोहोचू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

बुद्ध दर्शनात मात्र मोक्षाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे. मोक्ष म्हणजे:

  1. दुःखाच्या चक्रातून मुक्ती: बुद्धांनुसार मोक्ष म्हणजे दुःखाच्या चक्रातून मुक्ती करून घेणे, ज्यामध्ये जन्म, मृत्यू, आणि पुनर्जन्म यांचा समावेश होतो.
  2. निर्वाण: मोक्ष म्हणजे निर्वाण प्राप्त कराणे म्हणजे दुःखाच्या मूळ कारणांचा नाश करणे होय.
  3. तृष्णा (वासना) मुक्ती: मोक्ष म्हणजे तृष्णा (वासना) मुक्ती करून घेणे, ज्यामुळे व्यक्ती दुःखाच्या चक्रातून बाहेर पडते.
  4. शांती आणि समाधान: मोक्ष म्हणजे शांती आणि समाधानाची स्थिती प्राप्त करून, ज्यामध्ये व्यक्ती स्थिर आणि शांत राहते.

बुद्धांच्या मोक्षाचा मार्ग हा अष्टांग मार्ग (आठ सूत्रे) आहे, ज्यामध्ये योग्य दृष्टीकोन, योग्य संकल्पना, योग्य वचन, योग्य कृती, योग्य जीवन, योग्य प्रयत्न, योग्य स्मृती, आणि योग्य समाधान यांचा समावेश होतो. हा अष्टांग मार्गच बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या निर्वाणासंबंधित विचारात घेतलेला आहे.

~~~ 

जैन धर्मात आत्म्याची संकल्पना मानली जाते. जैनांनुसार आत्मा हा एक अविनाशी आणि अनंत असे एक वास्तविक तत्व आहे, जे शरीरात वास करते. म्हणून जैन दर्शनात आत्म्याला “जीव” असे म्हटले जाते. जीव हे एक स्वतंत्र असे तत्व असून ते शरीरापासून वेगळे आहे. जीवाचे अस्तित्व शरीराच्या जन्मापूर्वी आणि शरीराच्या मृत्यूनंतरही असते.

जैनांनुसार जीवाचे मुख्य गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत:

  1. चेतना: जीव हा चेतन असतो आणि त्याला अनुभव आणि ज्ञान असते.
  2. अविनाशी: जीव हा अविनाशी असतो म्हणून त्याचा नाश होत नाही.
  3. अनंत: जीव हा अनंत असतो आणि त्याचे अस्तित्व विश्वाच्या सर्व भागात आहे.
  4. स्वतंत्र: जीव हा स्वतंत्र असतो आणि त्याचे अस्तित्व शरीरापासून वेगळे आहे.

जैन धर्मात आत्म्याच्या संकल्पनेचा महत्वाचा भाग म्हणजे त्याचा कर्माशी असलेला संबंध. जीवाचे कर्म हे त्याच्या कृतींचे परिणाम आहेत जे त्याच्या भविष्यातील जन्मांवर परिणाम करतात. जैनांनुसार आत्म्याची मुक्ती कर्मांच्या बंधनातून मुक्त होऊन आणि मोक्ष प्राप्त करून शक्य आहे. त्यालाच ते कैवल्यानंद असे म्हणतात.

~~~

या सर्व नास्तिक दर्शनाहून वेगळे आहे ते चार्वाक दर्शन. ते इहवादी दर्शन असून तर्काधिष्टीत आहे. म्हणून चार्वाकांना विज्ञानवादी दृष्टिकोनाचे प्रवर्तक म्हणतात. चार्वाक दर्शनाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  1. भौतिकवाद: चार्वाक दर्शन हे भौतिकवादी तत्वज्ञान आहे, ज्यामध्ये भौतिक जगाच्या अस्तित्वाला मान्यता दिली जाते.
  2. नास्तिकवाद: चार्वाक दर्शन हे नास्तिक तत्वज्ञान आहे, ज्यामध्ये वेद, ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, आणि मोक्ष या संकल्पनांना मान्यता दिली नाही.
  3. इंद्रियवाद: चार्वाक दर्शनात इंद्रियांना महत्वाचे स्थान आहे, आणि त्यांनी इंद्रियांच्या अनुभवाला मान्यता दिली. म्हणून त्यांचा प्रत्यक्ष प्रमाणावर भर असतो.
  4. वेदविरोध: चार्वाक दर्शनात वेदांच्या अधिकारित्वाला मान्यता दिली नाही, आणि त्यांनी वेदांच्या अधिकारित्वाला नकार दिला.
  5. सुखवाद: चार्वाक दर्शनात सुखाला महत्वाचे स्थान आहे, आणि त्यांनी सुखाच्या अनुभवाला मान्यता दिली.
  6. ईश्वरविरोध: चार्वाक दर्शनात ईश्वराच्या अस्तित्वाला मान्यता दिली नाही.
  7. आत्मविरोध: चार्वाक दर्शनात आत्म्याच्या अस्तित्वाला मान्यता दिली नाही.
  8. पुनर्जन्मविरोध: चार्वाक दर्शनात पुनर्जन्माच्या संकल्पनेला मान्यता दिली नाही.
  9. मोक्षविरोध: चार्वाक दर्शनात मोक्षाच्या संकल्पनेला मान्यता दिली नाही. त्यामुळे जे काही भोगायचे आहे ते या जन्मातच असे त्यांचे तत्त्व आहे.

या विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, वरील सर्व नास्तिक दर्शनांमध्ये खऱ्या अर्थाने चार्वाक दर्शन हेच एकमेव नास्तिक दर्शन आहे. जर चार्वकांची विचारसरणी भारतीयांनी उचलून धरली असती तर विज्ञान क्षेत्रात भारताने त्याकाळी जी भरारी मारली होती त्यापेक्षा आज भारत जगात कितीतरी पुढे असता. कारण दहाव्या शतकापूर्वी आयुर्वेद, रसायन, वैद्यक, शिल्प इत्यादी विषयांवर इथे अभ्यास पूर्ण ग्रंथरचना झाली होती. भूमिती, व्याकरण, कला यांचाही समावेश त्यात होता. पण नंतर समाज योगधारणा, भक्तीमार्ग, मोक्षसाधना, परलोक, मृत्यूनंतर जीवन यामागे लागला. त्यातून भारतीयांचा निराशावादी दृष्टिकोन वाढीस लागला तसे विज्ञान आणि वैचारिक विचार मागे पडत गेले आणि भारताची अधोगती सुरू झाली. आणि आजही बाबांच्या सत्संगाला भरणारी गर्दी पाहून यात फारसा बदल झालेला आहे असे वाटत नाही. हे जर बदलायचे असेल तर सातत्याने समाजाचे प्रबोधन करण्याची गरज आहे, प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण करण्याची गरज आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून जगण्याची गरज आहे. तसेच चार्वाकांच्या विचारसरणीचा पुन्हा एकदा साकल्याने विचार करण्याची गरज आहे.

☘️☘️

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैय्याकरणी यास्मिन शेख ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

वैय्याकरणी यास्मिन शेख ☆ सौ. मंजिरी येडूरकर

“भाषेला धर्म नसतो. भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझं माझ्या भाषेवर जीवापाड, नितांत प्रेम आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्रात जन्मलेल्या, वास्तव्य करणाऱ्या प्रत्येकाची आहे. ” हे शब्द आहेत जन्माने ज्यू, लग्नाने मुसलमान, तरी मराठी भाषेवर नितांत प्रेम असणाऱ्या यास्मिन शेख यांचे! नितळ गोरा रंग, मृदू स्वभाव, स्वच्छ सुंदर मराठी शब्दोच्चार, नखशिखांत महाराष्ट्रीयन संस्कृतीशी एकरूप झालेलं व्यक्तिमत्त्व! 

त्यांचे मूळ नाव जेरूशा रूबेन. त्यांचे वडील जॉन रूबेन हे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. त्यांच्यासारख्या बदल्या व्हायच्या पण त्या महाराष्ट्रातच झाल्या. त्यांचे नाशिकला स्वतःचे घर होते. त्यांची मुलगी, जेरुशा रूबेन, कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला आल्या व परशुराम महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने बी. ए. उत्तीर्ण झाल्या. त्यांना एम. ए. साठी फेलोशिप मिळाली पण तब्येतीच्या तक्रारीमुळे त्या नाशिकला परत गेल्या. तेथे वसंत कानेटकरांची ओळख झाली. त्यांनी अगदी एम. ए. च्या अभ्यासासाठी कोणती पुस्तके हवी हे सांगण्यापासून त्यांना सर्वच बाबतीत मार्गदर्शन केले. कानेटकरांच्या मुळे परिचित झालेल्या एका तडफदार देखण्या पुरुषाशी मैत्री झाली व तिचे रूपांतर विवाहात झाले. आणि त्या यास्मिन शेख झाल्या. हा प्रवास तसा सोपा नव्हता कारण हिंदू -मुस्लिम पेक्षा ज्यू -मुस्लिम हा भेद भयावह होता. दोन्ही कुटुंबे सुधारक विचारांची, उदारमतवादी, सुशिक्षित असल्यामुळे दोघांच्या घरातून विरोध नव्हता. जेरुशाला धर्मांतरासाठी कोणीही आग्रह धरला नाही त्यामुळे त्या ज्यूच राहिल्या.

एम. ए. नंतर औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात काही वर्षे अध्यापनाचे कार्य केले. पुढे 28 वर्षे सायन येथे S. I. S. महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. श्री. पु. भागवतानी प्रभावी अध्यापन करावयाचे असेल तर आधुनिक भाषाशास्त्र शिकण्याचा सल्ला दिला तो त्यांनी लगेच मान्य करून डेक्कन कॉलेजमधल्या या विषयासाठी प्रवेश घेतला. मराठी साहित्यातील सौंदर्याबद्दल, शुद्धतेबद्दल बोलणाऱ्या श्री. म. माटे यांच्या त्या आवडत्या विद्यार्थिनी होत्या. कदाचित त्यामुळेच त्यांना मराठी व्याकरणात गोडी निर्माण झाली. भाषेकडे व्यापक नजरेने पाहण्याची दृष्टी लाभली. त्याबरोबर त्यांना ‘ मौज ‘ च्या श्री. पु. भागवत यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली. भानू काळे संपादक असणाऱ्या ‘ अंतर्नाद ‘ या मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून त्यांनी पंधरा वर्षे काम केले. मुंबई येथील नियतकालिकातून वर्तमानपत्रातून ‘भाषा सूत्र ‘ हे मराठी भाषेच्या भाषेतील त्रुटींवर सदर चालवले. बालभारतीच्या मराठी पुस्तकाचे सात वर्षे संपादन केले. एस. आर. एस. महाविद्यालयात सहा वर्षे मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केले. निवृत्तीनंतरही दहा वर्षे त्या आयएएस च्या विद्यार्थ्यांना शिकवीत होत्या. दरम्यानच्या काळात ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ व ‘मराठी शब्द लेखन कोश’ अशा दोन ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना डॉक्टर अशोक केळकर ‘भाषा अभ्यासक’ पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल जो समारंभ झाला त्यावेळी ज्येष्ठ लेखक व संपादक भानू काळे यांनी त्यांच्यावरील ‘ यास्मिन शेख – मूर्तिमंत मराठी प्रेम ‘ या गौरव ग्रंथाचे संपादन केले आहे. उत्तुंग व दिव्य व्यक्तिमत्व लाभलेल्या, परिपूर्णतेचा ध्यास असणाऱ्या, निर्मळपणा, शिस्त, बुद्धिमत्ता, परिश्रम करण्याची ताकद असणाऱ्या यास्मिन यांनी स्वतःच्या विकासाबरोबरच अनेकांना सावली दिली.

यास्मिन यांनी आपले सारे जीवन व्याकरणातील सौंदर्य शोधण्यासाठी खर्ची घातले. काही लोकांना व्याकरण आणि सौंदर्य हे दोन शब्द एकत्र येणं म्हणजे वदतोव्याघात वाटेल, पण हेच कदाचित या लोकांचं वेगळेपण असेल. बोलताना इतर भाषेतील शब्द वापरण्यावर त्यांचा आक्षेप आहे. जितक्या सहजतेने आपण इतर भाषेतील शब्द वापरतो तितकी सहजता आपल्याच भाषेतील शब्द वापरताना का येत नाही? हा त्यांचा प्रश्न असतो. गेली 75 वर्षे व्याकरण हाच ध्यास घेणाऱ्या शेख वयाच्या 90 नंतरही तेवढ्याच उमेदीने मराठी भाषेवर काम करताना दिसतात. त्यांच्या मते भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे प्रत्येक मराठी भाषिकाचे कर्तव्य आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आज लोकांनी जे कष्ट घेतले त्यापेक्षा कणभर जास्त कष्ट यास्मिन यांनी घेतले आहेत. त्यांनी आयुष्यभर मराठीच्याच अभिजाततेची कास धरली आणि तेच त्यांचे कार्यक्षेत्र झाले. मराठी प्राचीन भाषा आहे याचे पुरावे ही मिळाले आहेत. त्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा. असे त्या आवर्जून सांगत. योगायोग पहा, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच ‘ याची देही याची डोळा ‘ त्यांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे प्रत्यक्ष पाहता आले. केवढा आनंद झाला असेल त्यांना!!

यास्मिन शेख म्हणतात, मातृभाषा सहजपणे बोलता येणे आणि ती व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध असणे या गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी मराठी भाषा बोलली जाते. म्हणजेच प्रादेशिक भाषा किंवा बोलीभाषा वेगवेगळ्या असल्या तरी औपचारिक लेखनासाठी जी भाषा वापरली जाते ती प्रमाणभाषा सर्वांनी वापरली पाहिजे. बोलीभाषा व प्रमाणभाषा यात वाद असू नये. ललित साहित्यात बोलीभाषा महत्त्वाची कारण बोलीभाषेमुळे लेखनात सच्चेपणा किंवा जिवंतपणा येतो. वैचारिक, औपचारिक लेखनात प्रमाणभाषा यायला हवी. त्यामुळे लेखन बहुश्रुत, बहुज्ञात होते आणि त्यामुळे भाषा समृद्ध होते. भाषा बोलताना तिचे सौंदर्य व सौष्ठव याचे भान असले पाहिजे असे म्हणणारे व मराठी भाषेच्या अस्मितेवर, तिचे व्याकरण, यावर अखंड विवेचन करणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा वारसा घेऊन यास्मिन शेख यांची वाटचाल झाली. त्या म्हणतात आपण कोणत्या धर्मात जातीत जन्म घेणार हे माहीत नसते. व ते आपल्या हातातही नसते. आपण माणसे आहोत. त्यामुळे माणुसकी हाच आपला धर्म असला पाहिजे.

जेरुशा यांचा जन्म 21 जून 1925 चा! त्याबद्दलची एक गमतीदार आठवण त्या सांगतात. एक दिवस त्या गणवेश न घालता शाळेत गेल्या होत्या. वर्गशिक्षिका त्यांना खूप रागवल्या. पण जेरुशा गप्पच. काहीच बोलली नाही. शेवटी तिची मैत्रीण म्हणाली, की बाई आज तिचा वाढदिवस आहे म्हणून तिने गणवेश घातला नाही. तेव्हा शिक्षिका म्हणाल्या आज 21 जून, वर्षातला सगळ्यात मोठा दिवस. या दिवशी तुझा जन्म झाला म्हणजे पुढे तू खूप मोठी होणार आहेस आणि खरोखरीच जेरुशा शतायू झाल्याच पण कर्तुत्वाने, मानानेही मोठया झाल्या. आणि वर्गशिक्षिकांचे शब्द खरे ठरले.

शंभरीतही स्मरणशक्ती मजबूत, नवं काही करण्याचा उत्साह, स्वतःच्या हाताने कागदावर लेखन करण्यात आनंद, असणाऱ्या, वैय्याकरणी म्हणू की वैय्याकरण योगिनी म्हणू, यास्मिन शेख यांना आज म्हणावेसे वाटते “तुमच्या या अभ्यासू वृत्तीला वयाचे ग्रहण कधीच लागू नये, असे निरामय दीर्घायुष्य लाभू दे. “

जेरुशा भारतीय कशा झाल्या, याचा थोडा इतिहास. ज्यू लोक मुळातच बुद्धिमान. जसे कार्ल मार्क्स, आईन्स्टाईन, फ्रॉइड हे शास्त्रज्ञ, फेसबुक व्हाट्सअप चे झुकरबर्ग, गुगलचे समी ब्रिन हे उद्योजक, स्टीव्हन्स स्पिलबर्ग हा सिने दिग्दर्शक, थॉमस फ्रीडमन हा पत्रकार, बॉब डीलन हा गायक ही सगळी नावे ज्यू समाजातील प्रतिभावान लोकांमधील काही प्रसिद्ध व्यक्तींची आहेत. जगाच्या लोकसंख्येत पाव टक्का असलेला हा समाज! पण नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्यांचे प्रमाण वीस टक्के आहे. पॅलेस्टाईन व आसपासचा परिसर हे त्यांचे मूळ स्थान. दोन हजार वर्षांपूर्वी पासून सुरू झालेल्या आक्रमणांना तोंड देत देत अखेरीस देशोधडीला लागले. निरनिराळ्या देशात जाऊन हे लोक स्थायिक होऊ लागले. असाच एक गट एका मोडक्या जहाजातून पळून जात असताना जहाज भरकटले व अलिबाग जवळ जहाज आदळून त्याचे तुकडे तुकडे झाले. बहुतेक सगळे बुडाले. पण असे म्हणतात की त्यातील सात जोडपी नौगाव च्या किनाऱ्यावर कशी तरी पोहोचली. अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर पडलेली, जवळ काहीही नाही, अशा अवस्थेत आलेल्या लोकांना कोळी समाजाने आसरा दिला. कालांतराने यांची संख्या वाढत गेली. त्यांनी आपला धर्म जपला पण भाषा रितीरिवाज स्थानिक लोकांचे घेतले. 1948 मध्ये इस्त्राइलच्या निर्मितीनंतर बहुतांश ज्यू लोक परत गेले पण काही आपल्या प्रेमापोटी इथेच राहिले. त्यांच्या मनात भारतीयांबद्दल अपार कृतज्ञता होती. फ्लोरा सॅम्युअल लिहितात, “मी साऱ्या जगाला सांगू इच्छितो की भारत हा जगातील एकमेव देश असा आहे की जिथे आम्हा ज्यूंचा धार्मिक कारणावरून कधी छळ झाला नाही. ” भारतीयांच्या सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव या गुणांची आणखी काय पावती हवी!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अभ्यास कसा करावा, ह्याचाच अभ्यास” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ “अभ्यास कसा करावा, ह्याचाच अभ्यास” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“त्याचं नेमकं काय चुकतं, हेच कळत नाही. “

“ही घरी सगळं व्यवस्थित करते, पण ऐन परीक्षेत त्याच त्या चुका. ” 

“हजारदा सांगितलं तरी अजूनही वेळापत्रक करणं जमतच नाहीय. “

“शाळेत आणि क्लास मध्ये सगळं समजतं, पण घरी आल्यावर लक्षातच राहत नाही असं म्हणतो. “

“नुसत्या वह्या पूर्ण केल्या की अभ्यास होतो का? तुम्हीच सांगा. पण हिला ते पटतच नाही. “

“दिवसभर नुसती लिहीतच असते. पण तरीही मार्कांमध्ये फरक नाहीच. ” 

“लिखाणात असंख्य चुका.. ” 

“अर्धा ताससुद्धा एका जागी बसत नाही, आणि लगेच अभ्यास झाला म्हणतो. आता दहावीच्या वर्षात असं चालतं का?” 

“प्रॅक्टिस करायला नाहीच म्हणतो. मी तुम्हाला मार्क मिळवून दाखवीन असं म्हणतो. पण अभ्यास करताना तर दिसत नाही. ” 

” परीक्षेत वेळच पुरत नाही असं म्हणते. निम्मा पेपर सोडूनच येते. ” 

” नियमितपणाच नाही, शिस्त नाही. उद्या परीक्षा आहे म्हटलं की आज रात्र रात्र बसायचं. आणि वरुन पुन्हा आम्हालाच म्हणायचं की, बघा मी कसं मॅनेज केलं. ” 

“अभ्यासाचं महत्वच वाटत नाही हिला. सारखा मोबाईल हातात. ” 

“दहावीत चांगले मार्क मिळाले. पण अकरावी आणि बारावीत गाडी घसरली. गेल्या दहा बारा टेस्ट मध्ये फक्त एक आकडी मार्क्स मिळालेत. कुठून मिळणार मेडिकल ला ॲडमिशन?” 

“इंस्टाग्राम वर दिवस दिवस वेळ घालवल्यावर मार्क कुठून मिळणार?”

“हिच्या आळशीपणाचा, न ऐकण्याचा आणि अभ्यास न करण्याचा आम्हाला इतका कंटाळा आला आहे की, आता आम्ही तिच्याशी बोलणंच सोडून दिलं आहे. “

“हाच म्हणाला म्हणून सायन्स ला ॲडमिशन घेतली, आता ते जमतच नाही असं म्हणतो. तीन लाख रुपये फी भरली आहे हो आम्ही. आता काय करायचं?”

“सर, मागे तुमच्याकडे ॲप्टिट्यूड टेस्ट केली होती, तेव्हां तुम्ही स्पष्ट सांगितलं होतं की, त्याला सायन्स झेपणार नाही. पण माझ्याच मित्राचं ऐकून मी त्याला सायन्स ला पाठवलं. आता बारावीत तीनही विषयात नापास झालाय. कॉलेज नको म्हणतो, क्लास नको म्हणतो. अभ्यासच नको म्हणतो. आता कसं करावं?”

आणखी लिहीत राहिलो तर यादी आणखी खूप मोठी होईल. आपली मुलं आणि त्यांचा अभ्यास हा पालकांसमोरचा यक्षप्रश्न झाला आहे. मार्कांची स्पर्धा एवढी वाढली आहे की, त्यात मुलांचा टिकाव लागावा यासाठी पालकांची सर्वतोपरी धडपड सुरू असते.

“मार्क म्हणजे सर्वस्व नाही” हे म्हणणं सोपं असलं तरीही मार्कांशिवाय काही होत नाही हेही तितकंच खरं आहे. पुढचे प्रवेश मिळवताना मार्कलिस्ट भक्कम नसेल तर खिशाला कशी भोकं पडतात, हे अनेकांच्या उदाहरणातून आपण पाहिलंसुद्धा असेल.

प्रवेश परीक्षा आणि त्यासाठी आवश्यक असणारं मेरिट हा प्रश्न सुटणार कसा? आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती अपेक्षेनुसार झाली नाही तर पुढं कसं होणार? आणि करिअर कसं होणार? ही चिंता पालकांना आहेच. म्हणूनच, बहुतांश पालक “आपण पालक म्हणून कुठंही कमी पडता कामा नये” या प्रयत्नात असतात. ते मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देतील, लॅपटॉप देतील, मुलांच्या खोलीला एसी बसवतील, सगळी स्टेशनरी आणि स्टडी मटेरियल उत्तम दर्जाचं आणून देतील, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतील, ब्रँडेड क्लासेस लावतील, पर्सनल कोचिंग लावतील, परीक्षेच्या वेळी तयारीसाठी महिनाभर रजा काढून घरी थांबतील. पण मूळ समस्या वेगळीच आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही..

जसजशा वरच्या इयत्तेत आपलं मूल जाईल तसतसा अभ्यास अधिकाधिक व्यापक आणि वाढत जाणार. अभ्यासासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आणि अभ्यासाचं आकलन सुद्धा चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करावे लागणार, हे समजून घेणं गरजेचं असतं. पण प्राथमिक शाळेत असताना आपलं मूल जसा आणि जेवढा अभ्यास करत होतं, तेवढाच अभ्यास आता दहावी-बारावीच्या वर्षातही करत असेल तर ते कसं चालेल? शैक्षणिकदृष्ट्या महत्वाच्या वर्षांच्या काळात अभ्यासाचा अतिरेक नको, पण अभ्यासाविषयी गांभीर्य तर गरजेचंच आहे.

आपली मुलं अभ्यास करतात, म्हणजे नेमकं काय करतात? हे जरा लक्ष देऊन पाहिलं की, अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. पुष्कळ मुलामुलींना अभ्यास कसा करायचा असतो, हेच ठाऊक नसतं. एखाद्या प्रश्नाचं नेमकं मुद्देसूद आणि अचूक उत्तर कसं लिहावं, हे त्यांना माहितीच नसतं. आता जे त्यांना ठाऊकच नाही, ते परीक्षेत कसं जमेल? कितीतरी मुलांना प्रश्नपत्रिकेत नेमका कसा प्रश्न विचारला आहे आणि त्याचं उत्तर कसं लिहावं लागेल, हेही जमत नाही. “मी कितीही लिहिलं तरीही मार्क्स मिळत नाहीत” अशी तक्रार करणाऱ्या मुलांच्या उत्तरपत्रिका पहा. मोठं उत्तर लिहिण्याच्या नादात अनावश्यक लिखाण केल्याचं आपल्याला दिसेल.

“सराव केल्याशिवाय आपल्याला अचूकता साधणार नाही” हे न पटणारी अनेक मुलं आहेत. अतिआत्मविश्वास आणि आळस या दोन दोषांमुळे त्यांचं वारंवार नुकसान होतच असतं. पण तरीही त्यांना सुधारणा करणं जमत नाही.

एकूणच, आपल्या मुलांना अभ्यासाची आणि परीक्षेची कौशल्यं शिकणं, ती आत्मसात करणं हे नितांत आवश्यक आहे. उत्तम अभ्यास कसा करावा, याची कौशल्ये वेगळी असतात आणि उत्तम परीक्षार्थी कसं व्हावं यासाठी वेगळी कौशल्ये आत्मसात करावी लागतात. हा फरक आपण सर्वांनीच समजून घेतला पाहिजे.

“जेव्हां अभ्यास करायचा असतो तेव्हां विद्यार्थी आणि जेव्हां परीक्षा असते तेव्हां परीक्षार्थी” हा तोल प्रत्येकाला साधता यायला हवा. हा समन्वय जी मुलं साधू शकतात, त्यांना यश मिळवणं सहज शक्य होतं.

याच महत्वाच्या मुद्द्याला समोर ठेवून “साधना” या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. हे या कार्यक्रमाचं १९ वं वर्ष आहे. शहरापासून दूर, खऱ्या अर्थानं समृद्ध निसर्गाच्या सानिध्यात चार दिवसांचं हे निवासी प्रशिक्षण असतं. सातवी ते बारावीपर्यंतच्या वयोगटासाठी “साधना” आहे.

“अभ्यास कसा करावा, ? ह्याचाच अभ्यास” हेच “साधना” चे ब्रीद आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी अभ्यासाची योग्य पद्धत विकसित व्हावी आणि त्यांना उत्तम शैक्षणिक यश मिळावं, ह्या उद्दिष्टानेच ‘साधना’ ची आखणी करण्यात आली आहे. आजवर या कार्यशाळेत देशभरातून तसेच परदेशातूनही अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

आपल्याला अनेकदा असं वाटत असतं की, अभ्यास करणं ही एक वैयक्तिक गोष्ट आहे आणि त्याच्या पद्धती व्यक्तीनुसार बदलत असतात. ज्याची त्याची सवय वेगळी, पद्धत वेगळी. ती प्रत्येकालाच जशीच्या तशी लागू होणं कठीण असतं. आपलं वाटणं अगदी बरोबर आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर, प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. सगळ्याच विषयांसाठी एकाच पद्धतीनं अभ्यास करणं प्रभावी ठरत नाही.

पालकमित्रांनो, उत्तम अभ्यास करणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्यच असतं असं आपल्याला वाटत असतं. पण तुम्हाला अपेक्षित असणारा उत्तम अभ्यास ही एक कला आहे. आपली मुलं कोणत्याही इयत्तेत शिकत असोत, त्यांना ही उत्तम अभ्यासाची कला अवगत होणं अतिशय आवश्यक आहे.

अभ्यासातलं यश हे केवळ मुलांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे कष्ट यांच्यावरच अवलंबून नसतं. तर, अभ्यासाच्या तंत्रशुद्घ पद्धतींवर सुध्दा अवलंबून असतं. मुलांना अभ्यासाची योग्य पद्धत अवगत झाली तर त्यांच्या अभ्यासात लक्षणीय बदल होतो, अभ्यास अधिक प्रभावी होतो, तो अधिक काळ स्मरणात राहतो आणि त्याची गुणवत्ता पूर्वीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक सुधारते.

कित्येक बुद्धिमान मुलांना अभ्यासात म्हणावं तितकं यश मिळत नाही, परिक्षेत गुण मिळत नाहीत, अशा विद्यार्थ्यांची स्थिती खरोखरच फार कठीण असते. सगळेच त्यांना हुशार म्हणत असतात, पण अभ्यासात मात्र त्यांची हुशारी दिसून येत नाही, हीच मोठी समस्या असते. पण त्यांच्या तुलनेत सामान्य विद्यार्थी सुध्दा अभ्यासाच्या बाबतीत चांगलं यश मिळवून पुढं जातात. असं का होत असेल? याचं मूळ अभ्यासाच्या तंत्रांमध्ये दडलेलं आहे.

“अभ्यास कर”, “अभ्यास कर” असा आग्रह सगळेच धरतात, पण “नेमका अभ्यास कसा करावा?” याचं शिक्षण मात्र मिळत नाही.

“साधना” ही कार्यशाळा ह्याच समस्येला डोळ्यांसमोर ठेवून सुरु करण्यात आली. गेली अठरा वर्षे ही कार्यशाळा दरवर्षी होते. ही चार दिवसांची कार्यशाळा निवासी असून केवळ ३० विद्यार्थ्यांसाठीच असते.

“साधना” कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रभावी अभ्यास करण्याची २३ तंत्रे शिकवली जातात. ही तंत्रे परदेशांतील अनेक संशोधकांनी विकसित केलेली असून अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये शिकवली जातात. हीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणित तंत्रे विद्यार्थ्यांना शिकवली जातात. “साधना” मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी देखील एक स्वतंत्र सेशन असते, जे अतिशय उपयुक्त आणि महत्वाचे असते.

इयत्ता सातवी पासून पुढचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकतात. तसेच सीए, सीएस, स्पर्धा परीक्षा, इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकतात.

(आपली नोंदणी लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. ३० जागा भरल्यावर नोंदणी थांबवण्यात येते. नोंदणी करण्याकरिता 8905199711 किंवा 8769733771 (सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत) या क्रमांकावर संपर्क साधावा.) 

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सोळा सहस्त्र एक शतक वरमाला!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“सोळा सहस्त्र एक शतक वरमाला! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ही तर मोठी दिवाळी!

जन्मदात्री धरित्री आपल्याला कधीही मृत्युशय्येवर निजवणार नाही, याची त्याला पुरेपूर खात्रीच होती. मरेन तर तिच्याच हातून… अन्यथा नाही असा त्याचा प्रण होता. आणि ब्रम्हदेवांकडून तसा वर पदरात पडताच तो स्वर्गातील देवांनाही वरचढ ठरला आणि पृथ्वीवर साक्षात ‘नरक’ अवतरला!

त्याचे अपराध शंभरात नव्हे तर सहस्र संख्येने गणले जाऊ लागले होते… सोळा सहस्र आणि वर एक शतक अधिकचे! त्याचा ‘शिशुपाल’ करण्याची घटिका समीप आली होती. मुरा नावाच्या अधमाला लीलया मातीत घालून तो ‘मुरारी’ झाला! पण नरक अजूनही नांदताच होता… ब्रम्हदेवाच्या वरदानाची कवचकुंडले परिधान करून रणात वावरत होता… चिरंजीव असल्याच्या आविर्भावात. इकडे ही सत्याचे भाम म्हणजे प्रकाश अंगी मिरवणारी रणात निघाली होती आपल्या सुदर्शनचक्रधारी भ्रतारासोबत.. तिला रण अनुभवयाचे होते… आपल्या स्वामींना शत्रूशी झटताना आणि विजयश्री प्राप्त करताना याचि देही.. याचि डोळा तिला पहावयाचे होते! ती फक्त दर्शक म्हणून आली होती… पण प्रत्यक्ष युद्धभूमीत तिच्या स्वामींनी चिरपरिचित नीतीने, ‘माये’च्या रीतीने तिला हाती आयुध घ्यायला उद्युक्त केले! तो पृथ्वीचा पुत्र… रावणाची चिता विझून गेल्यावर जणू त्याचाच कुमार्ग अनुसरण्यासाठी मातेला भार म्हणून जन्मास आलेला. पण ही तर स्वत:च पृथ्वीचा अवतार… म्हणजे त्याची आई…. आणि त्याचे अपराध उदंड झालेले… त्याला दंड दिलाच पाहिजे. तसा तिने तो दिलाही! त्यामुळे तिच्यावरचाच भार गेला.

खेळ तो येणेचि खेळावा.. सारे खेळ त्याचेच.. खेळाडूही तोच.. आपण फक्त दर्शक. स्वामींनी सत्यभामेकडून खेळ खेळवून घेतला!

सोळा हजार शंभर अभागी जीव आता स्वतंत्र झाले होते… नव्हे त्यांना प्रत्यक्ष देवाने सोडवले होते त्या नरकातून. पण मानवी जीवनात मानवाला अतर्क्य घटनांना सामोरे जावे लागते… देव असले म्हणून काय… मानव अवतारात अवतारी देवही अपवाद नव्हते! भगवान श्रीरामांनी संसाराचे भोग भोगले होतेच की. कुणा एकाचे बोल ऐकून प्राणप्रिय पत्नी वनात धाडली होती… रामायणानंतर आणखी एक रामायण घडले होते.

नरक तर आईच्या मृत्यू पावून तसा मुक्त झाला होता… पण त्याच्या बंदिवासातील सोळा हजार शंभर स्त्रिया आता विनापाश झालेल्या होत्या. ज्याने स्त्री संकटातून मुक्त केली त्याचे त्या स्त्रीने दास्य पत्करावे असा संकेतच होता तेंव्हा. त्या म्हणाल्या… देवा… आता आम्ही सर्वजणी तुमच्या आश्रित झालेल्या आहोत… जगाचे आणि आमचे आजवर एकच नाते होते… शरीराचे. आणि आम्ही स्त्री जातीत जन्मलो एवढेच काय ते आमचे पातक. जन्मदात्यांनी आम्ही विटाळलो म्हणून आमचे नाव टाकले… आम्ही कुणाच्याही बहिणी उरलो नव्हतो, कुणाच्या पत्नी होऊ शकत नव्हतो… निसर्गनियमाने आई झालोच तरी कुणाचे नाव सांगायचे बाळाचा पिता म्हणून? तो असुर असला तरी त्याचे नाव तरी होते आमच्या नावात… आमच्या इच्छेविरुद्ध. पण आता आम्ही कुणाच्या नावाने जगावे.. पती म्हणून कुणाला कपाळी रेखावे?

धर्माच्या पुनरुत्थानार्थ संभवलेल्या भगवंतापुढे असे धर्मसंकट यावे? या जीवांना आश्रय देणे तर कर्तव्याच. पण त्यांचा प्रश्न? त्याला व्यवहाराने उत्तर देणे अपरिहार्य होते. स्वत: देव यशोदासूत होते तसे देवकीनंदनही होतेच. वासुदेव होते तसेच नंदलालही होतेच!

“तुम्ही आता या क्षणापासून आमच्या, अर्थात द्वारकाधीश श्रीकृष्ण यांच्या धर्मपत्नी आहात! आणि अखिल जगत या नात्याचा सन्मान करेल.. अशी आमची आज्ञा राहील!

 राजयाची कांता काय भीक मागे.. मनाचिये योगे सिद्धी पावे.. अशी त्या सा-या आत्म्यांची गत झाली. एवढी वर्षे नरक भोगला… पण भगवत्कृपा झाली आणि पावित्र्य अंगा आले. आता प्रत्यक्ष देवाच्या नावाचे कुंकू लेवून जगायचे आणि अहेव जायचे! राजाची मुद्रा उमटवलेले साधे कातडे जरी असले तरी ते व्यवहारात सुवर्णमुद्रेसारखे चालून जाते.. मग आम्ही तर जिवंत देह आहोत.. आमचा धनी, आमचा स्वामी एकच… श्रीकृष्ण! जगताच्या दृष्टीने हे विवाह असतील… या संस्कारातून कामवासनेचा गंध येईलही एखाद्या घ्राणेन्द्रीयास! सर्व भोगांच्यामध्ये राहूनही नामानिराळा राहणारा हा… लांच्छन बरे लावून घेईल? रुक्मणि, जाम्बवन्ती, सत्यभामा, कालिन्दी, मित्रबिन्दा, सत्या, भद्रा और लक्ष्मणा अशा आठ सर्वगुणसंपन्न भार्या असणारा राजस सुकुमार मदनाचा पुतळा आमच्या सारख्या चुरगळलेल्या फुलांची माला का परिधान करेल? देवाच्या चरणावर वाहिलेली फुले कायमची सुगंधी होऊन राहतात.. त्यांचे निर्माल्य नाही होत!

आम्हा सर्वजणींचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची त्याची हे कृती न भूतो न भविष्यती! मानव्याच्या दृष्टीने ही अलौकिक कृती म्हणजे विश्वाने उदरात सामावून घेतलेल्या सहस्र आकाशगंगाच म्हणाव्यात.

भोगी म्हणून अज्ञानी जीव उपहास करु शकतील हे काय त्यांना ज्ञात नसेल? पण कर्मसिद्धांत सांगणारे हृद्य फलाची चिंता का वाहील? देवाने ज्याला आपले मानले त्याचे इह आणि परलोकीही कल्याणच होते! त्याची “मी स्वामी पतितांचा” ही उक्ती सिद्ध करणारी ही कृती म्हणूनच वंदनीय आणि अनुकरणीय!

मानव की परमेश्वर? या प्रश्नाने त्या युगातही काही शंकासूर ग्रस्त होते आणि या युगातही आहेतच! पण ज्याला कीर्तीचा मोहच मुळी नाही… आम्हा पतितांचे रुदन तो केवळ ऐकत स्वस्थ बसू शकणा-यांपैकी खचितच नव्हता. कर्तव्यासाठी कलंक साहण्याचे सामर्थ्य अंगी असणारा तो एक समर्थ होता. आम्हां पतितांना संजीवन देण्यासाठी त्याने कलंक आदराने ल्याला… हलाहल प्राशन करून देवेश्वर झाला… ज्याने बाल्यावस्थेत धेनू राखल्या… त्याचे हृदय वत्सल धेनूसम असावे, यात नवल ते काय?

कौरवांच्या सभेत याच द्वारकाधीशाने एका द्रौपदीला वस्त्रे पुरवली यात म्हणूनच आश्चर्य वाटत नाही!

(दीपावली दरम्यान येणारी चतुर्दशी लहान दिवाळी म्हणून उल्लेखिली जाते. खरे तर हाच दिवस ख-या दिवाळीचा मानला जावा, असे वाटून जाते. अशी अलौकिक घटना या दिवशी श्रीकृष्णावतारात घडली… समाजबहिष्कृत थोड्याथोडक्या नव्हे, तब्बल सोळा हजार शंभर स्त्रियांना एका सर्वशक्तीमान दैवी अवतारीपुरुषाने पत्नी म्हणून स्विकारणे ही घटना सर्वार्थाने असामान्य! देवाचा माणूस झाला किंवा माणसाचा देव झाला या चर्चेपेक्षा माणसातले देवत्व कर्मातून सिद्ध करणारा मनुष्य देवच! भगवान श्रीरामांचे चरित्र व्यवहारात अनुसरण्यायोग्य आहे, पण भगवान श्रीकृष्ण चरित्र प्रत्यक्षात अनुसरणे केवळ अशक्य आहे, असा मतप्रवाह आहे. पण श्रीकृष्ण परमात्याची पतितोद्धाराची कृती अनुकरणीय नाही का? असो. अधिकाराविना बरेच लिहिले आहे. महान गीतगोविंदकार कवी मनोहर कवीश्वर यांनी ‘माना मानव वा परमेश्वर’ हे खरोखर अप्रतिम रचनेतून प्रत्यक्ष श्रीकृष्ण चारित्र्य नजरेसमोर उभे केले आहे. हे विचार लिहिताना त्यांच्याच शब्दांचा आधार घेतला आहे, हे लक्षात येईलच. यात इदं न मम अशी भावना आहे. जय श्रीकृष्ण.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – २ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – २ ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

(आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.) इथून पुढे —- 

आपल्या शिक्षकी पेशातून किती तरी वर्षांपूर्वी अण्णा निवृत्त झाले होते. पण पुढे कित्येक वर्षे अध्यापन, लेखन त्यामुळे ते खर्‍या अर्थाने निवृत्त झाले नव्हतेच. या दुखण्याने मात्र त्यांना निवृत्त केलं. आता ते इतके रिकामे रिकामे झाले,  की मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. बोलता येईना,  त्यामुळे संवाद थांबला. लिहिता येईना, त्यामुळे लेखन थांबलं. लोकसंपर्कही हळूहळू कमी झाला. आपल्यामुळे कुणाला कसला त्रास होऊ नये, म्हणून अण्णा विलक्षण जागरुक असायचे. पण या काळात अण्णांना नेमके काय हवे,  कशाची गरज आहे, हे लक्षात घेऊन ती गरज भागविण्यासाठी उज्ज्वला आपणहून पुढे आली. वहिनी अर्थात होत्या. पण त्या घर, स्वयंपाक-पाणी, अण्णांचं पथ्यपाणी यात गुंतलेल्या. त्यात त्यांचं वयही सत्तरीच्या जवळपास.

वर्षातून एकदा लांबचा प्रवास करून यायचा, असा अण्णा-वहिनींचा गेल्या ३०-३५ वर्षातील शिरस्ता. मागे एकदा कन्याकुमारीला भेट दिली, तेव्हा विवेकानंद स्मारकाचा विकास झालेला नव्हता. पुन्हा त्या भागात जाऊन ते स्मारक बघून येण्याची इच्छा दोघांच्याही मनात निर्माण झाली. आता अण्णांनी पंचाहत्तरी गाठलेली. वहिनी अडुसष्ठच्या पुढे. त्यात अण्णांची बोलण्याची, लिहिण्याची, घास गिळण्याची समस्या. उज्ज्वलाने यावेळी पुंडलिकाची भूमिका बजावत वयाने वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या दांपत्याला, शरिराने काही प्रमाणात विकलांग, पण मनाने निरामय असलेल्या आपल्या गुरुला आणि गुरुपत्नीला दक्षिण भारताची मुशाफिरी व विवेकानंद स्मारकाचे दर्शन घडवले.

प्रवासाला गेलं की तिथली माहिती समजून घ्यायची. टिपणे काढायची आणि नंतर अत्यंत रोचक व माहितीपूर्ण प्रवासवर्णन लिहायचं,  हाही अण्णांचा नित्याचा प्रघात. यावेळी उजव्या हाताच्या बोटांना पकड नव्हती. त्यांनी हळूहळू डाव्या हाताने लिहिण्याचा सराव केला. अजून व्यवस्थित लेखन होत नव्हतं,  पण वाचून कळेल इतपत लिहायला जमू लागलं. लेखनाची उर्मी अशी उदंड की लेखन केल्याशिवाय राहवेना. प्रवास संपवून मंडळी घरी आली. अण्णांनी रोज थोडं थोडं जमेल तसं वेड्या-वाकड्या अक्षरात लेखन केलं. उज्ज्वलाने इतरांना समजेल, अशा अक्षरात त्याची मुद्रण प्रत तयार केली. दक्षिण भारताचे सुंदर प्रवास वर्णन पुढे प्रसिद्ध झाले. साधु वासवानी यांच्या विचारांचा इंग्रजीवरून मराठी अनुवाद त्यांनी केला. शालेय मुलांना उद्बोधक अशी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या पाश्चात्य कर्तृत्ववान व्यक्तींचा परिचय करून देणारे माहितीपूर्ण लेखन त्यांनी ‘ मानवतेचा दीपस्तंभ ‘ या दोन भागात केले. या सार्‍या लेखनाला वाचनीय अक्षरांचे रूप देण्याचे काम उज्ज्वलाने केले आणि नंतर ती प्रकाशित झाली.

उज्ज्वला अशी मुलीसारखी घरी येत राहिली. मुलीसारखी वहिनींना घरकामात, अण्णांना लेखनात मदत करत राहिली. अण्णांना क्वचित बाहेर त्यांच्या समवयस्क मित्रांकडे घेऊन जाऊ लागली. अण्णांना अर्धांगाचा झटका आल्यापासून वहिनींनी स्वत:च्या जेवणाची आबाळ करायला सुरुवात केली. आपण सवाष्णपणे या जगाचा निरोप घ्यायचा, असा त्यांचा मनोनिग्रहच होता जणू. दवाखान्यातून आल्यावर अण्णांची प्रकृती सुधारली. कारण वहिनी त्यांचे पथ्यपाणी नीट सांभाळत होत्या. वहिनींची प्रकृती मात्र खालावत गेली,  कारण त्यांनी आपल्या प्रकृतीची फारच हेळसांड केली. जुन्या संस्काराचा मनावर पगडा असलेल्या वहिनींनी अहेवपणी जाण्याचा नियतीशी जणू हट्टच धरला. आणि अखेर ती शर्यत जिंकली. त्या १९८९ च्या जुलैमध्ये कालवश झाल्या.

वहिनी गेल्या. नंतर अण्णांची काळजी घेणारे घरात कुणी उरले नाही. त्यांचे धाकटे भाऊ होते  पण ते स्वत:च थोडे अपंग होते. धाकटा मुलगा चाळीशीचा असला, तरी थोडा लाडावलेला. थोडा गतिमंद. त्या दोघांचीही अर्थात लग्ने झालेली नव्हती. मोठा मुलगा नोकरीनिमित्त इंदौरला. तो किती राहणार? यावेळी उज्ज्वलाच आण्णांच्या घरी रहायला आली. अण्णांचे पथ्य सांभाळले. पातळ जेवण करून,  मिक्सरमधून काढून ती ते चमच्याने अण्णांना भरवू लागली. त्यांना गिळता येत नसे. झोपवून चमच्याने ते पातळ जेवण थेट घशात सोडावं लागे. अण्णांची आई बनून तिने त्यांना जेवू घातले.

वर्षभर सगळं ठाक-ठीक चाललं. अण्णांचं जेवण, पातळ खीर, अंबील, मिक्सरमधून पोळी काढून त्यात दूध घालून केलेली पोळीची पेस्ट असं सगळं करून ती शाळेत जाई. हे घर तसं मध्यवर्ती होतं. तिचं स्वत:चंही घर शाळेपासून जवळ होतं. तिला शाळेतून येताना घरी डोकावता येत असे. तिचा मुलगा-मुलगी,  आई-वडील,  भाऊ यांना भेटून येता येत असे. मुलीचे लग्न झाले होते. तिला एक नातही होती. या सार्‍यांची ख्याली-खुशाली विचारून,  घरचं हवं – नको पाहून ती संध्याकाळी अण्णांकडे येऊ शकत असे. पुढे वाड्याचं अपार्टमेंट करायचं ठरलं. बिल्डरने दिलेली पर्यायी जागा उज्ज्वलाच्या दृष्टीने खूप लांब होती. तिला दोनदा बस बदलून शाळेत जावं लागणार होतं. अण्णा तिला म्हणत, ‘वाडा सोडला, की तू आपल्या घरी जा. साडी, चोळी, बांगडी देऊन माहेरवाशिणीची पाठवणी करतो.’  आण्णा म्हणायचे,  म्हणजे लिहून दाखवायचे. ती म्हणायची, ‘ मग तुमचं कोण करणार? ‘  ते म्हणायचे, `मी दूध वगैरे पेय घेऊन राहीन. बाकीचे नेहमीप्रमाणे डबा आणतील. तू इतक्या लांब येऊ नकोस. तुझी खूप ओढ होईल.’  पण ती म्हणायची,  ‘ मी वहिनींना वचन दिलय,  शेवटपर्यंत तुमची काळजी घेईन. मीही तुम्हा सर्वांबरोबर तिकडच्या घरी येणार !’

उज्ज्वला आता इतकी घरातली झाली होती की आम्ही भाच्या-पुतण्या आण्णांना भेटायला गेलो की तिला इतका आनंद होई, माहेरवाशिणींचं किती कौतुक करू आणि त्यांच्यासाठी घरात काय काय करू, नि काय काय नको, असं तिला होऊन जाई. अण्णांना मुलगी असती, तर तिने तरी त्यांच्यासाठी इतकं  केलं असतं की नाही कुणास ठाऊक? कदाचित् ती देखील आमच्यासारखी आपल्या संसारात गुरफटून गेली असती.

आण्णांचा मोठा मुलगा नोकरीच्या निमित्ताने दूर गावी होता. तो आण्णांना सारखा `तिकडे चला’  म्हणायचा. पण अण्णांना पुणं सोडून कुठेच जायचं नव्हतं. ‘नेत्रदान केलंय.. देहदान केलंय…’ वगैरे सबबी ते सांगायचे. खरी गोष्ट अशी होती की त्यांना अखेरच्या दिवसात, आपली वास्तु,  जी त्यांच्या पत्नीची स्मृती होती आणि आपली कर्मभूमी या गोष्टी सोडून कुठेही जायचं नव्हतं,  हेच खरं. या स्थितीत त्यांच्याजवळ होती,  त्यांची एके काळची विद्यार्थिनी, जी गुरु-ऋण मानून आपलं शिक्षण संपल्यावरही, त्यांच्या गरजेच्या काळात,  त्यांची काळजी घेण्यासाठी आपलं घर,  आई-वडील,  भाऊ,  मुलगा या सार्‍यांपासून दूर आपल्या गुरुजवळ राहिली. आता अण्णा जाऊनही किती तरी वर्षे झाली. पण तिने त्यांच्यासाठी जे केले त्याला खरोखरच तोड नाही. त्या  `ऋणानुबांधाच्या गाठी ‘ होत्या हेच खरं !

– समाप्त –

©  सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – १ ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

‘आण्णा, आज संध्याकाळी येताना आंबे घेऊन येते बरं का ! ‘ उज्ज्वला घड्याळाचा पट्टा बांधून, टेबलावरची पर्स उचलत, पायात चपला सरकवता सरकवता म्हणाली. नकारार्थी मान हलवत हाताने आण्णांनी `नको’ अशी खूण केली. याचा अर्थ `आंबे नकोत’, असा नसतो. `तू एवढा त्रास घेऊ नकोस’, असा असतो. गेल्या पंध्रा-वीस वर्षांच्या परिचयाने, सहवासाने, त्यांच्या नकारामागील मतितार्थ पुष्पाला नेमका कळतो. ती म्हणते,

`आण्णा मला कसला आलाय त्रास? आज काही शाळा नाही. आज मी घरून निघेन आणि मंडईत उतरेन. आंबे आले असले, तर घेईन, आणि तिथेच कॉलनीची बस करीन. ‘

आण्णांनी `ठीक आहे. ‘ अशा अर्थाने मान हलवली. कुणाही अपरिचिताला वाटेल, की हा संवाद, जो एका बाजूने शाब्दिक आणि दुसर्‍या बाजूने खाणा-खुणांच्या सहाय्याने चाललाय, तो बाप-लेकीतला, किंवा भावा-बहिणीत चालू असणार. किंवा निदान काका –पुतणी, मामा-भाची अशा अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तींमध्ये चालू असणार. प्रत्यक्षात हा संवाद चालू असतो, गुरु-शिष्यामध्ये.

कधी काळी गुरूच्या आश्रमात गुरूची सेवा करत विद्यार्थी विद्या संपादन करत असत, असं आपण सगळ्यांनी वाचलय. आज एकविसाव्या शतकात गुरुजनंविषयी अलिप्ततेने, इतकेच नव्हे, तर तुच्छतेने, हेटाळणीने बोललं जाणार्‍या जमान्यात, गुरूविषयीच्या कृतज्ञतेने त्याच्या शारीरिकदृष्ट्या आपत्काळात, मुलगी, बहीण, आई होऊन त्यांची सेवा करणारी उज्ज्वला ही जगावेगळीच म्हणायला हवी. विशेषत: आयुष्यात दु:ख, कष्टच वाट्याला आल्यानंतर, विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर, सुखाचे चार घास आता कुठे निवांतपणे खाण्याची शक्यता असताना आपला सुखाचा जीव सेवाव्रताच्या तप:साधनेत व्यतीत करणार्‍या उज्ज्वलाबद्दल बोलावं तेवढं थोडंच!

आण्णांनी आपल्या आयुष्यातील ४७ वर्षे शिक्षण क्षेत्रात काढली. आण्णा म्हणजे गो. प्र. सोहोनी. पुण्यातील कॅम्प विभागातील कॅम्प एज्यु. सोसायटी व त्याच संस्थेच्या सर राजा धनराज गिरजी हायस्कूल या दोन शाळांमधून त्यांनी अध्यापन केले. दोन्ही शाळा तशा तळा- गाळातल्या म्हणाव्या आशा. या शाळांमधून त्यांनी जवळ जवळ 35 वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर 5 वर्षे फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यानंतर सरकारच्या विनंतीवरून सासवड येथे कंडेन्स कोर्ससाठी ते सासवडला गेले. स्वत: उत्कृष्ट शिक्षक होते, पण उत्कृष्ट अध्यापन एवढीच त्यांची खासियत नव्हती. ते आदर्श शिक्षक होते. आपल्या विद्यार्थ्यांवर वर मुलाप्रमाणे प्रेम करणारे होते. सेवानिवृत्तीनंतर सरकारच्या विनंतीवरून त्यांनी सासवड येथील कस्तुरबा विद्यालयाचा कारभार पाच वर्षे सांभाळला. इथे बहुतेक सर्व विषयांचे अध्यापन ते करीत. मुख्याध्यापक आणि वसतिगृहाचे रेक्टर याही जबाबर्‍या त्यांच्यावर होत्या. रुढार्थाने आपल्याला परिचित असलेल्या शाळांसारखी ती शाळा नव्हती. शालांत परीक्षेपर्यंत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही, अशा असहाय्य, परित्यक्ता, विधवा स्त्रियांसाठी सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला होता. शाळा कोणत्याही इयत्तेत सोडलेली असली, तरी इथे दोन वर्षात दहावी-अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाई. आणि दुसर्‍या वर्षी शालांत परीक्षेला बसवलं जाई. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, प्रश्नपत्रिका अन्य शालेय विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच असत. विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सोय होती. विद्यार्थिनींच्या राहण्या-जेवण्याचा सारा खर्च सरकार करत असे. आण्णा सुपरिंटेंडेंट म्हणून काम पाहत असत. त्यांची सहकुटुंब राहण्याची सोयही तिथेच केलेली होती. आण्णा आणि वहिनींच्या रुपाने शाळेत शिक्षण घेणार्‍या आणि वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थिनींना आई-वडलांचे छत्र लाभले होते. आर्थिक भार सरकारने उचलला असला, तरी मानसिक आधार, उमेद, उत्साह आण्णा-वहिनींनी त्या वेळच्या विद्यार्थिनींमधे वाटला.

आर्थिक कारणाने सरकारने सासवड येथे चालवलेली ही शाळा ७२ साली बंद केली. मग आण्णा-वहिनी पुण्याला त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांच्या सासवडच्या किती तरी विद्यार्थिनी, कधी मुला-बाळांना घेऊन, कधी नवर्‍याला घेऊन आण्णांकडे यायच्या. उज्ज्वलाचे वडीलही पुण्यालाच राह्यचे. त्यामुळे एस. एस. सी. ची परीक्षा झाल्यावर, तीदेखील पुण्याला आली. उज्ज्वला काळे पुण्यातच होती. त्यामुळे तिचे येणे वारंवार घडू लागले. कधी मुलांना घेऊन, कधी वडलांना, कधी भावाला. असं होता होता, उज्ज्वला आणि तिचा परिवार आण्णांच्या गोतावळ्यात कधी मिसळून गेला, कुणालाच कळलं नाही.

आण्णा तिला एकदा म्हणाले, ‘नुसता एस. एस. सी. चा काय उपयोग? तू डी. एड. हो. ‘ नुसती सूचनाच नाही. तिच्या मागे लागून तिला डी. एड. ला प्रवेश घ्यायला लावला. तिचा अभ्यास करून घेतला. मग यथावकाश प्राथमिक शाळेत नोकरी, कायम होणं, हे सारं घडून गेलं. उज्ज्वलाचा संसार मार्गी लागला. हे सारं होईपर्यंत एखाद्या डोंगरासारखे आण्णा तिच्या मागे उभे राहिले. आण्णांचे हे ऋण उज्ज्वला नेहमीच मानते. ती म्हणते, `आण्णा नसते, तर लोकांच्या घरी धुणं-भांडी करून मला मुलांना वाढवावं लागलं असतं. ‘

उज्ज्वला मराठा समाजातली. वडील चांगले पदवीधर. पण समाजाची म्हणून एक रीत-भात असते. चाकोरी असते. तिचं लग्नं लवकरच, म्हणजे बाराव्या-तेराव्या वर्षी झालं. दोन मुले झाली आणि पठोपाठ वैधव्याच्या दु:खाला सामोरे जायची वेळ आली. आपघर उध्वस्त झाल्यावर बापघर जवळ करणं आलं. तिथे आसरा, तात्पुरता आधारही मिळाला. पण कुटुंब मोठं. मिळवता एकटा. आसरा मिळाला तरी आपल्या पिलांच्या चारा-पाण्याची व्यवस्था तरी आपल्याला बघायला हवी. त्यासाठी शिक्षण हवे. आईने मुलांना संभाळायचे मान्य केले आणि उज्ज्वला सासवडला राहिली. दोन वर्षात शालांत परीक्षा ती उत्तीर्ण झाली.

बुद्धिमान माणसे आपल्या कर्तृत्वावर पुढे जातात. सामान्य वकुब व कुवत असलेल्या व्यक्तींमध्ये चैतन्याची, जिद्दीची ज्योत पेटवावी लागते. `तू ही गोष्ट निश्चितपणे करू शकशील, असा आत्मविश्वास जागवावा लागतो. ‘ आण्णांनी उज्ज्वलाच्या बाबतीत नेमके हेच केले. उज्ज्वला सामान्य बुद्धीची मुलगी असली, तरी कष्टाळू होती. `परीक्षेत पास होणे मुळीच अवघड नाही’ असा विश्वास त्यांनी तिच्यात निर्माण केला. तिचा अभ्यास घेतला. तिला मार्गदर्शन केले. म्हणूनच ती म्हणते, `आण्णांमुळेच मी आज शिक्षिका म्हणून उभी आहे. एरवी मला इतरांच्या घरची धुणं-भांडी करून मुलांना वाढवावं लागलं असतं.

१९७७मध्ये आण्णांना अर्धांगाचा झटका आला. महिना-दीड महिना हॉस्पिटलमध्ये काढल्यावर आण्णा घरी आले. आपण कुणावर भार होऊ नये, असं आण्णांना सारखं वाटायचं. उजव्या हाताला पकड नव्हती आणि गिळण्याची क्रिया जवळ जवळ थांबली होती. पण प्रयत्नपूर्वक जेवणाच्या व्यतिरिक्त सर्व गोष्टी ते स्वत:च्या स्वत:च करू लागले. हा आघात त्यांची वाणी आणि त्यांची लेखणीही घेऊन गेला. उजव्या हाताची शक्तीच नाहीशी झाली. `महाराष्ट्र एज्युकेशन जर्नल’ या इंग्रजीतून प्रकाशित होणार्‍या नियतकालिकाच्या संपादनाचे काम ते गेले २५ वर्षे करत होते. इतकंच नव्हे, तर त्यातील लेखनही बव्हंशी ते एकटाकी करत होते. आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.

 – क्रमशः भाग पहिला 

©  सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares