मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नऊ दुर्गा म्हणजे… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ नऊ दुर्गा म्हणजे… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

नऊ दुर्गा म्हणजे नऊ प्रकारच्या आयुर्वेदिक दिव्यौषधी

देवींची नावे आणि औषधे याचे संदर्भासह स्पष्टीकरण.. (संदर्भः मार्तंड पुराण)

दुर्गा कवच

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।

तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीतिच।

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।

उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।

हे दुर्गा कवच ब्रह्मदेवाने मार्कंडेय ऋषींना दिलेले होते. मार्कंडेय ॠषी वैद्यकीय उपचार पद्धतीत ज्या ९ औषधी वनस्पतींना उत्तम स्थान आहे त्या ९ वनस्पतींची नावे या दुर्गा कवचातून आपल्याला पहायला मिळतील ती अशी

प्रथम नवदुर्गा : शैलपुत्री म्हणजे हिरडा.

हिरडा/हरडा ही एक दिव्य औषधी वनस्पती आहे.

पर्यावरण जनजागरणाचा नक्षत्रवनाच्या दृष्टीने विचार केल्यास कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा पर्यायी वृक्ष हिरडा आहे.

नास्ति यस्य गृहे माता तस्य माता हरीतकी ।।

असे हिरड्याचे महत्त्व आहे.

हे झाड ५० ते ७५ फुटांपर्यंत वाढते. समुद्रस पाटीपासून पंधराशे मीटर उंचीपर्यंत व दाट वनातील महाबळेश्वर, कोयना तसेच मध्य प्रदेशातील नदीचा किनारा अशा प्रकारच्या ठिकाणी चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीत, भरपूर सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी ४६ सेंटीग्रेड पर्यंतच्या तापमानाच्या प्रदेशात हा वृक्ष चांगला वाढतो. तसेच पाण्याचा ताण असेल तरी हा वृक्ष सहन करू शकतो.

या झाडाची जुनी पाने डिसेंबर ते मार्च काळात गळून पडतात व नवीन पालवी तांबूस रंगाची लव असलेली येते. पाने ७. ६ ते १७. ८ सेंटीमीटर लांबीची व ३. ८ ते ८. ९ सेंटीमीटर रुंदीची असतात. हिरड्याची फुले मार्च-एप्रिलमध्ये येतात. ही उग्र वासाची पांढरी पिवळी असतात.

औषधी म्हणून हिरड्याची फळे उपयुक्त असून नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत येतात. फळे साधारण २. ५ ते ३. ३३ सें. मीटर लांब व ३. ८ ते ८. ९ सें. मिटर रुंदीची मध्यभागी फुगीर व ५ शिरा स्पष्ट दिसणारी पिवळट तपकिरी रंगाची गोलसर असतात.

हिरड्याचे प्रमुख तीन प्रकार आहेत

१) हिरड्याचे फळ पक्व होण्यापूर्वी म्हणजेच त्यात बी निर्माण होण्यापूर्वी काही फळे झाडावरून पडतात त्याला बाळहिरडा असे म्हणतात

२) हिरड्याचे फळ जे मोठे होते पण अपरिपक्व अवस्थेत वाढलेले असते त्याला चांभारी हिरडा असे म्हणतात. यामध्ये टॅनीन असते. याचा उपयोग कातडी रंगवण्यासाठी होतो

३) जे फळ पूर्ण परिपक्व होते त्याला सुरवारी हिरडा म्हणतात. हे पाण्यात टाकले कि बुडते. वजनाला २० ग्रॅमपर्यंत असते. हे औषधी फळ होय.

हिरड्याचा आकार व रंग यावरून हिरड्याच्या अजून सात जाती आहेत.

विजया : या जातीची फळे तुंबडी सारखी गोल असतात व सर्व प्रकारच्या रोगावर उत्तम असतात.

पूतना : जातीचा हिरडा मोठा व पातळ असून तो लेप देण्यासाठी वापरतात.

अमृता : यातील बी बारीक, मांसल व भरलेली, रेचन देण्यास उपयुक्त असते.

रोहिणी : हे साधारण गोल फळ व्रणरोपक म्हणून वापरतात.

अभया : या हिरड्यावर ठळक पाच उभ्या रेषा असतात. हा हिरडा नेत्र रोगावर वापरतात.

जीवंती : याचा रंग सोन्यासारखा पिवळा असतो व सर्व रोगावर उपयुक्त असतो.

चेतकी : याला पाच धारा असतात व चूर्ण करण्यास उपयुक्त असून हा हिरडा भाजून खातात.

हिरड्याचे औषधी म्हणून दात, हिरड्या, प्लिहा, खोकला, आवाज बसणे, उचकी, श्वासनलिका, गर्भाशयासाठी बलदायी तसेच पचनसंस्थेत रेचक असे गुणधर्म आहेत. गर्भवती स्त्रीने हिरडा खाऊ नये. त्रिफळा चूर्ण हे उपयुक्त औषध बनवण्या साठी ३ भाग हिरडा, ७ भाग बेहडा व १२आवळा असे प्रमाण असते. हिरड्याच्या फुलांपासून उत्तम मध मिळतो. यामुळे या झाडावर मधमाशांचे प्रमाण खूप असते जे पर्यावरण रक्षणासाठी फारच उपकारक असते.

द्वितीय नवदुर्गा : ब्रह्मचारिणी या नावाने ओळखली जाते. ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी वनस्पती-

स्मरणशक्ती वाढविणारी ही वनस्पती असल्यामुळे हिला सरस्वती असेही म्हणतात. ब्राह्मीचे तेल प्रसिद्ध आहे. यामुळे शांत झोप लागते व केसांची वाढ उत्तम होते. अर्थातच शांत झोपेमुळे आपले आयुर्मान वाढते. स्मरणशक्ती वाढते. ब्राह्मी रक्तदोषनाशक, स्वरयंत्राला पोषक असून पचनसंस्था व उत्सर्जन संस्था आरोग्य दायी बनविते.

तिसरी नवदुर्गा : चंद्रघंटा म्हणजेच चंद्रशूर, हालीम, चमसूर, –

हालीम ही शरीरास पोषक अशी अत्यंत दिव्य औषधी असून विटामिन सी, ए, इ, प्रोटीन्स, लोह, फायबर देणारी वनस्पती आहे. पालेभाजी म्हणूनही हिची ओळख आहे. ॲनिमिया, हिमोग्लोबिन, सांधेदुखी, हृदय विकार, रक्तशुद्धी, महिलांच्या मासिक पाळीचे विकार, स्त्रीचे अंगावरील दूध वाढविणे, प्रतिकार शक्ती वाढविणे, अशा विविध गुणधर्मांनियुक्त अशी ही पालेभाजी आहे. जी पौष्टिक, कफनाशक, बलवृद्धी करणारी आहे. ही वनस्पती लठ्ठपणा कमी करते, म्हणून हिला चर्महंती असेही म्हणतात. या वनस्पती च्या बिजास हलीम असे म्हणतात. याचे लाडू बाळंतिणीला देतात. आजारी व्यक्तीला ही दिले जातात.

चौथी नवदुर्गा : कुष्मांडा : कोहळा या वनस्पतीचे संस्कृत नाव कुष्मांडा असे आहे

पेठा नावाची मिठाई कोहळ्यापासून करतात. निरोगी आरोग्यासाठी पचन संस्था सक्षम असणे गरजेचे असते. कोहळा आतड्यांस बळ देतो. आतड्यातील अन्नरस शोषून त्याचे रक्तांत रूपांतर होते. या प्रक्रियेत कोहळ्याची महत्त्वाची भूमिका असते. वीर्यवृद्धी, रक्तशुद्धी, मनोबल वाढवण्यासाठी कोहळा उपकारक आहे. कप, पित्त, वात यांचे संतुलन करणारे कुष्मांडा अर्थात कोहळा हे फळ भोपळ्याच्या आकाराचे असते. याचा रस नियमित घेतल्यास वरील सर्व फायदे मिळतात.

पाचवी नवदुर्गा : स्कंदमाता. म्हणजेच अळशी / जवस वनस्पती

अळशी अर्थात जवस ही वनस्पती महिलांच्या सर्व आजारांवर अत्यंत उपयुक्त अशी दिव्यौषधी आहे. यामध्ये ओमेगा ३, ओमेगा ६, प्रोटीन्स, विटामिन सी, इ, के, बी-कॉम्प्लेक्स, कॉपर, झिंक, मॅंगनीज, मॅंगनेजीयम फॉस्फरस, आयर्न असे अनेक घटक द्रव्य असून यामुळे आपल्या शरीराचे वात, पित्त, कफ संतुलित होतात.

विशेष करून महिलांचे सर्व प्रकारचे विकार उदा. गर्भाशयातील गाठी, मासिक पाळीच्या समस्या, सांधेदुखी, पीसीओडी, चेहऱ्यावरील केस, सुरकुत्या, अशा व्याधींचा नाश जवस/ अळशी करते. अळशीमुळे एंड्रोजन हार्मोन्स कमी होतात. आळशी अँटिऑक्सिडंट, ऍंटीकॅन्सर आहे. नियमितपणे अळशी खाल्ल्यास वरील सर्व विकार नाहीसे होतात.

सहावी नवदुर्गा : कात्यायनी म्हणजे अंबाडी पालेभाजी –

अंबाडीची पालेभाजी रक्तदाब नियंत्रित करते. शरीरातील चरबी कमी करते. लो कॅलरीज डायट म्हणून ही भाजी उपयुक्त आहे. यामध्ये विटामिन ई, लोह, झिंक हे डोळ्यांसाठी उपयुक्त असे घटक या मध्ये असतात. भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे हाडे मजबूत होतात. ऑस्टीओपोरोसीसचा आजार होत नाही. अंबाडीची भाजी डियूरॅटीक द्रव्यांनी युक्त असते त्यामुळे लघवीची जळजळ, उन्हाळे लागणे यांवर उपकारी.

तथापि अंबाडीची भाजी ऑक्सेलिक ऍसिडयुक्त असल्यामुळे मुतखडा असणाऱ्यांनी, ऍसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी ही भाजी खाऊ नये.

पित्त, कफाचे तसेच गळ्याचे आजारांवर अंबाडीची भाजी उपयुक्त.

सातवी नवदुर्गा : काळरात्री म्हणजेच नागदवणी वनस्पती-

ही वनस्पती सर्वत्र आढळते. ही अत्यंत थंड वनस्पती आहे. शरीरांतर्गत रक्तस्त्राव, बवासीर, मुळव्याध सारख्या विकारात या झाडाची पाने काळ्यामिरी सोबत खाल्याने रक्तस्त्राव थांबतो. शरीरावर आलेली सूज, अल्सर, आतड्यांचे विकारांवर गुणकारी. लघवीला होणारा त्रास, जळजळ, मुत्र विरोध अशा विकारात गुणकारी. या वनस्पतीची लागवड घराच्या सभोवती केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. पानांचा चिक (दुध) विषनाशक आहे.

आठवी नवदुर्गा : महागौरी म्हणजेच तुळस

तुळशीचे धार्मिक आणि पर्यावरण विषयक महात्म्य आपणा सर्वांनाच परिचित आहे. घरामध्ये सातत्याने सकारात्मक उर्जेची निर्मिती व वातावरण शुद्धी करण्याचे काम तुळस करते. तुळस अँटीकॅन्सर आहे. विटामिन सी, झिंक, अँटिबॅक्टेरियल, अँटिव्हायरस, मुत्रवर्धक, अशा विविध गुणांनी युक्त अशी तुळस दिव्यौषधी आहे. शरिरातील वाढलेल्या युरिक ऍसिड वर तुळशीचा रस गुणकारी असतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळशीचा काढा प्यावा. सर्दी, पडसे, ताप, त्वचारोग, केसांची गळती, मानसिक आरोग्य अशा सर्व विकारांवर तुळस अत्यंत गुणकारी आहे. रक्तवृद्धी, बलवृद्धी, हृदयाची मजबुती, मज्जा संस्था, स्मरणशक्ती अशा सर्वच बाबतीत तुळस अत्यंत गुणकारी आहे.

तुळशीचे विविध प्रकार आहेत तथापि सर्वच प्रकारची तुळस ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते.

नववी नवदुर्गा : सिद्धिदात्री ; शतावरी वनस्पती –

शतावरी वनस्पती ही दिव्य औषधी आहे. शतावरी या शब्दातच शतावरी चे गुणविशेष आहेत. म्हणजे शेकडो फायदे ज्या वनस्पतीमध्ये आहेत अशी वनस्पती म्हणजे शतावरी !

विशेषतः महिलांच्या बालपणापासून वृद्धावस्थे पर्यंत सर्व विकारांवर शतावरी वरदान आहे.

शतावरीच्या नियमित सेवनामुळे स्मरणशक्ती वाढते. शतावरी हॅप्पी हार्मोन्स तयार करते, ज्यामुळे चिडचिडेपणा व ताणतणाव दूर होतात. रक्ताभिसरण, दृष्टीदोष, हृदयाची मजबुती, श्वसनाचे विकार, दमा, पचनसंस्था, आतड्यातील कृमींचा नाश, भूक वाढविणे, खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रूपांतर करणे, बद्धकोष्ठता, अतिसार, बवासीर, मुळव्याध, वजन कमी होणे, चरबी कमी करणे, मधुमेह, कोरडी त्वचा सतेज बनवणे, शरीरावरील फोड, मुरमे यांचा नाश करणे असे असंख्य फायदे शतावरीच्या सेवनाने होतात. अर्थात शतावरी हे शरीराचे कफ, पित्त, वात यांचे संतुलन करून आपली प्रतिकारशक्ती वाढवून बलशाली, वीर्यवान, सुडौल, निरोगी, चिरतारूण असे आरोग्य प्रदान करते. हृदयाला बळ देते.

नवरात्रीचा सण साजरा करीत असताना आपण मार्तंड पुराणातील या दुर्गा कवचाचा सखोल अभ्यास केला की आपल्याला समजते की कोणत्या वनस्पतींमध्ये कोणत्या देवीचा वास आहे. या वनस्पतींची लागवड, संवर्धन, तसेच त्याचा योग्य वापर स्वतःसाठी आणि समाजासाठी करून देणे, वनस्पतीचे औषधी गुणधर्म समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यातून निरोगी, बलशाली सदविचारी, समाज निर्मिती करणे यालाच पूजन म्हणावयाचे.

हा संस्कार/ संदेश धार्मिक विधीतून देण्याचा सण म्हणजे नवरात्रौत्सव !! निसर्गाने आपल्याला भरपूर काही फुकट दिलेले आहे, आणि संस्कृतीने प्रत्येक वृक्षवेलीला देवत्व दिलेले आहे. या सर्व गोष्टींचा फायदा आपण आपले जीवन सुखी आणि आनंदी बनविण्यासाठी करूयात का ?

धन्यवाद !

माहिती संकलन : कुलकर्णी गुरुजी पंचवटी – नाशिक (संपर्क : ९९२१७५५४३६)

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मी कसा आहे..? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ मी कसा आहे..? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. 

*

एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते.

तेवढ्यात त्याच्या समोर घरमालक येऊन उभा राहिला. 

“आज कसं येणं झालं..?” उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले.

कामाच्या नादात ते विसरून गेले होते की, समोर त्यांचा घरमालक उभा आहे.

घरमालक विनम्रपणे म्हणाला, “मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं.”

उद्योगपती वरमले आणि म्हणाले, “हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा.”

एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले.

घरमालक उद्योगपतींना म्हणाला,” तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता, याचे मला आश्चर्य वाटते.”

यावर उद्योगपती हसले व म्हणाले, “मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे.

माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो.” 

घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला.

हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. 

उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले.

तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एका सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले.. 

तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले, 

“सर, तुम्ही रांगेत का उभे आहात..? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.”

उद्योगपती म्हणाले, 

“आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही.

“उद्योगपती, हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे.” 

…  एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला.

 

तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले.

रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली.

त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या अलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत.

सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. 

त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

*

एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते. त्या दिवशी एक प्रसंग घडला.

हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले. त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली.

तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार..

…. उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, “तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?'”

हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, “माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.”

उद्योगपती हसले व म्हणाले, ” पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड.”

… उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.

असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते. त्याची उत्सुकता चाळवली गेली. 

तो उद्योगपतींना म्हणाला, ” साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते..? आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता?? “

… यावर उद्योगपती म्हणाले, “अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले.  ते मला म्हणाले होते,  ” तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण.. ‘तू कसा आहेस ‘ हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा.”… तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की, खरोखरच आपण कोण आहोत’ हे महत्त्वाचे नसतेच. …. ‘आपण कसे आहोत’  यावर आपली किंमत ठरते…. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते.”

या उत्तुंग उद्योगपतीचे नाव ..  रतन टाटा…

खरंच, जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी..  कुठलीही गुंतागुंत नसलेली.. अशी असतात. खरेतर…साधे राहणे हेच कठीण असते.

अशा व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे…

म्हणूनच, “तुम्ही कोण आहात?”   हे महत्वाचे नाही.

“तुम्ही कसे आहात?”   हे महत्वाचे आहे…

सरांना भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🙏

┉❀꧁꧂❀┉

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘काळजी करणारा माळी…’ – लेखक : श्री रत्नाकर सावित्री दिगंबर  येनजी ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘काळजी करणारा माळी…’ – लेखक : श्री रत्नाकर सावित्री दिगंबर  येनजी ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

एकदा रतन टाटा सुट्टीनिमित्त स्वतःच्याच म्हणजे टाटा ग्रुपमधील रिसॉर्ट मध्ये गेले होते. त्यांना सवय असल्याने नेहमीप्रमाणेच सकाळीच लवकर उठून तेथील गार्डन मध्ये फेरफटका मारत असताना त्यांनी पाहिले पहाटेच्या काळोखात एक वयस्कर माळी मशीन फिरवून लाॅनवरील गवत कापत होता. जवळजवळ सगळेच लाॅन कापून पुर्ण झाले होते. रतनजींना आश्चर्य वाटले ह्या माळ्याने एवढ्या सकाळी आपल्या कितीतरी आधी उठुन हे काम पूर्ण केले. त्याचे गवत कापुन झाल्यावर रतन टाटांनी त्याची आपुलकीने चौकशी केली. घरी कोण कोण आहेत व ते काय करतात हे सगळेच  त्यांनी आपुलकीने विचारले तेव्हा त्यांना कळले की त्यांचे दोन मोठे चिरंजीव माळीकाम करतात व लहानगा इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला आहे. आतापर्यंत त्याने चांगले मार्क्स मिळविले असून सहा महिन्यांनी तो पदवीधर होणार असून तोच कुठेतरी  नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे. रतन टाटा साहेबांना ते कळल्यावर वाईट वाटले. आपला टाटा समूह जगभर प्रचंड उलाढाल करताना त्याच समूहातील एका दिवसभर मेहनत करणाऱ्या व्यक्तीस स्वतःच्या पदवीधर होणाऱ्या मुलाच्या नोकरीची चिंता वाटते. टाटासाहेब  सुट्टीवरून पुन्हा कार्यालयात दाखल झाले तेव्हा त्यांनी स्वतःहुन त्या रिसॉर्ट च्या माळ्यासाठी सहा महिन्यानंतर त्यांच्या चिरंजीवासाठी नोकरीची सोय केली. सहा महिन्यानंतर त्या माळ्याने स्वतःच्या देवघरातील रतन टाटांच्या तसबिरीला स्वतं: फुलवून बनविलेला हार घालून मनोभावाने हात जोडले होते. त्याला त्याचा  देव नवस न करता पावला होता. जसे एखादा माळी स्वतः काम करत असलेल्या बागेतील फुलझाडांची मुलांसारखी काळजी व निगराणी घेतो तसेच रतन टाटासाहेब संपूर्ण समूहातील  कामगारांची स्वतःच्या मुलांसारखीच काळजी घेत असत. ते जेव्हा नवीन उद्योग सुरू करायचे तेव्हा ते प्रथम कामगारांना भविष्यात आपल्या या घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान तर होणार नाही ना याची पुर्ण काळजी घेत असत. भारतातील इतर उद्योजक नवीन कंपनी काढुन स्वतःच्या परिवारास फायदा झाल्यावर त्या कंपनीच्या शेअरच्या किंमती गडगडल्यावर स्वतः निमुटपणे बाजुला किंवा परदेशात पळुन जातात. मुबंईत जेव्हा ताज हॉटेल वर अतिरेकी हल्ला झाला तेव्हा या जगप्रसिद्ध हाँटेलचे प्रचंड नुकसान झाले व आजूबाजूच्या लोकांचे नुकसान झाले त्यात अनेक गरीब लोक म्हणजे हातगाडीवर ज्युस किंवा भेळ विकणारी माणसे होती त्या सर्वांनाच रतन साहेबांनी त्यांच्याशी संबंध नसला तरी त्यांचे झालेल्या  सर्व नुकसानीची भरपाई करुन दिली. 

याच अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून हजारो गाड्याची आलेली  मोठी आँर्डर सरळ नाकारुन त्यांनी स्वतःचे देश प्रेम व्यक्त केले.

ॐ शांती 🌹🙏

लेखक : श्री रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रतन टाटा : भारतीय उद्योग जगतातील प्रेरणास्थान – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆रतन टाटा : भारतीय उद्योग जगतातील प्रेरणास्थान – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

रतन टाटा हे भारतीय उद्योगजगताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या कार्याने केवळ टाटा समूहाला नव्हे तर संपूर्ण भारताला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली. रतन टाटांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला आणि ते जेव्हा टाटा समूहाचे प्रमुख बनले, तेव्हा त्यांनी त्याचे नेतृत्व अत्यंत कौशल्याने केले.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

रतन टाटांचे पूर्ण नाव रतन नवल टाटा आहे. त्यांचा जन्म टाटा घराण्यात झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांचे पालक विभक्त झाले होते, त्यामुळे त्यांचे बालपण खडतर राहिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईमध्ये झाले. पुढे त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी घेतली आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनातील शिक्षण पूर्ण केले.

टाटा समूहातील योगदान

रतन टाटांनी १९९१ साली टाटा समूहाची धुरा सांभाळली. त्यांनी समूहात मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणल्या. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा ताबा घेतला, ज्यात जगप्रसिद्ध Jaguar Land Rover (JLR) आणि Tetley यांचा समावेश आहे. यामुळे टाटा समूह जागतिक पातळीवर एक मोठा उद्योगसमूह म्हणून उभा राहिला.

महत्त्वपूर्ण प्रकल्प

रतन टाटांनी भारतीय सामान्यांसाठी एक स्वस्त वाहन उपलब्ध करण्याचे स्वप्न पाहिले आणि “टाटा नॅनो” या प्रकल्पाची सुरुवात केली. टाटा नॅनो हे जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या प्रयत्नामुळे मध्यमवर्गीय लोकांसाठी कार घेणे सहज झाले.

नेतृत्व आणि उदारता

रतन टाटा हे अत्यंत साधे आणि विनम्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे नेतृत्व कौशल्य, पुढाकार घेण्याची क्षमता आणि ध्येयप्राप्तीसाठी त्यांचा चिकाटीने केलेला प्रयत्न नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे. त्यांनी समाजकार्यातही मोलाचे योगदान दिले आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात दान दिले आहे.

सन्मान आणि पुरस्कार

रतन टाटांना त्यांच्या कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना भारत सरकारकडून २००० साली पद्मभूषण आणि २००८ साली पद्मविभूषण या दोन प्रमुख पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

निष्कर्ष

रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नसून, ते एक प्रेरणादायी नेते, समाजसेवक आणि नवोन्मेषक आहेत. त्यांनी उद्योग, समाज आणि मानवता यांना एकत्र जोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्यामुळे ते लाखो भारतीयांसाठी एक आदर्श आणि प्रेरणास्थान ठरले आहेत.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ TCOC : टाटा कोड ऑफ कंडक्ट… लेखक : श्री मंदार जोग ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ TCOC : टाटा कोड ऑफ कंडक्ट… लेखक : श्री मंदार जोग ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मी शक्यतो वैयक्तिक काहीही समाज माध्यमांवर लिहीत नाही. पण आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत काळा दिवस आहे. म्हणून थोडे लिहितो आहे. मी टाटा जॉईन केल्यावर इंडक्षन नंतर माझ्या बॉस बरोबर कॅफेटेरिया मध्ये बसलो होतो. तेव्हा त्याने एक कानमंत्र दिला. तो म्हणाला “मंदार तू स्किलमध्ये कमी असलास तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे तुला ट्रेन करतील. पण TCOC शी प्रतारणा केलीस आणि तू रतन टाटा देखील असलास तरी तुला नोकरीवरून काढून टाकतील हे विसरू नको!”

टाटा ग्रुपच्या सगळ्या कंपनीज्मध्ये TCOC म्हणजे टाटा कोड ऑफ कंडक्ट नावाची एक नियमावली आहे जी सर्व कर्मचाऱ्यांना लागू असते. तिथे उल्लंघन केल्यास क्षमा नाही. बाकी स्कील सेटमध्ये एव्हरेज .. क्वचित बिलो एव्हरेज असलेले काही लोक टाटांच्या कंपनीत सरकारी सेवेत काम केल्यासारखे वर्षानुवर्ष काम करून आज उत्तम पगार घेत असलेले मला माहीत आहेत! टाटा कर्मचाऱ्यांची काळजी घेतात, त्यांना ट्रेन करतात, त्यांची क्षमता वाढायला वाव देतात. पण कोड ऑफ कंडक्ट बाबत नो कॉम्प्रोमाईज! त्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये टाटा कर्मचारी म्हणून माणसाने कसे वागावे आणि कसे वागू नये ह्याबद्दल अगदी मूलभूत माहिती आहे. कोणतेही जाचक बीचक नियम नाहीत. बेसिकली टाटा समूह ज्या सचोटी, तत्त्व आणि सर्व समावेशन ह्यासाठी ओळखला जातो त्याचे पालन करावे आणि त्यासाठी काय करू नये हे त्यात सांगितलेले आहे. 

इथे फार काही लिहिता येणार नाही. पण एक गंमत सांगतो. एका विभागाने एका विशिष्ट ट्रेनिंगसाठी काही कोटिंचं एक टेंडर काढलं. आम्ही ते बीड केलं. तिथे गेल्यावर आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही अर्धे पैसे आम्हाला कॅश द्या, मग हव्या त्या किंमतीची ऑर्डर आम्ही तुम्हाला देतो. मग पुढे ती तुम्ही पूर्ण केलीत की नाही हे पण आम्ही विचारणार नाही. टाटा कंपनी असल्याने अर्थात आम्ही नकार देऊन काही लाखांचं होऊ घातलेल्या नफ्याचं नुकसान करून घेतलं. पण सहा महिन्यांनी त्या विभागाचं ऑडिट झाल्यावर ऑडिटरनी त्यांना प्रश्न विचारला की गल्ली बोळात असलेल्या किरकोळ कंपन्यांना तुम्ही  कामासाठी नियुक्त केलं आहे मग टाटा कंपनीला का नाही? मला त्या अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी अडचण सांगितली. आम्ही मात्र एकही पैसा देणार नाही ह्यावर ठाम होतो. त्यांना आम्हाला पूर्ण पैशांची काही लाखांची ऑर्डर अखेर द्यावी लागली! 

बाकी टाटा समूह, त्यांचा दानधर्म, ते टाटा ट्रस्ट मधून करत असलेली अवर्णनीय समाज सेवा ह्याबद्दल माहिती शोधल्यास उपलब्ध आहे. त्यावर वेगळे लिहायची गरज नाही. पण १९९१ मध्ये चेअरमन बनल्यावर ५ बिलियन डॉलर इतकी उलाढाल असलेल्या टाटा समूहाला २०२३-२४ मध्ये  टाटा समूहाच्या त्याच तत्वांवर आणि मूल्यांवर अढळ रहात १६५ बिलियनपेक्षा जास्त उलाढाल आणि १० लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देणारा समूह बनवणाऱ्या एका अत्यंत हुशार, तत्त्वनिष्ठ, प्रेमळ, चाणाक्ष, निस्वार्थी आणि अतिशय साधे जीवन जगणाऱ्या उद्योगमहर्षी श्रीयुत रतन टाटा साहेब ह्यांचं आज निधन झालं आहे ! म्हणून हा लेख प्रपंच!

विशेषतः हल्ली आपल्या पैशांनी सरकार विकत घेणारे, भंगार भिकार नशेबाज बॉलीवूड नटनट्या नाचायला बोलावून त्यांच्यासह नाचकामाचे फोटो प्रसारित करून आपल्या भ्रष्ट श्रीमंतीची सूज बाजारात मांडणारे, व्यवस्थेला झुकवून आणि आपल्या दाराला जुंपून भ्रष्ट राजकारणी लोकांशी संगनमताने पैसा कमावणारे “व्यापारी” पाहिले की रतन टाटा ह्यांना(च) “उद्योगपती” म्हणावं अस वाटतं! मग ते सामान्य लोकांसाठी नॅनो सारखी गाडी बनवणे असो, ताज हॉटेलमध्ये हल्ला झाल्यावर तिथले कर्मचारी आणि इतर मृतांसाठी केलेले काम असो, जे आर डी टाटांनी सुरू करून नंतर सरकारने हडपलेली आपलीच एअर इंडिया परत सरकारला पैसे देऊन तिथल्या सरकारी वृत्तीच्या आणि वकुबाच्या स्टाफसकट विकत घेणे असो.. रतन टाटा साहेबांनी ते सर्व केलं. आजही अनेक नवनवीन स्टार्टअप मध्ये त्यांची स्वतःची वैयक्तिक आर्थिक गुंतवणूक आहे!

मी मागेही अनेक लेखांमध्ये उल्लेख केल्यानुसार लता, बाळासाहेब, रतन टाटा, अमिताभ, सचिन ही आमची काही  श्रद्धास्थाने आहेत. बाळासाहेब आणि लता नंतर आज रतन टाटा साहेबही गेले! आमच्या श्रद्धेच्या मंदिरातील आणखी एक मूर्ती भंग पावली! भारताच्या उद्योग जगतातील ध्रुव तारा आज अस्ताला गेला. भारतातील philanthropy च्या कोहिनूरला आज तडा गेला. लाखो करोडोंचा पोशिंदा आज स्वर्गस्थ झाला. सर्वत्र धंदा आणि धंदेवाल्यांचा चिखल दिसत असताना त्यात उगवलेलं सचोटीचं दुर्मिळ कमळ आज कोमेजलं, भारताच्या प्रगतीच्या क्षितीजावरचा तेजस्वी सूर्य आज अस्ताला गेला. आज सर्वार्थाने #भारतरत्न रतन टाटासाहेब गेले! टाटा समूहाचे RNT गेले! आज जणु देवाचाच स्वर्गवास झालाय ! आजचा दिवस देशाच्या आणि माझ्याही आयुष्यातील अत्यंत काळा दिवस आहे!

साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम! ईश्वर तुम्हाला सद्गती देवो हीच प्रार्थना! फार फार वाईट झालंय आज !

.,..

लेखक : श्री मंदार जोग 

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रतन टाटा यांची एक अविस्मरणीय मुलाखत ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ रतन टाटा यांची एक अविस्मरणीय मुलाखत ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆

मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”

जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: “सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला,  ती आठवण सांगाल का”?

रतनजी टाटा म्हणाले: “मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला.”

पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.

मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.

त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.

चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.

पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”

मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.

मुलाने म्हटले: “मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”

वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?

#कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.

भावपूर्ण श्रध्दांजली

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उंची आभाळाएवढी… पाय मात्र जमिनीवर…  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ उंची आभाळाएवढी… पाय मात्र जमिनीवर…  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अतिमहत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर, एका ठिकाणी तातडीच्या मिटिंगला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती. आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता. सर्वजण सकाळी लवकर निघाले होते.

गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हरच्या लक्षात आले की  मागील एक चाक पंक्चर आहे, त्याने ती गाडी एका बाजूला घेतली. आणि सर्वाना उतरायला सांगितले. सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता. मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले. कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले. कोणी झुडुपाआड गेले.

अर्ध्या तासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली तरी मात्र मालक नाही दिसले. सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेनात. दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर, मालक हातात स्पॅनर घेऊन.. शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून.. घामाघूम होऊन.. चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हरला स्टेपनीचे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले.

आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकाऱ्यांना मिळाला. “थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात. नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात… मालक नाही होता येत. “

त्या उद्योगपतीचे.. म्हणजे  मालकाचे नाव.. “श्री. रतन टाटा”.. नाशिक येथे नेल्कोची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला हा प्रसंग … बरंच काही शिकवून गेलेला. 

संदर्भ : The Habit of Winning

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “फ्राइडचे स्वप्न…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

फ्राईडचे ‘स्वप्न’…” ☆ प्रा. भरत खैरकर 

सिग्मंड फ्राईड

सिग्मंड फ्राईड हे व्यवसायाने डॉक्टर होते. रोग्याशी प्रत्यक्ष संबंध आणि स्वतःची शास्त्रीय प्रतिभा वापरल्याने फ्राईड यांना मानवासंबंधी विलक्षण साक्षात्कार झाला. त्यांना मानवाचे एक आगळेच दर्शन घडले. त्यांना असे आढळून आले की, माणसाला होणाऱ्या रोगांपैकी कितीतरी रोग असे असतात की ते दिसतात शारीरिक, पण त्यांचे कारण असते मात्र मनात.

त्यांना असेही आढळून आले की रोग्याचे शरीर निकोप असले तरी मन निकोप नसते. काही विशिष्ट वासना, अत्यंत प्रबळ इच्छा, ह्या ना त्या कारणांनी दाबून-दडपून टाकाव्या लागल्यामुळे शरीरात या विशिष्ट रोगाची निर्मिती करतात आणि बाह्य लक्षणे दिसायला लागतात. ह्याचे कारण मनामध्ये आहे. हे फ्राईडच्या लक्षात आलं. मग त्याने मनाचा अभ्यास केला. मनाचे दोन भाग असतात असे त्यांच्या लक्षात आले. पहिल्या भागाला फ्राईडनी नाव दिले ‘जाणीव युक्त मन’ (Conscious Mind) आणि दुसऱ्याला नाव दिले ‘नेणीवयुक्त मन’ (Subconscious Mind). !

फ्राईड यांना असे आढळून आले की स्वतःच दडवून ठेवलेल्या स्वतःच्याच ज्या वासनांची रोग्यांना जाणीव नसते, त्या वासना-इच्छा या ‘नेणीवयुक्त’ मनात डांबल्या गेलेल्या असतात. वासना किंवा इच्छारुपी या प्रबळ प्रेरणांच्या अंगी प्रचंड शक्ती असते. ही शक्ती अशी जबरदस्तीने डांबली गेल्यामुळे ती ज्ञानतंतुंवर दाब आणून शारीरिक विकृती वा रोग निर्माण करतात. मानवी मनाच्या क्रिया-प्रक्रियांचे अध्ययन करणाऱ्या शास्त्राला आपण “मानसशास्त्र”(Psychology) म्हणतो.

बहुतेकांना वाटतं ‘स्वप्ने ही भविष्य दर्शवितात, ‘ पण फ्राईडच्या मते स्वप्ने ही वस्तुतः भूतकाळ अथवा गतकाळाची निदर्शक असतात. त्यात भविष्य असं नसतंच. स्वप्न म्हणजे दाबलेल्या वासनांचे रुप ! असं ते म्हणतात. स्वप्न या अवस्थेत मनुष्य बेसावध असतो. पण बेशुद्ध नसतो. त्या वेळी त्याच्या ‘मनातले’, त्याच्या ‘नेणीवे’तले विचार बाहेर येत असतात. हाच धागा पकडून फ्राईडने नंतर आपल्या कितीतरी रोग्यांचे निदान हे त्यांचे स्वप्न ऐकून.. त्यांच्या मनात काय चाललंय हे आणि नेमकं काय त्यांच्याशी होत आहे.. हे ठरवून थिअरी तयार केली.. अशा पद्धतीने फ्राईडने स्वप्न आणि त्यांचा आपल्या रोग्याशी असलेला संबंध जोडला जो बऱ्याच अंशी खरा ठरला.

… एखाद्याबद्दल चांगली किंवा वाईट बातमी कळली की आपल्या मेंदूतून एक विशिष्ट प्रकारचा द्राव किंवा डोपामाईन रिलीज करण्यात येते.. जे मनुष्याला आनंद देतं किंवा नर्व्हस करतं.. जसं की रील बघितल्यानंतर जर त्या रिलमध्ये कोणी खाली धपकन पडला.. तर आपल्याला एक प्रकारचा आनंद होतो.. हसायला येतं.. पण ह्या मागे एक विज्ञान आहे.. तो पडला.. म्हणजे त्याला लागलं.. आता तो हालचाल करू शकणार नाही.. आपल्यापेक्षा तो दुर्बळ झाला.. आणि आपण आता त्याच्यापेक्षा कुठेतरी श्रेष्ठ झालो. असं काहीसं मेंदूच्या आतमध्ये माणसाला सुखावणार चालू असतं.. त्यामुळे मनुष्य आनंदी होतो.. ह्यूमन सायकॉलॉजी हा खरोखर अभ्यासाचा विषय आहे.. सिग्मंड फ्राईडने ‘इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’मधे स्वप्न हे आपले नसतातच आपल्या सबकॉन्शिअस माईंडमध्ये जे काही साठवून ठेवलेलं असतं त्याच्यावरची तुमची थॉट प्रोसेस ती असते. स्वप्नात जर तुमचे दात पडताना दिसत आहे तर तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे. असं तो सांगतो. जर तुम्हांला स्वप्नात तुम्ही नग्न अवस्थेत बघताय तर खऱ्या जगामध्ये तुमचा प्रभाव कमी आहे. असा त्याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे. आपलाच मेंदू आपल्याला पॅरासाईट बनवून वेगवेगळ्या पद्धतीने वागवत असतो.. भीती घालत असतो.. आता मला परवा स्वप्नात दिसले की मी पप्पांना आयफोन गिफ्ट करतोय मला चांगला जॉब लागला आहे.. आता सबकॉन्शिअसमध्ये माझा जॉब आणि आयफोन याचाच विचार चालू असल्याने त्या पद्धतीचे स्वप्न मला पडलं.. सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंटचे काम चर्चेत असल्याने बायकोलाही चांगलं तीन रूमचं घर असल्याचं स्वप्न पडलं. त्यामुळे फ्राईडने सांगितलेली स्वप्नाबाबतची थेअरी खरी वाटते.. आधुनिक काळातल्या माणसाची स्वप्न मात्र फार कॉम्प्लिकेटेड झाल्याचे तो बोलतो.. आधी मनुष्य जंगलात राहायचा त्याच्या एवढ्या सा-या आशा अपेक्षा नव्हत्या. पोट भरणे किंवा अन्न, वस्त्र, निवारा ह्या पलीकडे त्याच डोकं नव्हतं.. पण आता मात्र माणसाचा अन्न, वस्त्र, निवारा खूप मोठा झाला आहे. फ्लॅट, फियाट आणि फ्रिजचे आकार वाढले आहे.. त्यामुळे स्वप्नातही त्याला तेच दिसते.

स्वप्नामध्ये आपल्याला टेक्स्ट किंवा अक्षरं कधी दिसत नाही.. स्वतःचे हात किंवा कुठल्याही प्रकारचा टाईम तुम्हांला दिसत नाही.. स्वप्नामध्ये नेहमी 80% सकाळच असते.. म्हणजे उजेडी स्वप्न जास्त असतात.. रात्रीचे म्हणजे अंधारातील बरीच कमी स्वप्ने असतात.. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी स्वप्नांमध्ये तुम्हांला टेक्स्ट किंवा अक्षरं लिहीता येत नाही.. वाचता येत नाही.. जर स्वप्नांमध्ये काही वाचायचा प्रयत्न केला तर जाग येणार किंवा स्वप्न तुटेल.. स्वप्नामध्ये स्वतःची बोटं सुद्धा आपल्याला मोजता येत नाहीत. म्हणजे काउंटिंग करता येत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या नैसर्गिक स्किल नाहीत ! मॅथस, आकडेमोड, टेक्स इंटरप्रिटेशन ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप नंतर डेव्हलप केलेल्या आहेत.

मात्र आपण स्वप्नांमध्ये पळतो, झाडावर चढतो कारण त्या आपल्या नैसर्गिक स्किल आहेत.. स्वप्नांत आपण बोलत सुद्धा खूप नाही.. कारण सुरुवातीला इशाऱ्याचीच भाषा होती. स्वप्नात त्यामुळे काय बोलतो हे पण नीट कळत नाही! कारण आपला ब्रेन.. आपला मेंदू दहा हजार वर्ष जुनाच आहे मात्र टेक्नॉलॉजी ही अत्याधुनिक आहे.. त्याच्याशी मिळतेजुळते घेणे अजूनही मेंदूला जड जात आहे.

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

निकष काय होते? कोणते फायदे मिळणार?

भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय?

संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठीजनांना अभिमान वाटावा अशी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे. अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहेत. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

दरम्यान, काही लोकांना प्रश्न पडला आहे की, एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं? यामुळे काही फायदे मिळणार? आणि अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे निकष काय असतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देत आहोत.

अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय?

देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तमिळ भाषेला सर्वात आधी २००४ साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला. त्यापाठोपाठ संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते.

अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना केली जाते. प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं. भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार.

भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळण्याचे निकष काय?

अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असायला हवी. त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी. ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावे, अनुवादित नसावे. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे, अशा सर्वसाधारण अटी आहेत. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते. त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो. मराठी भाषेने हे सर्व निकष पूर्ण केले आहेत.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर 

बदलापूर – मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मराठवाडा मुक्ती-संग्रामाचा इतिहास…”  लेखक : अज्ञात ☆ माहिती प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “मराठवाडा मुक्ती-संग्रामाचा इतिहास”  लेखक : अज्ञात ☆ माहिती प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पूर्वपीठिका…

संत ज्ञानेश्वरांच्या कालात आपल्या मराठवाड्यावर आपलेच राज्य होते. देवगिरी ही राजधानी होती आणि रामदेवराय हा राजा होता.

अल्लाउद्दीन खिलजी या परकीय आक्रमकाने इ. स. १२९४-९५ ला आपल्यावर स्वारी केली, रामदेवरायास हरवले आणि आपण परतंत्र झालो. मराठेशाहीत आपल्यावर राज्य करणार्या निजामास थोरला बाजीराव आणि माधवराव पेशवे यांच्याक्डून पराभूत करून मांडलिक तर बनवण्यात आले.

पण मराठवाडा काही हिंदवी स्वराज्यास जोडण्यात आला नाही.

मराठेशाहीचा अस्त होण्यापूर्वीच निजामाने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले.

इंग्रज गेल्यानंतर निजामाने स्वत:चे भारतापासून वेगळे असे स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. १७सप्टेम्बर१९४८पर्यंत आपण त्याच्या गुलामीत होतो.

निजाम घराण्यात सात निजाम झाले. त्यापैकी सातवा निजाम मीर उस्मान अली हा १९११साली गादीवर आला.

त्याने अलीगढ मुस्लीम विद्यापीठात शिक्षण घेतले होते. या निजामाने राज्यातील शाळांची संख्या एकदम कमी केली व १९२२पासून धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी सुरु केली. आमिष दाखवून किंवा बळजबरीने धर्मांतरे करण्यास सुरुवात केली. मजलिसे मुत्तेहादिल मुसल्मिन[एम आय एमMIM] य़ा सैनिकी संघटनेची स्थापना करून तिच्याकरवी जनतेवर अत्याचार सुरु केले. याच संघटनेचे पुढे रजाकार मध्ये रुपांतर झाले. रझाकार प्रमुख कासिम रझवी हा लातूरचा असून अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचाच विद्यार्थी होता. विशेषत: १९४६ ते १९४८ या काळात भयंकर अत्याचार झा्ले. गावे जाळणे, महिलांवर बलात्कार करणे, बळजबरीने धर्मांतर करणे, दलितांना धमकावून सरकारी बाजू घ्यायला लावणे असे प्रकार रझाकारांनी केले.

आर्यसमाज

निजामाच्या या अत्याचारास सर्वप्रथम विरोध आर्यसमाजाने केला व शेवटपर्यंत त्यासाठी लढा दिला. यात अनेक आर्यसमाजी हुतात्मा झाले. सत्याग्रह, जेल भरो, ध्वमस्फोट असे सर्व प्रकार आर्यसमाजाने हाताळले. हुतात्म्यांमध्ये उदगीरचे भाई श्यामलालजी, भीमराव पाटील, शंकरराव सराफ, लोहार्याचे रामा मांग, गुंजोटीचे वेदप्रकाश, शंकर जाधव, एकनाथ भिसे, बहिर्जी वाप्टीकर, धारूरचे काशिनाथ चिंचालकर, किल्ल्रारीचे माधव बिराजदार, जनार्दनमामा, फकीरचंद्रजी आर्य, कल्याणानंदजी, मलखानसिंह, रामनाथ असाना, सुनहराजी, ब्रह्मचारी दयानंद, मानकरणजी, लक्षैयाजी, सत्यानंदजी, विष्णूभगवंत तांदूरकर, इत्यादि. नांवे प्रमुख होत. या सत्याग्रहाचे नेतृत्व एकाच्या अटकेनंतर दुसरा अशा साखळी पद्धतीने पं नरेंद्रजी आणि स्वामी स्वतंत्रानंद यांच्या मार्गदर्शनात महात्मा नारायण स्वामी, श्री चांदकरणजी शारदा, श्री खुशहालचंद खुर्संद, राजगुरु धुरेंद्र शास्त्री, देवव्रत वानप्रस्थ, महाशय कृष्ण, द्न्यानेश्वर सिद्धांतभूषण, विनायकराव विद्यालंकार यांनी केले. गोदावरीबाई किसन टेके यांच्यासारख्या महिलांनीही निजामी अत्याचाराचा प्रतिकार केला. नारायणबाबू यांनी प्रत्यक्ष निजामावर ध्वम फेकला होता पण निजाम बचावला.

स्वा. सावरकर आणि हिंदुमहासभा.

१९३५साली इंग्रजांनी भारतास टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देण्याचे मान्य करून प्रांतांना स्वायत्तता दिली. त्यानुसार १९३७ला मुंबई प्रांतात कूपर-मेहता मंत्रिमंडळ सत्तेवर आले व त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्त केले. यानंतर सावरकर हिंदुमहासभेचे अध्यक्ष झाले व त्यांनी आर्यसमाजाच्या निजामविरोधी लढ्यास मोलाचे साह्य केले. सावरकरांनी भारतभर दौरे करून या विषयावर व्याख्याने दिली व निजामशाहीत घुसण्यासाठी सत्याग्रही तयार केले तसेच या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमवला. सत्याग्रहींचे जत्थेच्या जथे निजामशाहीत घुसले. यांपैकी एका जत्थ्याचे नेतृत्व पंडित नथुराम गोडसे यांनी केले. त्यांना निजाम शासनाने एक वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला. सावरकरांनी निजामी अत्याचाराबाबत अनेक लेख लिहून जागृती केली आणि निजामाला अत्याचार बंद करण्याचे आवाहन केले. सत्याग्रहींसाठी निजामाचे तुरुंग अपुरे पडू लागले तेव्हा १९३९साली निजामाने सावरकर आणि आर्यसमाज यांना त्याम्च्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले व सत्याग्रह थोड्या काळासाठी स्थगित झाला.

डॊ. आम्बेडकर

निजामाने बाबासाहेबांची धर्मांतराची घोषणा ऐकली. त्याने बाबासाहेबांना दोन कोटी रूपये देऊ केले, त्या बदल्यात मराठवाड्यातील दलित जनतेसोबत इस्लाम कबूल करण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांनी ते दोन कोटी रूपये ठोकरले. इतकेच नव्हे तर आमिष दाखवून किंवा बळजबरीने धमकावून धर्मांतरित झालेल्या दलित बंधूंना स्वधर्मात परतण्याचे आवाहन केले, आवाहनाचे हे पत्रक त्यांनी नैशनल हेराल्ड या दैनिकात प्रसिद्धीस दिले. बाबासाहेबांचे समविचारी बौद्ध भिक्षु उत्तम यांनी काही काळ बंगाल हिंदुसभेचे प्रदेशाध्यक्ष भूषवले होते. ब्रह्मदेशातून तेरा सत्याग्रही निजामविरोधी लढ्यात सहभागी होण्यास आले होते.

वंदे मातरम आंदोलन

निजामी राज्यात वंदे मातरम हे गीत गाण्यास बंदी होती. महाविद्यालयीन तरुणांनी ही बंदी मोडण्याचे आंदोलन केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या आंदोलनास प्रोत्साहन दिले. बंदी मोडणार्या विद्यार्थ्यांना निजामाने विद्यापीठातून काढले तेव्हा विदर्भ प्रांतातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे आवाहन सावरकरांनी त्यांना केले. त्यानुसार अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी नागपूरला आले. या आंदोलनात रामचंद्र राव यांनी पोलीसांचे फटके खात असताना सुद्धा वंदे मातरम च्या घोषणा चालूच ठेवल्या. त्यामुळे त्यांचे वंदे मातरम रामचंद्र राव असेच नांव पडले. ते पुढे हिंदुमहासभा आनि आर्यसमाजाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. या आंदोलनास पंडित नेहरूंनीही पाठिम्बा दिला होता. त्यांचे अनुयायी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव याच आंदोलनातून पुढे आले.

मुस्लीम सत्याग्रही

अनेक मुस्लीम बांधवांनीही निजामविरोधी लढ्यात आपले योगदान दिले. त्यात शहीद शोएब उल्ला खान आणि सय्यद फय्याज अली हे प्रमुख होत. शहीद शोएब उल्ला खान हे इमरोज या वृत्तपत्राचे संपादक होते. ते आपल्या सम्पादकीयांतून निजामी अत्याचारांवर कठोर टीका करीत. रझाकारांनी २१ औगस्ट १९४८ला रात्री १वाजता पाठीत गोळ्या घालून त्यांची हत्या केली. सय्यद फय्याज अली हे अजमेरचे निवासी. अजमेर आर्यसमाजाच्या प्रेरणेने त्यांनी पुसदच्या आर्य सत्याग्रहात भाग घेतला आ्णि तुरुंगवास भोगला. कताल अहमद, मौलाना सिराजुल हसन तिरमिजी, पंजाबचे मुंशी अहमद्दीन, कराचीचे मियां मौसन अली, सातार्याचे मौलाना कमरुद्दिन यांनीही निजामविरोधी लढ्यात आपले योगदान दिले.

स्वामी रामानंद तीर्थ आणि स्टेट कांग्रेस

स्वामी रामानंद तीर्थ यांनी विविध कारणांसाठी १९२८, १९३८, १९४०, १९४३ या वर्षी कारावास भोगला. स्टेट कांग्रेसवर तिच्या स्थापनेपूर्वीच बंदी घालण्यात आली होती. भारत स्वतंत्र झाला तरी निजामाने आपले राज्य त्यात विलीन न करण्याची घोषणा केली. स्टेट कांग्रेसने या घोषणेविरुद्ध ७ औगस्ट १९४७ ला खूप मोठे मोर्चे काढले. आ. कृ. वाघमारे, शेषराव वाघमारे, अनंत भालेराव, भाई बंशीलाल, दिगंबरराव बिंदू, राजूर तालुक्यातील विधिद्न्य निवृत्ती रेड्डी, कलिदासराव देशपांडे, माणिकराव पागे, राजाराम पाटील, इत्यादि नेते हे त्यावेळी स्वामीजींचे सहकारी होते. १५ औगस्ट १९४७साली लोकांनी आपल्या घरांवर तिरंगे फडकवले. स्वामीजींना पुन्हा तुरुंगात धाडण्यात आले. रझाकारांचे अत्याचार वाढले. सावरकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना सशस्त्र लढा देण्याचे आवाहन केले. ना. य. डोळे यांनी लिहिले आहे की महात्मा गांधींनीही या लढ्यात शस्त्र वापरण्याची अनुमती दिली होती.

रझाकार आणि जनता यांच्यात सशस्त्र लढा पेटला.

सैनिकी कारवाई

भारत सरकारने संघराज्यात विलीन होण्याचा विचार करण्यासाठी निजामास १५ औगस्ट १९४८ पर्यंतची मुदत दिली होती. पण निजाम या मुदतीनंतरही विलीन होण्यास तयार नव्हता. जनता आणि रझाकार यांच्यात संघर्ष पेटला होता. १२सप्टेम्बर १९४८ या दिवशी जिनांचे पाकिस्तानात निधन झाले. त्याच दिवशी मध्यरात्री सरदार पटेल यांनी पं. नेहरूंना बजावले की सैनिकी कारवाईची मान्यता दिली नाही तर आपण मंत्रिमंडळातून बाहेर पडू. तेव्हा नेहरूंनी निजामाविरुद्ध सैनिकी कार्रवाईच्या आदेशावर स्वाक्षरी केली. पटेलांनी १३सप्टेम्बर १९४८ला आपले सैन्य तीन दिशांनी निजामशाहीत घुसवले. रझाकारप्रमुख कासिम रझवी हा चारच दिवसांत पाकिस्तानला पळून गेला. १७सप्टेम्बर १९४८ या दिवशी निजामाने संध्याकाळी ५ वाजता आपले राज्य भारतीय संघराज्यात विलीन केले. त्याने विमानतळावर सरदार पटेलांना वाकून नमस्कार केला. अशा प्रकारे ६५३ वर्षांच्या पारतंत्र्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला.

सर्व नागरिकांना मराठवाडा स्वातंत्र्य दिनाच्या ” हार्दिक ” शुभेच्छा !! 💐

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares