मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद– (ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ६  (इंद्र सूक्त)) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद– (ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ६ (इंद्र सूक्त)) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र : छंद – गायत्री

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – १ ते ३ इंद्र; ४ ते ६, ८, ९ मरुत्; ५ ते ७ इंद्रमरुत्; १० – इंद्र 

—मधुछन्दस वैश्वामित्र ऋषींनी पहिल्या मंडळातील सहाव्या सूक्तात इंद्र आणि मरुत् या देवतांना आवाहन केलेले आहे. तरीही हे सूक्त इंद्रसूक्त म्हणूनच ज्ञात आहे. याच्या गीतरूप भावानुवादाच्या नंतर दिलेल्या लिंकवर क्लिक केले म्हणजे हे गीत ऐकायलाही मिळेल आणि त्याचा व्हिडीओ देखील पाहता येईल. 

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री. 

यु॒ञ्जन्ति॑ ब्र॒ध्नम॑रु॒षं चर॑न्तं॒ परि॑ त॒स्थुषः॑ । रोच॑न्ते रोच॒ना दि॒वि ॥ १ ॥

व्योमामध्ये चमचमताती असंख्य नक्षत्रे

सज्ज जाहली या देवाच्या प्रस्थानास्तव खरे

इंद्राचे हे तेज किती हो उज्ज्वल प्रकाशते

सामर्थ्याने साऱ्या विश्वे संचारा करिते ||१||

यु॒ञ्जन्त्य॑स्य॒ काम्या॒ हरी॒ विप॑क्षसा॒ रथे॑ । शोणा॑ धृ॒ष्णू नृ॒वाह॑सा ॥ २ ॥

अती देखणे तांबटवर्णी अश्व सज्ज झाले

रथासी जुंपून सेवक त्यांना घेउनिया आले

पाहुनिया वारूंना लोभस अभिलाषा जागली

आरुढ होता इंद्र रथावरी तेजा येत झळाळी ||२||

के॒तुं कृ॒ण्वन्न॑के॒तवे॒ पेशो॑ मर्या अपे॒शसे॑ । समु॒षद्‍भि॑रजायथाः ॥ ३ ॥

जयासि ना आकार तयाला साकारा आणिले

जाड्य अचेतन तयामध्ये तू चैतन्या भरले 

साक्ष होऊनी उषेसवे तू  प्राणा साकारले

जन्म घेउनिया अवनीवर अवतारुनी आले ||३||  

आदह॑ स्व॒धामनु॒ पुन॑र्गर्भ॒त्वमे॑रि॒रे । दधा॑ना॒ नाम॑ य॒ज्ञिय॑म् ॥ ४ ॥

यज्ञाकरिता सर्वा परिचित असे नाम धारिले

पुनःपुन्हा जन्माला येण्या गर्भवास पावले

जननानंतर मरण अशा या सृष्टिक्रमा राखिले

कितीकदा या अवनीवरती जन्म घेउनी आले ||४|| 

वी॒ळु चि॑दारुज॒त्‍नुभि॒र्गुहा॑ चिदिन्द्र॒ वह्नि॑भिः । अवि॑न्द उ॒स्रिया॒ अनु॑ ॥ ५ ॥

बलशाली तू सुराधीपती योगसिद्ध राजा

सहज भेदिशी अशनी योगे अभेद्य ऐशा नगा

योगाच्या सामर्थ्याने तू  गुंफा फोडुनीया 

प्रभारूपी धेनूंना आणिसी शोधूनी तू लीलया ||५||

    

दे॒व॒यन्तो॒ यथा॑ म॒तिमच्छा॑ वि॒दद्व॑सुं॒ गिरः॑ । म॒हाम॑नूषत श्रु॒तम् ॥ ६ ॥

वैभवदायी देवेंद्राला कितिक स्तोत्र अर्पिली

समाधान देवाला अपुल्या देण्यास्तव गायिली

किती महत्तम सुरेंद्र तैसा यशोवंत फार

जगता साऱ्या विश्रुत आहे शचीपती तो थोर ||६||   

इन्द्रे॑ण॒ सं हि दृक्ष॑से सञ्जग्मा॒नो अबि॑भ्युषा । म॒न्दू स॑मा॒नव॑र्चसा ॥ ७ ॥

देवेंद्राला भय ना ठावे शूर वीर तेजस्वी

तयासवे तव संचाराची शोभा ही आगळी

उभय देवतांचे हे तेज प्रदीप्त हो होते

मुदित पाहूनी दोघांना ही समाधान दाटते ||७||

अ॒न॒व॒द्यैर॒भिद्यु॑भिर्म॒खः सह॑स्वदर्चति । ग॒णैरिन्द्र॑स्य॒ काम्यैः॑ ॥ ८ ॥

इंद्राचे अनुचर ही असती सकलांना प्रीय

दहीदिशांना  तेज फाकते त्यांचे  तेजोमय

अवगुण त्यांच्या ठायी नाही सर्वगुणांनी युक्त

त्यांच्या पूजेसाठी घोष  करीत त्याचे भक्त ||८||

अतः॑ परिज्म॒न्ना ग॑हि दि॒वो वा॑ रोच॒नादधि॑ । सम॑स्मिन्नृञ्जते॒ गिरः॑ ॥ ९ ॥

भक्त तुझा मी दास तुझा मी स्तोत्र तुझी अळवितो

तुझ्या स्तुतीने अपुली वैखरी अलंकृत करितो

सर्वव्यापी हे देवा करता विलंब का आता 

द्युलोकीहून सत्वर यावे दर्शन द्यावे आता ||९||

इ॒तो वा॑ सा॒तिमीम॑हे दि॒वो वा॒ पार्थि॑वा॒दधि॑ । इन्द्रं॑ म॒हो वा॒ रज॑सः ॥ १० ॥

व्योमातुन वा पार्थिवातुन सत्वर ही यावे 

दिव्यलोकही वा त्यजुनी आता साक्ष इथे व्हावे  

इंद्राचा सहवास अर्पितो अभिष्ट आनंद

अभिलाषा ना अन्य ठेविली दर्शन हा मोद ||१०||

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

https://youtu.be/_J2mwG5SfHg

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लाजाळूचे अलगद मिटणे! — श्री ए.के.मराठे ☆ संग्राहिका – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ लाजाळूचे अलगद मिटणे! — श्री ए.के.मराठे ☆ संग्राहिका – श्री अनंत केळकर ☆  

निसर्गात,आपल्या आजूबाजूला अनेक आश्चर्यकारक गोष्टी असतात. लाजाळू वनस्पतीही अशीच एक आश्चर्यचकित करणारी आहे. स्पर्श होताच / धक्का लागताच लाजळूची पाने पटकन मिटतात हे आपण सगळेच जाणतो.

धसमुसळेपणा या वनस्पतीला अजिबात आवडत नाही. इंग्रजीत Touch Me Not नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या वनस्पतीचे एक पान अलगद पकडले, तर मात्र एक नितांत सुंदर कलाविष्कार पहावयास मिळतो. आपल्या बोटांची स्पर्श-ऊर्जा जसजशी भिनत जाईल, तसतशी लाजाळूच्या पानांची एकेक जोडी अलगद मिटत जाते.

निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार !!!

लेखक : ए.के. मराठे, कुर्धे

9405751698

संग्राहक : अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कालबाह्यतेचा सापळा.. लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ कालबाह्यतेचा सापळा.. ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

जानेवारी १९२५…

स्वित्झर्लॅंडच्या जिनिव्हा या शहरामध्ये एक खास उद्योगसमूहाने एक गुप्त सभा आयोजित केली गेली होती.

विजेवर चालणारे प्रकाशदिवे (बल्ब) बनवणारे सर्व आघाडीचे उत्पादक त्या मिटींगमध्ये सहभागी झाले होते.

बल्बचा शोध लागून एव्हाना नव्वद वर्ष झाली होती. सुरुवातीच्या काळातले बल्ब अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अल्पायुषी होते पण त्यात प्रचंड सुधारणा होत गेल्या. १९२० पर्यंत तब्बल अडीच हजार तासांचे आयुष्य असणारे दर्जेदार आणि दिर्घायुषी बल्ब बाजारात उपलब्ध व्हायला लागले होते. जनता बल्बवर खूश होती.  पण कोणालातरी बल्बचे इतके दीर्घजीवी असणे खटकत होते.

ते कोण होते?—-

साक्षात बल्ब उत्पादक…

कारण त्यांना वाटत होते की प्रत्येक आवृतीनंतर बल्बचे आयुष्य वाढत जाणे हे त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे.

जिनिव्हाच्या त्या मिटींगमध्ये इंटरनॅशनल जनरल इलेक्ट्रिक,ओसराम, फिलिप, टंगस्राम, असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज, या सर्व जागतिक आघाडीच्या बल्बनिर्मात्यांनी एक गुप्त करार केला.—- ‘ आपल्या दीर्घकालीन हितासाठी आणि येणाऱ्या काळात भरघोस नफा मिळवण्यासाठी ते सर्वजण मिळून निकृष्ट दर्जाच्या अल्पायुषी बल्बचीच निर्मिती करतील.’ —–

त्या सर्वांनी या कराराचे इमानेइतबारे पालनही केले. पूर्वी अडीच हजार तास चालणारे बल्ब बाजारातून नामशेष झाले.

१९२५ नंतर बाजारात येणारे बल्ब फक्त एक हजार तास चालू लागले. आयुष्य घटले आणि साहजिकच बल्बची मागणी वाढली. खप वाढला. निकृष्ट दर्जाचे बल्ब आधीच्या किंमतीत विकून कंपन्यांनी ग्राहकांना मनसोक्त लूटले होतेच. आता आयुष्यमान कमी झाल्यामुळे विक्रीही दुप्पट तिप्पट झाली. बल्ब विक्रेत्यांची चांदीच चांदी झाली.

उत्पादनाचा दर्जा घसरवूनही पैसे कमवता येतात हे नवेच गुपित उद्योगजगताला माहीत झाले. बल्ब कंपन्यांच्या त्या एकत्र येऊन सापळा रचणाऱ्या कंपन्यांना ‘ फिबस कार्टेल ‘  या नावाने ओळखले जाऊ लागले. वस्तूंचा दर्जा घसरवून पैसे कमवण्याच्या त्यांच्या क्लूप्तीला म्हणतात— “ प्लॅन्ड ओबसोलेसेंस.’ 

खरंतर हा सापळा आहे. मराठीत याला ‘ नियोजित अप्रचलन ‘ असे म्हणता येईल.— सोप्या शब्दात एखादी वस्तू लवकर कालबाह्य करुन ग्राहकाला पुन्हा एक नवी खरेदी करायला भाग पाडणे असे याचे वर्णन करता येईल.

दहा पंधरा वर्षापूर्वीचे मोबाईल फोन चांगले पाच पाच वर्ष चालायचे. हल्ली मात्र कितीही भारीचा घेतला तरी एक स्मार्टफोन दोन तीन वर्षापेक्षा जास्त टिकूच शकत नाही—- कारण तेच—– नियोजित अप्रचलन.

जाणून बुजून फोनची रचनाच अशी केली जाते की तीन चार वर्षात फोन निकामी व्हावा. जुने उत्पादन टिकाऊ असेल तर कंपनीने निर्माण केलेले नवे उत्पादन कोण घेईल?— लाखो कोटी रुपयांचा बिजनेस हवा असेल तर पूर्वीच्याच ग्राहकांना पुन्हा खरेदी करायला भाग पाडले पाहिजे.

आजची बहूतांश उत्पादने याच धर्तीवर बनवली जातात. पूर्वीचे टीव्ही वीस वीस वर्ष चांगले चालायचे. आताच्या एल ई डी मधे पाच सात वर्षात पट्ट्यापट्ट्या दिसायला लागतात.

१००० वेळा पुन्हा पुन्हा दाढी करता येईल आणि स्वच्छ करुन पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा टिकाऊ ब्लेड बनवण्याचे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. पण कोणतीही नामांकित कंपनी तशा प्रकारच्या ब्लेड बनवण्यात पुढाकार घेत नाही.—- कारण मग सोन्याची अंडी देणारा बिजनेस कायमचा बसेल.

लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता पेन कचऱ्यात फेकून नवीन पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आजही जेव्हा पेनच्या रिफीलचा शोध घेतो तर बहुतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत.—- 

कारण तेच—- मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल?

या नियोजित अप्रचलन नावाच्या विकृत व्यापार फंड्यामुळेच “ वापरा आणि फेका “ नावाचा भस्मासुर जन्माला आला.

सुंदर निसर्गाचे एका विशाल कचराकुंडीत रुपांतर व्हायला लागले—-

—कपडे विटले, फेकून द्या— शुज उसवले, फेकून द्या— लॅपटॉप खराब झाला, दुरुस्तीऐवजी नवाच घ्या— इस्त्री चालेना झाली, नवीन घ्या— मिक्सर बिघडला, नवीन घ्या — वॉशिंग मशीन खराब झाली, नवे मॉडेल घ्या.

—पंधरावीस वर्षांखालच्या गाड्यांचे स्पेअरपार्ट मिळत नाहीत, आणि उपभोक्ता कंटाळून गाडी कवडीमोल भावात विकून नवी गाडी घेण्याच्या तयारीला लागतो.

—एकदा माऊस कीबोर्ड खराब झाला की फेकून द्यावा लागतो.

—लाईटच्या माळा, चार्जर, हेडफोन इत्यादी  इलेक्ट्रीक उपकरणांना दुरुस्त करणे ही संकल्पनाच आता मोडकळीला आलेली आहे.

फुटबॉल किंवा क्रिकेटमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक संघामध्ये नव्या प्रकारच्या जर्सीची ब्रॅंड न्यू  डिझाईन लॉंच केली जाते.

—संघ तोच — खेळाडू तेच — प्रत्येक मौसमात अवतार मात्र नवा असतो.— कारण प्रेक्षकांना शर्टपॅंटचे नवे जोड विकायचे आहेत— चाहत्यांना सामन्याला जाताना मागच्या वेळीचा शर्ट घालताना लाज वाटते — सर्वजण त्यांच्याकडे गरीब आहे असा दृष्टिकोन टाकतील म्हणून तो आपल्या आवडत्या संघासाठी नवी जर्सी आनंदाने खरेदी करतो.

भारतात कमी असले तरी विदेशांमध्ये ही क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसते.

नियोजित अप्रचलनाचा आणखी एक छोटा भाऊ आहे. —- तो म्हणजे ‘ समंजस अप्रचलन ‘ (पर्सिव्हड ऑबसोलेसेंस).—–

—–यामध्ये तुमची कार आता जुनी झाली आहे, पर्यायाने तुम्ही आऊटडेटेड झाले आहात, असे तुमच्या मनावर बिंबवण्यात येते.

—-जाणूनबुजून आणि प्रयत्नपूर्वक तुमच्या वापरात असलेल्या जुन्या वस्तूंविषयी तुमच्या मनात उदासीनता आणि न्यूनगंड निर्माण केला जातो.

—–एखादी वस्तू विकत घेतली नाही तर तुमचे व्यक्तिमत्व अधुरे अपूर्ण आहे असे जाहिरातींच्या माध्यमातून सुप्त मनावर पुन्हा पुन्हा ठसवले जाते.

—-साधे भोळे लोक खोट्या प्रतिष्ठेपायी या चतुर लोकांनी रचलेल्या जाळ्यात अलगद अडकतात.

—-स्वतःला उच्चशिक्षित मानणारा सुजाण श्रीमंत वर्ग या कंपन्यांच्या तावडीत सापडतो आणि आवश्यकता नसताना कधी मजबुरीने नवी खरेदी करतो.

—-त्यांना वारंवार सांगितल्या गेलेल्या उत्पादनांची ते आज्ञा पाळल्यासारखी निमूटपणे खरेदी करतात.

—- कधी दिखावा करण्यासाठी, कधी छाप पाडण्याच्या नावाखाली, कधी स्वतःचा अहं पोसण्यासाठी, कधी स्टेटस मेंटेन करण्याच्या नावाखाली अव्याहत खरेदी सुरूच असते. कोणतीही नवी खरेदी करण्याआधी ‘ मला या वस्तूची खरंच तीव्र गरज आहे का ‘  याचा समग्र विचार करण्याची त्यांची आकलनशक्तीच त्यांनी हळूहळू गमावलेली असते.

लठ्ठ पगार कधीही एकटा येत नाही. येताना तो चंगळवादालाही सोबत घेऊन येतो. नवश्रीमंतांच्या बाबतीत तर हे हमखास घडते—- महागड्या ठिकाणी पार्ट्यांना जाणे.— आधी भरपूर वाढून घेणे आणि नंतर जात नाही म्हणून ताटात तसेच अन्न टाकून देणे ही याचीच लक्षणे असतात.

——आर्थिक सुबत्ता असूनही ज्याने संयम गमवला नाही आणि जो सत्व पाळू शकला तोच खरा भाग्यवान. 

——वस्तूंना रुपयां-पैशात तोलणारी माणसं खरी कर्मदरिद्री. ती बनवण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती, त्याच्या निर्मितीसाठी घेतले गेलेले कष्ट या सर्वांचे मोल ज्याला समजले तो खरा सुजाण…

बिजनेस माईंडच्या चतुर पण मुठभर लोकांनी पर्यावरणाचा बट्ट्याबोळ केला आहे. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी उभ्या जनतेला आणि त्यासोबत निसर्गाला त्यांनी स्वतःच्या दावणीला बांधले आहे. श्रीमंत लोकांच बरं आहे.

ते फक्त पैसे देऊन किंमत चुकवतात.—– पण गरीब लोक आपलं आयुष्य देऊन अप्रचलनात बळी जातात.

जल-प्रदूषण, भू-प्रदूषण आणि हवा-प्रदूषणाचे सर्वात गंभीर परिणाम त्या देशातील दारिद्र्यरेषेवर झगडणाऱ्या नाजूक नाशवंत लोकसंख्या घटकावरच होतो.

हे बदलायला हवे.—-

—तुम्ही तयार आहात का? प्रत्येक खरेदी सजगपणे करा— वापरा आणि फेकाच्या गोंडस सापळ्यात अडकू नका.

अप्रचनलाचे नवे बळी बनू नका…!!

लेखक :  अज्ञात 

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ||•• क्रिकेटचे असेही भक्त ••|| … श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

||•• क्रिकेटचे असेही भक्त ••|| श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

क्रिकेटचे असे भक्त अनेक आहेत. दहा, बारा वर्षांपूर्वी मी एक समारंभ आयोजित केला  होता, तो समारंभ होता सुनील गावस्कर आणि विश्वनाथ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्ताने. त्यांचा सत्कार अमिताभ बच्चन ह्यांनी केला होता .. त्यावेळी अमिताभ बच्चन आल्यानंतर काही क्रिकेटपटू आणि अमिताभ बच्चन ह्यांना मी एका हॉलमध्ये नेऊन बसवलं होतं. तिथे चंदू बोर्डे आणि चंदू पाटणकर हे दोन क्रिकेटपटू सुद्धा होते. बोर्डे आणि पाटणकरांनी पाहिलं की समोर अमिताभ बच्चन आहे. त्यांची इच्छा झाली की अमिताभ बच्चनला जाऊन भेटावं. म्हणून हे दोघंजण गेले आणि चंदू बोर्डेनी अमिताभ बच्चनला हात पुढे करून सांगितलं, ‘ नमस्ते ..!! मी चंदू बोर्डे ..!! ‘ 

अमिताभ बच्चन दिलखुलास हसले, आणि चंदू बोर्डेना म्हणाले की, ‘ तुम्ही तुमचं नाव कशाला सांगता ..?? मी तुम्हाला तुमचीच एक आठवण सांगतो. तुम्हाला आठवतं का की, तुम्ही १९५८ साली दिल्लीला वेस्टीइंडिज विरुद्ध  शतक ठोकलं होतं ..?? ‘ 

बोर्डे म्हणाले की, ‘ हो. मला चांगलंच आठवतंय ..!!’ 

अमिताभ पुढे म्हणाला .. ‘ तुम्हाला हे ही आठवतंय का, की त्यावेळेला काही मंडळींनी तुम्हाला खांद्यावरून उचलून पॅव्हेलियनमध्ये नेलं होतं ..?? ‘ 

बोर्डे म्हणाले .. ‘ हो. आठवतं ..! !’ 

आणि मग अमिताभ बच्चनने त्यांना सांगितलं की, ‘ त्यातला एक खांदा माझा होता ..!! ‘ 

अमिताभने हे म्हटल्यावर चंदू पाटणकर, मी, बोर्डे, खरं तर आम्ही तिथे जे होतो, ते सर्वच शहारलो ..!! 

नंतर आणखीन एक गोष्ट आम्हाला कळली की, चंदू बोर्डेना उचलणारा तिथे आणखी एक तरुण होता, जो गोरा गोमटा होता. जो अमिताभ बच्चनचा मित्र होता. त्याचं नाव होतं राजीव गांधी ..!! 

गंमत पहा या दोन मित्रांपैकी एक ‘ वन मॅन फिल्म इंडस्ट्री ‘ झाला, आणि दुसरा देशाचा पंतप्रधान ..!! 

चंदू बोर्डे ह्यांनी १९६४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध दसऱ्याला भारताला एका छोट्या पण अफलातून खेळीने जिंकून दिलं. अत्यंत मोक्याच्या वेळेला त्यांनी अप्रतिम अशी आक्रमक फलंदाजी केली. त्यावेळेला स्टेडियममधली अनेक मंडळी स्तिमित झाली. त्यांना हर्षवायू झाला. आणि त्या आनंदाच्या भरात चंदू बोर्डेना खांद्यावरून पॅव्हेलियनमध्ये कोणी नेलं असेल ..?? 

त्या माणसाचं नाव होतं राज कपूर ..!! 

लेखक : – श्री द्वारकानाथ संझगिरी

संग्राहक : श्री सुनीत मुळे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दोन चित्रे – लेखक -अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दोन चित्रे – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

आईने तिच्यासाठी शब्दकोडे, चित्रकोडे यांचे पुस्तक आणले होते. आधी ती हरखून गेली. तिनं मग ते पुस्तक उघडले. पहिलाच खेळ होता– मांजराला माश्याकडे मार्ग दाखवा. तिनं पेन्सिलीने रेघांची वेटोळी ओलांडून क्षणात ते कोडं ओलांडलं. पुढचा खेळ होता योग्य जोड्या जुळवा– तिनं क्षणार्धात मोची आणि चप्पल, शिंपी आणि सदरा, डॉक्टर आणि औषध, सुतार आणि कपाट, असं सगळं जुळवलं. 

आई कौतुकाने ते बघत होती. पुढ़च्या शब्दखेळाला ती थबकली – थोडीशी हिरमुसली. तिनं ते पुस्तक बाजूला ठेवले. आई ते बघत होती. 

” काय झालं बाळा, तुला नाही आवडलं का पुस्तक.” 

“तसं नाही आई, मला तो पुढला चित्रखेळ नाही आवडला. ‘ दोन चित्रातील फरक ओळखा.’ –आई मला दोन चित्रातला फरक नाही ओळखता येत.”

आई म्हणाली, “अगं सोपाय. बघ ह्या चित्रात चेंडू लाल रंगाचा आहे, त्या चित्रात हिरवा. ह्या झाडावर पक्षी बसलेला आहे, त्या झाडावर नाहीये.” 

“आई मला फरक ओळखायला नाही आवडत. उलट दोन्ही चित्रात साम्य किती आहेत. ह्या मुलाकडाची बॅट आणि त्या मुलाकडची बॅट सारखी आहे. दोघांची टोपी सारखी आहे. दोन्ही मैदानावर गवत आहे, सुंदर हिरवे गार. दोन्ही चित्रात खूप खूप सुंदर, सारखी झाडं आहेत. दोन्हीकडे सूर्य सारखाच हसतोय. दोन्ही ढग सारखेच सुंदर आहेत. दोन्ही चित्रात इतकी अधिक साम्य असतांना, आपण जे थोडेसे फरक आहेत ते का शोधत बसतो.” 

आई एकदम चमकली— किती सहज सोपं तत्वज्ञान आहे हे. आपण आपला पूर्ण वेळ चित्रातला फरक शोधण्यात  घालवतो, पण हे करतांना आपण दोन चित्रातली साम्य– जी चित्रातल्या फरकांपेक्षा अधिक आहेत, ती लक्षात घेत नाही.

मुलांच्या बाबतीत सुद्धा अगदी हेच करतो. ‘ ती समोरची मुलगी आपल्या मुलीपेक्षा अधिक उंच आहे. वर्गातल्या बाजूचा मुलगा गणितात अधिक हुशार आहे, ती दुसरी मुलगी माझ्या मुलीपेक्षा छान गाते.’ —- आपण केवळ आणि केवळ फरकच शोधत बसतो आणि साम्यस्थळे अगदी आणि अगदी विसरून जातो.

आईने तो चित्रखेळ पुन्हा उघडला. त्यावर ‘ दोन चित्रातील फरक ओळखा ‘ मधील ‘फरक’ हा शब्द खोडून त्या जागी ‘साम्य’ हा शब्द लिहिला. आता तो खेळ ‘ दोन चित्रातील साम्य ओळखा ‘ असा गोमटा झाला होता. मुलीने हसुन तो खेळ सोडवायला घेतला. आईने मुलीला जवळ घेतले. 

दोन्ही चित्रे आता एक होऊन त्यातील फरक मिटला होता. आता त्यात राहिले होते ते फक्त आणि फक्त साम्य—आणि अमर्याद पॉझिटिव्हिटी.

लेखक – अनामिक.

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद– (ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ५ (इंद्र सूक्त)) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद– (ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ५  (इंद्र सूक्त)) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र : छंद – गायत्री

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री

आ त्वेता॒ नि षी॑द॒तेन्द्र॑म॒भि प्र गा॑यत । सखा॑य॒ स्तोम॑वाहसः ॥ १ ॥

या मित्रांनो या सखयांनो यज्ञवेदीला या

सारे मिळूनी गायन करु या सुस्वर लावू या

गायन अपुले सुरेन्द्रास या प्रसन्न करण्याला  

कृपा तयाची व्हावी म्हणुनी आर्त व्हावयाला ||१||

पु॒रू॒तमं॑ पुरू॒णामीशा॑नं॒ वार्या॑णाम् । इन्द्रं॒ सोमे॒ सचा॑ सु॒ते ॥ २ ॥

सुरेंद्र शीरोमणी श्रेष्ठतम त्यासी वंदन करा

अलोट संपत्तीचा स्वामी त्याचे चरण धरा 

होत्साता तो सिद्ध सोमरस सुरेंद्रस्तोत्र करा

आवर्जुनिया आर्त स्वराने त्या पाचारण करा ||२||

स घा॑ नो॒ योग॒ आ भु॑व॒त्स रा॒ये स पुरं॑ध्याम् । गम॒द्वाजे॑भि॒रा स नः॑ ॥ ३ ॥

या देवेंद्रा सामर्थ्यासह आम्हास दर्शन द्याया

आम्हा देखील तुम्हासारिख्या वैभवास द्याया

लाभ आमुचे सद्भावनिही तुमचा वास असो 

तुमच्या चरणी चित्त आमुचे सदैव लीन असो ||३||

यस्य॑ सं॒स्थे न वृ॒ण्वते॒ हरी॑ स॒मत्सु॒ शत्र॑वः । तस्मा॒ इन्द्रा॑य गायत ॥ ४ ॥

चंडप्रतापी देवेन्द्राशी रणी कोण भिडतो

सज्ज तयाच्या अश्वा पाहुन रिपुही भेदरतो

प्रसन्न करण्या सुरेन्द्रास या आर्त होऊनीया

सारे मिळूनी स्तवन करूया महिमा गाऊया ||४|| 

सु॒त॒पान्वे॑ सु॒ता इ॒मे शुच॑यो यन्ति वी॒तये॑ । सोमा॑सो॒ दध्या॑शिरः ॥ ५ ॥

ताज्या सोमरसात मधुर दह्यास मिसळूनी

पवित्र पावन सोमरसाचा हविर्भाग आणुनी

रुची द्यावया  देवेंद्राला त्यास सवे घेउनी

प्रसन्न करूया या इंद्राला सोमरसा अर्पुनी ||५||

त्वं सु॒तस्य॑ पी॒तये॑ स॒द्यो वृ॒द्धो अ॑जायथाः । इन्द्र॒ ज्यैष्ठ्या॑य सुक्रतो ॥ ६ ॥

राज्य कराया जगतावरती  चंडप्रतापी इंद्रा

सोमाच्या पानास्तव होशी प्रकट सिद्ध देवेंद्रा 

करून सोमाचा स्वीकार आम्हा उपकृत करी

सामर्थ्याने तुझिया देवा वसुंधरे सावरी ||६||

आ त्वा॑ विशन्त्वा॒शवः॒ सोमा॑स इन्द्र गिर्वणः । शं ते॑ सन्तु॒ प्रचे॑तसे ॥ ७ ॥

ज्ञानमंडिता हे शचिनाथा सोमरसा स्वीकारी

पान करुनिया या सोमाचे गात्रा मोद करी

वर्धन करिण्या उत्साहाचे तुझे स्तवन देवेंद्रा 

तव चित्ताला तव देहाला नंद देत हे इंद्रा ||७||

त्वां स्तोमा॑ अवीवृध॒न्त्वामु॒क्था श॑तक्रतो । त्वां व॑र्धन्तु नो॒ गिरः॑ ॥ ८ ॥

स्तवनांनी या तुझीच महती दाहिदिशा पसरली

तुझ्या स्तुतीने तुझीच कीर्ति वृद्धिंगत ती झाली

या स्तोत्रांनी तव महिमा बहु दिगंत तो व्हावा

प्रज्ञाशाली रे देवेन्द्रा सकला प्रसन्न व्हावा ||८||

अक्षि॑तोतिः सनेदि॒मं वाज॒मिन्द्रः॑ सह॒स्रिण॑म् । यस्मि॒न्विश्वा॑नि॒ पौंस्या॑ ॥ ९ ॥

अमोघ वज्रा हाती घेउन इंद्र ज्यास तारी

कोण असे या जगी पूत जो तयासिया मारी

सहस्र ऐरावताच्या बला आम्हासिया देई

सामर्थ्ये ज्या पराक्रमांचे कृत्य हातूनी होई ||९||

मा नो॒ मर्ता॑ अ॒भि द्रु॑हन्त॒नूना॑मिन्द्र गिर्वणः । ईशा॑नो यवया व॒धम् ॥ १० ॥

रक्ष रक्ष इंद्रा स्तवितो तुज तुझ्या चरणी येउनी

देहाला या अमुच्या पीडा देऊ शके ना कोणी

तव सामर्थ्ये राज्य पसरले तुझे त्रिभूवनी

वधू शके ना आम्हा कोणी ठेव अम्हा राखुनी ||१०||

YouTube Link:  https://youtu.be/aeFjHiFyKis

Attachments एरिया 

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 5 Marathi

Rugved Mandal 1 Sukta 5 Marathi

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रशियन कलाकारांची रामलीला… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ रशियन कलाकारांची रामलीला… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

1960 मध्ये रशियन कलाकार गेनाडी मिखाईलोविच पेचिन्कोव याने पहिल्यांदा प्रभू रामचंद्र साकारला आणि पुढे चाळीस वर्षं त्याने श्रीराम म्हणून रशिया व युरोपातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रशियात आणि जवळपासच्या देशांत रामायण पोचवण्याचं काम त्यांनी चोख बजावलं. भारत सरकारकडून २००६ मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं गेलं. २०१८ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

गेली काही वर्षं योगींचं भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अयोध्येतील दीपोत्सव आपल्या डोळ्यांचं पारणं फेडत आहे.  २०१८ मध्ये अयोध्येत पहिल्यांदाच रशियन कलाकारांनी रामलीला सादर केलेली आणि नंतर २०१९ च्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यात.

यंदाच्या दिवाळीत पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी २३ ऑक्टोबरला अयोध्येतील दीपोत्सवात भाग घेतला आणि रशियन कलाकारांनी साकारलेली रामलीला पाहिली.

मर्यादा पुरुषोत्तम राम साकारला आहे इल्दार खुस्नुलिस याने, तर सुकुमार सीतामाई आहे मिलाना बायचोनेक. अलेक्सेई फ्लेयिन्कव बंधुप्रेमामुळे रामचंद्राबरोबर गेलेला लक्ष्मण झाला आहे, ज्यांचा फोटो आपण येथे पहात आहोत. 

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गॉडविट…– लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ गॉडविट…– लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

काल हा फोटो बघितला आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या पुढे आपण काहीच नाही याची जाणीव झाली. 

गॉडविट (Godwit) जातीच्या पक्षाने नुकताच एक जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला. ५ महिन्यांच्या या पक्षाने १३ ऑक्टोबर २०२२ ला अलास्का इकडून उड्डाण भरलं. तब्बल ११ दिवस १ तासात त्याने १३५६० किलोमीटर अंतर कापून ऑस्ट्रेलियातील टास्मानिया इथे तो उतरला. या ११ दिवसात त्याचा सरासरी वेग होता ५१ किलोमीटर / तास. 

या संपूर्ण प्रवासात तो एकदाही झोपला नाही, त्याने काही खाल्लं नाही, त्याने पाणी प्यायलं नाही. तो फक्त उडत होता आपल्या लक्ष्याकडे. अलास्कामध्ये त्याच्या पाठीवर बसवण्यात आलेल्या ५ ग्रॅमच्या सॅटलाईट चिपने त्याच्या या संपूर्ण प्रवासाची नोंद केली आहे. त्याच्या नावावर हा जागतिक विक्रम नोंदला गेला आहे. 

गॉडविट नावाचे पक्षी स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे हवेतून तब्बल ८० किलोमीटर / तास वेगाने उडू शकतात. (उड्डाण करतात ग्लाइड न करता). तळ्याकाठी, मॅन्ग्रूव्हच्या जंगलात यांचं अस्तित्व दिसून येते. 

निसर्गाच्या या अदाकारीपुढे पुन्हा एकदा नतमस्तक झालो. सलग ११ दिवस असा पृथ्वीच्या दोन टोकांचा प्रवास महासागरावरून करणं ही नक्कीच अविश्वसनीय अशी घटना आहे. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अश्या घटना उजेडात येत असल्या तरी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी केलेला हा हजारो किलोमीटरचा प्रवास मला स्वतःला खूप शिकवून गेला.

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम्— श्री वासुदेवानंद सरस्वती — मराठी भावानुवाद☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ जयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम्— श्री वासुदेवानंद सरस्वती — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

जयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम्— श्री वासुदेवानंद सरस्वती 

मराठी भावानुवाद : जयलाभयशप्राप्ती स्त्रोत्र : डॉ. निशिकांत श्रोत्री 

श्रीगणेशाय नमः | श्रीसरस्वत्यै नमः| 

श्रीपादवल्लभ श्रीनृसिंहसरस्वती श्रीगुरुदत्तात्रेय नमः||

दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलम् ।

प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ १ ॥

दत्तात्रेया ब्रह्मरूपा वरदायी भक्तवत्सला

संकटहारी हे देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||१||

दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणम् ।

सर्वारक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ २ ॥  

दीनबंधू सिंधू कृपेचा कारण असशी विश्वाचा

सकल रक्षका हे  देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||२||

शरणागतदीनार्तपरित्राणपरायणम् ।

नारायणं विभुं वंदे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ३ ॥

शरणागत दीनांची पीडा निवारण तू करिशी

नारायणा श्रेष्ठ देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||३||

सर्वानर्थहरं देवं सर्वमंगलमंगलम् ।

सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तुगामी नोऽवतु ॥ ४ ॥

सकलानर्थ हरण कर्ता करिशी सर्व मंगला 

सर्वक्लेशनिवारकदेवा स्मरणसाक्षी नमन तुला ||४||

ब्रह्यण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनम् ।

भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ५ ॥  

तू तत्वज्ञ ब्रह्मज्ञानी वर्धिशी भक्तकीर्तिला 

भक्तकल्याणी हे देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||५||

शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः ।

तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ६ ॥

शोषणकर्ता पापांचा तू दीप तेजवी ज्ञानाचा 

तापशामक हे देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||६||  

सर्वरोगप्रशनम् सर्वपीडा निवारणम् ।

आपदुद्धरणं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ७ ॥

शमवुनी सर्व रोगांना सकल पीडा निवारिल्या

अरिष्टोद्धारक हे  देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||७||

जन्मसंसारबन्धघ्नं स्वरुपानंददायकम् ।

निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ८ ॥

जननमरण बंधघ्न चिदानंद मोक्षदायका

दिव्योद्धारा हे देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||८||

जयलाभयशःकाम-दातुर्दत्तस्य यः स्तवम् । 

भोगमोक्षप्रदस्येमं प्रपठेत्स कृती भवेत् ॥ ९ ॥

दत्तस्तोत्र हे पवित्र जयलाभ नि यशकीर्ती

स्तवन श्रवण करी त्यासी लाभे भोगासवे मुक्ती ||९||

*****

॥ इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं जयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम् संपूर्णम् ॥   

||इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती रचित निशिकांत भावानुवादित जयलाभयशप्राप्ती स्त्रोत्र संपूर्ण||

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

मो. ९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “श्री सुधांशु मनी”… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनु ष्य ?

☆ “श्री सुधांशु मनी”… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

सुमारे ६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , २०१६ची.

रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे. पेशाने इंजीनियर होते. त्यांच्या रिटायरमेंटला केवळ  दोन वर्षे  बाकी होती. सहसा रिटायरमेंटच्या वेळीजेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्‍याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे. पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी की कर्मचार्‍याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्‍यानेने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.

ICF म्हणजे Integral Coach Factory, रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना.

 रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, काय करणार?

ते इंजीनियर म्हणाले, “ आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे.” —–

–ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी १८० किमी धावणारी Spanish Talgo कंपनीच्या डब्यांची चाचणी सुरू होती.

चाचणी सफल होती.. पण ती कंपनी १० डब्यांच्या गाडीसाठी सुमारे २५० कोटी रुपये मागत होती. शिवाय तंत्रज्ञान देण्याचा करारही करत नव्हती. 

अशा परिस्थितीत या इंजीनियरने संकल्प केला की ‘ आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.’ 

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले, “Are You Sure, We Can Do It ?” 

उत्तर होते… “Yes Sir! “ 

“ किती पैसे लागतील R&D साठी ?” —- “ फक्त १०० कोटी रु सर!” 

रेल्वेने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.

त्या अधिकार्‍याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले. 

दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर  जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले, त्याला आपण ट्रेन १८– म्हणजेच “ वन्दे भारत रॅक” नावाने ओळखतो.

आणि ठाऊक आहे या १८ डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला? केवळ ९७ कोटी ! जेव्हा की Talgo केवळ १० डब्यांच्या ट्रेनचे २५० कोटी मागत होती.

ट्रेन १८ हा भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हिरा आहे.

या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे की, या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण हिचा प्रत्येक डबा स्वतःच  ‘ सेल्फ प्रोपेल्ड ‘ आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.

दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक, वन्दे भारत ट्रेन या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.

या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे सुधांशु मनी. २०१८ मध्येच हे निवृत्त झाले.

या देशात ट्रेन-१८ च्या यशासाठी कुणी या टीमचे कौतुक तर केले नाहीच, परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा वन्दे भारत म्हशीला धडकली आणि तिचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला, तेव्हा सर्व वामपंथी आणि देशद्रोही ट्रेनच्या अपयशाच्या नावाने शंख करायला लागले, तेव्हा सुधांशु सरांना दु:ख झाले. आणि त्यांनी एक लेख लिहून त्या ट्रेनच्या डिझाईनची वैशिष्ठ्ये सांगितली…

श्री. मनी  सेवानिवृत्त होऊन सध्या लखनऊला रहात आहेत.

 संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares