मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 258 ☆ एक उनाड दिवस… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 258 ?

☆ एक उनाड दिवस… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

वयाच्या या टप्प्यावर…

वाटते फिरता येईल तोवर,

मुक्त फिरून घ्यावे,

सुख घ्यावे आणिक द्यावे !

 *

सोबती असाव्या—

आमच्याच पोरी बाळी,

आधारासाठी लागलाच जर,

हात द्यावा त्यांनी ऐनवेळी!

 *

प्रत्येक पिढीचे असते,

जगणे निश्चितच वेगळे

साधावा संवाद तरूणाईशी,

सांगावे शल्य मनीचे सगळे !

 *

 आजचा दिवस असाच,

उनाड होता—-

मस्त रेस्टॉरंट मधे भेटलो,

रुचकर जेवणासह, बोललो !

 *

अख्खा दिवस बरोबर असता,

 आलेली मरगळ गेली निघून

सऱ्याजणींच्या मनी आता

पुनर्भेटीची मंजुळ धून !

 *

या उनाड दिवसाने

सांगितले बरेच काही,

आला क्षण मस्त मानावा

उद्याचे काय? माहित नाही !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंदाचे शिंपण… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ आनंदाचे शिंपण ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त कविता)

 ☆

माझे जीवनगाणे गमते

तृप्त मनाचे गायन मजला

मागे वळुनी पाहता दिसे

मळा समाधानाचा फुलला ||

 *

संसार करावा निगुतीने

नाती जपावी आत्मियतेने

कर्म चांगले सत्शील वृत्ती

समाजसेवा ध्यास मनाने ||

 *

वृथा कुणाला ना हिणवावे

उगा कुणाला ना दुखवावे

प्रेमभराने जीव लावुनी

स्नेहबंधही घट्ट करावे ||

 *

अहंकार कर्मास नासवी

अभिमान स्नेहास संपवी

तरतम भावा जाणुनिया

विवेकपूर्णा कृती असावी ||

 *

आला क्षण आपुल्याच हाती

मनमुक्त जगावे आनंदाने

आनंद वाटावा सकलांना

हसतमुखाने शुद्ध मनाने ||

 *

मायबाप हृदयी पूजिता

त्यांची शिकवण आचरते

असेच माझे जीवनगाणे

आनंदाचे शिंपण करते ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आरसा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

आरसा ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

करता उगी कशाला बदनाम आरश्याला

बघण्यास रूप तुमचे त्याचा गुलाम झाला

 *

पाहून आरश्याला हुरळू नका गड्यांनो

तुमचेच रूप असली तो दावतो तुम्हाला

 *

माणूस माणसाला अंदाज देत नाही

होतो तयार नकली नात्यात बांधण्याला

 *

सत्यास शोधण्याची आहेत कारणे ही

बाजार माणसांचा विकतोय माणसाला

 *

आनंद वाटताना नव्हता विचार केला

फिरले नशीब उलटे भलताच काळ आला

 *

निरखून पाहताना मी आरश्यात थोडे

आत्मा कुठे दिसेना मुखडा मलूल झाला

 *

आभार मानताना तो आरसा म्हणाला

तुमच्याच वास्तवाला लपवू उगा कशाला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लोकशाहीचे स्तंभ… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ लोकशाहीचे स्तंभ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

(वनहारिणी – ८/८/८/८)

लोकशाहिला आधाराला

आहेत म्हणे चार स्तंभ हे

गोंधळ माजू नये म्हणोनी

असतात विधीकार स्तंभ हे

*

पळवाटांचा शोध लावती

त्यांना मोठा वचक बसावा

म्हणून येथे पोलीस रूपे

असती कार्यभार स्तंभ हे

*

ढासळू नये संसद अपुली

तोल उचलुनी सांभाळावा

यासाठी तर सुसज्ज असती

न्यायपालिका द्वार स्तंभ हे

*

पाय लंगडे तीन पाहता

चौथा आला आधाराला

सांभाळाया माध्यम म्हणजे

लेखणीचे प्रहार स्तंभ हे

*

कसले फसती पाय सदा हे

सत्तेला या सावरताना

बरेच पक्के हवे जनांचे

ऐक्याचे आधार स्तंभ हे

*

ताज घालण्या जनसत्तेला

सोनार कुशल तशीच जनता

निर्माणाला कारण बनले

सुवर्ण मंदिरकार स्तंभ हे

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सां ग ता ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ सां ग ता ! ⭐ श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

मन झाले मोरपीस

वाऱ्यासवे हले-डुले,

रांगोळी इंद्रधनुची

अंगा अंगात फुले !

*

 काय घडले कसे घडले

 माझे मला न कळले,

 धून ऐकून हरीची

 नसेल ना तें चळले ?

*

मनी झाली घालमेल

चुके पावलांचा ताल,

आर्त स्वर बासरीचा

करी हृदयी घाव खोल !

*

 झाले कावरी बावरी

 शोधले परस दारी,

 परि दिसे ना कुठेच

 मज नंदाचा मुरारी !

*

जादू अशी मुरलीची

वाट दावे मज वनीची,

दिसता मूर्ती हरीची

झाली सांगता विरहाची !

झाली सांगता विरहाची !

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दमलेला जीव… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ दमलेला जीव ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

भुकेला कोंडा 

निजेला धोंडा

ही म्हणही इथे

बघा मागेच पडते

*

कष्ट करोनी

दमल्यावरती

मिरची ढिगावर

झोप लागते

*

दमल्या जीवा

आग न होते तिखटपणाने

ठसकाही नाही लागत याला

श्वास उच्छश्वासाने

*
निवांत झोपी 

जाई ऐसा

गिरद्यावरती

राजा जैसा

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “प्रेषित…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “प्रेषित…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

प्रेषित निघून जातात कालातीत विचारांचे ठसे ठेवत.

आम्ही मात्र काळाच्या पडद्यावर रक्तलांच्छित ठसे ठेवतो.

*

ते सुळावर चढतात आमच्या कल्याणा साठी.

त्यांच्या विचारांना आम्ही सुळी देतो स्वार्थासाठी.

*

ते आपलाच क्रूस वागवतात खांद्यावर स्वतःच्याच.

आम्ही जबाबदारीचे ओझेही पेलत नाही स्वतःच्याच.

*

मृत्यूनंतरही ते पुन्हा प्रकटतात आमच्या भल्यासाठी.

मारेकरी मात्र सतत जन्म घेतात क्रौर्यासाठी.

*

एकदा क्रूरपणे त्यांना प्रत्यक्ष मारण्यासाठी,

 मग अधिक क्रूरपणे विचारांना मारण्यासाठी.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओढ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ ओढ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

संध्याकाळच्या वेळेस पक्ष्यांची माळ घरट्याकडे परतत होती,

दूरवर राहिलेल्या घरट्याला कवेत घेऊ पाहत होती.

चुकलेला, राहीलेला असेल मागे कोणी

म्हणाली, ” पुरे आता, फिरा माघारी, नका थांबू आणि,

*

अनुभवलेल्या गोष्टींचे भांडार होते तिच्यापाशी,

भविष्यासाठी असेच शिकणार होते ते प्रत्येक दिवशी.

अंगातला थकवा रात्रीच्या विसाव्याने घालवून,

प्रसन्न मनाने ते उदया परत उडणार होते आनंदून.

*

पण त्यासाठी आज घरी परतणे अनिवार्य होते,

काहींचे कुटुंब येण्याची त्यांच्या वाट पाहत होते,

सांगायचे होते काहींना आज त्यांनी काय पाहीले,

जे घरी राहून न गेलेल्यांचे अनुभवायचे राहीले.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “मन में है विश्वास” – लेखक : विश्वास नांगरे पाटील ☆ परिचय प्रा. भरत खैरकर ☆

प्रा. भरत खैरकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “मन में है विश्वास” – लेखक : विश्वास नांगरे पाटील ☆ परिचय प्रा. भरत खैरकर 

i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodr...

पुस्तक : “मन मे हैं विश्वास”

लेखक : विश्वास नांगरे पाटील

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे.

मूल्य – 300  रु

तरुणपण घोडचुकामधे, प्रौढत्व संघर्षात आणि म्हातारपण पश्चातापात जावू नये असं वाटत असेल तर बालपणापासूनच आयुष्याची इमारत उभारायला, मजबूत करायला सुरुवात झाली पाहिजे. न थांबता,न थकता, न हरता पेकाट मोडेपर्यंत व बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास केला पाहिजे. मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखात बळ निर्माण करण्याची लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची जिद्द व त्यासाठी अविरत संघर्ष करण्याची तयारी आजच्या तरुणांमध्ये असली पाहिजे. ज्या दिव्यांमध्ये खैरातीच तेल आहे, त्या दिव्याचा उजेडही मला नको अशी भावना त्यांच्या मनात हवी.

“अभ्यास करून मोठा साहेब हो.” असं सांगणार्‍या बाबांसाठी जिद्दीने पेटून उठलेला विश्वास पुढे मोठा पोलीस अधिकारी झाला. कोणतीही गोष्ट गुद्धयांनी नाही, मुद्दयाने सोडवायची शिकवण बालपणीच विश्वासला मिळाली होती. ‘ दुखायचं दुखतं कळ काढ ‘, निसर्ग सगळं काही वेळेत दुरुस्त करतो.

तारुण्याच्या काळात संपत्ती व सत्ता एकत्र आल्यावर अनर्थ घडू शकतात, म्हणून विद्यार्थ्याने अभ्यास काळात संयम, विवेक आणि धीर सोडू नये.

संपत्तीचा मोह आणि सत्तेचा माज कधीही चढू द्यायचा नाही ! ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे,देहामध्ये शक्ती आहे,मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीत विवेक आहे, हृदयामध्ये करूणा आहे, मातृभूमी वर प्रेम आहे, इंद्रीयांवर संयम आहे. माणूसपण स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे,इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचं बळ आहे, सिंहासारखा जो निर्भय आहे, ध्येय उच्च आहे. व्यसनमुक्त जीवन आहे, जीवनात शिस्त आहे,निती आहे, ज्याचे चारित्र्य शुद्ध आहे, असा आदर्श युवक स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला आहे. रस्ता कठीण असला तरी ध्येय गाठण्यासाठी हा एकच मार्ग आहे. ह्याच मार्गाने मनात दीर्घ “विश्वास” ठेवून जर एखादा युवक मार्गक्रमण करतो तर यश निश्चितच आहे.

काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. बचतीची व काटकसरीची सवय लहानपणापासून असणे चांगले आहे. वेगवेगळी आत्मचरित्रे वाचून आपला आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी तर त्यांचा गाव म्हणजे एक विद्यापीठच

असतं! जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट घेणार नाही, ही खूणगाठ मनाशी बांधणे गरजेचे आहे.

स्पर्धा परीक्षांबाबत कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता प्रत्येक क्षणाची,प्रत्येक कणाची आणि मनाची चाचणी घेणे गरजेचे आहे. पेनाने ” पेन” होईस्तोवर लिहिलं तर यश तुमचेच आहे. पराकोटीचा संयम आणि मनावर कठोर नियंत्रण ह्यामुळे कोणतेही यश आपण मिळवू शकतो,असा विश्वास लेखक या पुस्तकात मांडत आहे.

” इस दुनिया में आप किसलिए आए हो? ” ह्या प्रश्नाचं दिलेलं हे उत्तर मिळवण्यासाठी “मन में है विश्वास” हे पुस्तक वाचणे अत्यंत गरजेच आहे. जसं घोड्यावर मांड टाकली की स्वार किती दमाचाआहे हे कळतं. तसंच विद्यार्थ्यांचे असतं. त्याची बैठक किती आहे, ह्यावर त्याचं स्पर्धा परीक्षेचे यश अवलंबून असतं. आयत्या मिळालेल्या घबाडाला बळी पडायचं नाही, लढायचं, उठायचं, दोन द्यायचे,दोन घ्यायचे, तरच यश तुमचेच आहे. स्वतःच्या नजरेतून स्वतः कधी उतरायचं नाही हा गुरुमंत्र ह्या पुस्तकातून लेखकाने दिला आहे. प्रत्येक घरी हे पुस्तक असणं गरजेचे आहे.

परिचय –  प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 240 ☆ सौभाग्य कंकण..! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 240 – विजय साहित्य ?

☆ सौभाग्य कंकण..! ☆

(काव्यप्रकार अष्टाक्षरी.)

सौभाग्य कंकण,

संस्कारी बंधन.

हळव्या मनाचे,

सुरेल स्पंदन…! १

*

सौभाग्य भूषण,

पहिले‌ कंगण.

माहेरी सोडले,

वधुने अंगण…!२

*

सौभाग्य वायन ,

हातीचे कंकण.

मनाचे मनात,

संस्कारी रींगण..!३

*

सप्तरंगी चुडा,

हिरव्या मनात .

हिरवी बांगडी,

हिरव्या तनात…!४

*

प्रेमाचे प्रतीक,

लाल नी नारंगी .

जपावा संसार   ,

नानाविध अंगी..!५

*

निळाई ज्ञानाची,

पिवळा आनंदी.

सांगतो हिरवा,

रहावे स्वच्छंदी…!६

*

यशाचा केशरी ,

पांढरा पावन .

जांभळ्या रंगात,

आषाढ श्रावण..!७

*

वज्रचुडा हाती ,

स्वप्नांचे कोंदण.

माया ममतेचे,

जाहले गोंदण…!८

*

आयुष्य पतीचे ,

वाढवी कंगण.

जपते बांगडी,

नात्यांचे बंधन…!    ९

*

चांदीचे ऐश्वर्य,

सोन्याची समृद्धी.

मोत्यांची बांगडी ,

करी सौख्य वृद्धी..!१०

*

भरल्या करात,

वाजू दे कंकण ,

काचेची बांगडी,

संसारी पैंजण…!११

*

चुडा हा वधूचा,

हाती आलंकृत .

सासर माहेर ,

झाली सालंकृत..!१२

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares