मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पहिलं- श्रोत्यांनाही कविता आवडतात, हे त्यांच्या प्रतिसादावरून म्हणजे टाळ्यांवगैरे वरून कळत होतं. आता इथून पुढे – ) 

मी – पण काय ग, काव्यक्षेत्रात तू अशी स्थिरावली असताना, तू एकदम कविता करणं बंद कसं केलस?

उज्ज्वला – मी बंद केलं असं नाही, कविता माझ्या हातून निसटून गेली. माझं जसं गद्य लेखन वाढलं, ललित, वैचारिक लेख, व्यक्तिचित्रण , पुस्तकावरील अभिप्राय, तसतशी कविता माझ्यापासून दूर जाऊ लागली. मी १९७० मध्ये सांगलीला डी.एड. कॉलेजमध्ये नोकरीला लागले. कॉलेज मुलींचं, वसतिगृहयुक्त होतं. तिथे वेगवेगळ्या गावाहून, बर्या चशा खेड्यातून मुली राहायला यायच्या. त्या प्रत्येकीचे प्रश्न वेगळे, समस्या वेगळ्या, कथा-व्यथा वेगळ्या. त्यांच्या बोलण्यात मला कथांची बीजे दिसायची. पुढे मी कथा लिहायला लागले.

मी – कधीपासून बरं? आठवतय?

उज्ज्वला – साधारण १९७६पासून मी कथा लिहायला लागले. याशिवाय आसपास घेतलेल्या अनुभवातूंही मला कथाबीजे मिळाली आहेत.  मी तुला २-३ अनुभव सांगते. म्हणजे मी तिथे नोकरी करत नसते, तर तशा कथा माझ्याकडून लिहून झाल्या नसत्या असं मला तरी वाटतं.   मी – सांगच! नाही तरी मी तुला तुझ्या कथांबद्दल विचारणारच होते.

उज्ज्वला – आता साल माझ्या लक्षात नाही. आमच्या कोलेजमध्ये राधा नावाची मुलगी होती. ती पूर्व प्राथमिककडे होती. त्यावेळी शासनाने पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक असे २ भाग केलेले होते.

पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाडीचे आणि इ. १ ली ते ४ थी पर्यन्त शिकवणार्याा शिक्षिका तर प्राथमिक म्हणजे इ. १ली ते ७वी पर्यन्त शिकवणार्याण शिक्षिका. मुली म्हणायच्या डी.एड. झालं की राधाची नोकरी पक्की. ‘कसं काय?’ मी विचारलं. इतर मुलींच्या बोलण्यातून कळलं, तिच्या गावात बालवाडी आहे. एक बाई त्या चालवतात. पण त्या ट्रेंड नाहीत. त्यामुळे सरकारी अनुदान नाही. तिढा खराच होता.  राधाचे सासरे सरपंच आहेत. त्यामुळी राधाची नोकरी नक्की. माझं मन मात्र  तिच्यापाशी रेंगाळत होतं, जी आजूनपर्यंत तिथली बालवाडी चालवते आहे.   राधा डी.एड. झाली की तिला शाळेत शिक्षिकेची नेमणूक द्यायची, म्हणजे शाळेला सरकारी अनुदान चालू होईल. शाळेच्या विकासासाठी अनुदान आवश्यकच होतं. पण, जिने ३-४ वर्षं काटकसरीत आणि कमी पगारात शाळा चालवली होती, तिचं काय?  त्यातून माझी ‘पायाचा दगड’ ही कथा लिहिली गेली. मराठी आणि हिन्दी दोन्ही भाषांच्या वाचकांना ती आवडली.

मी – खरं म्हणजे याच सुमाराला तू मुलांसाठीही कथा लिहिल्यास नाही का?

उज्ज्वला – हो. त्यालाही एक कारण झालं. शासनाच्या लघुशोध प्रकल्पाच्या माहितीचं एक सर्क्युलर आलं होता. त्यात एक विषय होता, किशोर मासिकाच्या ५ वर्षांचा अभ्यास व सुधारणेसाठी शिफारसी. विषय छान होता. किशोरचे ६० अंक वाचून होणार होते. म्हणून मी हा प्रकल्प निवडला. तो वर्षभरात पूर्ण केला. तो करता करता मुलांसाठी गोष्टी लिहायला मला सुचल्या. तसंच आणखी एक गोष्ट दिसली. मुलांसाठी लिहीलेल्या नाटिका कमी आहेत. मग मी नाटिकाही लिहिल्या. माझी नाटीकांची ५ पुस्तके झाली. त्यापैकी गवत फूल गात राहिलेला बाल कुमार साहित्य संमेलनाचा पुरस्कार मिळाला.

मी – तुझी एकूण बलवाङ्मायाची किती पुस्तके झाली आणि पुरस्कार कुणाला मिळाले? माझी बालवाङ्मयाची ३०-३२ पुस्तके झाली. दोन दोन आवृत्याही निघाल्या. त्यात कथा, नाटिका, चरित्र, भौगोलिक , कादंबरी, कविता सगळ्या प्रकारची आहेत. त्यात ‘गरगर गिरकी ‘ या कविता संग्रहाला साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा व ‘बदकाचे बूट’ ला बाल कुमार साहित्य संमेलनाचा आणि द्क्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार मिळाला.

मी – डी.एड.ल असताना एका संस्थाभेटीतूनही तू कथा लिहिली होतीस, नाही का?

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिलं – त्यात उत्स्फूर्तता अशी फारशी नसायची. फार गंभीरपणे आम्ही तिकडे बघतही नव्हतो. आता इथून पुढे-)

उज्ज्वला – तरीही काही बर्या  कविता त्यावेळीही माझ्याकडून लिहिल्या गेल्या. मी एस. वाय. बी.ए. ला असताना कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा कविता संग्रह काढायचा ठरला. ‘शिल्प’ नावाने तो निघालादेखील त्यात माझी ‘बंधन ‘ही कविता निवडली गेली होती. एव्हाना चांगली कविता आणि वाईट कविता याबद्दलची माझी समाज काहीशी वाढली होती.

मी – त्यावेळी मासिकातूनही तू कविता पाठवायचीस ना!

उज्ज्वला- हो. चांगली लिहून झालीय असं वाटलं तर पाठवायची. ‘माणूस’ म्हणून पाक्षिक तेव्हा निघायचं. त्यात मी कविता पाठवायची आणि समोरच्याच पानावर गोपीनाथ तळवलकर यांनी कवितेचा आस्वाद घेतलेलं लेखन असायचं. माझ्या कवितांचं त्यांनी खूप कौतुक केलं होतं. तिथे पाठवलेल्या कवितांच्या संदर्भात एक मजेशीर आठवण आहे.

मी – कोणती ग?

उज्ज्वला – ‘धुंद धुक्यातील अशा पहाटे’ अशी एक कविता मी पाठवली होती. लहानशीच कविता. कवी वामन देशपांडे  यांना ती इतकी आवडली होती की त्यांची पाठ झाली. पुढे योगायोगाने त्यांची ओळख झाली स्नेह संबंध जुळले. एकदा अशीच काही मंडळी जमली होती. एकमेकांना कविता वाचून दाखवत होतो. मी ती कविता वाचली. ते म्हणाले, ‘ही कविता तुमची नाही.’ मी म्हंटलं ‘का माझीच आहे.’ ते म्हणाले ‘ही कविता मी कुठे तरी मासिकात वाचलीय. मी म्हंटलं, ‘माणूस’ मध्ये पाठवली होती. तीच तुम्ही वाचली असेल. तर त्यांचं म्हणणं असं की खाली कवायत्रीचं नाव वेगळं होतं.’ मी म्हंटलं, ‘असणारच. कारण मी ती लग्नापूर्वी लिहिलेली व पाठवलेली कविता होती. त्यावेळी मी उज्ज्वला केळकर नसून कुमुदिनी आपटे होते.’ तेव्हा कुठे त्यांची खात्री पटली, कविता माझीच होती म्हणून. यानंतर पुन्हा जेव्हा जेव्हा भेट होईल, तेव्हा या कवितेची आठवण काढून आम्ही खळखळून हसतो.

मी – पण आपण केलेली कविता कुणाला तरी आवडते, लक्षात ठेवावीशी वाटते, ही गोष्टदेखील आनंददायक आणि प्रेरणादायक होती, नाही का?

उज्ज्वला – हो नक्कीच

मी – मग पुढे?

उज्ज्वला – पुढे काय? चार-चौघींसारखं लग्न झालं. मी संसाराला लागले.  कविता  करण्यापेक्षा कविता  जगायला लागले. कवितेचा प्रवाह नव्हे, थेंबुटे ओंजळित येऊ लागले. या मधल्या काळात चांगल्या कवींच्या खूप चांगल्या कविता वाचल्या. चांगली कविता म्हणजे काय, हे मनात स्पष्ट झालं. 

या काळात, उमेद वाढवणारी आणखी एक घटना घडली. किर्लोस्करने जिल्हावार नवनवोन्मेषांचा शोध घेण्यासाठी एक उपक्रम राबवायचे ठरवले. जिल्हावार कविसंमेलने घ्यायची. त्याची जबाबदारी एखाद्या स्थानिक संस्थेकडे द्यायची. त्यांनी कविता मागवायच्या निवडायच्या व तेवढ्याच कविता संमेलनात वाचायच्या. दोन दोन कविता मागवल्या होत्या. संमेलनाचे वेळी किर्लोस्करचे संपादक कुणा तरी मोठ्या कवींना घेऊन येणार होते. तिथे वाचल्या गेलेल्या कवितांपैकी ७ कविता किर्लोस्करमध्ये छापण्यासाठी निवडल्या जाणार होत्या. सांगलीत एकूण 300 कविता आल्या, असे प्रस्ताविकातून कळले. त्यापैकी संमेलनात वाचायला 30 कविता निवडल्या होत्या. त्यापैकी ‘जन्म आणि ‘पेपर’ आशा माझ्या 2 कविता वाचायला निवडल्या गेल्या. त्यापैकी ‘पेपर’ ही कविता त्यांनी किर्लोस्करमध्ये छापण्यासाठी निवडली. त्यानंतर संपादक ह. मो. मराठे यांचे पत्र आले, ‘पेपर’मध्ये कथेचे बीज आहे. तुम्ही परवानगी देत असाल, तर त्यावर मी कथा लिहीन.‘ मी नकार देण्याचं काही कारणच नव्हतं. एक मोठा कथाकार माझ्या कवितेवर कथा लिहितो, म्हंटल्यावर मी हुरळूनच गेले. पुढे त्यांनी कथा लिहिली. ती प्रसिद्धही झाली, पण मला वाचायला मिळाली नाही. त्यानंतर दुसरी ‘जन्म ‘ही कविता मी ‘स्त्री’मध्ये पाठवली. तीही छापूनही आली.

या सगळ्या गोष्टींमुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला. आपण लिहितो, ते लोकांना आवडतं, हे नक्कीच प्रेरणादायी होतं. त्या काळात अनेक वेळा कविसंमेलने होत आणि मी बहुतेक ठिकाणी हजर राहत असे. श्रोत्यांनाही कविता आवडतात, हे त्यांच्या प्रतिसादावरून म्हणजे टाळ्यांवगैरे वरून कळत होतं. 

क्रमश:….

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मी – का ग, आज गप्पगप्पशी आहेस आणि जरा गंभीर दिसतियस.

उज्ज्वला – मी? नाही बाई!

मी – खरं म्हणजे तू खुशीत असायला हवस. नुकतीच तुझी २ पुस्तके प्रकाशित झालीत. ‘कृष्णस्पर्श ‘ रिप्रिंट झालय आणि एवढ्यातच आणखीही २ पुस्तके येणार आहेत. 

उज्ज्वला – तशी खुशीतच आहे मी. पाचा उत्तराची कहाणी हे माझ्या स्वत:च्या कथांचं पुस्तक आलय. आनुवादीत नव्हे. दुसरं मात्र अनुवादीत आहे. प्रातींनिधिक पंजाबी लघुकथा. अरिहंत प्रकाशनाने ही छापलीत.

मी –आणि येणार्याल पुस्तकात तुझ्या टोरॅंटोच्या मैत्रिणीचा पुस्तक आहे. तू पण खूश. ती पण खूश.

उज्ज्वला- होय. हंसा दीप तिचं नाव. या चार-पाच वर्षातलीच तिची नि माझी ओळख. तीही ई-मेल, फोनद्वारेच आणि मुख्य म्हणजे लेखनातून पण ती माझी अगदी सख्खी मैत्रीण झालीय. तिच्या कथांचा अनुवाद ‘आणि शेवटी तात्पर्य’ म्हणून येतोय. छान, खुसखुशीत आणि वास्तववादी कथा आहेत तिच्या. माझ्यापेक्षा तीच जास्त उत्सुक आणि अधीर झाली आहे पुस्तक बघायला.

मी  – मला वाटतं , नवदुर्गा काढतेय हे पुस्तक.

उज्ज्वला-  बरोबर आहे. याबरोबरच गौतम राजऋषी यांच्या कथांचा ‘हिरव्या हास्याचा कोलाज’ हेही पुस्तक येतय. अगदी वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे हे. लेखक स्वत: मिल्ट्रीमध्ये कर्नल आहेत. युद्धाचा अनुभव घेतलेले आहेत. त्यांचं पोस्टिंग बव्हंशी काश्मीर घाटी, पीरपंजालची पहाडी,  संरक्षण रेषेच्या जवळपासची ठाणी इ. ठिकाणी झालय. तिथलं वातावरण, तिथल्या सैनिकांचं आणि लोकांचं जीवन आणि मानसिकताही, या पार्श्वभूमीवरच्या त्यांच्या कथा आहेत. अगदी वेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. या पुस्तकाचं खूप चांगलं स्वागत होईल असं मला वाटतं.

मी –मग असं असताना तू इतकी गंभीर का?

उज्ज्वला – सहज मनात येतय, आपल्या लेखनप्रवासाचा मागोवा घ्यावा. खरं म्हणजे लेखिका व्हायचं मी काही लहानपणापासून ठरवलं नव्हतं. 

मी – पण मला वाटतं, तू लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासून कविता करतेस.  उज्ज्वला- हो. पण माझी पहिली कविता मात्र फुकटच गेली. म्हणजे गंमतच झाली तिच्याबाबतीत.

मी – काय झालं ग?

उज्ज्वला – अग, मी ८ वीत होते तेव्हा गोवा मुक्तिसंग्रामाचा लढा जोरात चालू होता. त्यातले एक मुख्य सेनानी हेमंत सोमण. एकदा शाळेत बातमी आली, हेमंत सोमणांनी तिरंगा फडकावला आणि पोर्तुगीजांनी त्यांना गोळी मारली. त्यांचा बळी गेला. बातमी ऐकली आणि मी उत्स्फूर्तपणे लिहिलं,

‘हेमंत सोमणांनी गोव्यात झेंडा रोविला

तडतडा तडकले पोर्तुगीज झेंडा त्यांनी पाहिला ‘

इथून मग त्यांच्या बलिदानाशी कविता येऊन थांबली. दुसर्याी दिवशी बातमी आली, की हेमंत सोमणांना गोळी नाही मारली. पकडून तुरुंगात टाकलं. मग माझ्या कवितेला काहीच अर्थ उरला नाही. अर्थात माझी कविता फुकट गेली याचं मात्र मला मुळीच वाईट वाटलं नाही. हेमंत सोमण वाचले, हे महत्वाचं.

मी- आणखीही काही कविता तू लिहिल्या होत्यास ना शाळेत?  

उज्ज्वला – चार-पाच वेळा काही तरी चाल मनात सुचली, ती गुणगुणताना त्यावर शब्द सुचत गेले.

मी- आठवते तुला त्यातलं काही?

उज्ज्वला- दोन ओळीच आठवताहेत. एक चाल गुणगुणताना  लिहिलं होतं,

‘ संध्यारजनी आली आली

     गाई – वासरे घरा परतली.’  बाकी काही आठवत नाही. म्हणजे ते सगळं तितकं महत्वाचं नव्हतंच.

मी – कॉलेजला गेल्यावर तुझ्या कविता लेखनाला बहार आला होता, नाही का?

उज्ज्वला- बहार वगैरे असा नाही पण कविता करणार्याा आणि मुख्य म्हणजे कवितेवर प्रेम    करणार्या– मैत्रिणी मिळाल्या. हिने काल कविता लिहिली, आपण का नाही? आशा इरिशिरीने कविता लिहिल्या तेव्हा. त्यात हौसेचा, अनुकरणाचा भाग जास्त होता. मौलिकता कमीच. तो काळ रोमॅंटिक होता. प्रेम या कल्पनेवरच प्रेम होतं तेव्हा. त्यामुळे प्रेमावर त्याहीपेक्षा वियोगावर कविता जास्त लिहिल्या गेल्या. काव्यबहरातला बराचसा बहर या स्वरूपाचा होता. त्यात उत्स्फूर्तता अशी फारशी नसायची. फार गंभीरपणे आम्ही तिकडे बघतही नव्हतो.

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 146 ☆ जीवन यात्रा – श्री सुशील सिद्धार्थ, एक  व्यंग्यकार, समीक्षक, संपादक और सहज इंसान ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है। )

आज प्रस्तुत है  आपका एक आलेख  श्री सुशील सिद्धार्थ, एक  व्यंग्यकार, समीक्षक, संपादक और सहज इंसान

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 146 ☆

? जीवन यात्रा – श्री सुशील सिद्धार्थ, एक  व्यंग्यकार, समीक्षक, संपादक और सहज इंसान ?

किसी भी कवि लेखक या व्यंग्यकार की रचनाओ में उसके अनुभवो की अभिव्यक्ति होती ही है.  रचनाकार का अनुभव संसार जितना विशद होता है, उसकी रचनाओ में

उतनी अधिक विविधता और परिपक्वता देकने को मिलती है. जितने ज्यादा संघर्ष रचनाकार ने जीवन में किये होते हैं उतनी व्यापक करुणा उसकी कविता में परिलक्षित होती है , कहानी और आलेखो में दृश्य वर्णन की वास्तविकता भी रचनाकार की स्वयं या अपने परिवेश के जीवन से तादात्म्य की क्षमता पर निर्भर होते हैं. रोजमर्रा  की दिल को  चोटिल कर देने वाली घटनायें व्यंग्यकार के तंज को जन्म देती हैं.

श्री सुशील अग्निहोत्री एक प्राध्यापक के पुत्र थे. अध्ययन में अव्वल. हिन्दी में उन्होने पी एच डी की उपाधि गोल्ड मेडल के साथ अर्जित की. स्वाभाविक था कि विश्वविद्यालय में ही वे शिक्षण कार्य से जुड़ जाते. पर  नियति को उन्हें  अनुभव के विविध संसार से गुजारना था. सुप्रतिष्ठित नामो के आवरण के अंदर के यथार्थ चेहरो से सुपरिचित करवाकर उनके व्यंग्यकार को मुखर करना था. आज तो अंतरजातीय विवाह बहुत आम हो चुके हैं किन्तु पिछली सदी के अतिम दशक में जब सिद्धार्थ जी युवा थे यह बहुत आसान नही होता था. सुशील जी को विविध अनुभवो से सराबोर लेखक संपादक समीक्षक बनाने में उनके  अंतरजातीय प्रेम विवाह का बहुत बड़ा हाथ रहा. इसके चलते उन्होने विवाह के एक ऐसे प्रस्ताव को मना कर दिया, जिसके परिणाम स्वरूप उन्हें विश्वविद्यालयीन शिक्षण कार्य की नौकरी नही मिल सकी, और वे फ्रीलांसर लेखक बन गये. स्थायित्व के अभाव में वे लखनऊ, मुम्बई, वर्धा, दिल्ली में कई संस्थाओ और कई व्यक्तियो के लिये अखबार, पत्रिकाओ, शिक्षण संस्थाओ, प्रकाशन संस्थानो के लिये लेखन कर्म से जुड़े तरह तरह के कार्य करते रहे.

प्रारंभ में वे लखनऊ से अवधी में अधिक लिखते रहे. तभी उनके दो अवधी कविता संग्रह आये जिसके लिये उन्हें उत्तरप्रदेश हिंदी संस्थान से नामित पुरस्कार मिले.

 

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? आत्मसंवाद – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ?

(रेडिओवरील व मंडळांमधील भाषणांसंबंधी सांगितले.)

“कवितेच्या प्रांतात कधी शिरली नाहीस का?”

“जवळ जवळ नाहीच. माझी ‘चारधाम’वरील कविता आणि ‘झोपाळा’ ही कविता प्रसिद्ध झाली . बाकी बऱ्याच कविता या प्रसंगानुरूप केलेल्या होत्या. कुणाच्या लग्नाचा वाढदिवस, साठावा किंवा ८० वा वाढदिवस वगैरे. अशा कविता मी सांभाळून ठेवल्या नाहीत. कारण त्या कविता त्या प्रसंगापुरत्याच असतात.”

“बरोबर. लेखनामुळे आलेले आणखी काही विशेष वेगळे अनुभव सांगतेस का?”

“हो. आठवतील तसे सांगते. माझा रशियामधील पीटर्सबर्गवरील लेख प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण दोन महिन्यांनी मला रशियन कॉन्सुलेटमधून डॉक्टर सुनीती अशोक देशपांडे यांचा फोन आला. पीटर्सबर्गवरील माझ्या लेखात मी रशियन बॅलेबद्दल सविस्तर लिहिले होते. डॉक्टर देशपांडे यांनी त्या लेखातील बॅलेचा उल्लेख करून मला कॉन्सुलेटमधील ‘कल्चरल सेंटर ऑफ रशिया’ पेडर रोड इथे होणाऱ्या एका रशियन बॅले शोसाठी आमंत्रित केले. डॉक्टर देशपांडे यांच्यापर्यंत हा लेख कसा पोहोचला ते मला कळले नाही कारण बॅले शोसाठी आम्ही गेलो  त्यावेळी त्यांची भेट होऊ शकली नाही. आम्ही बॅले पाहून आणि  अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन परतलो.”

“अरे वा! छान संधी मिळाली.”

“माझा मोरोक्कोवरील लेख मानिनी दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांची ईमेल मला आली. त्यात त्यांनी लेख खूप आवडल्याचे व त्यांना मोरोक्को पहायची इच्छा होती पण जमले नाही. त्यामुळे या लेखातूनच मरोक्कोची भेट झाली असे कळविले होते.”

“मला आठवतं की तुला कौस्तुभ आमटे यांचीही एक मेल आली होती”.

“हो ना! तेव्हाही मला आनंद आश्चर्याचा  धक्का बसला होता. माझा ‘उरते फक्त आमसुलाची चटणी’ हा लोकसत्ता- चतुरंगमध्ये प्रकाशित झालेला ललित लेख वाचून  श्री कौस्तुभ प्रकाश आमटे यांनी आनंदवनहून लेख खूप आवडल्याची कौतुकाची ईमेल पाठविली होती.”

“छान! त्यांनी आवर्जून कळविले ही विशेष गोष्ट!”

“तसंच कौतुक मला डॉक्टर महेश करंदीकर यांचं वाटतं. डॉक्टर करंदीकर नाशिकरोडला त्यांच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये न्युरो सर्जन आहेत. पण त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून माझा लोकसत्तेत आलेला लेख वाचून आवडला तर आठवणीने फोन करतात. ‘आमसुलाच्या चटणीसाठी’ त्यांचाही फोन होताच!

“मला वाटतं माननीय सुरेश खरे यांनीसुद्धा तुझी पुस्तके वाचून तुला काही सूचना केल्या होत्या.”

“हो तर! शिवाय डॉक्टर शरद वर्दे, शुभदा चौकर ,जयप्रकाश प्रधान, धनश्री लेले,ठाण्याचे श्री शरद भाटे , शुभदा चंद्रचूड यांचेही कौतुक व मार्गदर्शन लाभले. रत्नागिरीपासून नागपूरपर्यंतच्या वाचकांनी खुशी पत्रे पाठवून,  किंवा फोन, ईमेल करून पसंतीची पावती दिली. या सर्वांमुळे मी लिहिती राहिले.

“चांगल्या झाल्या आपल्या गप्पा! आठवणींची उजळणी झाली. मी आता एकच प्रश्न विचारतो. प्रवासाच्या आवडीमुळे भरपूर विमान प्रवास झाला. कधीच काही अडचण आली नाही का?”

“एक अविस्मरणीय प्रसंग सांगते आणि आपण थांबू या.”

“चालेल”.

“ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडच्या प्रवासाहून मुंबईला परत येताना वाटेत बँकॉकला विमान बदलायचे होते. बँकॉकहून  दुसऱ्या विमानाने निघालो. पोटावर बांधलेले पट्टे अजून तसेच होते. विमान  आकाशात स्थिरावयाचे होते. तेवढ्यात उजवीकडील खिडक्यांच्या बाजूने, पुढपासून मागपर्यंत विजेची एक सळसळती रेषा सरकन गेली. ‘something wrong ‘असं मनात येईपर्यंत मागच्या बाजूचे लोक ‘फायर फायर ‘असं ओरडत पुढे येऊ लागले. आरडाओरडा, हुंदक्यांचे आवाज येऊ लागले. कॅप्टनने सर्वांना आपापल्या जागेवर पट्टे बांधून बसण्याची विनंती केली. सर्व क्रू मेम्बर्स, एअर होस्टेससुद्धा त्यांच्या जागेवर बसले. कॅप्टनने  घोषणा केली की, विमानाच्या एका इंजिनाला आग लागली होती. ती आता विझविण्यात आली आहे आणि विमान परत बँकॉक विमानतळावर नेण्यात येत आहे.

मी मधल्या रांगेत ,पुढून दुसऱ्या लाईनमध्ये कडेच्या सीटवर होते. तिथेच जवळ दरवाजाशी एक एअर होस्टेस कॅप्टनने सूचना केल्या प्रमाणे बसली होती. तिचं तोंड माझ्याकडे होतं. अगदीच पोरसवदा दिसत होती. नवीनच लग्न झालं असावं किंवा घरी लहान बाळ असावं. तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहत होतं. मी खुणेने तिला सांगितलं रडू नको आणि आकाशाकडे बोट दाखवून नमस्कार केला. खांद्यावर क्रॉस करून दाखवलं आणि म्हटलं God is great. Don’t weap .”

अशा परिस्थितीमध्ये विमानाचं जमिनीवर सुखरूप उतरणं हे महत्त्वाचं असतं. विमानाने नुकतेच उड्डाण केल्यामुळे ते फ्युएलने पूर्ण भरलेले होते. काहीही घडू शकत होते. कॅप्टनने अतिशय कौशल्याने विमान सुखरूप उतरविले. सर्वांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. ती एअर होस्टेस माझ्या जवळ आली आणि माझे हात हातात घेऊन,

‘Thank you very much, thank you very much’असे म्हणू लागली. मी तिला म्हटलं,’ अगं, मी तुझ्यापेक्षा जास्त घाबरले होते. (I was more afraid of than  you. Believe in God. He will take our care.)’

नंतर मनात आलं की मृत्यु समोर दिसल्यावर कोण घाबरणार नाही? पण काही प्रसंगच असे असतात की त्या वेळी आपण काहीसुद्धा करू शकत नाही. आपलं आयुष्य हा सुद्धा एक प्रवासच आहे. जीवनाच्या या प्रवासात कितीतरी वेळा आपल्याला प्रश्न पडतात की अरे, हे असं का झालं? अमुक एक घटना का घडली? पण अशा प्रश्नांना काहीही उत्तर नसतं. असे अनुत्तरित प्रश्‍न आणि अनपेक्षित घटना यांना बरोबर घेऊनच आपल्याला आयुष्याचा प्रवास करायचा असतो.

बँकॉकला विमान उतरल्यावर आमच्यासाठी चहा नाश्ता तयार होता. कोणाला घरी फोन करायचा असेल, ई-मेल करायची असेल तरी विनामूल्य सोय होती. तासाभरातच दुसऱ्या विमानाने आम्हाला घेऊन उड्डाण केलेसुद्धा आणि आश्चर्य म्हणजे त्याच एअर होस्टेस , पण नवीन ताजा आकर्षक युनिफॉर्म घालून हसर्‍या चेहर्‍याने आमचं स्वागत करीत होत्या.

अनुत्तरित  प्रश्न आणि अनपेक्षित घटना यांना गृहीत धरून आयुष्याचं असंच स्वागत करायला हवं, नाही का?”

भाग चार व आत्मसंवाद समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? आत्मसंवाद – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ?

(सिडनीमध्ये परदेशी स्त्रीकडून भारतीय पुरुषांची नक्कल)

“आणखी कुठच्या क्षेत्रात मुशाफिरी करायला मिळाली?”

“एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून ‘आकाशवाणी’ मुंबई, इथे प्रवासावरील दोन लेख लिहून पाठविले. काही दिवसांनी त्यांचे रेकॉर्डिंगसाठी बोलावणे आले तो एक वेगळाच अनुभव होता.”

” फक्त प्रवास वर्णनांचे  प्रसारण झाले की….”

‘ऑल इंडिया रिटायर्ड पर्सन्स असोसिएशन’ यांच्यातर्फे आनंदी वार्धक्य या कार्यक्रमात भाग घेता आला. तसेच आम्ही मैत्रिणींनी एकदा गाणी गोष्टी वेगळेअनुभव यांचा एक सुंदर गजरा आकाशवाणीवरून सादर केला. त्याचे लेखनही मीच केले होते.”

“याला श्रोत्यांचा प्रतिसाद मिळत होता का?”

“माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त! प्रथम मला वाटायचे की, या टीव्हीच्या जमान्यात रेडिओ कोण ऐकतो? पण तसं नाहीये . रेडिओचे कार्यक्रम नियमित ऐकणारे श्रोते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. माझे प्रवास लेख आवडल्याचे अनेकांनी आकाशवाणीवर कळविले. त्यामुळे मला अशा प्रकारचे दहा कार्यक्रम प्रसारित करायची संधी मिळाली.”

“मला आठवतं की तुझ्या “अन्नब्रह्म” या कार्यक्रमाला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला होता. काय सांगितलं होतंस तेंव्हा?

“जे जे देश बघितले तिथल्या हवामानानुसार ,पिकानुसार तिथे बनवले जाणारे विविध पदार्थ यात सांगितले होते. व्हिएतनाममध्ये तळ्यात उगवणाऱ्या गुलाबी कमळाच्या देठापासून फुलापर्यंत प्रत्येक भाग विविध पदार्थांमध्ये वापरला जातो तर कंबोडियामध्ये अननस, आंबा, फणस यांच्याबरोबरच खेकडे, कोळी यांचे वेफर्ससुद्धा मिळतात. तसंच आपल्या आदिवासींमध्ये लाल डोंगळ्यांची चटणी करून खाण्याची पद्धत आहे असा माहितीपूर्ण आणि मजेशीर विषय होता.”

” खरं आहे. अन्नब्रम्हाचा मार्ग ब्रह्मांडं व्यापणारा आहे. मला वाटतं एकदा  टीव्हीवर सुद्धा कार्यक्रम झाला”.

“हो ऑल इंडिया रिटायर्ड पर्सन्स’ असोसिएशनतर्फे मी व डॉक्टर आचरेकर यांच्याबरोबर ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न व त्यावरील उपाय यांची चर्चा झाली. तोही एक एक वेगळा अनुभव. तसंच  रविराज गंधे यांनी एकदा ‘अमृतवेल’ या त्यांच्या टीव्हीवरील कार्यक्रमात  माझ्या ‘देशोदेशींचे नभांगण’ या पुस्तकाचा परिचय करून दिला .”

“मला आठवतं की तू वेगवेगळ्या मंडळांमध्ये व्याख्यानासाठीसुद्धा जात होतीस”.

“हो. दादरपासून डहाणूपर्यंतच्या अनेक वनिता मंडळात व ज्येष्ठ नागरिक संघात वेगवेगळ्या विषयांवर भाषण करण्याची संधी मिळाली.”

“यात फक्त प्रवासातील अनुभव सांगितलेस की…..”

“प्रवासातील अनुभव  व इतर गमतीजमती तर सांगितल्याच.  एकदा दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर पालकांच्या भूमिकेतून बोलायला मिळाले. मातृदिनानिमित्त झाशीची राणी, जिजाबाईंपासून आधुनिक  स्त्रीपर्यंत विचार मांडले. रोटरी इंटरनॅशनल क्लबमध्ये ‘जर्नी ऑफ लाइफ’ यावर भाषण केले. स्त्री दिनानिमित्त ‘स्त्री ही सबलाच आहे’ या विषयावर बोलले. “

“अशा भाषणांसाठी वेगळा अभ्यास करावा लागला असेल ना?

“अशी माहिती जमवताना आपल्या ज्ञानात भर पडते. मुख्य प्रश्न असतो तो अभिव्यक्तीचा! समोरच्या श्रोत्यांना आपल्याला पहिल्या तीन-चार मिनिटातच आपल्या विषयाकडे आकर्षित करून घ्यावं लागतं आणि मग त्या विषयाचा विस्तार सहजपणे होतो.”

” म्हणून तर वक्तृत्व कला चौसष्ट कलांमध्ये समाविष्ट आहे”.

“कार्यक्रमांचे निवेदन करतानाही असाच अभ्यास करावा लागतो. गीतरामायण, पावसाळी गीते अशा काही कार्यक्रमांचे निवेदन केले. “

“निवेदनालाही भाषणासारखी तयारी करावी लागते का?”

“निवेदकाला प्रामुख्याने हे लक्षात ठेवावे लागते की निवेदकाचे काम हे फुलांच्या गजऱ्यामधल्या  दोऱ्यासारखे आहे. योग्य शब्दात  आधीच्या व पुढच्या गाण्याची जोड कुशलतेने करून द्यावी लागते.  कधी एखादी त्या गाण्यासंबंधी आठवण किंवा प्रसंग थोडक्यात सांगावा लागतो. “

“म्हणजे हा गाण्यांचा कार्यक्रम आहे.निवेदनाचा नाही हे लक्षात ठेवायचं.”

“बरोबर. अनेक वेळा महिला मंडळं, गणेश उत्सव यांच्यातर्फे घेतलेल्या स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा यासाठी परीक्षकाचे काम केले.” 

“म्हणजे तेंव्हा अगदी व्यस्त दिनक्रम होता म्हणायचा”.

“व्यस्त पण आवडीचा”. याच सुमारास “मराठी प्रवास वर्णन लेखक वाचक मंच” यांच्यातर्फे महिला दिनाला सन्मानपत्र मिळाले.”

“म्हणजे तुझ्या अनेक प्रांतातल्या मुशाफिरीची दखल घेतली गेली म्हणायची.”

 आत्मसंवाद भाग – ३ समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? आत्मसंवाद – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ?

(मैत्रिणीने माझ्यावर लेखनाची जबाबदारी टाकली.)

“पार पाडलीस का ही जबाबदारी?”

“हो तर! तिच्या फोननंतर डोक्यात विचारचक्र सुरू झालं. मनातलं कागदावर  उमटू लागलं. लेखन, पुनर्लेखन असं करता करता तो लेख विविध उदाहरणांनी सजवून झाला.”

“मला आठवतं की त्या लेखात तू अमृता प्रीतम यांच्या ‘चौथा कमरा’ या पुस्तकाचा उल्लेख केला होतास”.

“हो. ‘अमृता प्रीतम’ यांचा ‘चौथा कमरा’ डोळ्यापुढे ठेवून त्यादृष्टीने लेखाचा शेवट केला की प्रत्येक स्त्रीला तिची स्वतःची आवड जपण्याची संधी मिळाली पाहिजे. मग ती आवड कसलीही असो. गायन, वादन ,भजन, पत्ते खेळणे, नाटक सिनेमा पाहणे जे आवडत असेल त्या आनंदासाठी तिने स्वतःच स्वतःचा ‘चौथा कमरा’ निर्माण करणं आणि तो जपणं खूप गरजेचे आहे .”

“आवडला ना तो लेख संपादकांना?”

“हो.लेख प्रसिद्ध झाला आणि फोनचा पाऊस पडला. फक्त मनस्वीनीच नाही तर माझे इतर अनेक सुहृद,मित्र- मैत्रिणी आणि अनोळखी वाचक यांनी लेख आवडल्याचे फोनवरून, पत्रांतून कळवलं.  मला लेखनातला, प्रसिद्धीतला आनंद कळला आणि त्याची गोडी लागली.”

“लेखक ‘स्वान्त सुखाय’ लिहितो असं म्हणतात….. “

“असं कितीही म्हटलं तरी लेखकाला वाचकांच्या पसंतीची पावती लागतेच.

वाचकांच्या उत्साही प्रतिसादामुळे अनेक ललित लेख लिहून झाले .आजूबाजूला घडणाऱ्या लहान मोठ्या गोष्टी टिपून त्यावर तरंगणाऱ्या विचारलहरी आणि अनेक अनुभव सजगतेने टिपताना मनात उमटणार्‍या प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी ललित लेखनातून मिळाली.या ललित लेखनाला वर्तमानपत्रे मासिके आकाशवाणी यांच्यामुळे चांगली प्रसिद्धीही मिळाली.”

“लेखन सुरू होऊन साधारण किती वर्ष झाली असतील?”

“माझ्या लेखनाची डेक्कन क्वीन सुरू झाली त्याला आता १७ वर्षं झाली.””  “प्रवास वर्णनं लिहिण्याकडे जास्त कल आहे का?”

“हो. प्रवासाची आवड आम्हा दोघांनाही आहे. नोकरी करीत असताना भारत दर्शन केले. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर परदेश प्रवासाचा आनंद घेतला.”

” एखाद्या नावाजलेल्या टूरिस्ट कंपनीत पैसे भरायचे आणि प्रवासाला जायचे असा प्रवासाचा सोपा मार्ग स्वीकारला की……..”

“सुरवातीला प्रवासी कंपनीबरोबर जाणारे आम्ही, नंतर प्रवासी कंपनीकडून  फक्त बुकिंग करून घेऊन जाऊ लागलो. आमचा मित्र मैत्रिणींचा प्रवासाचा ग्रुप खूप छान आहे. सर्वांच्या उत्साहाने सहकार्याने अनेक देश बघण्याचे भाग्य लाभले.”

“मला आठवतं की जपानला तुम्ही एका स्नेह्याच्या घरी आठ दिवस राहून जपानमध्ये भरपूर फिरलात.”

“हो. ती एक चांगली संधी आम्हाला मिळाली. नाही तर जपान प्रवासी म्हणून फिरायला खूपच महाग आहे.परदेशात राहणाऱ्या मित्र-मैत्रिणी नातेवाईक यांचा आधार घेऊन काही देश बघितले. तर त्यानंतर इंटरनेटवरून युथ हॉस्टेलचे बुकिंग करून प्रवास करण्याचा यशस्वी प्रयोग केला.”

“अशा पद्धतीच्या प्रवासाची मजा वेगळीच! नाही का?

“नक्कीच! थोडीफार खटपट करावी लागली तरी असा प्रवास स्वस्त आणि मनासारखा होतो. वेगवेगळ्या अनुभवांनी आयुष्य समृद्ध बनतं.”

“खटपट म्हणजे—–“

” प्रवास सुरू करण्यापूर्वी ज्या देशाला भेट द्यायचे ठरविले आहे त्या देशाबद्दल सहा- सहा महिने आधी आमची चौकशी चालू होते. जगाच्या नकाशावरील त्या देशाचे भौगोलिक स्थान, हवामान, प्रेक्षणीय स्थळे, खर्चाचा अंदाज घेणे चालू असते. आम्हा सर्वांना स्थलदर्शनामध्ये विशेष रस आहे.  अनेक टुरिस्ट कंपन्यांकडून माहितीपत्रके मागवून, खर्च व स्थलदर्शन यांचा योग्य समन्वय साधून मग आम्ही  एका कंपनीकडून बुकिंग करून घेतो.”

“वा! छान आहे ही पद्धत .”

“आज इंटरनेटमुळे फारच चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत.शिवाय ज्या देशाला जायचे आहे त्या देशामध्ये आपल्या माहितीतले कुणी जाऊन आले आहे का याची चौकशी करून त्यांचे नाव, संपर्क नंबर मिळवून आम्ही त्यांच्याशी बोलतो. त्यामुळे त्यांचे अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी कळतात. अशा संपर्कांचा खूप फायदा होतो .”

“प्रवासाहून आल्यानंतर त्या त्या देशावर लेख लिहीत होतीस का?”

“हो. प्रवास करताना आपले कान, नाक, डोळे उघडे ठेवले की तिथल्या इतिहास-भूगोलाबरोबरच तिथली माणसे वाचण्याची सवय लागते. ते अनुभव लेखात उतरले की तो लेख जिवंत वाटतो.”

“त्या लेखांना प्रसिद्धी मिळाली ना?”

“अगदी चांगली प्रसिद्धी मिळाली. लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ, श्री दीपलक्ष्मी, विवेक, भटकंती, माहेर ,अथश्री, ब्रह्मवार्ता,  चारचौघी अशा अनेक ठिकाणी ललितलेख व प्रवास वर्णने प्रसिद्ध झाली.”   

“छान. मला वाटतं अनेक दिवाळी अंकातही…..”

“हो. मानिनी, अनुराधा, उत्तम कथा ,हेमांगी, गार्गी, विश्व भ्रमंती, मुशाफिरी अशा अनेक दिवाळी अंकात लेख प्रसिद्ध झाले”.

“लेख सहजपणे लिहून होतात की…..”

“माझ्या प्रत्येक लेखासाठी मी व्यवस्थित मेहनत घेते. लेख मनासारखा होईपर्यंत मी त्याचे पुनर्लेखन करते. लेख माहितीपूर्ण असतोच शिवाय त्याला इतिहास- भूगोल याबरोबरच वर्तमानाचे संदर्भही असतात.”

“खरं आहे. म्हणून तर एवढे वाचक आणि त्यांच्या लेख आवडल्याच्या प्रतिक्रिया  मिळाल्या. तुला एक विचारायचं होतं की,प्रवासाची इच्छा असली तरी तेवढंच पुरेसं आहे का?”

“नाही रे बाबा! घरातील सर्वांनी संपूर्ण सहकार्य केल्यामुळे प्रवासासाठी मानसिक बळ  मिळालं.  प्रवासाची इच्छा असली तरी आर्थिक पाठबळ महत्वाचं. आम्हा     दोघांनाही हे बळ आपापल्या नोकऱ्यांमधून मिळालं. एकदा प्रवासाची चटक लागली की मग इतर अनेक लहान- मोठ्या, अनावश्यक गरजांना मागे सारून प्रवास केला जातो. प्रकृतीची साथही तितकीच महत्त्वाची.”

“अगदी बरोबर”. या प्रवास लेखांना पुस्तक स्वरूप देता आलं का?”

“भारतातील व परदेशातील प्रवासाचे  तीस-पस्तीस लेख प्रसिद्ध झाले तरी त्यांचे पुस्तक करण्याचा विचार केला नव्हता. माझ्या मैत्रिणीच्या- शोभाच्या पाठपुराव्यामुळे तीन-चार प्रकाशकांना फोन केला. त्यांनी सांगितलेला खर्चाचा आकडा ऐकून गप्पच बसले.”

“बापरे. मग पुस्तक प्रसिद्ध कसं झालं?”

“विजय खाडिलकर या आमच्या सुहृदांच्या सांगण्यावरून ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’कडे माझे परदेश प्रवासावरील लेख ‘देशोदेशींचे नभांगण’ हे नाव देऊन पाठविले. एका वर्षानंतर पुस्तक स्वीकृत झाले पुण्याच्या ‘गमभन प्रकाशन’ यांनी ते अतिशय दर्जेदार स्वरूपात प्रसिद्ध केले. या पुस्तकाला माननीय यशवंतराव चव्हाण पारितोषिक मिळाले.”

“शाब्बास! आणि भारतातील प्रवासाचे लेख…….”

“ते लेख मी पुण्याच्या ‘उत्कर्ष प्रकाशन’ यांच्याकडे पाठवले. त्यांना आवडले . त्यांनी ते प्रवास लेख ‘चला आसाम पासून अंदमान पर्यंत’ या नावाने प्रसिद्ध केले.

“एवढ्या प्रवासामध्ये अनेक अनुभव आले असतील ना?”

“भरपूर अनुभवांचं गाठोडं जमलं आहे”.

“त्यातला एखादा मजेशीर अनुभव सांगतेस का?”

“ऑस्ट्रेलियाच्या प्रवासासाठी आम्ही  इंटरनेटवरून मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन अशा तीन ठिकाणी युथ होस्टेलमध्ये राहण्यासाठी बुकिंग केलं होतं. सिडनीचं युथ होस्टेल खूप मोठं होतं. तिथे जगभराच्या प्रवाशांची सतत ये-जा चालली होती. “

“युथ होस्टेलमध्ये सर्वांना राहता येतं का? तिथे सोयी वगैरे कशा असतात?”

“युथ हॉस्टेल ही परदेशामध्ये राहण्याची एक अतिशय स्वस्त आणि सुंदर सोय आहे. युथ होस्टेलच्या मेंबरशिपला वयाची अट नसते. सिडनीला आम्ही दोघा- दोघांच्या रुम्स घेतल्या होत्या. छोट्याशा स्वच्छ खोलीत, एकावर एक दोन बंकर बेड (टू टायर थ्रू ट्रेनमध्ये असतात तसे), आणि सामान ठेवायला थोडी जागा होती.”

“आणि टॉयलेट वगैरे?”

“बाथरूमस् आणि टॉयलेटस्  कॉमन पण अतिशय स्वच्छ! स्त्रीयांसाठी , पुरुषांसाठी वेगळी. २४ तास गरम पाणी.  कधीही कसली खोटी झाली नाही.”

“खान-पान सेवेसाठी रेस्टॉरंट होतं का?”

“छे.छे.सर्वांना मिळून एक मोठं कॉमन किचन दुसऱ्या मजल्यावर होतं.त्या स्वयंपाकघरात वेगवेगळ्या ठिकाणी पंधरा-वीस ओटे होते. त्यावर गॅसच्या शेगड्या. कपाटातील ड्रॉवरमध्ये छोट्या चमच्यांपासून ग्लास, कपबशा, प्लेटस् , झारे,, कालथे ,चाकू,सुऱ्या सारे होते. मिक्सर टोस्टर मायक्रो  होते. पुरुषभर उंचीचे फ्रिज भरपूर होते. आपण मार्केटमधून आणलेले दूध, लोणी वगैरे फ्रिजमध्ये आपल्या नावाचे लेबल लावून ठेवण्याची सोय होती.”

“म्हणजे अगदी सुसज्ज स्वयंपाकघर म्हण ना! तिथे आपण जेवण बनवायचे का?”

“हो. आणि त्यासाठीआपण वापरलेली सारी भांडी तिथेच ठेवलेल्या लिक्विडने घासून पुसून परत जागेवर ठेवायची. स्वयंपाकघराला जोडून बाहेर मोठा हॉल होता. तिथे टेबल-खुर्च्या ,सोफासेट, टीव्ही होता. आपण तयार केलेले पदार्थ प्लेटमध्ये घेऊन हॉलमध्ये बसून खायचे अशी पद्धत होती.”

“छानच सोय आहे ही! एक वेगळा अनुभव.”

“नक्कीच! सारेच प्रवासी असल्याने झटपट जेवण म्हणजे ब्रेड- आम्लेट, चहा- कॉफी, तयार पाकिटातील सूप, भाज्या, भात असा मेनू असायचा.  त्या होस्टेलमधला आमचा तो तिसरा म्हणजे शेवटचा दिवस होता. आम्ही मैत्रीणी मिळून त्या दिवशीचा आमचा झटपट स्वयंपाक बनवित होतो. तेवढ्यात तिथे एक उंच- निंच  धिप्पाड, गोरीपान बाई आली.आम्ही नेहमीप्रमाणे तिला हाय-हॅलो केले.”

“म्हणजे ती ओळखीची होती की…….”

“छे रे. ती आमची एक सवय आहे. ओळखी करून घ्यायच्या. त्यांची माहिती आपल्याला मिळते आणि आपण त्यांना आपल्याविषयी काही सांगू शकतो .”

“चांगली आहे सवय. घडीभरच्या भेटीत आपुलकी व्यक्त करणारी.”

“तिच्या बोलण्यावरून कळलं की ती एकटीच स्वीडनहून जगप्रवासाला निघाली होती. तिने आम्हाला विचारलं,’ तुम्ही इंडियनस् ना’?’. आम्ही ‘हो’ म्हटलं. आम्हाला वाटलं नेहमीप्रमाणे आमच्या कुंकवाच्या टिकल्यांवरून, पंजाबी ड्रेसवरून ओळखलं असावं. तेवढ्यात ती पुढे म्हणाली ‘I know, I know. All ladies are working and gents are sitting like this.’ असं म्हणून, सिटींगवर जोर देऊन, तिने बाहेर हॉलमध्ये आरामात गप्पा मारत बसलेल्या आमच्या पुरुष वर्गाची अशी झकास नक्कल केली की आम्ही आऽवासून पाहतच राहिलो. म्हणजे भारतीय पुरुषांची कीर्ती इतकी सर्वदूर पसरली आहे याची आम्हाला कल्पना नव्हती.”

“?? अगदी मर्मावर बोट ठेवले तिने!

” हो ना!तयार केलेले जेवण प्लेटमध्ये घेऊन आम्ही हॉलमध्ये आलो. हसत-हसत पुरुष वर्गाला तिची नक्कल करून दाखविली. पुरुषवर्ग गुळमुळीतपणे म्हणालाच की, ‘आम्ही तुमच्या पर्सेस सांभाळण्याचे महत्त्वाचे काम करीत होतो असे सांगायचे तिला!’.  पण तात्पुरता परिणाम मात्र झाला. जेवणानंतर सगळ्यांच्या डिश वगैरे पुरुषवर्गाने धुवून, पुसून ठेवल्या.

आत्मसंवाद भाग – २ समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? आत्मसंवाद – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ?

“ऐकलंस का  मनमित्रा, आज कुठे भटकायला जायचं नाही बरं ! इथेच माझ्याबरोबर राहायचं.”

“का बरं”

“आज ना, मला माझ्याशी संवाद करायचा आहे. माझ्याबद्दलंच लिहायचंआहे”.

“अरे बापरे ! स्वतःबद्दल लिहिण्याएव्हडी मोठी कधी झालीस तू?”

“तसं नाही रे! पण माझ्या एका मैत्रीणीने खूपच आग्रह केला म्हणून……”

“आलं लक्षात. म्हणजे नाव मैत्रीणीचं आणि गाव तुझं.”

“थोडंस तसंच म्हण ना . मलाही माझ्या छोट्याश्या लेखन संसारात डोकावून बघायला आवडेल ना!”

” मला वाटतं की तुझ्या लेखन संसारापेक्षा तुझा वाचन संसारच मोठा आहे.”

“अगदी खरं!  वाचनाची खूप आवड. लहानपणी बाबुराव अर्नाळकर यांच्या धनंजय- छोटूच्या,  लहान अक्षरातल्या रहस्यकथा सतत वाचल्यामुळे डोळ्याला फार लवकर चष्मा लागला तो कायमचा!

“आणि दिवाळीच्या दिवसात, रात्री उशिरापर्यंत, गॅलरीमधे आकाश कंदीलाच्या प्रकाशात दिवाळी अंक वाचत बसल्याबद्दल अनेक वेळा आईचा ओरडा  खाल्लास तो आठवत नाही का?”

“आठवतो तर! पण वाचन कायम राहिलं. रहस्यकथा मागे टाकून त्या वयात आवडलेल्या इसापनीती, अरेबियन नाईटस्,नंतर खांडेकर, फडके यांचा टप्पा ओलांडून पुलं, गोनीदा, र.वा दिघे, जी.ए.कुलकर्णी अशा अनेक नामवंत साहित्यिकांचा सहवास वाचनातून घडला. ऐतिहासिक, पौराणिक कादंबऱ्यांची गोडी लागली.”

” कविता पण आवडायच्या ना?”

“हो तर! कॉलेजच्या उमलत्या वयात काव्यानंदात रमले.  अनेक कविता तोंडपाठ होत्या. इंदिरा संत, पद्मा गोळे, सरोजिनी बाबर, शांता शेळके, बापट करंदीकर पाडगावकर यांची कवीसंमेलनं यात मैत्रिणींबरोबर रमून गेले. आरती प्रभू, ग्रेस, मनमोहन यांच्या गूढरम्य कवीतेबद्दलही आकर्षण होते. अलीकडे तरुण पिढीचे प्रतिनिधी असलेले प्रणव सखदेव, किरण गुरव, मेघना पेठे, मोनिका गजेंद्रगडकर यांचे साहित्यही वाचले.

” या सगळ्या वाचनात जास्त भर कशावर  होता?”

“मला आत्मचरित्रं वाचायला खूप आवडतात. अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध लेखक /लेखिकांची आत्मचरित्रं वाचून जीवनाच्या अनेक प्रवाहांचे दर्शन झाले.”

” आत्मचरित्रातून त्या व्यक्तीचा जीवनप्रवास संपूर्णपणे उलगडून दाखविला जातो असं वाटतं का तुला?”

” आत्मचरित्रं सत्याच्या खूप जवळ जाणारी असतात. तरीही प्रत्यक्ष जीवन जगणे आणि त्यावर लिहिणे यात थोडाफार फरक असणारच!   अनेकांचे संघर्ष, त्यांची धडपड, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळवलेले यश हे सारं माणसाची जीवनावरील श्रद्धा आणि  ध्येय गाठण्याची धडपड आपल्याला खूप काही शिकवतं.  एक खंत मात्र आहे.”

“कसली?”

“माझं इंग्रजी वाचन खूप कमी आहे. मुलाने आणि नातवाने,  मी इंग्रजी साहित्य वाचावं, त्या भाषेतले विविध विषयांवरील समृद्ध,  सविस्तर अनुभव घ्यावे, लेखनाचा आवाका म्हणजे काय, हे मला समजावे म्हणून खूप प्रयत्न केले. त्यांच्या आग्रहामुळे मी जेमतेम सात-आठ इंग्रजी कादंबऱ्या, पुस्तकं वाचू शकले. फाऊंटन हेड, रुटस््, लिटल प्रिन्स, लिटल वुमेन वगैरे मध्ये सहज रमले. पण हात पटकन वळतो तो मराठी साहित्याकडेच!”

“अगदी वाचन एके वाचन चालू होतं का?”

“अजिबात नाही. लहानपणापासून अनेकानेक सांस्कृतिक कार्यक्रम बघण्या- ऐकण्याची संधी मिळाली. अहमद सेलर बिल्डिंगच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मेळे, नाटकं, चक्री व्याख्यानं, अभिरूप न्यायालय यांची मेजवानी मिळाली. अशा उत्सवातून आणि शाळेच्या वत्कृत्व स्पर्धेत भाग घेतल्यामुळे सभाधीटपणा आला. त्याचा चांगला फायदा झाला.”

“आठवतंय का ‘हाच मुलाचा बाप’ हे नाटक?”

“हो अरे. गणेशोत्सवात मोठ्या माणसांनी केलेल्या या  नाटकात एक छोट्या मुलीची छोटीशी भूमिका होती. ती करण्यासाठी माझी निवड झाली.  खूप मजा आली. बक्षीसही मिळालं.”

“मला वाटतं त्या वेळी टीव्ही वगैरे भानगड नव्हती.”

“छे अरे! टीव्ही कुठला, रेडिओवरच्या गाण्यांचे स्वर सुद्धा लांबून कानावर यायचे. पण आम्ही बरोबरीच्या मुलामुलींनी खूप मजा केली. सुट्टीमध्ये सागर गोटे, विटी- दांडू, गोट्या लगोरी, दोन आणे तास भाड्याची सायकल घेऊन फिरवणे —-“

“आणि आरडा-ओरडा करून खुणा करत खेळलेले पत्ते आठवतात ना?”

“हो. पण संध्याकाळी परवचा, रामरक्षा, इतर स्तोत्र हे मात्र म्हणावंच लागे.”

“मला वाटतं तेंव्हा मनाच्या मशागतीसाठी खूप चांगले वेगळे मार्ग होते.”

“अगदी बरोबर. आम्ही दादरचा लोखंडी ब्रीज ओलांडून अमर हिंद मंडळ इथे जात असू.  गोविंदस्वामी आफळे यांची किर्तने, सुधीर फडके यांचे गीत रामायण , वासंतिक व्याख्यानमाला यांचा आनंद घेतला. प्राध्यापक शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर यांच्यापासून धनश्री लेले यांच्या पर्यंत अनेकांच्या वक्तृत्वाने कान तृप्त झाले.”

“सिनेमा, नाटक, संगीत यांची आवड होती ना”?

” हो.साहित्य संमेलने, चतुरंगचे कार्यक्रम यांना हजेरी लावली. ह्यांच्यामुळे शास्त्रीय संगीत ऐकायला आवडू लागले. अशी आवड असणारा आमचा एक छोटा ग्रुप तयार झाला. एन.सी.पी.ए. मध्ये पाहिलेले ‘हयवदन’, टाटा थिएटरमध्ये पुलंच्या सुसंवादासह अशोक रानडे यांनी उलगडलेली आणि ‘फैय्याज’ यांच्या स्वरांनी सजलेली बैठकीची लावणी, पुलं आणि सुनीताबाई यांनी शिवाजी मंदिरमध्ये बा.भ.बोरकर यांच्या कवितांचे केलेले वाचन सारेच अविस्मरणीय!

“तुम्ही वरळीच्या नेहरू सेंटरलासुद्धा जात होतात ना?”

 “नेहरू सेंटरमध्ये कमलाकर नाडकर्णी, काझी साहेब यांच्या उत्तम आयोजनामुळे अनेक प्रकारची नाटके, शास्त्रीय संगीत, झाकीर हुसेन, हेमामालिनी अशा अनेकांच्या दर्जेदार कार्यक्रमांचे साक्षीदार झालो दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, सावरकर सभागृह इथले कार्यक्रम ऐकले.भवन्स कल्चरल सेंटर, अंधेरी यांच्यामुळे घराजवळच सांस्कृतिक कार्यक्रमांची गंगा अवतरली आहे. इतक्या समृद्ध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या चांदणभरल्या आभाळातून आनंदाचे अमृतकण वेचता आले ही भाग्याची गोष्ट.”

“म्हणजे लिखाणासाठी सुपीक जमीन तयार होती म्हणायची”.

“तसं म्हणायला हरकत नाही पण मी लेखनाचा कधी विचारच केला नव्हता”.

“मग ‘लिहावं’ असं का वाटलं?”

“त्याचं काय झालं, ‘मनस्विनी’ म्हणून आमच्या बँकेच्या मैत्रिणींचा एक ग्रुप आहे. दर महिन्याला आम्ही एकत्र जमतो. एखादा विषय ठरवून त्यावर प्रत्येकीने बोलायचे, इतर माहितीची देवाण-घेवाण, कविता वाचन, तसेच प्रत्येकीने दिलेल्या वर्गणीतून एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी देतो. अगदी खारीचा वाटा!

एकदा गणपतीसाठी चिवडा करायचा म्हणून मी दाणे भाजत होते. तेवढ्यात एका मनस्विनीचा फोन आला. ती म्हणाली,’ पुष्पा, लोकसत्ता- चतुरंगमधील ‘नाते स्त्रीचे स्त्रीशी’ ही लेखमाला तू वाचतेस ना?’ मी म्हटलं, ‘हो’. अगदी आवडीने. तर ती हक्काने  म्हणाली, ‘तर मग ‘नाते स्त्रीचे स्त्रीशी’ या लेखमालेसाठी तुला, आपली ‘मनस्विनी आणि तू’ यांच्या नात्यावरील लेख लिहायचा आहे.  तू तो लिही आणि ‘चतुरंगला’ पाठव. मी काही म्हणायच्या आधीच तिने फोन ठेवून दिला आणि नंतर मी केलेला फोन उचलला  नाही. माझ्यावर जबाबदारी टाकून ती मोकळी झाली.”

आत्मसंवाद भाग-१ समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 143 ☆ आत्मसंवाद – दो दो बातें… ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है। )

आज प्रस्तुत है ई-अभिव्यक्ति के अनुरोध पर दो दो बातें… शीर्षक से श्री विवेक जी का आत्मसंवाद के माध्यम से दो टूक बातें।

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 143 ☆

? आत्मसंवाद – दो दो बातें…  ?

दो बातें जो एक  लेखक  की सृजनशीलता के लिए ज़रूरी हैं ?

‍‍‌‍‍‍‍‌‍‍‍‍‍..व्यापक सोच

और अभिव्यक्ति की क्षमता.

दो बातें जो एक सफल व्यंग्यकार में होनी चाहिये ?

..सूक्ष्म दृष्टि

और न्यूनतम शब्दों में चुटीला कहने का कौशल.

आपकी व्यंग्य लेखन यात्रा की दो सर्वाधिक  महत्वपूर्ण उपलब्धियां?

..पहली ही किताब “कौआ कान ले गया” को राष्ट्रीय दिव्य अलंकरण

और नई किताब “समस्या का पंजीकरण” पर पद्मश्री डा ज्ञान चतुर्वेदी की भूमिका , डा सूर्यबाला , डा प्रेम जनमेजय , डा आलोक पौराणिक , डा गिरीश पंकज , श्री बी एल आच्छा की सम्मतियां  व समकालीन व्यंग्यकारो की टिप्पणियां.

आपकी लिखी दो पुस्तकें  जिनसे आपको एक लेखक के रूप में नई पहचान मिली ?

..कविता संग्रह “आक्रोश”

तथा  नाटक संग्रह “हिंदोस्ता हमारा “.

दो चुनौतियां जो एक अभियंता के प्रोफेशनल कैरियर में हमेशा रहती हैं?

..परिस्थिति के अनुसार आन द स्पाट निर्णय लेने की योग्यता ,

व अपनी टीम को उत्साह जनक तरीके से साथ लेकर चलने की क्षमता.

एक अभियंता के रूप में आपके जीवन के दो गौरवमयी पल?

..परमाणु बिजली घर चुटका जिला मण्डला जो अब निर्माणाधीन है का स्थल चयन से सर्वे का सारा कार्य ,

और अटल ज्योति योजना के जरिये म. प्र. में फीडर विभक्तिकरण में महत्वपूर्ण कार्य.

दो संदेश जो आज के हाई टेक युवा अभियंताओं को देना चाहते हैं?

..जल्दबाजी से बचें

एवं  बड़े लक्ष्य बनाकर निरंतर सक्रियता से कार्य करें.

आपके संघर्ष के दिनों के दो साथी जिन्होंने हमेशा आपका साथ दिया? 

.. मेरी पत्नी कल्पना

तथा मेरी स्वयं की इच्छा शक्ति.

अपने जीवन के दो निर्णय जिन पर आपको गर्व है?

.. केवल अभियंता के रूप में सिमट कर रह जाने की जगह लेखन को समानांतर कैरियर बनाना

एवं बच्चों को उन्मुक्त वैश्विक शिक्षा के अवसर देना.

दो बातें जिनसे आप प्रभावित होते हैं ? 

.. विनम्र व्यवहार

तथा तार्किक ज्ञान.

दो जीवनमूल्य जो आपको अपने माता पिता से मिले हैं?

.. जो पावे संतोष धन सब धन धूरि समान ,

तथा परिस्थिति जन्य तात्कालिक श्रेष्ठ निर्णय लेना फिर उस पर पछतावा नहीं करना.  

अपनी जीवनसंगिनी के व्यक्तित्व की दो विशेषताएँ को उनको खास बनाती हैं?

.. कठिन परिस्थितियों में भी विचलित न होकर अधिकतम नुकसान के लिये मानसिक रूप से तैयार होकर धैर्य बनाये रखना ,

आर्थिक प्रलोभन या नुकसान से प्रभावित न होना एवं अपनो पर पूरा भरोसा करना.

दो बातें जो आपको नाराज़ करती हैं?

..चीटिंग से घृणा है

और झूठ से गुस्सा आता है.

दो शख्सियतें जिनसे आपको हमेशा  प्रेरणा मिलती है ?

..भगवान कृष्ण , मुश्किल परिस्थिति में सोचता हूं भगवान कृष्ण ऐसे समय क्या करते ?  

और मेरी माँ के प्रगतिशील जीवन से मुझे सदा प्रेरणा मिलती है.

दो बातें जिनमे आप विश्वास करते हैं ?

.. मेहनत कभी बेकार नही जाती ,

संबंध वे काम कर सकते हैं जो रुपये नही कर सकते.

दो बातें जो आपको हिंदी भाषा में सर्वश्रेष्ठ लगती हैं ? 

.. आत्मीयता बोध से भरी हुई सहज सरल है ,

कम से कम शब्दों में बडी बात कहने में सक्षम है.

दो बातें जो आप अपने आलोचकों से कहना चाहते हैं?

.. आलोचना करने से पहले मुझसे सीधी बात कीजीये आप जान जायेंगे कि मैं गलत नही ,

आलोचना करना सबसे सरल है, उन्हीं स्तिथियों में बेहतर कर पाना कठिन.

दो सीख जो अच्छे स्वास्थ्य के लिए कोरोना ने विश्व को दी हैं ?

.. धन से स्वास्थ्य सदा बड़ा होता है ,

हर पल का जीवन भरपूर जियें, जीवन क्षण भंगुर है.

जीवन में सफलता के दो मूल मंत्र ?

.. सचाई ,

तथा टैक्टफुलनेस.

दो अवार्ड जिन पर  आपको गर्व है ?

..सोशल राइटिंग के लिये राज्यपाल श्री भाई महावीर के हाथो मिला रेड एण्ड व्हाईट ब्रेवरी अवार्ड

और म प्र साहित्य अकादमी से मिला हरिकृष्ण प्रेमी सम्मान .

दो लक्ष्य जो आप जीवन में हासिल करना चाहते हैं ?

..कुछ शाश्वत लेखन

व निश्चिंत विश्व भ्रमण

मध्यप्रदेश के दो पर्यटन स्थल जो आपको आकर्षित करते हैं?

..नर्मदा का उद्गम अमरकंटक ,

कान्हा राष्ट्रीय उद्यान  

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – जीवन यात्रा ☆ शहीद दिवस – महात्मा को श्रद्धांजलि ☆ श्री सुरेश पटवा / श्री अरुण डनायक

?  शहीद दिवस – महात्मा को श्रद्धांजलि ?

☆ श्री सुरेश पटवा / श्री अरुण डनायक ☆ 

श्री सुरेश पटवा

गुरुदेव रविन्द्रनाथ टैगोर ने जिन्हे महात्मा की उपाधि से नवाजा था। जिन्हें चर्चिल “अधनंगा फकीर “कहता था। जिनके बारे मे महान वैज्ञानिक आईंसटीन ने कहा था कि –  “आने वाली नस्लें यह विश्वास नही करेंगी कि हाड़ मांस का ऐसा पुतला कभी जमीन पर चलता फिरता था।”

30 जनवरी 1948 को शाम की प्रार्थना के वक़्त द्वेषपूर्ण भावना से प्रेरित एक मानव ने महामानव के सीने मे तीन गोली नमस्कार की मुद्रा मे आकर उतार दीं।

हे राम! के शब्द के साथ क्षीण काया पोतियों आभा और केनू के कंधों से फिसलकर फर्श पर धराशाही हो गई।

महात्मा को श्रद्धांजलि

 – श्री सुरेश पटवा

☆ ☆ ☆ ☆ ☆ 

श्री अरुण कुमार डनायक

आज ही के दिन 30 जनवरी 1948 को एक महामानव, मानवता के अपने संकल्प को पूरा करने, सर्वधर्म सद्भाव बढ़ाने, हमें अहिंसक बने रहने, देश की एकता को बनाए रखने के  विचारों का समर्थक एक हत्यारे की तीन गोलियों का शिकार हो गया।  महात्मा का शरीर जब इस संसार से देवलोक गया तो सारे संसार में शोक की लहर छा गई । सभी ने उन्हें श्रद्धांजलियाँ दी :

मनुष्यों मे से एक देव उठ गया। यह कृशकाय छोटा सा व्यक्ति अपनी आत्मा की महानता के कारण मनुष्यों में देव था।

– राष्ट्रपति ट्रूमेन

हमारे सामने वे आज एक महान आत्मिक शक्ति के रूप में आने वाली संकटपूर्ण स्थिति के दिनों में हमारा और अपने लोगों का मार्गदर्शन करने के लिए खड़े हैं।

– स्टेफर्ड क्रिप्स (ब्रिटिश लेबर पार्टी के नेता, क्रिप्स मिशन के संयोजक)

 वे इस शताब्दी के महानतम व्यक्ति हो सकते हैं। लोग कभी कभी लेनिन को उनके  बराबर रखते हैं, परन्तु  लेनिन का साम्राज्य इस दुनिया का था और हमें यह भी पता नहीं कि दुनिया आगे चलकर उसके साथ कैसा  व्यवहार करेगी। गांधीजी के साथ ऐसी बात नहीं थी। उनकी जड़ें देश काल से परे थी और यहीँ से उन्हें शक्ति प्राप्त होती थी।

– ई एम फास्टर ( अंग्रेज उपन्यासकार, लघु कथा लेखक, व उदारवादी)

हिन्दू धर्म गांधीजी को अपना मानने का दावा कर सकता है , परन्तु उनकी आत्मा उन सभी धर्मों की गहरी से गहरी भूमि से अवतरित हुई थी, जहाँ पर सब धर्मों का मेल होता है।

– एल डब्लू ग्रेनस्टेट ( अंग्रेज शिक्षाविद ऑक्सफ़ोर्ड विश्वविद्यालय मे प्रोफ़ेसर)

हालंकि चरखे के प्रति गांधीजी की आस्था पर हँसना बहुत आसान है, विशेषकर ऐसी अवस्था में जबकि एक ओर कांग्रेस अपने चंदे के लिए ज्यादातर धनी  हिन्दुस्तानी मिल मालिकों की उदारता पर निर्भर थी ,तो भी चरखे का उनके जीवन दर्शन के मूलभूत सिद्धांतों में एक विशेष स्थान था, यह बात बिलकुल सत्य थी  और मुझे इसमें कोई सन्देह नहीं है।

– अर्ल आफ हेलिफेक्स (लार्ड इरविन) भारत के पूर्व वाइसराय

महात्मा जी के तीन आदर्शों का मुझ पर बहुत  प्रभाव पडा – पहला  ब्रह्मचर्य का आदर्श मानसिक पवित्रता से दैहिक पवित्रता पैदा कर उन्होंने अपनी वासना को बिलकुल  जीत लिया थाI दूसरा था निर्धनता का आदर्श—सर के ऊपर छत और धूप और सर्दी  से रक्षा कर सकें ऐसे अति साधारण कपड़ों के अलावा उनकी कोई व्यक्तिगत संपत्ति नहीं थी।तीसरा अहिंसा का आदर्श—वे मानते थे कि हिंसा को अहिंसा से , घृणा को प्रेम से और अहंकार को विनम्रता से जीतना चाहिए।

– थाकिन नू ( बर्मा के बौद्ध विचारक)

ईसाइयत को और अधिक स्पष्ट रूप से देखने में , किसी विशेष चर्च या ईसाइयत की किसी शाखा की अपेक्षा उन्होंने मेरी अधिक मदद की और निश्चय ही यह बात  उनके व्यापक विचार की सूचक है।

– सिविल थार्नडायक (प्रसिद्द अंग्रेज फिल्म कलाकार)

वे एक ऐसे व्यक्ति थे जिसने यूरोप की पाश्विकता का सामना सामान्य मानवी यत्न के साथ किया और इस प्रकार वे सदा के लिए सबसे ऊंचे उठ गएI आने वाली पीढ़िया श्याद मुश्किल से ही यह विश्वास कर सकेंगी कि गांधीजी जैसा हाड़ मांस का पुतला कभी इस धरती पर हुआ था।

– अल्बर्ट आइन्स्टीन (प्रसिद्द वैज्ञानिक) 

शांति पुरुष और अहिंसा के दूत गांधीजी धर्मान्धता के विरूद्ध- जिसने भारत की नवार्जित स्वाधीनता के लिए ख़तरा पैदा कर दिया था -संघर्ष में हिंसा द्वारा शहीद की भांति मरे। वे इस बात को समझ चुके कि राष्ट्र निर्माण के महान कार्य को हाथ में लेने से पहले इस कोढ़ को मिटाना होगा।

– लार्ड माउंटबैटन (पूर्व वायसराय)

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print