मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अन्नाची नासाडी नकोच… लेखक/लेखिका  : सुश्री सविता भोसले / श्री सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ अन्नाची नासाडी नकोच… लेखक/लेखिका  : सुश्री सविता भोसले / श्री सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

लग्नाचे मस्त रिसेप्शन सुरू होते. लोक रांगेमध्ये नवरदेव- नवरीला शुभेच्छा देत… भेटवस्तू देत…. फोटो काढत…. पुढे पुढे सरकत होते. झाल्यावर जेवणाचा मस्त आस्वाद घेत होते.

“अरे.. अरे…. हे काय करतोस? चक्क नोट फाडतोस. “

असा मोठाsss आवाज झाल्यामुळे, हॉलमधील सर्वांनीच स्टेजकडे वळून पाहिले. काहींना कसला गोंधळ आहे… तो कळेच ना… म्हणून सर्वजण स्टेज जवळ जमा झाले.

“अरेssss नकुल ! काय करतोयस तू? चक्क पाचशेची नोट फाडली! हा माझा अपमान आहे. असं कोणी करता का?”

असं म्हणून त्या जवळच्या नातेवाईकाने, नवरदेवाशी भांडायला सुरुवात केली. तेव्हा हॉल मधे कुजबूज सुरू झाली. त्यांच्या भांडणावरून एवढे कळाले की,

भेट म्हणून आलेले पैशाचे पाकीट तिथेच फोडून त्यातील पाचशेची नोट सर्वांसमोर फाडली होती. हे सर्व पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला. कारण नवरदेव.. नकुल… हा अतिशय समजूतदार मुलगा होता. तो असे काही करेल; असे कुणालाही वाटले नव्हते. थोड्या वेळ शांतता पसरली. जेवणाऱ्यानीही आपले जेवण मध्येच थांबवले.

सर्वांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून, नकुलने माईक हातात घेतला आणि तो शांतपणे बोलू लागला.

“मी असे केले; त्यामुळे तुम्हा सर्वांना खूप आश्चर्य आणि माझा रागही आला असेल. पण यामागेही काही कारण आहे. मी ते तुम्हाला सांगू इच्छितो. आपण सर्वजण खूप चांगले लोक आहात. छान पैकी जेवणाचा आस्वाद घेत आहात. पण मला असे आढळले की ९०% लोक आपले जेवणाचे ताट अर्धवट जेवून, जेवणाच्या ताटात बरेचसे पदार्थ टाकून देत आहेत. कुणी कुणी तर वाटीभर भाजी घेऊन, एक घास खाऊन, तशीच वाटी डस्टबिन मध्ये टाकली. असे आजच नाही तर; बऱ्याच ठिकाणी मी पाहतो. मला तुमचा अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही… तुम्ही पोटभर जेवा पण अन्न वाया घालवू नका. भले गर्दी असेल तर पदार्थ संपल्यावर पुन्हा रांगेत उभे राहावे लागते; पण फार वेळ नाही लागत हो! एकदम वाढून घेतल्याने अंदाज येत नाही. म्हणून अन्न तसेच टाकून दिले जाते. आज आपल्या भारतात कितीतरी जण उपाशी झोपतात. तुम्हाला मी एक ५००रुपयाची नोट फाडली तर किती राग आला!!! पण…. तुम्ही जेव्हा आपल्या ताटात बरेच उष्टे अन्न टाकता तेव्हा पाचशे रुपये पेक्षा जास्त किमतीचे अन्न वाया घालवत आहात;; पण ते कळून येत नाही…. आपणाला याची जाणीवही नसते किंवा जाणवत असेल तरी, दुर्लक्ष करतो का आपण? एक चपाती किंवा एक भाजी किंवा कुठलाही अन्नपदार्थ बनवण्यासाठी, ते उगवण्यापासून ते तुमच्या ताटापर्यंत खाण्यायोग्य बनवण्यासाठी… अनेक जणांचे हात लागलेले असतात. त्यांची मेहनत असते… वेळ आणि पैसा घालवलेला असतो! मग तो कोणाचा का असेना!!

‘मला कुठे खर्च येतो ?

मी कशाला काळजी करू?’

असा विचार असतों का तुमच्या मनात?

जी गोष्ट अन्नासाठी तीच पाण्याबाबत आहे.

हे तुम्हाला दर्शविण्यासाठी, मी पाचशेची नोट फाडली. आता तुम्हाला वाटेल की, तेवढ्यासाठी नोट फाडायची काय गरज? नुसतं सांगितलं असतं तरी चाललं असतं. पण काळजी करू नका! ही फाडलेली नोट खोटी होती. आणि या माझ्या छोट्याशा नाटकात माझा हा मित्रही सहभागी होता. “

असे म्हणून त्याने त्याला मिठी मारली. दोघांनी भांडण्याचे उत्तम नाटक केले होते.

हे ऐकल्यावर सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवल्या. एव्हाना प्रत्येकाच्या मनात असलेला प्रश्न आणि राग निघून गेला होता.

त्यानंतर नकुलने सर्वांना शपथ घ्यायला लावली की,

“मी कुठेही.. म्हणजे 

घरामध्ये…

हॉटेलमध्ये….

लग्नामध्ये….

अन्नाचा एकही कण वाया घालवणार नाही. “

त्या रिसेप्शन मधून बाहेर पडलेला प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती… सुसंस्कृत होऊन घरी गेला.

प्रत्येकाला तो विचार खूप म्हणजे खूपच आवडला.

लेखक : सविता भोसले / सुनील इनामदार

मो.  ९८२३०३४४३४.

प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आत्मिक वैभव… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ आत्मिक वैभव… ☆ श्री संदीप काळे ☆

मागच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात वाईट काय झाले असेल तर, यशोमती ठाकूर ताईला अपयश आले. ताईला भेटण्यासाठी मी अमरावतीला गेलो होतो. ताईची भेट काही कारणास्तव लांबणीवर गेली. पुढचे दोन दिवस या भागातल्या भेटीगाठी करायच्या, या उद्देशाने मी मेळघाटच्या दिशेने निघालो. मेळघाटमधल्या काही ओळखीतल्या लोकांशी संपर्क केला, तर ते सारे कामात होती. ‘वैभवभाई’ मेळघाटात आहेत, त्यामुळे यावेळी भेटणे शक्य नाही. असे दोन तीन जणांकडून निरोप आले. कोण ‘वैभवभाई’? असे विचारेपर्यंत शेवटच्या व्यक्तीनेही फोन ठेवला. मेळघाटामधल्या घटांग, मसुंडी, बेला, कोहना, जैतादेही, बिहाली, हत्तीघाट, सलोना, भवई अशा अनेक गावांत मी गेलो. त्या ठिकाणी गेल्यावर माझ्याशी परिचित असणारी व्यक्ती मला हेच सांगत होती. ‘वैभवभाई’ आताच येऊन गेले. कुठे किराणा सामान दिले. कुठे कपडे दिले. कुठे शाळेचे साहित्य, कुठे घरात लागणारे साहित्य, तर कुठे अन्य काही साधनसामुग्री दिली. बापरे, कोण आहे हा माणूस, ? जो या अत्यंत दुर्लक्षित असलेल्या भागात एवढे मोठे काम करतो, असा मला प्रश्न पडला होता. माझ्यासोबत याच भागातले किशन जांभोरी होते. मी त्यांना विचारले, ‘मामा हे ‘वैभवभाई’ कोण आहेत, ? त्यांनी मला वैभव यांच्याविषयी सांगितले. मी त्यांना म्हणालो, ‘लावा बरं फोन त्यांना’. मामाच्या फोनवर मी वैभवजी यांना बोललो. एक माणूस नि:स्वार्थीपणे या भागात काम करतोय, हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होते. एका तासानंतर आमचे भांद्री या गावात भेटायचे ठरले. आम्ही भेटलो. खूप गप्पा झाल्या आणि वैभवचे कधीही कोठे न दाखवलेले खूप मोठे सामाजिक कामही माझ्या पुढे आले. काय काही काही माणसे असतात, जी प्रचंड मोठे काम करतात. त्यात वैभव एक होते.

वैभव वानखडे (९४२३४०१०००) अकोला येथील आदर्श कॉलनीमधला एक युवक. वैभवचे आजोबा आणि वडील हे सेवाभावी वृत्तीने प्रचंड झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते. ‘आपला जन्म देण्यासाठी झाला’ हा विचार वैभव यांच्या मनात लहानपणापासून अगदी शिगोशीग भरला होता. वैभव म्हणाले, माझे वडील गेल्यावर अनेक मित्रांच्या मदतीने उभा केलेला खूप मोठा व्यवसाय तसाच बाजूला ठेवून बाबांच्या आठवणीत पूर्णवेळ सेवाभावी कार्यात स्वतःला झोकून द्यावं असा विचार करून मी बाहेर पडलो. एका वर्षाने मागे फिरून पाहिले तर ज्या अनेकांची भिस्त माझ्या व्यवसायावर होती, त्यांचे कुटुंब उघड्यावर पडायची वेळ आली होती. मी स्वतःला थोडे सावरत, थोडा व्यवसाय आणि अधिकचे सेवाभावी कार्य असे काम सुरू केले. जसे माझे आजोबा आणि वडील यांना ‘आत्मिक वैभवा’ची रुची निर्माण झाली होती, तशी रुची मलाही लागली होती. सर्व जण माझी काळजी करायचे. एकटी माझी आई मीरा वानखडेला सारखे वाटायचे, माझा मुलगा प्रत्येक पाऊल धाडसाने टाकतो. आई जेजे म्हणायची ते ते व्हायचं. एका महिलेकडे आणि युवकांकडे बोट करीत वैभव म्हणाले, ‘ही माझी पत्नी पूनम, आणि हा गौरव काटेकर हे दोघेंजण राज्यातील गरीब मुलांचे शिक्षण, गरिबी निर्मूलन उपक्रम, आणि मराठी शाळा या तिन्ही उपक्रमांचे काम पाहतात. ‘मी वैभव यांना म्हणालो, हे तिन्ही उपक्रम आहेत तरी काय’? वैभव म्हणाले, २०१२ ला मी ‘नि:स्वार्थ सेवा फाउंडेशन’ आणि ‘सेवा बहुउद्देशीय संस्था’ अशा दोन संस्था काढल्या. माझे बाबा गेले आणि बाबांच्या आठवणीत २०१९ पासून या दोन्ही संस्थांच्या कामाला प्रचंड गती मिळाली. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून नि:स्वार्थ सेवा होत आहेत, हे कळल्यावर राज्यातून शेकडो तरुण या कामासाठी पुढे आले. मेळघाटसारखे राज्यातले २८ गरिबी आणि भीषण संकटे असणारे भाग आम्ही निवडले. तिथे प्राथमिक स्वरूपात जे काही पाहिजे ते पुरवले. गरिबी फार वाईट असते, या काळात जो कुणी साथ देतो, तो देवापेक्षा मोठा वाटायला लागतो. माझ्या बाजूला असलेल्या एका महिलेकडे खुणावत वैभवजी मला म्हणाले, ‘ही अंजना याच मेळघाट भागातली. तिची सात मुले दगावली. कुपोषण, रोगराई, अज्ञान अशी कारणे त्या सात मुलांच्या जाण्यामागे सांगण्यात आली. माझ्या दृष्टीने ही मुले जाण्यामागे खरे कारण होते गरिबी. आता अंजना सोबत जो मुलगा उभा आहे. तो तिचा मुलगा शिवा आहे’. मी अंजनाकडे पाहत म्हणालो, ‘शिवा तर मला एकदम पैलवान वाटतो’. डोळ्यात आलेली आसवं पुसत अंजना म्हणाली, ‘दादा, कुठे तरी देव हाय ना जी’.. ! आपल्या पोटात नऊ महिने वाढवलेला मांसाचा गोळा जेव्हा डेडबाॅडी होऊन आपल्याच हातावर असतो ना, तेव्हा त्या आईला धरणीमाय जागा देत नाही. त्या आईचा आक्रोश कुणालाही दिसत नाही, तो आतला आक्रोश फार भयंकर असतो. माझ्या तिसऱ्या बाळापासून वैभवदादांची ओळख झाली. एक तरी बाळ वाचेल असे वाटत होते, पण छे ! आठव्या बाळंतपणाच्या वेळी पूनमवहिनी आणि वैभवदादा मला त्यांच्या घरी अकोल्याला घेऊन गेले. चांगल्या दवाखान्यात माझी प्रसूती झाली. पुढे वैभव भाऊने अनेक फिरते दवाखाने या भागात सुरू केले. ज्यातून माझ्यासारख्या अनेक अंजनाला त्यांचे मातृत्व मिळाले. आम्ही बोलत, बोलत त्या मेळघाटातल्या भागात वैभव यांच्यामुळे झालेल्या अनेक सामाजिक कामांचे दाखले अनुभवत होतो. वैभव यांनी गौरव काटेकर, तृप्ती महाले, पूनम कीर्तने, गिरीश आखरे, वैशाली जोशी, अशा अनेकांची ओळख करून दिली. चर्चेतून आमचा रस्ता ‘अमरावती’च्या दिशेने कटत होता. ३४० जणांची पूर्णवेळ काम करणारी टीम, हे तिन्ही उपक्रम मोठ्या उत्साहाने राबवत होती. मेळघाटामध्ये गरिबी निर्मूलन उपक्रम, शाळाबाह्य मुलांसाठी उभे केलेले वैभव यांचे काम पाहून कोणीही थक्क होईल, असे ते काम होते. या स्वरूपाचे काम केवळ मेळघाटामध्ये नव्हते तर, राज्यात छत्तीस जिल्ह्यांत सुरू होते. अगदी कुठलाही गाजावाजा न करता. आमच्या गाडीत वैभव यांनी सुरू केलेल्या त्या तिन्ही उपक्रमांविषयी चर्चा सुरू होती. आता ‘मराठी शाळा वाचली पाहिजे’ या उपक्रमाविषयी समजून घेण्याची मला उत्सुकता लागली होती. वैभव म्हणाले, ‘आपण सारे आपल्या मराठी शाळेत शिकलो’. कसे वागायचे, जगायचे हे सारे संस्कार आम्हाला मराठी शाळेने शिकवले. अशा जीव की, प्राण असणाऱ्या शाळा वाचाव्यात यासाठी आम्ही राज्यभरात सर्व्हे करून एक रूपरेषा ठरवली. सर्व राज्यांत २४० शाळा निवडल्या, ज्या शाळेतून बाहेर पडणारी दीड लाखाहून अधिक मुले दुर्दम्य आत्मविश्वास घेऊन आभाळाला गवसणी घालायचे काम करतात. कोण किती वाईट आहे, यंत्रणा किती कामचुकार आहे, यात आम्ही कधीही घुसत नाही. आम्ही आमचे ठरवलेले काम करतो. आम्ही अमरावतीजवळच्या घटांग या शाळेत पोहचलो. त्या त्या शाळेतले अनेक प्रयोग वैभव आणि त्यांची टीम मला सांगत होती. तिथे असणाऱ्या श्रीजया, विजया, कान्होपात्रा या तिन्ही बहिणी एका पाठोपाठ नवोदयला लागल्या. त्यांचे वडील साधी पानपट्टी चालवतात. त्या शाळेत कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करते. कोणी खेळाची. कुणी छान कविता लिहितो. हे याच शाळेत का पाहायला मिळत होते, त्याचे कारण या शाळेत वैभव आणि त्यांच्या टीमने मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून अनेक उपक्रम विकसित केले होते. या घटांगच्या शाळेसारख्या राज्यात २४० शाळांमध्ये लाभ घेणाऱ्या विद्यार्थांना भेटायचे आहे त्यांच्या ‘वैभवभाई’ यांना. आभार मानणारे पालक, शिक्षक, विद्यार्थी त्यांच्या पुढे अगदी साधेपणात नतमस्तक झालेले वैभव, त्या शाळेतला सारा प्रसंग मी अगदी डोळे भरून पाहत होतो. वैभव यांच्या सर्व टीमने त्या शाळेतील कामामध्ये स्वतःला गुंतवले होते. बाजूला मी आणि वैभव दोघे बोलत बसलो होतो. वैभव म्हणाले, ‘माझे आजोबा कृष्णराव वानखडे यांनी पदरमोड करून आणि लोक वर्गणीतून बहुजनांच्या मुलांसाठी अनेक शाळा सुरू केल्या. या काळात आपण नव्या शाळा काढू शकत नाही, पण आहे त्या शाळा चांगल्या करू शकतो. वडिलांचेही माझ्याविषयी खूप स्वप्न होते. वडिलांच्या आठवणीतून डोळे पाणावलेल्या वैभव यांचे लक्ष एका उत्साहाने धावत येणाऱ्या मुलीकडे गेले. ती मुलगी ‘बाबा’ म्हणत, वैभव यांच्या गळ्यात येऊन पडली. तिने वैभवच्या डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू पुसले. ती मुलगी म्हणाली, ‘तुम्हाला कोणाची आठवण येते?, माझ्या आजोबांची की तुमच्या आजोबाची?. वैभव काहीच बोलले नाहीत. त्यांनी पुन्हा त्या मुलीला घट्ट पकडले. त्या दोघांचेही डोळे अश्रूनी भरली होती. एकमेकांच्या स्पर्शातूनच त्यांचे बोलणे सुरू होते. थोडे भानावर येत वैभव मला म्हणाले, ‘ही माझी मुलगी शिवन्या. शिवन्या आणि माझी आई आताच मुंबईवरून आलेत. या दोघींनाही माझ्या सामाजिक कामात प्रचंड रुची आहे’. वैभव यांच्या आईची ओळख झाली. बऱ्याच गप्पा झाल्यावर मी जाण्यासाठी निघालो. वैभव यांच्या आईच्या पायावर मी डोके ठेवत आईला म्हणालो, ‘आई, अनेक जन्म साधना केल्यावर तुम्हाला असा पुत्र मिळाला असेल’. माझे बोलणे ऐकून आईचे डोळेही पाणावले होते. मी निघालो. थोडे पुढे गेल्यावर मलाही अश्रू आवरेनात. माझे अश्रू त्या ‘आत्मिक वैभवा’साठी होते, ज्याला वाटते सगळीकडे ‘चिरंतन टिकणारा’ विकास झाला पाहिजे. ज्यांना वाटते, सगळीकडे चांगले झाले पाहिजे. तुम्हालासुद्धा हे ‘आत्मिक वैभव’ मिळायचे असेल तर, तुम्ही नक्की ‘वैभव’च्या पावलावर पाऊल टाका, बरोबर ना.. !

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॲनिमेशनची कला… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ॲनिमेशनची कला… ☆ प्रा. भरत खैरकर 

कल्पनाशक्तीला जिवंत करणे म्हणजे ॲनिमेशन! हा एक आकर्षक कला प्रकार आहे. जो सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि कथाकथन यांचे मिश्रण करून स्थिर प्रतिमांना हलत्या व्हिज्युअलमध्ये बदलते. जगभरातील प्रेक्षकांना मोहित करते. फीचर फिल्म्सपासून व्हिडिओ गेम्सपर्यंत, आपण जे कथा, कल्पना आणि मनोरंजन अनुभवतो यात ॲनिमेशन महत्त्वाची भूमिका बजावते.

ॲनिमेशन म्हणजे काय? ॲनिमेशन ही स्थिर प्रतिमा जिवंत करण्यासाठी डिझाइन, रेखाचित्र, मांडणी आणि कलाकृती तयार करण्याची प्रक्रिया आहे. मुख्य कल्पना म्हणजे हालचालींचा भ्रम निर्माण करणे, ज्यामुळे प्रतिमांना वापरून, कालांतराने कथा सांगणे शक्य होते. हाताने काढलेले कार्टून असो किंवा संगणकाद्वारे तयार केलेले पात्र असो, ॲनिमेशन स्थिर व्हिज्युअल्सना मनोरंजन, माहिती आणि प्रेरणा देणा-या डायनॅमिक कृतींमध्ये बदलते.

ॲनिमेशन तयार करणारी व्यक्ती ‘ॲनिमेटर’ म्हणून ओळखली जाते. ॲनिमेटर्स ही पडद्यामागील सर्जनशील शक्ती आहेत, जी चळवळ, अभिव्यक्ती आणि भावनांना पात्र आणि कथांमध्ये जीवन फुंकण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यांचे कार्य ब्लॉकबस्टर चित्रपटांपासून डिजिटल जाहिरातींपर्यंत विविध माध्यमांमध्ये सगळीकडे पाहिले जाऊ शकते.

ॲनिमेशन अनेक शैलींमध्ये येते, प्रत्येकाची स्वतःची अनन्य तंत्रे आणि सौंदर्यास्थाने आहेत. ॲनिमेशनच्या प्राथमिक प्रकारामध्ये

पारंपारिक ॲनिमेशन, हाताने काढलेले ॲनिमेशन म्हणूनही ओळखले जाते, ते ॲनिमेशनच्या सर्वात जुन्या प्रकारांपैकी एक आहे. यात प्रत्येक फ्रेम हाताने तयार करणे, प्रत्येक दृश्याला एक अद्वितीय कलाकृती बनवणे समाविष्ट आहे. डिस्नीचे बरेचसे सुरूवातीचे आणि सिंड्रेला सारखे क्लासिक चित्रपट पारंपारिक ॲनिमेशन वापरून तयार केले गेले आहेत.

टूडी ॲनिमेशन.. ह्यात एक्स, वाय अक्ष वापरून या प्रकारच्या ॲनिमेशनमध्ये हालचाल निर्माण करण्यासाठी द्विमितीय प्रतिमा किंवा रेखाचित्रे वापरतात!हे ॲनिमेशन डिजिटल पद्धतीने किंवा पारंपारिक हाताने काढण्याच्या तंत्राद्वारे तयार केले जाऊ शकते. लोकप्रिय दाहरणांमध्ये ‘ द सिंम्पसन’ आणि ‘स्पाॅज बाॅब’ सारखे ॲनिमेटेड टीव्ही शो समाविष्ट आहेत.

थ्रीडी ॲनिमेशन हे संगणक सॉफ्टवेअर वापरून, थ्रीडी (एक्स, वाय, झेड अक्ष) ॲनिमेशन प्रतिमांना खोली आणि परिमाण जोडते. ॲनिमेशनचा हा प्रकार टॉय स्टोरी आणि फ्रोझन सारख्या प्रमुख ॲनिमेटेड फीचर फिल्म्ससाठी मानक बनला आहे. ज्यामुळे वास्तववादी, सजीव हालचाली आणि तपशीलवार पात्रांना ह्या मधे दाखविता येते.

मोशन ग्राफिक्स हे मजकूर, लोगो आणि आकार यासारख्या ग्राफिक डिझाइन घटकांसह तयार केलेले ॲनिमेशन असते. हे सामान्यतः जाहिराती, संगीत व्हिडिओ आणि डिजिटल सामग्रीमध्ये दृश्यात्मक आकर्षक मार्गाने.. पध्दतीने.. माहिती देण्यासाठी वापरले जातात.

स्टॉप-मोशन ॲनिमेशनमध्ये प्रत्येक शॉट दरम्यान किंचित हलविलेल्या भौतिक वस्तू किंवा मॉडेल्सच्या वैयक्तिक फ्रेम्स कॅप्चर करणे समाविष्ट असते. क्रमाक्रमाने खेळल्यास, वस्तू स्वतःहून हलताना दिसतात. द नाईटमेअर बिफोर ख्रिसमस आणि वॉलेस अँड ग्रोमिट सारखे आयकॉनिक स्टॉप-मोशन चित्रपटात हे तंत्र वापरले आहे.

ॲनिमेशन प्रक्रियेमध्ये अनेक पायऱ्यांचा समावेश होतो, ह्यात प्रत्येक प्रक्रिया ही पॉलिशिंग आणि अंतिम उत्पादन तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण असते. कल्पना, प्रक्रिया, विचारमंथन, ॲनिमेशनच्या पध्दती आणि थीमची संकल्पना इथून ॲनिमेशनची तयारी होते. इथेच सर्जनशील दिशा ठरवली जाते.

कथा, पात्रे, संवाद आणि वेळेची रूपरेषा सांगण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली जाते. हे ॲनिमेशनसाठी ब्लूप्रिंट म्हणून काम करते. नंतर ॲनिमेटर्स एक स्टोरीबोर्ड तयार करतात, जो ॲनिमेशनच्या मुख्य दृश्यांचा नकाशा बनवतो, ज्यामुळे टीमला पूर्ण फ्रेम्स तयार करण्यापूर्वी ॲनिमेशनची प्रगती आणि वेळेची कल्पना करता येते.

रफ ॲनिमेशन स्टेजमध्ये मूलभूत पोझेस किंवा कीफ्रेम तयार करणे समाविष्ट असते. हे ॲनिमेटर्सना पात्रांच्या हालचाली आणि दृश्यांच्या प्रवाहाची जाणीव देते. खडबडीत ॲनिमेशननंतर, काम सुबक करण्यासाठी आणि ॲनिमेशनमध्ये प्रवाहीपणा सुनिश्चित करण्यासाठी वर्ण अभिव्यक्ती, पार्श्वभूमी आणि दुय्यम हालचाली यासारखे तपशील जोडले जातात.

एकदा ॲनिमेशन पूर्ण झालं की अंतिम संमिश्रामध्ये सर्व घटकांचा समावेश होतो जसे की पार्श्वभूमी.. वर्ण.. प्रभाव.. एकत्र मिश्रित.. संगीत.. ध्वनी प्रभाव आणि व्हॉइसओव्हर देखील या टप्प्यावर एकत्रित केले जातात.

ॲनिमेशनची अंतिम संपादित आवृत्ती प्रसारणासाठी तयार असते, मग ती टीव्ही, चित्रपट, इंटरनेट किंवा इतर प्लॅटफॉर्मसाठी ती पाठविली जाते.

ॲनिमेशन हा विविध क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण करिअर संधींसह भरभराट करणारा उद्योग आहे. काही रोमांचक क्षेत्रे आहेत जिथे ॲनिमेटर्सना मागणी आहे. ॲनिमेशन स्टुडिओ ब्लॉकबस्टर चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये कथा जिवंत करण्यासाठी ॲनिमेटर्सची नियुक्ती करतात. पिक्सार, डिस्नी वर्ल्ड, ड्रिम वर्क सारख्या कंपन्या ॲनिमेटेड चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखल्या जातात.

ॲनिमेटर्स गेम डेव्हलपमेंटमध्ये, कॅरेक्टर मूव्हमेंटपासून.. इंटरएक्टिव्ह स्टोरीटेलिंगमध्ये.. महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच लक्ष वेधून घेण्यासाठी आणि ब्रँड संदेश सर्जनशीलपणे वितरीत करण्यासाठी जाहिरातींमध्ये ॲनिमेशनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ३० सेकंदांची जाहिरात असो किंवा दीर्घ स्वरूपाची डिजिटल मोहीम असो, ॲनिमेटर्स गर्दीच्या जाहिरातींच्या ठिकाणी ब्रँड्सना उभे राहण्यास मदत करतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी डिजिटल सामग्री निर्मितीमध्ये मोशन ग्राफिक्स, स्पष्टीकरण व्हिडिओ आणि ॲनिमेटेड व्हिज्युअल यांचा समावेश असतो. लहान, आकर्षक ॲनिमेशनमध्ये सरस.. कुशल असलेल्या ॲनिमेटर्सना डिझाईन एजन्सी आणि सामग्री निर्मात्यांकडून खूप मागणी आहे.

ॲनिमेशन मोबाइल ॲप्स आणि वेबसाइट्सच्या विकासामध्ये, परस्परसंवादी घटक जोडण्यासाठी आणि वापरकर्त्याचा अनुभव वाढवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका अॅनिमेटरची असते.

ॲप डेव्हलपर सुध्दा व्हिज्युअल फीडबॅक आणि आकर्षक इंटरफेस तयार करण्यासाठी ॲनिमेशन वापरतात.

ॲनिमेशन हे फक्त मनोरंजनापेक्षाही अधिक खूप काही आहे. हा एक कला प्रकार आहे. कथाकथन, शिक्षण, विपणन आणि त्यापलीकडे एक शक्तिशाली साधन आहे! ॲनिमेशनचे जग सर्जनशील अभिव्यक्तीसाठी अमर्याद आकाश आहे.. ज्यात आपण आपल्या पंखाने गरुड भरारी घेवून जगाला अचंबित करू शकतो.

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ कालभैरवाष्टक॥ – मराठी भावानुवाद – रचनाकार : आद्य शंकराचार्य ☆ भावानुवादक : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ कालभैरवाष्टक॥ – मराठी भावानुवाद – रचनाकार : आद्य शंकराचार्य ☆ भावानुवादक : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

देवराज्य सेव्यमान पावनाघ्रिपंकजम्।

व्यालयज्ञ सूत्रमिंदू शेखरं कृपाकरम्।

*

नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरम्।

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ।।१।।

*

भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकं परं।

नीलकण्ठमीप्सिथार्थ दायकं त्रिलोचनम।

कालकाल मम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं।

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।२।।

*

शूलटंक पाशदण्ड पाणिमादिकारणं।

श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम।

भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं।

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।३।।

*

भुक्तिमुक्ति दायकं प्रशस्तचारुविग्रहं।

भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं।

विनिकण्वन्मनोज्ञ् हेम् किंकिणीलस्तकटिं।

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।४।।

*

धर्मसेतू पालकं अधर्ममार्ग् नाशकम्।

कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्।

स्वर्णवर्ण शेष् पाश शोभितांगमण्डलं।

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।५।।

*

रत्नपादुकाप्रभाभिराम पाद युग्मकम्।

नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्।

मृत्युदर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्।

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।६।।

*

अट्टहास भिन्नपद्म जाण्ड् कोश संततिं।

दृष्टिपात नष्टपाप जालमुग्र शासनं।

अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं।

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।७।।

*

भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं।

काशिवास लोकपुण्यपापशोधकं विभुम्।

नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं।

काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।८।।

*

कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं।

ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्।

शोक मोह दैन्य लोभ कोपतापनाशनम्।

ते प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् धृवम् ।।९।।

इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं कालभैरवाष्टकम् संपूर्णम्।

॥ कालभैरवाष्टक

इंद्रराज पूजितो चरणयुगुल पावना

नाग हेच जानवे शशी शिरोभूषणा

नारद नि योगीवृंद दिगंबरा तव नमना

काशिकालभैरवा तव चरणी वंदना ||१||

*

कोटिसूर्य तेजनिधी भवसागर तारितो

त्रिनेत्री नीलकंठ कामनांस पुरवितो

अक्षय तू त्रिशुलधारी कमलनेत्र त्रिनयना

काशिकालभैरवा तव चरणी वंदना ||२||

*

श्यामवर्णि शूल टंक पाश दंड धारिला

आदिदेव अविनाशी आदिकारण निर्मला

चंडप्रताप तांडवप्रिय देवता विलक्षणा

काशिकालभैरवा तव चरणी वंदना ||३|| 

*

मुक्ती-भुक्ती देतसे प्रशस्त मोहदा मूर्ती 

भक्तहृदयी वास करी व्यापित विश्वांतरी

रंजविते घंटिका सुवर्ण कटी किणकिणा

काशिकालभैरवा तव चरणी वंदना ||४||

*

धर्म रक्षितो सदा अधर्म नाश करुनिया

कर्मबंध ध्वंसितो आत्महर्ष निर्मिण्या

सुवर्ण नाग वेढिती तनुस भव्य शोभिण्या

काशिकालभैरवा तव चरणी वंदना ||५||

*

रत्नजडित तेजपुंज चरणयुगुली पादुका

अद्वितीय निष्कलंक सदैव इष्ट देवता 

दन्तपंक्ति तव कराल मुत्यूमद हारणा

काशिकालभैरवा तव चरणी वंदना ||६|| 

*

विकट तव हास्याने ब्रह्माण्डही कापते

एक दृष्टीक्षेप करित सर्वपापमुक्ती दे 

अष्टसिद्धि दान करी मुंडमाळधारिणा

काशिकालभैरवा तव चरणी वंदना ||७||

*

भूतसंघनायका भव्य कीर्तिदायका

पाप-पुण्य न्यायदा काशीपुरी वासिका 

थोर प्रभा तव ज्ञाना विश्वपति सनातना

काशिकालभैरवा तव चरणी वंदना ||८||

*

जपताती चित्तहारी कालभैरव या स्तोत्रा

ज्ञानदायी मोक्षदायी विचित्र पुण्यवर्धिता

शोक मोह त्रास दैन्य संतापा नाशना

खचित लाभ त्यास मिळे कालभैरवा चरणा ||९||

इति श्रीमत् शंकराचार्य विरचित कालभैरवाष्ट्क स्तोत्र संपूर्ण 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ही जणू आजची हिरकणी … लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ ही जणू आजची हिरकणी … लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

छायाचित्रात दिसणारी मुलगी म्हणजे श्रेया संतोष खरात. राहणार पाली गावची. घर जवळपास तोरण्याच्या सीमेवर. तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहचायचे म्हटले तर खुप लांबचा प्रवास. मी सुवेळा माची ते संजिवनी माची हा ट्रेक करताना मला एका कातळ कड्यावरून निदर्शनास आली. ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणा मार्गाने वर चढत होती. जेमतेम सात ते साडेसात वर्षांचा जीव. डोक्यावर पाण्याच्या, सरबताच्या व ताकाच्या आणि दहा बिसलरी बाटल्या घेऊन चढत होती.

थोडावेळ हे दृश्य पाहून सुन्न झालो व कॅमेरा मध्ये छायाचित्र घेतले. कड्यावरून तीला गाठायचेच हा निर्धार केला. किल्ले राजगडाच्या दक्षिणेकडील सुवेळा माची ते संजीवनी माची दरम्यानची संपूर्ण तटबंदी तुडवत तूडवत प्रदक्षिणा पूर्ण करत व इतिहासाच्या पाऊलखुणा कॅमेरातून छायाचित्राच्या माध्यमातून टिपत टिपत मी शेवटी या चिमुरडीला गाठले. तोपर्यंत ती बरीच वर चढून आली होती. तिच्या जवळ पोहताच तिने आवाज दिला “ दादा सरबत, पाणी, ताक घ्या की…” मी तिच्या डोईवरच गाठोड खाली घेत विचारलं “ बाळा कुठची राहणार. ” पाली गावचं नाव सांगितलं. ‘ शाळेत जातेस का? ‘ २ री मध्ये जातेय सांगितले व शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी, सरबत विकते निरूत्तर झालो व ह्रदयात कुठेतरी खोल जखम झाल्यासारखे वाटले. नाव विचारले तर श्रेया म्हणुन सांगितले.

खरच हा प्रसंग जाणून घेताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे परंतु पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही. श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर चक्क दहा भरलेल्या बाटल्या होत्या. मी सरबत मुद्दामहून जास्त पीलो, पाण्याच्या बाटल्या घेतल्या. व पुढील एक वर्षांच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल तेवढी रक्कम तिच्या हातात टेकवत तिचे गाठोड बांधत तिच्या डोईवर ठेवले. आठवण म्हणून एक सेल्फि घेत त्या चिमुरडीच्या जिद्दिला मुजरा केला.

गडकोट फक्त भटकंतीच नाही तर जगवायला पण शिकवतात हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार अनुभवयाला मिळाला…..

जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय..

लेखक व छायाचित्र – श्री रमेश खरमाळे

माजी सैनिक, खोडद,  ८३९०००८३७०

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ओरडणारी, किंचाळणारी आई…’ – लेखक : डॉ. अनिल मोकाशी  ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले  ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ओरडणारी, किंचाळणारी आई…‘ – लेखक : डॉ. अनिल मोकाशी  ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

ओरडणारी, किंचाळणारी आई…

(‘घरोघरी मातीच्याच चुली’ की हो !)

बाईपण दे गा देवा. ओ के आहे. पण आईपणाचा बोजा नको रे बाप्पा! ऐसे कैसे चलेगा! मान्य आहे, सोपं नाही आहे ते. पण घेतला वसा तर निभावायलाच हवा ना. आनंदाने, सुख, समाधानाने संसार तर करायलाच हवा.

१. आईचे ताणतणाव

आईचे व्यक्तिमत्त्व आणि तिच्या वागणुकीचा मुलांच्या मानसिकतेवर आणि भावनिक विकासावर फार मोठा परिणाम होतो. आई जर वारंवार ओरडणारी, किंचाळणारी असेल तर मुलांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

२. मुलांमध्ये तणाव आणि चिंता

मुलांना आईकडून हवे असते प्रेम आणि सुरक्षितता. लहान सहान चुकांवर ओरडणारी आई मुलांमध्ये तणाव आणि चिंता निर्माण करू शकते. त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का देऊ शकते.

३. आत्म-संयम, वर्तणूक आणि सामाजिक कौशल्ये:

आईच्या ओरडण्यामुळे मुलं घाबरु शकतात. भेदरू शकतात. स्तब्ध, होऊ शकतात. कॉम्प्युटर हँग होतो तशी. वर्तणुकीत समस्या निर्माण होतात. आईच्या ओरडण्याला उत्तर म्हणून मुलं उलट उत्तर, आक्रमकता, विरोध किंवा विद्रोह करू शकतात. हे साद प्रतिसादाचे प्रकरण आहे. त्यांचे चुकीचे वागणे त्यांच्या सामाजिक कौशल्यांना बाधा पोचवू शकते. आईने संयम बाळगून वर्तणूक केली तर मुलेही संयम बाळगून वर्तणूक करायला शिकतील.

४. भावनिक विकास:

आईच्या ओरडण्यामुळे मुलांच्या भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मुलं त्यांच्या भावना व्यक्त करण्यात कमी पडू शकतात. त्यांची भावनिक बुद्धिमत्ता कमी होऊ शकते. त्यांना आपल्या भावना दडपून ठेवायला शिकायला लागतं. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

५. आत्मसन्मान:

वारंवार ओरडण्यामुळे मुलांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो. त्यांनी स्वतःबद्दल निगेटिव्ह भावना बाळगायला सुरुवात केली तर त्यांचा आत्मविश्वास खालावतो. “तू तर बॅड बॉयच आहे” हे त्याला वारंवार सांगून पटवून देण्याने काय साधणार? मुलांचा स्वतःचा स्वतःवरच विश्वास नसेल तर शैक्षणिक, सामाजिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.

६. आईचे मानसशास्त्र:

आईचे वर्तनही तिच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते. ताण, चिंता, कौटुंबिक, आर्थिक, वैवाहिक समस्यांमुळे आईचा मूड बिघडू शकतो. आईनी स्वतःची मानसिकता सुधारली तर मुलांचे वर्तणूक सुधारते. मन पावन, पवित्र वातावरणात ठेवा. प्रसन्नतेने मिळवा, परम सुखाचा मेवा. बघायला गेलं तर, यादी मोठी समस्यांची. आवाक्याबाहेरची काळजी कशाला उद्याची. आईचे ताणतणाव पोखरती, तिच्या स्वतःच्या, व मुलाच्या मनाला आणि शरीराला. मनात नकोच जागा, त्यांच्यासाठी उरायला. आईने कायम चिंताग्रस्त राहून, काय साधणार. सशक्त मन, कधीच नाही कोलमडणार.

७. संवाद आणि सामंजस्य:

आई-मुलांमधील संवाद आणि सामंजस्य वाढवणे हे महत्वपूर्ण आहे. आईने आपल्या मुलांशी प्रेमळ, आदराने आणि सहनशीलतेने वागायला शिकायला हवं. जर मुलं चुका करतात, तर त्या चुका सुधारण्यासाठी प्रेमळ मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. कणभर चुकीला मणभर रागवायला नको. जुन्या चुका आठवून, आठवून रागवायला नको. केल्या चुकीला लगेच रागवायला तर हवेच. पण ते एक दोन वाक्यात असावे. पानभर रागवायला नको.

८. सकारात्मक पालनपोषण:

पॉजिटिव्ह पॅरेंटिंग हवे. प्रेम, आदर, आणि सहनशीलता हवी. मुलांना शिस्त लावण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन हवा. मुलं आत्मविश्वासाने, स्वावलंबी आणि सामर्थ्यवान बनू शकतात.

निष्कर्ष:

ओरडणारी, किंचाळणारी आई मुलांच्या मानसिकतेवर आणि भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम करू शकते. आईने सकारात्मक पद्धतीने मुलांचे पालनपोषण करणे आवश्यक आहे. त्यानी मुलं सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या स्थिर बनतील. आईने आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही लक्ष देणे आवश्यक आहे, ज्यामुळे तिच्या वर्तनात सकारात्मक बदल होऊ शकतात. कंट्रोल मॅडम, कंट्रोल.

लेखक : विद्यावाचस्पती डॉ. अनिल मोकाशी

बाल कल्याण केंद्र, मतीमंद, मूकबधिर, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा. जामदार रोड, काराभारीनगर, कसबा, बारामती, ४१३१०२,

९८२२३०२१३१ —- dranilmokashi@gmail. com

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती… मूळ इंग्रजी लेखक : ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (Retd) ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? मनमंजुषेतून ?

महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती… मूळ इंग्रजी लेखक : ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (Retd) ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

महाकुंभपर्वामध्ये गंगास्नान करण्यासाठी मी अजूनही गेलेलो नाही हे ऐकताच तो म्हणाला, “इतक्या मोठ्या स्तरावर हा महाकुंभमेळा आयोजित करणे म्हणजे पैशांचा आणि संसाधनांचा निव्वळ अपव्यय आहे, दुसरं काय?” तो स्वतः नास्तिक असल्याचे त्याने मला आधीच सांगितले होते.

मी हसतमुखानेच त्याला म्हणालो, “तुझ्या चष्म्यातून तुला सर्व धर्मांमधल्या केवळ वाईट गोष्टीच दिसत राहणार यात काही नवल नाही. पण एका सैनिकाच्या दृष्टिकोनातून मला तरी असे दिसते की, भारताने आपले शत्रू आणि मित्र या दोघांनाही या कुंभमेळ्याद्वारे एक अतिशय स्पष्ट इशारा दिलेला आहे.”

माझे बोलणे ऐकताच त्याने भुवया उंचावून म्हटले, “सैनिकी दृष्टिकोन? पण धर्म आणि सैन्यदलांचा काय संबंध?” 

“अगदी घनिष्ठ संबंध आहे. आता असं पाहा, कोट्यवधी लोक लांबलांबून येऊन प्रयागतीर्थी एकत्र जमले, इथे राहिले आणि सर्वांनी एका सामायिक श्रद्धेने गंगेमध्ये स्नान केले. यामधून किमान चार गोष्टी स्पष्ट होतात: –

  1. कोट्यवधी भारतीयांना अशा प्रकारे एकसंध समूहात एकवटता येणे शक्य आहे.
  2. अभूतपूर्व अशा प्रकारचा हा सोहळा घडवून आणण्यासाठी लागणारी योजनक्षमता आपल्यामध्ये आहे.
  3. एखाद्या सांघिक ध्येयावर जर अढळ विश्वास असेल, तर ते उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी, वैयक्तिक स्तरावर अपार कष्ट आणि गैरसोय सहन करण्याचा सोशिकपणा भारतीयांमध्ये आहे.
  4. आपल्या देशाचे नेतृत्व अत्यंत सक्षम आणि कणखर आहे.

अरे, अवकाशात भ्रमण करणाऱ्या उपग्रहांनाही दिसू शकेल इतका भव्य सोहळा आपल्या देशात आयोजित होतोय ही गोष्ट तुला अभिमानास्पद वाटत नाहीये का? मी तुला सांगतो, आपले शत्रूदेखील या सोहळ्याकडे आज अचंबित होऊनच, पण अतिशय सावधपणे पाहत असतील!”

त्याने नुसतेच खांदे उडवले आणि म्हणाला, “असेलही. पण माझा प्रश्न पुन्हा तोच आहे. सैनिकी दृष्टीकोनाचा इथे काय संबंध?” 

जरासा पुढे झुकत मी म्हणालो, “कल्पना करून बघ, एखाद्या युद्धाच्या प्रसंगी अशा तऱ्हेने संपूर्ण जनसमूह एकवटून जर देशाच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहिला तर युद्धावर किती जबरदस्त प्रभाव पडेल? पाकव्याप्त काश्मीर किंवा तिबेटला शत्रूच्या जोखडातून मुक्त करायचे ठरवून जर असा जनसमूह उद्या एकवटला तर? देशावर ओढवलेल्या एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी जर जनता अशा तऱ्हेने एकत्र आली आणि त्यांनी यथाशक्ती दान केले तर केवढी प्रचंड संपत्ती उपलब्ध होऊ शकेल माहितीये? हे बघ, कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यातून एक गोष्ट ठळकपणे सिद्ध होते – भारताची युद्धक्षमता केवळ सैन्यदलांचे शौर्य आणि त्यांच्या शस्त्रसामर्थ्यावर अवलंबून नव्हे, तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या जनतेच्या इच्छाशक्तीमध्ये आहे. जगातला कोणीही युद्धनीतिज्ञ माझे हे म्हणणे मान्य करेल.”

आता त्याच्या चेहऱ्यावर काहीसे कडवट आणि कठोर भाव दिसू लागले, “या मेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत कित्येक निरपराध लोकांना प्राण गमवावे लागलेत, आणि तू इथे बसून खुशाल राष्ट्रीय शक्तिप्रदर्शनाच्या पोकळ गप्पा मारतोयस? तुझं हे बोलणं तुला विचित्र नाही का वाटत?”

एक सुस्कारा सोडत मी उत्तरलो, “अरे, जरासा व्यापक विचार करून पाहा. ती दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथे जाणाऱ्या लोकांची संख्या कमी तर झालीच नाही – उलट वाढलीच. शिवाय, प्रशासनानेही तेथील व्यवस्था अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला. आपली जनता आणि प्रशासन या दोघांचाही निर्धारच यातून ठळकपणे दिसतो. चीनमध्ये जर अशी चेंगराचेंगरीची घटना घडली असती तर काय झालं असतं माहितीये? एकतर त्यांनी हा सोहळाच तातडीने गुंडाळून टाकला असता, किंवा मग गर्दी नियंत्रित करण्यासाठी राक्षसी ताकद वापरली असती – जे त्यांनी कोव्हिडकाळात केलंच होतं. त्यांच्या सैनिकांच्या गोळ्यांनी त्यांचेच नागरिक मृत्युमुखी पडतानाचे व्हिडिओ नाही का पाहिलेस तू?”

आता मात्र तो उपहासाने हसत म्हणाला, “मग काय? इतकं सगळं झालं तरी आपण आपला आनंदसोहळा साजरा करत राहायचं, असं तुझं म्हणणं आहे का?”

“सोहळा तर साजरा करायचाच. पण ही वेळ अंतर्मुख होऊन गंभीर विचार करण्याचीदेखील आहे.” 

“कसला गंभीर विचार?” तो जरा चिडखोरपणेच बोलला.

मी पुन्हा पुढे झुकत म्हणालो, “अरे, आईचं दूध प्यायलेला कोणीही शत्रू अशा वेळी आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील, आणि आपण जर गाफील राहिलो तर तो यशस्वी होईलही. “

माझी परीक्षा पाहत असल्याच्या अविर्भावात तो म्हणाला, “शत्रू आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील? ते कसं काय बुवा?”

त्याचा उपहास मला कळत होता, पण माझा प्रयत्न मी सोडला नाही. “हे बघ, कुंभमेळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे लोकांची आस्था, आणि दुसरं, आपलं कार्यक्षम नेतृत्व. आपला शत्रू एकतर लोकांची आस्था डळमळीत करण्याचा प्रयत्न करील, किंवा आपल्या डोक्यावर कमकुवत नेते बसवण्याचा प्रयत्न करेल. भारतातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल प्रभावित करण्यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला गेल्याबद्दल तू वाचलं नाहीस का?”

तो कुत्सितपणे उद्गारला, “ओहहो! आता मला माझ्यासमोर बसलेला ‘अंधभक्त’ स्पष्ट दिसायला लागला !”

मी नुसतीच मान हलवली. कारण, मुद्देसूद चर्चा सोडून आता तो वैयक्तिक टीका करू लागला होता. स्वतःमधल्या नकारात्मकतेमुळे आंधळा झालेला असूनही, तो मलाच विनाकारण ‘अंधभक्त’ ठरवू पाहत होता. मी मनातून पुरता चडफडलो होतो. पण शक्य तितक्या शांत स्वरात मी म्हणालो, “माझं दुर्दैव इतकंच की अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन असलेला, माझ्यातला एक सच्चा देशभक्त तुला दिसत तरी नाहीये, किंवा तू पाहूच इच्छित नाहीस. असो. “

याउप्पर त्याच्याशी कोणतीच सयुक्तिक चर्चा शक्य नसल्याने, मी तिथून निघून जाणेच श्रेयस्कर होते.

‘गुरुवाणी’ मधला एक श्लोक जाता-जाता सहजच माझ्या मनात उमटला, “हम नाहीं चंगे, बुरा नाहीं कोये, प्रणवथ नानक, तारे सोये।” म्हणजेच, “मी चांगला आहे असे नाही, इतर लोक वाईट आहेत असेही नाही, नानक प्रार्थना करतो, तोच (देव) आमचा तारणहार आहे!”

मूळ इंग्रजी लेखक : ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (सेवानिवृत्त)

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’… माहिती संग्राहक : संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’… माहिती संग्राहक : संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’…  सुश्री अचला जोशी… जन्म. १९ मार्च १९३८

अचला जोशी या वाइन बनविणाऱ्या राज्यातील या पहिल्या महिला उद्योजिका असल्या तरी आजही त्याच उमेद, प्रामाणिक व पारदर्शकपणे मद्याच्या या दुनियेत ‘वाइनलेडी’ म्हणून काम करत आहेत. वाइन म्हणजे दारू नव्हे आणि ही वाइन महिलांनीच प्यायची असे काही नाही, तसेच ती कोणीही सहजरीत्या घरीही बनवू शकतं. वाइनबाबतीत अशी ठळक वाइनशास्त्र सांगणारी आणि वाइन बनविण्याचा हा व्यवसाय ऋतुमानावर अवलंबून असल्याने त्याला जोडधंदा म्हणून आवळ्याचे ‘च्यवनप्राश’ आणि ‘तळोजा क्वील्ट’ या नावाने सुरू केलेल्या व्यवसायाला लंडनच्या बाजारात पोहोचवणाऱ्या श्रीमती अचला फडके-जोशी यांनी पनवेलमधील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना एक आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली आहे.

अचला जोशी या माहेरच्या अचला फडके. दादर हिंदू कॉलनीतील कॉलनी नर्सिंग होमचे डॉ. जी. एम. फडके हे त्यांचे पिता, तर मूत्रपिंड-तज्ज्ञे डॉ. अजित फडके हे त्यांचे सख्खे भाऊ होत.

त्या वेळच्या मुंबईतील माटुंग्यासारख्या ठिकाणी डॉक्टर फडकेंचे ते प्रशस्त घर म्हणजे साहित्य संघातील दिग्गजांचा हे मुक्त वावराचे ठिकाण. साहित्य व सांस्कृतिक वातावरण अचला यांची जडणघडण झाली असली तरी स्वत:ची हौस पुर्ण करत करत त्यांनी बीए व एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबत शिवणकाम व साहित्यप्रेम हेसुद्धा कायम ठेवले. शिक्षणानंतर काही वर्षांनी १९६० साली टाटा कंपनीमधील एका अभियंत्यांसोबत सुधाकर जोशी यांच्यासोबत विवाह झाला. नवरा आणि कळायला लागलेली दोन मुले जसजशी मोठी झाली त्याच वेळी संसाराच्या पटलावरील गृहिणीचे पात्र सोडून शिक्षणाचा अजूनही काही लाभ घ्यावा अशीही सल मनात कुरकुर करू लागल्याने एका वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून त्यांनी इंडियन काऊंसिलच्या प्रदर्शनात भारताच्या शिष्टमंडळात समन्वयकाची जबाबदारी मिळवली. याच जबाबदारीतील पहिला सोहळा पार पडताना स्वत:च्या कार्यपद्धतीवर अमेरिकन अधिकाऱ्यांचे मन कामातून जिंकणाऱ्या या शिष्टमंडळाला थेट एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्टीचे निमंत्रण मिळाले. याच पार्टीतील रेडवाइनच्या पहिल्या घोटातील चवीने तिने मायदेशी हीच वाइन बनविण्याची जिद्द उराशी बाळगली आणि अमेरिका वारीहून भारतात परतताना अचला यांनी वाइनइस्ट सोबत घेऊन भारतामध्ये प्रवेश केला. प्रवासादरम्यान वाइन कशी बनवितात, त्याचे फायदे-तोटे याविषयी पुस्तकी ज्ञान घेतल्यानंतर मुंबईतील एका रविवारच्या दुपारी अचला या माहेरी गेल्या असताना डॉक्टर भावाला आलेल्या भेट वस्तू मधील पाच किलो द्राक्षाच्या पेटीवर अचला यांची नजर गेली. द्राक्षपेटीतून पहिले द्राक्ष जिभेवर विरघळल्यानंतर अचला यांना अमेरिकेतील त्या रेडवाइनशी जुळत्या चवीचा अंदाज आला. माहेरवाशीण आई घरची ही द्राक्षपेटी स्वत:च्या घरात त्या घेऊन गेल्यावर त्यांच्या पतीने तेवढय़ाच तडफेने द्राक्षाची वाइन बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. लगेचच मोहम्मद अली रोडवरून सात लिटर काचेचा कार्गो, एअर लॉक अशा सामग्रीची खरेदी करण्यात आली. घरातील या आईच्या वाइन बनविण्याच्या पहिल्यावहिल्या प्रयोगात लहानग्यांनी पाच किलो द्राक्ष धुण्यापासून इतर कामांची मदत केली. बघता बघता जोशींच्या घरातील एका बाजूला द्राक्ष धुऊन त्यामध्ये इस्ट टाकून ते बनविण्याची प्रक्रिया पार पडली. तब्बल दोन महिन्यांनी म्हणजेच १९७० सालच्या सप्टेंबर महिन्यातील सुटीच्या दिवशी अचला यांचा भाऊ व पती सुधाकर यांच्या उपस्थितीमध्ये वाइन झाली का याची उत्सुकता म्हणून हा कार्गो उघडून पाहण्यात आला. ५ किलो द्राक्षाची त्या वेळी सुमारे ४ ते साडेचार लिटर वाइन जोशींच्या घरातील एका कोपऱ्यातील कार्गोमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आली. चव घेण्यासाठी त्या वेळी अचला यांचा भाऊ यांनी पुढाकार घेतला. पहिल्यावहिल्या घरातील वाइनचा हा प्रयोग अगदी छान पद्धतीने यशस्वी पार पडल्याचे पहिले रिमार्क अचलाबाईंना त्यांच्या घरातून मिळाले. त्यानंतर अचलाबाईंचा हा प्रवास सुरूच राहिला. लिकर बनविणारे पाच हजार लिटर क्षमतेपेक्षा मोठे कारखाने मुंबईबाहेर ठेवण्याच्या नियमातून अचलाबाईंच्या प्रवासाची वाट तळोजा औद्योगिक क्षेत्राकडे १९७९ साली वळली. आजही अचलाबाई इन व्हॉगेस क्रिएशन या कंपनीच्या माध्यमातून प्रिन्सेस ही रेड, व्हाइट, पोर्ट व हनी वाइन बनवितात. सुमारे दीड लाख लिटर वाइनची उत्पादन काढताना एका बॅचमध्ये साचून ठेवलेले द्राक्षाचे अर्क गाळून वाइन तयार केली जाते.

घराच्या एका कोपऱ्यात स्वत:च्या कुटुंबासाठी बनविलेल्या वाइनला आज देशभरात मोठी मागणी होत आहे. १९७३ ते २०१६ या काळात आंध्र प्रदेश, केरळ सहित सैनिक कॅन्टिनमध्ये अचला जोशींची प्रिन्सेस रेडपोर्ट वाइन ठेवली जाते.

ऋतुवारीवर विसंबणाऱ्या वाइनच्या या व्यवसायामुळे कामगारांवर गदा न येण्यासाठी त्यांनी तळोजा क्वील्ट या नावाने मिलमधून विकत आणलेल्या संपूर्ण कॉटनच्या कपडय़ाच्या साह्य़ाने आणि विविध रंगसंगतीचा आधार घेऊन ऊबदार गोधडय़ा शिवल्या जातात. अमेरिकेसह लंडनमध्ये मोठय़ा कंपन्या गोधडय़ांचे प्रदर्शन मांडतात.

१९८३ साली अचला जोशी यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट उद्योजकतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अचला जोशी या ‘द फर्स्ट वाईन लेडी’ सोबतच लेखिका असून An Amazing Grace, आश्रम नावाचे घर, हरी नारायण आपटे (चरित्र), ज्ञानतपस्वी रुद्र (न. र. फाटक यांचे चरित्र), चंद्रमे जे अलांछन : अचला जोशी यांचे बंधू डॉ. अजित फडके यांचे चरित्र अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

नोव्हेंबर २०१३ मध्ये सावंतवाडी येथे झालेल्या कोमसापच्या ४ थ्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अचला जोशी होत्या..

अचला जोशी या मुंबईच्या माटुंग्यामधील श्रद्धानंद आश्रमाच्या अध्यक्ष म्हणून काम करतात. या महिलाश्रमाशी त्या चार दशकांहून अधिक काळ जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी या आश्रमातील महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी रजया, मसाले बनवून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ शोधली. तसेच त्या दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी आहेत.

माहिती संकलन : श्री संजीव वेलणकर

(संदर्भ : इंटरनेट/ श्री संतोष सावंत.) 

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन…” –  माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन…” –  माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ सुश्री प्रभा हर्षे

भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन…

हे आहे भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन, येथून उतरून पायी चालत गेल्यास प्रवासी तीन मोठ्या तीन देशात पोहोचतात !

तुम्हाला माहीत आहे का, भारतातील शेवटचे रेल्वे स्थानक कोणते आहे? हे स्थानक एकाच वेळी तीन देशांना जोडते, आणि या स्टेशनवर उतरून जर तुम्ही पायी चालत गेलात, तर थेट परदेशात पोहोचाल ! चला, जाणून घेऊया हे अनोखे रेल्वे स्थानक कोणते आहे.

ते आहे, भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक – सिंहाबाद स्टेशन

भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक पश्चिम बंगालमधील सिंहाबाद रेल्वे स्टेशन आहे. हे स्थानक बांगलादेशच्या सीमेलगत स्थित आहे. जेव्हा ब्रिटिश भारत सोडून गेले, तेव्हा हे स्थानक जसे होते, तसेच आजही आहे.

पूर्वी येथे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक सुरू होती, परंतु सध्या प्रवासी गाड्यांसाठी हे स्थानक बंद आहे. येथे केवळ मालगाड्यांची वाहतूक केली जाते आणि काही गाड्या थेट बांगलादेशपर्यंत जातात. हे स्थानक पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर परिसरात स्थित आहे.

ब्रिटिशकालीन वारसा :

सिंहाबाद रेल्वे स्थानक ब्रिटिश काळात बांधण्यात आले होते. आजही येथे कार्डबोर्ड तिकिटे पाहायला मिळतात, जी आता इतर कोणत्याही रेल्वे स्थानकावर वापरली जात नाहीत. येथे अजूनही हाताने नियंत्रित सिग्नल गिअर्स, ब्रिटिश काळातील टेलिफोन आणि उपकरणे वापरली जातात.

या रेल्वे स्थानकावर एक छोटे कार्यालय, दोन रेल्वे क्वार्टर आणि कर्मचारी कार्यालय आहे. विशेष म्हणजे, येथे “भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक” असा एक फलक लावण्यात आला आहे,

तीन देशांना जोडणारे अनोखे स्थानक:

सिंहाबाद रेल्वे स्थानकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, येथे उतरून जर तुम्ही पायी चालत गेलात, तर तुम्ही थेट तीन देशांत प्रवेश करू शकता.

ते देश म्हणजे – – 

  1. बांगलादेश
  2. नेपाळ
  3. पाकिस्तान

ही भारतातील एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक रेल्वे लिंक असून, आजही ती भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालवाहतुकीसाठी वापरली जाते.

उर्वरित भारताशी संपर्क कमी:

पूर्वी कोलकाता-ढाका रेल्वे मार्गाचा एक भाग म्हणून सिंहाबाद स्टेशनला महत्त्व होते. मात्र, सध्या येथून कोणतीही प्रवासी रेल्वे धावत नाही. त्यामुळे हे स्थानक निर्जन आणि शांत बनले आहे.

हे स्थानक ऐतिहासिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, या स्थानकाने अजूनही ब्रिटिशकालीन आठवणी जपून ठेवल्या आहेत.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गेले गायचेच राहूनी ! ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“गेले गायचेच राहूनी !  ☆ श्री संभाजी बबन गायके 

तो माझ्याएवढाच तेवीस चोवीस वर्षांचा. आम्हां दोघांनाही रायफल मस्त चालवता यायची… निशाणा एकदम अचूक आमचा. पण त्याला गिटार वाजवता यायची आणि तो गायचाही अतिशय सुरेख. एल्टन जॉनचं Sacrifice तर तो असा काही गायचा की बस्स! माझ्या आणि त्याच्या भेटीचा शेवट याच गाण्याने व्हायचा नेहमी… किंबहुना हे गाणं ऐकण्यासाठीच मी त्याच्याकडे जात असे. माझ्यासारखाच तोही इथं सैन्याधिकारी बनायला आला होता. त्याचे वडील बँकेत नोकरीला तर आई माझ्या आईसरखीच साधी गृहिणी होती. तो मेघालयातल्या शिलॉंग इथे जन्मलेला… शिलॉंग म्हणजे पृथ्वीवरील एक स्वर्गच जणू! इथेच मी एका शाळेत शिकलो. तो माझ्यापेक्षा केवळ शेहचाळीस दिवसांनी मोठा होता. इथल्याच एका प्रसिद्ध शाळेत शिकणारा हा गोरागोमटा गडी अंगापिंडाने मजबूत पण वागण्या-बोलण्यात एकदम मृदू. इथल्या तरुणाईच्या रमण्याच्या सगळ्या जागा आणि बागा आम्हांला ठाऊक होत्या. त्यावेळी त्याची आणि माझी अजिबात ओळख नव्हती… माझ्यासारखाच तो शहरात फिरत असेल, शाळा बुडवून सिनेमाला जात असेल… त्यालाही मित्र-मैत्रिणी असतील… त्याचीही स्वप्नं असतील माझ्यासारखीच… भारतीय सैन्याचा रुबाबदार गणवेश परिधान करावा… शौर्य गाजवावे! आणि योगायोगाने आम्ही दोघेही एकाच प्रशिक्षण संस्थेत एकाच वर्षी दाखल झालो. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नईची १९९६ची हिवाळी तुकडी. पण तो काही माझ्या कंपनी किंवा प्लाटूनमध्ये नव्हता. आमची ओळख झाली ती परेड ग्राउंडवर. दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय थकवणा-या वेळापत्रकानंतर त्याला त्याच्या बराकीत भेटायला जायचं म्हणजे एक कामच होतं… पण मी ते आनंदाने करायचो.. कारण त्याला भेटल्यावर आणि विशेष म्हणजे त्याचं गाणं ऐकल्यावर थकवा पळून जाई. आमच्या भेटीचा समारोप त्याच गाण्याने व्हायचा…. त्याने आधी कितीही वेळा ते गाणं गायलेलं असलं तरी मी त्याला एकदा.. एकदा… पुन्हा एकच वेळा… ते गाणं गा! असा त्याला आग्रह करायचो… आणि तो सुद्धा त्यादिवाशीचं त्याचं अखेरचं गाणं गाताना भान हरपून गायचा… त्याचं गाणं ऐकायला इतर बरेच प्रशिक्षणार्थी अधिकारी उपस्थित असायाचे. एकदा त्याने त्याच्या प्रेयासीचं नावही मला सांगून टाकले… आणि जेंव्हा जेंव्हा तिचा उल्लेख मी करयचो तेंव्हा तेंव्हा त्याचे गुबगुबीत गाल आणखी लाल व्हायचे… ते दोघं लग्न करणार होते स्थिरस्थावर झाल्यावर! त्याने त्याच्या आणि तिने तिच्या घरी अजून काही सांगितले नव्हते तसे! त्याच्या पाकिटात तिचा एक फोटो मात्र असे! दिवस पुढे सरकत होते… आमचे प्रशिक्षण जोमाने सुरु होते… आणि मी त्याचे गाणे ऐकायला जाणेही तसे रोजचेच होऊन गेले होते! 

ज्याच्यासाठी अट्टाहास केला होता तो दिवस अखेर उगवला… अंतिम पग नावाची पायरी पार करताना मनाला जे काही जाणवतं ते इतरांना कधीही समजणार नाही…. अभिमान, जबाबदारीची जाणीव, केलेल्या श्रमाचं फळ मिळाल्याची भावना… सारं कसं एकवटून येतं यावेळी. आम्ही दोघांनीही त्यादिवशी अंतिम पग पार केले आणि आम्ही भारतीय सेनेचे अधिकारी झालो! 

या दिवसाच्या पूर्वसंध्येला मी त्याच्या बराकीत गेलो होतो… पण तो त्याच्या आई-बाबांना घ्यायला बाहेर गेला होता… त्याचा थोरला भाऊ सुद्धा यायचा होता पासिंग आऊट परेड बघायला! त्यामुळे त्यादिवशीची आमची भेट झालीच नाही. दुस-या दिवशी परेड कार्यक्रम पार पडल्यानंतरच्या गडबडीत मला तो भेटला नाही. सायंकाळी आम्हां सर्वांनाच अकादमीचा निरोप घ्यायचा होता. त्याच्या आधी काही मिनिटे मी त्याच्या बराकीत पोहोचलो… तोवर तो तिथून निघून गेला होता… आमची भेट नाही झाली! तो त्याच्या टेबलवर जिथे त्याची गिटार ठेवत असे त्या जागेकडे पाहत मी तिथून माझ्या बराकीत परतलो आणि माझ्या गावी निघालो.

जंटलमन कडेट क्लिफर्ड किशिंग नॉनगृम त्याचं पूर्ण नाव होतं. त्याला पहिलीच नेमणूक मिळाली ती रणभूमीची राणी म्हणवल्या जाणा-या 12 JAK LI (१२, जम्मू and काश्मीर लाईट इन्फंट्री) मध्ये. इथे सतत काहीतरी घडत असते! त्याला शेवटचे भेटून अठरा महिने उलटून गेले होते. त्याच दरम्यान पाकिस्तानी आपल्या हद्दीत लपून छपून घुसले आणि त्यांना तिथून हुसकावून लावणे हे एक मोठेच काम होऊन बसले. त्यावेळी मी पठाणकोट येथे नेमणुकीस होतो. आपल्या सैन्याने पाकिस्तानने बळकावलेल्या चौक्या एका मागून एक पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याची मालिकाच सुरु केली होती… पण हे काम अतिशय जीवघेणे होते! ताज्या दमाचे अधिकारी आणि सैनिक या लढाईत अगदी पुढच्या फळीमध्ये होते…. रणभूमीला ताज्या रक्ताची तहान असते असं म्हणतात! युद्धात यश तर रोजच मिळत होते पण बलिदानाच्या काळीज पिळवटून टाकणा-या बातम्याही रोजच कानी पडत होत्या! अगदी काहीच दिवसांपूर्वी आपल्यासोबत हसणारा आपला सहकारी आज शवपेटीमध्ये पाहून दु:ख आणि शत्रूविषयी प्रचंड राग अशा संमिश्र भावना मनात दाटून यायच्या! 

त्यादिवशी मी माझ्या युनिटच्या रणगाडा दुरुस्तीच्या प्रशिक्षणात अगदी रात्री उशिरापर्यंत व्यग्र होतो. युनिटमध्ये माझ्यासाठी फोन आला… कुणी इन्फंट्री ऑफिसर माझ्याशी बोलू इच्छित होते. हात पाय ऑईल-धुळीने माखलेले अशा अवस्थेत मी धावत जाऊन तो कॉल घेतला… तर पलीकडून क्लीफी अर्थात क्लीशिंग क्लिफर्ड नांगृम साहेब बोलत होते.. क्लीफी हे मी त्याला ठेवलेलं टोपणनाव. त्याचा आवाज अगदी नेहमीसारखा… उत्साही! कारगिल लढाईमध्ये निघालो आहे! त्याने अगदी अभिमानाने सांगितले… आवाजात कुठेही भीती, काळजी नव्हती. लढाईत शौर्य गाजवण्याची संधी मिळत असलेली पाहून एका सैनिकाच्या रक्ताने उसळ्या घ्यायला सुरुवात केली होती…. भेटू युद्ध जिंकून आल्यावर… भेटीत तुझ्या आवडीचं गाणं नक्की गाईन… तेच नेहमीचं Sacrifice.. त्यागाचं गाणं! विश्वासाचं गाणं! अकादमीमधून निघताना तुझी भेट होऊ शकली नाही.. मित्रा! माफ कर!… तो म्हणत होता आणि माझ्या डोळ्यांसमोर तो साक्षात उभा राहिलेला होता! गिटार ऐवजी आता त्याच्या हातात मला रायफल दिसत होती! 

पर्वतांच्या माथ्यांवरून शत्रू आरामात निशाणा साधत होता. बर्फाने आच्छादलेल्या पहाडांवर चढून वर जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला कवेत घेणे. ७० अंशाची चढण चढून जाणे आणि तेही युद्ध साहित्य पाठीवर घेऊन, वरून अचूक गोळीबार सुरु असताना…. कल्पनाच धडकी भरवणारी. एक गोळी म्हणजे एक यमदूत…. अंधारात, बर्फावरून पाय निसटला म्हणजे खाली हजारो फूट दरीत कायमची विश्रांती मिळणार याची शाश्वती. शत्रू पाहतो आहे… भारताचे सिंह पहाड चढण्याच्या प्रयत्नात आहेत… त्यांना ही कामगिरी शक्यच होणार नाही हे ते ओळखून आहेत. समोरून, वरून प्रचंड गोळीबार होत असताना या मरणाच्या पावसात कोण चालेल? त्यांनी विचार केला असावा. त्यांचा गोळीबार तर थांबणार नव्हताच… त्यांची तयारी प्रचंड होती! पहाड जिंकायचा म्हणजे शत्रूच्या नरडीला हात घालावाच लागणार होता…. आणि हे करताना त्या मरणवर्षावात चिंब भिजावेच लागणार होते… तुकडीतील किमान एकाला तरी. अशावेळी हा नक्की सर्वांच्या पुढे असणार हे तर ठरलेले होते. त्याला त्याच्या जीवाची पर्वा तरी कुठे होती… सोपवलेली कामगिरी पडेल ती किंमत मोजून फत्ते करायचीच हा त्याचा निर्धार होता… धोका पत्करणे भागच होते! 

सत्तर अंश उभी चढण तो लीलया चढला…. दहा तास लागले होते त्याला पहाडाच्या टोकापर्यंत पोहोचायला…. गोळीबाराच्या गदारोळात शत्रूवर चालून गेला… शत्रूला हे असे काही कुणी करेल याची कल्पनाच नव्हती… ते वरून आरामात त्यांच्या शस्त्रांचे ट्रिगर दाबत बसले होते.. त्यांच्या टप्प्यात येणा-या भारतीय सैनिकांवर गोळीबार करीत होते. खालून आपल्या बोफोर्स तोफा आग ओकत होत्याच… पण शत्रूने जागाच अशा निवडल्या होत्या की तिथे फक्त माणूस पोहोचू शकेल! आणि तिथे कुणी माणूस पोहोचू शकेल असे शत्रूने स्वप्नातसुद्धा पाहिले नव्हते! तो एखाद्या वादळवा-यासारखा शत्रूच्या बंकरसमोर पोहोचला… बंकरमध्ये हातगोळे फेकले आणि त्याच्या हातातल्या रायफलने दुश्मनाच्या मरणाचे गीत वाजवायला आरंभ केला… जणू तो काही गिटारच्या ताराच छेडतो आहे… अचूक सूर! सहा शत्रू सैनिक त्याने त्यांच्या अंतिम यात्रेला धाडून दिले! एक धिप्पाड शत्रू सैनिक त्याच्यावर झेपावला… हातातल्या रायफली एवढ्या जवळून एकमेकांवर झाडता येत नाहीत…. अशावेळी क्लिफर्डने शाळेत असाताना गिरवलेले बॉक्सिंगचे धडे कामी आले… पाहता पाहता ते धिप्पाड धूड कायमचे खाली कोसळले… क्लिफर्ड साहेबांनी त्याने जणू त्या पहाडाला मोठे भगदाडच पाडले होते…. आपल्या नेत्याचा हा भीमपराक्रम पाहून त्याच्या मागोमाग मग त्याचे सैनिक पुढे सरसावले आणि त्यांनीही प्रचंड वेगाने उर्वरीत कामगिरी पार पाडली…. Point 4812 आता भारताच्या ताब्यात आले होते! 

पण पावसात बाहेर पाऊल टाकले म्हणजे भिजणे आलेच… हा गडी तर खुल्या आभाळातून होणा-या वर्षावात पुढे सरसावला होता… रक्ताने भिजणे साहजिकच होते… शरीराची शत्रूने डागलेल्या गोळ्यांनी चाळण झालेली…. केवळ २४ वर्षांचा तो सुकुमार देह… आता फक्त एकाच रंगाची कहाणी सांगत होता…. I gave my today for your tomorrow! महावीर लेफ्टनंट क्लीशिंग क्लिफर्ड नांगृम साहेब धारातीर्थी पडले! हेच तर स्वप्न असतं प्रत्येक भारतीय सैनिकाचं.. ताठ मानेने मरणाला सामोरे जायचं… राष्ट्रध्वजात गुंडाळले जाऊन घरी परतायचं… इथं या मरणाला जीवनाच्या सार्थकतेची किनार असते! 

तो लवकरच सुट्टीवर घरी येणार होता म्हणून थोरल्या भावाने आपल्या विवाहाची तारीख पुढे ढकलली होती… बाकी सर्व तयारी झालेलीच होती.. फक्त त्याची सर्वजण वाट पहात होते…. तो आला पण फुलांनी शाकारलेल्या, तिरंगा लपेटलेल्या शवपेटीत! पीटर अंकल आणि सेली आंटीच्या दु:खाला कोणतेही परिमाण लावता येणार नाही. ते त्याच्या शवपेटीवर डोकं टेकवून त्याच्या आत्म्याच्या कल्याणाची प्रार्थना पुटपुटत आहेत! त्याच्या सन्मानार्थ हवेत झाडल्या गेलेल्या गोळीबाराच्या फैरी मेघालयाच्या आभाळातल्या मेघांना भेदून वर जात आहेत… ढगांच्या मनातही मोठी खळबळ माजली आहे… ते कोणत्याही क्षणी बरसू लागतील असं वाटतं आहे७… ७ मार्च, १९७५ रोजी जन्मलेले Captain Keishing Clifford Nongrum आता पन्नास वर्षांचे असते… तुमच्या आमच्या सारखे संसारात आनंदात असते… पण देश सुखात रहावा म्हणून त्यांनी आपले तारुण्य अर्पण केले! 

माझ्या टेबलवर मी एका सैनिकाचा पुतळा ठेवलेला असतो कायम… या पुतळ्याच्या हातात गिटार मात्र नाही… रायफल आहे! माझ्या जिवलग मित्राच्या तोंडून Sacrifice अर्थात त्यागाचं गाणं एकदा शेवटचं ऐकण्याचं राहून गेलं… देवाच्या घरी भेट होईल तेंव्हा मात्र मी त्याला आग्रहाने तेच गाणं गाण्याचा आग्रह मात्र निश्चित धरणार आहे! 

– – लेफ्ट. कर्नल संदीप अहलावत 

(Captain Keishing Clifford Nongrum साहेबांचे मित्र लेफ्ट. कर्नल संदीप अहलावत साहेब यांनी एका फेसबुक लेखात इंग्रजी भाषेत वरील भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचे मी जमेल तसे मराठी भाषांतर आपल्यासाठी मला भावले त्या शैलीत केले आहे. यात काही कमीजास्त असू शकते. अहलावत साहेबांची परवानगी घेता नाही आली, क्षमस्व! सुधारणा असतील तर त्या निश्चित करेन!)

लहानपणी खेळ खेळताना हे छोटे Keishing Clifford साहेब स्वत: बनवलेली लाकडी रायफल हाती धरत. घरच्यांना अजिबात कळू न देता त्यांनी सैन्याधिकारी होण्यासाठीची परीक्षा दिली होती! अत्यंत कठीण प्रशिक्षण लीलया पूर्ण केले होते. सियाचीन ग्लेशियरवर नेमणुकीस असताना तिथे झालेल्या हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या बारा सैनिकांचे प्राण उणे ६० अंश तापमानात त्यांनी अथक प्रयत्न करून वाचवले होते. सुट्टीवर आल्यावर आपल्या शहरातील विविध शाळा-महाविद्यालयात फिरून व्याखाने देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. सैन्यात अधिकारी कसे व्हावे या विषयावर त्यांनी स्वहस्ताक्षरात सविस्तर माहिती लिहून ठेवली होती. ते देणार असलेले शेवटचे व्याख्यान त्या शाळेच्या परीक्षा सुरु असल्याने होऊ शकले नव्हते… त्यांचे मित्र संदीप अहलावत साहेबांनी नंतर त्याच शाळेत जाऊन दिले कारण हे व्याख्यान द्यायला Captain Keishing Clifford Nongrum हयात नव्हते! Captain Keishing Clifford Nongrum यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या भावाने गरीब मुलांसाठी एक फुटबॉल क्लब स्थापन केलाय. यासाठी लागणारा निधी हे विद्यार्थी स्वत: एक बेकरी चालवून त्यातून मिळणा-या पैशांतून भागवतात. साहेबांचे आई वडील कारगिलच्या त्या पहाडांवर स्वत: जाऊन आपला लाडका लेक जिथे धारातीर्थी पडला होता ती जागा बघून आले! साहेबांच्या स्मृती शिलांग मध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. आपले लोक ही बलिदाने विसरून जातात याचा अनुभव साहेबांच्या कुटुंबीयांनी सुद्धा घेतला आहे… पण जेंव्हा एखादी महिला साहेबांच्या बाबतीत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सर्व बातम्यांची कात्रणे दाखवायला येते, एखादा माणूस त्यांच्या दरवाजावर माथा टेकवून त्याने धरलेला उपवास सोडायला येतो… तेंव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो. देशाचा दुस-या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार, ‘महावीर चक्र’ प्राप्त करणारा मेघालयातील हा पहिलाच तरुण आहे, ही बाबही त्यांना अभिमानाचे क्षण देऊन जाते! आज इतक्या वर्षांनतर साहेबांचे कोर्स मेट अर्थात OTA मधील सहाध्यायी त्यांच्या घराला भेट देतात, साहेबांना मानवंदना देतात, तेंव्हा आपण एकटे नाही आहोत… देश आपल्या मागे उभा अही, ही त्यांची भावना दुणावते. पूर्वोत्तर राज्यातही देशभक्तीची बीजे खोलवर रुजली आहेत, याचेच हे प्रत्यंतर असते. जय हिंद! 

– – – तुम भूल न जाओ इनको… इसलिये कही ये कहानी! 

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares