मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्त्रियांची-एनर्जी! (Feminine energy) ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ स्त्रियांची-एनर्जी ! (Feminine energy) ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच Feminine energy असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते.

ही एनर्जी पालन पोषण करणारी, प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच एक मोठी गोष्ट आहे….. आकाशात सूर्य असतो तो दिवसभर काय करतो?  तो फक्त असतो. त्याच्या असण्यानंच खूप काही होतं, तशीच ही ऊर्जा केवळ “असण्याची ऊर्जा” आहे.

ही एनर्जी घरात असल्यानं घरात स्नेह,ओलावा,चैतन्य आहे,घरात उत्साह आहे, सौंदर्य आहे. तिनं काही करणं हे अतिशय सुंदर एक्स्ट्रा काम आहे, एनर्जीचा उपयोग करुन ती स्वयंपाक करते , घर सजवते.  पण कधी तिनं ही एनर्जी वापरुन काही केलं नाही तरी तिची किंमत कमी होत नाही, ती एनर्जी घरात आहे आणि ते असणंच एक समाज- देणं आहे. घरासाठी तर वरदान आहे

याचा अनुभव प्रत्येकाला आहे ,एखाद्या एकट्या रहाणा️ऱ्या  पुरुषाचं घर, बॅचलरच्या रुमचं उदाहरण घेऊ,

तिथे गेल्यावर कसं वाटतं , ते अनुभवा. तिथे काहीतरी उणिव वाटते ती कसली?

तर फेमिनाईन एनर्जीच तिथं नाही….किंवा घरातली आई/ पत्नी बाहेरगावी गेली आणि घरात इतर कोणतीही स्त्री नसेल तर घरात कसं वाटतं ते पण तपासा.

दोन दिवस कदाचित बदल चांगला वाटेल, पण नंतर मात्र सगळी कामं करणारे, सेवा देणारे असूनही काहीतरी रिकामं वाटेल, रुक्ष वाटेल….  ती उणिव आहे केवळ स्त्री एनर्जीची.

लग्न झाल्यावर लेक घर सोडून जाते तेव्हा घर रितं रिकामं होतं—ही ऊर्जा जाते,  फक्त घरातली मुलगी नाही, ही ऊर्जा पण तिच्यासोबत जाते…

अगदी घरातलं लहान बाळ एखादी मुलगी असेल तर घरातलं वातावरण पहा आणि तिचं असणं म्हणजे काय ते पण फील करा. ती एनर्जी त्या नवजात मुलीतही आहे…ही एनर्जी निसर्गाची निर्मितीची- क्रिएशनची ऊर्जा आहे,

घरातली सगळी प्रगती, सगळयांचा विकास, सगळयांचं खूप पुढे जाणं, यश प्राप्ती होणं , यासाठी तीच एनर्जी वापरली जाते….

मुलांच्या अभ्यासातल्या यशासाठी हीच घराघरातली सरस्वती आहे—

नव-याच्या आर्थिक यशाचं कारण हीच लक्ष्मी आहे…

घरातली प्रत्येक स्त्री काय देते? काय करते?

तर ती असते ! तिचं असणंच देणं आहे, तिनं आणखी काही करायची गरजच नाही, (तरी ती इतकं करते.)

तिच्या असण्याचीच किंमत खूप आहे जी पैशात मोजता येत नाही

जिथं अनादर आणि अपमान होतो, तिच्या एनर्जीचं शोषण होतं ,तिथं ती नकारात्मक होते, आणि

सगळया घराला त्याचे परिणाम भोगावे लागतात,

म्हणूनच आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी म्हणून पूजा करायला सांगितलंय.

पूजा प्रतिकात्मक आहे – पूजा म्हणजे आदर आणि कदर करणे…

आपल्या यशात आपल्या सुखात तिचा न दिसणारा वाटा मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे…!

मला वाटतं प्रत्येक स्त्रीला आपल्यातल्या या एनर्जीची खात्री पटली तर तिच्या मनातला अपराधीभाव आणि न्यूनगंड लगेचच जाईल.

वीजेसारखी ही ऊर्जा दिसत नाही, पण असते. एवढंच काय तर, स्त्रीच्या ऊर्जेवर घराचं घरपण टिकून असतं.

तिच्या कामांमधून ऊर्जा अभिव्यक्त होते , आणि त्यामुळे इतरांना पुढे जाता येतं…कोणत्याही स्त्रीनं स्वतःची किंमत आपण नोकरी करतो की नाही, पैसा कमवतो की नाही, या निकषावर करायची गरज नाही.

अनुकूल परिस्थिती नसेल आणि स्त्रीआयुष्यातल्या ऋतुप्रमाणे कधी थांबावं लागलं तरी स्वतःला आळशी, निरुपयोगी समजू नका,  कारण निसर्गाची प्रचंड ऊर्जा पेलून ती इतरांना सहज देत तुम्ही स्थिर उभ्या आहात ज्यासाठी तुम्ही ताकत लावलेली आहे…

हे घरात नुसतं बसणं नाही, हे घरात ‘असणं’ आहे, जे अमूल्य आहे.

सर्व स्त्री वर्गाला मनापासून धन्यवाद आणि खूप खूप सदिच्छा

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भलत्याच निघाल्या आजीबाई… ☆ संग्रहिका – सौ.स्वाती घैसास ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ भलत्याच निघाल्या आजीबाई… ☆ संग्रहिका – सौ.स्वाती घैसास ☆

बऱ्याच वर्षांपासून बागेत एक आजी भेटतात. प्रत्येक वेळी माझा व्यवसाय बदलत राहतात. कधी मला विचारतात, ‘ काय गं कसा चालू आहे तुझा नकली दागिन्यांचा व्यवसाय?’

कधी विचारतात- आमच्या शेजारचा यश तुझ्याच पाळणाघरात येतो का गं?

त्यांच्या चौकशीनुसार मी आतापर्यंत भाजी, पनीर, कपडे असं बरंच काही विकलेलं आहे.

शिवाय सरकारी नोकरी, बँकेत नोकरी, प्रायव्हेट नोकरी अशा नोकऱ्यादेखील केलेल्या आहेत.

हे आणि असं बरंच काही.

पहिले एक दोन वेळा मी त्यांचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी वेगळं काम मला दिलेलं बघून मनात म्हटलं, कदाचित आजींना स्मृतिभ्रंश वगैरे असेल, आपण कशाला उगीच नकारघंटा लावून त्यांना त्रास द्यायचा.

काही महिन्यांपूर्वी भेटल्या तर मला म्हणाल्या, ‘ बरी आहे का गं तुझी तब्येत?’

मी काय म्हणणार, बरी आहे म्हटलं.

आज पुन्हा खाली भेटल्या.

बाकावर मैत्रिणीबरोबर बसलेल्या होत्या. मला म्हणाल्या, ‘ शाळेला सुट्टी लागली का गं तुझ्या?’

मी म्हटलं, ‘ हो लागली.’

माझ्याबरोबर पण माझी मैत्रीण होती, तिने पुढे गेल्यावर विचारलं, ‘ काय गं, कसली शाळा?’

मी- अगं आजी काहीही विचारतात. बहुतेक स्मृतिभ्रंश आहे त्यांना, म्हणून मी पण हो ला हो करते.

तितक्यात मागून आजींचा त्यांच्या मैत्रिणीला बोलताना आवाज आला, ‘ बघ, मी तुला म्हटलं होतं ना, ती थोडी वेडी आहे अगं. प्रत्येकवेळी मी तिला वेगळंच काहीतरी विचारते आणि तीदेखील सगळ्याला हो म्हणते. थोडा परिणामच झालेला आहे तिच्या डोक्यावर. आजपण बघ कशी शाळेला सुट्टी लागली का विचारलं तर हो म्हणाली’

भलत्याच निघाल्या आजीबाई

🤭😂😝

संग्रहिका – सौ. स्वाती घैसास

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वाचनाचे फायदे… ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वाचनाचे फायदे… ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170,   e-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अक्षय्य तृतीया… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ 🚩 ‘अक्षय्य तृतीया’ 🚩 ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

“निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका..!”

३ मे ला अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो होतो. माझे साहित्यिक मित्र ही खरेदीला आले होते.

ते माझ्या कुंभार मित्राला म्हणाले “मडकं दे..!”

तो पटकन त्यांच्याकडे बघून म्हणाला, ” अहो या प्रसंगी तरी ‘मडकं’ म्हणू नका..!!”

खरेतर मलाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी मी त्याला विचारले, “मग काय म्हणतात याला?”.

“स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला केळी व स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला करा म्हणतात”.

माझ्या मराठी शब्दकोषात दोन शब्द वाढले.!!

मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्तते नुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते अशी माहिती झाली.

पाण्याचा …        माठ

अंत्यसंस्काराला.. मडकं

नवरात्रात …        घट

वाजविण्यासाठी.. घटम्

संक्रांतीला…        सुगडं

दहिहंडीला…       हंडी

दही लावायला…   गाडगं

लक्ष्मीपूजनाचे…   बोळकं

लग्न विधीत…… अविघ्नकलश

आणि

अक्षय्य तृतीयेला…केळी / करा

खरंच आपली मराठी भाषा समृद्ध व श्रीमंत आहेच…!!!

मला मंगल प्रसंगी कुमारिका हातात धरतात त्याला कऱ्हा म्हणतात.

हे माहिती होते पण अक्षय्य तृतीयेला ‘केळी’ व ‘करा’ म्हणतात हे तर माहित नव्हते, तुम्हाला  माहीत होते का ?

मला माहित नसलेली माहिती, एका मित्राने मला पाठवली आणि मी आपल्यासमोर मांडली 🙏🏻

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दोन सुपुत्र भारतमातेचे… विलास डोळस ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ दोन सुपुत्र भारतमातेचे… विलास डोळस ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

एक जण भारतीय “लोकशाहीला” शिस्त लावणारा तडफदार माजी “निवडणूक आयुक्त” “टी.एन.शेषन” तर दुसरा कोकण रेल्वे,दिल्ली मेट्रो रेल्वे, सारख्या चमत्काराचा निर्माता “मेट्रोमॅन” “ई.श्रीधरन” हे दोघंही आपआपल्या क्षेत्रात,टॉपचे अधिकारी तर होतेच,पण आप-आपल्या कामामुळे अख्ख्या देशाची व्यवस्था त्यांनी सुधारून दाखवली.

पण गंमत,म्हणजे हे दोघेही अधिकारी तुम्हाला खरं वाटणार नाही अगदी  प्राथमिक शाळेत असल्यापासून एकाच वर्गात शिकत होते आणि पहिल्या नंबरा साठी त्यांच्यात त्या वेळी तुफान स्पर्धा चालायची.

“ई.श्रीधरन” यांनी एका मुलाखतीमध्ये त्याकाळातल्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

“दोघेही मुळचे केरळचे”. १९४२ साली तिथल्या पलक्कड या गावातल्या सर्वात फेमस असलेल्या बेसल एव्हान्जीकल या मिशनरी हायस्कूलमध्ये “श्रीधरन” यांनी इंग्रजी दुसरी या वर्गात प्रवेश घैतला,  “शेषन” आधी पासून त्याच शाळेत होते.वर्गात “शेषन” यांचा पहिला नंबर यायचा.

“श्रीधरन” यांनी आल्या आल्या त्या वर्षी “शेषन” यांना मागे टाकले,आणि

तिथूनच या दोघांची स्पर्धा सुरु झाली.”शेषन” है उंचीला कमी असल्यामुळे, वर्गात नेहमी पहिल्या बेंचवर बसायचे तर “श्रीधरन” उंच असल्यामुळे शेवटच्या बेंचवर. “शेषन” हे अतिशय अभ्यासू,कायम पुस्तकात डोकं खुपसून असायचे.या उलट “श्रीधरन” फुटबॉल आणि इतर खेळ खेळायचे.इंग्रजी मध्ये मात्र “टी.एन.शेषन” यांच्या तोडीस तोड असा, एकही विद्यार्थी अख्ख्या शाळेत कोणीही नव्हता.

बोर्डाच्या परीक्षेत “शेषन” यांनी “श्रीधरन” यांना एका मार्काने मागे टाकलं. १९४७ सालच्या SSIC बोर्ड परीक्षेत “शेषन” ४५२ मार्क मिळवून “पहिले” आले.तर “श्रीधरन” यांना “४५१ मार्क मिळाले” होते  आणि त्यांचा दुसरा क्रमांक आला होता..

मार्कांसाठी कितीही जरी स्पर्धा चढाओढ असली तरीही “शेषन आणि श्रीधरन” ही जोडी तर   तुटली नाहीच,उलट ते आणखीनच चांगले दोस्त  झाले आणि त्यांच्या मैत्रीत खूपच वाढ झाली.

पुढे इंटरमेजीएटसाठी देखील व्हिक्टोरिया कॉलेजला दोघांनीही एकत्र अँडमिशन  घेतलं.दोघांनी एकत्रच बसून झपाटून अभ्यास केला.

आख्खा मद्रास प्रांतामध्ये इंजिनियरिंगला प्रवेश मिळेल एवढे मार्क मिळवणारे ते फक्त दोघेच विद्यार्थी होते.                    

पण “टी.एन.शेषन” यांना मात्र आपल्या भावाप्रमाणे “आयएएस अधिकारी” बनायचं होत यामुळे त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला नाही तर त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये  फिजिक्स विभागात प्रवेश घेतला. “श्रीधरन” यांनी मात्र आंध्रमधल्या काकीनाडाच्या इंजिनियरिंग कॉलेजमधून सिव्हील इंजिनियरिंग पूर्ण केलं.

पुढे १९५४ साली युपीएससी परीक्षा पास होऊन “शेषन” यांनी “आयएएस” बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. याच काळात “श्रीधरन” यांनी इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसेसची एक्झाम देवून ते पास झाले आणि रेल्वेमध्ये  भरती झाले.

“योगायोग” असा की हे दोघेही परत “ट्रेनिंगच्या” निमित्ताने इंडियन फोरेस्ट कॉलेज डेहराडून येथे एकत्र आले.. ते जवळ जवळ दोन-एक  महिने “शेषन आणि श्रीधरन” एकमेकांच्या सोबत राहिले. त्या नंतर मात्र दोघांचे रस्ते कामानिमित्त कायम स्वरुपी वेगळे झाले.”शेषन” यांनी प्रशासकीय कारकिर्दीत एकामागून एक यश मिळवत त्यांनी भारताचे “मुख्य कॅबीनेट सचिव” बनण्यापर्यंत मजल मारली, हे भारतातील सर्वोच्च पद, त्यांना मिळाले.        

१९८९ साली रिटायर झाल्यावर त्यांना निवडणूक आयुक्तपदावर नेमण्यात आलं, हे विशेष.

 भारतात निवडणूक काळात आचारसंहिता,शिस्त आणि कडकपण राबण्यास “शेषन” यांनी घालून दिलेली शिस्त ही कारणीभूत ठरली,त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव झाला,सन्मान म्हणून त्यांना “मॅगसेसे” पुरस्कार देखील देण्यात आला..   तर इथे “श्रीधरन” यांनी कलकत्ता मेट्रो,कोकण रेल्वे,दिल्ली मेट्रो,कोची मेट्रो,लखनौ मेट्रो असे मोठमोठे अशक्यप्राय वाटणारे प्रोजेक्ट स्वतःच्या कर्तबगारीने व नेतृत्वाने पूर्ण केले.विक्रमी वेळेत सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंगचे स्कील दाखवत “श्रीधरन” यांनी भारतीय रेल्वेचा संपूर्ण कायापालट करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांना त्या बद्दल भारताचा सर्वोच्च “पद्मविभूषण” हा किताब सन्मान देण्यात आला.

मैत्रीत अनेकदा लोक स्पर्धा करतात,पण स्पर्धा असावी तर “शेषन-श्रीधरन” यांच्या प्रमाणे चांगल काम करण्याची.देशाला “नंबर वन” करण्यासाठी या दोन वल्लीनी  “महान दोस्तांनी” जे औदार्य दाखवलं,आणि बुद्धी कौशल्यानी यशस्वी होवून दाखवलय.त्यांच्या या अलौकिक दैदिप्यमान कामगिरचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.त्यांचा हा आदर्श प्रत्येक तरूण तरूणींनी घ्यावा हे मात्र नक्कीच खरं आहे.                       

अशा ह्या भारत मातेच्या सुपुत्रांस सॅल्युट👍🙏.               

“जय महाराष्ट्र” “भारत माता” की जय हो 🚩🇮🇳👏.                                     

विलास डोळस.                         

[email protected]

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तूप … ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ तूप… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

तूप

जेवण कसलेहि असो, पंगतीला ,,तूप,, वाढले कि,मगच जेवायला सुरवात करायचि, आपलि परंपरा आहे. एकंदरित तूप हा अविभाज्य घटक आहे.

(१) जुन्या काळात युद्ध लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठि, तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारि.

(२) घ्रूत,अज्या, घि, हवि, सर्पि वैगेरे विविध नावाने तुपाला संबोधल्या जाते. तुप मधुर, अत्यंत बलवान, थंड , पित्तशामक, मेद मज्जा, शुक्र धातूंचे पोषण करणारे आहे.

(४) तुपामुळे स्मुर्ति, बुद्यि, आदिंचि वाढ होते. तूपाचे वैशिष्ट्य हे कि, तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तूपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे।

(५) तूपामूळे स्वरयंत्र सुधारते. आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाहि व रसायन गुणधर्माचे आहे.

(६) तूप कोणत्याहि रोगांत, विशेषतः वात-पित्त-कफ विकारांत वापरता येतं आयुर्वेदांत अनेक औषधि द्रव्ये तूपात सिद्ध करून त्यांचे औषधे बनवलि आहेत.

(७) डोके दुखत असेल तर, तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत. किंवा दुखर्या कपाळावर हलकेच मालिश करावि.

(८) १००  वेळा धुतलेले (शतधौत घ्रुत) तुप त्वचाविकार, जखमांवर, अंगाला खाज, टाचा फुटणे, अंग फुटणे, या विकारात गुणकारि आहे.

(९)  तूप किंचित कोमट करून खाल्ल्यावर उचकि थांबते. रात्रि झोपतांना एक पेलाभर दूधांत एक चमचा तूप टाकून प्यायल्यास सकाळि पोटाचा कोठा मोकळा होतो. बद्धकोष्ठ, मुळव्याध बरि होते.

(१०)  तुपामुळे मेद, चरबि वाढते हि समजूत चुकिचि आहे. नेहमि जे हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात, त्यांनि अवश्य तुप खावे.

(११)  कँसरच्या रूग्णाला तूप म्हणजे अम्रूतासमान.. कारण तूपात कँसरच्या पेशिंचि वाढ थांबवण्याचि शक्ति आहे.

तेव्हा अश्या बहुगुणि तुपाला आहारात श्रेष्ठ स्थान आहे च….

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ 72वर्षा पूर्वीच्या हळदी-कुंकवाच्या निमंत्रण पत्रिका ☆ संग्रहिका – सुश्री स्नेहल रोकडे ☆

☆ इंद्रधनुष्य ☆

☆ 72वर्षा पूर्वीच्या हळदी-कुंकवाच्या निमंत्रण पत्रिका ☆ संग्रहिका – सुश्री स्नेहल रोकडे ☆

☆ 72वर्षा पूर्वीच्या हळदी-कुंकवाच्या निमंत्रण पत्रिका ☆

संग्राहिका : सुश्री स्नेहल रोकडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समाधानाची व्याख्या… ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ समाधानाची व्याख्या… ☆ संग्रहिका – सुश्री मंजिरी गोरे ☆

समाधानाची व्याख्या

बंद पडलेली कार रस्त्यावर लावून,

मी बस मधे चढलो तर खरं.

पण आतली गर्दी बघून जीव घाबरला.

बसायला जागा नव्हती.

तेवढ्यात एक सीट रिकामी झाली.

पुढचा एक जण सहज

तेथे बसू शकत होता ….

पण त्याने ती सीट मला दिली.

 

पूढच्या stopवर पुन्हा तेच घडले.

पुन्हा आपली सीट

त्याने दुसऱ्याला दिली.

आमच्या पूर्ण बस प्रवासात

हा प्रकार चारदा घडला.

बर हा माणूस,

अगदी सामान्य दिसत होता,

म्हणजे कुठे तरी मजदूरी करून

घरी परत जात असावा,

आता शेवटच्या stopवर

आम्ही सर्वच उतरलो.

तेंव्हा उत्सुकता

म्हणून मी त्याच्याशी बोललो.

विचारले

प्रत्त्येक वेळी तुम्ही तुमची सीट

दुसऱ्याला का देत होता??

तेंव्हा त्याने दिलेले उत्तर,

मी शिकलेला नाही हो.

अशिक्षित आहे मी.

एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो, आणि माझ्या जवळ कोणाला द्यायला काहीच नाही.

ज्ञान नाही , पैसा नाही.

तेंव्हा मी, हे असे रोज करतो.

हेच मी सहज‌ करू शकतो.

 

दिवसभर काम केल्यानंतर

अजून थोड्या वेळ उभं राहणं मला जमते

मी तुम्हाला माझी जागा दिली,

तुम्ही धन्यवाद म्हणालात,

त्यातच मला खूप समाधान मिळाले,

मी कोणाच्या तरी कामी आलो ना?

कोणाला कायतरी दिल्याच.

असं मी रोज करतो

माझा नियमच झाला आहे••

आणि

रोज मी आनंदाने घरी जातो.

उत्तर ऐकून मी थक्कच झालो.

त्याचे विचार व समज बघून!

याला

अशिक्षित म्हणायचे का?

काय समजायचे ?

कोणाकरिता,

काही तरी करायची इच्छा,

ती पण स्वतः ची परिस्थिती

अशी असताना!

मी कशा रीतीने मदत करू शकतो?

त्यावर शोधलेला हा उपाय बघून

निसर्गसुध्दा आपल्या या निर्मीती वर खुष झाला असेल!

माझ्या सर्वोत्तम कलाकृती पैकी ही एक कलाकृती, असं दिमाखात सांगत असेल!

त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या

स्वतः ला हुषार शिक्षित समजणारा मी, त्याच्या समोर खाली मान घालून

स्वतः चे परिक्षण करू लागलो.

किती सहज, त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली.

*

मदत ही खूप महाग गोष्ट आहे

कारण मनाने श्रीमंत असणारे

खूप कमी लोक असतात .•••••

सुंदर कपडे ,हातात पर्स , मोबाईल , डोळ्यांवर गॉगल, चार इंग्लिश चे शब्द येणे म्हणजेच सुशिक्षत का ?

हीच माणसाची खरी ओळख का ?

मोठं घर ,मोठी कार , म्हणजे मिळालेले समाधान का ??

कोण तुम्हाला केंव्हा काय शिकवून जाईल, आणि तुमची धुंदी उतरवेलं सांगता येत नाही!
या माणसाच्या संगतीने
माझे विचार स्वच्छ झाले.

म्हणतात ना •••

” कर्म से पहचान होती है इंसानों की ।

वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में “।

🌿 Have a Good day 🌿

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ ( भाग दुसरा) ☆ प्रस्तुती – श्री अरूण कुलकर्णी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ (भाग दुसरा) ☆ प्रस्तुती – श्री अरूण कुलकर्णी ☆

राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ

रक्तदाब – हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची, तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात

उच्च रक्तदाब

१) चल उड़ जा रे पंछी ….४:३५ (भाभी)

२) चलो दिलदार चलो ….३:३२ (पाकीजा)

३) नीले गगन के तले….४:१३ (हमराज)

४) ज्योती कलश छलके ….३:३० (भाभी की चूड़ियाँ)

कमी रक्तदाब

१) जहाँ डाल डाल पर ….७:२० (सिकंदरे आज़म)

२) पंख होती तो उड़ आती रे ….४:३२ (सेहरा)

३) ओ निंद ना मुझको आये ४:०८ (पोस्ट बॉक्स नं. ९०)

रक्तक्षय, अनिमिया- अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.

१) खाली शाम हाथ आई है ….४:५५ (इजाजत)

२) आज सोचा तो आँसू भर आये ….४:२७ (हँसते जख्म)

३)नदियाँ किनारे ….३:३४ (अभिमान)

४) मैने रंग ली आज चुनरिया …..५:३४ (दुल्हन एक रात की)

अशक्तपणा – शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी

१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके …. (उड़न खटोला)

२) मनमोहना बड़े झूठे….३:५८  (सीमा)

३) साज हो तुम आवाज हूँ मै ….५:३७ (चंद्रगुप्त)

 पित्तविकार, अॅसिडीटी- अॅसिडीटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत

१) छूकर मेरे मन को ….२:३५ (याराना)

२) तुम कमसीन हो नादा हो ….४:२९ (आई मिलन की बेला)

३) आयो कहाँ से घनश्याम….२:५९ (बुढ्ढा मील गया)

४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये …..३:४४ (सेहरा)

चित्रपटगीते सर्वपरिचित आहेत म्हणून वर दिली आहेत. रागाची चव कळावी म्हणून. पण प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.

सुरिले परिवार/ सिनेमा अणि बरेच काही सुरिला संगीत 🎼

संगीतकार : खय्याम – १०

१. दो बुंदे सावन की (फिर सुबह होगी)

२. हरियाला बन्ना आए रे (रझिया सुलतान)

३. करोगे याद तो हर बात (बाजार)                         

४. तुम्हारी पलकोंकी चिलमनो में (नाखुदा)

५. मौसम मौसम लव्हली मौसम (आहिस्ता आहिस्ता)

६. चोरी चोरी कोई आए (नुरी)

 

गाण्यांची निवड – संग्राहक – श्री अरूण कुलकर्णी

पुणे

मो 8805984880

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ ( भाग पहिला) ☆ प्रस्तुती – श्री अरूण कुलकर्णी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ (भाग पहिला) ☆ प्रस्तुती – श्री अरूण कुलकर्णी ☆

☆ MUSIC IS MEDICINE ☆

१ राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.

२ राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.

३ राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा.

४ राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.

५ राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.

६ राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.

७ राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा.

८ राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा.

९ राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.

१०  राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.

११  राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.

१२ राग मालकंस – अतिशय शांत – मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.

१३ राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे.

१४ राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.

१५ राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.

१६ राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.

१७ राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण.

☆ संगीतोपचार ☆

विशेष सूचना:- डाँक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डाँक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.

हृदयरोग – राग दरबारी व राग सारंग

१) झनक झनक तोरी बाजे पायलिया….८:१६ (मेरे हुजूर )

२) तोरा मन दर्पण कहलाए….६:०६   (काजल)

३) बहुत प्यार करते है ,तुमको सनम….४:२४ (साजन)

४) जादूगर संय्या छोडो मेरी ३:०६    (नागिन).

विस्मरण – लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा

१) मेरे नयना सावन भादों ….५:०६ (मेहबूबा) 

२) ओ मेरे सनम….५:०९ (संगम)

३) दिल के झरोखे मे तुझको बिठाकर ….४:४१ (ब्रह्मचारी)

४) जाने कहा गये वो दिन ….६:५३ (मेरा नाम जोकर)

मानसिक ताण, अस्वस्थता – ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत

१) पिया बावरी….४:०२ (खूबसूरत)

२) मेरे सूर और तेरे गीत ….३:११ (गूँज उठी शहनाई)

३) मतवारी नार ठुमक ठुमक चली ….६:२९ (आम्रपाली)

४) तेरे प्यार मे दिलदार ….४:०४ (मेरे मेहबूब)

क्रमशः… 

गाण्यांची निवड – संग्राहक – श्री अरूण कुलकर्णी

पुणे

मो 8805984880

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print