मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विणकरी ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ विणकरी ☆ श्रीशैल चौगुले ☆

 

कसे गुंतले रे

बाहत्तर हजार

धागे या वसनी

सप्तकोटि शृंगार.

अष्टचित्र कोष

सुटेना कसा पाश

मन विणू पाहे

जन्मोजन्मीचा श्वास.

कळेना-टळेना

गुंता जड पेलेना

चिंता ठाई-ठाई

ओठ ‘विठ्ठला’विना.

भाव-भक्ती जोड

तरी ना लागे अंत

आत्मरंगी शोधे

नाम संदेश संत.

म्हणे सुखे सांगू

दुःख हेची लपवू

वसनाची कर्मे

विठू चरणी ठेऊ.

झालाची विसर

धागे वस्त्र नक्षींचा

राहिली कसर

विणकरी साक्षीचा.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 123 ☆ भाकरी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 123 ?

☆ भाकरी ☆

तिनं शिकून घेतलंय

भाकरी करण्याचं तंत्र

पीठ, पाण्याचं प्रमाण

दोघांना खेळवणारी

परात आहे तिच्या घरात

 

कणीक ओळखू शकते

बोटांची हालचाल

बोटांनाही कळतात

कणकीच्या भावना

बाळाला थोपटावं

तसंच थोपटते

आकार देते

इथवर सगळं ठीक आहे

 

तापलेल्या तव्यावर

भाकरी फिरवताना

कसरत करावी लागते

भाकर थोडी तापली की

पाठीवरून पाण्याचा

प्रेमानं हात फिरवावा लागतो

 

बाळाला शेक देताना

जपतात तशी

जपून शेकावी लागते भाकरी

तेव्हाच होते ती खमंग खरपुस

थोडी जर बिघडली तर

आहेच

जीभ नाक मुरडायला मोकळी…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महात्मा गांधी ☆ श्री रवींद्र सोनावणी

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ महात्मा गांधी ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

एक वकील नामांकित होते,

मोहनदास करमचंद गांधी.

ब्रिटिश विरोधी लढ्याची,

त्यांनी आफ्रिकेत केली नांदी.

 

मायभूमीला आले परतून,

लढा इथेही पुकारला.

शस्त्राविण सत्तेशी लढाई,

 साबरमतीचा संत बोलला.

 

दया क्षमा शांती मार्गाने,

दानवास मानव केले.

हिंसेला नमवीते अहिंसा,

विश्वाला पटवून दिले.

 

जनतेला बापुजी बोलले,

स्वातंत्र्याचा करूया जागर.

नका करू आपसात दंगे,

नका सांडू रक्ताचे सागर.

 

सत्य अहिंसा शांती पुढती,

झुकली सत्ता ब्रिटिशांची.

चले जावचा देऊन नारा,

लाट उठविली क्रांतीची.

 

अखेर आम्ही स्वतंत्र झालो,

गगनी तिरंगा फडफडला.

झाली फाळणी जातीय दंगे,

जीव बापूचा तडफडला.

 

कुणी वेड्याने वेधुन छाती,

गोळी तयांवर चालविली.

“हे राम” म्हणत शांतिदूताची,

 प्राणज्योत ती मालवली.

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तृ  प्ती ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ तृ  प्ती ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

मन झाले मोरपीस

वाऱ्यासंगे हले-डुले

सप्त रंगांची रांगोळी

साऱ्या अंगात खुले

 

               कारण काय घडले

               माझे मला न कळले

               ऐकून हरीची धून

               असेल का ते चळले ?

 

मनी झाली घालमेल

पावलांचा चुके ताल

आर्त स्वर बासरीचा

करे आत घाव खोल

 

               झाले कावरी बावरी

               शोधले परस दारी

               परी दिसे ना कुठेच

               मज नंदाचा मुरारी

 

जादू अशी मुरलीची

वाट धरली वनीची

दिसता मूर्ती हरीची

जाहली तृप्ती मनाची

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१२-०१-२०२२

संपर्क – (सिंगापूर) +6594708959, मो – 9892561086, ई-मेल – [email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 67 ☆ अभंग… स्वभाव जीवाचा ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 67 ? 

☆ अभंग…स्वभाव जीवाचा  ☆

वात कफ पित्त, त्रय दोष युक्त

नच कधी मुक्त, जीव पहा…!!

 

रोगाचे आगार, मानवाचा देह

सुटतो का मोह, कधी याला…!!

 

संपूर्ण आयुष्य, हावरट बुद्धी

नाहीच सुबुद्धी, याच्याकडे…!!

 

शेवट पर्यंत, पाहिजे म्हणतो

स्वतःचे करतो, अहंकारी…!!

 

वाईट आचार, सदैव साधतो

देवास भजतो, स्वार्थ हेतू…!!

 

कवी राज म्हणे, स्वभाव जीवाचा

उपाय कुणाचा, चाले ना हो…!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवाघरचे ज्ञात कुणाला  ☆  वसंत कानेटकर 

 

? कवितेचा उत्सव ?

☆ देवाघरचे ज्ञात कुणाला  ☆  वसंत कानेटकर  ☆

देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम?

कुणी रखडती धुळीत आणिक

कुणास लाभे हेम

 

मी निष्कांचन,निर्धन साधक

वैराग्याचा एक उपासक

हिमालयाचा मी तो यात्रिक

मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम ?

 

देवाघरचे ज्ञात कुणाला ?

 

– वसंत कानेटकर.

नाटक संगीत मत्सगंधा

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मुकी होऊन जगतात माणसं….! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मुकी होऊन जगतात माणसं….! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

हल्ली बोटानेच अशी सारी बोलतात माणसं

टच् स्क्रीनशीच हितगुज साधतात माणसं.

 

अक्षरांच्या गोतावळ्यात मुकेच शब्द सारे

मुक्यानेच भावनांना व्यक्त करतात माणसं.

 

समोरुन जरी आला कुणी शब्द उसने घेऊन

फोनवर नंतर बोलू म्हणून टाळतात माणसं.

 

हल्ली म्हणे संवाद कमी झालेत एकमेकांशी

अभासी दुनियेलाच आपलसं करतात माणसं.

 

चेहरा फक्त स्वतःच्याच सेल्फी पुरता हसरा

स्टिकर्स-इमोजीनेच भाव दाखवतात माणसं.

 

सुख दुःखाना असं मोबाईल मध्ये सजवुन

बंदिस्त चौकटीत स्वतःलाच कोंडतात माणसं.

 

बोटांची भाषा बोटांनीच केलेले बोटांचेच नखरे

आपल्यासारखीच मुकी होऊन जगतात माणसं.

 

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्षण ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ क्षण ☆ सौ राधिका भांडारकर ☆

दिवस कितीआनंदाचे

दिवस किती मजेचे

मुठीत जपले मस्त सारे

सोनसळी क्षण अपार सुखाचे…

 

घर कसे भरुन गेले

कमळापरी फुलून गेले

हळुवार तिचे गोड बोलणे

घरभर तिचे मुक्त बागडणे…

 

बागेतली फुले पाने मोहरली

गच्चीतला झोपाळा झुलला

निशीगंधाचा सुवास घमघमला

कोपरा कोपरा चैतन्यमय झाला…

 

रिकामे कपाट कसे ओथंबले

तिचे कपडे  खेळ पुस्तके

चादरी  चुरगळल्या  वस्तुंनी जागा सोडल्या

तिच्या अस्तीत्वाने घर भरले इतके…

 

पुन्हा एकदा शैशव रंगले

दारे खिडक्या भींती बोलल्या

मनातले वारे मोकळे झाले

सुखावले स्पर्शाने गंधभरल्या….

 

मात्र निरोपाचा हात अटळ

ओठावर हंसु  गच्च भरले डोळे

परतली ती तिच्या विश्वात

मी मात्र जपून आहे पोकळीतले

आनंद खुळे….

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रुप गंध अन सौंदयास्तव ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? रुप गंध अन सौंदयास्तव  ?   सुश्री नीलांबरी शिर्के ☆ 

धरतीचे अमर्याद देणे

झाडाचेही तसेच फुलणे

रुप गंध अन सौंदयास्तव

अपुरे पडती  नेत्र आपुले

धरतीवर चांदण्या उतरल्या

खेळ खेळता इथेच रमल्या

परत जायचे विसरुन जाता

फुल होऊन वेलीवर सजल्या

नीलांबरी ??शुभ सकाळ

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी एकटी….. ☆ श्री शरद दिवेकर

? कवितेचा उत्सव ?

 ☆ मी एकटी….. ☆ श्री शरद दिवेकर☆ 

अरे, एव्हाना ती यायला हवी होती !

अजून कशी उगवली नाही ती गवताची पाती !

 

ती आल्यावर प्रार्थनेचे सुर उमटतात.

आसमंत उजळून निघतो, लता वेली डोलू लागतात.

 

सुरू होते पूजा अर्चना

आणि सरस्वतीची आराधना.

 

मध्येच पोटात कावळ्यांचा कलकलाट.

खाऊ झालाच समजा सफाचाट.

 

कधी कधी ऐकू येतो गलका.

माझ्या कानांना मस्त बसतो दणका.

 

थोड्या वेळाने परतायची वेळ होते.

आमचं मन खट्टू होते.

 

मी पुन्हा एकदा नव्याने उजळणी करते.

आणखी एक आवर्तन पूर्ण होते.

 

उद्याच्या पुनर्भेटीचा संकल्प ठरतो

आणि सुर्य पश्चिमेला मावळतो.

 

पण आता सगळं  सुनसान आहे.

सर्वत्र स्मशानकळा आली आहे.

 

सगळीकडे जमली आहेत कोळीष्टके.

सगळे आयत, चौरस झाले आहेत ओकेबोके.

 

इकडे आणि तिकडे जमले आहेत धुळीचे थर.

माणसाचा कुठे उरला आहे इकडे वावर.

 

त्यामुळेच मनात काहूर उठलंय

की ती आता कधीच येणार नाहीत की काय ?

 

कधीची उभी आहे मी निष्पर्ण वृक्षासारखी.

मी एकटी, मी एकाकी.

 

प्रत्येक गावा गावातील शाळा.

प्रत्येक शहरा शहरातील शाळा.

 

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

70457 30570

[email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares