मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

जलचर  म्हणजे माशांचे प्रकार, कासव ,  मगरी यांचे सावधपण वेगळे असते. शार्क माशांच्या कातडीमधे विद्युत वहन होते. चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचे व्होल्टेज तयार होते.व त्यानुसार तो डाव्या उजव्या बाजूला जाऊन दिशा ठरवतो.तसेच व्हेल मासा जेव्हा शंभर – शंभर कि. मि. प्रवास करतो तो एक डिग्रीसुद्धा इकडे तिकडे न होता ,सरळ रेषेत प्रवास करतो. याबद्दलचे कोडे अजूनही उलगडलेले नाही. सील सारखे सस्तन जलचरसुद्धा चुंबकीय  क्षेत्राचा वापर करतात. चुंबकीय क्षेत्रात थोडा जरी बदल झाला तरी तो त्यांच्या लक्षात येतो.आँक्टोपस आपले अवयव कसेही  वाढवतो आणि सावज पकडतो. तारा मासे विषारी द्रव सोडतात. समुद्री गाय म्हणजे अवाढव्य जलचर! सात सात तास अखंड समुद्रातील वनस्पती खात असतात.व ताशी पाच मैल वेगाने  फिरत असतात. मगरी आपली  अंडी मऊ भुसभुशीत संरक्षित जागेत व डोहाच्या ठिकाणी घालून ती मातीने गाडून त्याची राखण करतात. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की पोहायला सुरुवात करतात. बदके किंवा राजहंसही एखाद्या प्राण्यापासून धोका आहे असे कळताच त्यावर ते फुत्कारतात.आणि अत्यंत आक्रमक होतात.काही जीवांना उपजतच द्न्यान असते. बदकाची पिल्ले अंड्यातून बाहेर पडली की,लगेच दाणे टिपायला लागतात. आकाशात घार दिसली की कोंबडी वेगळा आवाज काढून आपल्या पिलांना जवळ बोलावते.आणि आपल्या पंखाखाली घेऊन त्यांचे रक्षण करते.या सावधपणाचे वर्णन कसे करावे?

पक्ष्यांच्या बाबतीत सांगायचे तर, पक्षी स्थलांतर ही अनाकलनीय आणि विस्मयकारक घटना आहे असे म्हणावे लागेल. उत्तर ध्रुवावरील (सैबेरिया)भागात थंडी सुरू झाली की, खाद्याच्या तटवड्यामुळे अनेक पक्ष्यांचे थवेच्या थवे स्थलांतर करू लागतात. एका वर्षात ३६०००कि.मि.प्रवास म्हणजे उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव आणि पुन्हा उत्तर ध्रुव असा न चुकता करतात आणि  रात्री दाट पानांंमधे विश्रांती घेऊन स्वसंरक्षण करतात.अनेक पक्षी आपली विष्ठा पातळ आवरणात ठेवून ,विसर्जन करुन ,घरटे साफ ठेवतात. पिलांना अन्न भरवून ती स्वावलंबी होईपर्यंत सावधपणे त्यांच्या पाठीशी रहातात.सुगरण पक्ष्याचे तर किती कौतुक करावे तितके कमीच.! हिवाळ्यात थंडीची पूर्वसूचना ते लोकांना देतात. कायम थव्याने राहून ,घरटीही मोठ्या संख्येने बांधून, नवीन वसाहतच स्थापन करतात. धोका उत्पन्न झाल्यास चिट् चिट् असा आवाज काढून संपूर्ण वसाहतीला धोक्याचा इशारा देतात. नरपक्षी घरट्याचा पाऊण भाग विणतो.मादीला घरटे पसंत पडले की, मग तो अस्तर लावून घरटे पूर्ण करतो.अशी चार पाच घरटी बांधून कुटुंब वाढवतो.

घरटी बांधताना जमिनीपासून तीस मिटर उंचीवर व घरट्याखाली पाणी असेल अशा  ठिकाणी  किंवा काट्याच्या बाभळीच्या झाडावर अशा निर्धोक जागी घरटे बांधणे पसंत करतो.घरटे बांधताना देखील सुरुवातीला नळीचा आकार ,आतमध्ये  कधी जोडघरेही असतात. जेणेकरुन मोठा पक्षी  आत जाणार नाही. ही सावधानताच नव्हे काय?

सुगरणीवर अनेकांनी कविताही केल्या आहेत. बहिणाबाई तर म्हणतात, “अरे खोप्यामधी खोपा , सुगरणीचा चांगला,एका पिलासाठी तिने जीव झाडाला टांगला. किती छान!

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

डार्विनचा उत्क्रांती वादाचा सिद्धांत,  “Survival of the fittest “(जगण्यास  जे लायक असतील तेच जगतील .) याचा विचार करता माणूस हा पथ्वितलावर उत्क्रांत झालेला शेवटचा प्राणी. निसर्गाने मानवाला बुद्धीचा  नजराणा बहाल केला आहे. आणि त्याच्या जिवावर तो जमिनी पासून आकाशातच काय, अवकाशापर्यंतचे क्षेत्र आपल्या कवेत घ्यायला लागला आहे. तरीसुद्धा जिद्न्यासा आणि कुतूहलाने प्राणी, पक्षी त्यांचे वर्तन याचा अभ्यास व संशोधन करावेसे वाटायला लागले आहे. कारण त्यांच्या संवेदना माणसापेक्षा कितीतरी पटीनी अधिक असल्याचे लक्षात आले आहे.

‘सावधपणा’ म्हणजे दक्ष असणे, सावध असणे वगैरे. प्रत्येक जीवाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दक्ष व सावध रहावे लागते. सजीव कसे सावध असतात ,याचा विचार करायचा तर अगदी झाडे, वेली, एकपेशीय जीवापासून कीटक, माशा, मुंग्या,जलचर, पक्षी, प्राणी, जंगली प्राणी यांचा विचार करावा लागेल.

अँमिबासारख्या एकपेशीय प्राण्याला स्पर्शेंद्रिय नसते. पण त्याला स्पर्श केल्यास सावध होऊन तो आपले अंग आक्रसून घेतो. युग्लिना या एककोषिक प्राण्यालाही स्पर्शेंद्रिय नसते. पण प्रकाशाची जाणीव करुन देणारे  अतिसूक्ष्म इंद्रिय असते.त्यानुसार त्याला सजगता येते.व तो सावध होतो.

अगदी लहान कीटक वाळवी, मुंग्या, झुरळ, यांच्यामध्येसुद्धा सावधपणा असतो.त्यांचे वर्तन वेगवेगळे असते.त्यांची एक भाषा असते. कामकरी वाळवी किंवा मुंग्या रांगेतून जाताना येताना आपल्या भूमिकांशी स्पर्श करीत चालतात. चालताना त्यांच्या अंगातून एक प्रकारच्या वासाचा द्रव पाझरतो.त्या वासामुळे त्या न चुकता आपापल्या वारुळात परततात. मुंग्या जर चुकून दुसऱ्या समुहात गेल्या दुसऱ्या मुंग्या त्यांना सामावून घेत नाहीत. हुसकावून लावतात. किंवा मारतात. कित्येकदा हवेच्या बदलातला धोका कळल्याने मुंग्या तोंडात अंडी घेऊन जाताना आपण पहातो.हा सावधपणाच ना?नाकतोडा, टोळासारख्या कीटकांच्या पोटावर पातळ असलेले द्न्यानेंद्रिय  ध्वनी ग्रहण करतो. व त्याद्वारे तो  सावध राहू शकतो.काही कीटकात कामकरी असतात ते घरे बांधतात.अन्न गोळा करून संततीची काळजी घेतात.सैनिक असतात ते घर आणि संततीचे रक्षण करतात.मादी कीटक प्रजोत्पादन करते.प्रत्येक जण आपापले काम दक्ष राहून करत असतो. मधमाश्यांबद्दल सांगायचे तर कामकरी माशा मधाचे ठिकाण सापडल्यावर मोहोळावर येऊन विशिष्ट तर्हेने  गोलाकार 8 आकड्याप्रमाणे फिरुन दोन्ही बाजूला हालचाल करतात. आणि मध मिळविण्याची माहिती इतरांना देतात. निरिक्षणाने सिद्ध झालेले आहे की मधमाशीला उत्तम स्मरणशक्ती , हुशारी व वेळेचेही भान असते. कुंभारीण  तोंडाने मातीचा चिखल करुन सुंदर घर  बनवते. व त्यामध्ये अंडी घालते.त्यांच्या वर्तनाबद्दल  खरोखरच आश्चर्य वाटते.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ थोडं मनातलं… सावळ्या रंगाची बाधा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ थोडं मनातलं… सावळ्या रंगाची बाधा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ‘ असं ग दि माडगूळकरांचं माणिक वर्मा यांनी गायिलेलं एक गीत आहे. साधारणपणे सावळा रंग म्हटला की प्रथम आपल्या डोळ्यासमोर येतो तो कान्हा, कृष्ण. मग लक्षात येतं की अरेच्या ! केवळ कान्हाच कुठे आहे सावळा ? राम, विष्णू, शंकर, विठ्ठल असे आपले सगळे महत्वाचे देव तर निळ्या किंवा सावळ्या रंगातच दाखवले जातात. निळा किंवा सावळा रंग. सावळा म्हणजे थोडासा काळा आणि थोडासा निळा देखील. या रंगांमध्ये खरं तर एक जादू, एक गूढ लपलं आहे बरं का ! जे जे अफाट आहे, अगणित आहे, आपल्या नजरेत न मावणारं आहे, ते ते सगळं आहे काळं किंवा निळं. नाही पटत का ? बघा, आपल्या डोक्यावर हे अनंत पसरलेलं आकाश निळ्या रंगाचं आहे. समुद्र ! अथांग पसरलेला. जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी. तोही निळा. हातात थोडंसं पाणी घ्या. त्याला कुठलाही रंग नाही. पण त्याच पाण्याच्या थेंबांनी बनलेला सागर मात्र निळाईची गूढ शाल ओढून आहे. रात्री मात्र हे पाणी गूढगर्भ काळं दिसतं. आणि निळं दिसणारं आकाश ? खरं तर तेही निळं नसतं. उंच अवकाशात गेलो की निळा रंग नाहीसा होऊन सर्वत्र काळ्या रंगाचं साम्राज्य आढळतं. आहे की नाही गंमत ! मग हाच निळा, सावळा आणि काळा रंग आम्हाला शतकानुशतके मोहित करत आला आहे. अगदी ऋषीमुनींपासून तो आजच्या अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनांना.

या सावळ्या रंगाची बाधा भल्या भल्या लोकांना झाली हो ! पण ज्याला ज्याला ती झाली, तो तो त्यात रंगून गेला. तो त्याच रंगाचा झाला. त्याला दुसरा रंगच उरला नाही. आणि दुसरा रंगच नको आहे. अगदी मीराबाईंचं उदाहरण घ्या ना ! त्या तर कृष्णभक्तीत आरपार रंगून गेलेल्या. एका कृष्णाशिवाय त्यांना काही दिसतच नाही. ‘ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया.. ‘ असं म्हणताना त्या म्हणतात, ‘ लाल ना रंगाऊ , हरी ना रंगाऊ ‘. दुसरा कोणता रंग त्यांना नकोच आहे. त्या म्हणतात, ‘ अपने ही रंग में रंग दे चुनरिया…’ बस, एकदा त्या हरीच्या सावळ्या रंगात रंगले की झाले. एकदा जो कोणी या सावळ्या रंगात रंगला,त्याला अवघे विश्वच सावळे दिसू लागते. ‘ झुलतो बाई रासझुला… ‘ या सुंदर गीतात त्या अभिसारिकेला सगळेच निळे दिसायला लागते. ती म्हणते, ‘ नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा…’

तर ‘ सांज ये गोकुळी ‘ या सुंदर गीतात संध्याकाळचे वर्णन करताना कवीला सर्वत्र सगळ्याच गोष्टी सावळ्या किंवा श्याम रंगात बुडालेल्या दिसतात.

सांज ये गोकुळी सावळी सावळी अशी सुरुवात करून कवी म्हणतो. ही सांज कशी आहे तर, ‘ सावळ्याची जणू सावली. ‘

धूळ  उडवीत गायी निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या …. तर पुढे तो म्हणतो

पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेघ

होई डोहातले चांदणे सावळे, भोवती सावळ्या चाहुली.

संध्यासमयी दिसणाऱ्या पर्वतरांगेला एखाद्या काजळाची रेघ म्हणून कवीने तिचे सौंदर्य आणखी वाढवले आहे. आणि कवितेचा शेवट तर काय वर्णावा ! कवी म्हणतो

माऊली सांज अंधार पान्हा

विश्व सारे जणू होई कान्हा

मंद वाऱ्यावरी वाहते बासरी

अमृताच्या जणू ओंजळी

प्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांचं हे अप्रतिम गीत. आशा भोसलेंनी अजरामर केलंय. शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो सांज म्हणजे संध्याकाळची वेळ जणू माऊली. सगळीकडे आता अंधाराचं साम्राज्य पसरू लागलंय. अशा या संध्यासमयी अवघे विश्व जणू कान्ह्याचे रूप घेते ! संध्यासमयीचा मंद, शीतल वारा वाहतो आहे. असा हा वायू आपल्या लहरींबरोबर जणू कान्ह्याच्या बासरीचे सूर दूरवर वाहून नेतो आहे. श्रीकृष्णाची ही बासरी इतकी गोड आहे की काय सांगावं ? कवी म्हणतो, ‘ या बासरीच्या स्वर लहरी नाहीतच तर जणू अमृताच्या ओंजळी आहेत ! ‘जेव्हा सावळ्या रंगात आपण रंगून जातो, तेव्हा आपल्याला कान्हा, बासरी, त्याचा श्यामल वर्ण सगळीकडे दिसतो.

अशीच एक अभिसारिका. रात्रीच्या वेळी यमुनेवर पाणी आणायला निघालेली. रात्रीचा अंधार सगळीकडे पसरला आहे. ही सुंदर भक्तिरचना आहे विष्णुदास नामा यांची. विष्णुदास नामा हे संत एकनाथांचे समकालीन. बरेच लोक संत नामदेव आणि विष्णुदास नामा यांच्यात गल्लत करतात. पण हे दोघेही वेगळे. तर विष्णुदास नामा आपल्या सुंदर रचनेत म्हणतात

रात्र काळी घागर काळी

यमुनाजळेही काळे वो माय

रात्र काळ्या रंगात रंगलेली आहे. पाण्याला निघालेल्या या अभिसारिकेची घागरही काळ्या रंगाची आहे आणि यमुनेचे पाणीही रात्रीच्या अंधारात काळेच दिसते आहे. पुढे कवी म्हणतो

बुंथ काळी बिलवर काळी

गळा मोती एकावळी काळी वो माय

बुंथ म्हणजे अंगावर आच्छादण्याचे वस्त्र, ओढणी वगैरे. तेही काळ्या रंगाचेच आहे. तिच्या अंगावरचे सगळे दागिने एवढेच काय पण गळ्यात असणारी मोत्यांची माळ देखील काळीच आहे. ती पुढे म्हणते

मी काळी काचोळी काळी

कांस कासिली ती काळी वो माय

तिच्या अंगावरची सगळी वस्त्रे देखील काळ्या रंगाचीच आहेत. खरं तर ती गोरी आहे पण सावळ्याच्या रंगात एवढी रंगली आहे की स्वतःला ती काळीच म्हणवून घेते एवढी या काळ्या रंगाची जादू आहे. या अशा रात्रीच्या समयी अंधारात सगळीकडे जिथे काळ्या रंगाचेच साम्राज्य आहे, तेव्हा मी एकटी कशी जाऊ ? मग ती आपल्या सख्याना म्हणते

एकली पाण्याला नवजाय साजणी

सवे पाठवा मूर्ती सावळी.

अशा वेळी मला प्रिय असलेली सावळी मूर्ती म्हणजेच श्रीकृष्णाला माझ्याबरोबर पाठवा म्हणजे भय उरणार नाही. शेवटी कवी म्हणतो

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी

कृष्णमूर्ती बहू काळी वो माय

विष्णुदासांचा ज्या मूर्तीने ताबा घेतला आहे ती मूर्तीही काळीच आहे. म्हणजेच ते म्हणतात माझा स्वामी सावळा असा श्रीकृष्ण आहे.

अशी ही सावळ्या रंगाची बाधा. गोपींपासून राधेपर्यंत सर्वांना झालेली. ऋषीमुनी, कवी देखील यातून सुटले नाही. एकदा जो या रंगात रंगला, त्याचे वेगळे अस्तित्व राहतेच कुठे? आणि वेगळे अस्तित्व हवे आहे कुणाला ? म्हणून तर मीराबाईच्या शब्दात त्याला , त्या श्याम पियाला अशी विनंती करू या की माझ्या जीवनाचे वस्त्र तुझ्या रंगात असं रंगवून टाक की

ऐसी रंग दे के रंग नाही नाही छुटे

धोबीया धोये चाहे सारी उमरिया…

बाबारे, तुझ्या रंगात मला असे रंगून जाऊ दे की संसारात येणारे व्याप, ताप या कशानेच तो रंग जाणार नाही.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

१६/०९/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३८ परिव्राजक १६. बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३८ परिव्राजक १६. बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजी १६ ते २७ऑक्टोबर १८९२ मध्ये बेळगांवमुक्कामी आले. महाराष्ट् म्हणजे तेव्हाचा मुंबई प्रांत ! तेव्हा बेळगांव मुंबई प्रांतात होते. कोल्हापूरहून भाटे यांचे नावाने गोळवलकर यांनी परिचय पत्र दिलं होतंच.  श्री. सदाशिवराव भाटे वकिलांकडे स्वामीजींचं अत्यंत अगत्यपूर्वक स्वागत झालं. त्यांना पाहताक्षणीच हा नेहमीप्रमाणे एक सामान्य संन्यासी आहे अशी समजूत इथेही झाली असली तरी त्यांचं काहीतरी वेगळेपण आहे हे ही त्यांना जाणवत होतंच. भाटे कुटुंबीय आणि बेळगावातले इतर लोक यांना कधी वाटलं नव्हतं की काही दिवसांनी ही व्यक्ती जगप्रसिद्ध होईल. बेळगावचे हे श्री भाटे वकिल यांचे घर म्हणजे विदुषी रोहिणी ताई भाटे यांच्या वडिलांचे घर होय.

मराठी येत नसल्यामुळे भाटे कुटुंबीय स्वामीजींशी इंग्रजीतच संवाद साधत. त्यांच्या काही सवयी भाटेंना वेगळ्याच वाटल्या म्हणजे खटकल्या. पहिल्याच दिवशी स्वामीजींनी जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून विडा मागितला. त्याबरोबर थोडी तंबाखू असेल तरी चालेल म्हणाले. संन्याशाची पानसुपारी खाण्याची सवय पाहून भाटेंकडील मंडळी अचंबित झाली. आणखी एक प्रश्न भाटे यांना सतावत होता तो म्हणजे, स्वामीजी शाकाहारी आहेत मांसाहारी? शेवटी न राहवून त्यांनी स्वामीजींना विचारलंच की आपण संन्यासी असून मुखशुद्धी कशी काय चालते? स्वामीजी मोकळेपणाने म्हणाले, “मी कलकत्ता विद्यापीठाचा पदवीधर आहे. माझे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्यामुळे माझे जीवन जरी संपूर्ण बदलले असले तरी, त्याधीचे माझे आयुष्य मजेत राहणार्‍या चारचौघा तरुणांप्रमाणेच गेले आहे. संन्यास घेतल्यावर इतर सर्व गोष्टी सोडल्या असल्या तरी या एक दोन सवयी राहिल्या आहेत. पण त्या फारशा गंभीर स्वरुपाच्या नाहीत. म्हणून राहू दिल्या आहेत. पण आपोआपच सुटतील”. आणि शाकाहारीचं उत्तर पण भाटेंना मिळालं. “ आम्ही परमहंस वर्गातील संन्यासी. जे समोर येईल त्याचा स्वीकार करायचा. काहीही मिळालं नाही तर उपाशी राहायचं”.

खरच असं व्रत पाळणं ही कठीण गोष्ट होती. मनाचा निश्चय इथे दिसतो. स्वामीजी सलग पाच दिवस अन्नावाचून उपाशी राहण्याच्या प्रसंगातून गेले होते. भुकेमुळे एकदा चक्कर येऊन पडलेही होते. तर कधी राजेरजवाडे यांच्या उत्तम व्यवस्थेत सुद्धा राहिले होते. पण त्यांना कशाचाही मोह झाला नव्हता हे अनेक प्रसंगातून आपल्याला दिसलं आहे. जातीपातीच्या निर्बंधाबद्दल ही शंका विचारली तेंव्हा, आपण मुसलमानांच्या घरीही राहिलो आहोत आणि त्यांच्याकडे जेवलोही आहोत असे सांगितल्यावर, हे संन्यासी एका वेगळ्या कोटीतले आहेत हे समजायला वेळ लागला नाही.

आज लॉकडाउनच्या  काळात दारूची दुकाने उघडली तर परमोच्च आनंद झाला लोकांना. जणू उपाशी होते ते. १०ला उघडणार्‍या दुकानांसमोर सकाळी सातपासूनच उभे होते लोक ! दुकानांसमोर दारू घ्यायला रांगाच रांगा लागल्या होत्या. यात स्त्रिया सुद्धा मागे नव्हत्या. खांद्याला खांदा देऊन लढत होत्या !  हे दृश्य पाहिल्यावर स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीची किती आवश्यकता आहे हे जाणवून मन खिन्न होते. 

एकदा भाटेंचा मुलगा संस्कृत भाषेचा अभ्यास करताना पाणीनीच्या अष्टाध्यायीतील सूत्र म्हणत होता. त्यातल्या चुका स्वामीजींनी दुरुस्त करून सांगितल्या तेव्हा या अवघड विषयाचे ज्ञान असणे ही सामान्य गोष्ट नाही असे भाटे यांना वाटले. एक दिवस काही परिचित व्यक्तींना एकत्र करून त्यांनी स्वामीजींबरोबर संभाषण घडवून आणले. त्यात एक इंजिनियर होते. ‘धर्म हे केवळ थोतांड आहे, शेकडो वर्षांच्या रूढी चालीरीती यांच्या बळावर समाजमनावर त्याचे प्रभूत्त्व टिकून राहिले आहे किंबहुना लोक केवळ एक सवय म्हणून धार्मिक आचार पाळत असतात’, असं त्यांचं मत होतं. पण स्वामीजींनी बोलणे सुरू केल्यावर त्यांना ह्या युक्तिवादाला तोंड देणं अवघड जाऊ लागलं. आणि अखेर शिष्टाचाराच्या मर्यादेचा  भंग झाल्यावर भाटेंनी त्यांना (म्हणजे एंजिनियर साहेबांना) थांबवलं. पण स्वामीजींनी अतिशय शांतपणे परामर्श घेतला. ते प्रक्षुब्ध झाले नाहीत. कोणाच्याही वेड्यावाकड्या बोलण्याने सुद्धा स्वामीजी अविचल राहिले होते. याचा उपस्थित सर्वांवर परिणाम झाला.या चर्चेचा समारोप करताना स्वामीजी म्हणाले, “ हिंदुधर्म मृत्युपंथाला लागलेला नाही हे आपल्या देशातील लोकांना समजावून सांगण्याची वेळ आली आहे. एव्हढच नाही तर, सार्‍या जगाला आपल्या धर्मातील अमोल विचारांचा परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. वेदान्त विचाराकडे एक संप्रदाय म्हणून पहिले जाते हे बरोबर नाही. सार्‍या विश्वाला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्या विचारात आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे”. स्वामीजींची ही संभाषणे आणि विचार ऐकून बेळगावचा सर्व सुशिक्षित वर्ग भारावून गेला होता.                                                         

बेळगावातील मुक्कामात रोज सभा होऊ लागल्या. शहरात स्वामीजींच्या नावाची चर्चा होऊ लागली. वेगवेगळ्या विषयांवर सभांमध्ये वादविवाद व चर्चा झडत असत. स्वामीजी न चिडता शांतपणे प्रश्नांची उत्तरे देत. कोपरखळ्या मारत विनोद करत स्वामीजी समाचार घेत असत.

या बेळगावच्या आठवणी वकील सदाशिवराव भाटे यांचे पुत्र गणेश भाटे यांनी लिहून ठेवल्या आहेत. स्वामीजी त्यांच्याकडे आले तेंव्हा ते (गणेश)  बारा-तेरा वर्षांचे होते. स्वामीजीच्या वास्तव्याने पावन झालेली त्यांची ही वास्तू भाटे यांनी रामकृष्ण मिशनला दान केली आहे. स्वामी विवेकानंदांनी या मुक्कामात वापरलेल्या काठी, पलंग, आरसा या वस्तू ते राहिले त्या खोलीत आठवण म्हणून जपून  ठेवल्या आहेत, त्या आपल्याला आजही  पाहायला मिळतात.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘आधार आणि सोबत’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

 

? विविधा ?

☆ ‘आधार आणि सोबत’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

एखादा शब्द माणसाला आधार देत असतो सतत सोबत करीत असतो असं कुणी म्हंटलं तर ते खरं नाहीच वाटणार पण असा एक शब्द आहे.देहबोली!

जन्माला आल्यापासून एखाद्याला शब्दांनी जर झिडकारुनच टाकलेलं असेल तर  त्याला कायमस्वरूपी सोबत करते ती त्याच्या देहाशीच एकरूप असलेली देहबोली! आणि याचा ‘याची देही याची डोळा’ मला साक्षात्कार झाला तो जगाचा फारसा अनुभव नसलेल्या आणि नोकरीनिमित्ताने पहिल्यांदाच मुंबईत वास्तव्यास जायला लागलेल्या माझ्या नुकतीच विशी ओलांडलेल्या वयात. तेव्हा भयंकर गर्दीतला लोकलचा प्रवास म्हणजे मला एक अतिशय कठोर शिक्षाच वाटायची. पण तोही हळूहळू अंगवळणी पडत असताना त्या लोकलच्या प्रवासानेच मला अतिशय अनपेक्षित असा तो ‘दृष्टांत’ घडवलेला होता!

त्यादिवशी लोकलमधे माझ्या समोरच्या सीटस् वर पाच-सहा मुलांचा एक ग्रूप बसलेला होता. स्वतःशी अगदी हसतखेळत गप्पा मारताना एकमेकाला उत्स्फुर्त टाळ्या देणे, एखाद्याच्या पाठीत धपाटा मारणे, कुणी एखादा विनोद केला असेल तर त्याला हसून दाद देणे, त्यातल्याच कुणी एखाद्याने खोडी काढली असेल तर रुसल्याच्या अविर्भावात त्याबद्दल हसरा निषेध नोंदवणे, हे सगळं त्यांचं एकही शब्द न बोलता सुरू होतं. त्या वयापर्यंत मूकबधिरांचे प्रश्न आणि त्यांचं भावविश्व याबाबत मी पूर्णत: अनभिज्ञच होतो.त्या दिवशी मनाला झालेला अस्वस्थतेचा स्पर्श इतक्या वर्षांनंतर आजही मी विसरलेलो नाहीय!

संजीवकुमार आणि जया भादुरी यांचा ‘कोशिश’ मी मुंबईत तेव्हा पाहिला होता तो या पार्श्वभूमीवर. तो बघताना त्या दोघांच्यातल्या संवादाची विशिष्ट खूणांची देहबोली माझ्या मनाला अधिक उत्कटतेने स्पर्शून गेली ती त्याआधी मी घेतलेल्या लोकलमधील त्या अस्वस्थ अनुभवामुळेच! त्यादिवशी लोकलमधल्या प्रवासात माझी त्या विशिष्ट देहबोलीशी ओझरती ओळख झाली होती फक्त आणि आता ‘कोशिश’ने मूकबधिरांच्या त्या देहबोलीच्या मुळाशी असणाऱ्या अंतरंगाचीही मला ओळख करून दिली होती!

कोशिशचा अनुभव उत्कट होताच पण त्याहीपेक्षा मला जास्त अस्वस्थ करून गेला तो नाना पाटेकर आणि सीमा विश्वास अभिनित ‘खामोशी! ते दोघेही मूकबधिर. कनिष्ठ आर्थिक स्तरातले. त्यांच्या संसारात जेव्हा त्यांच्या लेकीचा जन्म होतो तेव्हा ती आपल्यासारखी नाहीय ना या आशंकेने ते अस्वस्थ. पण ती आपल्या चुटक्या, टाळ्यांना तात्काळ प्रतिसाद देतेय हे लक्षात येताच त्या दोघांच्या भरून आलेल्या तुडुंब नजरेतून पूर्ण चेहऱ्यावर पसरलेला अत्यानंद..! हा प्रसंग खरोखरंच सर्वच प्रेक्षकांना हेलावून सोडणारा होता.त्याच चित्रपटात आपल्या आई-बाबांची सावली बनून त्यांना आधार देणाऱ्या त्या मुलीची मोठेपणीची भूमिका केली होती मनीषा कोईरालाने. ती शिकते, यश मिळवते.आपल्या मूकबधिर आई-वडिलांनी शारीरिकदृष्ट्या हतबल असूनही प्रचंड कष्ट करुन, प्रसंगी स्वतः अर्धपोटी राहून, आपल्याला लहानाचं मोठं केलंय ही जाणीव ती विसरलेली नसते. तिच्या सत्काराच्या प्रसंगी तिचे ते मूकबधिर आई-वडील अर्थातच पहिल्या रांगेतील खुर्च्यांवरच बसलेले असतात. सत्कार स्वीकारल्यानंतर ती भाषण करायला उभी रहाते तेव्हा समोरच्या सर्व उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट थांबल्याचे समजणे शक्यच नसणारे ते दोघे अश्रूभरल्या अवस्थेत देहभान हरपून पुढे टाळ्या वाजवतच रहातात ते मोजके क्षण त्या दोघा मूकबधिरांचे दु:ख आणि अगतिकता अतिशय हळुवारपणे अधोरेखित करून जातात. या सगळ्यामुळे मनोमन अस्वस्थ झालेली त्यांची मुलगी आपलं भाषण सुरु करते तेव्हा ती काय बोलतेय हे आपल्यापर्यंत पोहोचत नसल्याची खंत आई-बाबांच्या डोळ्यांत तरळून जाते आणि ती त्याचक्षणी  त्यांच्या मुलीपर्यंत पोचतेही. त्यानंतरचं तिचं पुढचं संपूर्ण भाषण म्हणजे समोरच्या इतर सर्व श्रोत्यांसाठी शब्द आणि त्या शब्दांच्या उच्चारांबरोबरच त्या शब्दांचा अर्थ आपल्या कर्णबधिर आई-वडिलांपर्यंत पोचावा ‌ यासाठीच्या त्या शब्दांच्या अर्थाच्या मूकबधिरांच्या विशिष्ट देहबोलीतल्या अनुरुप खूणा यांच्या एकत्रित प्रवासासारखे सुरु रहाते.याद्वारे तिने व्यक्त केलेली आपल्या आई-वडिलांबाबतची कृतज्ञता त्या देहबोलीतून त्या दोघांच्या हृदयाला भिडताच आवाज भरुन आलेल्या मुलीच्या आवाजातील थरथर आणि त्या दोघांचेही भावनातिरेकाने नस न् नस हलणारे  चेहरे म्हणजे बोलीभाषा आणि देहबोली यांनी परस्पर सहकार्याने घेतलेला संबंधितांच्या मनातील भावनांचा ठावच ! आणि त्या क्षणांचा तो पूर्ण ऐवज त्याला साक्षीभूत असणाऱ्या प्रेक्षकांच्या काळजाचाही ठाव घेत असे !

इथे मूकबधिरांच्या देहबोलीचा इतका सविस्तर आढावा घेण्याचं एकमेव प्रयोजन म्हणजे माणसाच्या आयुष्यातली देहबोलीची भूमिका समजावी हेच. इथे श्रवणशक्तीच्या अभावी जन्मतःच वाचाशक्तीही मूक होऊन राहिलेल्या वंचितांना जन्मभराचा ‘आधार’ देते ती देहबोलीच ! त्यांच्यासाठी ही देहबोली खंबीर आधार देणारी तर ठरतेच आणि निशब्द राहूनसुद्धा संपर्क-संवादातलं सुख काय असतं याची प्रचितीही त्यांना देते.

आपल्या शरीराच्या अंगांगामधे देहाची ही बोलीभाषा अतिशय बारकाव्यांसह निसर्गतःच पेरली गेलेली असते. त्यामुळेच नैसर्गिक प्रेरणेनेच त्या देहबोलीतल्या  नि:शब्द भावना अगदी तान्ह्या बाळालाही उमजत असतात. म्हणूनच एखाद्या रडक्या बाळाला झोपवतानाचं त्याच्या आईचं ‘थोपटणं’ बाळ रडणं थांबवत नाहीय हे लक्षात येताच जेव्हा ‘धोपटण्या’त परावर्तित होतं तेव्हा ते त्या तान्हुल्याला आपसूक समजतं. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून ते एकतर घाबरुन रडणं थांबवतं तरी नाहीतर चिडून रडण्याची पट्टी वाढवतं तरी !

जन्मतःच असलेली ही देहबोलीची जाण मग पुढे आयुष्यभर आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दात लपलेल्या भावनांना सावली सारखी ‘सोबत’ करतच असते. किंबहुना आधी देहबोली आणि मग त्या देहबोलीचे बोट धरूनच आल्यासारखे शब्दांचे उच्चार असंच आपल्या संवादाचं स्वरूप असतं.’नाही’ या नकारात्मक उच्चाराआधी मान नकारसदृश आधी हलते न् मग ‘नाही’ या शब्दाचा उच्चार होतो. ‘होs नक्कीच’ हा होकार आधी होकारार्थी हललेली मान देते आणि नंतर त्याचे शब्दोच्चारण होत असते. देहबोलीचा मूकबधिरांना जसा ‘आधार’ तशीच आपल्यासारख्या अस्खलित बोलणाऱ्यांच्या    शब्दांनाही देहबोलीचीच ‘सोबत’!

‘नाटक’ म्हटलं की देहबोलीसंबंधी मला सर्वप्रथम आठवतो तो ‘माईम’ हा नाट्यप्रकार! केवळ हावभाव,अविर्भाव आणि हालचालीतून आकाराला आलेलं कथानाट्य म्हणजेच ‘माईम! चित्रपटातील मुकाभिनय म्हटलं की ठळकपणे नजरेसमोर येतो तो ‘चार्ली  चॅप्लीन’! या संदर्भात विशेषत्त्वाने उल्लेख करायलाच हवा तो कांही दशकांपूर्वीच्या ‘पुष्पक’  या चित्रपटातील कमल हसनच्या मुकाभिनयाचा!

चित्रपट असो वा नाटक बोलीभाषेला अनुरुप देहबोलीची जोड नसेल तर अभिनय परिणामकारक होऊच शकणार नाही.

भरतमुनींनी त्यांच्या अतिशय प्राचीन अशा ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथात अभिनयकलेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणाचे सविस्तर वर्णन केलेले आहे.’देहबोली’च्या विवेचनात भरतमुनींनी सांगितलेल्या चार अभिनय प्रकारांपैकी ‘आंगिक अभिनय’ या अभिनयप्रकाराचा उल्लेख       अपरिहार्यच.मुखज, शरीर आणि चेष्टाकृत हे ‘आंगिक अभिनयाचे’  तीन उपप्रकार म्हणजे अनुक्रमे १)चेहरा, २)शरीराची खांदे,मान, हात, पाय यासारखी मुख्य अंगे, आणि ३)शरीरावयवांच्या विविध हालचाली. या खेरीज विशिष्ट भूमिका साकारताना त्या पात्रानुसार(तरुण,प्रौढ,वृध्द इत्यादी) नटाने कसे चालावे, उठावे, बसावे, याबाबतचे नियमही नाट्यशास्त्रात सांगितलेले आहेत.

अतिशय परिपूर्ण आंगिक अभिनय कसा उत्कट नाट्यानुभव देऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी स्वतः प्रेक्षक म्हणून अनुभवलेल्या भूमिकांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात खालील भूमिकांचा आवर्जून उल्लेख करेन.

हत्तीरोगाची सुरुवात झाल्याने जडावलेला आपला एक पाय ओढत चालणारी ‘संध्याछाया’ या नाटकातील म्हातारी (विजया मेहता), अर्धांगाचा झटका आल्याने संपूर्ण शरीराची हळूहळू वाढत जाणारी वृध्द प्रो.भानूंच्या उभ्या शरीराची थरथर आणि अखेरचे त्यांचे उभेच्या उभे खाली कोसळणे! प्रेक्षकांच्या मनाचा थरकाप उडवणारे हे दृश्य अभिनित

केले होते डाॅ. श्रीराम लागू यांनी ‘हिमालयाची सावली’ या नाटकात! पुढे दिग्दर्शक आणि प्रकाशयोजनाकार म्हणून नावारूपाला आलेले ‘दिलीप कोल्हटकर’ आणि नुक्कड या हिंदी मालिकेमुळे वेगळी ओळख मिळालेले ‘सुरेश भागवत’ यांच्या ‘जास्वंदी’ या नाटकातल्या केवळ देहबोलीतून जिवंत केलेल्या दोन बोक्यांच्या अविस्मरणीय भूमिकाही खासच.आंगिक अभिनयातील देहबोलीचे महत्त्व अधोरेखित करणारे हे प्रातिनिधिक भूमिकांचे संदर्भ  पुरेसे बोलके ठरतील !

अशी ही देहबोली! नि:शब्द,अबोल.. तरीही खूप कांही सांगू पहाणारी मूकभाषा! शब्द हरवून बसलेल्या वंचितांना भक्कम आधार देणारी जशी तशीच आपल्यासारख्या सर्वांनाही जन्मक्षणापासून अखेरच्या श्वासापर्यंत सोबत करणारीही..!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जमापूंजी ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ जमापूंजी ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

माणूस म्हंटला की त्याला “संचय करणं” ह्याची आवड असते,सवय असते आणि त्याचं खूप महत्वही असतं. थोड्याफार जबाबदा-या उरकल्या की आपणच आपला सगळा हिशोब घेऊन बसतो. ह्या सगळ्या उलाढालीतून आपल्या जवळ काय उरलयं ह्याकडे प्रामुख्याने आपण लक्ष देतो.

आपल्याजवळ किती उरलयं वा आपल्याजवळ  शिल्लक किती ह्याकडे वळून बघतांना प्रथम आर्थिक बाबीकडे लक्ष जातं, नव्हे जवळपास त्याच निकषावर आपलं लक्ष केंद्रीत असतं. पण आपण जमा किती केलयं हे माणसं जोडणं, माणसं जपणं ह्या बाबीशी सुद्धा पडताळणं तेवढचं महत्त्वाचं असतं पण दुर्दैवाने तरुणाईच्या, यशाच्या धुंदीत बरेचवेळा ह्याचा विचार देखील आपल्याकडून होत नाही ही खेदाचीच बाब आहे.

माणसं, जोडणं, जपणं  ह्याला पण आपण “जमापूँजी” म्हणूच शकतो. काल एक “जमापूँजी “नावाची खूप मस्त शाँर्टफिल्म बघण्यात आलीयं. अर्थातच ती प्रत्यक्ष बघण्यातच खरी मजा आहे.कथानक तसं नेहमीचचं.बापलेकाच्या जनरेशन गँप मुळे गमावलेल्या खूप काहीबद्दल ही शाँर्टफिल्म सांगून जाते.नेहमीप्रमाणे “आई” नावाचा  हा दोघांना जोडणारा दुवा आपल्या परीने शक्यतोवर समेटाचा प्रयत्न करीतच असतो.

ही शाँर्टफिल्म बघतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, संवाद न साधणं, आणि त्यामुळे निर्माण झालेले गैरसमज ह्यामुळे आपण खूप काही गमावून बसतो आणि हे कळतं ते ही वेळ निघून गेल्यावरच ही आणखीनच दुर्दैवाची बाब. परस्परांशी घडघड मनमोकळं न बोलण्याने खरोखरच न भरून निघणारं नुकसान होतं हे ही शाँर्टफिल्म बघून जाणवलं.

मनमोकळे संवाद साधणे ही बाब खास करून  पुरुषांनी आवर्जून शिकून अंमलात आणण्याची बाब आहे कारण घडाघडा न बोलणा-या स्त्रिया ह्या अभावानेच आढळतील.

ह्या शाँर्टफिल्म मध्ये वडिलांबद्दल ओलावा, प्रेम नसलेल्या मुलाच्या डोळ्यातून त्यांच्या बद्दल असलेल्या गैरसमजामुळे त्यांच्या मृत्यू नंतर एकही अश्रुचा टिपूसही येत नाही अर्थातच टाळी एका हाताने कधीच वाजत नसते म्हणा. ही परिस्थिती उद्भवायला वडिलांचे सारखे तुलना करणे, संवाद न साधणे, आतून खूप असलेलं प्रेम मुलासोर अजिबात प्रदर्शित न करणं ह्या बाबी सुद्धा तेवढ्याच कारणीभूत असतात. वडीलांच्या मृत्यूनंतर आई काही प्रमाणात मुलाला वास्तविकतेची जाण देऊन मनातील किल्मीष दूर करण्यास सांगते.परंतु मुलाला ही एक प्रकारची रदबदली वाटते.

परंतु सामान आवरतांना मुलाला जेव्हा वडीलांना त्याच्याबद्दल वाटणा-या प्रेमाचा दाखला जेव्हा नजरेस पडतो तेव्हा मात्र मुलाच्या मनातील कटूता गळून पडते.  मुलाने लहानपणी काढलेलं चित्र, मुलाने वडीलांना गिफ्ट म्हणून पाठवलेलं रिस्टवाँच वडीलांनी जपून ठेवलेलं असतं ही बाब मुलाला एखाद्या इस्टेटीपेक्षाही भारी आणि महत्वपूर्ण वाटते. आणि वर्षानुवर्षे न साधलेली किमया हे चित्र, ते घड्याळ करतं आणि मुलाच्या डोळ्यातून त्याच्याही नकळत टपटप अश्रू ओघळायला लागतात.

कदाचित ह्या गोष्टींचे महत्त्व तरुणाईच्या जोषात लक्षात येत नाही परंतु आपल्या सगळ्यांनाच उत्तरायणाच्या दिशेने केव्हा ना केव्हा वाटचाल ही करावीच लागते. तेव्हा ह्या “जमापूँजी”च्या संकल्पनेत आर्थिक या बाबी बरोबर माणसं जोडणं, ती कायम जपणं ह्या संकल्पनेचा पण  समावेश असतो हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे कारण  पुढे मिळणाऱ्या सुख, समाधान, संतोष ह्याची ती  जणू गुरुकिल्लीच आहे. सोबत शाँर्टफिल्म ची लिंक देते आहे.

👉 https://youtu.be/JgvrQCxGepU

©  सौ.कल्याणी केळकर बापट

06/09/2022

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘या सम हा’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ ‘या सम हा’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

इतर कोणत्याही शब्दांसाठी त्यांच्या अर्थदृष्ट्या अनुरुप असे पर्यायी शब्द सहज सुचतात. सांगता येतात. चित्र हा शब्द मात्र याला अपवाद आहे. चित्र या शब्दाची असंख्य विविध आकर्षक रूपे सामावून घेणारा पर्यायी शब्द सहज सांगता येणार नाही.

चित्र या शब्दाची विविध रूपे आणि त्यात सामावलेल्या अर्थरंगांच्या वेगवेगळ्या छटा हेच या शब्दाचे सौंदर्य आहे.चित्रांचे जितके प्रकार तितकी त्याची रुपे.रेखाचित्र,रंगचित्र,तैलचित्र, जलरंगातलं चित्र, भित्तिचित्र, निसर्गचित्र, स्थिरचित्र, अर्कचित्र, व्यक्तिचित्र, छायाचित्र, त्रिमितिचित्र,हास्यचित्र,व्यंगचित्र असे असंख्य प्रकार.प्रत्येकाचं रुप, तंत्र, व्याकरण,निकष परस्पर भिन्न. तरीही ही सगळीच रुपं भावणारी ! हे सगळं सामावून घेणारा पर्यायी शब्द शोधून तरी सापडेल का?

चित्रकला ही निसर्गाने माणसाला दिलेली एक अद्भूत देणगी आहे.चित्र या शब्दाची व्याप्ती अधोरेखित करणारी जशी विविध रुपे आहेत,तशीच चित्रकलेद्वारे होणाऱ्या अविष्कारातही वैविध्य आहे.त्यातील प्रत्येक आविष्कारासाठी लागणाऱ्या कॅनव्हासचेही अनेक प्रकार.ड्राॅईंग पेपर,चित्रकलेच्या विविध आकाराच्या वह्या,अक्षरं गिरवण्यासाठी जशा सुलेखन वह्या तशीच रेखाटनांच्या सरावासाठीच्या सराव चित्रमाला!

हीच चित्रं जमिनीवर रेखाटली जातात ती रांगोळीच्या रुपात.या रांगोळ्यांच्याही कितीक त-हा.ठिपक्यांची रांगोळी,गालीचे, देवापुढे काढायची गोपद्म, शंख, स्वस्तिकांची रांगोळी,उंबऱ्यावरची रांगोळी,जेवणाच्या ताटाभोवतीची,औक्षण करण्यासाठीच्या पाटाखाली काढली जाणारी रांगोळी, आणि मग पाटाभोवती काढलेली सुबक महिरप, तसेच चैत्रागौर, ज्ञानकमळ  यासारखी वैशिष्ट्यपूर्ण रेखाटने ही सगळी चित्राचीच तर रुपे!

चित्रं मातीच्या झोपडीवजा घरांच्या भिंती सारवून त्या भिंतीवरही काढली जात.आदिवासी संस्कृतीतली वारली पेंटींगची कला ही तर आपला अमूल्य असा सांस्कृतिक ठेवाच आहेत!

चित्रं कागदावरच नाही तर कापडावरही काढली जातात.ती ‘फॅब्रिक पेंटींग’च्या विविध रुपात आविष्कृत होतात आणि वस्रप्रावरणांचं रुप खुलवतात.

चित्रकलेचं अनोखं असं एक वैशिष्ट्य म्हणजे ती एक स्वतंत्र कला जशी आहे तशीच इतर अनेक कलांचा अविभाज्य भागही बनलेली आहे. चलतचित्रांच्या सलग एकत्रीकरणातून निर्माण होणाऱ्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम ही रंगसंगती जपलेली आणि क्षणकाळात विरुन जाणारी  चित्रचौकटच असते.पूर्वीच्या काळात रंगभूमीवर वापरले जाणारे प्रसंगानुरुप स्थळं सूचित करणारे रंगीत पडदे,आणि आधुनिक रंगभूमीवरील नेपथ्य,रंग-वेशभूषेमधेही चित्रसौंदर्य अभिप्रेत आहेच. भरतनाट्य, कथ्थक यासारख्या शास्त्रीय-नृत्यप्रकारातल्या रंग-वेशभूषेने अधिकच खुलवलेल्या प्रत्येक मुद्रा या जिवंत चित्रेच म्हणता येतील.नृत्य सादरीकरण करता करता  नृत्याविष्कार करीत असतानाच क्षणात कॅनव्हासवर कुंचल्याच्या अलगद फटकाऱ्याने चित्रं रेखाटण्याची अचंबित करणारी कला नृत्य-चित्रकलेचा अनोखा मिलाफच म्हणावी लागेल.

नुकतीच समज आलेले लहान मूल प्रत्येक गोष्ट हाताळून बघण्याच्या औत्सुक्यापोटी एखादं पेन किंवा पेन्सिल असं कांही हाती लागलं की दिसेल तिथं रेघोट्या मारुन गिरगटा करीत बसते.हे करत असतानाची त्याची तल्लीनता भान हरपून चित्रात दंग होणाऱ्या कसलेल्या चित्रकाराच्या तल्लीनतेपेक्षा कणभरही कमी नसते.लहान मुलांचं हे गिरगटणं नेहमीच वेळ जायचं साधन असतं  असं नाही.अनेकदा मनातल्या सुप्त भावना व्यक्त करण्याचं ते एक माध्यमही असतं.म्हणूनच  अजाण मुलांनी भिंतीवर किंवा कागदांवर रेखाटलेल्या वरवर निरर्थक वाटणाऱ्या चित्रातही त्यांच्या त्या त्या वेळच्या मनोवस्थांचे ठसे लपलेले असतात.ते शोधून काढण्याचे तंत्रही आता विकसित झालेले आहे जे वैद्यकीय क्षेत्रात मानसिक बालरुग्णांच्या बाबतीत योग्य निदान आणि उपचारांसाठी पूरक ठरते आहे.

व्यक्तिचित्र काढताना प्रत्यक्ष ती व्यक्ती किंवा  तिचं छायाचित्र पुढे ठेवून रेखाटन केलं जातं.अशी प्रत्यक्ष व्यक्तिप्रतिमा उपलब्ध नसेल तेव्हा त्या व्यक्तीचं वर्णन ऐकूनही त्याबरहुकूम हुबेहूब चित्र काढण्याची कलाही कांहीना अवगत असते.एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हेगाराच्या वर्णनाबरहुकूम काढलेली अशी रेखाटने गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी नेहमीच सहाय्यभूत ठरतात.

चित्र हा शब्द चित्रकलेचा अविभाज्य भाग जसा आहे तसाच अनेक अर्थपूर्ण शब्दांचा जन्मदाताही. चित्रकार,चित्रपट, चित्रकाव्य, चित्रदर्शी, चित्रमय, चित्ररथ, चित्रविचित्र, चित्रशाळा, चित्रीकरण,चित्रमाला,चित्रतारका असे कितीतरी शब्द !प्रत्येकाचे अर्थ,भाव,रंग,संदर्भ वेगवेगळे तरीही त्यात चित्र या शब्दातली एक रंगछटा अंतर्भूत आहेच.

असा चित्र हा शब्द!अल्पाक्षरी तरीही बहुआयामी !अनेक कंगोरे असणारा.म्हणूनच सुरुवातीला मी म्हंटलं तसं चित्र या शब्दाचा हा एवढा पैस सामावून घेणारा पर्यायी शब्द शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच चित्र या शब्दाला या सम हा असेच म्हणणे उचित ठरेल !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र उत्सव व त्याचे बदलते स्वरूप… ☆ सौ. अर्चना देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ नवरात्र उत्सव व त्याचे बदलते स्वरूप… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

भक्ती, शक्ती ,बुद्धी आणि माया यांचा अनोखा संगम असलेल्या आदिशक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. भक्तिमय वातावरणात आणि तेवढ्याच उत्साहाने शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये साजरा केला जातो. रास, गरबा, श्री सूक्त, दांडिया बरोबरच इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल या दिवसात असते.

महिषासुरमर्दिनी, महिषासुर राक्षसाला मारणारी रणरागिनी! अनेक राक्षसांना मारणाऱ्या देवांची आपण पूजा करतो पण या राक्षसाला  मारण्यासाठी देव का पुढे आले नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण उत्तर अगदी सोपे आहे.

कोमल मनाच्या, नाजूक शरीराच्या आत केवढी प्रचंड शक्ती सामावलेली असते ही समाजाला दाखवून द्यायचे होते.

नवरात्र सोहळा म्हणजे स्त्री शक्तीची ,स्त्रीने स्वतःला व समाजाला करून दिलेली आठवण आहे. एक जन्मदायिनी प्राण हरणी सुद्धा होऊ शकते हे जगाला दाखवून देण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे.

आदिशक्तीचा जागर म्हणजे नवरात्रीचा सण रात्रीचाच साजरा करण्याची प्रथा आहे .याला धार्मिक व पौराणिक आधारही आहेत. या दिवसात देवीची भजने, गोंधळ, श्री सूक्त पठाण असे कार्यक्रम केले जातात . स्त्रियांचयासाठी तर मंतरलेले दिवस असतात.नवरात्रोत्सव आपला धार्मिक तसाच सांस्कृतिक ठेवा आहे

नवरात्र म्हणजे वास्तविक घरगुती धार्मिक सोहळा. देवीच्या मंदिरात पूजा, उपासना, भजन ,गोंधळ आधी माध्यमाद्वारे चालणारा सोहळा! देवतांची मनापासून उपासना हीच आपली खरी संस्कृती .आपल्या संतांनी विविध धार्मिक मार्गांनी आदिशक्तीचा जागर केलेली उदाहरणे आपल्या ऐकिवात आहेत. नवरात्राचे धार्मिक महत्त्व मोठे आहे.

अत्यंत पवित्र वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो. स्त्रिया घराची रंगरंगोटीकरून घरातली भांडी स्वच्छ घासून घेतात तसेच अंथरूण , पांघरूण  धुतलीजातात. स्त्रिया नऊ दिवस उपास करतात ,गादीवर झोपत नाही एवढेच काय पायात चप्पल न घालता नऊ दिवस देवीच्या दर्शनाला जातात. घटस्थापने दिवशी घट बसवूनअखंड नंदलाल नंदादीप तेवत ठेवतात. देवीच्या जागराचा म्हणजेच स्त्री सन्मानाचा हा उत्सव आहे. 

पण आता मात्र त्याचे स्वरूप बदलले आहे. गणेश मंडळाप्रमाणेच नवरात्रोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे., मंडळामध्ये स्पर्धा निर्माण  झाल्या आहेत, मोठमोठ्या वर्गण्या सक्तीने वसूल केल्या जातात. रस्त्यावर मोठमोठे मांडव घातले जातात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.  सगळीकडे झगमगाट करून कानठळ्या बसणारी गाणी लावली जातात एवढेच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत दांडिया खेळला जातो. त्यावेळी रुग्ण, विद्यार्थी ,वृद्ध व्यक्ती यांचा विचार केला जात नाही .तरुण मुले मुली न शोभणारी वेशभूषा करूनहुललडबाजी करतात. दहा वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरावीत हा कायदा मोडून, पोलिसांना न जुमानता बेधुंदपणे गोंधळ सुरू असतो. हा प्रकार वाढत चालल्यामुळे उत्सव ही सामाजिक समस्या होत चालली आहे.

काही वेळा गणेशोत्सवाला घातलेला मंडप न काढता त्याच ठिकाणी दुर्गामातेचे प्रतिष्ठापना केली जाते. परंतु अनंत चतुर्दशीनंतर पितृपंधरवडा येतो व त्यानंतर नवरात्राला सुरुवात होते त्यामुळे जवळजवळ एक महिना रस्त्यावरील जागा अडवून ठेवली जाते ,वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे थकल्या भागलेल्यांना दूरच्या रस्त्याने घरी पोहोचावे लागते ..काही वेळा कार्यक्रम सुरू असेल तर आहे त्यावेळी तिकडची वाहतूक दुसरीकडून वळवली जाते त्यावेळी घरी परतणाऱ्या व्यक्तिंना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

काही मंडळे  तिसरी माळ पाचवी माळ सातवी माळ….. असा मुहूर्त पाहून तोरणाची मिरवणूक करतात .रस्त्याचा बराच भाग व्यापत ही मिरवणूक मंद गतीने पुढे सरकत राहते .त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो .नाचण्यात दंग असलेल्या कार्यकर्त्यांना याची जाणीव नसते .बँडचा ताफा, ध्वनिवर्धक भिंती ढोल ताशांचा मोठा आवाज यामुळे कोलाहल माजतो.त्यावेळीइमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास होतो याचा विचार होत नाही तसेच अशा मिरवणूकीत दंगा होऊ नये म्हणून पोलिसांवर येणारा ताण वेगळा!

आपला समाज उत्सवप्रिय आहे मान्य पण नियमांचे पालन केले गेले तर विविध सणाद्वारे आणि उत्सवा द्वारे समाजात चैतन्य निर्माण होईल, आणि आनंद द्विगुणीत होईल असे मला वाटते.    

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 10 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

 

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 10 ☆ सौ. अमृता देशपांडे  

” श्यामची आई ” या साने गुरुजींच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आचार्य प्र.के.अत्रे लिहितात,” साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक आपल्या आसवांनी लिहून काढले. त्यातले प्रत्येक अक्षर न् अक्षर गुरुजींनी गहिवरल्या अंतःकरणाने आणि डबडलेल्या डोळ्यांनी लिहिले आहे. त्यातले प्रत्येक वाक्य गळ्यातून अन् दाबून ठेवलेल्या हुंदक्यातून निर्माण झाले आहे.

गुरुजींच्या जीवनाचा झरा शक्य तितका निर्मळ ठेवण्याची आटोकाट काळजी तिने घेतली. मन कशाने स्वच्छ करता येईल ? अश्रूंनी…म्हणून अश्रूंचे हौद परमेश्वराने डोळ्यांजवळ भरून ठेवले आहेत.’ असुवन जल सींच सींच प्रेमवेलि बोई ‘ हा अश्रूंच्या पाण्याने मन शुध्द करून त्यात प्रेम आणि भक्ती ची वेल वाढवण्याचा मीराबाईचा मंत्र गुरूजींना त्यांच्या आईनेच शिकवला. आपल्या जीवनवेलीला आत्मशुद्धीच्या आसवांचे शिंपण घालावयाला आईने गुरुजींना लहानपणापासून शिकवले. अश्रूंचा इतका उदात्त आणि सुंदर अर्थ कालातीत आहे,
” मिळतिल कवने, मिळतिल दुर्मिळ तत्त्वांचे बोल
दिव्य अश्रूंनो! तुम्हांपुढति परि
ते सगळे फोल……

समाप्त 🙏🏻

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प,भाग ३८ परिव्राजक १६.बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प भाग ३८ परिव्राजक १६.बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजी १६ ते २७ऑक्टोबर १८९२ मध्ये बेळगांवमुक्कामी आले. महाराष्ट् म्हणजे तेव्हाचा मुंबई प्रांत ! तेव्हा बेळगांव मुंबई प्रांतात होते. कोल्हापूरहून भाटे यांचे नावाने गोळवलकर यांनी परिचय पत्र दिलं होतंच.  श्री. सदाशिवराव भाटे वकिलांकडे स्वामीजींचं अत्यंत अगत्यपूर्वक स्वागत झालं. त्यांना पाहताक्षणीच हा नेहमीप्रमाणे एक सामान्य संन्यासी आहे अशी समजूत इथेही झाली असली तरी त्यांचं काहीतरी वेगळेपण आहे हे ही त्यांना जाणवत होतंच. भाटे कुटुंबीय आणि बेळगावातले इतर लोक यांना कधी वाटलं नव्हतं की काही दिवसांनी ही व्यक्ती जगप्रसिद्ध होईल. बेळगावचे हे श्री भाटे वकिल यांचे घर म्हणजे विदुषी रोहिणी ताई भाटे यांच्या वडिलांचे घर होय.

मराठी येत नसल्यामुळे भाटे कुटुंबीय स्वामीजींशी इंग्रजीतच संवाद साधत. त्यांच्या काही सवयी भाटेंना वेगळ्याच वाटल्या म्हणजे खटकल्या. पहिल्याच दिवशी स्वामीजींनी जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून विडा मागितला. त्याबरोबर थोडी तंबाखू असेल तरी चालेल म्हणाले. संन्याशाची पानसुपारी खाण्याची सवय पाहून भाटेंकडील मंडळी अचंबित झाली. आणखी एक प्रश्न भाटे यांना सतावत होता तो म्हणजे, स्वामीजी शाकाहारी आहेत मांसाहारी? शेवटी न राहवून त्यांनी स्वामीजींना विचारलंच की आपण संन्यासी असून मुखशुद्धी कशी काय चालते? स्वामीजी मोकळेपणाने म्हणाले, “मी कलकत्ता विद्यापीठाचा पदवीधर आहे. माझे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्यामुळे माझे जीवन जरी संपूर्ण बदलले असले तरी, त्याधीचे माझे आयुष्य मजेत राहणार्‍या चारचौघा तरुणांप्रमाणेच गेले आहे. संन्यास घेतल्यावर इतर सर्व गोष्टी सोडल्या असल्या तरी या एक दोन सवयी राहिल्या आहेत. पण त्या फारशा गंभीर स्वरुपाच्या नाहीत. म्हणून राहू दिल्या आहेत. पण आपोआपच सुटतील”. आणि शाकाहारीचं उत्तर पण भाटेंना मिळालं. “ आम्ही परमहंस वर्गातील संन्यासी. जे समोर येईल त्याचा स्वीकार करायचा. काहीही मिळालं नाही तर उपाशी राहायचं”.

खरच असं व्रत पाळणं ही कठीण गोष्ट होती. मनाचा निश्चय इथे दिसतो. स्वामीजी सलग पाच दिवस अन्नावाचून उपाशी राहण्याच्या प्रसंगातून गेले होते. भुकेमुळे एकदा चक्कर येऊन पडलेही होते. तर कधी राजेरजवाडे यांच्या उत्तम व्यवस्थेत सुद्धा राहिले होते. पण त्यांना कशाचाही मोह झाला नव्हता हे अनेक प्रसंगातून आपल्याला दिसलं आहे. जातीपातीच्या निर्बंधाबद्दल ही शंका विचारली तेंव्हा, आपण मुसलमानांच्या घरीही राहिलो आहोत आणि त्यांच्याकडे जेवलोही आहोत असे सांगितल्यावर, हे संन्यासी एका वेगळ्या कोटीतले आहेत हे समजायला वेळ लागला नाही.

आज लॉकडाउनच्या  काळात दारूची दुकाने उघडली तर परमोच्च आनंद झाला लोकांना. जणू उपाशी होते ते. १०ला उघडणार्‍या दुकानांसमोर सकाळी सातपासूनच उभे होते लोक ! दुकानांसमोर दारू घ्यायला रांगाच रांगा लागल्या होत्या. यात स्त्रिया सुद्धा मागे नव्हत्या. खांद्याला खांदा देऊन लढत होत्या !  हे दृश्य पाहिल्यावर स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीची किती आवश्यकता आहे हे जाणवून मन खिन्न होते. 

एकदा भाटेंचा मुलगा संस्कृत भाषेचा अभ्यास करताना पाणीनीच्या अष्टाध्यायीतील सूत्र म्हणत होता. त्यातल्या चुका स्वामीजींनी दुरुस्त करून सांगितल्या तेव्हा या अवघड विषयाचे ज्ञान असणे ही सामान्य गोष्ट नाही असे भाटे यांना वाटले. एक दिवस काही परिचित व्यक्तींना एकत्र करून त्यांनी स्वामीजींबरोबर संभाषण घडवून आणले. त्यात एक इंजिनियर होते. ‘धर्म हे केवळ थोतांड आहे, शेकडो वर्षांच्या रूढी चालीरीती यांच्या बळावर समाजमनावर त्याचे प्रभूत्त्व टिकून राहिले आहे किंबहुना लोक केवळ एक सवय म्हणून धार्मिक आचार पाळत असतात’, असं त्यांचं मत होतं. पण स्वामीजींनी बोलणे सुरू केल्यावर त्यांना ह्या युक्तिवादाला तोंड देणं अवघड जाऊ लागलं. आणि अखेर शिष्टाचाराच्या मर्यादेचा  भंग झाल्यावर भाटेंनी त्यांना (म्हणजे एंजिनियर साहेबांना) थांबवलं. पण स्वामीजींनी अतिशय शांतपणे परामर्श घेतला. ते प्रक्षुब्ध झाले नाहीत. कोणाच्याही वेड्यावाकड्या बोलण्याने सुद्धा स्वामीजी अविचल राहिले होते. याचा उपस्थित सर्वांवर परिणाम झाला.या चर्चेचा समारोप करताना स्वामीजी म्हणाले, “ हिंदुधर्म मृत्युपंथाला लागलेला नाही हे आपल्या देशातील लोकांना समजावून सांगण्याची वेळ आली आहे. एव्हढच नाही तर, सार्‍या जगाला आपल्या धर्मातील अमोल विचारांचा परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. वेदान्त विचाराकडे एक संप्रदाय म्हणून पहिले जाते हे बरोबर नाही. सार्‍या विश्वाला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्या विचारात आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे”. स्वामीजींची ही संभाषणे आणि विचार ऐकून बेळगावचा सर्व सुशिक्षित वर्ग भारावून गेला होता.                                                                          

बेळगावातील मुक्कामात रोज सभा होऊ लागल्या. शहरात स्वामीजींच्या नावाची चर्चा होऊ लागली. वेगवेगळ्या विषयांवर सभांमध्ये वादविवाद व चर्चा झडत असत. स्वामीजी न चिडता शांतपणे प्रश्नांची उत्तरे देत. कोपरखळ्या मारत विनोद करत स्वामीजी समाचार घेत असत.

या बेळगावच्या आठवणी वकील सदाशिवराव भाटे यांचे पुत्र गणेश भाटे यांनी लिहून ठेवल्या आहेत. स्वामीजी त्यांच्याकडे आले तेंव्हा ते (गणेश)  बारा-तेरा वर्षांचे होते. स्वामीजीच्या वास्तव्याने पावन झालेली त्यांची ही वास्तू भाटे यांनी रामकृष्ण मिशनला दान केली आहे. स्वामी विवेकानंदांनी या मुक्कामात वापरलेल्या काठी, पलंग, आरसा या वस्तू ते राहिले त्या खोलीत आठवण म्हणून जपून  ठेवल्या आहेत, त्या आपल्याला आजही  पाहायला मिळतात.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares