हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 118 – देश-परदेश – मत चूको चौहान ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)

☆ आलेख # 118 ☆ देश-परदेश –  मत चूको चौहान ☆ श्री राकेश कुमार ☆

मौके पर चौका लगाना चाहिए। ये सब दशकों से सुनते आ रहे हैं। विगत वर्ष ” राष्ट्रीय आडंबर विवाह ” सम्पन्न हुआ था। हमने उक्त परिवार के एक खास से पूछा, हमें बुलाना भूल गए थे। उसने तत्परता से बताया यदि हम उसको अपनी दिल की बात पहले बता देते तो इटली से लेकर जामनगर सभी कार्यक्रम में शिरकत कर चुके होते। दिल की बात बताने में हम हमेशा लेट लतीफ़ ही रहते हैं। युवा अवस्था में अपने पहले प्यार का इज़हार करने में भी चूक गए थे। खैर छोड़िए “अब पछताए होत क्या जब चिड़िया ही दूसरे के साथ उड़ गई”

 उक्त विवाह में भाग ना ले सकने का दुःख के लिए बस इतना ही कह सकते हैं, कि ” जिस तन लागे, वो तन जाने”

इस बार हमने मत चूको चौहान को अपना अड़ियल मानते हुए, दूसरे घराने के  परिवार के विवाह के निमंत्रण प्राप्त करने के लिए ” सारे घोड़े खोल दिए” थे। अपने मुम्बई की पोस्टिंग्स के कॉन्टैक्ट्स हो या, दिल्ली की सत्ता के गलियारे वाले संबंध हो। यहां ये स्पष्ट कर देवे, इसी मौके के लिए विगत वर्ष हमने दस दिन का गुजरात दौरा भी किया था।

लाखों जतन कर लो पर होता वही है, जो लिखा होता है। दूसरे परिवार ने तो इतनी सादगी से विवाह किया, कि पड़ोसियों को भी नहीं बुलाया हैं, फिर हम किस खेत की मूली हैं।

इस सादगी पूर्ण विवाह के लिए दूसरे परिवार का साधुवाद।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान)

मोबाईल 9920832096

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याची सरगम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

आयुष्याची सरगम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आयुष्याची सुरावट ”सा रे ग म प ध नी सा’ या सप्तसुरातून साकार होत असते किंवा केली जाते. हे सूर जितके सच्चे, तितके त्यातून निर्माण होणारे गीत सुरेल निघते. सप्तसुरांच्या संगतीने आपले आयुष्य सुंदर सुरमयी बनते कारण यातील प्रत्येक सूर हा त्याच्या विचाराशी किंवा आशयाशी सच्चा राहतो.

*सा.. *आयुष्याचा प्रारंभ हाच ‘सा’ मधून होतो त्यामध्ये जीवनाचे सातत्य समाविष्ट आहे.

 रे… रेंगाळणे.. आयुष्याची वाटचाल चालू असताना आपण अधून मधून थांबतो किंबहुना रेंगाळतो..

ही वाटचाल जेव्हा शांतपणे सुरू असते, तेव्हा ‘रे’ सुराची निर्मिती होते.

ग.. विचारांना ‘ग’गती देतो. तर कधी

‘ग’ हा गमावल्याची भावनाही निर्माण करतो.

म… मानून घेणे, हे ‘म’ चे वैशिष्ट्य आहे.. जे आहे त्यात समाधान मानून आपल्या आयुष्याची वाटचाल आपण सुखद करतो.

प.. मनाची व्याप्ती वाढवणे किंवा पसरवणे हे ‘प’ चे वैशिष्ट्य! सप्तसुरांतील ‘प’हा चढती कमान दाखवतो. !

ध.. ‘ध’धारण करणे.. मनाची शांतता धारण करणे हे शिकवणारा

हा ‘ध’ आहे. ‘ध-‘ धारयती हा पुढे

‘नि’ मध्ये जातो.

नि – निवृत्ती कडे वाटचाल..

जगण्यातून निवृत्ती घेता येणे हे बोलणे सोपे पण आचरण्यास अवघड असे तत्व!ही निवृत्ती ज्याला साधली त्याला ‘सा’ची सायुज्यता साधणे कठीण जात नाही..

सायुज्यता – मोक्षाच्या चार अवस्थांपैकी चौथी सायुज्यता!

ही साधली तर वरच्या ‘सा’च्याजवळ आपण पोचू शकतो असे म्हणायला हरकत नाही..

आयुष्याच्या सरगमातील हे ‘सारेगमपधनीसा’ चे सूर विचार केला तर किती वेगळे अस्तित्व दाखवतात ना?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शाळा सुटणारी मुले अर्थात गळती” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸 

☆ “शाळा सुटणारी मुले अर्थात गळती” ☆ सुश्री शीला पतकी 

दहावी काय कोणत्याही टप्प्यावर नापास झाले की मुले शाळा सोडतात पालकांना काहीच प्रॉब्लेम नसतात कारण दहा वर्षाचा मुलगा चहाच्या गाडीवर काम करून रोज शंभर रुपये मिळवतो शिवाय त्याचा चहा नाश्ता तिथेच चालतो म्हणजे तो खर्च नाही झोपडपट्टीतल्या पालकाकडे शंभर रुपये रोज मुलामुळे मिळतात मग ही मुलं शिक्षण नाही योग्य मार्गदर्शन नाही नको त्या वयात पैसा हातात त्यामुळे व्यसनाधीन होऊन बिघडतात

दुसरा मुद्दा म्हणजे आता सर्वच पालकांना इंग्रजी माध्यमाचे वेड लागले आहे. ऐपत नाही आर्थिक, घरामध्ये कोणतेही वातावरण नाही आणि सगळ्या घराने राबून विनाकारण एका मुलासाठी इंग्रजी माध्यमाचे पैसे भरत बसायचे.. त्याला ते झेपत नाही तो एखाद्या तुकडीत वारंवार नापास होतो आणि शाळा सुटते ती कायमची.. !या सगळ्यावर सरकारने एकच उपाय काढला तो म्हणजे नापासच करावयाचे नाही! त्यामुळे शिक्षणाचा स्तर खालावला परीक्षाच नाही म्हणल्यावर मुले कशाला अभ्यास करणार? शेवटी परीक्षा हा एक धाक होता.. मुलांनी अभ्यास करायला तोच मुळी संपला. शिक्षकही निवांत झाले… पण आम्ही शिकवत होतो त्यावेळेला एक मार्कही वाढवून देत नसू त्यामुळे मुलांना कसून तयार करून घेणे आणि आपल्या वर्गाचा निकाल उत्तम लावणे हे आमचे कामच होते पहिल्या वर्षी जेव्हा चौथीतल्या नापास मुलांनाही पाचवी ढकलण्यात आल तेव्हा माझ्या असे लक्षात आले की सहावीत आल्यावर या मुलींना वाचता येत नव्हते लिहिता येत नव्हते शेवटी मी त्यांचा एक स्वतंत्र वर्ग पाच तुकड्यातून तयार केला आणि त्या वर्गाला पूर्ण पहिली टर्म फक्त लिहायला आणि वाचायला शिकवायचे प्रत्येक शिक्षक आणि मग मराठीचा असो इंग्रजीचा असो गणिता चा… गणित शिक्षकाने पाढे पक्के करून घ्यायचे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चार क्रिया शिकवायच्या. इंग्रजी शिक्षकाने एबीसीडी आणि काही शब्द स्पेलिंग साठी त्यांना दिले होतेते शिकवावयाचे आम्ही हे सिल्याबस अभ्यास करून तयार केले होते परिणाम असा झाला की सहावीच्या दुसऱ्या सत्रात ही मुले अभ्यासू तर झालीच आव्हान स्वीकारायला तयार झाली. आपल्यासाठी कोणी विशेष राबत आहे या भावनेने प्रेरित झाली! पालकांची सभा घेऊन त्यांनाही वेळीच जाणिव दिली तेही थोडे बहुत सतर्क झाले आणि शेवटी या वर्गाचा निकाल शंभर टक्के आणि उत्तम लागला केवळ दहावीला प्रयत्न करून चालत नाही हे शिक्षकांना कोण सांगणार?( त्या नाही शिक्षणाचे फालतू कामे आहेतच आणि त्याचा ताणही आहे )पण असे काही वेगळे होण्यापेक्षा 35 पर्यंत आणून त्या मुलाला पास करण्याचा सपाटा बोर्डाने चालवलाच आहे वीस मार्गाच्या कुबड्या दिल्या मग उरले किती पंधरा मार्क.. पेपरच असे काढले की प्रश्नपत्रिकेच्या पहिल्याच पानात त्याला 15 मार्क पडतात. दहावीच्या परीक्षेला प्रश्न गाळलेल्या जागा, जोड्या लावा, वेगळा घटक ओळखा अशा फुटकळ प्रश्नांनी त्याला सहजच 20 मार्क मिळू लागले परीक्षकांचे कष्ट वाचले… नाहीतर परीक्षकांना सूचना 15 पर्यंत आलेल्या मुलाला वीस पर्यंत आणा वीस पर्यंत आलेल्या मुलाला 25 पर्यंत न्या आणि मग मॉडरेटर पर्यंत त्या मुलाला 35 मार्क मिळून जातात ही वाढवा वाढवी झाल्यामुळे मुलाला प्रत्यक्षात काहीही येत नाही आणि आपण स्वतःची त्या मुलाची पालकांची शाळेची आणि एकूण समाजव्यवस्थेची फसवणूक करीत आहोत. याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक टप्प्यावर उत्तम समुपदेशक हवेत नेमके काय खरे आहे याची जाणीव त्या विद्यार्थ्याला झाली पाहिजे त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे त्याला त्याला वेगवेगळ्या लोकांच्या कथा सांगितल्या पाहिजेत नकारातून स्वीकाराकडे कसे जाता येते या वाटा त्यांना कळल्या पाहिजेत आम्ही आपलं काहीच करीत नाही 35 मिनिटांचा तास संपला की शिक्षकांचे त्या वर्गाप्रती काही देणे लागत नाही शिक्षक फक्त जबाबदार आहेत असे नाही पालक विद्यार्थ्यांना रोज शाळेत पाठवत नाही हे दुःख आहे मग कधी मध्ये शाळेत येणारे विद्यार्थी शाळेत रमत नाही बर शाळेत सगळेच फुकट मिळत असल्याने पालक राखोळी घातल्यासारखा विद्यार्थी शाळेत पाठवतात विद्यार्थ्यांनाही सगळे फुकट मिळत असल्यामुळे कसलीच जाण नाही पालकांच्या खिशाला तोशिष पडत नाही त्यामुळे शाळा म्हणजे गंमत झाली! शाळेमध्ये सध्या फक्त नाच गाणे चालू आहे कॅसेट लावून नाचणे नाटक तर संपतच आले नवीन क्रिएटिव्हिटी ला वाव नाही स्वतः काही लिहत नाहीत विज्ञानाला तर काहीच व्हॅल्यू नाही मुळात विज्ञान शिक्षक विज्ञान दृष्टिकोन असणारा असत नाही खेडेगावात तर अंधश्रद्धा दूर करा असे सांगणारे शिक्षक नवस फेडायला रजा घेऊन निघालेले दिसतात हे दुर्दैव आहे.. याच्या वरती विचार करायला कमिट्या ह्या थोरामोठ्यांच्या त्यात अनुभवी शिक्षकांचा समावेश नसतो त्यामुळे तोडगे भलतेच निघतात आणि सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे शिक्षणाने धड माणूस घडत नाही धड कर्मचारी घडत नाही तिथे काही वेगळ्याच परीक्षा असतात आणि वेगळेच फंडे असतात माझ्या शेजारी बांधकाम चालू आहे बांधण्यात येणाऱ्या बीम जेव्हा भरतात तेव्हा तो सर्व बाजूने समान मापाचा असावा यासाठी एक कोयत्यासारखा सरकपट्टीवरचा वर्नियर कॅलिपर त्यांनी बनवला आहे अर्थात त्याला हे नाव माहित नाही ते मी त्याला सांगितलं सर्व बाजूने माप सारखे असावे यासाठीच ते उपकरण आहे आम्ही शाळेत शिकवलेले उपकरण वेगळं पण तेच कार्य करणारे अतिशय साधे पट्टीवरचे उपकरण त्याने सुंदर बनवले आहे ही आहे त्या त्या ठिकाणांची गरज आणि त्यासाठी वापरलेले किंवा केलेले प्रयत्न हे शिक्षणाच्या पलीकडे आहेत हे वापरणारा माणूस शिक्षित नाही आहे की नाही गंमत मला तर खूपदा मनात प्रश्न येतो की काही टक्के मुलाने शिकू नये त्याला फक्त लिहायला वाचायला शिकवावे त्याला कष्टाची विविध कामे करता येईल असे ट्रेन्ड करावे आणि त्या कामाला भरपूर मजुरी द्यावी गवंड्याला हजार रुपये पगार आहे रोज.. शिक्षित बीए बीएड 5000मासिक वर काम करायला मिळतात दुर्दैव आहे.. 100 जागांसाठी परवा 1000 इंजिनिअर लाईन मध्ये उभे होते हा व्हिडिओ पाहिल्यावर खूप वाईट वाटले आता मुलांनी शिकावं तरी किती पण रोजगाराची उपलब्धता नाही नवनवीन रोजगार हुडकणारी एक कमिटी हवी त्या त्या भागातली वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याचे नियोजन झाले पाहिजे मी एक दिवसभर लिहीत बसले तरी हे संपणार नाहीत असो एका लेखाच्या निमित्ताने माझ्या मनात आलेले विचार मी शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे मांडले आहेत आणि माझ्या अनुभवातून काही लिहले आहे इतकेच….. !!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “ स्थितप्रज्ञ“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – स्थितप्रज्ञ – ? ☆ श्री सुहास सोहोनी

वर्षे सरली, युगे उलटली,

काळ किती लोटला

स्थितप्रज्ञ मी अविचल अविरत

शिलाखंड एकला

 

सजीव प्राणी पक्षी त्यांसी

स्वर्ग, नरक अन् मोक्ष

निर्जीवांसी गति न कोणती

केवळ अस्तित्व

 

घडले नाही कधीच काही

उबूनि गेला जीव

अंतर्यामी आंस उठे परि

जिवास भेटो शिव

 

शिल्पकार कुणि दैवी यावा

व्हावी इच्छापूर्ती

अंगांगातुन अन् प्रकटावी

सुबक सांवळी मूर्ती

 

मोक्ष हाच अन् हीच सद्गती

निर्जीवाचे स्वत्व

छिन्नीचे घन घाव सोसुनी

लाभतसे देवत्व…

©  श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “आली गाडी.. गेली गाडी..…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “आली गाडी.. गेली गाडी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“सांगितलं कि गं तुला कितीतरी बाऱ्या!… माझ्या गावा कडं येताना तू मोकळीच येऊ नगंस म्हनून!… तिकडनं मंमईहून येताना माझ्या सासुरवाशीण लेकीला संगट घेऊन येशील, चार दिवस आपल्या म्हातारीला भेटायला… पन तू काय मनावर घायचं नावं घेत न्हाईस!… अन फुकाच्या मातूर दिसरातीच्या सतरा बाऱ्या येरझारा घालतीस… तसं तुला काय गं कुणाच्या सुखदुखाचं काय पडलेललं नसतयं म्हना!… तू जोडून घेतलेला हाय नव्हं त्यो चौवीस डब्यांचा बारदाना… आमच्यावानी संसाराचा ओढत जातीस तुझा गाडा…बाया बापड्या, बापयं गडी मानूस, लेकरं बाळं, ट्रंका, बोचकी, पिशव्या नि हबशींनी ओतू जातोय डब्बा डब्बा… जसा जीवनाच्या प्रवासाला निघतातं तसं…कुणी हसतया,कुणी रडतया तर कुणी इवळतया तर कुनाची कुजबूज, शबुद नसलेली धुसफूस तर कुनाची कावाकाव…तुला यातलं काही कळंत नसतया तुझी असती रूळावरून वाघ पाठीमागं लागल्यासारखी धावाधाव…जाशील तिकडं मुलूख तुला थोडा जसा दक्षिणेतलं रामेश्वर अन उत्तरेतलं काशी…सगळीच अनोळखी कुणं कुणाची कशाला करतीय चवकशी… जो तो इथं वागतोय तालेवार असल्यावानी…सगळ्यांना घेतीस सामावून तू आपल्याच पोटात.. अन जो तो असतो आपल्याच नादात.. कुणाचं दुखलं खुफलं… मन फुलून आलं आनंदान.. तुला गं पडाया कशाची फिकीर.. शिटीवर शिटी फुंकत जातीस वरडत नि एकेक स्टेशान मागं सोडंत.. जत्रा भरेली फलाटावरची चढ उतार होतेय तू आल्यावर… वाईच पोट होतयं तुझं  ढवळल्यागत… पर तुला काहीच फरक पडतो काय… फलाटाला सोडून गेल्यावर त्या फलाटाचा उसासा तुला कधी कळतो काय?… साधू संतावानी तू अशी कशी गं निर्लेपवानी… अन तुला कसं कळावं एका आईचं आतडं कसं तिळ तिळ तुटतयं  लेकीच्या भेटीसाठी.. चार वर्षांमागं लेकीला गं सासरला धाडलं…काळजाचा तुकडाच दूर दूर गेला नि भेटीगाठीला गं आचवला… सांगावा तो तिचा यायचा सठीसाही माहीला सुखी आहे पोरं कानात सांगुन जायचा.. परी पोरीच्या भेटीसाठी जीव तो आसुसलेला असायचा… लिहा वाचायची वानवा हाय माझ्याजवळ..पतुर पाठवाया  उभा राहायतयं धरम संकट.. फोनची श्रीमंती आमच्या खेड्यातपतूर पोहचलीच नाही… बोलाचाली चा मायेचा शबुद सांग मंग कानावर कसा पडावा बाई..इकडच्या धबडगा घराचा उंबरठा नि शेताचा बांध कधी मला गावाची वेस वलांडून देईनात खुळे… अन तिकडं पोरीला सासरच्या जोखडात अडकवून टाकतात कारणांचे खिळे… मग तुझा घ्यायचा आधार असं मला लै मनात आलं.. म्हटलं तू सारखी ये जा करतीस लाखावरी माणसांची ने आण करतीस मगं तुला माझ्या पोरीला एकडाव तरी संगट घेऊन यायला जड कशाला जाईल.. अगं चार दिसं नसंना पण उभ्या उभ्या येऊन पोरं जरी येऊन भेटून, नदंरला पडून गेली तरी बी लै जीवाला बरं वाटंल बघ.. सकाळी सकाळी तू तिला इथं सोडायचं अन रातच्याला माघारी घेऊन जायचं… तू म्हनशील मगं तूच तसं का करीनास… न्हाई गं बाई… पोरीची अजून कूस उजवली नाही तवर तिच्याकडं जाता येत न्हाई हि परंपरा हायं आमची… तवा तुझ्याकडं पदर पसरून मागणं केलं… काही बी करं कसं बी जमवं पण एक डाव, या वेड्या आईला तिच्या पोरीची भेट एवढी घडवं… आणि पोरीला आणशील तवा हसऱ्या चेहऱ्याने  निळ्या धुराचा पटका हवेत उडवत, आनंदाचा हिरवा बावटा फडकत फलाटावर येशील… गळाभर लेकिला तिचं मी भेटल्यावर मायेच्या पायघड्या घालून तिला माहेराच्या घराकडं नेईन…औटघटकेचं का असंना पण माहेरपण करीन…आणि…रातच्याला पाठवणी करायला येईन तवा तू वेळ झाली निघायची म्हणून शिटीवर शिटी फुंकत…अंधारातल्या आकाशात ताटातुटीचे उमाळाचे काळे सावळे धुराचे सर रेंगाळत सोडशील…अन फलाट सोडून निघशील तेव्हा जड अंतकरणानं पाय टाकत पुढे पुढे जाताना… क्षणभरासाठी का होईना लालबावट्याला बघून थांबशील… वेड्या आईकडं  पोरीनं  पुन्हा एकदा मान वेळावून खिडकीतून बघितलं का याचा अंदाज घेशील… दोन निरोपाचे आसू गालावर टपकलेले निपटलेले  दिसल्यावर तू तिथून हलशील… इतकचं इतकचं माझ्यासाठी करशील… करशील नव्हं… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ स्मृतिशेष जयप्रकाश पाण्डेय विशेष – अविस्मरणीय संस्मरण ☆ साभार – स्मृतिशेष जयप्रकाश जी के स्वजन-मित्रगण ☆

☆ स्मृतिशेष जयप्रकाश पाण्डेय विशेष – अविस्मरणीय संस्मरण ☆ साभार – स्मृतिशेष जयप्रकाश जी के स्वजन-मित्रगण ☆

♥♥♥♥♥

☆  एक अच्छे व्यंग्यकार ही नहीं थे वरन बेहतर मनुष्य  भी थे ☆ श्री गिरीश पंकज ☆

जयप्रकाश पांडेय जी के रूप में एक बेहतर मनुष्य हमारे बीच से चले गए. ये सिर्फ एक एक अच्छे व्यंग्यकार ही नहीं थे वरन बेहतर मनुष्य  भी थे.  पिछले साल जब मैं  पाँच हजार रुपये राशि वाले एक सम्मान के लिए जबलपुर गया था, तो कार्यक्रम के समय से लगातार मेरे साथ रहे. रात को एक जगह ले जाकर मुझे डिनर भी कराया.  एक घटना बताने में  मुझे कोई संकोच नहीं कि जिस सम्मान के लिए मैं गया, उसके पहले एक  ने मुझसे दो-तीन पुस्तकें बुलवाई कि पढ़ना चाहता हूँ. मैंने भेज दी. फिर किसी का फोन आया कि आपको हम एक सम्मान देंगे. लेकिन आपको ₹200 शुल्क देना होगा. मैंने साफ -साफ इनकार कर दिया कि मैं कोई शुल्क नहीं दूंगा. तो पांडेय जी का फोन आया. उन्होंने कहा कि आपको कोई शुल्क नहीं देना है. आयोजकों ने ऐसा नियम ही बना रखा है कि क्या करें. लेकिन आपको आना है. आपका शुल्क मैंने पटा दिया है. आप आ जाएं  इसी बहाने आपके साथ कुछ घंटे बिताने का अवसर मिलेगा. उनके स्नेहभरे आग्रह के कारण मैं जबलपुर गया और लंबे समय तक पांडेय जी के साथ समय बिताया.  जब वे अट्टहास पत्रिका का  अतिथि संपादन कर रहे थे, तब भी उनसे दो बार बात हुई. और उनके सम्पादन में अट्टहास का सबसे खूबसूरत विशेषांक निकला.  उसका कलेवर अभूतपूर्व था. उनका जाना व्यंग्य साहित्य की बड़ी क्षति है. उनको शत-शत नमन!

श्री गिरीश पंकज

♥♥♥♥♥

☆  जयप्रकाश पांडेय जी हमेशा जेहन में बने रहेंगे ☆ श्री सुदर्शन कुमार सोनी 

जयप्रकाश जी का अचानक चले जाना अंत्यंद दुखद है। उनके साथ का एक प्रसंग याद आ रहा है। वो व मैं मध्यप्रदेश के उमरिया जिले में पदस्थ थे। बात होगी 2011-12 की मुझे तब पता नही था कि वो व्यंग्य भी लिखते हैं। मैं वहां मुख्य कार्यपालन अधिकारी, जिला पंचायत के तौर पर पदस्थ था और वे बैंक में। सेन्टल बैंक आफ इंडिया उमरिया का लीड बैंक था अतः वे आरसेटी रूरल सेल्फ एम्पलायमेंट टेनिंग इस्टटीटयूट का भी कुछ कार्य देखा करते थे। जंहा मैंने कई बैचेस में युवक युवतियों की रोजगारमूलक प्रशिक्षण कार्यक्रम करवाए थे। वहां पर मेरे बंगले में एक नाई गंगू मालिश के लिए आया करता था। वह बहुत बातूनी था लेकिन बडी़ अच्छी अच्छी बातें किया करता था। मैंने उस पर गंगू के नाम से एक कहानी भी लिखी थी। उसका किरदार मुझे बडा़ रोचक लगा तो मैंने अपने व्यंग्य का उसे किरदार बना लिया पुराने कई दर्जन व्यंग्यों में उसका नाम आता है। गंगू जयप्रकाश जी के भी सम्पर्क में था यह मुझे ज्ञात नही था। वहां से आने के बाद संभवतया मुझे पता चला कि उन्होने भी गंगू को अपनी रचनाओं में एक किरदार के रूप में प्रयोग करना शुरू कर दिया है। मैं यह जान बडे़ पशोपेश में पड़ गया। मैं उनसे कैसे कह सकता था कि आप यह प्रयोग करना बंद कर दो या वो मुझसे कहते कि आप यह प्रयोग बंद कर दो। काफी बाद में मेरे एक मित्र ने मेरे कुछ व्यंग्य पढ़ते हुए कहा कि आप यह किरदार बदल कर अच्छा सा नाम रखों। मुझे उसकी बात जांच गई और अब गंगू मेरी रचनाओं में गंगाधर है। एक बार मैं उनकी वैगन आर में जबलपुर से उमरिया व्हाया सड़क मार्ग आया भी था। जयप्रकाश जी को बहुत बहुत श्रद्वासुमन वे हमेशा जेहन में बने रहेंगे। जंहा तक मुझे याद है वे हमारी संस्था भोजपाल साहित्य संस्थान के आजीवन सदस्य भी हैं।

श्री सुदर्शन कुमार सोनी

♥♥♥♥♥

☆  मन बहुत व्यथित हुआ ☆ श्री सुनील जैन राही

यात्रा के 

अधबीच में जब यह समाचार मिला कि आज जय प्रकाश जी का देवलोक गमन हो गया, मैं मौन रह गया। आत्मीयता से सराबोर व्यक्ति/घनघनाती आवाज/फोन उठाते ही ऐसा प्रतीत होता दिन सफल हो गया। कई बार उनकी रचनाओं पर अपनी प्रतिकृया देने हेतु मैंने कई बार उन्हें फोन किया। कभी निराशा मुझे हाथ नहीं लगी। जब उनकी रचना “अस्थि विसर्जन का लफड़ा” पढ़ी तो मुझे याद है लगभग सवा घंटे बात हुई। ठहाकों से शुरू और ठाकों पर समाप्त ऐसी बातचीत किसी साहित्यिक मित्र से शायद ही कभी किसी से हुई हो। आलोचना और प्रशंसा के मामले में कबीर थे। 40, 000/- का चेक/डांस इंडिया डांस ने आँखें सजल की थीं और अस्थि विसर्जन पर खाकी पर परिश्रमिक शब्द गूंज उठे।

मन बहुत व्यथित हुआ।

व्यंग्य का उद्दंड विद्यार्थी

श्री सुनील जैन राही

नई दिल्ली / 28/12/2024

♥♥♥♥♥

☆  व्यंग्य लेखन में परसाई की परंपरा को आगे बढ़ाया  ☆ श्री राजशेखर चौबे ☆

पूरे देश में शायद एक भी ऐसा व्यंग्यकार नहीं होगा जिससे जयप्रकाश पांडे जी की बात नहीं हुई हो। वे लगभग सभी से बात करते थे। आपके अच्छे व्यंग्य पर वे जरूर दाद देते थे, मैसेज करते थे जब उन्हें लगता तो फोन भी जरूर करते थे। मुझे भी उनका सानिध्य मिला। मेरी उनसे पहली मुलाकात 2016 में जबलपुर में अट्टहास के कार्यक्रम में हुई थी। इसके बाद उनसे तीन-चार बार मुलाकात हुई और सभी मुलाकातें यादगार बन गई। व्यंग्य के एक कार्यक्रम में वे रायपुर भी आए थे। जून 2024 में जबलपुर जाना हुआ पर उनसे मुलाकात नहीं हो सकी थी। फोन पर जरूर बात हुई थी। तभी उन्होंने अपनी तबियत के बारे में बताया था। उस समय भी वे काफी पॉजिटिव थे और ऐसा नहीं लग रहा था कि वे इतनी जल्दी हम सब को छोड़कर चले जाएंगे। वे जबलइपुर के थे और उनकी आवाज में जबलपुरिया टोन था। उनकी आवाज में एक अलग तरह की मिठास थी। लगभग डेढ़ महीने पहले फोन आया कि उनके मित्र मेरे छत्तीसगढ़ी व्यंग्य को अपनी पुस्तक में लेना चाह रहे हैं। उस समय भी लंबी बात हुई थी। उन्होंने व्यंग्य लेखन में परसाई की परंपरा को आगे बढ़ाया। उनके कई व्यंग्य और व्यंग्य संग्रह डांस इंडिया डांस को हमेशा याद किया जाएगा। उनके व्यंग्य “अस्थि विसर्जन का लफड़ा ” काफी चर्चित हुआ था जिसे व्यंग्य यात्रा पत्रिका ने पुरस्कृत किया था। जयप्रकाश जी हम सब को छोड़कर चले गए हैं परंतु वे हमेशा याद किए जाएंगे। उन्हें विनम्र श्रद्धांजलि। भगवान उनकी आत्मा को शांति प्रदान करे और परिवार वालों, मित्रों व शुभचिंतकों को यह दुख सहन करने की शक्ति प्रदान करे।

राजशेखर चौबे

रायपुर

♥♥♥♥♥

☆  प्रिय जय प्रकाश तुम बहुत याद आओगे ☆ श्री जयंत भारद्वाज ☆

साहित्य जगत की अपूरणीय क्षति तो है ही साथ ही हमारा एक जिंदादिल,हंसमुख,मिलनसार दोस्त चिरनिंद्रा में चला गया।

भाई जयप्रकाश के साथ जबलपुर में तुलाराम चौक शाखा में पदस्थी के दौरान अविस्मरणीय यादें हैं।

प्रसिद्ध व्यंग्यकार स्वर्गीय हरिशंकर परसाई जी के व्यंग्य साहित्य पर आधारित  मेरे द्वारा बनाए गए व्यंग्य चित्रों की  तीन दिवसीय प्रथम प्रदर्शनी दुर्गावती संग्रहालय  में उनके ही संयोजन में  लगाई गई ।

प्रिय जय प्रकाश तुम बहुत याद आओगे हम तुम्हे कभी भूल नहीं पाएंगे।

विनम्र श्रद्धांजलि 🙏🏽

श्री जयंत भारद्वाज

♥♥♥♥♥

☆  व्यंग्य लेखन में परसाई की परंपरा को आगे बढ़ाया  ☆ डॉ ए के तिवारी ☆

चाहे  कहीं रहे जय प्रकाश पांडे मगर मुझसे फोन /मोबाइल  पर बात कर लेते थे. अब कौन मुझे मोबाइल फ़ोन पर कॉल करेगा–?? व्यक्तिगत विषय हों या पारिवारिक साहित्य हों या बैंक का, श्री सुरेश तिवारी जी हों या डॉ अशोक कुमार  शुक्ल सब पर खूब चर्चा करता था J P .अब याद कर रहे बस. मेरे से कई बार कहा कि अपना व्यंग्य संकलन प्रकाशित कराओ . लघुकथा संग्रह भी कब छपेगा.अपनी स्वास्थ्य पर भी अनेक बार बताया तो मैंने कहा था पुणे और मुम्बई जाओ फॅमिली मेंबर्स के साथ. लेकिन विधाता क्या करेगा मालूम ना था l ओम शान्ति शान्ति I 🙏

डॉ ए के तिवारी

पोद्दार कॉलोनी सागर

♥♥♥♥♥

☆ जयप्रकाश जो कभी हारा ही नहीं ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

जिस व्यक्ति से कभी आमने सामने मिला नहीं,लेकिन मिलने की आस अंतिम समय तक कायम रही, आत्मीय इतने कि आज से सात वर्ष पूर्व, जब मैं उपचार हेतु अस्पताल में भर्ती था, तो फेसबुक के साधारण परिचय के बावजूद, इनके एकमात्र फोन ने मुझे चौंका दिया । बस तब से परिचय की यह कड़ी एक मजबूत गांठ बन चुकी थी, लेकिन किसे पता था, प्रदीप और जयप्रकाश के नसीब में एक होना लिखा ही नहीं था । जयप्रकाश जो कभी हारा ही नहीं, आज भी उसकी याद का दीपक हमारे दिलों में प्रदीप्त है,और सदा रहेगा । सामाजिक और साहित्यिक गतिविधियों में सदा व्यस्त रहने के कारण कुछ समय से स्वास्थ्य के बारे में चिंतित थे, एक दो बार बात हुई, लेकिन हंसकर टाल गए और फिर हंसते हंसते ही अचानक हम सबको छोड़कर चले भी गए । जबलपुर से मेरा परिचय अब सिर्फ परसाई और जयप्रकाश तक का ही रह गया है, अफ़सोस दोनों मुझसे दूर चले गए ।। ॐ शान्ति..!!

श्री प्रदीप शर्मा 

इंदौर 

♥♥♥♥♥

☆  अंत समय तक रचनाधर्मिता में लगे रहे ☆ श्री मुकेश गर्ग असीमित ☆

अत्यंत दुखद समाचार। भगवान उनकी आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें ।  🙏अंत समय तक रचनाधर्मिता में लगे रहे हैं ।अट्टहास पत्रिका के दिसंबर अंक के लिए उनके द्वारा आतिथ्य संपादन करना था। मुझ से भी एक रचना माँगी गई तो जो मैंने उन्हें सहर्ष आभार के साथ प्रदान की थी ,कभी मिला तो नहीं उनसे लेकिन चंद महीनों में ही एक मौन सा संवाद और उनके प्रति कृतज्ञता का भाव रहता था। 

श्री मुकेश गर्ग असीमित

♥♥♥♥♥

☆  समर्पित व्यंग्यकार पाण्डेय जी ☆ श्री  सुरेश मिश्रा “विचित्र” व्यंग्यकार 

जयप्रकाश पांडे जी भले ही हमारे बीच में नहीं है, लेकिन उन्होंने शहर के व्यंग्यकारो को एकत्र करते हुए व्यंगम संस्था का अच्छा खासा संचालन किया। और प्रत्येक माह होने वाली व्यंग्य गोष्ठी को अपने ही निवास पर आयोजित करते रहे, यह एक बड़ी उपलब्धि रही है।जिसने व्यंग्य लेखन में शहर को आगे रखा है। आपका व्यंग्य लेखन और व्यंग्य की बारीकियों को, विसंगतियों को,उजागर कर अपने लेखन मे पैनापन बनायें रखा। व्यंग्य लेखन के लिए उनके द्वारा किया गया यह समर्पित भाव एवं कार्य हमेशा याद रखा जाएगा।

सादर श्रृद्धासुमन अर्पित है 🙏🌹🙏

श्री  सुरेश मिश्रा “विचित्र” व्यंग्यकार

जबलपुर ( मध्य प्रदेश)

♥♥♥♥♥

☆  विनम्र श्रद्धांजलि ☆ श्री ओ.पी.सैनी ☆

मेरी पहली मुलाकात श्री पांडेय जी से 6 वर्ष पूर्व व्यंगम की गोष्ठी के अवसर पर हुई थी । पहली ही मुलाकात मैं वे सबसे अलग अनुभूत हुए । नया सदस्य होने के बाद भी उन्होंने मुझे  आत्मीय सम्मान दिया । जब-तक उनसे मुलाकात होती रही वे बहुत ही मिलनसार और सहयोग देने मैं तद्पर रहे । किसी कारण वश 2 माह से मेरी पेंशन रुकी हुई थी जब उनको इस बारे मैं पता चला तो उन्होंने भोपाल स्थित पेंशन विभाग मैं बात की जिससे 1-2 दिन मैं ही मेरी पेंशन मुझे मिल गयी । इतने सहयोगी थे पांडेय जी । उनकी आत्मा के श्री चरणों में मेरी विनम्र श्रद्धांजलि ।

श्री ओ.पी.सैनी

जबलपुर (म.प्र )

♥♥♥♥♥

☆ संस्मरण (35-40 वर्ष) पूर्व का…  ☆ श्री के. पी. पाण्डेय ‘वृहद‘ ☆

श्री जय प्रकाश पाण्डेय जी से मेरी पहली मुलाक़ात मेरे निवास  एम -193 शिव नगर के सामने हाउसिंग बोर्ड का एम आई जी 20 ख़रीदा ओर उसे किराए  से देना चाहा था दो किरायेदार रखने थे पाण्डेयजी ने किसी बैंक कर्मचारी को बेच दिया था।  उन दिनों में लिखता तो था किन्तु अधिकतर कविताएं लिखता था पर मुझे तब नहीं मालूम था कि  ये व्यंग विधा के अच्छे लेखक है। व्यक्तिगत मुलाक़ात के अतिरिक्त मैं पाण्डेयजी को इस से पूर्व इसलिए भी जानता था कि  मेरे मित्र प्रकाश चंद दुबे जो मेरे सहकर्मी ओर परसाई जी के भांजे है और अक्सर उनके निवास पर मेरा व जय प्रकाशजी का आना होता था। 

कालांतर में पाण्डेयजी बैंक की नौकरी में इधर उधर रहे वा मैं भी ट्रांसफर होता रहा। सेवा निवृत्ती के काफ़ी दिनों बाद जय प्रकाश जी से मुलाक़ात एक साहित्यिक  समारोह में हुई तब मैं उनके व्यंग्य विधा को गहराई से जान सका था इधर करीब 5-6 वर्षों  से व्यंग पढता तो उन्हें बधाई अवश्य देता। 

आत्मीयता का दायरा उस समय से ओर अधिक बढ़ा जब से मुझे उनके निवास पर व्यंगम की  मासिक गोष्ठी में शरीक होने का मौका मिला श्री पाण्डेयजी के माध्यम से ई -अभिव्यक्ति पत्रिका एवम अट्टहास मे मेरी व्यंग रचना (यदि  परसाईजी ना होते तो क्या होता?) प्रकाशित हुई।  पाण्डेयजी के इस आत्मीय सहयोग एवम परमार्थ का में ऋणी हूँ उन्हें विनम्र श्रद्धांजलि साथ ही ईश्वर से प्रार्थना  है कि परिवारजनों को असमय आए इस असीम कष्ट को सहने की शक्ति प्रदान करें पुनः विनम्र श्रद्धांजलि

श्री के. पी. पाण्डेय ‘वृहद‘

मो. 9424746534

♥♥♥♥♥

 संपादक – श्री हेमन्त बावनकर / सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’   ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आकाशातला ‘नीत’ळ स्वर…” ☆ सुश्री वैशाली पंडित ☆

☆ “आकाशातला ‘नीत’ळ स्वर…” ☆ सुश्री वैशाली पंडित ☆

कधीकधी आपल्याला लाभलेलं मैत्र फारच अकल्पित असतं. माझ्या मैत्रीच्या वर्तुळात अशीच एक सहेली माझ्या हातात हात गुंफून गेली चाळीस वर्षे उभी आहे.

तिची माझी ओळख रत्नागिरी आकाशवाणीच्या केंद्रात झाली. तेव्हा मी खारेपाटणला वास्तव्याला होते. माझे पती श्रीनिवास तिथल्या शेठ म. ग. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक होते. त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद काळे हे सत्यकथा या गाजलेल्या मासिकाचे लेखक होते. त्यांचे अनेक कार्यक्रम रत्नागिरी आकाशवाणीवर होते. त्यांनी माझ्यातला होतकरू लेखक ओळखला होता. अशाच एका आकाशवाणी फेरीत त्यांनी माझं नाव तिथे सुचवलं.

“पंडितबाई, तुम्हाला आकाशवाणीवरून कार्यक्रमासाठी आमंत्रण येईल हं. कवितेचे विषय तेच देतील. “असा निरोप त्यांनी आणला आणि मी उत्कंठतेने त्या निमंत्रणाची वाट पाहू लागले.

खरंच एक दिवस तो लिफाफा आला. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. कवितेचा विषय होता, ‘कुटुंबनियोजन’. तेव्हा तर मी नवखीच होते. दे दणादण सुचवल्या घरी सुखी राहण्यासाठी कविता ‘बनवल्या’. काव्यवाचनाची जोरदार प्रॕक्टीस वगैरे करत नवऱ्याला जेरीस आणलं. आणि अखेर तो दिवस आला.

रत्नागिरी आकाशवाणीच्या त्या इमारतीत पाऊल टाकलं. पहिल्यांदाच आकाशवाणीची इमारत बघत होते. गेटवर व्हिजिटर्स रजिस्टर भरणं वगेरे नवीनच होतं. आत गेले. कार्यक्रम विभागात माझं पत्र दाखवलं.

“वैशाली पंडित ना ? ये ये. मीच रेकाॕर्डिंग करणार आहे. घरकुल कार्यक्रम मीच घेते. “असं म्हणत एक प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या स्त्रीने माझं स्वागत केलं.

‘…याच त्या ‘नीता गद्रे. ‘

प्रथमदर्शनीच मला त्या खूप आवडल्या. त्यांचा आवाज किंचित बसका तरीही आत्मविश्वास दाखवणारा होता. व्यक्तिमत्वात ठामपणा आणि आपलेपणा यांचं मजेदार रसायन होतं. कुरळ्या केसांची महिरप गोऱ्यापान चेह-यावर खुलत होती. वेषभूषेतली रंगसंगती त्यांची अभिरूची दाखवत होती.

माझ्या हातातलं स्क्रीप्ट घेऊन त्यांनी वाचलं.

“छान समजून घेतलायस विषय. मस्त झाल्यात कविता. सरकारी विषय तू सोपेपणाने कवितेत मांडलायस. “अशी दाद त्यांनी दिल्यावर मला जो काय आनंद झालाय तो झालाय.

त्या सफाईनं रेकाॕर्डींग रूमकडे निघाल्या. त्या चालण्यात डौल होता. त्यांच्या हालचाली फार सहज पण पाॕलिश्ड होत्या. मला रेकाॕर्डींग रूम, तिथलं टेबल, तिथला माईक सगळं नवीन होतं. आधी स्वतः त्या माझ्याबरोबर आत आल्या. कागद कसे धरायचे, कागदांचा उलटताना आवाज कसा होऊ द्यायचा नाही याचं मला ट्रेनिंग दिलं.

“आता वाचायचं बरं का बिनधास्त. काळजी करू नकोस. छानच होईल रेकाॕर्डींग. “असा धीर त्यांनी दिला.

जाड काचेच्या पलिकडून उभ्या राहून नीता गद्रेंनी मला सुरू कर अशी खूण केली.

एक दोन रिटेक झाले तरी न चिडता मला प्रोत्साहन देत त्यांनी रेकाॕर्डींग संपवलं.

… ती नीता गद्रेंशी माझी पहिली भेट.

नंतर मी आकाशवाणीच्या निमंत्रणाची वाट बघायला लागले ती फक्त नीता गद्रेंशी भेट व्हावी म्हणून.

नंतरच्या सगळ्या भेटीत नीताताईंमधलं साहित्यरसिकत्व मला खूप समजत गेलं. या बाई केवळ आकाशवाणीच्या औपचारिक अधिकारी नाहीत. स्वतःला साहित्याची उत्तम जाण आहे. श्रोत्यांना सकस कार्यक्रम ऐकवण्याचं भान आहे. ती आपली जबाबदारी आहे, तीही सरकारी चौकटीत राहून पूर्ण करायचं आव्हान आहे हे त्या जाणून होत्या. करियरवर मनापासून प्रेम करणा-या नीताताईंनी माझ्या मनात खास जागा निर्माण केली.

त्यांचा ‘तांनापिहि’ हा कथासंग्रह माझ्या वाचनात आला आणि मी त्यांची फॕनच झाले. विशेषतः त्यातली ‘ओझं’ही कथा तर मला बेहद्द आवडली होती. गृहिणीला मध्यवर्ती व्यक्तिरेखा करून लिहिलेली ही कथा मला स्पर्श करून गेली. मी लगेचच त्या पुस्तकावर अभिप्राय लिहिणारं पत्र त्यांना पाठवलं.

लगोलग त्याचं उत्तरही नीताताईंकडून आलं. त्यात त्यांनी, ‘तुला मी माझ्या आणखीही काही पुस्तकांची नावं देते तीही वाच. (भोग आपल्या कर्माची फळं )’ असं मिश्किलपणे लिहिलं होतं. ते मला जामच आवडलं होतं. नंतर खरोखरच ती फळं मी चाखली.

त्यांचं ‘एका श्वासाचं अंतर’ हे पुस्तक तर एका जीवघेण्या आजारावर मात केलेल्या जिद्दीची कहाणी आहे. ते पुस्तक मी माझ्या परिचयातील काही डाॕक्टर्सनाही वाचायला दिलं होतं. एका प्रसिद्ध रूग्णालयात पेशंटला किती हिडीसफिडीस केलं जातं, अक्षम्य अशी बेफिकीरी दाखवली जाते याचा पर्दाफाश त्यांनी निर्भीडपणे केला होता. नंतर त्या रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली होती, आणि यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची जाहीर हमी दिली होती असं ही समजलं.

नीताताई रत्नागिरी केंद्रावर तेरा वर्षे होत्या. नंतर सांगली, कोल्हापूर आणि मुंबई अशा सेवा करत त्या निवृत्त झाल्या. मध्यंतरी आमची गाठभेट बरीच वर्ष नव्हती. पुन्हा एकदा मुंबई आकाशवाणीवर त्या असताना त्यांनी मला माझ्या एका कवितेसाठी खास संधी दिली. परत आम्ही जुन्या उमाळ्याने भेटलो.

आता त्या निवृत्त जीवनात स्वतःचे दिवस अनुभवत आहेत. नभोनाट्य, ब्लाॕग्ज, लेखन, वाचन, प्रवास यांत सुरूवातीची वर्षे आनंदात गेली. आता शारीरिक थकव्याने मर्यादा आल्यात. आमचा फोनसंपर्क वाढला आहे. निवृत्तपणाच्या इयत्तेत मी त्यांच्याहून आठदहा वर्ष मागेच असले तरी आम्ही अगं तुगं करू लागलो आहोत. एकमेकींची हालहवाल जाणून घेत आहोत. चॕनेलवरच्या मालिकांवर यथेच्छ टीका टीप्पणी करून खिदळतो आहोत, राजकारणातल्या सद्य स्थितीवर फुकटच्या चिंता वहातो आहोत, जीव कासावीस करून घेत आहोत. मतदान केल्याच्या काळ्या शाईच्या मोबदल्यात इतकं तरी करतोच आहोत.

… एक मैत्रकमळ असं पाकळी पाकळीने फुलत गेल्याचा आनंद दोघीही अनुभवतो आहोत ! 

© सुश्री वैशाली पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – सलीब ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – सलीब ? ?

तुम्हारी कोख में

अब शायद कीलें

ठोंकी जाएँगी,

ख़त्म हो चुकी हैं

सलीबें उनकी

नए ईसाओं को

लटकाने के लिए!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥  मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना आपको शीघ्र दी जावेगी। 💥 🕉️ 

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्थाएं ☆ “लिटरेरी वॉरियर्स: साहित्य का वैश्विक मंच”/”सृजन का कारवां: लिटरेरी वॉरियर्स” ☆ साभार – सुश्री नीलम सक्सेना ☆

☆ संस्थाएं ☆ “लिटरेरी वॉरियर्स: साहित्य का वैश्विक मंच”/”सृजन का कारवां: लिटरेरी वॉरियर्स” ☆ साभार – सुश्री नीलम सक्सेना ☆

विश्व विख्यात लेखिका कवियित्री और लिम्का बुक्स ऑफ़ वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर नीलम सक्सेना जी द्वारा नवंबर, 2011 में POETS AND WRITERS DEN नामक समूह की स्थापना की गई। उस समय फेसबुक भी धीरे-धीरे प्रचलित हो रहा था इस समूह को स्थापित करने का उस समय एकमात्र उद्देश्य था साहित्य में रुचि लेने वाले उनके सहपाठी और मित्रों को एक मंच प्रदान करना। प्रारंभिक दिनों में इस समूह में केवल उनके महाविद्यालय के सहपाठी ही थे । समूह को प्रारंभ करते हुए कविता लेखन और कुछ साहित्यिक प्रतियोगिताएं और गतिविधियां आयोजित की गई। धीरे-धीरे यह कारवां बढ़ता गया ……जैसा कि मजरूह सुल्तानपुरी साहब ने कहा है कि

मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर,

लोग साथ आते गए कारवां बढ़ता गया

इसी तरह यह कारवां बढ़ते बढ़ते हजारों तक पहुंच गया समूह के ईमानदार प्रयासों से इसकी लोकप्रियता भी बढ़ती गई और समान रुचि वाले साहित्य प्रेमी जुड़ते चले गए।

फिर आया 2020 जब संपूर्ण विश्व को आपदा का सामना करना पड़ा। कोरोनाकाल में जब सभी इस महामारी से जूझ रहे थे, तब जन्म हुआ साहित्यिक सिपाहियों की ऑनलाइन गतिविधियों का। इस तरह POETS AND WRTERS DEN तब्दील हो गया लिटरेरी वॉरियर्स ग्रुप में। उस समय जब सभी लोग महामारी से जूझ रहे थे तो कठिन मानसिक दौर से जूझने के लिए रचनात्मकता सबसे बेहतरीन माध्यम थी। यह आवश्यक था कि जीवन को सकारात्मक बनाए रखने के लिए रचनात्मकता से जुड़ा जाए। इसी उद्देश्य के साथ फेसबुक पेज पर ऑनलाइन कार्यक्रमों की शुरुआत हुई। आज जब पीछे मुड़कर देखते हैं तब लगता है कि कुछ सहपाठियों द्वारा शुरू किया गया यह छोटा सा समूह आज विश्व विख्यात है। इसमें लगभग 300000 फॉलोअर्स है और पेज की व्यूअरशिप भी लगभग लाखों तक पहुंच गई है। इस समूह से न केवल भारत के साहित्य प्रेमी बल्कि विदेश में बसे भारतीय साहित्य प्रेमी भी जुड़ते जा रहे हैं।

आज तक लिटरेरी वॉरियर्स ग्रुप के तहत बहुत सारे कार्यक्रम साहित्यिक समारोह आयोजित किए हैं जिसमें प्रमुख हैं साहित्य अकादमी दिल्ली में आयोजित लिटरेचर फेस्टिवल जो कि नवंबर 2023 में आयोजित किया गया था। इसी प्रकार प्रतिष्ठित NCPA सभागृह में लिटरेरी वॉरियर्स ग्रुप के सफल कार्यक्रम आयोजित किया जा चुके हैं। इसके अलावा विश्व पुस्तक मेला लखनऊ में 11 पुस्तकों का विमोचन भी हमारे समूह द्वारा किया गया जो अपने आप में एक रिकॉर्ड है। हाल ही में पुणे के प्रतिष्ठित CME सभागार, पुणे में लिटरेरी वॉरियर्स ग्रुप के दूसरे लिटरेचर फेस्टिवल का आयोजन किया गया। दो दिन के इस समारोह में संपूर्ण भारत से आए साहित्य प्रेमियों ने उत्साह पूर्वक हिस्सा लिया और इस कार्यक्रम को सफल बनाया। कार्यक्रम के दौरान पुस्तक विमोचन, चित्रकला प्रदर्शनी, कविता पाठ और विभिन्न प्रतियोगिताओं के साथ-साथ सांस्कृतिक गतिविधियों का भी आयोजन किया गया।

हम सब ने मिलकर अपने आप को साहित्य के योद्धा घोषित कर दिया है। देखा जाए तो हम सब सिपाही ही थे जो कोरोनाकाल के उस गंभीर दौर में नकारात्मकता से लड़ रहे थे। कलम और भावनाओं का सुहाना सफर यूं ही जारी रहे यही उम्मीद है।

और अंत में…

Here is the story of LWG from our very own Anup Jalan Ji who made this video despite his ill health.

Literary Warriors Group or LWG is a brainchild of well-known author and poetess, Neelam Saxena Chandra, who wanted to bring Indian authors together under the same roof and create a platform for budding writers and poets to express themselves, learn and grow.
Author and translator Anup Jalan Ji was one of the first six members of the group and has seen it grow from six to an amazing 1,300 members.

LITERARY WARRIORS GROUP की कहानी श्री अनूप जालान जी की जुबानी

Instagram Link 👉 https://www.instagram.com/reel/DC_BflhtMqY/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

साभार – सुश्री नीलम सक्सेना 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भातुकलीचा खेळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ भातुकलीचा खेळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

दिवाळी झाली, आता गावातली गर्दी थोडी कमी झाली असेल म्हणून दिवाळीनंतर तुळशी बागेची फेरी मारायचे ठरवले. निमित्त होते नातीला भातुकलीचा खेळ आणून द्यायचे! तुळशीबागेसारखी पितळेची छोटी छोटी खेळण्यातली भांडी जगात कुठेच मिळत नसतील बहुतेक!

अगदी घंगाळ, हंडा, ताटाळे, कळशी, साधा कुकर आणि काय काय! तो खेळ बघितला की आपल्याला सुद्धा मनाने मोहरून जायला होते. मन आपल्या बालपणात शिरते!

तीस-पस्तीस वर्षांपूर्वी असा पितळेचा खेळ तुळशी बागेत पाहिला, तेव्हा आवडला.. पण तो महाग होता. तेवढे पैसे नव्हते खिशात! त्यापेक्षा घरासाठी खरी खरी भांडी खरेदी करण्यात इंटरेस्ट होता. त्यामुळे माझ्या मुलीला तो खेळ मी घेऊ शकले नाही हे खंत होतीच मनात! पुढे सावंतवाडीची लाकडी रंगीत खेळणी तिला खेळायला आणली आणि त्यात ती खुश होऊन गेली. अधून मधून प्लास्टिकचा खेळही आणला जात असे, पण त्यात काही फारशी मजा नव्हती. फक्त लाल, हिरवे, पिवळे रंग बघायला मिळत! आधुनिक जगाची सुरुवात जेव्हा प्लास्टिकने झाली, तेव्हा खरंतर संसाराचा सगळा घरंदाज पणा जायला लागला होता! काळाचा महिमा म्हणून आपण काळाबरोबर तडजोड करत गेलो!

मुलगी म्हटली की लहानपणापासूनच बाहुली आणि चुलबोळक्याची संगत असतेच तिला! आई जे काही आपल्याबरोबर वागते, करते, ते ते सगळं त्या खेळातल्या भावली बरोबर ती करत असते, नव्हे, अनुभवत असते आणि तो भातुकलीचा संसार सांभाळत असते.

तिच्या मैत्रिणी या तिच्या आईच्या मैत्रिणींसारख्या असत. त्यावरून आठवले, माझी मुलगी आणि तिच्या दोन मैत्रिणी त्यांची नावे आपापल्या आईची घेत असत आणि भातुकलीच्या खेळात त्याप्रमाणेच त्या बोलत, वागत!तो चूल बोळक्याचा संसार त्या आनंदाने सांभाळत. त्यात चुरमुऱ्याचा भात, शेंगदाणे आणि गुळाचे लाडू असतच! असा हा संसार मांडता मांडता मुलगी मोठी होते आणि खरंच संसारात पडते!

जीवनाच्या चक्राप्रमाणेच आधी मुलगी, मग गृहिणी, आई, आजी अशा भूमिका निभावत स्त्रीचे जीवन चक्र चालू असते!

तरी स्त्रीतील बदल जसे होतात तसेच निसर्गाचे बदल ही आपण समजून घेतले पाहिजेत. धरित्री किंवा सृष्टी ही आपली सृजनशील माता आहे. तिच्या पोटी येणारे जीवनाचे अंकुरांचे, हवा आणि पाणी यांनी पोषण केले जाते. रोप वाढते, झाड बनते आणि पुन्हा त्याला फुले, फळे येऊन त्यांच्या बिजातून नवीन रोप जन्माला येते. निसर्गाचे हे चक्र अव्याहत चालू असते.

‘आधी बीज एकले, एका बिजा पोटी, फळे कोटी कोटी, पोटी जन्म घेती, सुमने, फळे!’ या गीताप्रमाणे निसर्ग वाढ करीत असतो!

सृष्टीने मांडलेल्या या जीवन संसारात पंचमहाभूतांची गरज ही अगदी नि:संशय आहे. माणसाने निसर्गाचे खच्चीकरण करायला सुरुवात केली, त्यामुळे त्याचे परिणाम आता दृष्टीस दिसू लागले!

परमेश्वराने मांडलेला हा सृष्टीचा खेळ एखाद्या सुंदर, नेटक्या भातुकली सारखाच आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्यासह निसर्ग, प्राणी त्याची लेकरे आहेत. माणसाने निसर्गापेक्षा वरचढपणा दाखवायचा प्रयत्न केला की निसर्ग आपली वडीलकीची अस्त्रे हातात घेतो हे आपल्याला कोरोनामुळे बघायला मिळाले..

अशावेळी निसर्ग दाखवून देतो की माणसाचा हा भौतिक हव्यास सुखदायी वाटत असला तरी तो अंतिमतः दुःखाकडे नेणारा आहे, ही जाणीव मनुष्य विसरला आहे. ती करून देण्याकरता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात निसर्ग प्रकट होत असतो… जसे मोठी वादळे, भूकंप, किंवा कोरोना…

कोरोनाच्या काळात काही गोष्टी मात्र चांगल्या घडल्या. त्या म्हणजे माणसाच्या खऱ्या गरजा खूप कमी असतात याची जाणीव झाली. दुसरे म्हणजे नातेसंबंध, परिचित आणि सभोवतालचे लोक या सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती वाढली. कुटुंबामध्ये एकत्र राहिल्यामुळे प्रेमाचा जबाबदारीचा बाॅंड अधिकच वाढला. सामाजिक जाणीव झाल्यामुळे वेगवेगळ्या संस्थांद्वारे सर्वांना मदत पोहोचवण्याकडे माणसाचा कल वाढला. स्वार्थीपणाने फक्त स्वतःचा संसार करण्यापेक्षा या भातुकलीचा विस्तार अधिक वाढला. माणसाला या गोष्टीची जाणीव आपोआपच झाली की सभोवतालचे जग हा आपलाच एक भाग आहे. कधीतरी हे नश्वर जग सोडून आपल्यालाही जायचे आहे. अचानकपणे संसारातून काहींची ‘एक्झिट’ होऊ शकते. भातुकली सारखा हा संसार करता करता तो कधी बोलावेल याची शाश्वती नाही, तेव्हा मात्र हा खेळ तसाच टाकून पटकन जाता आले पाहिजे, अशी मनाची तयारी करायची. मग मागे राहिलेली ही चूल बोळकी कोण वापरेल की टाकेल याची चिंता नाही करायची!

घरी येऊन नातीला भातुकलीचा खेळ मांडून देताना माझे मन पूर्णपणे संसाराची भातुकली फिरून आले. आणि सगळ्या जाणिवांसह मी पुन्हा उत्साहाने तिची भातुकली मांडून दिली…!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares