मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ द्रौपदी मुर्मू ☆ प्रस्तुती – प्रा. मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ द्रौपदी मुर्मू ☆ प्रस्तुती – प्रा. मीनल केळकर ☆ 

ही कहाणी आहे एका शिक्षिकेची. ही कहाणी आहे एका झुंजार आदिवासी महिलेची. ही कहाणी आहे एका निस्वार्थी समाजसेविकेची . ही कहाणी आहे एका अध्यात्मिक प्रवासाची, ही कहाणी आहे एका जिद्दी समर्पित जीवनाची –ही कहाणी आहे द्रौपदी मुर्मू यांची . 

कालपर्यंत फारसे कोणाला माहीत नसलेले द्रौपदी मुर्मू यांचे नाव आज खूपच चर्चेत आहे.राष्ट्रपतीपदाची त्यांची उमेदवारी घोषित होईपर्यंत तसे त्यांचे नाव अज्ञात होते. एका आदिवासी,गरीब,सामान्य कुटुंबातील महिलेला राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च पदाची उमेदवारी मिळते, हीच मुळी आपल्या शक्तीशाली लोकशाहीची थक्क करणारी सुंदर साक्ष आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क  करणारा आहे. विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रेरणादायीही आहे. घराणेशाही,अमर्याद संपत्ती आणि खानदानाचा दर्प नसलेल्या सामान्य माणसाला अभिमान वाटावा अशीच कहाणी आहे द्रौपदी मुर्मू यांची .

ओरिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला.१९७९ साली त्या पदवीधर झाल्या.ओरिसा सरकारच्या सिंचन खात्यात कारकून झाल्या. पुढे त्या शिक्षक झाल्या.नगरसेवक झाल्या.आमदार झाल्या. मंत्री झाल्या. राज्यपाल झाल्या.आणि आता आहेत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार. घराणेशाही नाही, संपत्ती नाही, वारसा नाही. सारेच कसे थक्क करणारे आहे. त्यांच्या पतीचे नाव शामचरण मुर्मू आहे. 

आजही त्या मयूरभंज येथे एका साध्या दुमजली घरात राहतात.६४ वर्षाच्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. दलित,आदिवासी, लहान मुले यांच्या उत्थापनासाठी झटणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची  वैयक्तिक जीवनात अनेक संकटामुळे अक्षरशः होरपळ झाली. कोणीही कोलमडले असते. त्याही कोलमडल्या, पण पुन्हा उभ्या राहिल्या. ताठ उभ्या राहिल्या.त्यांना दोन मुले व एक मुलगी. २००९ साली २५ वर्षाचा मुलगा मरण पावला. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्या डिप्रेशन मध्ये गेल्या.जीवनातील सारे स्वारस्य निघून गेले. खचून गेल्या. याचवेळी त्या प्रजापिता ब्रह्मकुमारी या अध्यात्मिक संस्थानात गेल्या.त्या अध्यात्माला शरण गेल्या.त्या पुन्हा उभ्या राहतात तोच दुसरा मुलगा २०१३ साली रस्ता अपघातात गेला.त्याच महिन्यात आई गेली, कर्तबगार भाऊही गेला. चार वर्षात जवळची सगळी माणसे हरवली.आणि २०१४ साली पती शामचरण मुर्मूही गेले.त्या एकाकी झाल्या. नियतीने त्यांच्यावर घोर अन्याय केला.

परंतू अध्यात्म त्यांच्या सोबत होते. त्यांनी दलित,आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. स्वतःचे दुःख जगाच्या दुःखात मिसळून टाकले. पुन्हा ताठपणे उभ्या राहिल्या. २०१५ साली झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम केले. लवकरच विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला. २०२१ पर्यंत त्या राज्यपाल होत्या.

२० जून रोजी त्यांचा वाढदिवस होता.आणि २१ जूनला भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांना हा आनंदाचा धक्का होता आणि देशालाही. त्या नेहमीप्रमाणे शिवमंदीरात गेल्या. स्वतः झाडू घेऊन मंदीर स्वच्छ केले. मंदीरातील कर्मचाऱ्याबरोबर सुखसंवाद केला. मयूरभंजमध्ये जल्लोष झाला. द्रौपदी मुर्मू या एका लहानशा घरातून ३५० एकर परिसर, १९० एकर बगीचा व ७५० कर्मचारी असलेल्या प्रशस्त राष्ट्रपतीभवनात लवकरच जातील. एक सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होईल. हे भारतीय लोकशाहीचे केवढे नितांत सुंदर व विलोभनीय रुप आहे बरे !

संग्राहिका : प्रा. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दत्त म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दत्त म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

🙏🏻 दत्त म्हणजे 

अद्वैत, अतर्क्य, अद्भूत, अनाकलनीय, अनादी, अथर्व, अनंत, अंतर्यामी, अवधूत, अर्चना आनंतयोगी

 

🙏🏻 दत्त म्हणजे

आई, आदर, आदेश, आशिर्वाद, आत्मा, आशा, आदित्य, आदिनाथ, आनंद, अल्लख

 

🙏🏻 दत्त म्हणजे

इशत्व, इप्सित, ऊर्जा, उपासना, उन्नती, उत्पत्ती, ऐश्वर्य, ऐक्य, एकाधिकार

 

🙏🏻 दत्त म्हणजे 

ओमकार, औदुंबर, औक्षण, अंतरात्मा, अंतर्मन, अंतरंग, अथर्ववेद,  आठरापुरण

 

🙏🏻 दत्त म्हणजे

ऋणमोचन, ऋगवेद, कर्म, कर्ता, किर्ती, करूणा, कृष्ण, खरेपणा

 

🙏🏻 दत्त म्हणजे

गणेश, गती, गर्भ, गायत्री, गार्गी, चमत्कार, चारित्र्य, चातुर्य, चित्त, जन्म, जरा, जप, तप

 

🙏🏻 दत्त म्हणजे

दया, दिशा, दिप, दान, दशा, दिगंबर, दास, धडाडी, धाडस, धर्म, नम्रता, निती, नाती, नियम

 

🙏🏻 दत्त म्हणजे

प्रेम, प्रीती, प्रचिती, पापक्षालन, प्रभा, प्रतिभा, फळ, बळ, भाव, नाव, माया, ममता, माता, मर्म

 

🙏🏻 दत्त म्हणजे

राम, रूप, रंग, लक्ष्य, लक्ष्मी, लाभ, वज्र, व्रत, वर्तन, वर्म, विष्णू, शरणागती, शंकर, शितल, शुभ, षडरस

 

🙏🏻 दत्त म्हणजे

समर्पण, समाधान, साधना, सेवा, सेवक, सर्वस्व, स्मर्तृगामी, सामर्थ्य, समर्थ, सुहास, सविता, स्वामी, संस्कार

 

🙏🏻 दत्त म्हणजे

क्षमा, क्षेम, क्षण, ज्ञान, ज्ञानेश्वर, त्राता, त्राण, प्राण

 

🙏🏻 दत्त म्हणजे

श्रम, श्रद्धा, कर्म आणि धर्म आहे.

 

संग्राहक : श्री अनंत केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पक्ष्यांच्या गाण्याची खरी गोष्ट… श्री शरद मगदुम ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पक्ष्यांच्या गाण्याची खरी गोष्ट… श्री शरद मगदुम ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

पक्ष्यांच्या गाण्याची खरी गोष्ट 

एका भारतीय संगीतकाराच्या, इतिहास घडवणाऱ्या या पक्षांच्या गाण्याची खरी गोष्ट नक्कीच वाचा – सोनेरी गाणं

ऋषीतुल्य ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित ‘ माचीवरला बुधा ‘ या चित्रपटाच्या वेळी ज्येष्ठ संगीतकार धनंजय धुमाळ यांना स्वतःलाही माहीत नव्हतं की या चित्रपटातलं एक संस्मरणीय, विश्वविक्रमी गीत संगीतबद्ध होण्यासाठी त्यांची वाट पहातयं. याचं कारण असं की तब्बल ४० संगीतकारांनी नाकारलेलं गाणं आता प्रत्यक्षात कधी येणारच नाही अशी हळहळ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना वाटायला लागलेली असतानाच हे गाणं धनंजयजींच्या वाट्याला आलं आणि गाण्याचं अक्षरशः सोनं झालं.

झालं असं की, या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय दत्त आणि पटकथा, संवाद लेखक प्रताप गंगावणे एकदा बोलत होते. आपल्या चित्रपटात वेगळं काय बरं करता येईल असा विचार सुरू असतानाच अचानक, या चित्रपटात केवळ पक्षांचेच आवाज वापरून एक गाणं करायचं ही कल्पना प्रतापजींना सुचली. * कोणतंही वाद्य नको, कोणताही आवाज नको, फक्त पक्षांचेच आवाज असतील * असं गाणं हवं असं ठरलं. पण हे गाणं करायला कुणीही पुढे येईना. सिनेइंडस्ट्रीतील लहानमोठे तब्बल चाळीस संगीतकार गाठले, पण कुणीही हे आव्हान पेलण्याची तयारी दाखवली नाही. कुणी म्हणे, आम्ही तोंडाने आवाज काढू. कोणी म्हणे वाद्यावर आवाज काढू. पण वाद्याशिवाय, आवाजाशिवाय, केवळ पक्षांच्याच आवाजात गाणं करायचं ही कल्पनाच पचणारी नव्हती. आणि दुसरीकडे, केवळ नैसर्गिक आवाजांनी बद्ध असलेलं गाणंच हवं असा जणू दिग्दर्शकांनी (विजयदत्तजींनी) हट्टच धरला होता. अशावेळी कसं कोण जाणे, प्रतापजींना एकदम धनंजयजींचच नाव सुचलं आणि लगोलग त्यांना निरोप धाडला गेला. मुंबईला दादरला शिवाजी पार्कजवळ भेट झाली.

पक्षी आणि निसर्गातले वेगवेगळे आवाज घेऊन गाणं बनवायचंय, तुम्ही बनवू शकाल का.. असा प्रश्न समोरून येताच, धनंजयजींनी क्षणार्धात हे आव्हान घेतलं.. धनंजयजींचा आत्मविश्वास बघून खूश होऊन तत्क्षणी दिग्दर्शकांनी आपल्या खिशातले पाच हजार रूपये काढून बक्षीस म्हणून धनंजयजींच्या हातावर ठेवले आणि कामाचा श्रीगणेशा झाला.

मग सुरू झाला धनंजयजींचा प्रवास, अगदी झपाटल्यागत.. आव्हान घ्यायचं आणि ते पेलूनच यशस्वी व्हायचं हा स्वभाव असलेल्या धनंजयजींनी दिग्दर्शक विजयदत्तजींना सोबत घेऊन दोन- तीनदा जंगलाची सैर केली. केवळ पक्षांचेच आवाज ऐकायचे, आणि निसर्गातल्या अन्य आवाजांचा सतत कानोसा घेत जायचं– पक्ष्यांच्या गुजगोष्टींना ताल लयीत मांडायचे कसे हाच विचार… त्यासाठी जंगलं जंगलं पायाखाली तुडवली. लोणावळा, अर्नाळा, त्र्यंबकेश्वर, सातारा, सगळीकडली जंगलं पालथी घालता घालताच तिथले जे जे आवाज ऐकू येतील, ते ते निसर्गातले पक्ष्यांचे आवाज ध्वनिमुद्रीत करावे अशी कल्पना सुचली, आणि आपले मोठे बंधू ध्वनीमुद्रक गोरखनाथ धुमाळ यांना घेऊन जंगलाजंगलात फिरून आवाजांचं ध्वनीमुद्रण केलं.

तब्बल १९००० कि.मी. चा प्रवास करत, सहा महिने, रात्री बेरात्री, उन्हा पावसाची पर्वा न करता, पक्ष्यांचे आवाज गोळा करता करता, सुमारे २० ते २५ जीबीचा डाटा गोळा झाला. एवढ्या प्रचंड माहितीतून नेमकी माहिती हेरायची, नेमके आवाज हेरायचे, त्यांचाच उपयोग करून गाणं बनवायचं… सोपी गोष्ट नव्हतीच मुळी, अजिबातच… पण ते हरले नाहीत.. पुढला आठवडाभर या आवाजांचाच ध्यास घेतल्यागत दिवसरात्र तेच ते आवाज ऐकत राहिले. पक्ष्यांच्या आवाजासह मनातलं संगीत शोधत राहिले.

दोन आठवडे लोटले…. 

अन् एका जादूई क्षणी बुलबुल, सुतार, खंड्या, कावळा, चिमणी, करकोचे, बदक, कोकीळ अशा तब्बल ७२ पक्षांच्या आवाजासह मनातलं गाणं प्रत्यक्षात आलं. जगाच्या पाठीवरलं पहिलं असं गाणं, ज्यात कोणतंही वाद्य नाही, कोणतेही मानवनिर्मित आवाज नाहीत, कोणाही व्यक्तीचा आवाज नाही … आहेत ते केवळ नैसर्गिक आवाज, पक्षांचे आवाज.. आणि या गाण्याचे जन्मदाते, माझ्या नाशिकचे, थोर, जेष्ठ संगीतकार – पं. धनंजयजी धुमाळ ( सर ).. .. 

(आज जगात व्हायरल झालेले हे ७२ पक्ष्यांचे गाणे ऐका. आणि आनंद घ्या निसर्ग संगीताचा…..चित्रपट “ माचीवरला बुधा “) 

– मोहिनी घारापुरे – देशमुख, पत्रकार, नागपूर

संकलन : शरद मगदूम

अबकड कल्चरल ग्रुप, सांगली मो 94226 22626

 संग्राहिका : माधुरी परांजपे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृष्णवड…. श्री हर्षद तुळपुळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ कृष्णवड…. श्री हर्षद तुळपुळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

परवाच वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाबद्दल कुठेकुठे कायकाय वाचायला मिळत होतं. त्यात वडाचा हा एक अद्भुतरम्य प्रकार ज्ञात झाला – “ कृष्णवड “.

पहिल्यांदा वाचल्यावर असं वाटलं की, काळ्या तुळशीला ‘कृष्णतुळस’ म्हणतात, त्याचप्रमाणे या वडाची पानंबिनं काळीबिळी असावीत म्हणून याला ‘कृष्णवड’  म्हणत असतील; परंतु नंतर कळलं की या वडाची पानं देठाकडच्या बाजूने आत वळलेली, द्रोणासारखी असतात आणि त्यामागे एक कृष्णाची पौराणिक कथा आहे, म्हणून याला ‘कृष्णवड’ नाव पडलं.    

भारतीय संस्कृतीकोशात ही कथा वाचनात आली. एकदा गोपाळकृष्ण गाईंना घेऊन रानात गेला असता, काही गोपी लोणी घेऊन तिथे गेल्या व त्यांनी ते लोणी कृष्णाला दिलं. कृष्णाने ते लोणी सर्व गोपगोपींना वाटलं. त्यासाठी त्याने जवळच असलेल्या एका वडाची पानं तोडून ती जराशी मुडपून घेतली. तेव्हापासून त्या वडाची पानं द्रोणासारखी बनली आणि त्याच्या बीजापासून उत्पन्न झालेल्या वडाला तशीच पानं येऊ लागली. म्हणून या वडाला ‘कृष्णवड’ म्हणतात.

कोकणात कुठे हा वृक्ष मी अद्याप बघितलेला नाही, पण याच्याबद्दल जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.  म्हणून काही वनस्पतीअभ्यासकांना याबद्दल विचारलं आणि थोडंसं ‘नेटलं’. तेव्हा अशी माहिती कळली की मुंबईच्या जिजामाता उद्यानात आणि पुण्यात एम्प्रेस गार्डनमध्ये हा वृक्ष आहे. बंगाल प्रांतात हा वृक्ष खास करून आढळतो. देवराई अभ्यासक डॉ. उमेश मुंडल्ये यांनी पानांचा सुंदर फोटो पाठवला. या वृक्षाचे शास्त्रीय नाव Ficus krishnae. पूर्वी ही साध्या वडाचीच (Ficus benghalensis) एक उपप्रजाती मानली जात होती. मात्र केवळ याची पानंच नव्हे, तर या वृक्षाची वाढ, त्याच्या मुळांची रचना, पारंब्या या सगळ्यांमध्ये कमीअधिक फरक असल्याने अलीकडे ही स्वतंत्र प्रजाती गणली जाऊ लागली आहे. याला “ माखनकटोरा “ असंही एक गोड नाव आहे.  

२०१५ साली मनेका गांधी यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाची भेट म्हणून कृष्णवडाचं रोप दिलं होतं.                                          

या वडाच्या उत्पत्तीमागे असलेली कृष्णाची कथा हा एक सांस्कृतिक भाग झाला . पण उत्क्रांतीमध्ये या वडाची पानं अशी का झाली असतील याचं उत्तर  शोधणं मनोरंजक ठरेल ! पानांची अशी विशिष्ट रचना तयार होण्यामागे पाणी धरून ठेवणं, असा उद्देश असावा बहुधा.

या वृक्षाबद्दल आणखी कोणाला काही वेगळी माहिती असेल तर नक्की जाणून घ्यायला आवडेल.

छायाचित्र: डॉ. उमेश मुंडल्ये

— हर्षद तुळपुळे

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वारी-काही ठळक वैशिष्ट्ये… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ वारी-काही ठळक वैशिष्ट्ये… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

1) संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व परतीचे वेळी होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री चंद्रभागेचे स्नान.

2) संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी आरती होतात प्रथम- थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी.

3) श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही गावे इनाम दिली होती, श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांचे पदरी सरदार होते. माऊलींच्या मदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री जवळ सकाळची आरती होते.

4) इ.स.१८३१ पासून ह्या वारी सोहोल्यास श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे. आजही तो अखंडपणे चालूच आहे. त्यांच्या ह्या सेवेचे स्मरण आणि बूज म्हणून आजही श्री माऊलीचा रात्रीतळाचा मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो.

5) वाखरी येथून पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात.

6) वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडविण्यात येतो.

वारी संतांची

संग्राहक – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मधमाशा : शत्रू की मित्र ?– लेखक – श्री विक्रांत भिसे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ मधमाशा : शत्रू की मित्र ?– लेखक – श्री विक्रांत भिसे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

एकदा आमच्या स्टुडिओत दोन चार दिवस सतत मधमाश्यांचा वावर चाललेला. आम्हाला कळेना. त्यांनी पोळं बनवायलाही सुरुवात केलेली.. सुरुवातीला अगदी २०-२५ माश्याच आहेत पाहून आम्ही थोडासा धूर केला आणि त्यांना हाकलवून लावलं. दोन दिवसांनी अचानक पुन्हा त्यांचा वावर सुरु झाला. आम्ही बेचेन झालो. यावेळेस त्या हॉलच्या खिडकीतून स्टुडिओच्या दिशेनं जात होत्या. .. आम्ही पुन्हा धूर केला आणि त्यांचा माग घेतला . ती मधमाश्यांची लाख दीडलाखांची फौज स्टुडिओबाहेर २ फुटांचं  पोळं बांधण्याचं काम शांतपणे करत होती . आम्हाला धस्स झालं–आता  काय? घाबरून/ वैतागून, आता त्यांची विल्हेवाट लावायची म्हणून पेस्ट कंट्रोलवाल्याना फोन केला. त्यांनी २००० रुपये सांगितले, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येतो असे सांगून फोन ठेवून दिला.

हे सगळं करत असताना मनात आलं की त्यांना आपण वाचवू शकतो का आणि कसे ? म्हणजे कोणी संवर्धन करणारे असेल का?

माझा माश्यांवर रिसर्च चालूच होता ज्यात त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी लिहिल्या होत्या. जगाच्या पाठीवरून मधमाश्या नाहीशा झाल्या तर माणूस जेमतेम ४ वर्षेच जगू शकेल असे आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे. हे वाचून आम्ही खाडकन जागे झालो आणि चार दिवसापूर्वीचा  किस्सा आठवला.

आम्ही आमचा मित्र अभिनव काफरेकडे गेलो असता त्यांच्या सोसायटीमध्ये असंच कोणीतरी पेस्ट कंट्रोल करून लाखभर माश्या मारून टाकल्या होत्या. इथे भरदिवसा माणसं मारली जातायत, माशांचं काय. लाखो जीव तडफडत मरत होते. आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. मेलेल्या  लाखो माश्यांचा खच पडलेला पाहून अतिशय वाईट वाटले. बहुतेक तो प्रसंग आठवून आम्हाला त्यांचं  संवर्धन करण्याचं डोक्यात आलं असणार.

माझा रिसर्च सुरु असताना मला “ बी किपर “अमित गोडसे, हा आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून पूर्णवेळ मधमाश्या संवर्धनाच्या कामात स्वत:ला झोकून दिलेला तरुण समोर आला. मध काढण्याची, मधमाश्यांना पळवून लावण्यापेक्षा कमी संहारक आणि अधिक शाश्वत पद्धती असू शकते अशी त्याची खात्री होती. त्याच अनुषंगाने त्याने पुण्यातील मधमाशी पालन आणि संवर्धन केंद्र, तसेच खादी ग्रामोद्योगतर्फे महाबळेश्वर येथे चालवल्या जाणाऱ्या केंद्रात रीतसर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पुण्यात मधमाशी संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.

त्याला फोन केला. शांतपणे त्याने आवश्यक माहिती जाणून घेतली. यासाठी ४०००/- रुपये घेईन असे सांगितले. जीव घेण्याचे २०००/- आणि जीव वाचवण्याचे ४०००/-???– पण आताशा जगात जीव वाचवण्यापेक्षा जीव घेणं जास्त स्वस्त झालंय. तसं हे कामसुद्धा जोखमीचं होतं. त्यात तो पुण्याहून मुंबईला येणार होता. शेवटी त्यानेच पैसे कमी केले– ३०००/- रुपये सांगितले आणि उद्या १२ वाजेपर्यंत येतो म्हणाला.  त्याला पैशांपेक्षा माशांचा जीव महत्वाचा वाटला असणार, नक्कीच ! पैसे गेले तरी चालतील पण आपण त्यांना वाचवायचं, असा आम्हीही निर्णय घेतला. तो सांगितल्याप्रमाणे बरोबर १२ वाजता स्टुडिओवर आला. आमची थोडी चर्चा झाली. त्याच्या विलक्षण कामाबद्दल जाणून घ्यायला आम्ही दोघेही उत्सुक होतो.

अंगावर कोणत्याही प्रकारचं आवरण न घालता फक्त चेहऱ्यावर मास्क आणि टोपी घालून तो बाल्कनीत उतरला. पहिल्यांदा त्याने केवळ धुराच्या साहाय्याने त्यांना दूर करत, हलक्या हाताने त्यांना गोंजारत तो थेट पोळ्यापर्यंत पोहचला. नुकतंच बनत असलेलं पोळं त्याने करवतीने कापलं. नंतर त्या जागेवर जेल लावून त्याने ती जागा काही महिन्यांसाठी सुरक्षित केली. आता तिथे पुन्हा माश्या येणार नाहीत, १० किलोमीटरच्याबाहेर त्या नवीन जागा शोधतील आणि तिथे पोळं बांधायला सुरुवात करतील असं आम्हाला सांगितलं . हे सगळं तो एवढ्या साध्यासोप्या पद्धतीने हाताळत होता की आम्ही त्याच्याबरोबर तिथेच असूनही एकही माशी आम्हाला चावली नाही. त्यांनाही  कोणत्याही प्रकारचा धक्का बसला नाही आणि लाख दीड लाख माश्यांचे जीव वाचले. मधमाशांबद्दलची एवढी भीती आपल्या मनात लहानपणापासून बिंबवलेली असते की त्यांना पाहून पहिल्यांदा त्यांना मारण्याचाच  विचार आपल्या डोक्यात येतो. पण त्यांना वाचवण्याचं हे काम इतकं शांतपणे होत असलेलं पाहून मी त्याला विचारलं,

” त्यांनी आपल्यावर हल्ला का नाही केला? कारण बहुतांशवेळा आपण त्यांच्या कामात अडथळा आणला तर ते आपल्यावर हल्ला करतात हे पाहून आणि वाचून माहित होतं “. तो म्हणाला… “ आपण त्यांना त्रास द्यायच्या उद्देशाने काही करत नव्हतो आणि हे त्यांना कळतं . दुसरं म्हणजे आपण त्यांना अलगद  /शास्त्रोक्त पद्धतीने हाताळलं– हेच जर आपण त्यांच्यावर जबरदस्ती किंवा वार केला असता तर त्यांनी आपल्याला फोडून काढलं असतं एवढं नक्की !” हे सार इतकं विलक्षण होतं की आम्ही भारावून गेलो.

जीव घेणं जरी स्वस्त असलं तरी जीवनदान देण्याचा सुखद अनुभव त्या पैशांपेक्षा मोलाचा वाटला. आपल्याबरोबर निसर्ग वेगवेगळे प्रसंग घडवून आणतो. पण आपण त्याला  कसा प्रतिसाद देतो, त्याचा स्वीकार करतो की प्रतिकार, हे आपल्या हातात असतं .

हे लिहिण्याचा उद्देश एवढाच की अमित गोडसे नावाच्या या अवलियाला आणि त्याच्या मधमाश्यासंवर्धनाच्या कामाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून, अशा लाखो/ करोडो मधमाश्यांचे प्राण वाचावे, संवर्धन व्हावे  व असे अमित गोडसे प्रत्येक शहरात लाखोंच्या संख्येत तयार व्हावेत.

मित यांचे हे काम जास्तीत जास्त शेअर करा आणि मधमाश्यांचं संवर्धन करा.

त्यांना संपर्क करण्यासाठी — Whatsapp – 8308300008 https://www.beebasket.in

लेखक : श्री विक्रांत भिसे 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ☆ इतिहास बदलणारा उंदीर  — श्री सौरभ वैशंपायन ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ इतिहास बदलणारा उंदीर  — श्री सौरभ वैशंपायन ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

सर्वसाधारणपणे उंदीर हा पराकोटीची नासाडी करणारा अत्यंत उपद्रवी जीव समजला जातो. शास्त्रीय प्रयोगासाठी ते पांढरे उंदीर वापरताना आपण बघतो, ते वगळता उंदीर हा पाळीव प्राणी म्हणून कोणी वापरताना दिसत नाही. पण काही प्रशिक्षित उंदीर जीवितहानी टाळत आहेत आणि त्याबद्दल त्यांच्यातील एकाला सुवर्ण पदक दिलं गेलं होतं याबद्दल वाचलं आहे का?

आपल्या बोलण्यात सिंहाचा वाटा किंवा खारीचा वाटा हे शब्दप्रयोग येत असतात, पण भविष्यात त्यात उंदराचा वाटा अशी भर पडली तर आश्चर्य वाटायला नको. मात्र हे काय आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात एक चक्कर मारावी लागेल व त्याचा आज होणारा भीषण परिणाम जाणून घ्यावा लागेल.

व्हिएतनाम युद्धाच्या काळात अमेरिकेच्या विरोधात लढणारे शेकडो व्हिएतकाँगी म्हणजे व्हिएतनामचे स्वातंत्र्यसैनिक सीमा ओलांडून कंबोडियातील जंगलात लपून बसायचे. त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी विमानातून हजारो टन बॉम्ब तर टाकले गेलेच पण सोबत लाखो भू-सुरुंग पेरले गेले. वरून टाकलेल्या बॉम्बपैकी अनेक बॉम्ब चिखलात, शेतात रुतून बसल्याने फुटलेच नाहीत.  ते आजही तसेच जिवंत आहेत. तेच भू-सुरुंगांच्या बाबतीत. अमेरिकेने पेरलेल्या भू-सुरुंगातून आजही मृत्यूचे किंवा अपंगत्वाचे पीक निघते आहे. दरवर्षी शेकडो नागरिक शेतात, जंगलात काम करताना, लहान मुले खेळताना अजाणतेपणी अश्या बॉम्ब/भू-सुरुंगावर वजन पडल्याने प्राणास मुकतात किंवा अपंग होतात. अशाप्रकारे अपंग झालेल्यांचा अधिकृत आकडा तब्बल ६४ हजारांचा आहे. लाखो चौरस किमी.मध्ये लपलेले हे पन्नास लाखांहून अधिक बॉम्ब/भू-सुरुंग शोधून काढणे म्हणजे गवताच्या गंजीत टाचणी शोधण्यागत आहे. शिवाय शोधताना अपघात होतात ते वेगळे. अपघात होऊ न देता काम करणे अत्यंत वेळखाऊ, किचकट आणि खर्चिक काम. कंबोडिया हा देखील शेतीप्रधान देश. एखाद्या शेतात हे भू-सुरुंग न शोधता काम करायला जावं तर जिवाची जोखीम. म्हणजे गेली दशकानुदशके दररोज लाखो कंबोडियन नागरिक जीव मुठीत धरून कामावर जात आहेत. सगळ्याच बाजूने बिचाऱ्यांची कुचंबणा.

अशावेळी मदतीला आला एक उंदीर. तोच उंदीर जो एरवी शेतकऱ्यांचा मोठा शत्रू समजला जातो. त्याचं नाव – “मगावा”. हे त्याला लाडाने दिलेलं नाव. मगावाचा अर्थ “ध्यान केंद्रित असलेला”. तर हा मगावा मूळचा टांझानियातील “आफ्रिकन जायंट पोच्ड रॅट” प्रजातीचा उंदीर. हे उंदीर आकाराने सश्याइतपत मोठे असतात. अत्यंत तीव्र घाणेंद्रिय आणि मातीत कित्येक फूट खोल असलेल्या गोष्टीचा वास घेण्याची आश्चर्यकारक क्षमता असलेला हा मगावा कंबोडियन नागरिकांसाठी जणू देवदूत ठरला. जन्मानंतर पहिले दहा आठवडे त्याची व्यवस्थित वाढ झाल्यावर त्याला भू-सुरुंग बनवायला जी स्फोटकं किंवा मिश्रण वापरले जाते त्याचा गंध ओळखण्यासाठी प्रशिक्षित केलं. मोठमोठ्या लाकडी खोक्यात माती भरून त्यात ती मिश्रणे ठेवून त्याला तितका भाग ओळखण्याचे प्रशिक्षण दिले. बरोबर शोध घेण्याच्या बदल्यात त्याला अत्यंत चविष्ट फळे मिळत.

यासाठी मगावा आणि त्याच्यासारखे अजून काही उंदीर “ऑन फिल्ड” काम करत आहेत. वजनाने हलका असल्याने भू-सुरुंगावर त्याच्या वजनाचा काहीच परिणाम होत नाही. या उंदरांना एक छोटा बॉडी हार्नेस घालून त्यातून एक दोरी पास केली जाते व त्यांना एका सरळ रेषेत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालवलं जातं. मगावा २०० चौरस मीटरचा परिसर अर्ध्यातासात बिनचूक पिंजून काढू शकत असे. हेच काम करायला माणसाला अत्यंत प्रगत माईन-डिटेक्टर्स घेऊनदेखील चार दिवस लागतात. जून २०२१ मध्ये वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या आयुर्मानानुसार मगावा “म्हातारा” झाल्याने या कामातून त्याला निवृत्ती दिली। मात्र तोवर मगावाने १,७७,००० चौरस मीटरहून अधिक परिसर निर्धोक केला. त्याने ७१ भू-सुरुंग आणि डझनावारी इतर प्रकारची जिवंत स्फोटके शोधली होती. इतक्याश्या जीवासाठी हे काम खरोखर प्रचंड आहे. मगावाने एकही चूक न करता जो परिसर निर्धोक केला त्याची खात्री लोकांना पटविण्यासाठी मगावा ज्या भु-सुरुंग शोधणाऱ्या पथकासोबत काम करतो त्यांनी त्या जागी फुटबॉल मॅचेस खेळून दाखवल्या. ते बघून त्या परिसरातील नागरिक निश्चिंत झाले. मगावा हा कंबोडियन लोकांचा लाडका हिरो झाला.

त्याच्या याच कामाचे कौतुक म्हणून लंडनस्थित PDSA या संस्थेने सप्टेंबर २०२० मध्ये सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान केलेला आहे. PDSA ही संस्था १९१७ पासून माणसाला आपत्तीतून वाचविणाऱ्या प्राणी-पक्ष्यांचा ३ प्रकारची पदके देऊन सन्मान करते आहे. पैकी युद्धकाळात विशेष कामगिरी करणाऱ्या पशु-पक्ष्यांना डिकीन मेडल दिले जाते. हा पुरस्कार म्हणजे प्राण्यांचा “व्हिक्टोरिया क्रॉस” समजला जातो. याशिवाय शांतताकाळात विशेष काम करणाऱ्या प्राणी-पक्ष्यांना सुवर्ण किंवा रौप्य पदक दिले जाते. आजवर PDSA ने कुत्रे, मांजरी, घोडे आणि कबुतरांचा सन्मान केला होता (यावर मी माझ्या “परिंदे” या ब्लॉग मध्ये मागेच लिहिलं होतं – http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2015/01/blog-post_21.html ). मगावा  हा असे पदक/पुरस्कार प्राप्त करणारा पहिला उंदीर. PDSA ने प्राण्यांसाठी ब्रिटनमध्ये ४२ दवाखाने उघडले असून तिथे प्राण्यांवर मोफत उपचार होतात.ज्यांना सन्मान प्राप्त झाला आहे त्या प्राण्यांची कृतज्ञता म्हणून खरोखर ते मरेपर्यंत बडदास्त ठेवली जाते. जानेवारी २०२२ मध्ये मगावाने अखेरचा श्वास घेतला तोवर त्याचीही अशीच काळजी घेतली गेली.

तर अशी आहे ही सामान्य लोकांच्या जीवनासोबत एका अर्थी इतिहासही बदलणाऱ्या एका छोट्याश्या “हिरोरॅट” मगावाची छोटीशी तरीही खूप मोठी गोष्ट. 

— श्री सौरभ वैशंपायन

संग्राहिका :- सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फणसकिंग… श्री प्रदीप कोळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे – जोशी ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ फणसकिंग… श्री प्रदीप कोळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे – जोशी

हरिश्चंद्र देसाई यांच्या ‘झापडे’ येथील बागेला दिलेल्या भेटीत उलगडला गेला तो एका अवलीयाचा “शासकीय कर्मचारी (एक्सरे टेक्निशियन) ते फणसकिंग” असा थक्क करणारा प्रवास.

 एक शेतकरी वयाच्या 55 व्या वर्षी फणस लागवडीचा निर्णय घेतो. खरं तर हे निवृत्तीचे वेध लागणारे आणि नातवंडाच्यात रमण्याचे वय. पण हा माणूस या वयात देश-विदेशातील फणसाच्या जातीचा अभ्यास करतो, त्या बहुतांश फणसाच्या जातीची रोपे मिळवतो..अश्या 70 ते 80 प्रकारच्या फणसाच्या जातीची, 3000 हजार फणसाची झाडे आपल्या झापडे येथील 13 एकर जागेत लावतो.

बरं, एवढं करून एखादा माणूस फणसाच्या फळाची, त्याच्यापासून मिळणा-या  उत्पन्नाची वाट पहात कोकणी शेतक-यासारखा निवांत राहील ना! पण, हा वेडा माणूस आपल्या IAS ची परिक्षा देत असलेल्या मुलाला चक्क नोकरीचा नाद सोड सांगतो. त्याला जॅकफ्रूट इंटरनॅशनल परिषदेला घेऊन जातो. मुलाचे मन परिवर्तन करण्यात यशस्वी होतो आणि मुलाच्या साथीने महाराष्ट्रातील “जॅकफ्रूटकिंग” म्हणून आपले आणि कोकणचे नाव जगाच्या नकाशावर आणतो.

बरं, हा फणसाच्या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस – मग जगाला फणस लागवडीचे पर्यावरणविषयक आरोग्यविषयक फायदे पटवून देतो. उभ्या महाराष्ट्रात फणस लागवड शेतक-यानी करावी म्हणून फणसाची रोपे तयार करतो. अशी हजारो रोपे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला पुरवतो.                                                          

आता यंदा ह्या माणसाने साठी पार केली. तुम्ही म्हणाल, आता शेतकरी म्हणून याने क्षितीज गाठलंय, आता स्वतःला सिद्ध करायचे काय बाकी राहिलं आहे ? —- पण, संतुष्ट रहाणे म्हणजे जणू शरीराला जडलेली व्याधी असा ह्या माणसाचा पक्का समज असावा—–

म्हणून हा हिमाचल प्रदेशला जातो. तेथील दर्जेदार सफरचंदाची रोपे आणतो आणि आपल्या नर्सरीत लावतो. मशागत करतो. आपल्या 900 काजू झाडांच्यामधे सफरचंदाची यशस्वी लागवड करून दाखवेन, असे छातीठोकपणे सांगतो. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि देहबोलीतला आत्मविश्वास आपली खात्री पटवतो . 

शेतीत अभिनव प्रयोग करणे आणि ते यशस्वी करून दाखवण्याचा छंद जडलेली ही वल्ली. हा एक दिवस जंगल साफ करायला घेतो आणि ठरवतो यातील एकही जंगली झाड मी तोडणार नाही, पण यातून उत्पन्नही मिळवेन.

हा याचा आणखीन एक संकल्प..! ‘या झाडांवर (नैसर्गिक स्टीक’वर) मी काळीमिरीच्या (ब्लॅकपेपर) वेली सोडेन, मी येथे कृषी-पर्यटन सुरू करेन.’ हे त्यांचे आत्मविश्वासपूर्वक बोलणे ऐकल्यावर, जिद्दीला सलाम करणे एवढे एकच काम आपलं रहातं.

फणस हेच भविष्यात माणसाचे अन्न असेल असे तत्वज्ञान सांगून हा माणूस थांबत नाही, तर पिकलेल्या फणसापेक्षा कच्चा फणस माणसाची भूक भागवेल.. असा सिद्धांत मांडत, आपल्या बागेत  फणासापासून कुरकुरित चिप्स बनवायचा प्लॅन्ट टाकतो. फणसापासून बिर्याणी ते कबाब, पकोडा ते डोसा आणि आईस्क्रीम ते मिठाई आणि असेच अन्य खाद्यपदार्थ कसे बनवता येतील याचा ध्यास घेऊन माहिती घेत रहातो…

“पुरूषाचे नशीब पाते-यात” अशी एक जुनी म्हण आहे. ती म्हण हा माणूस सिद्ध करण्यासाठी जणू इरेला पेटला आहे की काय? हे यांच्या शेतीतील कारवाया ऐकून/पाहून वाटते…. चक्क फणसाची हिरवी पाने हा माणूस टनच्या टन विकतो.

आंतरराष्ट्रीय कंपनीची चालून आलेली पार्टनरशीप.. बघू नंतर म्हणून टाळतो. तर दुसरीकडे.. काजूच्या झाडांचा पालापातेरा, जो कधीच कुजत नाही, त्याचे हा खत म्हणून तयार करायच्या मागे लागतो… ही खतनिर्मीती भविष्यात फक्त हाच माणूस करू शकेल. कारण हा शेतीमधला ‘एडिसन’ आहे.  

‘कल्पवृक्ष कन्येसाठी’च्या ऐवजी हा सासू-सास-यांना फणस द्या म्हणतो आणि फणस देखील कसा बहुगुणी आहे सांगत  सासुरवाडीकडून आणलेल्या फणसाच्या जातीपासून “देसाई कप्पा” नावाची फणसाची नवी जात विकसित करतो आणि थेट कल्पवृक्षांच्या माहेरघरात केरळात जाऊन विकतो. 

समस्या, अडचण हे शब्द या माणसाला कुठल्याही शिक्षकाने शिकवले नसावेत किंवा हा त्या दिवशी वर्गात गैरहजर असावा, यावर मी ठाम आहे. अहो, माकडांचा बंदोबस्त असो, गवा – रेड्यांचा उच्छाद असो, या माणसाकडे जालीम (रामबाण नको, संवेदनशील आहे) उपाय या माणसाकडून जाणून घ्यावा.

बरं, तांत्रिक समस्या म्हणाल तर त्यात हा टेक्निशियनचा बाप. हजारो मीटर विद्युतवहन विनाघट कसे करावे, हे प्रात्यक्षिकासह तुम्हाला दाखवून देतो..

एवढ्याने स्तंभित होऊन जाऊ नका, तुम्हाला हा माणूस फणासाची पिकलेली पिवळी पाने विकत घ्यायला लावणार आहे…. अठळा बदामच्या भावात विकणार आहे आणि फणसाचा समानार्थी शब्द हरिश्चंद्र देसाई असा तुमच्या शब्दकोषात बदल करायला भाग पाडणार आहे.

खरं सांगतो, एखाद्या फळझाडावर वेड्यासारखं प्रेम करणारी अशी व्यक्ती उभ्या आयुष्यात, @57 मी पाहिलेली नाही. या साठ वर्षाच्या तरुणाला तारूण्य, उर्जा, जिद्द, आत्मविश्वास ईश्वर मुक्तहस्ते प्रदान करेल यात शंका नाही. कारण, फणसाशी इमान राखणारा हा “फणस-राजा” हरिश्चंद्र या वरदानास पात्र आहे. 

लेखक  – प्रदीप कोळेकर, संस्थापक – माय राजापूर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेडगावचे शहाणे… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ पेडगावचे शहाणे… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे. असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का ? की पेडगावच का ?  दुसरे कुठले गाव का नाही ? पाहू या तर मग :-            

६ जून १६७४ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ? त्याची ही गमतीशीर हकीकत आणि गनिमी काव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-        

अहमदनगर जिल्ह्यात ‘पेडगाव’ नावाचं एक गाव आहे. तिथे बहादूरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट लुटून आणेल (बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे). 

कोणास ठाऊक कशी पण खानाला ही बातमी समजली , तेव्हा तो माजोरडा चेष्टेने हसत  म्हणाला, ” सिर्फ २००० मराठा मावळे ! उनके लिये तो किलेके दरवाजे खोल दो. अंदर आतेही खदेड देंगे,काट देंगे.”

तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादूरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे त्यांच्या लक्षात आले.  धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तसा लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षितपणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागे फिरले. पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली–खूप जवळ आली– तशी त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागे धूम ठोकली. बहादूरखान स्वतः त्यांच्या समाचारासाठी मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली.  कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूरखानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले, संपूर्ण २०००ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे !

खानाच्या फौजेत  एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावणे हे काही छोटे काम नाहीच.` शिवबांची फौज हरली, पळ काढला ! ` ही जीत औरंगजेबास कळल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल ? ह्या आनंदात बहादूरखान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादूरगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, “अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?”  “कोई नही जहापन्हा. आपकाही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढ़ाई करनी है “. आता किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा त्यांना अंदाज  आला.  आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं. आणि त्यांची भीती खरी ठरली. एक घोडेस्वार दौडत आला, आणि , “हुज़ूर, गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २०००  मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओंने हमला करके  सब लूट लेके चले गए हुज़ूर !”.                            

अशा प्रकारे  राज्याभिषेकाचा खर्च एक कोटीही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात— आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही न सांडता.                       

आता लक्षात आलं का ? की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणून,

 पेडगावचे शहाणे

 आणि                             

वेड पांघरून पेडगावला जाणे

हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले.

 

छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

 

माहिती संग्राहक : माधव केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ One liner Geeta ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

One liner Geeta ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

One liner Geeta.

हिंदू धर्मात मुलांना लहानपणापासून आपला धर्मग्रंथ गीता शिकवला जात नाही हे सत्य आहे.

त्यावर एका काकांनी लिहिले आहे. पण नुसतीच टीका न करता त्यांनी एक सोल्युशनही देण्याचा प्रयत्न केला आहे.

फक्त हे सोल्युशनच पुरेसे नाही हे मला मान्य आहे. पण आताच्या इंग्रजी मिडीयमच्या मुलांना गीतेत नक्की आहे तरी काय हे प्रत्येक चॅप्टरचे सार इंग्रजीत एका वाक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. गीता तत्वज्ञानाची तोंडओळख म्हणा ना.

☆ ☆ ☆ ☆ 

मला सांगा, दूरदर्शन मालिका सर्वसामान्य कुटुंबाकडून बघितल्या जातात. त्या मालिकेत गीतेचे नाव सुद्धा नसते . शाळेत गीता शिकवली जात नाही . कॉलेजात अर्थ समजावला जात नाही. खाजगी क्लासेस मध्ये गीतेचा अंतर्भाव नाही. 

तरुणपणी संसाराची सुरुवात करण्यापूर्वी गीता अभ्यासणार नाही . वयाच्या ४०/५० व्या वर्षी भविष्याच्या तरतुदीमध्ये व्यस्त .

संपूर्ण आयुष्य असेच निघून जाते . 

वाचकहो, मी तुम्हाला कसे समजावून सांगू ? गीतेशिवाय पर्याय नाही. आपणच आपल्या पायावर दगड मारून घेत आहे .

आजच्या ४०  वय असलेल्या मुलाला/ मुलीला विचारा , त्याला गीतेतील एका तरी श्लोकाचा अर्थ माहित आहे का ?

मी तुम्हाला  १८ अध्यायांचे सार सांगणारी १८ वाक्ये देतो  – इंग्रजी मध्ये देतो – One liner Geeta. 

करताय त्याचा प्रसार ?

प्रत्येकानी ४  दिवसात त्याला

किमान १०० फॉरवर्ड करा .

सगळ्या महाराष्ट्रात काय पण सर्व भारतभर पसरवा.

☆ One liner Geeta.

Chapter 1 – Wrong thinking is the only problem in life .

(चुकीचा विचार ही जीवनातील एकमात्र समस्या आहे)

Chapter 2 – Right knowledge is the ultimate solution to all our problems .

(सार्थ आणि पूर्ण ज्ञान हा सर्व समस्ये वरील अंतिम उपाय आहे)

Chapter 3 – Selflessness is the only way to progress and prosperity .

(निस्वार्थ हा प्रगती आणि उन्नतीचा उत्तम मार्ग आहे)

Chapter 4 – Every act can be an act of prayer .

(प्रत्येक कर्म ही एक प्रार्थना समजून करा)

Chapter 5 – Renounce the ego of individuality and rejoice the bliss of infinity .

(आत्मगौरवामधील अहम् चा त्याग करून अनंतातील अमर्याद आनंदात सहभागी व्हा)

Chapter 6 – Connect to the higher consciousness daily.

(नेहमी उच्च चेतनेशी एकरूप रहा)

Chapter 7 – Live what you learn .

(जे शिकाल त्याचे तसेच आचरण करा)

Chapter 8 – Never give up on yourself .

( स्वतः माघार घेऊन हार मानू नका)

Chapter 9 – Value your blessings .

(तुम्हाला लाभलेल्या आशिर्वादाची कदर करा)

Chapter 10 – See divinity all around .

(तुमच्या सभोवतालच्या देवत्वाची प्रचिती घ्या)

Chapter 11 – Have enough surrender to see the truth as it is.

(सत्याच्या प्रचितीसाठी स्वतःला समर्पित करा)

Chapter 12 – Absorb your mind in the higher.

(उच्च विचारसरणीत अंतर्भूत रहा)

Chapter 13 – Detach from Maya and attach to divine .

(मायावी जालापासून दूर रहा आणि देवत्वाशी जवळीक साधा)

Chapter 14 – Live a life- style that matches your vision.

(तुमच्या विचारांशी जुळेल अशीच जीवनशैली आचरणात आणा)

Chapter 15 – Give priority to Divinity .

(देवत्वाला अग्रक्रम द्या)

Chapter 16 – Being good is a reward in itself .

(सृजनशीलता हे एक वरदान आहे)

Chapter 17 – Choosing the right over the pleasant is a sign of power .

(आनंदाचा हक्क हे एकप्रकारे शक्तीचे दर्शक आहे)

Chapter 18 – Let go, let us move to union with God .

(ईश्वराशी तद्रुप होण्यासाठी पुढाकार घ्या)

(Introspect on each one of this principle)

(वरील सर्व विचारांचा परिचय करून घ्या)

|| ॐ तत् सत् ||0

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print