मराठी साहित्य – जीवन रंग ☆ लघुकथा : दुर्घटना , अट ☆ भगवान वैद्य ‘प्रखर’

श्री भगवान वैद्य प्रखर

संक्षिप्त परिचय

जन्म : 23 डिसेंबर 1946

सेवा-काल: मध्य प्रदेश लोक निर्माण विभाग, भारतीय डाक-तार विभाग, भारतीय आयुर्विमा महामंडळ यांत एकूण 40 वर्ष.

प्रकाशन/प्रसारण :  4 व्यंग्य- संग्रह, 3 कथा-संग्रह, 2 कविता-संग्रह, 2 लघुत्तम कथा-संग्रह , मराठी तून हिंदीत  6 पुस्तकें व  30 कथांचा अनुवाद प्रकाशित। आकाशवाणी हून सहा नाटकांसह अनेक कथा, कविता,लेख प्रसारित ।

पुरस्कार- सम्मान: भारत सरकार चा ‘हिंदीतर-भाषी हिंदी लेखक राष्ट्रीय पुरस्कार’, लघुकथा-संग्रह बोनसाई यास किताब घर दिल्ली चा ‘आर्य स्मृति साहित्य सम्मान 2018, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई द्वारा सीढ़ियों के आसपास आणि चकरघिन्नी या कथा-संग्रहांस मुंशी प्रेमचंद पुरस्कार(दोन बेळा), अंतस का आदमी या कविता-संग्रहास संत नामदेव पुरस्कार, धर्मक्षेत्रे -कुरुक्षेत्रे ला मामा वरेरकर अनुवाद पुरस्कार इत्यादि

☆ जीवनरंग : लघुकथा : दुर्घटना , अट  –  श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆

☆  दुर्घटना ☆

‘अहो, तुम्हीं फक्त ऐकलेच असेल परंतु आमचे घरी आजसुद्धा जादू चा एक आकर्षक दिवा ठेवलेला आहे.  आमच्या पूर्वजांच्या काळापासून जपून ठेवलेला आहे तो दिवा.’

‘खरंच! पण त्या पासून कार्यसिद्धि कशी काय होत असते हो?’

‘ते तुम्हीं ऐकलच असेल ना, की जादूच्या दिव्याला थोडं घासलं की लगेच जिन्न प्रगट व्हायचा आणि म्हणायचा, ‘बोलो, मेरे आका…आणि जी वस्तू मागितली ती घेऊन तो क्षणार्धात हजर व्हायचा.’

‘व्हायचा म्हणजे …! आजकाल नाही का होत जिन्न प्रगट?’

‘नाही, कांही वर्षापूर्वी एक दुर्घटना घडली तेव्हांपासून …’

‘कसली दुर्घटना..?’

‘तेव्हां आमचे ताऊजी (वडिलांचे मोठे भाऊ) म्हणे चौथीमध्ये शिकत होते. आपण स्वत: जादूचा दिवा घासून जिन्न प्रगट करावा, अशी त्यांची खूप इच्छा होती आणि एक दिवस सापडली त्यांना संधी. एकटे असतांना दिवा हाती लागला. मग काय, ताऊजींनी दिवा घासला, तोच समोर जिन्न हजर! जिन्न बघितल्याबरोबर ताऊजींची घाबरगुंडी उडाली. आता त्यास काय मागावे, हे त्यांना सुचेना. त्यांनी कांही दिवसांपूर्वीच आपल्या पाठ्य-पुस्तकात ‘ईमानदार माणूस’ नावाची एक कथा वाचली होती. त्यांना ती खूपच आवडली होती.

कथेतील ईमानदार माणूस, त्यांच्या मनावर चांगलाच ठसा उमटवून गेला होता. बस्‍, झटकन ताऊजींनी त्या जिन्नला म्हंटले, ‘मला एक ईमानदार माणूस आणून दे.’ या घटनेस आज कितीतरी वर्षे होऊन गेलीत. ताऊजींनी केलेली मागणी ऐकून गेलेला जिन्न अद्याप परत आलेला नाही.’***

 

☆ अट ☆

‘काय हो, तो कुख्यात तस्कर वारंवार आत्मसमर्पणाची इच्छा दर्शवितो आहे मग सरकार का बरं त्याची मागणी पूर्ण करीत नाही?’

‘सरकार कशी काय पूर्ण करणार त्याची मागणी? त्याचा खात्मा करण्याकरिता कितीही पोलीसांचा बळी द्यावा लागला तरी चालेल, पण सरकार त्याची आत्मसमर्पणाची मागणी काही पूर्ण करणार नाही.’

‘पण कां बरं?’

‘त्या तस्कराची आत्मसमर्पणाची अटच तशी आहे.’

‘अट हीच ना की त्याचे सगळे गुन्हें माफ करण्यांत यावे आणि त्यावर कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यांत येऊ नये!’

‘नाही हो, ही अट नाही त्याची.’

‘मग ही अट असेल की त्यास सरकारकडून थोडी जमीन अथवा काही आर्थिक मदत देण्यांत यावी जेणे करुन तो आपले व आपल्या कुटुंबियांचे पालन-पोषण सामान्य नागरिकां प्रमाणे करु शकेल.’

‘कित्येक वर्षांपासून निवडणूक लढविण्याकरिता जो गृहस्थ नेत्यांना आणि मंत्र्यांना कोट्यावधि रुपये देतो आहे तो शासनासमोर कशाला अशी भीक मागेल?’

‘मग त्याची अट तरी काय आहे की जी शासनास मान्य नाही?’

‘अहो, त्याच्याकडे त्याची एक वैयक्तिक डायरी आहे आणि त्याची अट ही आहे की आत्मसमर्पणानंतर त्यास त्याची ही डायरी प्रकाशित करण्याची सूट असावी.’ ***

 

© श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

संपर्क : मो. 9422856767, 8971063051  * E-mail[email protected] *  web-sitehttp://sites.google.com/view/bhagwan-vaidya

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ अपशकुनी ☆ भावानुवाद सुश्री माया महाजन

☆ जीवनरंग : अपशकुनी  –  सुश्री माया महाजन ☆

जेव्हा तिच्या पतीचा मृत्यू झाला, शेजार्‍या-पाजार्‍यांनी तिचे जगणे मुश्कील करून टाकले होते. पुरुषांची गिधाडाची नजर तिच्यावरच रोखलेली असायची तर बायकांची कुचकट दृष्टी तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून असायची.

आपल्या मुलाबाळांच्या भविष्याच्या काळजीने तिने नोकरी धरली. ऑफिसला जायला ती निघायची तेव्हा आणि परत घरी आल्यावर अनेक शंकेखोर नजरा तिच्यावर रोखल्या जायच्या. या सर्वांकडे दुर्लक्ष करून ती मात्र आपल्या जीवन-संघर्षाला सामोरे जात होती, परंतु अनेक वेळा तिच्यासाठी वापरलेला ‘पांढर्‍या पायाची’ शब्द तिच्या कानावर पडत होता.

तिला मनापासून वाटे की त्या वासंती काकूना ओरखडावं ज्यांनी तिच्या नोकरीच्या पहिल्या दिवशीच सार्‍या आळीला ऐकू जार्ईल इतक्या मोठ्याने म्हटलं होतं. ‘‘आग लागो त्या सौंदर्याला ज्याने इतक्या लवकर नवर्‍याला गिळलं आता रोजच आपला अपशकुनी चेहरा दाखवत जाईल, न जाणे किती नवर्‍याचे किती अनर्थ घडवेल! हिला तर इथून हाकलूनच द्यावे.’’

आतापर्यंत ती शांत राहिली होती. पण आज तिने निर्णय घेऊन टाकला की आता यापुढे ती काहीही सहन करणार नाही जर तिच्याविषयी कोणाला सहानुभूती वाटत नसेल, तर तिने का म्हणून त्यांचे टोमणे, अपमान सहन करायचे!

आज तिला पाहाताच वासंतीकाकू जशी बडबडली, ती पाहा येतेय अपशकुनी…

त्याच क्षणी ती त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘काकू, अपशकुनी मी नाही, तुम्ही आहात. ज्या दिवशी दुर्घटनेत माझ्या पतीचे प्राण गेले. त्या दिवशी सकाळी मी तुमचेच तोंड पाहिले होते. तुम्हीच चालत्या व्हा आमच्या आळीतून!’’

आश्चर्यचकित झालेल्या वासंतीकाकू काही बोलायच्या आधीच त्यांच्यावर एक जळजळीत नजर टाकत ती पुढे निघून गेली.

 

मूळ हिंदी कथा – मनहूस- सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया महाजन 

मो.-९८५०५६६४४२

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा : अकल्पित ☆ सुश्री मंजुषा मुळे

 ☆ जीवनरंग ☆ लघुकथा : अकल्पित ☆ सुश्री मंजुषा मुळे ☆ 

दोन तास झाले तरी ते दार उघडलं नव्हतं. बाहेर थांबलेल्या त्या दोघांची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती. या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहत होते… त्यासाठीच अमेरिकेहून परत आले होते.

एकदाचं दार उघडलं. नर्स बाळांना घेऊन आली. दोघांनाही प्रचंड आनंद झाला.त्या बाईला तिळं  होणार हे खरंतर आधीच माहिती होतं. पण तीनही बाळं सुखरूप असणं, ही त्या दोघांसाठी फार मोठी गोष्ट होती.

अनेक डॉक्टरांचे उंबरे झिजवून, अनेक प्रकारच्या टेस्टस करून, खूप वेगवेगळ्या शक्यतांवर, पर्यायांवर खोलवर चर्चा करून, त्यांनी हा निर्णय घेतला होता…… आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय. तिला मूल होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ ठरली होती. पण तो सक्षम होता. एखादं मूल दत्तक घ्यावं, असं तिचं म्हणणं होतं. पण “मला माझे मूल होऊ शकत असेल, तर काय हरकत आहे? ‘’हे त्याचं म्हणणं, त्याच्यावरच्या अतीव प्रेमापोटी, त्याच्या भावना जपण्यासाठी, खूप विचारांती तिने मान्य केलं होतं, आणि ‘सरोगसी’ चा पर्याय स्वीकारला होता. आज त्या ‘सरोगेट मदर’ ची प्रसूती झाली, आणि त्याला तीन मुलं झाली. तिलाही मनापासून आनंद झाला…. स्वतःच ‘आई’ झाल्यासारखा.

इतक्यात डॉक्टर गंभीर चेह-याने बाहेर आले. स्वतःचं गर्भाशय भाड्याने दिलेली ती बाळंतीण मात्र स्वतःचा जीव गमावून बसली होती. दोघेही एकदम सुन्न झाले. त्यांना मूल देण्याच्या बदल्यात, तिची स्वतःची तीन मुलं पोरकी झाली होती हे सत्य,  पैसे देऊनही बदलणार नव्हतं.

असह्य अस्वस्थता, दुःख, आणि अपराधीपणाची, मनाला घायाळ करणारी तीव्र वेदना……. दोघांनाही काहीच सुचत नव्ह्तं………….

शेवटी तिनेच कसंबसं स्वतःला सावरलं. त्याचा हात हळुवारपणे हातात घेतला…. “हे बघ, ऐक…  तुला तुझं एक बाळ हवं होतं, तर तीन मिळाली. मी एखादं मूल दत्तक घेऊ म्हणत होते, पण आता तीन मुलं दत्तक घेऊ शकेन…. हो…… तिची पोरकी झालेली तीन मुलं. देवाच्या कृपेने, सहा मुलं वाढवण्यासाठी आवश्यक ते सगळं आहे आपल्याकडे… तिच्या आयुष्याच्या बदल्यात, इतकं तर नक्कीच करू शकतो आपण… हो ना?”

तो कृतज्ञतेने तिच्याकडे पहात राहिला. तिच्या मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा त्याला प्रकर्षाने जाणवला… मग फक्त डोळे बोलले…. आणि अमेरिकेला परत जाण्यासाठी आता एकूण आठ तिकिटं काढली गेली……….

© सुश्री मंजुषा मुळे

मो ९८२२८४६७६२

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा : दोन अलक ☆ सुश्री नीशा डांगे 

सुश्री नीशा डांगे 

संक्षिप्त परिचय

जि. प. शिक्षिका/ साहित्यिका

प्रकाशीत साहित्य:- मुग्धायणी काव्यसंग्रह  प्रकाशनाच्या वाटेवर:- दीर्घकथा संग्रह, लघुकथा संग्रह, बालकथा संग्रह

प्राप्त पुरस्कार:- पदमगंधा राज्यस्तरीय पुरस्कार, शब्द अंतरीचे कडून कोहिनूर पुरस्कार, मनस्पर्शी कडून साहित्य रत्न पुरस्कार, वीरशैव लिंगायत समाजाकडून 2 वेळा समाजभूषण पुरस्कार प्राप्त

 ☆ जीवनरंग ☆ लघुकथा : दोन अलक ☆

अलक लेखन क्रमांक 1

दूरदर्शनवर महाभारत पाहतांना मोहित म्हणाला

“आई तू का नाही ग यज्ञातून एकदम मोठी मुले काढलीस ?”

“का रे?” आई आश्र्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली

मोठा असतो ना तर शाळेतून घरी आल्यावर एकटे राहताना मला भीती वाटली नसती

 

अलक लेखन क्रमांक 2

प्रजासत्ताकदिनी सायंकाळी ध्वज उतरवून गुरुजी घरी गेल्याबरोबर मुलांनी कुंपण नसलेल्या शाळेत धुमाकूळ घातला. रंगीबेरंगी पताका तोडून मुलांनी त्याचे छोटे छोटे ध्वज बनविले आणि आपापल्या घरावर लावले. कोणी भगवा, कोणी निळा, कोणी हिरवा……..

सुश्री निशा डांगे

पुसद

मो 84218754

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा – बाई – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा – अनुवाद – सुश्री माया महाजन

सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

☆ जीवनरंग : लघुकथा – बाई – भावानुवाद सुश्री माया महाजन ☆

शहरातील झाडून सर्व महिला समित्यांनी एकत्र येऊन आयोजन केले. खूप मोठ्या संख्येने महिला एकत्रित झाल्या. कलेक्टर कमिशनर, मेयर यांच्या बायकांबरोबरच काही नेत्यांच्या पत्नीदेखील आमंत्रित होत्या.

महिलांवर होणार्‍या अत्याचारांविरोधात मोकळेपणी, स्पष्टपणे चर्चा झडल्या ज्यात हुंडा, कुटुंबाकडून होणारे शोषण, नोकरदार महिलांना सहकारी पुरुषांकडून होणारा त्रास, स्त्री भ्रूणहत्या इत्यादी मुद्यांवर भरपूर चर्चा झाली. या मुद्यांवर काही प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आले.

दिवसभराच्या या व्यस्ततेनंतर माधुरी जेव्हा घरी पोहोचली तेव्हा रात्र झाली होती. जेवणे वगैरे उरकल्यानंतर ती थकलेली अशी पलंगावर पडली की नवर्‍याने तिला जवळ ओढले. माधुरी म्हणाली, ‘‘आज मी खूप थकून गेलेय…’’ नवरा एकदम चवताळून म्हणाला, ‘‘सगळा दिवस भाषणबाजी, घोषणाबाजी करताना स्टेजवर नाचताना थकवा नाही आला आणि आता मला पाहताच थकवा जाणवायला लागला का? समजतेस कोण स्वत:ला.’’

नवर्‍याची मारझोड सहन करून त्याची हवस पूर्ण करून जेव्हा ती पलंगावर मूक अश्रू गाळत पडली तेव्हा विचार करत होती, ‘हाच तर मुद्दा आज आपण मांडला होता, नवर्‍याकडून शोषण, उपेक्षा, मानहानी शेवटी बायकोने कसे तोंड द्यावे या सर्वाला! कुठपर्यंत हे सगळे सहन करावे तिने?

यातून सोडवणूक कधी? तिने मांडलेल्या या मुद्यावर प्रस्ताव मंजूर केला गेला. त्यांनी सर्वांनी अभिनंदन केले होते तिचे.

आता तिला वाटायला लागले की अभिनंदन करणारे जणू आता तिला टोमणे मारत आहेत, तिची चेष्टा करताहेत. पाह्यलं? चालली होती मोठी क्रांतिकारी बनायला.

विसरू नकोस तू बाई आहेस बाई…

 

मूळ हिंदी कथा- औरत- नरेन्द्र कौर छाबड़ा, मो.- ९३२५२६१०७९  अनुवाद- माया महाजन, मो.-९८५०५६६४४२

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग – लघुकथा ☆ तिरंगा – सुश्री मीरा जैन – अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन 

☆ जीवनरंग : लघुकथा – तिरंगा ☆

त्या प्रौढ बाईच्या, वैजूच्या टोपलीत, दोन तासातच नोटांचा ढीग लागला. तिला कुणालाच काही सांगावं लागलं नाही की तिने कुणाची विनवणी पण केली नाही. तिच्या टोपलीत छोटे छोटे तिरंगी झेंडे होते. त्याच्याजवळ तिने एक पाटी लावली होती. त्यावर लिहिलेलं होतं, ‘तिरंगा विकू शकेल, अशी कुणाचीच हिम्मत नाही आणि तो विकत घेता येईल, अशी ताकदही कुणाची नाही. हा तिरंगा सगळ्या देशाचा रक्षणकर्ता आहे. त्याच्या राज्यात कोण, कसा उपाशी राहील? तो आज तत्परतेने माझ्याजवळ उभा आहे. आपण हा सन्मानपूर्वक घेऊन जा आणि स्वेच्छेने आपल्याला जे द्यायचं असेल, ते द्या.’

© मीरा जैन

उज्जैन, मध्यप्रदेश

मूळ कथा – मीरा जैन    अनुवाद – उज्ज्वला केळकर 

Please share your Post !

Shares
image_print