मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 7 – आकार…! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं। अब आप श्री सुजित जी की रचनाएँ  “साप्ताहिक स्तम्भ – सुजित साहित्य” के अंतर्गत  प्रत्येक गुरुवार को  पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनकी कविता  “आकार…!”। )

 

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #6☆ 

 

☆ आकार…!☆ 

 

कुभाराचं ते मातीची भांडी घडविणारं चाक मला कायमच जवळच वाटत गेलं.   फिरत्या चाकावर मातीला हवा तसा आकार देताना त्याचा हात चुकत नाही पण त्याच्या आयुष्याचा आकार  मात्र नेहमीच चुकत गेला. हे अस का होतं? परंपरागत व्यवसाय स्विकारताना त्याच्या  आयुष्याचं मातेरं का व्हावं?

त्याचं  आख्खं आयुष्य गेलं ह्या फिरत्या चाकावर मातीला हवा तसा आकार देण्यात पण हे चाक कधी त्या कुंभाराला  हवं तसं फिरलंच नाही. आणि परिस्थितीला हवा तसा आकार त्याला  कधी देताच आला नाही.

या कुंभाराची लेकरं लहान असताना, त्यांची कित्येक स्वप्न त्याने, नाईलाजास्तव, प्रापंचिक  अडचणींच्या,

पायवाटेवर  चिखलात तुडवताना मी पाहिली आहेत.  तो कुंभार मी कवी. तो निर्मिती करत गेला आणि त्याची तुटपुंजी कमाई पहाताना मी हळवा होत गेलो.

आणि त्या कुंभाराच्या सुखस्वप्नांच्या चिखलाची त्यांच्या साठीच नव नवी हवी तशी  विविध आकाराची भांडी तो बनवत गेला. त्याचं जगण त्याच्या स्वप्नांना आकार  देत गेलं .

तो कुंभार  आता थकलाय. इतकी वर्षे संभाळून ठेवलेल्या परिस्थितीचा घडा आता, हळूहळू पाझरू लागलाय.त्याच्या  पायाखालचा चिखलही आता पहील्या पेक्षा कमी झालाय कारण आता…

त्याच्या लेकरांनी आपआपल्या स्वप्नांचा चिखल

आपआपल्या पायाखाली तुडवायला सुरवात केलीय

पुन्हा नव्याने परिस्थितीला, त्यांना हवा तसा आकार देण्यासाठी….!

हे वास्तव मला जाणवलं. ते मनात रेंगाळत  असतानाच माझ्याही मनात  एका कवितेने  आकार घेतला. .

तोपर्यंत तो कुंभार त्याचा जीवनप्रवास साकार झाला होता. मातीच्या भांडयान कलेचा आधार घेतला होता. त्याची मुलही मातीची भांडी बनवतात. वापरण्यासाठी नाही तर सिरॅमिक पॉट शोभिवंत फुलदाणी म्हणून. . . . !

 

© सुजित कदम, पुणे 

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ चरखा ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है।  किन्तु, इस आलेख  में आप उनके स्वराष्ट्र प्रेम की भी झलक पाएंगे। आज प्रस्तुत है उनकी स्मृति में  गांधीजी के चरखे  एवं चरखे से जुड़े ऐतिहासिक तथ्यों को  वर्तमान से जोड़ता हुआ  शोधपूर्ण आलेख   “चरखा ।) 

 

☆ चरखा 

 

दिनांक ५-११-२०१७ च्या सकाळ सप्तरंग मधील प्रा.उत्तम कांबळे यांचा “सेवाग्राम मधील प्रार्थना आणि चरखा” हा लेख वाचला.त्यांचे सर्वच लेख मला खूप आवडतात.कारण लेखनाच्या आधी ते जिथं जिथं फिरस्तीला. जातात आणि तिथं ते जे जे पाहतात त्यावर त्यांचं लगेचंच वास्तववादी व जिवंत प्रतिक्रिया देणारं लेखन असतं, त्यामुळे ते मनाला चटका लावून जातं.

आत्ताचा लेखही म. गांधींच्या चरखा विषयाचा. पवनार येथील पूज्य विनोबांच्या आश्रमातल्या प्रार्थनेचा. मी विचार करु लागले,चरखा हा माझाही अत्यंत जिव्हाळ्याचा. माझ्या लहानपणी मला आठवतं माझे काका – काकू घरी रोज चरख्यावर सूत कातून त्या सुताच्या गुंड्या बनवून पुण्यातल्या खादी ग्रामोद्योग मध्ये देऊन त्यापासून विणलेले सर्व कपडे वापरीत असत.

१९५१ ते १९५८ अखेर माझं प्राथमिक शिक्षण खंडाळा-पारगाव पुणे-सातारा रोडवरचं. येथे झालं.शाळेत त्यावेळी ती बेसिक शाळा होती. तिथं आम्हाला मेंढ्यांची लोकर वर्गवारी करुन, लोकर स्वच्छ करून ती छोट्या धनुकलीने पिंजून त्याचे पेळू तयार करून त्या लोकरीचे सूत चरख्यावर कातून त्यापासून हातमागावर घोंगड्या  विणण्याचा मूलमंत्र मिळाला होता.

घरी आणि शाळेत सतत चरखा सोबतीला असल्यानं तो माझ्या जिव्हाळ्याचा.पण गेली कित्येक वर्षात मला त्याचं साधन दर्शनही झालं नाही, आणि कांबळे सरांनी मला ते त्यांच्या लेखातून करविलं त्यामुळं मला अक्षरशः भरुन आलं स्वातंत्र्यपूर्व काळात चरख्यानं अख्ख्या भारताला,भारतातील खेड्यापाड्यातील आबालवृद्धांना, सुशिक्षीत अशिक्षितांना,सामान्यातील सामान्यांना बापूजींच्या चरख्याने गती दिली होती.

खेडोपाडी स्वदेशीची चळवळ उभी राहिली.स्वदेशी चळवळीने देश व्यापला. एवढासा चरखा पण तो देशव्यापी ठरला. मूलोद्योगी शिक्षणाचा मंत्र अख्ख्या भारताला  मिळाला तो चरख्यामुळे. समानतेचा संदेश दिला तो चरख्याने !

कित्येकांना रोजगाराची हमी दिली ती चरख्याने. लोकांमध्ये आत्मविश्र्वास निर्माण केला गेलातो चरख्यामुळे.

१५  आगष्ट १९४७ ला इंग्रज भारत देश सोडून गेले पण जाताना देशाचे दोन तुकडे करून त्यांची कोट हॅट पॅन्ट आपल्याला ठेऊन गेले जे आजही आपण आवडीने वापरतोय! पण त्यांनी काही आपलं कोट टोपी धोतर त्यांच्या देशात नेलं नाही.

आमच्या साताऱ्यातील ज्येष्ठ समाजसेविका मा.अंजलीताई महाबळेश्वरकर  म्हणाल्या की, आपल्या लोकांना ब्रॅंडेड व इंपोर्टेडच कपडे आवडायला लागले.आपल्या लोकांना स्वदेशी कपडे आवडत नाहीत.आपल्या देशाच्या हवामानाला खरम्हणजे सुती कपडेच योग्य !पण लोकांनी त्याकडे पाठ फिरवल्यानं चरखे व हातमाग आपोआप मागे पडले.

इंग्रजांनी भारतात आल्यावर मुंबईत कापड गिरण्या सुरू केल्या. इथून कच्चा माल तयार करून तो स्वत:च्या देशात नेऊन त्याचा पक्का माल करून ते भारतातल्या लोकांना महागड्या किंमतीला विकून आपल्यालाच लुटत राहिले.

स्वातंत्र्यानंतर आपल्या गिरण्यांच्या मालाला उठाव नसल्याने त्या तोट्यात येवू लागल्या, व एकेकाळी सोन्यासारखं वैभव असलेल्या मुंबईच्या कित्येक गिरण्यांना टाळेबंदी आली व लाखो कुशल कामगार बेकार होऊन अक्षरशः देशोधडीला लागले.

आज हे लिहितानाही माझे डोळे पाणावलेत.तर प्रत्यक्ष ज्यांनी भोगलं त्यांना काय झालं असेल.?

७ आगष्ट रोजी शासनाने हातमागदिन म्हणून साजरा करण्याचे मागीलवर्षी जाहीर केले आहे. तेव्हा देशवासियांना विनंती करावीशी वाटते, की प्रत्येकाने किमान एकदातरी चरखा हातात घेऊन पहावा. त्यावर सूत कातताना आपली होणारी एकाग्रता आपल्याला आयुष्यात किती उपयोगी पडते. मोबाईल व टीव्ही मुळे मंद होत चाललेल्या आपल्या मेंदूला चालना मिळून तो किती कार्यक्षम होतो ते पहा. त्याबरोबरच किमान बंद पडलेले हातमाग व पश्र्चिम महाराष्ट्रातल्या सूतगिरण्या ज्यामध्ये शासनाचे अमूल्य भांडवल वाया जाते आहे त्या पुन्हा सुरू होतील, हजारो बेकार हातांना चांगला रोजगार मिळेल. !

जय हिंद जय महाराष्ट्र!!

 

©®उर्मिला इंगळे, सातारा 

दिनांक :-८-७-१९

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #11 – स्पर्शगंध… ? – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

 

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की  ग्यारहवीं कड़ी स्पर्शगंध…  सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं।  आज पढ़िये स्पर्शगंध… एक वार्तालाप, संभवतः स्वयं से? इस शृंखला की  कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। ) 

 

? साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी  – #11  ? 

 

☆ स्पर्शगंध… ☆

 

जाणिवेत पुरून उरतो तो…

कळतंय का, मी काय म्हणत्ये ते?

असाच आहेस, सगळं माझ्याकडून ऐकायचं असतं तुला, हो ना!

पण खरं सांग, हा अनुभव तुलाही आलाय ना !

म्हणजे बघ ना, फुलं हातात घेतली की त्यांचा मुलायम स्पर्श गुदगुल्या करतो, चेहऱ्यावर आपोआप हास्य खुलतं, आणि ह्याचा स्पर्शाचा सुगंध अंगभर पसरतो, दरवळतो… तो परिमळ अवतीभोवती प्रसन्नता ठेवून जातो…

एखाद्या तान्ह्याला उचलून घे, मग बघ काय होतं ते… इंग्लिशमध्ये bundle of joy म्हणतात ते उगीच नाही… ते गोंडस रूप डोळ्यात भरून घ्यावं, त्याच्या इवल्या इवल्या बोटांचा स्पर्श हृदयाचा ठाव घेतो… त्याला खाली ठेवलं तरी निरागसतेचा गंध वातावरण उत्साही करतो… एक निर्मळ आनंद देऊन जातो… नवनिर्मितीचा ध्यास पूर्ण करतो, नवीन नात्यांची वीण गुंफू लागतो…

शाळा सुरू व्हायच्या आधी नवीन पाटी, पुस्तकं, वह्या, दप्तर ह्यांच्या स्पर्शाने जीवनाची दिशा ठरवली जाते, आणि ज्ञानरुपी सुगंधाने आयुष्य समृद्ध होते… हा स्पर्शगंध आयुष्य घडवतो, माणूस घडवतो…

बरसणारी प्रत्येक सर मातीच्या कणाकणाला स्पर्शून जाते, आणि सृजनातल्या तृप्ततेचा गंध आसमंताला गवसणी घालतो…

असाच असतो हा स्पर्शगंध… हवाहवासा… जसा तुझ्या मिठीतील स्पर्शातून भावनांना मोकळं करून जबाबदारीच्या गंधातून आपलं अस्तित्व टिकवणारा…

क्षितिजाला नजरेनेच स्पर्शून स्वप्नांचा दरवळ आयुष्य जगायला शिकवतो…

सूर्योदय, सूर्यास्त ह्यांची बात काही वेगळीच आहे… जन्म ह्या जाणिवेला क्षणोक्षणी फुलवत, विधात्याच्या परीस स्पर्शाने, आपल्या पावलांचे ठसे मागे ठेवत अनुभवाचा गंध मृत्यूला सामोरं जायची शक्ती देणारा असतो…

कळतंय का तुला?

आता तू काय म्हणणार आहेस हे तुझ्या स्मित हास्यातून कळतंय बरं…

माझ्यावरील प्रेमामुळे तू हे बोलतोस, पण तुझा स्पर्शगंध अंग अंग मोहरून टाकतो, जो आर्ततेच्या स्पर्शातून पूर्णत्वाच्या गंधाकडे नेतो… तुझ्या विचारांचा स्पर्श जेव्हा शब्दांमधून गंधाळतो, तेव्हा समर्पणाची गझल बनते, जसा तुझ्या ओठांचा स्पर्श होताच मुरली संगीत सुगंधाचे वेड लावते…

मग तुझं माझं असं काही उरत नाही, कारण तो स्पर्शगंध तुझ्या माझ्यातील अंतर नष्ट करून सावळ्या रुपात विलीन होतो…

 

© आरुशी दाते, पुणे 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ नाते ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झालक  देखने को मिलती है। हम भविष्य में आपके उत्कृष्ट साहित्य की अपेक्षा रखते हैं। आज प्रस्तुत है उनका आत्मकथ्य “नाते ”।) 

 

नाते 

 

अगदी खरं आहे सायली तुझं.तूही माझी लेकच आहेस.

तुझी माझी ओळख तरी कशी झाली,तू नगरची मी सातारानिवासी.पण माझा मुलगा अनिल नगरला होता त्यामुळे मी फेब्रुवारी २००१ मध्ये तिकडं आले होते.माझ्या योगगुरुंच्या आज्ञेनुसार नगरला मी “विनामूल्य योगवर्ग “घेणार म्हणून आम्ही “केदार अपार्टमेंट , सहकारनगर येथे रहात असल्याने त्या बिल्डींगच्या तळमजल्यावरील भाजीच्या दुकानात एका चिकटलेल्या कागदावरील योगवर्गाची माहिती बघून तू वरच्या मजल्यावर चौकशीसाठी आलीस आणि पहिल्या दृष्टभेटीतच आपल्या नात्याच्या तारा जुळल्या.

हे तू वर्ग पूर्ण झाल्यानंतर त्यावेळी “तरुण भारत मुक्तमंच “ला दिलेल्या तुझ्या बातमीत नमूद केले होतेस.माझ्याकडून तुला किंवा वर्गाला मिळालेल्या योगासने, निसर्गोपचार व अन्य मोलाच्या माहितीमुळे तू खूप प्रभावित झालीस व माझं नातं तुझ्याशी घट्ट विणलं गेलं.गेल्या १८ वर्षात ते इतकं सुबक आणि सुंदर झालं की त्याचं रुपांतर मायलेकीच्या नात्यात कधी झालं ते कळलंच नाही.

नगरला मी पाहुणी असूनही तू मला तिथल्या अनेक उपक्रमात सहभागी नुसतं करुन घेतलं नाहीस तर नगरवासियांना वर्तमानपत्रातील बातम्यांद्वारे माझा परिचय करुन दिलास.हे मी कधीच विसरु शकत नाही.नगरच्या आपल्या एकूण सहा सात वर्षांच्या सहवासाने आपलं नातं खूप दाट विणलं गेलं. माझा किंवा घरातील सर्वाचे वाढदिवस लक्षात ठेऊन पहिला शुभेच्छा फोन तुझाच असतो.आता तर आपण वाटस्अॅपवर अखंड जोडलेल्या आहोतच !

यालाच तर म्हणतात खरं   नातं प्रेमाचं,आपलेपणाच,   अगदी निरपेक्ष !!

 

©®उर्मिला इंगळे, सातारा 

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ तरूणांसमोर पर्याय काय? ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते।  हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है   युवाओं  के जीवन पर सोशल मीडिया , विभिन्न एप्स , ऑन लाइन/ऑफ लाइन गेम्स आदि के  उनकी शिक्षा, नौकरी एवं सामाजिक जीवन पर  विचारोत्तेजक आलेख  तरूणांसमोर पर्याय काय?।)

 

☆ तरूणांसमोर पर्याय काय? ☆

 

माणुस कितीही लढवय्या असला तरी जर त्याच्या लढण्याला योग्य दिशा नसेल. किंवा कशासाठी लढतोय हे स्पष्ट नसेल. तर त्याच्या लढण्यालाही अर्थ उरत नाही. माणसाचा स्वभाव चंचल आहे. मन अस्थिर आहे. हे त्या गोष्टीमध्ये जास्त गुंतते ज्याच्यामुळे वेळ वाया जातो. ज्याच्याने वेळ कामांस येईल असं खुप कमी होतांना दिसतं. आणि आजच्या काळात वेळ वाया घालवण्यासाठी नवनवीन माध्यमे उपलब्ध आहेत. त्यात मोबाईल, टि. व्ही. संच वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत.  असं म्हटलं जातं कि एका नाण्याचे दोन बाजू असतात. या साधनाच्याही आहेत. फायदे आणि नुकसान प्रत्येक गोष्टीचा असतो. तसं यांचही आहे. काही फायदा वगळता तोटेही बघायला मिळतात.

आज इंटरनेट मुळे जग जवळ आलं असलं. तरी जवळची माणसं दुर गेलेली दिसतात. इंटरनेटच्या या जगात शाॅर्ट मॅसेज सर्व्हीसचा बोलबाला आहे. कारण फेसबुक व्हाटसअॅप वगैरे अशा अनेक अॅप आहेत ज्यांच्याद्वारे पुर्ण माहिती न देता ती एडिट करून प्रसारित केली जाते. किंवा कोण कोणाबद्दल काय बोललं हे फक्त दाखवलं जातं. मग तो का बोलला, कशाबद्दल बोलला याचं कोणाला काहीही घेणं देणं नसतं. याच एडिटींगच्या आणि शाॅर्ट मॅसेज सर्व्हीस मुळे कधी कधी संकुचित विचार होऊन सामाजिक एकोपाही धोक्यात येतो.

आज फेसबुक व्हाटसअॅप वगैरे यांसारख्या सोशल मिडियावर अनेक गृप स्थापन केले जातात. आणि या गृपमध्ये ही अपूर्ण माहीती काॅपी पेस्ट करण्याचे काम सर्रासपणे होताना दिसतं. याच गृपमधुन अस्वीकारार्ह पोस्टही टाकल्या जातात. त्यातुन कधी कधी अघटीतही घडतं. म्हणुन सोशल मिडिया वापरणं वाईट आहे असं मी म्हणणार नाही. पण आपन त्याचा कसा वापर करतो. ही गोष्ट इथे महत्वाची ठरते. जसा सोशल मिडियाद्वारे भडकाऊ अस्वीकारार्ह किंवा अश्लील पोस्ट टाकल्या जातात. त्याच सोशल मिडियावर राष्ट्रीय एकात्मतेच्या, सामाजिक बांधिलकीच्या, विज्ञान व तंत्रज्ञान, महापुरूषाच्या माहितीच्या आणि आजच्या तरुण पिढीसाठी उपयुक्त अशा स्पर्धां परीक्षाच्या- उद्योग धंद्याच्याही पोस्ट टाकल्या जातात. आता यातुन आपल्याला कोणत्या पोस्ट फाॅरवर्ड  करायच्यात किंवा डिलीट करायच्या ते वापरकर्तावर अवलंबून आहे.

पण प्रश्न असा आहे कि या सोशल मिडिया किंवा टेलेव्हिजन संच यामध्ये अडकून राहणा-या आणि या असल्या पोस्टने आजची तरूण पिढी तर बळी नाही ना पडत. याचा आधी विचार करायला हवा. कारण हीच तरुण पिढी देशाचा आधारस्तंभ आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा कि असल्या आक्षेपार्ह किंवा अस्वीकारार्ह पोस्ट न टाकता काही माहीती तंत्रज्ञानाच्या किंवा इतरही उपयोगाच्या पोस्ट केल्या तर तरूणांना त्याचा फायदाच होईल. आणि अप्रत्यक्ष देशाचा विकासालाही हातभार लागेल. आता ते वापरकर्ता वर अवलंबून आहे कि काय पोस्ट करावं नि काय डिलीट.

आणि जर समजा हि तरूणाई या सोशल मिडियापासुन लांबच राहीली तर अनेक गेम्स सध्या उपलबध आहेत. जसं पबजी, सब वे , वगैरे. या गेममध्ये असा काही अडकून जातात कि आजुबाजुला काय घडतंय. याचं भानच उरत नाही. एकप्रकारे विचार करण्याचा वाटाच बंद होऊन जातात. याचं गेम्स मुळे मुलांचे जिवही गेलेयत. जास्त काळ मोबाईलकडे पाहत राहिल्याने अंधत्वही आल्याच्या बातम्या मध्यंतरी वाचायला मिळाल्या होत्या. तरी ही तरूण पिढी त्यातुन बाहेर निघायला तयार नाही. यामुळे समाजाचं आणि देशाचंही नुकसान होत आहे. मोबाईल, टी व्ही, इंटरनेटचा वापर सिमित करून जर ही तरूणाई उद्योग धंद्यात गुंतली तर ते देशाच्या विकासाला  नक्किच पोषक ठरणार आहे.

आज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होतंय. शेतीसाठी उपयुक्त माहिती किंवा घरगुती उद्योगांची माहीती आत्मसात केली तर स्वत उद्योग धंदे स्थापन करू शकतात. अशी महीती मोबाईलवर एका क्लिकने मिळते. यामुळे काही अंशी बेरोजगारीही कमी व्हायला मदत होईल. दरवर्षी डिग्री घेऊन लाखो मुलं बाहेर पडताहेत. डिग्री घेतल्या घेतल्या नोकरीच्या शोधात निघणा-या मुलंचाही एक वेगळाच ताफा आहे. डिप्लोमा, इंजिनियरींग, मेकॅनिकल वगैरे असंख्य विषयांत डिग्री संपादन करून मुलं महिन्याच्या एक तारखेला कंपन्यांच्या गेटवर काम मागण्यासाठी उभे राहतात. नाहीतर वर्षानुवर्षे न संपणारा एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी च्या मार्गावर चालतात. पण दरवर्षी डिग्रीधारक विद्यार्थी आणि आणि वर्षभरात निघालेल्या जागा यांत खुप मोठी तफावत असते. म्हणुन याही क्षेत्रात डाळ न शिजलेले विद्यार्थी एक तर गावाकडे परत जाऊन वाडिलोपार्जित शेती सांभाळतात. किंवा पुणे, मुंबई सारख्या बड्या शहरात एम. आय. डी. सी. चा रस्ता धरतात. आणि हे भविष्यातले क्लास वन क्लास टू चे अधिकारी आठ दहा हजाराची नोकरी करतात. एकप्रकारे स्वेच्छित गुलामगिरीच स्विकारता. आणि आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या किंवा न शिकलेल्या अनुभवी लोकांच्या हाताखाली काम करतात. मी असं म्हणत नाही कि कमी शिकलेला किंवा न शिकलेला माणुस अज्ञानी असतो. त्या माणसांत असलेली क्षमता आणि त्याच्याकडे असलेल्या कौशल्याचा जोरावर तो इथपर्यंत आलेला असतो.

पण होत काय कि हा डिग्री घेउन हेल्परचं काम करणारा मुलगा जास्त करून सोबत काम करणा-यांच्या रडारवर असतो. खरं तर त्याचं शिक्षण त्यांच्या रडारवर असतं. उदा. बघा एखादा दहावी, बारावीचा मुलगा काम करत असेल आणि सोबतच एखादा डिप्लोमा इंजिनियर झालेला मुलगा काम करत असेल. आणि दोघांकडून काही चुक झाली तर उच्च शिक्षित म्हणुन डिप्लोमा वालाला टारगेट केलं जातं. त्यासाठी काही शब्द ठरलेली असतात. कि काय फायदा एवढ्या शिक्षणाचा, शिकला तेवढा चुकला,  आणि कोणता मास्तर होता रे तुला शिकवायला वगैरे असे शब्द बोलले जातात. त्याला बिचा-याला बोलता येत नाही. मुकाट्याने ऐकून घ्यावं लागतं. आणि शिक्षित मुलापेक्षा, त्याच्या डिग्रीपेक्षा आपण कसे सिकंदर आहोत हा भाव चेह-यावर आणला जातो.

परिणामी त्या मुलाला आपल्या शिक्षणाची लाज वाटायला लागते. त्याच्या आयुष्यात जे काही वाईट घडतं त्याला तो त्याच्या शिक्षणाला जबाबदार मानतो. यातूनच त्याला नैराश्य येते. आणि या नैराश्यातुन तो वाईट मार्गाला लागतो. पण अशा वेळी नैराश्याने ग्रसून न जाता अशा परिस्थितीत शांत डोकं ठेवून विचार करायला हवा. कारण याही प्रसंगात आपल्याकडे अनेक वाटा शिल्लक असतात. पण त्या वेळेवर दिसत नाही. कारण त्या शिक्षणाबददलच्या भयंकर रागाने मेंदू काबीज केलेला असतो. म्हणुन त्याला कोणतीही वाट दिसत नाही. आणि तो वाईट गोष्टींकडे आकर्षिला जातो. अशा वेळी स्वतःला शांत ठेवून जर उपाय किंवा मार्ग शोधले तर त्याचा नक्किच फायदा होईल. त्यात स्वयंरोजगार हा एक पर्याय असू शकतो. आपल्या शिक्षणाची तमा न बाळगता जर छोटे मोठे व्यवसाय स्थापन केले तर ती सुखी भविष्याची पेरणी ठरू शकेल. पण ते करायला आपन धजत नाही. कारण शिक्षण म्हणजे नोकरी ब्रीदवाक्यच बनून गेलंय. ही मानसिकता बदलनं गरजेचं आहे.

आणि दुसरा म्हणजे डायरेक्ट सेलिंगचा ही एक पर्याय राहू शकतो.  काही अपवाद वगळता आणि भविष्यात ऑनलाईन पकड पाहता डायरेक्ट सेलिंग हा एक सक्षम पर्याय बनून उभा राहू शकतो. पण डायरेक्ट सेलिंग म्हटलं म्हणजे लोकं सहसा त्याच्या कडे लक्ष देत नाही. कारण आधीच्या कंपन्यानी केलेली फसवणूक लगेच लक्षात येते. पण अशाही कंपन्या आहेत कि जे कित्येक वर्षापासून खंबीरपणे उभ्या आहेत. आणि अनेक लोक यात कमालीचे यशस्वी होतांना दिसताहेत.

वरिल दोन्ही मार्गांमध्ये गरज आहे ती *रिस्क* घेण्याची. कारण उद्योग करायचे झालं म्हणजे भांडवल आलंच. त्यासाठी पैसा लागतो. चालला तर ठिक नाही तर शुन्य. म्हणुन हा रिस्क कोणी घेऊ इच्छित नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. कोणत्याही फिल्डमध्ये रिस्क आहेच. मग नोकर बनून दुस-याच्या हाताखाली काम करून रिस्क घेण्यापेक्षा स्वत मालक बनून रिस्क घेण्यात काय हरकत आहे. कारण आधीच पंधरा- सोळा वर्षे शिक्षणात टाकली. त्यात वय लग्नाच्या दिशेने कुच करतेय. आणि स्पर्धां जास्त असल्यामुळे यशस्वी होण्याचे कमी चान्सेस. नोकरीही नाही किंवा रोजगाराचा पर्याय उपलब्ध नसेल तर हे पर्याय नक्किच तारणहार ठरू शकतील. म्हणुन तरूणांनी नैराश्याने खचुन न जाता हिंमतीने आणि आत्मविश्वासाने उभे राहून परिस्थितीवर मात करायला हवी. तेव्हाच तो एक लढवय्या शोभेल.

 

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा

जि. नंदुरबार

मो  9168471113

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प सहावे #6 ☆ पावसाचे मुक्त चिंतन. . .  समाज पारावरून . . . ! ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं  ।  अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “पावसाचे मुक्त चिंतन. . .  समाज पारावरून . . . !” ।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – पुष्प सहावे  #-6 ☆

 

☆ पावसाचे मुक्त चिंतन. . .  समाज पारावरून . . . ! ☆

 

आला पाऊस पाऊस

तन मन भुलवीत

पानाफुलांचा पिसारा

आनंदाने फुलवीत . . . !

 

अनादी अनंत काळापासून या पावसाने वेड लावले आहे. संपूर्ण चराचर व्यापून टाकणारा हा पाऊस तन  आणि मनावर  अधिराज्य गाजवतो. प्रतिक्षा करायला लावणारा हा पाऊस  आल्यावर मात्र तनामनावर मोहिनी घालतो.

पावसाची नऊ नक्षत्रे वजा केली तर बाकी शून्य उरते. . . . बिरबलाची ही चातुर्य बुद्धी विचार करण्यासारखी आहे.  आपला भारत देश हा शेती प्रधान देश आहे.  यामुळे पावसावर आपले सारे भवितव्य अवलंबून आहे. हा पाऊस डोळ्यातले पाणी  आनंदाश्रू त परीवर्तित करतो.  स्नेह, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माया, ममता सा-या भावनांचा  एक थेंब माणसाला माणुसकीचे नाते जोडायला पुरेसा ठरतो.

माणूस जेव्हा  एकटा  असतो ना तेव्हा  अनेक ताणतणाव, चिंता, काळजी, क्लेश, उलट सुलट विचार यांनी स्वतःच वादाच्या भोवऱ्यात  अडकतो. प्रश्नांचे  आवर्त चक्रीवादळाप्रमाणे मनात घोंघावत  असताना कुणीतरी येतो, केलेल्या कामाची पावती देतो,  अपयश आले  असल्यास धीरान परीस्थिती हाताळण्याचा सल्ला देतो तेव्हा ही व्यक्ती देवदूत वाटते. तिन दिलेला दिलासा मनाला  उभारी देतो. मन मोकळे होते. जाणिवा नेणिवांच्या मोकळ्या  अवकाशात सृजनशील विचारांची पेरणी  आपल्याला  आपल्या ध्येयाकडे घेऊन जाते.

समाजपारावर बारमाही बरसणार्‍या प्रापंचिक तक्रारी या मोसमात दूर होतात.  आषाढ महिन्यात पावसाचे आगमन चराचराला चैतन्य बहाल करून जाते. हिरवा शालू  धरतीला सुजलाम सुफलाम करून जातो. बळीराजान केलेल्या कष्टाच सार्थक होत. पाण्याने भरलेले ढग  असो,  किंवा भरून  आलेले मन  असो बरसून गेल्यावरच बरे वाटते.

गरमागरम चहा, कॉफी, किंवा गरमागरम भजी पावसाळ्यात त्याचा  आस्वाद घेण्याची लज्जत  अवर्णनीय आहे.  पाऊस हा शब्दच मनात चलबिचल सुरू करतो. पावसाळ्यात भिजण्याची मजा  आणि पावसाच्या पाण्यात भिजवून ठेवलेला ताणतणाव माणसाला माणूस करतो. स्नेहाचा  ओलावा भावभावना सांभाळून  एकमेकाच्या काळजात रूजतो आणि सुखसमृद्धीची सुगी आकारास येते.

हा पाऊस खर तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय.  टाळताही येत नाही  अन सांगताही येत नाही  असा विषय. तरीही हा पाऊस प्रत्येक जण आपापल्या परीने  अनुभवीत रहातो.  आबाल वृद्धांना आकर्षित करणारा हा पाऊस कवी, कवयित्री चे हळवे व्यासपीठच. मनातल्या भाव भावना शब्दात व्यक्त करताना  आठवणींच्या सरी झरू लागतात आणि साहित्य जन्माला येते. सारे शब्दालंकार व नवरस घेऊन शब्द सरी कोसळत असताना माणूस व्यक्त होतो. कलाकार आणि रसिक एकमेकांना भेटण्याचा हा सोहळा  आकाश  आणि धरतीच्या मिलना इतकाच सुंदर, पवित्र  आणि शब्दातीत आहे.

कथा, कादंबरी, कविता, लेख, नाटक यातून बरसणार्‍या  पावसाने शारदीय  सारस्वतात  अनोखे दालन निर्माण केले आहे. बालकविता पावसाशिवाय अपूर्णच आहेत. पाऊसावर कविता न करणारा कवी, कवयित्री जसे दुर्मीळच तसाच पाऊस न आवडणारी, पावसात न भिजलेली व्यक्ती दुर्मीळच.

सृष्टी चक्रात महत्त्व पूर्ण  असलेला हा पाऊस  अतीवृष्टी आणि दुष्काळ  या दोन्ही रूपातून दर्शन देतो. त्याला हवा तेव्हा येतो. हवा तसा कोसळतो. चराचरात सामावतो. माणसाच्या मनात  आणि निसर्गाच्या कणाकणात सामावणारा पाऊस समाज पारावर असाच चघळत रहावा कधी चेष्टेतून, कधी नाष्ट्यातून  तर कधी सुजलाम सुफलाम  अशा शेतीप्रधान राष्टातून.

 

मेघ नभीचे मनी दाटले

झालो मी साकार.

नभवलयी या शब्दपाखरे

दिसती काव्याकार. . . !

 

ये कविते ये,  अलगद  ओठी

स्थान तुझे स्विकार. . . . !

 

नभवलयी या ,ऋतू पाखरे

करती स्वैराचार .

झाड  होऊनी थांब नभी तू

सृजन ते स्विकार. . . . !

 

ये कविते ये,  अलगद  ओठी

स्थान तुझे स्विकार. . . . !

 

नभवलयी या, रंग फुलांचे

प्रतिभेचा दरबार.

कुंचल्यातुनी रंगव सारे

मनातले सरकार. . . !

 

ये कविते ये,  अलगद  ओठी

स्थान तुझे स्विकार. . . . !

 

नभवलयी या पाऊस धारा

अपुली जीवनाधार

देण्या जीवन कृष्ण घनातून

घे नवा अवतार. . . . !

 

ये कविते ये,  अलगद  ओठी

स्थान तुझे स्विकार. . . . !

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख – ☆ खाकीतली आई ☆ – सौ संगीता अजित माने

सौ संगीता अजित माने

 

(मराठी साहित्यकार सौ संगीता अजित माने जी का e-abhivyakti में स्वागत है। महाराष्ट्र पुलिस में सेवारत होते हुए अपने अतिव्यस्त कार्य प्रणाली के साथ परिवार, साहित्य एवं समाज सेवा में सामंजस्य बनाना इतना आसान नहीं है। हम सौ संगीता जी के इस जज्बे का सम्मान करते हैं। वे हम सब के लिए भी अनुकरणीय हैं। हम श्रीमती रंजना  मधुकरराव लसणे जी  के आभारी हैं, जिन्होने सौ संगीता अजित माने जी जैसी प्रतिभाशाली साहित्यकार की रचनाओं को हमारे पाठकों से साझा करने का अवसर दिया।)

संक्षिप्त परिचय 

सौ संगीता अजित माने , म पो हे काॅ सातारा

साहित्य 

  • छंद कविता/कथा लेखन संगीत समाजसेवा
  • सन २०१८ महिला दिन निमित्ताने कै वामनराव बोर्डीकर इंग्लीश स्कूल जिंतूरने उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित केले
  • सन २०१९ मशाल न्यूज नेटवर्क आयोजित युट्युब चॅनेल ने आयोजित काव्य स्पर्धा पर्व दुसरे तृतीय क्रमांक विजेता पुरस्कार
  • व्हाट्सएप चे विविध साहित्यिक समुहातील स्पर्धा मध्ये सर्वोत्कृष्ट ते लक्षवेधी पर्यंत ७८६ प्रमाणपत्र
  • सन २०१९ माहुर काव्य संमेलन काव्यसखी पुरस्काराने सन्मानित
  • २ जून २०१९ रोजी काव्यस्पंदन तर्फे महाराष्ट्र भुषण अष्टपैलू कामगिरी पुरस्कार सन्मानित
  • विविध समुहात परिक्षण करीता पुरस्कार प्राप्त
  • पोलीस दला मध्ये विविध कामगिरी बक्षीसे

समाजसेवा

  • ३४ लग्न विनामोबदला जमवली तसेच २ कन्यादान करुन दिली

 

☆  ससममान प्रस्तुत है सौ संगीता अजित माने जी का आलेख “खाकीतली आई”। ☆     

☆ खाकी वर्दी  में माँ की विवेचना कोई खाकी वर्दी में सेवारत माँ ही कर सकती हैं।  ☆   

 

? खाकीतली आई ?

 

*खाकीतल्या आईचा*

*रडी भुकेन घरी तान्हा*

*कर्तव्याला बांधलेने*

*ती तिथेच जिरवी पान्हा*

“आई” उच्चारता हा शब्द प्रत्येकाच्या समोर उभी राहते त्याच्या मातेची प्रेमळ छबी .तीने मुक्तपणे केलेली प्रेम बरसात छोट्या मोठ्या संकटात झालेली आपल्या समोरची ढाल आणि आपल्या सुखासाठी ती तहहयात करीत असलेला त्याग.

खाकीतली आई ही अगदी तशीच असते . उदरी जाणवता पहिला श्वास बाळाचा इतर आई सारखीच ती सुखावते मनात आनंदाचे भरते आले तरी एक पोलीस म्हणून तीला कराव्या लागणार्‍या ड्यूटीचा गर्भास काही त्रास तर होणार नाही या कल्पनेने धास्तावते खाकीतली आई. आई म्हणून तीच धास्तावण इथुनच प्रारंभत .

गर्भधारणेनंतर होणाऱ्या उलट्या चक्कर थकवा तीला ही निसर्ग नियमाप्रमाणे होत असतोच पण नोकरीत रोजरोज कोण रडगाणे ऐकणार म्हणून कोणताही सबब न  सांगता ती नेमली नोकरी करत राहते. नोकरी करत करत दिवस लागतात संपू आठव्या नवव्या महिन्यात तर पोटाचा आकार व भार याचा त्रास कितीही झाला तरी ती रजा काढत नाही कारण ती रजा तीला बाळासाठी त्याच्या जन्मानंतर त्याच्या संगोपनासाठी घालवायची असते.

सन 2006 च्या आयोगाने शासकीय नोकरदार महिलांना सहा महिने बाळंतपणाची रजा देवू केली फार चांगला निर्णय होता तो. त्यापुर्वी तीन महिन्यांतच   बाळाला घरी सोडून मातेस नोकरी वर याव लागे कार्यालयीन कामकाज करणार्‍या महिला ठराविक कार्यालयीन वेळेनंतर बाळाला वेळ देवू शकतात पण पोलीस असणाऱ्या महिलांचे तसे नसते आरोपीपार्टी कायदा व सुव्यवस्था  बंदोबस्त मंत्री दौरा बंदोबस्त या  अनियमित काल असलेल्या दैनंदिन नोकरी ती नाकारुच शकत नाही. अंगावर पुरेसे दुध असताना ही ती बाळाला स्तनपान  करु शकत नाही अस ही म्हणता येईल की,स्तनपान बाळाचा हक्क ती त्याला देवु शकत नाही.  नोकरीवर असताना आलेला पान्हा तीच्या वर्दीवर वाहुन जातो त्यावेळी सहपुरुष कर्मच्यार्यानां तो दिसु नये ही स्त्रीसुलभ लज्जा तीच्या मनात येते त्या वेळी होणारी तीची तारांबळ आणि वाटणारी लाज याने खाजिल होते ती . घरी बाळाला सांभाळायला कोणी असेल तर ठिक पण नसेल कोणी तर अजूनच समस्या पाळणाघरात ठेवले तरी पाळणाघराची ठराविक वेळ संपल्यावर रोज बाळाला कुठे ठेवायचे कोण आपल्या बाळाला संभाळेल एक नाही हजार प्रश्नांचा पाठपुरावा ती करत असते कधी कधी तर बाळाची रांगणे चालणे बोलणे पहिली बाललीला पाहणे तीच्या वाट्याला येत नाही हे फक्त एक आईच समजू शकते  त्या बाळलीला पाहणे तीच्यासाठी किती आनंदायक क्षण असतो जो तीच्या ह्रदयावर कायमचा कोरला जातो.

मुले शाळेत जात असतील भुकेने व्याकुळ होऊन येतात घरी, मायेने गरम गरम खाऊ घालणारी आई नसते त्यांच्या नशिबी  गृहपाठ कर,  लांब खेळायला जावु नको इत्यादी सुचना फोनवरच देत असते खाकीतील आई  शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम किंवा पालकसभा नाही वेळ देवू शकत. एवढच काय तापाने फणफणलेल्या मुलाला ठेवून तीला नोकरीवर हजर राहावे लागते. नोकरीमध्ये शरीर करत असते नोकरी मन मात्र मुलांभोवती पिंगा घालत असते.

धावत असते ती रात्र दिवस संसार आणि नोकरीच्या तालावर या दोन्ही मध्ये तीच ती स्वअस्तित्वच विसरते फक्त चालू असते तीची कसरत घर घरातील माणसे नातेवाईक सणवार समारंभ  आजारपण यांना जपुन प्रामाणिकपणे नोकरी करते.

खाकीतली आई तरीही सगळीकडे दुर्लक्षित असलेली.

 

© सौ संगीता अजित माने ✍

*सातारा*

*७०५७८०८४४८*

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ देवा होऊ कशी उतराई ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झालक  देखने को मिलती है। हम भविष्य में आपके उत्कृष्ट साहित्य की अपेक्षा रखते हैं। आज प्रस्तुत है उनका आत्मकथ्य “देवा होऊ कशी उतराई”।) 

 

देवा होऊ कशी उतराई

 

आज वळून मागे पहाताना मला दिसतंय की, भगवंताने मला जन्मल्यापासूनच किती भरभरुन दिलंय.

जन्म पिता रामचंद्र माता सरस्वती यांच्या पोटी. आजी राधा माझी प्रियतमा.काका काकू ज्यांनी जन्म दिला नसला तरी मातपित्यापेक्षाही उच्च प्रेम व संस्कारांनी वाढवलं. शिकवलं अतिशय मायेनं पालनपोषण करुन लग्न करुन देऊन पुढे माझं बाळंतपण, माझ्या मुलांनाही तितक्याच मायेनं किंबहुना त्यापेक्षा जास्त. वाढवलं संस्कारित केलं.

माझ्या लहानपणी मी काका काकूंकडे म्हणजे आम्ही सर्वच भावंडं वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून काकू म्हणजे माईकडेच वाढलो. काका म्हणजे आण्णा तालुक्याच्या गावी तालुकामास्तर म्हणून सेवेत होते. त्यामुळे आमचं शिक्षण त्यांचेकडेच झालं. किंबहुना त्या‌दोघांमुळेच झालं.

खेड्यात राहूनही आमच्याकडून बोलताना लिहिताना उच्चार चुकले तर ओठावर फट्कन् आण्णांची दोन बोट उमटायची. त्यामुळे बाळपणापासूच वाणी शुद्ध झाली.

पहाटे चार वाजता आम्हा भावंडांना  उठवून काही व्यायाम व अभ्यास याची सवय बाळपणापासूनच लागली. आजही वयाच्या पंच्याहत्तरीत मी पहाटे उठून नियमित व्यायाम प्राणायाम,आता अध्यात्मिक अभ्यास,लिखाण व कविता करते.

भाषा समृद्ध होण्याचे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे मला सुदैवाने शालामाऊलीही अत्यंत चांगली लाभली. न्यू इं.स्कूल सातारा. या माझ्या शाळेत मला सर्वच विषयाचे शिक्षक अतिशय भले भेटले. संस्कृत या माझ्या अत्यंत आवडत्या विषयाला पू. गुरुवर्य आपटीकर लाभले. संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होतेच परंतु बऱ्याच पौराणिक ग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला होता. त्यांच्यामुळे माझं संस्कृत विषयाचं ज्ञान उत्तम झालं. आयुष्यात मला त्यांचा खूप मोलाचा उपयोग झाला. आजही मी माझ्या नातवंडांनाच नाही तर शेजारच्या मुलांनाही संस्कृत शिकवते, मार्गदर्शन करते.कारण ती देवभाषा आहे सर्वांना ती माहिती असणे आवश्यक आहे. असा माझा दृढ विश्वास आहे.

©®उर्मिला इंगळे, सातारा 

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? रंजना जी यांचे साहित्य #-6 – प्राथमिक शाळेतील समस्या ? – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। अब आप उनकी अतिसुन्दर रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनका एक आलेख   “प्राथमिक शाळेतील समस्या” जो प्राथमिक शालाओं की समस्याओं एवं शिक्षकों  के दायित्व की विवेचना करता है। उनके जीवन में उनके प्रत्येक विद्यार्थी की शिक्षा का कितना महत्व है,आप  यह आलेख  पढ़ कर ही जान सकेंगे। मैं ऐसी शिक्षिका और उनकी लेखनी को नमन ही कर सकता हूँ। )

 

? साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #-6 ? 

 

? प्राथमिक शाळेतील समस्या ?

 

*शिक्षणाचा लावी लळा

माझा गुरूजी सावळा।

कलागुणांचा सोहळा

बाल गोपाळांचा मेळा*

अशा आमच्या गुरूजींच्या खांद्यावर शिक्षणाची धूरा अगदी गुरूकुल परंपरे पासून  आजपर्यंत समाजाने सोपवली आहे.

याच समाजाने गुरूला ब्रह्मा विष्णू महेशाचीही उपमा दिलेली.

विद्यार्थी जीवनात,अगदी विधात्या प्रमाणे विद्यार्थ्यांच्या उत्पत्ती, स्थिती व लय निर्मितीचे अधिकारच समाजाने आपल्याला दिलेले आहेत. आपण विद्यार्थ्यांचे भाग्यविधाता आहोत या भूमिकेतून जर आपण सर्व अडचणींकडे पाहिले तर निश्चितच सर्व अडचणी क्षुल्लक वाटायला लागतील .कारण भाग्य विधाता ही उपाधी सर्व अडचणीवर मात करण्याची स्फूर्ती नक्कीच देऊन जाते.

*माझा एक विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहिला म्हणजेच मी एक आयुष्य लयाला नेले* ही जाणीव जेव्हा आपल्याला होईल तेव्हा शिक्षकांना कुठली अडचणच दिसणार नाही. मुख्य म्हणजे शाळेतील मुलं ही माझी मुलं आहेत ही भावना ज्या दिवशी  निर्माण होईल, त्या दिवशी आपोआपच त्यांच्या संबंधातील सारे हक्क आणि कर्तव्य आपोआपच माझ्याकडे असतीलच यात तिळमात्र  शंका नाही. तेव्हा आपण आज समोर बसलेली माझीच मुले  आहेत असे गृहीत धरून अडचणींकडे  पाहू या म्हणजे  त्यांच्या सर्व समस्या माझ्या होतील  आणि माझी समस्या कितीही कठीण असेल तरीही मी ती सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ असेन कारण मुलं माझी आहेत ही भावना खूप महत्त्वाची आहे. जर क्रांतीज्योती सावित्रीबाईंना  दीडशे वर्षापूर्वी याहून कठीण समस्या कुठल्याही मदती शिवाय सोडवायला कठीण वाटल्या नसतील तर तिच्या लेकींना 21व्या शतकात त्या इतक्या कठीण का वाटाव्यात हा विचार केला की समस्या क्षुल्लक वाटायला लागतात, मार्ग नकळत सापडायला लागतात.

*विधाता बनने निश्चितच सोपे काम नाही*.

मग अडचणीच सोप्या दिसायला लागतील.

पालकांचे दारिद्रय, अज्ञान, अंधश्रद्धा, पालकांचे स्थलांतर, लहान भावंडे सांभाळणे, घरकाम करणे, इ.अडचणी

तर अपुऱ्या शालेय सुविधा, शैक्षणिक साधनांचा अभाव, अपुरे खेळाचे मैदान नियोजनाचा अभाव, अधिकाऱ्यांचा दबाव, अपुरे विषय ज्ञान, शिक्षक पालक संबंधातील तफावत, शिक्षकातील मतभेद, समाज व शाळा यांच्यातील दरी अशी अनेक कारणे गुणवत्ता विकासात अडसर निर्माण करतात परंतु कुशल शिक्षक  मनाचा पक्का निर्धार करून यातून योग्य मार्ग नक्कीच काढू शकतो यात यत्किंचितही शंका नाही. फक्त माझी 100% देण्याची तयारी हवी.  आणि जो भरभरून देतो त्याला मागण्याचा नक्कीच  हक्क असतो आणि तो कोणी  नाकारू शकत नाही, आणि खरंतर विद्यार्थी आणि पालक यांचे प्रेम जिव्हाळा आपुलकी यात तो नकळत आकंठ बुडालेला असतो.  चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला  गुणवत्ता विकाचा एक दृढ निश्चय घेवून सकारात्मक सुरुवात करूयात

 

अडचणीवर करू मात

धरून बालकांचे हात।

 ज्ञान दानाचा वसा घेत

सरस ठरूया गुणवत्तेत।

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ कौमार्य चाचणी… अमानुष पद्धत.. ☆ – सुश्री आरुशी अद्वैत

सुश्री आरुशी अद्वैत

 

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी  (सुश्री आरुशी अद्वैत जी ) का  एक सामाजिक कुप्रथा पर आधारित  आलेख। इस आलेख में उद्धृत निष्पक्ष विचार सुश्री आरुशी जी के व्यक्तिगत विचार हैं।  हम किसी भी सामाजिक कुप्रथा  जो  संविधान , समाज अथवा व्यक्ति की मनोभावना व वैचारिक स्वतन्त्रता  तथा आत्मसम्मान के विरुद्ध हो उससे कदापि सहमत नहीं हैं।   )

 

☆ कौमार्य चाचणी… अमानुष पद्धत.. ☆

 

लग्न झाले की नवऱ्या मुलीला ही चाचणी करावीच लागते, ह्यातून सुटका नाही… कंजारभाट समाजातील ह्या घृणास्पद रितिरिवाजावर काल करम प्रतिष्ठान तर्फे चर्चासत्र आणि विषयाधारीत कवितावाचन ठेवण्यात आलं होतं…

तिथे लीलाताई इन्द्रेकर ह्यांच्याकडून जी माहिती मिळाली ती ऐकल्यावर मन विषण्ण झालं, सुन्न झाले… काही वेळा अंग थरथरायला लागलं, तर कधी दगडासारखं घट्ट बनलं, तर कधी पोटात ढवळाढवळ होऊ लागली.. एकंदरीत काय रितिरिवाजांमधील फोलपणा समोर येत होताच, त्याचबरोबर त्यातील भीषणता अस्वस्थ करून मनाला डागण्या देत होते… नुसतं ऐकून आमची ही अवस्था झाली होती, तर ज्या मुलींना ह्या पद्धतीला नकार देता येत नाही आणि सगळं निमूटपणे सहन करायला लागत असेल त्या मुलींना, स्त्रियांना ह्या राक्षसी वृत्तीच्या पुरुषांची चीड आल्याशिवाय राहत नसेल… जे जे ऐकलं ते इतकं भयंकर आहे की लिहितानासुद्धा अंगावर काटा येतोय आणि लिहिण्याचं धैर्य तर अजिबात नाही…

कौमार्य चाचणी घेताना मुलीवर, तिच्या कुटुंबियांवर जे दडपण, दबाव टाकला जातो, त्यामुळे लग्नानंतर सुरू होणाऱ्या नाजूक, कोमल नात्याबद्दल स्वप्न पाहणं तर दूरच, पण ह्या चाचणीमुळे जो मनस्ताप सहन करावा लागत असेल ते शब्दात सांगणे कदापि शक्य नाही… दुर्दैवाने जर ही चाचणी फेल गेली तर त्या मुलीचे आणि कुटुंबाचे हाल हाल केले जातात, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो, अगदी जीवनावश्यक गोष्टीही पुरवल्या जात नाहीत, मुलीला मारहाण, तिचा छळ, ह्याची परिसीमाच… मुलीला शंभर लोकांसमोर उत्तरे द्यावी लागतात… बिचारीची धिंड काढायची बाकी असते… हे सगळं तिच्या इच्छेविरुद्ध घडत असतं, आणि तिला कोणीच एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून मदत करायला तयार नसतं… सगळं चव्हाट्यावर आणून तिला दोषी ठरवून तिच्यावर अत्याचार करतात, आणि ह्याला कोणीच विरोध करत नाही, करण जात पंचायत जे सांगेल ते बरोबर ह्या अंधश्रद्धेच्या आंधळ्या कुबड्यावर चालणं इथल्या पुरुषांना सोपं वाटतं, शिवाय जमातीत राहायचं आहे तेव्हा जमातीच्या नियमांना डावलण्याचं धाडस नसतं किंवा सोयीस्कर रित्या हे धाडस गुंडाळून ठेवलं जातं… देशातील कायद्याला धाब्यावर बसवून जात पंचायत फक्त त्यांचा इगो आणि सो कॉल्ड पद भूषवण्यात धन्यता मानतात… चर्चासत्रातून असेही निदर्शनास आले की ही पद्धत फक्त कंजार भाट समाजात नसून, इतर अनेक उचचभृ समाजातही पाळली जाते…

आज एक स्त्री म्हणून मी देवाचे आभार मानते की त्याने माझ्यावर अशी वेळ कधीच आणली नाही, तरी माझ्या तक्रारी संपत नाहीत, ह्या अवस्थेतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे… जणू दुःखाची काय किंवा सुखाची व्याख्या पडताळून पाहणे आवश्यक आहे…

इंटरनेट वर search केलं तर ह्यावर इथांभूत माहिती मिळेल.

सध्या ह्याच समाजातील काही तरुणांनी ह्या अमानुष रूढी परामपरेविरुद्ध आवाज उठवला आहे, त्यात विवेक तामचीकर आणि त्यांच्या पत्नी ऐश्वर्या भात ह्या लढ्याला सुरुवात केली आहे, शिवाय लीलाताई इन्द्रेकर ह्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत, हे कार्य करणाऱ्या , मुलांना त्यांच्याच समाजातूनच अनेकविध लोकांकडून धमक्या येतात, तरी ही लोकं आता थांबणार नाहीत, हे नक्की.. ही अमानुष रीत समूळ नष्ट करण्यात देव त्यांच्या प्रयत्नांना यश देवो, हीच प्रार्थना…

ह्या विषयावर कविता लिहायचं आव्हान पेलणे खूप अवघड गेले, मी एक स्फुट लिहायचा प्रयत्न केला, ते पुढे मांडते आहे…

 

लग्नाला नक्की या हं…

आणि हो, आहेर अजिबात स्वीकारला जाणार नाही…

तुमचे शुभाशीर्वाद हाच मोठा आहेर…

 

हे माझ्याही लग्न पत्रिकेवर छापलेलं पाहून थोडासा दिलासा मिळाला…

 

आई बाबांना हे पटवून देणं खरंच कठीण गेलं की

भेटवस्तूंची प्रथा मोडून

सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज कशी जास्त आहे… !

 

प्रत्येक वस्तू खरेदी करताना

तिचा योग्य वापर, फायदे, नुकसान

ह्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि गॅरंटी / वॉरंटी,

ह्याची खातरजमा झाली की,

ती वस्तू खरेदी होते, हो ना !

 

आई, थोड्याच दिवसात ह्या लग्नाच्या दुकानात तू प्रेमाने, वात्सल्याने वाढवलेल्या,

ह्या संस्कारित मांसाच्या गोळ्याची अवस्था होणार आहे…

रुखवतात मांडलेल्या अनेक वस्तूंप्रमाणे माझी स्थिती होईल…

पीस खराब निघाला तर रिप्लेसमेंटही होईल कदाचित…

 

नाही म्हणजे स्वप्नरूपी माप ओलांडताना,

प्रेमाचे, लाडाचे, कौतुकाचे शब्द,

दुसऱ्या दिवशी पहाट झाल्यावर,

बहरू पाहणाऱ्या नात्याला नजर लागू नये म्हणून,

रक्ताच्या टिक्याने सुरक्षित करून,

आनंदाने स्वीकारतील, ही गॅरंटी मिळवण्यासाठी,

सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे…

 

तेव्हा,

लग्नाला नक्की या हं…

आणि हो, आहेर अजिबात स्वीकारला जाणार नाही…

तुमचे शुभाशीर्वाद हाच मोठा आहेर…

 

© आरुशी अद्वैत

Please share your Post !

Shares