बूट चप्पल शिवणारा चांभार, बागायती शेती करणारा-वृक्ष लावणारा माळी. !
आणि लढाई लढणारा क्षत्रिय. !
आलं का काही डोस्क्यात.. ?
आरं काम म्हणजे जात.
आणि सर्वात महत्त्वाचे वरीलप्रमाणे कामे आता कुठल्याही एका जातीचीच व जातीसाठी राहिली नाहीत.
आता शिक्षणाने व्यवसाय प्रत्येकाचे बदलले आहेत.
आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला……
आता इंजीनीयर ही नवी जात.
कॉम्प्युटर, केमिकल ही पोटजात.
“सी. ए” ही पण जात,
तर
“एम. बी. ए” ही नवी जात.
डॉक्टर ही पण जात
तर वकीलही जातच
तर “शिक्षण” व “माणुसकी” हाच खरा धर्म.
बदला की राव कवाचं तेच धरुन बसलात!
घरीच दाढी करता नवं? … तेव्हा तुम्ही न्हावी होता
बुटाला पालीश करता नव्हं?…. तेव्हा तुम्ही चांभार होता
गैलरी टेरेसवर झाडे लावता ना ! बगीचा करता …. तेव्हा तुम्ही माळी होता
घरच्या घरीच पुजा-अर्चा करता नव्ह?.. , , तेव्हा ब्राम्हण पण होताच की ?
आरं कामानं मोठं व्हा जातीनं न्हाय !
आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला, हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय?
मंग कशाला उगीचच बोंभाटा करता राव ?
तुम्ही शहरात/खेडेगावात राहत असाल.. तुम्ही आजारी पडल्यावर/अडीअडचणीला मदतीला सगळ्यात आधी धावून येतो तो तुमचा शेजारी/मित्र आणि तो तुमच्या वरीलप्रमाणे जुन्या जातीचा नसतोच हे मान्य कराल की नाही?
सगळ्याला आता आधुनिक पद्धतीने काम हाय !
सगळ्याला शिक्षण खुले हाय !
खूप शिकायचं काम करायचे !
माता पित्याचे- -गावाचे- जिल्हय़ाचे- राज्याचे- देशाचे नावलौकिक करायचे.
कधीतरी लक्षात घ्या की… ” जात फक्त राजकारणी लोकांनी स्वार्थासाठी जिवंत ठेवली आहे “
लेखक – अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
! पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा?
! दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!
! तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ?
! चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!!
! राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, “मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?”
! राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे.
! राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली, “मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही.
! राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, “तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?
! तिसरी राणी म्हणाली, “मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही.
! आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पुर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ? माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकटं वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले?
! तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तिला अंगभर कपडे नव्हते की, तिच्या अंगावर मुठभर मांस नव्हते कि, दागिने नव्हते.
! ती म्हणाली, “तुम्ही जाल तिकडे येईल. नरकात असो की स्वर्गात, कोणत्याही प्रकारच्या जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचनं आहे.
! राजा थक्कं होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला कि, जीला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, ना पुर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभर काळजी केली. ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे? राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्यागं केला.
! कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला.. ? त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण तरीही एवढा त्याग का केला..
! तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसुन स्वतः आपणच आहोत.
🔸 आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरचं सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.
🔸 आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते, ते आपली मुले, आप्तेष्ट, मित्र थोडक्यात समाज.
🔸 आपली तिसरी राणी, जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे, धन-पैसा आपल्या मृत्युनंतर आपली लगेच दुसऱ्याची होते.
🔸 आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म जे आपण सदभावनेने नि:स्वार्थपणे, आणि विना अहंकाराने केले. जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही, तरीपण जन्मोजन्मी आपल्याबरोबर येतंच असते… !
लेखक : अज्ञात
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मातृदिन” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस “पिठोरी आमवास्या ” म्हणजेच “मातृ-दिन ” आहे.
ह्या दिवशी आई मुलांना वाण देते आणि मुलं आईच्या पाया पडुन आशिर्वाद घेतात ही खरी आपली पारंपारिक परंपरा आहे. आई-मुलाच नातं म्हणजे “वैश्विक नाते “. कारण आई मुलांचे सर्वस्व असते, आई मुलांचे विश्व असते. Mothers Day सेलिब्रेट करण्यापेक्षा पिठोरी आमवस्येच्या दिवशी आईच्या पाया पडावे. खरं तर आई- वडीलांच्या रोज पाया पडणे हे मुलांच कर्तव्य. पण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात ते घडत नाही, त्याची अनेक कारणं आहेत. पण किमान मातृ-दिना निमित्त आपण आपल्या आईच्या पाया पडुन तिचे आशिर्वाद घेऊया. कारण तिच्यासाठी हेच खूप मोठ गिफ्ट असेल❗
श्रावण महिन्यात येणाऱ्या या पिठोरी अमावास्येला कुषोत्पतिनी अमावस्या असेही म्हणतात. तसेच या दिवशी “बैल पोळा ” सण देखील साजरा केला जातो❗
मे महिन्याचा दुसरा रविवार ‘मदर्स डे’ सेलिब्रेट करण्याची विदेशी पध्दत. कार्ड, फुले, केक ई. रेडीमेड भेटवस्तूंच्या माध्यमातून ‘मदर्स डे’ साजरा करतात. पण आपला पारंपारीक ‘मातृ-दिन’ म्हणजे श्रावणी अमावस्येचा दिवस, अर्थात पिठोरी अमावस्या. भारतीय मातृदिनाच्या या संकल्पनेत ‘रेडिमेड’ गोष्टींचा समावेश नसतो. म्हणून पिठोरी पूजनात सर्व काही नैसर्गिक असते.
करडू, तेरडा, गाजरा, पेवा, कललावी सह अनेक प्रकारची रानफुले रानातून आणली जातात. पूजेसाठी तांदळाऐवजी वाळू वापरतात, दिवेही पिठाचे बनवतात, घरातील मुलगा पिठोरीचे पूजन मांडतो. त्या वेळी हातात लव्याचा (लव्हाळे )कडा आणि आंगठी घातली जाते. केळी आणि काकडीचा प्रसाद दाखवला जातो. धातूच्या ताटाऐवजी केळीच्या पानांचा नैवेद्यासाठी आणि पंगतीसाठी उपयोग करतात. खिरीचा नैवेद्य असतो….. सर्व काही स्वकष्टाचं आणि निसर्गासह भारतीय संस्कृतीला साजेसं. लोकगीते आणि पारंपारीक फेऱ्यांचा नाच करून रात्र जागवतात❗
विशेष करून आगरी कोळी समाजात हा ‘मातृ-दिन’ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कारण हा समाज पूर्वी ‘मातृसत्ताक’ होता. आईच्या गौरवार्थ अनेक सण आणि उत्सव या समाजात असतात याचे आश्चर्य वाटायला नको. आगऱ्यांच्या प्रत्येक गावी गावदेवीच्या रूपात आईचे मंदिर असते. गावोगावी आईच्या जत्रा मोठ्या उत्साहात होतात❗
रेडिमेड वस्तू भेट देवून साजऱ्या होणाऱ्या ‘मदर्स डे’ पेक्षा आपला पारंपरिक ‘मातृ-दिन’ जास्त अर्थपूर्ण वाटतो. ‘मदर्स डे’ जरूर साजरा करा … पण ‘मातृदिन’ विसरू नका.
“पिठोरी आई ” सर्वांना सुखासमाधानात ठेवो ‼
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
उदा. एका शर्टाला इस्त्री करणे, कपाटात पुस्तकं नीट लावणे, टिव्ही स्वच्छ पुसणे, सुरेख कांदा चिरणे… अट एकच ते काम तुम्ही मन लावून आपल्याला जितकं चांगलं येतं तितकं चांगल करायचं आहे. बिनचूक… दिसायला सुंदर… !
आता ते काम झाल्यावर आतून जे वाटतं ते अनुभवा, तो असतो आनंद. कधीकधी पहा आपण स्वतःशीच हसतो सुद्धा. आपण थोडं मागे जातो, कामाकडे पहातो आणि आपण खूश होतो. घर आवरल्यावर स्त्रिया घरभर नजर फिरवून तृप्त होतात किंवा आपली कार धुऊन चकचकीत झाल्यावर पुरुष पहात बसतात.. ! लहान मुलं तर काही तयार केल्यावर नाचतातच… !
हे काय आहे ? हा आनंद आतून येणारा… आतल्या चैतन्याला काम आवडल्याचा… !
हा आनंद बेस्ट मोटिवेशन आहे. बाहेर काही शोधायची गरज नाही. मला हा सापडलाय. सुरुवातीला हा आनंद खूप सुक्ष्म असतो; पकडावा लागतो. एकदा दिसू लागला की वाढत जातो आणि आपण अक्षरशः त्यात भिजून जातो. करायचं काय ? तर वरील पध्दतीने काम केल्यावर क्षणभर थांबायचं आणि आत कसं वाटतंय ते पहायचं, अनुभवायचं; मग दुस-या कामाकडे जायचं.
सकाळी उठल्या उठल्या आपण जे पांघरुण घेतलं होतं त्याची सुंदर सुबक घडी करा, आणि शेवटी त्यावर हात फिरवताना काय वाटतं ते पहा. पहिली कमाई झाली, आता दुसरं काम.. तिथल्या तिथे मोबदला तिथल्या तिथे बक्षीस… अशी ही अद्भुत यंत्रणा काम करताना पाहून थक्क व्हायला होईल.
मग हेच सुरु ठेवायचं दिवसभर… थकवा गायब… नैराश्य गायब… उदासिनता, मरगळ पळून जाईल… !
आपण काय करतो, कसंतरी करतो. मग आतून काम कसंतरी झालंय, असा फीडबॅक येतो, त्याने आपण दुःखी होतो. आता पुढचं काम करायला ऊर्जा कमी होते. दिवसभर हे कर्ज वाढत जातं.
उदा. सकाळी चादरीची घडी कशीतरी करुन फेकली तर आपल्याला दंड थोडीच भरावा लागणार आहे ? पण आतमधे कोणीतरी असतं ज्याला हे माहीत आहे की चादरीची घडी कशी करतात; तो नापास करतो. असे आपण स्वतःला नापास करत रहातो. मग माझ्यात आत्मविश्वास नाही, मला नैराश्य आहे… ई. ई. तक्रारी आपण करतो.
यापुढे ‘कसंतरी काम करतोय, त्यामुळे आतलं कर्ज वाढतंय’ हे लक्षात येईल. थोडा वेळ दिला तरी चालेल, पण चांगलं काम करायची सवय लावली तर वेळ वाचेल आणि आनंद मिळेल.
‘भरभर कर… काय खेळत बसलाय… चेंगटपणा नको’ असं आपण ऐकतो. गती वाढवणं म्हणजे काम कसंतरी करणं नाही. काम झाल्यावर मस्त वाटलं पाहिजे. कोणी टाळ्या वाजवणारं नसलं तरी आतून त्या आपल्याला ऐकू आल्या पाहीजेत.
काम उत्कृष्ट करुन ह्या आनंदाचं सायन्स अनुभवून आपण दिवसभर उत्साही राहू शकतो. थकवा निराशा टाळू शकतो. आजच्या काळाचे मनोशारिरीक आजार दूर करु शकतो. थकवा आणि आजार म्हणजे हे साठलेलं कर्ज आहे. आनंदच संपलाय करण्यातला !
हवंय एक लहानसं काम पूर्ण… संपूर्ण… आणि सुंदर… आतला आनंद बाहेर आला पाहिजे असं !
लेखिका : सौ. सुजाता शेठ (देसाई)
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈