मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नातं… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ नातं… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

वेळेनुसार माणसं बदलतात..त्यांची  priority बदलते.

नातं बदलतं.. नात्यातले संदर्भही बदलतात.

कधी वेड्यासारखी जीव लावणारी माणसं अचानक अनोळखीसारखी वागायला लागतात.

आपल्याला गृहीत धरल्या जातं.. टाळल्या जातं.

 

हेच त्या नात्यातलं सगळ्यात नाजूक वळण असतं.

इथेच नात्यातले अपघात होतात.

 

कधी कधी वाटतं 

समोरच्याच्या आयुष्यातलं आपलं अस्तित्व आपल्याला ठरवता आलं असतं तर..? 

पण दुर्दैव…असं नाही करता येत.

 

अशावेळी कोण चुकलं यापेक्षा काय चुकलं हे बघावं.

कारण एकमेकांच्या चुका शोधतांना उत्तर तर सापडतं पण माणसं हरवतात.

आपण फक्त अवघड झालेलं सोपं करण्याचा प्रयत्न करावा.

एकदा…दोनदा…..तीनदा…..

आपण आतून संपत नाही तोपर्यंत..करतच रहावा.

 

आणि या सगळ्याला 

अपवाद असलेलं एखादं नातं असतंच …

जे शेवटपर्यन्त कधीच बदलत नाही.

आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर असं कुणीतरी येतं आपल्या आयुष्यात… 

जे घट्ट मिठी मारून सांगतं… 

आयुष्य खूप सुंदर आहे…आणखी थोडं जगुयात ना !

आपल्याला सोपं करतं,

आपल्याला समजून घेतं. 

आपण कायम खास असतो त्यांच्यासाठी.

 

बस तेच मनापासून जपावं 

इतकंच असतं आपल्या हातात —— 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 24 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 24 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

३५.

जिथं मन मुक्त असेल, माथा उन्मत्त असेल,

ज्ञान मुक्त असेल,

 

घरांच्या क्षुद्र भिंतींनी जगाचे तुकडे झाले नसतील,

सत्याच्या गाभाऱ्यातून शब्दांचा उच्चार होईल,

 

अथक परिश्रमांचे हात

 पूर्णत्वाप्रत उंचावले जातील,

 

मृत सवयींच्या वालुकामय वाळवंटात

बुध्दीचा स्वच्छ झरा आटून गेला नसेल,

 

सतत विस्तार पावणाऱ्या विचार

आणि कृती करण्याकडेच

तुझ्या कृपेने मनाची धाव असेल,

 

हे माझ्या स्वामी, त्या स्वतंत्रतेच्या स्वर्गात

माझा देश जागृत होऊ दे.

 

३६.

माझ्या ऱ्हदयातील दारिऱ्द्य्याच्या

मुळावर घाव घाल

 

सुख आणि दुःख आनंदानं सोसायची

शक्ती मला दे.

माझं प्रेम सेवेत फलद्रूप करण्याची शक्ती दे.

 

गरिबापासून फटकून न वागण्याची अगर

धनदांडग्या मस्तवालासमोर शरण न जाण्याची

शक्ती मला दे.

 

दैनंदिन क्षुद्रतेला ओलांडून उंच जाण्याची

शक्ती मला दे आणि

प्रेमभावनेनं तुझ्या मर्जीप्रमाणं तुला शरण

जाण्याची शक्ती मला दे.

इतकीच माझी प्रार्थना आहे!

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काळ जुना होता…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆ 

? वाचताना वेचलेले ?

☆ काळ जुना होता…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆  

काळ जुना होता

अंग झाकायला कपडे नव्हते,

तरीही लोक शरीर झाकण्याचा प्रयास करायचे

आज कपड्यांचे भंडार आहेत,

तरीही जास्तीतजास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरु आहेत

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता, रहदारीची साधने कमी होती.

तरीही कुटुंबातील लोक

भेटत असत .. 

आज रहदारीची साधने भरपूर आहेत.

तरीही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता,

घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती.

आजची मुलगी ही

शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे.

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता, लोकं

गावातील वडीलधार्‍यांची

चौकशी करायचे

आज पालकांनाच

वृद्धाश्रमात ठेवले जाते

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता,

खेळण्यांचा तुटवडा होता.

तरी शेजारची मुलं

एकत्र खेळायची .

आज खूप खेळणी आहेत,

मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता,

रस्त्यावरील प्राण्यांना सुद्धा

भाकरी दिली जायची

आज शेजारची मुलंही

भुकेली झोपी जातात

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता,

शेजारच्या व आपल्या घरी

नातेवाईक भरलेले असायचे

आता परिचय विचारला तर–

आज मला शेजाऱ्याचे नावही माहीत नाही.

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

 

संग्राहिका – माधुरी परांजपे

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पवित्र -आनंददायी वास्तू ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ पवित्र -आनंददायी वास्तू ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

एका व्यक्तीने व्यवसायात प्रगती करून लंडनमध्ये जमीन विकत घेतली आणि त्यावर आलिशान घर बांधले.

त्या जमिनीवर आधीच एक सुंदर जलतरण तलाव होता आणि मागे 100 वर्ष जुने लिचीचे झाड होते.

 त्या लिचीच्या झाडामुळेच त्यांनी ती जमीन विकत घेतली होती, कारण त्यांच्या पत्नीला लिची खूप आवडत होती.

काही काळानंतर घराचे नूतनीकरण करावे असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना नूतनीकरणाच्या वेळी सल्ला दिला की त्यांनी वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्यावा.

त्यांचा अशा गोष्टींवर फारसा विश्वास नसला तरी, मित्रांचे मन राखण्याचे त्याने मान्य केले आणि हाँगकाँग येथील, वास्तुशास्त्राचे तज्ञ मानले जाणारे प्रसिद्ध मास्टर काओ यांना बोलावले.

काओंना विमानतळावरून नेले, दोघांनी शहरात जेवण केले आणि त्यानंतर ते त्यांना त्यांच्या कारमध्ये घेऊन त्यांच्या घराकडे निघाले. वाटेत जेव्हा एखादी गाडी त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तो त्याला रस्ता देत असे. मास्टर काओ हसले आणि म्हणाले की तुम्ही खूप सुरक्षित ड्रायव्हिंग करता. ते देखील हसले आणि प्रतिसादात म्हणाले की लोक सहसा काही आवश्यक काम असतानाच ओव्हरटेक करतात, म्हणून आपण त्यांना मार्ग दिला पाहिजे.

घराजवळ पोहोचल्यावर रस्ता थोडा अरुंद झाला आणि त्याने गाडीचा वेग बराच कमी केला. तेवढ्यात अचानक एक मूल रस्त्यापलिकडून हसत हसत आणि वेगाने धावत त्यांच्या गाडीच्या समोरून रस्ता ओलांडून गेले.  त्याच वेगाने चालत असताना तो मात्र त्या रस्त्याकडे पाहतच राहिला, जणू कोणाची तरी वाट पाहत होता.  तेवढ्यात त्याच रस्त्यावरून अचानक आणखी एक मूल पुढे आलं. त्यांच्या कारच्या पुढून पळत गेले, बहुधा पहिल्याचा पाठलाग करत असावे. मास्टर काओने आश्चर्याने विचारले -” दुसरे मूलही धावत बाहेर येईल हे तुला कसे कळते?”

ते मोठ्या सहजतेने म्हणाले, “ मुले अनेकदा एकमेकांच्या आगे मागे धावत असतात आणि कोणतेही मूल जोडीदाराशिवाय असे धावत असते यावर विश्वास बसत नाही..”

मास्टर काओ हे ऐकून मोठ्याने हसले आणि म्हणाले की “ तुम्ही निःसंशयपणे खूप स्थिर चित्त व्यक्ती आहात.”

घराजवळ आल्यानंतर दोघेही गाडीतून खाली उतरले. तेवढ्यात अचानक घराच्या मागच्या बाजूने ७-८ पक्षी वेगाने उडताना दिसले. हे पाहून तो मालक मास्टर काओला म्हणाला की, ” जर तुमची हरकत नसेल तर आपण इथे थोडा वेळ थांबू शकतो का? “

मास्टर काओ यांना कारण जाणून घ्यायचे होते. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की,  ” कदाचित काही मुले झाडावरून लिची चोरत असतील आणि आमच्या अचानक येण्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, तर झाडावरून पडून मुलाला दुखापतही होऊ शकते.”

मास्टर काओ काही वेळ गप्प बसले, मग ते संयत आवाजात म्हणाले, ” या घराला वास्तुशास्त्राच्या तपासाची आणि उपायांची गरज नाही.”

त्या गृहस्थाने मोठ्या आश्चर्याने विचारले – का?

मास्टर काओ – ” जिथे तुमच्यासारखे विवेकी आणि आजूबाजूच्या लोकांचा चांगला विचार करणारे लोक उपस्थित/रहात असतील – ते ठिकाण , ती मालमत्ता वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार अतिशय पवित्र-आनंददायी-फलदायी असेल “.

— मित्रांनो, आपले तन आणि मन जेव्हा इतरांच्या सुख-शांतीला प्राधान्य देऊ लागते तेव्हा, इतरांनाच नव्हे तर आपल्यालाही मानसिक शांती व आनंद मिळतो.

जेव्हा माणूस नेहमी स्वतःच्या आधी इतरांच्या भल्याचा विचार करू लागतो, तेव्हा नकळत त्याला संतत्व प्राप्त होते, ज्यामुळे इतरांचे भले होते आणि त्याला ज्ञान प्राप्त होते.

आपणही असे गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्या घराला फेंगशुई किंवा “वास्तू”सारख्या तंत्राची किंवा नवस बोलण्याची गरज भासणार नाही.

संग्राहक : सुनीत मुळे 

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आप्तज ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆  आप्तज ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

अंधार कशामुळे होतो हे कळत नसलेल्या आदी मानवाला रात्र असह्य वाटायची, पण अगदी एक प्रहरात डोळा लागलेला असताना त्याला पक्षाची किलबिल ऐकू यायची, आकाशात पूर्वेला कुणीतरी रंगाचं दुकान थाटलेले असायचं.

काळी रात्र विराट जात असल्याने घाबरलेला आनंदून जायचा. आनंदाने उमाळे फुटत असतानाच सूर्य उगवून लख्ख दिसायचा.

नवा दिवस , एक नवी उमेद , जणू पुनर्जन्म…या उत्साहलेल्या मनाच्या निर्मळ माणसाने सूर्याला नाव दिले मित्र…………अनुभवातून, निसर्गाच्या भव्य रूपातून प्रसवलेली सृजनता.. त्याच्या एकटेपणाचा शाप दूर करणारा नभोमंडलातला प्रदीप्त आप्तज……….किती सुंदर नाव दिले त्या सूर्याला. मित्र….प्रकाश असतो सतेज आणि सतिश ….     …… त्याच्याविना आयुष्य फक्त अंधार…………मैत्री दिनाच्या आभाळभर शुभेच्छा………

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वृद्ध व्यक्तीचा मेंदू ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ वृद्ध व्यक्तीचा मेंदू ☆ संग्राहक – श्री माधव केळकर☆

जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनचे संचालक असा युक्तिवाद करतात की वृद्ध व्यक्तीचा मेंदू सामान्यतः विश्वास ठेवण्यापेक्षा जास्त व्यावहारिक असतो.  या वयात, मेंदूच्या उजव्या आणि डाव्या गोलार्धांचा परस्परसंवाद सुसंवादी बनतो, ज्यामुळे आपल्या सर्जनशील शक्यतांचा विस्तार होतो.  म्हणूनच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये तुम्हाला अशी अनेक व्यक्तिमत्त्वे आढळू शकतात ज्यांनी नुकतेच त्यांचे सर्जनशील क्रियाकलाप सुरू केले आहेत.

अर्थात, मेंदू आता तारुण्यात होता तितका वेगवान राहिलेला नाही.  तथापि, तो लवचिकता प्राप्त करतो .  म्हणून, वयानुसार, आपण योग्य निर्णय घेण्याची अधिक शक्यता असते आणि नकारात्मक भावनांना कमी सामोरे जावे लागते.  मानवी बौद्धिक क्रियाकलापांची शिखरे वयाच्या ७० च्या आसपास होतात, जेव्हा मेंदू पूर्ण ताकदीने कार्य करू लागतो.

कालांतराने, मेंदूतील मायलिनचे प्रमाण वाढते, हा एक पदार्थ जो न्यूरॉन्समधील सिग्नलचा जलद मार्ग सुलभ करतो.  यामुळे, बौद्धिक क्षमता सरासरीच्या तुलनेत 300% वाढतात.

हे देखील मनोरंजक आहे की 60 वर्षांनंतर, एखादी व्यक्ती एकाच वेळी 2 गोलार्ध वापरू शकते.  हे आपल्याला अधिक जटिल समस्या सोडविण्यास अनुमती देते.

मॉन्ट्रियल विद्यापीठातील प्राध्यापक मोंची उरी यांचा असा विश्वास आहे की वृद्ध माणसाचा मेंदू कमी ऊर्जा वापरणारा मार्ग निवडतो, अनावश्यक गोष्टी काढून टाकतो आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी फक्त योग्य पर्याय ठेवतो . विविध वयोगटांचा समावेश करून एक अभ्यास करण्यात आला.  चाचण्या उत्तीर्ण करताना तरुण लोक खूप गोंधळलेले होते, तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी योग्य निर्णय घेतला.

आता, 60 ते 80 वयोगटातील मेंदूची वैशिष्ट्ये पाहू. ते खरोखर गुलाबी आहेत.

वृद्ध व्यक्तीच्या मेंदूची वैशिष्ट्ये.

  1. तुमच्या सभोवतालचे सर्वजण म्हणतात त्याप्रमाणे मेंदूतील न्यूरॉन्स मरत नाहीत.जर एखादी व्यक्ती मानसिक कार्यात गुंतली नाही तर त्यांच्यातील संबंध फक्त अदृश्य होतात.
  2. भरपूर माहितीमुळे विचलित होणे आणि विस्मरण होणे उद्भवते.म्हणूनच, तुमचे संपूर्ण आयुष्य अनावश्यक क्षुल्लक गोष्टींवर केंद्रित करणे आवश्यक नाही.
  3. वयाच्या 60 व्या वर्षापासून, व्यक्ती, निर्णय घेताना, तरुण लोकांप्रमाणे एका वेळी एकच गोलार्ध वापरत नाही, परंतु दोन्हीचा वापर करते.

निष्कर्ष: जर एखादी व्यक्ती निरोगी जीवनशैली जगत असेल, हालचाल करत असेल, व्यवहार्य शारीरिक हालचाली करत असेल आणि पूर्णपणे मानसिकरित्या सक्रिय असेल, तर बौद्धिक क्षमता वयानुसार कमी होत नाही, ती फक्त वाढते , वयाच्या 80-90 व्या वर्षी शिखरावर पोहोचते .

त्यामुळे म्हातारपणाची भीती बाळगू नका.  बौद्धिक विकासासाठी प्रयत्न करा.  नवीन हस्तकला शिका, संगीत बनवा, वाद्य वाजवायला शिका, चित्रे रंगवा ! नृत्य शिका ! जीवनात रस घ्या, मित्रांना भेटा आणि संवाद साधा, भविष्यासाठी योजना करा, शक्य तितका उत्तम प्रवास करा.  दुकाने, कॅफे, शो मध्ये जाण्यास विसरू नका.  एकटे गप्प बसू नका, ते कोणासाठीही विनाशकारी आहे. :” सर्व चांगल्या गोष्टी अजूनही माझ्या पुढे आहेत !” या विचाराने जगा. 

स्रोत: न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन.

ही माहिती तुमच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या 60, 70 आणि 80 च्या दशकातील मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना त्यांच्या वयाचा अभिमान वाटेल 

संग्राहक : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 23 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 23 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

३१.

  “हे बंदिवाना, सांग, तुला कोणी बंदिस्त केलं?”

   बंदिवान म्हणतो, ” माझ्या धन्यानं!”

   “धन आणि सत्ता मिळवून मी

   सर्वश्रेष्ठ होईन, असं मला वाटलं.

   राजाला द्यायचे पैसे मी

   माझ्या तिजोरीत साठवले.

   माझ्या धन्यासाठी

   असलेल्या बिछान्यावर मी पहुडलो.

   जाग आल्यावर मला समजलं…

   मी माझ्याच धनमहालात बंदिवान झालो.”

 

   “हे बंदिवाना, ही अभेद्य साखळी कोणी केली?”

  

   ” मीच ही साखळी अतिदक्षतापूर्वक घडवली.

     वाटलं होतं. . .

     माझ्या अपराजित सत्येनं हे जग

     गुलाम करता येईल

     आणि मी निर्वेध सत्ता उपभोगीन.

     प्रचंड अग्नी आणि निर्दय आघात

     रात्रंदिवस करून ही साखळी मी बनवली.

     काम संपलं.

     कड्या पूर्ण व अभेद्य झाल्या तेव्हा समजलं. .

     मीच त्यात पूर्णपणे अडकलो.”

 

   ३२.

   माझ्यावर माया करणारे

   मला सुरक्षित राखण्यासाठी जखडून ठेवतात.

 

   पण तुझ्या प्रेमाची त‌ऱ्हाच ‌न्यारी

   ते त्यांच्या स्नेहाहून अधिक महान आहे

    कारण तू मला स्वतंत्र ठेवतोस.

 

   त्यांचे स्मरण सतत रहावे

   म्हणून तू मला एकट्याला सोडत नाहीस पण,

   दिवसामागून दिवस गेले तरी तू दिसत नाहीस

 

   माझ्या प्रार्थनेतून मी तुला हाक घातली नाही

   अगर ऱ्हदयात तुला राहू दिले नाही

   तरी तुला माझ्याबद्दल प्रेम वाटतच राहते.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भेट ☆ संग्राहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ भेट☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

” राग ” भेटला 

मला पाहून म्हणाला… 

काय राव, आठवण काढत नाही हल्ली ? 

 

मी म्हणालो अरे नुकताच 

” संयम ” पाळलाय घरात 

आणि ” माया ” पण माहेरपणाला 

आली आहे.. 

 

तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!! 

 

पुढे बाजारात ” चिडचिड ” 

उभी दिसली गर्दीत, खरं तर 

ही माझी बालमैत्रीण पण पुढे 

कॉलेजात ” अक्कल ” नावाचा 

मित्र मिळाला आणि हिच्याशी 

संपर्क तुटला..!! 

 

आज मला पाहून म्हणाली, अरे 

” कटकट ” आणि ” वैताग ” 

ची काय खबरबात ? 

 

मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा.. 

हल्ली मी ” भक्ती ” बरोबर 

सख्य केलंय त्यामुळे 

“आनंदा”त आहे अगदी..!! 

 

पुढे जवळच्याच बागेत 

” कंटाळा ” झोपा काढताना दिसला 

माझं अन त्याच हाडवैर…. 

अगदी 36 चा आकडा म्हणा ना…. 

त्यामुळे मला साधी ओळख 

दाखवायचाही त्याने चक्क ” आळस ” केला..!! 

मीही मग मुद्दाम ” गडबडी ” कडे 

लिफ्ट मागितली आणि 

तिथून सटकलो..!! 

 

पुढे एका वळणावर ” दुःख ” भेटलं, 

मला पाहताच म्हणालं 

” अरे ये, तुझीच वाट पहात होतो ” 

 

मी म्हणालो, “अरे वाट पहात 

होतास की वाट लावायच्या 

तयारीत होतास? –आणि सर्वात जास्त 

तूच  वाट बघतोस की रे माझी 

” तसं ” लाजून ” ते म्हणालं, 

“अरे मी पाचवीलाच पडलो 

( पाचवीला पुजलो ) तुझ्या वर्गात. 

कसं काय सर्व ? घरचे मजेत ना?” 

 

मी म्हणालो, ” छान ” चाललंय सगळं… 

” श्रद्धा ” आणि ” विश्वास ” 

असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात 

त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. 

तू नको ” काळजी ” करूस. 

हे ऐकल्यावर ” ओशाळलं ” 

आणि निघून गेलं..!! 

 

थोडं पुढे गेलो तोच 

” सुख ” लांब उभं दिसलं 

तिथूनच मला खुणावत होतं, 

‘ धावत ये नाहीतर मी चाललो 

मला उशीर होतोय..’  

 

मी म्हणालो, “*अरे कळायला *

*लागल्यापासून तुझ्याच तर मागे *

धावतोय ऊर फुटेपर्यंत, 

*आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट *

झालीय… एकदा दोनदा भेटलास 

पण ‘ दुःख ‘ आणि ‘ तू ‘ साटलोट  

करून मला एकटं पाडलंत .. दर वेळी. 

आता तूच काय तुझी 

” अपेक्षा ” पण नकोय मला. 

मी शोधलीय माझी ” शांती ” 

आणि घराचं नावच 

” समाधान ” ठेवलंय..!

 

संग्राहिका : अंजली दिलीप गोखले 

मो ८४८२९३९०११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भाव , अभाव आणि प्रभाव… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ?

भाव, अभाव आणि प्रभाव …☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

श्रीकृष्ण युधिष्ठिर आणि बलराम दादाच्या आग्रहास्तव कौरवांकडे दूत बनून गेला. जसं रामराया मिथिलेत आल्यावर जनक महाराजांनी सीतेचं सुंदरसदन रिकामं करून रामरायाची निवास व्यवस्था केली होती, त्याचप्रमाणें दुर्योधनाने आपल्या भावाचं, दुःशासनाचं राजभवन सुशोभित करून कृष्णाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. परंतू , श्रीकृष्णाने ते नाकारलं. शिवाय युद्ध टाळण्याची चर्चा निष्फळ ठरल्यावर जेव्हा दुर्योधनाने एक प्रयत्न म्हणून भगवंताला ५६ भोग भोजनाचं निमंत्रण दिलं, तेसुद्धा गोविंदाने नाकारलं….

भगवंताने भोजन नाकारण्याचं जे स्पष्टीकरण दिलं ते फार मार्मिक आहे. गोपाळ म्हणाले, “दुर्योधना, एखाद्याकडचं भोजन घेण्याची तीन कारणे असू शकतात ! —

 १) भाव २) अभाव ३) प्रभाव

१) अन्न देणाऱ्याचा प्रेम भाव

२) भुकेल्याकडे अन्नाचा अभाव

३) भुकेल्याच्या मनात अन्नदात्याबद्दलचा प्रभाव

मुरारी म्हणाला, “दुर्योधना, मला जेवू घालण्यात तुझा प्रेमभाव नसून कपट आहे. मी शिधा सोबत आणलेला असल्याने माझ्याकडे अन्नाचा अभाव नाही. आणि तुझ्या दुराचरणामुळे माझ्या मनांत तुझ्याबद्दल आदरयुक्त प्रभाव नाही. मग तुझे हे ५६ भोग मी का स्विकारावे ? “

लहानपणी घरात भरपूर दूध, दही, लोणी असूनही दुसऱ्याकडे डल्ला मारणारा हा माखनचोर आतासुद्धा सोबत शिधा असतांना दुसरीकडे जेवायला जायच्या विचारात होता.

तेव्हा, द्रोणाचार्य, कृपाचार्य या आदरणीय गुरूजनांनी भोजनाचं निमंत्रण दिलं. परंतू , दुराचारीचा पक्ष धरल्याने कान्हाने त्यांचंसुद्धा निमंत्रण नाकारून त्यांचं गर्वहरण केलं ! आणि मग भगवंतानें विचार केला की, भूक तर लागलीच आहे आणि हे सर्व लोक तर माझ्या भोजनाच्या अनुग्रहाला पात्र नाहीत. परंतु, ब्रम्हज्ञानी, कर्मयोगी आणि अनन्य भक्त असलेला एकजण या राज्यात आहे, तो म्हणजे भक्त विदुर !

मन करम वचन छांड चतुराई ।

तबहि कृपा करत रघुराई ।।

मग काय ! भगवंत विनाआमंत्रण या भक्ताच्या घरी स्वतःहून गेले. परंतू, दैव म्हणा किंवा प्रारब्ध, विदुरकाका बाहेर गेलेले होते. काकू घरी होत्या. आणि ज्या भगवंताची आतापर्यंत भक्ती केली तो प्रत्यक्ष आपल्या दारात उभा पाहून त्या मातेचा कंठ दाटून आला आणि रडत रडतच भगवंताला हाताला धरून बसवलं…

विदुराणी भिजलेल्या डोळ्यांनी हा मुखचंद्र न्याहाळत म्हणाली, ” लाला, अरे दररोज तुझ्यासाठी लोणी-साखर काढून ठेवत होते, तू आलाच नाहीस. आता आलास, पण लोणी-साखर तयार नाही ?”

आणि मग काय सांगू ! या साध्वीने,  आत जाऊन लोणी करत बसले तर भगवंताचा चेहरा नजरेआड होईल, म्हणून मग बाजूला ठेवलेले केळीचे घड घेतले आणि या भावविभोर अवस्थेत केळी सोलून भगवंताला साली भरवू लागली, आणि केळी बाजूला टाकू लागली.

थोड्या वेळाने जेव्हा विदुरकाका आले, तेव्हा परब्रम्ह परमात्मा स्वतः अचानक घरी आलेला पाहून आता काकांनी अश्रूंनी श्रीचरणी अभिषेक घातला. नंतर त्यांना भगवंताला केळीच्या सालांचा भोग चालू पाहून कसंतरी वाटलं आणि मग त्यांनी केळी भरवायला सुरुवात केली. आणि काकांनी विचारलं, ” हे गिरीधर, केळी गोड आहेत ना ?”

एवढा वेळ हे काका काकू रडत होते, आता भगवंताचा गळा भरून आला, अश्रू अनावर झाले. हा गोकुळ नंदन म्हणाला, 

“काका, केळी फार गोड आहेत. परंतू काकूंच्या हातानं जी सालं खाल्ली ना त्याची बरोबरी फक्त माझ्या बालपणी यशोदा मातेने भरवलेल्या लोण्याशीच होऊ शकते. आज मला माझं बालपण पुन्हा जगायला मिळतंय या अमृतसेवनाने “

आणि हे ऐकून पुन्हा तिघांनी अश्रूंचा बांध मोकळा केला. हे तिघं म्हणजे भक्ती, प्रेम आणि ज्ञान ! विदुरकाकांचं परमात्मज्ञान, विदुराणीची निर्लेप, निर्दोष भक्ती आणि भगवंताचं या दोघांवरचं अमर्याद प्रेम ! या तिघांपैकी कोण श्रेष्ठ हे कसं आणि का ठरवायचं ?

भगवंताला साक्षी ठेवून सांगतो, हा भक्ती, प्रेम आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम म्हणजे नाम ! ते नाम जीवापाड जपून कर्तव्याच्या मर्यादा सांभाळाव्या, भगवंत आपल्या घरी यायला, आपल्या हृदयांत साठवायला वेळ नाही लागणार.

।। श्रीगुरुदेवदत्त ।।

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भारतरत्न गुलझारीलाल नंदा ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ भारतरत्न गुलझारीलाल नंदा ☆ संग्राहक – श्री माधव केळकर☆

भाडे न दिल्याने घरमालकाने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले.  म्हाताऱ्याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी, प्लास्टिकची बादली आणि घोकंपट्टी वगैरे शिवाय काहीही सामान नव्हते. म्हातार्‍याने मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली.  शेजाऱ्यांनाही म्हातार्‍याची दया आली आणि त्यांनी घरमालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ द्यायाला सांगितले . घरमालकाने अनिच्छेने त्याला भाडे भरण्यासाठी थोडा वेळ दिला.

म्हातार्‍याने सामान आत घेतले.

तेथून जाणाऱ्या एका पत्रकाराने थांबून सर्व दृश्य पाहिले.  ही बाब आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे उपयुक्त ठरेल असे त्यांना वाटले.  त्याने एक मथळा देखील शोधला, ” क्रूर जमीनदार पैशासाठी म्हातार्‍याला भाड्याच्या घरातून बाहेर काढतो.”..   मग त्याने त्या जुन्या भाडेकरूचे काही फोटो काढले आणि भाड्याच्या घराचेही  काही फोटो काढले.

पत्रकाराने जाऊन आपल्या प्रेस मालकाला घडलेला प्रकार सांगितला.  प्रेसच्या मालकाने चित्रे पाहिली आणि त्यांना धक्काच बसला.  त्यांनी पत्रकाराला विचारले, “ म्हाताऱ्याला ओळखता का? “ पत्रकार नाही म्हणाला.

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोठी बातमी छापून आली.  ” गुलझारीलाल नंदा, भारताचे माजी पंतप्रधान, एक दयनीय जीवन जगत आहेत.” असे शीर्षक होते.  या बातमीत पुढे लिहिले होते की, माजी पंतप्रधान कसे भाडे देऊ शकले नाहीत, आणि त्यांना घरातून कसे हाकलून देण्यात आले.  आजकाल फ्रेशर्सही भरपूर पैसे कमावतात, अशी टिप्पणीही  केली गेली.  तर दोन वेळा माजी पंतप्रधान राहिलेल्या आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःचे घरही नाही.

वास्तविक गुलझारीलाल नंदा यांना रु.  500/- प्रति महिना भत्ता उपलब्ध होता.  मात्र आपण स्वातंत्र्यसैनिकांच्या भत्त्यासाठी लढलो नसल्याचे सांगत त्यांनी हे पैसे नाकारले होते.  नंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना असे सांगून भत्ता स्वीकारण्यास भाग पाडले की मुळात त्यांना दुसरे कोणतेही स्त्रोत नाही.  या पैशातून ते  घरभाडे देऊन गुजराण करत असत .

दुसऱ्या दिवशी विद्यमान पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाहनांच्या ताफ्यासह त्यांच्या घरी पाठवले.  एवढ्या व्हीआयपी वाहनांचा ताफा पाहून घरमालक थक्क झाला.  तेव्हाच त्यांना कळले की त्यांचे भाडेकरू श्री गुलझारीलाल नंदा हे भारताचे माजी पंतप्रधान होते.  घरमालक त्यांच्या गैरवर्तनाबद्दल लगेच गुलझारीलाल नंदा यांच्या चरणी नतमस्तक झाले.

अधिकारी आणि व्हीआयपींनी गुलझारीलाल नंदा यांना सरकारी निवास आणि इतर सुविधा स्वीकारण्याची विनंती केली.  गुलझारीलाल नंदा यांनी, ‘या वृद्धापकाळात अशा सुविधांचा काय उपयोग?’ असे सांगून त्यांची ऑफर स्वीकारली नाही.  शेवटच्या श्वासापर्यंत ते एका सामान्य नागरिकाप्रमाणे सच्चे गांधीवादी म्हणून जगले.  1997 मध्ये सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला.

आदरांजली आणि विनम्र अभिवादन

संग्राहक : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares