मराठी साहित्य – विविधा ☆ गुरु पौर्णिमे संदर्भात थोडी महत्वपूर्ण माहिती!! ☆ सुश्री नीला ताम्हनकर ☆

? विविधा ?

☆ गुरु पौर्णिमे संदर्भात थोडी महत्वपूर्ण माहिती !! ☆ सुश्री नीला ताम्हनकर ☆

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा हा मंगलदिन आहे. ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.

गुरूंचे अनेक प्रकार आहेत. १) पृच्छक गुरु, २) चंदन गुरु, ३) अनुग्रह गुरु, ४) कर्म गुरु, ५) विचार गुरु, ६) वात्सल्य गुरु, ७) स्पर्श गुरु.

दत्तभक्तांसाठी हा पूण्यपावन दिवस !

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः॥

“जो जो जयाचा घेतला गुण । तो म्यां गुरु केला जाण । अवधूतांनी २४ गुरु केले. या चोविसांचे महत्व तीन प्रकारांत आहे. एक सदगुण अंगीकारासाठी गुरू, दोन अवगुण त्यागासाठी गुरु आणि तीन ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजे ‘गुरु’ हे लौकिक दॄष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील.

‘गुरुचरित्र’ या ग्रंथात श्री गुरुंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरुंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्व सांगितले आहे.

या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे साधक – पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात.. परंतु खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वच नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.

कलीने ब्रह्मदेवांना ‘गुरु’ शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला, की ‘ग’ कार म्हणजे सिध्द होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या जगाचे पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरुंच लागतो.  

कैलास पर्वतावर भगवान शंकराने पार्वतीमातेसह पारमार्थिक संवादात जगाच्या उद्धाराविषयी बोलताना गुरुंचे महत्व सांगितले आहे.. त्यास गुरुगिता असे म्हणतात..

गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व गुरुंमध्ये आपले सदगुरु आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरु साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल, फेरफार करत नाही. परंतु तो भोग सोयीने (सहजतेने) भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात. भोगाची तीव्रता कमी करतात.

आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सदभावाने सदगुरु चरणाची सेवा करावी.

जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे. त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.

मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥

सदगुरुंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते-बोलते ईश्वराचे अंशच असतात.

मित्रांनो साधकाने कोणत्याही गुरुंची निंदा करू नये. तसेच आपल्याही गुरुंची निंदा कोणी केलेली ऐकू नये. तिथून निघून जावे. गुरुनिंदा करणे म्हणजे महापाप होय. गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्यशक्ती आहे.

गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे !

संग्रहिका – सुश्री नीला ताम्हनकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुरूपौर्णिमा…… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ गुरूपौर्णिमा… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

धर्मपुराणानुसार आषाढ पौर्णिमे दिवशी व्यासांचा जन्म झाला .महर्षी व्यासांनी वेदांचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवन संपन्न केले आहे .या अमौलिक कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्यासांचे पूजन केले जाते. हा दिवस ” व्यास पौर्णिमा “म्हणून ओळखला जातो. हाच दिवस”गुरुपौर्णिमा “म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान पूज्य मानले जाते. 

आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून गुरु -शिष्य परंपरा चालत आली आहे .भारतीय गुरुपरंपरेत जनक -याज्ञवल्क्य, कृष्ण, सुदामा – सांदिपनी, कर्ण -परशुराम अर्जुन -द्रोणाचार्य स्वामी विवेकानंद -रामकृष्ण परमहंस, ज्ञानेश्वर -निवृत्तीनाथ ,चांगदेव- मुक्ताबाई यां नावांचा समावेश करता येइल.

आपला पहिला गुरु आई .ती आपल्याला बोलायला चालायला शिकवते, त्याचप्रमाणे वडील आपल्याला व्यवहार ज्ञान शिकवतात. वय वर्षे ५ते १६ हा काळ आपल्या आयुष्यात महत्त्वाचा असतो . या वयात संस्काराची गरज असते. हे अमूल्य संस्कार घरी आई वडील देतात तर शाळेत व्यक्ती सापेक्ष-मनुष्य सापेक्ष जीवन विचारसरणी शिकवली जाते.

” गुरु विना ज्ञान नाही, ज्ञाना विना शांती नाही आणि शांती विना आनंद नाही “हेच खरे. आपल्याला लहान मोठ्यांकडून बरेच काही शिकता येते पण त्यासाठी ते जाणून घेण्याचा दृष्टिकोन हवा.

केवळ व्यक्ती कडूनच ज्ञानमिळत असते असे नाही. तर  लहानपणापासून म्हातारपणापर्यंत जे जे विद्या देतात ते आपलेगुरु असतातच म्हणून निसर्ग हा आपला गुरु आहे .निसर्गाकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात ओहोळ रूपाने येणारी नदी वाहत असताना अनेक ओहळांना आपल्यात सामावून घेते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते पण जाताना जमीन सुपीक करते शेती फुलवते पिण्यासाठी पाणी देते तिचा उपयोग वीज निर्मितीसाठी होतो सर्वांना आपल्यात सामावून घ्या, शांत राहून इतरांना मदत करा ही   शिकवण नदीकडूनमिळते. डोंगरावर वादळ वाऱ्यासारखी संकटे येतात पण खचून न जाता पुन्हा कामाला लागा असा संदेश डोंगर देतात. वृक्ष, झाडे झुडपे लता वेली वगैरे वनस्पतींचे प्राणीमात्रावर अगणित उपकार आहेत वनस्पती नसतील तर कदाचित प्राणी मात्र जगू शकले नसते. श्वास घेण्यापासून ते पोट भरण्यापर्यंत आपल्याला या सर्वांची गरज असते. हे सर्वजण फांद्या फुल फळे यांचे ओझे वाहतात आणि आपल्याला मधुर फळ देतात. वाटेवरच्या वाटसरूला सावली देतात. उन्हामध्ये कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून ऑक्सिजन आपल्याला देतात , दातृत्वाची शिकवण देतात पण त्या बदल्यात निसर्ग आपल्याला काहीच मागत नाही म्हणून” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी “असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

एवढेच नव्हे चिमणी, पक्षी आपले घरटे बांधताना काटक्या गोळा करतात घरटे बांधतात त्या घरट्यामध्ये अंडी पण घालतात कधी कधी पाऊस वाऱ्याने ते खाली पडते पण हे पक्षी पुन्हा नवीन घरटे बांधतात.

घरात आढळणारा कीटक कोळी आपले जाळ विणत असताना अनेकदा खाली पडतो पण  तो जिद्दीने आपले जाळे तयार करतोच. आज आलेल्या संकटावर मात कशी करावी, सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा याचे ज्ञान आपल्याला या कीटकांकडून मिळते.

मुंगी एक कण दिसला तरी इतर मुंग्यांना गोळा करतात, एखाद्या पदार्थाला मुंग्यांची रांग लागलेली आपण पाहतो.,झाडावरून घसरुन  मुंगी खाली पडते पण ती आपले  कार्य सोडत नाही तर पुन्हा वर चढून आपले ध्येय गाठते.संकटाला न घाबरता प्रयत्न करा यश तुमच्या पाठीशी आहे असे शिकवते जणू!अशीअनेक उदाहरणे देता येतील. म्हणून निसर्गासारखा नाही रे ‌सोयरा

गुरु,सखा बंधू मायबाप

त्याच्या कुशीमधये सारें व्यापताप

मिटती क्षणात आपोआप 

निसर्गाप्रमाणे ग्रंथ गुरुची महती सांगता येईल. ग्रंथा मधून भूतकाळातील गोष्टी समजू शकतात, तसेच वर्तमान काळ , भविष्यकाळ याबद्दल अफाट ज्ञान ग्रंथातून, पुस्तकातून मिळते.,  हे अमूल्य ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केले जाते. पुस्तकामुळे ज्ञानवृद्धी होते. सकारात्मक विचारसरणी बनते .आत्मविश्वास वाढतो .चांगले संस्कार होतात .कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी पाठबळ मिळते. या गुरूकडे जात धर्मभेद नाही ,काळाचे बंधन नाही म्हणून ग्रंथ हे  सुध्दा आपले गुरु आहेत. 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नुकत्याच झालेल्याआषाढी एकादशीच्या निमित्ताने… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ नुकत्याच झालेल्याआषाढी एकादशीच्या निमित्ताने… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

नारद मुनींच्या सांगण्याप्रमाणे श्रीकृष्ण व रुक्मिणींनी द्वारकेला जाण्याचा निर्णय घेतला. पण तिकडे जाण्यापूर्वी पंढरीला लोकांचे निरोप घेण्यासाठी निघाले. प्रथम पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या कुटीजवळआले. पण आजच्या दिवशी पडलेल्या पावसामुळे कुटीसमोर चिखल असल्यामुळे त्यांनी अंगणातून पुंडलिकाला हाक मारली.

साक्षात परमेश्वर विष्णू दाराशी पाहताच पुंडलिक म्हणाला,” देवा मी माझ्या आई-वडिलांचे प्रातर्विधी उरकत आहे. कृपया आपण कुटी मध्ये येऊ नये. मी थोड्या वेळाने बाहेर येतो.” आणि श्री विष्णूंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून त्याने जवळ असलेली एक वीट उचलली व मनोभावे नमस्कार करून अंगणात टाकली आणि विनवणी केली,” मी बाहेर येईपर्यंत कृपया या विटेवर उभे रहा”.

श्रीकृष्ण त्याच्या विनंती प्रमाणे दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या टाकलेल्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाने आपल्या आई-वडिलांना श्री विष्णूचे दर्शन घडविले आणि श्रीकृष्ण आपल्या भक्ताची वाट पाहत विटेवर उभे राहिले. एक घटका होत आली तरीही पुंडलिक बाहेर आला नाही. विष्णूंना पाहून जनसमुदाय गोळा झाला.भगवंताला यायला उशीर का झाला हे पाहायला रखुमाई ही तेथे आल्या.

पांडुरंगाच्या हाकेला ही पुंडलिक का बाहेर आला नाही हे पाहण्यासाठी एक  सदगृहस्थ कुटीत गेले. तर पुंडलिकाचे आई वडील मरण पावले होते आणि त्यांच्या चरणी पुंडलिकाने आपल्या प्राणाचा त्याग केला होता.

त्याची अपार भक्ती पाहून पांडुरंग त्याच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले कोणत्याही पूजेत तुझे नाव प्रथम घेतले जाईल  “पुंडलिका” आणि जसा विटेवर उभा आहे त्या स्थितीत पाषाण रूपात ह्याच पंढरपुरात 28 युगे उभा राहून माझ्या भक्तांना दर्शन देत राहीन. त्यानंतर थोड्याफार अंतरावर थांबलेल्या रखुमाई त्याच ठिकाणी पाषाण रूपात उभ्या राहिल्या.

तेव्हापासून विठ्ठल रुक्माई च्या स्वयंभू मूर्तीच्या चरणावर माथा टेकवून आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची लागली ती अजूनही अखंडित व अविरतपणे चालू आहे.

पंढरपुरात श्रीकृष्ण रुक्मिणी पाषाण स्वरूपात स्थितप्रज्ञ झालेला तो पवित्र दिवस म्हणजे “आषाढी एकादशी”

संत ज्ञानेश्वरांनी सुमारे आठशे वर्षांपूर्वी दीडशेच्या संख्येने सुरू केलेली वारी आजही खांद्यावर भगवी पताका, टाळमृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत रणरणत्या उन्हात पावसा पाण्याची पर्वा न करता दरवर्षी ला खूप वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात.

घेईन मी जन्म‌ याचसाठी देवा

तुझी चरणसेवा साधावया.

तुकाराम महाराजांनी म्हटलेल्या या अभंगाप्रमाणे 200 ते  225 किलोमीटर अंतराची पायी वाटचाल करीत  वारकरी एकादशीला पंढरपूरला पोचतात.

“जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल”

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 25 – परिव्राजक –३. गाजीपूर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 25 – परिव्राजक –३. गाजीपूरडाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

गाजीपूरच्या लोकांबरोबर स्वामीजींच्या खूप छान वैचारिक चर्चा होत होत्या. आपल्या समाजात दूरवर शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. आपल्या संस्कृतीतील सत्वांश जाणून घेऊन समाजाला प्रेमाने विश्वासात घेऊन सुधारकांनी सुधारणा घडवून आणली पाहिजे. ती सहज प्रक्रियेतून व्हायला हवी. लादली जाऊ नये. शिक्षणाचा पाया आणि त्यातील तत्वे हिंदू विचारधारेवर आधारित असली पाहिजेत. जे चांगलं आहे ते गौरवपूर्वक मांडलं गेलं पाहिजे. हिंदू धर्मात मानले गेलेले आदर्श नीट समजून घेऊन समाजासमोर ठेवले पाहिजेत. असं समाजसुधारकांना बजावून सांगताना स्वामीजी म्हणतात, “ध्यानात ठेवा हिंदू धर्म हे काही केवळ चुकीच्या गोष्टींचे एक गाठोडे नाही. खोलवर बुडी मारा, तुमच्या हाताला अनमोल रत्ने लागतील. परक्या लोकांची संस्कृती आणि चालीरीती, यांच्या डामडौलावर भुलून जाऊ नका. आपली ही मातृभूमी कशी आहे ते समजून घ्या. आपल्या भारतीय समाजाचा जीवनहेतु काय आहे आणि त्याच्या अस्तित्वाची प्रेरणा कशात आहे, याचा तुम्ही शोध घ्या. आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक आदर्श आपण विसरून गेलो आहोत, हे आपले खरे दारिद्र्यपण आहे. आपल्या ठायी स्वत:च्या अस्मितेचे भान उत्पन्न होईल तेंव्हाच आपले सारे प्रश्न सुटतील”.

इथेच गाजीपूरमध्ये स्वामीजींच्या विचारांना एक आकार येत चालला होता. सतत आध्यात्मिक विचार तर होतेच डोक्यात, पण देशाच्या वर्तमानस्थितीबद्दल त्यांना चिंता सतावत होती आणि त्यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधताना भविष्यातला दृष्टीकोण आकार घेत होता असे दिसते.

गाजीपूरला काही इंग्रज अधिकारीही होते. त्यातील दोघांशी स्वामीजींचा संवाद होत होता. अफू विभागात रॉस म्हणून एक अधिकारी होते, त्यांना हिंदू धर्म व त्यातले देवदेवता, उत्सव, सामाजिक चालीरीती, याचे खूप कुतूहल होते. काही रूढी आणि आचार उघड उघड सदोष होते, अशा आचारांना हिंदूच्या धर्मग्रंथात काही आधार आहे का याचं त्यांना कोडं पडलं होतं. मग स्वामीजींनी प्रतिसाद देत, धार्मिक कल्पनांचा विकास, आणि सामाजिक आचारांच्या मागे उभी असणारी आध्यात्मिक बैठक त्यांनी सांगितली. हे ऐकून हिंदू धर्मातला व्यापक दृष्टीकोण रॉस यांच्या लक्षात आला.

एकदा, रॉस यांनी तिथले जिल्हा न्यायाधीश पेंनिंग्टन यांची स्वामीजींशी भेट घडवून आणली. स्वामीजींनी त्यांच्या बरोबर हिंदू धर्माचे पुनरुत्थान, आजच्या विज्ञानामुळे होऊ घातलेले परिवर्तन, योगाच्या मागचा शास्त्रीय विचार, सन्याशांचा संयम आणि मनोनिग्रह यावर आधारित जीवननिष्ठा यावर संवाद साधला. स्वामीजींचा, मुलभूत मानवी शक्ति, प्रेरणा आणि साधना याबद्दलचा वेगळा दृष्टीकोण  पेंनिंग्टन यांना खूप आवडला. त्यांना वाटलं याचं तर आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे विश्लेषण होऊ शकतं की. ते एव्हढे प्रभावित झाले की, ते म्हणाले, “हिंदूंचा धर्म आणि त्यांचा सामाजिक आचार याविषयीचे आपले विचार तुम्ही इंग्लंडला जाऊन तेथील विचारवंतांपुढे ठेवले पाहिजेत.”

“वादे वादे जायते तत्वबोध:” सतत तत्वचिंतन सुरू असल्याने स्वामीजींचे हे विचार  आतापर्यंत फक्त गुरुबंधु, आपल्या समाजाचे लोक यांच्यापुरताच मर्यादित होते. आज मात्र ते निराळ्या संस्कृतीत वाढलेल्या विचारवंतांपुढे मांडल्यामुळे त्याचे परिमाणच बदलले होते.

स्वामीजींच्या या समाधानकारक चर्चा तर चालू होत्याच, पण गाजीपूरला येण्याचा त्यांचा मूळ उद्देश होता, श्रेष्ठ आध्यात्मिक विभूति पवहारी बाबा यांची भेट घेणं. न्याय, वेदान्त, व्याकरण अशा सर्व शास्त्रांचा अभ्यास, भारतभर केलेला प्रवास, संस्कृत बरोबर इतर भाषांचे ज्ञान, सद्गुरूंकडून योगमार्गाची मिळालेली दीक्षा, त्याप्रमाणे वर्षानुवर्षे केलेली साधना आणि शेवटी शेवटी चालू असलेला निराहार अवस्थेतला एकांतवास व मौनाचा स्वीकार अशा तपश्चर्येचं तेज असणारे पवहारी बाबा. स्वामीजींची यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यानंतर ते वाराणशी करून वराहनगर मठात आले. कारणही तसच होतं,  बलराम बाबू यांचं निधन झालं होतं, त्या पाठोपाठ सुरेन्द्र नाथांचे पण निधन झाले, त्यांच्या आध्यात्मिक परिवारात खूप मोठी पोकळी निर्माण झाली.

वराहनगर मठाची  व्यवस्था लावून, नंतर त्यांना हिमालयात जाऊन गढवाल च्या शांत परिसरात साधना करण्याची इच्छा होती. यावेळी त्यांचा भ्रमणाचा काळ जवळ जवळ सलग पावणेतीन वर्ष होता. आणि प्रदेश थेट हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंतचा, विविध प्रांत, भाषा, प्रदेश, अनेक प्रकारच्या व्यक्ती असा विविधतेने नटलेल्या भारताच्या भागात त्यांनी संचार केला. त्यांनी गाजीपूरला समाजसुधारकांना म्हटलं होतं की, ‘आपली मातृभूमी समजून घ्या’ त्याप्रमाणे ते ही याच उद्देशाने स्वदेश संचाराला निघाले होते.    

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 6 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 6 ☆ सौ. अमृता देशपांडे 

अंदमानच्या कारागृहाच्या भिंती मात्र स्वतःला धन्य समजत असतील. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांना तिथे बंदिवासात ठेवलं होतं.त्यांच्या कर्तृत्वाची आणि कवनांच्या शब्दांची उंची इतकी भव्यदिव्य होती की ती  कारागृहाच्या भिंती भेदून, छत फाडून गगनस्पर्शी झाली. कारागृहाच्या भिंतीही तेजःपुंज आणि पवित्र झाल्या.

या सृष्टीमध्ये निर्जीव वस्तूला सजीवता देऊन अमरत्व प्राप्त होण्याचा मान कुणाला मिळाला असेल तर तो छोट्याशा भिंतीलाच. ज्ञानतपस्वी श्री चांगदेवयोगी वयाच्या 113व्या वर्षी जेव्हा वायुमार्गाने वाघावरून

ज्ञानेश्वरांना भेटायला आले, तेव्हा श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडांसह छोट्याशा भिंतीवर सकाळी बसले होते. त्रिकालज्ञानी ज्ञानमाऊलीने बसलेल्या भिंतीलाच त्यांना सामोरे जाण्याची विनंती केली आणि ती निर्जीव भिंत आपले निश्चलत्व टाकून चारी भावंडांना आकाशमार्गे चांगदेवांना भेटायला घेऊन गेली. ते बघता क्षणीच चांगदेवांना अहंकार गळून पडला आणि त्यांनी चारी भावंडांच्या पायी लोळण घेतलं. ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत अमर झाली.

ही कथा आजच्या युगात अविश्वसनीय वाटेल , पण तेव्हा तसे घडले होते, हे खरे मानले तर ज्ञानेश्वरांचे देवत्व आणि भिंतीला मिळालेले सजीवत्व व अमरत्व हे ही खरे वाटू लागते.

अशा या भिंती,  बोलक्या आणि मुक्या सुद्धा! स्वतःचे अस्तित्व दाखवणा-या, ख-या, सुंदर, सकारात्मक आणि आनंदी.  सर्वच भिंती अशाच असाव्यात यासाठी आपण प्रयत्न करूया.  हो! फक्त घराच्याच नाही तर मनातल्या सुद्धा……

समाप्त…..🙏🏻

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे 

भिंतीवर कॅलेंडर लावले जाते, हे ठीक. पण कॅलेंडरच्याच भिंती पण तयार होतात. कुठे ??????

अहो, रसवंती गृहात!

नवनाथ, गणपती, शंकरपार्वती,  दत्तगुरू, साईबाबा, रामलक्ष्मणसीता, ज्योतिबा,  तुळजाभवानी,  अंबाबाई, तिरूपती यांच्या कॅलेंडरनीच बनलेल्या असतात त्या भिंती! हे सगळे जणू उसाचा रस प्यायला आलेले असतात, त्याचबरोबर राजेश खन्ना पासून रणवीर पर्यंत,  वैजयंती मालापासून आलिया भट पर्यंत  सर्व नटनट्या नटूनथटून हजर असतात. अशा रंगीबेरंगी भिंती,  चिमुकली टेबले आणि बाक, चरकाच्या घुंगरांचा खुळखुळ आवाज आणि आलेलिंबू घालून केलेला तो गोड गार उसाचा रस…अहाहा! त्या छोट्याश्या जागेत केवढा परमानंद असतो, ते तिथे बसून रस प्याल्याशिवाय कळणार नाही. अजूनपर्यंत अशा भिंती शिवाय असलेलं  एकही रसवंतीगृह मी बघितलं नाही.

माझ्या बाबांचे एक मित्र पोलीस होते.त्यांना भेटायला बाबा पोलीस चौकीत गेले होते, मी पण बरोबर होते. तिथे भिंतीवरचे ते गुन्हेगारांचे फोटो बघून मी इतकी घाबरले होते की त्या दिवशी जेवलेच नाही. पुढे कित्येक दिवस त्या भिंतींच्या आठवणींचा धसका मनात होता.

कारागृहाच्या भिंती हे अतिशय दारूण सत्य गुन्हेगारांना स्वीकारावंच लागतं. काळ्याभोर दगडांच्या उंच उंच भिंतींच्या आत काय आहे, हे बाहेरून कधीच कळत नाही. जगापासून दूर ठेवणा-या भिंतीही गुन्हेगारांना काही शिकवत असतील का?

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे 

घरांप्रमाणे आता कार्यालयातही भिंतीना असेच महत्त्वाचे स्थान आहे. नवीन पद्धतीप्रमाणे Corporate offices मध्ये कमी उंचीच्या फायबर ग्लासच्या पार्टिशन्स करतात,  हेतु हा की प्रत्येक कर्मचा-याची काम करताना एकाग्रता साधणे, अलगपणा जपणे, त्याचबरोबर सहका-यांना मदतही करणे. या छोट्या उंचीच्या  भिंतींचे विचार किती उच्च आहेत नाही?

चीनची भिंत पूर्वी पासून प्रसिद्ध. गेल्या शतकापासून या भिंतीला फक्त लांबीचे महत्त्व उरले आहे. कारण जगाने चीनकडे किंवा चीनने जगाकडे ही भिंत ओलांडून संबंध प्रस्थापित केले आहेत. त्याची उपयुक्तता आणि परिणाम किंवा सौहार्द की विनाश,  हा विषय वेगळा!

पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी मधली भिंत पडली. पण ती पडल्यानंतर खरंच पूर्व-पश्चिम जर्मनी तले अंतर कमी झाले व संबंध चांगले झाले.

शाळेच्या भिंतींची प्रत्येक वीट,  प्रत्येक चिरा वंदनीय असतात. भिंतीवरचे बाराखडीचे, अक्षरांचे, शब्दांचे, अंकांचे, पाढ्यांचे तक्ते,  सुविचारांनी रंगलेल्या भिंती कोणीच विसरणार नाही.  वर्गात आता भिंतीवर फळ्याबरोबर digital screens ही असतात. मातीच्या गोळ्याला सुबक आकार देऊन छोटुल्याला मोठा करणा-या शाळेच्या भिंतीं…..

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ते, ती आणि मी कुकरी क्लासेस ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 ते, ती आणि मी कुकरी क्लासेस !😅💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“पंत, पंत, पंत हे आता तुम्हीं नवीन कुकरी क्लासच काय काढलंय मधेच ?”

“अरे मोऱ्या थांब थांब, असं ओरडायला काय झालं तुला एकदम आणि आमचा पेपर आणलास का ते सांग आधी ?”

“आणलाय, हा घ्या आणि बोला !”

“काय बोलू मोऱ्या ? मस्त पावसाला सुरवात झाल्ये ! वाटलं नव्हतं की हा परत इतक्या लवकर येईल !”

“पंत, मी तुम्हांला तुम्हीं चाळीत चालू करणार असलेल्या कुकरी क्लास बद्दल विचारतोय आणि तुम्ही पावसाचं काय सांगता आहात मला !”

“अरे मोऱ्या मला वाटलं असा मस्त पाऊस पडतोय तर तुला काकूच्या हातचा आलं घातलेला चहा हवा असेल आधी, म्हणून म्हटलं !”

“पंत चहाच नंतर बघू ! आधी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या !”

“कुठला प्रश्न मोऱ्या ?”

“तुम्ही चाळीत कुकरी क्लास चालू करणार आहात आणि त्याला लेले काका, जोशी काकांच ऑब्जेकशन आहे आणि चाळीचा सेक्रेटरी या नात्याने त्या दोघांनी माझ्याकडे तशी लेखी तक्रार पण केली आहे !”

“मोऱ्या, त्या घाऱ्या जोशाला आणि त्या बिनडोक लेल्याला काडीची नाही  अक्कल, तेव्हा तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देवू नकोस !”

“असं कसं पंत, चाळीचा सेक्रेटरी या नात्याने मला त्यांच्या तक्रारीची दखल घेणं भाग आहे !”

“बरं बरं, काय तक्रार आहे त्यांची?”

“तुम्ही हा कुकरी क्लास चाळीत सुरु करू नये असं त्यांच म्हणणं आहे आणि त्या लेखी तक्रारीवर पाठिंबा म्हणून 23 चाळकऱ्यानी सह्या पण केल्या आहेत !”

“अरे पण का ?”

“पंत, कारण मागे तुम्हीं चाळीत योगासनाचे फुकट वर्ग चालू केलेत, त्यात जोशी काकूंचा पाय फ्र्याक्चर झाला होता, आठवतंय ना ?”

“नं आठवायला काय झालंय मोऱ्या ? अरे ही गेल्या महिन्यातच घडलेली गोष्ट ! अरे मी त्या बयेला सांगितल, की हे विचित्रासन तू करू नकोस, तुझं वजन जास्त आहे ! तरी ऐकायला म्हणून तयार नाही ती बया आणि घेतलान पाय फ्र्याक्चर करून, त्याला मी काय करणार ?”

“आणि लेले काकूंच्या हाताचं काय ?”

“अरे मोऱ्या मी त्या महामयेला म्हटलं, हे मयुरासन तुला जमेल असं वाटत नाही तर तू ते करू नकोस, त्या ऐवजी मी तुला दुसरं आसन सांगतो !”

“मग ?”

“मग काय मग मोऱ्या ? अरे लेल्याची बायको शोभयला नको ती महामाया, तो एक हट्टी तर ही दहा हट्टी !”

“म्हणजे ?”

“अरे हट्टास पेटून केलेन तीन मयुरासन आणि घेतलान हात मोडून, त्याला मी कसा जबाबदार सांग बरं मला ?”

“बरोबर आहे तुमच पंत, पण तुम्ही हा कुकरी क्लास चालू करू नये असं त्यानी तक्रारीत म्हटलंय, म्हणून मी तुमच्याकडे आलो !”

“अरे पण मोऱ्या, हा कुकरी क्लास सुद्धा मी योगाच्या क्लास सारखा फुकट चालू करतोय, तर त्याला त्यांच का ऑब्जेक्शन हे सांगशील का मला जरा ?”

“सांगतो ना पंत, हा कुकरी क्लास चाळीत सुरु करून तुम्ही चाळीत हिंसेचा प्रचार आणि प्रसार करणार आहात, असं त्यांच म्हणणं आहे !”

“हिंसा ?”

“हॊ, आता तुम्ही कुकरीचे क्लास घेतांना, ती कशी चालवायची, कसे वार करायचे, कशी फेकून मारायची हेच शिकवणार नां? मग एक प्रकारे हा हिंसेचा प्रचार आणि प्रसारच नाही का ?”

“बघितलंस, बघितलंस काय अकलेचे दिवे पाजळतायत तुझे लेले काका आणि जोशी काका !”

“म्हणजे ? मी नाही समजलो पंत !”

“मोऱ्या, अरे त्या दोन बैलांना वाटलं मी कुकरी क्लास घेतोय म्हणजे नेपाळी गुरखा लोकं जी कुकरी वापरतात, ती कशी चालवायची हे मी त्या क्लास मध्ये शिकवणार म्हणून !”

“हॊ, मला पण तसंच वाटलं, म्हणून मी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नां पंत !”

“मोऱ्या गाढवा, अरे तू तर चांगला शिकला सवरलेला आजचा तरुण आणि तुला कुकरीचा तोच एक अर्थ माहित आहे ? दुसरा अर्थ माहित नाही ?”

“आहे ना पंत, जेवण बनवणे !”

“अरे बैला, मग त्या दोन नंदी बैलांना सांगितलं का नाहीस तसं ?”

“सॉरी पंत, पण तेंव्हा लक्षात आलं नाही माझ्या.  पण मग तुम्ही तुमच्या क्लासच नांव ‘ते, ति आणि मी कुकरी क्लासेस’ असं विचित्र का ठेवलंय ?”

“मोऱ्या, जेवण करतांना अत्यावश्यक असलेल्या तीन पदार्थांच्या नावांचे शॉर्टकट आहेत ते !”

“म्हणजे काय पंत ?”

“अरे बल्लवा, तू…”

“पंत मी मोरू, हा बल्लव कोण आणलात तुम्ही मधेच ?”

“मोऱ्या, अरे मला तुला बैला म्हणायचं होतं पण चुकून बल्लवा असं तोंडातून बाहेर पडलं !”

“ठीक आहे पंत, पण ते तुम्ही तुमच्या कुकरी क्लासच्या नावाच्या शॉर्टकटच काहीतरी सांगत होतात !”

“हां, म्हणजे असं बघ, कुठलही जेवण करतांना आपल्याला तेल, तिखट आणि मीठ यांची गरज लागतेच लागते, हॊ की नाही ?”

“बरोबर पंत !”

“मोऱ्या, म्हणूनच आजच्या तुमच्या जमान्यात शोभेल असं ट्रेंडी नांव मी माझ्या कुकरी क्लासला दिलं आहे !”

“धन्य आहे तुमची पंत !”

© प्रमोद वामन वर्तक

०८-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे 

सर्वसाधारणपणे घराच्या बाहेरच्या भिंतींवरून इमारतीचे आकारमान,  घरमालकाची आर्थिक सुस्थिती आणि बांधकामाचे कौशल्य व्यक्त होते. खरी ओळख असते ती, घरातल्या आतल्या भिंतींची,.

पूर्वी भिंतीवर पूर्वजांचे फोटो, अर्थात ब्लॅक अॅड व्हाईट.  देवांचे फोटो,  राजा रविवर्म्याची चित्रे ओळीने लावलेली असत. आता एखादी कलाकृती,  नैसर्गिक देखावा यांच्या फ्रेम्स असतात. हल्ली चायनीज शुभचिन्हे लावायची फॅशन आहे. भिंतीवर ची अशी प्रतिके घरातल्यांची मनोवृत्ती व्यक्त करतात.

हल्ली खूपशा घरात वास्तुशास्त्रानुसार फ्रेम्स आणि पिरॅमिड्स असतात. जास्त करून बहुमजली सदनिकांमध्ये अशा प्रकाराच्या वस्तू असतात. सहाजिकच आहे, कष्टांनं मिळवलेल्या वास्तूमध्ये सुख, शांती, समाधान,  प्रगती असावी असे वाटणे नैसर्गिक आहे आणि तसे उपाय करणे, आवश्यक आहे.

मी एकदा माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते.  तिच्या घरात एकदम सुने सुने वाटत होते. एकाही भिंती वर एकही चित्र, फोटो, फ्रेम्स काहीच नाही.  भिंती अगदी ओक्याबोक्या दिसत होत्या. मला तिची मनःस्थिती माहीत होती. 5-7 वर्षापूर्वी तिचे यजमान गेले. मुले लहान होती. बिचारी कशीबशी संसार पुढे रेटत होती. त्या भिंतींच्या मुकेपणाने तिचं मुकेपण व्यक्त होत होतं.

काही वर्षांपूर्वी भिंतीवर कॅलेंडर असायचेच. एकच नव्हे तर अनेक दिनदर्शिका लावल्या जायच्या. पण आता कॅलेंडर मोबाईल वर उपलब्ध आहे.  त्यामुळे कॅलेंडर भिंतीवरून हातात आले आहे.

ठराविक भिंती ला ठराविक रंग देणे याचाही नियम आहे. अंतर्गत सजावट करणारे व रंगारी लोकां ना ते बरोबर माहीत असतं. भिंतींच्या रंगाचा तिथे रहाणा-या लोकांवर व त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो.

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे 

औद्योगिकीकरण, शहरीकरण,  पाश्च्यात्यांचे अनुकरण यांच्या प्रभावाने पुढे पुढे जाणारा काळ नवी नवी स्थित्यंतरं घडवू लागला. सामाजिक आणि कौटुंबिक जीवन झपाट्याने बदलले. नवीन बदलांना आत्मसात करताना काही आधीच्या गोष्टी,  वस्तू,  चालीरीतींची जागा नवीन बदलांनी घेतली.

वाडांच्या जागी चाळी आल्या. घरे आली, अपार्टमेंट्स आली. बंगले बांधले गेले. बहुमजली इमारती आल्या. या बदलात एक घटना प्रकर्षाने जाणवली.  ती म्हणजे घरांची संख्या वाढली.  भिंती वाढल्या. तशाच नात्यातही भिंती आल्या. हे कालानुरूप घडणारच होतं.

त्याचबरोबर एक चांगली गोष्ट ही घडली,  ती म्हणजे प्रत्येक भिंती प्रमाणे त्या घरात रहाणा-या प्रत्येक व्यक्तीला स्वतःची ओळख मिळाली. भिंत म्हणजे व्यक्तिचं प्रातिनिधिक रूप असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.  प्रत्येक भिंतीला, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं व्यक्तिमत्व प्राप्त झाले. शतक ओलांडताना झालेला हा बदल अपरिहार्य होता.

कुठलाही बदल होताना सुरवातीला विरोध होणे, धुसफूस, भांडणे,  नाराजी,  असहकार व्यक्त होणे असतेच. इथेच मनावर झालेले संस्कार आपला प्रभाव दाखवतात. घडणारे बदल स्वीकारताना,  त्यानुसार स्वतःत बदल करताना मानसिक क्षमता गरजेची असते. ती नसेल, तर अशा व्यक्तीच्या मनात नेहमीच असुरक्षितता असते.

पूर्वी चे एकत्र कुटुंब अलग होऊन प्रत्येकाचे घर वेगळे,  संसार वेगळा,  राहणीमान वेगळे झाले. एकत्र असण्याचे संस्कार असलेलीच मने अशा प्रसंगी न दुरावता, प्रत्येकाच्या अस्तित्वाची प्रतिष्ठा जपत,  आपुलकीने घट्ट बांधलेली असतात. पण दुस-याच्या मनाचा विचार करण्याचा मोठेपणाही घरातल्या वडीलधा-या व्यक्तींच्या जवळ असला तरच हे शक्य होते.

अशा मनांचे,  व्यक्तित्वांचे प्रातिनिधिक रूप म्हणजेच या भिंती,  काही बोलक्या,  काही मुक्या !

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares