सूचना/Information ☆ महादान “महाचषक” निबंध स्पर्धा २०२५ ☆ साभार – श्री सुनील देशपांडे ☆

☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ महादान “महाचषक” निबंध स्पर्धा २०२५ ☆ साभार – श्री सुनील देशपांडे ☆

दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई या राष्ट्रीय संस्थेतर्फे

महाराष्ट्र राज्यस्तरीय हा शालेय व महाविद्यालयीन शिक्षकवर्गासाठी -महादान “महाचषक” निबंध स्पर्धा २०२५

महादान (नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान)

श्री सुनील देशपांडे

निबंध विषय (खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर):

  1. महादान ही काळाची गरज
  2. विद्यार्थ्यांमध्ये महादान संस्कार रुजवण्यासाठी माझ्या संकल्पना
  3. महादानासाठी शिक्षकांची भूमिका
  4. समाजासाठी महादान – सामूहिक जबाबदारी

भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

ही स्पर्धा दोन गटात विभागली आहे

गट विभाग पहिला

शालेय शिक्षक गट – इयत्ता १० वी पर्यंत शिकवणारे शिक्षक

गट विभाग दुसरा

महाविद्यालयीन प्राध्यापक गट – इयत्ता ११ वी ते पदवी स्तरावर शिकवणारे प्राध्यापक

निबंध लेखनासाठी सूचना:

१) एका शिक्षकाला कोणत्याही एका भाषेतून व कोणत्याही एकाच विषयावर एकच निबंध सादर करता येईल.

२) शब्दमर्यादा: ८०० ते १००० शब्द

३) निबंध ए ४, साईज कागदावर, एकाच बाजूने सुवाच्य हस्ताक्षरात किंवा टाईप केलेला असावा.

४) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील त्यावर कोणत्याही प्रकारे न्यायालयीन प्रक्रिया केली जाऊ शकणार नाही

५) निबंधावर लेखकाचे नाव किंवा ओळख दर्शवणारी कोणतीही माहिती लिहू नये

६) निबंधासोबत खालील माहिती वेगळ्या कागदावर देऊन स्टेपल करून पाठवावी:

        • लेखकाचे पूर्ण नाव
        • वय
        • मोबाईल नंबर
        • ई-मेल
        • शाळा/महाविद्यालयाचे नाव व संपूर्ण पत्ता
        • मुख्याध्यापक/प्राचार्य यांचे नाव व संपर्क क्रमांक
        • लेखकाचै एक छायाचित्र. (पासपोर्ट साईज फोटो)

प्रतिज्ञापत्र:

(स्वतःच्या माहितीच्या कागदाखाली लिहावे आणि स्वाक्षरी करावी)

“मी प्रतिज्ञापूर्वक घोषित करतो की वरील निबंध मी स्वतः लिहिला आहे.

तो कोणत्याही व्यक्तीच्या, संस्थेच्या वा इंटरनेटवरील मजकुराची प्रत नाही.

हा निबंध यापूर्वी कुठेही प्रसिद्ध केलेला नाही व हा या स्पर्धेसाठीच सादर केला आहे.

स्पर्धेचे सर्व नियम व अटी मला मान्य आहेत.”

स्वाक्षरी, स्थळ व दिनांक

६) निबंध पाठविण्याचा अंतिम दिनांक: ३० जून २०२५ पर्यंत

७) पोस्टाने किंवा कुरिअरने निबंध पोहोचलेला असला पाहिजे.

८) निबंध पाठविण्याचा पत्ता:

श्री. सुधीर बागाईतकर, उपाध्यक्ष,

दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन,

रो हाऊस क्र. १५, साई सदन सोसायटी,

महानगर बँकेजवळ, सेक्टर क्र. २,

ऐरोली, नवी मुंबई – ४००७०८

टीप: ई-मेल, व्हॉट्सॲप किंवा इतर डिजिटल माध्यमातून पाठवलेले निबंध स्पर्धेसाठी स्वीकारले जाणार नाहीत.

९) बक्षीसै व सन्मान:

प्रत्येक गटातून:

प्रथम क्रमांक: ₹१०,०००/- + प्रमाणपत्र + शाळा/कॉलेजसाठी ढाल (स्मृतिचिन्ह)

द्वितीय क्रमांक: ₹५,०००/- + प्रमाणपत्र + शाळा/कॉलेजसाठी ढाल (स्मृतिचिन्ह)

प्रत्येक भाषेतील एका निबंधास एक विशेष पुरस्कार: ₹३,०००/- + प्रमाणपत्र + शाळा/कॉलेजसाठी ढाल (स्मृतिचिन्ह)

१०) निकाल आणि सन्मान समारंभ:

निकाल:  ऑगस्ट २०२५ या महिन्यात  जाहीर करण्यात येईल

सन्मान समारंभ: फेडरेशनच्या २०२५ मधील राज्यस्तरीय अधिवेशनात बक्षिसाची रक्कम व विजेत्यांचा सन्मान केला जाईल (२०२५)

अधिवेशनासाठी विजेत्यांना स्वखर्चाने यावे लागेल, परंतु अधिवेशनाचे सहभाग शुल्क भरावे लागणार नाही.

११) बक्षीस विजेते निबंध फेडरेशनच्या विशेषांकात प्रसिद्ध केले जातील त्याला कोणतेही वेगळे मानधन दिले जाणार नाही

१२) सर्व सहभागी शिक्षकांना सहभाग प्रमाणपत्र (ई-सर्टिफिकेट स्वरूपात) मिळेल.

१३) अधिक माहिती व संपर्कासाठी

श्री सुधीर बागाईतकर – 9819970706

श्री सुनील देशपांडे  – 9657709640

श्री प्रशांत पागनीस – 8530085054

सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य,  शिक्षक बांधव व शिक्षक संघटनांना विनंती:

आपल्या संस्थेतील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महादान विषयक संस्कार रुजवावेत, ही नम्र विनंती!

साभार  – श्री सुनील देशपांडे 

पुणे , मो – 9657709640 ईमेल : [email protected]

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बैल गेला नि झोपा केला… + संपादकीय निवेदन – सुश्री शीला पतकी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री शीला पतकी 

💐 अ भि नं द न 💐

“युवा विवेक” या पुणेस्थित संस्थेतर्फे “म्हणींच्या गोष्टी” या नावाने आयोजित केलेल्या एका वेगळ्याच प्रकारच्या कथा स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका / कवयित्री सुश्री शीला पतकी यांच्या “बैल गेला नि झोपा केला” या कथेला सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांतर्फे सुश्री शीला पतकी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्य-प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा..💐

आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कारप्राप्त कथा.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

🌸 जीवनरंग 🌸

☆ बैल गेला नि झोपा केला… ☆ सुश्री शीला पतकी ☆

शेवटचा पेपर संपून संध्याकाळी सगळी मुले नाना आजोबांकडे आली त्यावेळेस सगळेजण समीरला चिडवत होते तो बिचारा अगदी रडकुंडीला आलेला. नानानी विचारलं, “काय रे काय झालं ?”समीर खाली मान घालून उभा” नाना आजोबा माझा पेपर बुडाला म्हणजे आज शेवटचा दिवस होता ना म्हणून सकाळी पेपर ठेवला होता आणि मला वाटलं नेहमीप्रमाणे दुपारी आहे मी दुपारी गेलो माझ्या लक्षात नव्हते आणि त्यामुळे आता माझा पेपर बुडाला पेपर झाल्यावर मी शाळेत गेलो”. त्यावर नाना म्हणाले” अरेरे! म्हणजे तुझं असं झालं… पेपर गेला आणि समीर आला..! तुझ्यावरून आता ही नवीन म्हण पडेल “.. म्हण म्हणजे काय हो आजोबा? सगळ्या मुलांनी एक सुरात विचारले. नाना म्हणाले “अरे एखादी घटना अगदी थोडक्यात सांगण्याचे साधन म्हणजे म्हण! अशा म्हणी आम्ही खूप वापरत असू तुमच्या पिढीला हे माहिती नाही. ” पण म्हण म्हणजे काय? नाना म्हणाले म्हण म्हणजे.. नाचता येईना अंगण वाकडे… नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.. अंथरून पाहून पाय पसरावे.. इकडे आड तिकडे विहीर याला सगळ्याला म्हणी असे म्हणतात. अशाच एखाद्या गोष्टीवरून ती म्हण पडलेली असते. गोष्टीवरून म्हणल्याबरोबर मुले जोराने म्हणाली “मग आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना” आजोबा म्हणाले” हो सांगतो ना बसा बसा सगळे बसा.. पेपर कसे गेले सगळ्यांना?” छान गेले आजोबा”. तोपर्यंत आतून आजी म्हणाल्या पोरांनो तुमच्या आजोबांची गोष्ट होईपर्यंत मी मस्त भेळ तयार करते मग भेळ खाऊन जारे…! पोरं तर आनंदाने उड्याच भरायला लागले. सगळ्यांनी एकच गल्ला केला. सांगा ना आजोबा सांगा ना आजोबा अरे हो सांगतो. आजोबा सांगू लागले..

खवणी नावाचे एक गाव होते. त्या तिथे जीवाजी नावाचा शेतकरी राहत होता. भरपूर शेती होती मळा होता जिवाजी खूप कष्ट करणारा शेतकरी आपला मळा त्याने सुंदर केला होता. त्याच्याकडे सोन्या आणि तान्या अशी दोन बैलं होती त्याच्यावर जिवाजीचा फार जीव होता जिवाजी म्हातारा झाला आणि मुलगा शेती करायला लागला मुलाचं नाव होतं तानाजी तानाजीला ही शेतीतलं ज्ञान चांगलं होतं. पण थोडासा आळशी होता तेथे काम वेळेवर करावे ही पहिल्या पिढीतली शिकवण तानाजी कडे नव्हतीच त्यामुळे जिवाजीला थोडा राग पण यायचा. अरे शेतीत कामे वेळेवर केली पाहिजेत बाबा. पण तो म्हणायचा करतोय ना त्यापुढे जिवाजी काहीच बोलत नसे. जीवाजीचे दोन बैल ज्या झापेत बांधायचे तो झापा पडला होता आणि जिवाजी रोज तानाजीच्या मागे लागायचा अरे झापा नीट करून घे नवा बांध तो म्हणायचा सध्या खूप काम आहे. दुपारी तो बैलांना झाडाखाली बांधायचा आणि रात्री घराच्या पुढे आलेल्या पत्रात जवळपास वर्षभर हे चालले होते पावसाळ्यात बैलांना पाऊस लागे चिखलात उभं राहावं लागलं उन्हाळ्यात वरून ऊन मारत होतं आणि थंडीत थंडी वाजली. बैल कंटाळले होते पण तानाजीला वेळ नव्हता बैल एकदा असेच झाडाखाली एकमेकांशी बोलत होते ते म्हणाले आपला मालक जीवाजी आपल्यावर किती प्रेम करत होता आणि हा मुलगा आपल्याला एक डोक्यावर छप्फर बांधून देत नाही किती दिवस आपण चिखलात मातीत पाण्यात उभे राहायचं बरं ?.. आपण येथून पळून जाऊ. दुसऱ्या दिवशी रात्री दोन्ही बैल दावं तोडून पळून गेले जिवाजी सकाळी पाहतो तर झाडाखाली बैलं नाहीत शेतातही कुठे दिसेना बैलाच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराचा आवाज सकाळी ऐकल्याशिवाय जिवाजीला चैन पडत नसे. त्याने सगळ्यांना बैल हुडकायला चारी दिशांना पिटाळलं. संध्याकाळपर्यंत बैल कोणालाही सापडले नाहीत. जिवाजींन तानाजीला सांगितलं तानाजी अरे बैलांची सुद्धा काळजी घ्यावी लागते घरातल्या माणसाप्रमाणे तू त्यांची वर्षभर अबदा केलीस.. किती सोसणार मुक जनावर बिचारे… जिवाजी खूप रागावला. तानाजीला खूप वाईट वाटलं खरंच आपण चुकलो त्यानं दुसऱ्या दिवशी दिवसभर खपून मोठे डाम रोऊन घेतले होते भोवताली पट्ट्या लावून तुराट्या बांधून घेतल्या चिखला न लिंपून घेतल्या. गवताच्या पेंढ्या लावून वरच्या बाजूला छप्पर केल जमिनीपासून वर एक फुटावर घेतल्यामुळे ते छान दिसत होत. त्यांन जिवाजीला बोलवून दाखवलं बाबा कसा गोठा चांगला झालाय बघ. बा म्हणाला, पण आता त्याचा उपयोग काय बैल गेला अन झापा केला अशी तुझी गत झाली. सुदैवानं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जिवाजीच्या ओढीन बैल घराकडे परतले. त्यांच्या गळ्यातल्या घुंगराचा आवाज ऐकून जीवाची खुश झाला. जिवाजीच्या बायकोन रकमाना त्या बैलांना ओवाळलं. पाणी पाजलं. गुळ अन भाकरी खाऊ घातली आणि बैल नव्या झाप्यात जाऊन उभे राहिले. तानाजीने त्यांना बांधलं. चारा टाकला. पाण्याच्या बादल्या ठेवल्या आणि त्यांन त्या दोन्ही बैलांना अक्षरशः गळ्याला लावले त्यांच्या अंगावर हात फिरवत तो म्हणाला आता मला सोडून जाऊ नका बाचा जेवढा जीव आहे तेवढाच माझा बी जीव आहे तुमच्यावर… जिवाजी हे लांबून पाहत होता जिवाजीचे गडी तानाजीला म्हणाले मालक आता बैल गेला आणि झापा केला असं करू नका बरं आपल्या बाच जरा ऐकत चला. हो रे बाबांनो चूक झाली माझ्याकडून आता पुन्यांदा अशी चूक होणार नाही.

– – आणि या प्रसंगातून एक म्हण तयार झाली ” बैल गेला अन झापा केला. ” आता आपल्या समीरला पण एक म्हण तयार होईल ना नाना! कोणती रे? तीच ती मगाशीच तुम्ही म्हणालात ना ” पेपर झाला आणि समीर गेला “.. सगळे मोठ्यांना हसायला लागले. तोच आजीने हाक दिली ‘ चला रे भेळ खायला या आत मध्ये ‘ मुले उड्या मारत स्वयंपाक घरात गेली.. भेळेवर ताव मारायला.

© सुश्री शीला पतकी

सोलापूर 

मो. 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता #283 – फसली आशा…+ संपादकीय निवेदन – श्री अशोक श्रीपाद भांबुरे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

💐 अ भि नं द न 💐

ललित कला फाऊंडेशन ठाणे. आयोजित साहित्य पुरस्कार सोहळा दिनांक ३ व ४ मे २०२५ रोजी के. आ. बांठीया विद्यालय सिडको सेक्टर १८ नवीन पनवेल येथे संपन्न झाला. रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी, ज्येष्ठ साहित्यिक माननीय अशोक श्रीपाद भांबुरे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक सेवेच्या सन्मानार्थ, ललित कला साहित्य पुष्प पुरस्कार,  मा. ए. के. शेखमा. तुकाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे श्री अशोक श्रीपाद भांबुरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.! .💐

आज त्यांची कविता “फसली आशा” प्रकाशित करीत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 283 ?

☆ फसली आशा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आज जीवनी उरली नाही कसली आशा

वाट पाहुनी किती उशीरा निजली आशा

*

तिला वाटले उद्या सुखाचा दिसेल तारा

दिव्यत्वाचे स्वप्न पाहुनी चुकली आशा

*

बरेच काही बोलायाचे होते बाकी

कुठे बोलली मुकाट होती बसली आशा

*

बोली होती तिची लागली या बाजारी

अर्ध्या किमती मधेच गेली विकली आशा

*

हिरवी झाली कधीच नाही शेतीवाडी

सुकून गेले स्वप्न बावरे सुकली आशा

*

मृगजळ दिसले धावत गेली त्याच्या मागे

आभासाच्या जलाशयाला फसली आशा

*

तारुण्याचा बहर तसा तर शिल्लक होता

तारुण्यातच अशी कशी ही खचली आशा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ के ‘शब्दों की चाय संग जासूसी’ के मराठी अनुवाद ‘छोटा जासूस’ का महाराष्ट्र में होगा वितरण ☆

☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ के ‘शब्दों की चाय संग जासूसी’ के मराठी अनुवाद ‘छोटा जासूस’ का महाराष्ट्र में होगा वितरण ☆

प्रसिद्ध बाल साहित्यकार ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ के नवाचारी शैक्षणिक हिंदी उपन्यास ‘शब्दों की चाय संग जासूसी’ का मराठी अनुवाद ‘छोटा जासूस’ के रूप में प्रकाशित हो चुका है। यह उपन्यास वर्तनी सुधार और भाषा शिक्षण को एक रोमांचक जासूसी कहानी के माध्यम से प्रस्तुत करता है, जो पाठकों को शिक्षित और मनोरंजित करती है। इसी विशेषता को दृष्टिगत रखते हुए इस उपन्यास का मराठी में अनुवाद किया गया है।

इस उपन्यास का अनुवाद मराठी भाषा की प्रसिद्ध अनुवादक सुश्री रेवती पाटिल द्वारा किया गया है। जिसे महाराष्ट्र की जानी-मानी प्रकाशक सुश्री सुनीता मनोहर पाटिल द्वारा संचालित रश्मि बुक एजेंसी, कोल्हापुर ने प्रकाशित किया है। ‘छोटा जासूस’ को महाराष्ट्र के 1000 विद्यालय और पुस्तकालयों में वितरित करने की योजना है, ताकि यह छात्रों और शिक्षकों के लिए आसानी से उपलब्ध हो सके।

यह उपन्यास हिंदी भाषा के उपन्यास की तरह मराठी भाषाभाषी पाठकों को भाषा के नवाचार, भाषा के प्रति रुचि जगाने और शैक्षणिक नवाचार को बढ़ावा देने में महत्वपूर्ण भूमिका निभाएगा। जिसके बारे में प्रख्यात बाल साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ का कहना है, “‘छोटा जासूस’ के माध्यम से शिक्षा को रोचक बनाने का मेरा जो सपना था लगता है वह अब साकार होने लगा है।” अनुवादक सुश्री पाटिल का कहना है, “मराठी में इस उपन्यास को अनुवादित करना एक सुखद और रचनात्मक अनुभव रहा है। जिसका लाभ महाराष्ट्र के पाठकों को प्राप्त होगा”

इस उपन्यास के प्रकाशन पर आपको साहित्यकार साथियों, ईष्टमित्रों, परिवार जनों और पत्रकार साथियों ने हार्दिक बधाई दी हैं। आपने मध्य प्रदेश का नाम महाराष्ट्र में रोशन किया।  

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ श्री अरविंद लिमये – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

✒️ श्री अरविंद लिमये ✒️

💐 संपादकीय निवेदन 💐

 !! हार्दिक अभिनंदन !!

शिवाजी विद्यापीठस्तरीय “स्पंदन २०२५” या सांस्कृतिक युवा महोत्सवात, आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिक, कथा नाट्य लेखक श्री अरविंद लिमये यांच्या. *पत्रास कारण की एकांकिकेस प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वीही त्यांच्या अनेक नाटकांना व एकांकीकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे श्री. अरविंद लिमये यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.! .💐

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चैत्रपालवी… भाग – १  + संपादकीय निवेदन – सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. राधिका भांडारकर 

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या “दुर्वांची जुडी “ या नव्या कथासंग्रहाचे प्रकाशन दि. ०६/०४/२०२५ रोजी शुभंकरोति साहित्य परिवारातर्फे करण्यात आले. वीर सावरकर अध्यासन केंद्र पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात मा. ममता सकपाळ यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. (प्रकाशक:अमित प्रकाशन)

या नव्या कथासंग्रहाबद्दल आपल्या सर्वांतर्फे राधिकाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच अखंड साहित्य सेवेसाठी असंख्य शुभेच्छा.

आजच्या आणि उद्याच्या अंकात वाचूया या नव्या संग्रहातली एक कथा चैत्रपालवी – दोन भागात.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? जीवनरंग ?

☆ चैत्रपालवी… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

गॅलरीतून दूरवर दिसणाऱ्या त्या निष्पर्ण झाडाकडे नंदा कितीतरी वेळ पहात होती. दिवस सरत्या हिवाळ्यातले असले तरी उन्हातलं ते निष्पर्ण झाड अगदी भकास दिसत होतं. एखाद्या सुकलेल्या काड्यांच्या खराट्या सारखं. भासत होतं. त्या झाडाकडे पाहता पाहता नंदाच्या मनात आलं, “आपलंही आयुष्य असंच आहे. भकास, निष्पर्ण, शुष्क, ओलावा नसलेलं.

आजूबाजूला अनंत गोंधळ होते. वाहनांची वर्दळ होती. हॉर्न चे आवाज होते. समोरच्या मैदानात मुले खेळत होती. कोणाचे मोठ्याने बोलण्याचे ही आवाज होते. हसणे, ओरडणे, सारं काही होतं. खरं म्हणजे अशा प्रकारच्या वातावरणात नकळत एक ऊर्जा असते. हालचालीतलं चैतन्य असतं. पण नंदा, या क्षणी तरी या वातावरणाचा भाग होऊच शकत नव्हती. जणू काही तिचं सारं अस्तित्व, त्या दूरच्या पानं गळून गेलेल्या बोडक्या झाडाशीच बांधलेलं होतं. कुठेतरी तिच्या अंत:प्रवाहात एक लांबलचक कोरडा उसासा फिसकारला.

ती घरात आली आणि पुन्हा एका शून्यात हरवली. भिंतीवर कोलाज केलेली अनेक छायाचित्रे होती. दोघांची. ती आणि श्रीरंग. दोन हसरे, आनंदी चेहरे. घट्ट प्रेमाने बांधलेले, मिठीत विसावलेले, हातात हात धरलेले. जणू एक गाढ भावनेचा प्रवाहच त्या भिंतीवर या स्वरूपात दृश्यमान होता. फोटोतला नदीचा किनारा, फेसाळलेल्या लाटा, पौर्णिमेचा चंद्र, नारळाची गर्द झाडी, पाण्याने वेढलेल्या खडकावर बसलेल्या तिचा निवांत चेहरा. हे नुसतेच फोटो नव्हते, त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे बंदिस्त क्षण होते.

एकमेकांबरोबर आयुष्याला सुरुवात करताना किती नादमय होतं सारं! नंदा आणि श्रीरंग सारखं जोडपंच नसेल कुठे? सौंदर्य, आरोग्य, बुद्धी, पैसा सारं काही होतं. कशाचीच उणीव नव्हती. पण बेभानपणे आयुष्य जगत असताना, कुठेतरी जीवनातला पोकळपणा नकळतच आजकाल जाणवायला लागला होता. काही प्रश्न सभोवती झडत होते.

“काय नंदा? संपलं नाही का तुमचं फॅमिली प्लॅनिंग? किती दिवस दोघे दोघेच राहणार? येऊ देत की आता बालपावलांची दुडदुड. “

कधी तिची आईच म्हणायची,

” लवकर विचार करा बाबा! आता आमचीही वय होत चालली आहेत. अधिक उशीर झाला तर आमच्याकडूनही काही होणार नाही बरं! आणि हे बघ प्रत्येक गोष्टीचं वय ठरलेलं असतं बरं का! आता उशीर नका करू, मग पुढे अवघड जाईल. निसर्गाचे काही नियम असतात. “

कोणी बोललं म्हणून नव्हे, पण नंदाला तिच्या स्वतःच्या देहाबद्दल आजकाल काहीतरी परकेपणा जाणून लागला होता.

त्यादिवशी बागेतल्या कुंड्यांना पाणी घालत असताना तिला जाणवलं, ही सदाफुली फुलली आहे, मोगऱ्यालाही वेळेवर फुले येतात, गुलाब उमलतात, घाणेरी सुद्धा सदाबहार असते, पण ही जास्वंदी? हिरवीगार, टवटवीत, भरपूर पान असूनही आजपर्यंत हिला एकदाही एकही फुल आलं नाही. असं का? मग तिने ठरवलं, आता विशेष लक्ष देऊन या झाडाला खत पाणी घालायचं. पण या विचारा बरोबरच एक उदासीनता तिच्या मनाला घट्ट पकडून राहिली.

या विषयावर व्हायला हवी तशी चर्चा त्या दोघांमध्ये आजपर्यंत झाली नव्हती. कदाचित दोघेही, कुणी कुणाला दुखावू नये म्हणून मुद्दामहून हा विषय टाळत असावीत. पण एक लक्षात आलं होतं की कसलेही अवरोधन वापरत नसताना ते का घडू नये? 

सुरुवातीला माणसं नाकबुलीमध्ये मध्ये असतात. आशावादी असतात. ‘होईल की. एवढी काय घाई आहे?’ याही विचारात असतात. पण मग असा एक क्षण येतो की तो शक्याशक्यतेच्या पलीकडे घेऊन जातो. माणसाला खडबडून जागा करतो. आणि गडद अंधारातही ढकलतो.

श्रीरंग तसा फारसा गंभीर नसावा. पण नंदाच्या उदासीनतेकडे तो दुर्लक्ष करू शकत नव्हता. अखेर त्यांनी दोघांनी वैद्यकीय सल्ला घ्यायचा ठरवले. तोही काळ नंदाला खूप कठीण गेला. दोष कुणात असेल? तिच्यात दोष निघाला तर त्यांच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होईल? श्रीरंग नक्की कसा रिऍक्ट होईल? समजून घेईल की दुरावेल?या अपूर्णतेचा तो कसा स्विकार करेल? प्रेमाचं सहजीवन यांत्रिक होईल की आणखी भलतंच काही सोसावं लागेल? या विचारांनी नंदा पार विस्कटून जायची. आणि समजा, दोष श्रीरंग मध्ये निघाला आणि तो डिप्रेशन मध्ये गेला तर? सगळंच अनाकलनीय आणि अस्वस्थ करणार होतं.

श्रीरंग मात्र नंदाला म्हणायचा “नको इतका विचार करूस. काहीतरी मार्ग निघेल. आणि अगं! मुल झालंच पाहिजे या विचारापासूनच थोडी दूर जा की. जीवनात इतर आनंद नसतात का?”

असं कसं बोलू शकतो हा? स्त्री आणि मातृत्व यांचं अतूट भावनिक नातं याला समजत नाही का?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चौफेर, नाना प्रकारच्या टेस्ट्स दोघांच्याही झाल्या. डॉक्टरांच्या प्रश्नांना उत्तर देतानाही कधी कधी मन खचायचं.

पण वैद्यकीय चाचण्यांमधून काहीच निघाले नाही. डॉक्टर म्हणाले, ” व्यंधत्वाचे कुठलेही दोष शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर दोघांतही नाहीत. तुम्हाला मूल न होण्याचं तसं वैज्ञानिक कारण काहीच नाही. “

” मग?”

त्यानंतर डॉक्टर म्हणाले,

” काही वेळा वाढतं वय, मानसिक स्थिती, थकलेपण, ताण-तणाव, दडपण याचाही परिणाम होऊ शकतो. जितकी लैंगिक उत्कटता असायला हवी तितकी नसते. आजकालच्या पीढीची ही समस्याच आहे. पण निराश होऊ नका. शास्त्र खूप पुढे गेले आहे आता. आपण काही प्रगत तंत्रज्ञान वापरून प्रयत्न करू शकतो. म्हणजे इन्सेमिनेशन, आयव्हीएफ, यु आय आय वगैरे. विचार करा आणि पुन्हा भेटा. “

खरोखरच हे सगळं मानसिक दृष्ट्या खूप त्रासदायक होतं. अवघडवून टाकणार होतं. प्रगत शास्त्राच्या उपयोगालाही मर्यादा असतातच. शक्याशक्यताही असतातच. सारं कितीही अवघड असलं तरी याही प्रवाहात जाण्याचं नंदा आणि श्रीरंग ने ठरवलं.

आशावाद नव्हता असंच नाही. पण एक डोंगराएवढं ओझं होतं मनावर. शरीराच्या व्यथेपेक्षा मनाची व्यथा खूप मोठी होती. भावनांचे प्रचंड चढउतार होते. कमतरता, उणीव, काहीतरी नसल्याची जी भावना असते ना ती खचवून टाकणारी असते. सुखाची पानगळच असते ती.

यामधला एकच, अत्यंत सकारात्मक भाग म्हणजे दोघांमधलं नातं! ते अधिक घट्ट होत होतं. दोघंही एकमेकांची मनं जपत होते. पण त्यातही एक होतं की नंदाची मानसिक पडझड जास्त होत होती. श्रीरंगला तेही जाणवत होतं.

त्यादिवशी प्रधानांच्या आजी बोलता बोलता नंदाला सहज म्हणाल्या,

” का ग? तुमच्या पत्रिकांमध्ये एकनाड योग आहे का?”

“म्हणजे?” नंदाने विचारले.

” म्हणजे पत्रिकेत दोघांचीही अंत्यनाड असेल तर मुलं होण्यास बाधा येऊ शकते. कितीही प्रयत्न केले तरी मुल होत नाही, असं म्हणतात. “

नंदाने जेव्हा श्रीरंगला हे सांगितले तेव्हा तो उसळलाच. आणि ठामपणे म्हणाला,

” या कशावरही आपण विश्वास ठेवायचा नाही. लोकांना म्हणावं आमचं आम्ही पाहून घेऊ. तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही. “

पण असं होत नाही ना?

– क्रमशः भाग पहिला 

©  सौ. राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? डाॅ. निशिकांत श्रोत्री – अभिनंदन ?

💐 संपादकीय निवेदन 💐

 !! हार्दिक अभिनंदन !! 

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखक व कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांची पाच पुस्तके २८ फेब्रुवारी २०२५ ते ३० मार्च २०२५ या अल्प कालावधीत प्रकाशित झाली आहेत. हा खरोखरच एक विक्रम म्हणायला हवा. आणि त्यासाठी आपल्या सर्वांतर्फे डॉ. श्रोत्री यांचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन.

त्यांचे असेच आणखी कितीतरी उत्तम साहित्य वाचण्याची सर्व वाचकांना सुसंधी लाभो या असंख्य शुभेच्छा.💐

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तावडे यांचा *आनंदाच्या वाटेवर* हा ललित लेख संग्रह पुणे येथे नुकताच प्रकाशित झाला आहे. या नव्या पुस्तक प्रकाशनाबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

आज त्यांचा लेख “विसाव्याचा थांबा” प्रकाशित करीत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? विविधा ?

☆ “विसाव्याचा थांबा” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

” कुहू ऽऽ कुहू ऽऽ ” कोकीळेची साद ऐकू आली. जणू वसंताच्या आगमनाची वर्दीच दिली गेली. आता वातावरणात फरक पडत जातो‌. हळूहळू थंडीचा कडाका कमी होत जाऊन दिवसाची उब वाढायला सुरुवात होते. उन्हाळी कामांची लगबग सुरु होते.

दरवर्षी शाळेच्या परीक्षेचा शेवटचा पेपर होतो आणि उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीला आरंभ होतो. तसे तर सुट्टीचे वेध परीक्षेच्या आधीपासूनच लागलेले असतात. सुट्टीतल्या धमाल मस्तीचे बेतही तयार असतात. एक काळ असा होता की, ‘ सुट्टी आणि मामाचा गाव’ यांचं अतूट समीकरणच होतं. मामाकडे मामे – मावस भावंडांचा मेळावा जमायचा तर स्वतःच्या घरात चुलत – आत्ये भावंड जमा व्हायची. सुट्टीतलं जणू शिबिर सुरू व्हायचं. एकत्र गप्पा, गोष्टी, गाणी यांची धमाल व्हायची. वस्तूंची देवाणघेवाण, गोष्टी वाटून घेणे, एकमेकाला समजून घेणे, न भांडता रागावर ताबा मिळवणे अशा कितीतरी गोष्टी आपोआप शिकल्या जायच्या. नव्या गोष्टी बनवायला शिकायचो. भातुकलीची तर मजा औरच असायची. शेवटी कला सादरीकरणाला घरचेच व्यासपीठ मिळायचे‌. सभाधीटपणा यायचा. आता या सर्व गोष्टींच्या आठवणी सुद्धा खूप आनंद देतात. किती छान होते ते दिवस. या एकत्रित रहाण्याने मजा तर यायचीच पण नाती आणखी घट्ट व्हायची.

पण आता काळ बदलला. सामाजिक परिस्थिती बदलली. कुटुंब दुरावली. तशी सुट्टीतली ती मजा सुध्दा संपली. आता सुट्टीचे वेगळेच बेत सुरु होतात. लहान मोठ्या मुलांसाठी सुट्टीत वेगवेगळी शिबिरं भरवली जातात. वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन केले जाते. आज-काल बरेच जण पर्यटनाला प्राधान्य देत आहेत. कारण आजचे जीवनमान खूप धावपळीचं झालेले आहे. एकत्र येत पुन्हा जवळीक साधणे अनेक दृष्टीने अवघड आणि गैरसोयीचे झालेले आहे. अशावेळी या पर्यटनाचा मात्र छान उपयोग होतो आहे. पुन्हा सर्वांनी एकत्र येणं या गोष्टीची जाणीव कोव्हिडच्या काळामध्ये जास्त तीव्रतेने झाली. ट्रिपच्या निमित्ताने एकत्र येण्याचा आम्ही कुटुंबीयांनी खूप छान अनुभव घेतलेला आहे.

जागतिक महामारीने वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शाळा, लॉक डाऊन, आयसोलेशन, खा- प्या- खेळा पण सगळं काही घरातूनच या गोष्टीचा अतिशय भयावह अनुभव अकल्पितपणे घ्यावा लागला. लहान-मोठे सगळेजणच यामुळे त्रासले, वैतागले होते. या मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी मिळून कुठेतरी चार दिवस ट्रीपला बाहेर जावे असा विचार सुरू झाला.

कारण निर्बंध कमी झाले, बाहेरचे वातावरण सुधारले. पण मुलांच्या शाळा, अभ्यास, परीक्षा यांच्या ताणाने ते अगदी कंटाळले होते. तर मोठे लोक रोजची धावपळ, सकाळ, संध्याकाळ गर्दीतून प्रवास, कामाचा ताणतणाव, ताणलेले नातेसंबंध, कामाच्या ठिकाणचे दडपण अशा एकूण व्यस्त आणि तणावपूर्ण वातावरणाने अगदी थकून गेले होते. यापासून चार दिवस तरी सुटका मिळावी, थोडे स्वास्थ्य, निवांतपण अनुभवावं म्हणून पुणे ते हरिहरेश्वरचे नियोजन केले होते.

आम्ही घरचेच बारा जण गेलो होतो. हरिहरेश्वरला ‘भोसले वाडा’ हा बंगलाच बुक केला होता. चार बेडरूम्स, किचन, हॉल, गच्ची, अंगण असा प्रशस्त बंगला होता. गच्ची आणि हॉल मध्ये झोपाळे बांधलेले होते. त्यामुळे लहान-मोठे सर्वजण खुश होते. किचनही सुसज्ज होते. त्यामुळे चहा कॉफी मनाप्रमाणे घेण्याची मजा घेता आली.

बंगल्याजवळच्या आतल्या रस्त्याने सरळ समुद्रावर जाता येत होते. मुख्य गर्दीच्या किनाऱ्यापासून थोडेसे दूर स्वच्छ, निवांत, कसलीही वर्दळ नसलेला हा किनारा. सर्वांनी चार दिवस समुद्रात डुंबणे, पाण्यात खेळणे, ओल्या मातीत खेळणे, ओल्या वाळूतून पाण्यातून दूरवर चालणे याचा मनसोक्त आनंद घेतला. सूर्यास्ताचा आनंद तर अवर्णनीय होता.

एक दिवस ‘दिवे आगर’च्या गणेशाचे दर्शन घेतले. एक दिवस ‘बाणकोट’ हा किनाऱ्यावर टेहळणीसाठी बांधलेला छोटा गड बघीतला. बाणकोट म्हणजे सावित्री नदीच्या काठावर असलेल्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्याची प्रमुख जागा होती. सावित्री नदीतील फेरी सेवा घेत आपल्या गाड्यांसह बोटीतून नदीच्या पलीकडे जाण्याचा अनुभव वेगळाच होता. एक दिवस ‘हरिहरेश्वर’ दर्शन आणि मंदिर प्रदक्षिणा केली. इथे स्थलदर्शन करताना काळजी घ्यावी लागली. उन्हाळा तीव्र असल्याने सकाळी आणि दुपारनंतर बाहेर जाणे आणि मधल्या वेळात बंगल्यावर खेळणे, विश्रांती असे नियोजन केले होते.

या जोडीला हापूस आंबे, उकडीचे मोदक, घावन, बिरड्याची उसळ अशा खास कोकणी पदार्थांबरोबर स्वादिष्ट नाष्टा, जेवण यांची मेजवानी होती. त्यामुळे चार दिवस स्वयंपाका पासून सुट्टी मिळाली. हॉल मध्ये फक्त एकच टी. व्ही होता. त्यामुळे सिरियल्स, बातम्या यांच्या भडीमारापासून चार-पाच दिवस अगदी शांततेत गेले. त्या ऐवजी सर्वांच्या गप्पा, जुन्या आठवणी यांना वेळ मिळाला. जोडीने कॅरम, पत्ते, बुद्धिबळ खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. नातवंडेही त्यात आनंदाने सहभागी झाली होती.

या सगळ्यामध्ये एक अतिशय चांगली गोष्ट जर कोणती झाली असेल तर ती म्हणजे इथे असलेली इंटरनेटची ‘अवकृपा’. या गोष्टीचा मला मात्र खूप आनंद झाला.

एरवी पुण्यामध्ये सर्वांची उजाडल्यापासून फोनच्या तालावर धावपळ सुरू होते. नाचकामच म्हणा ना. ‘वर्क फ्रॉम होम ‘म्हणजे काय तर अखंड कानाला फोन चिकटलेला. कान दुखायला लागतो. डोकं कलकलायला लागतं. चिडचिड होते. त्यावरुन घरात वादावादी, गैरसमज, ताणतणाव वाढतात. घरादाराची शांतताच जाते. इथे मात्र वेगळाच अनुभव येत होता. एक दोघांचे फोन रेंज असल्याने चालू होते ते संपर्कासाठी, निरोपासाठी, बुकिंगसाठी उपयोगी पडत होते. पण इतर बहुतेकांचे फोन रेंज अभावी बंद होते. त्यामुळे हात आणि कानही रजेवर होते. मनही रजेचे निवांतपण मनसोक्त अनुभवत होते. आम्हालाही एरवी कामात बुडालेल्या मुलांचा विनाव्यत्यय पूर्णवेळ सहवास मिळत होता. आम्हा दोघा जेष्ठांसाठी ही ट्रिपची खास कमाई होती.

आयटी क्षेत्राने सर्वच क्षेत्रात आज-काल अक्षरशः क्रांती केली आहे. सगळे जग इतके जवळ आले आहे की, शब्दशः घरात सामावले आहे. आयटी क्षेत्रातील नोकरीला तर काळ-वेळाचे नियम लावताच येत नाहीत. प्रत्येक देशाच्या वेळेनुसार रात्रंदिवस संपर्क, चर्चा, मीटिंग्ज सुरू असतात. त्यामुळे या नोकरीत शरीरावर, मनावर अक्षरशः अत्याचार होत असतात. शरीराचे नैसर्गिक चक्रच विस्कटले जाते. त्यामुळे शारीरिक व्याधी, मानसिक ताण-तणावांचे प्रमाण वाढलेले आहे. तो ताण कमी करण्यासाठी मधून मधून अशी पूर्ण विश्रांती घेणे अत्यावश्यक झाले आहे.

आपल्या रोजच्या सवयींपेक्षा वेगळ्या वातावरणात गेल्याने ही सवयींची साखळी लवकर तुटते. वेगळे ठिकाण, वेगळे वातावरण, वेगळी माणसे, वेगळ्या सोयीसुविधा यामुळे वेगवेगळे अनुभव येत असतात. काही घटक छान सुखद अनुभूती देतात. एखाद्या अनोख्या अनुभवाने ‘अरे व्वा, असे पण होऊ शकते !’ ही नव्याने जाणीव होते. तर निसर्गातल्या विविधतेने मन अचंबित होते. अशा भटकंतीने त्या त्या ठिकाणची नैसर्गिक वैशिष्ट्ये, खाद्यसंस्कृती, लोकपरंपरा यांची ओळख होते. मन आपोआप शांत होत गेलेले आपल्याला जाणवतही नाही. पण आपण मात्र हासत खिदळत, गाणी म्हणत, गप्पा मारत निवांत फिरत असतो एवढे मात्र खरे.

यासाठी मधून मधून असे छोटे छोटे ब्रेक किंवा ‘विसाव्याचे थांबे’ घेणे अतिशय गरजेचे असते. त्यासाठी फार प्रसिद्ध ठिकाणे मात्र नसावीत. कारण पुन्हा तिथेही गर्दी, रांगा लावणे, वेळेच बंधन यामुळे धावाधाव, ताणतणाव येतोच. तुलनेने थोडीशी छोटी अशी ही ठिकाणे मात्र यादृष्टीने खूपच सोईची असतात.

इथे मुख्य म्हणजे मनाला विश्रांती मिळते. जिवलगांशी सुसंवाद होतो. सगळे ताण, गैरसमज विसरून नाती जवळ येतात. निसर्गाचे सान्निध्य अनुभवायला मिळते. खूप काही शिकायला मिळते. काही गोष्टी नव्याने समजतात. आत्मपरिक्षण केले तर चुका लक्षात येतात. मग त्या सुधारायची संधीही मिळते. शेवटी रोजचा जीवन संघर्ष करायचा तो काय फक्त पैसे मिळवण्यासाठी ? नाही! तर कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी, सगळ्यांच्याच आनंदासाठी. तेव्हा रोज धावणाऱ्या प्रवाशांना विश्रांती हवीच ना! त्यामुळे थकलेली गाडी पुन्हा नव्या दमाने रुळावर येते. नवीन ऊर्जा, नवा उत्साह, नवी उमेद, नवे विचार, नव्या योजना घेऊन येते. त्यासाठी मनाला ताजेतवाने बनवणारे असे थांबे घ्यायलाच हवेत.

निसर्गाचे अद्भुत विश्व डोळे भरून पहायला, अनुभवायला हवे. मग मन आपोआप गायला लागते,

या जन्मावर या जगण्यावर

शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे !

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

‘सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

💐 संपादकीय निवेदन 💐

💐 अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. उज्वला सहस्रबुद्धे यांचा  ‘कवडसे’ हा लेख संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.हे त्यांचे तिसरे पुस्तक आहे.त्यांच्या या साहित्यिक वाटचालीबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा   !

 

– आजच्या अंकात वाचूया त्यांचे एक पुरस्कारप्राप्त आलेख – “कवडसे…”

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

🔅 विविधा 🔅

☆ कवडसे ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गेले पंधरा दिवस पावसाने अगदी धुमाकूळ घातला होता. जून मध्ये सात जूनला पावसाची थोडी सुरुवात तर झाली पण नंतर पाऊस  गायब झाला.  जवळपास एक दोन नक्षत्रे पावसाने हुलकावणी दिली पण नंतर गणपती बाप्पा आले तेच मुळी पाऊस घेऊन! मग काय सर्वांनाच खुशी झाली. पाऊस पाणी चांगलं झालं तरच शेत पिकणार आणि पावसाची नऊ नक्षत्र अशी नवरात्रीपर्यंत पडली की  पीक पाणी चांगले येणार.. त्यावेळी नवरात्रात येणारे  उन्हाचे कवडसे आपल्याला मनापासून आनंद देतात!

आज खूप दिवसांनी खिडकीतून उन्हाचा कवडसा घरात आला आणि त्याच्या सोनेरी उबेत घराचा कोपरा न् कोपरा सुखावला! बाहेरची सुंद, ढगाळ हवेने इतके दिवस आलेली मरगळ त्या एका कवडशाने घालवून टाकली! खरंच हा सूर्य नसता तर..!

लहानपणी आपण असे निबंध लिहीत असू. सूर्य, पाऊस, हवा, वातावरण यातील काहीही नसतं तर आपलं जीवन कसं वैराण झालं असते याची कल्पनाच करवत नाही!

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूंचे चक्र फिरत राहते, तेव्हा कुठे सूर्याचे फिरणं आपल्या लक्षात येतं! पृथ्वीच्या गतिशीलतेमुळे हे ऋतू आपण उपभोगतो .या प्रत्येक ऋतूचा आपण अनुभव घेत असतो. एका ऋतू नंतर दुसरा ऋतू सुरू होताना नकळत त्याचा कवडसा त्यात डोकावत असतो. पाऊस संपून हिवाळ्याची चाहूल लागते तेव्हा हळूहळू ऋतू बदलाचा कवडसा दिसू लागतो. ऋतू बदलताना ती काही आखीव रेखीव गोष्ट नसते की, एका विशिष्ट तारखेला हा ऋतू संपेल, आणि दुसरा ऋतू येईल! तर हा बदल होतो अलगदपणे! एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जाताना  त्या दोन्ही ऋतूंची सरमिसळ होत असते.त्यांची एकमेकात मिसळण्याची प्रक्रिया चालू असते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अलीकडे या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी आधी कळतात ही गोष्ट अलहिदा! तरीही एखाद्या वेळी अचानक येणारे वादळ या अंदाजावर पाणी फिरवते! असे हे ऋतूंचे चक्र आपल्याला त्यातील असंख्य धुली कणांच्या रूपात सतत दिसून येत असते.

जेव्हा घरात उन्हाचा कवडसा डोकावतो, तेव्हा आपल्याला त्या कवडशात दिसणारे असंख्य धुलीकण वेगवेगळ्या गोष्टींची आठवण करून देत असतात!

तसेच जीवनात येणारे चांगले वाईट असे विविध प्रसंग हे आपल्या आशेने भरलेल्या मनाचे प्रतिक आहे! खूप निराशा, खूप दुःख जेव्हा वाट्याला आलेले असते  तेव्हा नकळतच कुठेतरी आशेचा कवडसा  दूरवर दिसत असतो. नुकतीच घडलेली एक घटना.. माझी पुतणी कॅन्सरच्या आजाराने मृत्यूला सामोरे गेली. खूप वाईट वाटले.. असं वाटलं, परमेश्वर इतका का दुष्ट आहे की त्या तरुण मुलीला मृत्यू यावा! जिचे आता उमेदीचे वय होतं. संसारात जोडीदाराबरोबर उपभोगायचं वय होतं, ते सगळं टाकून तिला हा संसाराचा सारीपाट  अकाली उधळून टाकून जावे लागले! सगळेच अनाकलनीय होतं! इतक्या दुःखद प्रसंगा नंतर हळूहळू त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा नवीन बातमीचा कवडसा आम्हाला दिसू लागला! तिची बहीण प्रेग्नेंट आहे असे कळले, पुन्हा एक नवीन जीव आपल्याला आनंद देण्यासाठी जन्माला येणार आहे, नकळतच त्या बातमीने मन व्यापून टाकले. मनाचा गाभारा उजळून गेला नुसत्या आशादायक  विचाराने! हाच तो कवडसा खूप मोठ्या तेजोवलयाचा भाग असतो! असंच काहीसं या कवडशात दिसत रहातं  ते गेलेल्या गोष्टींचं अस्तित्व!

लहानपणी काचा कवड्या  खेळताना कधी मनासारखं दान पडे तर कधी नाही! पण म्हणून काही त्यातलं यश- अपयश मनाला  लावून घेऊन खेळणं कधी कोणी सोडत का?

अशीच एका जवळच्या नात्यातली गोष्ट! त्या मुलीच्या नवऱ्याचा एक्सीडेंट होतो आणि कित्येक महिने त्याला हॉस्पिटलायझेशन करावे लागते. त्या मुलीला दोन लहान मुली असतात. शिक्षण पदवीपर्यंत झालेले असते. नवरा आजारी, घरात मिळवते कोणीच नाही, अशावेळी ती मनाने खचून गेलेली असते…., पण अचानक तिने  एका नोकरीच्या  ठिकाणी अर्ज केला होता तिथून नोकरीचा कॉल येतो. ती मुलाखत योग्य तऱ्हेने देते, तीन महिने तिला ट्रेनिंग असते.. लहान दोन मुली पदरात.. पण सर्वांनी तेव्हा तिची अडचण काढली. तिने ट्रेनिंग पूर्ण केले आणि कामावर जॉईन झाली.. हा किती सुंदर सोनेरी कवडसा तिच्या जीवनात आला! पुढे तिने दोन्ही मुलींना चांगले शिकवले. तिचा नवराही बऱ्यापैकी ठीक झाला. एक जीवन मार्गाला लागले. असे हे कवडसे प्रत्येकाच्या आयुष्यात संकट प्रसंगी येत असतात, पण त्या  संकटांना न घाबरता ती संधी म्हणून त्याचा लाभ घेता आला पाहिजे! कवडसा हा आशादायी असतो. तो कुठूनही कसाही आला तरी त्यातील धुलिकण न बघता त्याचे तेज पाहिले पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे.. तरच आपल्या जीवनाचे सार्थक होईल, अशा या कवडशावर माझा विश्वास आहे. पुढे पूर्ण अंध:कार आहे असं भवितव्य कधीच नसतं! तर दयाळू परमेश्वर एक तरी झरोका असा देतो की तिथून हा  कवडसा आपल्या आयुष्यात डोकावतो आणि आपला जीवन प्रवास सुकर करण्यासाठी आशावादी ठेवतो….

रोज दिसतो एक कवडसा,

मनात माझ्या आशेचा !

विरतील निराश ढग मनातून,

येईल उत्साह जगण्याचा!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

‘सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

💐 संपादकीय निवेदन 💐

💐 अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 💐

तितीक्षा इंटरनॅशनल ने आयोजित केलेल्या श्री गणेश या विषयावरील काव्य स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे यांना ह्रदयस्पर्शी या गटात पुरस्कार प्राप्त झाला आहे. इ अभिव्य्क्ती परिवाराकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. !

– आजच्या अंकात वाचूया त्यातील त्यांची एक पुरस्कारप्राप्त कविता – “गणेश – जन्म…”

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

? कवितेचा उत्सव  ?

☆ गणेश – जन्म… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गणांचा अधिपती, तू आहेस गणराय !

जन्म माघ चतुर्थीचा, असे मंगलमय !.. १

 *

 पार्वती पुत्र तू, भोळा शंकर तुझा पिता!

असशी तू बुद्धिवंत, तनय एकदंता… २

 *

तुझी जन्म कथा ऐकतो, असे तीही न्यारी !

लाभले गजमुख तुला, सकाळच्या प्रहरी !… ३

*

अवज्ञा तू केलीस, साक्षात श्री शंकराची!

शिरच्छेद केला त्याने, परिसीमा क्रोधाची !… ४

*

 माता पार्वती दुःख करी, पुत्र तिचा गुणी !

आणून द्या त्याचे शीर, माता बोले तत्क्षणी!… ५

*

पश्चात्ताप करी सांब, मातेचे दुःख पाहुनी!

पहिले शीर आणीन, निश्चय केला मनी !… ६

*

 प्रातःकाली दृष्टीस पडे, गजाचे आनन!

गणेशास मिळे पुनर्जन्म, झाला गजवदन!.. ७

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares