मराठी साहित्य – विविधा ☆ ग्रीष्माकडून वर्षेकडे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ ग्रीष्माकडून वर्षेकडे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सरत्या मे महिन्याचे दिवस ! आभाळात हळूहळू ढगांचे येणे सुरू झाले आहे. घामाच्या धारा वाहत आहेत ! असं वाटतंय, यावी एकदा पावसाची मोठी सर आणि भिजून जावे अंगभर ! पण अजून थोडी कळ काढायला हवी ! मृगाच्या आधीची ही तृषार्तता ! ग्रीष्माच्या झळांनी तप्त झालेल्या सृष्टीला आता ओढ लागली आहे ती नवचैतन्य देणाऱ्या वर्षेची ! कायम आठवतात ते बालपणापासूनचे दिवस ! एप्रिलमध्ये कधी एकदा परीक्षा संपते आणि मोकळे होतोय याची वाट पहायची ! आणि मग दोन महिने नुसता आनंदाचा जल्लोष ! सुट्टीत कधी मामाच्या घरी जायचं तर कधी काकाच्या घरी जायचं ! कधी आत्याकडे मुक्काम ठोकायचा ! उन्हाच्या वेळी घरात पंखा गरगर फिरत असायचा,उकाडा असायचा, पण तरीही खेळण्या कुदण्यात बाकीचं भान नसायचं ! आंबे, फणस, काजू, कलिंगडं, खरबूज, जांभळे अशा फळांची लयलूट सगळीकडे त्या त्या प्रदेशानुसार असे ! सगळ्याचा आनंद घ्यायचा ! अगदी आईस्क्रीमच्या गाडीवरील आईसकांडीचा सुद्धा ! उसाचा थंड रस प्यायचा, भेळ खायची..असे ते उडा- बागडायचे दिवस कधी सरायचे कळायचे सुद्धा नाही ! नेमेची येतो मग पावसाळा, तो जसा येतो तशीच शाळा सुरू व्हायची वेळ येते.. 

आमच्या वेळची सुट्टी अशी जात असे आणि जून महिना येत असे. त्याकाळी अगदी नवी पुस्तकं मिळायची नाहीत. सेकंड हॅन्ड पुस्तके गोळा करायची .काही पुस्तकांना बाइंडिंग करून घ्यायचं, जुन्या वहीचे उरलेले  कोरे कागद काढून त्या पानांची वही करायची. दप्तर धुऊन पुन्हा नव्यासारखं करायचं आणि शाळेच्या दिवसाची वाट पाहायची ! नवीन वर्ग, नवीन वर्ष असले तरी मैत्रिणी मात्र आधीच्या वर्गातल्याच असायच्या !

कधी एकदा सर्वांच्या भेटी गाठी घेतो असं वाटे.

गेले ते दिवस म्हणता म्हणता आमची लग्न होऊन मुले बाळे झाली. काळ थोडा बदलला. मुलांसाठी नवीन पुस्तके, नव्या वह्या, दप्तर, वॉटर बॅग अशा खरेद्या होऊ लागल्या. आणि जून महिन्यात छत्र्या, रेनकोट यांनी पावसाचे स्वागत होऊ लागले…… अशा या सर्व संधीकालाचे आम्ही साक्षी. स्वतःचं बालपण आठवताना मुलांचं बालपण कसे गेले ते आठवते. आणि आता नातवंडांचे आधुनिक काळातील बालपणही अनुभवतो आहोत !

काळ फार झपाट्याने बदलला.. मजेच्या संकल्पना बदलल्या. हवा तीच ! सुट्टी तशीच ! पण ती घालवण्याचे मार्ग बदलले. बऱ्याच मुलांना आजोळी जाणे माहित नाही. स्वतःच्या गावी जात नाहीत, जिथे आठ पंधरा दिवस विसावा घ्यायला जाता येईल असं ठिकाण उरले नाही.. उद्योग धंदा, नोकरी यात आई-वडील बिझी, त्यातून काढलेले सुट्टीचे चार दिवस मुलांना घेऊन जातात थंड हवेच्या ठिकाणी ! भरपूर पैसा असतो, खर्च करून येतात आणि मुलांना विकतचं मामाचं गाव दाखवून येतात. आईस्क्रीम, पिझ्झाच्या पार्ट्या होत असतात. हॉटेलिंग, खरेदीची मजा चालू असते. कारण प्रत्येकाला आपली स्पेस जपायची असते. संकुचित झाली का मनं असं वाटतं ! पण तरुण पिढीच्या मर्यादाही कळतात. त्यांचं वेळेचं भान वेगळं असतं .आल्या गेलेल्यांच्या स्वयंपाकाची सरबराई करणारी गृहिणी आता सगळा दिवस घराबाहेर असते. त्यामुळे कशी करणार ती आदरातिथ्य ! यंत्रवत् जीवनाचा एक भाग बनतात जणू सगळे ! असं असलं तरी मुलांचा सुट्टीचा मूड थोडा वेगळा असतो. त्यांना दिलासा देणाऱ्या काही गोष्टी आता आहेत. मुलांना वेगवेगळ्या क्लासेसना नेणं- आणणं हा एक आधुनिक काळातील बदल आहे .संस्कार वर्ग, स्विमिंग, नाट्य, गायन असे वेगवेगळे वर्ग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उघडलेले असतात !  जमेल त्या पद्धतीने मुलांचा विकास व्हावा म्हणून हे क्लासेस जॉईन करण्याचा पालकांचा उत्साह असतो. काहीतरी नवीन शिकवण्याचा अट्टाहास असतो. पुन्हा एकदा शाळेच्या चाकोरीला जुंपण्याआधीचे हे मे अखेरचे आणि जूनचे पहिले काही दिवस असतात !

आता आगमन होणार असते ते पावसाचे ! नव्याच्या निर्मितीसाठी आतूर सृष्टी आणि होणार असते पावसाची वृष्टी ! छत्री, रेनकोट घेऊन चालणार माणसांची दुनिया ! मग कधी पाऊस करतो सर्वांची दाणादाण ! कुठे पाणी साचते तर कुठे झाडे पडतात. सृष्टीची किमया तिच्या तालात चालू असते. माणसाची पुन्हा एकदा ऋतुचक्रातील महत्वाच्या ऋतूला- पावसाला तोंड देण्याची तयारी झालेली असते. मेच्या अखेरचे आणि जूनच्या सुरुवातीचे दिवस विविध अंगाने आणि वेगळ्या ढंगात येत असतात. परमेश्वरा ! तुझ्या अनंत रुपातील हे सृजनाचे रूप मला नेहमीच भुरळ घालते. आकाशातून वर्षणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरीची मी चातकासारखी वाट पाहत राहते. तन शांत, मन शांत अशी ती अनुभूती मनाला घ्यायची असते. सरता मे आणि उगवता जून यांच्या संधीकालातील ही तगमग आता वर्षेच्या आगमनाने शांत होणार असते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– आधुनिक गार्गी – मैत्रेयी… भाग -2 – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – आधुनिक गार्गी – मैत्रेयी… भाग-2 – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

कविश्रेष्ठ इंदिरा संत

विदुषी दुर्गाबाई भागवत

अभिजात संगीत आणि काव्याच्या अभ्यासात मला नेहमीच प्रोत्साहन देणार्‍या पितृतुल्य, गुरूतुल्य अशा नाशिकच्या बाबा दातार आणि परिवाराने माझ्या पहिल्यावहिल्या स्वतंत्र ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ कॅसेटची आणि नंतर ‘रंग बावरा श्रावण’ अशा अनेक कॅसेट्सची निर्मिती केली. स्वतःच ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ असलेल्या दुर्गाबाईंच्या पवित्र हस्ते या कॅसेटचं उद्घाटन झालं. योगायोग म्हणजे आणीबाणीच्या काळी, नाशिकमधले माझे ‘निमंत्रक’ म्हणून बाईंनी, दातार परिवाराचा उल्लेख केला. गंमत म्हणजे दिलखुलासपणे बोलताना त्या एवढ्या रंगून गेल्या की, त्यांनी दीक्षित मास्तरांनी शिकवलेल्या ‘ सुखवी बहु केदार जनमन…’ या केदार रागातल्या बंदिशीत, शुद्ध निषाद आणि कोमल निषाद एकमेकांवर रेललेले असताना किती सुंदर सुरावट होते, ती गाऊनही दाखवली. 

आदरणीय कुसुमाग्रजांच्या सांगण्यावरून, दातार कुटुंबियांनी, इंदिराबाईंच्या बेळगांवी, ‘रंग बावरा श्रावण’ – निवड कुसुमाग्रजांची– भाग १ या कॅसेट – सीडीचा सोहळा प्रचंड उत्साहाने, इंदिराबाईंच्याच शब्दांत ‘कुबेरालाही लाजवेल’ अशा थाटात संपन्न केला. त्यादिवशी अक्कांच्या वक्तव्याची सुरुवात ‘आज माझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस…’ अशी अत्यानंदाने झाली. या कार्यक्रमासाठी मुंबईहून बेळगांवला निघताना, अक्कांच्या सख्ख्या मैत्रिणीने, दुर्गाबाईंनी माझ्याजवळ इंदिराबाईंसाठी पत्रातून शुभेच्छा दिल्या… 

… “ लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आहे आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा, कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले तरी मनाने त्यात आहे बरं का !” अक्कांचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाच्या तरी करंटेपणाने हुकले असले तरी, धीर देताना दुर्गाबाईंचे हे शब्द, थोरल्या बहिणीने पाठीवरून मायेचा हात फिरवल्यासारखे वाटतात आणि डोळ्यांत पाणी तरळते. मी बेळगांवहून परतताना माझ्या हाती दुर्गाबाईंसाठी पत्रोत्तर पाठवताना अक्का म्हणतात, “ मी पद्मजाला म्हटले, खरे म्हणजे साहित्यसृष्टीत दुर्गाबाईच माझा आधार आहेत. तो आधार त्यांच्या साहित्यावर आहे. तो नकळत मला कित्येक गोष्टी देतो. सूर्याचा प्रकाश किरणांतून आला तरी, तो जसा सर्व बाजूला एकदम फाकतो – तेजाळतो तसे तुमच्या बुद्धीचे आहे. तुमच्या प्रत्येक लेखनात हे दिसून येते.”

— अशाप्रकारे या ‘गार्गी – मैत्रेयी’च्या पत्रांचे पोस्टमन होण्याचे भाग्य मला लाभले !  

दुर्गा आणि इंदिरा ही देवीची दोन रूपंच ! एका दुर्गेने आणीबाणीच्या वेळी जो प्रखर दुर्गावतार धारण केला, त्याला तोड नाही. एकटं असूनही तिला कुणाचंही भय वाटत नसे. कुणालाही हार जाणे, शरण जाणे हे तिच्या स्वभावात नव्हतेच. शरीर जर्जर झाले, तरी अगदी मृत्यूलाही  त्यांच्या  ‘देहोपनिषदात’ त्या  ठणकावून सांगतात… 

‘आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत

भय गेले मरणाचे, कोंब फुटले सुखाचे..।।

अवयवांचे बळ गेले, काय कुणाचे अडले

फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे… ।।

मरणा तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज

पायघडी देहाची ही घालूनी मी पाही वाट…

सुखवेडी  मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले…।।’

…. बाई गेल्यानंतरही त्यांच्या शांत, तेजस्वी चेहर्‍यावर ‘ देहोपनिषद सिद्ध झाले ’ हाच भाव होता.

इंदिराबाईंनी पती निधनानंतर अपार हाल सोसले, दुःख भोगलं. एकटेपणा जगतानाही, दैवाला दोष न देता, रडत न बसता, त्या ‘प्रारब्धाला’ही ठणकावून सांगतात….  

‘प्रारब्धा रे तुझे माझे, नाते अटीचे तटीचे,

हार जीत तोलण्याचे, पारध्याचे – सावजाचे.

जिद्द माझीही अशीच, नाही लवलेली मान,

जरी फाटला पदर, तुझे झेलते मी दान,

काळोखते भोवताली, जीव येतो उन्मळून,

तरी ओठातून नाही तुला शरण शरण….’

मला तर वाटतं, इंदिरा अक्कांची सात्त्विक, सोज्वळ कविता हा माझा ‘प्राण’ आहे, तर मला वेळोवेळी साहित्यतुषारात चिंब भिजवणाऱ्या आणि ‘देहोपनिषद’सारखा अपूर्व अभंग देऊन प्रथमच मला ‘संगीतकार’ म्हणून घडवणार्‍या दुर्गाबाईंचे दृढनिश्चयी, ओजस्वी विचार हा माझा ‘कणा’! दोघीही माझ्या जीवनातील  मोठे आधारस्तंभ ! त्यांची आठवण जरी झाली तरी त्याचा सुगंध, चंदनी अगरबत्तीसारखा कितीतरी वेळ माझ्या मनात दरवळत राहतो. दोघींच्या नितांत सुंदर लेखनाने, माझ्या आयुष्याला सुंदर वळण दिलं. गर्भरेशमी कवितेचा ‘ध्यास’ आणि ‘नाद’ दिला. सृजनाचा उत्कट आनंद घ्यायला आणि आयुष्य कसं जगावं, यातलं ‘अध्यात्म’ अनुभवायला शिकवलं… 

‘आत आपुल्या झरा झुळझुळे

निळा निळा स्वच्छंद,

जगणे म्हणजे उधळीत जाणे

हृदयातील आनंद !…’

— समाप्त —

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दिया जलाना कहाँ मना है?… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

दिया जलाना कहाँ मना है ?… ☆ श्री संभाजी बबन गायके 

—’हा अग्निदाहो न संभवे !‘ 

कफी तिचं नाव….तिच्या वडीलांचं त्या तिघांशी काही कारणांनी भांडण झालं होतं. ती अवघ्या तीन वर्षांची होती तेंव्हा. ते तिघे तिच्या घरापाशी आले….ती अंगणात खेळत होती आपल्या मैत्रिणींसोबत..होळीचा सण होता…रंगांची उधळण सुरू होती….या रंगांमध्ये अचानक रक्ताचा लाल भडक रंग मिसळला गेला….त्या तिघांपैकी कुणीतरी एकानं तिच्या चेह-यावर कसला तरी द्र्वपदार्थ फेकला आणि ते पळून गेले…अ‍ॅसिड होतं ते! एखाद्या सुंदर गुलाबपुष्पावर निखारे पडावेत तसं झालं क्षणार्धात. या नाजूक फुलावरच्या दोन नेत्रपाकळ्या जळून गेल्या. मुखकमल काळवंडून गेले होतेच. जीव मात्र बचावला. पण हे असं जिवंत राहणं किती वेदनादायी असतं हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं! 

सामान्य दुकानदार असणा-या तिच्या बापानं कंबर कसली. भारतातल्या सर्व मोठ्या इस्पितळांत तिला उपचारांसाठी दाखल करताना त्याच्याजवळची होती नव्हती ती सर्व पुंजी समाप्त झाली. त्यानं मग तिला जिल्ह्याच्या गावी आणलं….पोटाची खळगी भरण्यासाठी तिथल्या न्यायालयात झाडू मारण्याचं काम स्विकारलं. न्यायालयाचं आवार साफ करणा-या या बापाला त्या न्यायालयात न्याय मात्र मिळू शकला नाही. पोलिसी यंत्रणांच्या मर्यादांमुळे आणि कायद्यातील नागमोडी पळवाटांमुळे तिचे दुश्मन दोनच वर्षांत तुरूंगाबाहेर आले…..ती मात्र अंधाराच्या कोठडीत जेरबंद होऊन खितपत पडली. जिंदगी थांबत नाही. या धावपळीत ती आठ वर्षांची झाली. तिला पहिलीच्या वर्गात  शाळेत दाखल केलं गेलं तिला पण अभ्यासाचं गणित काही जमेना. कारण ती बघू शकणा-या मुलांची शाळा होती. तोपर्यंत बापाचे वीस लाख खर्च झाले होते. कफी आठ वर्षांची झाली होती. राक्षसी दुनियेत काही देवदूतही लपून बसलेले आहेत….त्यांनी साहाय्य केले त्यांच्यापरीने. बापाने मग तिला मोठ्या शहरात आणलं. डोळ्यांविनाही तिचं काळीज जगण्याची आशा घट्ट धरून होतं! तिची स्मरणशक्ती पाहून तिला थेट सहावीच्या वर्गात दाखल केलं गेलं. लुई ब्रेलचे उपकार तिच्याही कामी आले….तिची बोटं शाबूत होती…हात जळाला होता तरी. तिची बोटं एखाद्या निष्णात संवादिनी वादकाच्या सराईत बोटांसारखी ब्रेल लिपीच्या कागदावर उठावाने उमटवलेल्या खडबडीत अक्षरांवरून भराभर फिरू लागली…बोटांतून स्पर्श शब्दरूप घेऊन मेंदूत विसावू लागले. तिथल्या अंधांसाठीच्या डोळस शाळेने सर्व सहकार्य केलं….अंधांनाही वापरता येऊ  शकेल असा संगणक उपलब्ध करून दिला. आधुनिक काळात उपलब्ध असलेली काही साधनं तिच्या मदतीला आली. सीबीएसईचा अभ्यासक्रम इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत काहीसा अवघड मानला जातो. भाषेचं ठीक  आहे, पण विज्ञान,गणितातल्या संकल्पना समजून घेणं किती जिकीरीचे झाले असेल कफीला! पण तिने हार मानली  नाही…दिवसरात्र अभ्यास केला….आईबाप, शिक्षक पाठीशी होते….तिचे गुणांचे शतक अवघ्या पाच टक्क्यांनी हुकले! ९५.०६ टक्के दहावी बोर्ड परीक्षेत! अवघे पाच टक्के मिळवले असते या पोरीने तरी ते शंभर टक्क्यांच्या तोडीचे  ठरले असते! 

‘ नैनं दहति पावक:’ अर्थात ‘ हा अग्निदाहो न संभवे ’ असं ज्ञानोबाराय म्हणून गेलेत….आत्मा अग्निने जाळला जाऊ शकत नाही…कफीचा अंतरात्मा अ‍ॅसिडनेही जाळला जाऊ शकला नाही. मी निरूपयोगी नाही, दृष्टी नसली तरी माझ्याकडे दृष्टीकोन आहे हे दाखवून देणा-या कफीने मिळवलेलं हे यश म्हणूनच अलौकिक ठरते. तिला आय.ए.एस. व्हायचं आहे भविष्यात. खरं तर ती आताच झाली आहे आय.ए.एस (I.A.S….I AM STRONG!). तिच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या….माना की अंधेरा घना है…लेकीन दिया जलाना कहाँ मना है? कफी ! तू प्रज्वलीत केलेली ही ज्योत अनेकांच्या अंधा-या मनात उजेड प्रक्षेपित करेल….हे सूर्यप्रकाशाएवढं ठळक आहे. 

चला…कफीला शुभेच्छा,आशीर्वाद देऊयात…तिच्या चेह-यावर नसलेल्या डोळ्यांतील आशा आणखी पल्लवीत करुयात….तिच्यासाठी प्रार्थना करूयात ! तू देखणी आहेस कफी….लव यू कफी ! 💐

(दैनिक सकाळ,पुणे, इंटरनेटवरील बातम्या यांवर हे लिखाण बेतलेले आहे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पिंपळ आणि आंबा…लेखक – श्री सतीश मोघे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पिंपळ आणि आंबालेखक – श्री सतीश मोघे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

आपले दु:ख, तेवढ्या मोठ्या मात्रेचे नसतांना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढे आले की, थोडे गोंधळायला होते. हे  सात्वंन झिडकारावे की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे  स्वीकारावे ? अशा संभ्रमात पडायला होते खरे… बागेतल्या पिंपळाला असेच काहीसे त्यादिवशी झाले.

बागेतले आंब्याचे झाड त्याला सांगत होते, “बघवत नाही रे तुला पिंपळा.. शिशिर ऋतूने तुला अगदीच पर्णहीन, निस्तेज करून टाकलय. पण धीर धर. काही दिवसाच वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा पालवी…. होईल पुन्हा पूर्वीसारख रूप … होशील माझ्यासारखा…” 

शिशिरात पर्णहीन अवस्थेत नीरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या पिंपळाला यावर काय बोलावे, हे क्षणभर समजेना. अनेकदा दुसऱ्याचे सांत्वन करतांना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतुपेक्षा, आपण खूप सुखात आहोत याचा काकणभर का होईना अभिमान दाखविण्याचा हेतू सांत्वन करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो. पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसे बोलता येत नाही, याची समज आणि उमज पिंपळाला होती.

मंद स्मित करून पिंपळ आब्यांला म्हणाला, “तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी खूप आभार. पण एक सांगू.. मी अजिबात दु:खात नाही. सृष्टीने सहाही ऋतूत आपले प्रारब्ध आधीच लिहून ठेवले आहे. कोणत्या झाडाने केव्हा फुलावे, बहरावे, कोमजावे सगळे सगळे. आपल्या हातात फक्त मूळं आहेत आणि त्यांच्या व्दारे जमिनीतून जीवनरस घेणे आहे.हे एकदा उमगले की दुःखाचा लवलेश नाही”

“आपली मूळं आत सारखीच आहेत. फरक दिसतो, तो  फक्त बाहेर.. जमिनीवर… पाने, फळे, फुले, खोड, उंची यात फक्त फरक. विविधता आणि सौंदयासाठी केलेला… हे एकदा कळलं की, आहे त्यात आनंद.

सुखदुःखापलीकडील समाधानाचा, आनंदाचा अनुभव. आपल्या बाहयरूपातल्या बदलांकडे पहाण्याची एक वेगळीच दृष्टी येते… एक समाधानी अवस्था येते. जिथे कुणाशीही तुलना नाही, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।”

पिंपळाच्या या बोलण्याने आंब्याचे समाधान झाले नाही. त्याने पिंपळाला विचारले, “खरे खरे सांग! पर्णहीन झाल्याने तुझं रूप कुरूप झालय, पक्षी येईनासे झालेत, पानांची सळसळ नाही… याचे खरेच तुला दुःख नाही?”

धीरगंभीर आवाजात पिंपळ उत्तरला, ” नाही. अजिबात नाही. बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपल्या सुखाला जोडून घ्यायचं आणि त्या गोष्टी बदलल्या की दुःखी व्हायचं, ही माणूसं करीत असलेली चूक आपण का करायची! माझं सद्‌भाग्य की, तथागताचा सहवास मला लाभला आणि पानं, फुलं, फळ 

यापलीकडे जाऊन कायम मूळाकडेच पाहण्याची खोड मला जागली. ‘घट्ट मूळ’ आणि ही ‘खोड’ असली की आनंदाला बाधा नाही. बाह्य बदलांकडे पाहण्याची दुष्टीच बदलून जाते”

“‘तू म्हणतोस पाने नाहीत त्याचं दुःख. पण खरं सांगू शिशिर ऋतू माझा ५-६ हजार पानांचा भार हलका करतो. ते २-३ महिने खुप हलकं हलकं वाटत! तू हे सुख नाही अनुभवू शकत.. पानांचा भार नाही. 

सळसळ नाही, पक्षांचे आवाज नाही. त्यामुळे ध्यान समाधीही दीर्घकाळ लावता येते. अधिक मूळाकडे जाऊन चैतन्याचा स्रोत देहभर भरून घेता येतो. वसंताला सामोरे जाण्याची ही पूर्व तयारी असते. म्हणूनच वसंत आला रे आला की अवघ्या सात दिवसात माझ्या देहभर पालवी फुललेली दिसते “

आंब्याला हळूहळू पिंपळाचे विचार पटत होते. पिंपळ पुढे बोलू लागला.” कुणाला आपण किती प्रिय आहोत, यावर आपण आपली प्रियता ठरवू नये. तुझाही मोहोर कधी जळतो.. कधी गळतो.. फळं नाही येत तेवढी… लोकं नाराज होतात..  फळांच्या अपेक्षेने प्रियता, जवळीकता असली की ती कधीतरी लोप पावते. पण फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम केलं की प्रियता कायम रहाते. अशा निरपेक्ष प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांच्या वहीत, पुस्तकात पिंपळपान कायमचं ठेवतात. शिशिरात देहावरची पाने गळाली तरी ती वह्या-पुस्तकातील पाने तशीच असतात. त्यांना बघून मी धन्य होत असतो.”

आपल्या फळाला बाजारात मोठा भाव / प्रसिध्दी आहे, अशा समजूतीत असणाऱ्या आंब्याला पिंपळ आपल्याहून जाणीवेने, विचाराने खूप मोठा आहे, हे एव्हाना जाणवले होते. पिंपळाप्रती आदरभाव, कौतुक व्यक्त करावं म्हणून आंबा पिंपळाकडे वळला तर काय? पिंपळ डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. पर्णहीन पिंपळाचं झाड आंब्याला त्याच्याहून सुंदर दिसलं..समाधानी जाणवलं…आणि  मूळाकडे जायची खोड लावून घेण्याचा निश्चय त्याने मनोमन केला.

लेखक – श्री सतीश मोघे

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “इस्त्री, E स्त्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “इस्त्री, E स्त्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

नेहमीच्या सवयीने इस्त्री करणाऱ्या माणसाला फोन करून कपडे घ्यायला येऊ का? कार्यक्रमाला जायचे आहे. कपडे हवे आहेत. असे विचारले. तो त्याच्या नेहमीच्या सवयीने म्हणाला, तयार नाहीत..  अर्ध्या तासात होतील.

फोन बंद करून ठेवला, आणि लगेचच फोन वाजला. नंबरच होता. कोण आहे…….. या विचारातच फोन घेतला……. सध्या मी फोनमध्ये सेव्ह केलेल्या नावापेक्षा इतर नंबरचेच फोन जास्त येतात……… आपले नंबर यांना मिळतात कसे? हा प्रश्न असतोच……

फोनवर मी काही बोलण्याच्या आधीच एका छान आवाजात माहिती देण्याची प्रक्रिया सुरू देखील झाली.‌.‍………(आता आवाज छान होता म्हटल्यावर ती माहिती नको असताना देखील मी फोन सुरू ठेवला होता हे ओळखले असेलच. त्या आवाजाला उगाचच गोड, मंजुळ अशी विशेषणे लावण्याच्या भानगडीत पडलो नाही.)

सध्या प्रचारात असलेली आणि प्रचलित होणारी ती E जाहिरात होती. या E प्रणालीची सुरुवात कुठून आणि कशी झाली ते सांगता येणार नाही. पण सध्या बऱ्याचशा जाहिराती या अशा E प्रकाराबाबतच असतात, आणि त्यात बहुतांश स्त्रीचाच आवाज असतो. म्हणून ही E स्त्री. कपड्यांच्या इस्त्री चा आणि या E स्त्री चा काहीही संबंध नाही किंवा नव्हता हे आता लक्षात आले असेलच.

साधारणपणे कर्जाने घेतलेले घर, वस्तू यांचा जो एक ठराविक हप्ता असतो त्याला हप्ता ऐवजी  E M I म्हणायची सुरुवात झाली आणि तेथूनच पुढे E चा प्रवास आणि प्रसार वाढला असावा.

E पेमेंट, E शिक्षण, यापासून सुरुवात होत E गेम, E सिगारेट, E व्हिकल, E न्यूज पेपर, E बुक्स असे त्यांचे जाळे वाढतच चालले आहे. आणि इंटरनेट वापरत आपणही त्या जाळ्यात पुढे पुढे सरकत आहोत. 

प्रत्येक पिढीने काही वाक्ये हमखास ऐकली असतील. ती वाक्ये म्हणजे, सगळं बदलत चालले आहे. किंवा, आमच्या वेळी असले काही नव्हते. इ…… तीच वाक्यं परत आठवली.

अगदी जुन्या काळातील वाक्यांचा संदर्भ आठवला, त्यात (इ)कडून काही निरोप नाही, (इ)कडून काही बोलणे नाही असे इ ने सुरु होणारे शब्द आणि वाक्ये स्त्रियांच्या तोंडी असत. पण त्या इ चा संबंध घरच्या माणसाबद्दल असे. पण आता E स्त्री चा आवाज आला की त्याचा संबंध जाहिरातीशी असतो हे समजले. आणि अशी जाहिरात पैशांच्या गुंतवणूकी पासून वैयक्तिक गुंतागुंत सोडवण्यासाठी सगळ्या बाबतीत असते.

फक्त इस्त्रीच्या कपड्यांवरून नंतर लगेचच आलेल्या फोनमुळे ही जाहिरात करणारी E स्त्री देखील आहे हे लक्षात आले. बाकी काही नाही………

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– आधुनिक गार्गी – मैत्रेयी… भाग -1 – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – आधुनिक गार्गी – मैत्रेयी… भाग-1 – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

कविश्रेष्ठ इंदिरा संत

विदुषी दुर्गाबाई भागवत

कविश्रेष्ठ इंदिरा संत आणि विदुषी दुर्गाबाई भागवत ही साहित्य क्षेत्रातली दोन उत्तुंग शिखरं ! या दोघींना पाहिलं, की मला नेहमी डॉ. आनंदी गोपाळ जोशी आणि पंडिता रमाबाई यांची आठवण होई. दोघीही तेजस्विनी, प्रखर स्वाभिमानी, ज्ञानी, मनस्वी आणि कर्तृत्ववान स्त्रिया ! परंतु दोघींनाही एकमेकींविषयी प्रचंड प्रेम आणि आदर ! दोघी एकमेकींपासून शरीराने दूर, पण मनाने एकमेकींना भेटण्याची असीम 

ओढ ! जीवनाविषयी या दोघींना अपार कुतूहल, उत्सुकता आणि प्रेम !

इंदिराबाई आणि दुर्गाबाई या खरंतर माझ्या आजी शोभतील, अशा वयाच्या. पण या दोघींचा मला स्नेह, सौहार्द, आशीर्वाद लाभला आणि माझं भाग्य मला ऐश्वर्यवंत करून गेलं! इंदिरा आणि दुर्गा लक्ष्मीचीच नावं. दोघी सात्त्विक आणि निर्मळ मनाच्या. साधं असणं, साधं वागणं, साधं बोलणं दोघींची सहजप्रवृत्ती ! या द्वयींच्या सहवासात वाटायचं, जणू प्राजक्ताच्या झाडाखाली मी बसलेय आणि धुंद गंधाच्या प्राजक्ताचा माझ्यावर अभिषेक होतोय ! यांच्याकडून किती टिपू आणि काय काय टिपू असं व्हायचं. ज्ञान टिपून घ्यायच्या बाबतीत दोघींचीही हीच अवस्था…. 

‘मी भुकेला सर्वदाचा, भूक माझी फार मोठी,

मंदिरी या बैसलो मी, घेऊनिया  ताट वाटी

ज्ञानमेवा रोज खातो, भूक माझी वाढताहे

सेवितो आकंठ तरीही, मी भुकेला राहताहे…’

वयाच्या नव्वदीतही, दुर्गाबाई त्यांच्या शरीराला न पेलवणाऱ्या वजनाच्या ग्रंथाचे भाषांतर करण्यात गर्क ! ‘मला अजून भरपूर काम करायचंय’ ही प्रचंड उमेद ! जगातली सर्वांत ‘आनंदयात्री मीच’ ही भावना  ! दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ ! जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा वाढदिवसासारखाच साजरा करावा आणि ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे’ हे जीवनाचं तत्त्व ! ९०व्या वर्षीही बाईंची बुद्धी तल्लख ! आणीबाणीविरुद्ध जनजागृती करताना, त्यांनी दुर्गेचा अवतार धारण केला होता, हे सर्वश्रुत आहेच. प्रखर सूर्याचं तेज त्यांच्या वाणीत होतं, तर मृदुभाषी इंदिरेच्या लेखनात चंद्रकिरणांकुरांची ‘शांताकार शीतलता’ होती. दोघींच्या नात्याची वीण मात्र जाईजुईच्या गुंफलेल्या गजऱ्यासारखी घट्ट होती !

‘ प्रत्येक साहित्यकृतीच्या निर्मितीत वाचकाचा, मूळ निर्मात्याइतकाच सहभाग असतो,’ अशी दुर्गाबाईंची श्रद्धा होती. ‘ खरी डोळस मेहनत वाया जात नाही. प्रत्येक अभ्यासकाने किंवा संग्राहकाने आपली कुशाग्र बुद्धी पणाला लावून, स्वतःच्या दृष्टिकोनातून आपली कृती साध्य करावी. प्रत्येकाची कुवत मर्यादित असते. पण एखाद्याने ती सीमारेषेपर्यंत ताणली तर स्वतंत्र कृती निर्माण होते आणि कर्त्याला अपार मानसिक समाधान देते;’ असे त्यांना वाटे. दुर्गाबाईंच्या अशा अनुभवांचा मला कविता गायनात खूप उपयोग झाला..

दुर्गाबाईंना कर्मकांडापेक्षा ‘कर्मयोग’ महत्त्वाचा वाटे. ध्यासी हे प्यासी, पर्यायाने कर्मयोगीच असतात. त्यांची पिपासा जगाला कल्याणकारीच असते. आपलं काम निष्ठेनं, भक्तीनं केलं तरी खूप झालं. परखड तसेच विचारपरिप्लुत व लालित्यपूर्ण लेखन करणार्‍या दुर्गाबाईंनी, आपल्या लेखनात अगदी पाककृतींपासून ते साहित्यसंस्कृती, समाजकारण, वैचारिक लेखन, राजकारण, प्राचीन इतिहास, अशा अनेक प्रांतांत लीलया संचार केला.

दुर्गाबाईंचे स्त्रीविषयक तर्कशुद्ध विचार आजच्या आणि उद्याच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरू शकतील. त्यांना ‘स्त्रीमुक्ती’ चळवळीचे अतिरेकीपण मान्य नव्हते. एकदा तर त्या मला म्हणाल्या, “अगं पद्मजा, रात्री अपरात्री दार वाजलं तर प्रथम आपण घरातल्या पुरुषासच पुढे पाठवतो ना?”  पण स्वतःच्या हिंमतीवर जगणार्‍या कर्तृत्ववान स्त्रियांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. कामाठीपुऱ्यातल्या स्त्रियांसाठी काम करताना अनेकदा त्यांना शिव्याशापांनाही  सामोरे जावे लागले. स्त्रीच्या आयुष्यातील निराशा, अडचणी, त्यांनी अचूक हेरल्या होत्या. 

इंदिराबाईंनाही स्त्रीची ही व्यथा व्याकूळ करते. एका अल्पाक्षरी कवितेत हे ‘वैश्विक सत्य’ त्या अगदी सहजपणे मांडतात…

‘काय बाई सांगू कथा, क्षण विसावा भेटतो,

गुलबाशीच्या  फुलासंगे, पुन्हा दीस उगवतो…

काय बाई सांगू कथा, पाणी आणून डोळ्यांत

एवढेच बोलली ती, घागरीला हात देत….’

इंदिराबाईंच्या मते कविता वाचन म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद लुटणे नव्हे. कविता वाचनात वाचकही निर्मितीक्षम असतो, असायला हवा. तरच त्या कवितेतील सूक्ष्म असलेले, मोलाचे काही उलगडता येईल. 

इंदिराबाईंच्या काव्याविषयी कविवर्य ग्रेस यांनी मला एकदा पत्रात लिहिले होते,

‘दिन डूबा, तारे मुरझाए,

झिसक झिसक गई रैन,

बैठी सूना पंथ निहारूँ,

झरझर बरसत नैन…’

मीरेची एकट एकाकी विरही वेदना, मराठीत अस्सल आत्मतत्त्वाच्या करांगुलीवर जर कोणी तोलून धरली असेल तर ती इंदिराबाईंनीच ! 

‘दुखियारी प्रेमरी, दुखड़ा रो मूल,

हिलमिल बात बनावत मोसो, 

हिवडवा (हृदयात) में लगता है सूल.’

“इंदिराबाईंच्या वेदनेचा हा काटा, पद्मजाबाई तुमच्या गळ्याला गायिका म्हणून नक्कीच झोंबला असणार….”  — ग्रेस. 

“चाकूने किंवा सुरीच्या टोकाने मनगटावर घाव करावेत आणि त्यातून आलेल्या रक्ताच्या थेंबाकडे बघत रहावं, तशा या माझ्या कविता आहेत..” अशी प्रतिक्रिया स्वतःच्या कवितेकडे पाहताना फक्त इंदिराबाईच लिहू शकतात. त्यांची कविता आत्मस्पर्शी व आत्मभान असलेली आहे. ती वाचतानासुद्धा दुर्गाबाईंच्या लेखनासारखी चित्ररूपच कायम डोळ्यांसमोर येते. 

इंदिरा अक्कांचं खास वैशिष्ट्य म्हणजे, निसर्गातील कुठल्याही ‘अजीव’ गोष्टीतही त्यांना ‘चैतन्य’ दिसतं. निसर्गावर तर दोघींचंही प्रचंड प्रेम ! दुर्गाबाईंच्या ‘ऋतुचक्र’, ‘निसर्गोत्सव’, ‘दुपानी’ किंवा इतर लेखनातही हा निसर्ग जिवंत उभा राहतो. अक्कांच्या संवेदनशील मनानं ‘वंशकुसुम’ हा संग्रह तर चक्क पारिजातकाच्या फुलाला वाहिलाय. फुलपाखरू जसं अलगद फुलावर बसावं, तशी त्यांची कविता एखाद्या दवबिंदूप्रमाणे तरल आहे. ‘ दवबिंदूला स्पर्श करताच तो फुटून जाईल की काय या भीतीनं कवितेतील ‘कवितापण’ जपायचा मी प्रयत्न करते, कारण प्रत्येक कविता हे कवीचं बाळच असतं.’.. ही त्यांची हळुवार तरल भावना. 

पती ना. मा. संत निवर्तल्यावर अक्कांनी व्रतस्थपणे लिहिलेली एक कविता… 

‘कसे केव्हा कलंडते, माझ्या मनाचे आभाळ

आणि चंद्र चांदण्यांचा दूर पोचतो ओहळ… 

पेट घेई मध्यरात्र, पेटे काळोखाचे जळ

दिवसाच्या राखेमध्ये, उभी तुळस वेल्हाळ….’

यातील ‘तुळस वेल्हाळ’ हे शब्द म्हणजे अक्कांचा ऑटोग्राफच जणू ! अशा या सत्त्वशील योगिनींचा मला सुगंधी सहवास लाभला, हे माझे महत्भाग्यच ! 

— क्रमशः भाग पहिला. 

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पलायन…” लेखक : रस्किन बाॅन्ड – अनुवाद – सुश्री निलिमा भावे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “पलायन…” लेखक : रस्किन बाॅन्ड – अनुवाद – सुश्री निलिमा भावे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

आकाश उजळत होतं, तसतसे पाईन  आणि  देवदार  वृक्ष  स्पष्ट दिसायला  लागले  आणि पक्ष्यांची हालचाल सुरू झाली. सुरुवात दयाळ पक्ष्याने केली. त्याने एक सौम्य, मंद शीळ घातली. त्यानंतर साळुंक्या झुडुपांमध्ये कलकल करायला लागल्या. एक तांबट एका उंच झाडावर बसून कर्कश्यपणे ठक् ठक् आवाज करायला लागला. आकाश जरा आणखी पांढुरकं झाल्यानंतर तजेलदार हिरव्या रंगाचा पोपटांचा थवा झाडाच्या शेंड्यावरून उडत गेला.

पावसाची भुरभुर चालूच राहिली. पूर्वेकडच्या आकाशात तांबूस रंगाचा चमकदार प्रकाश पसरला आणि मग, अगदी अचानकपणे ढगांमधल्या फटीतून सूर्य बाहेर आला. हिरवंगार पावसाचं गवत एकदम उठून दिसायला लागलं. मी आणि दलजीत दोघेही चकित होऊन हे दृश्य पहात होतो. आत्तापर्यंत कधीच आम्ही इतक्या लवकर उठलो नव्हतो. झाडं, झुडुपं, गवत यांच्यामध्ये विणलेल्या एरवी लक्षात न येणार्‍या कोळ्यांची शेकडो जाळी सोनेरी आणि रुपेरी जलबिंदूंनी नटून लक्ष वेधून घ्यायला लागली. जाळ्याच्या नाजूक रेशमी तंतूंनी सूर्यप्रकाश आणि जलबिंदू यांना तोलून धरलं होतं. प्रत्येक जलबिंदू लहानशा रत्नासारखा चमचमत होता.

पावसात भिजून ओला आणि जड झालेला एक जांभळ्या फुलांचा जंगली डेलिया टेकडीच्या उतारावर पसरला होता आणि पाचूसारखा चमकदार हिरवा गवती किडा त्याच्या एका पाकळीवर पाय पसरून ऊन खात पहुडला होता.

पुस्तक – वावटळ आणि सात कथा

लेखक – रस्किन बॉँड 

अनुवाद – सुश्री नीलिमा भावे 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 194 – पौधे लगाएँ, पेड़ बचाएँ ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 194 ☆ पौधे लगाएँ, पेड़ बचाएँ ?

लौटती यात्रा पर हूँ। वैसे यह भी भ्रम है, यात्रा लौटती कहाँ है? लौटता है आदमी..और आदमी भी लौट पाता है क्या, ज्यों का त्यों, वैसे का वैसा! ख़ैर सुबह जिस दिशा में यात्रा की थी, अब यू टर्न लेकर वहाँ से घर की ओर चल पड़ा हूँ। देख रहा हूँ रेल की पटरियों और महामार्ग के समानांतर खड़े खेत, खेतों को पाटकर बनाई गई माटी की सड़कें। इन सड़कों पर मुंबई और पुणे जैसे महानगरों और कतिपय मध्यम नगरों से इंवेस्टमेंट के लिए ‘आउटर’ में जगह तलाशते लोग निजी और किराये के वाहनों में घूम रहे हैं। ‘धरती के एजेंटों’ की चाँदी है। बुलडोजर और जे.सी.बी की घरघराहट के बीच खड़े हैं आतंकित पेड़। रोज़ाना अपने साथियों का कत्लेआम  देखने को अभिशप्त पेड़। सुबह पड़ी हल्की फुहारें भी इनके चेहरे पर किसी प्रकार का कोई स्मित नहीं ला पातीं। सुनते हैं जिन स्थानों पर साँप का मांस खाया जाता है, वहाँ मनुष्य का आभास होते ही साँप भाग खड़ा होता है। पेड़ की विवशता कि भाग नहीं सकता सो खड़ा रहता है, जिन्हें छाँव, फूल-फल, लकड़ियाँ दी, उन्हीं के हाथों कटने के लिए।

मृत्यु की पूर्व सूचना आदमी को जड़ कर देती है। वह कुछ भी करना नहीं चाहता, कर ही नहीं पाता। मनुष्य के विपरीत कटनेवाला पेड़ अंतिम क्षण तक प्राणवायु, छाँव और फल दे रहा होता है। डालियाँ छाँटी या काटी जा रही होती हैं तब भी शेष डालियों पर नवसृजन करने के प्रयास में होता है पेड़।

हमारे पूर्वज पेड़ लगाते थे और धरती में श्रम इन्वेस्ट करते थे। हम पेड़ काटते हैं और धरती को माँ कहने के फरेब के साथ ज़मीन की ख़रीद-फ़रोख़्त करते हैं। खरीदार, विक्रेता, मध्यस्थ, धरती को खरीदते-बेचते एजेंट।

मन में विचार उठता है कि मनुष्य का विकास और प्रकृति का विनाश पूरक कैसे हो सकते हैं? प्राणवायु देनेवाले पेड़ों के प्राण हरती ‘शेखचिल्ली वृत्ति’ मनुष्य के बढ़ते बुद्ध्यांक (आई.क्यू) के आँकड़ों को हास्यास्पद सिद्ध कर रही है। धूप से बचाती छाँव का विनाश कर एअरकंडिशन के ज़रिए कार्बन उत्सर्जन को बढ़ावा देकर ओज़ोन लेयर में भी छेद कर चुके आदमी  को देखकर विश्व के पागलखाने एक साथ मिलकर अट्टहास कर रहे हैं। ‘विलेज’ को ‘ग्लोबल विलेज’ का सपना बेचनेवाले ‘प्रोटेक्टिव यूरोप’ की आज की तस्वीर और भारत की अस्सी के दशक तक की तस्वीरें लगभग समान हैं। इन तस्वीरों में पेड़ हैं, खेत हैं, हरियाली है, पानी के स्रोत हैं, गाँव हैं। हमारे पास अब सूखे ताल हैं, निरपनिया तलैया हैं, जल के स्रोतों को पाटकर मौत की नींव पर खड़े भवन हैं, गुमशुदा खेत-हरियाली  हैं, चारे के अभाव में मरते पशु और चारे को पैसे में बदलकर चरते मनुष्य हैं।

माना जाता है कि मनुष्य, प्रकृति की प्रिय संतान है। माँ की आँख में सदा संतान का प्रतिबिम्ब दिखता है। अभागी माँ अब संतान की पुतलियों में अपनी हत्या के दृश्य पाकर हताश है।

और हाँ, जून माह है। पर्यावरण दिवस के आयोजन भी शुरू हो चुके हैं। हम सब एक सुर में सरकार, नेता, बिल्डर, अधिकारी, निष्क्रिय नागरिकों को कोसेंगे। काग़ज़ों पर लम्बे, चौड़े भाषण लिखे जाएँगे, टाइप होंगे और उसके प्रिंट लिए जाएँगे। प्रिंट कमांड देते समय स्क्रीन पर भले ही शब्द उभरें-‘ सेव इन्वायरमेंट। प्रिंट दिस ऑनली इफ नेसेसरी,’ हम प्रिंट निकालेंगे ही। संभव होगा तो कुछ लोगों, खास तौर पर मीडिया को देने के लिए इसकी अधिक प्रतियाँ निकालेंगे।

कब तक चलेगा हम सबका ये पाखंड? घड़ा लबालब हो चुका है। इससे पहले कि प्रकृति केदारनाथ जैसे ट्रेलर को लार्ज स्केल सिनेमा में बदले, हमें अपने भीतर बसे नेता, बिल्डर, भ्रष्ट अधिकारी तथा निष्क्रिय नागरिक से छुटकारा पाना होगा।

चलिए इस बार पर्यावरण दिवस के आयोजनों  पर सेमिनार, चर्चा वगैरह के साथ बेलचा, फावड़ा, कुदाल भी उठाएँ, कुछ पौधे लगाएँ, कुछ पेड़ बचाएँ। जागरूक हों, जागृति करें। यों निरी लिखत-पढ़त और बौद्धिक जुगाली से भी क्या हासिल होगा?

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आषाढ़ मास साधना- यह साधना आषाढ़ प्रतिपदा तदनुसार सोमवार 5 जून से आरम्भ होकर देवशयनी एकादशी गुरुवार 29 जून तक चलेगी। 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 67 ⇒ मोटा अनाज  || MILLETS ||… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “किताब और कैलेण्डर”।)  

? अभी अभी # 67 ⇒ मोटा अनाज  || MILLETS ||? श्री प्रदीप शर्मा  ? 

रोटी से इंसान का पेट भरता है। पेट तो जानवर भी भर लेते हैं, लेकिन इंसान एक समझदार प्राणी है। वह घास फूस नहीं खाता, उसकी अपनी रुचि है, अपनी पसंद है, वह जरूरत और हैसियत के अनुसार अपने भोजन का चुनाव करता है, जिसमें देश, काल, परिस्थिति और पर्यावरण का भी अपना योगदान होता है।

जिस तरह इस सृष्टि में जड़ और चेतन की ही तरह जीव और वनस्पति का भी अस्तित्व है, आहार भी मुख्य रूप से शाकाहार और मांसाहार में वर्गीकृत किया जा सकता है। तीन चरों से मिलकर बना यह चराचर जगत, जलचर, नभचर और थलचर के रूप में विराजमान है। जीव के आहार की परिभाषा कम से कम और स्पष्ट शब्दों में इस तरह की गई है, जीव: जीवस्य भोजनम्।।

पेड़ पौधे, वनस्पति, फल, फूल, अनाज, सभी जीव ही तो हैं, निर्जीव नहीं, यहां तक कि हमारी माता और गऊ माता के दूध में भी एनिमल फैट मौजूद है। फिर भी एक लकीर है, जो शाकाहार और मांसाहार को अलग करती है। यह एक वृहद विषय है जिसका हमारे मोटे अनाज से कहीं दूर दूर तक कोई संबंध नहीं है।

स्पष्ट शब्दों में कहें जो जैसे गाय भैंस चारा खाती है, हम संसारी जीव मोटा अनाज खाते हैं। भौगोलिक परिस्थितियों के अनुसार कहीं चावल की पैदावार अधिक है तो कहीं अन्य तरह के अनाज की। ।

आहार संवाद का विषय है, विवाद का नहीं ! किसान जो बोएगा, वही तो खाएगा। एक मजदूर को जितनी मजदूरी मिलेगी, उसमें ही तो वह अपना और अपने परिवार का पेट पालेगा। युद्ध जैसी त्रासदी और अकाल, बाढ़ और जलजले जैसी परिस्थिति में भूख महत्वपूर्ण होती है, पौष्टिक भोजन नहीं।

शेर घास नहीं खाता, कोस्टल एरिया में चावल और जल तुरई ही उनका प्रमुख भोजन है। बड़ा सांभर और इडली डोसा खाने वाला एक मद्रासी व्यक्ति कितनी रोटी खाएगा। कभी पंजाबी लस्सी पीजिए, मलाई मार के। ।

हमने एक समय में लाल गेहूं भी खाया है और आज मोटे अनाज पर जगह जगह परिसंवाद हो रहे हैं, जन जागरण का माहौल है। गांव में किसने ज्वार, बाजरा, और मक्के की रोटी नहीं खाई। लेकिन शहर में आकर मालवी, शरबती गेहूं ऐसा मुंह लगा कि घर घर अन्नपूर्णा आटे ने अपनी पहचान बना ली। ।

भोजन में बढ़ती केमिकल फर्टिलाइजर की मात्रा ने लोगों को सोचने पर मजबूर कर दिया और संतुलित आहार और भोजन की गुणवत्ता पर अधिक जोर दिया जाने लगा। एकाएक भोजन से टाटा का नमक और शकर गायब होने लगी। तेल घी और मिर्च मसालों की तो शामत ही आ गई। मत पूछिए फिर बाजार में चाट पकौड़ी और कचोरी समोसे कौन खाता है।

मोटे तौर पर मोटा अनाज आठ प्रकार का होता है जिसमें ज्वार, बाजरा, रागी, सावां, कंगनी, चीना, कोदो, कुटकी और कुट्टू का आटा प्रमुख है। हमने तो इनमें से सिर्फ ज्वार बाजरे का नाम ही सुना है। रागी आजकल अधिक प्रचलन में है। कुट्टू का आटा, हमारे लिए फलाहार का विकल्प है। ।

आप जैसे ही स्वास्थ्य के प्रति जागरूक होते हैं, सस्ती खाद्य सामग्री आसमान छूने लगती है।

उपेक्षित ज्वार बाजरे की आजकल चांदी है। ब्राउन राइस और ब्राउन राइस अलग भाव खा रहे हैं।

आप अगर ऑर्गेनिक हो सकें तो हो ही जाएं, स्वास्थ्य की कीमत पर, कोई महंगा सौदा नहीं है।

कभी मोटा अनाज गरीबों के नसीब में होता था, आज हम भी नसीब वाले हैं कि इतनी न्यूट्रीशनल वैल्यू वाला मोटा अनाज हमारी पहुंच में है और उधर बेचारा गरीबी रेखा से नीचे वाला आदमी, उसे तो सरकार के मुफ्त राशन से ही अपने पेट की आग बुझानी है। ज्यादा भावुक होने की आवश्यकता नहीं, अपना स्वास्थ्य सुधारें, स्वाद पर नहीं, गुणवत्ता पर जाएं। जान है तो जहान है। ।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रेम… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ प्रेम… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे — खरंच किती भावार्थ लपला आहे नाही या गाण्यात…प्रेम ही ईश्वरी देणगी आहे.. प्रेम हे ठरवून कधीच होत नाही.. प्रत्येक व्यक्ती कधीना कधी कोणावर ना कोणावर प्रेम करतेच नाही का..

कुणीतरी आपल्यासाठी आपल्याला आवडतं म्हणून काही करणं म्हणजे प्रेम असतं. प्रेम हे केवळ व्यक्तीवर  असतं ? तर नाही.. ते भावनेवर असतं त्याच्या/ तिच्या अस्तित्वावर असतं.. त्याच्या / तिच्या  सहवासात असतं… प्रेम हे दिसण्यात असतं ? तर  ते  नजरेत असतं. जगायला लावणाऱ्या उमेदीत असतं. प्रेम निर्बंध असतं..त्याला वय , विचारांचं बंधन कधीच नसतं. जेंव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा अख्खं जग सुंदर दिसू लागतं…त्याचे संदर्भ मनातल्या मंजुषेशी जुळलेले असतात…ते एक अनामिक नातं भावनांच्या मनस्वी लाटा वाहवणार असतं…एक हुरहूर,ओढ आणि तेवढीच धडधड वाढविणारही असतं. कांहीही नसताना खूप कांही जपणार आणि जोपासणार असतं. अश्या अनामिक नात्याची उत्कटता शब्दांत व्यक्त करताचं येत नाही…

प्रेम सहवासाने वाढते.. ते कृतीतून  स्पर्शातून व्यक्त होते.. प्रेमामुळे तर आपुलकी स्नेह निर्माण होतो.

सर्वोच्च प्रेमाची परिणीती म्हणजे त्याग…

आपल्या प्रिय गोष्टीचा त्याग करणे हे ही एक प्रकारचे प्रेमच असते. नाही का..! शेकडो मैल केलेला प्रवास म्हणजे प्रेमाची परिसीमाच नाही काय?.. प्रेम ही एक सर्वोच्च शक्ती आहे. प्रेमामुळेच विविध महाकाव्यांची निर्मित झाली.. 

प्रेम हे  पहाटेच्या धुक्यात असते… रातराणीच्या सुगंधात असते..खळखळ वाहणाऱ्या निर्झरात असते.. तर प्रेम पहाटेच्या मंद झुळकीत ही असते बरे.. इतकं नाही तर दूरदूर जाणाऱ्या रस्त्यात सुद्धा प्रेम असते… प्रेम गालावरच्या खळीत असते…झुकलेल्या नजरेत असते…ओथंबलेल्या अश्रूत ही असते.. शीतल चांदण्यात,  आठवणींच्या गाण्यात, चिंचेच्या बनात, निळ्याशार तळ्यात..दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं..घट्ट घट्ट मिठीत सुद्धा असते. 

गुणगुणाऱ्या भुंग्याला पाहून लाजणाऱ्या फुलात ही प्रेम असते.

सृष्टीच्या प्रत्येक रचनेत चराचरात … निसर्गात प्रेम असते आणि आहे…

विरह हा प्रेमाचा खरा साक्षीदार …वाट पाहण्यातील आतुरता, हुरहुर, ती ओढ, ती न संपणारी प्रतीक्षा.. वेळ किती हळूहळू जातोय असं वाटणारी ती जीवघेणी अवस्था. …तो किंवा ती कधी येईल ? ही वाटण्यातील अधीरता, तो किंवा ती आपल्याला फसवणार तर नाही ना ? अशी मनात येणारी दृष्ट शंका. ..किती किती भावना नाही का? 

मी तिच्यावर /त्याच्यावर प्रेम करावे. त्याला /तिला अजिबात जाणीव नसू नये. .मी निष्ठापूर्वक प्रेम करावे त्याची उपेक्षा व्हावी. ..त्यामुळे झालेले दुःख मला प्राणापेक्षा प्रिय आहे. ही कधी संपत नाही अशी गोष्ट आहे नि न संपणारी रात्र आहे. .फक्त आणि फक्तच ज्योत बनून तेवत रहाणे हेच तर खऱ्या प्रेमाचे भाग्यदेय आहे नाही का? ….

पण खेदाची बाब ही आहे की प्रेम या सर्वोच्च भावनेचा, त्याच्या पवित्रतेचा अर्थच लोकांना अद्याप समजलेला नाही.. नसावा त्यामुळे तर विकृती कडे पाऊले उचलली जात आहेत  प्रेमात वासनेला मुळीच स्थान नसते तर तिथे हळूवार नाजूक स्पर्श हवा असतो. दोन जीवांच्या अत्युच्च प्रेमामुळेच तर सृष्टीची निर्मिती झाली आहे. अशक्य ते शक्य करण्याची ताकद प्रेमात असते नुसते मनच नाही तर जगही प्रेमामुळे जिंकता येते. 

प्रेम म्हणजे स्वतः जगणं आणि दुसऱ्याला जगवण आहे… प्रेमाचा परिसस्पर्श ज्याला होतो त्याचे सारे आयुष्य उजळून निघते..म्हणूनच याला देवाघरचे लेणे असे संबोधले आहे…

प्रेम हृदयातील एक भावना.. कुणाला कळलेली.. कुणाला कळून न कळलेली.. कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली.. तर कुणी आयुष्यभर लपवलेली… कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली.. तर कुणाची गंमत झालेली.. कुणाचे आयुष्य उभारणारी.. तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी….. . फक्त एक भावना…!!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares