मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईचे काही फ़ेमस डायलॉग… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आईचे काही फ़ेमस डायलॉग… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आपल्या लहानपणीचे आईचे काही फ़ेमस डायलॉग …

 

१. आई भूक लागली …

“सारखं काय द्यायचं तुम्हाला खायला, आता मलाच खा”

( दहा मिनिटात आपल्यासमोर काहीतरी खायला असायचं तो भाग वेगळा)

 

२. सकाळची घाई गडबड आणि नेमकं गॅस सिलिंडर संपतं…अती त्राग्याने..” मरा, ह्या मेल्याला पण आत्ताच सम्पायचं होतं? एक एक दिवस अगदी परीक्षाच असते

( त्या परिक्षेत ती अगदी उत्तम पास होते तो भाग वेगळा)

 

३. आई वेणी घालून दे ना…

” एवढी घोडी झाली तरी आई लागते वेणी घालायला”

कृतःकोपा ने प्रेमळ धपाटा ..

( बोले पर्यंत वेणी घालून पण होते ते निराळं )

 

४. ” किती पसारा करता रे..आवरताना जीव मेटाकुटीस येतो, शिस्त नाही तुम्हाला, माझंच चुकलं, चांगले दणके द्यायला हवे होते..”

( तिच्या ही नकळत, रागाच्या भरात सर्व पसारा तीच आवरते)

 

५. पाणी प्यायला स्वयंपाक घरात गेलं की…

” दूध ठेवलय गं गॅस वर, लक्ष ठेव, माझी पाठ वळली की

पळून जाऊ नकोस, मी आलेच पटकन.

( गॅस इतका बारीक ठेऊन जाते, की ती परत आली तरी

किमान दहा मिनिटं तरी दूध तापायला लागतील , पण आपल्याला चांगलीच ओळखून असते त्यामुळे..)

” आणि ढणढण्या गॅस ठेऊ नकोस, दूध करपतं”

( काय बिशाद आपली गॅस मोठा करण्याची)

 

६. परीक्षेला जाताना…

” सगळं व्यवस्थीत घेतलंस ना? पेपर आधी नीट वाच,

धांदरटपणा करु नकोस “

( जगातल्या तमाम आयांना, आपलं परीक्षेला बसणारं

मुल धांदरट का वाटतं, हे न उलगडणारं कोडं आहे, अगदी मी आई झाले तरी)

 

७. आपण बाहेर जाताना…

“लवकर ये, उशीर करु नकोस…जास्त उशीर केलास तर दार उघडणार नाही “

आपल्याला यायला उशीर होतोच..

काळवंडलेल्या चेहर्याने दार उघडताच..

” कित्ती उशीर, काय झालं? सगळं ठीक आहे ना?”

( काळजीने प्रश्नांच्या सरबत्तीत, दार उघडणार नव्हती हे विसरुनच जाते)

 

काय अजब रसायन असतय ना आई म्हणजे?

आपल्याला म्हणते सुट्टी असली तरी लवकर उठावं 

आणि बाबांना म्हणेल, झोपू द्या हो एकच दिवस मिळतो..

 

आपल्याला म्हणते, असं घाबरून कसं चालेल?

आणि स्वतः मात्र सारखी घाबरते..

( हे घाबरणं आपल्यासाठी होतं हे आपल्याला कळे पर्यंत मात्र एक तप उलटतं)

 

पिढ्यांपिढ्या थोडया फार फरकाने हे संवाद असेच चालू रहातील, कारण आई सगळयांची सारखीच असते..आई ही आईच असते..

ती काल ही अशीच होती, आज ही अशीच आहे आणि उद्या पण अशीच राहील..

कारण आई ही फक्त आईच असते… कायम..

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “क…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “क…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

एखाद्या व्यक्तीबद्दल सहज बोलतांना आपण कधीकधी म्हणतो, तो चांगला आहे, पण…….. या पण नंतर सगळे वाईटच असते असे नाही. पण त्यामुळे संमीश्र भावना मनात येतात.

एखाद्या अक्षरा पासून तयार होणाऱ्या शब्दांबद्दल अशाच भावना मनात येतात का?……..

कसं काय ते सांगता येणार नाही, पण क या अक्षरा पासून सुरू होणाऱ्या शब्दांसाठी  मनात अशा संमीश्र भावना येतात. हा माझा बालीशपणा असेल. (हो बालीशपणा, कारण सगळे मनातल्या भावना शब्दात उतरवतात, माझ्या मनात मात्र शब्दांमुळे संमीश्र भावना येतात.) यांचे कारण त्यात प्रश्न, निषेध, राग,  तीरकसपणा, वाईटपणा, नाराजी बरोबरच चांगलेपणा देखील बरोबरीने जाणवतो.         

आपल्याला पडणारे किंवा विचारले गेलेले बरेचसे प्रश्न हे क पासूनच सुरु होतात. आणि त्याच बाराखडीतले (कुटुंबातील) असतात असे वाटले. जसे…..

क – कधी? कसे? कशाला? कशासाठी? कळेल का?

का – का? काय? कारण काय? काय करशील?

कि की – किंमत किती? किंमत आहे का? किती वेळा? किती?

कु कू – कुठे?

के – केव्हा?

को – कोण? कोणी? कोणाला? कोण आहे? कोणासाठी? कोणी सांगितले? कोण म्हणतो? कोण समजतो?

असे बरेच प्रश्न क पासूनच सुरु होतात. इतकेच नाही तर वाईट अर्थाने, किंवा नाराजीने वापरले जाणारे क पासून सुरू होणारे बरेच शब्द आढळतील.

काळा पैसा, काळा धंदा, कट कारस्थान, कारावास, करणी, कुरापत, कुख्यात, कावेबाज, कळलाव्या.

एखाद्या गोष्टीकडे मुद्दाम लक्ष दिले नाही तरी कानाडोळा केला असे म्हणतात.

“स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातंल कुसळ दिसतं.” हा कुसळ देखील चांगल्या अर्थाने वापरलेला नसतो.

निरर्थक गप्पा मारल्या तरी म्हणतात “बसले असतील कुटाळक्या करत.”

नको त्या वेळी कोणी आलं तरी म्हणतो “कोण कडमडलं आता.”

कोणाचा संसार मोडू नये असे वाटते. पण तसे झाले तरी काडीमोड झाला असे म्हणतात.

अती शुल्लक गोष्टीला कवडीमोल म्हणतो. तर अबोला धरल्यास देखील कट्टी झाली असे म्हणतो.

नाराजीच्या अथवा विरोधाच्या सुरात हळूच बोललं तरी कुरकुर नकोय, कटकट नकोय असे म्हणतात.

त्रासदायक वाटणारी, खोड्या, मस्ती, दंगा करणारी लहान मुले कौरवसेना म्हणून ओळखली जाते. तर माणूस कंसमामा म्हणून.

अपरिपक्व असेल तर कच्चा आहे असे म्हणतो. पण ताजा आणि हवासा असतो तो कोवळा.

बरं वाटतं नसले, चांगले दिसत नसले तरी म्हणतो कसंतरी होतय, किंवा कसंतरीच दिसतंय. हिंमत हरली तरी कच खाल्ली असे म्हणतो. घर झाडण्यापूर्वी पायाला जाणवते ती कचकच. आणि टाकायचा असतो तो कचरा. आणि टाकतो (कचरा) कुंडीत.

वाइटाशी वाइट वागून काम साध्य करायचे असेल तर, “काट्याने काटा काढायचा.” (सगळेच शब्द क पासून सुरू होणारे.)

निषेध नोंदवण्यासाठी रंग सुध्दा काळा.  वाइट घटना घडली तरी काळा दिवस, काळी रात्र असे म्हणतो.

अर्जुनाला पडलेले अनेक प्रश्न आणि झालेले युद्ध ते ठिकाण देखील कुरुक्षेत्रच. पण उत्तर देणारे मात्र कृष्ण.

पण सगळेच क पासून सुरू होणारे शब्द प्रश्न निर्माण करणारे आणि नकारात्मकच आहेत असे नाही.

सकाळी उठतानांच “कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. कर मुले……….” म्हणतात.

नमस्कार करतांना कर जोडावे लागतात.  देवालयाचा कळस पवित्र भावना जागवतो. धार्मिक विधीसाठी कद नेसावा लागतो. पहाटे होणारी आरती काकड आरती असते. तसेच किर्तन देखील असते. काशी, केदारनाथ, करवीर (कोल्हापूर) पवित्र स्थान. तर काश्मीर, कोकण, केरळ निसर्गाने नटलेले. कन्याकुमारीचे आकर्षण वेगळेच.

वस्तू आणि स्थळ नाहीत. तर माणसांमध्ये देखील वेगवेगळ्या स्वभावाच्या माता  कौशल्या, कैकयी, कु़ंती पण सुरुवात क पासून. दानशूर पणाचे उदाहरण म्हणजे कर्ण.  तर झोपाळू माणूस म्हणजे कुंभकर्ण.

प्राणी पक्षी यात स्वामीनीष्ठ असतो तो कुत्रा, तर लबाड, धुर्त कोल्हा. बारीक नजर ठेवणारा कावळा. तर गाणारी कोकीळा‌‌.

सहज खुशाली विचारतांना देखील काय? कसं काय? असे विचारले तरी त्यात सुखाचे उत्तर अपेक्षित असते. पण सुरुवात होते क पासूनच. आणि ते प्रश्नच असतात.

कट्टर हा शब्द मात्र शत्रू आणि मित्र दोघांसाठी असतो. ठाम पणे किंवा निश्चयाने बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ.

कृतघ्न जरी क पासून सुरू होत असला, तरी कर्तृत्व, कर्तबगार, कृतज्ञ, कलावंत, कलाकुसर, कलात्मक, कसब, कणखर असे आब वाढवणारे क पासून सुरू होणारे शब्द देखील आहेत.

कवी, कथाकार, कादंबरीकार असे सगळे साहित्यिक, तर प्रेमळ असणारा कनवाळू हे शब्द क पासूनच सुरु होतात.तर चित्रकाराच्या हाती असतो कुंचला.

त्यामुळेच माझ्या मनात क ने सुरु होणाऱ्या शब्दाबद्दल संमीश्र भावना असतात.

आता माझ्या नावांचे काय?……… ते तुम्ही ठरवा.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अम्मी आणि मम्मी – भाग 3 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ अम्मी आणि मम्मी – भाग 3 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

(मागील भागात आपण पाहिले – पाकिस्तानने कॅ. अभिनंदन ना पकडलं. आता मात्र अगदी हद्द झाली! दोन्ही मुलींच्या घरच्यांनी कडक पावले उचलली. तृपित आणि तहरीमचं एकमेकींशी बोलणं बंद करून टाकलं. कडक आज्ञा दिली गेली, की आपापल्या कामाशी काम  ठेवा, सरळ घरून शाळा आणि शाळा ते घर! एकमेकींशी बोलताना दिसलात, तर तुमचं काही खरं नाही! – आता इथून पुढे)

परिस्थितीच तशी झालेली होती. केंव्हाही युद्ध सुरु होण्याची शक्यता होती. युद्ध तर युद्धच असतं. ते जरी सीमेवर चालू असलं, तरी त्याचा परिणाम त्या देशाच्या प्रत्येक नागरिकावर होत असतो, मग तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात का रहात असेना. मुलींची परिस्थिती फारच वाईट झालेली होती. वर्गात फक्त एकमेकींकडे बघता यायचं, बोलणं शक्य नव्हतं. रिकाम्या डोळ्यांनी अशा बघत असायच्या, की जणू दोघी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहेत! तहान भूक सगळं हरपलं होतं दोघींचं. अशा काही चिडीचूप झाल्या होत्या, जसं काही त्यांचा मनमीत त्यांच्यापासून कोणी हिराऊन घेतला होता. त्यांचं हे गुपचूप रहाणं अम्मी आणि मम्मीला व्यवस्थितपणे समजत होतं. पण त्याच्यावर काही उपाय करू शकत नव्हत्या, त्यावर एकच उपाय होता, तो हा, की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंधातील भडकलेल्या आगीवर कुठून तरी थंड पाणी पडावं.

घरांमध्येही तणाव वाढत होता. या दोन्ही देशांच्या बाहेरही, जिथे जिथे या दोन्ही देशातले लोक होते, ते सगळे टी. व्ही. ला चिकटलेले असत. कॅ. अभिनंदनची जेंव्हा पाकिस्तानातून सुटका झाली, तेंव्हा सगळ्यात जास्त आनंद झाला होता, तो मम्मीला. तिच्या स्वतःच्या मुलीच्या मैत्रीसाठी ती आनंदित झाली होती. अभिनंदनचं परत येणं जसं काही तिच्या मुलीची आणि तहरीमची मैत्री वाढवणं होतं. या परतण्याने भडकलेल्या आगीवर थंड पाण्याचा थोडाफार तरी शिडकावा झालेला होता. परंतु, आजीने अजुनही हार मानलेली नव्हती. तहरीमशी मैत्री तोडून टाकण्यासाठी मागेच लागलेली असायची. पाकिस्तान्यांच्या गोष्टी सांगत रहायची – “या लोकांनी आपल्याला असं केलं, तसं केलं.”

तृपितला मात्र समजायचंच नाही, की यात तहरीमचा काय दोष आहे! आणि तिनं स्वतः काय करायला हवं? ती तर तहरीमसाठी जीव पण देऊ शकते. मम्मीला समजायचं, की तृपितच्या मनात काय चाललंय. पण कसं समजावणार तिला, की तहरीम आणि तृपितच्या मधे, अम्मी आणि मम्मीच्या मधे, नुसता हिंदी-उर्दूचा फरक नाही, तर दोन देशांचा फरक आहे, दोन देशातील तिरस्काराचा फरक आहे! एका आईच्या दोन मुलांमधील फरक आहे, जे एकमेकांशी झगडत,लढत एकमेकांच्या जीवावर उठले आहेत.

परंतु, आता ते इथे, तिसऱ्याच देशात होते, जो या दोघांपैकी कोणाचाच नव्हता, तर सगळ्याच देशांचा होता. एक एक करून वेगळं काढलं, तर जगातले सगळेच देश एका शाळेत मिळाले असते. वेगवेगळ्या देशांच्या या स्थानाला, भारत आणि पाकिस्तानची लढाई असो, की इस्त्राईल-पॅलेस्टाईनची लढाई असो काही फरक पडत नव्हता. सगळे आपापसातील तेढ बाजुला सारून एकमेकात मिळून, मिसळून रहायचा प्रयत्न करत असत. शेजारी पाजारी भलेही एकमेकांना ओळखत नसतील, पण कोणी कोणाशी अपमानास्पद पद्धतीने वागत नसत. सगळे आपापले रस्ते निवडून चालत रहात असत.

आज परत तो दिवस आला होता, की तिरस्काराच्या नद्या वाहू लागल्या होत्या. सीमेवर तणाव होता. काकांच्या मरणाची आठवण परत जखम बनून भळभळू लागली होती. हुतात्मा झालेल्या सगळ्या सैनिकांचे मृतदेह आणले जात होते. ज्या लोकांचा दुरान्वयानेही या युद्धाशी संबंध नव्हता, अशा लोकांच्या भावनांशी खेळ चाललेला होता. मुली घाबरून चुपचाप असायच्या. त्यांच्या मैत्रीवर परत एकदा कडक पहारे बसवले गेले होते.

आणि तेंव्हाच एक मोठी दुर्घटना घडली. न्यूयॉर्क शहरातल्या फ्लशिंग हायस्कूलमधे एका माथेफिरूने गोळ्या झाडल्या होत्या. बातमी वाऱ्यासारखी फैलावली. कित्येक पालकांनी शाळेकडे धाव घेतली. आधीच असा सगळा गोंधळ चाललेला असताना तिथेच एक बॉम्बस्फोट झाला. पण तोपर्यंत शाळा रिकामी झालेली होती. पोलिसांचे कडक पहारे लागलेले होते. आपापल्या मुलांचा शोध घेण्याची परवानगी फक्त आई वडिलांनाच दिली जात होती. धावत पळत मम्मी जेंव्हा शाळेत पोचली, तेंव्हा तिथे नुसता धूरच पसरलेला दिसत होता. तो धूर एवढा दाट होता, की लोकांच्या नाका-तोंडात जाऊन लोकांचा खोकून खोकून जीव हैराण होत होता, तरीसुद्धा प्रत्येक जण आपापल्या मुलांना जीव तोडून शोधत होता. कुठून तरी तृपित दिसावी, ती मिळावी या आशेने वेडावून गेलेल्या मम्मीची नजर आपल्या मुलीची एक झलक बघण्यासाठी शोधत होती. तिचे वडीलही आजीला घेऊन तिथे आले होते. सगळं काही ठीक असल्याची एकही खूण नजरेला पडत नव्हती. जिथं बघावं तिथे निराशा पदरात पडत होती. मनात एक अनोळखी भीति होती, जी मुलीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उभे करत होती.

इतरही अनेक पालक आपापल्या मुलांना हाका मारत वेड्यासारखे सर्वत्र धावत होते. जवळ जवळ अर्धा तास मम्मी, तृपितचे वडील आणि आजी तृपितला शोधत होते. शेवटी हार मानून त्या दोघी जोरजोरात हुंदके देऊन रडायला लागल्या, तृपितच्या वडिलांच्या डोळ्यातूनही अश्रू वहायला लागले. आजी जोरजोरात किंचाळून रडत होती, इतक्या जोरात, की त्या बॉम्बस्फोट करणाऱ्यांच्या कानावरही तो आवाज जावा, की या निष्पाप मुलांनी तुमचं काय बिघडवलं होतं? आजी जोरजोरात किंचाळत होती – “माहित आहे मला, हा बॉम्ब माझ्या मुलाच्या खुन्यांनीच फोडला असणार. रक्तपिपासू आहेत हे लोक, माझ्या नातीला पण मारायचं आहे आता ह्यांना!” पण त्या कोलाहलात अश्रू गाळण्याशिवाय कोणाच्या काही लक्षात येत नव्हतं. आणि ही वेळ अशी होती, की कोणीच काही करूही शकत नव्हतं.

धूर, पोलिसांच्या सायरनचा आवाज आणि लोकांचं रडणं! जेंव्हा द्वेषाची आग हसत्या-खेळत्या लोकांचं आयुष्य आपल्या धगीने जाळून, भाजून काढते, असा हा एक अभद्र, काळा दिवस होता. तेवढ्यात समोरून आवाज येऊ लागले. धुराचे ढग थोडे विरळ झाल्याबरोबर समोरचं दृश्य दिसू लागलं. पोलिसांच्या बंदुकांच्या संरक्षणात काही लोक बाहेर येत होते. त्या येणाऱ्या लोकांच्या गर्दीत तहरीमची अम्मी दिसत होती, तिच्या एका बाजूला तहरीम तर दुसऱ्या बाजुला तृपित होती. त्या धुरात अजुनी जमीन दिसत नव्हती की आकाश दिसत नव्हतं, सगळं धूसर-धूसर होतं, सावल्या होत्या आणि दोन्ही मुलींच्या पाठीवर आईचा हात होता. त्या दोघी घाबरून, अम्मीला चिकटून चालत येत होत्या.

तो एक क्षण असा होता, की ना कोणी भारतीय होतं, की ना कोणी पाकिस्तानी, फक्त दहशत होती आणि घाबरलेले लोक होते. एक आई होती, जिचा संबंध ना कुठल्या देशाशी होता, ना कुठल्या सीमेशी! ती फक्त आणि फक्त मुलांची आई होती! एकेका बाजुला तहरीम आणि तृपित होत्या आणि त्यांच्या पाठीवर अम्मीचा हात होता. मंटो यांच्या कथेतील टोबा टेकसिंहचे ते दृश्य जसं काही परत एकदा जिवंत झालेलं होतं, जिथे जमिनीच्या त्या तुकड्यावर कुठल्याही देशाचं नाव नव्हतं. अगदी तसेच इथे अम्मीचे ते हात होते, जे ना भारताचे होते, ना पाकिस्तानचे! हे एका मातेचे हात होते, माता जी मुलांची जननी असते! आपल्या मुली सुरक्षित आहेत हे बघून आज पहिल्यांदाच अम्मी आणि मम्मी एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या. समोर उभ्या असलेल्या आजीच्या डोळ्यातही अश्रू होते, जे तिच्या मनातला द्वेष धुवून टाकण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत असावेत!                                                 

– समाप्त –

मूळ हिंदी कथा – अम्मी और मम्मी – मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिवरात्र आणि ऊसाचा रस – सुश्री विनीता क्षीरसागर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ शिवरात्र आणि ऊसाचा रस – सुश्री विनीता क्षीरसागर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

पूर्वी शिवरात्र आणि उसाचा रस हे जणू समीकरणच ठरलेले होते. म्हणून लहानपणी आम्ही अगदी वाट बघत बसायचो, शिवरात्रीची….!                     

पूर्वी उपवासाचे पदार्थ अगदी पोटभर असे मोठी एकादशी, शिवरात्र, अशा मोठ्या उपवासालाच मिळायचे………….! नाहीतर एरवी मोठ्या माणसांना फराळासाठी केले की एकेक घास हातावर मिळायचा…….! आता कसे आपण एरवी सुध्दा साबुदाणा खिचडी करतो..! किंवा बाहेर हॉटेलमध्येसुध्दा खिचडी, साबुदाणा वडे इ… सगळे काही मिळते……! पूर्वी अगदी आई, आजी राजगिऱ्याच्या लाह्या सुध्दा घरी फोडायच्या……!                                                                        

शिवरात्रीला आजीबरोबर  सगळ्यांनी रामेश्वर मंदिरात जायचे….. आल्यावर साबुदाण्याची खिचडी, बटाटा भाजी, कवठाची पाट्यावर वाटलेली चटणी, घरी केलेल्या तळलेल्या पापड्या, खाडिलकरांकडून विकत आणलेले ताक, रताळयाचे गुळाच्या पाकातले काप ह्यावर अगदी पंगत मांडून यथेच्छ ताव मारायचा एवढेच होते…!

नंतर दुपारी सगळी मोठी मंडळी डाराडूर पंढरपूर म्हणून झोपून जायची………..! घरातली लहान मुले मात्र केव्हांच एकदाचे साडे चार  वाजून जातायत  ह्याची वाट बघत घड्याळ बघत बसायची……! कारण  दुपारी पाच वाजून गेले की घरी उसाचा रस आणायचाच हे शिवरात्रीला ठरले असायचे…..! तोही एक कार्यक्रम च असायचा….! स्टीलची एखादी मोठी लोटी घेऊन गुऱ्हाळात जायचे, जाताना बर्फासाठी एखादा मोठा कापडी रूमाल किंवा पिशवी घेऊन जायची……!  त्या वेळी आमच्या घराच्या जवळ म्हणजे धर्म चैतन्याच्या कोपर्‍यावर एक गुऱ्हाळ सुरू झालेले असायचे. तट्टे ठोकून केलेल्या भिंतभर रंगीबेरंगी कॅलेंडर्स, देवांची चित्रे लावलेल्या त्या गुऱ्हाळात जायला खूप छान वाटायचे……..! आई त्याला गेल्या बरोबर “ताजा काढून देरे बाबा रस” म्हणून बजावायची….. तसेच न विसरता त्यात आले लिंबू टाकायला सांगायची……….! त्याचा रस चक्रातून काढणे……., भुश्श्यातला तरटात गुंडाळलेला बर्फ फोडणे हे जवळून बघायला खूप मजा वाटायची…..!  त्या वेळी फ्रीज नव्हते म्हणून बर्फ बाहेरून च विकत घ्यावा लागे……………! गुऱ्हाळात सुध्दा बर्फाचे वेगळे पैसे द्यावे लागत……! … असे सगळे करून एकदाचा रस घरी यायचा……….!                                 घरातले चहाचे कप रसासाठी सज्ज असायचे….! बर्फ पाण्याने स्वच्छ धुवून फोडून झाला की रसाचे कप भरून सगळयांना रसाचा वाटप व्हायचा……!..

….. रस पिऊन मन तृप्त व्हायचे व आता खरी शिवरात्र साजरी झाली असे वाटायचे………! दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर “काल आमच्या कडे उसाचा रस आणला होता.” हे न चुकता सांगण्यात एक धन्यता वाटायची…………! कारण पूर्वी उसाचा रस पिणे ही सुध्दा एक चैनच वाटायची……..! बैलाच्या चरकावरचा रस पिण्यासाठी आम्ही सगळे… घरातले लोक  लक्ष्मी रोड जवळच्या इलेक्ट्रिक आॉफीसजवळच्या गुऱ्हाळात जायचो…….! ते सुध्दा सगळ्यांच्या वार्षिक परीक्षा झाल्यावर बरं का………!

लेखिका : सुश्री विनीता क्षीरसागर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ? — कवी रमण रणदिवे ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ? ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆  

भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?

यावर आपण एक उदाहरण बघू. तीन महिन्यांसाठी एक प्रयोग करून बघा. सात्त्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो. कारण जसे अन्न, तसे मन होते. सात्त्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही, तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते.

जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल, तर त्यास सात्त्विक अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक  करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात, उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये. (जेवण बनवू नये. अन्न शिजवू नये.)

तसेच स्वयंपाक करत असताना कधीही आईला, बहिणीला, पत्नीला (जे कोणी स्वयंपाक करत असतील, त्यांना) ओरडू नये, रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना, त्या पदार्थांत त्याच प्रकारची (सर्व रागाची) स्पंदने जातात आणि तेच आपण खाणार असतो. ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

आणि म्हणूनच पूर्वी सोवळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती.

भोजन तीन प्रकारचे असते.

(१) जे आपण हॉटेलमध्ये खातो,

(२) जे घरात आई, पत्नी बनवते आणि

(३) जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो, ते भोजन.

तिन्ही भोजनांत वेगवेगळी स्पंदने असतात.

(१) हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात, ते विकत घेऊन खावे लागते. ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत. त्यामुळे कधी कधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो. ते पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याचा भाव कोणता आहे, ते सगळं त्या अन्नात उतरतं, तेच संस्कार त्या अन्नावर होतात. तोच भाव आपल्यात उतरतो.

(२) घरात आई, पत्नी जे पदार्थ करते, ती फार प्रेमाने करत असते. म्हणून त्या पदार्थांत सात्त्विक स्पंदने असतात, ती आपणास समाधानी बनवतात. 

परंतु हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात. त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत.

घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल, की मला अजून एक पोळी वाढ. तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो. ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते. त्यात तिचे प्रेम असतं, आनंद असतो. पण हेच आपण स्वयंपाक्याकडे मागितले, तर तो वाढेल; पण त्यात प्रेम असेलच, असे नाही. असे जेवण अंगी लागत नाही.

(३) मंदिरात अन्नकोटात आपण जे खातो, तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो. ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते.

आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत, असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसादच भक्षण होईल.

स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल, तर त्यावर हा एक उपाय आहे. ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा.

परमेश्वरास प्रार्थना करावी, की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम , वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे. त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता, तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा.

अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्कारांचाही परिणाम होतो. स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे भाजी असो, कुकर असो, काही असो, त्या पात्राला हात लावून कृष्णार्पणमस्तु म्हणून नमस्कार करा. मग बघा, काय जादू होते.. 

सगळी आसपासची सूक्ष्म स्पंदनं संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल प्रसाद !

संग्रहिका : माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्योती कलश छलक… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ ज्योती कलश छलक… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

पूर्वी दूरदर्शनवर राष्ट्रीय साक्षरता मिशन या कार्यक्रमाच्या प्रचारार्थ एक गाणं दाखवलं जायचं. मला ते फार आवडायचं. ते गाणं होतं ‘ पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा , जागी हर दिशा दिशा , जागा जग सारा. ‘ त्या गाण्यात सकाळच्या सूर्याचा सोनेरी प्रकाश,छोट्या मुलांचं पाटीवर मुळाक्षरं गिरवणं , त्या वृद्ध आजोबांचा हसतमुख चेहरा, त्यांचं दाढी करताना साबणाचा फेस त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्याला लावणं, नंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवणं, त्या मुलाचा विलक्षण हास्याने उजळलेला चेहरा, त्याचं निरागस हास्य या गोष्टी मनाला खूपच स्पर्शून जात होत्या. काही काही गोष्टी अशा चिरकाल स्मरणात राहून जातात. तसेच ते ‘ मिले सूर मेरा तुम्हारा ‘ हे गाणं . भारतातील विविध भाषा, विविध भागातील प्रादेशिक प्रथितयश कलाकार आणि गायक आणि विविध नयनरम्य दृश्ये यामुळे ते गाणं अमर झालं आहे. भारतातील विविधतेतील एकतेच दर्शन घडवण्यात त्या गाण्याचा दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.

तसेच ज्योती कलश छलके हे गाणं . सूर्य उगवल्यानंतरच्या दृश्याचं मनोरम वर्णन त्या गाण्यात आहे. अशी खूप गाणी आहेत. जी सकाळची वेळ दाखवतात. सूर्य उगवला आहे, आणि त्याबरोबर सारी सृष्टी कशी चैतन्यात न्हाऊन निघाली आहे हे बहुतेक गाण्यातून दाखवले आहे. अशी मन प्रसन्न करणारी भक्तिगीते तर भरपूर आहेत. गणपतीला भूपाळी म्हणताना ‘ तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्वदिशी फडकती, अरुण उगवला, प्रभात झाली , उठ महागणपती. ‘ किती सुंदर वर्णन हे ..! शब्दातलं सौंदर्य बघा. गणपतीचा वर्ण लाल, आरक्त. तशीच पूर्व दिशा सकाळच्या वेळी लाल, आरक्त झाली आहे. जणू रक्त पताका म्हणजे लाल रंगाच्या पताका पूर्व दिशेला सूर्यदेवाच्या आगमनाने फडकत आहेत.

तर दुसऱ्या एका अवीट गोडीच्या भक्तिगीतात श्रीरामाला जागवताना, ‘ उठी श्रीरामा, पहाट झाली, पूर्वदिशा उजळली, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली ..’ त्याच गाण्यात पुढे ‘ चराचराला जिंकून घेण्या अरुणप्रभा उगवली.. ‘ असे शब्द आहेत. खरोखर सूर्योदय झाला की त्याची प्रभा, प्रकाश जणू चराचर जिंकून घेतो. चराचरात चैतन्य आणतो. धरतीवरच निद्रिस्त जीवन जागृत होतं . फुलं उमलतात, पक्षी गाऊ लागतात. देवळातल्या घंटा निनादू लागतात. काही काळापूर्वी सगळीकडे पसरलेलं अंधाराचं साम्राज्य कुठे नाहीस होत ते कळत नाही. ‘ फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..’ दरीखोऱ्यात मग सगळीकडे प्रकाशच प्रकाश भरून राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे तो सोबत येतांना नव्या दिवसाबरोबर नव्या आशा घेऊन येतो. नव्या आशा, नव्या दिशा आणि जीवनाचे नवे गाणे.

वसंतराव देशपांडेंनी गायलेलं ‘ तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज..’ हे गाणं मनाला स्पर्शून जातं .  कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे पद पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलं आणि त्याला संगीतसाज चढवला आहे जितेंद्र अभिषेकी बुवांनी. ललत पंचम रागातील हे गीत कधीही ऐकलं तरी आनंद देणारं . हा तेजोनिधी एकदा आकाशात प्रकटला की अवघे भुवन म्हणजे जग त्याच्या दिव्य स्पर्शाने झगमगून जातं .

आपण भारतीय किती भाग्यवान आहोत, याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. जगातील अनेक देशात फार कमी मिळणारा सूर्यप्रकाश आमच्या देशात जवळपास बारा महिने  मुबलक उपलब्ध आहे. हे आमचे केवढे भाग्य आहे. आणि आता तर उन्हाळा सुरु झाला आहे.  आम्ही सूर्योपासनेच्या बळावर कोरेनासारख्या  संकटाचा यशस्वी मुकाबला करू शकलो. सूर्यनमस्कारासारखा व्यायाम आम्हाला शक्ती देईल. आमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल. कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरायला जाणे आमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल.

 सूर्य हा अनंत काळापासून आपला शक्तीदाता आहे, बुद्धिदाता आहे, आरोग्यदाता आहे. तो आहे तर पृथ्वीवर जीवन आहे. म्हणूनच तो खऱ्या अर्थाने ‘ मित्र ‘ आहे. सकाळी उठल्यावर प्रकाशमान, चैतन्यदायी असं काही आपल्याला दिसत असेल, तर ते म्हणजे पूर्वेला उगवलेला सूर्य. केवढ्या तेजानं ती पूर्व दिशा उजळली असते..! अशा वेळी आपणही त्या तेजाचं दर्शन घ्यावं. त्या तेजात न्हाऊन घ्यावं. त्याला थोडी प्रार्थनाही करावी. की बाबा, या तुझ्या विलक्षण तेजातला काही अंश तरी आम्हाला दे. आमचेही अंतर असेच उजळू दे. त्यातील अमंगल, वाईट विचार, निराशा यांचा अंध:कार तुझ्या तेजात नष्ट होऊ दे. आम्हाला आरोग्य प्रदान कर. रोगराई नष्ट होऊ दे. सर्वांचं मंगल कर, सर्वांचं कल्याण कर.

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

 ©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मला भावलेलं इंग्लंड” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “मला भावलेलं इंग्लंड” ☆ श्री मोहन निमोणकर ☆

मागच्या वर्षी मी आणि बायको संजीवनीची इंग्लंडला जायची तिसरी वेळ होती. मुलगा आशिष फिजिओथेरपीमध्ये एम.एस. करून तिथं नोकरी करतोय, तर सून निवेदिताही तिथंच वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करते. दोघांनी तिथं नवीन संसार सुरु केल्यानं त्यांचं कौतुक करायला आणि चिरंजीव अभिनवला भेटायला आम्ही इंग्लंड गाठलं.

इंग्लंडमध्ये भौगोलिकदृष्ट्या पाहण्यासाठी ब-याच गोष्टी आहेत. पण यंदा आम्हाला तिथल्या सामाजिक आणि सार्वजनिक गोष्टी खूपच भावल्या. किंबहुना याच तिथलं वेगळेपण सिध्द करायला पुरेशा ठरल्या. एखाद्या देशाची ठरलेली जीवनशैली आणि स्वभाव असतो, यामध्ये इंग्लंड खरंच चारचौघांपेक्षा भिन्न ठरतो.

इंग्लंडमध्ये ढोबळमानानं चार ऋतू आहेत. समर, ऑटम, विंटर आणि स्प्रिंग. समरमध्ये पहाटे पाच वाजताच उजाडतं आणि रात्री १० वाजता अंधार पडतो. ऑटम, विंटर आणि स्प्रिंगमध्ये उशीरा उजाडतं आणि अंधारही लवकर म्हणजे दुपारी चार वाजताच पडतो. विंटरमध्ये तापमान सर्वात जास्त म्हणजे पाच ते सहा अंश तसंच कमी म्हणजे उणे असतं. इंग्लंड उत्तरध्रुवाजवळ असल्यानं तिथं खूप थंडी असते. समरमध्ये मात्र तापमान १८ अंश झालं, तरी लोकांना उष्णतेची लाट आल्यासारखं वाटतं. आम्हाला इथं एक गोष्ट नवीन वाटली. ती म्हणजे, दिवस लवकर वा उशीरा उजाडण्याचा, मावळण्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून वर्षातून दोनदा घड्याळ ऍडजस्ट केलं जातं. मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारी घड्याळ एक तास मागं करतात. सार्वजनिक बागांमध्येही बागा उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा उजेडानुसार बदलतात. तशा प्रत्येक महिन्याच्या वेळांचा बोर्ड आगाऊच लावलेला असतो. वर्षभरात पाऊस कधीही येतो; परंतु वेगळा असा पावसाळा हा ऋतू इथं नाही.

इंग्लंडची वाहतूक व्यवस्था जगातील उत्तम व्यवस्था म्हणावी लागेल. महाग आहे; पण अतिशय उत्तम. रेल्वेचं नेटवर्क हे खाजगी कंपन्यांकडे सोपवलंय. त्या कंपन्या म्हणजे सदर्न रेल, साउथ इस्टर्न रेल्वे, नॉर्दन रेल, ग्रेट वेस्टर्न रेल्वे आणि व्हर्जिन रेल्वे. या पाच खाजगी कंपन्या सर्व युकेचा रेल्वेचा प्रवास सांभाळतात. रेल्वे डब्यांची स्थिती अतिशय उत्तम. दारं आपोआप उघड-बंद होतात. त्यामुळे पळत येऊन गाडीला लटकत गाडी पकडणं हा प्रकार नवीन नाही. याव्यतिरिक्त लंडन ट्यूब रेल्वेही म्हणजे ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ इतर कंपन्यांचा भार हलका करते. ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ ही खाजगी कंपनी इंग्लंडमधील बसवाहतूक सांभाळते. बसमध्ये लहान मुलांच्या बाबा गाड्यांनाही प्रवेश प्राधान्यानं असतो. चढण्या-उतरण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, शिवाय उतरण्याचा आपला स्टॉप येण्यापूर्वी आपल्या सीटजवळील बटण दाबलं, की ड्रायव्हरला मेसेज जातो आणि तो बस स्टॉपवर थांबवतो. ड्रायव्हरच तिकिटं पाहतो आणि काढतोही.

रेल्वे आणि बसच्या तिकिटांचे दर हे वेळेनुसार (गर्दीच्या) कमी-जास्त असतात. तसंच, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी कमी असतात. एखादी ट्रेन रद्द झाली आणि रात्रीनंतर ट्रेन नसेल, तर पर्यायी व्यवस्था स्टेशनबाहेर केलेली असते. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत वा-यावर सोडलं जात नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये पादचा-यांना फार महत्त्व दिलं आहे. रस्ता क्रॉस करण्यासाठी ‘सेल्फ ऑपरेटेड सिग्नल्स’ आहेत. या गोष्टी आम्हाला खूपच भावल्या. एखाद्याला कार रिव्हर्स घ्यायची असेल आणि तो रस्ता कितीही वाहता असेल, तरी त्याचं रिव्हर्स घेणं पूर्ण होईपर्यंत सर्व गाड्या थांबतात आणि कुणीही हॉर्न वाजवत नाहीत, हे विशेष. रस्ते आपल्याएवढेच, तरीही लहान-मोठी वाहनं बिनबोभाट जा-ये करत होती. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कठीण अशा परीक्षेला सामोरं जावं लागतं. पहिल्या फटक्यात लायसन्स मिळणारा अगदी विरळाच.

आपल्या घराबाहेर रस्त्यावर गाडी पार्क करायलाही वर्षाला ४० पौंड द्यावे लागतात. ठिकठिकाणी पार्किंगच्या सोयी केल्या आहेत. गर्दीच्या वेळी पैसे आणि एरवी फुकट! वीज आणि गॅस वापरण्यासाठी बिलिंगची पध्दत नाही, तर एक प्रीपेड कार्ड असतं आणि त्यात जेवढा टॉप अप तुम्ही केला असेल तेवढीच वीज आणि गॅस तुम्हाला वापरता येतो. केंटमधल्या ग्रेव्हज् एंड इथं आमचं वास्तव्य होतं. लंडनपासून रेल्वेनं एक ते दीड तासाच्या अंतरावर दक्षिणेला हे ठिकाण आहे. त्या शहरात कचरा संकलनाची अतिशय उत्तम सोय आहे. प्रत्येक भागासाठी आठवड्यातून एक ठराविक वार कचरा संकलनासाठी ठरवलेला असतो. दोन मोठ्या पेट्या त्यासाठी कौन्सिलतर्फे पुरवल्या जातात. एकात रिसायकल होणारा आणि दुस-यात रिसायकल न होणारा असं एकआड एक दर आठवड्यानं असं कचरा संकलन केलं जातं. रिसायकल होणा-या गोष्टींची आणि न होणा-या गोष्टींची यादी कौन्सिलतर्फे वेळोवेळी प्रसिध्द केली जाते.

इथं दैनंदिन जीवनातल्या ब-याच गोष्टी स्वत:च्या स्वत:ला कराव्या लागतात. नोकर-चाकर, मोलकरीण कुणी ठेवत नाहीत. कुणी ठेवलीच, तर त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्यामुळे भांडी घासणं, घराला रंग देणं, सायकलचं पंक्चर काढणं, सायकल आणि कारमध्ये हवा भरणं इत्यादी गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. एवढंच काय, तर पेट्रोल पंपावर पेट्रोलही आपल्यालाच भरायला लागतं. नंतर बिल दुकानात नेऊन द्यायचं. आशिषनं कार खरेदी केल्यावर दुस-याच दिवशी तो आणि निवेदिता पंपावर जाऊन पेट्रोल कसं भरायचं हे शिकून आले होते. घरात पाहुणे आल्यावर, आपल्याला जेवणानंतर भांडी घासताना पाहून तेही पहिल्या दिवसानंतर आपल्याला आपोआप मदत करू  लागतात.

इंग्लंडमधील अशा ब-याच गोष्टी आपल्याला भावतात. त्यांचं अप्रुप आपल्याला वाटतं. तरीही अखेर आपलं आपल्या मातीशी असलेलं घट्ट नातंच वरचढ ठरतं. तीन महिन्यातच आपल्याला मायदेशातील घराची आठवण येते आणि सहा महिने काढायचे असले, तरी काऊंटडाऊन तेव्हाच सुरु होतं, परतण्यासाठी ..…

         

 ©️ श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-3 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-3 ☆ श्री राजीव गजानन पुजारी

(मी रांगेत जाऊन मसाला डोसा घेतला व एका टेबलावर येऊन खायला सुरुवात केली.) इथून पुढे —-

माझ्या शेजारीच शार मध्ये काम करणारे एक गृहस्थ, त्यांची पत्नी व त्यांची छोटी मुलगी येऊन बसले. आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांचे नाव संग्राम असून ते मूळ ओरिसाचे आहेत. त्यांना उत्तम हिंदी येते. ते SHAR मध्ये VAB(vehicle assembly building) मध्ये कामाला आहे व इस्त्रो क्वार्टर्स मध्ये राहतात. मी महाराष्ट्रातील सांगलीहून निव्वळ लाँच बघायला आलोय याचे त्यांना फार कौतुक वाटले. मी एकटाच आलोय म्हटल्यावर त्यांच्या पत्नीने ‘परत आला तर पत्नीला घेऊन या व आमच्याच घरी उतरा’ असे सांगितले. ओळख पाळख नसतांना एवढे अगत्यपूर्ण आमंत्रण ओरिसातील माणसेच करू जाणोत. ओरिसाच्या आदरतिथ्याचा अनुभव मी कासबहाल येथे ट्रेनिंगला गेलो असताना अनुभवला होता. त्यावेळी ट्रेनिंग दरम्यान दिवाळी आली होती व आमच्या एका प्रोफेसरनी आम्हा सर्वांना त्यांच्या घरी अगत्याने फराळाला बोलावले होते. असो. मसाला डोसा खात असताना स्वयंपाक घरातील एक डिलिव्हरी देणारा माणूस मला हुडकत आला व माझ्यासमोर आणखीन एक मसाला डोसा ठेवून गेला. तो काय बोलला ते मला कळलं नाही. पण संग्राम म्हणाले, ” तुम्ही दोन रोटींची ऑर्डर दिली होती. ती कॅन्सल केल्यावर आणखी दहा रुपयांचे कुपन तुम्हाला दिले. एक मसाला डोसा पन्नास रुपयांना मिळतो. तुम्ही एकच डोसा घेऊन आलात म्हणून हा माणूस दुसरा डोसा घेऊन आला आहे. मला हसावे कि रडावे ते कळेना. नाईलाजास्तव दुसरा डोसा पण खावा लागला. मसाला डोशाची भाजी आपल्याकडे असते तशी सुक्की नसते तर आपण कांदा बटाटा रस्सा करतो तशी पण जरा घट्ट अशी असते. संग्राम यांच्याशी बोलल्यावर कळलं की तुम्हाला फक्त रोटी किंवा चपातीचे कुपन मिळते, त्याचे बरोबर भाजी व आमटी मिळतेच. कुपनावर त्याचा उल्लेख नसतो. शेजारच्या टेबलावर एक मुलगा भाजीबरोबर चपाती खात होता. बघतो तर आपण घरी करतो तशीच चपाती होती. असो. त्या दिवशी दोन मसाला डोसा खाण्याचा योग होता हेच खरे. जेवून उठताना श्री संग्राम यांनी आवर्जून माझा फोन नंबर घेतला व त्यांचा मला दिला. ती छोकरी पण ‘बाय अंकल’ म्हणाली. जेवण करून रूमवर आलो थोडा वेळ टी.व्ही. बघून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी माझी ट्रेन होती (पिनाकिनी एक्स्प्रेस) मी साडेनऊ वाजता लॉज सोडले व रिक्षाने स्टेशनला आलो. वेळ होता म्हणून फिरत फिरत तेथून जवळच असलेल्या एस्. टी. स्टॅन्डला गेलो व शारला जायला इथून एस्. टी. ची सोय असते का याची चौकशी केली; तर तशी कांही सोय नसते व आपणास रिक्षाने जावे लागते असे कळले. परत स्टेशनवर आलो. गाडी पाऊणतास लेट होती. ती बाराला आली. गाडीत एक आय.टी. इंजिनियर व त्यांचा आठ वर्षाचा मुलगा असे माझ्यासमोरील सीटवर बसले होते. माणूस आय.टी. इंजिनियर असूनही विजयवाडा येथे कॉलेजमध्ये शिकविण्याचे काम करत होता. ती त्यांची आवड होती. ते दोघे शेगांव येथे एका लग्नासाठी चालले होते. घरी लहान बाळ असल्याने पत्नी घरीच थांबली होती. मी त्यांना गजानन महाराजांच्या समाधी विषयी माहित आहे का असे विचारले. त्यांना त्या भागाची काहीच माहिती नव्हती. मग मी त्यांना गजानन महाराजांविषयी माहिती सांगितली व समाधी मंदिराचे नक्की दर्शन घ्या असे सांगितले. शेगांव कचोरी पण आवर्जून टेस्ट करा असेही सांगितले.   झालेला बराचसा उशीर गाडीने भरून काढला व एकच्या ऐवजी सव्वाला गाडी चेन्नई सेंट्रलला पोहोचली. माझे पुढची ट्रेन शताब्दी एक्सप्रेस संध्याकाळी साडेपाचला होती चेन्नई सेंट्रलला एक सोय चांगली आहे ती म्हणजे सर्व प्लॅटफॉर्म्स समपातळीत आहेत, त्यामुळे जिने चढउतार करावे लागत नाहीत. मी वेटिंग हॉलमध्ये ‘इंडिया टुडे’ चाळत असतांना एक युवक माझ्या शेजारी येऊन बसला व मला विचारले ‘तुम्ही केरळचे का?’  मी म्हटलं, ‘नाही, पण आपण असे का विचारत आहात?’ तो म्हणाला, ‘तुम्ही केरळी दिसता म्हणून विचारलं.’ चला, मला माझ्याविषयी एक नवीनच माहिती मिळाली. नंतर मी त्याला त्याची माहिती विचारली. तो केरळचा असून त्याने गेल्याच वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते व तो नोकरीच्या शोधात होता. अनेक ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा त्याला नोकरी मिळत नव्हती. मी त्याला त्याची आवड विचारली. तो म्हणाला, ‘ मला फॅब्रिकेशन विषयी आवड आहे.’ मी त्याला सुचवलं, ‘मग तू एखादे फॅब्रिकेशन शॉप का सुरू करत नाहीस? तसंही कोरोनानंतर बांधकाम व्यवसायात तेजी आली आहे, आणि बांधकाम म्हटलं कि, ग्रील, खिडक्या वगैरे आलंच.’ तो म्हणाला,’भांडवलाचं काय?’ मी म्हटलं, ‘हल्ली बँकांच्या कर्जपुरवठ्याच्या चांगल्या योजना आल्या आहेत. तू पण चौकशी कर.’ त्याचा चेहरा उजळलेला दिसला. मला पण बरं वाटलं. नंतर मी लंचसाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूला

‘ए टू बी म्हणून लंच हाउस होते तेथे गेलो. तेथे रांग होती. रांगेत उभेराहून चपाती,भाजी व शिरा यांचे कुपन घेतले. ऑर्डर सर्व्ह करणाऱ्याने एका डिस्पोजिबल प्लेटमध्ये सर्व वाढून दिले. बाजूला कट्ट्यावर ताट ठेवून उभेराहून खायचं. खरंतर मला हे असे उभेराहून वचा वचा खाणे आवडत नाही. खाणे कसे व्यवस्थित बसून असावे. पण साउथ मध्ये जास्त करून अशा पद्धतीने खायची पद्धत आहे. ‘व्हेन इन रोम वन मस्ट डू ॲज द रोमन्स डू’ असे म्हणून मी समाधान मानले व सव्वा पाचला ट्रेनमध्ये जाऊन बसलो. ट्रेनमध्ये  बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी होत्या. ते सर्व बेंगलोरला उतरून पुढे पुण्याला जाणार होते. ती सर्व मुले VIT कॉलेज वेल्लूरची होती. त्यांच्या टीवल्या बावल्या चालल्या होत्या, ते अनुभवण्यात वेळ छान गेला. साडेदहाला बेंगलोर आले. ईशा व योगेश स्टेशनवर आले होते. गाडीत भरपेट नाश्ता झाल्याने दूध पिऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला ईशाने उप्पीट केले होते. जेवायला पोळी भाजी व जिरा राईस होते. बऱ्याच दिवसांनी पोळी भाजी खाल्ल्याने बरे वाटले. रात्री आठच्या कोंडुस्कर स्लीपरचे रिझर्वेशन होते. ईशा व योगेश सोडायला आले होते. सकाळी साडेआठला सांगलीला पोहोचलो. एका स्वप्नाची इथे कर्तव्यता झाली.

नोंद :- 

१)श्रीहरीकोट्याला जाण्यासाठी मी मला सोयीचे म्हणून बेंगलोरला जाऊन चेन्नईला गेलो होतो.  काहीजणांना थेट चेन्नईला जाणे सोयीचे असेल तर तसं करायला हरकत नाही.

२) सुलुरूपेटा लॉजचा पत्ता – श्री लक्ष्मी पॅलेस, c/o लक्ष्मी थिएटर, शार रोड, सुलुरूपेटा -५२४१२१। जिल्हा -तिरुपती (आंध्र प्रदेश) प्रोप्रायटर – श्री दोराबाबू , फोन – 9985038339.

— समाप्त — 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पंगत आणि पार्टी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ पंगत आणि पार्टी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

पंगत म्हणजे डिसीप्लीन- शिस्त.

पार्टी म्हणजे धांगडधिंगा… 

 

पंगत म्हणजे सहभोजन.

पार्टी म्हणजे स्वभोजन… 

 

पंगत म्हणजे बैठक ठोकून जेवावे.

पार्टी म्हणजे उभ्याउभ्यानेच हादडावे… 

 

पंगत म्हणजे शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक साजशृंगार

पार्टी म्हणजे सामाजिक दिखाऊपणाचा अधिभार… 

 

पंगत म्हणजे हवं तेवढं जेवा.

पार्टी म्हणजे हवंतर जेवा… 

 

पंगत म्हणजे उदबत्यांचा घमघमाट.

पार्टी म्हणजे बाटल्यांचा खणखणाट…

 

पंगत म्हणजे श्लोक म्हणायची घाई

पार्टी म्हणजे मोठ्या आवाजाची महागाई … 

 

पंगत म्हणजे एका रेषेत ताटे वाढलेली

पार्टी म्हणजे रांग लावून अन्न घेतलेली … 

 

पंगत म्हणजे ताटाला काढलेली रांगोळी

पार्टी म्हणजे रिकाम्या वाट्यांची रोषणाई … 

 

पंगत म्हणजे मिळते पावती तृप्तीची 

पार्टी म्हणजे गोष्ट कोल्हा करकोच्याची

कोल्ह्याला बाटलीतून दिलेल्या खिरीची…

 

पंगत म्हणजे हर हर महादेवा !

पार्टी म्हणजे डान्सचा जलवा… 

 

पंगत म्हणजे जय जय रघुवीर समर्थ !

पार्टी म्हणजे डीजे ,नाय तर सगळं व्यर्थ… 

 

पंगत म्हणजे निकोप स्पर्धा खाण्याची,

पार्टी म्हणजे भीती उपाशी राहण्याची… 

 

पंगत म्हणजे सत्व रजाची आरास..

पार्टी म्हणजे रज तमाची नुसती रास…

 

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ काटा रूते कुणाला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ काटा रूते कुणाला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. अग थांब चारूलते! तो मनोहारी भ्रमर ते कुमुदाचे कुसुम खुडताना उडून गेला पण माझं लक्ष विचलित करून गेला. त्याकडे पाहता पाहता नकळत माझं पाऊल बाभळीच्या कंटकावर की गं पडले… आणि तो कंटक पायी रूतला.. एक हस्त तुझ्या स्कंधावरी ठेवून पायीचा रूतलेला कंटक चिमटीने काढू पाहतेय.. पण तो कसला निघतोय! अगदी खोलवर रुतून बसलाय.. वेदनेने मी हैराण झाले आहे बघ… चित्त थाऱ्यावर राहिना… आणि मला पुढे पाऊल टाकणे होईना.. गडे वासंतिका, तू तर मला मदत करतेस का?..फुलं पत्री खुडून जाहली आणि आश्रमी परतण्याच्या मार्गिकेवर हा शुल टोचल्याने विलंब होणारसे दिसतेय… तात पूजाविधी करण्यासाठी खोळंबले असतील..

.. गडे चारुलते! अगं तरंगिनीच्या पायी शुल रुतूनी बसला.. तो जोवरी बाहेर निघून जात नाही तोवरी तिच्या जिवास चैन पडणार कशी?.. अगं तो भ्रमर असा रोजचं तिचं लक्ष भुलवत असतो.. आणि आज बरोबर त्यानं डावं साधला बघ… हा साधा सुधा भ्रमर नव्हे बरं. हा आहे मदन भ्रमर . तो तरंगिनीच्या रूपावरी लुब्ध झालाय आणि आपल्या तरंगिनीच्या हृदयात तोच रुतलाय समजलीस… हा पायी रूतलेला शुल पायीचा नाही तर हृदयातील आहे… यास तू अथवा मी कसा बाहेर काढणार? त्याकरिता तो ऋषी कुमार, भ्रमरच यायला हवा तेव्हा कुठे शुल आणि त्याची वेदना शमेल बरं… आता वेळीच तरंगिनीच्या तातानां हि गोष्ट कानी घालायला हवी…आश्रम प्रथेनुसार त्या ऋषी कुमारास गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगणे आले नाही तर तरंगिनीचे हरण झालेच म्हणून समजा. 

गडे तंरगिनी! हा तुला रूतलेला मदन शुल आहे बरं तू कितीही आढेवेढे घेतलेस तरी आम्हा संख्यांच्या लक्षात आलयं बरं.. तो तुझ्या हृदय मंदिरी रुतून बसलेला तो ऋषी कुमार रुपी भ्रमराने तुला मोहविले आहे आणि तुझे चित्त हरण केलयं… हि हृदय वेदना आता थोडे दिवस सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही.. पाणिग्रहण नंतरच हा दाह शांत होईल.. तो पर्यंत ज्याचा त्यालाच हा दाह सहन करावा लागतो.. 

.. चला तुम्हाला चेष्टा सुचतेय नि मला जीव रडकुंडीला आलाय… अश्या चेष्टेने मी तुमच्याशी अबोला धरेन बरं.. 

हो हो तर आताच बरं आमच्याशी अबोला धरशील नाहीतर काय.. त्या भ्रमराची देखील चेष्टा आम्ही करु म्हणून तूला भीती वाटली असणारं… आता काय आम्ही सख्खा परक्या आणि तो परका ऋषी कुमार सखा झालायं ना.. मग आमच्याशी बोलणचं बंद होणार… 

.. चला पुरे करा कि गं ती थट्टा..आश्रमाकडे निघायचं पाहताय की बसताय इथंच . .. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares