मराठी साहित्य – विविधा ☆ ‘हरवू पहाणारा थारा!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘ हरवू पहाणारा थारा!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘वळचण’ म्हणजे एक आडोशाची जागा. अंधारी.., सहज नजरेस न पडणारी.. आणि म्हणूनच सुरक्षित! जुन्या काळातल्या कौलारु घरांच्या उतरत्या छपराचा पुढे आलेला भाग आणि वासा यामुळे निर्माण झालेला हा आडोसा म्हणजेच  ‘वळचण’ ! ही वळचण प्रत्येक घराचाच एक अविभाज्य भाग असायची. उन्हाची काहिली सहन न होऊन पसाभर सावलीच्या असोशीने किंवा अचानक एखादी पावसाची जोरदार सर येताच घरट्याकडे झेप घेण्याइतकी उसंत मिळाली नाही म्हणून पक्षी अतिशय विश्वासाने धाव घ्यायचे ते हाकेच्या अंतरावरच्या अशा कौलारू घरांच्या वळचणींकडेच!

अतिशय शांत जलाशयावर अचानक एखादा खडा पडताच असंख्य तरंग उमटत रहातात. ‘वळचण’ या शब्दाचा मनाला स्पर्श होताच असंच होतं. कधीही सहजासहजी डोकं वर न काढता मनाच्या वळचणीला अंग चोरून पडून राहिलेल्या जुन्या काळातल्या कितीतरी आठवणी त्या स्पर्शाने जाग्या होत मनात त्या जलाशयावर उमटणाऱ्या तरंगांसारख्याच झुलत रहातात.. !

वळचणीला कांही काळापुरतं आश्रयाला येणाऱ्या पक्षांसाठी त्या कौलारु घरांबाहेरची वळचण हा हक्काचा निवारा असायचा कारण त्यांना तिथे घरातली माणसं हुसकून न लावता आवर्जून थारा द्यायची. हा थारा आश्रयाला आलेल्या पक्षाला निश्चिंतता देणारा म्हणूनच सुरक्षित वाटायचा. वळचणीला आलेल्या पक्ष्यांच्या मनात संकोच्यापोटी आलेलं दबलेपण नसायचं आणि घरातल्या माणसांच्या मनातही उपकार करीत असल्याची भावना नसायची. ते नैसर्गिकपणेच आकाराला येत रुढ होत गेलेलं माणूस आणि निसर्ग यांचं आनंदी सहजीवनच होतं. आज मनाच्या वळचणीला विसावलेल्या त्या  काळातल्या असंख्य आठवणी मन:पटलावर जेव्हा तरंगतात तेव्हा त्या सहजीवनातील निखळ आनंदच आज कुठेतरी हरवून गेल्याच्या दुखऱ्या जाणिवेने निर्माण केलेली अस्वस्थता त्या आठवणींमधे अधिकच झिरपत जाते.

त्या आठवणी आहेत वळचणींच्याच पण त्या वळचणी कौलारु घरांच्या उतरत्या छपरांआडच्या वळचणी नाहीयत तर त्या अशा असंख्य कौलारु घरांमधल्या सर्वसामान्य आर्थिक स्तरावरच्या ओढग्रस्त जीवनशैलीतही त्या घरांच्या घरपणाने आवर्जून जपलेल्या  वळचणींच्या आठवणी आहेत!

घराच्या आडोशाच्या वळचणीने पक्ष्याला दिलेला थारा त्या पक्षासाठी चटके देणाऱ्या उन्हात अचानक आकाशात डोकावणारा एखादा ओलसर काळा ढगच असायचा.. किंवा.. अनपेक्षित आलेली एखादी गार वाऱ्याची झुळूकही ! तोच दिलासा त्या कौलारु घरातल्या घरपणांनी जपलेल्या वळचणी घरी आश्रयाला आलेल्या आश्रितांना अगदी सहजपणे देत असायच्या !

अशा घरांमधे उतू जाणारी श्रीमंती कधीच नसायची. घरात खाणारी पाचसहा तोंडं आणि मिळवणारा एकटा. प्रत्येक घराचं चित्र हे एखाददुसरा अपवाद वगळता असं एकरंगीच. अगदी पै पैचा खर्चही विचारपूर्वक, अत्यावश्यक असेल तरच करायचा हे ठामपणे ठरवून देणारं काटेकोर आर्थिक नियोजन आणि तरीही आपल्या चाहूलीने अस्वस्थता वाढवणारी महिनाअखेर या अशा घरांसाठी नेमेची येणाऱ्या पावसाळ्यासारखी सवयीचीच होऊन गेलेली. अशा घरातल्या बेतासबात शिक्षण झालेल्या गृहिणीही हे दरमहाचं तूटीचं अंदाजपत्रक कौशल्याने सांभाळून त्यातूनही स्वतःच्या होसामौजांना मुरड घालून वाचवलेला एखाददुसरा आणा अचानक येऊ शकणाऱ्या अडीअडचणीसाठीची बेगमी म्हणून धान्याच्या डब्यांच्या वळचणीला सुरक्षित ठेवीत असायच्या.

विशेष म्हणजे अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही या घरांनी स्वतःच्या मनातल्या वळचणींच्या खास जागा गरजूंसाठी आवर्जून निर्माण करुन सातत्याने जपलेल्या असायच्या. शिक्षणाच्या ओढीने घराबाहेर पडलेल्या एखाद्या गरीबाच्या मुलाची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत दूर करायला अशी घरेच त्या मुलाचे आठवड्यातल्या जेवणाचे एकेक दिवस वाटून घेत त्याला वार ठरवून देत. ते शक्य नसेल ती घरे स्वतःच्या घरी त्याची पथारी पसरायला लागणारी वीतभर जागा देत. ठरावीक दिवशी माधुकरी मागायला येणाऱ्या सेवेकऱ्यासाठी घासातला घास काढून अशा घरांमधे एखादा चतकोर माधुकरी घालण्यासाठी आठवणीने बाजूला  काढून ठेवला जात असे.

प्रतिकूल परिस्थितीतही गरजूना आश्रय देणाऱ्या, त्याला आधार वाटावा असा मदतीचा हात देऊ पहाणाऱ्या या घरांच्या घरपणाने आवर्जून जपलेल्या या जणू कांही वळचणीच्या जागाच तर होत्या !

आज काळ बदलला. घरं बदलली. माणसंही. हळूहळूच पण सगळंच बदलत गेलं. त्याचबरोबर पूर्वीचं जीवनशैलीतच दीर्घकाळ मुरलेलं समाजाप्रती असणाऱ्या गृहित कर्तव्याचं भानही. आज ते नाहीय असं नाही. पण पूर्वी प्रतिकूल परिस्थितीतही घरोघरी आवर्जून जपलेल्या वळचणींसारखं मात्र निश्चितच नाहीय. पूर्वी ते सर्रास असायचं आणि आज ते अपवादात्मकच दिसतं हे नाकारता येणार नाही.

हरवू पहाणाऱ्या हा वळचणींचा थारा नव्या काळानुसार नव्या रुपात  प्रत्येकाने निर्माण करणं न् तो जपणं हे आवश्यक आहे आणि अशक्यप्रायही नाही हे जाणवायला मात्र हवं!

समाजाकडून वर्षानुवर्षे कांही ना कांही रुपात सतत कांहीतरी घेतच आपण मोठे होत असतो. समाजाचे ते ऋण परतफेड करता येणारं नसतंच. तरीही अशा स्वनिर्मित वळचणींच्या रुपाने देणाऱ्याने स्वतःच्या मनात उपकार करीत असल्याची भावना न ठेवता घेणाऱ्यालाही संकोच वाटू नये अशा पध्दतीने हरवू पहाणारा वळचणीच्या आडोशाचा थारा जपणे समाजाप्रती असणारा कृतज्ञभाव व्यक्त करायला पूरकच ठरेल हे लक्षात घ्यायला हवं.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भवानी संग्रहालय -एक सत्यातील स्वप्न  ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

परिचय 

नांव – राजीव गजानन पुजारी

शिक्षण – बी. ई. (मेकॅनिकल), DBM

नोकरी – मे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, किर्लोस्करवाडी येथून मॅनेजर मेंटेनन्स म्हणून निवृत्त त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कांही वर्षे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले.

आवड – प्रवास, वाचन, लेखन

प्रसिद्ध झालेले साहित्य –

  • कॅलिफोर्निया डायरी हे प्रवास वर्णनात्मक पुस्तक
  • नासाची मंगळ मोहीम ही दहा लेखांची लेखमाला दै. केसरी मध्ये प्रसिद्ध
  • मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिका या मासिकांतून
    • जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण,  
    • नासाची आर्टिमिस योजना,
    • लेसर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन

हे लेख प्रसिद्ध

  • अक्षर विश्व् या दिवाळी अंकांत
    • माझी मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन आणि
    • भेदीले शून्य मंडळा ही विज्ञानकथा प्रसिद्ध
  • रेडिओ मराठी तरंग वर
    • विक्रम साराभाई स्पेस सेन्टरला भेट आणि
    • भेदीले शून्य मंडळा या विज्ञान कथेचे वाचन
  • सावरकर शाळेच्या रविवारच्या व्याख्यान मालेत जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण या विषयावर व्याख्यान
  • नृसिंहवाडी येथील पुजारी घराण्याची ई. स. 1435 पासून ते 2022 पर्यंतची वंशावळ संकलित करून श्री दत्त देवस्थानकडे सुपूर्द.

? इंद्रधनुष्य ?

☆ भवानी संग्रहालय -एक सत्यातील स्वप्न  ☆ श्री राजीव ग पुजारी 

औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही कोल्हापूरहून औंधला गेलो. औंधच्या डोंगरावर यमाई देवीचे सुंदर मंदिर आहे. गाडीने थेट देवळापर्यंत जाता येते. गाडी पार्क केल्यावर एक लहान किल्लावजा बांधकाम आहे. त्याच्या आत देवीचे मंदिर आहे. देवीची मूर्ती काळ्या पाषाणात व जवळजवळ दोन मिटर उंच आहे. मूर्ती खूप देखणी आहे. मंदिर व परिसर अनेक पिढ्यांपासून पंत कुटुंबियांच्या अधिपत्याखाली आहे. त्या कुटुंबातील सध्या हयात असलेल्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी सात किलो वजनाचे कळस मंदिरावर चढवले आहेत. 

या देवीविषयी अशी हकीकत सांगण्यात येते की, श्रीराम वनवासात असतांना रावणाने सीताहरण केले, त्यामुळे श्रीराम अत्यंत दुःखी होऊन शोक करू लागले. त्यावेळी देवी सीतामाईचे रूप घेऊन श्री रामासमोर आली. त्या शोकाकुल अवस्थेतही रामाने देवीस ओळखले व तो तिला ‘ये माई’ म्हणाला, म्हणून देवीचे नाव यमाई पडले. 

देवीचे दर्शन घेऊन खाली उतरताना प्रसिद्ध भवानी संग्रहालय लागते. हे संग्रहालय औंधचे राजे, पंतप्रतिनिधी यांनी १९३८ मध्ये उभारले. सध्या ते महाराष्ट्र सरकारद्वारा संचलित केले जाते. संग्रहालयामध्ये दुर्मिळ चित्रकृती व शिल्पकृती यांचा उत्कृष्ट संग्रह आहे. 

येथील कलाकृती एवढ्या अप्रतिम आहेत की आपण जणू स्वप्नांच्या दुनियेत आहोत असे वाटत राहते. चित्रकलेच्या दालनांमध्ये बहुतेक सर्व सर्व शैलींची चित्रे ठेवली आहेत. उदा. जयपूर शैली, मुघल शैली, कांग्रा, पंजाब, विजापूर, पहाडी, मराठा वगैरे. प्रसिद्ध भारतीय तसेच विदेशी चित्रकारांची चित्रे येथे बघायला मिळतात. राजा रविवर्मा, एम्.व्ही.धुरंधर,माधव सातवळेकर, कोट्याळकर, रेब्रांट,लिओनार्डो द् विंची,बार्टोना मोरिला,जी.जी.मोरिस वगैरे नामवंत चित्रकारांची चित्रे येथे बघायला मिळतात. स्वराज्याची शपथ, शिवराज्याभिषेक, दमयंती वनवास, पद्मपाणी बुद्ध, लास्ट सपर,मोनालीसा वगैरे प्रसिद्ध चित्रे येथे आपणास पाहायला मिळतात. किरीतार्जुन युध्दाचा  नव्वद चित्रांचा संच बघण्यासारखा आहे. 

येथील धातू व संगमरवरी पाषाणातील शिल्पांचा संग्रहही अप्रतिमआहे.वर्षा,ग्रीष्म,वसंत, हेमंत, शिशिर आणि शरद हे वर्षातील सहा प्रमुख ऋतू. या ऋतूंना स्त्री रूपात कल्पून त्यांची नितांत सुंदर शिल्पे येथे पाहायला मिळतात. प्रत्येक ऋतू शिल्पाला साजेशी काव्यपंक्ती त्या शिल्पाला जणू बोलती करते. उदाहरणार्थ,

        ‘वसंत वाटे अतिगोड साचा, 

        शृंगार केला विविध फुलांचा, 

        वेणीत कानात करी  कटीला, 

        गळ्यात दुर्डित उणे न त्याला’ 

या काव्यपंक्ती आणि ऋतू वसंत ललनेचे मूर्तरूप एकमेकांना साजेसे असेच आहे. नऊवारी साडी, उजव्या खांद्यावर पदर घेऊन, एका हातात फुलांची परडी,तर दुसऱ्या हातात कमलपुष्पे. शिवाय मनगटांवर फुलांच्या माळा, दंडांवर फुलांचाच बाजूबंद आणि फुलांचा कमरबंध असे नानाविध पुष्पालंकार परिधान करीत, गळ्यात मोत्यांचा लफ्फा-साज घालून सुहास्य वदनी ऋतू ‘वसंता’ पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते.  या उलट, ग्रीष्म ऋतू  वा ‘ग्रीष्मकन्या’. उन्हाच्या झळांनी व्याकुळ, थोडीशी थकलेली, अगदी अलंकारही नकोसे वाटणारी. एका हातात पंखा आणि दुसऱ्या हाताने केसांच्या वेणीला मुक्त करणारी ‘ग्रीष्मबाला’ आणि त्याला साजेशी काव्य रचना, 

         ‘घे विंझणा वातची उन्ह आला, 

          ये घाम वेणीभार मुक्त केला, 

          त्यागी तसे आभरणासी बाला,

           हा ग्रीष्म तापे सुकवी तियेला’.   

हातांत आरतीचे  तबक घेऊन, बंधू व पतीस भाळी कुंकूमतिलक लावून दसरा व दिवाळी निमित्ताने ओवाळण्यास  सिद्ध झालेली गुर्जर वेषातील युवती म्हणजे आपली ‘शरद कन्या’. काव्य पंक्ती अगदी तिला साजेशा आहेत.

          ‘मोदे करी सुंदर वेगळा

         बंधूसी तैसी युवती पतीला

        कुर्वंडीते,कुंकुम लावी भाळी

        शरद ऋतूचा दसरा दिवाळी

हेमंत सुंदरीचे वर्णन केले आहे ते असे,

        ‘हेमंत आला तशी थंडी आली 

        घेऊन उणीशी निवारलेली

         शेकावया शेगडी पेटवीली

        बाला सुखावे बहु शोभावीली’

‘शिशिर बाले’चे वर्णन केले आहे ते असे,

      ‘लोन्हा गव्हाच्या बहु मोददायी

      हुर्डा तसा शाळूही शक्तिदायी

      काढावया घेऊनिया विळ्यासी

      बाळा तशी ये शिशिरी वनासी’

 — मराठी शिल्पशैलीत साकार झालेल्या या सहा ऋतूकन्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ‘ऋतूराज्ञी’ शोभाव्यात अशाच आहेत. 

औंधच्या राजांच्या प्रोत्साहानामुळे अनेक शिल्पकार येथे तयार झाले. त्यातील प्रमुख म्हणजे पांडोबा पाथरवट. ते व त्यांची मुले राजाराम व महादेव यांनी साकारलेली हस्तीदंतातील शिल्पे निव्वळ अप्रतिम. एखादा माणूस दगडातून इतके नाजूक कोरीवकाम कसे करू शकतो याचे पदोपदी आश्चर्य वाटत राहते. ही शिल्पे दगडातून नव्हे तर लोण्यातून कोरल्यासारखी वाटतात. 

हेन्री मूर या जगप्रसिध्द शिल्पकाराने बनवलेले ‘मदर अँड चाईल्ड’ हे शिल्प आपणास येथे बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे येथे पहायला मिळतात. एक घोड्यावर बसलेला व दुसरा उभा. उभ्या पुतळ्यात महाराज म्यानातून तलवार बाहेर काढतांना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरील त्वेषपूर्ण भाव निव्वळ अप्रतिम.

संग्रहालयाच्या मध्यभागी एक अवाढव्य बुद्धीबळाचा पट आपले लक्ष वेधून घेतो. पटावर दिसतात ते शस्त्रसज्ज सैनिक-प्यादी,परस्पर विरोधी राजे,वजिर,अंबारीयुक्त हत्ती, घोडे आणि ऊंट. असे म्हणतात की, यावर प्रत्यक्ष बुद्धीबळाचा खेळ खेळला जात असे व प्यादी उचलून ठेवायला माणसे असत.

या संग्रहालयातील प्रत्येक दालन बघायला कमीत कमी एक दिवस लागेल. म्हणजे पूर्ण संग्रहालय बघायला १५ दिवस सुद्धा  अपूरे पडतील. मी तर ठरवलंय 15 दिवस वेळ काढून निवांत आणखी एकदा हे अप्रतिम संग्रहालय बघायचेच.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

फोन -9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आप्तज ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆  आप्तज ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

अंधार कशामुळे होतो हे कळत नसलेल्या आदी मानवाला रात्र असह्य वाटायची, पण अगदी एक प्रहरात डोळा लागलेला असताना त्याला पक्षाची किलबिल ऐकू यायची, आकाशात पूर्वेला कुणीतरी रंगाचं दुकान थाटलेले असायचं.

काळी रात्र विराट जात असल्याने घाबरलेला आनंदून जायचा. आनंदाने उमाळे फुटत असतानाच सूर्य उगवून लख्ख दिसायचा.

नवा दिवस , एक नवी उमेद , जणू पुनर्जन्म…या उत्साहलेल्या मनाच्या निर्मळ माणसाने सूर्याला नाव दिले मित्र…………अनुभवातून, निसर्गाच्या भव्य रूपातून प्रसवलेली सृजनता.. त्याच्या एकटेपणाचा शाप दूर करणारा नभोमंडलातला प्रदीप्त आप्तज……….किती सुंदर नाव दिले त्या सूर्याला. मित्र….प्रकाश असतो सतेज आणि सतिश ….     …… त्याच्याविना आयुष्य फक्त अंधार…………मैत्री दिनाच्या आभाळभर शुभेच्छा………

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २५- भाग ३ -कारीबू केनिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २५- भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कारीबू केनिया ✈️

केनियातील मसाईमारा आणि टांझानियातील गोरोंगोरो,सेरेंगेटी  हा सारा सलग, एकत्रित, खूप विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. राजकीय सोयीसाठी त्याचे दोन विभाग कल्पिलेले आहेत. इथले एक आश्चर्य म्हणजे ‘ग्रेट मायग्रेशन’! दरवर्षी ठराविक वेळेला लाखो प्राणी झुंडीने स्थलांतर करतात ते बघायला जगभरचे प्रवासी आवर्जून येतात. साधारण जुलै पर्यंत टांझानियातील गोरोंगोरो, सेरेंगेटी  इथले हिरवे गवत संपते, वाळते. अशावेळी फक्त गवत हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेले  लक्षावधी वाइल्ड बीस्ट, झेब्रे, हरणे ग्रुमिटी आणि मारा या नद्या ओलांडून, हजारभर मैलांचे अंतर कापून, केनियाच्या मसाईमारा विभागात येतात. कारण मार्च ते जूनपर्यंत केनियात पडणाऱ्या पावसामुळे तिथे भरपूर ओला चारा असतो.  मसाईमारा विभागात जेंव्हा नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये हिरवे गवत संपते, वाळते तेंव्हा हे प्राणी पुन्हा सेरेंगेटी, गोरोंगोरो इथे स्थलांतर करतात. त्यांच्या स्थलांतराच्या काळात सिंह, चित्ता, बिबळ्या तिथे बरोबर दबा धरून बसलेले असतात. आणि नदीतील मगरी तर त्यांची वाटच पहात असतात.आयते चालून आलेले भक्ष त्यांना मिळते तर काही वेळेला एका वेळी हजारो प्राणी नदी प्रवाह ओलांडून जात असताना त्यांच्या वजनाने सुसरी दबून जातात. नदीच्या आजूबाजूला कोल्हे, तरस, गिधाडे हीसुद्धा उरलेसुरले  मिळवायला टपून असतात. शेकडो वर्षांची ही निसर्गसाखळी घट्ट टिकून आहे. नाहीतरी नद्या, वारा, पक्षी, प्राणी यांना सरहद्दीची बंधने नसतातच. लाखो मैलांचे अंतर कापून आपल्याकडे सयबेरियातील फ्लेमिंगो व इतर पक्षी ठराविक काळापुरते येतात व त्यांच्याकडील कडाक्याची थंडी संपल्यावर परत आपल्या ठिकाणी जातात. निसर्गाने पक्ष्यांना, प्राण्यांना बहाल केलेली ही जीवनशक्ती आहे.

आज लवकर नाश्ता करून, चार तासांचा प्रवास करून नैवाशा लेकला पोहोचलो. या विस्तीर्ण जलाशयातून एक तासाची सफर होती. त्या विस्तीर्ण तलावाच्या कडेने झाडे- झुडपे, पाणवनस्पती होत्या. खडकासारखे दिसणारे पाणघोडे डुंबत होते. इथले खंड्या पक्षी ( किंगफिशर ) काळ्या- पांढऱ्या रंगाचे होते. ते पाण्यावर धिरट्या घालून, लांब चोचीत अचूक मासा पकडून, झाडावर घेऊन जात. जलाशयाच्या कडेने पिवळ्या चोचींच्या बदकांचा थवा चालला होता. लांब लाल चोच आणि उंच लाल पाय असलेला पांढराशुभ्र बगळा बकध्यान लावून मासे टिपत होता. आमच्या नावाड्याने पाण्यात भिरकावलेला मासा, लांब झाडावर बसलेल्या गरुडाने भरारी घेऊन अचूक टिपला. एका बेटावरील झाडीत जिराफ, लांब माना आणखी उंच करून झाडपाला ओरबाडीत होते. बेटावर उतरून थोडे पायी फिरलो. गेझल्सचा (हरिणांचा) खूप मोठा कळप कमानदार उड्या मारीत पळाला. हरिणांसारखेच पण चांगले मोठे, काळपट तपकिरी रंगाचे, पाणीदार डोळ्यांचे, उंच शिंगे असलेले ॲ॑टीलोप नावाचे  प्राणीही होते.

आज ‘ग्रेट रिफ्ट व्हॅली’ या प्रदेशातून लेक नुकरू नॅशनल पार्क इथे जायचे होते. चहा व कॉफीचे मळे रस्त्याच्या कडेला होते. डोंगर उतारावर शेती होती. खालच्या उंच सखल पोपटी दरीमध्ये निळ्याशार पाण्याची छोटी- मोठी तळी, सूर्यप्रकाशात निळ्या रत्नासारखी चमकत होती. ही ग्रेट रिफ्ट व्हॅली म्हणजे मूळ मानवाचे जन्मस्थान मानले जाते. संध्याकाळी लेक नुकरू या मचुळ पाण्याच्या सरोवरापाशी गेलो. भोवतालच्या दलदलीत असंख्य काळे- पांढरे पक्षी चरत होते. हेरॉन, पेलिकन, शुभ्र मोठे बगळे होते. कातरलेले पंख असलेले स्पर विंगड् गूझ होते.

विषुववृत्ताची कल्पित रेषा केनियामधून जाते. दुसऱ्या दिवशी माउंट केनिया  रीजनला जाताना, वाटेत थॉमसन फॉल्स नावाचा धबधबा पाहिला. एका गावामध्ये ‘इक्वेटर’ अशी पाटी होती. तिथे थोडा वेळ थांबलो. तिथून माउंट केनियाकडे जाताना रस्त्यावर अनेक धावपटू स्त्री-पुरुष पळताना दिसले. इथल्या ‘केनिया स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये ऑलम्पिक पदक विजेते धावपटू घडविले जातात. समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंचावर असलेल्या या गावात केनियातीलच नाही तर अन्य देशांचे खेळाडू प्रशिक्षणासाठी येतात.

१६०००.फूट उंच असलेल्या माउंट केनियाच्या उतरणीवर ‘सेरेना माउंट लॉज’ हे गर्द जंगलातील हॉटेल ५२०० फूट उंचीवर आहे. संपूर्ण हॉटेल महोगनी आणि सीडार वृक्षांचे लाकूड वापरून बांधलेले आहे. प्रत्येक रूममधील काचांच्या मोठ्या खिडक्यातून पुढ्यातला छोटा, नैसर्गिक मचुळ पाण्याचा तलाव दिसत होता. तलावाच्या आजूबाजूच्या जमिनीत खनिज द्रव्य आहेत. ही खनिज द्रव्य मिळविण्यासाठी, इथली माती चाटण्यासाठी जंगली प्राणी रात्री या पाण्यावर येतात. हॉटेलला मोठे फ्लड लाईट लावून ठेवले होते. वेगवेगळे प्राणी पाण्यावर आले की हॉटेलचा स्टाफ आपल्याला सूचना द्यायला येतो. तसेच एक घंटाही वाजवतात. रानटी म्हशी, हरिणे, रानडुक्कर, हैना असे अनेक प्राणी आम्हाला काचेतून दिसले.

माउंट केनिया हा थंड झालेला ज्वालामुखी पर्वत १६००० फूट उंच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शिखरावरील बर्फ चमकताना दिसत होते. केनियाच्या आग्नेय दिशेला हिंदी महासागर आहे. युगांडा, टांझानिया, सुदान, सोमालिया हे देश सभोवती आहेत. १९६३ मध्ये केनियाला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. तेंव्हा जोमो केन्याटा  हे पहिले पंतप्रधान झाले. शेतीप्रधान असलेल्या या देशातून चहा व कॉफीची निर्यात होते. अलीकडे ताजी गुलाबाची व इतर फुले युरोपमध्ये निर्यात केली जातात. पर्यटन हेही उत्पन्नाचे मोठे साधन आहे.

देवाघरचे हे समृद्ध निसर्ग वैभव एक प्रवासी म्हणून आपल्याला आवडते परंतु तिथल्या सर्वसामान्य माणसाचे जीवन फार कष्टाचे, गरिबीचे आहे.

आक्रमक घुसखोर स्वभावाला अनुसरून  चिनी ड्रॅगनने आपला विळखा जवळजवळ सर्व आफ्रिकेला घातला आहे. एअरपोर्ट, बंदरे, रस्ते अशा सोयी उभारून देणे, त्यासाठी प्रचंड कर्ज देणे आणि कर्ज फेड न झाल्याने ते प्रोजेक्ट गिळंकृत करणे अशी ही कार्यशैली आहे.( याबाबतीत नेपाळ व श्रीलंकेचे उदाहरण आहेच). आफ्रिकेतील शेतजमिनी, खाणी यामध्ये चीनने प्रचंड गुंतवणूक केली आहे. केनियामध्येही चिनी गुंतवणुकीचा वाढता ओघ आहे.

नैसर्गिक व खनिज संपत्तीचे वरदान असलेल्या या देशांना ब्रिटनने आधीच लुटले आहे. आता देशातील सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी केनिया  आणि इतर आफ्रिकी देशांनी चिनी कर्जांच्या काटेरी सापळ्यात न अडकता पुढील वाटचाल केली तर ते हितावह होईल. पण…….

केनिया भाग ३ व केनिया समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 2 ☆ सौ. अमृता देशपांडे  

जन्माला आलेला प्रत्येक जीव पहिलं काय करतो,  तर तो रडतो. बाळाचा पहिला टॅहॅ टॅहॅ ऐकू आला कि तिथे असलेले डाॅक्टर्स,  नर्सेस सह, त्याच्या स्वागतासाठी आतुर झालेले सर्व जण आनंदित होतात. बाळ जन्मानंतर जर पटकन रडलं नाही तर डाॅक्टर्स त्याला उलटं धरून रडेपर्यंत कुल्ल्यांवर चापट्या मारतात.  जेव्हा ते रडून ठणठणाट करू लागतं, तेव्हा स्वच्छता वगैरे साठी नर्सकडे देतात. जन्मानंतर लगेचच बाळाचं रडणं आवश्यक असतं. श्वसनसंस्था स्वच्छ आणि योग्यप्रकारे कार्यरत होण्यासाठी ते अतिशय गरजेचं असतं. पुढच्या दिवसात भूक लागली की रडणं, ओलं ओलं झालं की गार वाटून रडणं हे नैसर्गिक असतं. इतर शारिरीक कार्यसंस्था उदा. पचनसंस्था, मूत्रपिंडाचे कार्य,  रक्तवाहिन्या, सर्व नसा,  अस्थिसंस्था यांची स्थिरता व कार्य सुरळीत होईपर्यंत नवजात बाळाला जपणे आवश्यक असते. हळूहळू सर्व व्यवस्थित सुरू होते,  पण सुरवातीला थोडासा जरी बदल झाला तरी बाळाच्या रडण्यानेच कळते की त्याला काही तरी त्रास होतो आहे. मग त्यावर उपाय करता येतो. एक गोष्ट मात्र खरी कि बाळ अंघोळीच्या वेळी आणि भूक लागली की जेवढं खणखणीत रडतं, तेवढं ते आरोग्यानं अधिक सशक्त होतं.  फक्त आईला समज, धीर, आणि सहनशीलता हवी.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझिया माहेरा जा – लेखिका – सौ. रेणुका आशिष ओझरकर ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? मनमंजुषेतून ?

☆ माझिया माहेरा जा – लेखिका – सौ. रेणुका आशिष ओझरकर ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

 ~माझ्या जीवनाचे शिल्पकार 

लग्न होऊन मी माप ओलांडून सासरी आले. सुखाच्या व आनंदाच्या पायघड्यावरून माझी पावले पडलीत. कालची मुलगी आज सून झाली. मुलगाही एकुलता एक- इंजिनियर- गुणसंपन्न- पती म्हणून मला लाभला.

आई-वडिलांची उणीव भासू न देणारे सासू-सासरे, बहिणीची उणीव भासू न देणारी माझी नणंद या सर्व गोकुळात मी व्यस्त होते.

मला तीन भाऊ व मी शेंडेफळ, अत्यंत लाडात वाढलेली जणू लाडू बाई.  माझ्या संसारात मी पूर्णपणे रमले होते. पण म्हणतात ना कळीचे फूल कधी झाले, वेलीला वृक्षाचा आधार केव्हा मिळाला, हे सर्व स्वप्नाप्रमाणे घडले. 

मनपाखरू क्षणार्धात भूतकाळात विहार करावयास लागले—–

माझे माहेर नागपूरचे.  टुमदार व सुंदर माझे घर.  समोरचे मोठे अंगण, त्या अंगणात तुळशी वृंदावन, सुरेख व सुबक रांगोळी सजलेली समोरील बाजू, स्वागत करण्याकरता फाटकाच्या दोन्ही बाजूला जाईचा नाजुक वेल, थोडं पुढे गेल्यावर गुलाब व शेवंती वाऱ्यावर नाचत असताना दिसतात.  मागे पेरू व सिताफळाचे झाड, परसदारी आळू कोथिंबीर खेळत असतात. गोड पाण्याची विहीर मुक्तहस्ताने सर्वांची तृष्णा तृप्त करीत होती . आम्ही वरच्या मजल्यावर रहायचो.  खाली माझे आजोळ होते.

माझे आई बाबा दोघेही नोकरी करणारे. त्यामुळे आम्ही भावंडे आजीच्या अंगाखांद्यावर खेळून शैशवातून बालपणात आलो. आमचे बालपण मामी व मावशीचे बोट धरून संपन्न झाले. माझे व्यक्तिमत्व घडविणारे जणू हे तीन खांब होते. चौथा खांब माझे आई-वडील त्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वाला परिपूर्णता देऊन आकार देण्याचाही प्रयत्न केला. उत्तम संस्कार करून विद्या विनय संस्कार यांनी संपन्न केले. मला सर्वांग सुंदर बनवण्याकरता शास्त्र व कला यांचा सुंदर संगम माझ्यात केला. मी गायन व नृत्य शिकले.

नृत्याच्या बाबतीतला एक अविस्मरणीय प्रसंग व आठवण तुम्हाला सांगते. माझे नृत्य –शाळेतर्फे पहिला वहिला नृत्याचा कार्यक्रम झाला व त्याला प्रथम पारितोषिकाचा मान मिळाला. अध्यक्षांच्या हस्ते बक्षीस घेतले तो क्षण व आईला मारलेली मिठी तो क्षण अविस्मरणीय अजरामर असा आहे.

माझी आईही विद्यार्थीप्रिय अध्यापिका होती. ती माझ्या आयुष्याची बॅकबोन आहे .तिने मला अभ्यास निरनिराळ्या अध्यापन पद्धतीने शिकविला. माझी आई एक प्रतिभावंत लेखिका व कवयित्री आहे .तिच्याच प्रेरणेमुळे माझ्यात लेखनाचा गुण आला असावा .मी नवव्या वर्गात असताना ‘क्रिकेट’ वर व एका अध्यात्मिक विषयावर कविता केली .सर्व लोक अचंबित झाले त्या कविता वाचून.  लेखनाची सवय मला तिच्या motivation मुळे लागली.

माझे बाबा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवन कसे जगावे हे त्यांनी शिकवले. माझ्या आई-बाबांनी माझ्यावर उत्तम संस्कार करून उत्तम माणसाची प्रेरणा केली .माझे आई-बाबा  व आजोळ म्हणजे माझ्या संस्काराचे चालतं बोलतं विद्यापीठच जणू ! माझ्या शैक्षणिक बाजूकडे तर त्यांचे लक्ष होते पण मला सोशल बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

मी सुद्धा आज उत्तम शिक्षिका आहे अध्यापनाच्या विविध पद्धती मला ज्ञात आहे .माझ्या कर्तव्यात पूर्णपणे मी devoted आहे .हे सर्व माझ्या आईने motivation केले म्हणून शक्य झाले. जणू काही ही सर्व माहेरची मंडळी माझ्या जीवनाचे शिल्पकारच नव्हे का ?

माझ्या माहेरची आठवणींची दृश्य, त्याची चित्रफित माझ्या डोळ्यासमोरुन अखंडपणे जात होती . किती वेळ झाला तरी मी भूतकाळाच्या हिंदोळ्यावर बसून  झोके घेत होती. तेवढ्यात मला माझ्या मुलीची हाक ऐकू आली.  एकदम मी वर्तमानात आले. या सर्व व्यक्ती  व आठवणी हृदयाच्या कुपीत बंदिस्त करून ठेवल्या होत्या, त्यांना आज संधी मिळाली.    

लेखिका :- सौ. रेणुका आशिष ओझरकर (पूर्वाश्रमीची रेणुका वसंत पराडकर )

Mobile no. 9372912230

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उत्तम असामान्य ज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ उत्तम असामान्य ज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

हे आपणास माहित आहे का?

  1. गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.
  2. मोनालिसाच्या चित्राला भुवया नाहीत.
  3. “The quick brown fox jumps over the lazy dog” हया इंग्रजी वाक्यात इंग्रजीचे सर्व अक्षर आलेले आहेत.
  4. जीभ हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.
  5. मुंग्या अजिबात झोपत नाहीत.
  6. “I am.” हे इंग्रजीतील सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य आहे.
  7. कोका कोला हे शीत पेय मूलतः हिरव्या रंगाचे होते.
  8. जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव मोहम्मद
  9. जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमीपेक्षा जरासे कमी भरते.
  10. वाळवंटातील उडणाऱ्या वालुकणापासून बचावासाठी उंटाला तीन पापण्या असतात.
  11. “abstemious” आणि”facetious” हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात इंग्रजीचे स्वर क्रमबध्द आले आहेत.
  12. सर्व खण्डांची इंग्रजीतील नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्याच अक्षराने संपतात.
  13. अमेरिकेत दरमाणशी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.
  14. TYPEWRITER हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळ दाबून टाईप होणारा सर्वात लांब शब्द   आहे.
  15. उणे चाळीस डिग्रीला सेल्सिअस व फॅरेनहाईट दोन्ही उणे चाळीसच असतात.
  16. चाॅकलेट खाल्याने कुत्र्याचा मृत्यू होऊ शकतो. कारण चाॅकलेटमधील थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्वस सिस्टमवर विपरित परिणाम होतो.
  17. स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषांपेक्षा दुप्पटवेळा पापण्या ब्लिंक करतात.
  18. आपलाच श्वास रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.
  19. ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक”गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड”– तशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नमूद आहं.
  20. डुकरांना आकाशाकडे पाहता येत नाही.
  21. “sixth sick sheikh’s sixth sheep is sick” हे इंग्रजीतील सर्वात उच्चारण्यास अवघड वाक्य मानले जाते.
  22. “Rhythm” हा इंग्रजीतील स्वररहित सर्वात लांब शब्द आहे.
  23. आपण खूप जोरात शिंकलो तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर डोक्यातील वा मानेतील रक्तवाहिनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.
  24. पत्त्यातील चारही राजे महान राजांचे चित्र आहेत.
    1. – इस्पिक – राजा डेव्हिड
    2. – किलावर – अलेक्झांडर
    3. – बदाम – चार्लमॅगने
    4. – चौकट – जुलियस सिझर
  25. आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.
  26. 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321
  27. ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.
  28. गोळीरोधक जाकेट, आगनिरोधक, कारचे वायपर व लेसर प्रिंटर्स ही सर्व स्त्रियांनीशोधलेली साधने आहेत.
  29. मध हे एकमेव खाद्यान्न चिरकाल टिकते.
  30. मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.
  31. साप तीन वर्षांपर्यत झोपू शकतो.
  32. सर्व विषुववृत्तिय अस्वले डावरी असतात.
  33. विमानात द्यावयाच्या सॅलडमधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन, अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.
  34. फुलपाखरे पायांनी चव अनुभवतात.
  35. हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.
  36. मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी माणसाळला गेलेला नाही.
  37. मृत्युपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
  38. Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्या हाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.
  39. मुंग्या विष प्राशनानंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.
  40. वीज दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.
  41. 41 रक्ताचा तीस फूट फवारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते. 
  42. उंदरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहा लाख होवू शकतात.
  43. इअरफोन एक तास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700 पट विषाणू वाढतात.
  44. सिगारेट लायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.
  45. बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वृद्ध व्यक्तीचा मेंदू ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ वृद्ध व्यक्तीचा मेंदू ☆ संग्राहक – श्री माधव केळकर☆

जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनचे संचालक असा युक्तिवाद करतात की वृद्ध व्यक्तीचा मेंदू सामान्यतः विश्वास ठेवण्यापेक्षा जास्त व्यावहारिक असतो.  या वयात, मेंदूच्या उजव्या आणि डाव्या गोलार्धांचा परस्परसंवाद सुसंवादी बनतो, ज्यामुळे आपल्या सर्जनशील शक्यतांचा विस्तार होतो.  म्हणूनच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये तुम्हाला अशी अनेक व्यक्तिमत्त्वे आढळू शकतात ज्यांनी नुकतेच त्यांचे सर्जनशील क्रियाकलाप सुरू केले आहेत.

अर्थात, मेंदू आता तारुण्यात होता तितका वेगवान राहिलेला नाही.  तथापि, तो लवचिकता प्राप्त करतो .  म्हणून, वयानुसार, आपण योग्य निर्णय घेण्याची अधिक शक्यता असते आणि नकारात्मक भावनांना कमी सामोरे जावे लागते.  मानवी बौद्धिक क्रियाकलापांची शिखरे वयाच्या ७० च्या आसपास होतात, जेव्हा मेंदू पूर्ण ताकदीने कार्य करू लागतो.

कालांतराने, मेंदूतील मायलिनचे प्रमाण वाढते, हा एक पदार्थ जो न्यूरॉन्समधील सिग्नलचा जलद मार्ग सुलभ करतो.  यामुळे, बौद्धिक क्षमता सरासरीच्या तुलनेत 300% वाढतात.

हे देखील मनोरंजक आहे की 60 वर्षांनंतर, एखादी व्यक्ती एकाच वेळी 2 गोलार्ध वापरू शकते.  हे आपल्याला अधिक जटिल समस्या सोडविण्यास अनुमती देते.

मॉन्ट्रियल विद्यापीठातील प्राध्यापक मोंची उरी यांचा असा विश्वास आहे की वृद्ध माणसाचा मेंदू कमी ऊर्जा वापरणारा मार्ग निवडतो, अनावश्यक गोष्टी काढून टाकतो आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी फक्त योग्य पर्याय ठेवतो . विविध वयोगटांचा समावेश करून एक अभ्यास करण्यात आला.  चाचण्या उत्तीर्ण करताना तरुण लोक खूप गोंधळलेले होते, तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी योग्य निर्णय घेतला.

आता, 60 ते 80 वयोगटातील मेंदूची वैशिष्ट्ये पाहू. ते खरोखर गुलाबी आहेत.

वृद्ध व्यक्तीच्या मेंदूची वैशिष्ट्ये.

  1. तुमच्या सभोवतालचे सर्वजण म्हणतात त्याप्रमाणे मेंदूतील न्यूरॉन्स मरत नाहीत.जर एखादी व्यक्ती मानसिक कार्यात गुंतली नाही तर त्यांच्यातील संबंध फक्त अदृश्य होतात.
  2. भरपूर माहितीमुळे विचलित होणे आणि विस्मरण होणे उद्भवते.म्हणूनच, तुमचे संपूर्ण आयुष्य अनावश्यक क्षुल्लक गोष्टींवर केंद्रित करणे आवश्यक नाही.
  3. वयाच्या 60 व्या वर्षापासून, व्यक्ती, निर्णय घेताना, तरुण लोकांप्रमाणे एका वेळी एकच गोलार्ध वापरत नाही, परंतु दोन्हीचा वापर करते.

निष्कर्ष: जर एखादी व्यक्ती निरोगी जीवनशैली जगत असेल, हालचाल करत असेल, व्यवहार्य शारीरिक हालचाली करत असेल आणि पूर्णपणे मानसिकरित्या सक्रिय असेल, तर बौद्धिक क्षमता वयानुसार कमी होत नाही, ती फक्त वाढते , वयाच्या 80-90 व्या वर्षी शिखरावर पोहोचते .

त्यामुळे म्हातारपणाची भीती बाळगू नका.  बौद्धिक विकासासाठी प्रयत्न करा.  नवीन हस्तकला शिका, संगीत बनवा, वाद्य वाजवायला शिका, चित्रे रंगवा ! नृत्य शिका ! जीवनात रस घ्या, मित्रांना भेटा आणि संवाद साधा, भविष्यासाठी योजना करा, शक्य तितका उत्तम प्रवास करा.  दुकाने, कॅफे, शो मध्ये जाण्यास विसरू नका.  एकटे गप्प बसू नका, ते कोणासाठीही विनाशकारी आहे. :” सर्व चांगल्या गोष्टी अजूनही माझ्या पुढे आहेत !” या विचाराने जगा. 

स्रोत: न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन.

ही माहिती तुमच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या 60, 70 आणि 80 च्या दशकातील मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना त्यांच्या वयाचा अभिमान वाटेल 

संग्राहक : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग-२९ परिव्राजक –७.मीरत / मेरठ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग-२९ परिव्राजक –७.मीरत / मेरठ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

 हिमालयातील भ्रमंती, खाण्यापिण्याची आबाळ, कठोर साधना यामुळे स्वामीजींची प्रकृती खालावली. ते अतिशय कृश दिसत होते. तसं अल्मोरा सोडल्यापासूनच अधून मधून त्यांना ताप येत होता. पुरेशी विश्रांती मिळत नव्हती. नीट उपचार मिळाले नव्हते. मिरतचे डॉक्टर त्रैलोक्यनाथ घोष यांच्या उपचाराने आणि पंधरा दिवसांच्या विश्रांतीने स्वामीजींना बरे वाटू लागले. इतर गुरुबंधु पण इथे एकत्र आले. आणि सर्वजण शेठजींची बाग इथे राहायला गेले. शेठजींनी सर्व संन्याशांची आपल्या घरी निवासाची व्यवस्था केली होती. सगळे हाताने स्वयंपाक करीत. बाकी वेळ अध्यात्म चिंतनात जाई.

निरनिराळ्या दिशांना भ्रमण करत असलेले, स्वामीजी, ब्रम्हानंद, सारदानंद, तुरीयानंद, अखंडानंद, अद्वैतानंद, आणि कृपानंद असे सर्व गुरुबंधु वराहनगर मठ सोडल्यानंतर खूप दिवसांनी एकत्र आले होते. त्यामुळे मिरतचे हे वास्तव्य सर्वांनाच आनंद देणारे होते. भजन, ध्यानधारणा, शास्त्रांचे पठन याबरोबर संस्कृत आणि इंग्रजी मधल्या श्रेष्ठ साहित्य कृतींचे वाचन असा त्यांचा कार्यक्रम असे. मेघदूत, शाकुंतल, कुमारसंभव, मृच्छकटिक यांचे वाचन सर्वांनी मिळून केले.

मिरतमध्ये एक ग्रंथालय होतं. तिथून स्वामीजींनी अखंडानंदांना सर जॉन लुबाक यांचे ग्रंथ आणायला सांगितले. त्यानुसार अखंडानंद त्या ग्रंथलयातून रोज एक ग्रंथ घेऊन जात. स्वामीजी तो पूर्ण वाचून काढत आणि लगेच दुसर्‍या दिवशी परत ग्रंथालयात घेऊन जात. तो देऊन लगेच दूसरा ग्रंथ आणायला सांगत. असा रोजचा क्रम पाहून ग्रंथपालाला एक दिवस शंका आली. फक्त वाचनाचा देखावा करण्यासाठी ग्रंथ घेऊन जातात आणि लगेच परत आणून देतात अशी शंका त्यांनी अखंडानंदांकडे बोलून दाखविली, ती स्वामीजीनांही कळली. स्वामीजी त्या ग्रंथपालाला जाऊन भेटले आणि म्हणाले, “मी जे ग्रंथ आता वाचले आहेत त्या बद्दल काहीही आणि कोणताही प्रश्न मला विचारा. आणि काय, त्यांना विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं स्वामीजींनी लगेच दिली. ग्रंथपाल हे बघून आश्चर्य चकित झाला. आणि अखंडानंद सुद्धा. त्यांनी विचारले तुम्ही इतकं वेगात कसं काय वाचू शकता? स्वामीजी म्हणाले, मी एकेक असा शब्द वाचत नाही. तर, संपूर्ण वाक्य एकदम वाचतो. कधी कधी याच पद्धतीने मी परिच्छेदामागून परिच्छेद वाचतो. एका दृष्टीत तो समजून घेऊ शकतो.”

इथे आपल्या लक्षात येत की, वाचण्यासाठी नुसता वेग नाही तर मन एकाग्र करण्याचे असाधारण सामर्थ्य स्वामीजींकडे होतं. त्यामुळेच ते असं करू शकत होते. म्हणजेच कोणतीही गोष्ट करतांना मनाची एकाग्रता होणं अत्यंत आवश्यक असतं.

इथे मिरतला म्हणजे आजचे मेरठला उद्यानगृहात झालेली राहायची आणि दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था, गुरु बंधूंचा सहवास, ध्यानधारणा आणि अध्यात्म संवाद, उत्तमोत्तम ग्रंथांचा आस्वाद व काव्यशास्त्रविनोद यांचा लाभ. एव्हढं सगळं असताना चिंता कसली? असे त्यांचे दोन महीने अतिशय आनंदात आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारे गेले.

स्वामी तुरीयानंदांनी या आठवणी सांगताना म्हटले आहे, “मिरतच्या वास्तव्यात स्वामीजींनी आम्हाला, साधी चप्पल दुरुस्त करण्यापासून ते चंडीपाठ म्हणण्यापर्यंतचे सारे शिक्षण दिले. एकीकडे वेदान्त व उपनिषदे किंवा संस्कृतमधली नाटके यांचं वाचन चाले, तर दुसरीकडे जेवणातील पदार्थ कसे तयार करायचे त्याचे धडे ते आम्हाला देत.” एके दिवशी त्यांनी स्वत: पुलाव तयार केला होता. इतका स्वादिष्ट झाला होता. आम्हीच तो सारा संपऊ लागलो. तर स्वामीजी म्हणाले, “मी खूप खाल्लेलं आहे. तुम्ही खाण्यात मला समाधान आहे. सगळा पुलाव खाऊन टाका.” तुरीयानंदांनी ही आठवण मिरतला जाऊन आल्यावर पंचवीस वर्षानी काढली आहे. म्हणजे खरच मनावर कोरली गेलेली आठवण आहे.

असे अनेक आणखी सुद्धा अनुभव स्वामीजींनी याही वास्तव्यात घेतले. अनेक प्रकारचे लोक भेटले. आता तब्येत पण सुधारली असल्याने पुन्हा त्यांची परिव्राजकतेची प्रेरणा उफाळून आली, पण हिमालयात आता एकट्याने जाऊ शकणार नव्हते. मग दुसरीकडे जावे असं मनात आलं. पण प्रबळ इच्छा होती ते एकट्याने फिरण्याचीच. कारण श्रीरामकृष्ण यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून पुढची कार्याची दिशा ठरवण्याचं भान सतत त्यांना होतं. त्यांनी सर्व गुरुबंधूंना जाहीर सांगितलं की, आता यानंतर मी एकटाच फिरणार आहे कोणीही माझ्याबरोबर येण्याचा प्रयत्न करू नये. अखंडानंदांना याचं सर्वात वाईट वाटलं. तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही असं त्यांनी म्हणताच स्वामीजींनी समजूत घातली, “गुरुबंधूंचं सान्निध्य हा देखील आध्यात्मिक प्रगतिमध्ये एक अडसर ठरू शकतं. तोही एक मायेचा पाश आहे. तुमच्या बाबतीत तो अधिक बलवान होऊ शकतो.”

आता स्वामीजी दिल्लीला आले. भारताच्या प्राचीन काळापासूनचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. दिल्लीहून ते राजस्थान कडे निघाले. आता खर्‍या अर्थाने ते एकटेच भ्रमणास निघाले. दिल्लीच्या मोगल सत्तेशी झुंज देणारं राजस्थान. प्रत्येक प्रांतातला अनुभव वेगळा, माणसं वेगळी, वातावरण वेगळं. संस्थानाच्या राजधानीत अलवार मध्ये स्वामीजी येऊन दाखल झाले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मित्र नावाचा नातलग… – डॉ.महेंद्र वंटे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ मित्र नावाचा नातलग… – डॉ.महेंद्र वंटे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

…. ना जवळचा ना लांबचा… पण  हाकेच्या अंतरावरचा..

१९६५ चा जून महिना …चार साडेचार वर्षांची बालकं.. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो…. कुणी हमसून हमसून, तर कुणी भोकाड पसरून.. पण सगळेच रडके…. या समूहरुदनाकडे मख्खपणे पाहणाऱ्या जोशीबाई..  प्रत्येकाच्या डोळ्यात ‌एकमेकाविषयी सहानुभूती.. एक दोन दिवस रडण्यात गेले…  मग चेहऱ्यावर निर्विकार भाव.. मग हासरी आपुलकी… दोन दिवस गाळलेल्या आसवांच्या थेंबात मैत्रीची बीजं ओलावली…. अंकुरली….. पालवली.. फुलली… आणि फुलतच राहिली…. भावनिक मुळं एकमेकात जी अडकली, तो गुंता अजूनही शाबूत आहे. अ..अननसाचा… ब.. बदकाचा.. पेक्षा… म… मित्राच्या ओढीने शाळेकडे पावलं खेचू लागली… कुणी चालत, तर कुणी बापाच्या  सायकलवर, तर एखादा फटफटीवर… कुणी डॉक्टरचा, कुणी सायबाचा, कुणी शिक्षकाचा, पण बरीच मोठी पिलावळ कामगारांच्या बिऱ्हाडातील…… सवर्ण, अवर्ण, गौरवर्ण, कृष्णवर्ण, गरीब, श्रीमंत……  सामाजिक भेदाभेदीची ही सगळी ओझी घराच्या उंबरठ्यावर सोडून मित्राला भेटण्यासाठी धावणारी.. पाठीवर ओझं फक्त दप्तराचं.. कुणाच्या फडक्यात चटणी भाकरी, तर कुणाच्या टिफीनमधे तूप साखर पोळी……. मधल्या सुट्टीत वाटून खाताना… ना जात ना पात….. ना भेद ना भाव…….

मित्रांशी खेळणं आणि सोबत खाणं याच सुखाच्या  परमोच्च कल्पना… बेभान होऊन केलेली पळापळ.. पडणं, धडपडणं, खरचटणं… उचलणं, जखमेवर फुंकरणं, आयोडीन लावणं.. पुन्हा फुंकरणं..

सहवासातून सुखवासाची अनुभूती देणारा सत्संग..

याच सुखाच्या निरागस समागमातून जन्माला आलेला मित्र नावाचा नातलग… ना जवळचा ना लांबचा… पण  हाकेच्या अंतरावरचा…

एके काळचा अनोळखी, पण आता जिवलग,

ना जातीचा, ना पातीचा,

ना रक्ताचा, ना वंशावळीचा,

मीही तोच, तोच तूही.

‘मी’पणाच नाही कुठे..

वयं वाढली.. बुद्धी वाढली..  तशी इयत्ताही वाढत गेली….बालवाडीची झाली शाळा… शाळेचं झालं विद्यालय.. तिचं झालं महाविद्यालय..  मित्र नावाच्या नातेवाईकांत नवी भर पडली… मिशी आली.. दाढी वाढली…. खांद्याखांद्यावर जबाबदारी वाढली…

रोटी कपडा और मकान… काळानुरुप गरजा बदलल्या….. बदलल्या सुखाच्या कल्पना.. त्याच्या शोधासाठी पायाला भिंगरी….  झाल्या दिशा वेगवेगळ्या… झाल्या वेगवेगळ्या वाटा…… काही स्वत:च्या… काही वहिवाटा …..

पण वाटेच्या प्रत्येक वळणावर मागे वळत एकमेकांना अडीअडचणीला “मैं हूं ना” चा आशावाद देत संसाराची सप्तपदी चालणारे मित्र…

पोटाची भूक ज्यांनी कधीकाळी वाटून खाऊन भागवली, ते आता  झाले एकमेकांच्या भावनिक भुकेचे वाटेकरी ..

हक्काने बोलवता येईल असा सुखदुःखातील सहकारी…

लग्नं, बारसं, बर्थडे, पूजा…. दहन, दफन, दहावा, तेरावा…

कुणी कारने, कुणी दुचाकीने, तर कुणी बसने… पण येणार हमखास.. नातलगांपेक्षा आधी पोहचणारा तोच मित्र नावाचा नातलग…. ना लांबचा, ना दूरचा…  हाकेच्या अंतरावरचा… 

गेल्या ५० वर्षांत कितीतरी वेळा आला गेला….  दु:खात आणि सुखात.. कधीतरी सहज…. वाटलं भेटाव़ं म्हणून आलेला.. वयाने साठी गाठली तरी चवीपुरतं बालपण अजूनही  गाठीला जपलेला..

कष्टाने मिळवलेली सुबत्ता आणि दैवाने दिलेली सुखदुःखं भोगलेली पिढी .. 

काहींनी मोजता येणार नाही इतकं मिळवलं, तर कुणी सहन होणार नाही इतकं गमावलं…  कुणाची सुखं मुठीत सामावलेली.. तर कुणाची मिळकत बॅंकेच्या पासबुकात मावलेली…

पंखात बळ भरलेल्या पाखरांनी आपापलं आभाळ शोधलं…  कुणी लोकल, तर कुणी ग्लोबल झालं.

कोणी आजोबा केलं, तर कोणी ग्रॅंडपा… मोबाईलच्या पडद्यावर नातवाने दिला पा…

पोटाचा घेर सुटला.. गुढघ्यांचा भार वाढला… केसाने रंग सोडला…. डोक्याने केस सोडले..

बीपी, शुगर, संधिवात…. सकाळ दुपार संध्याकाळ…. .

जेवणाच्या जागी औषधं आली..

तरीही..

मित्रांचा कुंज तोच….. तीच मैत्रमोहिनी

माझ्या ६१ व्या वाढदिवशी एका हाकेला जमला.. कुणी कारने, कुणी दुचाकीने, तर कुणी चालत.. पद, प्रतिष्ठा अन् सुबत्तेपायी साठलेलं ‘मी’पणाचं ओझं  उंबरठ्यावर सोडून….. 

तोच उत्साह, तीच निरागसता…… .बालसवंगडी ते शाळकरी.. वर्गात पहिल्या दिवशी एकाच सुरात रडलेले ते तमाम सुदामा… सवंगड्याच्या अनेक सुखात हसलेला आणि प्रत्येक दुखा:त पाणावलेला सुदामा…  

तांबेकर, घारे, नारंग, झानपूरे, सोमण…. घाटणेकर, सानप, चव्हाण, आठवले…… 

किती नावं, किती आडनावं…  ना जात, ना पात….. ना भेद, ना भाव..

आता ना फडक्यातील भाकरी उरली, ना डब्यातील तूप साखर पोळी… उरले आहेत जग नावाच्या बंदीशाळेतील शेवटचे काही तास आणि प्रत्येक सुदाम्याने जपलेले पोहे खास……

शाळा संपल्याची घंटा वाजण्याआधी आनंदाने वाटून खा….. ते उरलेसुरले चविष्ट घास….. मित्र नावाच्या नातलगाचे…..

ना जातीचा ना पातीचा

ना रक्ताचा ना वंशावळीचा

ना जवळचा ना लांबचा… पण  हाकेच्या अंतरावरचा… 

लेखन…डॉ.महेंद्र वंटे

मो 9673817700

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares