मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -4 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -4 ☆ सौ. अंजली गोखले ☆

किशोर वयातले ते अल्लड, अबोध कळी पण हळूहळू उमलत जाते, तस तसे अवतीभोवतीचे खरे वास्तव लख्ख दिसायला लागते ,  जाणवायला लागते. तारुण्याच्या उंबरठ्यावर डोळ्यांची पाखरं फडफडायला लागतात,  मनाला फुलपाखरी पंख फुटतात. स्वप्नांच्या ढगांमध्ये मुक्तपणे संचार सुरू होतो. एवढ्याश्या मनामध्ये, इवल्याशा नजरेची स्वप्न असंख्य असतात, , अभ्यासाची असतात करियरची असतात, मोठेपणी आई-वडिलांना आधार देण्याची असतात, मित्र-मैत्रिणींची असतात, आयुष्याच्या जोडीदाराची असतात, मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याची असतात.कोणाला मिलिटरी मध्ये जायचे असते, कोणाला क्रिकेटर बनायचे असते, कोणाला शास्त्रज्ञ तर कोणाला सर्जन!उन्हाळ्यामध्ये बहावा कसा फुलून, पिवळ्या जर्द नाजूक फुलांनी डवरलेला असतो, डोलत असतो, गुलमोहर गडद लाल फुलांनी आकर्षून घेत असतो, तसे तारुण्यातल्या मनाला ही सगळी स्वप्न खुणावत असतात.ती स्वप्न गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असते.ज्यांना मनासारखे यश मिळते, ते सुखाने मनोराज्यात मुक्तपणे विहार करतात.ज्यांचे निम्मी किंवा अखे तरूणपण त्यांना पकडण्यात जाते, त्यांच्या मनाला ओरखडे पडतात, त्यांच्या स्वप्नांचे पक्षी दूर दूर भरकटत निघून जातात आणि उरते एकाकीपण!सभोवताली निराशेचे ढग जमायला लागतात.जीवनाला सुरवंटाचे काटे टोचायला लागतात आणि अपयशाने खचून जायला होते.यास  सुरवंटी अवस्थेमध्ये , एखादा जरी सोबतीचा हात मिळाला, सहानुभूतीची हलकीशी थाप पाठीवर पडली, तरी ते आयुष्य सावरायला मदत मिळते आणि बघता बघता आयुष्याची पन्नास-पंचावन्न वर्षे भुरकन सरतात.इतरांसाठी करता-करता, स्वतःच्या इच्छा , अपेक्षा, आवड गुंडाळून ठेवलेली असते.आयुष्याची संध्याकाळ खुणावायला लागते.

नेमक्या याच वळणावर आपल्या आयुष्याची, आरोग्याची, आपल्या माणसांची खरी किंमत कळते.काहींना”संध्याछाया भिवविती हृदया”हे जाणवायला लागते तर अनेकांना अनेक व्याधींचा  विळखा पडलेला असतो. त्यांना दवाखान्याचे खेटे घालावे लागतात, वेळच्यावेळी औषध पाण्याच्या वेळा सांभाळण्यात सहकार्याची दमछाक होते.आपल्या गाडीचा वेग मंदावलाय हे समजते. काहीजण मात्र यासाठी नंतर अतिउत्साही बनतात. आपले छंद जोपासतात. आपला आनंद आपणच शोधतात. पर्यटनाचा आनंद उपभोगतात. मित्रमंडळीत रमतात. वाचन मनन चिंतन आणि चर्चा अशा मधून एकमेकांशी संवाद साधतात. तरुणपणी जे करायला मिळाले नाही, जे छंद जोपासायला मिळाले नाही त, आयुष्यातले जे क्षण वाळूसारखे हातातून गेलेले असतात, ते पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करतात आणि जीवनाची संध्याकाळ मनासार खी उपभोगतात.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ टपालाचे दिवस …. ☆ श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ टपालाचे दिवस …. ☆ श्रीशैल चौगुले ☆

(ऑक्टोबर महिन्यात टपाल दिवस साजरा करण्यात येतो.त्यानिमीत्त.)

आठवणीतले क्षण एखाद्या चिमणीसारखे टिपतात आणि मग आपणास लेखणीने सांगीतल्याशिवाय मनही स्वस्थ बसत नाही.

लहान असताना जसजसे कळायला लागले तसतसी विशीष्ट व्यक्तींची ओळख डोळ्यात साठवून ओळख पटू लागली. खास करुन शिक्षक,पोलीस, व सर्वात महत्वाची व्यक्ती चटकन आकर्षून घ्यायचा तो पोस्टमन.

मला वाटते त्यावेळी जांभळा सदरा व टोपी असा काहीतरी वेश होता बहुधा. नंतर खाकी वेष व हातात कसले तरी थोडे कागद व पिशवीतही खाकी चौकोनी जाड कागद. हळूहळू त्या कागदाची ओळख टपाल म्हणून परिचीत झाली. दारात पोस्टमन आला कि हा काही क्षणाचा विशेष पाहुणाच वाटायचा. मग बहिणींची धावपळ व्हायची. कुणाचे पत्र आले हे पहाणेसाठी व माझीही लुडबूड व्हायची, बहिणींचे परकर धरुन. मग ती टपाल नावाची अद्भूत वस्तू मलाच मिळण्यासाठी रडारड घरभर. पण, ते पत्र पूर्ण वाचलेशिवाय काय माझ्या हाती लागायचे नाही.

कधी कधी तारही आल्याचे आठवते. धारवाडहून मामांचे अथवा मुंबईहून नागूकाका शिक्षक जे वडिलांचे व आमचे घरोबा शेजारी यांचे.

मग घरभर धिंगाणा चालायचा. पत्र वाचायला अथवा लिहायला येणारी व्यक्ती अथवा मुलगा हुशार समजला जायचा.

पण हे टपाल भांडण लावण्यात सर्ईरात. वाचायला व्यवस्थीत आले तर ठिक, नसता घरभर बहिण भावंडात हशा होऊन कधी कधी टपाल फाटूनही जायचे. पाठवाणार्याचे ते दुर्दैवच.

पत्ता निट असेल तरच पत्र लवकर मिळायचे. अन्यथा पोस्टमन गल्ली बोळ शोधून दोन दिवस दिरंगाईने पत्र पोचते करायचे. त्यात पत्र वेळाने आले कि,पटकन पोस्टात जाऊन दहा पैशाचे पत्र आणून ऊत्तर पाठवताना मजकूरात पहिले वाक्य ‘टपाल वेळाने मिळाले’.

पत्र लिहिताना लिहीणार्याचा भाव काय विचारता. आम्ही सगळे त्यांच्याभोवती रींगण करुन गुडघे दुमडून,गालावर हात ठेऊन गांभिर्याने टपालकडेच एकटक मंत्रमुग्ध होऊन बघत असू. मग काय लिहीणार्या बहिणीचा भाव अधिक,सरा, अंधार करू नका,हलवू नका. मग आम्ही हताश. पण टपाल पूर्ण झाले की टपालपेटीत टाकून येण्याची जबाबदारी कधी कधी माझ्यावरही यायची. मला अतिशय कटाक्ष सुचना असायच्या,’हे बघ,ते पेटीचे वरचे दार ऊघडून त्यात टाकायचे. हाताला येतय नव्हे. मी होय म्हणून थाप लावायचा. मग मुलींच्या शाळेत अथवा बस स्थानकातल्या पेटीजवळ गेलो की,अगोदर चड्डी गच्च करणार. कारण ही गडमोहीम साधी नव्हती. खांबावर चार पाय वर चढून मोठ्या कसरतीने दार ऊघडून टपाल टाकायचे. पण मोहिम फत्ते झाली कि मला पाच दहा पैशाचे बक्षिस घरी आल्यावार नक्की मिळायचे. अहाहा काय त्या टपालमेहनतीतून मिळालेल्या साखरगोळी,निलगीरी गोळीचा आस्वाद. छे ! तो आनंदच वेगळा.

टपालाची सुध्दा एक गंमत असायची. आम्ही  चव्हाणवाड्यात नवीन रहायला आलेलो. मी तिसरी चौथीच्या वर्गातला हुशार विद्यार्थीच होतो अगदी ठाम.

मग दिवसभर शेजारी चव्हाणवाड्यातच थौड्या फरकाने एक दोन वर्षाच्या अंतराने सवंगडी असलेने तिथेच खेळायला असू. मग टपाल वागैरे आले कि गलकाच गलका. मग त्यांचे घरी आमच्या तुलनेने लहान व शिक्षणानेही थोडाफार मठ्ठ असलेला चव्हाणांचेच शेजारीमित्र होते. त्याला टपाल वाचायची भारी हौस. अजून दुसरीपर्यंतच असेल पण टपालाचा आनंद विरळच.

तो कोणतेही पत्र आले कि,मामा चचो,मामी चचो,काका चचो असा मोठ्याने वाचायचा आणि वाडा हशानै गदगदून जायचा.

आणखी एक टपालाचा प्रसंग,आमच्या बहिणींची नुकतीच लग्नं झालेली. मग त्यांच्यात सरशी असायची कि,कुणाचे मिस्टर किती थोर म्हणजे भाऊंजींची लढत असायची.

मग मोठ्या बहिणीच्या हाती मधल्या बहिणीच्या भाऊजीकडून आलेले पत्र हाती आले मग त्या टपालातील दोष काढून चिडवा चिडवी सुरु. आम्ही सगळे गमतीत रमून हसू लागलो. आणि आमच्या मधल्या बहिणीचा राग अनावर होऊन अक्षरशः पळीने फेकून बहिणीला अंदाजाने भिरकावले. तिला वाटले लागणार नाही. आणि काय विचारता राव पळीचा घाव पायावर जबरदस्त बसला. बहिण बेशुध्द काही क्षण. हसता हसता सगळ्यांचे डोळे भरुन आले., मधल्या बहिणीचे तर काळीजच फुटले या टपालप्रकरणातून. तसा मारण्याचा हेतू नव्हता पण  रागाने भिरकावलेले स्वयंपाकशस्त्र. क्षणभर धावपळ. काय करायचे कुणाला काही कळेना.

यापुढे मात्र टपालातल्या दोषांची टिका टळली. आणि आम्ही चांगले टपाल लिहायला शिकलो.

एकंदरीत संदेशाचे पुष्पकविमान म्हणजे टपाल.

एक हिंदी कविता आठवाते पाठ्यपूस्तकातीलः

लेकर पिला पिला थैला

पत्र बॉंटने आता

यह है मुन्सीराम डाकीया. . . . .

डाकीया’ नावाची कविता.

अशा खूप जीवनातल्या सुख-दुःख क्षणाशी निगडीत पोस्टमन वा टपालाच्या आठवाणी. पण आजसाठी ईथेच थांबतो.

सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार व. . . . गोड गोड पापा.

आपला विश्वासू

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -3 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -3 ☆ सौ. अंजली गोखले ☆

आपल्याला वाटेल लहान जीवांना कसला आलाय कठीण प्रसंग?लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं.  आई बाबा, आजी आजोबा यांच्या प्रेमाच्या  मऊ उबे मध्ये वाढत असताना त्यांना कशाचा होणार त्रास?पण आलीकडे ही प्रेमाची मऊ दुलई फार लवकर काढली जाते आणि पाळणाघर नावाच्या वेगळ्याच शिस्तीच्या धगे ला त्यांना सामोरे जावे लागते, इच्छा असो वा नसो, ही परिस्थिती ते वाढणारे मूल बदलू शकत नाही. त्या नवीन वातावरणामध्ये ते रमले तर ठीक, नाहीतर अशाही फुलपाखराचे सुरवंट व्हायला वेळ लागत नाही.

तीच परिस्थिती शालेय जीवनामध्ये.  खरेतर लहान मुलांना शिकायला खूपच आवडते.  त्यांची इवलीशी नजर बघा, नव्याचा शोध घेत असते. एखादी गोष्ट त्यांना आवडली की त्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला ती चमक दिसते. त्यांचा मेंदू विलक्षण तजेलदार असतो.  स्पंज जशा पाणी शोषून घेतो, तसा त्यांचा मेंदू नवनवीन गोष्टी स्वीकारायला आसुसलेला असतो. अशावेळी या मेंदूला योग्य ते खाद्य मिळाले तर ठीक. पण जर का कु संगत लाभली तर आयुष्याचा सुरवंट झालाच म्हणून समजा. अशावेळी त्याला त्यामधून बाहेर काढण्याची जबाबदारी सर्वस्वी पालकांची, आजूबाजूच्या लोकांची आणि त्याच्या शिक्षकांची असते.

शाळेच्या इयत्ता जसजशा वाढत जातात, तस-तशी त्यांची निरीक्षणशक्ती वाढते. त्या निरीक्षणाचे अनुकरण करण्याचे ते निरागस वय. घरी घरी आई बाबा जसे वागतात, बोलतात, ते ही मुले बरोबर टिपतात आणि त्याप्रमाणे त्यांचे वागणे असते.  एखादेवेळी आईने एखादा खोटा शब्द बोललेला त्यांच्या लक्षात आले, तर ते नेमकेपणाने लक्षात ठेवतात. आणि आपल्या सोयीसाठी खोटे कसे बोलावे, वागावे हे हेरतात आणि मोठ्यांच्या नकळत त्यांच्या गाडीचा ट्रॅक बदलत जातो.  हे असे न होण्यासाठी योग्य आणि सचोटीने वागण्याची जबाबदारी असते, ती घरातील आजूबाजूच्या वयाने मोठे असलेल्या थोरांची !

उमलत्या वयातील मुला-मुलींची आयुष्याकडे बघण्याची उत्सुकता पराकोटीची वाढलेली असते.  आत्तापर्यंतचा मित्र किंवा काल पर्यंत ची मैत्रीण यांच्या वागण्या-बोलण्यात झाले ला बदलत्यांना फार लवकर समजतो.  पण कारण समजत नाही.  मैत्री तर हवीहवीशी असते, पण अचानक निर्माण झालेली दरी कासावीस करते.  शाळेमध्ये अभ्यासाचा ताण वाढत जातो, अनेक नवनवीन गोष्टी समजायला लागतात.  समाजा मधल्या गोष्टींची जाणीव व्हायला लागते.  भोवताली घडते ते सारेच चांगले वाटायला लागते.  एखादी चुकीची गोष्ट आई-बाबांनी, शिक्षकांनी दाखवून दिली, समजवण्याचा प्रयत्न केला तर तो अपमान वाटतो.  त्यांच्याशी बोलणेच नको इथपर्यंत मजल जाते.  त्यांचा  सहवास टाळावा असा वाटतो.  अशा या संवेदनशील वयामध्ये सच्चे मित्र मैत्रिणी खूप उपयोगाचे अन महत्त्वाचे ठरतात.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ हाव ‘. . . एक बांडगूळ. . ! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆  ‘ हाव ‘. . . एक बांडगूळ. . ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

हाव. दिसायला दोन अक्षरी एक साधा शब्द, पण त्यात नकारात्मक अर्थांचे विविध छटांचे रंग ठासून भरलेले. . ! कांही हवं असणं आपण समजू शकतो, पण अंत नसलेलं ‘आणखी हवं’ ही उध्वस्ततेची सुरुवात ठरते. आणखी हवं असणं म्हणजे हव्यास. हव्यास म्हणजे विध्वंसाची ठिणगीच जणू. कारण कोणत्याही हव्यासाचं असणं परोपकारासाठी, जनसुखाय -जनहिताय कधीच नसतं. ते तसं असूच शकत नाही. ते असतं स्वत:साठी, . . स्वार्थासाठी. ! म्हणूनहव्यासाची परिणती अर्थातच विनाश हेअपरिहार्यच. खरं तर विश्व निर्माण झालं तेव्हाच निसर्गनियमही अस्तित्वात आले. हे नियम निसर्गातले सर्व घटक काटेकोरपणे पाळत असतात. अपवाद फक्त माणसाचा.  पैसा, पद, प्रतिष्ठा, सुख यांच्या हव्यासापायी निसर्गाचे सगळे नियम धाब्यावर बसवण्याच्या सुरुवातीचा पहिला क्षणच विनाशकाले विपरीत बुध्दी ठरला.  आपलं जगण्याचं निसर्गाला अपेक्षितच नव्हे तर अभिप्रेतही असलेलं प्रयोजनच माणूस विसरुन गेला आणि विनाशाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला.

निसर्गाने माणूस निर्माण केला आणि त्याला बुध्दीचं वरदान दिलं. त्या बुध्दीचा  सर्व निसर्गघटकांच्या हितासाठी त्याने योग्य उपयोग करणे अपेक्षित होते. पण हव्यासाच्या अतिरेकामुळे सुखासमाधानाच्या मृगजळामागे धावता धावता निसर्गानेच दिलेलं बुध्दीमत्तेचं कोलीत हातात घेऊन सर्वाना प्रकाश दाखवणे अपेक्षित असताना अतिरेकी हव्यासामुळे माणूस ते क़ोलीत घेऊन सगळा निसर्गच जाळत सुटलाय.

माणसाचं हे अनैसर्गिक जगणंच त्याला आज विनाशाच्या अखेरच्या वाटेवर घेऊन आलंय.

निसर्गाला अपेक्षित असणारं  माणसाचं ‘ जगणं’ हे एका अतिशय सुखी, समाधानी, समृध्द,  सुंदर अशा जगाच्या निर्मितीला निमित्त झालं असतं.  एरवी अगदी सहज वास्तवात येऊ शकलं असतं असं ते सुंदर जग आज माझ्या मनात मला स्वच्छ दिसतंय, पण. . स्वप्नवतच.  म्हणूनच ते रुखरूख वाढवणारं ठरतंय. काहीतरी निसटून गेल्याची रुखरुख.  निसर्गाला अभिप्रेत असलेल्या त्या सुंदर जगाचं दर्शन   तुमच्याही मनात ती रुखरुख निर्माण करेल आणि कदाचित नव्या वाटा शोधण्याची असोशीही. . . . !

कसं आहे हे हवंहवंस जग?हे जग आणि अर्थातंच इथलं जगणंही अतिशय निरामय

आणि  सुंदर आहे. या जगात माणुसकी हा एकच धर्म अस्तित्वात आहे. ॐकार हाच प्रत्येकाचा देव आहे. घरं मंदिरासारखी पवित्र आहेत आणि त्या घरांऐवजी प्रत्येकाच्या मनामधे देव्हारे आहेत. त्या देव्हार्यात ॐकाराची पूजा नित्यनेमाने होते. नीतिनियमांनुसार आचार हे प्रत्येकाचे व्रत, आणि त्यातून मिळणारं समाधान हा पूजेचा प्रसाद. . !निसर्गाचे सर्व नियम इथे सर्वानी मनापासून स्विकारलेत. त्यामुळे निसर्गालाही कृतकृत्य वाटतेय. त्यामुळे निसर्ग छान खुललाय. फुललाय. निसर्गचक्राचा स्वत:चा ताल, वेग सर्वांसाठीच हवाहवासा, आनंददायी ठरतो आहे. निसर्ग प्रसन्न आहे, त्यामुळे माणसेच नव्हे, तर मनुष्येतर प्राणीही अतिशय समाधानी आहेत. माणसांनी त्याना अभयारण्यांऐवजी अभयच देऊ केल्यामुळे मानवाचा अधिकार त्यानीही मनापासून स्विकारलाय आणि स्वत:च्या अरण्यकक्षेत ते आनंदाने जगतायत. माणसांचं नागरी जीवन त्यामुळे भयमुक्त आणि श्वासोच्छवासासारखं सहजसुंदर आहे. पृथ्वीच्या अंगाखांद्यावरचं जनसंख्येचं अतिरिक्त ओझं आता कमी झालंय. त्यामुळे पृथ्वीसुध्दा निरोगी आणि नीतिमान माणसांचं आस्तित्व अलंकारांसारखं मिरवतेय. . . !

या जगात प्रत्येकजण सुखी आहे आणि समाधानीही. . !

प्रत्येकाला स्वत:च्या कुटुंबाचं असं घर आहे. ते एकमजलीच आहे. घरापुढे प्रशस्त अंगण आहे आणि फुललेली हसरी बागही. त्या बागेतल्या गोड,  रसाळ फळांसारखाच प्रत्येकाचा संसार आहे.

रस्तेआहेत आणि ते स्वच्छ, चकचकीत आहेत. पादचार्यांसाठी खास अभयरस्ते आहेत. वाहनांसाठी अर्थातच वहातुकीचे वेगळे रस्ते. त्यामुळे रस्त्यातून चालणं आणि वहान चालवणंही आनंददायी आणि निश्चिंत आहे.

एकमजली बैठ्या घरांमुळे सूर्यही प्रसन्न आहे. त्याच्या आनंदप्रकाशी किरणांतून पसरणार्या प्रकाशाची कोणत्याही अडसरावीना आता मुक्त उधळण होऊ शकतेय. त्यामुळे या वातावरणात भरुन राहिलेल्या सौरशक्तीवरच सर्व वाहने चालतायत. त्यामुळे संपूर्ण निसर्गच प्रदूषण, धुराचा वास, आणि सहवास यापासून पूर्णपणे मुक्त आहे. शाळा आहेतच, त्याना प्रशस्त पटांगणेही आहेत. घरांसारख्या शाळाही नैसर्गिक संस्कारकेंद्रे आहेत. मुलं फुलांसारखी सुंदर आहेत. त्याना शाळा घरांइतक्याच प्रिय आहेत. . !

कौटुंबिक पार्श्वभूमीवर श्रमविभागणी आहे. नेमून दिलेली सर्व कामे प्रत्येकालाच आळीपाळीने करावी लागतात. तिथे स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी याऐवजी प्रत्येकाचा एक व्यक्ती म्हणूनच विचार होत असल्याने सर्वानाच सर्वप्रकारच्या कामांचं कौशल्य अंगी बाणवणं शक्य होतं. या जगात वृध्दांचं वार्धक्य तरुणांच्या निगराणीखाली कृतार्थ आहे. . !इथे मरणही आहेच, आणि ते  जगण्याइतकंच सुंदरही आहे. कारण ते भयमुक्त आहे. निसर्गनियमांनुसार योग्यवेळी येणारा हा मृत्यू अट्टाहासाने कांहीही करून जगण्याचा हव्यास नसल्याने कृतार्थही आहे. आणि म्हणूनच पुन्हा सळसळत्या जीवनाचा उपभोग घेण्यासाठी टाकल्या जाणार्या कातीसारखि तो सहजसुंदर आहे.

हे स्वप्नवत वाटेल सगळं, पण हे वास्तवात उतरणं अशक्य नसणारं स्वप्न आहे. मात्र सर्व स्तरांवर फोफावलेल्या हव्यासांची बांडगुऴं हाच यातला एकमेव अडसर आहे. . !त्या बांडगुळाचा नाश करायचा की फक्त जिवंत रहाण्यासाठी घुसमटत जगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधता आलं,  तरच स्वप्न आणि वास्तवातली सीमारेषा पुसली जाईल. . !

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -2 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -2 ☆ सौ. अंजली गोखले ☆

आपल्यालासुद्धा आनंद देणारा.  उत्साह वर्धक असाच तो कार्यक्रम आहे असे मला वाटले.पण आपल्याकडे त्यापेक्षा विरुद्ध परिस्थिती आहे असे मला जाणवले.आत्ता या घडीला साठे च्या पुढचे.  पंच्याहत्तरी पर्यंतच्या लोकांनाहे म्हणणे पटेल.हे लोक तरुण असताना.  तरुणां सारखे वागायला मिळाले का त्यांना?सतत वयाने मोठ्यांचा मान राखायचा.  त्यांचे सांगणे ऐकायचे आणि त्याच प्रमाणे वागायचे.अश्या जबरदस्त पगड्याखाली.  रहावे लागल्या कारणाने.  सतत एक प्रकारचा दबाव त्यांच्यावर होता.त्यामुळे मनमुराद हसणे.  गप्पा मारणे.  सहकाऱ्यांबरोबर फिरणे अशा साध्या साध्या आनंदापासून ही मंडळी वंचित राहिली.घरचे काय म्हणतील?त्यांना आवडणार नाही.  त्यांनी एकदा नको म्हटले ना.  मग नको.अशा दबावाखाली त्यां चं तरुण पण संपलं .

विशेष करून महिलावर्ग या बाबतीत जास्तच दबला गेला .एखादी डिग्री मिळाली की त्यांचे पंख छाटले जायचे .संशोधन सुरू .मग इतरांच्या म्हणण्याला होकार देऊन.  माहेरचा मोकळा.  आनंदी स्वच्छंदी उंबरा ओलांडून.  टिपिकल वर्चस्वाचा दुसरा उंबरा ओलांडून. दुसऱ्या घरी जायचे. तिकडे गेल्यावर आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवायच्या.  स्वभाव बदलायचा.  पदरी पडले पवित्र झाले.  या नात्याने नवीन पण रटाळ आयुष्याला मन मारून सुरुवात करायची.खुर्चीत एखादी चे मत विचारले जायचे.  पण ते म्हणणेविचारात घेतले जाईल असे नाही .मग अशा सगळ्या वातावरणात तरुणपणीच.  मनाचे वृद्धत्व जाणवायला लागायचे.उडणाऱ्या पक्षाला पिंजऱ्यात कोंड्यावर तो लवकर म्हातारा होणारच ना!मग किती का गोड-धोड.  चांगले चांगले खायला घाला.  मानसिक वृद्धत्व आले किती घालवणे अवघड.

कोणालाही त्या त्या वयामध्ये.  जे येते.  जे करायला आवडते.  रुचते.  ते थोड्या प्रमाणात का होईना.  पण करायला मिळाले पाहिजे.सचिन तेंडुलकरच्या हातातून पंधराव्या वर्षी बॅट काढून घेतली असती.  तर त्याचे खेळणे फुलले असते का?त्याने इतके उत्तुंग ध्येय गाठले असते का?लता मंगेशकर ना मधुर गळ्यातून गायची संधी न देता.  दोन वेळेच्या भाकऱ्या बडवायला लावल्या असत्या.  तर आपल्याला अविट गाणी ऐकायला मिळा लीअस ती का?

आवडीचे काम करायला मिळाल्यावर शरीर हे सुदृढ राहते.  मन प्रसन्न राहते.  काम करायला उत्साह येतो आणि आनंदी आनंद उपभोगायला मिळतो.अशी व्यक्ती स्वतःही आनंदी राहते आणि दुसऱ्यालाही आनंद वाटते.असे हे सरळ वागणे .   फार थोड्यांच्या वाट्याला येते .बहुतेकांच्या बाबतीमध्ये सुरवंटाचे फुलपाखरू होण्याऐवजी फुलपाखराचे सुरवंट होते .

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गरज आहे.  ती सुरवंटाचे फुलपाखरू होऊ द्यायची.फुलपाखराचे गुन्हा सुरवंट न होऊ देण्याची.बाल्यावस्थेपासून वृद्ध अवस्थेपर्यंत प्रत्येकाला या संक्रमण आम मधून जावेच लागते.गरज आहे ती सावरण्याची !अशा कठीण प्रसंगी आपले मनोबल ढळू न देण्याची .कुणीतरी येईल आपल्याला मदत करेल.  या आशेवर न राहण्याची. विं.दा. नीसांगितल्याप्रमाणे “माझ्या मना बन दगड”ही अवस्था अनुभवण्याची.प्रसंगी मन कणखर बनवले.  तरच त्या व संतुलित अवस्थेत मधून संतुलन मिळू शकतो.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोरपंखी आठवण ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ मोरपंखी आठवण ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

घराच्या पल्याड, उसाच्या शेतात, बरीच वर्षे मोर वस्ती करून होते. सकाळी ते मधली भिंत ओलांडून, नारळाच्या बागेत आपल्या कुटुंबकबिल्यासह चारा टिपायला येत. तीनचार लांडोर आणि मोर मात्र एकटाच बापडा! लांडोर,  मोराच्या मागे मागे जात. बराच वेळ त्यांचा मुक्तपणे संचार चाले.

साखर झोपेतून जाग येई ती त्यांच्या केकानीच!पुन्हा:निद्राधीन होताहोता उजाडेच. रोज त्यांच्या हालचाली पाहता पाहता, मनात येई, एकदातरी,  पिसारा फुलवून तुझे ते मोरपंखी सौंदर्य मला दाखवशील का? आणि तो क्षण एकदा येऊन ठाकला. शेजारच्या अपर्णाने दूरध्वनीवर सांगितले,  “अग सुधा, लवकर बाहेर ये!” . मोराने पिसारा फुलवला आहे, आणि मग मागीलदारी जाण्याची धांदल उडाली.  मोरपंखी रंगाचा विलोभनीय सोहळा अनिमिष नेत्रांनी पाहता पाहता मनाला रंगसुख देत होता.  तो पिसारा पाहता मनात आलं, उगाच नाही त्या मोरपंखी पिसाने, श्रीकृष्णाच्या मुकुटावर आढळस्थान मिळवलयं. त्या पिसाऱ्याचा मनोहारी रंग मनाला आनंद देतो. मन जेव्हां आनंदाने फुलून येते, तेंव्हा म्हटले जाते,  “बाई,  बाई,  मनमोराचा कसा पिसारा फुलला,  फुलला!”. काही आठवणी हळूवार मनात डोकावतात, आणि मग त्या अंगावर मोरपीस फिरवल्या सारख्या सुखद वाटतात.

लहानपणी,  त्या मोरपंखी रंगाचा ठेवा, पुस्तकाच्या पानात जपून ठेवताना रंगांची ऊब देते. एखादा फकीर आपल्या हातातील मोरपिसांच्या झुपकेदार पंखा धुपाटण्यावर  फिरवून ऐख्याद्याच्या डोक्यावर हळूवार फिरवत दुवा देतो. आशा असंख्य प्रसंगात, हे मोरपीस आपल्या रंगानी आणि विलोभनीय रूपाने दिमाखात मिरवीत असते. अशा ह्या बहुरंगी पक्ष्याची आपल्या देशाचा पक्षी म्हणून निवड झाली.

एकेदिवशी नारळाच्या बागेत येणारा मोर संध्याकाळच्या वेळेस चक्क नारळाच्या शेंड्यावर जाऊन बसला. ते पाहून मन चिंतेत पडले. अरे बापरे!आता याला खाली कसे आणायचे.  मोर खरंतर पाच फुटाच्यावर उडणारा पक्षी नव्हे. प्राणीमित्राना आता बोलवायला हवे. असे म्हणत सकाळ झाली. मागे उगाचचं मोराच्या काळजीने डोकावले तर हा त्या झाडाच्या शेंड्यावरून गायब!

रोज संध्याकाळी मागे नारळाच्या बागेत डोकावून, निरीक्षणाचा छंदच जडला.  एकेदिवशी, या मोराचे झाडावर चढणे, मी चोराला पकडल्यागत, पाहिलेच,  हा पठ्या आधी भिंतीवर मग भिंतीवरून लहान नारळाची झावळी, त्यावरून वरची,  त्यापुढची

असं करत वरचढून शेंड्याला जात असे, आपले शयनकक्षच  नारळाच्या झाडावर करू लागला. त्याच्यामागे लांडोर असत,  पण त्या कधी झाडावर चढत नसत. असे

कित्येक दिवस तो मोर झाडाचा व आमचाही  सोबती झाला.  केका  हा जीवनाचा रोजचा भाग झाल्या. मनाला सुखवणारे मोराचे हे रंगीत सुख नंतर, २००५च्या पुरात

वाहूनच गेले.  ऊसाची शेतं उजाड झाली. मोरांना बसायला,  आपला कुटुंबकबिला जपायला जागाच गेली. मोराने दुसरी सुरक्षित शेत पाहिले असावे. मोराच्या विरहाने मनाचा विरंगुळा हरवला. नारळाची बाग सुनीसुनी झाली. मनात त्या रंगसोहळ्याची

सुखद स्मृती जपत राहिलो.

 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -1 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -1☆ सौ. अंजली गोखले ☆

B.B C. वर नुकताच एक चांगला कार्यक्रम पहायला मिळाला. परदेशातील लोकांनी बनवलेला. विचार, प्रयोग, निरीक्षण, परिक्षण ‘ अनुमान निकाल या सगळ्या टप्यांवर आधारीत प्रयोगशील कार्यक्रम होता. प्रश्न निवडला होता तो जगातील सर्व स्त्री – पुरुषांसाठी चा

सर्वसामान्य पणे संपूर्ण जगामध्ये ६० वर्षे वयावरील सर्वाना सिनियर सिटिझन – अर्थात वृद्ध म्हणून संबोधले जाते. त्यांनी साठ वर्षे किंवा त्याहूनही कमी वयाचे स्त्री पुरुष निवडले होते. त्यांचे खरे वय नोंद केले गेले. त्यानंतर त्यांची उंची वजन ‘ काम करण्याची क्षमता, काय – किती खातात ‘ हे सगळे नोंद केले आणि एका मशिन व्दारे त्यांची स्थूलता ‘ त्यांच्या – मध्ये असलेले कोलेस्टिरॉल ‘ ते करत असलेले काम, व्यायाम या व्दारा त्यांच्या शरीराचे वय काढले. रिझर्टस् अचंबित करणारे होते.

एक ४९ वयाचा निवृत्त पोलीस अधिकारी होता. तो भरपूर जाड होता. नऊ महिन्याच्या गरोदर बाईचे पोट कसे वाढलेले दिसते ‘ तसे त्याचे सर्वसाधारण पोट होते. त्याच्या सगळ्या नोंदी केल्या गेल्या. मशिनव्दारे त्याचे वय काढले गेले. ४९ वयाच्या माणसाच्या शरीराचे वय किती यावे? तब्बल ९० वर्षे! तोही चमकलाच. त्याचा चेहरा इतका पडला की काही विचार नका. पण प्रयोग करणाऱ्या मंडळीनी त्याला दिलासा दिला. त्याला त्याचा व्यायाम खाणे पिणे, फिरणे, काम करण्याची पद्धत सगळे आखून दिले. तो खुर्चिमध्ये तासन्तास बसून कॉम्प्युटरवर काय करत होता. काय करणे तर त्याला सोडून चालणार नव्हते. त्यांनी त्याला उभे राहून कॉम्प्युटर उंच ठेऊन का म करण्याचा सल्ला दिला. त्याने तो मानला त्याचे खाणे किती काय खायचे ते ठरवून दिले. आणिसहा आठवड्यांनी पुनः परत बोलावले. त्यानेही मनापासून ते सगळे पाळले आणि ६ आठवड्यानंतर त्याच्या वजनामध्ये पोटाच्या घेरामध्ये ‘ त्याच्या कार्यक्षमते मध्ये लक्षणीय फरक दिसून आला. त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्याच्या शरीराचे वजन ९० वरून ७२ पर्यंत कमी आले होते. आता त्याला त्यांचे सांगणे जास्तच पटले आणि वय आणखी कमी करण्याचा निर्धार त्याने केला.

एका प्रौद बाईवरही असाच प्रयोग केलेला दाखवला. ती फार जाड नव्हती, का मं करत होती कार्यरत होती. तरी तिच्या नैसर्गिक वयापेक्षा मशिनव्दारे शारीरिक वय जास्त आले. निरीक्षणामध्ये चेहऱ्यावर जास्त सुरकुत्या आल्या होत्या. तिलाही त्यांनी योग्य तो व्यायाम. योग्य खाणे ठरवून दिले. ६ आठवड्यानंतर तिच्याही चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी झालेल्या आढळून आल्या. काम करण्यामध्ये तिचा उत्साह वाढला होता. शारीरिक वय कमी झाल्याची नोंद झाल्यावर तिचा आनंद गगनात मावेना. ती खूप खुष होऊन गेली.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 2 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –2 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

मी अजून लढते आहे

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

माझ्या आई-बाबांना माझ्यावर आलेल्या संकटाची,उद्भवणाऱ्या अडचणींची पूर्ण कल्पना आली होती. माझ्यासमोर त्याबद्दल काहीही बोलले जात नसे. इतर भावं डाप्रमाणेच मलाही वागवले जात होते .

शाळेमध्ये सुद्धा माझ्या वागण्यावर खूपच मर्यादा येत होत्या. कितीतरी उणीवा,अर्थात उणीवा असे मी आता म्हणू शकते, त्यावेळी इतके समजत नव्हते. त्या उणिवा म्हणजे लिहिणं नाही. मैत्रिणींचे चेहरे दिसत नव्हते, समोरच्या बाई दिसत नव्हत्या. ग्राउंड वर पळवणे नाही, लंगडी पळती खेळणे नाही. नवीन वस्तू समजत नव्हती. रंग डिझाईन काहीच दिसत नव्हते. अशा कितीतरी मर्यादा होत्या, तरी बाबांनी माझं डोकं वक्तृत्वा मध्ये घातल्यामुळे शाळेमध्ये भाषण करण्याचा मी सपाटाच लावला होत. कितीतरी स्पर्धांमध्ये भाग घेत होते. बरेचदा बक्षीसही मिळे, पण नाही मिळाले तरी वाईट वाटून घ्यायचे नाही, रडायचे तर नाहीच नाही असे मला बाबांनी बजावून ठेवले होते. थोडक्यात काय माझ्या व्यक्तीमत्वा मधली रिकामी जागा वक्तृत्वाने भरून काढली. अजूनही मला नवीन नवीन ऐकण्याचा,ऐकलेले लक्षात ठेवण्याचा आणि लोकांसमोर मांडण्याचा अतिशय उत्साह आहे च.

साधारण मी तिसरी-चौथीत असताना माझ्या बाबांना प्रोजेक्टर आणि स्लाईड्स बक्षीस मिळाल्या होत्या. त्यावेळी मला पुसट पुसट दिसत होते. म्हणजे पडद्यावरची आकृती थोडे थोडे रंग जे माझ्या मनावर चांगले बिंबवले गेले. त्या स्‍लाईड्समध्‍ये भारतातील निरनिराळ्या नृत्य प्रकार यांची माहिती होती. त्यातील नृत्यांगना, त्यांचे छान छान ड्रेस, मस्त मस्त दागिने, आलता लावलेले लाल हात हे सगळे माझ्या डोळ्यासमोर आणि मनासमोर चांगलेच उमटले होते. ते नाच बघू न मी घरी गाण्यांवर आपली आपणच नाच करत होते .माझा मी आनंद मिळवत होते. साधारण सहावी मध्ये मला मिरजेतील विद्या गद्रे यांची मुलगी प्रतिमाही भेटली. ती मला गाण्यावर नाच शिकवू लागली. म्हणजे आता माझा अभ्यास, वक्तृत्व आणि नृत्य जोमात सुरू झाले. प्रतिमाने माझ्याकडून कटपुतली चा नाच बसवून घेतला होता. तो मला शाळेच्या स्टेजवर करायला मिळाला. सगळ्यांना खूप आवडला .भरपूर टाळ्या मिळाल्या. पण त्यावेळी मी माझ्या बाबांवर खूप रुसले होते, थोडीशी रागावले होते म्हणा ना! कारण नाचाच्या अधिक त्यांनी माझी ओळख अंध शिल्पा अशी करून दिली होती. जे मला अजिबात आवडले नव्हते. मी बाबांशी दोन दिवस अबोला धरला होता. त्यांना ते नंतर समजले .
विशेष म्हणजे मला कशाची पण भीती वाटत नव्हती. घरी बहिणी जसे करतात तसे करायचे असे मी थांब ठरवून ठेवले होते. एखादी गोष्ट आपल्याला करता येत नाही म्हणजे काय?आलेच पाहिजे असाच माझा हट्ट असे. एकदा मी देवासमोर दिवा म्हणजे समयी लावली होती, सगळं हाताने चाचपून. घरी काकांनी ते पाहिलं होतं. घरी मॅगी करून बघण्याची मला हौस. एकदा आई स्वयंपाक घरात नसताना मी एका भांड्यात पाणी घेऊन गॅसवर उकळायला ठेवलं, मॅगीचा पुडाही काढला. तेवढ्यात आई आली आणि मला धपाटा खावा लागला.

माझ्या सगळ्या वस्तू,पुस्तके,कंपास जिथल्या तिथे जागेवर असायच्या.माझ्या भावाला किंवा बहिणीला ते माहिती होतं,त्यांचं सापडेना झालं की गुपचुप माझा कंपास ते घेऊन जायच,माझ्या लक्षात आल्यावर मात्र मी रागवायची.अर्थात हे सगळं लुटूपुटूच्या असायचं.

सांगलीच्या गांधी वाचनालयातील वक्तृत्व स्पर्धा मला अजून आठवतात . पाचवी ते दहावी दरवर्षी मी भाग घेत होते. जवळजवळ पन्नास ते सत्तर मुलं-मुली सायची. दहावीपर्यंत मला नंबर मिळाला नाही. मात्र दहावीला माझं भाषण इतकं सुंदर झालं की त्यांना मला पहिला नंबर द्यावाच लागला.

शाळेपासूनच मला रायटर घेऊन परीक्षा देण्याची सवय लागली होती. दहावी मध्ये वनिता वडेर माझी मैत्रीण होती. अभ्यासामध्ये तिनं मला खूपच मदत केली .सगळं वाचून दाखवाय ची .मी ते लक्षात ठेवायची .दहावीत मला 80 टक्के मार्क्स मिळाले .वनिताला गणितात तेवढे माझ्यापेक्षा सात मार्क्स जास्त होते.

अकरावीमध्ये मी कन्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतली. अर्थातच माझ्यासाठी आर्ट्स साईडच बरोबर होती. इथेही मी खूप स्पर्धेमध्ये भाग घेतला .तिथल्या सगळ्या प्राध्यापकांची मी लाडकी होते .सगळ्या मैत्रिणी मला खूप खूप मदत करायच्या .कॉलेजला जाताना एकदा पाऊस सुरू झाला .तर एका मुसलमान मैत्रिणीं ने तिची ओढणी काढू न दिली.

तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की आपण गोड बोललो,की समाजातील सगळ्याच आपल्याला मदत करतात .मलाही आईच्या कामामध्ये मदत करायची खूप इच्छा असायची. भाजी निवडणे, शेंगा सोलणे अशी मदत मी करत होते. माझे असे सहज वागणे बघून शेजार पाजाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला. मला काम करताना बघून त्यांनाही आश्चर्य वाटे. आपण स्वतः मध्ये मॅग्नेटिक पॉवर निर्माण केली पाहिजे हे मी ठरवलं होतं.

कॉलेजमध्ये मी जे ऐकत होते,ते मनामध्ये टिपून ठेवत  होते. सगळे पीरियड्स अटेंड करत होते. त्यामुळे प्राध्यापकही माझ्यावर लक्ष ठेवून होते. माझे एकूण छान चालले होते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमचे दादा ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ आमचे दादा ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

आमचे दादा असं मी वर म्हंटलं खरं, पण ते आता आमचे राहिले नाहीत. ते आता देवाचे झालेत.

२६ ऑक्टोबरला त्यांना जाऊन वर्ष झालं. त्या निमित्ताने त्याचं स्मरणरंजन असंही मी म्हणणार नाही, कारण त्यांची आठवण तर आम्हाला रोज येते. दादा म्हणजे माझे मोठे दीर. गंगाधर नारायण केळकर. माधवनागर कॉटन मिल्सचे मॅनेजर म्हणून ४० वर्षे त्यांनी काम पाहिले. शिस्त आणि सहानुभूती या दुहेरी विणीवर आधारलेलं त्यांचं व्यवस्थापन अतिशय यशस्वी झालेलं होतं. कामगार, ऑफीसमधील कर्मचारी वर्ग आणि मालक मंडळी यांच्यातील ते दुवा होते. हा दुवा अतिशय नाजूक होता. या पदावरून काम करताना, कुठलाही निर्णय घेताना, कुणावरही अन्याय होत नाही ना, हे बघणे अतिशय महत्वाचे असते. ते कौशल्य त्यांना चांगल्या रीतीने साध्य झाले होते.

माझं लग्न होऊन मी केळकरांच्या घरात आले. सगळे जण दादा म्हणत, म्हणून मीही भाऊजींना दादा आणि मोठ्या जाऊबाईंना वाहिनी म्हणू लागले. पण पुढे दादा हे केवळ म्हणण्यापुरते राहिले नाहीत. ‘दादा’पणाचं नातंचं मनात, वर्तनात घट्ट रूजलं. मला मोठा भाऊ नाही. मोठ्या भावाचं प्रेम, माया, काळजी, मार्गदर्शन सगळं सगळं मला त्यांच्याकडून मिळालं. त्यांना चार बहिणी. एक मोठी. तीन धाकट्या. त्यानंतर मी त्यांची पाचवी धाकटी बहीण झाले. लग्नानंतर एकही दिवाळी अशी गेली नाही, की त्या दिवाळीत मला भाऊबीज मिळाली नाही.

माझं लग्न झालं, तेव्हा जवळची- लांबची अशी तीस –पस्तीस जणं महिनाभर तरी घरात होती. त्यावेळी तिथे असलेल्या माझ्या चुलत मावस सासुबाई, इंदिरा जोशी आणि चुलत आत्ये सासुबाई, ताई सोमण मला म्हणाल्या होत्या, ‘तुझ्या घरात दोन देवमाणसं आहेत बघ. एक तुझ्या सासूबाई आणि दुसरे तुझे दीर दादा. त्या तेव्हा जे म्हणाल्या, ते पुढच्या काळात मी अनुभवलं. ‘जिथे कमी तिथे मी’ हा सासुबाईंचा बाणा. तिथे हजार असणं, हे शरीराने, मनाने, अर्थाने असे सर्वार्थाने असे. गरजावंताला आर्थिक मदत करण्यासाठी दादांचा हात सदाचाच वर उचललेला असे. विंदा करंदीकरांनी कुणापासून काय घावे, हे सांगताना म्हंटले, ‘ एक दिवस घेता घेता देणार्‍याचे हात घ्यावे.’ दादांच्या बाबतीत मला नेहमीच वाटत आलय, की त्यांचे हात, म्हणजे त्यांचं दातृत्व घ्यायला हवं. कदाचित सरत्या शालेय वर्षात त्यांनी जी विपन्नावस्था अनुभवली, त्याचाही परिणाम असेल की अनेक परिचित, अपरिचित मुलांना शिक्षणासाठी त्यांनी आपल्या कुवतीनुसार आर्थिक मदत केली.

दादा दहावीत असताना एक मोठेच संकट कुटुंबावर कोसळले. त्यांचे वडील नाना स्वर्गवासी झाले. लहान वयात त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली.

११वीचं वर्ष कसबस पार पडलं. त्यांनी शिक्षण सोडून नोकरी करण्याचा निर्णय घेतला.  १९४४ साली माधवनागर कॉटन मिल्समध्ये क्लार्क म्हणून ते नोकरीला लागले. आपली हुशारी, बुद्धिमत्ता प्रामाणिकपणा, सचोटी, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणे, या गुणांच्या बळावर अकाउंटंट आणि नंतर मॅनेजर या पदापर्यंत दादा पोचले. ते पदवीधर नव्हते पण जिद्द आणि कष्टाच्या बळावर त्यांना मॅनेजरची मानाची खुर्ची मिळाली. मॅनेजर म्हणून ४० वर्षे त्यांनी मिलचे व्यवस्थापन बघितले. १९९४ साली ते सन्मानाने आणि समाधानाने निवृत्त झाले.

मिलचे, तिथल्या लोकांचे अनेक प्रश्न. अनेल समस्या. दादांना अनेक ताण-तणाव असणारच. पण ते, ते सगळं तिथेच ठेवून घरी येत. मनात असतीलही कदाचित. पण त्या विषयी ते घरी काही बोलत नसत. त्याचा त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवनावर कधी परिणाम होऊ दिला नाही. दादा निवृत्त होण्यापूर्वी त्याच्या मुलांची, मुलींची लग्ने-कार्ये होऊन ती आपआपल्या संसाराला लागली होती. त्यांच्या प्रापंचिक जाबाबदार्‍या संपल्या होत्या. २००० साली आमच्या वाहिनीही गेल्या.  दादांना काहीसे एकटेपण जाणवले असणारच. पण त्यांनी कधी त्याचा बाऊ केला नाही..

मी नेहमी म्हणायची, आमची ‘गायत्री’ म्हणजे वृद्धाश्रम आहे. इथे सगळे ७५च्या वरचे तरुण राहतात. माझी वाहिनी सौ. अंजली गोखले यावर म्हणाली, तो ‘आनंदाश्रम’ आहे. तो ‘आनंदाश्रम’ होऊ शकला, याचे सर्व श्रेय दादांचे.

दादांचं जीवन सफल, संपूर्ण झालं. यशस्वी जीवन ते जगले. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसारणी हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते आणि पारमार्थिक वृत्ती हा त्यांच्या जीवनाचा गाभा होता. आम्हाला, मुलं- मुली- नातवंडांना त्यांनी संस्काराची शिदोरी दिली. त्याबाबत आम्ही किती भाग्यवान, पण दादा आम्हाला तुमच्याबद्दल किती कृतज्ञता वाटते, त्याच्याही पलिकडे काय काय वाटतं, हे तुम्हाला

कसं कळेल?

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सहभोजन….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ सहभोजन….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

सहभोजने: वनातली, शेतातली आणि मनातली!!

कुणीतरी म्हटलेय ना!  निसर्गाच्या सानिध्यात एकत्र जेवा. मग पहा!  मनातली सगळी किल्मिष निघून जातील आणि स्वच्छ मनात नव्या नात्यांचे आणि नव्या मैत्रीचे गोफ विणले जातील. याचे कारण म्हणजे या जेवणानंतर होणारे उपस्थितांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम,  आणि त्यामधून व्यक्त होणारी त्यांची अंतरे!!!

कोजागिरी पौर्णिमा, शाळेतले हदगा विसर्जन, केळवणे,  डोहाळजेवणे, ट्रेकिंगच्या वेळचे कॅम्प फायर… कितीतरी… माझ्या नशिबाने मी अशी सहभोजने खूप आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवलेली आहेत.

त्या सहभोजनांच्या वेळी खाण्याच्या पदार्थांची चव तर खुलतेच पण त्यासाठी आलेली माणसेही खुलतात आणि मनापासून उलगडतात. तेव्हा आपल्याला अजिबात अज्ञात असलेले त्यांच्यातले कला गुणही कळतात.

अशाच एका प्रसंगाच्या वेळी..एरवी सतत सर्वांवर करवादत असलेल्या माझ्या एका आत्याला केशवसुतांच्या कितीतरी कविता आणि गडकरींच्या नाटकातले उतारे पाठ आहेत हे कळल्यावर तिच्याकडे पहायचा दृष्टिकोनच बदलला.

अनेकदा आम्ही त्यावेळी ‘जस्ट ए मिनिट’  हा खेळ खेळत असू. यामध्ये आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने आपल्याला एखादा विषय द्यायचा आणि त्या विषयावर आपण मिनिटभर विचार करून बोलायचे.  यावेळी लोकांची खरी ओळख व्हायची.  त्यांच्याबद्दलचा आदरही दूणावायचा.

माझ्या त्या सहभोजनविशिष्ट आठवणींच्या पोतडीतल्या काही खास आठवणी आज मी इथे पेश करते आहे.

नवरात्र दिवाळी संपली की आमचे हिंगणघाटचे आजोबा,  ‘अंगणातल्या स्वैपाकाचा म्हणजे पानगे वरणाचा बेत जाहीर करत.  सर्वांनाच मोठा उल्हास येई. खरे तर पानगे वरण हा स्वैपाक घरातली पुरुष मंडळी करत.  पण त्याची तयारी मात्र अर्थातच बायकांना करावी लागे.

अंगणात काट्या कुटक्या गोळा होत. तुराट्या आणल्या जात.  पळसाची आणि वडाची पाने जमवली जात. आजी मिरच्याचा ठेचा,  जवस आणि तीळाच्या चटण्या करून ठेवी. गव्हाची जाडसर कणिक दळून आणे.

बहुधा सुट्टीच्या दिवसात हा बेत जमवत असल्यामुळे शेजारी पाजारी आणि जवळपासची नातेवाईक मंडळी या सर्वांना त्याचे निमंत्रण जाई.

भल्या सकाळी अंगणातली चूल सारवून घेत आणि त्यावर तूरीच्या वरणाचे मोठ्ठे पातेले चढे.  पुरूष मंडळी धोतर खोचून भरपूर तूप घालून मोठ्या परातीत कणिक भिजवत.  त्याचे गोळे पळसाच्या पानात बांधत आणि ते निखा-यांवर भाजायला ठेवत. पान जळले की आतले पानगे शिजत. जळलेल्या पानासकट पानगे वाढले जात.  ती पाने काढणे कौशल्याचे असे. मग ते गरम गरम पानगे मधोमध फोडायचे आणि मग त्यात ते वाढणारे तूप ओतायचे. हे पानगे द्रोणात वाढलेल्या तूरीच्या गोड वरणात  भरपूर तूप घालून  खाल्ले जात.

दुसर्‍या बाजूच्या निखा-यावर विशेषतः तरूण मंडळी भरपूर तेल घालून कणिक भिजवत आणि तर्री मसाला घालून तिखटजाळ फोडणीचे वरण करत.

हे सगळं होत असताना बायका पत्रावळ्या आणि द्रोण लावत आणि अखंड बडबड करत. मुले इकडून तिकडे पळापळी करत.

यावेळी पहिली पंगत बायका आणि मुलांची बसे… आग्रह करकरून पुरुष मंडळी वाढत. जेवण झाल्यावर विविध गुणदर्शन…  स्त्रिया आणि पुरूष अशा गाण्याच्या, कधी स्वरचित गाण्याच्या भेंड्या होत.   एकमेकांना कोपरखळ्या मारत.  बरोबर नेम बसायचा.

कधी कधी घरात केलेले जेवणाचे पदार्थ आणि लोणचं घेऊन एखाद्या बागेत जायची पध्दत होती.  शेजारच्या चार पाच घरांमध्ये बेत ठरायचा आणि रोजचे नेहमीचेच जेवण खूप रूचकर बनायचे.

सगळ्यात मजा यायची ती आवळीभोजनाला, हे बहुधा आळीतल्या किंवा भिशीतल्या बायका ठरवत.  प्रत्येक जण जेवणातले वेगवेगळे पदार्थ घेऊन येण्याची जबाबदारी वाटून घेई . सांज्याच्या पोळ्या, साध्या पोळ्या,  पु-या, बटाट्याची भाजी, घट्ट पिठले, दहीभात, चटण्या आणि लोणची,  आवळ्याचे लोणचे असावेच लागे.   असे पदार्थ असत.  शिवाय पेरू आणि बोरेपण आणत.

यावेळीही गाण्याच्या भेंड्या, उखाणे, बैठे खेळ रंगायचे. चारच्या सुमाराला सगळ्या बायका मिळून कच्चा चिवडा करत. एरवी घरात अगदी हळू आवाजात बोलणा-या  आणि पदर तोंडावर ठेवून हसणा-या बायका तिथे मोठमोठ्यांदा बोलत आणि हसत.

त्यामुळेच की काय कोण जाणे दिवस उतरायला आला की  घरी परतताना पावले जड होत.

माझ्या वर्धेच्या काकांनाही  पाहुणे आले की गावाबाहेर पेरूच्या मळ्यात, झाडाखाली जेवायला जायला अतिशय आवडे.  काकू पालक परोठे,  लोणचे, शेंगदाण्याची चटणी करून बरोबर घेत.  बाहेरच्या मोकळ्या हवेत चार घास जास्त जात.  आपसातली भांडणे विरून जात.

या सगळ्यांवरची कडी म्हणजे… हुर्डा पार्टी,  आजीच्या माहेरी वैद्यांची हुर्डापार्टी आणि तळेगावकर देशपांड्यांची हुर्डा पार्टी दोन्हीही खासच असत.  पण देशपांड्यांकडे हुर्डा पार्टीच्या वेळी काका मोठ्या आकाराचे गोड साखरेचे पेढेही कधीतरी आणत.  कोवळी ज्वारीची कणसे निखा-यावर भाजून त्यातले कोवळे दाणे पत्रावळीवर देत.

त्याबरोबर निखा-यावर वांगे,  टोमॅटो, कांदे आणि मिरच्या भाजून केलेले भरीत असे.  प्रत्येकाला द्रोण भरभरून दही साखर आग्रह करकरून खायला घालत. शेतातले कच्चे मूळे,  गाजर कांदे,  टोमॅटो, पेरू चिरून देत. कोवळ्या तूरीच्या शेंगा आणि बोरे खाऊन पोट गच्च भरायचे.  मनसोक्त शेतात हुंदडून झाले की घरी परतताना प्रत्येकाला भाजलेला हुरडा आणि शेतातली भाजी द्यायची पध्दत वैद्यांकडे होती. यावेळीही हास्यविनोदाचे फवारे उडत.

कधीतरी घरात कोणत्यातरी निमित्ताने पाहुणे जमले की एखाद्या शेतात,  देवळाजवळ स्वैपाक करायची टूम निघे.  अशावेळी घरातून फक्त पोळ्या करून घेत.  तिथे चूल मांडून  एका मोठ्या हांड्यात पाणी उकळत . त्या पाण्यात डाळ,  टोमॅटो, मिरच्या, वांगे,  मूळे,  भोपळ्याच्या फोडी,  बोरे भुईमुगाच्या शेंगा अशा असतील त्या भाज्या घालत. उपलब्ध असतील ते मसाले घालत आणि अक्षरशः  भाज्या आणि डाळीचे असे काही चवदार मिश्रण तयार होई की त्याची सर घरात बनवलेल्या कोणत्याही भाजीला येत नसे.  कधी कधी मात्र तिखट चमचमीत वांग्याची भाजी किंवा विदर्भ स्पेशल मसाले भरून अख्ख्या भोपळ्याचे गाकर बने…

कोल्हापूरला राजारामपुरीत मुडशिंगीकरांच्या वाड्यात रहात असताना त्यांच्या गच्चीवर आपापली ताटे घेऊनही कितीदा एकत्र जेवत असू किंवा मुडशिंगीच्या त्यांच्या शेतात किंवा त्यांच्या गु-हाळावर सगळे बि-हाडकरू एकत्र जेवायला जात असू. अशा वेळी जून्या आठवणी निघत. अनुभवांचे खजिने रिते होत. कितीतरी माहितीची देवाणघेवाण होई.

या सहभोजनांच्या आणि विशेषतः त्यानंतरच्या गप्पांच्या स्मृती माझ्या रसनेने आणि अर्थातच मनातही जपलेल्या आहेत.

त्या अधून मधून बाहेर पडतात.  मग मी या लाॅकडाऊनच्या काळात… आमच्या कोल्हापूरच्या घरातही दुपारच्या चहाच्या वेळी कच्चा चिवडा नाहीतर दडपे पोहे करते आणि कर्दळीच्या पानात घेऊन …आंब्याच्या झाडाखाली बसून एकटीच खाते. त्यावेळी संगतीला सोबत माणसे नसली तरी असतात त्या आठवणी आणि पाखरांची गाणी!

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print