मराठी साहित्य – क्षण सृजनाचे  ☆ शकुनी,एक धगधगता सुडाग्नी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? क्षण सृजनाचे ?

शकुनी, एक धगधगता सूडाग्नी ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

 

काळ्या कभिन्न सावल्यात तारूण्याचा मळा

अन् तुटलेल्या काळजात अजरामर कळा

देहच काय, सगळंच होऊन पडलं गलितगात्र

अन् जरा बनलं एक विदुषकाचं पात्र

काय चुकलं माझं? नसानसात घृणा पेटलेली

जळणाऱ्या डोळ्यांनी, युगायुगाची आग ओकलेली

निधड्या छातीनं भर सभेत लाज ओरबाडली

षंढांच्या बाजारात गोळा केली आसवं गाळलेली

माझा विडा कुणी उचलावा? सावलीत खुडलेलं कर्तृत्व

निवडुंगाच्या उलट्या काट्यांनी पोखरलेलं स्वत्व

गंजलेली शस्त्रं अन् झाकोळलेलं आयुष्य, भितीनं!

कुणाच्या बाहुच्या, कुणाच्या बाणाच्या तर कुणाच्या  नितीनं!

बापानं आपलाच भेजा भरवला बाळवाटीनं!

भूत अन् भविष्य ढकलत राहिला जळत्या काडीनं

 कुरवाळायचं कुठल्या आगीला अन् ठेचायचं कुठल्या आगीला

हे ठरवणार कोण? यांच्या कुलस्त्रिया अन् लंपट बासरीवाला!

मी कधीच हरलो नाही अन् हरणार ही नाही

मी कधीच चुकलो नाही अन् चुकलेल्यांना माफही करणार नाही

माझ्या या अवस्थेस कारणीभूत, ही मूर्ख कौरव प्रजा

हा सूड घेण्यात झालो यशस्वी, नष्ट झाला अंध राजा

अजूनही कित्येक सूड आहेत शिल्लक धगधगते

सत् शील, सत् कर्म, सत् वचन यांच्या बुरख्यात होते

युगानुयुगे मी जन्म घेत राहीन, हा सुडाग्नी पेटता राहील

खरे सत्य युग येईल, तेंव्हाच हा आत्मा शांत होईल!

 

कवितेचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी शकूनीची कथा, त्याच्याच शब्दात! –

काळ कोठडीतला तो एक एक दिवस अजून पोखरतोय. आई, वडील – सुबल ( गांधार देशाचा राजा),सगळी भावंडं यांना भुकेनं तडफडून मरताना पाहिलंय मी! काय गुन्हा होता आमचा? केवळ गांधारीच्या पत्रिकेतील दोष घालवण्यासाठी केलेला तो एक उपाय होता. तो ही राजा ध्रुतराष्ट्राच्या दीर्घायुष्यासाठी!आणि उगाच विधवेशी लग्न लावून दिलं, असा कांगावा केला. त्यात आमचा काही स्वार्थ होता का? अशी ती कोणती कौतुकास्पद, अभिमानास्पद गोष्ट होती की ती सर्वांना आवर्जून सांगावी. असेलही ती आमची चूक, तुम्हाला न सांगण्याची! पण ती तुमच्या चुकीपेक्षा तर मोठी नव्हती.चूक कसली, फसवणूक होती ती आमची, सत्तेच्या बळावर, स्वार्थासाठी केलेली!

भीष्म पितामह गांधारीचा हात मागण्यासाठी आले होते. त्यांना माहीत होतं, आम्हाला नाही म्हणता येणार नाही, इतकं त्या सोयरिकेला राजकीय महत्त्व होतं. आणि होय म्हणणं पण अवघड होतं. शंकर आराध्य असणाऱ्या त्याचा आशीर्वाद असणाऱ्या एका  सुंदर राजकुमारी ने एका अंध राजाशी लग्न का करावं? शेवटपर्यंत राजा गांधारीला विचारत होता, नाही म्हणू या का ? वडिलांची द्विधा मनस्थिती लक्षात घेऊन गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली व प्रतिज्ञा केली की ही पट्टी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अशीच राहील. आणि म्हणाली आता तुमच्या मुलीला योग्य वर मिळाला आहे नं! लग्न झालं, नंतर आम्हा सर्वांना काळ कोठडीत टाकून गांधार राज्य काबीज केलं.

एक बरं केलं, आम्हाला पोटभर अन्न दिलं नाही. त्यामुळे सगळे लवकर गेले, यातनातून मुक्त झाले. पण त्यांनी मला जगवलं. नुसतं जगवलं नाही तर माझ्या मनात सुडाग्नी धगधगत ठेवला. मी षडयंत्र रचण्यात पटाईत होतो. वडिलांनी मला द्युत खेळण्यास शिकविले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मनावर दगड ठेवून मी त्यांच्या हाडांचे फासे केले, जे माझ्या आज्ञेत राहणार होते. किती क्रोध, किती मत्सर, किती जळफळाट माझ्या मनात कोंडला असेल याची कोणी कल्पनाच करू शकणार नाही. माझं नशीब बलवत्तर म्हणून मी एकटा उरल्यावर माझी सुटका केली व चक्क राजमहालात प्रवेश दिला. खोटा अहंकार, फाजील आत्मविश्वास, सत्तेचा माज यामुळे त्यांना वाटलं असेल की हा आपलं काय वाकडं करू शकणार! ही गुर्मी माझ्या पथ्यावर पडली आणि मी या संधीचं सोनं करायचं ठरवलं. मी शांत राहून प्रेमाचं नाटक केलं, सगळ्यांचा विश्वास संपादन केला. नको इतकं त्यांना पांडवांच्या विरूध्द भडकवित राहिलो. द्यूत हा माझा हुकुमाचा एक्का वापरला. पांडवांची मानहानी करून कौरवांच्या मनात आणि महालात स्थान पक्कं केलं.

युधिष्ठिर सद्गुणी, सत्यप्रिय  इत्यादी गुणांचा पुतळा असल्यामुळे  त्याच्यावर कुरघोड्या करणं सोपं होतं.इतर पांडव कसेही असले तरी मोठ्या भावाच्या आज्ञेत होते.

कुंती माता तिच्या तीनही मुलांना घेऊन वनातून हस्तिनापूरला आली, त्यांना युध्दाचं शिक्षण देण्यासाठी!तिकडे माद्रीला अश्विनी कुमार यांच्या पासून दोन मुलगे झाले.ते दोघेही वैद्यक शास्त्रात निपुण झाले. जसं मोठ्या झाडाच्या छायेत लहान झाडं खुरटतात, तसं थोडं त्यांचं झालं. सहदेवला त्रिकाल ज्ञानी होण्यासाठी पंडू राजाने अंत्य समयी आपल्या मेंदूचा काही भाग खाण्यास सांगितले. त्याला भविष्याचे ज्ञान झाले, त्यामुळेच द्युत खेळण्यासाठी सगळे निघाले तेंव्हा त्यांना अडविण्याचा आटोकाट प्रयत्न सहदेव ने केला, निदान द्रौपदीला नेऊ नका म्हणाला, त्याच्या म्हणण्याला महत्त्व कोण देणार? विधिलिखित कुणालाच पुसता येत नाही, ते सहदेवला कसं येणार! दैव माझ्या बाजूने होते कारण माझीही बाजू सत्याचीच होती.

कौरवांनी पांडवांना मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला. पण मी निर्धास्त होतो कारण मला माहित होतं की द्रौपदीला वस्त्र पुरविणारा कृष्ण काहीही करू शकतो. पांडव मेले असते तर कौरव मदोन्मत्त झाले असते, मग माझ्या सुडाचं काय? अखेरीस सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडत गेल्या आणि कौरव – पांडव यांच्यात निर्णायक महाभारत सुरू झालं. अर्थात माझ्याबाबतीत सुध्दा विश्वासघात झालाच.दोघांच्या जवळचे बाण संपल्यावर रथावरून उतरून सहदेव बोलणी करण्यासाठी आला म्हणून मी ही रथावरून उतरून आलो तेंव्हा त्याने मला बेसावध पाहून तलवारीने घाव घातला. मृत्यूचं दुःख नव्हतंच. कारण तो युध्दाचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे एकन् एक कौरव मारला गेला हे माझ्या डोळ्यांनी पाहून मी तृप्त झालो होतो. माझा जगण्याचा उद्देश्य सफल झाला होता. या युद्धात पांडव, यादव सगळेच भरडले गेले. त्यामुळे माझ्या आनंदात भर पडली होती. पांडव, कृष्ण यापैकी कोणाबद्दल ही मनात ओला कोपरा नव्हताच. कारण शक्य असूनही यांच्यापैकी कोणीही आम्हाला सोडवण्यास  आले नव्हते.  तो भीष्म आणि त्याचा हा सगळा पसारा उध्वस्त झालेला पहायचा होता. भले युद्धानंतर कुणी काय गमावलं, कुणी काय कमावलं यावर चर्चा होत राहतील, पण निष्कर्ष एवढाच असेल की फक्त मी हे युद्ध पूर्णपणे जिंकलो! फक्त मी जिंकलो!!!

गुगल वरील महाभारताच्या ‘न ऐकलेल्या गोष्टी ‘  यांच्यावर आधारित

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – ताई… – ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?️?  चित्रकाव्य  ?️?

? “ताई”? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

तव मायेचे छत्र मजवरी छत्रीविना तू कशी

आज अचानक  येता पाऊस  उगाच का भिजशी ….. 

लहान जरी मी तुझ्याहून  तरी घेईन मी काळजी

नको भिजू तू पावसात  या तू तर ताई माझी ….. 

हे ही सरतील दिवस..  आपुले येतील बघ नक्की

जरी धाकटा, होईन मोठा खूणगाठ  ही पक्की……. 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 213 ☆ मकर संक्रांत ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 213 ?

मकर संक्रांत ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सण आवडता संक्रांतीचा,

अनेक पदर असलेला !

आठवतो…

लहानपणीचा,

काळ्या गर्भ रेशमी ताग्याचा,

वडिलांनी मला आणलेला,

खऱ्या जरीचा– परकर पोलक्यासाठी !

 

आणि आईची चंद्रकळाही !

तीळगुळ वडी, आईचं हळदीकुंकू,

अत्तरदाणी गुलाबदाणी !

 

तिचं काचेच्या बांगड्याचं वेड !

आडव्या खोक्यातले चुडे!

अंगणातील सडा रांगोळी!

आजीचा आशीर्वाद,

“जन्म सावित्री व्हा, सोन्याचे चुडे ल्या!”

 

सुगडं, ओंब्या, ओवसा !

“सीतेचा ओवसा जन्मोजन्मीचा

ओवसा”म्हणत,

सासूबाईंनी दिलेला वसा !

डोईवरचा पदर,

हातभार चुडे..उंबरठ्यात पाय अडे!

 

पण मी “नारी समता मंच” मधे

जायला लागले,

आणि सोडून दिली,

नावापुढे सौ.ची उपाधी लावणं,

हळदीकुंकवाला केला राम राम!

आणि

समजला संक्रांतीचा खरा अर्थ,

नात्यात गोडी असेल तरच

जगणं सार्थ…नाहीतर सारंच व्यर्थ,

संक्रांत आता माझ्या लेखी,

फक्त तिळगुळाच्या देवाणघेवाणीचा !

   समृद्ध जीवनानुभवाचा,

  सण– कर्मकांडाच्या पलिकडचा!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मकर संक्रांत… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ. मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

मकर संक्रांत… ☆ 🖋 सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆

उत्तम पोषण

गोडवा गुळाचा

क्रांती संक्रमण

आधार जगाचा

मऊ मुलायम

तिळाची स्निग्धता

अक्षय हृदयात

निस्वार्थ जपता

स्नेह वृद्धिंगत

होईल सर्वांचा

मकर संक्रांत

सण शुभेच्छांचा

निरोगी मनात

उच्च सुविचार

गोड उच्चारण

विनम्र आचार

आनंद देईल

प्रेमळ  वर्तन

सत्यात येणार

आजचे कवन.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तिळगूळ…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “तिळगूळ…” ☆ श्री सुनील देशपांडे

[१]

तिळा मधे गूळ, संक्रांतीचं खूळ

तिळावरचा हलवा, दागिन्यांचं खूळ

पोळीतही आई, घालायची गूळ

गोड गोड बोला, म्हणायचं खूळ

वाटलं का आज, होतं तेही खूळ

शैशवातलं हेच, आनंदाचं मूळ

[२]

तिळात ना स्नेह. गुळात ना गोडी

संक्रांतीची खोडी,    काढू नये.

भाकरी न लोणी, गुळपोळीची न चव

संक्रांतीला जेव,   म्हणू नये

लाडूही ना वडी,  ना हलव्याचा घोळ

त्याचे गोड बोल,  मानू नये

विकतचे सारे,  विकतची गोडी

कसे प्रेम जोडी, सुन्या म्हणे.

[३]

शब्दांचीच गोडी,  शब्द प्रेम जोडी

शब्द तोडी जोडी,  मित्र भाव

गुळाचीच गोडी,  तीळ स्नेह जोडी

तिळगुळ जोडी, मित्र भाव

मित्र भाव मनी, शिवी देई कोणी

तरी जागे मनी, प्रेम भाव

प्रेमाची महती,  तिळगूळ चित्ती

शब्द जागवीती, प्रेम भाव

कडू गोड शब्द, मित्र भावे बद्ध

जोडी सारे शब्द, प्रेम भाव

मनामध्ये सदा, गोडभाव हवा

तेंव्हाच शब्दांना, गोडी खरी

मुखामधे येई,  शब्द कोणताही

मैत्री स्नेह देई, सुन्या म्हणे.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #220 ☆ तन काटेरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 220 ?

तन काटेरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

तन काटेरी आत गोडवा

जीवन अपुले असेच घडवा

नको दुरावा नकोच भांडण

नकोच प्रेमाचे या शोषण

तीळगुळासम हृदये जुळवा

तन काटेरी आत गोडवा

हलवा करतो अमृत सिंचन

मुखात असुद्या असेच वर्तन

क्रोध अंतरी किल्मिष दडवा

तन काटेरी आत गोडवा

रंग बिरंगी पंतग आपण

आकाशाचे करुया मापन

अभेद उंची अशी वाढवा

तन काटेरी आत गोडवा

दोर तुटला तरीही झुलतो

वाऱ्यासोबत मस्ती करतो

बालचमुंनी झेलुन घ्यावा

तन काटेरी आत गोडवा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अनुमान… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ अनुमान… ☆ श्रीशैल चौगुले ☆

अनुमान लावून कधी, जगणे होत नाही

 वचनांची देऊन हमी, भेटणे होत नाही.

आयुष्याची उघडी पाने, मोजणे होत नाही

भावनांनी वेढली मने, वेचणे होत नाही.

हृदयाची केवळ भाषा, बोलणे होत नाही

विस्कटले हवेत क्षण, जोडणे होत नाही.

विरहाचे बंधन दुःख, आकार होत नाही

नजरेत स्वप्नांचे चित्र, साकार होत नाही.

कवणांची साधता साथ, आकांत होत नाही

शब्दांनीच बांधता गाठ, एकांत होत नाही.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तूच गं ती… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री सुहास सोहोनी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  तूच गं ती… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री सुहास सोहोनी ☆

श्री आशिष बिवलकर   

? – तूच गं ती… – ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

कोल्ह्याला द्राक्ष लागतात आंबट,

तो ही पून्हा एकदा बघेल चाखून |

मादक सौंदर्य तुझं लावण्यवती ,

कोणीही न्याहाळेल श्वास रोखून |

कामुक नजरेतून तूझ्या सुटती,

मदनाचे मनमोहक बाण |

घायाळ  करतेस पामरांना,

एका अदेत होतात गतप्राण |

विश्वमित्राची तपश्चर्या भंग करणारी,

मेनका तूच ग तीच असणार |

कलयुगात  पुन्हा अवतरलीस,

सांग आता ग कोणाला तू डसणार |

द्राक्षांचे घड मिरवतेस अंगावर,

उगाच कशाला वाढवतेस त्यांची गोडी |

एक एक द्राक्ष झाला मदिरेचा प्याला,

नकोस ग काढू खाणाऱ्यांची खोडी |

चालण्यात ऐट तुझ्या,

साज तुझा रुबाबदार |

ऐन गुलाबी थंडीत,

वातावरण केलेस ऊबदार |

महाग केलीस तू द्राक्ष,

गोष्ट खरी सोळा आणे |

अजून नको ठेऊ अंगावर,

होतील ग त्यांचे बेदाणे |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

श्री सुहास सोहोनी

? – तूच गं ती… – ? ☆ श्री सुहास सोहोनी ☆

( २ ) 

आधीच तुझ्या नजरेत केवढी

ठासून दारू भरलेली

त्यात आणखी द्राक्षांनीच तू

आपादमस्तक भारलेली ll

तूच सांग बाई आता

किती नशा झेपवायची

आधीच केवढी तप्त भट्टी

आणखी किती तापवायची ??

वाईन करण्यापूर्वी द्राक्षे

अशीच “पक्व”त असतील काय ?

दूध तापण्यापूर्वीच त्यावर

अशीच “डक्व”त असतील साय ??

जे काही करीत असतील

करोत,आपलं काय जातं

समोर आहे खाण तोवर

भरून घेऊ आपलं खातं ll

कवी : AK (काव्यानंद) मराठे

कुर्धे, पावस, रत्नागिरी

मो. 9405751698

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झाडं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ झाडं☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आजवर उच्यपदस्थ म्हणून मिरवणाऱ्या भामट्यांनो आता तुम्ही खरेच जागे व्हा

बांडगुळांसारखे अधांतरी जगणं सोडून

जरा झाडाबुडीच्या संस्कारक्षम मातीवर या

 

 म्हणजे कळेल तुम्हाला जगवणाऱ्या मुळांची कशी असते दशा आणि कोणती असते दिशा

 

 आम्ही मूळं होऊन जगवलाय डवरलेला समाज वृक्ष

 प्रसन्नतेने डुलणारा डवरणारा निसर्ग नियमांचे पालन करून

 

 मूळं, खोड, फांद्या, फुलं, फळं हे अवयवच आमचे

एकजिन्सी होऊन मातीच्या मांडीवर हसत खेळत ताठ मानेने उभे आहोत

 आणि तुम्ही ऐतखाऊ होऊन अधिपत्य गाजवायला कसे काय आलात रे तिथं अचानक

 

आजवर तुम्ही ज्ञानाचे पोशिंदे म्हणूनच वावरलात

 केलात घात आमचा

 आम्हाला मातीत गाडून

 पण आम्ही कुजणारे नाही वाढणारे आहोत

 हे कसं काय विसरलात ?

रोज उगवणारा नवा सूर्य देतोय नवी ऊर्जा आम्हाला

त्यानं आपली पिलावळ पेरली आहे आमच्या मातीत

तीच तर आता तरारून वाढते आहे

 नवे क्षितीज कवेत घेऊन

त्यांनी केलाय ज्ञानाचा मुलुख पादाक्रांत

मुळांचा उद्धार करण्यासाठी

 

 आता होतील मूळं मजबूत

 वाढेल समाजवृक्ष पुन्हा

बळकट होऊन

पिलावळीतील ग्रह गोल तारे सुद्धा करतील तुमचा खात्मा

सगळ्याच प्रकारची झाडं

निकोप होऊन वाढावीत म्हणून

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 156 ☆ हे शब्द अंतरीचे… अंगणात माझ्या… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

 

?  हे शब्द अंतरीचे # 156 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… अंगणात माझ्या…! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

अंगणात माझ्या उभा तो प्राजक्त

सुगंध त्याचा दरवळे नित आसमंत  १

त्याचा प्रश्न सदैव एकच असतो

एकटाच का बरे तू नेहमी असतो    २

नाही कुणी तुला जीव लावणारे

तुझ्यावरी पंचप्राण ते ओवळणारे   ३

नाही का तुझ्या हृदयात कोणी

प्रेमळ हृदयाची जीवन-सांगिनी    ४

प्रेम कधीच नाहीका तुला कुणावर झाले

का कुणीच नाही तुझ्यावर कधी प्रेम केले   ५

हास्य करतो मी फक्त तेव्हा त्या क्षणाला

बोलूच काय मी या चित्तचोर प्राजक्ताला   ६

हृदयात वसते माझ्या अनामिक एक ती

जिच्या साठी जगतो मी दिन आणि राती  ७

तिचे प्रेम लाभेल मनीं आस आहे

तिचे सौख्य लाभेल मी अश्वस्थ आहे   ८

येईल कधीतरी ती आहे विश्वास माझा

आरे प्राजक्ता तू फक्त दे रे साथ माझा… ९

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares