मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रक्षाबंधन☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ रक्षाबंधन ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

रक्षणाचे बंधन परंपरेने भावाला बहिणीचे जरी

अडचणीत आईसम संभाळते बहिणच खरी

राखी एक निमित्त,नातं बांधून ठेवण्यासाठी

भाऊ असतोच समर्थ तिला जपण्यासाठी

रक्षणा सोबत प्रोत्साहन हवे उच्च शिक्षणास

संपत्तीत वाटा देताना समाधान वाटावे मनास

नात्यातले तयार असावेत एकमेकांच्या रक्षणास

भाऊ पाहिजे असा नसावा कुणाचाच अट्टाहास

बहीण ही बहिणीला हाक देते संकटकाळी

सोबत करतात एकमेकी अडचणीच्या वेळी

रक्षेचे बंध हे मनातून जिव्हाळ्याने बांधावे

हातावर दोरा बांधण्याला कमी अर्थ उरावे

बांधावी राखी कुणीही कुणाच्या ही हातावर

कुणी ही रक्षण करतो नातं मनातून जुळल्यावर

स्व-संरक्षण करणे हेच असावे आपुले धेय्य

कुणी रक्षणास नाही, याचे नसावे कधीच भय

मैत्रीला ही बंध हवेत मैत्री कायम निभावण्याचे

मैत्रीसोबत हसताना, प्रसंगी सोबत लढण्याचे

नाती वेगवेगळी जरी, बंध प्रेमाने रक्षणाचे

सण हे केवळ निमित्तच कर्तव्ये आठवण्याचे

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चांद्रयान ३ ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ चांद्रयान ३ ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆

चांद्रयान ३ चे झाले पदार्पण

एका अमृतक्षणी चंद्रावर

 

तिरंगा लागला लहरायला

अभिमानाने  दक्षिण ध्रुवावर

 

सत्कार मानवतेच्या प्रेरणेचा

शुभेच्छांचा वर्षाव शास्त्रज्ञांवर

 

माझ्या भारताची पहा शान

चमकदार यशाच्या शिखरावर

🎊🎉

© सौ. मुग्धा कानिटकर

विश्रामबाग, सांगली – मो. 9403726078

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कैसे द्यावे उत्तर…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “कैसे द्यावे उत्तर…” ☆ श्री सुनील देशपांडे

जबाबदारी नको कोणती

हक्कासाठी मारू पत्थर

झुंडशाहीला लोकशाहीने

सांगा कैसे द्यावे उत्तर

 

मला हवे ते मला मिळावे

मी म्हणतो ते एकच उत्तर

ठोकशाहीला लोकशाहीने

सांगा कैसे द्यावे उत्तर

 

मोडू तोडू सदा कायदा

नशेत बरळू आम्ही निरंतर

झोकशाहीला लोकशाहीने

सांगा कैसे द्यावे उत्तर

 

सीमेवरती शत्रू ठाकला

सडेतोड ते देऊ उत्तर

अराजकाला लोकशाहीने

सांगा कैसे द्यावे उत्तर

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नंदादीप… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ नंदादीप… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मनाच्या सुरक्षित कोप-यात

सतत तेवणारा

तुझा नंदादीप

भवसागरात भरकटलेल्या

माझ्या आकांक्षांच्या गलबताला किना-यावर प्रकाशमान झालेल्या परोपकारी दिपस्तंभासारखा वाटतो.

 

तो खुणावत असतो,

सांगत असतो,

ये , थांब इथं,

हा संपन्न किनारा सुरक्षित आहे तुझ्यासाठी.

इथ भक्कमपणे पाय रोवून बघ एकदा

आकाशाकडे

कर सेवा विशाल धरतीची

ती स्वीकारतील तुला,

पुरवील तुझ्या सर्व आकांक्षा,

पण अट एकच,

श्रद्धेनं वास्तवाला आलिंगन देण्याची,

चालत राहण्याची, .

स्वकष्टाने प्रकाशित होण्याची,

 

तरंगत राहून स्वप्नं

पूर्ण होत नाहीत कधी,

इथं वावरणारे सारेच तुला

सटीक समृद्धिची भाषा शिकवतील

दिशा दाखवतील

उज्वलतेच्या

कारण इथं अस्तित्वात असलेलं सारं

इथंच वाढणारं आणि

इथंच  मुरणारं आहे.

इथे नाही गाज झुलवत ठेवणारी.

इथल्या प्रत्येक प्रकृतीला तुला मिठी मारता येईल माझीच म्हणून.

मग तुला  नंदादीपाची

गरज भासणार नाही

कालांतराने तूच होशील नंदादीप वास्तवतेतला, पुजणारा, भजणारा, मानणारा.

आणि तिच्याच चरणी लीन होणारा.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #203 ☆ ‘शालीन तंबोरा…’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 203 ?

☆ शालीन तंबोरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

पतंगासारखा होतो, कुणी हा छाटला दोरा

गगन हे भेदणारा मी, क्षणातच उतरला तोरा

हृदय तू चोरुनी नेले, जरी कुलपात ते होते

कसा रे प्राणवायूतुन, उतरला आत तू चोरा

सुका दुष्काळ पडलेला, ढगातुन होइना वृष्टी

तुला पाहून बरसूदे, असा तू नाच रे मोरा

दुधावर साय धरताना, फसफसू लागले आहे

कमी कर आच तू थोडी, उतू जाऊ नको पोरा

उतरते कर्ज श्वासाचे, कुडी सोडून जाताना

तनाचा सातबाराही, बघा झाला कसा कोरा

असे अंधार पाठीशी, समोरी तू उभी आहे

नको ना दीप तू लावू, तुझा तर चेहरा गोरा

रसिकता कालची येथे तुला दिसणारही नाही

सखे तू गा तुझे गाणे तुझा शालीन तंबोरा

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पाऊलखुणा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि सुश्री निलांबरी शिर्के ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  पाऊलखुणा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि सुश्री निलांबरी शिर्के ☆

श्री आशिष बिवलकर   

?– पाऊलखुणा… – ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

हातात हात तुझा,

करू सोबत जीवनाचा प्रवास !

हृदयावर कोरले नाव तुझे,

रम्य वाटतो तुझा सहवास !

श्वासात माझ्या,

दरवळे तुझाच गंध !

स्वर्गीय सुखासारखे,

तुझ्या प्रीतीचे मर्मबंध !

फेसळणारा विशाल सागर,

तुझ्या माझ्या प्रीतीची देतोय साक्ष !

अथांगता त्याची हृदयात,

तुझ्या प्रीतीतच दिसतो मज मोक्ष !

तुझ्या माझ्या पाऊलखुणा,

या लाटा  सहजच  पुसतील !

मनातल्या गाभाऱ्यात सदैव,

आपल्या प्रेमाचे ठसे दिसतील !

चिरंजीवी असू दे,

आपल्या प्रेमाची कहाणी !

माझ्या हृदयाचा तू राजा,

तुझ्या ह्रदयाची मी राणी !।

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

सुश्री नीलांबरी शिर्के

?– पाऊलखुणा… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

( २ ) 

हातात  हात आश्वासक  साथ

न बोलता कळते काय मनात

जोडीने पावलाचे ठसे उठती

ओलसर वाळूत सागर काठात — 

 लाटा गाजेच गीत गात येतील 

 पाऊल खुणांना सवे नेतील

 रोज समूद्राच्या गाजेमधून 

 आपल्या प्रेमाचे गीत गातील —

 अथांग  सागर असंख्य  लाटा

 त्यात आपला तरलसा वाटा

लाटा ,सागर ,रेती ,किनारा

आपल्या आनंदाच्या पेठा —

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी म्हणाले… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मी म्हणाले… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

मी म्हणाले , ये

लवकर ये

रिमझिमत ये

फूलकोषात झिरपत ये

नदी-नाले भरत ये

बीजातला अंकुर जागवत ये

नवे जीवन घडवत ये

सृष्टी सुजलाम् सुफलाम् करत ये

तू आलास

लगेचच आलास

दौडत आलास. झोडत आलास.

फूल-पाने मोडत-तोडत

नदी-नाल्यांना पूर आणत

बीजातला अंकुर कुजवत

अवघे जीवन नष्ट करत

सृष्टीमध्ये विनाश घडवत

तू आलास

असा रे कसा आलास ?

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 141 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 141 ? 

☆ अभंग…

आपुले जपावे, यशस्वी होवावे

यश संपादावे, अनेकांना.!!

कुणी नं कुणाचे, एकटे शेवटी

आवरा शेपटी, योग्य-वेळी.!!

पाहणी करावी, आखणी करावी

घाई ती नसावी, अवकाळी.!!

कवी राज म्हणे, चार ते जोडावे

बाकीचे तोडावे, बिनकामी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मी आणि माझा एकांत…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “मी आणि माझा एकांत” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

मी आणि माझा एकांत

यांची पडता गाठ

एक नाही दोन नाही

प्रश्न सुटतात साठ…

 

माझ्यातील मला

दिशा नवी मिळते

काय चूक काय बरोबर

इथेच तर कळते..

 

कधी कुठं त्याला गाठायचं

हे लागलं कळायला

त्याची न माझी वेळ मग

आपोआप लागली जुळायला…

 

जगाच्या पसाऱ्यातही

मी असते पसार

कितीही असली गर्दी

वाटतो एकांताचाच आधार…

 

आपल्यातच दडलेले रहस्य

इथेच तर उलगडते

कमी जास्त सारं काही

स्वतःमध्येच सापडते….

 

त्याच्यासोबत प्रत्येक क्षण

असतो नवा कोरा

दिवस असो वा रात्र

वाटतो वेळ अपुरा…

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अखिल हिंदु विजयध्वज गीत…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆  अखिल हिंदु विजयध्वज गीत… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆  अखिल हिंदु विजयध्वज गीत…. स्व. वि. दा. सावरकर ☆

अखिल – हिंदु – विजय – ध्वज हा उभवुया पुन्हा ॥ध्रु॥

या ध्वजासची त्या काली । रोविती पराक्रमशाली

 

रामचंद्र लंकेवरती । वधुनि रावणा ॥१॥

करित जैं सिकंदर स्वारी । चंद्रगुप्त ग्रीकां मारी

हिंदुकुश – शिखरी चढला । जिंकुनि रणा ॥२॥

रक्षणी ध्वजाला ह्याची । शालीवाहनाने साची

 

 

उडविली शकांची शकले । समरि त्या क्षणा ॥३॥

हाणिले हुसकिता जेथे । हूणांसि विक्रमादित्ये

हाच घुमवि मंदसरच्या । त्या रणांगणा ॥४॥

 

जइं जइं हिंदू सम्राटे । अश्वमेध केले मोठे

करित पुढती गेला हाचि । विजय घोषणा ॥५॥

 

उगवुनि सूड हिंदूंचा । मद मर्दुनि मुस्लीमांचा

शिवराय रायगडी करिती । वीरपूजना ॥६॥

 

ध्वज हाच धरुनि दिल्लीला । वीरबाहु भाऊ गेला

मुसलमीन तख्ता फोडी । हाणुनि घणा॥७॥

 

पुढती नेम कांही ढळला । ध्वज जरी करातुन गळला

उचलुया पुनरपि प्राणा । लावुनि पणा ॥८॥

(आंग्ल दैत्य तोचि आला । सिंधुतूनि घालुनि घाला

बुडविला सिंधुतचि त्याही । करुनि कंदना ॥८॥)

–  कवी – वि. दा. सावरकर

☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

भारत पारतंत्र्यात असताना १९३८ साली सावरकरांनी ही कविता लिहिली होती. त्यावेळी त्या कवितेत पहिली आठ कडवी होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ साली या कवितेतलं आठवं कडवं बदलून, त्याजागी सावरकरांनी वर कंसात दिलेलं आठवं कडवं जोडलं.

या देशातल्या पौराणिक  व ऐतिहासिक वीरांनी परकीय आक्रमणाला कसं तोंड दिलं, शत्रूला पळवून लावलं आणि हिंदूंचा विजयध्वज कसा फडकत ठेवला याचं वीरश्रीपूर्ण वर्णन या कवितेत केलेलं आहे. कवितेतले जोशपूर्ण शब्द, काळजाला भिडणारे प्रसंग, प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारे, यमक साधणारे खणखणीत शब्द, भारतीयांची  छाती अभिमानाने फुगविणारे इतिहासातले दाखले देऊन हिंदुंच्या वीरश्रीला साद घालणारी, त्यांचा आत्मविश्‍वास वाढविणारी विजयाची वर्णने अपेक्षित परिणाम नक्कीच साधतात, रोमांचित करतात. सावरकर या कवितेत, प्रभू रामचंद्रांनी केलेला रावणवध, सम्राट चंद्रगुप्ताने सिकंदराचा पराभव करून त्याचा सेनापती सेल्युकसला, त्याच्या ग्रीक सैन्यासह हिंदुकुश* पर्वतापर्यंत घ्यायला लावलेली माघार, शक व हूणांचा* शालिवाहन व विक्रमादित्य* यांनी केलेला पराभव, मुस्लीम पातशाही नेस्तनाबूत करण्यासाठी शिवाजी महाराजांनी उभारलेला स्वातंत्र्यलढा व मिळवलेले विजय, सदाशिवभाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेची मोहिम फत्ते केल्यानंतर उत्तरेच्या मोहिमेत २ ऑगस्ट  १७६० रोजी मराठ्यांनी जिंकलेलं दिल्लीचं तख्त* या व अशा ओजस्वी इतिहासाची हिंदु बांधवांना आठवण करून देऊन, इंग्रजी सत्तेविरुद्ध लढण्यासाठी व हिंदू विजयध्वज फडकविण्यासाठी कवी  या कवितेद्वारे हिंदूंना उद्युक्त करीत आहेत.

*हिंदुकुश पर्वत = हिमालयीन पर्वत रांगांचा अफगाणिस्तान पासून ताजिकिस्तान पर्यंत पसरलेला पश्चिमेकडील भाग.

*शक व हूण = पूर्व/मध्य आशियातील रानटी, लुटारू टोळ्या

*शालिवाहन  = गौतमीपुत्र सातवाहन/ सालाहन/ सालीहन ( इ स ७२ ते ९५) म्हणजेच शकारी किंवा शककर्ता शालीवाहन. शकांवरील विजयाचे (इ.स.७८) स्मरण म्हणूनच त्याने चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारे शालिवाहन शक १९४५ वर्षांपूर्वी सुरू केले. हे युद्ध आताच्या नाशिक परिसरात झालं, कारण नाशिकला लागूनच गुजरात व राजस्थान इथं शक राजा नहापानने आपली सत्ता प्रस्थापित केली होती.. याविषयीचा शिलालेख  नाशिक येथे उपलब्ध आहे.

*विक्रमादित्य = दुसर्‍या चंद्गुप्ताचा नातू स्कंदगुप्त. याने देखिल आपल्या आजोबांप्रमाणे विक्रमादित्य हे बिरुद धारण केले होते.

*मंदसर(मंदोसर/मंदसौर)= मेवाड व माळवा यांच्या बाॅर्डरवरील शहर. येथे अफूची शेती होते. हे रावणपत्नी मंदोदरीचं माहेर मानलं जातं. येथे झालेल्या युद्धात विक्रमादित्याने हूणांचा दारूण पराभव  केला. त्यानंतर ४०/५० वर्षे हूणांनी भारतावर आक्रमण केले नाही.

*दोन ऑगस्ट १७६० रोजी दिल्ली जिंकल्यानंतर दोन महिन्यांनी मराठ्यांनी १० ऑक्टोबर रोजी शाह आलम या मुघल वंशजाला दिल्लीच्या गादीवर बसवलं.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares