ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ एप्रिल – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

प्रकाश खरात

प्रकाश नथू खरात (25 जानेवारी 1952 – 18 एप्रिल 2021) हे मराठी कवी व लेखक होते.

त्यांचा जन्म जुन्नर येथे झाला. राज्यशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी एम ए केलं.

सेंट्रल बँकेत असिस्टंट मॅनेजर असताना 2001 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात एम. ए. च्या विद्यार्थ्यांना अध्यापन करत असत.

‘निर्मितीचा प्रदेश’, ‘पार्थिव – अपार्थिव’, ‘जन्ममरण वर्दळीवर येताना’ हे कवितासंग्रह, ‘अनिकेत’  हा कथासंग्रह, ‘अस्तित्वाचे धागे’ ही आत्मपर कादंबरी इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली.

सौंदर्यवेधी कल्पना, अर्थपूर्ण प्रतिमा, व्यामिश्र वास्तवाचा शोध, चिंतनशील काव्यात्मकता या वैशिष्ट्यांमुळे खरातांची कविता रूढ दलित काव्याची चौकट ओलांडून गेली.

‘आरंभ’ या अनियतकालिकाचे ते संपादक होते.

बेळगाव, नाशिक, नागपूर येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनात त्यांचा सहभाग होता.

खरातांच्या कवितांचे इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती या भाषांत अनुवाद झाले आहेत.

त्यांच्या ‘अनिकेत’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

‘अस्तित्वाचे धागे’ या आत्मपर कादंबरीस ‘साद’ पुरस्कार मिळाला.

दलित साहित्य संसद, दिल्ली या संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.

इंदूरचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

18 एप्रिल 2021 ला करोनामुळे त्यांचा देहांत झाला.

खरातांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, ‘जन्म – मरण वर्दळीवर येताना ‘:परिचय व प्रस्तावना.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ एप्रिल – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १७ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

१७ एप्रिल संपादकीय – वि. आ. बुवा.

वि. आ. बुवा यांचा जन्म ४ जुलै १९२६चा. विनोदी लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. .१९५० पासून त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. त्यांची १५० हून अधीक विनोदी पुस्तके आहेत. त्याचबरोबर आकाशवाणीवर अनेक श्रुतिकांचं लेखन त्यांनी केलय. आकाशवाणीवर त्यांचे ६०० पेक्षा जास्त कार्यक्रम झाले. त्यापैकी ‘-पुन्हा प्रपंच’ या कौटुंबिक  श्रुतिका मालेचे ४०० पेक्षा जास्त भाग त्यांनी लिहीले  आहेत. याशिवाय पटकथा, विनोदी निबंध, तमाशाच्या संहिता, , विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन त्यांनी केलेले आहे.

१९५० मध्ये ‘इंदुकला’ हा हस्तलिखित साहित्याचा अंक त्यांनी प्रकाशित केला होता. त्यात अनेक मान्यवर लेखकांनी लेखन केले आहे. पुढे प्रभाकर पाध्ये यांच्या प्रेरणेने त्यांनी वृत्तपत्रातून लिहावयास सुरुवात केली. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, कल्पकता, उत्स्फूर्त विनोद ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. अनेक दिवाळी अंकातून त्यांनी लेखन केले. ‘अकलेचे तारे’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९५३  मध्ये प्रकाशित झाला. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ आणि नाट्य पुरस्कार समित्यांवर ते अनेक वर्षे परीक्षक म्हणून काम बघत होते.    

वि. आ. बुवा यांची काही पुस्तके –

१. अकलेचे दिवे, २.असून अडचण नसून खोळंबा, ३. अफाट बाबुराव, ४. इकडे गंगू तिकडे अंबू,  ५. खट्याळ काळजात घुसली. ६. झक्कास गोष्टी , ७.फजितीचा सुवर्ण महोत्सव, ८. फिरकी, ९. शूर नवरे, १०. हलकं फुलकं

गिरिजा कीर यांनी आपल्या ‘ दीपगृह’ या पुस्तकात वि.आ. बुवांवर लेख लिहिला आहे.

या हरहुन्नरी लेखकाचा आज स्मृतीदिन ( १७ एप्रिल २०११ ) . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ एप्रिल – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १६ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गो.मा.पवार

गोपाळराव मारूती पवार उर्फ गो.मा.पवार हे मराठीतील नामवंत समीक्षक. अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी तेहतीस वर्षे मराठीचे अध्यापन केले. निवृत्तीनंतर सोलापूर येथे वास्तव्य करून विपुल प्रमाणात साहित्य लेखन केले.

मराठवाडा साहित्य परिषद, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळ या संस्थांमध्ये त्यांनी कलेले कार्य संस्मरणीय आहे. सोळा ग्रंथ व साठ शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पी.एच् डी. प्राप्त केली आहे.

त्यांची काही साहित्य संपदा:

निवडक मराठी समीक्षा

मराठी विनोद: विविध आविष्कारणे.

महर्षि वि.रा म.शिंदे.. जीवन व कार्य

साहित्य मूल्य आणि अभिरुची सुहृद् आणि संस्मरणे ..इ.

पुरस्कार:

साहित्य अकादमी 2007

डाॅ.व.दि.कुलकर्णी स्मृती पुरस्कार

भैरू रतन दामाणी पुरस्कार, सोलापूर

शिवगिरिजा प्रतिष्ठान, कुर्डूवाडी

महाराष्ट्रफाउंडेशनचा मराठी साहित्य पुरस्कार.

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार

यशवंतराव चव्हाण पुरस्कार

जीवन गौरव पुरस्कार..सोलापूर विद्यापीठ 2016

आज त्यांची  पुण्यतिथी आहे.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏🏻

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ एप्रिल – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मोरेश्वर रामचंद्र पराडकर

मोरेश्वर रामचंद्र पराडकर ऊर्फ मोरोपंत किंवा मयूर पंडित (1729 – 15 एप्रिल 1794) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते.

सुमारे 45 वर्षे अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतांनी 75 हजाराच्या वर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर 268 काव्यकृतींची नोंद आहे.त्यामध्ये ‘आर्याकेकावली’, ‘आर्याभारत’, ‘केकावली’ वगैरे असंख्य ग्रंथांचा समावेश आहे.

मोरोपंतांनी 60हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने वा महिलांसाठी ओवीबद्ध गीते रचली.

त्यांनी गझलाही लिहिल्या आहेत. त्या प्रकाराला ते गज्जल म्हणत. हा प्रकार मराठीत पहिल्यांदा त्यांनीच हाताळला.

‘आर्याभारत’ हे त्यांनी आर्यावृत्तात रचलेले समग्र महाभारत आहे.

विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी त्यांनी 108 रामायणे लिहिली. प्रत्येक रामायणाचे काहीतरी वैशिष्ट्य होते.

बारामतीतील त्यांच्या वाड्याच्या एका खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द त्यांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून ते आपली काव्ये सजवत असत.

‘झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु यासम हा ‘ व ‘बालिश बहू बायकांत बडबडला ‘ या त्यांच्या उक्ती आजही वापरल्या जातात.

त्यांचे चरित्र व त्यांच्या काव्याची चर्चा करणारे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

☆☆☆☆☆

डॉ. विनायक रा.करंदीकर

डॉ. विनायक रा. करंदीकर (27 ऑगस्ट 1919 – 15 एप्रिल 2013) हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व नंतर सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालय येथे प्राध्यापक होते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सचिव होते.

त्यांचा संतसाहित्य, रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांचा विशेष अभ्यास होता. रामकृष्ण मठाशी त्यांचा निकटचा संबंध होता

त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाशी संलग्न विविध संस्थांमध्ये काम केले.

दैनिक ‘तरुण भारत’ प्रकाशित करणाऱ्या राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते पदाधिकारी होते.

त्यांनी मराठी ज्ञानकोशाच्या संपादनाचे कामही केले आहे.

ते पुणे विद्यापीठाच्या ज्ञानदेव अध्यासनाचे आद्य प्राध्यापक होते.

‘कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद’ (आत्मचरित्र),

‘ख्रिस्त, बुद्ध आणि श्रीकृष्ण, ‘गोपवेणू’ (कवितासंग्रह), ‘स्वामी विवेकानंद जीवनदर्शन'(स्वामी विवेकानंदांचे त्रिखंडात्मक चरित्र), ‘ज्ञानेश्वरीदर्शन’,’Three Architects of RSS'(इंग्रजी) वगैरे अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.

साहित्य अकॅडमीने प्रकाशित केलेल्या ‘इंडियन मास्टरपीस ‘ या संपादित ग्रंथात त्यांनी ज्ञानदेव- तुकारामांवर लिहिलेल्या इंग्रजी लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी, इंग्रजी, कन्नड व अन्य भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

कवी मोरोपंत व डॉ. विनायक रा. करंदीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन. 🙏🏻

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, लोकसत्ता.कॉम – पंकज भोसले.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ एप्रिल – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

विलास सारंग

विलास सारंग यांचा जन्म १९४२चा. नवतेचा आग्रह धरणारे हे मराठी आणि इंग्रजीही लेखक होते. मूळ इंग्रजीत लिहीलेल्या आपल्या अनेक पुस्तकांचे त्यांनी मराठी अनुवाद केले. तसेच मूळ मराठीत लिहीलेल्या आपल्या अनेक पुस्तकांचे त्यांनी इंग्रजीत अनुवाद केले. त्यांची मराठीत ११ व इंग्रजीत ८ पुस्तके आहेत. अनेक संपादित निवडक कथांच्या संग्रहात त्यांच्या कथा आहेत.        

आधुनिक परंपरेतील कवी, कथाकार, कादंबरीकार यांच्या साहित्य व्यवहाराची त्यांनी पर्खडपणे चिकित्सा केली आहे. त्यांचे लेख व समीक्षा प्रामुख्याने ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाल्या. पुढे ’अभिरुची’, ‘अनुष्टुभ’, ‘नवभारत’ इ. मधूनही त्यांचे लेखन प्रकाशित झाले.   

विलास सारंग यांची काही पुस्तके –

१. अमर्याद आहे बुद्ध, २. अक्षरांचा श्रम केला, ३ आतंक ( कथासंग्रह), ४. एन्कीच्या राज्यात, (कादंबरी)  ५. कविता (१९६९ ते १९८४ ), ६. घडल्या इतिहासाची वाळू , ७. रुद्र ( कादंबरी), ८. लिहित्या लेखकाचं वाचन (समीक्षा), ९. वाङ्मयीन संस्कृती आणि सामाजिक वास्तव १०. सर्जनशोध आणि लिहिता लेखक – विलास सारंग यांची इंग्रजी पुस्तकेही आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या नावावरूनच त्यांच्या लेखनातील वेगळेपण जाणवते.

आज विलास सारंग यांचा स्मृतीदिन ( १४ एप्रील २०१५ ) त्यांच्या स्मृतीला सादर वंदन. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ एप्रिल – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १२ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

भानुदास बळीराम शिरधनकर

भानुदास बळीराम शिरधनकर ऊर्फ भानू शिरधनकर (मृत्यू :12 एप्रिल 1977) हे मराठी लेखक होते.
त्यांची शैली सुबोध होती. त्यांनी लिखाणात नवेनवे विषय हाताळले. नवे शब्द तयार करून ते रूढ करण्याचा प्रयत्न केला.
स्वतःला वेगळे अनुभव घेता येत नाहीत, तर ते स्वतः वेगळे अनुभव घेणाऱ्यांपर्यंत पोहोचत.शिकारी, कोळी, सर्कसमधील लोक, जंगल अधिकारी वगैरेंच्या मुलाखती घेऊन त्यांनी त्यांचे अनुभव वाचकांपर्यंत पोहोचवले.

शिरधनकरांची ‘उधानवारा’, ‘सागरसंग्राम’, ‘शिमाळ आलं,शिमाळ आलं!!’ ही रिपोर्ताजरुपी लेखांची सागरी जीवनावरील इत्यंभूत माहिती देणारी मराठीतील पहिली-वहिली पुस्तके. ‘कारवारचा काळुराम’ (शिकारकथा), ‘तराईच्या जंगलात’, ‘रानातील सावल्या’, ‘घनु वाजे घुणघुणा’ ही त्यांची शिकारी लोकांचे अनुभव शब्दबद्ध करणारी पुस्तके.
‘सर्कसचे विश्व’, ‘वाघ-सिंह माझे सखेसोबती'(दामू धोत्रे यांचे सर्कस अनुभव), ‘चिडियाँघर’, ‘जिवाचं मैतर तुम्ही माझ्या’, ‘फोर्डस्डेलवरील फुफाटा’ ही प्राणी -पक्षांच्या बाबतीतील कुतूहल शमवणारी पुस्तके, ‘ऑलिम्पिकची नवलकथा’, ‘इस्पितळाच्या वाटेवरून’, ‘पुस्तकांची दुनिया’,’गुन्हेगारांच्या मागावर’, ‘कस्टमला झुकांडी’ आणि विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं ‘एस एस सी नंतरच्या वाटा’……

शिरधनकरांच्या पुस्तकांची नुसती नावं जरी बघितली, तरी त्यातलं विषयांचं वैविध्य बघून चकित व्हायला होतं.

त्यांनी अनुवादही केले होते. अमेरिकन लेखक हर्मन मेलविल यांच्या ‘बिली बड’ आणि ‘टायपी’ या दर्यावर्दी जीवनावरील कादंबऱ्यांचा त्यांनी केलेला अनुवाद म्हणजे ‘पाचूचे बेट’ व ‘शिस्तीचा बळी’.

दुर्दैवाने शिरधनकरांच्या एकूण पुस्तकांपैकी थोड्याच पुस्तकांच्या प्रती आता उपलब्ध आहेत.

भानू शिरधनकर यांच्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली. 🙏🏻

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, लोकसत्ता.कॉम – पंकज भोसले.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ एप्रिल – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ११ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

प्राचार्य विजय  प्रल्हाद देव   

प्राचार्य विजय  प्रल्हाद देव यांचा जन्म १९४१ साली झाला. राज्यशास्त्राचं त्यांनी ३५ वर्षे अध्यापन केलं. सर परशुरामभाऊ कॉलेजमध्ये ते दोन वेळा प्राचार्य झाले. राज्यशास्त्र, समाजशास्त्र. इतिहास, दुर्गसंपदा इ. विषयांवर त्यांनी लेखन केलं.

गो.नि.दांडेकरांचे ते जावई, लेखिका वीणा देवचे पती व सुप्रसिद्ध मृणालिनी कुलकर्णींचे वडील.

विजय देव यांची काही पुस्तके 

१.आत्मानुभूती (आत्मचिंतान), २.आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत , ३. दुर्गचिंतन, ४. दुर्गयात्रा , ५ कौटिल्याच्या यथार्थ तूलनेत मॅकिव्हेली, ६ राज्यजिज्ञासा (स्पर्धा परीक्षेसाठी क्रमिक पुस्तक), ७.श्री शिवछत्रपती : एक स्मरण, ८ हृदयपालट ( कादंबरी)

आज विजय देव यांचा स्मृतीदिन ( ११एप्रील २०१९ ) त्यांच्या स्मृतीला सादर वंदन. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ एप्रिल – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  ९ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

शंकरराव रामचंद्र खरात

शंकरराव रामचंद्र खरात(11 जुलै 1921 -,9 एप्रिल 2001) हे मराठी लेखक व इतिहासकार होते.

खरात हे आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते.

‘मी स्वतः महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे,’असं ते म्हणत.

त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांत ‘तराळ अंतराळ’ हे आत्मचरित्र, ‘बारा बलुतेदार’, ‘मसालेदार गेस्ट हाऊस’, ‘आज इथे तर उद्या तिथे’, ‘टिटवीचा फेरा’ अशा अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह व ललितलेखसंग्रहाचा समावेश आहे.

‘शंकरराव खरातांचं कथाविश्व’ हे संदीप सांगळे यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.

ते काही वर्षे ‘प्रबुद्ध भारत’ या नियतकालिकाचे संपादक होते.

1984 साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.

ते बँक ऑफ इंडियाचे संचालक  व ऑफिसर्स सिलेक्शन कमिटीचे चेअरमन होते.

अशोकजी परांजपे

अशोक गणेश परांजपे (मृत्यू :9 एप्रिल 2009) हे मराठी गीतकार  व मुंबईमधील महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालयाचे संचालक होते.

ते मूळ सांगली जिल्ह्यातील हरीपूरचे.

त्यांनी भक्तीगीत, भावगीत, लावणी, गण-गवळण, नाट्यगीत या विविध प्रकारची गीते लिहिली.

इंडियन नॅशनल थिएटर रिसर्च सेंटरचे त्यांचे काम सुरू असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये जाऊन तेथील लोककलावंतांच्या लोककलेच्या ध्वनिफिती तयार केल्या. त्या संदर्भात त्यांनी 1986 मध्ये आनंदवन येथे महाराष्ट्र आदिवासी कलामहोत्सव व 1992मध्ये पंढरपूर भक्तीसंगीत महोत्सव आयोजित केले. या कामाची नोंद फोर्ड फाउंडेशनने घेतली व ऑस्ट्रियातल्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हिडीओग्राफी या आंतरराष्ट्रीय लोककला संस्थेने परांजपेंना सभासदत्व दिले. त्यानंतर परांजपेंनी अनेक मराठी कलावंतांना फ्रान्स, आयर्लँड, जपान आदी देशांत नेऊन तेथे त्यांना कला सादर करण्याची संधी मिळवून दिली.

त्यांनी ‘संत कान्होपात्रा’,’बुद्ध इथे हरला आहे’ वगैरे चार नाटके लिहिली.

त्यांनी लिहिलेली ‘अवघे गर्जे पंढरपूर ‘, ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘एकदाच यावे सखया ‘, ‘कैवल्याच्या चांदण्याला’, ‘नाविका रे ‘ वगैरे अनेक गीते लोकप्रिय झाली.

‘नाविका रे ‘या गीताला 1975 सालचा ‘बेस्ट सॉंग’ हा पुरस्कार मिळाला.

 

शंकरराव रामचंद्र खरात व अशोक जी परांजपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन🙏🏻

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, मुक्त ज्ञानकोश.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ७ एप्रिल – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  ७ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

एकाहून एक सरस आणि अर्थपूर्ण भावगीतांची देणगी मराठीला देऊन मराठी काव्य संपन्न करणारे कवी राजा नीळकंठ बढे यांचे प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरात झाले. पंजाब विद्यापिठातून मॅट्रीक झाल्यानंतर काही काळाने त्यांनी दै. सकाळ मध्ये उमेदवारी केली. पुन्हा नागपूरला  जाऊन दै. महाराष्ट्र मध्ये सहसंपादक म्हणून काम केले. तसेच बागेश्वरी मासिक व साप्ताहिक सावधान मध्ये संपादकीय कामकाज पाहिले. नंतर 1956 ते 1962 या काळात मुंबई आकाशवाणीवर सुगम संगीत निर्माता म्हणून काम केले.

राजा बढे यांची ग्रंथ संपदा:

अशी आहे गंमत, मंदिका, मखमल, माझिया माहेरा जा, योजनगंधा, रसलीना, लावण्यलळीत, वर्खाचा विडा, शृंगार श्रीरंग इ.

बढे यांची काही लोकप्रिय गीते :

चांदणे शिंपित जाशी, जय जय महाराष्ट्र माझा, घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला, माझिया माहेरा जा, सृजनहो परिसा रामकथा, हसतेस अशी का मनी, कळीदार कपूरी पान, तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग, त्या चित्तचोरट्याला का आपले म्हणू मी, मी जाया धर्ममया, हसले मनी चांदणे इ.

त्यांच्या लोकप्रियतेमुळेच मुंबई येथील एका चौकाला व महाल पेठ, नागपूर येथील एका चौकाला कवी राजा बढे चौक असे नाव देण्यात आले आहे.

रसिकांच्या मनावर आरूढ झालेले  राजा 07/04/1977 ला स्वर्गवासी झाले.

☆☆☆☆☆

डाॅ. सदाशिव शिवदे : 

डाॅ. सदाशिव सखाराम शिवदे हे व्यवसायाने पशूवैद्यक असले तरी इतिहासाच्या आवडीमुळे लेखनाकडे वळले. मराठी व इतिहास हे विषय घेऊन त्यांनी एम्. ए. केले. एकीकडे व्यवसाय व दुसरीकडे लेखन चालूच होते. त्यांनी इतिहास विषयक सुमारे सव्वीस पुस्तके लिहिली आहेत. त्यातील ज्वलज्वलनतेजस संभाजी राजा या पुस्तकास न. चि. केळकर ग्रंथालयाचा साहित्य साधना पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी सेनापती धनाजी जाधव, हंबीरराव मोहिते, कान्होजी आंग्रे, सईबाई, मोरोपंत पिंगळे इत्यादींची चरित्रे लिहीली आहेत. याशिवाय परमानंदकाव्यम् ‘ महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग 1 व 2 , मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था(अनुवादित), माझी गुरे, माझी माणसे  अशा अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या कार्याबद्दल बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे त्यांना स्वामीनिष्ठ खंडोबल्लाळ चिटणीस पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

07/04/2018 रोजी त्यांचे निधन झाले.

कवीराज राजा बढे आणि इतिहासप्रेमी डाॅ. शिवदे यांच्या स्मृतीस अभिवादन! 🙏🏻

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, बाइटस् ऑफ इंडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ एप्रिल – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  ६ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गोपाळ गोविंद मुजुमदार

गोपाळ गोविंद मुजुमदार – पाटणकर (साधुदास) (1883 – 6एप्रिल 1948) हे कवी व कादंबरीकार होते.

त्यांचा जन्म व शालेय शिक्षण सांगलीत झाले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना शिक्षण अर्धवट सोडून ते सांगलीला परतले व नोकरी करू लागले.

‘साधुदास’ या नावाने त्यांनी काव्यरचना व अन्य लिखाण केले.

रामकथा चार भागात सांगण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘विहारे’ नावाची काव्यरचना केली. पण ते फक्त तीनच विहार  पूर्ण करू शकले.

त्यांच्या ‘पौर्णिमा’ या कादंबरीत शनिवारवाड्याचे यथातथ्य वर्णन आले आहे.

साधुदास यांनी लिहिलेली पुस्तके :

काव्ये : गृहविहार, रणविहार, वनविहार 

स्तोत्रे : कृष्णालहरी, भीमशती, रामशती, सद्गुरूशती, सीताशती

स्फुटकाव्ये : निर्माल्यसंग्रह भाग 1,2.   महायुद्धाचा पोवाडा

कादंबऱ्या : 1. पौर्णिमा -पूर्वरात्र

  1. पौर्णिमा -उत्तररात्र
  2. मराठेशाहीचा  वद्यपक्ष -प्रतिपदा -पूर्वरात्र व उत्तररात्र

      4.मराठेशाहीचा वद्यपक्ष – द्वितीया-  पूर्वरात्र व उत्तररात्र

अन्य पुस्तके : 1. मराठीची सावट भाग 1 व 2

  1. बुद्धिबळाचा मार्गदर्शक

पाठ्यपुस्तकातील मुलांच्या आवडत्या कविता :

  1. पडू आजारी मौज हीच वाटे भारी
  1. नाकेला अन गुलजार

साधुदासांच्या स्मृतिदिनी त्यांना सादर अभिवादन. 🙏🏻

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares