मराठी साहित्य –  इंद्रधनुष्य ☆ झाशीवाली शौर्य शालिनी ! – भाग – २ – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ झाशीवाली शौर्य शालिनी ! – भाग – २  – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

किल्ल्याला वेढा देत इंग्रजांनी २५ मार्च १८५८ रोजी झाशी किल्ल्यावर प्रत्यक्ष आक्रमण केलं. मेजर जनरल हयू रोज समोर मोठं आव्हान होतं. त्यावेळी त्यांना रसद उपलब्ध होऊ नये म्हणून भोवती गवताचं पातंही शिल्लक न रहाण्याची खबरदारी तिनं घेतली होती अशी नोंद सर हयू रोज करून ठेवतो. तोफा आग ओकत होत्या. चकमकी वाढत होत्या. रातोरात पडलेल्या भिंती उभ्या करून राणी सैन्याला सतत प्रेरित करत होती. जखमी,आश्रितांची व्यवस्था, दारुगोळा, अन्नछत्र अशा विविध पातळ्यांवर राणी अहोरात्र झुंजत होती. मदतीला येणारे तात्या टोपेही तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत हे ऐकून राणीचे सरदार निराश झाले तेव्हा ही झाशीवाली त्यांच्यावर कडाडली! स्वबळावर ही लढाई सुरूच ठेवण्यासाठी तिनं त्यांचं मन वळवलं. ३ एप्रिल रोजी किल्ल्याची भिंत फोडून इंग्रज आत शिरले तेव्हा राणीनं आत्माहुती न निवडता मोठंच धाडस दाखवलं. अशाही परिस्थितीत स्थिर चित्तानं पुढची निरवानीरव करत ११/१२ वर्षांच्या दामोदरला घेऊन ती बाहेर पडली. अंगात चिलखत,कमरेला विशाचं पाणी दिलेला जंबिया, एक मजबूत तलवार साथीला. आता पुन्हा कधी झाशीचं दर्शन!

झाशीतली भीषण लढाई, पाठलाग करणाऱ्या वॉकरशी झालेलं द्वन्द्व यानंतर अन्नपाण्याविना राणी लक्ष्मीई सलग १०२ मैल (१६४ किलोमीटर्स) एवढी घोडदौड करत मध्यरात्री काल्पी इथे पोहोचली. हे प्रचंड अंतर आहे. आज चांगल्या रस्त्यावरून,गाडीनं कमीत कमी अडीच-तीन तास लागणारं हे अंतर तेव्हा डोंगराळ असताना, रात्रीच्या गडद अंधारात, प्रचंड तणावाखाली राणीनं कसं पार केलं असेल? मुळात हाच घोडदौडीचा, आत्यंतिक धाडसाचा तिचा पराक्रम भारतीय इतिहासात नोंदवलेला आहे. काल्पीला पोहोचताक्षणीच घोड्यानं अंग टाकलं पण रजस्वला अवस्थेत पोहोचलेल्या राणीनं तशातही मोठंच बळ एकवटलं. पुन्हा हिंमत बांधली.

एवढ्या कडक सुरक्षेतून राणी निघून गेली हे कळताच सर हयू रोज संतापला. राणीचे वडील मोरोपंत तांबे यांना ५ एप्रिल रोजी भर दुपारी सर हयू रोजनं झाशीच्या राजवाड्यासमोर जाहीरपणे फासावर चढवलं. झाशीची प्रचंड लूट सुरू झाली. मोठा नरसंहार झाला. प्रत्यक्ष तिथे असलेला डॉ. थॉमस लिहितो, “Death was flying from house to house with mercurial speed, not a single man was spared. The streets began to run with blood.”

हे ऐकल्यावर राणीची काय अवस्था झाली असेल? त्यातूनही ती पुन्हा उभी राहिली! दुर्मिळातल्या दुर्मिळ अशा स्त्री मधल्या अद्वितीय शौर्याला प्रकट करणारं राणीचं एकेक धाडस वंदनाला पात्र आहे. रावसाहेब पेशव्यांच्या पायावर तलवार ठेवत या रणरागिणीनं त्यांना पूर्वजांच्या पराक्रमाचं स्मरण करून दिलं. पेशवे, नवाब यांच्या साथीनं राणीनं १५ में रोजी काल्पीजवळ मोठाच लढा दिला. वीजेसारखी तिची समशेर शत्रूसंहार करत चौफेर फिरली.

काल्पी इंग्रजांच्या हाती लागल्यावर पुनश्च हरि ॐ! छत्रपतींचा आदर्श डोळ्यांसामोर ठेवत ग्वाल्हेरचा किल्ला घेण्याचा आग्रह तिनं धरला. इंग्रजांची साथ देत पेशव्यांवर चालून आलेल्या जयाजीराव शिंदेंचा चोख बीमोड केल्यावर त्यांच्या सैन्यातली मराठी अस्मिता जागवून आपल्या बाजूनं वळवण्याचं मोठं काम राणीनं केलं. केवळ साधनांवर युद्धं जिंकली जात नाहीत तर त्यासाठी पराक्रम हवा हे राणी लक्ष्मीबाईनं पुन्हा पुन्हा सिद्ध केलं.

आता मात्र अंतिम लढाई! १७ जून १८५८. इंग्रजांचा तळ ब्रिगेडियर स्मिथच्या नेतृत्वाखाली कोटा की सराई इथे उभारण्यात आला होता. एक नव्या शुभ्र घोड्यावर स्वार झालेली राणी घोड्यावरून फिरत, सैन्यरचना करत होती, योजना समजावत होती. ते तिचं स्वतःचं सैन्य नसून ठिकठिकाणचं एकत्र झालेलं विस्कळीत सैन्य होतं. ती त्यांचा मनापासून गौरव करत होती, त्यांचं मनोबल उंचावत होती. इंग्रजांच्या ९५ व्या पायदळ तुकडीनं रेन्स या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली धावा पुकारला. भोवती कोरडे तसंच पाणी असणारे ४-५ फुट खोलीचे मोठे नाले, उंचसखल भाग कशाची तमा न बाळगता राणी सैन्य समुद्राला भिडली! राणी, तात्या, नवाब,सगळं सैन्य यांच्यात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची एक अभूतपूर्व अशी उंच लाट उसळली होती! राणी दिवसभर अथकपणे लढली.

लढाईचा दुसरा दिवस. राणीच्या घोड्याला मोठा नाला ओलांडता न आल्यानं तो संथ झाला आणि तेवढ्यात राणीच्या मस्तकावर मागून आघात झाला. मागचा भाग विच्छिन्न झाला. समोरून सपासप वार झाले. डोळा बाहेर आला. छातीवर, अंगावर मोठ्या जखमा होऊन रक्तबंबाळ लक्ष्मीबाई कोसळली. अखेरचा श्वासही स्वातंत्र्य देवतेला अर्पण करून ती अनंतच्या प्रवासाला निघून गेली. आकाशानं टाहो फोडला. रामचंद्र देशमुखांनी राणीनं सांगून ठेवल्याप्रमाणे तिचा देह शत्रूच्या हाती लागू दिला नाही. एका कुटीजवळ नेऊन त्यांनी शिताफीनं तिला अग्नी दिला. तात्यां टोपेनच्या टोपेंची मनू त्यांच्या पुढे निघून गेली!

राणीबरोबर प्रत्यक्ष लढलेला स्वतः सर हयू रोज अंतर्मुख होऊन राणीविषयी लिहितो – “Although a lady, she was the bravest and best military leader of the rebels. A man among the mutineers.”

स्वा. सावरकरांचे शब्द जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातला राणी लक्ष्मीबाईविषयीचा गौरव प्रकट करतात- “जातीने स्त्री, वयाने पंचविशीच्या आत, रूपाने खूबसूरत,वर्तनाने मनमोहक, आचरणाने सच्छील,राज्याचे नियमनसामर्थ्य, प्रजेची प्रीति, स्वदेशभक्तीची जाज्वल्य ज्वाला, स्वातंत्र्याची स्वतंत्रता,मानाची माननीयता, रणाची रणलक्ष्मी ! ‘लक्ष्मीराणी आमची आहे’ हे म्हणण्याचा मान मिळणे परम दुष्कर आहे. इंग्लंडच्या इतिहासाला तो मान अजून मिळालेला नाही! इटलीतील राज्यक्रांती इतकी वीररसयुक्त असतांनाही तसल्या उदात्त प्रसंगातही इटलीच्या गर्भात राणी लक्ष्मीसारखा गर्भसंभव नाही!लक्ष्मीच्या अंगात जे रक्त खेळत होते ते रक्त, ते बीज, ते तेज आमचे आहे’ ही यथार्थ गर्वोक्ती करण्याचे भाग्य, हे भारतभू, तुझे आहे!”

— समाप्त —

लेखिका : मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)

प्रस्तुती : जुईली केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हेच तर ते देवदूत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “हेच तर ते देवदूत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

भर पावसात भिजत उभ्या असलेल्या तरूणास विचारले , “नुसताच भिजतो कश्याला?”

 तो उत्तरला “नही साब”.. त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवतं तो म्हणाला,

“इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है”

तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे ऊभा होता!

रस्त्याखालचा पाईप पूर्ण भरला असावा, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते. फुटभर ऊंचीचे पाणी वरून वेगाने जात होते. पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे!

मी अवाक झालो!

कोण होता हा? कोणासाठी हा असा पाण्यात ऊभा राहिलायं?

मी भरं पावसातं खाली ऊतरलो. त्याला म्हंटले, “बहोत बढिया, भाई!”

तो फक्त कसनूसं हसला आणि म्हणाला,

“बस, कोई गिरना नै मंगता इधर”

“कबसे खडा है?”

“दो बजे से”

घड्याळातं पाच वाजले होते..!

३ तास तसेचं ऊभे राहून याला भूक लागली असणारं. दुर्दैवाने माझ्याकडे काहीच नव्हते. सगळी दुकानेही बंदं. हा भूक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते!

कुठल्या प्रेरणेने तो हे करतं होता? त्या घाण गुडघाभर ऊंचीच्या पाण्यात उभे राहून तो तीन तासांपासून कोणाला वाचवतं होता? आणि का? दोन वाजल्यापासून त्याने कित्येक  जणांना वाचवले असणार. कोणाला त्याची जाणीवही नव्हती. खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?

ही अशी छोटी छोटी माणसें हे जग सुंदर करून जातात!

मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा ‘कालनिर्णय’ विकतं बसलेला दिसला.

दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.

“केवढ्याला ‘कालनिर्णय’, काका?”

“फक्त बत्तीस रूपये, साहेब” केविलवाणे तो म्हणाला. सकाळपासून एकही विकले  गेलेले दिसतं नव्हते. मी एक घेतले. पन्नासची नोट होती. ती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतचं होता, की अचानक उंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला.

“कितने का है ये?”

“बत्तीस रुपया”

“कितने है?”

“चौदा रहेंगे, साब”

ज्याला मराठी येतं नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोयं?

त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले! 

मी आश्चर्यचकित..! छापील किंमतीत विकतं घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेतं नाहीये. तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटतं नव्हता.

तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल. मला राहवलेचं नाही. मी थांबवून त्यांना विचारलेच!

हे मुळचें लखनौचे महोदय एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते. शिवाजीपार्कात स्वत:चे घर होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. लठ्ठ पेन्शन येत होती.

“वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा? सौ, डेढसौ? वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभरं ऐसेही धुप मे बैठना पडता था. मैने ऊसका काम थोडा हलका करं दिया. बस इतनाही!”

मला काही बोलणेचं सुचले नाही! पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणारं काय होता?

“सोसायटी मे बहोत मराठी फ्रेंडस है, उन को बांट दूंगा!”

मी दिग्मूढ!

“तु एक मिनीट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता!” मला डोळा मारतं, हसतं तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा!

माणूसकी याहून काय वेगळी असते? 

एखाद्या हॉस्पिटलबाहेर ‘तात्काळ रक्त हवे’ असा फलक वाचून, ऑफिसला वा घरात जायला ऊशीर होईल, याची तमा न बाळगतां रक्त देणारे कोण असतात? ते ही रांग लावून! 

कोण असतात हे? कुठल्या जातीचे? कोणत्या धर्माचे? ‘भैये’ असतात की ‘आपले’ मराठी?

मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो ‘चायवाले’ आहेत. 

बहुतांश उत्तरेकडले. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभरं चहा ते रस्त्यावर फेकतात.

दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक ‘चायवाला’ मला माहिती आहे! सकाळी सकाळी भिकारी आलाचं नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो!

“बर्कत आती है” एवढीचं कारणमिमांसा त्याने दिली होती.

डोळे ऊघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरचं मेलेली असते.

परवा थायलंडमध्ये गुहेत अटकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले. 

गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले. ते पाणी कुठे फेकले?

ज्याच्या शेतातं ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातलें तीन एकरातले ऊभे पिक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान.

एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारले.

“नुकसानीचे काय एवढं? मुले वाचली ना? पेरणी परतं करता येईल. मुलांचे प्राण परतं आणता आले असते का?”

हे ऊत्तर ऐकूनचं डोळ्यात पाणी आल!

हे जग सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.

फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे!

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उंबरा… आत्मभान जागृत ठेवणारे – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ उंबरा… आत्मभान जागृत ठेवणारे – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान…!!! 🙏🏻

अवश्य वाचा

उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे (औदुंबराचा) उंबराचा वृक्ष.

म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे. या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे.

उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे.

साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. २१ गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली.

औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात.कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते.

काही वर्षे पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायची. उंबरठ्यावर नृसिंहलक्ष्मीचे स्थान असते. तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते. घरात कोण, कसे,काय घेऊन जातेय त्यावर त्याचे ध्यान असते.

उंबरठा ! किती अर्थ होता त्या उंबरठ्याला .उंबरठा म्हणजे, दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी, पण, किती अर्थ होता या लाकडी पट्टीला. चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कुणीही धजत नसे. सातच्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता. आता तर कुणी बाराच्या आतही घरात येत नाही.

पूर्वी बायका म्हणायच्या कि आमच्या उंबरठ्याचा गुण आहे, आमच्या घराचा उंबरठा ओलांडून लेक घरात आली कि तिला आमचे गुण लागलेच म्हणून’ समजा.  हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतिक मानला जायचा. ज्या घराला उंबरठा नाही ते काय घर म्हणावं का..?

ज्या घराला उंबरठा नाही तेथे कुणाचाच पायपोस कुणाला नसतो अस म्हणतात. आओ जाओ घर तुम्हारा. सणवार आला कि उंबरठा सारवला जायचा. त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे. दारावर तोरण बांधले जायचे.  फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय.

आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते. काहीच आडपडदा नको. कोणीही उपटसुंभ येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो. ना मानसन्मान ना मर्यादा किती सुधारलो ना आपण?

नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेशते. उंब-याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंब-याच्या खूप सा-या भूमिका असल्या तरीही उंबरा असते एक मर्यादा.

उंबरा असते एक सीमारेषा. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट..

बाहेरुन घरात येणा-यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं. आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही, हे  लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा.

उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान.उंब-याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे.

उंबरठे झिजवल्या शिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच. पण उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंब-याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं.

अजून एक गोष्ट इथे नमूद करायलच हवी. ती म्हणजे उंब-याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं.

हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं.

उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा. जे जे अपवित्र असेल,वाईट असेल त्या वस्तू असतील,विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आता थारा नाही. मग ते काहीही असु शकते.

भ्रष्टाचाराचा पैसा असेल,कुलक्षणी मित्र असतील,व्यसनांसाठी लागणारे साहित्य असेल,वाईट विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही. म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उंबऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा. म्हणून पूर्वीच्या घरांना ओसऱ्या असत. चहापाणी, गप्पा बाहेरच व्हायच्या.

घरातील गृहलक्ष्मीला  सुद्धा कधी बाहेर जायचे आणी कधी नाही हे कोण आलंय याचे भान असायचे. आता काय भावोजी भावोजी करत असेल त्या अवतारात बाहेर. घरातील संस्कार, जेष्ठांचे वर्तन, मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तीमत्व ठरवते.

उंबरा म्हणजे मर्यादा. जशी नदीला दोन काठांची मर्यादा असते,सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते. ज्यावेळी नदी,सागर मर्यादा ओलांडतात तेव्ह जलप्रलय येतो. तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे.

म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल.

एकुणच काय मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली,आपण ती ध्यानात ठेऊ, उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेऊ.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “परफेक्शनिस्ट आई…” – भाग – २ – लेखक : श्री बिभास आमोणकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

??

☆ “परफेक्शनिस्ट आई…” – भाग – २ – लेखक : श्री बिभास आमोणकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

सुमारे दहा वर्षं तिचा आवाजच गेला होता, तो तिच्या आयुष्यातील सर्वात भीषण, पण त्याचवेळेस तिला आणि आम्हा कुटुंबीयांनाही खूप काही शिकवून गेलेला असा काळ होता. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेली आई वेगळीच होती. त्या दहा वर्षांच्या कालखंडात ती एकटीच होती. साथीला कुणीही नसायचं, ना कुणी शिष्य, ना इतर कुणी. त्या वेळेस तिचं अखंड चिंतन सुरू होतं. विभा पुरंदरे यांनी त्या कालखंडात आईला जी साथ दिली त्याला तोड नाही. त्या कॉलेज संपल्यानंतर यायच्या रोज. आई काय पुटपुटते आहे ते समजून तिच्याशी संवाद साधायच्या. त्यांचे ऋण आहेत आम्हा कुटुंबीयांवर. वैद्य सरदेशमुखांकडे तीन र्वष आईचे उपचार सुरू होते. दर शनिवारी आईसोबत पुण्याला औषधोपचारासाठी जायचो. तेव्हा जाताना ती आईच असायची अनेकदा. पण तिला बोलता यायचं नाही. उपचारादरम्यान, तिने जे सहन केलंय ते दररोज पाहत होतो. फार कळण्याचं वय नव्हतं, पण जे पाहिलं त्याचा अर्थ आणि मोल नंतर कळत गेलं. त्या वेळेस तिने भरपूर वाचन आणि चिंतन केलं. ‘स्वरार्थरमणी’ हे तिचं पुस्तक त्याच काळातील चिंतनाचं संचित होतं. एक मात्र होतं की, ती चिंतनात आहे किंवा दु:खात आहे म्हणून घरात संवादच झालेला नाही, असं कधीच झालं नाही. घरात ती छान स्वयंपाकही करायची. शेवयाची खीर मला आवडते म्हणून अनेकदा करायची. मला केव्हा ती खीर हवीहवीशी वाटायची हे तिला नेमकं कळायचं. स्वयंपाक मनापासून आवडायचा. माईपासूनच ते परफेक्शन तिच्याकडे आलेलं असावं. तिने चिरलेली भेंडी तुम्ही व्हर्निअर स्केल लावून तपासलीत तरी त्याच आकाराची असतील एवढं ते परफेक्शन होतं. वाटाणे सोलतानाही कधी सोललेले वाटाणे इकडे तिकडे पळताहेत असं झालेलं मी आजवर पाहिलेलं नाही. तिला चित्रकला, भरतकाम, वीणकाम सारं काही आवडायचं. तिचं वीणकामही पाहिलं आहे. त्यातदेखील एकही टाका तिरका जात नसे. गेलाच तर पूर्ण उसवून ती पुन्हा सारं नेमकं करायची. नातवांसाठी तिने स्वेटर्स वेळ काढून कधी विणली कळलंही नाही. साधं कामंही वेगळ्या पद्धतीनं करण्याची शक्ती तिच्यात होती. ईश्वरावर गाढ श्रद्धा होती. म्हणून जप किंवा पूजा करताना आम्ही तिला कधीच डिस्टर्ब होऊ दिलं नाही. ती खूप कौेटुंबिक होती. संगीतात जशी तिने कधी घराणी मानली नाहीत, तशीच तिने जातपातही नाही मानली. त्यामुळेच आमच्या घरात सर्व लग्नं आंतरजातीय झालेली दिसतील. माझं, भावाचं, आमच्या मुलांची. आमची लग्नं झाल्यावर आलेल्या सुना तिच्या मुली झाल्या होत्या आणि आम्ही जावयासारखे झालो होतो. सुनांवर तिने मुलांसारखंच प्रेम केलं. परफेक्शनच्या मागे एवढी असायची, की एकदा जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये कार्यक्रम तिच्या मनासारखा झाला नाही म्हणून परत एकदा जाऊन कार्यक्रम केला, त्याचे पैसे घेतले नाहीत.

वर्षांतून एकदा तिच्या वाढदिवशी मात्र आई वेगळी दिसायची. कारण एरवी तिचा थोडा धाक आम्हाला आणि शिष्यांनाही असायचा. मात्र आईच्या वाढदिवशी आम्ही सगळे एकत्र घरातच छोटा कार्यक्रम करायचो. त्यात नाच-गाणीही असायची. त्या दिवशी मात्र ती काहीच बोलायची नाही किंवा कदाचित आम्हीच तिला काही बोलू द्यायचो नाही. आई मुळात चांगली क्रीडापटूही होती, हे फार कमी जणांना माहीत आहे. ती उत्तम टेबलटेनिस खेळायची. ‘किस’ प्रकारात मोडणारी सव्‍‌र्हिस ती अप्रतिम करायची. चेंडूचा पहिला टप्पा आपल्या बाजूस टेबलाच्या कोपऱ्यावर आणि दुसरा टप्पा थेट प्रतिस्पध्र्याच्या भागात टेबलच्या कोपऱ्यावर! हा अप्रतिम प्रकार आम्ही अनेक वर्षांनंतर थेट ओरिसाला अनुभवला. मुरलीधर भंडारी ओरिसाचे राज्यपाल असताना ओरिसा येथील विद्यापीठाने आईला डी. लिट्. देऊन सन्मानित केलं, त्या वेळेस राजभवनावर टेबलटेनिसचं टेबल पाहून आईचे हात शिवशिवले आणि आम्ही पुन्हा एकदा ती सव्‍‌र्हिस अनुभवली.

एकदा आईची शिष्या नंदिनी बेडेकर बसली होती. भूप गात असताना तिने स्वरमंडल बाजूला सारलं आणि डोळ्यांतून अश्रूधारा सुरू झाल्या. ते आनंदाश्रू होते. ती म्हणाली, आज गायलेला भूप वेगळा होता, तो आजवर असा कधीच जाणवला नव्हता. आज वेगळा साक्षात्कार झाला. त्यानंतर अगदी अलीकडे तिला आनंदी पाहिलं ते नवी दिल्लीला झालेल्या तिच्या अखेरच्या मैफिलीनंतर. तिने त्या दिवशी स्वत:हून माझ्या पत्नीला, तिच्या सुनेला, भारतीला फोन केला आणि सांगितलं की, ‘‘आज मी खूश आहे, मी खूप छान गायले.’’ हा आमच्या सर्व कुटुंबीयांसाठी मोठाच धक्का होता. कारण ‘मी आज खूप छान गायले’ असे शब्द आईच्या तोंडून एवढय़ा वर्षांत कधीच ऐकल्याचं स्मरणात नव्हतं. ती मैफल, गाणं छान झालं तर मी तुला साडी देईन, असंही ती सुनेला आधी म्हणाली होती. तिचा फोन हा आनंदाचा धक्का होता.

याआधी तिला आनंद झाला होता तो माझी मुलगी तेजश्री हिने शास्त्रीय संगीताला वाहून घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा. तिने आमच्यापैकी कुणावरही या मार्गाने येण्यासाठी जोरजबरदस्ती केली नाही, ना कधी साधं बोलून दाखवलं. पण काहीही न करता तेजश्रीने घेतलेल्या निर्णयाचं तिला समाधान होतं. जे मला सांगायचं आहे व अपेक्षित आहे ते कळण्याची व समजून घेण्याची क्षमता तिच्याकडे आहे, असं मात्र ती सतत सांगायची. आता आजीच्या असामान्य कर्तृत्वासमोर उणे न पडण्याचं आव्हान तेजश्रीसमोर आहे. आई गेली त्या दिवशी ती पूजाघरात बसून होती. मी तिला सावरण्यासाठी गेलो तेव्हा ती इंग्रजीत म्हणाली, ‘आय डोन्ट वॉन्ट टू सी हर’ पण मी चुकून ‘सिंग’ एवढंच ऐकलं आणि हातपायच गळून गेले होते. म्हणून तिला पुन्हा विचारलं त्या वेळेस ती स्पष्ट म्हणाली की, त्या अवस्थेत तिला पाहावत नाही. तिच्या अंत्यसंस्कारासाठी निघालो तेव्हा तिने आईची मैफिलीची साडी व शाल कपाटातून काढली. ती म्हणाली, मैफिलीत जशी जायची त्याच वेशात तिला निरोप देऊ या. हा संपूर्ण कुटुंबासाठी अतिभावुक असा क्षण होता. अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी दादरच्या चौपाटीवर तिच्या अस्थी विसर्जित केल्या, त्या वेळेस एरवी कचरा भरलेल्या त्या किनारपट्टीवर कचऱ्याचा मागमूसही नव्हता. भरती होती, लाटा वेगात येत होत्या. त्या वेळेस मी तेजश्रीला म्हटलं की, ‘‘गानसरस्वती’च्या स्वागतासाठी सारा आसमंत बघ कसा स्वच्छ झालाय. कारण तिला सारं स्वच्छ आणि नेटकं लागतं याची त्यालाच तर कल्पना असणार!’’ अस्थी हातात घेतलेल्या अवस्थेत माझा भाऊ निहार तिला म्हणाला, ‘‘हे सारं भौतिक आहे, नश्वर आहे. जे नश्वर नव्हतं ते ईश्वरी सूर तिने तुला दिले आहेत. ते तुझ्यात सामावलेयत ते आता आपल्यासोबत असतील!’’

आंबा म्हणजे आईचा जीव की प्राण. माईंचे यजमान भाटिया हयात असताना माईने खूप सुख अनुभवलं. नंतर परिस्थिती कठीण झाली. पण आईनेही ते सुख काही काळ अनुभवलं होतं. ती म्हणायची. आंबा म्हणजे ढीग पडलेला असायचा. आंबा म्हणजे तिच्यासाठी स्वर्गसुख असावे, असे अनेकदा जाणवायचे. मग आम्हीही मार्केटमध्ये पहिला आंबा आला की तिच्यासाठी घेऊन यायचो. आंबा खाताना ती जग विसरायची. फेर्नादिन आणि मानकुराद हे दोन गोव्यातील आंब्याचे प्रकार तिच्या भारी आवडीचे. हे अनेकदा पावसाळ्यात येतात. आंब्यासारखंच प्रेम तिने निसर्गावरही केलं. बकुळीची फुलं तिला प्रचंड आवडायची. माझं निसर्गप्रेम बहुधा तिच्या रक्तातूनच आलेलं असावं. निसर्गाबद्दल आईशी होणारा संवाद अनेकदा अमूर्त प्रकाराचा असायचा. ती फक्त व्यक्त व्हायची, मी समजून घ्यायचो. निहारकडे निसर्गाबद्दल फार कमी बोलणे व्हायचं. कलाकार असल्यामुळे माझ्याशी ते सूत जुळलं असावं. तिच्या गावचा किस्सा तिने एकदा सांगितला होता : कुर्डीला नदीकाठी घरं होतं. तिथे नदीकाठी वाढणारी बॅरींग्टोनिया रेसिमोसाची झाडं खूप होती. या झाडाला माळांसारखी फुलं येतात. काहीशी बारीक असलेल्या केसांसारखी दिसणारी. आई बसलेली असायची नदीकाठी आणि वारा आल्यावर ती फुलं खाली नदीच्या पाण्यात पडायची व वाहायची. आई म्हणाली होती, फुलांचं ते वाहणं पाहून आयुष्यात प्रथम ऱ्हिदम काय असतो ते कळला. निसर्गातही ती बहुधा संगीताचाच शोध घेत असायची!

– समाप्त –

लेखक : श्री बिभास आमोणकर 

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तीनशे एकोणचाळीसावे प्रस्थान ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ तीनशे एकोणचाळीसावे प्रस्थान ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

वारी…! ‘वा’सनांची ‘री’घ लागलेली असते मानवाच्या जीवनवाटेवर! ‘वा’म मार्गाला जाण्याची  ‘री’त सहजपणे अनुसरण्याची सवय असलेले मन याच वाटेवरून तर चालत असते निरंतर! या वाटेला कोणतेही अंतिम गंतव्य स्थान नाही…अर्ध्या वाटेवरून पुन्हा माघारी फिरणे आणि संसाराचा ताप सहन करीत पुन्हा वाटेला लागणे नव्या जन्मात…पुनरपि जननं ठरलेलं…मरण तर असतंच…कितीदा जन्मून मरत असतील ना जीव?  पण आपले जग मोठे भाग्यशाली…इथे वैराग्याची बाग फुलवणारे संत महात्मे जन्मले! 

वारी….अलौकिक आनंदाची जी वाट शतकानुशतके ज्ञानोबाराय-तुकोबारायादी संत-महात्मे चालून निजधामाला पोहोचले…त्याच वाटेवर त्यांच्या पादुका पालखीत विराजमान करवून त्यांच्यासोबत चालणे ही कल्पनाच केवळ अवर्णनीय! जगाला तोवर देवतांच्या पालख्या माहित होत्या. देव आत गाभा-यात विराजमान असतात…या देवांचे मुखवटे पालखी नावाच्या विशेष सजवलेल्या आकर्षक आसनामध्ये विशिष्ट तिथीला किंवा काही ठिकाणी रोजच्या रोज मंदिरांच्या आवारात किंवा परिसरात भक्तीभावाने मिरवल्या जात. नंतर देवतांचे मूर्तिमंत प्रतिनिधी अशी ओळख धारण केलेल्या राजांनी  मग हा अधिकार स्वत:ला बहाल केला! नंतर इतर अधिकारी या पालख्यामधून मिरवू लागले.  पालखीचा मान हा दिला जाण्याची बाब होती..त्यासाठी स्पर्धाही असेलच आणि एकमेकांची असूयाही!

मानवी देहात येऊन आणि मानवी देहाला अनिवार्य असणारे भोग भोगून जगासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ झालेल्या चिरंजीवी  संतांना त्यांच्या जीवनकालात पालखीचा लाभ झाला असेल की नाही,कोण जाणे! 

परंतू, अवतार समाप्तीपश्चात का असेना…पण किमान आपल्या मराठी मुलुखात तरी हा मान संतांना अत्यंत नम्रतेने प्रदान करण्याचं मराठी मनाने मनावर घेतलं हे आपले भाग्यच! 

प्रत्यक्ष महादेव हे पंढरीचे सर्वप्रथम वारकरी असल्याचं मराठी मन मानतं. तीच परंपरा कित्येक भगवदभक्तांनी अखंड ठेवली…तत्कालीन सामाजिक,धार्मिक,व्यावहारिक आणि नैसर्गिक गोष्टींना सामोरे जात जात. 

जगदगुरू तुकोबारायांच्या कित्येक पिढ्या आधीपासून वारी होती…ती आजपर्यंत आहे. तुकोबाराय वैकुंठास निघून गेले त्यावेळी त्यांची भार्या आवली उर्फ जिजाबाई पाच-सहा महिन्यांच्या गर्भार होत्या…त्यांच्या पोटी नारायण आले! नारायण महाराज. धाकुटे तरी आध्यात्मिक अधिकार तोलामोलाचा. आकाशाएवढे जन्मदाते लाभलेले नारायण महाराज. पण त्यांना पित्याचा सहवास लाभू शकला नाही..! पंढरीच्या कित्येक येरझारा घातलेल्या आपल्या वडिलांच्या पादुका..चरणपादुका त्यांना शिरोधार्य होत्या. नारायण महाराजही पंढरीची नित्याची वारी धरून होते…एकेदिवशी त्यांच्या मनाने घेतलं….पित्यासोबत वारी केली तर? 

 काळ मुघली आक्रमणाचा होता…तरीही हे धाडस केले नारायण महाराजांनी….छत्रपती श्री संभाजी महाराजांचा पाठिंबा होताच…साजेशी पालखी सजवली…तुकोबारायांच्या पादुका पालखीत घातल्या….पण खुद्द तुकोबाराय स्वत:ला जाहिरपणे (आणि स्वत: विशिष्ट अधिकार प्राप्त केल्यावरही) पायीची वहाण म्हणवून घेत असतील तर ते  एकट्यानं पालखीत बसले असते?…कदापि नाही! राजस सुकुमार ज्ञानियांचा ‘राजा’ असलेल्या माऊलींना त्यांनी प्रथम मान दिला असता…! जेष्ठ शुद्ध सप्तमीस नारायण महाराजांनी पालखीसह प्रस्थान ठेवले! त्या दिवशी देहूत मुक्काम ठेवून दुसरे दिवशी अष्टमीस तुकोबारायांची पालखी अलंकापुरीस नेली…देहू आणि आळंदी हाकेच्या अंतरावर..मोठ्या भक्तीभावाने माऊलीस समाधीतून क्षणभर जागृत केले…तुम्हीही चला तुकोबांसवे…तुम्हां दोघांच्या नामगजरात चालू आम्ही पंढरीची वाट! ज्ञानोबा-तुकाराम! ज्ञानेश्वर माऊली..ज्ञानराज माऊली तुकाराम! हा मंत्रच! माऊली गोड हसल्या…नारायण तर तुकोबारायांचे मूल..मुलाचा हट्ट पुरवला पाहिजे…! वैय्यक्तिक पातळीवरचा परमार्थ सार्वजनिक जीवनात आणून क्रांती घडवणा-या ज्ञानोबारायांस वारकरी भक्तांसवे वाटचाल करण्याची कल्पनाच भावली असावी….ज्ञानराज आपल्या वैभवासह पालखीत विराजले….नामाचा एकाच कल्लोळ उठिला….ज्ञानबा! नारायण महाराजांनी पित्याच्या नावाच्या आधी ज्ञानोबारायांचे नाव उच्चारले आणि मग तुकोबारायांचे ! एक आनंदपर्व आरंभले होते…भक्तीगंगेचा उगम ज्ञानोबा-तुकोबा हे दोन थेंब असले तरी ते थेंब जनसागरात मिसळून गेले आणि त्यांच्या अमृतस्पर्शाने सागर महासागर झाला…अध्यात्माचा,नैतिकतेचा,निर्मल,कोमल भगवदभक्तीचा अथांग महासागर! या सागरावरून वाहत येणा-या वा-याने संगे उत्तम आचरणाचे बाष्प वाहवून आणले…आणि उभा महाराष्ट्र चिंब होत राहिला! 

हा क्रम सुरू राहिला काही काळ…बदल हा कालाचा स्थायीभाव. या एकात्म परंपरेत खंड पडला काही कारणाने…देहू आणि आळंदी यांचे पंढरीला जाण्याचे मार्ग भिन्न झाले…पण गंतव्य मात्र तेच राहिले…श्री विठ्ठल! 

थोर भक्त हैबतबाबा चाफळकर अलंकापुरीस वास्तव्यास आले आणि इथलेच झाले…महापूर आला तरीही त्यांनी माऊलींस अंतर दिले नाही…पुढे आषाढी जवळ आली…त्यांनी ज्ञानोबारायांच्या पादुका स्वतंत्र पालखीत ठेवल्या…अल्पावधीतच वैभव वाढले…आणि कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदीहून स्वतंत्र प्रस्थान ठेवू लागले…पण तिथी मात्र तीच राखली…अष्टमी! आणि नामगजरही तोच…ज्ञानबा तुकाराम…ज्ञानोबा-तुकाराम! दोन्ही कडील वारकरी हरिपाठ गातात तो माऊलींचाच…आणि विशेषत: अभंग मात्र तुकोबारायांचे! अर्थात दोघांच्याही सोबतीला नामदेवमहाराज, एकनाथमहाराज,निळोबाराय होतेच…मुक्ताई होत्या,जनाई होत्या…अवघे संतनभोमंडळ होते आणि आजही असतात!  

आधी एकाच मार्गावरील भाविकांना दर्शनाचा लाभ होई…आता दोन वेगवेगळ्या मार्गांवरील भाविकांस हा लाभ मिळू लागला. तुकोबारायांसोबतची वाटचाल आरंभी ज्ञानोबारायांच्या वाटचालीपेक्षा कठीण होती…पण आता दोन्ही मार्ग वैभवसंपन्न झाले आहेत….नारायण महाराज यांनी आरंभ केलेला हा ज्ञान-वैराग्य-आनंद सोहळा मोग-यासारखा बहरला आहे…आपण फुले वेचतो न वेचतो तोच पुन्हा वेल कळ्यांनी बहरू लागलेली  असते…हा सुगंध महाराष्ट्राच्या कणाकणात असाच घमघमत राहो…ही ज्ञानोबा-तुकोबांच्या चरणी विनम्र प्रार्थना….नारायण महाराज आणि हैबतबाबांच्या चरणी वंदन…रामकृष्णहरि! ज्ञानोबा….तुकाराम….ज्ञानराज माऊली तुकाराम! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  इंद्रधनुष्य ☆ झाशीवाली शौर्य शालिनी ! – भाग – १ – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

? इंद्रधनुष्य ?

झाशीवाली शौर्य शालिनी ! – भाग – १ – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

१८ जूनची सकाळ. आज सूर्याला शेवटचं अर्घ्य ! दामोदरला अलगद बाजूला करून राणी लक्ष्मीबाई निघाली. तोच करारी पोशाख, डोळ्यात निखारे, मनात अतूट निर्धार आणि चित्तात कमालीची स्थिरता! ती जय –पराजयाच्या खूप पुढे निघून गेली होती. १३ मार्च १८५४ रोजी या रणलक्ष्मीनं झाशीच्या दरबारात बुंदेलखंडाचा राजकीय प्रतिनिधी मेजर रॉबर्ट एलिस याच्यासमोर गर्जना केली होती, ‘मेरी झाँसी नही दूँगी!’ ती होती अन्यायाविरुद्ध ललकार, ती होती रक्तातली स्वातंत्र्याची उपजत उर्मी !

“Is Jhansi Rani overrated? Why is she so glorified?” असं सहजपणे विचारणाऱ्या व्यक्तींनी तिचा संघर्ष अवश्य अभ्यासावा आणि या वाक्याचं उत्तर शोधावं. “मोठी झाशीची राणीच लागून गेलीस!” असं एखाद्या धीट मुलीला आजही अगदी सहजपणे म्हंटलं जातं. किती पिढ्या उलटल्या तरी लहान मुली चंद्रकोर,मोत्याची माळ मिरवत झाशीची राणी होऊन स्पर्धेसाठी उभ्या रहातात! असं काय होतं या वीरांगनेत की तिचं धाडस या भारताची ओळख म्हणून गौरवलं गेलं?आघाडीवर राहून सक्षमपणे सैन्यनेतृत्व करणारं लक्ष्मीबाईचं शौर्य हे केवळ प्रासंगिक किंवा परिस्थितीवश आलेलं नव्हतं. तर अगदी बालपणापासून तिच्या चारित्र्यात, तिच्या निर्णयांमध्ये ते दिसून येतं. त्याला सखोल आणि ठाम अशी भूमिका होती. तिची आंतरिक शक्ती,तिचं आत्मबळ तिच्या शौर्यातून प्रकटलेलं दिसून येते. तिचे शब्द अंतस्थ प्रेरणा होऊन सैनिकांचं मन,मनगट बळकट करत असत.

महाराज छत्रासालांकडून थोरल्या बाजीरावांकडे १७२९ साली झाशीची सुभेदारी आली. पुढे पराक्रमी सरदार रघुनाथ हरि नेवाळकरांच्या अथक मेहनत आणि दूरदृष्टीतून झाशी समृद्धीच्या शिखरावर पोहोचली. १८१७ साली पेशवाईचे सगळे अधिकार संपुष्टात आले तेव्हा इंग्रजांनी झाशीला वंशपरंपरागत पद्धतीनं ते सांभाळण्याची परवानगी दिली होती.

पेशव्यांच्या पदरी दिवाणी कामकाज करणाऱ्या मोरोपंतांची ही कन्या मनुबाई (मनकर्णिका) गहू वर्णाची, सुविद्य,संस्कृत साहित्यात विशेष रमणारी, शस्त्रविद्यापारंगत होती. देहयष्टी फार मजबूत नव्हती, पण अंगी साहस मात्र दुर्दम्य! १८४२ साली या तेजस्वी युवतीचा गंगाधरपंतांशी विवाह झाला कर्तव्यबुद्धीला जणू अधिकारांची जोड मिळाली. नेवाळकरांची कुलस्वामिनी महालक्ष्मी. म्हणून तिचं नाव ठेवलं ‘लक्ष्मीबाई’! स्वतंत्रपणे प्रजेसाठी निर्णय घेत त्यांच्यात ती सामावून गेली. तिचा हळदीकुंकू कार्यक्रम राजपरिवारापुरता मर्यादित न ठेवता झाशीतल्या समस्त स्त्रिया, तरुणी यांनाही तिनं सामावून घेतलं. एकमेकींना हळदी कुंकू लावणारे हे हात राणीसाठी एक दिवस शस्त्रं चालवणारे सामर्थ्यशाली हात झाले!

अवघी चार वर्षांची असतांना झालेला मातृशोक, तान्ह्या पुत्राचा वियोग आणि पाठोपाठ गंगाधरपंतही १८५३ साली निवर्तले. अशा किती आघातांना सोसून ती पुन्हा उभी राहिली. तत्कालीन समाजावर रूढीचा घट्ट पगडा असतानाही राणीनं केशवपन करून लाल अलवण नेसण्यास ठामपणे नकार दिला. स्वतःचा राजधर्म जाणत दत्ताकपुत्र दामोदरला मांडीवर घेऊन तिनं प्रशासन हाती घेतलं. इंग्रजांनी अखेरीस झाशी किल्ला, खजिना सगळं ताब्यात घेतलं तरी पुन्हा झाशी आपल्याकडे येणार ही केवढी तिची दृढ इच्छाशक्ती !

इ. स. १८५७ मध्ये जागोजागी भारतीय सैन्यात स्वातंत्र्य समराचा वणवा पसरू लागला. झाशीजवळ नैगांग या लष्करी ठाण्यात सैन्यांनं मोठं बंड पुकारलं. 

‘खुल्क खुदाका |मुल्क बादशाह का |अंमल रानी लक्ष्मीबाईका ||’

ही घोषणा सर्वदूर पसरली. अनेक इंग्रज अधिकारी मारले गेले. या धुमश्चक्रीमध्ये योग्य संधी बघून राणी लक्ष्मीबाई प्रजेला अभय देत पुन्हा झाशीच्या सिंहासनावर आरुढ झाली. फितूर झालेल्या भाऊबंदाना तिनं कैदेत टाकलं. सैन्यासह चालून आलेल्या नत्थेखानाला अद्दल घडवून परत पाठवलं. झाशीनं कात टाकली. बाजारपेठा फुलल्या! सैन्य सशक्त झालं, तोफा बुरुजांवर चढल्या. दारुगोळ्याचा कारखाना सुरू झाला.

राणीचं व्यक्तिमत्व फार अलौकिक होतं. पहाटे व्यायामापासून तिचा दिवस सुरू होत असे. हीच पळत्या घोड्यावरमांड टाकून भाला फेकणारी वीरश्रीयुक्त सुस्नात काया शुभ्र वस्त्रात व्रतस्थ होऊन धर्माचरण करे तेव्हा ती मूर्तिमंत सात्विकता वाटे! तर दरबारात पायजमा, अंगात गडद रंगाचा अंगरखा, डोक्यावर केशरी रंगाची रेशमी रत्नजडित टोपी, त्यावर बांधलेली सुंदर बत्ती, कमरेला जरीचा दुपट्टा आणि त्याला लटकवलेली रत्नखचित तलवार असा एका राज्यकर्तीला शोभेल असा कडक पोशाख आणि करारी मुद्रेनं ती वावरत असे. अतिशय स्पष्टपणे आज्ञा देत ती दिवाणी,फौजदारी खटले ऐकून न्यायदान करणारी ती एक कुशल प्रशासिका होती.

एक प्रभावी सेनापती म्हणून राणीच्या सैन्यात शिस्त, अनुशासन होतंच पण त्याला भावनेचा स्पर्शही होता. युद्धानंतर सैनिकांचे घाव स्वतः बांधण्यासाठी ती जातीनं उपस्थित असे. त्यांच्या कामगिरीवर खूश होऊन त्यांना पदके देऊन गौरवणं, संकटात घाबरून न जाता सैन्याला खंबीर करणं असे असंख्य गुण तिला सेनापती म्हणून वेळोवेळी सिद्ध करतात. या ओळी प्रसिद्ध होत्या –

 जिन्ने (जिसने) सिपाही लोगोंको मलाई खिलाई l

आपने (स्वतः) खाई गुडधानी – अमर रहे झांसी की रानी |

– क्रमश: भाग पहिला 

लेखिका : मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)

प्रस्तुती : जुईली केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अन्नपूर्णा – लेखिका : सुश्री पूजा साठे पाठक ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ क्षणभर – लेखिका : सौ. कांचन दीक्षित ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

हल्लीच्या काळात चोवीस म्हणजे तसं फारच लवकर लग्न झालं होतं तिचं. कोकणातल्या एका गावात , खटल्याच्या घरात राहत असलेली ती. माहेरी नारळी पोफळीच्या बागा, अस्सल हापूस दारात आणि घरामागे समुद्राची गाज. एकत्र कुटुंब असल्याने तिला भरपूर लोकांची सवय होतीच पण घरात लहान असल्याने स्वयंपाक घरात जायची फार वेळ आली नव्हती. 

तिचं लग्न होऊन ती गेली जवळच्याच गावात. अंतराने जवळ असलं तरी शेवटी दुसरं गावच. इथे प्रत्येक गावाची वेगळी पद्धत. नवीन गावाहून आलेल्या मुलीला बघायला पुर्ण गाव येणार आणि बायका अगदी बारीक निरखून बघणार तिला. कोणी कौतुकाने, कोणी असुयेने तर कोणी असच मायेने. 

लग्नानंतर आलेला पहिलाच सण गुढी पाडव्याचा. दोन दिवस आधी बेत ठरला. गोणीतून समान काढून झालं. आंब्यांची रास लागली. दुसऱ्या दिवशी कोणी कधी उठून काय काय करायचं याची उजळणी झाली. ती नवीन नवरी असल्याने तिला अर्थात च लिंबू टिंबू कामे दिली होती, पण ही लगबग तिला नवीन नव्हती. 

जसा पाडवा जवळ आला तशी ती वेगळ्याच चिंतेने ग्रासली. ते एकमेव कारण ज्यामुळे तिला या पंक्ती च जेवण अजिबात आवडत नसे, ते म्हणजे बायकांची पंगत बसेपर्यंत होणारी उपासमार!

लहान होती तेव्हा मुलांच्या पंगतीत तिचं जेवण व्हायचं, पण मोठी झाल्यावर तिलाही थांबावं लागायच च. सकाळपासून तयारीची गडबड, स्वयंपाक घरातल्या धुराने चुरचुरणारे डोळे, वाढताना वाकून वाकून दुखायला लागलेली कंबर याने ती अगदी वैतागून जायची. बायकांची पंगत बसायला जवळ जवळ चार वाजायचे, मग समोर यायच्या गार भजी, उरलेल्या मोडक्या कुरडया, तळाशी गेलेला रस आणि कोमट अन्न. कितीही सुग्रास असलं तरी दमल्याने, भूक मेल्याने आणि गार अन्नाने तिची खायची इच्छा मरून जायची.

तिथे तरी आई मागे भुणभुण करता यायची. इथे? भूक तर सहन होत नाही आपल्याला, मग काय करायचं? असो, होईल ते होईल म्हणत ती झोपी गेली. 

सकाळी पाच वाजता बायका उठल्या. अंगणात सडा पडला, दोन धाकट्या नणंदा रांगोळी काढायला बसल्या. सगळ्यांना चहा फिरला आणि बायका जोमाने स्वयंपाक घरात कामाला लागल्या.चटणी , कोशिंबीर, पापड, गव्हल्यांची खीर, कुरडया, भजी , कोथिंबीर वडी,बटाटा भाजी,मटकी उसळ, पोळ्या, पुऱ्या, वरण भात , रस, रसातल्या शेवया आणि नावाला घावन घाटलं. पटापटा हात चालत होते. फोडण्या बसत होत्या. विळीचा चरचर आवाज येत होता. खमंग वास दरवळत होते. 

हिने दोन चार सोप्या गोष्टी करून मदत केली.अध्येच पोहे फिरले. वाटी वाटी पोहे असे काय पुरणार? पण पोटाला आधार म्हणून खाल्ले.

बारा वाजत आले. नैवेद्याचे ताट तयार झाले. देवाचा , वास्तूचा, गायीचा, पितरांचा नैवेद्य वाढला गेला.

आता पंगती बसणार! ती तयारीतच होती. माजघर पुन्हा एकदा केरसुणीने स्वच्छ झाले. ताटे मांडली, रांगोळ्या घातल्या गेल्या. पोरी सोरींनी लोटी भांडी ठेवली. 

मुलांची पंगत बसली. अर्धेमुर्धे खाऊन मुले उठली. तिने खरकटे काढले आणि माजघर पुसून घेतले. पुन्हा ताट मांडली, रांगोळ्या काढल्या.

आणि आतून सर्व पुरुष मंडळी आत आली. “चला सर्व अन्नपूर्णा !” आजे सासर्ऱ्यांचा दमदार आवाज आला तशा सगळ्या जणी बाहेर आल्या. “बसा पानावर” ते म्हणाले.

ही गांगरलीच ! हे काय वेगळंच? आता पुरुष मंडळींची पंगत असते ना?

पण सगळ्या बायका जाऊन पानावर बसल्या. हिलाही सासूबाईंनी हाताने खूण केली. ही पण अवघडून एका पानावर जाऊन बसली.

आजे सासर्ऱ्यांनी तिथूनच सर्वांना नमस्कार केला आणि पान सुपारी ठेवली.

“आज काय आणि रोज काय, पण या अन्नपूर्णा आपल्यासाठी जेवण रांधतात आणि आपल्याला गरम जेवू घालतात. म्हणून आजचा मान त्यांचा. त्यांनी केलेले गरम अन्न आधी त्यांना मिळावे म्हणून हा खटाटोप. अर्थात तो गरम घास आधी आपल्याला मिळावा हीच त्यांची धडपड असते पण आज आपण त्यांना आग्रह करायचा. सूनबाई, तुला माहित नसेल म्हणून सांगतो” ते तिच्याकडे बघत म्हणाले “तुझी आजे सासू एकदा अशीच उपाशी पोटी चक्कर येऊन पडली सणाच्या दिवशी. तेव्हा कुलदेवी स्वप्नात येऊन म्हणाली की जी अन्नपूर्णा राबते ती उपाशी राहून कशी चालेल? तेव्हापासून प्रत्येक पंगत ही पहिली मुलांची आणि दुसरी बायकांची असते आपल्याकडे!”

ती स्तिमित राहून ऐकत होती. 

इतक्यात खड्या थरथरत्या आवाजात “वदनी कवळ घेता” सुरू झाले. “रघुवीर समर्थ” चा घोष झाला आणि जेवणं सुरू झाली. मागून मुलं, पुरुष एक एक वाढायला आली. आग्रह कर करून भजी, रस वाढला जात होता. ती अजूनही धक्क्यातच होती ! गरम गरम पोटभर जेवण झालं आणि आपसूकच तिच्या तोंडून उद्गार निघाले

“अन्नदाता सुखी भव !”

लेखिका : सुश्री पूजा खाडे पाठक

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मागण्या आणि मागण्या… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

मागण्या आणि मागण्या ☆ सौ कल्याणी केळकर बापट

काही गोष्टी करायला खूप सहज सोप्या असतात तर काहीं गोष्टी ह्या करण्यासाठी खूप अवघड असतात. ह्या काही गोष्टींमधील एक गोष्ट म्हणजे “मागण्या”. मागण्या करणं खूप सोप्प पण मागण्या पूर्ण करणं हे जरा अवघड काम. खरंतर मागण्या करणं आणि मागण्या पूर्ण करणं ह्या वाक्याममधे फक्त एका शब्दाचा फरक, पण अर्थाने मात्र दोन शेवटची टोकं.

आपलं सगळ्यांचंच लहानपण, हे मोठ्यांनी जे शिकविलं ते  आज्ञाधारक पणे शिकायचं , नुसतचं शिकायचं नाही तर ते आपल्याला आचरणातपण आणावचं लागायचं,ह्यात गेलयं.सरसकट सगळ्या भावंडांमध्ये एखादा अपवाद वगळता बाकी सगळे मुकाट्याने पटो की न पटो पण सांगितलेले निमूटपणे स्विकारायचे.एखाद्यामध्ये मात्र थोडीफार हिंमत,  धमक असायची मग ते भावंड जरा बंडखोरी करुन  हवं ते मिळविण्यासाठी आपली बाजू हिरीरीने मांडायचे .थोडफार फडफडल्याने कधी त्या बंडखोर व्यक्ती च्या मनासारखं व्हायचं तर कधी मात्र नजरेच्या धाकाच्या जोरावर वा चौदाव्या रत्नाचा प्रसाद देऊन मोठी वडील माणसं त्या प्रश्नाचा,त्या समस्येचा निकाल लावतं.

ह्या सगळ्या समस्येच मूळ म्हणजे “मागण्या”हेच असायचं.प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या भूमिकेतून अगदी योग्यच असतो.आमच्या लहानपणी आजुबाजूचे,परिसरातील,

नात्यातील,परिचीत आणि मैत्रातील बहुतेक सगळ्या कुटूंबांची एकूणच आर्थिक परिस्थिती,जीवनमान,स्तर हे अगदी थोड्याफार फरकाने पण सारखचं होतं.त्यामुळे एकूणच सर्वांचा राहणीमानाचा दर्जा हा जवळपास सारखाच होता. त्यामुळे परस्परांत दरी,विषमता ह्याची धग कधी फारशी जाणवलीच नाही.

मग अशा वेळी मागण्या वा डिमांड पुरविल्या गेल्या नाहीत तर अचानक आपल्याला डावलल्या गेल्याचं फील यायचं,उगाचच फक्त आपल्यावर अन्याय झालायं असा गैरसमज मनात ठाण मांडून बसायचा.वास्तविक पाहता आईवडील, पालक वा वडीलधारी मंडळी त्यांच्या जागी अगदी योग्यच असायची.तेव्हा आम्ही मागण्या करायचो,बंडखोरी करायचो पण आमच्या अल्लड, अजाणत्या वयातचं बरं का.जसजसं वयं वाढलं,परिपक्वता वाढली तसतसं अडचणीच्या काळात, आणीबाणीच्या काळात किंवा एखादं रोगराई सारखं अचानक अस्मानी संकट अंगावर येऊन पडल्यास मोठ्यांना, पालकांना वेठीस धरू नये एवढी जाण,समज तश्या फारशी पाचपोच नसलेल्या वयातही कोठून आणि कशी आली ते आमचं आम्हालाही कळलं नाही.

महिना अखेरचे दिवस हे पालकांचे सत्वपरीक्षेचे दिवस असतात हे अनुभवाने आम्हांला पाठ झालं होतं.खरचं जेथे घर चालवितांना एवढ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं,परिवारातील सगळ्यांची मर्जी सांभाळावी लागते तेथे कोणीही सत्तेवर असलं तरी सत्तेवर असलेल्या कोणाही साठी अगदी सत्वपरीक्षेचाच काळ असतो हे पण खरं.

पालकांच्या अडचणीच्या काळात,प्रमुख आलेल्या आपत्तीकडे कानाडोळा करुन त्यांच्या मागे मागण्यांच तुणतुणं वाजवून त्यांना पिडू नये,बेजार करु नये ही जाण,हा शहाणपणा आम्ही लहान असलो तरी सगळ्यांजवळ होता.जी समज लहानवयात येऊ शकते ती समज, ते शहाणपण निव्वळ सत्तेसाठी , एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी मोठ्यांजवळ नसावं ह्यांच खरचं वैषम्य वाटतं.

अगदी आपण करीत असलेल्या मागण्या आपल्या दृष्टीने खरोखरच योग्य आहेत हे शंभर टक्के आम्हाला कळलेले असले तरीही आम्ही लहान असूनही

परिस्थितीचा,पालकांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचो,त्या पोशिंद्यांचा विचार करायचो आणि आता परिस्थिती कोणती,संकटाची तीव्रता किती हे सगळं कळूनही निव्वळ दुराग्रह, अट्टाहास ह्याला प्राधान्य देऊन,स्वतःतील”मी”ला खतपाणी घालतं,कुरवाळत बसणं खरोखरच योग्य आहे का, ह्याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आलेली आहे.

शेवटी काय तर पालक असो वा सरकार त्यांच्याकडे आपल्याला काही मागण्या करायच्या असल्यासं त्या मागण्यांसाठी  आपण वेळकाळ पहाणं खूप गरजेच आहे जरी आपल्या मागण्या अगदी रास्त असतील तरी.सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात पालकांना तसेच जे जगावर अस्मानी महामारीचे संकट आले असतांना ते आरक्षण वगैरे मागणे हे योग्य आहे का हे प्रत्येकाने  आपल्या सदसद्विवेकबुद्धी ला विचारुन बघावे.आपले खरे उत्तर आपल्याला आपले मनचं देईल हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “परफेक्शनिस्ट आई…” – भाग – १ – लेखक : श्री बिभास आमोणकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

??

☆ “परफेक्शनिस्ट आई…” – भाग – १ – लेखक : श्री बिभास आमोणकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

आईसाठी गाणं हेच सर्वस्व होतं. तिने अनेक प्रकारचे त्याग त्या संगीताच्या, अमृताच्या पूजेसाठी केले. ते आम्ही सारं पाहत होतो. कुणाला असंही वाटेल की, तिच्या त्या अमृतपूजेमुळे आम्हाला आमची आई कमी मिळाली. पण तिने केलेल्या अनेक गोष्टींच्या त्यागापुढे आमचा त्याग काहीच नव्हता.

आपली आई ही इतरांसारखी हाडामांसाची आई असली तरी ती इतर आईंपेक्षा खूप वेगळी आहे, याची जाणीव आम्हा दोन्ही भावांना अगदी लहानपणापासून न कळत्या वयातही होतीच. सामान्यपणे आई शाळेत सोडायला वगैरे येते तसं आमच्याबाबतीत कधी घडलं नाही. ठरावीक पातळीपर्यंत ती आमची आई असायची आणि नंतर ती इतरांसाठी बरंच काही असायची. लहानपणी आयुष्यात प्रथमच चित्रकलेसाठी बक्षीस मिळालं तेव्हा ते नेऊन आईला दाखवावं अशी खूप इच्छा होती, धावत घरी गेलोदेखील, पण नंतर लक्षात आलं आई कानपूरला गेलीय मैफिलीसाठी, ती नाहीये घरात, मग मावशीला दाखवलं. अनेकदा मावशी आणि माई म्हणजेच आजी मोगुबाई कुर्डिकर याच आमची आई झाल्या होत्या. त्यांनी आमची जबाबदारी घेतली होती. आईसाठी गाणं हेच सर्वस्व होतं. तिने अनेक प्रकारचे त्याग त्या संगीताच्या, अमृताच्या पूजेसाठी केले. ते आम्ही सारं पाहत होतो. कुणाला असंही वाटेल की, तिच्या त्या अमृतपूजेमुळे आम्हाला आमची आई कमी मिळाली, पण तिने केलेल्या अनेक गोष्टींच्या त्यागापुढे आमचा त्याग काहीच नव्हता. शिवाय कळायला लागल्यापासून ती जे काही करते आहे ते एकाच वेळेस अद्भुत आणि दुसरीकडे रसिकांना परब्रह्माची अनुभूती देणारं आहे, याचीही प्रचीती आम्हाला येतच होती. त्यामुळे ती आम्हाला इतर आईंसारखी फार वेळ नाही देऊ शकली याचं आम्हा दोघाही भावांना कधीच वैषम्य नाही वाटलं. उलट आपणही तिच्या या साधनेच्या कुठे तरी कामी यायला हवं, तिच्या त्या अमृताच्या पूजेत आमचाही खारीचा का असेना पण वाटा असावा, असं सारखं वाटायचं. ती जे काही करते आहे त्याला तोड नाही, याची कल्पना होती. समजू उमजू लागल्यापासून तर तिच्या त्या कर्तृत्त्वाचा अभिमान वाटायचा. अर्थात, तिच्या त्या अमृताच्या पूजेत आम्ही करण्यासारखं काहीच नव्हतं; तिला त्रास होणार नाही किंवा तिच्या रियाझामध्ये खंड पडणार नाही अशा प्रकारे घरातला वावर असावा, हेच आमच्या हाती होतं. ते आम्ही परोपरीने राखण्याचा प्रयत्न केला इतकंच!

आई मैफिलीच्या दौऱ्यावरून परत येण्याच्या दिवशी आम्हीही इतर मुलांप्रमाणे तिची वाट पाहत बसायचो. त्या वेळेस मुंबईत फार कमी टॅक्सीज होत्या. आमच्या घराच्या दिशेने टॅक्सी येताना दिसली, की कोण आनंद व्हायचा. मग आमच्याकडचा रामा बॅगा घ्यायला खाली उतरायचा आणि आम्ही मात्र बॅगा काढून झाल्या, की त्याच टॅक्सीत बसून केम्प्स कॉर्नरच्या त्या खेळण्यांच्या दुकानात तिला घेऊन जायचो. ती दौऱ्यावरून थकून भागून आलेली असेल, दौऱ्याचे काय कष्ट असतात ते समजण्याचं ते वयच नव्हतं. आम्ही तिच्याकडून मग खूप लाड करून घ्यायचो. केम्प्स कॉर्नरचे दुकान असल्याने खेळणी महाग असत. पण बहुधा आम्ही काही गोष्टींना मुकलोय याची जाणीव तिलाही असायची आणि मग सारं काही विसरून तीही आमच्यात मूल होऊन रमायची त्या दिवशी. मग दुसऱ्या दिवसापासून आई परत वेगळी असायची. नंतर मोठे झाल्यानंतर आम्हाला आईच्या दिवसाचं मोल अधिक कळलं होतं!

बाबांच्याच शाळेत म्हणजे गिरगावात राममोहनमध्ये असलो तरी अनेकदा राहायला माईकडे (मोगुबाई) गोवालिया टँकला आणि कधी वरळीला मावशीकडे असायचो. सुट्टीच्या दिवशी आईला भेटायचो. मे महिन्यात अनेकदा मावशीकडेच असायचो. इतर घरांमध्ये अनेकदा आई मुलांना घेऊन शिकवायला बसते. तसं आमच्याकडे कधीच झालं नाही. आई शिकवायला बसली असती तर थेट संगीतकारच झालो असतो. पण आईच्या वागण्याबोलण्यातून नकळत झालेल्या संस्कारांमुळे खूप काही शिकलो. भाऊ निहार तबला शिकला, पण मी काही संगीताकडे वळळो नाही. नाही म्हणायला टाइमपास म्हणून तबल्यावर बसायचो. दोनच ताल जमायचे- सवारी आणि योगताल! पंधरा आणि साडेपंधरा मात्रांचे हे ताल फार कमी वाजवणारे आहेत. ते बहुधा आईच्या पोटातूनच आलेल्या अभिजात संगीताच्या संस्कारामुळे साध्य झालं असावं. माई तेव्हा आईला म्हणाली होती, बिभासची लय हलत नाही. ती बहुधा आईचीच देण होती. संगीताचं शिक्षण नसल्यानं सूर नाही ओळखता येत, पण त्याचा रंग सांगता येतो. सुरांच्या रंगांचं एक पॅरामीटर असतं. ते कळतं. ते युनिव्हर्सल स्केल आहे. त्यासाठी जो कान असावा लागतो, तो आईमुळे जन्मापासूनच तयार झाला असावा.

आईच्या प्रत्येक कृतीत परफेक्शन असायचं. काम करत असतानाही तिच्या मनात बहुधा ते संगीतच रुंजी घालत असावं. बॅक ऑप द माइंड तेच सुरू असायचं हे जाणवायचंही. जेव्हापासून, म्हणजे जन्मापासून ऐकू येतंय तेव्हापासून सतत आयुष्यात परफेक्ट सूरच ऐकत आलोय. मग ते आजीचे म्हणजेच माईचे सूर असतील नाही तर आईचे. त्यामुळे संगीताचं व्याकरण सांगता आलं नाही तरी चुकलेलं कळतं आणि कुठे चुकलंय तेही नेमकं कळतं. तिने केलेली प्रत्येक गोष्ट नेमकी व परफेक्टच असायची. मग ती तिने काढलेली रांगोळी का असेना. आईला रांगोळी प्रचंड आवडायची. ती सुंदर रांगोळी काढायची, तीदेखील चार फूट बाय चार फूट अशी मोठय़ा आकारात. दीनानाथ दलालांची चित्रं आईने रांगोळीत साकारलेली आम्ही अनेकदा पाहिली आहेत. तिने काढलेली रांगोळीची रेषाही रेखीव असायची. तिच्यासारखी रेखीव रांगोळी नाही जमली काढायला कलावंत असूनही. आधी कार्डबोर्डवर चित्र चितारायची आणि मग रांगोळीत. कदाचित कार्डबोर्डवरचा तो तिचा रियाझ असावा चित्रकलेचा. आई कविताही छान करायची. त्या कवितेतील शब्दही तेवढेच जपून वापरलेले आणि नेमके असायचे. त्या शब्दांमध्ये खोलीही आहे. पण या कविता आम्हा केवळ घरच्यांनाच माहीत आहेत. बाहेर कुणाला याची गंधवार्ताही नाही.

घरात असताना आई नेहमी तिच्याच जगात असायची. रात्री अनेकदा उशिरा झोप, सकाळी साधारण चार-पाच तासांचा रियाझ. अगदी शेवटच्या दिवसापर्यंतही हे चुकले नाही. अलीकडे तर लोक विचारायचे, ‘आता या वयात कशाला रियाझ?’ त्यावर ती म्हणायची, ‘हा माझा श्वास आहे. ज्या दिवशी गाणार नाही त्या दिवशी या जगात नसेन!’ रात्री उशिरा झोपायची. अनेकदा दीड- दोन वाजायचे. त्यामुळे दुपारची झोप तिच्यासाठी महत्त्वाची असायची. कधी फार भेट झाली नाही तर खोलीत फक्त डोकावायचं. गानसमाधी लागलेली असताना तिला काहीच कळायचं नाही. पण कुणाला शिकवत असेल तर तिला लक्षात यायचं, मग बाहेर येऊन आवर्जून विचारपूस करायची. ती काही मिनिटांची तिची भेटही आमच्यासाठी खूप काही असायची.

आम्ही आईसाठी काय त्याग केला याहीपेक्षा आईने संगीतासाठी किती त्याग केला ते अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही ते सारं जवळून पाहिलंय. अप्पा जळगावकर आईच्या मैफिलीच्या वेळेस साथ करायचे. त्या काळी अनेकदा त्यांनी तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून रेल्वेप्रवास केलेला असायचा. कार्यक्रमही अनेकदा मोफतच केलेला असायचा, एखाद्या संस्थेसाठी धर्मादाय म्हणून. हे असं तिने अनेकदा धर्मादाय कार्यक्रम करणं आवडायचं नाही. तिला आम्ही नाराजीही अनेकदा सांगायचो, पण तरीही ती ते करायची. अनेकदा ती रागीट वाटायची किंवा मानी. पण विमानतळावर विमानाला उशीर झाल्यानंतरही व्हीआयपी लाऊंजमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर तिने कधी तमाशा नव्हता केला. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण तिने कधी मिरवले नाहीत. तिच्यासाठी ‘गानसरस्वती’ हाच सर्वात मोठा बहुमान होता. कधी तिने स्वत: तापाने फणफणत असताना कार्यक्रम केले आहेत, तर कधी आम्ही तापाने फणफणत असतानाही जाऊन कार्यक्रम केले. हे कार्यक्रम मिरवण्यासाठी नव्हते तर ती तिच्यासाठी अमृताची पूजा असायची, याची आम्हालाही कल्पना होती. पण याची कल्पना नसलेले रसिक मग ताई साडेनऊ वाजले तरी स्टेजवर नाही म्हणून कागाळी करायचे. कधी तिला मनासारखी वाद्यं लागलेली नसायची, तर कधी इतर काही कारण असायचं. ती परफेक्शनिस्ट होती. त्यामुळे कधी वेळ व्हायचा. हे सारं मी जवळून पाहिलं आहे.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री बिभास आमोणकर 

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 4 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 4 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

डार्कवेब बद्दल जे काही गैरसमज आहेत त्यातील एक प्रमुख गैरसमज म्हणजे, ‘डार्कवेबचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे.’ हा गैरसमज इतका प्रचलित आहे की उद्या एखाद्याने कुणाला सांगितले की, ‘मी डार्कवेबचा वापर केला आहे’, तर लगेच त्याच्याकडे कुणीतरी मोठा गुन्हेगार आहे असे बघितले जाते. किंवा मग तो खूप मोठा हॅकर असल्याचा समज करून घेतला जातो. 

आजपर्यंत कोणत्याही देशाने डार्कवेबवर बंदी घातलेली नाही. भारतात तर त्याबद्दल कोणते कायदेही नाहीत. त्यामुळे कुणी आपल्या लॅपटॉपवर टोर ब्राउजर इंस्टाल केले असेल तर तो आपल्या देशात गुन्हा नाही. ते फक्त एक साधन आहे. आपण जोपर्यंत त्यावर कोणतेही बेकायदेशीर काम करत नाही, कायद्याच्या कचाट्यात येत नाही. 

हे समजवण्यासाठी एक अगदी घरघुती उदाहरण देतो. आजकाल प्रत्येकाच्या घरात सुरी असतेच. वेगवेगळ्या आकारात ती सुपरमार्केटमध्येही मिळते. ज्यावेळी आपण तिचा वापर फळे / भाजी कापण्यासाठी करतो, ती साधन असते, पण तीच एखाद्याच्या शरीरावर चालवली तर? तर त्याला शस्त्र म्हटले जाते. वस्तू एकच आहे पण तिचा वापर काय होतो त्यानुसार वस्तूचे नांव बदलते. हीच गोष्ट डार्कवेबचा वापर करण्यासाठी बनवलेल्या टोर ब्राउजरबाबतही लागू होते. 

डार्कवेबचा वापर कायद्याने गुन्हा नाही तर लोकांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला का दिला जातो? त्याचे कारण एकच. इथे ज्या गोष्टी केल्या जातात त्यावर कोणत्याही सरकारचे नियंत्रण नसते. समोरची व्यक्ती खरी की खोटी हेही आपल्याला माहित नसते. अशा वेळी आपण फसवले जाण्याची टक्केवारी अनेक पटीने वाढलेली असते. त्यापासून वाचावे यासाठीच इथे जाऊ नये असे सांगितले जाते. तसेच काही जण अनवधनाने एखाद्या अशा साईटवर गेले, जिथे हत्यारांची विक्री होत असेल, लहान मुलांच्या अश्लील फिल्म बनवल्या जात असतील, स्त्री पुरुषांची खरेदी विक्री केली जात असेल, बंदी घालण्यात आलेल्या नशिल्या पदार्थांची विक्री केली जात असेल तर मात्र ते कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. जसे भारतात रस्तावर चालताना ‘डाव्या बाजूने चालावे हे मला माहिती नव्हते’ असे सांगता येत नाही, तसेच इथेही आहे.   

या संदर्भात अजून एखादे उदाहरण द्यायचे झाले तर, अनेक मोठ्या शहरात ‘रेड लाईट एरिया’ असतो. त्या शहरात राहणाऱ्या लोकांना ते माहितीही असते. पण अनेकदा त्याच्या जवळपास राहणारे लोक जवळचा रस्ता म्हणून त्या भागातून कायम ये जा करतात. त्यांना त्याबद्दल कुणीही विचारत नाही. पण समजा त्या भागात पोलिसांची धाड पडली आणि तुम्हीही त्या भागात सापडला, तर पोलीस तुम्हालाही त्यांच्यातील एक समजून अटक करू शकतात. अर्थात ज्यावेळी तुम्ही त्यांच्यातील नाहीत याची पोलिसांची खात्री पटेल, तुम्हाला सोडून दिले जाईल. पण ते होईस्तोवर तुम्हाला जो मनस्ताप होईल त्याचे काय? किंवा लोकांचा तुमच्याबद्दल जो गैरसमज होईल त्याचे काय? हाच विचार करून आपल्या घरचे आपल्याला सांगतात, ‘बाबारे… त्या भागात जाऊ नकोस.’ तीच गोष्ट याबाबतही आहे.

सावधानीचा इशारा : डार्कवेब वापरणे कायद्याने गुन्हा नाही, पण त्यावरचा वावर तुमची सिस्टीम हॅक होण्यास कारणीभूत ठरू शकतो. किंवा नशीब अगदीच खत्रूड असेल तर पोलिसांशी प्रश्नोत्तरेही होऊ शकतात. 

क्रमशः भाग चौथा 

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares