मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यामध्ये श्री आणि सौ गावडे हे दाम्पत्य राहात होते. दोघेही हाडाचे शिक्षक. श्रीगोंदा तालुक्यातील विविध खेडयांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थी घडवण्यात दोघांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आयुष्य घडविण्यातच त्या दोघांनाही अपार आनंद मिळायचा. 

ते १९७० चे दशक. ‘वंशाला दिवा हवाच’ असा जनू अलिखित नियमच त्या काळी खेड्यांमध्ये होता. श्री. व सौ. गावडे यांना मात्र एका पाठोपाठ एक मुली होत गेल्या. त्यात एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या या दांपत्याच्या घरातील बहुतेक थोरले लोक अशिक्षित होते. ते मुलासाठी आग्रही होते. त्यामुळे कुटुंबनियोजन शक्य नव्हते. एका पाठोपाठ एक चार मुली झाल्या. त्या काळी मुंबईत नव्याने सोनोग्राफी मशीन आल्या होत्या. कायद्या अभावी गर्भलिंगनिदान आणि स्रीभ्रुण हत्या सर्रास चालू झाली होती. मुंबईला राहणाऱ्या एका नातेवाईकाने सगळी ‘व्यवस्था’ करण्याची तयारी दोघांना दाखवली. दोघे नोकरीला असल्याने पैशांचाही प्रश्न नव्हता. पण गावडे दांपत्याने गर्भलिंग निदान आणि स्री भ्रुण हत्येला स्पष्ट नकार दिला. “अजून कितीही मुली झाल्या तरी चालतील. पण आम्ही गर्भातील मुलगी मारणार नाही.” असा ठाम निर्णय दोघांनी त्याला कळवला. त्यांना पुढे अजून दोन मुली झाल्या. अनेक नवस, उपवास, जपजाप्य, इत्यादी चालूच होते. शेवटी सहा मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाला. त्याचा जन्म नेमका गोकुळ अष्टमीला झाला. म्हणून दोघांनी मोठ्या आनंदाने आपल्या या शेंडेफळाचं नांव ‘गोपालकृष्ण’ असं ठेवलं. 

शिक्षक आई-बापाच्या पोटी जन्मलेल्या मुलाला अभ्यासांत रूची घेण्यावाचून पर्याय नसतोच. शिक्षक आई वडिलांच्या संस्कारामुळे गोपालकृष्णला अभ्यासातच रूची निर्माण झाली. पुढे बारावी बोर्डाच्या वेळी त्याने इतका कसून अभ्यास केला की त्याला पुण्याच्या प्रसिद्ध बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये ओपन गटामध्ये मेरिटवर प्रवेश मिळाला. पंचक्रोशीमधून एम् बी बी एस् च्या अभ्यासक्रमासाठी निवड झालेला तो पहिलाच विद्यार्थी होता.

एम्‌बीबीएस्‌ चांगल्या गुणांनी पूर्ण केल्यानंतर पुढे गोपालने पोस्ट ग्रॕज्युएशनसाठी स्रिरोग आणि प्रसुतीशास्र हा विषय निवडला. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये त्याचे हे शिक्षण चालू झाले. डॉ संजीव डांगरे गोपालचे पी जी गाईड आणि हेड आॕफ डिपार्टमेंट होते. त्यांची मुलगी, जान्हवी त्याच अभ्यासक्रमासाठी गोपालची ज्युनिअर म्हणून नंतर तेथे रूजू झाली. जान्हवीचे आई-बाबा दोघे मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमधून पास झालेले एम् डी गायनिक. जान्हवीचे बाबा तर एकदम कडक शिस्तीचे होते. सिस्टरची आॕपरेशन दरम्यान काही चुक झाली आणि ते ओरडले तर सिस्टरांच्या हातातील आॕपरेशनची हत्यारे गळून पडत. पण त्यांच्या कडक शिस्तीमुळे डिपार्टमेंट अतिशय चांगले चालले होते. जान्हवीच्या आई-वडिलांचे सिंहगड रोडवर स्वत:चे मोठे मॅटर्निटी हॉस्पिटल होते. तरी केवळ सेवाभावाने डॉ डांगरे कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट हेडची कायदेशीर जबाबदारी घेवून सेवा देत होते. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये स्रिरोग आणि प्रसुतीशास्र विभागात प्रचंड काम होते. गोपाल आणि जान्हवीला हॉस्पिटलमध्ये सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत एकत्र काम करावे लागे. त्यात जान्हवी खुपच सुस्वभावी होती. हळूहळू दोघांना एकमेकांचे स्वभाव आवडू लागले. दोघांमधील जवळीक वाढू लागली. जान्हवीला विचारावे की विचारू नये या द्विधेत गोपालचे सहा महिने गेले. जान्हवीने तिने नकार दिला असता आणि शांत राहिली असती तर गोपालला फार नुकसान झाले नसते. पण तिने नकार देवून ही गोष्ट तिच्या बाबांना सांगितली असती तर मात्र गोपालची काही खैर नव्हती. शेवटी हिंमत करून गोपालने घाबरत घाबरत जान्हवीला विचारलेच. जान्हवीने त्याला चक्क “हो” म्हटले. गोपालला आभाळ ठेंगणे झाले. पण जान्हवीची एक अट होती. “माझ्या आई वडिलांना आम्ही दोघी मुलीच आहोत. मला त्यांची शेवटपर्यंत काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मी पुणे सोडणार नाही.” गोपालला कुठे तरी सेटल व्हायचेच होते. पुणे उत्तमच होते. त्यामुळे शेवटी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही घरातील थोरांच्या संमतीने लग्न पार पडले.

पुढील शिक्षण घेताना दोघांनाही डॉ लाला तेलंगासारख्या हाडाच्या शिक्षकाचे मार्गदर्शन मिळाले. गोपालसाठी डॉ लाला तेलंग शिक्षक तर होतेच, पण त्यापेक्षा जास्त ते त्याचे श्रद्धास्थान होते. डॉ लाला तेलंगाचा गोपालवर खास जीव होता. डॉ लाला तेलंगांनी गोपाल नावाच्या दगडाला ख-या अर्थाने घडवले. डॉ लाला तेलंगांमधील हाडाचा शिक्षक, गोपालची त्या शिक्षकावरील निस्सीम श्रद्धा, दोघांच्या एकमेकांबद्दलचा स्नेह या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या. त्यामुळे डॉ लाला तेलंगांनी दोन वर्षात सांगितलेला एक एक शब्द गोपालच्या मेंदूत अक्षरशः कोरला गेला. डॉ लाला तेलंगांनी गोपाळच्या मेंदूवर “Prevention is better than cure” या नियमाचे संस्कार वारंवार केले. 

यथावकाश गोपाळचे हे पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण झाले. त्याने सिंहगड रोड वर ” गुरूदत्त वेल वुमन क्लिनिक” नावाने ‘प्रिव्हेंटिव्ह हेल्थ  चेकअप सेंटर’ चालू केले. वेगवेगळ्या कँसरच्या तसेच इतर ‘सायलेंट किलर’ आजाराच्या तपासण्या करण्यासाठी वेगवेगळ्या मशिन त्याने विकत घेतल्या. अतिशय कमी दरामध्ये सर्व ‘रिकमेंडेड टेस्ट’ एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात हा  त्याचा प्रयत्न होता. पण या सर्व प्रकाराला लोकांकडून अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. त्याने पदर पैसे खर्च करून वेगवेगळ्या माध्यमामधून लोकांशी संवाद सुरू केला. त्याला अनेक विचित्र प्रतिक्रिया मिळाल्या. 

“ मी फिट आहे. मला तपासण्यांची काय गरज?”

“ मला कसलाही त्रास नाही. मग उगाच तपासणी कशाला?”

“ आजार झाल्यावर पाहू की ! आत्ता उगाच खर्च कशाला?”

“ काही निघाले मग? उगाच गोळ्या औषधांचा मारा चालू होईल !”

“ उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला? “

“ आजकालचे डॉक्टर कॅन्सरसारख्या आजारांची भीती घालून लोकांना उगाच तपासण्या करायला लावतात.”

अगदी गोपालच्या स्वतःच्या घरातील लोकही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक अप करून घ्यायला तयार होत नव्हते. या सर्व प्रकारांनी तो थोडा निराश झाला…….

होय, ही माझीच सत्यकथा आहे.

डॉ लाला तेलंग यांच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकताना “डॉक्टरने ‘रिॲक्टिव्ह’ नव्हे, तर ‘प्रोॲक्टिव्ह’ राहायलाच हवे” हे बाळकडू सरांकडूनच मिळाले होते. पण प्रत्यक्षात आपला समाज मात्र  आरोग्याच्या बाबत कमालीचा उदासीन अन्‌ ‘रिॲक्टिव्ह’ आहे. कुठलेही दुखणे भरपूर काळ अंगावर काढल्यानंतर अगदी असह्य झाले आणि इतर काहीच उपाय चालेनासा झाला की त्यानंतर नाईलाजास्तव लोक डॉक्टरकडे जातात. अशा वातावरणात काही त्रास होत नसताना डॉक्टरांना भेटने आणि तपासण्या करून घेणे लोकांच्या पचनी पडले नाही. या परिस्थितीत डॉक्टरने तरी ‘प्रो-ॲक्टिव्ह’ असावे. तेच समाजाला प्रेव्हेंटिव्ह हेल्थ बाबत ज्ञान देवून शहाणे करू शकतात. याच प्रेरणेने मी स्वत:चे पहिले ‘वेल वूमन क्लिनिक’ सुरू केले होते. पण घरातूनही टेस्टसाठी विरोध होत होता. ‘ मेडिकल टेस्ट रिपोर्ट करणे टाळायचे ’ ही ९९.९९ टक्के लोकांची मूलभूत प्रवृत्ती असते हे मला जाणवले.

— क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कल्हईवाला… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ कल्हईवाला… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

बालपणीच्या आठवणी जागवणारी एक व्यक्ती आहे. मी लहान असताना आमच्या घरासमोर एक कल्हईवाला बसायचा.कल्हई म्हणजे पितळी भांड्यांना शुद्ध कथिलाचा पातळ लेप लावणे.

रोज भांड्याचा ढीग त्याच्या पुढे असायचा आणि त्याची कारागिरी बघणे हा आमचा आवडता उद्योग.काम करता करता तो गाणी म्हणायचा, गप्पा मारायचा.त्याचे ते भांडे लाल लाल तापवणे त्यात ती चमकदार काडी थोडीशीच लावणे आणि जादू केल्या प्रमाणे भांडे चकचकित करणे हे बघणे फार आवडायचे.

सगळ्या गावाची भांडी त्याच्याकडे येतात याचा त्याला फार अभिमान असायचा.बघ मी सगळ्यांचे आरोग्य कसे छान ठेवतो म्हणायचा. त्याचा आविर्भाव कोणत्याही राजा,डॉक्टर पेक्षा कमी नसायचा.त्याचे महत्व आत्ता पटत आहे.

या लेखाच्या निमित्ताने मी हे महत्व सांगण्याचा एक छोटा प्रयत्न करणार आहे.जे माझ्या वाचनात आले.काही मोठ्या जाणत्या लोकांकडून समजले व काही अनुभवाने समजले.शुद्ध कथिल विषारी नसते.त्यात लोणचे,दही कळकत नाही.

कल्हई साठी कथिल वापरले जाते ते आपल्या शरीराला खूप आवश्यक असते.सध्या तेच मिळत नसल्याने बऱ्याच आजारांना तोंड द्यावे लागते.

‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल  हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’

हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बऱ्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे?

२०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कल्हई केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती. तेव्हा स्टेनलेस स्टील,

ॲल्युमिनियम, कोटिंग केलेली भांडी नव्हती. पितळेच्या भांड्याला कल्हई करून वापरली जात होती. त्यामुळे कल्हईच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही.

कथिल शरीराला मिळत नाही. मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागताच चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना शौचास साफ होऊ लागली. शरीरातील घाण बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.

या मुळे पुढील फायदे होतात.

१ पिंपल्स कमी होणे

२ पित्ताचा त्रास कमी होणे

३ मधुमेह खूप कमी होणे

४ पोट साफ होणे

५ दम लागणे बंद होते

६ पंडुरोग नष्ट होणे

७ कृमी नष्ट होणे

८ शरीर शुद्धी होणे

पूर्वी असे आजार दिसत नव्हते.

याला अजूनही कारणे आहेत पण लेखाच्या अनुषंगाने आज कल्हईचे महत्व माझ्या अल्पमतीने व थोड्या अभ्यासाने सांगण्याचा प्रयत्न केला.

गेली सतरा वर्षे आयुर्वेदिक डॉक्टर पितळी पट्टीला दोन्ही बाजूला केलेल्या कल्हई चे महत्व लोकांना सांगत आहेत.ही पट्टी स्टीलच्या पातेल्यात एक लिटर पाण्यात उकळून, गार केलेले पाणी पिऊन त्याचा फायदा झाल्याचे अनेकांनी सांगीतले आहे.

आमच्या पूर्वजांना ही माहिती होती. या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतःपैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का? नक्कीच नव्हते.आपल्या पेक्षा आरोग्यदायी जीवन जगत होते.

यातील पटेल ते अंगीकारावे ही विनंती आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जे. पी. नाईक यांना आम्ही विसरलो…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “जे. पी. नाईक यांना आम्ही विसरलो…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

५ सप्टेंबर हा जे .पी. नाईक यांचा जन्मदिवस असतो. पण राधाकृष्णन यांचे स्मरण होताना जे पी नाईक यांची कोणीसुद्धा आठवण काढत नाही. युनेस्को’ने गेल्या २५०० वर्षांतील जगातल्या शंभर शिक्षणतज्ज्ञांची यादी प्रसिद्ध केली, त्या यादीत भारतातील केवळ तीन शिक्षणतज्ज्ञांची नावे आहेत. त्यांपैकी एक महात्मा गांधी, दुसरे रवींद्रनाथ टागोर आणि तिसरे नाव जे. पी. नाईक यांचे आहे! या कीर्तीचीदेखील फारशी माहिती महाराष्ट्रला नसते.

युनेस्कोने त्यांना आशिया खंडातील प्राथमिक शिक्षण-प्रसाराची योजना तयार करण्याची विनंती केली, कराची येथे आशियायी राष्ट्रांच्या परिषदेत त्यांनी सार्वत्रिकीकरणाची विविधांगी योजना मांडली, ‘कोठारी आयोगा’सारखा गाजलेला अहवाल नाईकांनी लिहिला हे फार थोडय़ांना माहीत आहे? आजची ‘अंगणवाडी योजना’ ही नाईकांच्या अहवालामुळे सार्वत्रिक झाली.

भारतात प्राथमिक शिक्षणाच्या सांख्यिकी नियोजनाचा आणि त्याच्याशी जुळणाऱ्या प्रशासकीय व अर्थसाहाय्याच्या योजना तयार करण्याचा पाया नाईकांनी घातला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयात त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. समाजविज्ञान संशोधन परिषदेला गती देऊन त्यांनी शिक्षण, आरोग्य व शेती या भारतीय पुनर्निर्माणासाठी कळीच्या कार्यक्षेत्रांना प्राधान्य दिले.

असे अकांचन आणि साधेपणाने काम करणे ही काय नाईकांची चूक होती की काय म्हणून या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मराठी माणसाला महाराष्ट्र आज विसरला? 

किमान या वर्षीच्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाला तरी त्यांचा जन्मदिवस असतो हे लक्षात घेऊन प्रत्येक शाळा व शासकीय स्तरावर तरी नाईकांनाही अभिवादन केले जावे. 

आज मोठय़ा प्रमाणात झालेले शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या माणसाच्या खांद्यावर उभे आहे हे आपण विसरता कामा नये..

लेखक : हेरंब कुलकर्णी 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गावाकडचा पाऊस… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ गावाकडचा पाऊस… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचं बोलकं वर्णन केलं जातं.

याच शब्दांत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय,

त्याच्या पाठोपाठ म्हाताराही येऊन जाईल, 

नंतर सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल… 

हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.

पुनर्वसू म्हणजे तरुण, पुष्य म्हणजे म्हातारा, मघा म्हणजे सासू आणि पूर्वा म्हणजे सून ही नावं अनेक शतकांपासून गांवगाड्यात लागू आहेत.

मृग आणि आर्द्रा या सुरुवातीच्या दोन नक्षत्रात जो पाऊस पडतो त्या दरम्यान खरीपाचा पेरा केला की उत्तम पीक हाती येतं ही पूर्वापार धारणा होय, 

आताशा असं घडताना दिसत नाही ही गोष्ट अलाहिदा.

मृग आणि आर्द्रा ही पर्जन्याची बालरुपे समजली जातात, याच काळात मातीतल्या बीजांना अकुंरांचे रूप बहाल होते. हे कोवळे अंकुर म्हणजे पर्जन्याची बाल्यावस्था ही कल्पनाच मुळात अत्यंत रम्य आहे!   

मग या अकुंरांवर ज्याची प्रीत बहरते तो पुनर्वसूचा पाऊस! 

म्हणून तो तरणा पाऊस! 

आणि पीक जोमात आल्यानंतर त्याचा निरोप घेण्यासाठी येणारा तो म्हातारा पाऊस, म्हणजेच पुष्याचा पाऊस! 

किती भारी आहेत ही नावे! अगदी नितांत चपखल!

मघा नक्षत्रातला पाऊस असा कोसळत असतो की तरण्या विवाहितेला घराबाहेर पडताच येत नाही, तिला शेतांत धन्याच्या मागे जाता येत नाही की गावात कुठे जाता येत नाही. अशा सुनेला मग तो पाऊस सासूसारखा वाटू लागतो, चोवीस तास नजर ठेवणारा!

पूर्वा नक्षत्रातला पाऊस हा एका वेळेनुसार कोसळतो आणि ओसरतो देखील, त्याचं कोसळणं म्हणजे चपळ पर्जन्योत्सव होय. त्याची लगबग नि त्याचं कमी वेळेत भरपूर कोसळणं हे एखाद्या कामसू सुनेसारखं आहे, म्हणून तो सुनेचा पाऊस होय.

अर्थात ही केवळ नक्षत्रे लक्षात राहण्यासाठीची नावे होत, कारण हरेक स्त्रीला आधी सून व्हावं लागतं नि मग सासू बनावं लागतं, जे कुणालाच चुकलं नाही. त्यामुळे ही नावे कुणाएकीला दुखावण्यासाठी ठेवलेली नव्हती हे नक्की!

आता सध्या पुनर्वसू नक्षत्र सुरू आहे. त्यानंतर पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा आणि स्वाती अशी नक्षत्रांची रांग असेल.

या प्रत्येक नक्षत्रासाठी गावगाड्यात स्वतंत्र म्हणी आहेत ज्यांना मातीचा अमीट दरवळ आहे..  

‘पडल्या मिरगा (मृग) तर टिरीकडे बघा.’ (असं म्हणण्याचं कारण म्हणजे मृगात पेरणी होत नाही मात्र पेरणीपूर्व मशागतीची कामे केली जातात जी खूप महत्वाची असतात. जर का मृगाचा पाऊस पडला तर ही कामे खोळंबतात. परिणामी पुढच्या सर्व कामांचा विचका होतो. मग पावसाच्या मोसमाअखेरीस पोटावरून हात फिरवण्याची अनुभूती लाभत नाही. जुन्या मागच्या गोष्टीतच समाधान मानावं लागतं त्या अर्थाने टिरीकडे बघा असे शब्दप्रयोजन आहे)

‘पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा’ (आर्द्रा नक्षत्रातला पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील),

‘पडतील मघा तर चुलीपुढे हगा अन आभाळाकडे बघा’ (इथे चुलीपुढे हगा असं म्हटलेलं आहे. घरात अन्यत्र वेगवेगळ्या जागा आहेत जशा की कोनाडे, ढेलज, पडवी, अंगण, ओसरी, परस, माळवद, मोरी, सांदाडी, सज्जा, शेजघर, माजघर इत्यादी. तरीही चुलीपुढे हगा म्हटलंय कारण मघा नक्षत्राचा पाऊस इतका सातत्याने पडतो की त्याच्या जोडीने थंडीही लवकर येते. मग अडलेला माणूस आपली कामंधामं करायला घराबाहेर पडू शकत नाही मात्र थंडीपायी त्याला चुलीपुढे येऊन बसावं लागतं),

आश्लेषा नक्षत्रासाठीची म्हण – ‘मी येते सळाळा, मामाजी तुम्ही पुढिं पळा.’

म्हणजे काय ? तर आश्लेषाचा पाऊस हा आता होता आणि आता नाही अशा तऱ्हेचा असतो. तुम्ही पुढे आणि पाऊस मागे नाहीतर पाऊस पुढे आणि तुम्ही मागे असं याचं कोसळणं असतं. हा सूर ताल लावून पडत नाही आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी याची रीत !

‘पडतील पुक(पुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख’ ( असं का म्हटलंय – पुष्य नक्षत्राचा पाऊस दिवसा ढवळ्या धो धो कोसळतो. आता थांबला म्हणेपर्यंत पुन्हा संततधार सुरु होते. औताला बैल जुंपेपर्यंत आभाळ पुन्हा गळू लागतं. मग अशा वेळेस गड्याला कामाला जुंपता येत नाही. त्याच्यासाठी हा आरामच असतो, हे सुख त्याला क्वचित लाभतं ) (REPOST)

‘पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा’ आणि

‘पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती!’

या म्हणींना मातीचा गोडवा आहे आणि यात अस्सल बोली भाषेतलं जिवंत सत्व आहे!

गावाकडची मराठी शुद्ध की अशुद्ध या भानगडीत न पडता ती एक ग्राम्यबोली आहे जी आपल्या मायमराठीला सचेतअवस्थेत ठेवते आणि तिची जुनी वीण उसवू देत नाही याला मी महत्व देतो. 

शिवाय तिच्यात जी मिठास आहे ती अद्भुत आहे, तिचा लहेजा ढंगदार आणि न्यारा आहे. 

गावाकडच्या मराठीचं मातीवर आणि मातीत जन्मणाऱ्या अन मातीतच मरणाऱ्या भूमीपुत्रावर निस्सीम प्रेम आहे त्यामुळे ती अधिक जवळची वाटते यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही…   

लेखक – अज्ञात

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्न फुले… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ स्वप्न फुले… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज माझ्या स्वप्नात आलं आमचं घर, आमचं अंगण ! दारासमोर दिसला पारिजातकाचा सडा ! शुभ्र पांढऱ्या रंगाची ,केशरी देठाने सजलेली, नाजूक इवली इवली फुले सगळीकडे चांदण्यासारखी पसरली होती. नारळाच्या झाडाच्या साथीला होते प्राजक्ताचे झाड ! एरवी तसं रिकामंच दिसणारं ! पण पावसाची चाहूल लागली की बहरून येणारं ! डावीकडे होती इतर छान फुलांची झाडे ! एक मोठा कुंदाच्या झाडाचा पसारा बाजूला होता. काही वर्षे इतकी सुंदर कुंदाची पांढरी आणि मागून थोडीशी जांभळी झाक असलेली कुंदाची फुले येत होती .संध्याकाळी त्याच्या कळ्या टपोऱ्या फुगलेल्या दिसत. पण काही वेळा झाडाला दृष्ट लागते ना तसं झालं ! एवढं फुलणारं झाड..   त्याला फुलेच येईनाशी झाली ! राहिला तो मोठा झाडाचा पसारा !

बाजूलाच होता जुईचा वेल ! छोटी छोटी सुवासिक फुले ! वरच्या माडीपर्यंत वाढत गेलेला तो वेल पावसाचे दोन-चार महिने डोळ्याला आनंदित, सुगंधित करून जायचा ! त्याची इवली इवली फुले वेलीवरून घरंगळत खाली यायची आणि ती पहाताना मन मोहरून जायचे ! एक वर्ष तर अधिकाच्या महिन्यात रोज जुईचा गजरा देण्याचा नेम केला होता. सवाष्ण अगदी सुहास्य वदनाने ते वाण घेत असे. मोगऱ्याची दोन-चार झाडे उन्हाळ्यात आपल्या पांढऱ्या शुभ्र फुलांनी वातावरण आनंदित, प्रफुल्लित करून जायची ! देशी गुलाबाचं एक झाड असेच एखाद्या वर्षी बहरून जायचे ! जवळपास एखादा निशिगंधही असे. त्याचा एखादा तुरा मोरासारखा डोलत असे ! ब्रह्म कमळाचे खोड वर्षभर दिसे न दिसे, पण या पावसाच्या काळात ब्रह्मकमळाची पाच दहा फुले तरी मनाला आनंद देत असत ! तुळशी वृंदावनातील तुळस मनाला प्रसन्न करत असे. अधून मधून छोटी बटन शेवंती रुजवलेली असे तर दसऱ्याच्या दरम्यान मिळावीत म्हणून झेंडू वाढवलेला असे ! गौरीच्या दिवसात तेरडयाची पाने मिळावी म्हणून एखादं गौरीचे रोपही बागेत असे. जांभळी, गुलाबी गौरीची फुलं काही दिवसच  येत, पण बागेची शोभा वाढवत ! छोटीशी जागा पण किती तऱ्हेतऱ्हेची फुले देत असे !

मागच्या अंगणात माझ्या दिरांनी सुंदर गुलाबाची कलमे वाढवलेली होती. तसेच पेरू, चिकू, पपई यांचे एकेक झाडे होते. विशेष म्हणजे आमच्या प्लॉटवर एक आंब्याचे, एक फणसाचे, एक जांभळाचे आणि तीन नारळाची अशी मोठी झाडेही  होती. घराभोवतीचा सर्व परिसर हिरवा गार केलेला होता. छान वाटायचे झाडांच्या आणि घराच्या सावलीत !

या घराच्या सावलीत तीस-पस्तीस वर्षे राहिलो. हळूहळू मुले बाहेर पडली आणि आम्हीही बाहेर पडलो. मुलांकडे आलो. पण जेव्हा जेव्हा घराची आठवण येते तेव्हा हेच स्मरणातील घर डोळ्यापुढे येते आणि तेथील स्वप्न फुले स्वप्नासारखी  मनामध्ये उमलू लागतात !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओळखावे नव्याने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “ओळखावे नव्याने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आपल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी नुसार आपल्या सवयी बनत जातात. गाण्याची म्हणजे गाणे ऐकण्याची आवड असली की आपोआप गाणे ऐकल्यावर मन प्रसन्न होत. त्यामुळं रात्री झोपताना एक मस्त गाणं ऐकून झोपल. की झोपेचं समाधान मिळतं. सहसा ह्या गाण्यांमध्ये जुन्या आणि आमच्या काळातील गाण्यांचा समावेश असतो. अगदीं कधी मधी हल्लीच लोकप्रीय गाणं ऐकण्याचा योग आणते.

“चलो एकबार फिरसे अजनबी बन जाय हमदोनो” ह्या गाण्याची व्हिडीओ क्लीप काल बघण्यात आली. सुनील दत्त चा अभिनय आणि मालासिन्हा चे दिसणे मस्तच पण खरंतर हे गाणे लक्षात राहतं त्या गाण्याच्या बोलांनी,चालीनी,आणि त्याच्यातील खूप अर्थपूर्ण शब्दांनी.खरचं किती अफलातून कल्पना नं. आपल्या परिचीत व्यक्तीला अनोळखी समजून त्याची परत नव्याने ओळख करून घेणे.खूपदा या परत ओळखण्याने आपल्याला पहिल्यांदा न दिसलेले गुण दिसतील.कदाचित परत एकदा स्वभावाची नीट ओळख पटेल.परत एकदा एकमेकांना नव्याने ओळखू लागू.जुने काही मनात उगीचच किल्मिष असतील तर आपल्या चुकीची,गैरसमजाची जाणीव होऊन परत एकदा मने साफ होतील.

काहीवेळा अतिपरिचयाने आपण दुस-याच्या मनाचा विचार न करता एकमेकांना ग्रुहीत धरायला लागतो.ह्या परत एकदा एकमेकांना जाणून घ्यायच्या कल्पनेतून कदाचित स्वतः च्या आधी दुस-याचा विचार करायला शिकू.

          “कितीदा नव्याने तुला ओळखावे,

              स्नेहाच्या धाग्यात गुंतत जावे,

              मौनातील इशारे उमजून घ्यावे,

                        शब्दही त्यासमोर फिके पडावे ।।।

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न धरी शस्त्र करी मी… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ न धरी शस्त्र करी मी… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

कृष्ण अंधारात जन्मला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.

कृष्ण खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही…! 

अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच…

चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही. 

कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.

चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ”चालू” आहे असंच म्हणा हवं तर… चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो.

फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे…

तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा…

अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.

श्रीकृष्ण “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र ! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन…

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था

कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था

भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था

कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज…

अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसर्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो…

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥

जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार…? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल…

असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगारचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो…

रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो…कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणुत भरलो…

तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती – अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन…

म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.

कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.

श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.

श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.

आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.

कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही….!

।।जय श्रीकॄष्ण।।

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हक्क – शिक्षणाचा आणि जीवनाचाही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ हक्क – शिक्षणाचा आणि जीवनाचाही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

सन २००५, सप्टेंबर महिना. अमेरिकेतील अराकान्सास राज्याची राजधानी लिटल रॉक्समधील रॉबिन्सन शाळेचा नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. सगळी मुलं सुट्टी संपवून मित्र मैत्रिणींना भेटण्याच्या उत्साहात होती. 

इतिहास शिकवणाऱ्या मार्था शिक्षिकेच्या डोक्यात मात्र काही तरी वेगळंच शिजत होतं. मुख्याध्यापकांच्या परवानगीने, तिने तिच्या वर्गातली सर्व बाके काढून टाकली होती. वर्गात मुलं आली आणि मोकळा वर्ग बघून भांबावली. 

” मॅम, बाकं कुठे आहेत ? आम्ही बसू कशावर ?”

” त्या बाकांवर बसण्याचा हक्क तुम्हाला कसा मिळाला, हे जर तुम्ही सांगितलंत, तरच मी तुम्हाला बाकांवर बसू देईन.” 

मुलांच्या चेहऱ्यावर भली थोरली प्रश्नचिन्हं…  

“आम्ही चांगले गुण मिळवले म्हणून …” एकाने धीर करून सुरुवात केली. मार्थाची मान नकारार्थी हलली. 

“आम्ही चांगले वागतो म्हणून …” आणखी एक प्रयत्न. 

“चांगली वागणूक, चांगले गुण – या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेतच. पण बसायला बाक मिळण्यासाठी त्या पुरेशा नाहीत.” मार्था.

प्रत्येकजण आपापल्या परीने कारणं सांगत होता, पण योग्य उत्तर काही गवसत नव्हतं. 

पहिला तास संपला, दुसरा, तिसरा, चौथा. मधली सुट्टी झाली. शाळाभर बातमी पसरली, मुलांनी आपल्या आईवडिलांना कळवलं, वृत्तवाहिन्यांना या घडामोडींचा सुगावा लागला. शाळेत गर्दी जमू लागली. तर्क वितर्क होऊ लागले.

होता होता शेवटची तासिका सुरू व्हायची वेळ आली. मार्थाचे विद्यार्थी वर्गात जमिनीवरच फतकल मारून बसले होते. विद्यार्थ्यांचे पालक, पत्रकार – कोणी शाळेच्या प्रांगणात, कोणी वर्गाच्या खिडक्यांमधून आत डोकावत होते. 

“ठीक आहे. तुम्ही तुमच्या परीने योग्य उत्तरं देण्याचे चांगले प्रयत्न केलेत. आता मी तुम्हाला खरं उत्तर सांगते.” असं म्हणत मार्थाने वर्गाचं दुसरं दार उघडलं. त्या दारातून, हातात एक बाक घेऊन, एक पूर्ण गणवेशधारी माजी सैनिक वर्गात आला, त्याच्या मागोमाग आणखी एक, आणखी एक…  सैनिकांनी ते सगळे बाक व्यवस्थित लावले आणि बाजूला उभे राहिले.

विद्यार्थ्यांच्या आणि खिडकीतून डोकावणाऱ्या पालकांना – पत्रकारांना हळूहळू थोडा अर्थबोध होऊ लागला होता. 

“या बाकांवर बसण्याचा हक्क तुम्ही मिळवलेला नाहीत. तो या सैनिकांनी तुम्हाला दिला आहे. काहींनी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले असेल, काहींनी मनावर दगड ठेवून त्यांच्या तुमच्यासारख्या लहान मुलांना घरी ठेवलं असेल आणि स्वतः सीमेवर लढायला गेले असतील, बर्फ – ऊन – वारा – पाऊस यांना तोंड दिलं असेल, स्वतः बंदुकीच्या गोळ्या झेलल्या असतील, जीवलग मित्रांना वीरगती प्राप्त होताना पाहिलं असेल – यांच्या त्यागाने, निरलस सेवेने हा हक्क तुम्हाला दिला गेला आहे. आता तुमची जबाबदारी ही आहे की चांगलं शिकून, चांगलं नागरिक बनून सैनिकांच्या या उपकाराचे तुम्ही उतराई व्हाल.”

मार्थाची ही सत्य कथा इथे संपली. 

… पण ही कथा आपल्यालाही तितकीच लागू होते.

अगणित स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची बाजी लावली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपले सैनिक, पोलीस कामावर तैनात आहेत म्हणून आपण सुरक्षित जगू शकतो. आपले आई वडील, शिक्षक या सगळ्या सगळ्यांनी खस्ता खाल्ल्या त्यामुळे आपल्याला हा जगण्याचा हक्क मिळाला आहे. 

…. सचोटीने वागून त्यांच्या या त्यागाला सार्थ, यथार्थ बनवणं हे आता आपलं कर्तव्य हे आहे, नाही का ?

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नाते जुळते मनाशी मनाचे… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ नाते जुळते मनाशी मनाचे… ☆ श्री सतीश मोघे

(शिक्षक दिनानिमित्त)

तिच्याबरोबर काही वेळेला मॉलमध्ये जाणे घडते. ती शिक्षकी पेशातली. बऱ्याचदा अचानक ३० ते ४५ या वयोगटातले तरुण जवळून जातांना थबकतात आणि म्हणतात,  “आपण मोघे मॅडम ना ! मॅडम ओळखलत? मी १९९३ बॅचचा… मी १९९६ बॅचचा…. ” आणि काही बोलायच्या आत ते वाकून नमस्कार करतात. “ मॅडम अजूनही तुम्ही शिकवलेला धडा आठवतो.” कुणाला शिकवलेली कविता आठवते, कुणाला केलेली आर्थिक मदत आठवते, तर कुणाला दिलेला आत्मविश्वास… तो दिवस हिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा, धन्यतेचा दिवस असतो. तिच्या शिक्षकी पेशापुढे मला माझे अधिकारीपण थिटे वाटायला लागते. जगातल्या कुठल्याच क्षेत्रात, शेवटच्या श्वासापर्यंत अखंडपणे असा सन्मान आणि धन्यता  लाभत नाही.  ते पवित्र नाते पाहून परमेश्वराने पुढच्या जन्मी शिक्षक करावे, असे का कुणास ठावूक त्याक्षणी वाटू लागते.

हे असे बऱ्याच ठिकाणी घडते. प्रसंग मॉलमधला सांगण्याचे कारण एव्हढेच, की या नात्याच्या भेटीसोहळ्यात वेशभूषाही आडवी येत नाही, एव्हढे हे नाते पक्के असते. ही तिथे साडीमध्येच असते असेही नाही आणि तोही विद्यार्थ्यांच्या पेहरावात असतोच, असे नाही. पण या नात्यात आदरयुक्त भावनेचे प्रोग्रॅमिंग विद्यार्थ्यांच्या मेंदूत कायमचे झालेले असते आणि ‘लाईफटाईम ॲन्टी व्हायरस कीट’ या नात्यात “इनबिल्ट” असते.अगदी आई वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यातही दुराव्याचा,गैरसमजाचा व्हायरस आल्याचे काही ठिकाणी दिसते.पण या नात्यात ते अपवादाने नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती माझ्या प्रेमयुक्त आदराची आहे, याबाबत मन, बुद्धी आणि देहाचे कधी नव्हे ते क्षणात ऐक्य होते आणि नमस्काराची कृती होते. आपल्या शिक्षकांबाबतही आपले असेच होत असते.

परवाच माझे एक स्नेही, सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. मित्रगोत्रीसर घरी मुक्कामाला होते. सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. ते ठाण्यात येणार हे कळताच ,परिसरातल्या त्यांच्या विद्यार्थ्यांचे फोन सुरु. स्टेशनवर स्वागत, घरी घेऊन जाणे, पुन्हा स्टेशनवर पोहचविणे, प्रेमाचा आग्रह, भेट होताच सर्वांचा वाकून नमस्कार, या सर्व गोष्टी पाहून शिक्षकी पेशातल्या व्यक्ती खरेच नशिबवान असे वाटले,.त्यांचा हेवाही वाटला.

या मंडळींना स्वत: ऐश्वर्यवान होण्यापेक्षा विद्यार्थी ऐश्वर्यवान झालेले पाहणे आवडते. पंखात बळ देऊन, भरारी घेण्याचा आत्मविश्वास देऊन विद्यार्थ्यांचा निरोप घ्यायचा, पुन्हा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना घडवत राहायचे. हे ज्ञानदानाचे,विद्यार्थी घडविण्याचे अग्निहोत्र प्रज्वलित ठेवण्याचे पुण्यकर्म करणाऱ्या सर्वच शिक्षकांना वंदन.

आजचा दिवस शिक्षणपद्धती, शिक्षक यांच्या दोषांविषयी बोलण्याचा नक्कीच नाही. शहरी आणि ग्रामीण भागातल्या समस्या, गरजांमध्ये झालेले बदल, तात्विक अधिष्ठानात झालेले बदल हे तुमच्या आमच्यात, डॉक्टर, वकील इत्यादी सर्वच पेशात झालेले आहेतच. तेव्हा यात ‘सर्व बदलले ते ठीक, पण शिक्षकांनी तरी बदलायला नको, त्यांनी पूर्वीप्रमाणेच त्यागी, तत्वनिष्ठ रहावे,’ असे म्हणून त्यांच्यावरच नैतिकतेचा, तत्वनिष्ठतेचा बोजा टाकणे, योग्य वाटत नाही. तीही माणसेच आहेत. आपण बदललो, तीही बदलली आहेत.

अजूनही चांगल्या शाळा, महाविद्यालये आहेत. चांगले शिक्षक, प्राध्यापक आहेत. जे चांगले आहेत, तेच पुढे आठवणीत राहतील…मनाशी मनाचे नाते  जुळलेले राहील आणि खूप वर्षांनी जरी अशा शिक्षकांना विद्यार्थी भेटले, तरी ते तेव्हाही निश्चितच त्यांना वाकून नमस्कार करतील. 

सर्व आदरणीय शिक्षकांविषयी अशाच भावना आहेत:

 कधी तर नाहीच,

कधीतरी क्वचित

होते त्यांची भेट

जावून बसले

असतात मात्र

 आपल्या काळजात थेट !

सर्व शिक्षक बांधवांना शुभेच्छा आणि वंदन…

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ आभाळाचा वाढदिवस…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ आभाळाचा वाढदिवस… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. आभाळाचा वाढदिवस.. हो हो तुमच्या आमच्या माणसां सारखाच आभाळाचा वाढदिवस…कितवा वाढदिवस? म्हणून किती कुत्सितपणे शंका काढताय ना… तुमचं सगळयांचं असचं ठरलेलं असतं.. वाढदिवसाला मोजमाप लावयाचं.. त्याची जन्मतारीख कोणती? ते कोणतं वर्ष होतं.. मग आता किती पूर्ण झाली? ( अजुन उरली किती?) किती गणिती प्रश्न उभे कराल… एखाद्याला जन्मतारीख ठाऊकच नसेल… नसेल त्यावेळी तशी नोंद करून ठेवायची पध्दत तर त्याने त्याचा कधी नि कसा साजरा करावा वाढदिवस?.. तुम्हीच सांगा! त्याला वाटत नसेल आपलाही वाढदिवस साजरा करावा म्हणून.. आणि अश्या कितीतरी गोष्टींच्या सहवासात आपण आलेलो असतो… मग घरच्या नित्योपयोगी वस्तू असतील.. संस्था, आस्थापना, प्राणी, वाहन, सारं सारं काही… आपल्या संपर्कात आल्यापासून त्याची कालगणना आपण सुरू करतो… कदाचित त्याची एक्सपायरी डेट सुध्दा आपल्या ठाऊक असते… त्याची वारंटी गारंटी चा कालावधी लक्षात ठेवतो आणि मग अभिमानाने दर वर्षी त्याचा वाढदिवस साजरा  केलाच तर, करण्यात आनंद मानतो… पण चंद्र सूर्य तारे, ग्रहगोल, हवा,पाणी, नद्या, तळी, समुद्र, आकाश ,डोंगर निसर्ग याचं काय.. ते करत असतील का स्व:तापूरता वाढदिवस साजरा.? .. आपल्या नकळत..निसर्गाची पूजा दरवर्षी या ना त्या नावाने  आपण करत असतो तोच दिवस त्याचा वाढदिवस म्हणून साजरा करायला काय हरकत आहे…वसुंधरादिन …काही वेळा वर्षातून दोन तीनदा देखील आपण त्याचे पूजन करतो तेव्हा तेव्हा देखील वाढदिवस करायला काय हरकत आहे… आपण नाही का तारखेने, तिथीने तर वाराने वगैरे वगैरे वाढदिवस एकाहून अधिक वेळा साजरा करतो मग यांचा केला म्हणून बिघडले कुठे. त्या सगळयांनी सतत निरपेक्ष आपल्या सेवेला हजर असावे आणि बदल्यात आपण त्यांना काय देणारं… साधं गिफ्ट पण आपण कधीच देत नाही पण तरीही ते रिटर्न गिफ्ट मात्र भरभरून देत असतात… आपला तो हक्कच आहे असे समजून ते घेत असतो…निळे पांढरे, जांभळे, नारिंगी, सोनेरी, लाल, रूपेरी… रंगांचे आकाश छतासारखे डोक्यावर पसरलेले…हसत प्रसन्न पणे पाहत असते… मग त्याला आनंद होईल, उत्साह दुणावेल, प्रसन्नता वाटेल अशी एक तरी गोष्ट त्याला द्यायला… निदान हवेने भरलेले फुगे अंतराळात सोडून दिले तरी  त्या आकाशाचा बालका सारखा आनंद गगनात मावेनासा झालेला आपल्याला नाही का कळणार…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares