मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आता ती बघू शकेल. – भाग 2… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ आता ती बघू शकेल. – भाग १… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

 (मागील भागात आपण पाहिले –  प्रसादची आई म्हणाली ताई मला माहित्येय तुम्हाला काय विचारायचे आहे. मीच सांगते. तुम्हाला असं वाटतं ना प्रसाद आरती सारख्या आंधळ्या पोरीशी का लग्न केले आणि ती फोटो कसे बघू शकेल? आर्यनच्या आईनं होकारार्थी मान डोलावली. – आता इथून पुढे )

ताई, मी एका गरीब शेतमजुराची मुलगी आहे, माझ्या आई बापाने घरची थोडीफार शेती असलेल्या घरात माझे लग्न लावून दिले होते. घरची शेती काही फार जास्त नव्हती , पण खाऊन पिऊन सुखी होतो एवढंच. लग्नानंतर चार महिन्यांनी  शेजारच्या शेतकऱ्याने शेताच्या बांधावरून  भांडण उकरून काढले. भांडण एव्हढे विकोपाला गेले की शेजाऱ्यांनी रागात प्रसादच्या बाबांच्या डोळ्यात विषारी कीटक नाशक ओतले. खूप दवाखाने केले. डॉक्टर केले. पण त्यांचे डोळे गेले ते कायमचेच.’ आर्यनच्या आईच्या तोंडातून ‘आई ग , कीती निर्दयी आणि अमानुष’ असे उद्गार निघाले.

‘आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते, प्रसादच्या बाबांचे डोळे जाऊन आणि त्यांचा इलाज करण्यात दोन महिने गेले होते. लग्नानंतर सहाव्या महिन्यात मला पाळी आली तेव्हा, प्रसादचे बाबा बोलले, माझं आयुष्य तर आता अंधारात जाईल, आपल्याला मूलबाळ झालं नाही. तुला मी काडीमोड देतो, तुझे दुसरे लग्न झाले तर तू तरी सुखी राहशील. कशाला माझ्या आंधळ्या सोबत आयुष्याची नासाडी करतेस मला सांभाळत राहून?’ त्यावेळी मी ठाम राहिले त्यांनी माझ्या सुखासाठी मनापासून घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान वाटला आणि मी त्यांचा निर्णय नाकारला. घरातल्या शेतीची सगळी सूत्र मी हाती घेऊन संसार करू लागले. एक वर्षाने आम्हाला प्रसाद झाला पण वयाच्या नवव्या वर्षी त्याचा एक डोळा गेला. त्यावेळी खूप खचायला झाले पण प्रसादच्या आंधळ्या बाबांनी धीर दिला. माझे दोन डोळे गेलेत त्याचा एक तरी आहे ना, माझ्यावेळी हार नाहीं मानलीस मग आता का खचून जातेस?’

प्रसाद अभ्यासात हुशार होता, अभ्यास आणि शेती करता करता तो बँकांच्या आणि सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा देत होता. दीव्यांग कोट्यातून त्याला बँकेत चांगली नोकरी लागली. आता वर्षभरापूर्वी प्रसादचे बाबा वारले. वर्षभरात त्याचे लग्न करायचे म्हणून त्याच्यासाठी मुली बघायला लागलो. प्रसादला एक डोळा नाही म्हणून कधी मुलगी तर कधी मुलीचा बाप नकार देऊ लागला. कोणी कोणी तर मुलीच दाखवत नव्हते. जवळपास वीस एक ठिकाणी नकार आला होता.

आर्यनच्या आईने विचारले, मग आरती सोबत कसं काय लग्न जुळलं?

ही माझी सून आहे ना आरती ती आमच्याच गावातली. प्रसादच्या बाबांच्या डोळयात विषारी औषध ज्या माणसाने टाकले होते, त्याच माणसाची पोरगी आहे ही आरती. आरतीचा बाप जेल मधुन सुटून आल्यावर प्रसादच्या मागे चार वर्षांनी झाली होती त्यांना. जेव्हा त्याला कळले की त्यांची पोरगी जन्मजात आंधळी आहे, तेव्हा तो रडत रडत प्रसादच्या बाबांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायला आला. ‘दादा मी चुकलो देवाच्या काठीला आवाज नसतो मला माफ करा, देवानेच मला शिक्षा केली.’

गेल्या महिन्यात प्रसादला मुलगी बघायला आम्ही ज्या बसने तालुक्याच्या गावात चाललो होतो, त्या बस मध्ये आरती पण होती. आरतीचे देखणे आणि सुंदर रूप बघून बसमधील बाया, बाई ग, एव्हढी देखणी पोरं पण दिसत नाही तिला, कसं हीचं लग्न व्हायचं? हिला पण कोणीतरी आंधळाच मिळणार अस एकमेकींशी पुटपुटत होत्या.

तालुक्याच्या गावी ज्या मुलीला बघितलं तिने तिथेच नकार दिला, मी बिन लग्नाची राहीन पण या एक डोळ्याशी लग्न नाही करणार.’ ती म्हणाली होती.  तेव्हापासून प्रसाद ने डोळ्यावर चष्मा लावायचे सोडून दिले. बस मधील बायकांची कुजबुज त्याने पण ऐकली होती.           

घरी आल्यावर त्याने मला विचारले, आई आरतीला तुझी सून केली तर चालेल का? मी त्याला म्हणाले, माझा संसार झाला करून. तुझे तू ठरव. मी तुझ्यासोबत आहे.’

आरतीच्या  बापाला निरोप पाठवल्यावर तो पुन्हा घरी आला आणि आधीच मेलेल्याला अजून मारू नका म्हणू लागला. पण त्याला प्रसादने समजावले.

तुमची परिस्थिती नव्हती तशी आमचीसुद्धा परिस्थीती नव्हती म्हणून माझ्या बाबांना आणि तुमच्या आरतीला बघता आले नाही. पण आता मला चांगली नोकरी आहे, आज ना उद्या परिस्थीती सुधारेल. खुप लोकं नेत्रदान करतात, आपण आरतीसाठी बघू या कोणा दुसऱ्याचे डोळे मिळतात का? मला दोन डोळे असते तर माझाच एक तिला दिला असता. मीच कशाला माझ्या आईनेदेखील बाबांना दिला असता पण जग एवढं पुढे गेले हे माहितीही नव्हतं आणि माहिती असून ऐपत सुद्धा नव्हती. आता दोन महिन्यांपूर्वीच आमचे दोघांचे लग्न झाले. आम्ही गावाकडून मुंबईतल्या मोठ्या डोळ्यांच्या दवाखान्यात आलो होतो. आनंदाची गोष्ट अशी आहे की आरतीला बघता येणार आहे. दुपारपर्यंत दवाखान्यातले सगळं आटोपले म्हणून या लहानशा बोटीतून मांडवा की काय तिथं जाऊन पुन्हा याच बोटीने परत मुंबईला फिरणार. पुन्हा कधी समुद्र बघायला मिळेल की नाही म्हणून आजच साधली संधी.

हे सर्व ऐकताना आर्यनची आई अवाक झाली होती. न राहवून तिने प्रसादच्या आईला विचारले, ‘पण काकी आरतीसाठी नेत्रदान कोण करणार आहे? तिला कोणाचे डोळे लावणार आहेत? अवयव दान ही खुप खुप गुंतागुंतीची, खर्चिक आणि कायदेशीर पद्धतीने करायची प्रक्रिया आहे ना?’

प्रसादची आई म्हणाली, लग्न ठरल्या ठरल्या प्रसादने सगळी माहिती काढली होती, कोणी मृत्यूपूर्वी नेत्रदान केले असेल तर मिळतील असं काहीबाही तो सांगायचा. मी म्हटलं जिवंत असताना कोणी नाही का नेत्रदान करू शकत. मी माझा एक डोळा दिला तर नाही का चालणार? सुरवातीला तो नाही म्हणाला होता पण नंतर त्याला आणि मला डॉक्टरांनी तुम्ही म्हणताय तसे समजावले, कोणाचाही अवयव  कोणालाही सहजपणे नाही देता येत , रक्तगट , तो अवयव ज्याला द्यायचा आहे त्याचे शरीर ते स्वीकारू शकते का. अवयव दान करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य आणि वय हे अवयव दान करण्यासाठी योग्य आहे का, हे सगळे बघावे लागते.

आरतीचे बाबा पण डॉक्टर सांगत होते ते सगळं ऐकत होते. त्यांनी स्वतःहून पुढे होऊन सांगितले माझा आणि आरतीचा रक्तगट एकच आहे, तुम्हाला लागतील त्या सगळ्या चाचण्या करा पण माझाच डोळा माझ्या लेकीला द्या. माझ्या कर्माचे प्रायश्चित्त भोगल्याचे समाधान तरी मला लाभेल. डॉक्टरांनी आरतीच्या बाबांचे म्हणणे ऐकले आणि तशा चाचण्या करायला सांगितले. ते म्हणाले मी हॉस्पिटलमध्ये थांबतो तुम्ही आलाच आहात तर फिरून या कुठेतरी. या बोटीत बसण्यापूर्वी त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की चाचण्या पाहिजे तशा आलेल्या आहेत. डॉक्टरांनी कायदेशीर प्रक्रियांची तयारी करायला सांगितले आहे.

आर्यनची आई हे सर्व ऐकून निःशब्द झाली. तिला काय बोलावे हेच बराच वेळ सुचत नव्हते.

क्षुल्लक कारणावरून अमानुषपणे वागणारी आरतीच्या बापासारखी माणसं ज्यांना नंतर पश्र्चाताप सुद्धा होतो, अशा माणसांना मोठ्या मनाने माफ करणारे प्रसादचे आई बाबा , प्रसाद सारखा उच्च विचारसरणी असलेला तरुण. राहणीमानाने साधारण आणि भोळे असलेले पण मनाने सधन असणारे शेतकरी जमिनीत बियाणे रुजवून नुसते अन्नधान्यच पिकवत नाहीत तर लाखमोलाचे विचार सुद्धा समाजात रुजवतात.

– समाप्त –

लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनिअर, कोन, भिवंडी ठाणे

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहस्त्रगंगाधर… लेखक बाबासाहेब पुरंदरे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

सहस्त्रगंगाधर… लेखक बाबासाहेब पुरंदरे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा आविष्कारही तितकाच उग्र आहे! पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि!

त्याच्या आवडीनिवडी आणि खोडी पुरूषी आहेत, त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे, त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण सह्याद्रि हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न… रामोशासारखा. 

पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो!

आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य!

तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली,

त्याच्या अटिव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या, 

त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला,

मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले…

सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो! रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा! सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही, डोळेच फिरतात!

मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की, त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो, तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणे, खिदळणे ते! बेहोश खिदळत असतो. 

पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्रि सतत निथळत असतो. चार महिने त्याचे हे महास्नान चालू असते. काळ्यासावळ्या असंख्य मेघमाला, त्याच्या राकट गालावरून अन् भालावरून आपले नाजूक हात फिरवित, घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात. हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते. त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धूऊन निघते. तरी सगळी साफ नाहीच. बरीचशी.दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपतो. त्या हसर्‍या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो. कांचनाच्या, शंखासुराच्या, सोनचाफ्याच्या व बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार त्या शेल्यावर खुलत असते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात. मात्र जातांना त्या त्याच्या कानांत हळूच कुजबुजतात, “आता पुढच्या ज्येष्ठांत मृगावर बसून माघारी येऊं हं ! तोपर्यंत वाट पाहा !” रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात.दाट दाट झाडी, खोल खोल दर्‍या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड लवणे, घातली वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्‍या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा !

असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्रि बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर राहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतहि आहे. कारण तेहि मराठ्यांच्याइतकेच शूर आहेत !सह्याद्रीच्या असंख्य रांगा पसरलेल्या आहेत. उभ्या आणि आडव्याहि.

सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरामधील गल्ल्या फार मोठमोठ्या आहेत. कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यांतच चोवीस मावळे बसली आहेत. दोन डोंगर रांगांच्या मधल्या खोर्‍याला म्हणतात मावळ. एकेका मावळांत पन्नास-पन्नास ते शंभर-शंभर अशी खेडी नांदत आहेत.प्रत्येक मावळामधून एक तरी अवखळ नदी वाहतेच. सह्याद्रीवरून खळखळणारे तीर्थवणी ओढ्या-नाल्यांना सामील होते. ओढेनाले ते या मावळगंगांच्या स्वाधीन करतात. सगळ्या मावळगंगा हे माहेरचे पाणी ओंजळीत घेऊन सासरी जातात. या नद्यांची नावे त्यांच्या माहेरपणच्या अल्लडपणाला शोभतील अशीच मोठी लाडिक आहेत. एकीचे नाव कानंदी, दुसरीचे नाव गुंजवणी, तिसरीचे कोयना. पण काही जणींची नावे त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फारच लाडिक ठेवलेली आहेत. एकीला म्हणतात कुकडी, तर दुसरीला म्हणतात घोडी ! तिसरीला म्हणतात मुठा, तर चौथीला वेलवंडी ! काय ही नावे ठेवण्याची रीत ? चार चौघीत अशा नावांनी हाक मारली की, मुलींना लाजल्यासारखें नाही का होत ?कित्येक मावळांना या नद्यांचीच नांवे मिळाली आहेत. कानंदी जेथून वाहते ते कानद खोरे. मुठेचे मुठे खोरे. गुंजवणीचे गुंजणमावळ, पवनेचे पवन मावळ, आंद्रेचे आंदरमावळ आणि अशीच काही.मावळच्या नद्या फार लहान. इथून तितक्या. पण त्यांना थोरवी लाभली आहे, गंगा यमुनांची.

सह्याद्रि हा सहस्त्रगंगाधर आहे. मावळांत सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी उर्फ नागली पिकते. नाचणीची लाल लाल भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हे मावळचे आवडते पक्वान्न आहे. हे पक्वान्न खाल्ले की बंड करायचे बळ येते! भात हे मावळचे राजस अन्न आहे. आंबेमोहोर भाताने मावळी जमीन घमघमत असते. अपार तांदूळ पिकतो. कांही मावळांत तर असा कसदार तांदूळ पिकतो की, शिजणार्‍या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो. खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल. महाराष्ट्राच्या खडकाळ काळजातून अशी ही स्निग्ध प्रीत द्रवते. मावळे एकूण चोवीस आहेत. पुण्याखाली बारा आहेत व जुन्नर-शिवनेरीखाली बारा आहेत.

मोठा अवघड मुलूख आहे हा…..  इथे वावरावे वार्‍याने, मराठ्यांनी नि वाघांनीच.

लेखक – बाबासाहेब पुरंदरे

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बिनचेह-याची माणसं रेखाटणारा चित्रकार… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ बिनचेह-याची माणसं रेखाटणारा चित्रकार… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

पुणे विद्यापीठातल्या प्रौढ, निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागात मी रूजू झालो त्यावेळी विद्यापीठ कक्षेतल्या पाच जिल्ह्यांतल्या शेकडो महाविद्यालयांमधून प्रौढ शिक्षण कार्यक्रम धडाक्यात चालू होता.कार्यकर्त्यांची शिबीरं,प्रशिक्षण कार्यक्रम, मेळावे इथपासून राष्ट्रीय, विभागीय चर्चासत्रं,कृतिसत्रं सतत होत होती. विविध स्तरावरच्या कार्यकर्त्यांची उठबस इथं नेहमीच असायची. विविध पुस्तकं, नियतकालिकं, वर्तमानपत्रं यांचा इथं खच पडलेला असायचा. भितींवर अनेक तक्ते, पोस्टर्स आणि चित्रं असायची.  त्यात एक चित्र उठून दिसायचं. एक माणूस या विभागाची दिशा दाखवत असलेले हे चित्र होते. एअर इंडियाच्या महाराजाच्या  वेषात हा माणूस आदबीनं उभा होता. पण या माणसाला चेहरा नव्हता. त्या ठिकाणी प्रौढ शिक्षणाचं चिन्ह होतं-गोलात इंग्रजी वाय आकार. वायमध्ये  एक भरीव ठिपका. या चित्राचे मला नेहमी कौतुक आणि कुतूहलही वाटत असे. आयडिया भन्नाट होती. कुणाकडून तरी कळलं की, आपल्या विभागात एक चित्रकार होते  रामनाथ चव्हाण नावाचे. त्यांनी अशी बरीच चित्रं काढली होती.

चित्रकार रामनाथ चव्हाण  

केवळ रेखाटलेल्या चित्राला व्होकॅब्युलरी पिक्चर म्हणतात. त्यापेक्षा आशयघन कन्सेप्ट पिक्चर्सना प्रौढ शिक्षणात महत्वाचे मानले जाते.चव्हाणांची चित्रं कन्सेप्ट पिक्चर्स होती. चव्हाणांविषयी मी खूप ऐकून होतो.सर्वसामान्य नव्हे तर गरिब घरातून जिद्दीनं पुढं आलेल्या या युवकाला त्याच्या विचारांच्या माणसांची साथ इथं मिळाली.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- sks.satish@gmail.com

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सापेक्ष दृष्टीकोन… ☆ डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

अल्प परिचय 

शालेय शिक्षण: मराठी माध्यमातून हुजूरपागा, पुणे

M.Sc. आणि  Ph.D. (Physics), पुणे विद्यापीठ

LLM (Intellectual Property Rights -IPR), Turin University, Italy

इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालयात भौतिकशास्त्र प्राध्यापिका

छंद: निसर्ग निरीक्षण, शास्त्रीय संगीत श्रवण, मराठी-इंग्रजी ललित वाचन, फोटोग्राफी, Facebook blogger

? मनमंजुषेतून ?

☆ सापेक्ष दृष्टीकोन… ☆ डाॅ. शुभा गोखले ☆ 

एखादी मुलगी आणि मुलगा यांना टाळ्या देत हसतखेळत भेळ खाताना पाहून बहुतेक कपाळांवर ‘ काय हा थिल्लरपणा ‘ – असं म्हणणाऱ्या आठ्या उमटतात. पण त्याचवेळेला एका कोपऱ्यात उभे असलेले त्यांचे आई-बाबा, नुकतीच दृष्टी मिळालेल्या आपल्या धाकट्या बहिणीला भेळ खायला घालत, समोरच्या समुद्रात वेगाने जाणाऱ्या मोटर-बोटी दाखवणाऱ्या आणि एकमेकांना टाळ्या देऊन एन्जॉय करणाऱ्या दादाचं कौतुकच करत असतात….  म्हणजेच पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर सगळं अवलंबून असतं!

तसंच काहीसं  गेले काही आठवडे WA/FB व इतर माध्यमांतून आपल्यावर भडिमार होणाऱ्या गुरू-शुक्र युतीचं ! ……. सूर्यापासून ७८ कोटी किलोमीटर वरचा गुरू हा आकारानी सगळ्यात मोठा असलेला भाऊ, तर ११ कोटी किलोमीटर वर असणारा शुक्र …  हे दोघेही आपापल्या कक्षांमधून आपापल्या वेगाने सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतात ! गुरूला एका परिक्रमेला साधारण ११. ८ वर्षं,  तर शुक्राला केवळ २२५ दिवस लागतात…. असे परस्परांशी फारसा संबंध नसलेले ग्रह आपला क्रम आक्रमित असताना, त्या  दोघांनाही कल्पनाही नाहीये, की सूर्यापासून १५ कोटी किलोमीटर वर असलेल्या आपल्या पृथ्वी नावाच्या बहिणीवर वास्तव्य करणारे माणूस नावाचे प्राणीमात्र त्यांच्याकडे दुर्बिणी रोखून बसले आहेत ! 

कारण काय …  

… तर पृथ्वीवरून या दोघांच्या आपापल्या कक्षांमधल्या  आजच्या स्थिती अशा रीतीने एका सरळ रेषेत आल्यात की वाटतंय, ते एकमेकांच्या खूप जवळ आलेत. यालाच विज्ञानात ‘ युती  असे म्हणतात. ही स्थिती फक्त पृथ्वीच्या आजच्या सापेक्ष स्थानामुळे दिसतेय. अवकाशातल्या इतर कुठल्याही बिंदूवरून ते दोघे अगदी सुट्टे-सुट्टे दिसतील.

म्हणूनच म्हटलं दृष्टीचा-कोन महत्वाचा ! …. पटतंय का?

(फोटो सौजन्य : डॉ. गौरी दळवी, फ्लोरिडा. )  

© डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कुठलाही आजार आपल्याला का होतो? ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ कुठलाही आजार आपल्याला का होतो?  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

या प्रश्नाचे सहज सोपे उत्तर आहे…….  तुम्ही स्वीकारल्यामुळे !

आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल ? आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्विकारलेय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे,  तो पाण्यावर तरंगणार आहे. अहो सापाला हात पाय नसतात. तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले, तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हाही गैरसमजच आहे. बघा जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. 

याप्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे. ती आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी सतत काम करत असते. तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करा. हेच खरे शरीर शास्त्र आहे. ही शक्ती तुमच्यात नसेल तर मेडीकल सायन्स काहीच करू शकत नाही. तर ताप आल्यावर,सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा. तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.

अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे शरीरावर अत्याचार आहेत. ही अंधश्रद्धा आहे. शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे खरे विज्ञान आहे.

आपल्या शरीरातली अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहिती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळून येतं, काय करावं, ते समजत नाही.

मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघू या.

१) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते. 

२) परीक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो, 

३) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातली शक्ती गळून जाते.

४) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते.

तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे, पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची ! ताकतवार असला तरी तो गुलामच ! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम ! आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.

१) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार : – समजा एखादा माणूस नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल, उदा. – त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं!

        – ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले!

        – माझी तळपायाची आग मस्तकाला जाते!

— क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो. डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही. ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच तिला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.

—  थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशपणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.

२) आतड्यांचे विकार – जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, तिला छोट्या आतड्यांच्या विकारांची समस्या उदभवते.

३) अपचन – बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत. खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे. तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचा, जसं की एखादे चूर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा आधार घ्यावा लागतो.—- आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात……. 

काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं.. कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मूल आईवडीलांवर राग काढू शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो.

ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो. पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गिक नियंत्रण तो हरवून बसतो.

असंही बघण्यात आलं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते.

४) छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.

५) डोकेदुखी – 

आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?

– ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं!

– त्याने माझं खुप डोकं खाल्लं!

– आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही,

— निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे. — आणि मायग्रेनचा त्रास चालू !

डोकेदुखीची अजूनही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते.

तेव्हा असे कटू अनुभव विसरुन जाणेच इष्ट !

कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोन केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.

६) पाठदुखी वा कम्बर दुखी – 

एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकून गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीला वा कम्बरदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात. ह्यात मानेपर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्यावरचा ताण जाणवतो. चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.

— आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे?—- 

आपापले औषधौपचार चालू ठेवा, पण हे रोग शरीरातून समूळ उपटून काढायचे असतील तर स्वयंसुचना हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.

जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ – तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सूचना द्या –

‘आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे — आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे —डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे —  माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरिक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे — माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे — काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल !—आणि डोकेदुखी गायब !

प्रत्येक रोगासाठी अशा सूचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवून रोगमुक्त होता येते.

सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगू नका, रोग बनून ते शरीराला पोखरतील.  राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा !

इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो. त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे, मनातले संपूर्ण भाव ओतून रिते व्हायचे.  ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे.

— अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. आता क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.

तुम्हा सर्वांना, निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईचे काही फ़ेमस डायलॉग… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आईचे काही फ़ेमस डायलॉग… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आपल्या लहानपणीचे आईचे काही फ़ेमस डायलॉग …

 

१. आई भूक लागली …

“सारखं काय द्यायचं तुम्हाला खायला, आता मलाच खा”

( दहा मिनिटात आपल्यासमोर काहीतरी खायला असायचं तो भाग वेगळा)

 

२. सकाळची घाई गडबड आणि नेमकं गॅस सिलिंडर संपतं…अती त्राग्याने..” मरा, ह्या मेल्याला पण आत्ताच सम्पायचं होतं? एक एक दिवस अगदी परीक्षाच असते

( त्या परिक्षेत ती अगदी उत्तम पास होते तो भाग वेगळा)

 

३. आई वेणी घालून दे ना…

” एवढी घोडी झाली तरी आई लागते वेणी घालायला”

कृतःकोपा ने प्रेमळ धपाटा ..

( बोले पर्यंत वेणी घालून पण होते ते निराळं )

 

४. ” किती पसारा करता रे..आवरताना जीव मेटाकुटीस येतो, शिस्त नाही तुम्हाला, माझंच चुकलं, चांगले दणके द्यायला हवे होते..”

( तिच्या ही नकळत, रागाच्या भरात सर्व पसारा तीच आवरते)

 

५. पाणी प्यायला स्वयंपाक घरात गेलं की…

” दूध ठेवलय गं गॅस वर, लक्ष ठेव, माझी पाठ वळली की

पळून जाऊ नकोस, मी आलेच पटकन.

( गॅस इतका बारीक ठेऊन जाते, की ती परत आली तरी

किमान दहा मिनिटं तरी दूध तापायला लागतील , पण आपल्याला चांगलीच ओळखून असते त्यामुळे..)

” आणि ढणढण्या गॅस ठेऊ नकोस, दूध करपतं”

( काय बिशाद आपली गॅस मोठा करण्याची)

 

६. परीक्षेला जाताना…

” सगळं व्यवस्थीत घेतलंस ना? पेपर आधी नीट वाच,

धांदरटपणा करु नकोस “

( जगातल्या तमाम आयांना, आपलं परीक्षेला बसणारं

मुल धांदरट का वाटतं, हे न उलगडणारं कोडं आहे, अगदी मी आई झाले तरी)

 

७. आपण बाहेर जाताना…

“लवकर ये, उशीर करु नकोस…जास्त उशीर केलास तर दार उघडणार नाही “

आपल्याला यायला उशीर होतोच..

काळवंडलेल्या चेहर्याने दार उघडताच..

” कित्ती उशीर, काय झालं? सगळं ठीक आहे ना?”

( काळजीने प्रश्नांच्या सरबत्तीत, दार उघडणार नव्हती हे विसरुनच जाते)

 

काय अजब रसायन असतय ना आई म्हणजे?

आपल्याला म्हणते सुट्टी असली तरी लवकर उठावं 

आणि बाबांना म्हणेल, झोपू द्या हो एकच दिवस मिळतो..

 

आपल्याला म्हणते, असं घाबरून कसं चालेल?

आणि स्वतः मात्र सारखी घाबरते..

( हे घाबरणं आपल्यासाठी होतं हे आपल्याला कळे पर्यंत मात्र एक तप उलटतं)

 

पिढ्यांपिढ्या थोडया फार फरकाने हे संवाद असेच चालू रहातील, कारण आई सगळयांची सारखीच असते..आई ही आईच असते..

ती काल ही अशीच होती, आज ही अशीच आहे आणि उद्या पण अशीच राहील..

कारण आई ही फक्त आईच असते… कायम..

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “क…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “क…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

एखाद्या व्यक्तीबद्दल सहज बोलतांना आपण कधीकधी म्हणतो, तो चांगला आहे, पण…….. या पण नंतर सगळे वाईटच असते असे नाही. पण त्यामुळे संमीश्र भावना मनात येतात.

एखाद्या अक्षरा पासून तयार होणाऱ्या शब्दांबद्दल अशाच भावना मनात येतात का?……..

कसं काय ते सांगता येणार नाही, पण क या अक्षरा पासून सुरू होणाऱ्या शब्दांसाठी  मनात अशा संमीश्र भावना येतात. हा माझा बालीशपणा असेल. (हो बालीशपणा, कारण सगळे मनातल्या भावना शब्दात उतरवतात, माझ्या मनात मात्र शब्दांमुळे संमीश्र भावना येतात.) यांचे कारण त्यात प्रश्न, निषेध, राग,  तीरकसपणा, वाईटपणा, नाराजी बरोबरच चांगलेपणा देखील बरोबरीने जाणवतो.         

आपल्याला पडणारे किंवा विचारले गेलेले बरेचसे प्रश्न हे क पासूनच सुरु होतात. आणि त्याच बाराखडीतले (कुटुंबातील) असतात असे वाटले. जसे…..

क – कधी? कसे? कशाला? कशासाठी? कळेल का?

का – का? काय? कारण काय? काय करशील?

कि की – किंमत किती? किंमत आहे का? किती वेळा? किती?

कु कू – कुठे?

के – केव्हा?

को – कोण? कोणी? कोणाला? कोण आहे? कोणासाठी? कोणी सांगितले? कोण म्हणतो? कोण समजतो?

असे बरेच प्रश्न क पासूनच सुरु होतात. इतकेच नाही तर वाईट अर्थाने, किंवा नाराजीने वापरले जाणारे क पासून सुरू होणारे बरेच शब्द आढळतील.

काळा पैसा, काळा धंदा, कट कारस्थान, कारावास, करणी, कुरापत, कुख्यात, कावेबाज, कळलाव्या.

एखाद्या गोष्टीकडे मुद्दाम लक्ष दिले नाही तरी कानाडोळा केला असे म्हणतात.

“स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातंल कुसळ दिसतं.” हा कुसळ देखील चांगल्या अर्थाने वापरलेला नसतो.

निरर्थक गप्पा मारल्या तरी म्हणतात “बसले असतील कुटाळक्या करत.”

नको त्या वेळी कोणी आलं तरी म्हणतो “कोण कडमडलं आता.”

कोणाचा संसार मोडू नये असे वाटते. पण तसे झाले तरी काडीमोड झाला असे म्हणतात.

अती शुल्लक गोष्टीला कवडीमोल म्हणतो. तर अबोला धरल्यास देखील कट्टी झाली असे म्हणतो.

नाराजीच्या अथवा विरोधाच्या सुरात हळूच बोललं तरी कुरकुर नकोय, कटकट नकोय असे म्हणतात.

त्रासदायक वाटणारी, खोड्या, मस्ती, दंगा करणारी लहान मुले कौरवसेना म्हणून ओळखली जाते. तर माणूस कंसमामा म्हणून.

अपरिपक्व असेल तर कच्चा आहे असे म्हणतो. पण ताजा आणि हवासा असतो तो कोवळा.

बरं वाटतं नसले, चांगले दिसत नसले तरी म्हणतो कसंतरी होतय, किंवा कसंतरीच दिसतंय. हिंमत हरली तरी कच खाल्ली असे म्हणतो. घर झाडण्यापूर्वी पायाला जाणवते ती कचकच. आणि टाकायचा असतो तो कचरा. आणि टाकतो (कचरा) कुंडीत.

वाइटाशी वाइट वागून काम साध्य करायचे असेल तर, “काट्याने काटा काढायचा.” (सगळेच शब्द क पासून सुरू होणारे.)

निषेध नोंदवण्यासाठी रंग सुध्दा काळा.  वाइट घटना घडली तरी काळा दिवस, काळी रात्र असे म्हणतो.

अर्जुनाला पडलेले अनेक प्रश्न आणि झालेले युद्ध ते ठिकाण देखील कुरुक्षेत्रच. पण उत्तर देणारे मात्र कृष्ण.

पण सगळेच क पासून सुरू होणारे शब्द प्रश्न निर्माण करणारे आणि नकारात्मकच आहेत असे नाही.

सकाळी उठतानांच “कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. कर मुले……….” म्हणतात.

नमस्कार करतांना कर जोडावे लागतात.  देवालयाचा कळस पवित्र भावना जागवतो. धार्मिक विधीसाठी कद नेसावा लागतो. पहाटे होणारी आरती काकड आरती असते. तसेच किर्तन देखील असते. काशी, केदारनाथ, करवीर (कोल्हापूर) पवित्र स्थान. तर काश्मीर, कोकण, केरळ निसर्गाने नटलेले. कन्याकुमारीचे आकर्षण वेगळेच.

वस्तू आणि स्थळ नाहीत. तर माणसांमध्ये देखील वेगवेगळ्या स्वभावाच्या माता  कौशल्या, कैकयी, कु़ंती पण सुरुवात क पासून. दानशूर पणाचे उदाहरण म्हणजे कर्ण.  तर झोपाळू माणूस म्हणजे कुंभकर्ण.

प्राणी पक्षी यात स्वामीनीष्ठ असतो तो कुत्रा, तर लबाड, धुर्त कोल्हा. बारीक नजर ठेवणारा कावळा. तर गाणारी कोकीळा‌‌.

सहज खुशाली विचारतांना देखील काय? कसं काय? असे विचारले तरी त्यात सुखाचे उत्तर अपेक्षित असते. पण सुरुवात होते क पासूनच. आणि ते प्रश्नच असतात.

कट्टर हा शब्द मात्र शत्रू आणि मित्र दोघांसाठी असतो. ठाम पणे किंवा निश्चयाने बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ.

कृतघ्न जरी क पासून सुरू होत असला, तरी कर्तृत्व, कर्तबगार, कृतज्ञ, कलावंत, कलाकुसर, कलात्मक, कसब, कणखर असे आब वाढवणारे क पासून सुरू होणारे शब्द देखील आहेत.

कवी, कथाकार, कादंबरीकार असे सगळे साहित्यिक, तर प्रेमळ असणारा कनवाळू हे शब्द क पासूनच सुरु होतात.तर चित्रकाराच्या हाती असतो कुंचला.

त्यामुळेच माझ्या मनात क ने सुरु होणाऱ्या शब्दाबद्दल संमीश्र भावना असतात.

आता माझ्या नावांचे काय?……… ते तुम्ही ठरवा.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अम्मी आणि मम्मी – भाग 3 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ अम्मी आणि मम्मी – भाग 3 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

(मागील भागात आपण पाहिले – पाकिस्तानने कॅ. अभिनंदन ना पकडलं. आता मात्र अगदी हद्द झाली! दोन्ही मुलींच्या घरच्यांनी कडक पावले उचलली. तृपित आणि तहरीमचं एकमेकींशी बोलणं बंद करून टाकलं. कडक आज्ञा दिली गेली, की आपापल्या कामाशी काम  ठेवा, सरळ घरून शाळा आणि शाळा ते घर! एकमेकींशी बोलताना दिसलात, तर तुमचं काही खरं नाही! – आता इथून पुढे)

परिस्थितीच तशी झालेली होती. केंव्हाही युद्ध सुरु होण्याची शक्यता होती. युद्ध तर युद्धच असतं. ते जरी सीमेवर चालू असलं, तरी त्याचा परिणाम त्या देशाच्या प्रत्येक नागरिकावर होत असतो, मग तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात का रहात असेना. मुलींची परिस्थिती फारच वाईट झालेली होती. वर्गात फक्त एकमेकींकडे बघता यायचं, बोलणं शक्य नव्हतं. रिकाम्या डोळ्यांनी अशा बघत असायच्या, की जणू दोघी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहेत! तहान भूक सगळं हरपलं होतं दोघींचं. अशा काही चिडीचूप झाल्या होत्या, जसं काही त्यांचा मनमीत त्यांच्यापासून कोणी हिराऊन घेतला होता. त्यांचं हे गुपचूप रहाणं अम्मी आणि मम्मीला व्यवस्थितपणे समजत होतं. पण त्याच्यावर काही उपाय करू शकत नव्हत्या, त्यावर एकच उपाय होता, तो हा, की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंधातील भडकलेल्या आगीवर कुठून तरी थंड पाणी पडावं.

घरांमध्येही तणाव वाढत होता. या दोन्ही देशांच्या बाहेरही, जिथे जिथे या दोन्ही देशातले लोक होते, ते सगळे टी. व्ही. ला चिकटलेले असत. कॅ. अभिनंदनची जेंव्हा पाकिस्तानातून सुटका झाली, तेंव्हा सगळ्यात जास्त आनंद झाला होता, तो मम्मीला. तिच्या स्वतःच्या मुलीच्या मैत्रीसाठी ती आनंदित झाली होती. अभिनंदनचं परत येणं जसं काही तिच्या मुलीची आणि तहरीमची मैत्री वाढवणं होतं. या परतण्याने भडकलेल्या आगीवर थंड पाण्याचा थोडाफार तरी शिडकावा झालेला होता. परंतु, आजीने अजुनही हार मानलेली नव्हती. तहरीमशी मैत्री तोडून टाकण्यासाठी मागेच लागलेली असायची. पाकिस्तान्यांच्या गोष्टी सांगत रहायची – “या लोकांनी आपल्याला असं केलं, तसं केलं.”

तृपितला मात्र समजायचंच नाही, की यात तहरीमचा काय दोष आहे! आणि तिनं स्वतः काय करायला हवं? ती तर तहरीमसाठी जीव पण देऊ शकते. मम्मीला समजायचं, की तृपितच्या मनात काय चाललंय. पण कसं समजावणार तिला, की तहरीम आणि तृपितच्या मधे, अम्मी आणि मम्मीच्या मधे, नुसता हिंदी-उर्दूचा फरक नाही, तर दोन देशांचा फरक आहे, दोन देशातील तिरस्काराचा फरक आहे! एका आईच्या दोन मुलांमधील फरक आहे, जे एकमेकांशी झगडत,लढत एकमेकांच्या जीवावर उठले आहेत.

परंतु, आता ते इथे, तिसऱ्याच देशात होते, जो या दोघांपैकी कोणाचाच नव्हता, तर सगळ्याच देशांचा होता. एक एक करून वेगळं काढलं, तर जगातले सगळेच देश एका शाळेत मिळाले असते. वेगवेगळ्या देशांच्या या स्थानाला, भारत आणि पाकिस्तानची लढाई असो, की इस्त्राईल-पॅलेस्टाईनची लढाई असो काही फरक पडत नव्हता. सगळे आपापसातील तेढ बाजुला सारून एकमेकात मिळून, मिसळून रहायचा प्रयत्न करत असत. शेजारी पाजारी भलेही एकमेकांना ओळखत नसतील, पण कोणी कोणाशी अपमानास्पद पद्धतीने वागत नसत. सगळे आपापले रस्ते निवडून चालत रहात असत.

आज परत तो दिवस आला होता, की तिरस्काराच्या नद्या वाहू लागल्या होत्या. सीमेवर तणाव होता. काकांच्या मरणाची आठवण परत जखम बनून भळभळू लागली होती. हुतात्मा झालेल्या सगळ्या सैनिकांचे मृतदेह आणले जात होते. ज्या लोकांचा दुरान्वयानेही या युद्धाशी संबंध नव्हता, अशा लोकांच्या भावनांशी खेळ चाललेला होता. मुली घाबरून चुपचाप असायच्या. त्यांच्या मैत्रीवर परत एकदा कडक पहारे बसवले गेले होते.

आणि तेंव्हाच एक मोठी दुर्घटना घडली. न्यूयॉर्क शहरातल्या फ्लशिंग हायस्कूलमधे एका माथेफिरूने गोळ्या झाडल्या होत्या. बातमी वाऱ्यासारखी फैलावली. कित्येक पालकांनी शाळेकडे धाव घेतली. आधीच असा सगळा गोंधळ चाललेला असताना तिथेच एक बॉम्बस्फोट झाला. पण तोपर्यंत शाळा रिकामी झालेली होती. पोलिसांचे कडक पहारे लागलेले होते. आपापल्या मुलांचा शोध घेण्याची परवानगी फक्त आई वडिलांनाच दिली जात होती. धावत पळत मम्मी जेंव्हा शाळेत पोचली, तेंव्हा तिथे नुसता धूरच पसरलेला दिसत होता. तो धूर एवढा दाट होता, की लोकांच्या नाका-तोंडात जाऊन लोकांचा खोकून खोकून जीव हैराण होत होता, तरीसुद्धा प्रत्येक जण आपापल्या मुलांना जीव तोडून शोधत होता. कुठून तरी तृपित दिसावी, ती मिळावी या आशेने वेडावून गेलेल्या मम्मीची नजर आपल्या मुलीची एक झलक बघण्यासाठी शोधत होती. तिचे वडीलही आजीला घेऊन तिथे आले होते. सगळं काही ठीक असल्याची एकही खूण नजरेला पडत नव्हती. जिथं बघावं तिथे निराशा पदरात पडत होती. मनात एक अनोळखी भीति होती, जी मुलीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उभे करत होती.

इतरही अनेक पालक आपापल्या मुलांना हाका मारत वेड्यासारखे सर्वत्र धावत होते. जवळ जवळ अर्धा तास मम्मी, तृपितचे वडील आणि आजी तृपितला शोधत होते. शेवटी हार मानून त्या दोघी जोरजोरात हुंदके देऊन रडायला लागल्या, तृपितच्या वडिलांच्या डोळ्यातूनही अश्रू वहायला लागले. आजी जोरजोरात किंचाळून रडत होती, इतक्या जोरात, की त्या बॉम्बस्फोट करणाऱ्यांच्या कानावरही तो आवाज जावा, की या निष्पाप मुलांनी तुमचं काय बिघडवलं होतं? आजी जोरजोरात किंचाळत होती – “माहित आहे मला, हा बॉम्ब माझ्या मुलाच्या खुन्यांनीच फोडला असणार. रक्तपिपासू आहेत हे लोक, माझ्या नातीला पण मारायचं आहे आता ह्यांना!” पण त्या कोलाहलात अश्रू गाळण्याशिवाय कोणाच्या काही लक्षात येत नव्हतं. आणि ही वेळ अशी होती, की कोणीच काही करूही शकत नव्हतं.

धूर, पोलिसांच्या सायरनचा आवाज आणि लोकांचं रडणं! जेंव्हा द्वेषाची आग हसत्या-खेळत्या लोकांचं आयुष्य आपल्या धगीने जाळून, भाजून काढते, असा हा एक अभद्र, काळा दिवस होता. तेवढ्यात समोरून आवाज येऊ लागले. धुराचे ढग थोडे विरळ झाल्याबरोबर समोरचं दृश्य दिसू लागलं. पोलिसांच्या बंदुकांच्या संरक्षणात काही लोक बाहेर येत होते. त्या येणाऱ्या लोकांच्या गर्दीत तहरीमची अम्मी दिसत होती, तिच्या एका बाजूला तहरीम तर दुसऱ्या बाजुला तृपित होती. त्या धुरात अजुनी जमीन दिसत नव्हती की आकाश दिसत नव्हतं, सगळं धूसर-धूसर होतं, सावल्या होत्या आणि दोन्ही मुलींच्या पाठीवर आईचा हात होता. त्या दोघी घाबरून, अम्मीला चिकटून चालत येत होत्या.

तो एक क्षण असा होता, की ना कोणी भारतीय होतं, की ना कोणी पाकिस्तानी, फक्त दहशत होती आणि घाबरलेले लोक होते. एक आई होती, जिचा संबंध ना कुठल्या देशाशी होता, ना कुठल्या सीमेशी! ती फक्त आणि फक्त मुलांची आई होती! एकेका बाजुला तहरीम आणि तृपित होत्या आणि त्यांच्या पाठीवर अम्मीचा हात होता. मंटो यांच्या कथेतील टोबा टेकसिंहचे ते दृश्य जसं काही परत एकदा जिवंत झालेलं होतं, जिथे जमिनीच्या त्या तुकड्यावर कुठल्याही देशाचं नाव नव्हतं. अगदी तसेच इथे अम्मीचे ते हात होते, जे ना भारताचे होते, ना पाकिस्तानचे! हे एका मातेचे हात होते, माता जी मुलांची जननी असते! आपल्या मुली सुरक्षित आहेत हे बघून आज पहिल्यांदाच अम्मी आणि मम्मी एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या. समोर उभ्या असलेल्या आजीच्या डोळ्यातही अश्रू होते, जे तिच्या मनातला द्वेष धुवून टाकण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत असावेत!                                                 

– समाप्त –

मूळ हिंदी कथा – अम्मी और मम्मी – मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिवरात्र आणि ऊसाचा रस – सुश्री विनीता क्षीरसागर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ शिवरात्र आणि ऊसाचा रस – सुश्री विनीता क्षीरसागर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

पूर्वी शिवरात्र आणि उसाचा रस हे जणू समीकरणच ठरलेले होते. म्हणून लहानपणी आम्ही अगदी वाट बघत बसायचो, शिवरात्रीची….!                     

पूर्वी उपवासाचे पदार्थ अगदी पोटभर असे मोठी एकादशी, शिवरात्र, अशा मोठ्या उपवासालाच मिळायचे………….! नाहीतर एरवी मोठ्या माणसांना फराळासाठी केले की एकेक घास हातावर मिळायचा…….! आता कसे आपण एरवी सुध्दा साबुदाणा खिचडी करतो..! किंवा बाहेर हॉटेलमध्येसुध्दा खिचडी, साबुदाणा वडे इ… सगळे काही मिळते……! पूर्वी अगदी आई, आजी राजगिऱ्याच्या लाह्या सुध्दा घरी फोडायच्या……!                                                                        

शिवरात्रीला आजीबरोबर  सगळ्यांनी रामेश्वर मंदिरात जायचे….. आल्यावर साबुदाण्याची खिचडी, बटाटा भाजी, कवठाची पाट्यावर वाटलेली चटणी, घरी केलेल्या तळलेल्या पापड्या, खाडिलकरांकडून विकत आणलेले ताक, रताळयाचे गुळाच्या पाकातले काप ह्यावर अगदी पंगत मांडून यथेच्छ ताव मारायचा एवढेच होते…!

नंतर दुपारी सगळी मोठी मंडळी डाराडूर पंढरपूर म्हणून झोपून जायची………..! घरातली लहान मुले मात्र केव्हांच एकदाचे साडे चार  वाजून जातायत  ह्याची वाट बघत घड्याळ बघत बसायची……! कारण  दुपारी पाच वाजून गेले की घरी उसाचा रस आणायचाच हे शिवरात्रीला ठरले असायचे…..! तोही एक कार्यक्रम च असायचा….! स्टीलची एखादी मोठी लोटी घेऊन गुऱ्हाळात जायचे, जाताना बर्फासाठी एखादा मोठा कापडी रूमाल किंवा पिशवी घेऊन जायची……!  त्या वेळी आमच्या घराच्या जवळ म्हणजे धर्म चैतन्याच्या कोपर्‍यावर एक गुऱ्हाळ सुरू झालेले असायचे. तट्टे ठोकून केलेल्या भिंतभर रंगीबेरंगी कॅलेंडर्स, देवांची चित्रे लावलेल्या त्या गुऱ्हाळात जायला खूप छान वाटायचे……..! आई त्याला गेल्या बरोबर “ताजा काढून देरे बाबा रस” म्हणून बजावायची….. तसेच न विसरता त्यात आले लिंबू टाकायला सांगायची……….! त्याचा रस चक्रातून काढणे……., भुश्श्यातला तरटात गुंडाळलेला बर्फ फोडणे हे जवळून बघायला खूप मजा वाटायची…..!  त्या वेळी फ्रीज नव्हते म्हणून बर्फ बाहेरून च विकत घ्यावा लागे……………! गुऱ्हाळात सुध्दा बर्फाचे वेगळे पैसे द्यावे लागत……! … असे सगळे करून एकदाचा रस घरी यायचा……….!                                 घरातले चहाचे कप रसासाठी सज्ज असायचे….! बर्फ पाण्याने स्वच्छ धुवून फोडून झाला की रसाचे कप भरून सगळयांना रसाचा वाटप व्हायचा……!..

….. रस पिऊन मन तृप्त व्हायचे व आता खरी शिवरात्र साजरी झाली असे वाटायचे………! दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर “काल आमच्या कडे उसाचा रस आणला होता.” हे न चुकता सांगण्यात एक धन्यता वाटायची…………! कारण पूर्वी उसाचा रस पिणे ही सुध्दा एक चैनच वाटायची……..! बैलाच्या चरकावरचा रस पिण्यासाठी आम्ही सगळे… घरातले लोक  लक्ष्मी रोड जवळच्या इलेक्ट्रिक आॉफीसजवळच्या गुऱ्हाळात जायचो…….! ते सुध्दा सगळ्यांच्या वार्षिक परीक्षा झाल्यावर बरं का………!

लेखिका : सुश्री विनीता क्षीरसागर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – kelkar1234@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ? — कवी रमण रणदिवे ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ? ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆  

भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?

यावर आपण एक उदाहरण बघू. तीन महिन्यांसाठी एक प्रयोग करून बघा. सात्त्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो. कारण जसे अन्न, तसे मन होते. सात्त्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही, तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते.

जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल, तर त्यास सात्त्विक अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक  करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात, उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये. (जेवण बनवू नये. अन्न शिजवू नये.)

तसेच स्वयंपाक करत असताना कधीही आईला, बहिणीला, पत्नीला (जे कोणी स्वयंपाक करत असतील, त्यांना) ओरडू नये, रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना, त्या पदार्थांत त्याच प्रकारची (सर्व रागाची) स्पंदने जातात आणि तेच आपण खाणार असतो. ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

आणि म्हणूनच पूर्वी सोवळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती.

भोजन तीन प्रकारचे असते.

(१) जे आपण हॉटेलमध्ये खातो,

(२) जे घरात आई, पत्नी बनवते आणि

(३) जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो, ते भोजन.

तिन्ही भोजनांत वेगवेगळी स्पंदने असतात.

(१) हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात, ते विकत घेऊन खावे लागते. ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत. त्यामुळे कधी कधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो. ते पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याचा भाव कोणता आहे, ते सगळं त्या अन्नात उतरतं, तेच संस्कार त्या अन्नावर होतात. तोच भाव आपल्यात उतरतो.

(२) घरात आई, पत्नी जे पदार्थ करते, ती फार प्रेमाने करत असते. म्हणून त्या पदार्थांत सात्त्विक स्पंदने असतात, ती आपणास समाधानी बनवतात. 

परंतु हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात. त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत.

घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल, की मला अजून एक पोळी वाढ. तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो. ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते. त्यात तिचे प्रेम असतं, आनंद असतो. पण हेच आपण स्वयंपाक्याकडे मागितले, तर तो वाढेल; पण त्यात प्रेम असेलच, असे नाही. असे जेवण अंगी लागत नाही.

(३) मंदिरात अन्नकोटात आपण जे खातो, तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो. ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते.

आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत, असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसादच भक्षण होईल.

स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल, तर त्यावर हा एक उपाय आहे. ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा.

परमेश्वरास प्रार्थना करावी, की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम , वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे. त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता, तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा.

अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्कारांचाही परिणाम होतो. स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे भाजी असो, कुकर असो, काही असो, त्या पात्राला हात लावून कृष्णार्पणमस्तु म्हणून नमस्कार करा. मग बघा, काय जादू होते.. 

सगळी आसपासची सूक्ष्म स्पंदनं संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल प्रसाद !

संग्रहिका : माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares