मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक आटपाट नगर होतं … या नगरात एक चिऊताई राहायची.

गरीब घरातल्या या चिऊताईचं एका कावळ्याशी लग्न झालं …

चिऊताईने कावळ्याशी आनंदाने संसार मांडला…काडी काडी जमवून घरटं बांधलं …. यानंतर काही दिवसांनी चिऊताई आणि कावळ्याला एक मुलगी झाली, त्यांनी तिचं नाव “चिमणी” ठेवलं…. !

पण काळा कावळाच तो…. काही दिवसांनी चिऊताईला आणि या छोट्या चिमणीला सोडून तो पळून गेला… त्याने नावाप्रमाणे तोंड काळं केलं…! 

चिऊताईला कळेना, की छोट्या बाळाला…या माझ्या चिमणीला आता खाऊ काय घालायचं ?

बिन बापाच्या या चिमणीला कुणाचा आधार नव्हता…. चिऊताईने तिच्या या बाळाच्या डोक्यावर आपले पंख धरले…. पण तिचे इवलेसे ते पंख अपुरे होते….

छोट्या चिमणीसाठी अन्न शोधायला….चिऊताई काम शोधायला निघाली… वाटेत खूप गिधाडं भेटली…. त्यांनी चिऊताईला हवं तसं “ओरबाडून” घेतलं …! काम कोणीच दिलं नाही आणि केलेल्या कामाचे पैसे सुद्धा  !

तिच्या कडून मात्र “मोबदला”  घेतला.

सगळे पर्याय संपल्यावर, चिऊताईला भीक मागणे हा पर्याय सोपा वाटला… भीक मागून तान्ह्या चिमणीला तिने वाढवलं …. चिऊताई स्वतः निरक्षर होती…. परंतु शिक्षणाचे महत्त्व जाणून होती…भीक मागून चिऊताईने तिच्या छोट्या चिमणीला शिकवलं… पहिली… दुसरी… तिसरी …. चौथी नव्हे, तर तब्बल बारावी कॉमर्स पर्यंत शिकवलं…

नोकरी / जॉब असणारे … सिक्युअर्ड पगार असून सुद्धा मुलांना शिकवताना कितीतरी पालकांची तारांबळ उडते….

अशा परिस्थितीत भीक मागून, अनिश्चिततेच्या वातावरणात राहून, या चिऊताईने तिच्या चिमणीला बारावी कॉमर्स पर्यंत शिकवलं…. 

——महाराजांच्या गडावरील हिरकणीचं आधुनिक रूप होतं हे…. ! 

तर…. ही छोटी चिमणी आता बारावीपर्यंत पोहोचली…. स्वतंत्र विचार करू लागली….

आईला ती एके दिवशी म्हणाली, “ इतकं शिकवलं आहेस तू…. पण आता मला इथून पुढे ” बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ” मध्ये जायचं आहे…” बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन” (BBA) हा बारावी नंतरचा ग्रॅज्युएशनचा कोर्स करायचा आहे मला…”

निरक्षर चिऊताईला तर हे शब्द म्हणतासुद्धा येत नव्हते…

पण चिऊताईला हे जाणवलं…. आपल्या चिमणीची स्वप्नं फार मोठी आहेत…. ! 

या छोट्या चिमणीला माहीतच नव्हतं, की आपली आई भीक मागून आपल्याला शिकवते आहे….चिऊताईने आपल्या या छोट्या चिमणीला असं कधी जाणवूच  दिलं नव्हतं … 

चिऊताई च्या मातृत्वाला माझा सलाम ! चिऊताईने स्वतः भीक मागितली….पण मुलीला ते कळूही दिलं नाही…

हीच चिऊताई स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून, पोटच्या पोरीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द देत होती…. तिच्या पंखात बळ भरत होती…

—-आई… आई …. म्हणतात ती हीच असेल का ?

पण …. पोरीला ” बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन कोर्स ” करायचा आहे, हे ऐकून चिऊताई हबकली….

एका वर्षाचा खर्च साधारण ३५००० रुपये…. अशी तीन वर्षे….???

कुठनं आणायचे हे पैसे ?

चिमणीचं मन तरी कसं मोडायचं ??

चिमणी आता शिकणार… की… की आपल्यासारखीच भीक मागणार ????

चिऊताईचा रात्र रात्र डोळा लागत नव्हता… नेमकं काय करावं ? चिऊताई चिंतेत होती…. पण चिमणी निश्चिंत होती…. ! आई सर्व काही व्यवस्थित करेल यावर तिचा विश्वास होता…. आईच्या पदराखाली ती सुरक्षित होती….

आईच्या पदराला खिसा नसतो. परंतू जगायला बळकटी  देण्याचं सामर्थ्य याच जीर्ण पदरात असतं… जगातील सर्व संपत्ती इथेच दडलेली असते….!!!

तर, चिऊताई चिंतेत होती….

आणि नेमकी याच काळात माझी आणि या चिऊताईची भेट व्हावी…. हा कोणता संकेत असेल ? 

चिऊताई एकदा भीक मागताना मला दिसली… तरुण बाई भीक मागते…

माझ्या स्वभावाप्रमाणे मी तिला टोकलं… खोदत गेलो, खणत गेलो ..!  यानंतर रडत तिने वरची कहाणी मला सांगितली…. !

मी म्हणालो, “ मी जर तुझ्या चिमणीचं सर्व शिक्षण पूर्ण केलं तर चालेल का तुला ? “

माझ्या या वाक्यानंतर…. शॉक लागावा तशी ती माझ्यापासून दूर झाली ….साशंक चेहऱ्याने आणि कावऱ्या बावऱ्या नजरेने म्हणाली, “ पन या बदल्यात मला  तुमाला काय द्यायला लागंल ? “

मी हसत म्हणालो, “ फक्त एक राखी….! “ 

तिचा विश्वास बसेना… 

“ खरं म्हणता काय ??? “ तिच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. 

क्रमशः…

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग -2 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग -2 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

दुदुंभी राक्षसाच्या उत्पातामुळे हिमवान त्रस्त झाले. तरीही शांतब्रम्ह्य अविचल राहिले. त्यांनी मानसिक शांतता ढासळू दिली नाही. निळसर पांढर्‍याशुभ्र ढगांच्या आकारांत प्रसन्नपणे हिमवान त्या राक्षसासमोर येऊन अत्यंत सौम्यपणे विचारले, “हे राक्षसा! कां त्रास देतोस मला..?”

त्यावर दुदुंभी म्हणाला, “मी असे ऐकले की, तुला आपल्या बळाची, सामर्थ्याचे फार घमेंड आहे, म्हणुन तुला युध्दाचे आव्हान देण्यास आलो आहे.”

हिमवान स्मित करीत म्हणाले, “तू चुकीच्या ठिकाणी आला आहे. मी काही युध्दकुशल, युध्दनिपुण नाही, युध्द करणे हा माझा मनोधर्मच नाही. उगीच शिलावर्षाव करुन कां मला त्रस्त करतो आहेस? अरे! मी हिमालय म्हणजे शांतीचे वसतिस्थान. तपस्यांचे माहेर आहे. तपश्चर्येचे निजधाम आहे. इथे पुण्यवंतांचे पुण्य फुलते. तुला एवढीच युध्दाची हौस आली असेल तर किष्किंधा नगरीत महापराक्रमी, महाप्रतापी वानरराज वाली राज्य करीत आहे. तोच तुझ्याशी युध्द करण्यास समर्थ आहे.”

हिमवानाचे भाषण ऐकुन दुदुंभी आणखीनच चढला. हातातील गदा सांभाळीत  किष्किंधा नगरीत प्रविष्ट झाला. जोरजोरांत डरकाळ्या फोडत वालीला युध्दासाठी पुकारु लागला. पराक्रमी वालीने आव्हान स्विकारले. दोघांमधे घनघोर युध्द सुरु झाले. हळुहळू दुदुंभीची शक्ती क्षीण होऊ लागली व  वालीची शक्ती वाढू लागली. अखेर वालीने त्याला ठार केले. अजस्र राक्षस चेतनाहीन होऊन खाली कोसळला.

वाली एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अविचाराने दुदुंभीचे प्रेत उचलुन गरागरा फिरवले व एक योजनाभर  लांब भिरकावुन दिले.

दूदुंभीचे प्रेत मतंगत्रृषींच्या आश्रमावरुन पलीकडे फेकल्या गेले. त्यावेळी त्याच्या मुखातुन अंगातुन जे रक्ताचे थेंब उडाले ते सबंध आश्रमावर पडले. स्वतः मतंगत्रृषी एका शिलेवर तपश्चर्या करीत असतांना त्यांच्याही अंगावर अंगावर त्या रक्तांचे थेंब पडले.

मतंगत्रृषींची तपश्चर्या भंग पावल्याने त्यांनी डोळे उघडुन पाहिले, तर काय! त्यांच्या सर्वांगावर रक्ताचे थेंब पडले होतेच. शिवाय आश्रमभर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. ते पाहुन त्यांचा अतिशय संताप झाला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला असतां, आश्रमाच्या पलीकडे त्रृध्यमूक पर्वताच्या पलीकडे एका अवाढव्य असूराचे प्रेत पडलेले दिसले.

त्रृषींनी अंतर्दृष्टीने पाहिले असतां ही सारी करामत वालीची आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्याची सहनशक्ती नष्ट झाली. त्यांनी वालीला शाप दिला, “त्या दुर्बुध्दी वालीने या राक्षसाच्या रक्ताने हा आश्रम अपवित्र केला, हा पर्वत दूषित केला. जर कां त्याने या पर्वतावर पाय ठेवला तर त्याला तात्काळ मरण येईल, त्याचे जे मित्र इथे असतील त्यांनी ताबडतोब हा पर्वत सोडावा, अन्यथा त्यांना मरण पत्करावे लागेल. उद्या जो कोणी वालीचा मित्र इथे दृष्टीस पडला तर त्याचे रूपांतर होईल.”

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हरवलेला मधुचंद्र… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ हरवलेला मधुचंद्र.. ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

मी तीस वर्षांनंतर पुन्हा महाबळेश्वरला चाललो होतो. मी गाडी चालवत होतो व माझ्या शेजारी  प्रतिमा बसलेली होती. कात्रजचा घाट सुरु झाला होता.. घाटातील प्रत्येक वळणावर, मला तीस वर्षांपूर्वीचा आमचा मोटरसायकलवरचा पहिला प्रवास आठवू लागला..

मी खेड्यातून शहरात येऊन शिक्षण घेतले. पुणे विद्यार्थी गृहात आश्रमवासी म्हणून राहून ते पूर्ण केले. तेथीलच प्रिंटींग टेक्नाॅलाॅजीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डिप्लोमा घेतला. माझ्या सरांच्या ओळखीने मला एका प्रेसमध्ये नोकरी मिळाली.  दोन वर्षांतच माझं प्रिंटींगमधलं कौशल्य पाहून प्रेसच्या मालकांनी मला स्वतंत्र प्रेस थाटून दिला. माझ्याकडे दोन ट्रेडल मशीन होती. मी रात्रंदिवस काम करुन या व्यवसायात यश प्राप्त केले..

मालकांशी माझे कौटुंबिक संबंध होते. सणावाराला ते मला घरी बोलवायचे. त्यांना प्रतिमा नावाची एकुलती एक मुलगी होती. तिचं काॅलेजचं शिक्षण चालू होतं..

पाच वर्षातच मालकांनी देऊ केलेल्या प्रेसची सर्व रक्कम मी आलेल्या कमाईतून फेडून टाकली. आता याच व्यवसायात मला उत्तुंग यश मिळविण्याची महत्त्वाकांक्षा होती.

एके दिवशी मला मालकांनी घरी बोलावलं. मी गेल्यावर दोघा उभयतांनी मला लग्नाबद्दल विचारलं. मी अजून तसा विचारच केला नव्हता. त्यांनी, आमच्या प्रतिमाशी तू लग्न करशील का? असं विचारल्यावर मी तर निशब्दच झालो.. खरं तर प्रतिमाला पाहिल्यापासून, मी तिच्या प्रेमातच पडलो होतो मात्र मालकांना काय वाटेल, या विचाराने शांत राहिलो.. आज तर त्यांनीच तिच्याविषयी विचारुन मला आनंदाच्या लाटेवरच ढकलून दिलं होतं.. 

महिन्याभरातच आमचं लग्न झालं. मी नुकतीच नवीन मोटरसायकल घेतलेली होती. त्यावरुनच आम्ही मधुचंद्रासाठी महाबळेश्वरला जायचं ठरवलं.. 

कात्रज घाटातून जाताना प्रत्येक वळणावर प्रतिमा घाबरुन मला घट्ट बिलगत होती.. आणि मी रोमांचित होत होतो.. रमत गमत आम्ही चार तासांनी महाबळेश्वरला पोहोचलो.. तिथं हाॅटेल मिळवून देणारी काही माणसं आमच्या मागे लागली. त्यातील एका बारा चौदा वर्षांच्या मुलाला मी जवळ बोलावून तुझं हाॅटेल कुठं  आहे हे विचारलं. ते बाजारपेठेतच असल्याने तिथंच उतरायचं मी नक्की केलं.. हाॅटेलच्या काऊंटरमागे एक पारशी मालक बसला होता. हाॅटेलमधील रुम ताब्यात घेतली व सामान ठेऊन फ्रेश झालो.. त्या मुलाच्या हातावर पाच रुपये ठेवल्यावर तो खुष झाला.. 

त्याला नाव विचारल्यावर त्यानं ‘सलीम’ असं सांगितलं.. तो गाईडचंही काम करीत होता.. मी त्याच्यासोबत महाबळेश्वरमधील सर्व पाॅईंट्स व प्रेक्षणीय ठिकाणं पहाण्याचा निर्णय घेतला.. साडेचार वाजले होते, आम्ही सनसेट पाॅईंटला जायचं ठरवलं..

तिथं पोहोचल्यावर पाहिलं, तर पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढू लागली होती.. आम्ही दोघांनीही घोड्यावरुन रपेट मारण्याचा आनंद घेतला..

प्रतिमा एका उंच टेकाडावर, लाल टोपी घालून बसलेली होती. मी तिचे क्लिक थ्री कॅमेऱ्याने फोटो काढत होतो.. तेवढ्यात एक स्केचिंग करणारा चित्रकार माझ्याजवळ आला व म्हणाला, ‘तुमची हरकत नसेल तर मी यांचं एक स्केच करु का?’ मी होकार देऊन, तो स्केच कसे काढतो ते पाहू लागलो.. अवघ्या दहा मिनिटात त्याने लाल टोपी घातलेल्या प्रतिमाचे व समोर पसरलेल्या निसर्गाचे अप्रतिम स्केच, कलर पेन्सिलीने पूर्ण केले.. 

प्रतिमा तर ते चित्र पाहून बेहद खुष झाली. तिनं न राहवून त्याला विचारलं, ‘हे चित्र, तुम्ही मला द्याल का?’ तो कलाकार फारच संवेदनशील होता, त्याने त्यावर ‘शुभेच्छा’ लिहिले व खाली सही करुन तिच्या हातात दिले. मी त्या दोघांचा, एक आठवण म्हणून फोटो काढला…

सनसेट डोळ्यात साठवून आम्ही परतलो.. ते चार दिवस आम्ही खूप भटकलो. तेथील काही ठिकाणं हिंदी चित्रपटातील गाण्यांतून अनेकदा पाहिलेली होती.. जुनं महाबळेश्वर पाहिलं.. बाजारपेठेत खरेदी केली. त्या चार दिवसांत हाॅटेलच्या, पारशी मालकाशी माझी चांगलीच ओळख झाली होती.. 

महाबळेश्वरहून आम्ही स्वर्गीय आनंद उपभोगून, परतताना हाॅटेल मालकाचा निरोप घेतला. त्यांनी पुन्हा कधीही आलात तर इथेच या असं आम्हाला आपुलकीनं सांगितलं…

आम्ही दोघेही संध्याकाळी घरी पोहोचलो. आमचा संसार सुरु झाला.  मी पुन्हा प्रेसच्या कामात गुंतलो.. कामं वाढली होती. नवीन प्रिंटींगची मशीनरी घेतली. स्टाफ वाढला. आम्हाला मुलगा झाला. त्याचं सगळं करण्यात प्रतिमा गुंतून गेली..

वीस वर्षे हा हा म्हणता निघून गेली. मुलांचं शिक्षण पूर्ण झालं. माझा प्रेस हा शहरातील सर्वोत्तम प्रिंटींगची सेवा देणारा म्हणून सर्वांना परिचित झाला.. 

बंगला, कार, बॅंक बॅलन्स सर्व काही प्राप्त झालं. मुलाचं लग्न झालं. त्यांचा संसार सुरु झाला. आता आम्ही जबाबदारीतून मुक्त झालो होतो.. 

इतक्या वर्षांत आम्हा दोघांना बाहेर पडता आलं नव्हतं, म्हणूनच पुन्हा एकदा महाबळेश्वरला निघालो होतो.. खेडशिवापूरला जिथं तीस वर्षांपूर्वी ‘कैलास भेळ’ नावाची साधी शेड होती, तिथं आता मोठी पाॅश इमारत उभी होती. महाराष्ट्रीयन व दाक्षिणात्य पदार्थांसाठी प्रवाशांनी गर्दी होती. आम्ही तिथं मिसळचा आस्वाद घेतला व पुढे निघालो..

सुमारे तीन तासांनी आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो. महाबळेश्वर ओळखू न येण्याइतपत बदलून गेलेलं होतं.. आम्ही पूर्वीचं हाॅटेल शोधत होतो.. तेवढ्यात एक चाळीशीतला तरुण माझ्याकडे निरखून पाहू लागला.. मी सलीम पुटपुटताच त्यानं मला ओळखलं.. माझ्या रुपेरी केसांमुळे तो साशंक होता.. त्याने ते पूर्वीचं हाॅटेल दाखवलं.. हाॅटेलचं काऊंटर आता फर्निश्ड होतं. मालक मागील बाजूस हार लावलेल्या फोटोमध्ये गेले होते.. त्यांचा मुलगा काऊंटरवर होता.. आम्ही गेल्या वेळचीच रुम त्याला मागितली.. 

फ्रेश होऊन आम्ही दोघेही बाहेर पडलो. सनसेट पाॅईंटला गेलो. पाॅईंटवर गर्दी भरपूर होती. घोडेवाले  फिरत होते, मी प्रतिमाला विचारलं, ‘मी रपेट मारु का?’ तिनं मला हात जोडले.. सनसेट पाहून आम्ही परतलो.. वाटेतच जेवण केलं. चार दिवसांचा प्लॅन करुनही दोन दिवसांतच दोघेही कंटाळून गेलो. प्रत्येक ठिकाणं पुन्हा पहाताना दोघांनाही भूतकाळ आठवत होता.. पूर्वीचा निसर्ग आता आधुनिकीकरणामुळे राहिलेला नव्हता.. बाजारपेठ आता शहरासारखीच गजबजलेली होती. रात्री मुलानं व्हिडिओ काॅल करुन चौकशी केली. इकडची काळजी करु नका, आणखी दोन दिवस रहा.. असं म्हणाला..

रात्री मी विचार करीत होतो, तीस वर्षांपूर्वी जो आनंद मिळाला.. तसा आता मिळत नाही.. तेव्हा जी स्वप्नं पाहिली, ती आज सत्यात अनुभवतो आहे.. काळ हा कधीच थांबत नाही.. आज मी तोच आहे, मात्र सभोवतालचं जग बदललं आहे.. हा बदल मान्य करायलाच हवा… प्रतिमाला गाढ झोप लागली होती.. मी तिच्या अंगावर ब्लॅंकेट घातले व झोपी गेलो…

सकाळी आवरुन आम्ही निघालो.. हाॅटेलचं बिल पेड केलं.. गाडी स्टार्ट केली.. तेवढ्यात सलीम पुढे आला, प्रतिमानं त्याला बक्षिसी दिली व आम्ही रस्त्याला लागलो.. या तीस वर्षांत जग जरी बदललं असलं तरी एक गोष्ट अजिबात बदलली नव्हती.. ती म्हणजे प्रतिमा !! आज या प्रतिमेमुळेच जनमानसात माझी  ‘प्रतिमा’ उंचावलेली आहे…

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग -1 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग -1 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

हनुमानाने राम-लक्ष्मणाला त्रृष्यमुख पर्वतावर सुग्रीवाची भेट घालुन दिल्यावर रामाने सुग्रीवाला स्वतःचे राज्य असतांना निर्वासीत कां झालास म्हणुन विचारले असतां, सुग्रीवाने रामाला, आपला भाऊ, वाली आणि त्याच्यात दोघांमध्ये गैरसमजुतीने निर्माण झालेली दुःखद कथा कथन केली.

वालीचा जन्म अरुणी  आणि इंद्रापासुन तर सुग्रीवाचा जन्म अरुणी आणि सुर्यापासुन झाला. दोघांनाही गौतमत्रृषी व अहिल्येकडे ठेवले होते. गौतम अहिल्येला अंजना नांवाची मुलगी होती. अहिल्येला भ्रष्टकरण्याकरिता इंद्र आला ही गोष्ट तिने तिचे वडील गौतमांना सांगीतले म्हणून अहिल्येने तिला वानरी होण्याचा आणि मुलांनी ही बातमी सांगीतली नाही म्हणुन गौतमांनी मुलांना वानर होण्याचा  व अहिल्येला एकांतवासांत पाषाणवत होण्याचा शाप दिला.

गौतमत्रृषींना आईविना पोरक्या  मुलांचे रुपांतर झालेल्या वानरांबद्दल फार वाईट वाटले. एकदा तोंडातुन निघालेली शापवाणी माघारी पण घेता येत नव्हती. म्हणून त्यांनी त्या तिन्ही वानरांना किंष्किंधेच्या निपुत्रीक वानर राज रिक्षवांनाकडे सोपवले. तिथे त्यांचे शिक्षण झाले. विवाहयोग्य झाल्यावर अंजनाचा विवाह केशरीशी, वालीचा विवाह वानरप्रमुख सुषेनची कन्या ताराशी आणि सुग्रीवाचा विवाह रुमाशी झाला.

रिक्षराजांचे मुलांवर निरतिशय प्रेम होते. मृत्यूपूर्वी त्यांनी वाली व सुग्रीवला आपल्या राज्याचे वारस केले. किंष्किंधेत सर्व सुरळीत व कुशल सुरु असतांना दुंदुभी नांवाचा एक राक्षस जो नेहमी रेड्याच्या रुपांत वावरत असे,तो भल्यामोठ्या पर्वतासारखा अवाढव्य दिसत असे. त्याच्या अंगात हत्तीचं बळ होते. त्याला देवाचे वरदान प्राप्त असल्यामुळे अत्यंत उन्मत्त बनला होता.

दुदुंभी राक्षलाला आपल्या शक्तीचा फार गर्व झाला होता. तो फिरत फिरत जलनिधी समुद्राकडे आला असता समुद्राच्या पर्वतासारख्या लाटा एका पाठोपाठ एक अशा उसळत होत्या. लाटांच्या धीरगंभीर आवाजाने सारे अंतराळ भरुन गेले होते. सागराच्या लाटांचा जोर पाहुन व गर्जना ऐकुन दुदुंभी राक्षस संतापला. त्या राक्षसाने मोठमोठ्याने गर्जना करुन सागराला युध्दासाठी आव्हान देऊ लागला. राक्षसाचे आव्हान ऐकुन समुद्र देव पाण्यातुन बाहेर येऊन राक्षसाला म्हणाले, “मी तुझ्याशी युध्द करण्यास असमर्थ आहे. तूं पर्वतराज हिमालयाकडे जाऊन त्याच्याशी युध्द कर! गिरिराज तुझ्याशी युध्द करण्यास समर्थ आहे.”

दुदुंभी राक्षस जास्तच उन्मत्त व गर्विष्ठ बनला. तो हिमालय पर्वताकडे गेला. गिरीराज हिमालय अपल्या पांढर्‍या उंच उंच शिखरांनी तळपत होता. पर्वतांचा परिसरांत शांत, पवित्र वातावरण होते. ती निस्तब्धता, ती शांतता, ते पावित्र्य, मांगल्य पाहुन राक्षसाला खूप संताप, राग आला.त्या शांत वातावरणाचा भंग करण्यासाठीच जणू तो मोठमोठ्या शिळा उचलुन हिमालयाच्या शिखरावर फेकु लागला.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अखेरचा प्रवास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ अखेरचा प्रवास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

अनुजाचा, मायाच्या मुलीचा फोन आला. माया आमची जवळची मैत्रीण. खरे तर आमच्याहून मोठी,

पण झाली खरी जवळची मैत्रीण. अनुजा मायाची मुलगी. काय काम असेल, असा विचार करत होते, तेव्हा अनुजाचा पुन्हा फोन आला—-“ मी भेटायला येऊ का मावशी ? “ आणि अनुजा संध्याकाळी भेटायला आली. 

——माया हल्ली एकटीच रहात असे. तिचा मुलगा आनंद गेली अनेक वर्षे जपानला स्थायिक झाला होता. माया आणि तिचे मिस्टरही अनेकवेळा जपानवाऱ्या करून आले होते. आनंदच्या जपानी बायकोचे आणि जुळ्या मुलींचे फोटोही बघितले होते आम्ही. अनुजाही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होती. माया कॉलेजमध्ये प्रोफेसर होती .आणि तिचे यजमान एका कंपनीतल्या चांगल्या पोस्टवरून निवृत्त झाले होते. हल्ली खूप महिन्यात माया भेटलीच नव्हती मला. मध्यंतरी अचानकच मायाच्या यजमानांचे हृदयविकाराने निधन झाले, तेव्हा आम्ही सगळ्या भेटून आलो होतो.

माया स्वतःच्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. मायाने आपला छान ग्रुप जमवला होता. कधी ते ट्रीपला, कधी कोणाच्या farmhouse वर जात. एकटी राहणारी माया चांगली खम्बीर होती. तिचे आयुष्य तिने छान बेतले होते. तिच्या मैत्रिणी, कॉलेजचे मित्रमंडळी–अगदी  व्यस्त असे दिनक्रम मायाचा. पैशाची ददात नव्हती, आणि 

हौसही होतीच. कधीतरी आम्हालाही भेटायची माया. पण गेल्या जवळजवळ वर्षभरात भेट झालीच नव्हती तिची.

अनुजाचे काय काम असावे या विचारात मी पडले. अनुजा आली आणि म्हणाली, “ मावशी  वेळ न घालवता, मुद्द्याचेच बोलते. बाबा गेले तेव्हा अतिशय धीराने घेतले आईने. मी, दादा,म्हणालो,आई एकटी राहू नको, आमच्या घरी ये राहायला. पण ती म्हणायची,अरे तुम्ही आहातच की. पण होतंय तितके राहीन की मी. तुम्ही मुले काय रिकामी आहात का. आणि येतेच की मी अधूनमधून.” आम्हीही याला कधीच हरकत घेतली नाही. मी दर आठ्वड्याला चक्कर मारतेच. पण गेल्या वर्षभरात आईमध्ये हळूहळू बदल होताना दिसला मला. मावशी, तिचे लक्षच नसते आम्ही बोलतो त्याच्याकडे.अस्वस्थ हालचाल करते बोटांची. घरही पूर्वीसारखे छान आवरलेलेले नसते. अशी आई कधीही मी बघितलेली नाही ग. ती हल्ली स्वयंपाक तरी नीट करते की नाही, जेवते का नाही ,तेही मला माहित नाही.” 

“अनुजा,तू असे कर. काही दिवस तुझ्या घरी रहायला घेऊन जा, म्हणजे तुला ती चोवीस तास कशी रहाते हे नक्की समजेल. तिने विरोध केला,तरी नेच तिला. मला दर आठवड्याला फोन करून कळवत मात्र जा हं.”

अनुजाने मायाला तिच्या घरी नेले. नातवंडांनी उत्साहाने स्वागत केले आजीचे. त्यांना पूर्वीची आजी हवी होती. 

पण आत्ताच्या आज्जीमध्ये लक्षात येण्याइतका बदल झालेला त्यांनाही जाणवलाच . अनुजाने मायासाठी दिवसभराची बाई ठेवली. नशिबाने त्या बाई खरोखरच चांगल्या मिळाल्या. मायाबरोबर त्या पत्ते खेळत, तिला पुस्तक वाचायला बसवत. मायामध्ये जरा सुधारणा होत असलेली दिसली.औषधेही चालू केलेली होतीच.

मध्यंतरी महिनाभर बाई रजेवर गेल्या. आता मायाला २४ तास कोण कसे देऊ शकणार होते? पुन्हा माया तिच्या कोशात गेली. हळूहळू मायाचे बोलणे कमी झाले. टक लावून नुसती बघत बसायची.

“आई,अग घास घे ना, चावून खा ग.” मायाला  हळूहळू तेही उमजेनासे झाले.दैनंदिन नैसर्गिक विधीवरचा  तिचा ताबा सुटला. अनुजाने अथक प्रयत्न केले. बायकाही ठेवल्या. पण ते अनुभव काही फारसे चांगले आले नाहीत.

मायाचे घर तर केव्हाचेच बंद झाले होते. एकदा अनुजाने  मायाला  त्या  घरी नेले. तिच्या फ्लॅटजवळ आल्यावर माया नुसतीच भिरभिर बघत राहिली. शेजारच्या काकू भेटायला आल्या.“ मायाताई,चला आमच्याकडे कॉफी प्यायला.” काकूंनी प्रेमाने हात धरला. मायाने तो हिसडून टाकला,आणि ‘या कोण’ असे मुलीला विचारले.

‘ घरी– घरी ‘असे पुटपटू लागली. काकू हे बघून घाबरूनच गेल्या. हताश होऊन अनुजा मायाला घरी घेऊन आली.

 आता अनुजालाही आईला  सांभाळणे अतिशय अवघड होऊन बसले होते. 

अशी चार वर्षे गेली. मध्यंतरी आनंद येऊन भेटून गेला.“अनुजा,काहीही झाले तरी आईला वृद्धाश्रमात ठेवायचे नाही हं.” असे बजावून गेला. अनुजाला भयंकर रागही आला,आणि दुःख तर झालेच.’ काय हा मुलगा. आज इतकी वर्षे मी एकटी आईला सांभाळते आहे,कधी चौकशी केली का? किती ,कोणत्या अवघड परिस्थितीतून मी जातेय 

याची ‘– माझा नवरा देव माणूस आहे,तोही आईचे सगळे करतो. मला फक्त हा उपदेश करून आनंद मात्र निघून गेला. वावा.” अनुजाचा तोल सुटला होता . ती आनंदला म्हणाली होती ,” हो का? मग जा घेऊन जपानला. करते का बघू तुझी ती बायको. हे बघ आनंद, मला हौस नाही आईला वृद्धाश्रमात ठेवायची. पण तो निर्णय मी घेईन.पुन्हा मला असले सल्ले देणार असलास तर तू न आलेलाच बरा .” 

एक दिवस माया बाथरूममध्ये पाय घसरून पडली. खुब्याचे हाड मोडले आणि तिच्या यातनांना पारावार उरला नाही. हाडे इतकी ठिसूळ झाली होती की डॉक्टर ऑपरेशन करायला तयार होईनात. अनुजाने एका चांगल्या नर्सिंग होममध्ये मायाला हलवले. दिवस दिवस माया नुसती पडून राहू लागली.

आम्ही मैत्रिणी तिला भेटायला गेलो.“ माया,लवकर बरी हो ग. पुढची भिशी तुझ्याकडे करायचीय ना ?”

मायाच्या डोळ्यातून नुसतीच धार लागली. तिला बोलता तर येत नव्हतेच. खूप वाईट वाटले आम्हाला.

आणि आमच्याही भविष्याच्या सावल्या भेडसावू लागल्या. सगळ्यांचीच मुले दूरदेशी. “आज निदान अनुजातरी आई जवळ आहे, मला कोण आहे ग?” निर्मला हताशपणे म्हणाली. निर्मलाला दुर्दैवाने मुलं झालीच नाहीत.

मायाचा प्रवास झपाट्याने उतरणीकडे सुरू झाला. तिला फीडिंग ट्यूबने अन्न भरवावे लागू लागले. तिच्याकडे जाऊन आले, की खरोखरच वाईट वाटे. एका उमद्या,आनंदी जीवाची ही परवड बघवेनाशी झाली.

आणि एक दिवस अनुजाचा फोन आला, “ मावशी,आई गेली. तुझ्या ओळखीच्या नेत्रपेढीचा फोन नंबर दे. आईचे नेत्रदान करणार आहोत.”

आम्ही सगळ्या तिचे अखेरचे दर्शन घ्यायला गेलो. ‘ सुटली बिचारी,’ असेही वाटले.

—–पण असे आयुष्य तिच्या काय, कोणाच्याच वाट्याला येऊ नये असे वाटून आमचा जीव नुसता कासावीस झाला.

अनुजाच्या पाठीवर सांत्वनाचा हात ठेवून, काहीच न बोलता, आम्ही आपापल्या घरी परतलो —–

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ द्रौपदी मुर्मू ☆ प्रस्तुती – प्रा. मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ द्रौपदी मुर्मू ☆ प्रस्तुती – प्रा. मीनल केळकर ☆ 

ही कहाणी आहे एका शिक्षिकेची. ही कहाणी आहे एका झुंजार आदिवासी महिलेची. ही कहाणी आहे एका निस्वार्थी समाजसेविकेची . ही कहाणी आहे एका अध्यात्मिक प्रवासाची, ही कहाणी आहे एका जिद्दी समर्पित जीवनाची –ही कहाणी आहे द्रौपदी मुर्मू यांची . 

कालपर्यंत फारसे कोणाला माहीत नसलेले द्रौपदी मुर्मू यांचे नाव आज खूपच चर्चेत आहे.राष्ट्रपतीपदाची त्यांची उमेदवारी घोषित होईपर्यंत तसे त्यांचे नाव अज्ञात होते. एका आदिवासी,गरीब,सामान्य कुटुंबातील महिलेला राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च पदाची उमेदवारी मिळते, हीच मुळी आपल्या शक्तीशाली लोकशाहीची थक्क करणारी सुंदर साक्ष आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क  करणारा आहे. विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रेरणादायीही आहे. घराणेशाही,अमर्याद संपत्ती आणि खानदानाचा दर्प नसलेल्या सामान्य माणसाला अभिमान वाटावा अशीच कहाणी आहे द्रौपदी मुर्मू यांची .

ओरिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला.१९७९ साली त्या पदवीधर झाल्या.ओरिसा सरकारच्या सिंचन खात्यात कारकून झाल्या. पुढे त्या शिक्षक झाल्या.नगरसेवक झाल्या.आमदार झाल्या. मंत्री झाल्या. राज्यपाल झाल्या.आणि आता आहेत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार. घराणेशाही नाही, संपत्ती नाही, वारसा नाही. सारेच कसे थक्क करणारे आहे. त्यांच्या पतीचे नाव शामचरण मुर्मू आहे. 

आजही त्या मयूरभंज येथे एका साध्या दुमजली घरात राहतात.६४ वर्षाच्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. दलित,आदिवासी, लहान मुले यांच्या उत्थापनासाठी झटणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची  वैयक्तिक जीवनात अनेक संकटामुळे अक्षरशः होरपळ झाली. कोणीही कोलमडले असते. त्याही कोलमडल्या, पण पुन्हा उभ्या राहिल्या. ताठ उभ्या राहिल्या.त्यांना दोन मुले व एक मुलगी. २००९ साली २५ वर्षाचा मुलगा मरण पावला. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्या डिप्रेशन मध्ये गेल्या.जीवनातील सारे स्वारस्य निघून गेले. खचून गेल्या. याचवेळी त्या प्रजापिता ब्रह्मकुमारी या अध्यात्मिक संस्थानात गेल्या.त्या अध्यात्माला शरण गेल्या.त्या पुन्हा उभ्या राहतात तोच दुसरा मुलगा २०१३ साली रस्ता अपघातात गेला.त्याच महिन्यात आई गेली, कर्तबगार भाऊही गेला. चार वर्षात जवळची सगळी माणसे हरवली.आणि २०१४ साली पती शामचरण मुर्मूही गेले.त्या एकाकी झाल्या. नियतीने त्यांच्यावर घोर अन्याय केला.

परंतू अध्यात्म त्यांच्या सोबत होते. त्यांनी दलित,आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. स्वतःचे दुःख जगाच्या दुःखात मिसळून टाकले. पुन्हा ताठपणे उभ्या राहिल्या. २०१५ साली झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम केले. लवकरच विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला. २०२१ पर्यंत त्या राज्यपाल होत्या.

२० जून रोजी त्यांचा वाढदिवस होता.आणि २१ जूनला भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांना हा आनंदाचा धक्का होता आणि देशालाही. त्या नेहमीप्रमाणे शिवमंदीरात गेल्या. स्वतः झाडू घेऊन मंदीर स्वच्छ केले. मंदीरातील कर्मचाऱ्याबरोबर सुखसंवाद केला. मयूरभंजमध्ये जल्लोष झाला. द्रौपदी मुर्मू या एका लहानशा घरातून ३५० एकर परिसर, १९० एकर बगीचा व ७५० कर्मचारी असलेल्या प्रशस्त राष्ट्रपतीभवनात लवकरच जातील. एक सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होईल. हे भारतीय लोकशाहीचे केवढे नितांत सुंदर व विलोभनीय रुप आहे बरे !

संग्राहिका : प्रा. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ सासू, सून आणि DP ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 सासू, सून आणि DP ! 😂💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“सुनबाई, ऐकत्येस का ?”

“काय आई ?”

“अगं बाबू उठला का गं ?”

“आई बाबू म्हणजे….”

“किती वर्ष झाली गं तुमच्या प्रेमविवाहाला सुनबाई ?”

“इश्श, तुम्हांला जसं काही माहीतच नाही !”

“मला माहित आहे गं, पण तुमच्या या प्रेमविवाहाआधी किती वर्ष फिरत होतात ते माहित नाही नां, म्हणून विचारलं !”

“अहो आई, या डिसेंबरला चौदा वर्ष पुरी होतील !”

“काय गं सुनबाई, तुमचा लग्नाआधी  आम्हांला अज्ञानात ठेवून फिरायचा तुमचा अज्ञातवासातील प्रेमाचा एक वर्षाचा काळ धरून, का…..?”

“नाही आई, ते वर्ष धरलं तर मग पंधरा होतील !”

“सुनबाई, जरी तुमचा एक वर्षाचा अज्ञातवास लग्ना आधीच संपला असला, तरी तुमची सगळी चौदा वर्षाची शिक्षा भोगून झाल्ये आणि तरी तुला बाबू कोण माहित नाही ?”

“अय्या, म्हणजे तुम्ही विलासला बाबू म्हणता आई ?”

“लवकर कळलं माझ्या बबडीला !”

“आता ही बबडी कोण आणलीत मधेच तुम्हीं आई ? विलासची कोणी माझ्या आधी दुसरी मैत्रीण होती का ?”

“कठीण आहे ! अगं मी माझ्या बबडीला म्हटलं नां ? मग ! ते सगळं सोड आणि मला सांग बाबू उठला का नाही अजून, नऊ वाजून गेले !”

“झोपू दे की जरा त्याला आई, आज रविवार तर आहे !”

“अच्छा, आज रविवार म्हणजे सुट्टी म्हणून झोपू दे म्हणतेस, तर मग आज जेवणाला पण सुट्टी वाटतं ?”

“मला सांगा आई, आत्ता पर्यंत किती रविवार मी तुम्हांला उपाशी ठेवलंय हॊ ?”

“तुझी काय बिशाद मला उपाशी ठेवायची !”

“नाही नां ? मग असं बोलवत तरी कसं तुम्हाला आई ?”

“अगं, एवढ्या उशिरा उठायचं मग अकरा साडेअकराला नाष्टा करायचा आणि दोन अडीचला जेवायचं, हे बरं दिसतं का ?”

“अहो आई, पण रोज तुम्हांला एक वाजता जेवायला मिळतंय नां, मग एक दिवस उशीर झाला तर कुठे बिघडत म्हणते मी ?”

“माझं नाही बिघडत गं, तुझा स्वयंपाक बिघडतो त्याच काय ?”

“स्वयंपाक बिघडतो ? म्हणजे काय आई ?”

“अगं काय आहे, आधीच उशीर झालेला असतो जेवायला, मग तू घाईघाईत स्वयंपाक करतेस आणि मग कधी भाजी तिखट तर कधी आमटी खारट होते, खरं नां ?”

“अहो एखाद्या रविवारी झाली असेल चूक, म्हणून काय लगेच नांव ठेवायला नकोयत माझ्या स्वयपाकाला !”

“मग लग्नाच्या बैठकीत, ‘स्वयंपाक येतो का’ असं मी जेंव्हा तुला विचारलं तेंव्हा अगदी तोंड वर करून कशाला म्हणायचं ‘स्वयंपाकाची भयंकर आवड !”

“बापरे ! इतक्या वर्षांनी हे बरं तुमच्या लक्षात आहे ! आणि हॊ, आहेच मला स्वयंपाकाची भयंकर आवड !”

“बरोबर आहे सुनबाई, पण तेंव्हा बोलतांना तुझी वाक्य रचना थोडी चुकली असावी असं मला आत्ता वाटतंय खरं !”

“कशी ?”

“अगं तुला ‘भयंकर स्वयंपाकाची आवड’ असं म्हणायचं असेल तेव्हा, खरं नां ?”

“अजिबात नाही, तुमचीच ऐकण्यात काही चूक झाली असेल आई !”

“असेल असेल, पण दुसरी एक गोष्ट नक्कीच तू आमच्या पासून इतकी वर्ष लपवलीस, त्याच काय ?”

“कुठली गोष्ट आई ?”

“तुझ्या अंगात देवी येते ते !”

“का sss य, काय म्हणालात तुम्ही? माझ्या अंगात देवी येते ?”

“हॊ ssss य ! आणि तू हे आमच्या पासून इतकी वर्ष लपवून ठेवलस, हे सत्य आहे ! बाबुला तरी माहित आहे की नाही कोण जाणे !”

“आई पुरे झालं आता ! ‘भयंकर जेवणापर्यंत’ ठीक होतं, पण आता हे अति होतंय ! कुणी सांगितलं हॊ तुम्हाला माझ्या अंगात…..”

“अगं कोणी सांगायला कशाला हवंय, मी मगाशीच तुझा DP बघितला आपल्या व्हाट्स अपच्या ‘फॅमिली कट्ट्यावर !”

“DP ? कसला DP ?”

“अगं केस मोकळे सोडून काढलेला तुझा DP आज तू टाकलायस नां, तो पाहून माझी खात्रीच पटली, नक्कीच तुझ्या अंगात…..”

“धन्य झाली तुमची आई ! अहो आज मी न्हायल्यावर लगेच सेल्फी काढून तो DP म्हणून ठेवलाय ! कळलं ?”

“कर्म माझं ! अगं मला वाटलं तुझ्या अंगात बिंगात येत की काय !”

“काहीतरीच असतं तुमच आई ! बरं आता जाऊ का नाष्टा बनवायला ?”

“जाशील गं, पण त्याच्या आधी माझं एक छोटंसं काम कर नां !”

“कसलं कामं आई ?”

“मला पण आपल्या ग्रुपवरचा माझा DP बदलायचा आहे ! तेवढा माझा फोटो काढ आणि आपल्या फॅमिली कट्ट्यावर DP म्हणून टाक आणि मग जा नाष्टा करायला !”

“ठीक आहे आहे आई ! या इथे खुर्चीत बसा आरामात, म्हणजे मी…..”

“अगं इथं नको, किचन मध्ये स्वयंपाक करताना काढ !”

“काय ? अहो मी लग्न होऊन या घरी आले तेव्हापासून तुम्ही किचन मधे कधी पाय तरी ठेवला आहे का ?”

“अगं पण DP मधे जे दिसत ते थोडंच  खरं असतं ?”

“म्हणजे ?”

“अगं सुनबाई तुझ्या कुठे अंगात येत, पण मला तसं वाटलं की नाही तुझा DP बघून ? तसंच मी स्वयंपाक करायची नुसती ऍक्शन केली म्हणून कुठे बिघडलं ?”

“नको आई, त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक भन्नाट पोज आली आहे तुमच्या DP साठी !”

“कुठली गं पोज ?”

“तुमचं जेवणाचं ताट, मी केलेल्या वेगवेगळ्या चमचमित पदार्थांनी भरलं आहे आणि तुम्हीं अगदी समाधानाने त्यावर आडवा हात मारताय ! ही पोज कशी काय वाटते ?”

“चालायला लाग नाष्टा करायला लगेच !”

© प्रमोद वामन वर्तक

१५-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ ॥ मार्गदर्शक चिंतन॥ -॥ कर्म की महत्ता॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ मार्गदर्शक चिंतन

☆ ॥ कर्म की महत्ता॥ – प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’☆

मानव जीवन का कर्म से बड़ा गहरा नाता है। बिना कर्म किये जीवन चल ही नहीं सकता। जन्म से मरण पर्यन्त मनुष्य सदा कुछ न कुछ तो करता ही रहता है। कर्म ही जीवन को गति देते हैं। कर्म ही उसके भविष्य का निर्माण करते हैं। रामचरित मानस में संत तुलसीदास जी ने लिखा है-

कर्म प्रधान विश्व करि राखा, जो जस करिय सो तस फल चाखा॥

विश्व में कर्म की ही प्रधानता है। जो जैसा करता है उसे वैसा फल मिलता है। जैसा लोग बोते हैं वैसा ही पाते हैं। इस दृष्टि से तो कर्म का सिद्धान्त बड़ा सीधा और सहज है। भले का परिणाम भला और बुरे का परिणाम बुरा। परन्तु संसार में हमेशा ऐसा ही घटता हमेशा नहीं दिखता। कभी तो होम करते भी हाथ जलते देखा जाता है। अच्छा करने चलो परिणाम उलटा निकलते दिखता है। और इसके विपरीत कभी सारे दुर्गुणों से युक्त दुष्कर्म करने वाले सब प्रकार के सुखी, यश, मान, पाते हुए उन्नति करते दिखते हैं। ऐसा क्यों होता है कहना बड़ा कठिन है। परन्तु धर्म-निष्ठ अध्यात्मज्ञानी इसका उत्तर देते हैं- स्मृति न होने से इस कथन की प्राभाविकता का सत्यापन तो नहीं किया जा सकता, किन्तु हर कर्म उचित समय पर विभिन्न वृक्षों की भाँति फल देते हैं- इस सिद्धान्त पर विश्वास करके अनिवार्यत: प्रारब्ध का विधान मानकर संतोष करना पड़ता है। यद्यपि कर्मांें के विपरीत फल देखकर वास्तविक जीवन मेें मन विचलित अवश्य हो जाता है। फिर जीवन में व्यक्ति क्या करे ? क्या न करे ? निश्चित रूप से जो त्रिकाल सत्य हो ऐसा कहना बड़ा कठिन और उलझन पूर्ण है। एक ही कर्म देश काल और परिस्थिति वश अच्छा या बुरा कहा जाता है। एक व्यक्ति यदि किसी अन्य को जान से मार डालता है तो कानून के अनुसार उसे फाँसी की सजा दी जाती है किन्तु भिन्न परिस्थितियों में यदि एक व्यक्ति जो दस लोगों की जान ले लेता है तो उसे परमवीरचक्र का सम्मान मिलता है और इतिहास में वह अमर हो जाता है। सबके आदर का पात्र बन जाता है।

समाज में व्यक्ति अपने कर्माे से ही अपनी छवि निखारता है। कर्माे से ही लोग भले-बुरे, सज्जन-दुष्ट, उदार-कठोर, दयालु-निर्दय या विश्वस्त और धोखेबाज कहे और पहचाने जाते हैं। 

मोटे तौर पर तो यही कहा जा सकता है कि समाज की मान्यता के अनुसार अच्छे कर्म किए जाने चाहिए और बुरों का त्याग किया जाना चाहिए। किन्तु क्या नैतिक है और क्या अनैतिक यह भी तो समय की कसौटी पर हमेशा एक सा नहीं होता इसीलिए गीता कहती है-”कर्मण: गहना गति:’‘ अर्थात्ï करमन की गति न्यारी। यही स्थिति अर्जुन की तब हुई थी जब रणक्षेत्र में वह अपने नाते रिश्तेदारों से घिरा हुआ, उन्हीं से युद्ध करने के लिए खड़ा था। समस्या थी, एक छोटे से राज्य के लिए वह युद्ध कैसे करे? किन्हें मारे, किन्हें न मारे ? क्या उसे पाप नहीं लगेगा। तब ऐसी द्विविधा की स्थिति में श्री कृष्ण ने अर्जुन को समझाया था-”कर्मणि एव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन्ï’‘ अर्थात्ï कर्ता का अधिकार केवल कर्म पर है फल पर नहीं अत: हे अर्जुन तू केवल कर्म कर। वह कर्म जो तेरा धर्माेचित कत्र्तव्य है। ”मा कर्मफल हेतुर्भूमासङ्गïोस्तु कर्मणि।’‘ केवल कर्म कर, कर्म के फल अर्थात्ï परिणाम पर मन को आसक्त मत कर। फल का निर्धारण तो स्वत: कर्म से ही होता है, फल की चिंता किये बिना तू केवल अपना कत्र्तव्य करता चल। गीता में ही आगे कहा गया है-”स्वधर्मे निधनं श्रेय: परर्धाे भयावह:।’‘ अपने धर्म अर्थात्ï कत्र्तव्यों का निर्वाह किया जाना ही सदा श्रेयस्कर है। और धर्म की सरल व्याख्या तुलसी दास ने जो की है वह है-

परहित सरित धरम नहिं भाई, पर पीड़ा सम नहिं अधमाई।

अत: स्पष्ट है कि जो कर्म बहुजन के लिए हितकर हो वह किया जाना चाहिए ऐसा न किया जाय जो दूसरों के लिए अहित कारी हो।

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

 ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, म.प्र. भारत पिन ४६२०२३ मो ७०००३७५७९८ [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुरु पौर्णिमे संदर्भात थोडी महत्वपूर्ण माहिती!! ☆ सुश्री नीला ताम्हनकर ☆

? विविधा ?

☆ गुरु पौर्णिमे संदर्भात थोडी महत्वपूर्ण माहिती !! ☆ सुश्री नीला ताम्हनकर ☆

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा हा मंगलदिन आहे. ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.

गुरूंचे अनेक प्रकार आहेत. १) पृच्छक गुरु, २) चंदन गुरु, ३) अनुग्रह गुरु, ४) कर्म गुरु, ५) विचार गुरु, ६) वात्सल्य गुरु, ७) स्पर्श गुरु.

दत्तभक्तांसाठी हा पूण्यपावन दिवस !

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः॥

“जो जो जयाचा घेतला गुण । तो म्यां गुरु केला जाण । अवधूतांनी २४ गुरु केले. या चोविसांचे महत्व तीन प्रकारांत आहे. एक सदगुण अंगीकारासाठी गुरू, दोन अवगुण त्यागासाठी गुरु आणि तीन ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजे ‘गुरु’ हे लौकिक दॄष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील.

‘गुरुचरित्र’ या ग्रंथात श्री गुरुंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरुंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्व सांगितले आहे.

या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे साधक – पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात.. परंतु खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वच नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.

कलीने ब्रह्मदेवांना ‘गुरु’ शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला, की ‘ग’ कार म्हणजे सिध्द होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या जगाचे पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरुंच लागतो.  

कैलास पर्वतावर भगवान शंकराने पार्वतीमातेसह पारमार्थिक संवादात जगाच्या उद्धाराविषयी बोलताना गुरुंचे महत्व सांगितले आहे.. त्यास गुरुगिता असे म्हणतात..

गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व गुरुंमध्ये आपले सदगुरु आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरु साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल, फेरफार करत नाही. परंतु तो भोग सोयीने (सहजतेने) भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात. भोगाची तीव्रता कमी करतात.

आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सदभावाने सदगुरु चरणाची सेवा करावी.

जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे. त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.

मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥

सदगुरुंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते-बोलते ईश्वराचे अंशच असतात.

मित्रांनो साधकाने कोणत्याही गुरुंची निंदा करू नये. तसेच आपल्याही गुरुंची निंदा कोणी केलेली ऐकू नये. तिथून निघून जावे. गुरुनिंदा करणे म्हणजे महापाप होय. गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्यशक्ती आहे.

गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे !

संग्रहिका – सुश्री नीला ताम्हनकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय सावित्रीबाई… श्री गजानन धोंगडे☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

??

☆ प्रिय सावित्रीबाई… श्री गजानन धोंगडे☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

नमस्कार ! सकाळीच रेडिओवर ऐकलं की आज तुझी पुण्यतिथी. 

बायकोला सांगितलं, “अगं, आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी.”

मग स्वतःलाच विचारलं, “ सावित्रीबाईंची पुण्यतिथी ? कसं शक्य आहे ? अगं, माझ्या गावातली, शहरातली, 

देशातली प्रत्येक मुलगी जेव्हा शिक्षण घेऊन एखाद्या मोठ्या पदावर जाते, शिक्षणाच्या भरोशावर एखादा सन्मान प्राप्त करते, तेव्हा – तेव्हा तूच तर जन्माला आलेली असतेस. यंदा माझी पुतणी पदवी घेईल, म्हणजे यंदा तू माझ्या घरातही जन्माला येणार आहेस.  सुरुवातीला प्रश्न पडला की तुला काय म्हणावं ? बाई म्हणावं की आई म्हणावं ? आमच्याकडे गावात मोठ्या बहिणीला बाई म्हणतात. मग विचार केला, माझी आई शिकलेली, थोरली बहीण शिकलेली, मावशी शिकलेली, माझी पुतणी शिकतेय –म्हणजे तू तर प्रत्येकच रूपात माझ्याभोवती आहेस . 

सरकारचं घोषवाक्य आहे ‘ मुलगी शिकली, प्रगती झाली !’– 

मला वाटतं त्यात आणखी एक जोडावं ‘सावित्रीबाई जन्माला आली ‘.

आजही वाटतं तुला भारतरत्न मिळायला हवं होतं. मग लक्षात येतं की या देशातले अनेक भारतरत्न जे आहेत ते तुझ्या शिक्षण यज्ञामुळे झालेले आहेत. जेव्हा कुठल्या महिलेला भारतरत्न मिळत असेल तेव्हा तू ज्योतिबांना सांगत असशील ,  ‘अहो ऐकलं का आपल्या लेकीला भारतरत्न मिळालं ‘. 

तुझ्याबद्दलचा मुळातच असलेला आदर सहस्त्र पटींनी वाढतो तो तुझ्या स्वभावामुळे. 

दगड, शेण, असभ्य शब्दांचा मार सहन करीत तू तुझं काम करीत राहिलीस, म्हणजे आतून तू किती कणखर असली पाहिजेस–ते जिब्राल्टर रॉक म्हणतात तशी. तसूभरही ढळली नाही . आणि दुसरीकडे अत्यंत नम्र आणि प्रेमळ. 

कधी – कधी वाटतं टाईम मशिनने काळाच्या मागे जावं. लहान बनून तुमच्या घरात यावं.  ज्योतीबांच्या कोटाच्या खिशातल्या गोळ्या त्यांच्याच मांडीवर बसून खाव्यात. तुझ्याकडून लाड पुरवून घ्यावेत. 

मला एक प्रश्न नेहमी पडतो–’आपण करतो आहोत ते काम क्रांतिकारी आहे याची तुला जराशीही कल्पना नव्हती का ? कारण नखभर ही एटीट्यूड नव्हता तुझ्यामध्ये– नखभर सोडा, अणू – रेणू इतका सूक्ष्म पण नाही . 

हे कसं साध्य करायचीस ? नाहीतर आम्ही बघ– वितभर करतो आणि हात भर, त्याचाही  हल्ला, कल्ला करत ती दुखणी सांगत, ते यश सांगत गावभर हिंडतो. 

कदाचित म्हणूनच तू त्यावेळच्या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी म्हणून जी अक्षरं पाटीवर गिरवलीत, ती काळाच्या पाठीवर गिरवली गेलीत. 

आणि या भारतात जेव्हा – जेव्हा कोणी मुलगी, स्त्री शिक्षित होत राहील,  तेव्हा- तेव्हा ती अक्षरं गडद होत राहतील 

— पुन्हा – पुन्हा सावित्री जन्माला येत राहील. 

लेखक – गजानन घोंगडे

9823087650

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares