मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

ही मिस् जोकर अग इतकी सोन्यासारखी पोर. हो मी पोरच म्हणते माझी तिला.स्वतःच्या कुटुंबासाठी झिजली. भावाला शिकवले. परदेशी पाठवले. तो गेला तो गेलाच. लग्न केले. तिकडेच स्थायिक झाला. बहिणीचे मोठ्या घरात सालंकृत कन्यादान केले. दोघेही आपापल्या संसारात सुखी आहेत. पण आईबापांकडे बघणार कोण? आहे मिस जोकर. हक्काची सगळ्यांसाठी राबणारी तिचा विचार कोण करतो? आई आज दीड वर्ष अंथरुणात. तिचं सगळे करुन ही आपली ड्युटी हसतमुखाने करते. कधी उशीरा येणं नाही कि लवकर जाणं नाही. हॉस्पिटल मध्ये सगळ्यांना हवीहवीशी वाटते. अर्धे अधिक पेशंट औषधापेक्षा हिच्या बोलण्यानेच सुधारतात. त्यांच्या नातेवाईकाना  धीर मिळतो. मध्यंतरी  दोन, तीन मानसिक रुग्ण केवळ आणि केवळ हिच्यामुळेच सुधारुन ठणठणीत होऊन घरी गेले. विनोद धमाले म्हणून एक मुलगा चांगला शिकलेला, चांगल्या हुद्यावर नोकरीला. तुमच्या भाषेत व्हेलसेटल. डिप्रेशन मध्ये होता. हिच्यामुळे सुधारुन खडखडीत बरा झाला. त्याचे आई वडील इतके खुश झाले. हिची वागणूक, चालचलन बघून हिला मागणी घातली. पण हिचे आपले ‘मला लग्न करायचं नाही. रुग्णाची सेवेतच मी आयुष्य घालवणार. हाच  माझा संसार हेच माझं सुख.आता तु तरी तिला समजावून सांग.”

इतक्यात दुसरी एक नर्स धावत आली. “सिस्टर लवकर चला. चिल्डर्न वॉर्ड मधली तीन नंबर  बेबी दूध, इंजेक्शन, काही घ्यायला, झोपायला तयारच नाही. तिला मिस जोकरच पाहिजे गाणे म्हणून झोपवायला. तिचा ताप पण चढतोय. चला लवकर”

“असंच आहे बघ इथे. त्या मिस जोकर  शिवाय इकडे कोणाचं  पान हलत नाही. अशाने तिला विश्रांती मिळत नाही. ह्याचा विचार ती स्वतः तर करत नाहीच पण हे लोक पण करत  नाही.”

क्रमशः….

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

फोन नं.8425933533

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्वान प्रेम – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

 ☆ विविधा ☆ श्वान प्रेम – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

एकदा यूरोपच्या प्रवासात पॅरिस हून लंडनला जाताना इंग्लिश खाडी खालून जाणाऱ्या रेल्वेने प्रवास करायचा होता. त्यावेळी पॅरिस स्टेशनवर आम्हाला आमच्या सामानासकट उभ करण्यात आलं. 5 सात तगडे, कडक युनिफॉर्म मधील पोलीस भल्यादाडग्या उग्र कुत्र्यांना घेऊन आले. त्यांचं बोलणं नीट कळायच्या आधीच त्यांनी हातातल्या कुत्र्यांच्या साखळ्या सोडल्या. गाईडने सांगितलं होतं की तुम्ही शांत उभे राहा. ते कुत्रे काही करणार नाहीत. तरीही ते कुत्रे,सामान आणि आम्ही यांचं आक्रमकपणे चेकिंग करायला लागल्यावर, माझं काळीज बाहेर येऊन यूरोप यात्रे ऐवजी माझी जीवन यात्रा पूर्ण होणार असं मला वाटलं होतं.

देवांच्या गाई राक्षसांनी पळवून नेल्यामुळे त्या सोडवून आणण्यासाठी इंद्र देवांना सरमा नावाच्या कुत्रीने मदत केल्याची गोष्ट लहानपणी वाचली होती. श्री दत्तगुरू भोवती चार कुत्रे दाखविलेले असतात. त्याना वेदांचे प्रतीक  मानले जाते. छत्रपती शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याची कथा सर्वांना माहित आहे. विशिष्ट ट्रेनिंग दिलेले कुत्रे गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी पोलिसांना मदत करतात. लष्कराकडे ही असे श्वानपथक असते. हे आणि आणखी असेच सन्माननीय अपवाद असतीलच. पण……

एका रविवारी सकाळी डोंबिवलीहून धाकट्या बहिणीचा फोन आला.तिच्याकडे मोठी बहीण रहायला आली होती आणि डोंबिवलीत राहणारी मधली  बहीण सकाळपासून तिच्याकडे येणार होती. हे सांगून बहिण म्हणाली तू लगेच निघून इकडे ये. कोकणातून आलेला फणस पिकला आहे.  तू आल्याशिवाय फणस फोडायचा नाही असं ठरवलंय. लवकर ये. मीही उत्साहाने डोंबिवलीला पोचले. बहिणींच्या भेटी आणि शिवाय फणसाचं मोठं आमिष होतं. आंब्या सारखाच मला फणस ही खूप प्रिय आहे हे सगळ्यांना माहीत होतं.   खूप गप्पा, हसणं, जुन्या आठवणी आणि  फणस.फणस खाऊन पोट भरलं पण गप्पा संपल्या नाहीत.’ मी आता निघतेच आहे’ असा घरी फोन करूनही अर्धा तास होऊन गेला होता.  डोंबिवली लोकलने घाटकोपरला येऊन मेट्रोनेअंधेरीला उतरले आणी समस्या सुरू झाली. एकही रिक्षावाला जोगेश्वरी पूर्वेला यायला तयार नव्हता. जोगेश्वरी हे माझ्या तोंडून पूर्ण बाहेर पडायच्या आधीच रिक्षावाले भरकन निघून जात होते. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता आणि माझी अस्वस्थता वाढत होती इतक्यात 9 -10 वर्षांचा, चांगला दिसणारा मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला ‘ऑंटी, तुम्हाला रिक्षामध्ये कुत्रा चालेल का? एका रिक्षेकडे बोट दाखवून तो म्हणाला,’ ते रिक्षावाले काका तुम्हाला घरी सोडायला तयार आहेत. रिक्षामध्ये मी आणि आमचा रॉबिन आहोत. अडला हरी..च्या धर्तीवर नाईलाजाने मी म्हटलं, ‘चालेल’ मनाचा हिय्या करून मी अंग चोरून त्या रिक्षात बसले. रिक्षावाले काका म्हणाले,’ 5..7 रिक्षावाले तुम्हाला नाही म्हणता ना पाहिलं. म्हणून थांबलो. राजेश ला म्हटलं त्या काकूंना विचारून ये. जवळच जायचं असेल त्यांना. ‘हो जोगेश्वरी ईस्ट ला. थँक्स.’

राजेश म्हणाला,’ आमच्या रॉबिनला  रात्री रिक्षातून फिरायला आवडतं. मी रोज या काकांना घेऊन त्याला फिरवून आणतो. तुम्ही नीट बसा. रॉबिन तुम्हाला काही करणार नाही. राजेश च्या पलीकडे असलेला रॉबिन, सारखा रिक्षातून तोंड बाहेर काढत होता. माझं त्याच्यावर लक्ष होतंच.

अरे तो बघ,सारखा तोंड  बाहेर काढतो आहे. किती गाड्या, रिक्षा जात आहेत. त्याला आत घे.

‘ऑंटी, तुम्ही काळजी करू नका. रॉबिन खूप हुशार आहे. बस गाड्या आल्या की तो बरोबर तोंड आत घेतो. आमचा रॉबिन पूर्ण शाकाहारी आहे. म्हणजे ‘मी सुटले.’ मी मनातच म्हटलं. उकडलेले बटाटे त्याला खूप आवडतात.

मला नणंदेच्या घरचा’ सनी’ आठवला. ‘सनिलाना, आइस्क्रीम आणि घारगे खूप आवडतात. आणि दर गुरुवारी तो आम्ही बाहेरून परत यायची अगदी वाट बघत असतो. दत्ताच्या देवळातून येताना आम्ही प्रसादाचे पेढे आणतो ना, त्याला आधी चार पेढे भरविल्या शिवाय तो आम्हाला सोडतच नाही. ‘ त्यावेळी मी त्या गुरुवार लक्षात ठेवणाऱ्या सनीला चेहऱ्यावर हसू आणून, कौतुकाने मान डोलावली होती. नणंदेच्या सासरचे म्हणजे समर्था घरचे श्वान होते ते.

अंधेरी जोगेश्वरी अंतर कमी असली तरी ट्रॅफिक खूप होता  राजेश कौतुकाने  सांगायला लागला की, ‘आंटी, मागच्या महिन्यात आम्ही भेळेची, शेवपुरी ची तयारी करून बाहेर गेलो. आल्यावर बघतो तर उकडलेल्या बटाट्यांपैकी एकही बटाटा शिल्लक नाही. आम्ही रॉबिन ला खूप रागावले तर तो रुसून बसला. रडायला लागला. शेवटी त्याला जवळ घेतल्यावर रडायचा थांबला. ‘पुढे तो म्हणाला,’ या सीझनमध्ये रॉबिन ला आंबा आणि फणस खायला खूप आवडतं.’

मी दचकून, आश्चर्याने  रॉबिन कडे पहात राहिले. तेवढ्यात घर आलं. रिक्षातून उतरून मीटर पेक्षा जास्त पैसे देऊन रिक्षावाल्या  काकांचे आभार मानले. राजेश म्हणाला, ‘बाय ऑंटी.’ ‘बाय बेटा. सुखी रहा.’ आणि माझ्यासारखी आंब्या फणसाची आवड असणाऱ्या, पाठमोऱ्या रॉबिन ला मनापासून अच्छा करून त्याला त्या सन्माननीय अपवादान्च्या यादीत स्थान दिले.

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

11.08.2020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

स्वागतिकेला विचारले, ” मिस् जोकर कोण, कुठे ,कधी भेटेल मला? काका कुठे आहेत आता?”

ती म्हणाली, “आमच्या मुख्य  नर्स म्हणजे ‘मिस् जोकर’.आता येतील ड्युटीवर इतक्यातच.येताना काकांना पण घेऊन येतील.फार प्रेमळ, उत्साही, परोपकार आणि मुख्य म्हणजे विनोदी आहेत.त्या आपल्या विनोदाने, मस्करी ,मज्जा करुन पेशंटचे अर्धे आजार बरे करतात आणि त्यांच्या नातेवाईकांचं  अर्धे टेन्शन.”

इतक्यांत “Good morning everybody” म्हणत एक चाळीशीची एक गोरी, सडसडीत, हसतमुख बाई काकांबरोबर येताना दिसली. हीच ती माझी आणि स्वागतिकेची ‘मिस जोकर.’

मला बघितल्यावर चक्क मला तिने मिठीच मारली. तिला जुनी ओळख पटली. जवळपास पंधरा वर्षानी आम्ही भेटलो. मला म्हणाली, “मी वाॅर्ड मध्ये रोजची फेरी  मारुन येते. सगळे पेशंट बघून येते. मग निवांत आपण बोलू या.”

मी काकांना विचारले “काय काका, काल कुठे होतात तुम्ही?” काका म्हणाले ”काल तुम्ही सगळे गेलात.पण मला तुमच्या काकूंना सोडून जायला मन तयार होईना. मग बसलो इकडेच. नाहीतरी घरी जाऊन भुतासारखा हिच्याशिवाय  एकटा रात्र कशी काढणार? पण रात्री ह्या मुख्य नर्स बाई आल्या. त्यानी बळेबळेच मला स्वतःच्या रुम वर नेले. गरम गरम जेवू घातले. झोपण्याची व्यवस्था केली. आता सकाळी पण नाश्ता वगैरे दिला. आणि इकडे घेऊन आल्या. वर बजावले जोपर्यंत काकू इकडेअॅडमिट आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या कडे रहायचे अगदी निःसंकोचपणे. तुमच्या मुलीकडे आहात असे समजा”.

थोड्या वेळाने मुख्य नर्स बाई राऊंड मारुन सगळ्या पेशंटची विचारपूस करून त्यांना जरुरीनुसार सुचना देऊन आल्या. मला म्हणाल्या, ” चल ग आपण चहा घेत घेत दहा पंधरा मिनीटे गप्पा मारुया. “मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिला विचारले, “तु एक नंबरची टवळी. ह्या सिरीयस आणि तुझ्या स्वभावाशी विसंगत अशा पेशाकडे कशी काय वळलीस”.

मग ति सांगू लागली, “मी घरच्या परिस्थितीमुळे इंटरनंतर  काॅलेज सोडले नर्सिंगचा कोर्स घेतला. मला काय लग्न संसारात फारसा रस नव्हता. पण समाजासाठीं काही करण्याची मनापासून इच्छा होती. खरं तर डाॅक्टरी पेशा मला फार प्रिय. पण ते होणं परिस्थितीने आणि बुध्दीमतेने पण शक्य नव्हते. म्हणून मग परिचारिका बनून लोकांची सेवा करु.असा विचार केला आणि स्विकारला. “ह्या जोकरला इतके गंभीरपणे बोलताना मी पहिल्यांदाच बघत होते.”

त्या दिवशी मनात असून पण मार्च महिना, इयर एंडिंग म्हणून दांडी तर मारू शकत नव्हते. ठरवले रात्री झोपायलाच जाऊ या. काकूंना सोबत आणि त्यांच्या बरोबर निवांत गप्पा पण होतील. सकाळी  घरी सगळ्यांची व्यवस्थित रात्रीच्या जेवणखाणाची तयारी करून रात्री परस्पर बँकेतून हॉस्पिटल मध्ये गेले. काकूंशी गप्पा मारल्या. बाहेर सोफ्यावर झोप येईपर्यंत वाचत बसले.  रात्रपाळीच्या नर्सची स्टाफची कामे चालूच होती. माझ्याशी मधे मधे गप्पा मारायला मला कॉफी, हवे नको विचारायला आस्थेने येत होत्या, कारण मी त्यांच्या ‘मिस जोकरची’ मुख्य नर्सबाईंची मैत्रिण होते ना.

मीना म्हणून एक वयस्कर नर्स माझ्याशी गप्पा मारायला बसली., “ताई, ताई म्हटले तर चालेल ना तुम्हाला?” माझ्या होय नाहीची वाट न बघता पुढे बोलू लागली. ” ताई तुम्ही, तुमची मिस जोकर माझ्या मुलीसारख्या म्हणून जीव तुटतो. इतकी सुंदर,शालिन मुलगी. साऱ्या करिता धडपडते, झटते.”

क्रमशः…

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

लहानपणापासून तिचा खोडकर स्वभाव.त्यामुळे भावंडांचा,आईबाबांचा कोप,चोप असा भरपूर प्रसाद खाल्ला आहे तिने. शाळेत पण तीचं परिस्थिती पण बाकीचे तिचे गुण खूप चांगले. प्रेमळ, मायाळू, सतत कोणालाही मदत करायला पुढे, अभ्यासात हुशार घरीदारी त्यामुळे सगळ्यांची लाडकी हवीहवीशी.पण टिंगल टवाळीच्या स्वभावामुळे फारशी जिवाभावाची अशी कोणी तिला मित्रमंडळी लाभली नाही. आणि तिच्या ह्याच चेष्टेखोर स्वभावामुळे आम्ही तिला’ मिस् जोकरच’ म्हणू लागलो. तेव्हाच मेरा नाम जोकर राज कपूरचा चित्रपट जोरात चालू होता. ती पण खूष होती ह्या नावावर. पुढे काॅलेजमध्ये गेली पण मूळ स्वभाव कुठे जातो? तिकडे तर टिवल्याबावल्यानाआणखीनचं रान मोकळे. प्रोफेसर पासून सगळ्या मुलामुलींच्या टिंगल टवाळी कर त्यांच्या जोड्या लाव. त्यांना हैराण कर. हळूहळू सगळे पांगले. कोण शिक्षणासाठी परदेशी गेले तर कोणाला नोक-या लागल्या. कोणाच्या बदल्या झाल्या. सगळे आपापल्या आयुष्यात मग्न झाले. मधे  कोणाच्या लग्न कार्यात किंवा  अडीअडचणी ला शक्य झाले तर सगळे जात होते. भेटत होतो. मध्यंतरीच्या काळात ह्या ‘मिस् जोकर’चा संपर्क नव्हता.

तो दिवस 29 मार्च इयर एंडिंग बॅंकेत उशीरा पर्यंत थांबावे लागे.सकाळी लवकर जावे लागे.त्यातच मुलांच्या परीक्षा. काय धावपळ. आणि नेमकी ह्याच दिवशी आमच्याच ग्रुपमधल्या रेवतीची आई बाथरुम मध्ये पाय घसरून पडण्याचे निमित्त झालं. एकदम सिरीयस झाली. रेवती आणि नवरा US मध्ये, तिचा भाऊ आणि वहिनी बॅगलोरला  नुकतेच प्रमोशनवर गेलेले. तेव्हा आई बाबा दोघेच घरी अगदी ठणठणीत होते. त्याचे तिकडे स्थिरस्थावर झाल्यावर तो ह्या  दोघांना नेणार होता. आणि आई पाय घसरून पडण्याचे निमित्त झाले. डोक्याला मार लागला. आम्हीच मित्रमैत्रिणीनेच त्याना ऍडमिट केले. आमच्या बिझी schedule  मधून कसेबसे ऍडजेस्ट केले. धावपळ केली. रात्री घरी अंथरूणावर आडवे झाल्यावर एकदम डोक्यात विजेचा झटका लागावा तसे झालं. आपण काकूंच्या मागे धावलो, सगळं केले पण काकांचे काय ? इतक्या उशीरा रात्री फोन तरी कोणाला करणार? सगळ्यांची  दिवसभर धावपळीनी दमछाक झाली. माझी झोप उडाली होती. सकाळी लवकर उठून सगळं आटपून रेवतीचे घर गाठलं. तिकडे कुलूप. शेजारी चौकशी केली ते म्हणाले “काल काकूबरोबर हाॅस्पिटलमध्ये गेलेले काका घरी आलेच नाहीत”. मग धावत पळत हाॅस्पिटलमध्ये गेले. स्वागतिकेकडे चौकशी केली.

मला घाबरी घुबरी झालेली पाहून तिने मला बाकावर बसवले पाणी प्यायला दिले ती म्हणाली, “ताई, अजिबात घाबरू नका.आमच्या हाॅस्पिटलमध्ये एकदा पेशंट अॅडमिट झाला कि त्याच्यावर योग्य ते उपाय वेळेवर होतातच पण त्याची व वेळ पडली तर त्याच्या बरोबरीच्या माणसांची काळजी पण घेतली जाते. तेव्हा तुम्ही काकांची अजिबात काळजी करु नका जोपर्यंत काकू इकडे आहेत तोपर्यंत. किंवा त्याच्या नंतर सुध्दा गरज असेल तर.

“मला आश्चर्यच वाटले. कारण हे मी नवीनच ऐकत होते. “कोण करते अशी सोय? हाॅस्पिटल का?”

“छे ओ आमची ‘मिस् जोकर’ “. हे शब्द कानावर पडले आणि मन दहा पंधरा वर्षे मागे गेलं.

क्रमशः…

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सन्मानचिन्ह ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ सन्मानचिन्ह ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

बर्‍याच दिवसात शरद भेटला नव्हता. आज वेळ होता म्हणून त्याच्याकडे गेलो. शरद माझा जिगरी दोस्ती. शाळेपासूनचा. नेहमी काळ्यावर पांढरे करत असतो. अलीकडे साहित्य क्षेत्रात त्याचे चांगले नाव होऊ लागले आहे.

त्याच्या घरात गेलो आणि दिवाणखान्यातील शो-केसने लक्ष वेधून घेतले. तिथे दहा-बारा साहित्य संस्थांनी दिलेली सन्मानचिन्हे व्यवस्थित मांडून ठेवलेली होती. मी थोडसं रागावूनच शरदला विचारलं, ‘अरे, इतक्या वेळा तुझा सन्मान झाला, तुला इतके इतके पुरस्कार मिळाले, एकाही कार्यक्रमाला तुला दोस्ताला बोलवावसं वाटलं नाही? आम्ही आलो असतो, टाळ्या वाजवायला.’

तो म्हणाला, ‘कार्यक्रम झालाच नाही.’

‘म्हणजे?’ आता चकीत व्हायची वेळ माझी होती.

‘हे सन्मानचिन्ह बघ.’ त्याने एका मोमेंटोकडे बोट दाखवलं.

अक्षर साहित्य संस्थेने दिलेले सन्मानचिन्ह होते ते. मला काहीच कळेना. मग त्याने कागदाची एक चळत माझ्यापुढे केली.  वरचं पत्र अक्षर साहित्य संस्थेचं होतं. त्यात लिहीलं होतं, ’आपल्या साहित्य सेवेबद्दल आम्ही आपल्याला सन्मानित करू इच्छितो. पुरस्कारात आपल्याला शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख ५००० रुपये दिले जातील. कृपया आपली स्वीकृती लगेच कळवावी.’

‘मग?’

‘मी माझी स्वीकृती लगेच कळवली. रात्री संस्थेच्या अध्यक्षांचा फोन आला. ‘आपण २०,००० चा चेक पाठवून संस्थेचे संरक्षक सभासद व्हावे. म्हणजे आपल्याला  पुरस्कृत  करणे आम्हाला सोयीचे जाईल.’ विचार केला, इतके पैसे भरणं काही आपल्याला जमणार नाही. पण संस्थेची इच्छा आहे मला सन्मानित करण्याची, तर आपण त्यांच्या इच्छेचा आदर करून त्यांच्या नावाचे  सन्मानचिन्ह बनवून घ्यावे. ही दुसरीही पत्रे बघ, वेगवेगळ्या साहित्य संस्थांची.  फरक इतकाच की प्रत्येकाची वेगवेगळ्या रकमेची मागणी आणि देऊ केलेली पदे वेगवेगळी. म्हणजे कुठे आजीव सभासद, कुठे संस्थेचे अध्यक्षपद, कुठे विश्वस्त.  मी त्या त्या संस्थेच्या इच्छेनुसार माझ्या खर्चाने , सन्मानचिन्ह बनवली. त्यांना या पत्रांचा आधार आहे. पण हे काम खूपच कमी खर्चात झालं.’

© श्रीमती उज्ज्वला केळकर  

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शारदारमण गिनीज बुकात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ शारदारमण गिनीज बुकात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डकडून येणार्‍या पत्राची शारदारमण मोठ्या आतुरतेने वाट पहात होते. त्यांची इच्छा आहे की पुर्‍या विश्वात सगळ्यात जास्त कविता लिहिणारा कवी या केटॅगरीत त्यांचं नाव नोंदलं जावं. गेल्या वर्षापासून पार्सलद्वारा ते या संस्थेकडे सतत आपल्या कविता पाठवत आहेत. त्यांना पूर्ण विश्वास आहे की एक-न-एक दिवस त्या वर्ल्ड रेकार्डमध्ये त्यांचं नाव नोंदवलं जाईल.

साहित्य लेखनासाठी त्यांनी आपलं नाव `शारदारमण’ यासाठी घेतलेलं नाही कि त्यांच्या पत्नीचं नाव `शारदा’ आहे. ते म्हणतात, ‘कला, विद्या, प्रतिभा यांची देवी `शारदा’  त्यांच्यात रममाण झालीय, म्हणून ते ‘शारदारमण’ आहेत.

गांववाल्यांचं त्यांच्या कवितांच्या बाबतीतलं मत वेगळं आहे. ते म्हणतात, ‘त्यांची कविता म्हणजे, शब्दांचा ढीग फेकलेली कचराकुंडी.’ मत

शारदारमण उठता-बसता,  जागेपाणी- झोपेतही कविता करतात. एक दिवस ते असे झोपले  कि त्यांच्या तप:साधनेला यश मिळाले. `गिनीज बुक…’ च्या वतीने त्यांना एक पत्र मिळाले. त्यात लिहीलं होतं की त्यांचं नाव `गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये समाविष्ट केलं जाईल.  ते हर्षविभोर होऊन उठले, परंतु ते जसजसे पत्र वाचत पुढे गेले, तसतसा त्यांचा  आनंद, हर्ष, उल्हास फुग्याप्रमाणे खाली येत येत एकदम फुस्स… होऊन गेला.

त्यात लिहीलं होतं, `आपलं नाव विश्वविक्रमासाठी नोंदवलं जाणार आहे, पण एका वर्षात जास्तीत जास्त शब्द लिहिणारी व्यक्ती म्हणून ते समाविष्ट केलं जाईल. आम्हाला खेद आहे की अधिकाधिक कविता लिहिणारा कवी म्हणून आपल्या नावाची नोंद होऊ शकत नाही. आपण लिहीलेल्या शब्दांमध्ये कुठलंही काव्य, कविता जाणणार्‍या मर्मज्ञांना जाणवलं नाही. त्यामुळे अधिकाधिक शब्द लिहिणारी व्यक्ती म्हणून ते समाविष्ट करत आहोत.

पुढे लिहीलं होतं –

आमच्याकडे सगळ्यात मोठा कागदांचा जो संग्रह आहे, तो ब्रिटीश पार्लमेंटरी कागदांचा आहे.  त्याचं वजन पावणे चार टन है। आपण पाठवलेल्या कागदांचं वजन सव्वा पाच टन आहे. आजपर्यन्त आमच्याकडे आलेली सगळ्यात मोठी कादंबरी २०,७०,००० शब्दांची आहे. त्याचे २७ व्हॉल्युम्स आहेत. ती लिहायला ४ वर्षे लागली. आपण एकाच वर्षात  ४०, ४०, ००० शब्द लिहीले आहेत. तेव्हा एका  वर्षात जास्तीत जास्त शब्द लिहिणारी व्यक्ति या विभागात आपलं नाव आम्ही नोंदवत आहोत.  अधिकाधिक कविता लिहिणारी व्यक्ति या  विभागात आपलं नाव आम्हाला नोंदवता येणार नाही. क्षमस्व.

`हरामखोर स्साले…’ शारदारमण उसळून म्हणाले आणि धम्मकान सोफ्यावर पडले.

© श्रीमती उज्ज्वला केळकर  

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गानसमाधी.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ गानसमाधी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

हिन्दी भावानुवाद  >>  हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ गानसमाधि ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

व्यासपीठावरून गाणार्‍या त्या तरुण गायकाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत होता. आत्ताच्या मैफलीत तो बागेश्रीला आवाहन करत होता. ती हळू हळू डोळे उघडू लागली होती. विलंब गतीतील आलापीत आळसावलेली ती, आळोखे पिळोखे देऊ लागली होती. हळू हळू ती उठू लागली. क्षाणाक्षणाला कणाकणाने उमलू लागली. प्रत्येक आलापाबरोबर पदन्यास करू लागली. तानांची बरसात होऊ लागली. ती त्यावर थिरकू लागली. नर्तन करू लागली. समेवरचा तो विलक्षण सुंदर ठहराव. … गायक रंगून गात होता. श्रोते तल्लीन होऊन ऐकत होते.

पाहिल्याच ओळीत बरोबर मध्यावर, गायकाच्याच समोर बसलेले वयस्क गृहस्थ डोळे मिटून बसले होते. गायकाचे लक्ष अधून मधून त्यांच्याकडे जात होते आणि तो थोडा थोडा विचलित होत होता. सरावाने तो गात होता, पण त्याच्या मनात सारखं येत होतं, ’हे असं झोपायचं असेल, तर इथं यायचं तरी कशाला?’ क्वचित त्याला वाटे, ‘आपण गाण्यात कुठे कमी तर पडत नाही ना! कानावर पडत असलेला पेटी-तबल्याचा ध्वनी आणि डोक्यात वळवळणारा हा किडा यांची जशी जुगलबंदीच चालू झाली होती.

अखेर बागेश्रीचं नर्तन थांबलं. त्या वयस्क गृहस्थांनी आता डोळे उघडले होते. गायकाने संयोजकांना त्या गृहस्थांना बोलावून आणायला सांगितले. ते जवळ आल्यावर गायकाने त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. मग म्हणाला, ‘आजोबा मी गाण्यात कुठे कमी पडतोय का?

‘छे: छे:! आजीबात नाही. असा विचारही तू मनात आणू नकोस….’

‘मग तुमची झोप अपूरी झालीय का?’

‘नाही… नाही.. आजिबात नाही. ‘

‘गाण्याच्या वेळी आपले डोळे मिटलेले होते. असं का?’

‘त्याचं काय आहे, डोळे मिटले की पंचेद्रियांच्या सर्व शक्ती श्रवणेंद्रियात एकवटतात. विशेषत: सैरभैर फिरणारी नजर आपल्या मनाच्या ठायी स्थिरावते आणि स्वर कसे आत… आत… मनात… काळजात उतरतात. डोळे उघडे असले की ते फितूर होतात. आस-पासचं हवं – नको ते पहात रहातात. नाही म्हंटलं, तरी गाण्यावरून लक्ष थोडं तरी विचलित होतं. बंद डोळे स्वर पूर्णपणे आत सामावून घेतात.’ असं बोलता बोलता अभावितपणे थोड्या वेळापूर्वी गायलेली एक आलापी त्यातल्या सुरेख मिंडसह त्यांनी गुणगुणली. तो तरुण थक्क झाला.

ते गृहस्थ पुढे म्हणाले, ‘तू चांगलंच गातोस. पण गायक गायनाशी इतका एकरूप झाला पाहिजे, की समोरचे श्रोते काय करताहेत, दाद देताहेत की झोपताहेत, ऐकताहेत की एकमेकांच्यात बोलताहेत , याचंही भान गायकाला राहाता कामा नये. याला गानसमाधी म्हणायचं, तुझं गायन या अवस्थेला पोहोचो!’ असं म्हणत त्या गृहस्थांनी त्या तरुण गायकाच्या डोक्यावर हात ठेवला.’

© श्रीमती उज्ज्वला केळकर  

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अ ल क ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये

सौ. राही पंढरीनाथ लिमये

(गेली वीस वर्षे मासिकात कथा, कविता लिहिते. ललना, माहेर, उत्तम कथा, मानिनी, प्रपंच दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.)

 ☆ जीवनरंग ☆ अ ल क ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये ☆ 

1) पंचवीस वर्षे पलंगावर लोळागोळा होऊन पडलेल्या आणि नुकत्याच शांत झालेल्या मुलाच्या देहाकडे शीलाताई शांतपणे पहात होत्या. मनात भावनांचा कल्लोळ होता पण चेहरा निर्विकार होता. सगळे शोक व्यक्त करत होते. हळुच त्या देवघरात गेल्या. बाळकृष्णाला हात जोडले. तुझे आभार कसे मानू?अनंत उपकार केलेस. रोज तुला प्रार्थना करत होते माझ्या आधी माझ्या या गोळ्या ला ने.लाज राखलीस. खरा सखा झालास.आता मागे काही चिंता नाही. मी सुखाने डोळे मिटीन.

2) ती त्याच्या फोटो समोर उभी राहुन म्हणाली तुला माहितेय माझी मैत्रीण मला म्हणाली हल्ली तु शब्दातुन छान व्यक्त होतेस.ती आता माझी गरज झाली का रे? तु असताना कुठल्याही परिस्थितीत असणारी तुझी भक्कम साथ.तुझ्यावरचा दृढ विश्वास हा च मोठा भावनिक आधार होता. आता तो मी शब्दातुन शोधतेय का?सांग ना. तो फोटोतुन हसत होता. तिचे डोळे भरून आले.

अल्याड पल्याड चं हे अंतर–‐—-‘.

3) रात्री उशिरा फोन वाजला. बस दरीत कोसळली होती. तो रेस्क्यु टीम मध्ये होता. ती म्हणाली सांभाळून हं.त्याने तिला जवळ घेतलं. तुझा हा च शब्द मला सुरक्षित ठेवतो.तो भराभर निघुन गेला. ती दारातून अभिमानाने बघत होती. ती देवघरात आली. समई लावली आणि हात जोडून उभी राहिली. काही सांगायचं नव्हतच.कारण सांभाळून ह्या तिच्या शब्दातल॔ सुरक्षा कवच देवाच्या आशीर्वादाचच तर होतं.

 

सौ. राही पंढरीनाथ लिमये

मो  नं 9860499623

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – कल्पक योजना ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – कल्पक योजना ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

?लघु बोध कथा?

कथा २०. कल्पक योजना

यवन देशात ‘महमूद सुलतान’ नावाचा राजा होता. परदेशात जाऊन युद्ध करण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्याच्या प्रजेला खूप त्रास होत होता. त्यामुळे देश ओसाड, रिक्त झाला. जनता देश सोडून जाऊ लागली. तेव्हा त्याच्या मंत्र्याने ‘काहीतरी उपाय करून राजाची विवेकबुद्धी जागृत केली पाहिजे’ असा पक्का निर्धार केला. त्यामुळे जेव्हा जेव्हा तो राजाशी संवाद साधत असे, तेव्हा तेव्हा तो म्हणत असे, “मी पूर्वी एका सिद्धपुरुषाची सेवा केली होती. त्याच्या कृपेमुळे मी पक्ष्यांची भाषा शिकलो. पक्षी जे बोलतात ते सगळे मला कळते.”

एकदा शिकारीहून परत येताना राजाने मार्गात एका वृक्षावर बसलेल्या घुबडांचे बोलणे ऐकून मंत्र्याला उद्देशून म्हटले, “अरे, तू पक्ष्यांची भाषा जाणतोस ना? तर हे दोन घुबड काय बोलत आहेत ते मला सांग.” खरोखरच ते बोलणे समजत आहे असे भासवत मंत्र्याने काही वेळ ते कूजन ऐकले आणि राजाला म्हणाला, “महाराज, आपण ते बोलणे ऐकणे योग्य नाही.” “जे काही असेल ते पण तू मला सांगितलेच पाहिजेस” असा आग्रह राजा करू लागला तेव्हा विनयपूर्वक मंत्री सांगू लागला.

“महाराज, या दोन घुबडांपैकी एका घुबडाला कन्या तर दुसऱ्याला पुत्र आहे. दोघांचाही त्यांच्या विवाहासाठी प्रयत्न चालू आहे. पुत्र असलेल्या घुबडाने दुसऱ्या घुबडाला शेवटी विचारले की ‘माझ्या पुत्राला कन्या देताना पन्नास उजाड गावे देणार का?’ ‘देवाच्या कृपेने आमचे सुलतान महमूद सुखाने राज्य चालवीत आहेत. तेव्हा आमच्याकडे उजाड गावांना काहीही तोटा नाही. आपण पन्नास उजाड गावे मागीतलीत, मी पाचशे देईन’ असे कन्या असलेले घुबड म्हणाले.”

मंत्र्याचे बोलणे ऐकून दुःखी झालेल्या राजाने तत्काळ उजाड गावांचे नूतनीकरण केले व विनाकारण युद्धे करणे थांबवून प्रजेला सुखी केले.

तात्पर्य –चातुर्याने आखलेली योजना सफल होतेच.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गंमत ब्लड डोनेशनची – भाग – 3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  गंमत ब्लड डोनेशनची – भाग – 3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

तेव्हड्यात डॉक्टर चेकिंगला आले. तोपर्यंत सरही आले होते. मित्र म्हणाला, ‘डॉक्टर, आमचा मित्र ठीक तर झालाय. पण असे का करतोय बघा जरा. चांगले तपासा’. तपासा म्हंटल्या बरोबर त्याने आपले दोन्ही हात क्रॉस करून खांद्यापाशी धरले. ‘नको, नको. डॉक्टर मी बरा आहे. काही झालं नाही मला. फक्त आता घरी जाऊ दे माझ्या मैत्रिणी बरोबर, याच्या बरोबर नको.’

सर सुद्धा आश्चर्याने पहात राहिले. सगळी ट्रीप याने ठरवली. आता हा असे का बोलतोय त्यानाही समजेना. तेही डॉक्टरना म्हणाले,”डॉक्टर, प्लिज बघा बर जरा, हा असे का बोलतोय. अहो, आमच्या कॉलेजचा जी.एस. आहे हा. ऑल राउंडर. सगळी कामे धडाडीने करणारा. मैत्रिणी आहेत त्याला. पण त्यांच्या बरोबर घरी जाणं असलं काही नाही आवडणार त्याला.

डॉक्टरही संभ्रमात पडले.अशा कारणासाठी तपासायचे तरी कसे? याची पर्सनॅलिटी का बरे अशी चेंज झाली आहे? आपण याला ब्लेड दिले ते लेडीज कॉलेजच्या कॅम्पसमधून कलेक्ट केलेले आहे. त्याचा हा परिणाम तरी नाही? त्यांना मनोमन हसू आले. पण ते हसू चेहऱ्यावर उमटू न देता सरांना म्हणाले, “पेशंट आत्ता ओके दिसत असला, तरी त्याला अजुन ब्लड द्यायला लागणार आहे. याचे दोन तीन मित्र थांबू देत इथे. आज रात्री आणि उद्या सकाळी येऊन दुपारी डिस्चार्ज देतो. बाकी तुम्ही सगळे गेलात तरी चालेल. त्याच्या बरोबर मी मेडिकल सर्टिफिकेट देतो. काळजी करू नका.”

अन दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्याच्या मित्रांचे मॅच होणार ब्लड डॉक्टरांनी पेशंटला दिलं. पेशंट एकदम नॉर्मल झाला. जाताना डॉक्टरांना शेक हॅन्ड केले.आणि मित्रांच्या खांद्यावर हात टाकून डौलात पायऱ्या उचलून गेला.

डॉक्टर अजूनही आपल्या विचारावर, आपण केलेल्या निदानावर आणि पुन्हा दिलेल्या ब्लड ट्रीटमेंट वर विचार करत बसलेत. या ब्लड डोनेशन च्या गमतीचा तेढा अजूनही त्यांना सुटला नाही.

कथा संपूर्ण

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares