नेहमी प्रमाणे रविवारच्या सुटीनंतरची बँकेत गर्दी. ‘मॅडम गर्दी कंट्रोल करा’ माझ्या वरिष्ठांची सूचना. “येस सर, नरेश ग्राहकांना व्यवस्थित रांगेत यायला सांग. आपला परीसर लहान असल्याने दहा/दहा च्या संख्येने दरवाज्याच्या आत घे. बाकींना बाहेरच रांगेत राहायला सांग.”
मी कॅशियर केबिनमध्ये डोकावत कॅशियर अशोकला विचारले “मिलिंदला पाठवू का मदतीला ?”
“पाठवा मॅडम.”
“आणि छोट्या डिपाॅझीट बँक ग्राहक मित्र केंद्रावर वर्ग करा.”
“होय, काही ग्राहक कॅश डिपाॅझीट मशिनचीही मदत घेत आहेत.”
एक ग्राहक तक्रार घेऊन आले, “मॅडम एक तास झाला कॅश डिपाॅझीट करून, अजून अकोल्याला पार्टीच्या खात्यात जमा झाले नाही.”
“अहो, होइल जमा. नेटवर्क कनेक्टीव्हीटी नाही आहे.”
“कनेक्टीव्हीटी नाही किती सहजतेने म्हणता हो तुम्ही. तिकडे आमचा पेशंट तळमळतोय. ऑपरेशन करायचंय. पैसे जमा झाल्याशिवाय होणार नाही ते.”
मी आमच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क केला. संपूर्ण सर्व्हर डाऊन होता. प्रधान कार्यालयाशीही संपर्क झाला. तासभर तरी लागणार होता. “सर, तासाभराने कनेक्टीव्हिटी येईल.”
“एक तास ? मॅडम अहो, जीवन मरणाचा प्रश्न आहे. एका एका सेकंदाचा हिशोब आहे आणि तुम्ही एक तास म्हणतात? काय होईल पेशंटची हालत, काही माणुसकी आहे कि नाही तुमच्याजवळ ?”
“शांत व्हा सर,” मी त्यांना पिण्यास पाणी दिलं . “मी करते काहीतरी.” मी अकोला शाखेला फोन केला. शाखा व्यवस्थापकांना सगळी परिस्थिती सांगितली, ग्राहकांची एमरजन्सी सांगून माझ्या रिस्कवर पैसे द्यायला सांगितले. त्यांनी माझं नाव, GBPA नंबर घेतला व ग्राहकाला पैसे दिले. माझ्या समोर बसलेले ग्राहक मोहन वैद्य शांत झाले.
“धन्यवाद मॅडम, आम्ही अगतिक होतो, म्हणून बोललो मी. माफ करा.”
“ठीक आहे, तुमचं काम झालं ना, आनंद आहे मला.”
मोहन वैद्य गेले तशी मी थोडंसं हुश्श् केलं. माझी सहकारी प्रणिता सगळं पहात होती. ती म्हणाली, “सुनीता, कनेक्टीव्हीटी नसणे यात आमचा काय दोष. येतात काही तांत्रिक अडचणी. ग्राहकसेवा काही वेळापुरती खंडित होते हे मान्य. पण त्यात आपली चूक नाही ना. आपण काही हातावर हात धरुन बसत नाही. follow up सुरूच असतो. तो ग्राहक इतकं बोलत होता, तरी तू शांत राहिलीस. कसं शक्य होतं तुला हे बाई.”
“प्रणिता, येतातच असे समर प्रसंग आयुष्यात. ATM चालू नाही, बोलवा टेक्निशियन, त्यांना ताबडतोब येता येत नाही, कारण त्यांनाही अनेक ठिकाणची कामं असतात. ग्राहक ऐकत नाहीत. त्यांना ताबडतोब सुविधा हवी. ही तर काही उदाहरणं झाली. प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ग्राहक त्रास हे देतातच. पण मी ते दुर्लक्षित करुन त्यांचं काम करुन देते.”
“अग तेच तर म्हणतेय मी. तू इतकी मवाळ कशी ? तुला त्रास नाही होत या गोष्टींचा?”
“खरं सांगू प्रणिता, स्वतःला त्रास होऊ नये हाच माझा उद्देश असतो. कारण ‘तू तू मी मी’ करण्यात मनःशांती जाते. आपलंच बी. पी. वाढतं. मन अस्वस्थ होतं. बरं एवढंच नाही तर आपल्याला घरही सांभाळायचं आहे. कुटुंबाकडे लक्ष द्यायचं आहे. मग अशा गोष्टीत का आपली शक्ती खर्च करायची.
प्रणिता माझ्या कृतीने कुणाचं भलं होत असेल, चांगली सेवा मिळत असेल, पण यातून मला समाधान मिळतं, शांती मिळते, मी सुखी होते. बहुदा हाच माझा सुखाचा पासवर्ड असेल.”माझ्यापुढे दोन्ही हात जोडत प्रणिता बोलली, “धन्य आहेस गं बाई”.
प्रणिताने विषय छेडला आणि मी हळूहळू शिरले भूतकाळात.
“ए छकुली ऊठ गं, शाळेत जायचंय ना.”
मी अंथरूणात हातपाय हलवत, ‘आज नाही जात शाळेत’ सांगितलं.
“अगं, न जाऊन कसं चालेल. चांगलं शिक्षण घेशील तर जीवनात काही चांगलं करून दाखवशील. स्वतःच्या पायावर उभी राहशील. ज्ञानाने तुझ्या व्यक्तीमत्वात प्रगल्भता येईल. जगात जो ज्ञानी तो मोठा गणला जातो. तुला मोठं बनायचं आहे ना. मग तुला शाळेत जायला हवं. भरपूर शिकायला हवं. ऊठ बाळ, तुझ्या सुखी जीवनासाठीचा हा पासवर्ड समज आणि शाळेला जा.”
शाळेतही माझा पहिला नंबर कधी चुकला नाही याचे कारण मी वेळच्यावेळी अभ्यास करायचे, गृहपाठ करायचे, इतर माझ्या वर्गमैत्रिणी मात्र ‘तहान लागली की विहीर खोदायची’ या तत्वाने परीक्षा आली कि अभ्यासाला लागायच्या. मला विचारायच्या “सुनीता तुझ्या यशाचं रहस्य काय गं.”
मी त्यांना सांगायचे, “अगं, अगदी सोपं आहे ते, वेळच्यावेळी अभ्यास, हाच माझा यशाचा पासवर्ड, मग ऐनवेळी माझी धावपळ होत नाही कि रात्र /रात्र जागरणं करावी लागत नाहीत म्हणून कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येत नाही. म्हणून मी अगदी बिनधास्त असते.”
“आम्हांलाही आत्मसात करावा लागेल ग हा सुखाचा पासवर्ड.”
अशी मी पुस्तकांशी मैत्री असलेली , अगदी टिपीकल भाषेत ‘पुस्तकी किडा’. कोणी काहीही म्हणू दे, मी तर सुखी आहे ना.
☆ दोन अनुवादित कथा – १. त्या ग्रोसरी शॉपमध्ये – डॉ. हंसा दीप २. संस्कार – श्री सीताराम गुप्ता ☆ सौ. उज्ज्वला केळकर☆
१. त्या ग्रोसरी शॉपमध्ये – डॉ. हंसा दीप
त्या ग्रोसरी शॉपमध्ये पीटर नुकताच कामाला लागलाय. डेली नीड्स विभागाकडे लक्ष देण्याचे जबाबदारी त्याच्यावर देण्यात आलीय. मार्था रोज तिथे येते. सामान नीटपणे रचलेल्या शेल्फांमधून असलेल्या वाटेमधून ती जाते. तिथली प्रत्येक वस्तू हाताळते. उलटी-पालटी करून बघते. त्याची किंमत , त्याचा ब्रॅंड बघते. गेल्या आठवड्यातल्या किमती आणि या आठवड्यातल्या किंमती यात काय आणि किती फरक पडलाय, याचा शोध घेते. तासाभराने ती शॉपमधून बाहेर पडते.
मार्था करणार तरी काय बिचारी? ऐंशी वर्षाची मार्था घरी एकटीच असते. वेळ तरी कसा घालवणार? बाहेर थंडीचा कहर. भरभुरणारं बर्फ. त्यामुळे निसरडी झालेली वाट. पण व्यायाम नसेल, हता-पायांना चलन – वलन नसेल, तर झोप तरी अशी लागणार? त्यावर मार्थाने उपाय शोधून काढलाहे, या ग्रोसरी शॉपमध्ये रोज येऊन इथल्या वस्तू, फिरत फिरत बघून जायचा. इथे तासभर फिरताना तिचा व्यायाम होतो.
पीटरला मात्र पहिल्या दिवसापासूनच मार्था आवडली नाही. तिचे साधे खरबरीत, मळकट कपडे, विस्कटलेले केस, ठराविक वेळी येऊन वस्तू निरखून पहाणं, हाताळणं, तिथे घुटमळणं… त्याला काहीच आवडत नाही तिचं. रागच येतो. त्याला वाटते, ती चोर आहे. रोज चोरी करण्याच्या उद्देशानेच इथे येत असणार. हळू हळू त्याची खात्रीच झालीय याबद्दल. तो सतत तिच्यावर पाळत ठेवून आहे, पण ती अजून तरी कुठे सापडली नाही. आपण तिला पकडू शकलो नाही, हा आपला पराभव आहे, असा त्याला वाटतय. त्याच्या मनात कधीपासून एक विचार कुलबुलतोय. आज काही झालं, तरी तो तो उपाय अमलात आणणार आहे.
नेहमीप्रमाणे मार्था तासभर त्या शॉपमध्येफरून वस्तू हाताळून दोन-तीन वस्तू घेऊन, पेमेंट करण्यासाठी कौंटरजवळ गेली. घेतलेल्या वस्तूंचे पेमेंट केले आणि ती दुकानाबाहेर पडू लागली.
ती दाराशी पोचेपर्यंत पीटर तिथे उभा आहे. ‘मॅम, मला आपलं सामान आणि पावती दाखवा.’अतीव सभ्यतेने पीटर म्हणाला, ‘हे रूटीन चेक अप आहे.’ मार्थाने आपली पावती आणि सामानाची थैली पुढे केली. पीटरने सामान तपासले. त्यात बीन्सचे तीन डबे जास्त होते. त्याचं पेमेंट केलेलं नव्हतं. तो म्हणाला, ‘या तीन डब्यांचं पेमेंट केलेलं नाही.’
‘पण मी हे सामान मी घेतलेलच नाही. मी कधीच टीनमधले बीन्स कधीच खात नाही.’
‘चोरी सापडली की प्रत्येक चोर असंच म्हणतो.’ रागारागाने डोळे वटारत तो मनाला. त्याने मॅनेजरला आणि मॅनेजरने पोलिसांना बोलावले.
दहा मिनिटात पोलिसांची गाडी त्या शॉपसमोर उभी राहिली. दोन पोलीस खाली उतरले. त्यांनी मॅनेजरची तक्रार ऐकून घेतली. मग कार्यालयातील सीसीटीव्ही.चे फूटेज तपासले. त्यात आक्षेपार्ह काहीच दिसले नाही. मॅनेजरचे आभार मानून आणि मारठला घेऊन पोलीस गाडी निघून गेली. पीटरचा भाव आता वाढला होता. त्याला आता तिच्यापासून मुक्ती मिळाली होती. मोठ्या खुशीत होता तो.
अर्ध्या तासाने पुन्हा पोलिसांची गाडी त्या शॉपसमोर उभी राहिली. दोन पोलीस खाली उतरले. मार्था मात्र गाडीत तशीच बसून राहिली होती. पोलीस मॅनेजरशी काही बोलले. मॅनेजर त्यांना आपल्या रूममध्ये घेऊन गेले. दहा मिनिटांनी ते तिघे बाहेर आले. मॅनेजरनी पीटरला हाक मारली आणि कामावरून ताबडतोब काढून टाकल्याचा निर्णय सांगितला.
‘ का पण? चोरी पकडली म्हणून?’ त्याने तणतणत विचारले.
‘ नाही. चोरी केली म्हणून!’ मॅनेजर म्हणाला.
पोलिसांनी त्याला मॅनेजरच्या खोलीत असलेल्या सीसीटीव्ही.चे फूटेज दाखवले. त्यात पीटर मार्थाने पेमेंट केल्यानंतर दाराशी जाताना तिच्या थैलीत बीन्सचे डबे टाकताना स्पष्ट दिसत होतं. पीटरला या सीसीटीव्ही.ची काही कल्पना नव्हती. त्याने मार्थाच्या थैलीत टीन टाकताना कार्यालयातल्या सीसीटीव्ही.चा स्वीच ऑफ केला होता. पण दुकानात मॅनेजरच्या खोलीत आणखी एक सीसीटीव्ही.असू शकेल,याचा त्याला अंदाज आला नाही. पोलिसांनी मार्थाची क्षमा मागत तिला गाडीतून खाली उतरवलं आणि पीटरल ते घेऊन गेले. पीटरला मार्थापासून मुक्ती हवी होती. त्याला ती मिळालीही. पण कशी? त्याला दोषी ठरवून त्याचा सोनेरी भविष्यकाळ कळवंडत मिळालेली मुक्ती होती ती.
मूळ कल्पना – डॉ. हंसा दीप
लेखन – सौ. उज्ज्वला केळकर
♥ ♥ ♥ ♥ ♥
२. संस्कार – श्री सीताराम गुप्ता
रमेश कुमारांचा मुलगा रजत पिंपरीला राहून इंजिनियरिंगचा अभ्यास करत होता. योगायोगाने रमेश कुमारांच्या मित्राने तिथे एक फ्लॅट विकत घेतला होता. तो रिकामाच होता. रजत वर्षभर हॉस्टलमध्ये राहिला. मग वडलांच्या मित्राच्या फ्लॅटवर राहू लागला. रजतने आपल्या आणखी तीन मित्रांना तिथे राहायला बोलावले. एकूण चार विद्यार्थी तिथे राहत होते. तिथे त्यांना घरासारखाच आराम वाटायचा.
रमेश कुमार आग्र्याचे. त्यांनी स्वैपाक – पाणी आणि इतर कामे करण्यासाठी एका माणसाला नेमले. तो तिथेच राहत असे. एकदा मुलाची ख्याली-खुशाली बघण्यासाठी रमेश कुमार स्वत:च तिथे गेले. संध्याकाळची वेळ झाली, तेव्हा रजतचे अनेक मित्र तिथे आले. सगळे जण तिथेच जेवले. रमेश कुमार जोपर्यंत तिथे होते, तोवर रोज रोज हेच दृश्य ते पाहत होते. रोज संध्याकाळी मुले तिथे यायची. जेवायची. गप्पा-टप्पा व्हायच्या. थोडा दंगा-धुडगूसदेखील घातला जायचा. मग ती निघून जायची. त्यांचं अस्तित्व, गप्पा-टप्पा यामुळे मोठं चैतन्यपूर्ण वातावरण तिथे तयार व्हायचं.
रजतचे सगळे मित्र त्यांच्याशी अतिशय आदराने वागायचे. त्यांचा मान ठेवायचे. रमेश कुमारांना बरं वाटायचं. पण एक दिवस रजतचे सगळे मित्र निघून गेल्यावर त्यांनी रजातला विचारले, ‘रजत, तू इथे इंजिनियरिंगचा अभ्यास करण्यासाठी आला आहेस, की ढाबा चालवायला?’ त्यांच्या प्रश्नाने रजतचा चेहरा उतरला. तो जड आवाजात म्हणाला, ‘पापा, हेसुद्धा माझ्यासारखेच घरापासून दूर रहातात. बाहेर कसं जेवण मिळतं, आपल्याला कल्पना आहेच. हे कधी कधी यासाठीच इथे येतात, की घरी बनवलेलं चांगलं जेवण त्यांना कधी तरी मिळावं. इथे त्यांना घरी बनवलेलं चांगलं जेवण मिळतं. ‘
त्यावर रमेश कुमार म्हणाले, ‘पण त्यामुळे तुझा खर्च वाढत जातो, त्याचं काय? आणि तुझ्या अभ्यासावरदेखील त्याचा परिणाम होतो. अशा फालतू मुलांचं इथे येणं आणि रात्री दंगा घालणं बंद कर.’
रजत रोषपूर्ण आवाजात म्हणाला, ‘नाही बाबा, मी असं नाही करू शकणार! मुलं आली की जेवणासाठी त्यांना विचारावंच लागेल आणि ती जेवूनच जातील. खर्चाचं म्हणाल, तर मी माझ्या खर्चात तेवढी काटकसर करतोच आहे. आता मुले जमल्यावर थोड्या गप्पा-टप्पा, दंगा होणारच. ती काही रात्र रात्र दंगा करत नाहीत. त्यांनाही त्यांचा अभ्यास आहेच. ‘
राजतच्या या उत्तराने रमेश कुमार प्रसन्न झाले. ते एक प्रकारे रजतची परीक्षाच घेत होते. तो म्हणाला असता की पापा त्यांना उद्यापासून येऊ नका, म्हणून सांगतो, तर त्यांना वाईट वाटलं असतं. रमेश कुमारांच्या परिवारात ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या, दुसर्याचा विचार करणं, त्यांचा आदर-सत्कार करणं, मान-सन्मान ठेवणं हे संस्कार बाहेर राहूनही किंवा काळाचा प्रभाव पडूनही रजतच्या बाबतीत बदलले नव्हते.
आता रमेश कुमार म्हणाले, ‘मी काही मनापासून बोललो नव्हतो. तुझी प्रतिक्रिया काय होते आहे, हेच मला बघायचं होतं. आता उद्या मला आग्र्याला परत जायला हरकत नाही.’ हे ऐकल्यावर राजताच्या चेहर्यावर आलेल्या प्रसन्न भावाने रमेश कुमारांची प्रसन्नता आणखी वाढवली.
मूळ कथा – संस्कार
मूळ लेखक – श्री सीताराम गुप्ता
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
♥ ♥ ♥ ♥ ♥
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नेहमीप्रमाणे कंपनीत राऊंड मारताना डीकेना काही ठिकाणी कॉम्प्युटर आणि स्टाफच्या बसण्याची जागा बदलल्याचं लक्षात आलं.
“हे कोणी करायला संगितलं”
“संकेत सरांनी !!”सुप्रीटेंडेंटने उत्तर दिलं.
“मॅनेजर कोणयं ?”
“तुम्ही !!”
“मग हे बदलायच्या आधी विचारलं का नाही ? ”
“जे सांगितलं ते करावं लागतं. दोघंही साहेबच.”
“मला भेटायला सांगायचं”
“मी त्यांना बोललो पण गरज नाही असं म्हणाले.” .. हे ऐकून डी के भडकले.वादावादी सुरू झाली.
“सर,रागावणार नसाल तर एक बोलू ? ”
“बोल. ”
“इतके वर्षे सोबत काम करतोय.आपल्यातही वाद झालाय. पण गेल्या काही दिवसांपासून कंपनीत सतत काही ना काही कटकटी चालूयेत.. कारण तुम्हाला चांगलंच माहितीयं.”
“आलं लक्षात.काय करायचं ते. बघतो. परत जसं होतं तसं ठेव आणि कोणीही सांगितलं तरी मला विचारल्याशिवाय काहीही करू नकोस.”
—-
या घटनेनंतर संकेत डी के विरुद्ध जास्तच आक्रमक झाला.मुद्दाम त्रास होईल असं वागायला लागला.हवं तेच करण्याच्या हटवादीपणामुळे संकेतचं कोणाशीच पटत नव्हतं.मोठे साहेब सोडले तर इतरांना तो किंमत द्यायचा नाही.त्यावरून वाद झाले. संकेतविरुद्ध अनेकांनी तक्रारी केल्या परंतु केवळ कामातला उत्तम परफॉर्मन्स आणि कंपनीचा होणारा फायदा त्यामुळं सिनियर्सनी दुर्लक्ष केलं.सांभाळून घेतलं,कायम झुकतं माप दिलं परंतु हळूहळू कुरबुरी वाढून त्याचा कामावर परिणाम व्हायला लागला.शेवटी मोठया साहेबांना लक्ष द्यावं लागलं. साहेबांच्या केबिनमध्ये डी के आणि संकेत समोरासमोर बसले होते.
“दोघंही हुशार,मेहनती आहात. एकत्र काम केलंत तर कंपनीसाठी फायद्याचं आहे.”
“मी नेहमीच बेस्ट काम करतो. बाकीच्यांचं माहीत नाही” संकेतनं पुन्हा स्वतःची टिमकी वाजवली.तेव्हा वैतागून डीके म्हणाले “सर,काहीतरी करा.आता पाणी डोक्यावरून जातंय.तुम्ही सांगितलं म्हणून गप्प बसलो पण दिवसेंदिवस काम करणं अवघड झालयं.याचं वागणं सहन करण्यापलीकडं गेलयं. सगळ्याच गोष्टीत नाक खुपसतो.दुसऱ्यांच्या कामात लुडबूड करून विचार न करता परस्पर निर्णय घेतो.कंपनीच्या दृष्टीनं हे चांगलं नाही.यापुढं मला सांगितल्याशिवाय कोणताही निर्णय घायचा नाही हे फायनल.”
“मी जे काही करतो ते कंपनीच्या भल्यासाठीच आणि मला असले फालतू प्रोटोकॉल फॉलो करायला जमणार नाही.”संकेत उद्धटपणे म्हणाला.
“फालतू?विल शो यू माय पॉवर”डी के भडकले.
“आय डोन्ट केअर.जे वाटतं ते मी करणारच.हू आर यू”संकेत.
“संकेत,बिहेव युअरसेल्फ,से सॉरी तो हिम.”मोठे साहेब चिडले पण संकेतनं ऐकलं नाही.
“सर,आपल्या इथं टीम वर्क आहे.हा टीममध्ये फिट नाही. आता यावर जास्त काही बोलत नाही.तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल याची खात्री आहे.एक सांगतो,इतके दिवस दुर्लक्ष केलं पण आता लिमिट क्रॉस झालीय.”एवढं बोलून डी के बाहेर गेले तेव्हा संकेत छदमीपणे हसला.
“संकेत,धिस इज नॉट गुड. बी प्रोफेशनल”
“सर,मी काहीच चुकीचं केलं नाही.”
“असं तुला वाटतं पण कंपनीचे काही नियम तुला पाळावेच लागतील.अडजेसटमेंट करावी लागेल.दरवेळेला “मी” मह्त्वाचा नसतो.प्रसंगानुसार तो बाजूला ठेवावाच लागतो.तडजोड करावी लागतेच ”
“पण सर,माझ्यामुळे कंपनीचा फायदाच होतोय ना मग मी कशाला तडजोड करू. आतापर्यंत मी कधीच चुकलेलो नाही.”
“पुन्हा तेच.जरा हा ‘मी’पणा कमी करून दुसऱ्यांचंसुद्धा ऐकायला शिक.”साहेबांच्या स्पष्ट बोलण्याचा संकेतला फार राग आला पण गप्प बसला.
“हुशार,बुद्धिमान,धाडसी आहेस.पंचवीशीतचं मोठं यश मिळवून इतरांच्या तुलनेत पुढे गेलास.कामातल्या स्किल्समुळं सांभाळून घेतलं,वागण्याकडं दुर्लक्ष केलं.परंतु…..”
“माझी योग्यता फार मोठी आहे.इथल्या कोणाशीच बरोबरी होऊ शकत नाही.मी फार मोठा होणार असं सगळेच म्हणतात.”संकेतची आत्मप्रौढी सुरूच होती.
“नेहमी कामाचं कौतुक होतं त्याच गोष्टीचा तुला अहंकार झालाय.कौतुकाची इतकी चटक लागलीय की थोडंसुद्धा मनाविरुद्ध बोललेलं सहन होत नाही.“आपण करतो ते बरोबर,तेच बेस्ट”या भ्रमानं आत्मकेंद्री बनलायेस.”साहेबांनी पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला पण संकेतनं ऐकलं नाही उलट जास्तच हेकेखोर झाला.शेवटी नाईलाजानं साहेबांनी निर्णय घेतला.फायनल वॉर्निंग दिली. संकेतच्या ईगोला फार मोठा धक्का बसला.प्रचंड अस्वस्थ झाला.अपमानाने राग अनावर झाला त्याच तिरमिरीत कसलाही विचार न करता रिजाईन केलं.हे अपेक्षित असल्यानं साहेबांनी ताबडतोब राजीनामा मंजूर केला.संकेतला रिलीव्ह लेटर दिलं.तीन वर्ष काम करत असलेल्या नोकरीला एका फटक्यात लाथ मारली या आनंदात संकेतला नोकरी गेल्या विषयी वाईट वाटलं नाही.
लगेच दुसरी नोकरी मिळाली पण तिथंही पुन्हा तेच झालं. वागणुकीमुळे कंपनीनं बाहेरचा रस्ता दाखवला तरीही संकेतची धुंदी उतरली नाही.स्वतःला बदलण्याऐवजी इतरांना दोष देत तो नोकऱ्या बदलत राहिला.विचित्र स्वभावामुळं लोक टाळू लागले.मित्र मंडळी लांब झाली.संकेत एकटा पडला.
फक्त बाहेरच नाही तर घरीसुद्धा संकेत मग्रूरीत वागायचा. त्यामुळं घरात सतत अशांतता.रोजची वादावादी. शेवटी त्याच्या एककल्ली वागण्याला कंटाळलेल्या बायकोनं घटस्फोट घेतला.
—
सर्व काही उत्तम असूनही केवळ आडमुठेपणामुळं एकाकी पडलेल्या संकेतचं आयुष्य भरकटलं.दिशाहीन झालं.
असे स्वप्रेमात अडकलेले अनेक संकेत आपल्या आजूबाजूला आहेत जे कधीच तडजोड करायला राजी नसतात. हेकेखोरपणे आपलं तेच खरं करण्याच्या नादात जबर किंमत मोजतात, पण ‘अहं’ सोडत नाहीत .स्वतःची फरपट करतातच आणि जिवलगांची सुद्धा…..
थोडा लवचिकपणा स्वभावात आणला तर अनेक प्रश्न निर्माणच होत नाही.
(मागील भागात आपण पहिले- अंजलीला सासूसासरे असेपर्यंत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता.सासूसासरे वारल्यानंतर मात्र सगळं सुरळीत झालं होतं.आता इथून पुढे)
तिला आता भयंकर उदास वाटू लागलं होतं.प्रिया म्हणत होती तसं खरंच झालं तर नसेल?पावसामुळे झालेल्या अपघातात रितेशचं काही बरं वाईट तर…
एकदम तिला आठवलं रितेशच्या येण्याच्या रस्त्यावरच एक नाला होता आणि दरवर्षी त्याला पूर यायचा.पुर आलेल्या स्थितीत तो पार करतांना दरवर्षी चारपाच जण तरी वाहून जायच्या घटना घडायच्या.रितेशने तर तसा प्रयत्न केला नसेल?आणि…
त्या कल्पनेनेच तिचा घसा कोरडा पडला.जीव घाबराघुबरा होऊ लागला.डोळ्यात आसवं जमा होऊ लागली.घशात हुंदका दाटून आला.ती आता मोठ्याने रडणार तेवढ्यात प्रिया डोळे चोळत चोळत बाहेर आली.
“आई बाबा अजून आले नाहीत?” तिने रडवेल्या स्वरात विचारलं.अंजलीने उठून लाईट लावला.
” नाही बेटा.पण ते येतीलच थोड्या वेळात “अंजली तिला कसंतरी समजावत म्हणाली
” तू केव्हाची म्हणतेय येतील येतील म्हणून.पण ते का येत नाहियेत?”
” बेटा पाऊस किती जोरात पडतोय बघ.ते कुठतरी थांबले असतील”
” तू फोन लाव ना त्यांना.त्यांना म्हणा प्रियू वाट.बघतेय त्यांची “
” मी मगाशी लावला होता फोन पण लागलाच नाही “
” मग तू परत एकदा लाव ना गं फोन ” ती परत एकदा रडायला लागली.अंजलीने उठून तिला जवळ घेतलं.तशी ती हमसून हमसून रडायला लागली.तिच्या रडण्याने अंजलीच्याही डोळ्यात पाणी आलं.
” असं रडायचं नाही बेटा.तू शहाणी आहेस ना?बघ पाऊस कमी झालाय ना.येतीलच आता बाबा.तू झोप बरं “
” मी तिकडे झोपणार नाही”
” बरं चालेल.इथेच झोप”
” आणि बाबा आले की मला लगेच उठव “
” बरं उठवते “
अंजलीने तिला सोफ्यावरच टाकून तिला थोपटायला सुरुवात केली.तशी ती झोपून गेली.ती झोपलीये हे पाहून अंजली तिला बेडरुममध्ये घेऊन गेली.ती उठू नये म्हणून ती बराच वेळ तिला थोपटत राहिली.मग ती परत हाँलमध्ये येऊन बसली.अकरा वाजत आले होते.तिने मोबाईल उचलून रितेशला फोन लावला.तो लागला नाही म्हणून तिने प्रकाशला लावला.पण त्यालाही लागला नाही. तिने मोबाईलच्या स्क्रिनकडे पाहिलं.तिथं रेंजच नव्हती.थोडाफार का होईना जो प्रकाशचा आधार वाटत होता तोही नाहिसा झाला होता.आता तिलाही खचल्यासारखं वाटू लागलं.काळजीने मन पोखरु लागलं.त्या नाल्याल्या पुरात रितेश वाहून तर नाही ना गेला या विचाराने तिचे डोळे अश्रूंनी भरुन आले.आता एकच उपाय उरला होता.गणपतीला पाण्यात ठेवायचा.तिने डबडबत्या डोळ्यांनी मनाशी निश्चय केला आणि ती धीर एकवटून देवघराकडे जायला निघाली तेवढ्यात …..
होय तोच तो आवाज ज्याची ती जीवाच्या आकांताने वाट बघत होती.तोच तो फाटक उघडण्याचा आवाज.रितेशची वाईट बातमी घेऊन कुणी आलं तर नव्हतं?धडधडत्या ह्रदयाने ती उठली.डोळ्यातले आसू तिने पुसले.धीर धरुन तिने दार उघडलं.बाहेर काळ्या रेनकोटमधली एक आकृती गाडी लावत होती.तिने पटकन अंगणातला लाईट लावला.समोर रितेश उभा होता.रेनकोट असूनही नखशिखांत भिजलेला आणि थंडीने थरथर कापणारा.आनंदाने तिला भडभडून आलं.त्याला जाऊन घट्ट मिठी मारावी असं तिला वाटू लागलं पण तो ओला होता त्याला अगोदर घरात घेण्याची गरज होती.
“काहो इतका उशीर.आणि फोन तर करायचा.वाट बघून जीव जायची वेळ आलीये “
” अगं काय करणार!पावसाने सगळीच वाट लावलीये.कंपनीतून निघालो तर पंचमुखी हनुमान जवळच्या नाल्याला हा पूर!एकदोन जण वाहून गेले म्हणे.त्यामुळे तो रस्ता बंद झालेला.सुभाष चौकाकडून यायला निघालो तर एका डबक्यात गाडी स्लिप झाली आणि मी पडलो.शर्टाच्या खिशातला मोबाईल पाण्यात पडला.तो शोधुन काढला.नंतर गाडी सुरुच होईना.पावसामुळे बहुतेक गँरेजेस बंद.एका गँरेजवाल्याकडे गेलो त्याने एक तास खटपट केली पण गाडी काही सुरु होईना.त्याच्याकडे गाडी ठेवायला जागा नव्हती म्हणून गाडी ढकलत आणू लागलो तर ठिकठिकाणी झाडं पडल्यामुळे रस्ते बंद.मी कसा घरापर्यंत पोहचलो ते माझं मलाच माहित”
“अहो पण एखादा फोन तर करायचा.मी शंभरवेळा तुम्हांला फोन लावायचा प्रयत्न केला पण तुमचा मोबाईल बंदच.प्रकाश भाऊजींनीही प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही”
“हो अगं.डबक्यात पडल्याने मोबाईल खराबच झाला असावा.मी गँरेजवाल्याच्या मोबाईलने तुला फोन केला होता पण त्याचं नेटवर्कच गायब होतं.बरं या तुफान पावसात मोबाईल बाहेर काढायलाच लोक तयार होत नाही ” रितेश रेनकोट काढत म्हणाला
” थांबा मी टाँवेल आणते तुमच्यासाठी”ती टाँवेल आणायला वळत नाही तोच प्रिया जोरजोरात रडत बाहेर आली आणि “बाबाsssss” असं जोरात ओरडत तिने रितेशच्या पायांना मिठी मारली
“अगं थांब.त्यांना आत तर येऊ दे”अंजली ओरडली पण प्रियाने ऐकलं नाही.
लेकीच्या त्या आक्रोशाने रितेशच्या डोळ्यात पाणी आलं त्याने तशाच ओलेत्या स्थितीत तिला उचलून छातीशी धरलं॰
“बाबा तुम्ही लवकर का नाही आले?मला खुप भिती वाटत होती.” त्याच्या गळ्याला मिठी मारुन ती रडत रडत म्हणाली.
” हो गं बेटा.साँरी हं बेटा या पावसामुळे मला येता नाही आलं.आता यापुढे असं नाही करणार”
“प्राँमिस?”
” हो बेटा.प्राँमिस “
रितेशच्या गळ्याला मिठी मारुन प्रिया रडत होती।
अंजली टाँवेल घेऊन आली.बापलेकीचा तो संवाद ऐकून तिलाही गहिवरुन आलं.मोठ्या मुश्किलीने तिने अश्रू आवरले.
“उतर बेटा खाली.बाबांना कपडे बदलू दे.तुझाही फ्राँक ओला झाला असेल तोही बदलून घे”
थोड्यावेळाने ती आणि रितेश जेवायला बसली असतांना प्रिया आली आणि रितेशच्या मांडीवर जाऊन बसली.
” आई मला पण खुप भुक लागलीये.पण मी बाबांच्याच हातून जेवणार आहे”
अंजली आणि रितेश दोघांनाही हसू आलं.रितेश तिला हाताने भरवू लागला.आता मात्र प्रिया चांगली जेवली.जेवण झाल्यावर प्रिया अंजलीला म्हणाली
“आई मी आज मी बाबांजवळ झोपणार आहे”
अंजलीला हसू आलं.रोज खरं तर ती दोघांच्या मध्ये झोपायची पण आज ती रितेशच्या कुशीत झोपणार हे नक्की होतं.
झालंही तसंच ती रितेशच्या कुशीत त्याला मिठी मारुन झोपल्यावर अंजलीने रितेशला संध्याकाळपासूनच प्रिया किती बैचेन होती ते सांगितलं.तिच्या मनात चाललेल्या घालमेलीबद्दल,भीतीबद्दल सांगितल्यावर रितेश म्हणाला
“खरंच अंजू मुलींचं बापावर किती प्रेम असतं हे आज मी प्रत्यक्ष पाहिलंय.त्या मोठ्या झाल्यावरही असंच रहातं का गं हे प्रेम”
“प्रश्नच नाही. मुली कितीही मोठ्या झाल्या,अगदी लग्न होऊन त्यांची मुलं मोठी झाली तरी वडिलांवरचं त्यांचं प्रेम थोडंही कमी होत नाही. तुम्हांला आठवतं मागच्या वर्षी माझे वडिल वारल्यावर सात दिवस मी जेवले नव्हते.एकही मिनिट असा गेला नसेल ज्यात मी रडली नसेन”
“तसं असेल अंजू तर आपल्याला दुसरीही मुलगीच झाली तरी मला आवडेल”
अंजू समाधानाने हसली.मुलगी झाल्याचा सल रितेशच्या डोक्यातून कायमचा गेला हे बरंच झालं होतं.कारण अंजली आता गरोदर होती.पुन्हा मुलगीच झाली तर नवऱ्याची नाराजी आता रहाणार नव्हती.
रितेश प्रेमाने प्रियाच्या डोक्यावर, अंगावर हात फिरवू लागला.त्याच्या स्पर्शाने प्रिया जागी झाली.झोपाळलेल्या स्वरात ती रितेशला म्हणाली
“बाबा तुम्ही मला खुप आवडता”
रितेशने तिला छातीशी कवटाळलं.तिच्या गालाचा मुका घेत तो म्हणाला
“बेटा तू पण मला खूप खूप खूप खूप आवडतेस “
– समाप्त –
(ही कथा माझ्या ” अशी माणसं अशा गोष्टी “या पुस्तकातील आहे.)
“ब्राह्मणाला फसवलंस! तुझा वंशखंड होईल,इस्कोट होईल सगळ्याचा!” सुदामने भरबाजार पेठेच्या मोक्याच्या जागी बांधलेल्या नव्या कोऱ्या घरासमोर उभे राहून गोविंदभट अगदी सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाले तसे सुदामच्या घरातले सगळेच बाहेर आले.
कालच सुदामने साग्रसंगीत गृहप्रवेश,वास्तुशांती, सत्नारायण इत्यादी धार्मिक विधी करून घेतले होते. रात्री सात ते नऊ कीर्तन कार्यक्रम झाल्यावर येईल त्याला जेवू घातले होते.
वडिलांच्या माघारी सुदामने घरगाडा मोठ्या नेटाने हाकला आणि आईच्या उतारवयात तिचं मोठ्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं होतं. त्याच्या बायकोच्या माहेरची काही मंडळी आजही मुक्कामालाच होती. आणि अशात ही भलती शापवाणी ऐकून सारेच भांबावले आणि रागावले सुध्दा आणि हे साहजिकच होतं.! पण नक्की काय झालं हे सुदामला सुद्धा उमगत नव्हतं.
“आवो,काका! ही काय बोलायची रीत झाली का काय? शाप कशापायी देतात माझ्या भरल्या घराला?” सुदाम आवाजात शक्य तेवढा मऊपणा आणीत बोलला,पण त्याच्या काळजाला डागणी मात्र बसली होतीच.
“हा गोविंदभट काय मेला होता की काय की तू बाहेरचे ब्राह्मण बोलावून एवढी मोठी घरभरणी घातलीस ते? आम्ही काय दक्षिणेसाठी कधी अडून बसलो होतो की काय? अरे,तुझ्या बापजाद्यापासून भिक्षुकी करतोय या पंचक्रोशीत. चिमुटभर शिधा आणि मूठभर तांदळाशिवाय कधी काही अधिकचं मागितलं का ते विचार तुझ्या म्हातारीला!” गोविंदभट एखाद्या वळवाच्या पावसाच्या सरीगत बरसत होते,त्यात सुदाम चिंब भिजून गेला!
सुदामची आई हौसाबाई डोक्यावरचा पदर सारखा करीत बाहेर आल्या. “आवो,काका! का असं वंगाळ बोलताय? आमची आतापर्यंतची सारी कार्यं तुमच्याबिगर कधी झालीत का? पण तुम्हीच या वक्ताला आम्हांला फशिवलं!”
यावर गोविंदभट तडकले. “मी का तुम्हांला फसवू? आज सकाळी आलो तर तुमची घरभरणी कालच झाल्याचं दिसलं! मला सोमवारी सांगताय आणि रविवारीच कार्यक्रम उरकून घेताय म्हणजे काय? आणि तो सुद्धा बाहेरचे ब्राम्हण बोलावून?”
यावर सुदाम मध्ये पडला. “काका, मागल्या महिन्यात बाजारात भेटला होता तुम्ही तेंव्हा रविवारच ठरला होता की आपला! तुम्हीच नव्हता का मुहूर्त सांगितला आणि यादी दिली होती सामानाची?”
“रविवार नाही सोमवार म्हणालो होतो मी! हे बघ या डायरीत सर्व लिहिलेलं असतं माझं. काय आज नाही करत मी भिक्षुकी. जन्म गेलाय यातच माझा. तुम्हांला शहरातल्या शिकलेल्या ब्राम्हणांचं वेड लागलंय. सारं कसं अगदी भारीतलं पाहिजे!”
गोविंदभटांचाच खरं तर तारखेचा आणि सुदामचा समजूतीचा घोटाळा झाला होता. बरं या आधी असं कधीच झालेलं नव्हतं. गोविंदभटांनी डायरीत नोंद तर घेतली होती पण ती भलत्याच पानावर. वयोमानानं चष्मा लागलेला आणि स्मरणावर विसंबून राहण्यासारखी परिस्थिती नव्हती राहिली त्यांची. शिवाय सुदामने कुणा हाती दिलेला आठवणीसाठीचा निरोप देणं राहून गेलं होतं त्या माणसाकडून. आणि गोविंदभटांची त्या आठवड्यात बाजारात फेरी काही झालेली नव्हती. त्यांनी नेमका रविवारचा एक उद्योग घेतला होता पलीकडच्या एका आडगावातला. रात्री यायला त्यांना उशीरच झाला होता. पायी फिरूनच ग्रामीण भागात भिक्षुकी करावी लागत असे त्यावेळी.
सुदाम म्हणाला,”काका, काही झालं असेल तर ते होऊन गेलं. आता आलाच आहात तर तेवढी उत्तरपूजा करून द्या की.”
यावर तर गोविंदभटांचा राग अगदी पराकोटीला गेला. “बोलवा की तुमच्या त्या शहरातल्या भटांना!”
सुदाम म्हणाला,”आवो,त्यांना यायला जमणार नाही म्हणाले इतक्या लांब. सकाळी आरती करून तुमची तुम्ही पूजा काढून घ्या म्हणाले! एकतर कालच त्यांना मी अर्जंट बोलावून घेतलं होत्ं तुम्ही आला नाहीत म्हणून!”
“असली उष्टी कामं नाही करीत मी! पूजा काढून घ्या नाहीतर राहू द्या!” गोविंदभट काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते सुदामच्या घरावरून तसेच ताडताड चालत पुढं निघून गेले. त्यांच्या गावाकडे निघालेल्या एका वडाप वाहनाला हात दाखवला आणि तो ही बिचारा काकांना बघून लगेच थांबला. पुढच्या सीटवरच्या एकाला मागे पिटाळून त्याने काकांना पुढे बसायला बोलवलं. गोविंदभटांचा पारा अजूनही चढलेलाच होता. वडापवाल्यानं विचारलं,”काका, काय झालं? चेहरा का असा लालेलाल दिसतोय?”
“लोकांना लाजा नाही राहिल्या आजकाल. सांगतात एक आणि करतात भलतंच. अरे, बाजारातल्या सुदामने मला आजची घरभरणी सांगितली होती. आणि येऊन बघतोय तर कालच उरकून घेतला कार्यक्रम पठ्ठ्यानं!” त्या जीप गाडीतल्या सर्व प्रवाशांनी हा सगळा संवाद ऐकला होताच. त्यांपैकी अनेकांना गोविंदभटांचा शीघ्रकोपी स्वभाव माहित होताच. पण उभ्या पंचक्रोशीत गोविंदभटाचं एकच घर भिक्षुकाचं. आणि शहरातून इतक्या लांबवरच्या ‘उद्योगांना’ कुणी धार्मिक कृत्ये करून देणारा सहजासहजी यायचा नाही. शिवाय इतरांचा वारसाहक्क असणा-या गावांत इतर भिक्षुकांनी व्यवसाय करू नये, असा शिरस्ताच असतो.
अर्ध्या तासाभरात गोविंदभटांच्या गावचा फाटा आला. “काका,इथं सोडू का? आज तुमच्या गावातलं तुम्ही एकटंच शीट आहात म्हणून विचारलं. गाडी गावात नेण्यात वेळ जाईल म्हणून म्हणलं.” ड्रायवरने असं म्हणताच गोविंदभट आणखीनच करवादले. त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकीत पायउतार झाले. घरभरणीसाठी अत्यावश्यक साहित्य भरलेली पिशवी आता त्यांना जड झाली होती. उन्हाचा चटका वाढत चाललेला होता. त्यांच्या नशीबाने त्यांच्या गावाकडं निघालेला एक मोटारसायकलवाला त्यांच्या दृष्टीस पडला आणि गोविंदभट गावात पोहोचले.
गोविंदभटांच्या पत्नीला ते असे लवकरच परत आल्याचे आश्चर्य वाटले. काहीतरी गडबड झाल्याचे तिच्या लक्षात आले. पण लगेचच काही विचारावं तर स्वारी एकदम अंगावर येण्याची शक्य्ता तिने नेहमीप्रमाणे गृहीत धरली होती. रीतसर पाणी वगैरे दिल्यानंतर तिने विचारले,”लवकर उरकला का उद्योग? कुणी सोबतीला नेलं होतं का?” यावर झाल्या प्रकाराची अगदी साग्रसंगीत पुनरावृत्ती झाली. याही वेळी गोविंदभटांचा आवेश तोच होता.
(दुसऱ्या दिवशी लग्नाचे रिसेप्शन ठेऊ. आपल्याला उसना उत्साह दाखवावाच लागेल.”) – इथून पुढे
मी गप्प राहिले, मला चहा करण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती, अरुण ने सकाळी चहा केला, आपल्यासाठी आणि माझ्यासाठी नाश्ता बनवला. मग अरुणने धावपळ करून एक छोटा हॉल ठरवला. 50 माणसांसाठी लग्नाची तयारी केली, जुहू मधील एका मोठ्या हॉटेलात रिसेप्शन ठेवले. शंभर पत्रिका छापल्या. जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पत्रिका आणि काहींना फोन करून आमंत्रण दिले. सर्वांनाच धक्का बसला, माझी आई, बहिणी, अरुणची बहीण, भाचा, भाची सर्वजण आश्चर्यचकित झाले. कोणाला काही अंदाजच नव्हता. अरुण गावी जाऊन देवांना आणि घरच्या माणसांना आमंत्रण देऊन आला.
लग्नाच्या आधी दोन दिवस अमिता आणि जॉन आले. जॉन मला भेटायला आला. मला तो मुळीच आवडला नाही. वाढवलेले केस, दाढी, ढगळ कपडे, तोंडात सतत इंग्लिश मध्ये शिव्या, भारताला कमी लेखणे. पण मी असाहाय्य होते, माझ्या मुलीने त्याच्याशी लग्न केले होते, अरुण ला पण तो आवडला नव्हता हे कळत होते, पण अरुण तोंड मिटून गप्प होता.
यावेळी माझी मुलगी मला अनोळखी वाटली, तिचे प्रेम आटून गेले की काय अशी मला शंका आली. ती तिच्या बाबांना स्पष्टपणे म्हणाली, “अमिता – बाबा, आता मी फारशी भारतात येणार नाही, तुम्हा दोघांना वाटल्यास तुम्ही अमेरिकेत या. जॉन हा अमेरिकेतील मोठा पॉप सिंगर आहे. त्याच्या गाण्याचे त्याला खूप पैसे मिळतात. मी पण नोकरी सोडणार नाही. मला अमेरिकेत डॉलर्स मध्ये पैसे मिळतात. त्यामुळे यापुढे माझ्यासाठी पैसे जमवू नका. आता दोघांनी आराम करा. व्यवसाय कोणाकडे तरी सोपवून मोकळे व्हा.”
तिचे हे बोलणे ऐकून तिचा बाबा गप्पच झाला. आमच्या समाधानासाठी अमिता आणि जॉन यांचे आमच्या पद्धतीने छोटेसे लग्न लावले. दुसऱ्या दिवशी जुहू मधील मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवले. माझ्या माहेरील सर्वजण हजर होते, अरुण च्या घरची मंडळी पण उपस्थित होती. सर्वजण अभिनंदन करत होते, कौतुक करत होते, पण मला कळत होतं काही काही लोकांच्या डोळ्यात कुचेष्टा होती, काहींच्या सहानभूती. प्रत्येकाच्या डोळ्यात मी वाचत होते, एकुलती एक मुलगी आई-वडिलांना न जुमानता निघाली असल्या धेंडा बरोबर लग्न करून.
दोन दिवस मुंबईत राहून अमिता आणि जॉन अमेरिकेला निघाले. मला वाटले होते जाताना तरी अमिता माझ्या गळ्यात पडेल, मला मिठी मारून रडेल, बाबाला सावरेल… पण तसे काहीच झाले नाही. ती अतिशय आनंदात तिच्या जॉन बरोबर अमेरिकेला गेली.
गाडीतून परत येताना अरुण गप्प गप्प होता. तो तसा मनस्वी, मनातील खळखळणारा समुद्र जाणवू न देणारा. मी मात्र सुन्न झाले होते. कशासाठी आणि कोणासाठी ही सर्व धडपड.?
घराचे दार उघडून आम्ही दोघे घरात आलो आणि अरुण ओक्साबोक्सी रडू लागला. “आपली लेक आपल्याला परकी झाली गं, मुंबईत आली चार दिवस पण परक्यासारखी वावरली. जन्म दिला आपण, लहानाचे मोठे केले आपण, शिक्षण दिले संस्कार दिले आपण आणि त्या जॉन पुढे आपण तिला परके झालो”.
मग मी पुढे झाले, त्याला जवळ घेत मी म्हणाले, “खूप धडपडलास तू आमच्यासाठी, मुंबईत आलास तेव्हा तुझ्याकडे काहीही नव्हतं. आपलं लग्न झालं तेव्हा तू मामाकडे राहत होतास. मग छोटासा व्यवसाय सुरू करून यश मिळवलंस. मग अमिताचा जन्म झाल्यानंतर तू आणखी धडपडलास, स्वतःची जागा घेतलीस, ऑफिस साठी जागा घेतलीस, मग पुण्याला एक फ्लॅट घेतलास, घर, गाडी, फर्निचर, सर्व झालं, पण हे कुणासाठी? माझ्यासाठी आणि त्यापेक्षा लाडक्या लेकीसाठी, किती धडपड करशील रे…? कुणाला त्याची काही किंमत तरी आहे का? ती आपली लेक सांगून गेली, ‘आता सर्व कमी करा’ मग करा ना कमी सर्व, आपणा दोघांसाठी कितीसं काही लागणार आहें?
तुमच्या गावात तुमच्या चुलत भावाबरोबर कोर्टात केस? दहा गुंठे जमिनीसाठी? दहा वर्षे झाली त्या केसला, अजून काही निकाल लागत नाही, कशाला हवी गावची जमीन? तुमचा चुलत भाऊ झाला तरी तो तुम्हा मांजरेकर कुटुंबापैकीच आहे ना? म्हणजे तुझे आणि त्याचे आजोबा एकच. मग मिळू दे त्या मांजरेकर कुटुंबातील माणसाला. दुसऱ्यांनी जमीन खाण्याऐवजी तुझ्या कुटुंबातील एकाला मिळाली तर का नको? घेऊन टाक ती केस मागे, सर्व मांजरेकर कुटुंब एक होऊ दे.
तुझ्या मित्राचा मुलगा तुझ्याबरोबर व्यवसायात आहे, गेली कित्येक वर्षे इमाने इतबारे काम करतोय, हळूहळू त्याच्या हातात सर्व धंदा दे. पुण्यात तुझ्या बहिणीचा मुलगा अश्विन आहें, त्याला जागा नाही आहें, त्याला म्हणावं आपल्या फ्लॅटमध्ये राहा, हळूहळू सर्व काही कमी करायला हवं रे, जिच्यासाठी राखून ठेवलं होतं तिला त्याची गरज नाही, मग ज्यांना गरज आहे त्यांना का देऊ नये?
सांभाळ स्वतःला, आम्ही बायका रडत असलो तरी आतून खंबीर असतो, लहानपणापासून अनेक त्याग करायची सवय असते बायकांना.
आपल्या आई-वडिलांना, भावा बहिणींना सोडून आम्ही नवऱ्याच्या घरी जातो, आमचं नाव सुद्धा विसरतो आम्ही, पण तुम्ही पुरुष बाहेरून कणखर दाखवता पण मनातून मेणा सारखे मऊ असता. आपली लेक आपल्याला टाटा करून गेली, तिच्या मनातही आलं नाही की आपल्या आई-वडिलांच्या मनाची काय अवस्था झाली असेल.
नटसम्राट नाटकात गणपतराव बेलवलकर बोलून गेलेत, “आपण उगाच समजतो, आपण आई झालो, बाप झालो, खरं तर आपण कुणीच नसतो. अंतराळात फिरणारा एखादा आत्मा वासनेच्या जिन्याने खाली उतरतो, आणि आम्ही समजतो आई झालो, बाबा झालो’.
अरुण, आपली पोर आपल्यासाठी तीस वर्षांपर्यतच होती असं म्हणायचं, आणि गप्प राहायचं. त्या पेक्षा तूझ्या ऑफिस मधील शरद सतत तुझी काळजी करतो, तुला किंवा मला बरं नसतं तर त्याचा जीव कासावीस होतो, तो जवळचा नाही का?
“अरुण, पुरे झालं हे शहर, इथे धड श्वास घायला मिळत नाही, पुरे झाले पैशासाठी धावणे…. आता इथला पसारा कमी करून तूझ्या गावी जावू, जुने घर आहें, ते नवीन बांधू, तुम्ही मांजरेकर एक व्हा, पुन्हा पूर्वी सारखे सण साजरे करूया.”
माझे बोलणे अरुणला पटले असावे बहुतेक, डोळे पुसत तो मान हलवत होता, मी त्याला थोपटता थोपटता सलील कुलकर्णी म्हणतो ते गाणे गुणगुणु लागले.
नवरा ऑफिसमध्ये गेला आणि माझी आवराआवर सुरू झाली. आज अंथरुणं पांघरूणं धुवायला काढायची असं मी म्हणत होते, एवढ्यात मोबाईल वाजला म्हणून मी फोन घेतला, कन्येचं नाव दिसलं म्हणून मी खुश झाले. गेल्या महिन्याभरात किमान दहा स्थळांचे फोटो मी पाठवले होते. तिचे एवढे फोन आले पण कुठल्या स्थळाबद्दल तिने होकार कळवला नव्हता. पण माझा अंदाज होता एक दोन दिवसात ती निश्चित कळवेलच, कदाचित त्यासाठीच तिचा अचानक फोन असेल ह्या उत्सुकतेने मी फोन उचलला.
“मग काय, आज सकाळी सकाळीच फोन, म्हणजे भारतात सकाळ गं, नाहीतर तुझा रात्रीचा फोन ठरलेला. हाच फक्त सकाळी आला. आईशीच काही बोलायचे का? कुठला फोटो आणि कुठलं स्थळ तुला पसंत सांग लवकर?”
“अगं आई, त्या करताच मी फोन केला. तू मला एवढ्या स्थळांचे फोटो पाठवू नकोस, माझ्या लग्नाची तयारी पण करू नकोस, आम्ही लग्न ठरवलंय. ‘
लग्न ठरवलं हे ऐकून माझा श्वासच अडकला. “अगं आम्ही म्हणजे कोणी?”
“मी आणि जॉन ने. “
मी घाबरून किंचाळले, “अगं कोण हा जॉन?”
“अग आई, मागे मी तुला फोटो पाठवलेला ना जॉनचा. “
“अगं असे तुझ्या मित्र-मैत्रिणींचे फोटो तू नेहमीच पाठवतेस, माझ्या कसं लक्षात राहील जॉन कोण आणि कोणता ते. “
“अगं जॉन, जॉन विली त्याचं नाव, पॉप गायक आहे तो. “
” केवढा धक्का दिलास तू अमिता, मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती, तुझ्या बाबाला आता केवढा धक्का बसेल माहिती आहे? आणि काकांना मावशी ना काय सांगू गं मी?”
मी रडू लागले. फोन बंद करून खुर्चीत बसले. केवढ्या अपेक्षा या मुलीकडून ठेवल्या होत्या आम्ही? तिच्या लग्नाच्या तयारीसाठी काय काय जमवत होते मी. तिचा बाबा तर तिच्या बाबतीत खूपच सेन्सेटीव्ह, एकुलती एक मुलगी, त्यात पहिल्यापासून हुशार. तिच्या बाबाला गर्व होता की आपल्यासारखी हुशार म्हणून.
नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेली पण आज ना उद्या भारतात परत येईल ही आशा आम्हाला होतीच. तिची आता तिशी जवळ आली तशी आम्हाला आता जास्त काळजी वाटायला लागली. कुठून कुठून तिच्यासाठी स्थळं येत होती, त्यातील चांगल्यात चांगलं स्थळ तिच्यासाठी आम्ही निवडणार होतो पण….
मला माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याची, अरुणची जास्त काळजी वाटायला लागली. मी निदान रडून तरी दाखवीन, तो बाहेरून दाखवायचा नाही पण आतल्या आत कोसळून जाईल. एकुलत्या एक मुलीसाठी आयुष्यभर झटतोय, अजून उमेदीने व्यवसाय वाढवतोय, या वयात आठवड्यातून एकदा तरी दुसऱ्या शहरात व्यवसायासाठी धावतोय, कुणासाठी हे सर्व?
मी दिवसभर कॉटवर झोपून राहिले. काही करायची इच्छाच मला होईना, एवढी एवढी छोटी अमिता, शाळेत जाणारी अमिता, टेनिस खेळायला जाणारी अमिता, इंजिनीरिंग ला जाणारी अमिता आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी अमेरिकेत जाणारी अमिता मला आठवत राहिली. अमेरिकेत जायला माझा विरोध होताच पण तिच्या बाबाचा तिला पाठिंबा होता.
सायंकाळी अरुणला कसं सांगायचं याचा मी विचार करत होती, कदाचित तिने बाबाला फोन केला पण असेल, मी तिचा फोन कट केला तसा बाबा फोन कट करणार नाही, तो शांतपणे तिचं म्हणणे ऐकून घेईल, आतून कोसळेल पण बाहेर दाखवणार नाही. मला माझ्या नवऱ्याची अरुणची पद्धत माहिती होती. तॊ जेव्हा जास्त टेन्शनमध्ये असेल तेव्हा जास्त हसेल, गडबड करेल. आपलं टेन्शन दुसऱ्याला दाखवणार नाही. आतल्या आत आपणच ते सहन करील.
आज रोजच्या पेक्षा लवकर अरुण घरी आला. येताना माझ्या आवडीचे गुलाब जामुन घेऊन आला. तेव्हाच मी ओळखले याला सर्व कळले आहे. माझा तणाव घालवण्यासाठी याने मुद्दाम गुलाबजामून आणलेत. हाच तो माझी जास्त चेष्टा करेल, गमती जमती सांगेल. मनातल्या मनात रडत असेल पण बाहेर दाखवायचा नाही.
माझ्या हातात गुलाबजाम देऊन तो म्हणाला, “चल आज कुठेतरी फिरून येऊ”.
“आज एवढा खुशीत का, लाडक्या लेकीचा फोन आलेला दिसतो. “
“हो ना, तिनं लग्न ठरवलंय म्हणे, जॉन बरोबर. “
“मग झापलं नाहीस तिला, का खूप आनंद झाला जॉन बरोबर लग्न ठरवले म्हणून, एवढे गुलाबजामून आणलेस म्हणून विचारले. “
“विरोध करून काही उपयोग नसतो गं, उगाच आपल्या मुलीच्या मनातून आपण उतरतो, ती आता तिशीची झाली, तिचे बरे वाईट तिला कळते. “
“म्हणून काही उघड्या डोळ्यांनी आपण लग्न लावून द्यायचं? मी आई आहे तिची, कोण कुठला तो जॉन, ना ओळखीचा ना पाळखीचा, आपल्या मुलीच्या शरीराचा मनाचा तो मालक होणार, आपण उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं?”
” मग काय करू शकतो आपण? तिने लग्न करू का हे विचारलेले नाही, तिने याआधीच त्याच्याशी लग्न केले आहे ना”
“काय म्हणतोस?” मी किंचाळत विचारले.
“होय, तिने त्याच्याशी रजिस्टर लग्न केले आहे, दोन महिन्यापूर्वी. “
“आणि ती आता आम्हाला सांगते? आपली मुलगी एवढी परकी होते?”
“हे असंच असतं, तिला तिचा साथीदार मिळाला की तिचे आई-वडील पण परके होतात, तेव्हा तिला कसलाही विरोध न करता त्यांना आशीर्वाद देणे हेच योग्य”.
“पण अरुण, मी दुखावले गेले आहे रे, माझ्या मुलीकडून मलाही अपेक्षा नव्हती. मी तिला माफ करू शकणार नाही”.
“काय करू शकतो आपण? आपण तिला मोठ्या मनाने माफ करायला हवे, आपल्याला आपल्या मुलीला गमवायचे नसेल तर आपण तिला माफ करायलाच हवे”.
“पण तिने या आधीच लग्न करून ती मोकळी झाली, आणि ही गधडी आत्ता सांगते लग्न केले म्हणून? आपले संस्कार कुठे कमी पडले का? आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना काय सांगायचे? तिने दोन महिन्यापूर्वी लग्न केले म्हणून? माझी आई काय म्हणेल? माझ्या बहिणी, भाऊजी, तुझे गावचे भाऊ, काय उत्तर द्यायचे त्यांना?”
“उत्तर हे द्यावेच लागेल, लग्न याआधी झाले हे कळवायचे नाही कुणाला, मी अमित शी बोलतो, तिला म्हणतो तुम्ही दोघेही भारतात या, आपण त्यांचे परत इथे लग्न लावूया, एखादे रिसेप्शन ठेवूया, त्याला सर्वांना बोलऊया, आणि एक लक्षात ठेव, people’s memory is always short, कोणाला फारसे आठवणार पण नाही काही दिवसांनी. “
मी जेवण न करता उशीत डोकं खुपसून रडू लागले, अरुण येरझाऱ्या घालत होता. त्याच्या मनात केवढा कल्लोळ माजला असेल याची मला कल्पना होती. काही वेळानंतर अरुण फोनवर बोलल्याचे मला ऐकू येत होते.. निश्चितच तो अमिताशी बोलत असणार.
सकाळी अरुण मला म्हणाला, पुढील महिन्यात अमिता आणि जॉन भारतात येत आहेत. आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमंडळी साठी परत एकदा त्यांचे लग्न करू. दुसऱ्या दिवशी लग्नाचे रिसेप्शन ठेऊ. आपल्याला उसना उत्साह दाखवावाच लागेल. “
“कदम,जरा केबिनमध्ये या”साहेबांचा फोन.सकाळीच बोलावणं म्हणजे महत्वाचं काम असणार म्हणून कदम लगबगीनं केबिनमध्ये गेले. समोर बसलेल्या तिशीतल्या तरुणीशी साहेब बोलत होते.
“हियर ही इज,अवर बेस्ट अँड मोस्ट एक्सपिरीयन्स स्टाफ.ज्यांच्याविषयी सांगत होतो तेच आमचे कदम,गेली २० वर्षे एक्सलंट काम करत आहेत.”साहेबांनी अचानक केलेल्या कौतुकानं कदम संकोचले.
“तुमचा पाठिंबा आणि मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झालं.यू आर ग्रेट लीडर.” कदमांकडून स्तुती ऐकून साहेब सुखावले.
“कदम सर,फक्त सारिका म्हणा.तुमच्यापेक्षा ज्ञानानं,अनुभवानं,वयानं खूप लहान आहे”
“ओके”कदमांनी मान डोलावली.कदमांच्या मार्गदर्शनाखाली सारिकाचं ट्रेनिंग सुरू झालं.कामातले छोटे छोटे बारकावे समजून घेत वर्षभरात सारिका तयार झाली.सोबत वेळोवेळी साहेबांचं मार्गदर्शन होतचं.
—
प्रोजेक्टविषयी चर्चा सुरू असताना अचानक साहेब म्हणाले “दोन महिन्यांनी देशपांडे रिटायर होतायेत.चांगला माणूस कमी होतोय.एक बरयं की तुम्ही अजून दहा-पंधरा वर्ष आहात म्हणून काळजी नाही.”
“मीपण तीन वर्षानी रिटायर होतोय.”
“काय सांगता.तुमच्याकडे बघून वाटत नाही.चांगलं मेंटेन केलेय.अजूनही कामाचा झपाटा जबरदस्त आहे.सारिकाविषयी काय वाटतं”साहेब
“हुशार,मेहनती आणि प्रामाणिक आहे.”
“आता तिला मोठ्या जबाबदाऱ्या द्याव्यात का?”
“नक्कीच”
“कदम,इतकी वर्षे कंपनीच्या अनेक जबाबदाऱ्या उत्तमरीतीने पार पाडत आहात.हॅट्स ऑफ टू यूवर डेडीकेशन.”कदमांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली कारण साहेबांकडून कौतुक म्हणजे काहीतरी वेगळं घडणार याची पूर्वसूचना.
“तुमच्यावर कामाचा खूप लोड आहे.जर हरकत नसेल तर त्यातला थोडा भार कमी करुयात”.
“नो प्रॉब्लेम”कदमांना नाईलजानं परवानगी द्यावीच लागली.पर्याय नव्हता.निर्णय झाला होता फक्त तोंडदेखलं विचारण्याचं नाटक साहेब करत होते.काही दिवसातच कंपनीच्या महत्वाच्या विभागाची जबाबदारी कदमांच्या ऐवजी सारिकाकडं देण्यात आली.अनेकांना हा बदल आवडला नाही.तीव्र पडसाद उमटले.कदमांनासुद्धा हा धक्का होता.त्यानंतर साहेब कदमांशी चर्चेचे नाटक करून एकेक जबाबदाऱ्या देत सारिकाचं कंपनीतलं महत्व वाढवत होते.’खुर्चीपुढं गरजवंत हतबल असतो’ या न्यायानं कदम शांत होते.
—
दरवर्षीप्रमाणं कंपनीमध्ये अॅन्युअल डेला प्रमोशन जाहीर होणार होती.प्रचंड उत्सुकता होती.एकेक प्रमोशन जाहीर होऊ लागली तसा जल्लोष वाढत होता.अभिनंदनाचा वर्षाव,हसणं,गप्पांचा गदारोळ सुरू होता.सिनॅरिटीप्रमाणं कदम सर ‘मॅनेजर’ होणार याविषयी सर्वांना खात्री होती.आपल्या माणसाचं यश साजरं करण्यासाठी म्हणून खास तयारी केली होती.काही वेळानं साहेबांनी “मॅनेजर”चं प्रमोशन जाहीर केल्यावर एकदम शांतता पसरली.सारिकाची मॅनेजर म्हणून झालेली निवड धक्कादायक होती.उघडपणं बोललं नाही परंतु सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी होती. पार्टीचा मूड बदलला.साहेबांनी टाळ्या वाजवून सारिकाचं अभिनंदन केलं तेव्हा कोणीच प्रतिसाद दिला नाही.पुढे येऊन कदमांनी अभिनंदन केलं तेव्हा सारिकानं नजरेला नजर देणं टाळलं.
“कदमसर,तुम्हांला राग आला नाही”एकानं विचारल्यावर कदमांनी नकारार्थी मान डोलावली.
“आला तरी ते नेहमीप्रमाणे दाखवणार नाहीत”
“कदम सर,आज तरी बोला की तुम्हांला सहन करण्याची सवय झालीय.”
“जे व्हायचं ते होऊन गेलंय.आता यावर बोलून काय उपयोग?”जेवणाची प्लेट घेऊन कदम कोपऱ्यात जाऊन बसले.
“कदम,लेका आज तरी मनात ठेवू नकोस.मन मोकळ कर.”देशपांडे शेजारी बसत म्हणाले.
“जाऊ दे”
“का’?”
“तू रिटायर होतोयेस.मला अजून कंपनीत तीन वर्षे काढायचीयेत”
“साहेबांनी चुकीची निवड केलीय.मी त्यांच्याशी बोलतो”
“कालची पोरगी मॅनेजर आणि तू इतकी वर्ष कंपनीत काय xx xxxx..प्रामाणिकपणे काम करून काय मिळालं”
“जाऊ दे ना.उगीच नको त्या विषयावर चर्चा नको.”
“मॅनेजर कोण होणार याची माहिती होती”देशपांडेनी विचारल्यावर कदम फक्त सूचक हसले.
“बोल ना.साहेबांनी सांगितलं होतं”
“नाही पण काल संध्याकाळी बोलावलं तेव्हा अंदाज आला.”
“कशावरून”
“साहेबांची गोड बोलण्याची स्टाईल!!काल एकदम माझ्या कामाचा,प्रामाणिकपणाचा,मेहनतीचा,
कंपनीसाठी दिलेल्या योगदानाचा पाढा पुन्हा एकदा वाचायला सुरवात केली.कंपनीसाठी मी किती महत्वाचा आहे हे पटवून सांगायला सुरवात झाली.त्याचवेळी वारंवार माझ्या वाढत्या वयाचा आणि जबाबदाऱ्याचा उल्लेख करत होते.”
“मग!!”
“आपण मॅनेजर होणार नाही हे लगेच लक्षात आलं”
“कसं काय?”
“साहेब विनाकारण कधीच गोड बोलत नाही.सगळी साखर पेरणी सारिकासाठी होती. साहेबांच्या खास मर्जीतली असल्यानं तिला जॉइन मोठी पोस्ट आणि स्पेशल फेव्हर मिळणार याचा अंदाज होता परंतु माझ्याकरवी ट्रेनिंग देऊन मॅनेजर करून माझाच पत्ता कापला जाईल.असं वाटलं नव्हतं.”
“याविरुद्ध आवाज उठवायला हवा.गप्प बसू नकोस.कानामागून आली अन ….”
“आतापर्यंत कधीच कोणासमोर हात पसरले नाहीत.पद मिळवण्यासाठी तर नाहीच नाही.चमचेगिरी जमत नाही.साहेबांना,त्यांच्या हुकुमावर नाचणारा,हो ला हो करणारा,स्वतःचं डोकं न चालवणारा मॅनेजर हवा होता.तिथंच माझी अडचण झाली.”
“तुला डावललं याचं सगळ्यांना खूप वाईट वाटतंय.”
“माझ्यापेक्षा जास्त तुम्ही दु:खी झालात.अरे,इतका आपलेपणा रक्ताच्या नात्यातले पण दाखवत नाहीत.हीच तर माझी खरी कमाई.”
“हा आदर आपल्या प्रेमळ वागण्यानं तू मिळवला आहेस तरीपण चांगल्या लोकांची कदर होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं”
“ जेव्हा जेव्हा वशिला आणि प्रामाणिकपणा एका पारड्यात मोजला जातो तेव्हा नेहमीच वशिल्याचं पारडं जड ठरतं. हाच इतिहास आहे,हेच वर्तमान आणि हेच भविष्य आहे.तसंही नोकरी म्हणजे मनाविरुद्ध केलेली तडजोड.आतापर्यंत इतक्या केल्यात त्यात अजून एक तडजोड.वाईट एवढंच वाटतं की साहेबांनी असला खेळ खेळण्यापेक्षा स्पष्ट सांगितलं असतं तर एवढा त्रास झाला नसता.राजकारण करून बाजूला सारलं हे मनाला खूप लागलं रे….” डोळे पुसण्यासाठी कदमांनी मान फिरवली.
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
संजय दृष्टि – कथा – वेष की मर्यादा
(‘वह लिखता रहा’ संग्रह से।)
(दैनिक चेतना में 24 जनवरी 2024 को प्रकाशित।)
ठाकुर जी का मंदिर कस्बे के लोगों के लिए आस्था का विशेष केंद्र था। अलौकिक अनुभूति कराने वाला मंदिर का गर्भगृह, उत्तुंग शिखर, शिखर के नीचे उसके अनुज-से खड़े उरूश्रृंग। शिखर पर विराजमान कलश। मंदिर की भव्य प्राचीनता, पंच धातु का विग्रह और बूढ़े पुरोहित जी का प्रवचन..। मंदिर की वास्तु से लेकर विग्रह तक, पुरोहित जी की सेवा से लेकर उनके प्रवचन तक, सबमें गहन आकर्षण था। जिस किसी की भी दृष्टि मंदिर पर जाती, वह टकटकी बांधे देखता ही रह जाता।
मंदिर पर दृष्टि तो उसकी भी थी। सच तो यह है कि मंदिर के बजाय उसकी दृष्टि ठाकुर जी की मूर्ति पर थी। अब तक के अनुभव से उसे पता था कि पंच धातु की मूर्ति कई लाख तो दिला ही देती है। तिस पर सैकड़ों साल पुरानी मूर्ति याने एंटीक पीस। प्रॉपर्टी का डेप्रिसिएशन होता है, पर मूर्ति ज्यों-ज्यों पुरानी होती है, उसका एप्रिसिएशन होता है। मामला करोड़ों की जद में पहुँच रहा था।
उसने नियमित रूप से मंदिर जाना शुरू कर दिया। बूढ़े पुरोहित जी बड़े जतन से भगवान का शृंगार करते। आरती करते हुए उनकी आँखें मुँद जाती और कई बार तो आँखों से आँसू छलक पड़ते, मानो ठाकुर जी को साक्षात सामने देख लिया हो। मूर्ति की तरह ही पुरोहित जी भी एंटीक वैल्यू रखते थे।
आरती के बाद पुरोहित जी प्रवचन किया करते। प्रवचन के लिए बड़ी संख्या में लोग जुटते। उनका बोलना तो इतना प्रभावी ना था पर जो कुछ कंठ में आता, वह हृदय तल से फूटता। सुनने वाला मंत्रमुग्ध रह जाता। अनेक बार स्वयं पुरोहित जी को भी आश्चर्य होता कि वे क्या बोल गए। दिनभर पूजा अर्चना, ठाकुर जी की सेवा और रात में वही एक कमरे में पड़े रहते पुरोहित जी।
इन दिनों वेष की मर्यादा पर उनका प्रवचन चल रहा था।
“…श्रीमद्भागवत गीता का दूसरे अध्याय का 62वाँ और 63वाँ श्लोक कहता है,
अर्थात विषयों का चिन्तन करनेवाले मनुष्य की उन विषयों में आसक्ति पैदा हो जाती है। आसक्ति से कामना उत्पन्न होती है। कामना का अर्थ है, वांछा, प्राप्त करने की इच्छा। अतः आसक्ति से विषयभोग की इच्छा प्रबल हो जाती है। प्रबलता भी ऐसी कि विषयभोग में थोड़ा-सा भी विघ्न भी मनुष्य सहन नहीं कर पाता। यह असहिष्णुता क्रोध की जननी है।
क्रोध आने पर मनुष्य का विवेक नष्ट हो जाता है। उसमें सम्मोह (मूढ़भाव) उत्पन्न हो जाता है। सम्मोह से स्मृति में भ्रम हो जाता है। स्मृति में भ्रम हो जाने पर बुद्धि का नाश हो जाता है। बुद्धि का नाश होनेपर मनुष्य कार्य-अकार्य में भेद नहीं कर पाता, सही-गलत का भान नहीं रख पाता। ऐसा मनुष्य अपनी स्थिति से गिर जाता है, उसकी आंतरिक मनुष्यता का पतन हो जाता है।
पूरी प्रक्रिया पर विचार करेंगे तो पाएँगे कि मनुष्यता कहीं बाहर से नहीं लानी पड़ती। सच्चाई, सद्विचार मूल घटक हैं जो हर मनुष्य में अंतर्भूत हैं। ये हैं तभी तो दोपाया, जानवर न कहलाकर मनुष्य कहलाया।
ध्यान रखना, हर मनुष्य मूलरूप से सच्चा होता है। दुनियावी लोभ, लालच कुछ समय के लिए उसे उसी तरह ढके होते हैं जैसे जेर से भ्रूण। देर सबेर जेर को हटना पड़ता है, भ्रूण का जन्म होता है।
ढकने की बात आई तो वेष की भूमिका याद आई। आदमी की सच्चाई पर उसके वेष का बहुत असर पड़ता है। वह जिस वेष में होता है, उसके भीतर वैसा ही बोध जगने लगता है। सेल्समैन हो तो सामान बेचने के गुर उमगने लगते हैं। शिक्षक हो तो विद्यार्थी को विषय समझाने की बेचैनी घेर लेती है। चौकीदार का वेश हो तो प्राण देकर भी संपत्ति, वस्तु या व्यक्ति की रक्षा करने के लिए मन फ़ौलाद हो जाता है…।”
…वह पुरोहित जी के वचन सुनता, मुस्करा देता।
आरती और प्रवचन के लिए रोज़ाना आते-आते पुरोहित जी से उसका संबंध अब घनिष्ठ हो चुका था। मंदिर के ताला-चाबी की जगह भी उसे ज्ञात हो चुकी थी। एक तरह से मंदिर का मैनेजमेंट ही देखने लगा था वह।
प्रवचन की यह शृंखला तीन दिन बाद संपन्न होने वाली थी। हर शृंखला के बाद चार-पाँच दिन विराम काल होता। तत्पश्चात पुरोहित जी फिर किसी नये विषय पर प्रवचन आरंभ करते। आज रात उसने अपने सभी साथियों को बता दिया था कि विराम काल में ठाकुर जी का विग्रह कैसे अपने कब्ज़े में लेना है। कौन सा दरवाजा कैसे खुलेगा, किस-किस दरवाज़े का ताला टूट सकता है, किसकी डुप्लीकेट चाबी वह बना चुका है। आज से तीसरी रात योजना को सिद्ध करने के लिए तय हुई।
तीसरे दिन प्रवचन संपन्न हुआ। इस बार पुरोहित जी का स्वास्थ्य निरंतर बिगड़ता गया था। आज तो उन्हें बहुत अधिक थकान थी, ज्वर भी तीव्र था। उनका एक डॉक्टर शिष्य आज गाड़ी लेकर आया था। उसने ज़ोर दिया कि इस बार दवा से काम नहीं चलेगा। कुछ दिन दवाखाने में एडमिट रहना ही होगा।
पुरोहित जी, अपने ठाकुर जी को छोड़कर नहीं जाना चाहते थे। डॉक्टर शिष्य, स्थिति की नज़ाकत समझ रहा था, सो पुरोहित जी को साथ लिए बिना जाना नहीं चाहता था। अंतत: जीत डॉक्टर की हुई।
गाड़ी में बैठने से पहले पुरोहित जी ने उसे बुलाया। धोती से बंधी चाबियाँ खोलीं और उसके हाथ में देते हुए बोले,…”ठाकुर जी की चौकीदारी की ज़िम्मेदारी अब तुम्हारी। भगवान ने खुद तुम्हें अपना रक्षक नियुक्त किया है। आगे मंदिर की रक्षा तुम्हारा धर्म है।”
उसके बाँछें खिल गईं। उसने सुना रखा था कि ऊपर वाला जब देता है तो छप्पर फाड़कर देता है। सुने हुए को आज फलित होता देख भी रहा था। जीवन में पहली बार उसने मन ही मन सच्चे भाव से भगवान को माथा नवाया।
…रात का तीसरा पहर चढ़ चुका था। वह मंदिर के भीतर प्रवेश कर चुका था। अपनी टोली के आने से पहले सारे दरवाज़े खोलने थे। …अब केवल गर्भगृह का द्वार बाकी था। उसने चाबी निकाली और ताले में लगा ही रहा था कि गाड़ी में बैठते पुरोहित जी का चित्र बरबस सामने घूमने लगा,
“ठाकुर जी की चौकीदारी की ज़िम्मेदारी अब तुम्हारी। भगवान ने खुद तुम्हें अपना रक्षक नियुक्त किया है। आगे मंदिर की रक्षा तुम्हारा धर्म है।”
जड़वत खड़ा रह गया वह। भीतर नाना प्रकार के विचारों का झंझावात उठने लगा। ठाकुर जी के जिस विग्रह पर उसकी दृष्टि थी, उसी को टकटकी लगाए देख रहा था। उसे लगा केवल वही नहीं बल्कि ठाकुर जी भी उसे देख रहे हैं। मानो पूछ रहे हों,….मेरी रक्षा का भार उठा पाओगे न?…
विचारों की असीम शृंखला चल निकली। शृंखला के आदि से इति तक प्रवचन करते पुरोहित जी थे,
“….सम्मोह से स्मृति में भ्रम हो जाता है। स्मृति में भ्रम हो जाने पर बुद्धि का नाश हो जाता है। बुद्धि का नाश होनेपर मनुष्य कार्य-अकार्य में भेद नहीं कर पाता, सही-गलत का भान नहीं रख पाता..।”
उसकी स्मृति पर से भ्रम का कुहासा छँटने लगा था।
“…ध्यान रखना, हर मनुष्य मूलरूप से सच्चा होता है। दुनियावी लोभ, लालच कुछ समय के लिए उसे उसी तरह ढके होते हैं जैसे जेर से भ्रूण। देर सबेर जेर को हटना पड़ता है, भ्रूण का जन्म होता है ।”
उसके अब तक के व्यक्तित्व पर निरंतर प्रहार होने लगे। भ्रूण जन्म लेने को मचलने लगा। जेर में दरार पड़ने लगी।
तभी दरवाज़ा खुलने की आवाज़ ने उसकी तंद्रा को भंग कर दिया। लाठियाँ लिए उसकी टोली अंदर आ चुकी थी।
“….आदमी की सच्चाई पर उसके वेष का बहुत असर पड़ता है। वह जिस वेष में होता है, उसके भीतर वैसा ही बोध जगने लगता है।”
ठाकुर जी के चौकीदार में बिजली प्रवाहित होने लगी। चौकीदार ने टोली को ललकारा। आश्चर्यचकित टोली पहले तो इसे मज़ाक समझी। सच्चाई जानकर टोली, चौकीदार पर टूट पड़ी।
चौकीदार में आज जाने किस शक्ति का संचार हो गया था। वह गोरा-बादल-सा लड़ा। उसकी एक लाठी, टोली की सारी लाठियों पर भारी पड़ रही थी। लाठियों की तड़तड़ाहट में खुद को कितनी लाठियाँ लगीं, कितनी हड्डियाँ चटकीं, पता नहीं पर लहुलुहान टोली के पास भागने के सिवा और कोई विकल्प नहीं बचा।
शत्रु के भाग खड़े होने के बाद उसने खुद को भी ऊपर से नीचे तक रक्त में सना पाया। किसी तरह शरीर को ठेलता हुआ गर्भगृह के द्वार तक ले आया। संतोष के भाव से ठाकुर जी को निहारा। ठाकुर जी की मुद्रा भी जैसे स्वीकृति प्रदान कर रही थी। उसके नेत्रों से खारे पानी की धारा बह निकली। हाथ जोड़कर रुंधे गले से बोला,
“…ठाकुर जी आप साक्षी हैं। मैंने वेष की मर्यादा रख ली।”
कुछ दिनों बाद मंदिर के परिसर में पुरोहित जी की समाधि के समीप उसकी भी समाधि बनाई गई।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
“ हो, मला पण आधाराची गरज लागते. मी एकटीच आहे ना. घरात आपण प्रवाशासारखं राहतोय ”
“ पुन्हा तीच रेकॉर्ड नको. अजून काही वर्ष तुला एडजेस्ट करावं लागेल. नो चॉइस !!”
“ आतापर्यंत तेच तर करतेय. आम्हांला नाही निदान स्वतःला तरी वेळ देशील की नाही ? ”
“ काय ते नीट सांग.”
“ आताशा फार चिडचिडा झालायेस. सतत अस्वस्थ, बेचैन, तणावाखाली असतोस. वेळेवर जेवत नाही की झोपत नाहीस. डोळ्याखाली काळी वर्तुळ झालीत. थोड चाललं की धाप लागतीय. तब्येत ठीक नाहीये. कामांच्या नादात दुखणं अंगावर काढू नकोस. मागे ब्लडप्रेशर वाढलं तेव्हाच डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलं.. पण तू साफ दुर्लक्ष केलंस.”
“ आय एम फाइन ”
“ नो,यू आर नॉट. तुला त्रास होतोय पण कामाच्या नादात…..ऐक,डॉक्टरांकडे जाऊ या. सगळया तपासण्या करू.”
“ ओके, नक्की जाऊ. फक्त थोडे दिवस जाऊ दे. आत्ता खूपच बिझी आहे.”
“ कामं कधीच संपणार नाहीत. अजून वेळ गेलेली नाही. शरीरानं इंडिकेअटर्स दिलेत. कामाच्या बाबतीत जेवढा जागरूक आहेस तेवढाच तब्येतीबाबत बेफिकीर आहेस म्हणून काळजी वाटते.”
“ डोन्ट वरी, मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात सुट्टी घेतो तेव्हा डॉक्टरांकडे जाऊ ”
“ प्रॉमिस ? ” .. बायको.
“ हजार टक्के ”
बायकोला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करण्याची वेळच आली नाही. खरं सांगायच तर दोन तीन दिवस तब्येत ठीक नव्हती. परंतु महत्वाच्या कामामुळे दुर्लक्ष केलं अन त्याच दिवशी मिटिंगमध्येच कोसळलो. डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. नंतर कळलं पॅरेलिसिसचा अटॅक आला. जीव वाचला परंतु उजवी बाजू निकामी झाली. जबरदस्त धक्का बसला. वास्तव स्वीकारायला फार त्रास झाला. उतारवयातल्या आजाराला तरुणपणीच गाठल्यानं खूप हताश, निराश झालो. एकांतात भरपूर रडलो, स्वतःला शिव्या घातल्या पण पश्चातापाव्यतिरिक्त हाती काही लागलं नाही. आयुष्य ३६० डिग्री अंशात बदललं. स्वतःला नको इतकं गृहीत धरलं त्याची शिक्षा मिळाली. आधी हॉस्पिटलमध्ये.. नंतर घरात असे दोन महीने काढल्यावर हल्लीच घराबाहेर पडायला लागलोय. संध्याकाळी काठी टेकवत हळूहळू चालतो तेव्हा लोकांच्या नजरेतील सहानभूती आणि कीव करण्याचा फार त्रास होतो. काही दिवसांपूर्वी खूप खूप बिझी असलेला मी आता वेळ कसा घालवायचा या विवंचनेत असतो. गॅलरीतून रस्त्यावर पाहताना बहुतेकजण माझ्यासारखेच वाटतात… सो कॉल्ड बिझी ….. उद्यासाठी आज जीव तोडून पळणारे….
…. एक महत्वाचं सांगायचं राहिलं .. .. माझ्या आयुष्यातील घडामोडीचा कंपनीच्या कामावर काहीही परिणाम झाला नाही. माणसं बदलून काम चालूच आहे. कुठंही अडलं नाही. मला मात्र उगीच वाटत होतं की…….