मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वीर जवान 🇮🇳 ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ वीर जवान 🇮🇳 ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

सळसळते वर्दीच्या आत

ते रक्त वीरतेचे

देशसेवा प्रण घेतलेल्या

त्या वीर जवानाचे

 

वर्दीत झाकलेली ती

छाती अभिमानी असते

या मायभूचे रक्षण करता

भय मृत्यूचेही नसते

 

ऊंच फडफडत्या तिरंग्या

आहे बलिदान जवानांचे

प्राणास घालुनी आण

घेतले प्रण विरतेचे

 

वीर ऐसे जन्मा आले

थोर भाग्य मायभूचे

विरांच्या या भूमी वरती

थरथरती पाय शत्रूचे

 

जय जवान जय किसान

नुसतेच देतो नारे

निद्रिस्त झालो आम्ही

वीरास कुणी जाणिले

 

सीमेवर भारतभुच्या

शत्रूचे तुफान येते

रूप मर्द मावळ्यांचेच

ये वीर जवानाते

 

‘जय जवान जय किसान’ चे

नुसतेच नकोत नारे

 होऊनी जागृत आता

वीरांस यां जाणा रे

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #201 ☆ ‘सोनचाफा…’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 201 ?

☆ सोनचाफा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

भाळण्याचे हे तुझेही वय कुठे

शीळ मीही घालतो पण लय कुठे

 

सोनचाफा यायची तू माळुनी

विसर म्हणता विसरते ती सय कुठे

 

सोडुनी आलीस सारी बंधने

सांग तू केली कुणाची गय कुठे

 

अमृताचा लाव ओठी तू घडा

गार करते पाजुनी मज पय कुठे

 

तीच आहे आत अजुनी भावना

भावनेला सांग होतो क्षय कुठे

 

तोडल्या केव्हाच आपण शृंखला

राहिले आता जगाचे भय कुठे

 

वागलो तेव्हा जरी हटके जरा

सोडला आजून आपण नय कुठे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वातंत्र्य 🇮🇳 ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

🌳 विविधा 🌳

☆ स्वातंत्र्य 🇮🇳 ☆ सौ. विद्या पराडकर ☆

भारताचा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!💐 

स्वातंत्र्याच्या ‌निर्मात्यांना आमुचे लाख प्रणाम💐

 

७६‌ वर्षे झालीत

पण  स्वातंत्र्य मिळाले कुणाला?🌸

या देशातील सामान्य नागरिक

 स्वातंत्र्यापासून वंचितच राहिला ☘️

 

स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाचा पायावर

ज्यांनी आपल्या इमारती‌ बांधल्या

त्यांना स्वातंत्र्य उपभोगण्यास मिळाले

बाकीचे मात्र कोरडेच राहिले.🌸

 

स्वातंत्र्य सूर्याची किरणे शिरली

मोठमोठ्या बंगल्यात, महालात

पण झोपड्या अन् घरे मात्र

राहिलीत नेहमीच अंधारात 🌸

 

आपण सारे हिंदुस्तान निवासी

म्हणतात सारे तोंडाने

स्वार्थापोटी ‌हेच निवासी

हेच निवासी एकमेकांचे शत्रू होतात

कृतीने

या देशात आहे निस्वार्थी

म्हणून च‌ इतरांचा स्वार्थ साधतो

देशभक्त आहेत

म्हणूनच देशद्रोही सुखी आहेत.☘️

 

स्वातंत्र्य, समता, बंधुता

सारे काही सोंग आहे

स्वतंत्रतेच्या मात्र पायात

विषमतेची श्रुंखलाआहे☘️

 

खरी लोकशाही आहे अर्थहीन

सुरु आहे बेबंदशाही चे थैमान

चंगळ वादाला आला बहर

पतन होते लोकशाहीचे, नागरिकांचे

सर्व राजकीय पक्षांचे🌸

 

करण्या यशस्वी लोकशाही

घ्या हो शपथ राष्ट्रीय एकात्मतेची

होळी करा हो सत्तांध भावनेची

स्वातंत्र्याचा अखंड दीप गवसेल तेव्हा 🌸

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ छापा की काटा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ छापा की काटा…? ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

दोघांचीही निवृत्ती झाली होती,

साठी कधीच ओलांडली होती,

अजूनही परिस्थिती ठीक होती, 

हातात हात घालून ती चालत होती —

 

तो राजा ती राणी होती

जीवन गाणे गात होती

झुल्यावरती झुलत होती

कृतार्थ आयुष्य जगत होती —-

 

अचानक त्याची तब्बेत बिघडते,

मग मात्र पंचायत होते,

तिची खूपच धावपळ होते,

पण कशीबशी ती पार पडते,—-

 

आता तो सावध होतो,

लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो,

वारसाची पुन्हा खात्री करतो,

मृत्यूपत्राची तयारी करतो —- 

           

दुसर्‍या दिवशी बँकेत जातो,

पासबुक तिच्या हातात ठेवतो,

डेबीट कार्ड मशीनमध्ये घालतो,

तिलाच पैसे काढायला लावतो, —-           

 

पुन्हा तिला सोबत घेतो,

वीज-पाण्याच्या ऑफिसात जातो, 

तिलाच रांगेत उभं करतो,

बिल भरायचं समजाऊन सांगतो,—- 

 

अचानक तिला सरप्राईज देतो,

टचस्क्रीन मोबाईल हाती ठेवतो,

वाय-फाय नेटची गंमत सांगतो,

ऑन लाईन बॅकींग समजाऊन देतो,—-

 

तिलाच सर्व व्यवहार करायला लावतो,

नवा सोबती जोडून देतो

बाहेरच्या जगात ती वावरू लागते,

प्रत्येक व्यवहार पाहू लागते,—- 

 

कॉन्फीडन्स तिचा वाढू लागतो,

निश्चिंत होत तो हळूच हसतो,     

बदल त्याच्यातला ती पहात असते,

मनातलं त्याच्या ओळखतं असते,—-

 

थोडं थोडं समजतं असते,

काळजी त्याचीच करत राहते,

एक दिवस वेगळेचं घडते,

ती थोडी गंमत करते,—-

 

आजारपणाचा बहाणा करते,

अंथरूणाला खिळून राहते,

भल्या पहाटे ती चहा मागते,

अन् किचनमध्ये धांदल उडते,—-

 

चहात साखर कमी पडते,

तरीही त्याचे ती कौतुक करते,

नाष्ट्यासाठी उपमा होतो,

पण हळदीच्या रंगात खूपच रंगतो,—-

 

दिवसा मागून दिवस जातो,

अन् किचनमधला तो मास्टर होतो,

कोणीतरी आधी जाणार असतं,

कोणीतरी मागं रहाणार असतं,—-

 

पण …… 

पण मागच्याचं आता अडणार नसतं,

अन् काळजीच कारण उरणार नसतं,

सह-जीवनाचं नाणं उडत असतं,

जमीनीवर ते पडणार असतं,

 

आधी काटा बसतो की छापा दिसतो,

प्रश्न एकच छळत असतो……. 

                             प्रश्न एकच छळत असतो……. 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – निरागस सप्तपदी… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– निरागस सप्तपदी…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

[विवाहबद्ध होणारे भारतातील पहिले गतिमंद जोडपे अनन्या आणि विघ्नेश यांना सादर प्रणाम !!!]

शहाण्यांच्या जगात,

वेडा हा आपला संसार !

कसेही असोत आपण,

एकमेकांचा होऊ आधार !

आपल्या नशीबात

बाकी सारं उणं आहे !

निरागसपणा पत्रिकेत

जमलेला  गुण आहे !

जगाच्या चष्म्यातून आपली,

गती-मती  थोडी मंद आहे !

आपल्याच विश्वात रमण्याचा

आपल्याला निखळ आनंद आहे !

भातुकलीच्या भाबड्या खेळातील

तीच निरागसता आपल्यात आहे !

तूच  माझा राजा- मीच तुझी राणी,

जीवनाची जोडी जमल्यात आहे !

सकारात्मक आयुष्य काय असते,

वेड्या जगाला कळू दे !

तुझा माझा हा मांडलेला संसार,

सुखाच्या प्रकाशात उजळू दे !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माणसंच माणसं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ माणसंच माणसं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

माणसं सगळी हुशार असतात

संधी मिळताच डोक्यावर बसतात

भलाबुरा अनुभव घेऊन

नको तिथं फिदीफिदी हसतात

 

माणसं सगळीच संत नसताना

काही उपद्रवी काही परोपकारी असतात

माणसं माणसांना जीव लावतात

मन लाऊन वाचली की सगळीच कळतात

 

कोणी कोणाला जोखत असतात

स्वतःच मोठेपण मिरवून घेतात

हरवत किंवा जिंकत बसतात

वसवत जातात उसवत जातात

 

नखरे करतात हवं तिथं फिरतात

कधी बावरतात कधी सावरतात

काळाला मात्र सारीच घाबरतात

आलाकी सोडून पसार होतात

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 139 ☆ अभंग – मोरपंख धारी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 139 ? 

☆ अभंग – मोरपंख धारी… ☆

मोरपंख धारी, श्रीकृष्ण मुरारी

भक्तांचा कैवारी, घन:शाम.!!

 

अष्टविध युक्त, ब्रह्मचर्य शुद्ध

विशेष विशुद्ध, मनोहर.!!

 

अर्जुन सारथी, कृष्ण दामोदर

झालयां विभोर, मन माझे.!!

 

कवी राज म्हणे, पितांबर धारी

वाजवी बासरी, वनमाळी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा

हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना

करि अंतःकरण तुज, अभि – नंदना

तव चरणिं भक्तिच्या चर्ची। चंदना

गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

हा भग्न तट असे गडागडाचा आजी

हा भग्न आज जयदुर्ग आसवांमाजी

ही भवानीची ह्या पुन्हा गंजली धारा

ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले

जाहली राजधान्यांची । जंगले

परदास्य – पराभवि सारी । मंगले

या जगती जगू, ही आज गमतसे लज्जा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी

जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी

जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी

जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे

ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे

ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 –  कवी – वि. दा. सावरकर

☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

प्रस्तुत कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना १९२६ मधे लिहिली आहे. (ते शाळकरी असताना लिहिली असा कांही लोकांचा गैरसमज आहे.)

या कवितेत प्रखर बुद्धिमंत सावरकरांनी फारशा प्रचलित नसलेल्या पण चपखल अशा मराठी व संस्कृत शब्दांचा वापर केला आहे. उदा. संभूत, दिप्तितम, चर्ची, गूढाशा, शोणित इ. या कवितेची रचना भूपतिवैभव या मात्रावृत्तात केलेली आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज हे भारतीयांचे स्फूर्तिस्थान आहेतच पण त्यांच्याविषयी सावरकरांसारखा प्रखर देशभक्त जेंव्हा स्फुर्तीगीत लिहितो तेंव्हा ते महाराजांच्या भवानी तलवारीसारखं तेजःपुंज व धारदार होतं. पं. हृदयनाथ मंगेशकर व गानकोकिळा लता मंगेशकर या द्वयीने हे गीत स्फूर्तिदायक व रोमांचक बनवण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचे सूर व संगीत इतकं अर्थवाही आहे की गीत ऐकल्यानंतर कुणीही भारतीय रोमांचित झाल्याशिवाय रहात नाही. या तीन कडव्यांच्या गीताच्या पहिल्या कडव्यात महाराजांचं स्तुतीपर वर्णन करून त्यांना वंदन केलेलं आहे. दुसर्‍या कडव्यात हिंदुस्थानातील सद्यस्थितीचं (त्या काळातलं -१९२६ मधलं) वर्णन केलं आहे आणि तिसऱ्या कडव्यात महाराजांकडं मागणं मागितलेलं आहे. जेणेकरून आपला स्वातंत्र्य लढा यशस्वी होईल.

पहिल्या कडव्यात ते महाराजांचं वर्णन ” हिंदूंच्या शक्तीतून प्रकट झालेलं तेज, हिंदूंच्या वर्षानुवर्षांच्या तपस्येचं फलित म्हणून जन्मलेला तेजःपुंज ईश्वरी अवतार, हिंदुदेवतेचा सौभाग्यालंकार, नरसिंहाप्रमाणे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी अवतरलेला प्रभूचा अवतार” असं केलं आहे. आणि ते म्हणतात हे हिंदुराष्ट्र तुला वंदन करीत आहे, चंदनाचा लेप लावून तुझं पूजन करीत आहे, अंतःकरणपूर्वक अभिनंदन करीत आहे. सावरकर म्हणतात, ” माझ्या मनात ज्या गूढ आशा आहेत त्या मी तुला कथन करू शकत नाही. तरी त्या ओळखून, हे नृसिंहाचा अवतार असणाऱ्या शिवाजीराजा माझ्या या इच्छा तू पूर्ण कर. ” ही कविता लिहिली तेंव्हा सावरकर स्थानबद्धतेत असल्यामुळे स्वातंत्रप्राप्तीची इच्छा प्रकट करू शकत नव्हते म्हणून ‘गूढाशा’ हा शब्द वापरला आहे.

दुसर्‍या कडव्यात परकीय आक्रमणामुळे देशाच्या झालेल्या दुरावस्थेचं वर्णन केलं आहे. महाराजांनी निर्माण केलेल्या, जतन केल्या गड किल्ल्यांची अवस्था सांगितली आहे. कुठे तट भंगले आहेत, गड, कोट, किल्ले, जंजिरे भग्न पावले आहेत, राजधान्यांची जंगले झाली आहेत, साऱ्या मंगलगोष्टी परदास्यामुळे पराभूत झाल्या आहेत. महाराजांसारखे वीरपुरूष नसल्यामुळे भवानी तलवारीची धार गंजली आहे. अशातच आई भवानीही आधार देत नाही. अशा या जगात जगणं अत्यंत लज्जास्पद झालं आहे.

तिसऱ्या कडव्यात सावरकर म्हणतात, ” ज्या शुद्ध हृदयाच्या राजाला रामदास स्वामींनी आपलंसं केलं होतं, ज्या बुद्धिमान राजाने विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही व वऱ्हाडची इमादशाही अशा पाच शाह्यांना ‘त्राहि भगवान’ करून सोडलं होतं, जो राजा कूटनीतीचा युक्तीने उपयोग करून, वेळप्रसंगी तह करून, बलवान शत्रुला गाफील ठेऊन पराभूत करीत असे ; त्या राजाची अंतःकरणाची शुद्धी आमच्या कृतीत उतरू दे. ती बुद्धी माझ्या भाबड्या देशबांधवांना लाभूदे. ती शक्ती आमच्या नसानसातून (रक्तातून) वाहू दे. हे राजा, जो स्वराज्याचा मूलमंत्र तुला समर्थ रामदास स्वामींनी दिला, तो मंत्र तू आम्हाला दे. म्हणजे त्या मंत्रसामर्थ्याने, ती शक्ती व युक्ती वापरून, त्या शुद्धी व बुद्धीच्या योगाने आम्ही हिंदुस्थानचे बांधव परकियांना येथून हुसकावून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेऊ. “

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भिरभिरणारे मन… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पावसाची कविता – ‘भिरभिरणारे मन…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

((वृत्त~ शुभगंगा ८+८+६)

कुठून आले वादळ वारे कळले का

भिरभिरणारे मन हे माझे भिजले का

 

किती प्रतीक्षा वसुंधरेची थकली ती

निष्ठूर नको होऊस असा रडले का

 

एका वेळी अनेक शंका अशा कशा

आभाळातच काळे घन हे भरले का

 

कधी शांतता तुफान केव्हा काय असे

गहिवर जाता ऊन कधी ते पडले का

 

संततधारा कधी बरसल्या भूवरती

तशीच वर्षा मनात माझ्या झरते का

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

०९/०७/२०२३

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक विशेष  दिवस… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

एक विशेष  दिवस… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

कधीतरी रोजचीच सकाळ

वेगळीच किमया करून जाते

पालथ्या पडल्या हातावर

अत्तर फाया फिरवून जाते …

 

रोजचीच साखर, रोजचीच पावडर

रोजचंच दूध, नि रोजचंच पाणी

रोजचीच बशी नि रोजचाच कप

गंजही रोजचा नि रोजचीच गाळणी

 

तयारी तीच नि सरंजामही तोच

लगबग तीच नि उत्साह तोच

चवही तीच आणि चहाही तोच

करणारा तोच, नि घेणारा तोच,

 

पण आजचा दिवस खास आहे

ओल्या पाउसधारांचा आहे

भागलेल्या काळोखी सूर्याचा आहे

वाफाळता चहा समोरआहे

गरम गरम पहिला घोट तर

“आह्” ची दाद घेतो आहे …

 

अगदी खरं सांगायचं तर

सारं काही तेच असतं

आपलंच मन एखाद्या दिवशी

फुलपाखरू होऊन बागडत असतं

 

कालचं रंगित फूल त्याला

आज जास्त भावतं

कालच्यापेक्षा मध आज

जास्त गोड लागतो

एक नवल गुपित मात्र

त्याचं त्याला माहित नसतं

पंखांवर आज त्याच्या

इंद्रधनू नाचत असतं

 

अशी जादू घेउन येतो

तो दिवस हसरा असतो

मी विश्वाचा विश्वही माझे

सुखाचा मंत्र देऊन जातो

 

आजचा दिवस तर विशेष आहे

दुप्पट तिप्पट सुखाचा आहे

कारण त्याचं खमंग आहे

चहाआधी कांदाभजी

पोटात जाऊन बसली आहेत …..!!

😃

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares