मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 33 – शब्द पक्षी…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है!  आज प्रस्तुत है  एक भावप्रवण  कविता “शब्द पक्षी…!” )

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #33☆ 

☆ शब्द पक्षी…! ☆ 

मेंदूतल्या घरट्यात जन्मलेली

शब्दांची पिल्ल

मला जराही स्वस्थ बसू देत नाही

चालू असतो सतत चिवचिवाट

कागदावर उतरण्याची त्यांची धडपड

मला सहन करावी लागते

जोपर्यंत घरट सोडून

शब्द अन् शब्द पानावर

मुक्त विहार करत नाहीत तोपर्यंत

आणि ..

तेच शब्द कागदावर मोकळा श्वास

घेत असतानाच पुन्हा

एखादा नवा शब्द पक्षी

माझ्या मेंदूतल्या घरट्यात

आपल्या शब्द पिल्लांना सोडुन

उडून जातो माझी

अस्वस्थता ,चलबिचल

हुरहुर अशीच कायम

टिकवून ठेवण्या साठी…!

 

© सुजित कदम, पुणे

7276282626

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 35 – पिंपळवृक्ष ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनकी  बीस वर्ष पूर्व लिखी हुईअतिसुन्दर  कविता  “पिंपळवृक्ष .  सुश्री प्रभा जी की  यह कविता मुझे निःशब्द करती हैं, कोई भी टिपण्णी करने से । कविता में दादी माँ का कथन  – “माँ को बच्चे कीओर  इस  तरह एकटक नहीं देखना चाहिए” ही  अपने आप में एक कविता है। अठारह – बीस वर्षों में बच्चे का शरीर ही नहीं अपितु परिवार भी वृक्ष की तरह बढ़ जाता है।  शेष आपका दृष्टिकोण कुछ और हो सकता है। सन्दर्भ विचारार्थ  तथा उसमें निहित साहित्यिक अनुभव भी अपने आप में एक अविस्मरणीय  ऐतिहासिक दस्तावेज है। इस अतिसुन्दर कविता के लिए  वे बधाई की पात्र हैं। उनकी लेखनी को सादर नमन ।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 35 ☆

☆ पिंपळवृक्ष ☆ 

(बावीस वर्षापूर्वी ची कविता  (मृगचान्दणी मधून))

झोळीत झोपलेल्या,

तुझ्या गोलमटोल, गोब-या गोब-या..

तीट लावलेल्या

चेह-या वरून आणि सुकुमार  अंगावरून…

फिरून फिरून नजर फिरविताना पाहून…

आजी म्हणाली एकदा,

“आईनं असं एकटक पाहू नये बाळाकडे”

आज ताडमाड वाढलेल्या,

तुझ्या सडसडीत शरीरयष्टीकडे पहाताना-

तूच म्हणतोस..

“बघ किती वाळलोय ना मी ?

तुझं लक्षच नाही माझ्या कडे”

आणि मग तरळून गेला नजरे समोरून….

गेल्या अठरा वीस वर्षाचा इतिहास…

तसं फार लक्षपूर्वक वाढवलंच नाही तुला,

तरीही वाढलास तू-

स्वयंभू सळसळत्या पिंपळवृक्षासारखा !

परवा म्हटलं कुणीतरी-

“तुमचा मुलगा बाणेदार आहे!”

तेव्हा आठवलं पुन्हा…

आजीचं वाक्य –

“आईनं असं एकटक पाहू नये बाळाकडे”

 

☆ विचारार्थ ☆

माझा आवडता शेर विनोद खन्ना यांनी रेडिओ वर ऐकवलेला,

कंधा न देना मेरी मैय्यत को

कही जी न उठे सहारा पाकर

शाळेत असताना ऐकलेला साहिर लुधियानवी यांचं” तलखियाँ” हे पुस्तक विकत घेऊन वाचलं होतं! मीनाकुमारी ची शायरी आवडायची!

इलाही जमादारांशी ओळख झाली, आणि गझल जास्त आवडायला लागली, बालगंधर्व च्या कॅफेटेरियात इलाहींना ऐकलं आणि आपण कविता करणं सोडून द्यावं असं वाटलं, इतकी मी त्यांच्या गझल ऐकून भारावले होते!

इलाही अनेकदा घरी यायचे गझल ऐकवायचे,माझ्या कविता ऐकायचे, ते म्हणाले होते, तुम्ही “आपकी नजरोने समझा  ……ही गझल गुणगुणत रहा तुम्हाला गझल सुचेल! पण तसं झालं नाही!

इलाहींच्या प्रभावाने मीनल बाठे व शरद पाटील  गझल लिहू लागले! मी मीनल बाठे बरोबर सुरेश भट यांना भेटायला गेले तेव्हा मी गझल लिहित नव्हते, पण सुरेश भटांनी मला कविता म्हणायला सांगितलं आणि माझ्या मुक्तछंदातल्या पिंपळवृक्ष या कवितेला सुरेख दाद दिली!

पुढे मीनल ने क्षितीज ही गझलप्रेमी संस्धा काढली त्यात मी होते या संस्थेची पहिली बैठक इलाही यांच्या उपस्थितीत झाली त्यात मी माझी पहिली गझल सादर केली होती  १९९३ साली—-त्यातले दोन शेर  …

का असे डोळ्यात पाणी पावलांनो

स्वैर आभाळी तुम्हा का वाव नाही

आणि

संपता आयुष्य माझे भेटण्या ये

मरण यात्रेला कुणा मज्जाव नाही

माझ्या पहिल्या गझल ला ही कुणी इस्लाह केला नाही, या गझल च्या पहिल्या शेरात वृत्त चुकलं होतं, शरद पाटील ने सांगितले पहिल्या शेरात गडबड आहे, काय गडबड आहे ते त्याला सांगता आले नाही, मलाही कळलं नाही मी माझ्या पहिल्या कविता संग्रहात तशीच छापली आहे. पुढे डाॅ राम पंडित यांचे लेख वाचून लगावली, वृत्त वगैरे समजलं मग तो शेर माझा मीच दुरूस्त केला!

 मी खुप ढोबळमानाने गझल लिहू लागले पण नंतर कळले त्या वृत्तबद्ध आहेत, माझा फार अभ्यास नाही पण माझ्या गझल लेखनाने मला खुप समाधान दिलं आहे! काही काही शेर तर माझं मलाच आश्चर्य वाटतं मी कसे लिहिले असतील!

पण माझ्या सर्व गझला सहज सुलभ सुचलेल्या, मी आटापिटा कधीच केला नाही इस्लाह करून घेतला नाही या क्षेत्रात कुणीही गुरू नाही, मानायचंच झालं तर डाॅ राम पंडित यांचे लेख हेच गुरू! गझल समजली, हातून लिहून झाली. काही काळ एक झपाटले पण आलं! देवप्रिया वृत्तातली एक गझल नाशिकला किशोर पाठक यांना ऐकवली ते म्हणाले, “छान आहे पण गझल मध्ये अडकून पडू नकोस!”

गझल हा काव्यप्रकार सुंदरच आहे खरोखर ती वृत्तीच असावी, पण मुक्तछंदातली कविता ही जबरदस्त असते! गझल, वृत्तबद्ध कविता, मी फार अभ्यासू नसूनही हाताळता आले हे खुप छान वाटतं…..पण प्रत्येक कवीला गझल रचताच आली पाहिजे असं काही नाही, प्रत्येक कवीचा पिंड वेगवेगळा असतो!

हल्ली मला वैभव जोशी च्या गझल खुप आवडतात!

बोलला सायलेंटली पण जाब मागत राहिला

रात्रभर माझ्या उशाशी फोन वाजत राहिला

 

                 – वैभव जोशी

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होत आहे रे # 19 ☆ लग्नाचा घाणा ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है।  श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनके द्वारा रचित एक लग्न गीत “लग्नाचा घाणा”। आज भी पिछली  पीढ़ियों ने विवाह संस्कार तथा अन्य सामाजिक कार्यक्रमों में गीतों के माध्यम से विरासत में मिले संस्कारों को जीवित रखा है। हम श्रीमती उर्मिला जी द्वारा रचित इस लग्न गीत  के लिए उनके आभारी हैं। निश्चित ही यह गीत  आवश्यक्तानुसार परिवर्तित कर भविष्य में विवाह संस्कारों में गाये जायेंगे।

यह एक संयोग ही है  कि – आज दिनांक 1-2-2020 को उनके पौत्र चिरंजीव अवधूत जी का विवाह है । इसके लिए  ई- अभिव्यक्ति की ऒर से  उनके भावी  दाम्पत्य जीवन की हार्दिक शुभकामनाएं।  इस सुन्दर लग्न गीत की रचना  के  समय उनके मन में  आई भावनाएं उनके ही शब्दों में  – “लग्नाची मुहूर्तमेढ, देवांना बोढण म्हणजे पुरणपोळी पक्वांनाचा नेवैद्य व सवाष्णींना भोजन असा विधी पार पडला त्यावेळी मला सुचलेला लग्नाचा घाणा “. इस अतिसुन्दर रचना के लिए श्रीमती उर्मिला जी की लेखनी को नमन।)  

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 19 ☆

☆ लग्नाचा घाणा ☆

पाच कुलदेवतांचं देवक वाजत आणलं घरात !

पाच पत्रींची मुहूर्तमेढ रोविली दारात !!१!!

 

पाच सवाष्णींच्या हाताने जात ते पुजिलं!

हळद कुंकू लावुनिया उखळ-मुसळ पुजिलं!!२!!

 

घाणा तो भरण्या सुंदर ते जातं !

सवाष्णींचा हात लागता गरगरा ते फिरतं !!३!!

 

गरगरा फिरतं ते हळकुंड दळितं!

हळकुंड दळित त्याचीहळद करतं !!४!!

 

अवधूत-प्राजूच्या लग्नाची  दळताती हळद!

दळताती हळद बाई ओव्यांच्या सुरात !!५!!

 

ओव्यांच्या सुरात बाई नाद घुमतो घरात!

नाद घुमतो घरात बाई आनंद होतो मनात !!६!!

 

पुरण-पोळीच्या पक्वांनाचं भरिल बोढण !

देवांना नेवैद्य अन् सवाष्णींना भोजन !!७!!

 

हळद-कुंकू लावुनि द्या पानसुपारी हातात!

खण नारळ तांदुळ घाला त्यांच्या ओटीत !!८!!

 

जाई जुईचा गजरा माळा त्यांच्या वेणीत !

गजऱ्याचा वास घुमे सगळ्या घरात  !!९!!

 

उर्मिला हात जोडोनी विनंती करीत !

आनंद सुखसमृद्धी सदा नांदो माझ्या घरात!!१०!!

 

©®उर्मिला इंगळे

दिनांक:- १-२-२०२०

 

!! श्रीकृष्णार्पणमस्तु !!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ स्वप्ना अमृतकर यांची कविता अभिव्यक्ती – आधारवड ☆ सुश्री स्वप्ना अमृतकर

सुश्री स्वप्ना अमृतकर
(सुप्रसिद्ध युवा कवियित्रि सुश्री स्वप्ना अमृतकर जी का अपना काव्य संसार है । आपकी कई कवितायें विभिन्न मंचों पर पुरस्कृत हो चुकी हैं।  आप कविता की विभिन्न विधाओं में  दक्ष हैं और साथ ही हायकू शैली की सशक्त हस्ताक्षर हैं। आज प्रस्तुत है सुश्री स्वप्ना जी की  हायकू शैली में कविता “आधारवड ”। )

सुश्री स्वप्ना अमृतकर यांची कविता अभिव्यक्ती – आधारवड  ☆ 

(७रचना)

(Photo by icon0.com from Pexels)

निसर्ग छाया

आश्रितांना आधार

अर्पितो माया       १,

आधार वड

केवढा चमत्कार

प्रेम अपार         २,

विस्तार मोठा

पारंब्या हो अनंत

भासतो संथ        ३,

आधार वड

सावलीच्या छायेत

घेतो कवेत         ४,

छान घरटे

पशुपक्षी बांधती

आधार वाटे        ५,

सोशीक फार

उभा आधारवड

झेलतो भार        ६,

 

दुर्लक्ष होते

आधारवड तरी

सदा हासते        ७..

© स्वप्ना अमृतकर , पुणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 32 – मराठी क्षणिकाएं ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है!  आज प्रस्तुत है  एक तीन मराठी “मराठी क्षणिकाएं ” )

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #33☆ 

☆ मराठी क्षणिकाएं ☆ 

 

लेकराला कुशीत घेतल्यावर

मिळणार सुख हे

कित्येक वेळा

निःशब्द करून जातं…..!

♦ ♦ ♦ ♦ ♦ ♦ ♦ ♦

माझ्या

कमावत्या हातात

जेव्हा मी .. .

लेकराचा इवलासा

हात पकडतो ना.. .

तेव्हा खरंच

श्रीमंत झाल्यासारखं वाटतं….!

♦ ♦ ♦ ♦ ♦ ♦ ♦ ♦

हल्ली हल्ली शब्दांचाही

विसर पडू लागलाय

हे आयुष्या तुला संभाळता संभाळता….,

अक्षरांचा हात सुटू लागलाय..

 

© सुजित कदम, पुणे

7276282626

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 34 – ग़ज़ल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनकी अतिसुन्दर  “ग़ज़ल .  सुश्री प्रभा जी की  ग़ज़ल वास्तव में जीवन दर्शन है। यह तय है कि हम अकेले हैं और अकेले ही जायेंगे। यही जीवन है। इस सम्पूर्ण जीवन यात्रा का सार उनकी ग़ज़ल की अंतिम पंक्ति में समाया लगता है। यदि किसी को ईश्वर मन है तो उसे ईश्वर ही मानो क्योंकि वह पत्थर हो ही नहीं सकता। अर्थात यह विश्वास की पराकाष्ठा है।  फिर इस जीवन यात्रा में  एक स्त्री का जीवन तब  भी परिवर्तित होता है जब वह अपना घर छोड़ कर नए घर को अपना घर बना लेती है। ऐसी परिकल्पना सुश्री प्रभा जी ही कर सकती हैं ।इस अतिसुन्दर गजल के लिए  वे बधाई की पात्र हैं। 

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 34 ☆

☆ गझल  ☆ 

 

एकटी जाणार आहे,कोणता वावर नसो

तो जिव्हारी  लागणारा, जीवघेणा  स्वर नसो

 

तू दिलेले सर्व काही सोडुनी आले इथे

कोंडुनी जे मारते ते दुष्टसे सासर नसो

 

शांत वाटे या घडीला , मी इथे आनंदले

धूळ होणे ठरविले , ते  देखणे  अंबर नसो

 

मी कशी स्वप्ने उद्याची रंगवू वा-यावरी ?

वास्तवाचे प्रश्न मोठे त्या भले उत्तर  नसो

 

ही कशाने तृप्तता आली मला या जीवनी

सुख  असो वा दुःख आता त्यामधे अंतर नसो

 

कोणत्याही वादळाची शक्यता टाळू नको

जे मिळे ते युग सुखाचे त्यास मन्वंतर नसो

 

आपल्या ही आतला आवाज  आहे सांगतो

देव ज्याला मानले तो नेमका पत्थर नसो

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ श्री गणेश जयंती विशेष – मोरया रे ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज  प्रस्तुत है श्री गणेश जयंती पर विशेष कविता / गीत   “ मोरया रे।)

☆ श्री गणेश जयंती विशेष – मोरया रे☆

 

मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे

चमक तुझ्या बुद्धीची जणू सूर्या रे ॥ध्रु॥

 

आदि शक्ती आदि भक्ती सर्व कार्या रे

रिद्धी आणि सिद्धी दोन्ही तुझ्या भार्या रे ॥1॥

 

किती खाशी मोदक, मस्तकी दुर्वा रे

लंबोदरामधे तुझ्या जणू दर्या रे ॥2॥

 

धाव घेशी सज्जनांच्या शुभ कार्या रे

दुर्जनांचा वाजवशी तूच बोर्‍या रे ॥3॥

 

लोभस वाटे मजला तुझी चर्या रे

माताही लाभली तुला एक आर्या रे ॥4॥

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ कविता ☆ श्री गणेश जयंती विशेष – गणराया तू ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है  मराठी गीत श्री गणेश जयंती विशेष – गणराया तू । )

 ☆  श्री गणेश जयंती विशेष – गणराया तू ☆

(भावगीत)

एकदंत तू ,वरद विनायक, वंदन हे स्वीकार

कार्यारंभी करतो पूजन तुझाच जय जय कार .

 

तिलकुंदाचे केले लाडू, गुंफीयेला जास्वंदीचा हार

दुर्वादल ते लक्ष अर्पिले , देवा  आळवीत ओंकार.

 

सहस्त्र रूपे ,तुझी दयाळा ,  सृजनशील दरबार

माघ चतुर्थी ,जन्मोत्सव हा, शोभे निर्गुण निराकार.

 

गाणपत्य तू ,बुद्धी दाता, करीशी चराचरी संचार

कृपा असावी आम्हावरती ,  कर जीवन हे साकार .

 

अक्षर अक्षर दैवी देणे, मूर्त शारदा शब्दाकार

गणराया तू, ईश गुणांचा, देवा कलागुण स्वीकार .

 

तुला पूजिले, देहमंदिरी , देना  जीवनाला आधार

जन्मा आला, जगत नियंता ,देवा शब्दपुष्प स्वीकार .

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #34 – मानवतेचा झेंडा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है गणतंत्रता दिवस के अवसर पर रचित मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण एक विचारणीय कविता  “मानवतेचा झेंडा।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 34☆

☆ मानवतेचा झेंडा ☆

(सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! )

 

मानवतेचा झेंडा घेउन फिरतो मी तर

जोडू हृदये मने जिंकुया ध्यास निरंतर

 

काल फुलांच्या झाडाखाली जरा पहुडलो

कोण शिंपुनी देहावरती गेले अत्तर

 

देशोदेशी नेत्यांच्या या इमले माड्या

प्रत्येकाच्या वाट्याला ना येथे छप्पर

 

शूर विरांच्या कर्तृत्वावर संशय घेती

जी जी करुनी अतिरेक्यांचा करती आदर

 

देशभक्त हे मुसलमान तर शानच आहे

रोहिंग्यांचा फक्त बांधुया बोऱ्याबिस्तर

 

देशासाठी धर्म बाजुला ठेवू थोडा

मिळून सारे कट्टरतेला देऊ टक्कर

 

ईद दिवाळी मिळून सारे करू साजरी

खिरीत हिंदू लाडुत मुस्लीम होवो साखर

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 33 – चार दिशेची चार पाखरे ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है  आपकी एक भावप्रवण  कविता  “चार दिशेची चार पाखरे” । )

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 33 ☆ 

 ☆ चार दिशेची चार पाखरे

 

सोडून कट्टी कर ना ग बट्टी, हट्ट सखे हा सोड ना।

प्रेमा मध्ये नको दुरावा, बरी नव्हे ही खोड ना।।धृ।।

 

चार दिशेची चार पाखरे, जमलो या काव्यांगणी।

सुखदुःखांच्या अनेक लहरी, मनास गेल्या छेडुनी।

क्षणात हसणे क्षणात रुसणे  मैत्रीस या तोड ना।।१।।

 

ताई, माई, दादा, भाऊ, जमले सारे दोस्त ग।

काव्य मैफिली इथे रंगल्या अफलातून या मस्त ग।

चढाओढी अन् कुरघोडीची कधी न जमली जोड ना।।२।।

 

हाती हात नि पक्की साथ काव्य रसाची सारी रात।

भिन्न रंग- रूप धर्म जरी, मधे ना आली केव्हा जात।

असेल चुकला भाऊ अवखळ… अंतरंग परि गोड ना।।३।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares
image_print