मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 104 ☆ जखम ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 104 ?

☆ जखम ☆

ठेच लागलेल्या बोटाची जखम

चिघळून ठसठसावी

 तशाच ठसठसतात ना आठवणी?

खरं तर कारणच नव्हतं–

ठेच लागण्याचं,

पण एखादा निसरडा क्षण

ठेऊनच जातो कायमचा व्रण!

 

वेळीच

भळभळणा-या जखमेवर

भरली असतीस

चिमूटभर हळद,

तर जखम झालीही नसती

इतकी गडद!

 

धूळभरल्या वाटेवर

दुख-या बोटानं

अनवाणी चालत राहिलीस

बेफिकीर!

 

धूळच माखून घेतलीस

मलम म्हणून !

आता ती ठेचच बनली आहे ना,

एक चिरंजीव वेदना,

आश्वत्थाम्याच्या जखमेसारखी!

 

अशा जखमा भरतही नाहीत औषध पाण्याने अथवा

ब-याही होत नाहीत

रामबाण उपायाने—

आणि करता ही येत नाही,

त्या ठसठसत्या आठवणींवर शस्त्रक्रिया!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १३ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १३ – भाग ५ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ लक्षद्वीपचा रंगोत्सव – भाग १ ✈️

अथांग अरबी सागरात ‘कवरत्ती’ नावाची आमची पाच मजली बोट नांगर टाकून उभी होती. समोर दिसत असलेल्या मिनीकॉय बेटावर नारळाची असंख्य हिरवीगार झाडं वाऱ्यावर डुलत होती. आता आमच्या बोटीतून छोट्या यांत्रिक बोटीत उतरण्याची कसरत करायची होती. वाऱ्यामुळे, लाटांमुळे आमची बोट आणि छोटी यांत्रिक बोट, दोन्ही झुलत होत्या. या दोघींची भेट झाल्यावर बोटीच्या दारात उभा असलेला बोटीचा स्टाफ आम्हाला दोन्ही दंडाना धरून छोट्या बोटीमध्ये अलगद उतरवत होता.( लहानपणी केळशीला जाताना हर्णै बंदरातून किनाऱ्यावर पोचायला हाच उद्योग करावा लागत असल्याने त्याची प्रॅक्टिस होतीच)

लक्षद्वीप द्वीपसमूह  हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून साधारण चारशे किलोमीटर दूर असलेला छत्तीस बेटांचा समूह आहे. यापैकी फक्त अकरा बेटांवर मनुष्यवस्ती आहे. केंद्रशासित असणाऱ्या या बेटांवर जाण्यासाठी केरळमधील कोची (कोचिन /एर्नाकुलम) इथून ठराविक दिवशी बोटी सुटतात.

समुद्रावरील ताजा, मोकळा वारा भरभरून घेत मिनीकॉयवर उतरलो. साधारण ११ किलोमीटर लांबीचं, अर्धवर्तुळाकार पसरलेलं हे बेट,  लक्षद्वीप द्वीपसमूहातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचं बेट आहे. (आकाराने पहिला क्रमांक ऍड्रॉथ या बेटाचा लागतो.) नारळीच्या दाट बनातून आमची गाडी दीपगृहाजवळ पोहोचली. ब्रिटिश काळात १८८५  साली बांधलेल्या या भक्कम दीपगृहाच्या २२० अर्धगोलाकार पायऱ्या चढून गेल्यावर  अफाट, निळ्या- निळ्या सागराचं नजर खिळवून ठेवणारं दर्शन घडतं.  तिथून रिसॉर्टला पोहोचल्यावर सर्वांचं शहाळ्याच्या मधुर पाण्याने, त्यातल्या कोवळ्या, गोड खोबर्‍याने स्वागत झालं. पारदर्शी, स्वच्छ, नितळ निळा समुद्र सर्वांना साद घालत होता. सेफ्टी जॅकेट्स चढवून डुंबण्यासाठी सज्ज झालो. (समुद्रातील पोहणं, कयाकिंग, स्नॉर्केलिंग वगैरे साऱ्या गोष्टींसाठी सेफ्टी जॅकेट व पायात रबरी बूट, चपला घालणं बंधनकारक आहे. नाहीतर पाण्यातून चालताना धारदार कोरल्समुळे जखम होण्याची शक्यता असते.) समुद्रावर अनेक प्रशिक्षित ट्रेनर्स आपल्या मदतीसाठी सज्ज असतात.

किनाऱ्यावरील पाण्यात अलगद बसण्याचा प्रयत्न केला. पण लाटांनी वर ढकलून दिलं. शेवटी धबाकन फतकल मारुन बसलो. अंगावर झेपावणाऱ्या थंड लाटांनी छान समुद्रस्नान झालं. आजूबाजूला हात घातला की तरतऱ्हेचे कोरल्स हातात येत .काहींचा आकार झाडांचा तर कांहींचा आकार फुलांचा, पानांचा, पक्ष्यांचा. कुणाला गणपती सुद्धा सापडले. तासाभराने उठलो तेव्हा जमविलेल्या  कोरल्सची संपत्ती ‘समुद्रार्पणमस्तु’ म्हणून समुद्रालाच परत केली.(कुठच्याही प्रकारचे कोरल्स लक्षद्वीपहून आणणं हा दंडनीय अपराध आहे.)

मदतनिसाबरोबर कयाकिंगला गेले. मजबूत प्लास्टिकच्या लांबट, हलक्या होडीतून वल्ही मारत जाण्याचा अनुभव खूप वेगळा होता. आकाशाच्या घुमटातून  परावर्तित होणारे ढगांचे विविध रंग, पारदर्शी निळ्या पाण्यात उतरत होते. निळा, जांभळा, पिवळा, केशरी, गुलाबी असे अनंत रंग पाण्यात तरंगत होते. हेमगर्भ सौंदर्य आणि गूढरम्य सुशांतता यांचा अपूर्व मिलाप झाला होता. अथांग पाणी आणि असीम क्षितिज यांच्या शिंपल्यात आपण अलगत शिरत आहोत असा एखाद्या परीकथेतल्याप्रमाणे आभास झाला. मदतनिसाने परतण्यासाठी कयाक वळविली तेव्हा भानावर आले.

मिनीकॉयपासून  १०० किलोमीटर्सवर मालदीव बेट आहे. अर्थातच मालदीवला जाण्याची सोय किंवा परवानगी नाही. जेवण व थोडी विश्रांती झाल्यावर दुपारी आम्हाला तिथल्या एका गावात नेण्यात आलं. ११००० लोकसंख्या असलेल्या मिनीकॉय बेटावर छोटी छोटी ११ गावे आहेत.मुखिया म्हणजे गावप्रमुख एकमताने निवडला जातो. ग्रामपंचायत आहे. प्रत्येक गावात सार्वजनिक वापरासाठी एक मध्यवर्ती जागा ठेवलेली असते. गावातल्या कुठच्याही घरी काहीही कार्य असलं तरी प्रत्येकाने मदत करायची पद्धत आहे. आम्हाला ज्या गावात नेलं होतं ते तीनशे वर्षांपूर्वी वसलेलं गाव आहे.चहा, समोसा आणि नारळाची उकडलेली करंजी देऊन तेथील स्त्रियांनी आमचं स्वागत केलं. पांढऱ्याशुभ्र वाळूवर दोन लांबलचक होड्या सजवून ठेवल्या होत्या.दर डिसेंबरमध्ये तिथे नॅशनल मिनिकॉय फेस्ट साजरा होतो. शर्यतीसाठी प्रत्येक बोटीमध्ये वीस जोड्या वल्हव़त असतात. या बेटावर ट्युना कॅनिंग फॅक्टरी आहे. ट्युना माशांना परदेशात खूप मागणी आहे. त्यांची निर्यात केली जाते. इतर साऱ्या बेटांवरील बोलीभाषा, मल्याळम् असली तरी या बेटावर ‘महल'(Mahl) नावाची भाषा बोलली जाते.

भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार # 90 ☆ रास्ता ☆ सुश्री नीलम सक्सेना चंद्रा

सुश्री नीलम सक्सेना चंद्रा

(सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी सुप्रसिद्ध हिन्दी एवं अङ्ग्रेज़ी की  साहित्यकार हैं। आप अंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय /प्रादेशिक स्तर  के कई पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं । सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार शीर्षक से प्रत्येक मंगलवार को हम उनकी एक कविता आपसे साझा करने का प्रयास करेंगे। आप वर्तमान में एडिशनल डिविजनल रेलवे मैनेजर, पुणे हैं। आपका कार्यालय, जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है।आपकी प्रिय विधा कवितायें हैं। आज प्रस्तुत है  आपकी एक भावप्रवण कविता “रास्ता। )

आप निम्न लिंक पर क्लिक कर सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी के यूट्यूब चैनल पर उनकी रचनाओं के संसार से रूबरू हो सकते हैं –

यूट्यूब लिंक >>>>   Neelam Saxena Chandra

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार # 90 ☆

☆ रास्ता ☆

वो कौन से निशाँ हैं

जो ढूँढ़ रही है यह जिगर-अफ़गार ज़िंदगी?

वो कौन से जज़्बात हैं

जो महसूस करना चाहती है दिल की लगी?

वो कौन से मंज़र हैं

जो खोज रही हैं यह उचाट आँखें?

वो कौन से एहसास हैं

जो पाने को बेचैन हैं यह उखड़ती साँसें?

वो क्या है जो दिल सोचता है

कि कहूँ या न कहूँ?

वो क्या है जो पाना चाहती है

यह बेकल रूह?

 

न कोई तनहाई है मन के आँगन में

न कोई रुसवाई है जिगर के मौसम में

पर कोई गुल भी तो नहीं खिलता…

जाने क्यूँ सुकून भी नहीं मिलता…

 

यह ज़िंदगी एक सफ़र है और चली जा रही हूँ मैं…

जाने क्या खो रही हूँ और जाने क्या पा रही हूँ मैं?

 

© नीलम सक्सेना चंद्रा

आपकी सभी रचनाएँ सर्वाधिकार सुरक्षित हैं एवं बिनाअनुमति  के किसी भी माध्यम में प्रकाशन वर्जित है।

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 1 – सजल – जीवन हो मंगलमय सबका… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

ई- अभिव्यक्ति में संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी का हार्दिक स्वागत है। हम अपने प्रबुद्ध पाठकों के लिए  आदरणीय श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी का साप्ताहिक स्तम्भ ” मनोज साहित्य “ प्रारम्भ कर रहे हैं। अब आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 1 – सजल – जीवन हो मंगलमय सबका… ☆ 

सजल

सीमांत – इया

पदांत – है

मात्रा भार -16

 

सागर को जब पार किया है।

तब जग ने सम्मान दिया है।।

 

डरे नहीं झंझावातों से,

जीवन को निर्भीक जिया है।

 

जितनी चादर मिली जगत में, 

उसको ओढ़ा और सिया है।

 

स्वाभिमान से जीना सीखा,

प्रेम भाव में गरल पिया है।

 

लक्ष्य साध कर बढ़े सदा तो,

विजयी-भव वरदान लिया है।

 

पास रहें बेटा कितने पर

पीड़ा हरती बस बिटिया है ।

 

जीवन हो मंगलमय सबका,

मानवता ही वह पहिया है ।

 

राम कृष्ण गौतम मसीह ने ,

दुख-दर्दों का हरण किया है।

 

सागर कितना बड़ा रहा पर,

प्यास बुझाने को नदिया है।

 

©  मनोज कुमार शुक्ल ” मनोज “

17 मई 2021

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)-  482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 97 – लघुकथा – टुकिया का झूला ☆ श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

श्रीमती  सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। । साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य  शृंखला में आज प्रस्तुत है  गरीबी से संघर्ष करते परिवार की एक संवेदनशील लघुकथा  “टुकिया का झूला। इस विचारणीय लघुकथा के लिए श्रीमति सिद्धेश्वरी सराफ जी की लेखनी को सादर नमन। ) 

☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी  का साहित्य # 97 ☆

 ? लघुकथा – टुकिया का झूला ?

साइकिल की आवाज सुन कर  वह बाहर निकली।  टुकिया रोज की तरह अपने बाबा को दौड़ कर गले लगा, उनकी बाहों में छुप जाना चाहती थी।

पांच साल की टुकिया परंतु आज बाबा ने न तो टुकिया को गोद लिया और न ही उसके लिए जलेबी की पुड़िया दी। टकटकी लगाए हुए पापा की ओर देखने लगी।

परंतु उसे क्या मालूम था कि बाबा ऐसा क्यों कर रहे हैं। पापा अंदर आने पर अपनी पत्नी से पानी का गिलास लेकर कहने लगे… अब मैं बच्ची को उसकी इच्छा के अनुसार पढ़ाई नहीं करवा पाऊंगा। उसकी यह इच्छा अधूरी रहेगी, क्योंकि आज फिर से काम से निकाल दिया गया हूँ।

तो क्या हुआ बाबा…  गले से झूलते हुए बोली… बाबा हम आपके साथ सर्कस जैसा काम करेंगे। हमारे पास खूब पैसे आ जाएंगे। बाबा को अपने पुराने दिन याद आ गए । उन्होंने बिटिया का माथा चूम लिया।

शाम ढले दो बांसों के बीच रस्सी बांध दिया गया। टुकिया चलने लगी सिर पर मटकी और मटकी पर जलता दिया।

दिए की लौ से प्रकाशित होता पूरा मैदान। टुकिया चलते जा रही थी, बाबा  का कलेजा फटा जा रहा था। बच्चीं ने रस्सी पार कर कहा… बाबा हमें जीत मिल गई अब हम रस्सी पर खूब काम करेंगे। और देखना एक दिन आपको हवाई जहाज में घुमाएंगे।

बाबा ने सोचा क्या गरीबी का बोझ हवाई जहाज उड़ा कर ले जा सकेगी? टुकिया रस्सी पर कब तक चलेगी।

सिक्के और रुपए उसकी थाली पर गिरते जा रहे थे। तालियों की गड़गड़ाहट  में उसकी सिसकियां कहाँ  सुनाई देती?

 

© श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 105 ☆ डोंगर ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 105 ☆

☆ डोंगर ☆

 

आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा

मनात आले मारुन यावे सैर सपाटा

 

दुरून डोंगर छान वाटला म्हणून चढलो

ठेच लागली पाय घसरला आणिक पडलो

पाय ठणकतो त्यात मोडला हिरवा काटा

आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा

 

गाभुळलेल्या चिंचा होत्या झाडावरती

मनात ठसली ती तर होती शेंड्यावरती

गोट्यासोबत भिरकवला मी एक लखोटा

आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा

 

उभ्या पिकातच शिरली होती दोन पाखरे

येउन गेले होते वारे इथे बोचरे

त्यांनी केला गावोगावी मग बोभाटा

आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा

 

आठवणीच्या वाटे वरुनी खूप धावलो

अजून मजला कळले नाही कुठे पोचलो

वयासोबती धुरकट झाल्या साऱ्या वाटा

आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जयतु संस्कृतम् जयतु भारतम् ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ जयतु संस्कृतम् जयतु भारतम् ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

भारतातील अती महत्वाच्या संस्थांची  घोषवाक्ये संस्कृत मधील आहेत. अवश्य  वाचा. 

  • भारत सरकार ? सत्यमेव जयते
  • लोक सभा ? धर्मचक्र प्रवर्तनाय
  • उच्चतम न्यायालय ? यतो धर्मस्ततो जयः
  • आल इंडिया रेडियो ? सर्वजन हिताय सर्वजनसुखाय‌
  • दूरदर्शन ? सत्यं शिवं सुन्दरम्
  • गोवा राज्य ? सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्।
  • भारतीय जीवन बीमा निगम ? योगक्षेमं वहाम्यहम्
  • डाक तार विभाग ? अहर्निशं सेवामहे
  • श्रम मंत्रालय ? श्रम एव जयते
  • भारतीय सांख्यिकी संस्थान ? भिन्नेष्वेकस्य दर्शनम्
  • थल सेना ? सेवा अस्माकं धर्मः
  • वायु सेना ? नभःस्पृशं दीप्तम्
  • जल सेना ? शं नो वरुणः
  • मुंबई पुलिस ? सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
  • हिंदी अकादमी ? अहं राष्ट्री संगमनी वसूनाम्
  • भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी ? हव्याभिर्भगः सवितुर्वरेण्यम्
  • भारतीय प्रशासनिक सेवा अकादमी ? योगः कर्मसु कौशलम्
  • विश्वविद्यालय अनुदान आयोग ? ज्ञान-विज्ञानं विमुक्तये
  • नेशनल कौंसिल फॉर टीचर एजुकेशन ? गुरुर्गुरुतमो धाम
  • गुरुकुल काङ्गडी विश्वविद्यालय ? ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाघ्नत
  • इन्द्रप्रस्थ विश्वविद्यालय ? ज्योतिर्व्रणीत तमसो विज्ञानन
  • काशी हिन्दू विश्वविद्यालय: ? विद्ययाऽमृतमश्नुते
  • आन्ध्र विश्वविद्यालय ? तेजस्विनावधीतमस्तु
  • बंगाल अभियांत्रिकी एवं विज्ञान विश्वविद्यालय, शिवपुर ? उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत
  • गुजरात राष्ट्रीय विधि विश्वविद्यालय ? आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः
  • संपूणानंद संस्कृत विश्वविद्यालय ? श्रुतं मे गोपाय
  • श्री वैंकटेश्वर विश्वविद्यालय ? ज्ञानं सम्यग् वेक्षणम्
  • कालीकट विश्वविद्यालय ? निर्भय कर्मणा श्री
  • दिल्ली विश्वविद्यालय ? निष्ठा धृति: सत्यम्
  • केरल विश्वविद्यालय ? कर्मणि व्यज्यते प्रज्ञा
  • राजस्थान विश्वविद्यालय ? धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा
  • पश्चिम बंगाल राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विश्वविद्यालय ? युक्तिहीने विचारे तु धर्महानि: प्रजायते
  • वनस्थली विद्यापीठ ? सा विद्या या विमुक्तये।
  • राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद् ? विद्याsमृतमश्नुते।
  • केन्द्रीय विद्यालय ? तत् त्वं पूषन् अपावृणु
  • केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ? असतो मा सद्गमय
  • प्रौद्योगिकी महाविद्यालय, त्रिवेन्द्रम ? कर्मज्यायो हि अकर्मण:
  • देवी अहिल्या विश्वविद्यालय, इन्दौर ? धियो यो नः प्रचोदयात्
  • गोविंद बल्लभ पंत अभियांत्रिकी महाविद्यालय, पौड़ी ? तमसो मा ज्योतिर्गमय
  • मदनमोहन मालवीय अभियांत्रिकी महाविद्यालय गोरखपुर ? योगः कर्मसु कौशलम्
  • भारतीय प्रशासनिक कर्मचारी महाविद्यालय, हैदराबाद ? संगच्छध्वं संवदध्वम्
  • इंडिया विश्वविद्यालय का राष्ट्रीय विधि विद्यालय ? धर्मो रक्षति रक्षितः
  • संत स्टीफन महाविद्यालय, दिल्ली ? सत्यमेव विजयते नानृतम्
  • अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ? शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम्
  • विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपुर ? योग: कर्मसु कौशलम्
  • मोतीलाल नेहरू राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान,इलाहाबाद ? सिद्धिर्भवति कर्मजा
  • बिरला प्रौद्योगिकी एवं विज्ञान संस्थान, पिलानी ? ज्ञानं परमं बलम्
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान खड़गपुर ? योगः कर्मसुकौशलम्
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई ? ज्ञानं परमं ध्येयम्
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपुर ? तमसो मा ज्योतिर्गमय
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान चेन्नई ? सिद्धिर्भवति कर्मजा
  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रुड़की ? श्रमं विना न किमपि साध्यम्
  • भारतीय प्रबंधन संस्थान अहमदाबाद ? विद्या विनियोगाद्विकास:
  • भारतीय प्रबंधन संस्थान बंगलौर ? तेजस्वि नावधीतमस्तु
  • भारतीय प्रबंधन संस्थान कोझीकोड ? योगः कर्मसु कौशलम्
  • सेना ई एम ई कोर ? कर्म हि धर्म:
  • सेना राजपूताना राजफल ? वीर भोग्या वसुन्धरा
  • सेना मेडिकल कोर ? सर्वे संतु निरामया: ..
  • सेना शिक्षा कोर ? विद्यैव बलम्
  • सेना एयर डिफेन्स ? आकाशस्थ शत्रुन् जहि
  • सेना ग्रेनेडियर रेजिमेन्ट ? सर्वदा शक्तिशालिनः
  • सेना राजपूत बटालियन ? सर्वत्र विजयेम
  • सेना डोगरा रेजिमेन्ट ? कर्तव्यम् अन्वात्मा
  • सेना गढवाल रायफल ? युद्धाय कृतनिश्चयः
  • सेना कुमायू रेजिमेन्ट ? पराक्रमो विजयते
  • सेना महार रेजिमेन्ट ? यशसिद्धि
  • सेना जम्मू काश्मीर रायफल ? प्रस्थ रणवीरता
  • सेना कश्मीर लाइट इंफैन्ट्री ? बलिदानं वीरलक्ष्यम्
  • सेना इंजीनियर रेजिमेन्ट ? सर्वत्र
  • भारतीय तट रक्षक ? वयम् रक्षामः
  • सैन्य विद्यालय ? युद्धं प्रगायय
  • सैन्य अनुसंधान केंद्र ? बलस्य मूलं विज्ञानम्

– – – – – – – – – –

सिलसिला यहीं ख़त्म नहीं होता,

  • नेपाल सरकार ? जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी
  • इंडोनेशिया-जलसेना ? जलेष्वेव जयामहे (इंडोनेशिया) – पञ्चचित
  • कोलंबो विश्वविद्यालय- (श्रीलंका) ? बुद्धि: सर्वत्र भ्राजते
  • मोराटुवा विश्वविद्यालय (श्रीलंका) ? विद्यैव सर्वधनम् पेरादे पञ्चचित
  • पेरादेनिया विश्वविद्यालय ? सर्वस्य लोचनशास्त्रम्

जयतु संस्कृतम् जयतु भारतम् ।

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆‘कोरडा भवताल’ – श्री आनंदहरी ☆ परिचय – श्री रमेश नागेश सावंत

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘कोरडा भवताल’ – श्री आनंदहरी ☆ परिचय – श्री रमेश नागेश सावंत ☆ 

कवितासंग्रह – कोरडा भवताल

लेखक : आनंदहरी 

प्रकाशक : प्रभा प्रकाशन, कणकवली

पृष्ठसंख्या : ८४

कोरडा भवताल —- जगण्याच्या मुळाशी भिडणारी कविता

कवी आनंदहरी यांच्या ‘ कोरडा भवताल’ या नव्या कवितासंग्रहातील कविता भवतालात घडणा-या घटितांवर लक्ष्यवेधी भाष्य करतात. आनंदहरी यांच्या संवेदनशील दृष्टीला जाणवलेले जगण्याचे भान त्यांच्या कवितांतून संयत भाषेत व्यक्त झाले असले तरी या कविता वाचकाच्या संवेदनशील मनाच्या तळाचा ठाव घेणा-या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ.गोविंद काजरेकर यांनी त्यांच्या विश्लेषक प्रस्तावनेत नमूद केले आहे की कवी आनंदहरी समकाळाची स्पंदने टिपण्यात यशस्वी झाले आहेत. आपला भवताल कोरडा असल्याची कवीची जाणीव ही अभावाची आहे आणि त्यामुळे त्यांच्या कवितेतून जगण्यातील अर्थशून्यता निदर्शनास येते. म्हणूनच सामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाचा वेध घेणारी ही कविता वर्तमान काळाचा अवकाश व्यापून टाकणारी आहे. कवी आत्मनिष्ठ कवितेच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच्या कवितेचा सूर सामाजिक निष्ठेकडे वळलेला दिसून येतो. ‘मी साधेच शब्द लिहिले’ या पहिल्याच कवितेत अव्यक्त राहिलेल्या माणसांबद्दल कविला वाटणा-या सहसंवेदनेची ही जाणीव तीव्रतेने प्रकट झाली आहे.

“फक्त लागावा असा लळा

की ज्याला व्यक्त होता येत नाही त्याच्यासाठीच

माझ्या कवितेचे शब्द बोलत राहावेत

आयु्ष्यभर”

समकालीन मराठी कवितेत रुजलेला सामाजिक जाणिवेचा स्वर कवी आनंदहरी यांच्या कवितेतूनही प्रखरतेने उमटतो. ‘दिशा ‘ या कवितेत कविच्या सामाजिक अनुभूतीचे व्यामिश्र रंग उमटले आहेत.

भिरभिरलो दाहीदिशी आणि उतरलो धरेवर

सारा आसमंत कवेत घेऊन

आणखी कुणाच्याही दिशा

हरवून जाऊ नयेत म्हणून

कवीला त्याच्या आसपास दिसणा-या ‘ कोरड्या भवताला’ बद्दल वाटणारी संवेदना ‘आजचा काळ’, ‘वेदनेचे उठत राहतात तरंग’, ‘उपासमार’, ‘वासुदेव’, ‘मला माणूस म्हणू्न जगयाचंय’ या कवितांतून प्रकट झाली आहे. ‘आजचा काळ’ या कवितेतून कवीने सध्याच्या काळात मानवजातीवर घोंघावत असलेल्या असहिष्णुतेच्या वादळावर अतिशय मार्मिक शब्दांत आघात केला आहे.

वादळ कधीच करत नाही भेद

पाहत नाही रंग झाडापेडांचा, घरादाराचा आणि माणसांचाही

आजचा काळ असाच तर आहे असहिष्णुतेचा !

कोणत्याही कवीला शब्दांचा, प्रतिमांचा आणि प्रतिकांच प्रचंड सोस असतो. परंतु अल्प शब्दांत नेमक्या प्रतिमा वापरून आशयघन कवितेचे बिंब तयार करण्याचे कसब कवी आनंदहरी यांना जमले आहे. ‘ उपासमार ‘ या कवितेतून त्यांच्या काव्यगत प्रतिभेचे प्रत्यंतर येते.

तरीही मी राखलंय बियाणं शब्दांचं

रूजवू पाहतोय मनाच्या शेतात

निदान उद्या तरी डवरतील

शब्दांची कणसं

साध्या आणि सरळ भाषेत व्यक्त होतानाही मोठा आशय मांडणारी ही कविता थेट वाचकांच्या काळजालाच हात घालते. ‘ बांद’ या बोली भाषेत लिहिलेल्या गावरान बाजातल्या कवितेत ग्रामीण जीवनाचे चित्र कवीने आत्मीयतेने साकारले आहे. या कवितेतील ‘ बाप ‘ आणि ‘ आजा ‘ वाचकांना भावूक करून आठवणी चाळवणारा आहे.

आनंदहरी यांच्या कवितेची भाषा जितकी सहज, स्वाभाविक तितकीच त्यांची काव्यशैली देखील चिंतनशील प्रवृत्तीची आहे. त्यांच्या कविता जगण्याच्या मुळाशी भिडणा-या असून कविच्या भावना हळुवार शब्दांतून व्यक्त करतात. ‘ ऊनही आताशा’ या कवितेत एकीकडे निराशा आणि कोरडेपणा यांचे चित्रण करताना कविचा सूर भरपूर आशादायी असल्याचे जाणवते.

आशेची पाखरं

अवचितच झेपावतात आकाशात

आकाश पंखात घेण्यासाठी

रणरणत्या टळटळीत दुपारीही!

‘मला माणूस म्हणून जगायचं आहे’ या कवितेतून समाजातील दांभिक प्रवृत्तींचा वेध घेताना कवीने असामाजिक तत्वांवर शाब्दिक कोरडे ओढले आहेत. कवीचा आंतरिक आक्रोश हा जनमानसाचा प्रातिनिधिक आक्रोश आहे. सांप्रत काळात समाजमनावर पडलेला धर्माचा अतिरेकी प्रभाव आणि धर्माचे बदलते स्वरूप याबाबत कविने ‘ धर्म ‘ या कवितेतून प्रश्न उपस्थित केले आहेत. मुक्त छंदातील अशा सामाजिक भान प्रकट करणा-या कवितांबरोबरच ‘ मन वारकरी झाले’ , ‘ माझ्या देहाचे रे झाड’, ‘जन्म तुझा होता बाई’ , या अष्टाक्षरी कविता तसेच ‘ सुने झाले गाव’, ‘ दाटते मनात भय’, ‘लखलाभ तुम्हाला’ या गजला कविच्या बहुपेडी प्रतिभेची जाणीव करून देतात.

या कवितांतून सामाजिक जाणीव व्यक्त करताना कवीने स्त्रियांच्या व्यथा मांडण्याचे भानही जागृत ठेवले आहे. ‘ उसन्या अवसानाने ‘ आणि ‘ नि:शब्द कविता ‘ या कवितांतून पुरूषी अहंकाराची दासी झालेली आधुनिक स्त्री, ‘ ‘तोड’ या कवितेत दारि्द्यावर घाव घालणारी ग्रामीण स्त्री, आणि ‘ती म्हणाली, ‘ शेवटी तू ही पुरूषच’ , या कवितेतील मुक्तीसाठी आसुसलेली स्त्री, अशा स्त्रियांच्या नानाविध रूपांचे वेधक दर्शन कवी आनंदहरी यांनी घडविले आहे. या कवितासंग्रहातील कवितांचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये पाहता समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात कवी आनंदहरी यांच्या कवितेची योग्य दखल घेतली जाईल ही आशा बळावली आहे.

प्रस्तुति – श्री रमेश नागेश सावंत

मुंबई

संपर्क – 9821262767

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की#57 – दोहे – ☆ डॉ राजकुमार तिवारी “सुमित्र”

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम कालजयी दोहे।)

✍  लेखनी सुमित्र की #57 –  दोहे 

विवश विधाता ने किया, बरबस ही कुछ याद।

अश्रु आंख से निकलकर, बना याद अनुवाद।।

 

अश्रु पीर का मित्र है, जब्त किए  जज्बात।

बिना कहे ही कह रहा, किसकी क्या औकात ।

 

अश्रु – अश्रु में फर्क है, करें मौन संवाद।

आंसू देता साक्ष्य है, झलकें  हर्ष -विषाद ।।

 

तेरा हर आंसू मुझे, कर देता बेचैन।

देख देख कर बेबसी, भर आते हैं नैन।।

 

आंसू मां के नयन के, वत्सलता का रूप।

और एक आंसू रचे,   सिंदूरी  प्रारूप।।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव-गीत # 57 – लो सिमटने लग गईं…. ☆ श्री राघवेंद्र तिवारी

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है एक भावप्रवणअभिनवगीत – “लो सिमटने लग गईं….। )

☆ साप्ताहिक स्तम्भ # 57 ☆।। अभिनव-गीत ।। ☆

☆ लो सिमटने लग गईं…. ☆

बादलों का पलट कर अलबम

निकल आयी गुनगुनी

सी धूप

 

हो उठे रंगीन डैने

पक्षियों के

ज्यों सजग चेहरे हुये आरक्षियों के

 

लौट आयी है पुनः

सेवा- समय पर

पेड़ के, छाया

बना स्तूप

 

लो सिमटने लग गईं

परछाइयाँ

वनस्पतियाँ ले रहीं

अँगड़ाइयाँ

 

राज्य जो छीना

पड़ोसी शत्रु ने

पा गया फिर से

अकिंचन भूप

 

 हो गयीं सम्वाद

करने व्यस्त चिडियाँ

खोल दीं फूलों ने

अपनी चुप पखुड़ियाँ

 

ज्यों कि कालीदास के

अनुपम कथन में

नायिका का दिव्य

सुन्दर रुप

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

10-09-2021

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares