मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- महाबळेश्वरला फॅमिली शिफ्ट करेपर्यंतचा साधारण एक वर्षाचा काळ आम्हा उभयतांच्या दृष्टीने खरंच कसोटी पहाणारा होता. माझ्यापेक्षाही जास्त माझ्या बायकोसाठी. रोजचं कॉलेज, प्रॅक्टिकल्स, अभ्यास या सगळ्याचं श्वास घ्यायलाही फुरसत नसणारं ओझं आणि शिवाय लहान मुलाची जबाबदारी! आमच्या मुलाचा, सलिलचा जन्म झाल्यानंतर तशीच परिस्थिती निर्माण झाली तेव्हा बालसंगोपनाला प्राधान्य देत कर्तव्यभावनेने तिने तिची राष्ट्रीयकृत बँकेतली नोकरी सोडली होती. तिला शैक्षणिक क्षेत्राची आवड होती आणि सलिल थोडा सुटवांगा झाला की त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे तिने ठरवले होते. त्यानुसार यावर्षी तिला सरकारी बीएड कॉलेजमधे ऍडमिशनही मिळाली होती. आणि या पार्श्वभूमीवरची माझी महाबळेश्वरला झालेली बदली! 

या सगळ्याचा आत्ता पुन्हा संदर्भ आला तो तिच्या करिअरला आणि आमच्या संसारालाही विलक्षण कलाटणी देणाऱ्या आणि त्यासाठी माझी महाबळेश्वरला झालेली बदलीच आश्चर्यकारकरित्या निमित्त ठरलेल्या, सुखद असा चमत्कारच वाटावा अशा एका घटनेमुळे)

त्याकाळी इंग्रजी हा मुख्य विषय घेऊन एम. ए. बी एड् झाल्यानंतर कोल्हापूरमधे शाळाच नव्हे तर कॉलेजमधेही सहज जॉब उपलब्ध होऊ शके. पण तिने पुढे काय करायचे याचा विचार त्या क्षणी तरी आमच्या मनात नव्हताच. त्यातच माझी महाबळेश्वरला बदली झाल्यामुळे एप्रिलमध्ये तिची परीक्षा संपताच कोल्हापूर सोडायचे हे गृहितच होते. कौटुंबिक स्वास्थ्य आणि मुलाचे संगोपन यालाच सुदैवाने तिचेही प्राधान्य होतेच. तरीही जिद्दीने एवढे शिकून आणि इच्छा असूनही तिला आवडीचे कांही करता आले नाही तर तिच्याइतकीच माझ्याही मनात रुखरुख रहाणार होतीच. पण ते स्विकारुन पुढे जायचे याशिवाय दुसरा पर्याय होताच कुठे? 

या पार्श्वभूमीवर भोवतालचा मिट्ट काळोख अचानक आलेल्या लख्ख प्रकाशझोताने उजळून निघावा अशी एक अनपेक्षित घटना घडली आणि आरतीच्या करिअरला आणि अर्थातच आमच्या संसाराला ध्यानीमनी नसताना अचानक प्रकाशवाटेकडे नेणारी दिशा मिळाली! हे सगळंच अनपेक्षित नव्हे तर अकल्पितच होतं. त्या क्षणापुरता कां होईना चमत्कार वाटावा असंच!

कोल्हापूर सोडून आम्ही सर्व घरसामान महाबळेश्वरला हलवलं. बी. एड्. चा रिझल्ट लागायला अजून कांही दिवस असूनही महाबळेश्वरला आरतीला हवी तशी एखादी चांगली नोकरी मिळण्याच्या कणभर शक्यतेचा विचार मनात आणणंही एरवी हास्यास्पदच ठरलं असतं, अशा परिस्थितीत महाबळेश्वरच्या घरी आल्यानंतरच्या चारपाच दिवसात लगेचच इंग्रजी विषयाची शिक्षिका म्हणून महाबळेश्वरच्या सरकारमान्य माध्यमिक शाळेत आरती कायमस्वरुपी रुजूही झाली!!

हा आमच्यासाठी अनपेक्षित असा सुखद धक्काच होता! यामागचा कार्यकारणभाव समजून घेतला तर ही घटनाच नव्हे तर त्या घटीतामागचं परमेश्वरी नियोजन त्याक्षणापुरतं तरी चमत्कारच वाटत राहिलं. ‘देता घेशील किती दोन कराने’ या शब्दांमधे लपलेल्या चमत्कृतीची ती प्रचिती खरंच थक्क व्हावं अशीच होती!

महाबळेश्वरस्थित ‘गिरिस्थान हायस्कूल’ आणि ‘माखरिया हायस्कूल’ या दोन्ही माध्यमिक शाळांकडून आरतीसाठी इंग्रजी शिक्षक म्हणून नवीन नोकरीच्या संधीची दारं अनपेक्षितपणे उघडली जाणं हेच मला अविश्वसनीय वाटलं होतं. बी एड् चा निकालही लागलेला नसताना, आरतीने अर्ज करणं सोडाच तिथे अशी एखादी व्हेकन्सी असल्याची पुसटशीही कल्पना नसतानाही या शाळांकडून परस्पर असाकांही प्रस्ताव येणं हे एरवीही कल्पनेच्या पलीकडचंच होतं.

या दोन्ही शाळांची मुख्य खाती स्टेट बँकेत असल्याने माझा बँक-मॅनेजर म्हणूनही त्या शाळांशी त्या अल्पकाळात ओझरताही संपर्क आलेला नव्हता. दोन्ही शाळांमधे बी. ए बी. एड् इंग्रजी शिक्षकाची एकेक जागा व्हेकेट होती आणि त्यासाठी दिलेल्या जाहिरातींना नवीन शालेय वर्ष सुरू व्हायची वेळ येऊनही कांहीच प्रतिसाद आलेला नव्हता. गिरिस्थान हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी त्यांना मिळालेल्या माहितीची शहानिशा करुन आमच्याशी संपर्क साधला आणि नोकरीसाठी लगेच अर्ज करायला सांगितलं. ही चर्चा सुरू असतानाच त्यांनी ‘व्हेकन्सी बी. ए बी. एड्’ ची असल्याने त्या एम. ए. बी एड असल्या तरी स्केल मात्र मी बी. ए. बी. एड्चंच मिळेल याची पूर्वकल्पनाही दिली. अर्थात आमच्या दृष्टीने त्याक्षणी तरी तो महत्त्वाचा मुद्दा नव्हताच. आश्चर्य म्हणजे तिथे अर्ज करण्यापूर्वीच ‘माखरिया हायस्कूल’चे मुख्याध्यापक श्री. तोडकरसर यांनी आमच्याशी त्वरीत संपर्क साधून ‘एम. ए बी. एड्’ चं स्केल द्यायची तयारी दाखवली व तसा अर्जही घेतला आणि दुसऱ्या दिवसापासूनच नोकरीवर हजर व्हायची विनंती केली. अर्थात बी. एड्चा रिझल्ट लागेपर्यंत मस्टरवर सही न करता मुलांना त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मोफत शिकवण्याची त्यांची विनंती होती!

त्यांचं एकंदर मोकळं, प्रामाणिक, स्पष्ट न् आत्मविश्वासपूर्ण बोलणं आणि स्थानिक जनमानसात त्यांना असलेला आदर याचा विचार करून आम्ही त्यांचा प्रस्ताव मनापासून स्वीकारला आणि महाबळेश्वरला आल्यानंतर लगेचच आरतीचं माझ्याइतकंच बिझी शेड्यूल सुरुही झालं!

या सगळ्याच घडामोडींना स्वतः साक्षी असूनही मला हे सगळं स्वप्नवतच वाटत राहिलं होतं! 

पुढे पंधरा दिवसांनी जेव्हा बी. एड्चा रिझल्ट आला तेव्हा फर्स्ट-क्लास मिळाल्याच्या आनंदापेक्षाही इतक्या अकल्पितपणे शैक्षणिक क्षेत्रात कायमस्वरुपी कार्यरत रहायला मिळणार असल्याचा आनंद आरतीसाठी खूप मोठ्ठा होता!!

महाबळेश्वरला बदली झाल्याची आॅर्डर माझ्या हातात आली होती तो दिवस आणि मनाला कृतार्थतेचा स्पर्श झालेला हा दिवस या दोन दिवसांदरम्यानचा प्रत्येक क्षण न् क्षण पुन्हा जिवंत झाला माझ्या मनात! त्या त्या वेळचे कसोटी पहाणारे क्षण, वेळोवेळी तात्पुरता फायदा पाहून किंवा नाईलाजाने नव्हे तर अंत:प्रेरणेने आम्ही घेतलेले निर्णय, क्षणकाळापुरती कां असेना पण अनेकदा अनिश्चिततेपोटी मनात निर्माण झालेली अस्वस्थता,.. आणि नंतर ‘त्या’चा विचार मनात येताच मन भरुन राहिलेली निश्चिंतता सग्गळं सग्गळं याक्षणी मनात जिवंत झालं पुन्हा. या सगळ्याच घटीतांच्या रुपात प्रत्येकवेळी ‘मी आहे’ हा ‘तो’ देत असलेला दिलासा मला आश्वस्त करीत होता..!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #246 – लघुकथा – अनूठी बोहनी… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा अनूठी बोहनी” ।)

☆ तन्मय साहित्य  #246 ☆

☆ लघुकथा – अनूठी बोहनी… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

साँझ होने को आई किन्तु आज एक पैसे की बोहनी तक नहीं हुई रामदीन की।

बाँस एवं उसकी खपच्चियों से बने फर्मे के टंग्गन में गुब्बारे, बाँसुरियाँ, और फिरकी, चश्मे आदि करीने से टाँग कर वह रोज सबेरे घर से निकल पड़ता है।

गली, बाजार, चौराहे व घरों के सामने कभी बाँसुरी बजाते, कभी फिरकी घुमाते और कभी फुग्गों को हथेली से रगड़ कर आवाज निकालते ग्राहकों/ बच्चों का ध्यान अपनी ऒर आकर्षित करता है रामदीन बच्चों के साथ छुट्टे पैसों की समस्या के हल के लिए वह अपनी  बाईं जेब में घर से निकलते समय ही कुछ चिल्लर रख लेता है। दाहिनी जेब आज की बिक्री के पैसों के लिए खाली होती।

आज कोई बिक्री न होने से खिन्न मन  रामदीन अँधेरा होने से पहले घर लौटते हुए रास्ते में एक पुलिया पर कुछ देर थकान मिटाने के लिए बैठकर बीड़ी पीने लगा। उसी समय सिर पर एक तसले में कुछ जलाऊ उपले और लकड़ी के टुकड़े रखे मजदुर सी दिखने वाली एक महिला एक हाथ से ऊँगली पकड़े एक बच्चे को लेकर उसी पुलिया पर सुस्ताने लगी।

गुब्बारों पर नज़र पड़ते ही वह बच्चा अपनी माँ से उन्हें दिलाने की जिद करने लगा। दो-चार बार समझाने के बाद भी बालक मचलने लगा, तो उसके गाल पर एक चपत लगाते हुए उसे डाँटने लगा दी कि,

“दिन भर मजूरी करने के बाद जरा सी गलती पर ठेकेदार ने आज पूरे दिन के पैसे हजम कर लिए और तुझे फुग्गों की पड़ी है।” बच्चा रोने लगता है।

पुलिया के एक कोने पर बैठे रामदीन का इन माँ-बेटे पर ध्यान जाना स्वाभाविक ही था।

वह उठा और रोते हुए बच्चे के पास गया। एक गुब्बारा, एक बाँसुरी और एक फिरकी उसके हाथों में दे कर सर पर हाथ रख उसे चुप कराया। फिर अपनी बाईं जेब में हाथ डालकर  उसमें से इन तीनों की कीमत के पैसे निकाले और अपनी दाहिनी जेब में रख लिए।

अचानक हुई इस अनूठी और सुखद बोहनी से प्रसन्न मन मुस्कुराते हुए रामदीन घर की ओर चल दिया।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 70 ☆ मन बावरा… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “तुमसे हारी हर चतुराई…” ।

✍ जय प्रकाश के नवगीत # 70 ☆ मन बावरा… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

बाँसुरी पर किसी ने

अधर रख दिए

भोर का मन खिला

बावरा हो गया।

*

देह गोकुल हुई

साँस का वृंदावन

फिर महकने लगा

गंध राधा का मन

*

रास रचती रहीँ

कामना गोपियाँ

सारा मधुवन छवि

साँवरा हो गया।

 * 

तट तनुजा के

हैं खिलखिलाने लगे

वृक्ष सारे ही

जल में नहाने लगे

*

चोंच भर ले

उजाले की पहली किरन

बृज का आँगन

पावन धरा हो गया।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # 74 ☆ शराफ़त का उतारो तुम न जेवर… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भावप्रवण विचारणीय रचना “शराफ़त का उतारो तुम न जेवर...“)

☆ साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # 74 ☆

✍ शराफ़त का उतारो तुम न जेवर... ☆ श्री अरुण कुमार दुबे 

हमेशा तौलिए हर बात लोगो

करे दिल पर बड़ा आघात लोगो

 *

नदी तालाब दरिया और सागर

सभी कतरे की है सौगात लोगो

 *

ख़ुशी खाँसी खुनस मदिरा मुहब्बत

छुपा सकते नहीं ज़ज़्बात लोगो

 *

बचा सकते हैं तन मन बारिशों से

भिगो दे आँखों की है बरसात लोगो

 *

शराफ़त का उतारो तुम न जेवर

कोई दिखलाय जब औकात लोगो

 *

सबेरे पर यकीं रखिये वो होगा

नहीं रहना है गम की रात लोगो

 *

न इनका दीन औ ईमान कोई

नहीं हैवान की है जात लोगो

 *

यकीं है जीत पर मुझको मिलेगी

हुई शह है नहीं ये मात लोगो

 *

अरुण आनंद लेता इनको गाकर

भजन प्रेयर या होवें नात लोगो

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

सिरThanks मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – व्यंग्य ☆ शेष कुशल # 45 ☆ व्यंग्य – “स्मृति शेष : पत्रकारिता का यूँ गुजर जाना…” ☆ श्री शांतिलाल जैन ☆

श्री शांतिलाल जैन

(आदरणीय अग्रज एवं वरिष्ठ व्यंग्यकार श्री शांतिलाल जैन जी विगत दो  दशक से भी अधिक समय से व्यंग्य विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी पुस्तक  ‘न जाना इस देश’ को साहित्य अकादमी के राजेंद्र अनुरागी पुरस्कार से नवाजा गया है। इसके अतिरिक्त आप कई ख्यातिनाम पुरस्कारों से अलंकृत किए गए हैं। इनमें हरिकृष्ण तेलंग स्मृति सम्मान एवं डॉ ज्ञान चतुर्वेदी पुरस्कार प्रमुख हैं। श्री शांतिलाल जैन जी  के  स्थायी स्तम्भ – शेष कुशल  में आज प्रस्तुत है उनका एक अप्रतिम और विचारणीय व्यंग्य  स्मृति शेष : पत्रकारिता का यूँ गुजर जाना…” ।)

☆ शेष कुशल # 45 ☆

☆ व्यंग्य – “स्मृति शेष : पत्रकारिता का यूँ गुजर जाना…” – शांतिलाल जैन 

दुःखी मन से स्मृति शेष लिखने बैठा हूँ. पत्रकारिता के अवसान की घटना सामान्य नहीं है. अभी समाज को उसकी जरूरत थी, दुःखद है कि वह अब हमारे बीच नहीं रही.

यूँ तो आर्यावर्त में लगभग दो सौ साल का जीवन जिया था उसने लेकिन उसके असमय चले जाने से जो स्थान रिक्त हुआ है उसकी क्षतिपूर्ति कर पाना मुश्किल है. हालाँकि कुछ सिरफिरे और जिद्दी पत्रकार टाईप लोग यू ट्यूब और इन्टरनेट पर उसकी याद को जिलाए रखने की कोशिश कर रहे हैं मगर वे इन्फ्लुएंस नहीं कर पा रहे. और जो इन्फ्लुएंसर हैं उन्होंने उसका पुनर्जन्म नहीं होने देने की सुपारी ले रखी है. उसने आर्यावर्त में, कलकत्ता में, 1826 में जन्म लिया मगर दम तोड़ा नई दिल्ली के बहादुरशाह ज़फर मार्ग की प्रेसों में, मंडी हाउसों में, नॉएडा के स्टूडियोज़ में.

बीमार थी. दो तीन दशकों से. पिछले एक दशक में कुछ ज्यादा सीरियस हो गई थी. डॉक्टरों ने जवाब दे दिया था. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स की पैथ लैब से जाँच करवाई. रिपोर्ट में फ्रीडम का लेवल 180 आया. ये जानलेवा मानक से काफी ऊपर था और बढ़ता ही जा रहा था. फॉरेन तक के डॉक्टरों ने जवाब दे दिया. पेशेंट के तौर पर वह बिलकुल कोऑपरेट नहीं कर रही थी. टॉक्सिक्स अन्दर ही अन्दर बढ़ते जा रहे थे. निज़ाम ने ईलाज के जो इंतज़ामात किए उससे दाल और पतली होती चली गई. समझ में नहीं आया कि निज़ाम तबीयत ठीक करने में लगा है कि बिगाड़ने में.

बहरहाल, सिम्पटम्स तो बहुत समय पहले से उभरने लगे थे. पाठकों की अखबारों में, समाचार चैनलों में घटती रूचि, छीजता भरोसा, समाचारों की शक्ल में परोसे गए विज्ञापन, खरीदे गए न्यूज स्पेस के गोल गोल लाल चकते पूरे शरीर पर उभर आए थे. लग रहा था कि अब ये बचेगी नहीं. शरीर अलग पीला पड़ता जा रहा था. यलो जर्नालिज्म डायग्नोस हुआ. दुलीचंद बैद से चूने के पानी में संपादकों के हाथ धुलवाए, संवाददाताओं को सलीम मियाँ से झड़वाया, फोटो जर्नलिस्ट को तेजाजी महाराज की पाँच जात्रा करवाई, मगर कोई फायदा नहीं हुआ. हेपेटाईटिस वायरस के पॉलिटिकल वेरियंट ने उसका लीवर इतना खराब कर दिया था कि होम्योपैथी, आयुर्वेदिक, यूनानी कोई पैथी काम नहीं आई. एडिटर्स गिल्ड के मंदिर में ले गए, मन्नत मानी, न्यूज ब्रॉडकास्टर एंड डिजिटल एसोसिएशन के दरबार में ले गए वहाँ भी कृपा नहीं बरसी. कोई मंदिर, ओटला, मज़ार, बाबाजी का दरबार नहीं छोड़ा जहाँ ले नहीं गए. बिगड़ती सेहत का असर उसके दिमाग पर भी आ गया था. फिर उसे हिस्टीरिया के दौरे पड़ने लगे. रात नौ बजते ही वो जोर जोर से चिल्लाने लगती. प्राईम टाईम में बेसिरपैर के सवाल पूछती, आधे सच्चे आधे झूठे फेक्ट्स रखने लगती. कभी कभी पैनलिस्टों से गाली गलौच पर उतर आती. लोगों का मानना था कि उस पर निज़ाम की प्रेत-छाया है. किसी ने बताया प्रेस परिषद् के ओटले पे ले जाओ. बाबाजी कोड़े मार कर ऊपरी हवा का ईलाज करते हैं. ले गए साहब, वहाँ भी कुछ नहीं हुआ. प्रेस परिषद् के पास कोड़ा था ही नहीं, ‘कंडेम’ करने का परचा लिख कर उनने घर भेज दिया.

एक बार उसको दिमाग के डॉक्टर को भी दिखाया. मनोचिकित्सक. उसने बताया कि वो डर गई है. जब निज़ाम ने कुछ को अन्दर किया, कुछ के विज्ञापन रोक दिए, कुछ के मोबाइल, लैपटॉप जब्त किए तो किसी किसी को जहन्नुम का रास्ता दिखाया तब फियर सायकोसिस का शिकार हो गई. इस कदर कि उसने ‘फेक्ट’ और ‘फेक’ में अपने विवेक का इस्तेमाल करना छोड़ दिया, पॉवरफुल का ‘फेक’ भी ‘फेक्ट’नुमा आने लगा और पॉवरलेस का ‘फेक्ट’ भी ‘फेक’ की शक्ल में.  मुझे याद है एक बार आईसीयू में थोड़ा सा एकांत पाकर उसने कहा था कि वह ईमानदार काम करना चाहती है मगर कर नहीं पा रही. थोड़ी ईमानदार कोशिश की, ‘गोंजो पत्रकारिता’ करने से इंकार कर दिया तो उसे हैक, प्रेस्टीट्यूट और न जाने क्या क्या कहा गया. बड़ा सदमा तब लगा जब उसे कंटेंट राइटर, कंटेंट मैनेजर कहा गया. शायद यही उसके डीप-डिप्रेशन में जाने की वजह रही होगी.

जितने मुँह उतनी बातें साहब. कोई कोई कहते कि रोज़मर्रा की खुराक की जिम्मेदारी बदलने से उसकी सेहत बिगड़ी. कभी उसे खाना-खुराक स्वतंत्र मिडिया हाऊस दिया करते थे, फिर यह जिम्मा कार्पोरेट्स से होते हुए कांग्लोमरेट्स तक आ गया. उसके बाद से उसकी सेहत तेज़ी से बिगड़ी. खाना-खुराक में कमी और प्रॉफिट लाने के दबाव में वह बीमार होती चली गई. गांधी, अंबेडकर, नेहरू के शुरू किए गए अखबारों से मिला खून कब का पानी हो चुका था. गणेश शंकर विद्यार्थी से लेकर राजेंद्र माथुर, प्रभाष जोशी तक बहुत कुछ ठीक चला. कष्ट तो उसने जीवनभर सहे मगर दम नहीं तोड़ा था. इमरजेंसी में मौत के मुँह में जाकर वापस आ गई. लेकिन इस बार बीमार पड़ी तो ऐसी कि संभली ही नहीं. एक समय वह इतनी तंदुरुस्त, हौंसलामंद और साहसी थी कि अकबर इलाहाबादी के बोल ने नारे की शक्ल अख्तियार कर ली – ‘जब तोप हो मुकबिल तो अख़बार निकालो.’ बीते दिनों दुर्बलता इतनी आ गई थी कि मामूली से नेता-प्रवक्ता ‘टॉय-गन’ की आवाज़ से डरा लेते. एक दो बार उसने पीठ में दर्द की शिकायत की तो आकाओं ने उसकी रीढ़ की हड्डी ही निकलवा दी. दरबार में रेंग-रेंग कर चलते चलते उसकी ठुड्डी, कोहनी, घुटनों, पर घाव पड़ गए थे, उसमें पेड-न्यूज का मवाद रिसने लगा था. एक बार वो रेंगने की मुद्रा में आई तो फिर खड़ी कभी नहीं हो पाई.

अन्दर की बात तो ये साहब कि उसको नशे लत लग गई थी. प्रॉफिट के नशे में रहने के लिए उसने टीआरपी नाम का ड्रग लेना शुरू कर दिया था. एडिक्ट हो गई थी. वो चौबीस घंटे टीआरपी की तलाश में रहती. थोड़ा भी नशा उतरा कि फिर जोर जोर से चिल्लाने लगती, वायलेंट हो जाती, हाथ पैर मारने लगती, पुड़िया खरीदने के लिए नैतिक अनैतिक कुछ नहीं देखती. नशा खरीदने के लिए उसने अपनी कलम तक गिरवी रख दी. पैथोलॉजिस्ट ने कहा कि टीआरपी के नशे की लत से उसका मस्तिष्क गल गया है. तो मरना तो था ही. मल्टीपल ऑर्गन फेल्योर हो चुकने के बाद भारी मन से उसे मृत घोषित करना पड़ा.

उसके अवसान की वजह एक रही हो या एक से ज्यादा, सच तो यह है कि वह अब हमारे बीच नहीं हैं. दो शताब्दी पूर्व आर्यावर्त के नभ पर जिस ‘उदंत मार्तण्ड’ का उदय हुआ था वह अब अस्त हो गया है. हमारी सेहत का दारोमदार उसके स्वास्थ्य पर टिका था. पता नहीं लोकतान्त्रिक समाज के तौर पर उसके बिना हम स्वस्थ कैसे रह पाएँगे? उसे विनम्र श्रद्धांजलि.

-x-x-x-

© शांतिलाल जैन 

बी-8/12, महानंदा नगर, उज्जैन (म.प्र.) – 456010

9425019837 (M)

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – 39 – जीवन की चक्की…  ☆ श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’ ☆

श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’

(ई-अभिव्यक्ति में श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’ जी का स्वागत। पूर्व शिक्षिका – नेवी चिल्ड्रन स्कूल। वर्तमान में स्वतंत्र लेखन। विधा –  गीत,कविता, लघु कथाएं, कहानी,  संस्मरण,  आलेख, संवाद, नाटक, निबंध आदि। भाषा ज्ञान – हिंदी,अंग्रेजी, संस्कृत। साहित्यिक सेवा हेतु। कई प्रादेशिक एवं राष्ट्रीय स्तर की साहित्यिक एवं सामाजिक संस्थाओं द्वारा अलंकृत / सम्मानित। ई-पत्रिका/ साझा संकलन/विभिन्न अखबारों /पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। पुस्तक – (1)उमा की काव्यांजली (काव्य संग्रह) (2) उड़ान (लघुकथा संग्रह), आहुति (ई पत्रिका)। शहर समता अखबार प्रयागराज की महिला विचार मंच की मध्य प्रदेश अध्यक्ष। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा – जीवन की चक्की।)

☆ लघुकथा # 39 – जीवन की चक्की श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’

विद्या बहुत ही चंचल और खुशमिजाज लड़की थी छोटी सी उम्र में ही उसकी शादी हो गई थी उसने बस 12वीं तक की ही पढ़ाई की थी सास ससुर की सेवा करना बच्चे और पति का ध्यान देना।

बस उसकी यही दुनिया थी।

कल अचानक उसके भाई भाभी का फोन आया ।

सावन में तो दीदी घर आ जाओ । (पति) अशोक ने मना कर दिया, कहाॅं जाओगी? तुम्हारा घर एक तो गली में है और कोई जाओ तो ध्यान ही नहीं देता?

विद्या ने रोते हुए कहा – मेरी माॅं भाभी तो इसी शहर में रहती है, एक घंटे को भी नहीं जा सकती?

अशोक ने कहा जाओ बच्चों को मत ले जाना शाम को जल्दी घर आ जाना देर बिलकुल मत करना।

अपने मायके में भाभी की इज्जत देखकर उसे लगा की भाभी बैंक में नौकरी करती हैं इसीलिए मां और भाई मान और इज्जत देते …।

नौकर भी है उसे एक काम नहीं करना पड़ता।

काश! मैंने पढ़ाई कर ली होती और मैं नौकरी करती तो आज मेरे घर में भी मेरी इज्जत होती। बार-बार मुझे अपमानित नहीं होना पड़ता, न ही सबके ताने सुनने पड़ते कि –  तुम रसोई के लिए बनी हो।

मन में विचार ही कर रही थी विद्या तभी भाभी आ गई।

अरे! दीदी आज आप आ रहे हो इसलिए मैंन ऑफिस से जल्दी छुट्टी लेकर आ गई।

मैं आपके और जीजा जी के लिए कपड़े भी लाई हूं अब दो-तीन दिन आप रूकना और आज शाम को जीजा जी को बुला लो। वह अभी ऑफिस में होंगे इसलिए मैंने फोन नहीं किया बच्चे भी आप यहीं पर बुला लो उनके अकाउंट में मैं पैसे डाल दूंगी कपड़े खरीदने के लिए वह अपने मन से खरीदारी कर लेंगे।

क्या आपका मन अपने लिए कुछ नहीं होता? चलो! मैं आपको तैयार करती हूं और मैं आपका कुछ नहीं सुनुंगी।

आपको खाना खाकर ही जाना पड़ेगा ऐसा नहीं चलेगा।

आप तो एकदम ईद के चांद की तरह कभी-कभी तो आती हैं? कुछ दिन आराम से रहो?

हां भाभी आना तो मैं भी चाहती हूं लेकिन काम की व्यस्तता के कारण बच्चों की पढ़ाई के कारण मेरा आना नहीं हो पता है। नहीं तो जिसकी आप जैसी भाभी हो वहां कौन नहीं आना चाहेगा?

जीवन की चक्की में पिस रही हूँ।

****

© श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’

जबलपुर, मध्य प्रदेश मो. 7000072079

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 244 ☆ गजानन… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 244 ?

☆ गजानन☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

बनविले खास

सुंदर मखर

बसविले त्यात

गजानन ॥

*

केली पूजाअर्चा

आर्पिली जास्वंद

झाले आनंदीत

गजानन ॥

*

दुर्वा हरळीची

केवडा पाहून

 गेले की मोहून

 गजानन ॥

*

मोदक सुबक

खीर तांदळाची

तृप्त की जहाले

गजानन ॥

*

खिरापत रोज

आवडेच भारी

लाडू पेढे खाती

गजानन ॥

*

आरती म्हणता

दिन-रात आम्ही

झाले की प्रसन्न

गजानन ॥

*

दहा दिवसाचे

असती पाहुणे

दरवर्षी येती

गजानन ॥

☆  

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक – अष्टदीप 

लेखक – श्री. विश्वास देशपांडे,

प्रथम आवृत्ती – जुलै २०२२

एकूण पृष्ठ 300

प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे

या पुस्तकात आठ प्रेरणादायी भारतरत्नांच्या व्यक्तिमत्वाचा वेध लेखकाने घेतला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री प्रथमेश नाझरकर यांनी केले आहे ते अत्यंत समर्पक व आकर्षक आहे. ते बघितल्यावर लहानपणीचे थोरांची ओळख व लहान पुस्तकांची चरित्रमाला आठवते. पण या पुस्तकात अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल माहिती समजते. लेखकाची भाषाशैली सोपी, सरळ, सुटसुटीत व ओघवती आणि आबालवृद्ध सर्वांना आकलनास अत्यंत सोपी आहे. ती वाचकांना आपलेसे करणारी आहे. वाचक त्यात रंगून जातात.

 

श्री विश्वास विष्णु देशपांडे

पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत आठ भारतरत्नांची नावे त्यांच्या व्यक्तिमत्वातील वैशिष्ठयांसह दिसतात.

त्या नंतर आपण लेखकाचे मनोगत वाचू शकतो. खरे तर बरेचदा मनोगत, प्रस्तावना वाचले जात नाही. परंतु मनोगताची सुरुवात ” आपला भारत देश म्हणजे नररत्नांची खाण आहे “. हे वाक्य पुढचे मनोगत वाचण्याची उत्सुकता वाढवते. हे मनोगत काही संस्कार देते व लेखकाच्या वाचन, लेखन याचा प्रेरणास्त्रोत सांगते.

अष्ट म्हणजे आठ. या आठ महान व्यक्तिंनी दिव्याप्रमाणे उजळून, वाती प्रमाणे जळून निस्वार्थीपणे भारताला उजळून प्रकाशमान करून टाकले. लेखकाच्या भाषेत सांगायचे तर, ‘या सर्वांना आपल्या आयुष्यात अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली नैतिक मूल्ये ढळू दिली नाहीत. किंवा ते निराश झाले नाहीत’. हे वर्णन करताना पुढील समर्पक काव्यपंक्ती योजल्या आहेत. “आली जरी कष्टदशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर। त्यामुळे हे मनोगत वास्तव व रंजक झाले आहे.

हे पुस्तक म्हणजे फक्त जन्म, मृत्यू व त्रोटक कार्य सांगणारे साधारण चरित्र किंवा निबंध नाही. तर आठ भारतरत्नांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यात आपले विचार जोडून व्यक्तिंकडून वाचकांनी काय घ्यावे, त्यांचे आदर्श कसे रूजवावेत हे सगळे सहज सांगावे अशा ओघवत्या शैलीत सुचवले आहे. लेखकाची शब्द क्षमता, लेखणी सामर्थ बघून ते ‘सिद्धहस्त’ लेखक अहेत हे जाणवते. या आठ भारत रत्नांना जी अर्थपूर्ण विशेषणे वापरली आहेत त्यातून हे लक्षात येते.

मनोगता नंतर ‘प्रेरणादायी व संस्कारक्षम पुस्तक’ हे पुस्तकाविषयी विशेष माहिती देणारे श्री. लक्ष्मीकांत देशमुख, लेखक व माजी संमेलनाध्यक्ष यांचे विचार वाचायला मिळतात. त्यांचे मनोगत अतिशय वाचनीय व पुस्तकाचे यथार्थ महत्व विशद करणारे आहे.

या नंतर आपल्या समोर अतिशय महत्वाची माहिती सांगणारा लेख येतो. तो म्हणजे ‘ भारतरत्न पुरस्काराविषयी थोडेसे. ‘ हे सगळे लेख मुख्य पुस्तक वाचण्याची प्रेरणा देतात. व उत्सुकता वाढवतात. यात प्रत्येक व्यक्तिचे नाव त्यांच्या मुख्य वैशिष्ठयासह वाचायला मिळते. प्रथम आपल्या भेटीला येतात – निश्चयाचा महामेरु महर्षी धोंडो केशव कर्वे.

लेखाचे नाव वाचताच लक्षात येते, अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अचल निश्चय असणारे व ठाम ध्येय ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व. त्यांनी विधवांचे पुनरुत्थान करून व स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना जगात वेगळेच स्थान मिळवून दिले आहे. या काळात समाजाचा झंझावातरूपी विरोध सहन करून हे कार्य करणे, या साठी ठाम निश्चयाचा अचल महामेरूच पाहिजे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत सुरु झालेली छोटी संस्था आज मोठ्या वटवृक्षात रुपांतरीत होऊन अनेक महिलांना सक्षम बनवून त्यांना समाजात ठामपणे उभे करत आहे. त्यांचे हे कार्य लेखकाने इतके प्रभावीपणे मांडले आहे, की त्या काळातील परिस्थतीची वास्तवता लक्षात येते आणि आपण नतमस्तक होतो.

या नंतर बालपणीच देशाचा विचार करणारे, हित जपणारे द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरैया यांचे चरित्र समोर येते. यांना लहानपणी मामाकडे राहून शिक्षण पूर्ण करावे लागले. पण हुशारीच्या आड कोणत्याही गोष्टी येत नाहीत. याच बालवयात धबधबा बघताना त्यांची प्रतिक्रिया इतर मुलांप्रमाणे नव्हती. तर या द्रष्ट्या बालकाच्या मनात असा विचार होता, “केवढा हा पाण्याचा व शक्तीचा अपव्यय, याचा काही उपयोग नाही का करता येणार? मोठा झाल्यावर मी नक्कीच काहीतरी करणार, ” आणि हाच विचार त्यांनी मोठेपणी अंमलात आणला. व आपल्या कार्य कर्तृत्वाने पाणी, बंधारे, कालवे यावर प्रयोग व संशोधन केले. जे आजही आपल्याला उपयोगी पडत आहेत. आणि त्यांना काही पर्याय नाहीत. त्यांची शिस्त, वक्तशीरपणा विविध कार्य, त्यांच्या काही इमारती, वृंदावन गार्डन या विषयी अत्यंत आदरपूर्वक लिहीले आहे.

पुढे आपण भेटतो, ते भारत एकसंध करण्याच्या कामी अत्यंत मोलाची कामगिरी करणारे- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना. यांच्या कार्याचा व लोहपुरुष या विशेषणाचा अत्यंत सखोल अभ्यास करून कार्यपट समोर ठेवला आहे. ५६५ संस्थाने किती प्रयत्न पूर्वक आपल्या बुध्दिमत्तेने एका छताखाली आणली व त्या साठी काय काय करावे लागले, याचे अगदी बारकाईने वर्णन वाचायला मिळते. म्हणूनच ते भारताचे ‘लोहपुरूष’ या नावाने ओळखले जातात. भारताची एकता व अखंडता या साठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. हे सगळे वाचताना या लोहपुरुषाचे प्रयत्न, विचार यांचे समग्र दर्शन घडते. व हे व्यक्तिमत्व नसते तर काय घडले असते या विचाराने आपला थरकाप उडतो. हे सगळे वाचताना आपण किचकट इतिहास वाचत आहोत असे कुठेही वाटत नाही. यातच लेखकाच्या लेखणीचे व अवघड विषय सोपा करून सांगण्याचे कसब लक्षात येते.

द्रष्टा उद्‌योगपती जे आर डी टाटा यांचे वर्णन करताना लेखक ‘ ओबड धोबड दगडातून मूर्ती घडवणारा शिल्पकार, हिऱ्याला पैलू पाडणारा जवाहिर ‘ असे शब्द वापरतात. भारतात साखरेप्रमाणे विरघळून जाणे इथपासून टाटांचे खरे देशप्रेम व कार्य याची माहिती मिळते. यांचे चरित्र म्हणजे रत्नांची खाणच! असे वर्णन लेखक करतात. द्रष्टा उद्योगपती आपल्याला सोदाहरण वाचायला मिळतो. त्याच बरोबर सच्चा देशभक्त, गुणी माणसांची कदर, पारख असणारा, अनेक उद्‌योगांची टाटा समूहात भर घालणारा, माणसांचे गुण हेरुन त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारा माणूस हळवा व कुटुंबवत्सल होता हे या लेखातून समजते.

यानंतर आपण भेटतो अशा व्यक्तिला, ज्यांची घोषणा लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत, ती म्हणजे ‘जय जवान जय किसान ‘ ते म्हणजे निर्मळ चारित्र्याचे धनी (साधी रहाणी, उच्च विचार सरणी असलेला नेता) लाल बहादूर शास्त्री. यांचे जीवन समजणे व समजून घेणे आणि अंमलात आणणे सगळ्याच गोष्टी अवघड आहेत. परंतू लेखकाने अत्यंत सोप्या नेमक्या व नेटक्या शब्दात सांगीतले आहे. १९४२ ची चळवळ त्यांचा तुरुंगवास, घरची साधी रहाणी, चीनचा विश्वासघात, भारत नेपाळ संबंधात फूट, हजरतबल प्रकरण, रेल्वे अपघात असे अनेक कसोटीचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले. पण या सर्वांना समर्थपणे तोंड कसे दिले. व त्यातून त्यांच्या निश्चयी स्वभावाची व उच्च कर्तृत्वाची ओळख अतिशय आदर व कौतुकाने करून दिली आहे.

अजातशत्रू नेता अटलबिहारी वाजपेयी अगदी उचित ‘विशेषण योजून या भारतरत्नाची ओळख करुन दिली आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्याच कवितेच्या ओळींमधून सांगीतल्या आहेत. ‘यमुना तट, टीले रेतीले, माँ के मुँह में रामायण के दोहे – चौपाई रस घोले।’

त्यांचे ग्वाल्हेरचे शिक्षण या पासून ते त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेत त्यांच्या घरी जाऊन दिलेल्या सर्वोच्च पुरस्कारा पर्यंत लेखक आपल्याला प्रवास घडवतात. हे सगळे लेखकाच्या अनोख्या शैलीत पुस्तकात वाचणे अधिक योग्य ठरेल.

या नंतर आपल्या समोर येते गान कोकीळा, भारताची शान आनंदघन लता मंगेशकर सर्वच भारतीयांना जिचा अभिमान आहे. जिच्या सुरांनी सर्वावर मोहीनी घातली आहे. जगभरात हा सूर निनादतो. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी ऐकू येतो आणि जवळीक साधतो असा सूरी जणू या हारातील ‘तन्मणी! या स्वरलतेचे बालपणी पासूनचे टिपलेले सुंदर बारकावे व त्यातून घडलेले संस्कार खूपच वाचनीय आहेत. लता नामक महावटवृक्षाचा एकंदर जीवन प्रवास मांडणे म्हणजे ‘शिवधनुष्य पेलणे आहे. पण लेखकाने ते आपल्या लेखणीने समर्थपणे पेलले आहे. त्यांची सांगीतीक कारकिर्द अतिशय सुंदर व मनोवेधक पध्दतीने उलगडून दाखवली आहे. सर्व बारकावे वाचताना लेखक दर्दी व संगीतप्रेमी आहे, हे लक्षात येते. सदर पुस्तकातील जास्त पाने ‘लतागान’ गुणगुणत आहेत असे जाणवते. तिच्या गाण्याचे रसग्रहण करताना ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ…. ‘ या अभंगाचा आधार घेऊन लता नामक स्वरकमलाकडे रसिक श्रोते भ्रमराप्रमाणे कसे आकर्षित होतात ते सांगीतले आहे. या स्वरसाम्राज्ञीला शेवटी भा. रा. तांबे यांच्या शब्दात भावपूर्ण श्रध्दांजली वाहतात.

या पुस्तकात शेवटी आपण भेटतो ते उज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांना. त्यांचे कष्टमय बालपण, निःस्वार्थीपणे केलेली देशसेवा, त्यांचे विद्यार्थी प्रेम, त्यांची रुद्रवीणा वाजवण्याची आवड. त्यांनी लिहिलेली प्रेरणादायी पुस्तके हे सर्व बारकावे वाचायला मिळतात. त्यांची अपार विज्ञाननिष्ठा सर्वपरिचित आहे. शिवाय ते दररोज कुराण व भगवतगीता यांचे पारायण करतात. त्यांच्या आगळ्या वेगळ्या कार्यशैली मुळे ते राष्ट्रपती कसे बनले हे सर्व लेखकाच्या दृष्टीतून व सिद्धहस्त लेखणीले लिहीलेले वाचणे अधिक योग्य आहे. सदर ‘अष्टदीप’ पुस्तक आपल्या मनात हे आठ दीप उजळवून आपल्याला प्रकाशमान करून टाकतात.

 या पुस्तकाला नुकताच ‘तितिक्षा इंटरनॅशनलचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मी हे पुस्तक का वाचले?

एकदा रेडिओवर संगीत व माहिती यावर आधारित कार्यक्रम ‘आनंदघन लता मंगेशकर’ ऐकला. त्यातील निवेदक अतिशय शांत, धीरगंभीर आवाजात दिदींची माहिती सांगत होते. व त्यांनी हजारो गाण्यातून निवडलेली प्रसंगानुरूप गाणी लावत होते. चौकशीअंती समजले की या कार्यक्रमाचे लेखन, सादरीकरण करणारे लेखक श्री विश्वास देशपांडे आहेत आणि हे लेखन त्यांच्या ‘अष्टदीप पुस्तकातील आहे. त्यानंतर हे पुस्तक उत्सुकतेने वाचले, तर अतिशय सुंदर चरित्रे समोर आली. याच लेखकांची दहा पुस्तके प्रकाशित झाली अहित. व त्यातील ललित लेखाचे व रामायण महत्व आणि व्याक्तिविशेष याचे सादरीकरण रेडिओवर होत असते. त्यांची सगळीच पुस्तके अत्यंत सकारात्मक, अभ्यासपूर्ण, निरीक्षणात्मक असतात. भाषा अत्यंत सोपी, सहज असते. त्यामुळे ती आपल्याला आपलीच वाटतात.

अशीच अजून पुस्तके यावीत आणि आपण सर्वांनी ती आवर्जुन वाचावित. या सदिच्छेसह धन्यवाद!

(पुस्तकासाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा… श्री.विश्वास देशपांडे….. ९३७३७११७१८ ) 

पुस्तक परीक्षणसुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 71 – कोई मतलब की बात होने दो… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – कोई मतलब की बात होने दो।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 71 – कोई मतलब की बात होने दो… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

दिल की धड़कन की, बात होने दो 

अब, मुहब्बत की बात, होने दो

जिससे, रोमांच हो शिराओं में 

उस शरारत की, बात होने दो

ज्येष्ठ संत्रास का, बिता आये 

अब तो, सावन की बात होने दो

अपने सौहार्द, हों सुदृढ़ फिर से 

अब न नफरत की बात होने दो

जिससे, सारी फिजाँ महक जाये 

उस तबस्सुम की, बात होने दो

वक्त, बरबाद मत करो अपना 

कोई, मतलब की बात होने दो

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 144 – मनोज के दोहे ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है  “मनोज के दोहे”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 144 – मनोज के दोहे ☆

नेक दृष्टि सबकी रहे, होती सुख की वृष्टि।

जग की है यह कामना, मंगल मय हो सृष्टि।।

*

पोर्न फिल्म को देख कर, बिगड़ा है संसार।

नारी की अब अस्मिता, लुटे सरे बाजार।।

*

शिष्टाचार बचा नहीं, बिगड़ रहे घर-द्वार।

संस्कृति की अवहेलना,है समाज पर भार।।

*

तिलक लगाकर माथ में, सभी बने हैं संत।

अंदर के शैतान का, करा न पाए अंत।।

*

अंतरिक्ष में पहुंँच कर, मानव भरे उड़ान।

धरा सुरक्षित है नहीं, बिगड़ रही पहचान।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares