मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जुनी नवी संस्कृती… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ जुनी नवी संस्कृती… ☆ सुश्री त्रिशला शहा

जुने सारे बदलत चालले

नव्या संस्कृती चे वारे आले

*

रहाणीमान अन सवयी साऱ्या

नव्या रुपाने बदलत गेल्या

*

 रेडिओवरच्या रुपक, श्रुतिका

टिव्हीवरच्या मालिका झाल्या

*

सायकल जाऊन दुचाकी आली

फोनसुध्दा मग स्मार्ट झाले

*

कपड्यांच्या तर कितीक फँशन

रोज नव्याने बाजारात आल्या

*

शिक्षणातही बदल तितकाच

नविन अभ्यासक्रमात झाला

*

पोळी, भाकरी मागे पडली

पिझ्झा बर्गरची आवड झाली

*

जुन्या संस्कृतीची कास आगळी

नव्याची मात्र धाटणीच न्यारी

*

काही बदल जरी स्तुत्य वाटले

तरी जुनेही काही वाईट नव्हते

*

जुन्यातील काही अवघड वळणे

नव्यामुळे थोडे सोपे झाले

*

कितीही जपली जुनी संस्कृती

तरी नविनचे करु स्वागत दारी

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – तू गाये जा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

उगवतीचे रंग – तू गाये जा ? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

तू गाये जा…

बेकरार दिल तू गाये जा

खुशियों से भरे वो तराने

जिन्हे सुनके दुनिया झूम उठे

और झूम उठे दिल दीवाने…

‘दूर का राही’ या चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलेलं हे सुरेख गाणं ! असेच आयुष्य जणू जगल्या सुरील्या आवाजाच्या धनी असलेल्या प्रसिद्ध गायिका चारुशीला बेलसरे. त्यांच्या गाण्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला. आई-वडिलांच्या असलेल्या संगीताचा वारसा घेऊन हे रोप वयाच्या अकराव्या वर्षीच बहरलं आणि मग पुढे त्याचा वटवृक्ष होऊन रसिकांवर सूर-सुमनांचा वर्षाव करू लागला.

गाणं चारुशीलाच्या रक्तातच होतं. वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी आपल्या बोबड्या बोलात ‘ विठ्ठला समचरण तुझे धरिते ‘ हे गीत ती गुणगुणायला लागली. या ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम केलं ते तिच्या आई-वडिलांनी आणि त्यातून एवढी सुंदर मूर्ती घडवली की प्रत्यक्ष हृदयनाथ मंगेशकरांनी तिला ‘ बाल लता ‘ असं संबोधलं. आई वडील हे तिचे आद्य गुरु झाले. आपली नोकरी सांभाळून त्यांनी स्वतःची गायनकला जोपासली आणि विकसित तर केलीच पण या आपल्या चिमुकलीला गान कलेचा वसा आणि वारसा दिला. ‘ बोलात बोबडीच्या संगीत जागविले. ‘ आणि मग एक एक सूर अमृतात न्हावून येऊ लागला.

वयाच्या केवळ ११ व्या वर्षीच तिने आपला स्वतंत्र संगीताचा कार्यक्रम केला. १५ फेब्रु. १९७० या दिवशी हा कार्यक्रम झाला. तो ही तिकीट लावून. अर्थात आई-वडील साथीला होतेच. या कार्यक्रमाला मान्यवरांची मांदीयाळी हजर होती. तिच्या गायनाला बाल लता म्हणून दाद देणारे स्वतः हृदयनाथ मंगेशकर, पंडित सी आर व्यास, शिरीष पै, गायक अरुण दाते, ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग. या कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थिनी असलेली चारुशीला एवढ्या आत्मविश्वासाने आणि तन्मयतेने गायली की श्रोत्यांसह या मान्यवरांची दाद तिला मिळाली.

मग तिचे एकेक पाऊल पुढे पडत गेले. प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी तिचे गाणे ऐकले आणि तिला आपल्या चित्रपटात संधी देण्याचे मान्य केले. तसेच प्रख्यात गायक आणि संगीतकार बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनीही तिचे गायन ऐकून तिला शाबासकी दिली आणि मग ‘ कार्तिकी ‘ या चित्रपटासाठी तिचं पहिलं गीत रेकॉर्ड झालं. त्यानंतर १९७५ पर्यंत आहुती, बाईने केला सरपंच खुळा, पाच रंगाची पाच पाखरं, चंदनाची चोळी अंग अंग जाळी या पाच चित्रपटातील गीते गाण्याची संधी मिळाली या काळात राम कदम, सुधीर फडके, एल बी सारंग, विश्वनाथ मोरे, यशवंत देव, शांकनिल, शशिकांत राजदेरकर यांच्यासारख्या विविध संगीतकारांकडून त्यांना गायनातील बारकावे शिकता आले. केवळ नववीत असताना प्रख्यात संगीतकार सी रामचंद्र यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गीते त्यांनी गायली.

याच काळात महाराष्ट्रात विविध ठिकाणी गीत रामायणाचे आणि सुगम संगीताचे कार्यक्रम करण्याची संधी त्यांना मिळाली यातूनही त्यांच्या गायनात परिपक्वता येत गेली. मराठी चित्रपटांप्रमाणेच अनेक नाटकांमध्ये पार्श्वगायनाची संधीही त्यांना मिळाली. त्यामध्ये यज्ञ, दुभंग, प्रतापगड, भक्तीमहिमा, दुर्गा झाली गौरी, वृक्षवल्ली आम्हा, सत्य महाभारत अशा नाटकांचा समावेश आहे. १९७५ च्या सुमारास दूरदर्शनवर झालेल्या ‘ किलबिल ‘ या कार्यक्रमात त्यांनी काही बालगीते गायली. याच कालावधीत प्रसिद्ध संगीतकार दशरथ पुजारी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘ रिमझिम झरती श्रावणधारा.. ‘ हे गीत गायले. काही गीते सुरेश वाडकर यांबरोबर गायली. दिल्ली दूरदर्शनवरही कार्यक्रम झाले. मुंबई आकाशवाणीवर भावसरगम या कार्यक्रमात गजानन वाटवे, श्रीनिवास केसकर, प्रभाकर पंडित, यशवंत देव, भूमानंद बोगम यांच्यासारख्या संगीतकारांनी त्यांच्याकडून विविध लोकप्रिय गीते गाऊन घेतली आणि एक गायिका म्हणून चारुशीला बेलसरे हे नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेरही रसिकमान्य झाले.

पं सी आर व्यास हे शास्त्रीय संगीतातील मोठे व्यक्तिमत्व ! त्यांनी चारुशीला यांना सहा वर्ष शास्त्रीय संगीत शिकवले. ग्वाल्हेर घराण्याची गायकी आणि बसंत, मालकंस, अहिरभैरव, यमन आदी विविध राग त्यांनी शिकवले. ‘फुल खिले है गुलशन गुलशन ‘ हा लोकप्रिय कार्यक्रम मुंबई दूरदर्शनवर सादर करणाऱ्या बेबी तबस्सुम यांच्याबरोबर चारुशीला यांनी अनेक ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम ‘ तबस्सुम हिट परेड ‘ या नावाने केले केवळ पाच वर्षात जवळपास २००० कार्यक्रम संपूर्ण भारतभर त्यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये नामवंत कलाकारांची हजेरी असायची.

कोणाही व्यक्तीला आपला शिष्य म्हणून सहजपणे न स्वीकारणारे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांनी जेव्हा चारुलता यांचा आवाज ऐकला, तेव्हा त्यांना शिकवण्याचे मान्य केले आणि पंडितजींनी कडून त्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या. या काळात त्या एसएनडीटी महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठात संगीत शिकवत होत्या. परंतु गायन शिकायचे तर त्यासाठी वेळ दिला पाहिजे असे पंडितजींनी सांगितल्यावर त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला. आणि पूर्ण वेळ संगीताला वाहून घेतले. पंडितजींनी जवळपास दहा वर्षे त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांची अवस्था ‘ देता किती घेशील दो करांनी ‘ अशी झाली.

आपणा सर्वांना मोहन जोशी हे नाव उत्तम अभिनेते म्हणून माहिती आहे परंतु ते उत्तम गातातही हे फार थोड्या लोकांना माहिती असेल. त्यांच्यासोबत चारुशीला यांनी ‘ गोविंदा आला रे ‘ या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमामध्ये अनेक गीते गायली. साक्षात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासमोर त्यांची गाणी त्यांनी गाऊन दाखवली आणि लतादीदींनी त्यांचे खूप कौतुक केले. मॉम कॅसेट कंपनीने त्यांची ‘ हिट्स ऑफ लता ‘ ही कॅसेट प्रसारित केली. ती अतिशय लोकप्रिय ठरली.

पुढे त्या पुण्याला स्थायिक झाल्या. योगायोगाने त्यांची संत साहित्याचे अभ्यासक असलेले डॉ अरविंद नेरकर यांच्याशी भेट झाली. मग त्यांच्या दोघांच्या सहकार्यातून अनेक सुंदर कार्यक्रमांची निर्मिती झाली. त्यामध्ये मन हे राम रंगी रंगले, पांडुरंगी मन रंगले, दिंडी चालली चालली, अमृतवाणी ज्ञानियांची, रंग भक्तीचे यासारखे अनेक कार्यक्रम सादर झाले. या कार्यक्रमांना डॉ अरविंद नेरकर यांचे रसाळ निवेदन आणि चारुशीला यांचे सुश्राव्य गायन असा सुरेख संगम असायचा. हे कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. २४ गायत्री मंत्रावर आधारित २४ गायत्री मंत्राचा लाभ सांगणारा ‘ स्वरगायत्री ‘ हा आगळावेगळा कार्यक्रमही त्यांनी सादर केला. त्यासोबतच स्वरांच्या हिंदोळ्यावर सप्तसूर रंगले, चांदणे शिंपीत जाशी, रागांचे रंग यासारखे अनेक सुगम संगीताचे अनेक कार्यक्रम त्यांनी डॉ नेरकरांसोबत सादर केले आहेत आणि ते रसिकांचे अतिशय आवडते आहेत. केवळ इथेच त्या थांबल्या नाहीत तर साहित्यातील शब्द आणि संगीतातील गांधार असा विचार डोळ्यासमोर ठेवून या दोघांनी ‘ शब्दगांधार ‘ या दिवाळी अंकाची निर्मिती केली आणि गेल्या पंधरा वर्षापासून दर्जेदार दिवाळी अंक वाचकांना हे दोघे सादर करीत आहेत.

संगीत क्षेत्रात जवळपास ५० वर्षानूनही अधिक काळ साधना, तपश्चर्या करणाऱ्या आणि आपले अमूल्य योगदान देणाऱ्या चारुशीला यांना आपले जीवन कृतार्थ झाल्याचा अनुभव या क्षणी येतो आहे. यापुढील आयुष्यात समाजातील उपेक्षित घटकांची जास्तीत जास्त सेवा करायची आणि त्यांच्यासाठी कार्यक्रम करायची असे त्यांनी ठरवले आहे. विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. विजया फाउंडेशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार त्याचप्रमाणे मॉम इंडिया कंपनीतर्फे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे इतरही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना लाभले आहेत. नुकताच स्वरगायत्री प्रतिष्ठान या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे. या गानतपस्विनीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दंगल… — भाग – ३ – लेखक – श्री रवी दलाल ☆ प्रस्तुती – सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ दंगल… — भाग – ३ – लेखक – श्री रवी दलाल ☆ प्रस्तुती – सुश्री प्रणिता खंडकर ☆

(एक अखेरचा डाव) 

(महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, कथाकार श्री रवी दलाल यांची नुकतीच दिल्लीतील रॉक्स पुरस्काराकरीता निवड झाली. मराठी साहित्यकाराने दिल्लीतील दंगल जिंकून बहुमोलाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. राॅक्स हा विविध आठ भाषेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा विशेषांक निघतो… या पुरस्कारासाठी त्यांच्या “आंगधुणी” या कथासंग्रहातील “दंगल“ या पुढील कथेची निवड झाली आहे.) 

(आशाला नव्याने संसार करू द्या म्हणून आशाच्या मायने संताजीला समजावलं. संताजी तयार झाला पण एक अट घातली) – इथून पुढे —-

दुसऱ्या दिवशी लखन आणि प्रताप मारोतीच्या घरी आले. आबासाहेबांनी होकार पाठवला पण आबासाहेबांची एक अट आहे. मारोती गुजर बोलता झाला. कोणती अट घातली ? आबासाहेबांनी, आमचं पाटील कुटुंब म्हणजे खानदानी, आज्या – पंज्या पासून कुस्तीची वैभवशाली परंपरा जोपासणार कुटुंब आहे. आमच्या कुटुंबात आजपर्यंत पहेलवानचीच पोरगी मागण्याचा रिवाज आहे. ” माझ्या आज्या – पंज्यापासून ते आम्हा भावापर्यंत आम्ही पहेलवानाच्याच पोरी घरात करून आणल्या आणि आशाला पण बिहाडीला पहेलवानाशीच लग्न गाठ बांधली होती. पोरगी द्यायची तर मर्द माणसाच्या घरात आणि पोरगी करून आणायची तर मर्द माणसाची असा आमचा खानदानी रिवाज आहे. ” तुम्ही आबासाहेबांचे समकालीन वस्ताद पण बळवंताने कधीच मैदान मारले नाही, कधी कुस्ती खेळला नाही. आबासाहेबांचा आदेश आहे. आशा सोबत लगीन करायचं असेल तर मैदानात दोन हात करून जिंकावे लागेल. तेव्हा आशा सोबत लगीन करण्याचा मार्ग मोकळा होईल. आबासाहेबांची ही अट मंजूर असेल तर बोला आणि पानविडा समोर ठेवला. जर कुस्तीची अट मंजूर असेल तर विडा उचला नाहीतर आम्ही निघतो…..

मारोती बळवंताचे चेहरे पडले कारण बळवंता कधीच मैदानात कुस्ती खेळला नव्हता. संताजी पाटलाने अजब अट घालून पेचात पाडले होते. ” कुस्ती जिंकूनच आशा मिळवता येईल अन्यथा संबंध होणार नाही….. मारोती चुपचाप होता कारण पोरगा बळवंताला मैदानी कुस्तीची सवय नव्हती. समजा कुस्तीस होकार दिला तर भर मैदानात आत्महत्या करण्यासारखं होईल. जिंकू किंवा मरू या भावनेने बळवंताने विडा उचलला आणि कुस्ती लढण्यास होकार भरला. शाल – दुपट्टा देऊन संबंध पक्का झाला. “

पंचमीला यात्रा नुकतीच झाल्याने पुढच्या वर्षी पंचमीला लढत होणार. प्रतापने शाल – श्रीफळ देऊन सांगितले. बळवंत तुला एक वर्ष वेळ असून मेहनत घे, कसरत कर अन बापाकडून डावपेच शिकून तरबेज हो !आणि खुल्या मैदानात लखन ला आसमान दाखव. आता नंतरची भेट मैदानात होईल. प्रताप – लखन शाल – दुपट्टा घेऊन रवाना झाले आणि बळवंताने आखाडा पिसायला सुरुवात केली.

बलाढ्य मारोती आता जरी थकला असला तरी चेले त्याने तयार केले होते. मारोती नवीन डावपेचाचा जनक होता, बापाचा हात डोक्यावर असल्याने बळवंताची हिम्मत दुगुनी झाली होती. बळवंताने बापाच्या नजरेत खाली कसरत सुरू केली. आखाड्यातील तरबेज पहेलवानासोबत दंड – बैठका जोर अजमावणे सुरू झालं. पन्नास किलोमीटरवरची दौड सुरू आणि काजू -पिस्ता -बदाम – दूध – तुपाचा अलप सुरू केला. सूर्यनमस्कार दंड – बैठका, दोर -कसरत, पन्नास किलो वजन घेऊन पहाड चढणे सुरू केले. रात्रंदिवस व्यायाम करून शरीर आणखी भरदार होऊ लागलं. अधिक ताकदीच्या पैलवानासोबत खेळून जोर वाढवत होता. आखाड्यातील अनेक तगड्या पहेलवानीशी झुंज सुरू केली. पहेलवानकी हे बळवंताच्या रक्तात होती. फक्त त्याचा उपयोग केला नव्हता आणि फक्त पाच महिन्यातच बळवंता कुस्तीत तरबेज झाला.

पोराचा संसार थाटण्यासाठी मारोतीने वयाच्या 65 व्या वर्षी पुन्हा लंगोट कचली आणि मैदानात उतरला. बापासोबत पोराची तालीम सुरू झाली. आजपर्यंत कुणालाही न दिलेले डावपेच मारोतीने बळवंतावर आजमावले. अख्खा – डाव, बांगडी – डाव, धोबी – डाव, मानतोडी, उलटा – डाव, घिसा – डाव, मानगुटी – डाव, फसली – डाव बळवंताला शिकविले आणि प्रत्येक गावाची पद्धत समोरच्या पहेलवानाचा डाव ओळखण्याची कला मारोतीने शिकविली. एका वर्षात बळवंताने लेवल गाठली. बापाकडून शिकून चपळ आणि तरबेज झाला.

एका वर्षातच बळवंता सात पहेलवानाशी झुंजला. ” भंडाऱ्याचा हिम्मत पहेवानाला चित केले तर देवळीत जाऊन नबू शेख वस्तादाला आसमान दाखवले. मोठ्या पहेलवानाशी लढत देऊन हिंमत आणि ताकत दुप्पट केली. रामटेक थूगावच्या दंगलीत पंजाबी शेरा पहेलवान उतरला आणि लढत झाली पण बळवंता हरला. ज्या डावावर बळवंता पडला त्या अकली डावावर मारोतीने घिस्सा डाव शिकविला आणि पुन्हा पंजाबी शेरा सोबत लढत केली. दुसऱ्या कुस्तीत पंजाबी शेराला अवघ्या पाच मिनिटात भुईसपाट केलं.

यात्रेच्या आधीच बळवंता सात कुस्ती खेळला आणि जिंकला. इकडे लखन कुस्तीत आधीच नावाजलेला होता. त्याला मेहनत घेण्याची गरज नव्हती. पण संताजीच्या देखरेखित लखनची पिंढन चालू होती तर इकडे मारोती लंगोट कचून बळवंताला डावपेचात तरबेज करत होता. वीस वर्षापासून दंड – बैठका मारून लखनच शरीर दगडासारखं टणक होतं. लखनच्या वीस वर्षाच्या मेहनती पुढे बल्लूची एक वर्षाची मेहनत टिकणार नव्हती. लखनने बल्लूला हलक्यात घेतले आणि गाफील राहिला. पण मारोतीने कानमंत्र दिला. शक्तीवर युक्तीने विजय मिळवण्याची कला शिकविली.

आशाने बळवंताला कुस्तीत जिंकण्याचा वचन मागू नये म्हणून लखनने बहिणीकडून राखी बांधली नाही आणि दंगलीचा दिवस उजाडला. वर्षभराची प्रतीक्षा संपली. कुस्तीसाठी जनसागर उलटला होता पण यावेळी लोकांची भावना बळवंता सोबत जुळली होती. ” लखन हारावा व अशा चा संसार बसावा म्हणून अनेकांनी देवापुढे साकडे घातले होते. लखनला पराभूत करून आशाला मिळवायची होती तर लखनला बापाची पगडी शाबूत ठेवून ही कुस्ती जिंकायची होती.

कुस्तीला जातेवेळी आई पत्नी औक्षवंत करायचे पण यावेळी कुणीच ओवाळले नाही. लखन हरावा सर्वांच्याच मनात होतं. मैदान भरले पण यावेळी जोश नव्हता. भयानक शांतता पसरली होती. बळवंताची कुस्ती आशाला नवजीवन देण्यासाठी होती तर सख्खा भाऊ बहिणीला जीवनभर विधवा ठेवण्याच्या तयारीत होता.

लखन बळवंत मैदानात आमने- सामने आले. दोन माजी दिग्गज पहेलवान संताजी – मारोती पेंडॉलमध्ये विराजमान होते. लखन साठी ही लढत बहिणीला विधवा ठेवून घराणेशाहीच्या पारंपारिक सन्मानासाठी होती तर बळवंताची लढाई विधवेला नवजीवन देण्यासाठी होती. बळवंताने बापाचे पाय धरले. मारोतीने शांत राहण्यास सांगितले, घाई करू नको, तू आक्रमण करायचं नाही, आधी बचाव कर, लोकांची ताकद मोठी आहे आणि नंतर बळवंताने संताजीचे पाय धरले. ” संताजीने विजयी भव ” असा आशीर्वाद दिला. मग लखन बापाचा आशीर्वाद घ्यायला गेला ” पण बापाने पाय मागे घेतले.

आता संताजी जनभावना समजून चुकला होता. सर्व गर्दी बळवंताकडून होती. त्याला विधवेला न्याय द्यायचा होता तर लखनला बुरसटली परंपरा जोपासायची होती.

नामदेव सुताराने पहेलवानाचा परिचय करून दिला. कुस्ती सुरू झाली. ताकद आजमावने सुरू झाले. लखनच्या प्रचंड ताकतीपुढे बळवंत टिकाव धरत नव्हता. लखनच्या आडदांड शरीरापुढे बळवंताची ताकत कमी पडत होती. ही लढाई हळूहळू रंगात आली. लखनने वाकून बळवंताला घिस्सा डावात घेतले आणि बळवंताने दोन्ही पायाच्या फटीत लखनचा हात दाबला. पायाची कैची मजबूत केली तशी लखनने मानगुटी सोडली. पायाची आडी देऊन बळवंताला उघडा केला आणि मनगटाचा जबर वार मान्यवर केला. वार चुकवून बल्लू सुटून उभा झाला. लाल माती उडाली आणी जाध ठोकून बल्लू पुन्हा तयार झाला. मारोतीने सांगितलं होतं, लखन ताकदीने हरणे नाही युक्तीने हरवावे लागते. डावा मागून डाव सुरू झाले. लखनला वाटले, नोकरी करणाऱ्या नाजूक फुलाला मिनिटात कुचलून टाकू पण बळवंताला उमदा भरत होता. बळवंताला पाच मिनिटात चित करू हा भ्रम तुटला. लखनला आक्रमण करून बल्लूवर ताबा मिळवण्यासाठी खेळत होता. पण बल्लूने डाव फेल करून वेळ मारून नेली. कुस्तीचा रुख बदलला. आता लखन बल्लूच्या डावातून बचावात्मक पवित्रा घेत होता.

लखनने चढाई थांबवली. बल्लूचा प्रत्येक डाव लखनची धडकी भरवत होता. लखन कडून सर्व डाव खेळून झाले पण बल्लू चित होत नव्हता. ढोबी पझाड, घिस्सा – डाव, पटी – डाव, आतली टांग – बाहेरची टांग, बांगडी डाव मरून झाले. बल्लू मातीने न्हावून निघाला पण चित होत नव्हता. दात ओठ खाऊन लखन पुन्हा भिडला. लखन ताकदीच्या जोरावर लढत होता. बल्लू डावावर डाव मारत डाव परतवत होता. कुस्तीला अर्धा घंटा होऊन गेला पण कुणी कुणाला हात देत नव्हता. संताजीने ओरडून लखनला मोडी डाव मारण्यास सांगितले. योग्य टाइमिंग वेळ साधून गुघडी पोझिशन पाहून शांत बसलेला मारोती एकदम जोशात आला. त्याने लखनच्या डोळ्यातली भीती हेरली होती. शारीरिक थकवा दिसला. हीच योग्य वेळ साधून मारोती ओरडला ” बल्लू, ” मुडी डाव घाल पझाडू ” बापाचा आवाज ऐकून बल्लू पवित्रात आला. लखनला ” मुडी डाव ” माहीत असल्याने लखनने पायाची मोड केली. लखन गाफील झाला आणि बल्लूने मुडी डावाचा पवित्र घेऊन, मानेत हात घालून पायाने ” करठी डाव ” टाकला आणि लखन चीत झाला. नवख्या बल्लूने अखेरचा डाव साधला आणि लखलला आसमान दाखवले.

मैदानात हाहाँकार मचला पंचाने निर्णय दिला, बल्लूला विजय घोषित केले. बल्लूने लखनच्या शक्तीला न जुमानता युक्तीने विजय मिळविला होता. वीस वर्षाचा अनुभवी पहेलवाना समोर एक वर्षाची मेहनत जिंकली होती. मारोतीच्या युक्तीने बल्लूला जिंकविले होते. हा आनंद गावात साजरा करण्यात आला. प्रचंड ताकदीचा लखन घरच्याच मैदानात नवख्या पहेलवानाकडूनच चित झाला. मारोतीचा चेहरा आनंदला – फुलला……

बल्लूने लखनला हरवल्याची बातमी आशाला कळली. आईला कवटाळून आशाने मुका घेतला आणि आनंदाने घिरटी घेतली. बल्लू जिंकला ठरल्याप्रमाणे आशाच लग्न बल्लू सोबत होणार होतं…. विधवा आशा पुन्हा सौभाग्यवती होणार होती. आशाचा संसारवेल बळवंता सोबत फुलला आणि ठरल्याप्रमाणे संताजीने आशाचे लग्न बल्लू सोबत लावून दिले. ” कुस्तीच्या मैदानातील कट्टर हाडवैरी आता व्याही झाले होते. “

– समाप्त – 

लेखक : श्री रवी दलाल

 9960627818

प्रस्तुती –  सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रोजच्या व्यवहारातला दासबोध…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “रोजच्या व्यवहारातला दासबोध…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

त्या दिवशी दासबोध वाचत होते……

” अंतरासी लागेल ढका

ऐसी वर्तणूक करू नका

जिथे तेथे विवेका

प्रगट करी…. “

हे वाचताना अचानक जोशी बाईंची आठवण आली.

मी पाचवीत असतानाची गोष्ट. शाळा नुकतीच सुरू झाली होती बाई वर्गात आल्या आणि म्हणाल्या..

” मी काय सांगते ते नीट ऐका. उद्या आपल्या वर्गात मीनल नावाची नवीन मुलगी येणार आहे. तिच्या वडिलांची इथे बदली झाली आहे. तिला आई बद्दल काहीही विचारू नका….

कारण काही दिवसांपूर्वी तिची आई देवाघरी गेली आहे. “

सगळ्या वर्गात एकदम शांतता पसरली… स्तब्धच झालो…

गरीब.. बिचारी… बापरे. तीच्यावर किती मोठं संकट आलं आहे…

एखादीला आई नाही हे केवढे दुःख….. कारण त्या वयात आई हे मुलींच सर्वस्व असतं…

किती… किती विचार आमच्या मनात आले.. बाईंच्या ते लक्षात आले.

त्या म्हणाल्या,

” मीनलला तुमच्यात सामील करून घ्या. ईथे कोणी तिच्या ओळखीचं नाही. तुम्ही तिच्याशी गप्पा मारा. तिला मदत करा… “

सुट्टीत बोलायला तोच विषय होता.

आई नाही तर तिच्या घरी स्वयंपाक कोण करत असेल, घरं कोण आवरत असेल, तिची वेणी कोण घालत असेल हा सुध्दा प्रश्न आम्हाला पडला…

दुसरे दिवशी मीनलची आम्ही वाट पहात होतो. बाईंनी तिला मध्यभागी बसवलं. त्यामुळे आम्ही तिच्या जवळ होतो. दिवसभर आम्ही तिच्या मागेमागे होतो. डब्यातला खाऊ तिला दिला. शाळा दाखवली. जे शिकवून झाले होते ते दोघींनी तर तिच्या वहीत लिहूनही दिले… काय काय केलं….

तिचे वडील तिला न्यायला आले. ती त्यांना खुशीत म्हणाली,

” बाबा मला शाळा, बाई फार आवडल्या. आज मला नव्या मैत्रिणी मिळाल्या. “

नंतर हळूहळू ती सहजपणे रुळली…

आज समजतं त्या दिवशी बाईंनी आम्हाला केवढा मोठा धडा शिकवला होता.

एखाद्याचे दुःख समजून घ्यावं.. त्याला होईल ती मदत करावी, चारचौघात त्याला त्याविषयी विचारून कानकोंडं करू नये…. मुख्य म्हणजे त्याला आपल्यात सामील करून घेऊन देता येईल तो आनंद द्यावा.

आजही जोशीबाई आणि तो वर्ग आठवतो. बाईंनी शिकवलेलं अजून लक्षात आहे.

अंतःकरण न दुखावता विवेकानी वागायचा प्रयत्न सुरू ठेवू…

रामदास स्वामी आहेत शिकवायला…

त्यांनी त्यांच्या ग्रंथातून हेच तर सांगितलेले आहे. म्हणून ग्रंथ वाचताना समजून उमजूनच वाचावा.

आज दासबोध वाचायला घेतला तेव्हा हे सर्व आठवले…

रामदास नवमी जवळ आलेली आहे तर या ओव्या पण वाचा…

” आपणांस चिमोटा घेतला

 तेणे जीव कासावीस झाला

 आपणा वरून दुसऱ्याला

 पारखीत जावे”

*

” विचार न करता जे जे केले 

ते ते वाऊगे व्यर्थ गेले

 म्हणून विचारी प्रवर्तले

 पाहिजे आधी”

*

“उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा

 शब्द निवडून बोलावा

 सावधपणे करीत जावा

 संसार आपला”

*

नरदेहाचे उचित 

काही करावे आत्महित 

यथानुशक्त्या चित्तवित्त

सर्वोत्तमी लावावे”

*

आपल्या दृष्टीने सर्वोत्तम कुठले आहे हे आपले आपण ठरवायचे आहे. तिथे आपले सर्वस्व पणाला लावून स्वतःची ऊन्नती करून घ्यायची आहे.

सरळ सोप्या भाषेत रामदासांनी अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत.

रामदास स्वामींचे शब्दचं इतके बोलके आहेत की वाचता क्षणी त्याचा अर्थ लागतो. मनाला भावतो.. पटतो.. खूप क्लिष्ट नसल्याने आपण तो सहज अमलात आणू शकतो…..

 हळूहळू आपली प्रगती निश्चित होईल ही खात्री आहे.

आता हे पण लक्षात येत आहे की पोथी, ग्रंथ हे नुसते वाचायचे नसतात. त्यातला अर्थ, भावार्थ, गुढार्थ, समजून घ्यायचा असतो. त्यातले गुह्य काय आहे हे ओळखायचे जाणुन घ्यायचे असते.

संतांनी अपार तत्त्वज्ञान अभंग, ओव्या, भारूड, ग्रंथ, पोथ्या यातून सांगितलेले आहे.

त्यातले काही थोडे तरी.. आपल्याला घेता आले पाहिजे. ते नुसते घेऊन थांबून चालणार नाही…

तशी वागणुक करून ते आपल्या प्रत्यक्ष कृतीतून, वाणीतुन दिसले पाहिजे. तरच त्या वाचण्याला अर्थ आहे….. यातूनच आपल्या मनाची शक्ती वाढणार आहे. मनाचे श्लोक वाचताना याचे प्रत्यंतर येतेच…

आपण जसजसे वाचू लागतो तसतसे कळत जाते की वरवर दिसतो तितका हा मार्ग सोपा नाही. त्यासाठी सातत्य, प्रयत्न, निष्ठा, प्रेम, अभ्यास आणि मनापासून बदलायची तयारी हवी तरच हे जमेल.

समर्थांनी दासबोधात हे कसे करायचे ते पण सांगितले आहे.

” आलस्य अवघाची दवडावा 

यत्न उदंडची करावा

 शब्द मत्सर न करावा 

कोणा एकाचा”

साधक होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे….

” अवगुण त्यागी दिवसंदिवस

 करी उत्तम गुणांचा अभ्यास

 स्वरूपी लावी निजध्यास

 या नाव साधक”

समर्थांनी सांगितलेले शब्द लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागूयात. त्यातील आवडलेल्या ओव्या लिहून ठेवू. कधीही काढून तेवढ्याच वाचता येतील… त्यातील सखोल अर्थ मनात झिरपत राहील… त्यातून हळूहळू प्रगती निश्चित होईल. मार्ग दाखवायला आपला दासबोध आहेच..

जय जय रघुवीर समर्थ.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘श्रीसमर्थ रामदास पुण्यतिथी…. अर्थात दासनवमी’…भाग -१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘श्रीसमर्थ रामदास पुण्यतिथी…. अर्थात दासनवमी’…भाग -१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

इसवी सनाचे सतरावे शतक. तो काळ ‘मोगलाई’चा. ‘दहशतवाद’, ‘असहिष्णुता’ हे शब्द एखादवेळेस त्या काळातील शब्दकोषात देखिल नसतील, पण सामान्य मनुष्य ‘याचि देही याचि डोळा’ ते अनुभवत होता. सुलतानी आणि अस्मानी संकट एकाच वेळेला महाराष्ट्रावर आणि एकूणच भारतावर घिरट्या घालीत होते. ‘स्वधर्म’ नावाचा काही धर्म असतो आणि तो प्राणपणाने जगायचा, जपायचा असतो हे सांगण्याचे धाडस करण्याची तयारी देखील त्या काळात फार कमी लोकांची होती. एखादया भरलेल्या शेतात टोळधाड यावी आणि काही क्षणांत ते शेत फस्त करून टाकावे, अगदी अशाच पद्धतीने मोगल आणि इतर आक्रमक गावावर हल्ला करायचे आणि सोन नाणं लुटून न्यायाचेच, पण गावातील लेकीबाळी एकतर पळवून न्यायचे किंवा ‘नासवून’ टाकायचे. जनतेनं दाद मागायची कोणाकडे? कारण हिंदूंना राजा नव्हताच. काही सरदार होते, पण तेही बादशहाचे मांडलिक. त्यामुळे तेही वतने टिकविण्यासाठी आपल्याच लोकांशी भांडत होते. ब्राह्मण आपल्या कर्मकांडात गुंतले होते, क्षत्रिय तत्कालीन राज्य व्यवस्थेचे मांडलिक झाले होते. वैश्य जीव मुठीत धरून व्यापार करीत होते आणि तथाकथित शूद्र आपापले जीवन कसेतरी जगत होते. काहीही करून फक्त जीव वाचविणे हाच हाच त्याकाळातील जगण्याचा मूलमंत्र झाला होता. या सगळ्याचे वर्णन करण्यासाठी एकच सुयोग्य शब्द आहे ‘मोगलाई’

इसवीसनाच्या तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची पताका हातात घेतली आणि भक्तिमार्गाच्या माध्यमातून सामान्य मनुष्यात प्राण ओतण्याचे, त्याच्यातील ‘स्व’त्व जागृत करण्याचे कार्य चालू केले. त्या काळात समाजातील सात्विकता जवळ जवळ नष्ट होत चालली होती. चांगुल्यावरील सामान्य जनतेचा विश्वास उरला नव्हता. त्याकाळात मनुष्याचा चांगुलपणा वरील विश्वास निर्माण करणे आणि तो टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे होते. सर्व संतांनी अगदी तेच केले. दुष्काळ पडला तर शेतकरी सर्वप्रथम आपले बियाणे सुरक्षित ठेवतो याच सुत्राप्रमाणे माऊलींनी आणि नंतर तत्कालीन संतांनी समाजातील सात्विकतेच्या बीजाचे संरक्षण आणि संवर्धन केले. माऊलींचा हरिपाठ, संत एकनाथांचे भारूड आणि इतर संताचे अभंग यामुळे समाजमन भक्तिरसात न्हाऊन निघत होते आणि ईश्वराच्या, नामाच्या सान्निध्याने मनुष्यातील सत्वगुण वृद्धीगंत व्हायला बळ मिळत होते. मनुष्याच मन विकसित करणे, हे फार अवघड काम. त्याहून अवघड म्हणजे निद्रिस्त समाजाला जागृत करून त्यास विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत करून राष्ट्रकार्य, समाजकार्य करण्यास प्रवृत्त करणे. अर्थात, हे काम हृदयाच्या शस्त्रक्रियेसारखे. माणूस जिवंत ठेऊन जुनं म्हणजे सडलेले हृदय बदलून तिथे नवीन हृदयाचे रोपण करायचे. खरे हृदय बदलणे त्यामानाने एकवेळ सोपे म्हणता येईल, पण मनुष्याचे विचार समूळ बदलणे हे गोवर्धन पर्वत उचलण्यापेक्षा महाकठीण. पण आपल्याकडील संत मंडळी हे उत्तम मानसशास्त्रज्ञ, त्यामुळे त्यांनी ही सर्व शस्त्रक्रिया बेमालुमपणे आणि निष्णात तंत्रज्ञाप्रमाणे पार पाडली. ही शस्त्रक्रिया झाल्याचे सामान्य मनुष्याला कळलेदेखील नाही, पण त्याचा ‘रोग’ मात्र बरा होण्यास निश्चित मदत झाली असे खात्रीने म्हणता येईल.

“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥” (संदर्भ:- अभंग क्रमांक १०१४ सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था) म्हणतात ते उगीच नव्हे!

मराठवाड्यातील जांब गावातील एका घरात एका मुलाचा जन्म झाला. अर्थात मुलाचा जन्म होणे ही तशी सामान्य घटना. पण त्याच मुलाने पुढील काळात आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपले आपल्या गावाचे, प्रांताचे नव्हे तर देशाचे नाव जगप्रसिद्ध केले, इतकेच नव्हे तर आज चारशे वर्षांनंतरही ते नाव एक दीपस्तंभ बनून आजच्या पिढीला मार्गदर्शन करीत आहे. माझ्यासारख्या एका अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यास त्यांच्या चरित्राचे स्मरण करावेसे वाटते, त्याचे कर्तृत्व पुन्हा एकदा समाजाला सांगावेसे वाटते, यातच त्यांच्या अलौकिक आणि अपौरुषेय कार्याचे महात्म्य दडले आहे.

घरात अनेक पिढ्या चालत आलेली रामभक्ती !! मोठे बंधु त्यामानाने ज्येष्ठच. त्यामुळे हा बाळ आपल्या बालमित्रमंडळीत जास्त रमायचा. सुरपारंब्या आणि इतर तत्कालीन खेळ हे वेळ घालविण्याचे साधन. थोडा मोठा झाल्यानंतर मात्र सूर्यनमस्कार, पोहणे अशा गोष्टीत त्यास रस वाटू लागला. एकीकडे रामभक्ती चालू होतीच. आठव्या वर्षी मुंज झाली आणि अचानक वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या आकस्मिक निधनाचा बाळाच्या मनावर खोल परिणाम झाला. बाळ अंतर्मुख झाला. त्याचवेळेस गावात टोळधाड आली, समाजाची विदारक परिस्थिती त्याच्या लक्षात आली आणि या अंतर्मुखतेस एक वेगळी दिशा मिळाली. त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित झाले.

“धर्माच्या करिता आम्हांस जगती रामाने धाडियले।” 

रामकार्य करण्याचे ठरले आणि हनुमंत त्यांचा आदर्श, मार्गदर्शक आणि मित्र झाला. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी हनुमंताला आपल्या सोबत ठेवले. प्रत्येक गोष्ट हनुमंताला साक्षी ठेऊन आणि समर्पण करून केली. आयुष्यात परमेश्वरावरील अतूट श्रद्धा आणि शुद्ध साक्षीभाव किती काम करतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण !! आयुष्याचे ध्येय ठरले, निश्चय दृढ झाला, आता कृती !! सामान्य मनुष्याचे असामान्य संकल्प आईच्या अश्रूत वाहून जातात असा आपल्याकडील अनेक लोकांचा अनुभव आहे. ‘हुंडा मला नकोय पण आईसाठी घेतोय’, मला काही नकोय मात्र आईची इच्छा मोडवत नाही’, आई हो म्हणाली असती तर मी सैन्यात भरती झालो असतो, अशी ‘कारणे’ देणारी मंडळी आज देखील आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. पण याचे ध्येय पक्के होते, विशाल होते. ध्येय ‘रामराज्य’ प्रत्यक्षात आणण्याचे होते. हिंदूंना स्वतःचे सार्वभौम सिंहासन मिळावे, हिंदूसमाज जिंकू शकतो, हिंदू मनुष्य सार्वभौम राजा होऊ शकतो, इतकेच नव्हे हिंदू राजे जिंकलेल्या राज्याचा विस्तार करु शकतात, हिंदू ‘राज्य’ करु शकतात, हिंदू कारखाने चालवू शकतात, व्यापार करू शकतात, समुद्रावर सत्ता गाजवू शकतात, गडकिल्ले बांधू शकतात, शेती विकसित करू शकतात, हे दाखवून देण्याचा निश्चय झाला होता, आता हा संकल्प फक्त प्रत्यक्षात आणायचा होता. एका वाक्यात सांगायचे तर *सामान्य मनुष्यात ‘राष्ट्रभक्ती’, ‘राष्ट्रीय दृष्टीकोन’ राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे काम करायचे होते.

जगात कोणतीही गोष्ट दोनदा घडते. एकदा कोणाच्या तरी मनात आणि नंतर प्रत्यक्षात! हा संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी पारंपरिक पद्धतीने संसारात रमणे सोयीचे नव्हते, म्हणून आईच्या शब्दांसाठी बोहल्यावर चढलेला हा मुलगा, “शुभमंगल सावधान…. ” ऐकताच ‘सावधान’ झाला आणि गोरजमुहूर्ताचा फायदा घेऊन बोहल्यावरून पळून गेला. त्याला पारंपरिक संसारात न अडकता विश्वाचा संसार करायचा होता. “चिंता करतो विश्वाची”, असा विचार करणाऱ्या मुलाला ‘विश्वाची चिंता करायची म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुणांना तयार करायचे होते, तसेच त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रेमाची ताकद… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ प्रेमाची ताकद – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले.

गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते.

अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला ,पण राधा शांतचित्त होती.

गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली…..

“कसे आहात द्वारकाधीश ?”

जी राधा त्याला ‘कान्हा’ ‘कान्हा’ म्हणायची तिने ‘द्वारकाधीश’ असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला, “राधे, मी आजही तुझा कान्हाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस …! खूप दिवसांनी भेटतो आहोत, एकमेकांशी सुख दुःखाच्या गप्पा मारू. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती.”

राधा म्हणाली, “खरं सांगू ? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही.”

“कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही. आणि माझ्या नजरेत तूच होतास. त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जाऊ नयेस, म्हणून मी कधी रडलेच नाही.

प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू?”

श्रीकृष्ण ऐकतच राहिला…

राधा म्हणाली, “तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे, गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणाला कधीच भेटला नाहीस.तू खूप मोठा झालास, तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली.

पण ह्या प्रगतीमध्ये तुझी किती अधोगती झाली? यमुनेच्या पवित्र, गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरु झाले.त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी जाऊन पोहोचलास ( द्वारका समुद्रकिनारी होती/आहे).

एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास, पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास!

कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास, तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस!

कान्हा आणि द्वारकाधीश ह्यांत काय फरक आहे सांगू ….?

तू कान्हा असतास, तर तू सुदामाच्या घरी गेला असतास. सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं!

प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे … ‘युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो’. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो, पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही !

तू तर त्रैलोक्याचा स्वामी आहेस.महान भगवद्गीता तू जगाला सांगितलीस पण तू स्वतः काय निर्णय घेतलास?

तू राजा होतास, प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू कौरवांना देऊन टाकलेस?

तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास, त्याचा मार्गदर्शक बनलास,ज्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्यासमोर मारून टाकले?

तुझे सैन्य तुझी प्रजा होती ना? आणि प्रजा ही स्वतःच्या मुलांप्रमाणे असते ना? तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास !

इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा? मग जा, पृथ्वीवर जाऊन बघ. …. तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध.

नाही सापडणार तुला शोधूनही !

जिथे जाशील तिथे घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन.

होय. कान्हा मला गीतेचे महत्त्व माहीत आहे. आजही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते. माणसं ही गीतेला पूज्य मानतात .पण ते भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारकानरेश श्रीकृष्णावर नाही, तर प्रेम करणाऱ्या कान्हावर ठेवतात.

गीतेमध्ये माझा – राधेचा – तर दुरूनही उल्लेख नाहीये.पण आजही लोकं गीतेचा- तुझ्या महान भगवद्गीतेचा- समारोप करताना ‘राधेकृष्ण राधेकृष्ण’ असाच जप करतात!”   

हीच ती प्रेमाची खरी ताकद…!

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ.प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “उलघाल ” – लेखक : प्रा. यशवंत माळी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “उलघाल ” – लेखक : प्रा. यशवंत माळी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तक – उलघाल 

लेखक – प्रा. यशवंत माळी

प्रकाशक – साहित्याक्षर प्रकाशन, संगमनेर

पृष्ठे – १८२,

मूल्य – २५० रु.

गेल्या वर्षी मला एक पुस्तक पोस्टाने ‘सप्रेम भेट’ म्हणून आलं. ‘उलघाल’ हा कथासंग्रह. लेखक प्रा. यशवंत माळी. लेखक म्हणून प्रा. यशवंत माळी यांचं नाव पाहून मी आश्चर्यचकित झाले. चकित होण्याचं कारण असं की माळीसर कथा लिहितात, हे मला माहीतच नव्हतं. मी त्यांची एकही कथा वाचली नव्हती, किंवा

कथालेखक म्हणून त्यांचं नावही ऐकलं नव्हतं. विचार केला, प्रथम त्यांना फोनवरून पुस्तक मिळाल्याचं कळवावं. नंतर कथा वाचून पुन्हा फोन करावा. प्रा. यशवंत माळी माझे एम. ए. चे सहाध्यायी. आम्ही दोघेही नोकरी करत होतो. त्यामुळे रेग्युलर कॉलेजला जाणे शक्य नव्हते. बहिस्थ म्हणूनच आम्ही एम. ए. केले.

त्यावेळी बहिस्थ विद्यार्थ्यांना सांगलीचे प्रा. व्ही. एन. कुलकर्णी दर रविवारी मार्गदर्शन करत. म्हणजे नोट्स् देत. ते सांगत. आम्ही लिहून घेत असू. त्या नोट्सच्या जिवावर आम्ही बर्‍यापैकी मार्क मिळवून एम. ए. झालो. माळीसरांशी तशी तोंडओळख होती. नंतर आसपास होणार्‍या कवीसंमेलनातून, साहित्यसंमेलनातून आम्ही भेटत-बोलत राहिलो, पण त्यावेळी त्यांनी आपल्या कथालेखनाचा कधीच उल्लेख केला नाही. त्यामुळे ‘उलघाल’ पाहून आश्चर्य वाटलं. अर्थात आनंदही झालाच. मी ‘उलघाल’ चाळलं. अतिशय देखणं पुस्तक. कागद, मुद्रण, मांडणी, मुखपृष्ठ सगळंच छान. मुद्रणदोष फारसे नाहीत. पहिलंच पुस्तक हेवा वाटावा असं. म्हणजे त्यावेळी तरी मला ते त्यांचं पहिलंच पुस्तक आहे, असं वाटलं होतं.

‘उलघाल’ वाचलं. मला कथा अतिशय आवडल्या. यात एकूण १६ कथा आहेत. प्रत्येक कथा विषय –आशयाच्या दृष्टीने वेगळा. पण काही गोष्टी सर्वत्र समान आहेत. त्या म्हणजे आशयानुकूल प्रसंगनिर्मिती, ता प्रसंगातील तपाशीलांचे नानाविध मोहक रंग, त्यातून साकार झालेल्या साजिवंत वाटाव्या, अशा व्यक्ती, व्यक्तिचित्रणाला अनेक ठिकाणी दिलेली प्रतिमा-प्रतिकांची जोड, त्यातील मनोविश्लेषण, अनेक ठिकाणी

सूचकतेने घडणारे जीवन दर्शन, कथेचा परिपोष करणारी सुयोग्य भाषाशैली, अशी अनेक वैशिष्ट्ये यातील कथांमध्ये दिसतात. या कथांबद्दल मलपृष्ठावर, श्रेष्ठ लेखक आणि चिकित्सक कै. वसंत केशव पाटील यांनी लिहिले आहे, ‘ या लेखकाचे ग्रामीण आणि नागर संस्कृतिविषयक आकलन व अन्वय, अधिकतर अव्वल आणि गंभीर प्रकृतीचा आहे. त्यामुळे मानवी जीवनातील आदिम नि अपरिहार्य रीती-रिवाजाचे एक मनोहारी

प्रतिबिंब, सर्वच कथांमध्ये उतरले आहे. हा कथासंग्रह, एक अस्सल कलाकृती म्हणून जाणत्यांना नक्कीच विचारात घ्यावा लागेल. ’

कथासंग्रह वाचला आणि प्रा. यशवंत माळीसरांना तो आवडल्याचा फोन केला. फोनवर बोलताना कळलं, हा काही त्यांचा पहिला कथासंग्रह नव्हे. ‘केकत्यांचा बिंडा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. १९९२साली तो प्रकाशित झाला. त्याच्या 3 आवृत्या निघाल्या आणि त्याला ३ पुरस्कार मिळाले. त्यानंतर’ पोटगी’, ‘किराळ’, ‘परतीचा पाऊस’, ‘उलघाल’ असे कथासंग्रह निघाले. ‘वेगळी वाट’ हा कथासंग्रह फेब्रुवारी२००५ मध्ये

प्रकाशित झालाय. ‘परतीचा पाऊस’ला विविध संस्थांचे ७ पुरस्कार, तर ‘किराळ’ला १६ पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय, त्यांचा ‘सखी’ हा कविता संग्रह, ‘प्रतिज्ञा, आणि मिनीचे लग्न या बाल कादंबर्‍या आणि ‘माझी शाळा’ हा बालगीतांचा संग्रह प्रकाशित आहे. या सार्‍यांनाच विविध संस्थांचे पुरस्कार आहेत. त्यांच्या एकूण पुरस्कारांची संख्या ९० होते, असं कळलं. म्हणजे माळी सरांनी पुस्तक काढावं आणि त्याला पुरस्कार मिळावा, हे ठरल्यासारखंच झालं जणू. ‘सीनातीर’ ( जामखेड – जी. अहमदनगर ) केवळ त्यांच्याच १० कथांचा २०२१ साली दिवाळी अंक काढला. ‘उलघाल’मधील ‘थायलंडची तुळस’ या कथेचा डॉ. चंद्रकांत

पोकळे यांनी कन्नडमध्ये अनुवाद केला, तर ‘किराळ’ या कथासंग्रहाचा हिंदीमध्ये अनुवाद झालाय. शब्बीरभाई बिलाल शेख यांनी तो केलाय. ‘‘केकत्यांचा बिंडा’ या कथासंग्रहाचा इंग्रजीमध्ये अनुवाद डॉ. संजय बोरूडे करताहेत. त्यांच्या काही निवडक कथांचे उडियातही अनुवाद होत आहेत.

माळी सरांची ही मिळकत ऐकून मी थक्क झाले. वाटलं, आपल्या माहितीचा परीघ किती इवलासा असतो.

‘उलघाल’ ही कथासंग्रहातील पहिलीच कथा. तिची नायिका अबोली. ती बडी माँकडे मोलकरीण आहे. एकदा बडी माँ आणि त्यांचे पती आठ दिवसांच्या टूरवर जातात. घरात तरुण मुलगा आहे. मनजीत. ती कामाला घरी यते, तेव्हा मनजीत व्यायाम करत असतो. त्याचं घामाने निथळणारं पीळदार रूप पाहून अबोलीचं मन तिकडे ओढ घेतं. मग अनेक प्रसंगातून ती त्याला निसटते –पुसटते स्पर्श करते. हे प्रसंग मुळातूनच वाचायला हवेत. मनजीतलाही तिचे आकर्षण वाटते. ती तरुण आहे. सुंदर आहे. नीट-नेटकीही आहे. तो कामाला जायला निघतो, तर त्याला गाडी चालवतानाही तीच पुढे दिसते. पण तो मनाशी निश्चय करतो, ‘तिच्या हरहुन्नरी मनाला कुठेही चुरगळू द्यायचं नाही. त्यावर कलंक लागू द्यायचा नाही. जखम होऊ

द्यायची नाही. मनात कसलीही उलघाल होऊ द्यायची नाही. ’ ओढाळ आणि आतुर मनाची अतिशय मुग्ध अशी कथा आहे ही.

‘न सुटलेले कोडे’ ही माया इनामदारची कथा. माया सुरेख आहे. सतत स्वत:ला आरशात पाहून ती स्वत:वरच खुश असते. इनामदारीचा डामडौल आता त्यांच्या वाड्याप्रमाणेच ढासळलेला आहे. आई आजारी. तिला मायाच्या लग्नाची मुळीच काळजी नाही. पुढे मायाला नोकरी लागते. कामात ती व्यवस्थित, नीट-नेटकी आहे. ती कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. पण तिच्यावर मेहेरनजर आहे, ती तिच्या

बॉसची. कारण ही अविवाहित सुंदरी आहे. तिथे येणारा प्रत्येक नवा बॉस तिच्याशी संबंध ठेवतो. या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार? आई की आपण ? याचं तिला कोडं पडतं. आता ती बरीच प्रौढ झाली आहे. केस मुळापासून पांढरे होऊ लागले आहेत. पण तरुण दिसणं, ही तिची गरज आहे.

‘थायलंडची तुळस’ म्हणजे किमी. नायक थायलंडच्या टूरवर गेला असताना तिथे ती त्यांची गाईड होती. तिला नायकाबद्दल विशेष आत्मीयता वाटते. गप्पा, जवळीक यातून ती त्याच्याशी विशेष सलगी करते. परतताना विमानातळावरून एका वेगळ्या रस्त्याने त्याला बाहेर काढते. टॅक्सीने एका जागी नेते. ती सांगते, तिचा नवरा हिजडा आहे. दोघे एकरूप होतात. ती लगेचच त्याला विमानतळावर आणून सोडते. खाऊचा पुडा म्हणून ती त्याला एक चिठ्ठीवर मेसेज पाठवते. ती म्हणते, ‘तुझ्या भेटीने माझ्या सुखाचा रंग बदलला. मी तृप्त आहे. मी लवकरच आई होईन. त्याचे नाव तुझ्या नावाचा अर्थ असलेले थायी भाषेतले नाव ठेवीन. ’ तिला नायक ‘थायलंडची तुळस’ का म्हणतो, ते कथा वाचूनच समजून घ्यायला हवं.

.. ‘न सुटलेले कोडे’ आणि ‘‘थायलंडची तुळस’ या दोन्ही कथेत शरीरसंबंधाचा केवळ उल्लेख आहे. कुठेही उत्तानता नाही, हे लेखकाचे कौशल्य. वरील तिन्ही कथांचा आशय- विषय वेगळा असला, तरी यात एक अंत:सूत्र आहे, असे मला वाटते.

‘इगत’, ‘रतीब’, ‘शुटिंग’, ‘निवडणूक’ या ग्रामीण बाज असलेल्या कथा, गावरान बोली, संवादातून लोकांचे बेरकीपण व्यक्त होणारे, परिसर, प्रसंग, व्यक्ती आपण वाचत नाही, तर डोळ्यांनी बघतोय, अशी शैली. ‘इगत’ ही कथा तानाजी आणि हणम्या या दोन चुलत भावांची. भाऊ कसले वैरीच. जमिनीवरून वाद, भांडणे, मारामारी. एकदा तानाजी मारामारी केली म्हणून तालुक्याला जाऊन हाणमाविरुद्ध केस करतो. यातू बालबाल बचावण्यासाठी हाणमा कोणती ‘इगत’ साधतो, ते प्रत्यक्ष कथेतच वाचायला हवे.

तात्यानानांच्या मळ्यात ‘शुटिंग’ होणार, अशी बातमी पंचक्रोशीत पसरते. शुटिंग बघायला अख्खं गाव लोटतं. दिवसभर वाट पाहूनही तिथे कोणी येत नाही. मग कळतं, ती अफवा होती. लोक परततात. परतताना लोक तात्यानानांच्या मळ्याचा विध्वंस कसा करतात हे लेखकाने अगदी बारकाईने, तपशीलवार दिले आहे. ही अफवा कुणी आणि का उठवली, हे कथेतच वाचायला हवं.

प्रवास, सावली, दिशाहीन, पेन्शन, सत्कार, स्थलांतर, मी पुढे पुढे कथा वाचत जाते. प्रत्येक कथा वाचून झाली, की वाटतं, याचा समावेश परिचयात करायला हवा…. करायलाच हवा…. पण किती आणि काय

काय लिहिणार?

`व्यक्तिचित्रणाचा एक नमूना म्हणून बडी माँच्या बोलण्याबद्दल ( उलघाल ) त्यांनी काय लिहिले आहे, ते बघा. ‘चावी फिरवल्याबरोबर नळातून पाणी यायच्या आधी भसा-भसा वावटळासारखी हवा यावी, आणि पाण्याच्या फवार्‍याबरोबर नुसताच आवाज यावा, तसं बडीमाँचं बोलणं. काही कारण असू द्या की नसू द्या, त्यांचं तोंड अखंड चालू असायचं. कुणाशीही त्या रोखून बघतच बोलायच्या. बोलताना दारातल्या पायपुसण्याला खेटरं टराटरा पुसावीत, तसं डाव्या हाताच्या वाढलेल्या नखांनी साडीवरूनच डावी मांडी खरा-खरा खाजवणं मनमुराद सुरू असायचं. ’

‘न सुटलेलं कोडं’ मधील मायाच्या आजारी आईबद्दल त्यांनी लिहिलय, ‘आयुष्याच्या महावस्त्रात नकोसं

वाटत राहिलेल्या एकेका दिवसाचे मृत्यूच्या वाटेवर ठिगळ चिकटवत पडून राहिल्या. ’

—- प्रा. माळी यांच्या व्यक्तिचित्रणात व्यक्तीच्या बाह्य रूपदर्शनाबरोबरच त्याच्या मनातील विचारही त्यांनी बारकाव्याने, तपशीलाने दिले आहेत. सर्वच कथांमधील पात्रात असे बारकाव्याने केलेले मनोविश्लेषण दिसत असले, तरी, ‘इच्छामरण’, ‘दिशाहीन’, ‘पेन्शन’, ‘प्रवास’, ‘निवडणूक’, ‘सत्कार’, ‘निर्णय’ या कथांचा यासाठी आवर्जून उल्लेख करावा लागेल.

रचना स्वामी या ‘समकालीन कथांमधील मनोविश्लेषणाचा’ प्रबंधासाठी अभ्यास करताहेत. त्यात समकालीन कथांच्या तूलनेत, प्रा. यशवंत माळी यांच्या कथेतील मनोविश्लेषणाचा प्राधान्याने अभ्यास करत आहेत.

प्रा. यशवंत माळी यांच्या कथा अधिकाधिक कसदार आणि लौकिकसंपन्न होतील याची ग्वाही ‘उलघाल’ हा कथासंग्रह निश्चितपणे देतो.

परिचय –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #267 ☆ बढ़ती संवेदनशून्यता– कितनी घातक… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख बढ़ती संवेदनशून्यता– कितनी घातक। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 267 ☆

☆ बढ़ती संवेदनशून्यता– कितनी घातक… ☆

‘कुछ अदालतें वक्त की होती हैं, क्योंकि जब समय जवाब देता है, ग़वाहों की ज़रूरत नहीं होती और सीधा फैसला होता है’ कोटिशः सत्य हैं और आजकल इनकी दरक़ार है। आपाधापी व दहशत भरे माहौल में चहुँओर अविश्वास का वातावरण तेज़ी से फैल रहा है।  हर दिन समाज में घटित होने वाली फ़िरौती, दुष्कर्म व हत्या के हादसों में बेतहाशा वृद्धि हो रही है। संवेदनहीनता इस क़दर बढ़ रही है कि इंसान इनका विरोध करने का साहस नहीं जुटा पाता बल्कि ग़वाही देने से भी भयभीत रहता है, क्योंकि वह हर पल दहशत में जीता है और सदैव आशंकित रहता है कि यदि उसने ऐसा कदम उठाया तो वह और उसका परिवार सुरक्षित नहीं रहेगा। सो! उसे ना चाहते हुए भी नेत्र मूँदकर जीना पड़ता है।

आजकल किडनैपिंग अर्थात् अपहरण का धंधा ज़ोरों पर है। अपहरण बच्चों का हो, युवकों-यवतियों का– अंजाम एक ही होता है। फ़िरौती ना मिलने पर उसे मौत के घाट उतार दिया जाता है या हाथ-पाँव तोड़कर बच्चों से भीख मंगवाने का धंधा कराया जाता है या ग़लत धंधे में झोंक दिया जाता है, जहाँ वे दलदल में फंस कर रह जाते हैं। जहाँ तक बालिकाओं के अपहरण का संबंध है, उनकी अस्मिता से खिलवाड़ होता है और उन्हें दहिक शोषण के धंधे में धकेल कोठों पर पहुंचा दिया जाता है। वहाँ उन्हें 30-40 लोगों की हवस का शिकार बनना पड़ता है। रात के अंधेरे में सफेदपोश लोग उन बंद गलियों में आते हैं, अपनी दैहिक क्षुधा शांत कर भोर होने से पहले लौट जाते हैं, ताकि वे समाज के समक्ष दूध के धुले बने रहें और सारा इल्ज़ाम उन  मासूम बालिकाओं व कोठों के संचालकों पर रहे।

जी हाँ! यही है दस्तूर-ए-दुनिया अर्थात् ‘शक्तिशाली विजयी भव’ अर्थात् दोषारोपण सदैव दुर्बल व्यक्ति पर ही किया जाता है, क्योंकि उसमें विरोध करने की शक्ति नहीं होती और यह सबसे बड़ा अपराध है। गीता में यह उपदेश दिया गया है कि ज़ुल्म करने वाले से बड़ा दोषी ज़ुल्म सहने वाला होता है। अमुक स्थिति में हमारी सहनशक्ति हमारे दुश्मन होती है, अर्थात् इंसान स्वयं अपना शत्रु बन जाता है, क्योकि वह ग़लत बातों का विरोध करने का सामर्थ्य नहीं रखता। मेरे विचार से जिस व्यक्ति में ग़लत को ग़लत कहने का साहस नहीं होता, उसे जीने का अधिकार नहीं होना चाहिए। सत्य की स्वीकार्यता व्यक्ति का सर्वोत्तम गुण है और इसे अहमियत ना देना जीवन की सबसे बड़ी त्रासदी है।

आजकल लिव-इन का प्रचलन बढ़ता जा रहा है। इसमें दोष युवतियों का है, जो अपने माता-पिता के प्यार-दुलार को दरक़िनार कर, उनकी अस्मिता को दाँव पर लगाकर एक अनजान व्यक्ति पर अंधविश्वास कर चल देती है उसके साथ विवाह पूरव उसके साथ रहने ताकि वह उसे देख-परख व समझ सके। परंतु कुछ समय पश्चात् जब वह पुरुष साथी से विवाह करने को कहती है, तो वह उसकी आवश्यकता को नकारते हुए यही कहता है कि विवाह करके ज़िम्मेदारियों का बोझ ढोनेने का प्रयोजन क्या है– यह तो बेमानी है। परंतु उसके आग्रह करने पर प्रारंभ हो जाता है मारपीट का सिलसिला, जहाँ उसे शारीरिक व मानसिक रूप से प्रताड़ित किया जाता है। श्रद्धा व आफ़ताब, निक्की व साहिल जैसे जघन्य अपराधों में दिन-प्रतिदिन इज़ाफा होता जा रहा है। युवतियों के शरीर के टुकड़े करके फ्रिज में रखना, उन्हें निर्जन स्थान पर जाकर फेंकना इंसानियत की सभी हदों को पार कर जाता है। साहिल का निक्की की हत्या करने के पश्चात् दूसरा विवाह रचाना सोचने पर विवश कर देता है कि इंसान इतना संवेदनहीन कैसे हो सकता है? यह तो संवेदनशून्यता की पराकाष्ठा है। मैं इस अपराध के लिए उन लड़कियों को दोषी मानती हूँ, जो हमारी सनातन संस्कृति का अनुकरण न कर पाश्चात्य की जूठन स्वीकार करने में फख़्र महसूसती हैं। वैसे ही पित्तृसत्तात्मक युग में हम यह  अपेक्षा कैसे कर सकते हैं कि पुरुष की सोच बदल सकती है। वह तो पहले ही स्त्री को अपनी धरोहर / बपौती समझता था। आज भी वह उसे उसका मालिक समझता है तथा जब चाहे उसे घर से बाहर का रास्ता दिखा सकता है। उसकी स्थिति खाली बोतल के समान है, जिसे वह बीच राह फेंक सकता है; वह उस पर शक़ के दायरे में अवैध संबंधों का  इल्ज़ाम लगा पत्नी व बच्चों की निर्मम हत्या कर सकता है।  वास्तव में पुरुष स्वयं को सर्वश्रेष्ठ ही नहीं, ख़ुदा समझता है, क्योंकि उसे कन्या-भ्रूण को नष्ट करने का अधिकार प्राप्त है।

‘औरत में जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाज़ार दिया / जब जी चाहा मसला-कुचला, जब जी चाहा दुत्कार दिया।’ ये पंक्तियाँ औरत की नियति को उजागर करती हैं। वह अपनी जीवन-संगिनी को अपने दोस्तों के हम-बिस्तर बनाने का जघन्य अपराध कर सकता है। वह पत्नी पर अकारण इल्ज़ाम लगा कटघरे में खड़ा सकता है। वैसे भी उस मासूम को अपना पक्ष रखने का अधिकार प्रदान ही कहाँ किया जाता है? कचहरी में भी क़ातिल को भी अपना पक्ष रखने व स्पष्टीकरण देने का अधिकार होता है। इतना ही नहीं एक दुष्कर्मी पैसे व रुतबे के बल पर उस मासूम की जिंदगी के सौदे की पेशकश करने को स्वतंत्र है और उसके माता-पिता उसे दुष्कर्मी के हाथों सौंपने को तैयार हो जाते हैं।

वास्तव में दोषी तो उसके माता-पिता हैं जो अपनी नादान बच्ची पर भरोसा नहीं करते। वैसे भी वे अंतर्जातीय विवाह की एवज़ में कभी ऑनर किलिंग करते हैं, तो कभी दुष्कर्म का हादसा होने पर समाज में निंदा के भय से उसका तिरस्कार कर देते हैं। उस स्थिति में वे भूल जाते हैं कि वे उस निर्दोष बच्ची के जन्मदाजा हैं। वे उसकी मानसिक स्थिति को अनुभव न करते हुए उसे घर में कदम तक नहीं रखने देते। अच्छा था, तुम मर जाती और उसकी ज़िंदगी नरक बन जाती है। अक्सर ऐसी लड़कियाँ आत्महत्या कर लेती हैं या हर दिन ना जाने वे कितने सफेदपोश मनचलों की हमबिस्तर बनने को विवश होती हैं। काश! हम अपने बेटे- बेटियों को बचपन से यह एहसास दिला पाते कि वे अपने संस्कारों अथवा मिट्टी से जुड़े रहते व सीमाओं का अतिक्रमण नहीं करते। वे उसे आश्वस्त कर पाते कि यह घर उसका भी है और वह जब चाहे, वहाँ आ सकती है।

यदि हम परमात्मा की सत्ता पर विश्वास रखते हैं, तो हमें इस तथ्य को स्वीकारना पड़ेगा कि परमात्मा की लाठी में आवाज़ नहीं होती और कुछ फैसले रब्ब के होते हैं और जब समय जवाब देता है तो ग़वाहों की ज़रूरत नहीं होती– सीधा फैसला होता है। कानून तो अंधा व बहरा है, जो गवाहों पर आश्रित होता है और उनके न मिलने पर जघन्य अपराधी भी छूट जाते हैं और निकल पड़ते हैं अगले शिकार की तलाश में और यह सिलसिला थमने का नाम नहीं लेता। हमारे यहाँ फ़ैसले बरसों बाद होते हैं, जब उनकी अहमियत ही नहीं रहती। इतना ही नहीं, मी टू ने भी अपना खाता खोल दिया है। पच्चीस वर्ष पहले घटित हादसे को भी उजागर कर, आरोपी पर इल्ज़ाम लगा हंसते-खेलते परिवार की खुशियों में सेंध लगा लील सकती हैं; उन्हें कटघरे में खड़ा कर सकती हैं। वैसे यह दोनों स्थितियाँ विस्फोटक हैं, लाइलाज हैं, जिसके कारण समाज में विसंगति व विद्रूपताएं निरंतर बढ़ गई हैं, जो स्वस्थ समाज के लिए घातक हैं।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक समीक्षा ☆ संजय दृष्टि – अधरंगे ख़्वाब  — कवि- राजेंद्र शर्मा ☆ समीक्षक – श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। आज से प्रत्येक शुक्रवार हम आपके लिए श्री संजय भारद्वाज जी द्वारा उनकी चुनिंदा पुस्तकों पर समीक्षा प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)

? संजय दृष्टि –  समीक्षा का शुक्रवार # 26 ?

? अधरंगे ख़्वाब  — कवि- राजेंद्र शर्मा ?  समीक्षक – श्री संजय भारद्वाज ?

पुस्तक का नाम- अधरंगे ख़्वाब

विधा- कविता

कवि- राजेंद्र शर्मा

प्रकाशक- बोधि प्रकाशन, जयपुर 

? एक सिनेमेटोग्राफर की डायरी : अधरंगे ख़्वाब  श्री संजय भारद्वाज ?

सपना या ख़्वाब मनुष्य की जीवन यात्रा के अभिन्न अंग हैं। सुप्त इच्छाएँ, आकांक्षाएँ,  अव्यक्त विचार प्राय: ख़्वाब का आकार ग्रहण करते हैं। अधिकांशत: ख़्वाब चमकीले या रंग- बिरंगे होते हैं। कवि राजेंद्र शर्मा की ख़्वाबों की दुनिया उनके कविता संग्रह ‘अधरंगे ख़्वाब’ में उतरी है। अलबत्ता ये ख़्वाब कोरी कल्पना के धरातल से नहीं अपितु जीवन के कठोर यथार्थ एवं जगत की रुक्ष सच्चाइयों से उपजे हैं। यही कारण है कि कवि इन्हें अधरंगे ख़्वाब कहता है।

‘अधरंगे ख़्वाब’ की कविताओं में स्मृतियों की खट्टी-मीठी टीस है। राजनीति के विषैलेपन पर प्रहार है। लॉकडाउन के समय की भिन्न-भिन्न घटनाओं के माध्यम से तत्कालीन मनोदशा का वर्णन है। नगरवधुओं की पीड़ा के चित्र हैं। आचार-विचार  में निरंतर उतर रही कृत्रिमता पर चिंता है। राष्ट्रीयता पर चिंतन है। पर्यावरण के नाश की पीड़ा है। मनुष्य जीवन के विविध रंग हैं। भीतर ही भीतर बहती परिवर्तन की, बेहतरी की इच्छा है। सारी आशंकाओं के बीच संभावनाओं की पड़ताल है।

स्मृतियों का रंग कभी धुंधला नहीं पड़ता अपितु विस्मृति का हर प्रयास, स्मृति को गहरा कर देता है। निरंतर गहराती स्मृतियों की ये बानगियाँ  देखिए-

ये कैसा अमरत्व पा लिया है तूने

मेरे मस्तिष्क की गहराइयों में,

मान्यता प्राप्त किसी दैवीय शक्ति की तरह, अपरिवर्तित सौंदर्य, लावण्य, युवा अवस्था।

प्रेम की अनन्य मृग मरीचिका कुछ यूँ शब्दों में अभिव्यक्त होती है-

जिसे मैं ढूँढ़ रहा हूँ वो मुझमें ही बसती है,

बिन उसके कटता नहीं इक पल मेरा,

ऐसी उसकी हस्ती है।

राज करने की नीति अर्थात राजनीति। इस शब्द के आविर्भाव के समय संभवत: इससे राज्य- शासन के आदर्श नियम, उपनियम वांछित रहे हों पर कालांतर में येन केन प्रकारेण ‘फूट डालो और राज करो’  के इर्द-गिर्द ही राजनीति सिमट कर रह गई । कवि को यह विषबेल बुरी तरह से सालती है।

ये जानते हैं

ज्ञानी से मूर्ख को गरियाना,

ये जानते हैं

मूर्ख से ज्ञानी को लठियाना,

ये जानते हैं

मेरी कमज़ोरी,

ये जानते हैं

तेरी कमज़ोरी।

आम जनता में व्याप्त बिखराव की कमज़ोरी के दम पर सत्ता पिपासु अपनी-अपनी रोटी सेंकते हैं। उनकी आपसी सांठगांठ की पोल खोलती यह अभिव्यक्ति देखिए-

अनीति से नीति के इस हवन में

षड्यंत्र के नाम पर

आहुतियाँ यूँ ही पड़ती रहेंगी,

जय तुम्हारी भी होगी,

जय हमारी भी होगी,

कभी रोटियाँ तुम बेलो,

कभी रोटियाँ हम सेंकें,

कभी हम रोटियाँ बेलें,

कभी रोटियाँ तुम सेंको ,

यही तो समझदारी है,

हम हैं एक,

अलग-अलग कहाँ हैं..!

लॉकडाउन वर्तमान पीढ़ी द्वारा देखा गया अपने समय का सबसे भयावह सच है। अपने घरों में क़ैद हम क्या सोच रहे थे, इस सोच को विभिन्न घटनाओं पर टिप्पणियों के रूप में उपजी विविध कविताओं में कवि ने उतारा है।

समाज लोगों का समूह है। आधुनिकता ने हमें अकेला कर दिया है। इस लंबी नींद को तोड़ने का आह्वान कवि करता है-

अब मेरी आँखें खुल चुकी थीं,

मैंने उठकर अपने कमरे के

सारे रोशनदान,

सारी खिड़कियाँ,

दरवाज़े खोल दिए और

देखते ही देखते मेरा कमरा

एक सुनहरी रोशनी से भर गया।

भौतिक विकास के नाम पर पर्यावरण और सहजता का विनाश हो चुका। हमने इर्द-गिर्द और मन के भीतर काँक्रीट के जंगल उगा लिए हैं। प्राकृतिक जंगल हरियाली फैलाता है, काँक्रीट का जंगल अशेष को अवशेष कर देता है।

जहाँ स्वच्छ, स्वस्थ, प्राणवायु के नाम पर

बचे रह गए हैं कुछ एक पर्यटन स्थल,

निर्मल जल के नाम पर कुछ एक नदी तट,

और वे भी कब तक रहेंगे शेष?

न जाने किस दिन चढ़ जाएँगे

विकास के नाम पर विनाश की भेंट..!

छमाछम बारिश में भीगना, अब असभ्यता हो चला है। खुद को ख़ुद में डूबते देखना तो कल्पनातीत ही है-

आज मैंने

फिर एक बार

काग़ज़ की नाव बनाई,

फिर एक बार

उसे घर के पास

नाली के तेज़ बहते पानी में उतारा,

फिर एक बार उसमें बैठ

अपने को

दूर तलक जाते देखा,

फिर एक बार

आज बरसों बरस बाद,

ख़ुद को ख़ुद में डूबते देखा।

कविता सपाटबयानी नहीं होती। कविता में मनुष्य का मार्गदर्शन करने का तत्व अंतर्भूत होता है। सूक्ति नहीं तो केवल उक्ति का क्या लाभ?

निर्णय वही सही होता है, जो

सही समय पर लिया गया हो

वक्त के बाद लिया गया सही निर्णय भी,

हानि के उपरांत

उसका प्रायश्चित तो हो सकता है,

उस क्षति की पूर्ति नहीं।

‘बंद कमरे-बौद्धिक चर्चाएँ’ कविता में रोज़ाना घटती ऐसी घटनाओं का उल्लेख है जो हमें विचलित कर देती हैं। तथापि हम समस्या पर मात्र दुख जताते हैं। उसके हल के लिए कोई सूत्र हमारे पास नहीं होता। कहा गया है, ‘य: क्रियावान स पंडित:।’ जिह्वालाप से नहीं, प्रत्यक्ष कार्यकलाप से हल होती हैं समस्याएँ।

परिवर्तन सृष्टि का एकमात्र नियम है जो कभी परिवर्तित नहीं होता। हर समय परिवर्तन घट रहा है। अत: हर समय परिवर्तन के साथ कदमताल आवश्यक है-

कभी मैं बहुत छोटा था,

धीरे-धीरे बड़ा हुआ

और अब

तेज़ी से बूढ़ा हो रहा हूँ

किसी भी देश की सेना की शक्ति अस्त्र-शस्त्र होती है। भारत के संदर्भ में मनोबल और बलिदान का भाव हमारी सेना को विशेष शक्तिशाली बनाता है। ‘लीला- रामकृष्ण’ एक सैनिक और उसकी मंगेतर की प्रेमकथा है। यह काव्यात्मक कथा दृश्य बुनती है, दृश्य से तारतम्य स्थापित होता है और पाठक कथा से समरस हो जाता है।

प्रकृति बहुरंगी है। प्रकृति में सब कुछ एक-सा हो तो एकरसता हो जाएगी। मनुष्य को सारे रंग चाहिएँ, मनुष्य को रंग-बिरंगी सर्कस चाहिए।

ये दुनिया एक सर्कस है

जिसमें कई रूप-रंग,

क़द-काठी वाले स्त्री-पुरुष,

जिसमें कई भिन्न जातियों-प्रजातियों,

नस्लों वाले जीव-जंतु,

जिसमें कई तरह के श्रृंगार, साज़-ओ-सामान, परिधानों से लदे-फदे कलाकार,

अलग-अलग भाषा शैली,

गीत-संगीत के समायोजन से,

हास्य, व्यंग्य, करुणा,

नव रसों का रसपान कराते हैं,

टुकड़े-टुकड़े दृश्यों से

एक सम्पूर्ण परिदृश्य को

परिलक्षित करते हैं,

यही बहुरूपता ख़ूबसूरती है इसकी,

जो जोड़ती है आपको, मुझको इसके साथ।

मनुष्य में अपार संभावनाएँ हैं।  ईश्वरीय तत्व तक पहुँचने यात्रा का अवसर है मनुष्य का जीवन। इस जीवन में हम सबको प्राय: अच्छे लोग मिलते हैं। ये लोग सद्भावना से अपना काम करते हैं, दूसरों के काम आते हैं। ये लोग किसी तरह का कोई एहसान नहीं जताते और काम होने के बाद दिखाई भी नहीं देते। जगत ऐसे ही लोगों से चल रहा है। वे ही जगत के आधार हैं, नींव हैं और नींव दिखाई थोड़े ही देती है।

वे लोग जो एक बार मिलकर

दोबारा फिर कभी नहीं मिलते हैं,

वे लोग जो पहली मुलाक़ात में

सीधे-मन में समा जाते हैं,

वे लोग कहाँ चले जाते हैं?

नव वर्ष पर नए संकल्प लेना और गत वर्ष लिए संकल्पों को भूल जाना आदमी की स्वभावगत निर्बलता है। यूँ देखे तो हर क्षण नया है, हर पल वर्ष नया है।

न वो कहीं गया था, न ही वो कहीं से आ रहा है, उसे तो हमने अपनी सुविधा के लिए बांट रखा है।

अति सदैव विनाशकारी होती है। स्वतंत्रता की अति है उच्छृंलता। लोकतंत्र में अभिव्यक्ति की स्वतंत्रता के नाम पर अनेक बार देश को ही कटघरे में खड़ा करने, येन केन प्रकारेण चर्चा में रहने की दुष्प्रवृत्ति के अनेक उदाहरण देखने को मिलते हैं। इन दुष्प्रवृत्तियों को कवि खरी- खरी सुनाता है-

ये देश है तो

ये धर्म, ये मज़हब, ये सम्प्रदाय,

ये जाति, ये प्रजाति,

ये गण, ये गोत्र,

ये क्षेत्र, ये प्रांत,

ये भाषा, ये बोली,

ये रुतबा, ये हैसियत,

ये पक्ष, ये विपक्ष,

ये स्वतंत्रता, ये आज़ादी,

सब हैं..,

अन्यथा

कुछ भी नहीं..!

जीवन संभावनाओं से लबालब भरा है। अनेक बार परिस्थितियों से घबराकर लोग संभावना को आशंका मान बैठते हैं और जीवन अवसर से अवसाद की दिशा में मुड़ने लगता है।

कभी-कभी जीवन में ऐसा समय आता है,

जब व्यक्ति स्वयं ही

ज्ञान के, सूचना के

सभी मार्गों को अवरुद्ध कर लेता है,

इस वक्त वह एक भ्रम की स्थिति में जीता है,

वह अपने सत्य को ही

अंतिम सत्य मान बैठता है।

मनुष्य संवेदनशील प्राणी है। राजेंद्र शर्मा की रचनाओं में संवेदनशीलता उभर कर सामने आती है। ‘पापा याद है ना’ ऐसे ही एक मार्मिक रचना है। ‘नगरवधु’ विषय पर तीन कविताएँ हैं। पुरुष का स्त्री बनाकर लिखना लिंग पूर्वाग्रह या जेंडर बायस से मुक्ति की यात्रा है। यह अच्छी बात है।

इस संग्रह की अधिकांश रचनाएँ कथात्मक हैं। बल्कि यूँ कहें कि कथाएँ, घटनाएँ, अपने विवरण के साथ कविता में उतरी हैं तो अधिक तर्कसंगत होगा। शीर्षक कविता ‘अधरंगे ख़्वाब’  एक सार्वजनिक व्यक्तित्व के जीवन के उतार-चढ़ाव की लंबी कविता है। वर्तमान में न्यायालय के विचाराधीन इस प्रकरण में महत्वाकांक्षा के चलते प्रकाश से अंधकार की यात्रा पर कवि कुछ इस तरह टिप्पणी करता है-

महत्वाकांक्षी होना तो सुन्दर बात है

पर अति महत्वकांक्षी होना

बिलकुल सुन्दर बात नहीं ।

राजेंद्र शर्मा की रचनाओं की भाषा मिश्रित है शिल्प की तुलना में भाव मुखर है। कोई आग्रह नहीं है। जो देखा, समझा, जाना, काग़ज़ पर उतरा। पाठक उसे अपनी तरह से ग्रहण कर सकता है। यह इन रचनाओं की शक्ति भी है।

कवि सिनेमेटोग्राफर हैं। इन कविताओं में सिनेमेटोग्राफर की मन की आँख के लेंस से दिखते दृश्य उतरे हैं। जो कुछ सिनेमेटोग्राफर देखता गया, संवेदना की स्याही में डुबोकर उसे कथात्मक, घटनात्मक या विवरणात्मक रूप से लिखता गया। अतः ‘अधरंगे ख़्वाब’ में संग्रहित कविताओं को मैं ‘एक सिनेमेटोग्राफर की डायरी’ कहना चाहूँगा।

राजेंद्र शर्मा इसी तरह डायरी लिखते रहें। शुभं अस्तु।

© संजय भारद्वाज  

नाटककार-निर्देशक

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ तुमसे क्या छुपाना 2025 ☆ आत्मकथ्य – श्री राजेश सिंह ‘श्रेयस’ ☆

श्री राजेश सिंह ‘श्रेयस’

 ☆ पुस्तक चर्चा ☆ 

☆ तुमसे क्या छुपाना 2025 ☆ आत्मकथ्य – श्री राजेश सिंह ‘श्रेयस’ ☆

(‘क्षय मुक्त भारत’ की संकल्पना पर आधारित सामाजिक उपन्यास)

(पुस्तक समीक्षक श्री राम राज भारती जी के अनुसार “उपन्यास लेखन में श्रेयस जी पर मुंशी प्रेमचंद एवं रामदेव धुरंधर का सम्यक प्रभाव पड़ा है ।” यह पंक्ति अपने आप में श्री श्रेयस जी के संवेदनशील लेखन को साहित्यिक जगत का प्रतिसाद है। सुप्रसिद्ध प्रवासी भारतीय वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी द्वारा लिखित भूमिका ने उपन्यास को निश्चित ही पारस स्पर्श दिया है। श्री राजेश सिंह ‘श्रेयस’ जी को हार्दिक बधाई, शुभकामनाएं और अभिनंदन।)

पुस्तक – तुमसे क्या छुपाना 2025

लेखक – श्री राजेश कुमार सिंह ‘श्रेयस’

प्रकाशक – युगधारा फ़ाउंडेशन एवं प्रकाशन, लखनऊ उत्तरप्रदेश्ज

पृष्ठ संख्या – 288

मूल्य – ₹380

Amazon link 👉 तुमसे क्या छुपाना 2025

Flipkart link 👉 तुमसे क्या छुपाना 2025

“तुमसे क्या छुपाना” क्षय मुक्त भारत की संकल्पना पर आधारित यह उपन्यास क्षय उन्मूलन कार्यक्रम और उससे जुड़े हुए “सौ दिवसीय समग्र टीबी अभियान” की समग्रता को स्वयं में सजोये एक ऐसा कथात्मक दस्तावेज है, जिसमें क्षय रोग के कारण, निवारण एवं जन जागरण जैसे समस्त पक्ष मार्मिकता सामाजिकता और संवेदनशीलता से सजे कथानकों के साथ सुसज्जित ढंग से सजोए गए हैं। उपन्यासकार ने जो कि स्वयं क्षय उन्मूलन कार्यक्रम से लगभग एक दशकों से दिल से जुड़ा है, उसने अपने पल-पल के अनुभव को इस साहित्यिक दस्तावेज में सजोने का प्रयास किया है। उपन्यास में जिन पक्षो को रखा है वे कुछ इस प्रकार है –

  • ‌उपन्यास की नायिका एवं उसके माता-पिता अभाव भरी जिंदगी और गरीबी में जीते हैं। अशिक्षा और अज्ञानता बस नायिका की माँ टीबी रोग का शिकार बन जाती है। पिता इलाज के लिए शहर ले जाते हैं लेकिन वह बच नहीं पाती है। पिता को इस बात का तब एहसास होता है कि यदि मैंने आशा बहू का कहना मान लिया होता, और पहले टीबी की जांच के लिए तैयार हो जाता तो मेरी सुखवंती मेरे पास होती।
  • नायिका देवनंती संघर्षशील युवती है। क्षय उन्मूलन कार्यक्रम से सामाजिक तौर पर जुड़ती है, जिसमें उसका सह नायक शशांक मुख्य भूमिका में आता है। सह नायक का मित्र भावेश क्षय रोग उन्मूलन कार्यक्रम का समर्पित कार्यकर्ता है।
  • सह नायक कोविड जैसे कठिन समय में किस प्रकार क्षय रोगीयों को ढूंढ निकालता है और उसकी इलाज कराता है, यह स्वयं में बेमिसाल है।
  • क्षय उन्मूलन कार्यक्रम का कार्यकर्ता भावेश कॉविड जैसे कठिन काल में उत्तर प्रदेश में किस प्रकार से दूसरे राज्यों से आए हुए क्षय रोगियों को जांच और दवा को  उपलब्ध कराने में उनका मदद करता है, इसका सच्चा और जीवंत उदाहरण प्रस्तुत करता है।राज्य स्तर से किया गया यह प्रयास सराहनीय है।
  • क्षय उन्मूलन कार्यक्रम में आशा बहू का कितना महत्वपूर्ण रोल है, उपन्यास बताने में सफल होता है। आशा किस प्रकार कार्य करती है, और किस प्रकार से क्षय रोगियों की ढूंढने में मदद करती है इसका चित्रण उपन्यास में है।
  • क्षय उन्मूलन कार्यक्रम का कार्यकर्ता किस तरह से सामजिक सामाजिक भागीदारी करते हुए क्षय रोगियों को ढूंढने से लेकर उनको इलाज पर लाने, पोषण भत्ता, निक्षय पोषण दिलवाने एवं उनको स्वस्थ होने तक लगा रहता है।
  • जन भागीदारी एवं निक्षेप पोषण योजना का जीवंत दृश्य इस उपन्यास में समाहित है।
  • गांव के मुखिया से लेकर विधायक, मंत्री तक किस तरह से इस कार्यक्रम में जुड़कर भागीदारी करते हैं।
  • टीबी चैंपियन और टीबी वॉरियर्स की भागीदारी और उनके मध्य का भावपूर्ण संवाद भी इस उपन्यास को सुखद बनाता है।
  • उपन्यास का अंतिम भाग क्षय मुक्त भारत की संकल्पना को साकार करता हुआ प्रतीत होता है।
  • उपन्यास सुखान्त है।
  • उपन्यास की नायिका जो स्वयं टीबी चैंपियन है वह अंत में उपन्यास के सह नायक के साथ परिणय सूत्र में बधती है। जहां शादी के जयमाल आदि नृत्य गाने -धूम धड़ाम के बीच होते हैं वहीं यह मिलन क्षय उन्मूलन कार्यकर्ताओं सामाजिक क्षेत्र के लोगों तथा क्षय उन्मूलन से जुड़े एक कार्यक्रम में एक रहस्योद्घाटन के रूप में होता है, यह इस उपन्यास के अंतिम भाग को अतीव मार्मिक एवं संदेश प्रद बना देता है।
  • उपन्यासकार आवरण पृष्ठ जिस पर “तुमसे क्या छुपाना” 2025 लिखा है, यह क्षय उन्मूलन वर्ष को इंगित करता हुआ, अपने उद्देश्य में सफल होता है।
  • उपन्यास क्षय उन्मूलन कार्यक्रम के साथ-साथ एक सामाजिक, मार्मिक प्रेम कथा पर आधारित आत्ममुग्ध करने वाले कथानक पर आधारित उपन्यास है।
  • प्रदेश के समस्त जनपदों के लगभग समस्त क्षय उन्मूलन कार्यक्रम से जुड़े हुए क्षय कार्यकर्ताओ तक पहुंच चुका है।
  • उपन्यास, राज्य कर्मचारी साहित्य संस्थान, उप्र द्वारा वर्ष 2024 में श्याम सुंदर दास पुरस्कार (₹ 1,00, 000/-) द्वारा सम्मानित है।
  • क्षय उन्मूलन वर्ष 2025 में यह उपन्यास अपने मूल उद्देश्य के साथ क्षय उन्मूलन अभियान में अग्रणी भूमिका निभाएगा तथा और अधिक सम्मान पाकर स्वयं को साहित्य के उच्च पायदान पर स्थापित करने में सफल होगा, ऐसा मेरा विश्वास है।

© श्री राजेश कुमार सिंह “श्रेयस”

कवि, लेखक, समीक्षक

लखनऊ, उप्र, (भारत )

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares