पण ते कधी कसं केव्हा सोबत घेऊन जाणार हे नक्की कळत नाही माणसाला.
त्याची वाट पहातच जगत असतो माणूस मरेपर्यंत.
पण जन्ममरणाच्या मधल्या काळातली उलथापालथ कधी आनंद देते, तर कधी पिळवटून टाकते मना सोबत तनालाही.
तन माणसाचं आवडत ठिकाण, कारण त्यातच त्याचा आत्मा असतो. तो त्याला बाह्यात्कारी सजवण्यातच आयुष्य खर्ची घालतो. कारण मनाचा तसाच हुकूम असतो. मेंदू मनाचा गुलाम पण देहावरचा शासनकर्ता. मग मनाचा आदेश धुडकावून लावण्याची त्याची कुठे हिंमत चालते.
मन मुलखाचेओढाळ, त्याला आवरघालणे महाकठीण. या सगळ्या गुंत्यात मनाचेच फावते. ते सगळ्यांची भंबेरी उडवून देते. आणि जगण्याचाच बट्याबोळ करून टाकते. म्हणूनच आत्मा आणि मन यांचा वितंडवाद मिटवण्यासाठी करगर उपाय शोधून ते अमलात आणावे लागतात. पण हे कामही सोपे नसते. त्यासाठी मनालाच मारावे लागते. खडतर तप साधना करावी लागते. आत्मबल एकवटावे लागते. आणि निर्णय घ्यावे लागतात. तसे केले तरच माणसाला च्यारीत्र्य प्राप्त होते व माणूस इतरांपेक्षा वेगळा ठरतो. वागतो. नाहीतर सामान्य राहूनच निघून जातो जगातून. म्हणूनच मनावर काबू मिळवा आणि जगासमोर चांगला माणूस म्हणून मिरवून निघून जा, शांतपणे. एका माहित नसलेल्या अनोळखी विश्वात.
“आत्मशांती” उपाहारगृह हे खादाडीसाठी एक लोकप्रिय ठिकाण. प्रत्यक्ष उपाहारगृहात बसून खाण्याचा आनंद तर घेता यायचाच, शिवाय कालानुरूप स्विगी, झोमॅटो आदिंवरून घरपोच खाणे मागवण्याची सोयही येथे होतीच. बरेच जण फोनवरून ऑर्डर करून खाणे तयार करून ठेवायला सांगायचे आणि स्वतः येऊन पार्सल घेऊन जायचे.
आजही तशीच एक फोनवर ऑर्डर आली होती. कोण्या संपतशेठचा फोन होता. अर्ध्या तासात येतो म्हणाला. अर्धा तास होऊन गेला, तास होत आला तरी संपतशेठचा पत्ता नाही. मग मॅनेजरने त्याला फोन करून आठवण करण्याचा प्रयत्न केले, दोन चार वेळा पूर्ण रिंग गेली तरी कोणी फोन उचललाच नाही. आणि मग नंतर फोन करायचा प्रयत्न केल्यावर “आत्मशांती”चा फोन ब्लॉक केल्याचं लक्षात आलं. ही ऑर्डर घ्यायला कोणी येणार नाही, संपत नावाने फोन करून कोणीतरी चावटपणा केला आहे हे मॅनेजरच्या लक्षात आलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मॅनेजरने संपतच्या फोनवर मेसेज पाठवला आणि समाज माध्यमांमध्ये या पूर्वपीठीकेसह तोच मेसेज प्रसिद्ध केला.
“प्रिय संपत (किंवा जे काही आपले खरे नाव असेल ते),
काल संध्याकाळी तुम्ही आमच्या “आत्मशांती”मध्ये फोन करून जेवणाची ऑर्डर दिली होतीत, परंतु तुम्ही ती ऑर्डर स्वीकारायला आला नाहीत. तुम्हाला फोन केले, तुम्ही ते उचलले नाहीत आणि नंतर तर आमचा फोन ब्लॉकच केलात.
तुम्ही न आल्याने आमच्या शेफची मेहनत आणि साधनसामुग्री फुकट जाणार होती, आमचं आर्थिक नुकसान होणार होतं आणि मुख्य म्हणजे ते अन्न फुकट जाणार होतं, याचं आम्हाला जास्त दुःख होतं.
आपल्या “आत्मशांती”चे ब्रीदवाक्य आहे – उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म ! आम्ही “आत्मशांती”कडे निव्वळ तुमचे पोट भरण्याचे आणि आमच्यासाठी नफ्याचे साधन म्हणून पाहत नाही, सात्विक अन्नदान ही आमची भूमिका आहे.
आम्ही देवाची प्रार्थना करतो, की तुम्हाला आमची ही भूमिका लक्षात येवो आणि काल तुम्ही जो चावटपणा केलात, अन्नाचा अपमान केलात, तसं तुम्ही पुन्हा केव्हाही कोणाहीबरोबर न करोत.
पण वाईटातून नेहमी चांगले निघते म्हणतात तसं आमच्याबाबतीत काल घडलं. तुमच्या न येण्यामुळे श्री संतोष जगदाळे या मेहनती माणसाला मदत झाली.
तुम्ही घेऊन न गेलेल्या ऑर्डरचे काय करायचे, ती फुकट कशी जाऊ द्यायची नाही या विचारात आम्ही असतानाच श्री संतोष “आत्मशांती”मध्ये आले. साठएक वर्षांचे संतोष एका गोदामावर रखवालदार म्हणून काम करतात. ते, त्यांची सून आणि त्यांची दोन नातवंडं पंधरा दिवसांपूर्वीच या शहरात आले आहेत. यांना नुकतीच नोकरी लागली आहे, पगार अजून व्हायचा आहे, सून लहानमोठी कामं करून दोन पैसे मिळवायची पण कालपासून ती आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहे.
आज दिवसभर त्यांना आणि घरच्यांना उपवासच घडला होता, म्हणून एक संधी घ्यावी म्हणून ते आमच्याकडे काही काम आहे का, आणि त्या मोबदल्यात काही अन्न मिळेल का हे विचारायला आले होते.
त्यांची हकीकत ऐकल्यावर आम्ही सर्वप्रथम तुमच्या ऑर्डरचे अन्न त्यांना खायला देऊ केले. संतोष ते अन्न तसंच घरी घेऊन चालले होते, पण आम्ही त्यांना आश्वस्त केलं की घरी घेऊन जायला वेगळे अन्न दिले जाईल.
ते इथेच आमच्याकडे भरपेट जेवले, तृप्त झाले. आमच्या व्यवस्थापनाने त्यांना आठवडाभरासाठी रोज काही पोटभरीचे अन्न देण्याचा वायदा केला आहे.
त्यांच्या सूनबाईंची प्रकृती सुधारल्यावर त्यांना आमच्याकडे काही नोकरी देता येईल का हेही आम्ही प्रयत्न करून पाहणार आहोत.
सून नातवंडांसाठी खाणे घरी घेऊन जाताना संतोषच्या चेहऱ्यावरून ओसंडून जाणारे समाधान पाहताना आम्हाला यज्ञपूर्तीचा आनंद लाभला.
अमळनेर हे माझं सासरगाव. जेव्हा मी अमळनेरला जाते तेव्हा अगदी निवांत असते. देहाने आणि मनानेही. माझी धाकटी जाऊ सरोज, माझा तिथला मुक्काम आरामदायी व्हावा म्हणून अगदी मनापासून प्रयत्नशील असते. ती पहाटे लवकर उठते. प्रभात फेरफटका मारून येते. शांत झोपलेल्या मला- खुडबुडीचे आवाज येऊ नयेत म्हणून माझ्या रूमचा दरवाजा हलकेच ओढून घेते. खरं म्हणजे मी जागीच असते. माझा धाकटा दीर सुहास खराट्याने खरखर अंगण झाडत असतो. सरोज बाहेर गेली, आत आली, मागचा दरवाजा उघडला या सर्वांचे आवाज येत असतात पण तरीही मी उठत नाही. अशी घरी बनवलेल्या, घरच्या कपाशीच्या गादीवर अर्धवट झोपेतली जाग मी मजेत अनुभवत असते.
त्या पहाटेच्या वेळी फिरून आल्यानंतर पहिलं जर काय सरोज करत असेल तर ती तिचा छोटासा रेडिओ लावते. रेडिओवर सकाळची मंगल गाणी, भक्ती गीतं, भगवत् गीतेच्या अध्यायावरचं विवेचन वगैरे एकापाठोपाठ एक चालू असतं. मधून मधून निवेदिकेचा मंजुळ आवाजही येत असतो. सरोज रेडिओ काही कान देऊन ऐकत नसते पण दरम्यान ती चहापाणी, घरातला केरवारा, कपडे, भांडी यासारखी कामे रेडिओच्या तालात सहजपणे आवरत राहते, तेव्हा माझ्या मनात विचार येतो आजच्या दूरदर्शन, संगणक, मोबाईलच्या जमान्यातही सरोजसारखी रेडिओ ऐकणारी माणसं आहेतच की!
“ सकाळचे सहा वाजले आहेत, आम्ही जळगाव आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत. ” या एका वाक्याने मी जवळजवळ ६० वर्षे मागे जाते.
रेडिओ
हा रेडिओ म्हणजे एक महत्त्वाचं स्थान आहे आमच्या बालपणातलं आणि जडघडणीतलंही. एक अखंड नातं त्या ध्वनीलहरींशी जुळलेलं आहे. त्यावेळी घरबसल्या करमणुकीचं रेडिओ हे एकमेव साधन होतं. घराघरात वाजणारा, बोलणारा रेडिओ म्हणजे त्या त्या परिवाराचा एक महत्त्वाचा सदस्य होता.
ऑल इंडिया रेडिओ. AIR.
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पहाटेच्या प्रहरी वाजणाऱ्या सिग्नेचर ट्युननेच आम्ही जागे व्हायचो. आजही ती विशिष्ट वाद्यवृंदातील सुरमयी धुन कानात आहे आणि तिच्या आठवणीने अंतःकरणात खूप काहीतरी अनामिक अशा भावनांच्या लाटा उसळतात. बाल्य, कौमार्य आणि तारुण्य सारं काही आकाशवाणीच्या या धूनमधून उलगडत जातं.
रात्री झोपताना दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारी संगीतसभाही सोबत असायचीच.
आता टेलिव्हिजन वरच्या अनेक दुष्ट, मतलबी, स्वार्थी, विकृत मानवी भावनांचा अविष्कार घडवणाऱ्या, मनोवृत्ती बिघडवणाऱ्या, वर्षानुवर्षे चालणाऱ्या अनेक दीर्घ मालिका बघताना सहज मनात येते, रेडिओ हे त्यावेळेचे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते तर ते साहित्य, संगीत, कलेच्या माध्यमातून सामाजिक संस्कार करण्याचे, समाज घडवण्याचे एक श्राव्य माध्यम होते. आनंदी जीवनाची दिशा दाखवणारं साधन होतं. नि:संशय..
गंमत- जम्मत नावाचा लहान मुलांसाठी एक सुंदर कार्यक्रम आकाशवाणी वरून प्रसारित केला जायचा. त्यातले नानुजी आणि मायाताई मला अजूनही आठवतात. त्यांचे ते प्रेमळ आवाज आजही कानात घुमतात. कितीतरी कथा, बालनाट्ये, बालगीते या कार्यक्रमातून ऐकली. इतिहास, भूगोल, विज्ञान, समाजशास्त्र यांचेही मनोरंजक पद्धतीने ज्ञानार्जन व्हायचे. याच कार्यक्रमातून एखादी ऐतिहासिक किंवा भौगोलिक प्रश्नपत्रिका दिलेली असायची. आम्ही ती उतरवून घ्यायचो आणि त्याची उत्तरे पत्राद्वारे मागवलेली असायची.
द्वारा केंद्राधिकारी, आकाशवाणी मुंबई केंद्र, गंमत जंमत विभाग. मुंबई ४ असा त्यांचा पत्ता असायचा. मी अनेक वेळा या पत्त्यावर प्रश्नपत्रिका सोडवून पत्रं पाठवलेली आहेत आणि पुढच्या कार्यक्रमातून जेव्हा उत्तरे बरोबर असलेल्या अनेक नावांबरोबर माझे नाव घेतले जायचे तेव्हा मला खूप गंमत वाटायची.
माझ्या आजीचे आवडते कार्यक्रम म्हणजे “कामगार सभा” आणि “कीर्तन”. ती रेडियोला कान लावून कीर्तन ऐकायची आणि तिच्याबरोबर आम्ही सुद्धा. या कीर्तनानेही आम्हाला नकळत घडवलेच की! नऊ रसात ओथंबलेले ते कीर्तन ऐकताना आम्ही पुरणकाळात, ऐतिहासिक काळात सहजपणे फेरफटका मारून आलोय. हरिभक्त परायण कीर्तनकाराच्या संगीतातून, गायनातून आम्ही विस्तृत अशा लोक परंपरेच्या हातात हात घालून नाचलो, बागडलो. टाळ चिपळ्यांसोबत गायलेलं “जय जय रामकृष्ण हारी” अजूनही कानात आहे. प्रत्येकवेळी निरुपण संपले की आम्हीही बुवांबरोबर “बोला! पुंडलिक वरदे हरी विठ्ठल।श्री ज्ञानदेव तुकाराम।। असा जयघोष करायचो.
या क्षणी मला रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळा, त्यात सहभागी असणाऱ्या आकाशवाणीच्या प्रत्येक कलाकारांची नावे आठवत नाहीत पण प्रहर आठवतात, आवाज आठवतात. त्या त्या कार्यक्रमाच्या वेळी वाजणारा वाद्यवृंद आठवतो आणि मन पुन्हा पुन्हा त्या काळात झेपावतं.
संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या, ऑल इंडिया रेडिओ दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही न चुकता ऐकायचो. सगळ्या घडामोडींचा ताजा आणि निखळपणे घेतलेला मागोवा आम्हाला समाजाबरोबर ठेवायचा. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून बातम्या देणाऱ्या “सुधा नरवणे” यांचा स्पष्ट, मोकळा आवाज आमच्या पिढीतली एकही व्यक्ती विसरू शकणार नाही.
अनेक संगीत नाटकांचं रेडिओवरूनच सुंदर सादरीकरण व्हायचं. कलाकारांच्या संवाद बोलीतूनच डोळ्यासमोर ती पात्रं, ते सीन, वातावरण साकारायचे आणि आभासी असला तरी प्रत्यक्ष रंगभूमीवर नाट्यप्रयोग पाहत असल्याचा आनंद या आकाशवाणीने आम्हाला दिला. गो. नी. दांडेकरांच्या “शितू” या गाजलेल्या कादंबरीचे अभिवाचनही आम्ही रेडिओ जवळ बसून ऐकले. काय आनंद दिला आहे आम्हाला या दर्जेदार कार्यक्रमाने ते कसं सांगू तुम्हाला?
हलक्या- फुलक्या, विनोदी श्रुतिका हे तर मुंबई आकाशवाणीचं खास वैशिष्ट्य. त्या संबंधात मला “प्रपंच” ही श्रुतिका मालिका आठवते. प्रत्येक भाग हा विशेष, हसवणारा आणि मनोरंजक असायचा. त्यातले टेकाडे भाऊजी आणि वहिनी यांच्यात घडणारे खुसखुशीत संवाद आठवले की आताही सहज हसू येतं. “बाळ कुरतडकर”, “नीलम प्रभू”, प्रभाकर (आडनाव आठवत नाही) हे कसलेले कलाकार त्यात सहभागी असायचे. काय जिवंतपणा असायचा त्यांच्या नाट्य सादरीकरणात!
तशी मी लहानच होते पण तरीही १९५५ ते १९५६ हे साल म्हणजे आकाशवाणीच्या इतिहासातले सुवर्णाचे पान म्हणून गाजले ते पक्के लक्षात आहे. पुणे आकाशवाणी केंद्राचे तत्कालीन अधिकारी, भारतीय शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्य संगीताचे जाणकार “सीताकांत लाड” यांनी रामायणावर आधारित साप्ताहिक कार्यक्रमाची संकल्पना मांडली. कवी गदिमा आणि संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या सहभागाने “गीत रामायण” हे हृदयात राहणारे संगीतमय महाकाव्य अस्तित्वात आले. एक एप्रिल १९५५ रोजी ऑल इंडिया रेडिओ पुणे केंद्रावरून रामनवमीच्या पवित्र प्रसंगी
॥ स्वये श्री रामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती ॥
या परमसुंदर, श्रवणीय गीताने गीतरामायण कार्यक्रम सुरू झाला. हा कार्यक्रम वर्षभर चालला. अधिक मासामुळे हे वर्ष ५६ अठवड्यांचं होतं म्हणून ५६ भागात हे “गीत रामायण” वर्षभर श्रोत्यांनी प्रचंड भावनात्मकतेने, श्रद्धेने आणि अपार आनंदाने ऐकले.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या बुच विल्मोर सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या होत्या. त्यांना घेऊन बोईंग स्टारलाइनर अंतराळयानाद्वारे 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचले होते. ही मोहीम फक्त आठ दिवसांची असावी, अशी योजना होती. तथापि, अंतराळयानातील हीलियम वायूची गळती आणि थ्रस्टरच्या बिघाडामुळे अंतराळयानाच्या कार्यात अडथळा निर्माण झाला आणि त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबले. मिशन सुरू होण्यापूर्वी नासा आणि बोईंग या दोन्ही कंपन्यातील अभियंत्यांना या बिघाडाची माहिती होती. असे असूनही, त्यांनी या गळतीला मिशनसाठी एक किरकोळ धोका मानल्यामुळे नासा आणि बोईंगच्या या निर्णयामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकले आहेत. स्टारलाइनरच्या माध्यमातून प्रथमच अंतराळवीरांना अंतराळात नेण्यात आले आहे. या मिशनसाठी बोईंगने नासासोबत 4. 5 अब्ज डॉलरचा करार केला होता. या कराराशिवाय बोईंगने 1. 5 अब्ज डॉलर्सही खर्च केले आहेत.
हीलियम गळतीमुळे इंधन प्रणालीवर परिणाम झाल्यामुळे यानाचे नियंत्रण आणि स्थिरता धोक्यात येते. तर थ्रस्टर बिघाडामुळे यानाच्या दिशा नियंत्रित करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे सुरक्षित परतीच्या मार्गात धोका निर्माण होतो. नासा आणि बोईंगचे अभियंते या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. सुरक्षित परतीसाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे, ज्यामध्ये स्पेसएक्सच्या क्रू-10 मिशनचा वापर करून अंतराळवीरांना परत आणण्याची शक्यता देखील समाविष्ट आहे. तथापि, या समस्यांचे संपूर्ण निराकरण होईपर्यंत आणि अंतराळयान परतीसाठी सुरक्षित घोषित होईपर्यंत, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ISS वरच राहावे लागेल असे दिसतेय. त्याला पर्याय नाही.
खरे पहाता, या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून इतिहास रचला. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल अंतराळ केंद्रावरून निघाले होते. अशा मोहिमेवर उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला म्हणूनही विल्यम्स यांनी इतिहास घडवला आहे. तसे पाहिले तर 59 वर्षांच्या सुनीता विल्यम्स यांनी यापूर्वी दोनदा अंतराळ प्रवास केला आहे. याआधी 2006 आणि 2012 मध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या. नासाच्या म्हणण्यानुसार त्यांनी अंतराळात एकूण 322 दिवस घालवले आहेत. 2006 मध्ये सुनीताने 195 दिवस अंतराळात आणि 2012 मध्ये 127 दिवस अंतराळात घालवले होते. 2012 च्या मिशनची खास गोष्ट म्हणजे सुनीता यांनी तीनदा स्पेस वॉक केला होता. अंतराळवीर स्पेस वॉक दरम्यान स्पेस स्टेशनमधून बाहेर पडतात. पहिल्याच प्रवासात त्यांनी चार वेळा स्पेस वॉक केला. सुनीता विल्यम्स या अंतराळ प्रवास करणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहेत. त्यांच्या आधी कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या.
मग आता असा प्रश्न पडतो की, त्यांना फक्त आठवड्याभरासाठीच तिथे कार्यरत राहायचे होते आणि त्याप्रमाणे त्यांच्या अन्नाची आणि ऑक्सिजनची सोय केली असेल तर एवढा काळ त्यांना अन्न आणि ऑक्सिजन कसे काय पुरवले गेले आणि कुठून पुरवले गेले? यामागचे इंगीत असे आहे की, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ज्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आहेत, तिथे असा अडचणीचा काळ येऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन दीर्घकाळ राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आधीच उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे स्टारलाइनर यानाच्या अडचणींमुळे त्यांना अन्न, पाणी किंवा ऑक्सिजनच्या तुटवड्याचा धोका नाही. ISS वर ऑक्सीजन जनरेशन सिस्टम (OGS) असल्यामुळे इलेक्ट्रोलिसिसद्वारे पाण्यातील ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळा करता येतो. त्यामुळे ताज्या ऑक्सिजनचा सतत पुरवठा केला जातो. आणीबाणीच्या परिस्थितीत, ऑक्सिजन कॅनिस्टर आणि सोयुझ किंवा ड्रॅगन यानातून आणलेला अतिरिक्त ऑक्सिजन वापरता येतो. त्याचप्रमाणे ISS वर मोठ्या प्रमाणात शून्याच्या खालील तापमानात सुके अन्न साठवून ठेवलेले असते. ते गरजेनुसार नेहमीप्रमाणे खाण्यायोग्य करून वापरले जाते. त्याचबरोबर वॉटर रिक्लेमेशन सिस्टम (WRS) च्या सहाय्याने मूत्र आणि आर्द्रता पुन्हा प्रक्रिया करून प्यायचे पाणी तयार केले जाते. जर समजा या सगळ्या पद्धती वापरूनही तुटवडा निर्माण झालाच तर नियमितपणे स्पेसएक्स ड्रॅगन किंवा अन्य मालवाहू यानांद्वारे अन्न व पाण्याचा पुरवठा केला जातो. ISS ला सौरऊर्जेवर चालणाऱ्या प्रगत प्रणालीद्वारे वीजपुरवठा होतो. तिथे वातावरण नियंत्रित करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड फिल्टरिंग सिस्टम कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका कमी आहे. अशाप्रकारे ISS हे स्थानक अनेक अंतराळवीरांना वर्षभर राहण्यासाठी सक्षम आणि सुसज्ज केलेले असल्यामुळे सुनीता विल्यम्स आणि विल्मोर ISS वर पूर्ण सुरक्षित आहेत.
एवढा दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या शरीरावर काही महत्वाचे परिणाम होऊ शकतात. यामध्ये हाडांची घनता कमी होणे, स्नायू कमकुवत होणे, दृष्टीवर परिणाम आणि इतर आरोग्यविषयक समस्या समाविष्ट आहेत. 8 दिवसाच्या मोहिमेसाठी गेलेल्या या दोघांना आता जवळपास 8 महिने झाले आहेत. तेव्हा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतात या सर्व बाबींवर नासा लक्ष ठेवून आहे आणि अंतराळवीरांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. पण शून्य गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात दीर्घकाळ राहिल्याने मानवाच्या शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम होतात. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे हाडे कमकुवत होतात आणि त्यांची घनता १% – २% दरमहा कमी होऊ शकते. त्यामुळे परत आल्यावर फ्रॅक्चर किंवा ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्यांचा धोका वाढतो. असे होऊ नये म्हणून अंतराळवीरांना दररोज व्यायाम करावाच लागतो, पण तरीही परत आल्यावर स्नायू पूर्ववत होण्यासाठी काही आठवडे जातात. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे हृदय थोडेसे लहान होते आणि रक्ताभिसरणात बदल होतो. त्यामुळे पृथ्वीवर परतल्यावर चक्कर येणे आणि रक्तदाब नियंत्रणात समस्या येऊ शकते. दीर्घकाळ अंतराळात राहिल्यास काही अंतराळवीरांच्या डोळ्यांच्या मागील स्नायूंमध्ये द्रव जमा होऊन दृष्टी धूसर होण्याची समस्या उद्भवू शकते. वेगळेपणाची भावना, एकटेपणा आणि पृथ्वीपासून दूर राहण्याचा दीर्घकाळ याचा परिणाम मानसिक तणाव वाढण्यावर होऊ शकतो. ISS वर असलेल्या सहकाऱ्यांसोबत संवाद आणि पृथ्वीवरील कुटुंबीयांसोबत नियमित संपर्क ठेवल्याने हा परिणाम काही प्रमाणात कमी करता येतो. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर असल्यामुळे सूर्याच्या आणि अंतराळातील किरणोत्साराचा जास्त धोका असतो. कारण त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. या सगळ्या आरोग्यविषयक तक्रारी नियंत्रित ठेवण्यासाठी ISS वर प्रत्येक दिवशी किमान दोन तास नियमित व्यायाम करण्याची सक्ती आहे, त्यामुळे हाडांची मजबुती टिकून राहण्यास मदत होते आणि स्थायूंची कमकुवतता टाळण्यासाठीसुद्धा. त्याचबरोबर हाडांची घनता टिकवण्यास मदत करणारा विशेष आहार आणि औषधोपचारही दिले जातात. परतीनंतर वैद्यकीय तपासण्या आणि पुनर्वसनासाठी ठराविक कालावधी लागतो. या कालावधीत हळूहळू शरीर पुन्हा पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकते. अंतराळात अनपेक्षितरित्या जास्त दिवस लागल्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना काही शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे काय यावरही नासा आणि बोईंग यांची वैद्यकीय टीम त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. ISS वरील तंत्रज्ञान, व्यायाम आणि आहारामुळे हे परिणाम कमीत कमी होण्याची शक्यता आहे, आणि परत आल्यानंतर काही महिन्यांत त्यांची तब्येत पूर्ववत होईल. सध्या तरी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ISS वर सुरक्षित आहेत, आणि त्यांच्या परतीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.
आता प्रश्न उरतो तो त्यांच्या परतीच्या प्रवासाचा. बोईंग स्टारलाइनर वापरून सुनीता विल्यम्सच्या परतीच्या मोहिमेला पुढे न्यायचे, की स्पेसएक्स वापरून बचाव मोहीम सुरू करायची, यावर नासा सध्या विचार करत आहे. नासा स्पेसक्राफ्टचे माजी मिलिटरी स्पेस सिस्टम कमांडर रिडॉल्फी यांच्या सांगण्याप्रमाणे, स्टारलाइनरच्या सेवा मॉड्यूलने सुरक्षित परतीसाठी कॅप्सूल योग्य कोनात ठेवणे आवश्यक आहे. यात थोडीही चूक झाली तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. रिडॉल्फी यांनी असा इशारा दिलाय की, जर कॅप्सूल योग्यरित्या विशिष्ट कोनात नसेल तर, ते पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना जळू शकते. किंवा दुसरा संभाव्य धोका असा आहे की, जर कॅप्सूलने चुकीच्या कोनात पुन्हा प्रवेश केला तर ते वातावरणातून बाहेर पडू शकते आणि परत अवकाशात जाऊ शकते. सध्या बोईंग आणि नासा त्यांच्या परतीसाठी स्टारलाइनरच्या दुरुस्तीवर काम करत आहेत. जर स्टारलाइनर यान वापरणे शक्य नसेल, तर त्यांना स्पेसएक्स क्रू-10 किंवा अन्य यानाद्वारे पृथ्वीवर परत आणले जाईल. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.
अशाप्रकारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) परतीची योजना आता निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी स्पेसएक्स क्रू-10 मिशनचे प्रक्षेपण 12 मार्च 2025 रोजी होणार आहे. यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर परत येतील. या परतीच्या प्रक्रियेत, क्रू-10 मिशनचे अंतराळवीर ISS वर पोहोचतील आणि सुमारे एक आठवड्याच्या हस्तांतरण कालावधीनंतर, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्पेसएक्सच्या क्रू-ड्रॅगन कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर परत येतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांना या परतीच्या प्रक्रियेची गती वाढवण्याची विनंती केल्यामुळे ही योजना आता निश्चित करण्यात आली आहे. म्हणूनच, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची परतीची तारीख निश्चित झाली आहे, आणि ते लवकरच पृथ्वीवर परत येणार आहेत. काळजी नसावी.
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपकी भावप्रवण बुन्देली कविता – बढ़त जात उजयारो…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 231 – बढ़त जात उजयारो…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “बहके बहके आँगन की...”)
☆ साप्ताहिक स्तम्भ # 231 ☆।। अभिनव गीत ।। ☆
☆ “बहके बहके आँगन की...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆