लहानपणी पासून म्हणजे अगदी बाळ असल्यापासून आपले भावविश्व व परिचय होतो तो काऊ चिऊ यांच्याशी जोडलेले असते. अगदी एक घास काऊचा एक घास चिऊचा अशी सुरुवात होते. इथे इथे बस रे काऊ असे म्हणत काऊला हातावर बसण्यासाठी बोलावले जाते. आणि हे सगळे पशू पक्षी आपल्या आयुष्यात किती आवश्यक असतात हे मनावर ठसते. आणि मग या कावळ्याचा आपल्या आयुष्यात किती जवळचा व घनिष्ट वावर असतो ते लक्षात आले. या काऊचे बरेच प्रसंग अनुभवले आहेत. आणि त्यांच्या रागाचा तर चांगलाच प्रसाद मिळाला आहे.
आम्ही आमच्या नवीन घरात रहायला आल्यावर निसर्गरम्य परिसर, इकडे तिकडे फिरणारे विविध पक्षी यांचे फारच आकर्षण होते. आणि त्याचा किलबिलाट ऐकून खूप आनंद व्हायचा. मी हातावर धान्य घेऊन त्यांना भरवत असे. आणि त्याची चिमणी आणि इतर छोट्या पक्षांना चांगलीच सवय झाली होती. शनिवारी मात्र सकाळच्या शाळेमुळे हे शक्य व्हायचे नाही. आणि ते पक्षी सर्व प्रकारचा आरडा ओरडा करायचे. एका शनिवारी आमच्या ह्यांना वाटले आपण धान्य द्यावे. म्हणून ते हातावर धान्य घेऊन उभे राहिले, तर ते धान्य पक्ष्यांनी स्वीकारले नाही. उलट त्यांच्या हातावर चोची मारुन गेले.
एकदा आम्ही एका शेतातल्या घरी(फार्म हाऊस) वर गेलो होतो. आम्ही व्हरांड्यात बसलो होतो त्याच्या समोर एक झाड होते. त्यावर एक कावळा सतत येऊन ओरडायचा. आम्ही त्याच्याकडे इतके लक्ष दिले नाही. मग आम्ही फोटो काढण्यासाठी त्या झाडाजवळ गेलो. त्या वेळी तो कावळा जास्तच ओरडू लागला. पुन्हा आमच्या जागेवर जाऊन बसलो. नंतर तर तो इतक्या मोठ्या आवाजात चिडून आमच्या कडे बघून ओरडू लागला. थोड्या वेळाने तर तो स्वतःची पिसे उपटू लागला. थोडी चौकशी केल्यावर कळले, आम्ही बसलो होतो तेथे त्याच्यासाठी रोज धान्य व पाणी ठेवले जात होते. आम्ही तिथे बसल्यामुळे त्याच्यासाठी धान्य व पाणी दुसरीकडे ठेवले होते. ते त्याने अजिबात घेतले नव्हते.
आमच्या घरासमोर आम्ही अशोकाची झाडे लावली आहेत. त्यावर दरवर्षी अगदी शेंड्यावर कावळा घरटे बनवतो. त्यात कोकिळ पण आपले एखादे अंडे घालते. दोघांची अंडी उबवली जातात. कावळ्याची पिल्ले लवकर उडायला शिकतात. आणि त्या कोकिळेच्या पिल्लाला वाढवत असताना, उडायला शिकवत असताना, कावळा आमच्या डोक्यावर चोचीने मारतो आणि आम्हाला घरात जायची बंदी करुन टाकतो. आपण त्या पिल्लाकडे(कोकिळेच्या) पाहिले तरी अंगावर चाल करून येतो.
अशा विविध पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या रागाचे, खोडकर पणाचे व त्यांच्या आनंदाचे अनुभव घेतले आहेत. आणि या भावना त्यांच्यात पण असतात फक्त ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त करत असतात. ते आपण ओळखू शकलो तर आपल्याला पण खूप छान वाटते. आणि ही विविधता आनंद देते.
रोहिणी सकाळी नेहमीप्रमाणे उठली. तिच्या अगोदरच तिचा पती विनोद उठला होता. बेडरूमचे दार उघडून ती स्वयंपाक घरात गेली. विनोद सकाळचा चहा एक एक घोट घेत मोबाईल बघत बसला होता. ती उठून आलेली पाहून विनोदने तिला विचारले, ” तुझा नेमका काय प्रॉब्लेम आहे ? विनोद कोणत्या गोष्टीविषयी विचारतो हे तिला अजिबात लवकर लक्षात आले नाही. ती काहीच न बोलता ब्रश करायला निघून गेली.
नंतर त्याच्यासमोर असलेल्या खुर्चीत, एक-दोन मिनिटे ती शांत बसून राहिली. आणि मग तिला थोडंस लक्षात आले की त्याला कशाविषयी बोलायचे आहे ते. रात्री काय घडले होते हा विचार ती करु लागली. मग तिला लक्षात आले की, त्याने रात्री तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला होता पण तिने त्याचा हात बाजूला काढून टाकला होता. काय बोलावं या विचारात होती. थोडी भानावर आली आणि म्हणाली,
”तुझा तो हात घट्ट मिठी मारुन झोपणे या हेतूने नव्हता, तर तो डायरेक्ट स्तनाकडे गेला होता. मग मला वैताग आला आणि तो हात मी झिडकारून लावला. मी अशी का वागले किंबहुना बऱ्याच वेळा मी अशी का वागते, हेच तुला विचारायचा आहे ना ?
“होय मला हेच जाणून घ्यायचं आहे! ”तो उत्तरला.
ती त्याला शांतपणे म्हणाली, ”मी तुला खूप वेळा सांगितलं आहे. मला हल्ली इच्छा होत नाही. मला काही वेळा संभोग नकोसा वाटतो. मला फक्त जवळ घेऊन, मिठी मारून झोपलेलं आवडतं. पण तू डायरेक्ट लैंगिकतेकडे जातोस. तेव्हा मात्र मला खूप इरिटेशन होतं. जेव्हा मला नको असते तेव्हा मी तुला बाजूला सारते. शिवाय माझी रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही. अधून मधून सारखी जाग येते. मला वाटतं या विषयावर आपण खूप वेळा बोललो आहोत. त्याच त्याच विषयावर मला परत परत बोलायची इच्छा नाही. ”
“अगं पण बरेच दिवस झाले ना..! हे ऐकल्यावर ती चिडली. ती रागाने म्हणाली, ”अरे, तीन चार दिवसच तर झाले आहेत. ”
“मला इच्छा झाली पण तुझी इच्छा नसेल तर मग मी काय करावं? “ तो वैतागून म्हणाला
ती ओरडून रागाने त्याला म्हणाली, “ थोडा संयम ठेवायला शिक. तुझ्या हाताचा वापर कर. शीss सकाळी सकाळी माझ्या डोक्याला ताप देऊ नको. तुला जो हवा तो मार्ग तू काढू शकतोस. या गोष्टीवर मला वाद घालायचा नाही. मी तुला खूप वेळा सांगितलेलं आहे की मला जेव्हा इच्छा नसते तेव्हा मी तुझ्याशी संभोग करू शकत नाही That’s it. ”
असे म्हणून ती रडू लागली. तेव्हा त्याला जाणवले की ही खूपच काहीतरी गंभीर गोष्ट आहे. ती कोणत्यातरी अडचणीतून जात आहे. आज पर्यंत, लग्नाला 24 वर्षे झाली. नोकरी, घर, मुलांच्या शाळा सगळ्या गोष्टीला हिंमतीने तोंड देणारी, स्वतःचं मुलांचं जगणं आनंदमय करणारी रोहिणी आज-काल अशी का वागत असावी ? हा प्रश्न त्याला पडला होता. काहीतरी अडचण आहे याची त्याला जाणीव झाली.
तो उठला. त्याने लगेच तिला जवळ घेतले आणि विचारले, ” रोहिणी तुला नेमकं काय होतंय? सांगशील का मला प्लीज. मलाही त्रास होतो ग रोहिणी. आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ”
तिच्या डोळ्यातून झरझर पाणी ओघळत होते. आणि ती बोलू लागली, “अरे, मला हल्ली खूप एकटं वाटतं. अचानक गरम होतं, घाम सुटू लागतो. हात पाय दुखतात, पायात गोळे येतात. अचानक रडू येतं, खूप चिडचिड होते, राग अनावर होतो. काही करण्याची इच्छा होत नाही. अधून मधून सारखं इरिटेशन होतं. झोप व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठावसं वाटत नाही. बऱ्याच वेळा डोक दुखतं. अंगात हॉट फ्लसेस आल्यासारखे वाटतात. अगोदर सारखी संभोगाची इच्छा होत नाही. कधी कधी छातीत दुखतं, कधी कधी खूप धडधड जाणवते रे विनोद. काय काय आणि किती किती सांगू तुला ?” तिचे हुंदके चालूच होते.
“मधे एकदा तुला न सांगताच ऑफिस मधून मी डॉक्टरांच्याकडे गेले होते. ब्लड प्रेशर आणि ईसीजी नॉर्मल आहे म्हणाले ते डॉक्टर. विटामिन्सच्या काही गोळ्या लिहून दिल्या. रोज रात्री एक घेते मी त्या गोळ्या. ” बोलता बोलता थोडा वेळ ती थांबली. विनोद शांतपणे तिचं सगळं ऐकत होता. थोडा वेळ गेल्यावर डोळे पुसत अचानक म्हणाली,
“आईसारखं आपल्याला कोणीतरी मायेनं, आपुलकीनं जवळ घ्यावं असं मला वाटतं.. अंगात वाटतो तसा मनातही खूप कोरडेपणा जाणवतो. रात्री अचानकच खूप घाम येतो खूप गरम होऊ लागते. मला भिंती वाटते रे विनोद..!
“काय करू सांग ना ? मी रोज व्यायाम करते. सूर्यनमस्कार घालते. मेडिटेशन करते. पण तरीही काही फरक जाणवत नाही. ”
हे ऐकून विनोद म्हणाला, “रोहिणी माझं ऐक आपण Psychiatrist/मानसरोग तज्ञांच्या कडे जाऊया. ते काय सांगतात ते आपण ऐकूया. काही काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे.”
त्याच दिवशी संध्याकाळी ते दोघेही सायकियास्ट्रीस्ट कडे गेले. सायकियास्ट्रीस्ट दोघांशी बोलतात. आणि म्हणतात, ” तुम्हाला झोप लागावी यासाठी आपण काही दिवसांसाठी औषध देऊ शकतो पण तुम्हाला जाणवणारी ही सगळी लक्षणं रजोनिवृत्तीशी म्हणजेच menopausal symptoms शी निगडीत आहेत का हे पहावं लागेल. मला वाटतं ही सगळी लक्षणं, तुमच्या वयाचा विचार करता मेनोपॉजशी निगडित आहेत असे मला वाटते. बाकी तुमच्या मनाची अवस्था खूप काही अडचणीची आहे असे मला वाटत नाही. ”
असे म्हणून त्या डॉक्टरांनी त्या दोघांना स्त्रीरोगतज्ञ/ gynecologist ना भेटण्याचा सल्ला देतात. आणि गायनॅकॉलॉजिस्टनी कन्फर्म केल्यानंतर आपण सायकोथेरपीची मदत घेऊ शकतो असे ते सांगतात.
दुसऱ्या दिवशी रोहिणी आणि विनोद दोघेही gynecologist कडे जातात. रोहिणीची सगळी लक्षण डॉक्टर ऐकून घेतात.
“रोहिणी तुझं वय काय म्हणालीस ?
“50years मॅडम..
Menstrual cycle म्हणजे तुझे periods regular आहेत?
“नाही मॅडम, कधी चार महिन्यांनी, कधी तीन महिन्यांनी, कधी सहा महिन्यांनी, खूप irregular आहेत. ”
“तुला ब्लड प्रेशर चा त्रास किंवा शुगर वगैरे काही आहे ?
“अजून तरी नाही मॅडम..
“काही काळजी करू नकोस ही सगळी लक्षणं Premenopausal symptoms ची वाटतात. ”
बाकीच्या काही अडचणी नाहीत ना हे बघण्यासाठी आपण सोनोग्राफी करूया आणि काही ब्लड टेस्ट करून घेऊ. चालेल..!
“हो मॅडम करून घेऊया आपण सगळं..
रजोनिवृत्तीच्या काळात जी अनेक लक्षणं दिसून येतात त्याची सगळी माहिती डॉक्टर, रोहिणीला देतात.
45 ते 55 हा स्त्रियांच्या आयुष्यातला रजोनीवृष्टीचा काळ असतो. Menopause/ रजोनिवृत्ती इस्ट्रोजनच्या पातळीत घट झाल्यामुळे निर्माण होणारा नैसर्गिक बदल आहे. अनियमित मासिक पाळी, मूड स्विंग्सज्, सतत स्नायू दुखणे, हाॅट फ्लशेस, थकवा आणि आरोग्याच्या इतर अनेक समस्या रजोनिवृत्तीत प्रत्येक स्त्रीला जाणवतात.
Estrogen संप्रेरकाची पातळी कमी झाल्यामुळे, योनीत कोरडेपणा जाणवतो. त्यामुळे कामेच्छा कमी होते. घटत्या इस्ट्रोजेन पातळीमुळे अस्वस्थता निर्माण होते. शरीराच्या तापमानात सतत चढ-उतार झाल्यामुळे काही वेळा अचानक गरम वाटते. आणि रात्री घाम फुटतो. त्वचेला खाज सुटते. यामुळे म्हणावी तशी रात्रीची झोप पूर्ण होत नाही. दिवसा थकवा जाणवतो. वारंवार विश्रांती घ्यावीशी वाटते. झोप जितकी कमी होईल तितके जीवनातील गोष्टी आणि घटना लक्षात ठेवणे कठीण होते. त्यामुळे काही गोष्टी विसरतात हे जाणवू लागते.
रोहिणी प्रश्न विचारते, “मॅडम यापुढे हे असेच चालू राहणार का, की यातून मलि बाहेर पडता येईल?
“रोहिणी आणि विनोद हे पहा, हा काळ प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळा असतो. पण साधारणतः दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतचा काळ हा menopausal symptoms चा काळ धरला जातो. Mild to moderate सौम्या ते तीव्र अशा प्रकारची लक्षणे यात दिसू शकतात. शारीरिक, मानसिक, भावनिक या सर्व गोष्टीवर योग्य काम करून आपण या काळात जाणवणारे चढ-उतार योग्य प्रकारे मॅनेज करू शकतो. यासाठी हार्मोनल थेरपी शिवाय कौन्सिलिंग, सायकोथेरपी या गोष्टींचा वापर करता येतो.”
“पण मॅडम, हे सगळं कधीपासून चालू करायचं.?”
“तुला जे होतंय ते काय होतं, आणि ते कशामुळे होतं हे आता तुला लक्षात आले आहे. त्यातून तू हळूहळू मार्ग काढत जाशील. लक्षणं खूप तीव्र झाली तर काय करायचं ते आपण नंतर ठरवू! ”
नंतर डॉक्टर त्या दोघांना Premenopausal, menopausal, Postmenopausal याविषयी माहिती सांगतात. तसेच पूर्ण बारा महिने जेव्हा मासिक पाळी येत नाही त्यानंतरच आपण रजोनिवृत्ती झाली असं म्हणू शकतो हे नमूद करतात. अधूनमधून कधी कधी ब्लीडिंग, स्पाॅटींग होऊ शकतं तेव्हा घाबरायचं नाही तसेच एक- दोन वर्षातून एकदा pap smear ची test स्वतःच्या सवडीने करण्याचा सल्ला देतात.
संतुलित आहार, दररोज व्यायाम, स्वतःच्या छंदासाठी काही वेळ, मित्र-मैत्रिणींशी संवाद, आपल्या आवडत्या कामात रममाण होणे, जीवनशैलीत योग्य प्रकारे बदल करून आपण ही लक्षण कमी करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींसाठी कौन्सिलर आणि सायकोथेरपीस्ट यांचा उपयोग कसा करून घ्यायचा असा सल्ला देतात. गरज पडली तर असावे म्हणून रोहिणी आणि विनोद यांच्या आग्रहास्तव त्यांच्या ओळखीच्या दोन-तीन कौन्सिलरचे फोन नंबर डॉक्टर त्यांना देऊन ठेवतात.
सर्व माहिती ऐकल्यावर रोहिणी, मॅडमना म्हणाली, ” Thank you madam! तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगितले. मी स्वतःची काळजी घेईन. काही लागलं तर तुम्हाला संपर्क करेन! ”
विनोद म्हणतो, “मॅडम, मीही तिची काळजी घेईन, आणि मुलांनाही सांगेन, पण मॅडम, ती अगोदर सारखी आनंदी राहू शकेल ना!
डॉक्टर म्हणतात,” हो नक्की, कोणत्याही अडचणीत आपलं जगणं, आणि आपलं सहजीवन आनंदी करणं, सुंदर करणं हे आपल्याच हातात असतं. नाही का ?”
“It’s a pause, restart yourself Rohini…!
“Vinod take care of her!”
विनोद, रोहिणीचा हात हातात घेतो. दोघेही केबिनच्या बाहेर पडायला निघतात. दोघेही, “Thank you madam” Blood report झाल्यावर परत तुम्हाला आम्ही भेटायला येतो.
बाहेर पडताना रोहिणीच्या मनाला एकच वाक्य साद घालत होते. It’s a Pause, Restart…!
☆ माझी जडणघडण… परिवर्तन – भाग – ३९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
ठाण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मागच्या गल्लीतल्या गांगल बिल्डिंग मधल्या वन रूम किचन ब्लॉक मध्ये ताईच्या संसाराची घडी हळूहळू बसत होती. अनेक नकारात्मक बाजूंना आकार देत स्थिरावत होती. ताईचे मोठे दीर प्रकाशदादा आणि नणंद छाया नोकरीच्या निमित्ताने ताई -अरुणच्या घरी रहात असत. काही दिवसांनी ताईची धाकटी नणंद अभ्यासाच्या दृष्टीने चांगले म्हणून त्यांच्या सोबत रहायला आली. ताई -अरुणने सर्वांना ममतेने, कर्तव्य बुद्धीने आणि आपुलकीने सामावून घेतले. ताईचे सासू-सासरे मात्र सासऱ्यांच्या निवृत्तीनंतर लोणावळ्यात राहायला गेले होते तिथे त्यांनी एक बंगला खरेदी केला होता. एकंदर सगळे ठीक होते.
विशेष श्रेणीत कला शाखेत एमए झालेली हुशार ताई “रांधा, वाढा, उष्टी काढा यात अडकलेली पाहून माझं मन मात्र अनेक वेळा कळवळायचं. चौकटीत बंदिस्त असलेल्या गुणवंत स्त्रियांच्या बाबतीत मी तेव्हापासूनच वेगळे विचार नेहमीच करायचे मात्र त्यावेळी माझे विचार, माझी मतं अधिकारवाणीने मांडण्याची कुवत माझ्याकडे नव्हती. मी आपली आतल्या आत धुमसायची पण ताईचं बरं चाललं होतं.
बाळ तुषारच्या बाललीला अनुभवण्यात आणि त्याचं संगोपन करण्यात ताई अरुण मनस्वी गुंतले होते पण जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ. तुषार अवघा दहा महिन्याचा होता.
एके रात्री ऑफिसच्या पार्टीला जाण्याची तयारी करत असताना अरुणच्या पोटात अचानक तीव्र कळा येऊ लागल्या. सुरुवातीला ताईने घरगुती उपचार केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही तेव्हा तिने दादाला (मोठे दीर) फोन करून सर्व हकीकत सांगितली आणि ताबडतोब घरी यायला विनविले. दादांनी तात्काळ ऑफिसच्या गाडीतून अरुणला फॅमिली डॉक्टर अलमेडा यांच्याकडे नेले. त्यांनी तात्पुरते बॅराल्गनचे इंजेक्शन देऊन घरी पाठवले पण दुखणे थांबले नाही उलट ते वाढतच होते. अरुणचे मेव्हणे, ठाण्यातले प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर मोकाशी यांनी “हे दुखणे साधे नसल्याचे” सुचित केले व त्वरित ठाण्यात नव्यानेच सुरू झालेल्या शल्यचिकित्सक डॉक्टर भानुशालींच्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये अरुणला दाखल केले. अरुणला “पँक्रीयाटाइटिस”चा तीव्र झटका आलेला होता. अंतर्गत रक्तस्त्राव होत होता. १९६८साल होते ते. आजच्या इतकं शल्यचिकित्सेचं विज्ञान प्रगत नव्हतं. डॉक्टरांनी ताईला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. ” पेशंटची स्थिती नाजूक आहे. डॉक्टरांच्या हाताबाहेरचे आहे कारण या व्याधीवर लागणारे Trysilol हे औषध भारतात उपलब्ध नाही. तेव्हा आता फक्त भरवसा ईश्वराचाच. काही चमत्कार झाला तरच…”
ताई इतकी कशी धीराची! ती पटकन म्हणाली, ” डाॅक्टर! तो मला असे सोडून जाऊ शकत नाही. चमत्कार होईल. माझी श्रद्धा आहे. मी तुम्हाला हे औषध २४ तासात मिळवून देईन. “
त्यावेळी अरुण लंडनच्या B O A C या एअरलाइन्समध्ये इंजिनीयर होता. (आताची ब्रिटिश एअरलाइन्स). ताईने ताबडतोब सर्व दुःख बाजूला ठेवून प्रचंड मन:शक्तीने पुढचे व्यवहार पार पाडले. अरुणच्या मुंबईतल्या ऑफिस स्टाफच्या मदतीने तिने सिंगापूरहून ट्रायसिलाॅल हे औषध इंजेक्शनच्या रूपात डॉक्टरांना २४ तासात उपलब्ध करून दिले आणि अरुणची हाताबाहेर गेलेली केस आटोक्यात येण्याचा विश्वास आणि आशा निर्माण झाली. डॉक्टर भानुशाली यांनी लगेचच ट्रीटमेंट सुरू केली. अरुणने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. आता त्याने धोक्याची रेषा ओलांडली होती. अरुणचे आई-वडील, भाऊ, बहिणी, इतर नातेवाईक सारे धावत आले. ताई सोबत आम्ही होतोच. याही सर्वांचा ताईला मानसिक आधार मिळावा हीच अपेक्षा असणार ना? पण ताईच्या जीवनातल्या एका वेगळ्याच कृष्णकाळ्या अंकाला इथून सुरुवात झाली.
पुन्हा एकदा मनात खदखदणाऱ्या घटनांचा प्रवाह उसळला. जातीबाहेरचे, विरोधातले लग्न, आचार विचारांतली दरी, पुन्हा एकदा पट्टेकरी बुवा विचारधाराही उसळली. वास्तविक आमचं कुटुंब सोडलं तर आमच्या आजूबाजूचे सारेच या पट्टेकर बुवांच्या अधीन झालेले. तसे पट्टेकर बुवा पप्पांशी, माझ्या आजीशी भेटल्यावर आदराने बोलत पण कुणाच्या मनातलं कसं कळणार? पट्टेकरांना पप्पांच्या बुद्धिवादी विचारांवर कुरघोडी करण्याची जणू काही संधीच मिळाली असावी. सर्वप्रथम त्यांनी अरुणच्या परिवारास “ढग्यांची आजी ही करणी कवटाळ बाई आहे” असे पटवून दिले. परिणामी आमच्या कुटुंबास हॉस्पिटलमध्ये अरुणला भेटायला येण्यापासून रोखले गेले. हाच “बुवामेड” कायदा मुल्हेरकरांनी ताईलाही लावला.
अरुण त्याच्या आईला विचारायचा, “अरु कुठे आहे? ती का आली नाही. अरुणची आई उडवाउडवीची उत्तरे द्यायची.
पप्पा ऑफिसातून जाता येता हाॅस्पीटलमध्ये जात. अरुणच्या रूममध्ये बाहेरूनच डोकायचे. अरुण अत्यंत क्षीण, विविध नळ्यांनी वेढलेला, रंगहीन, चैतन्य हरपलेला असा होता. तो हातानेच पपांना आत येण्यासाठी खुणा करायचा. खरं म्हणजे पप्पा बलवान होते. ते या सगळ्यांचा अवरोध नक्कीच करू शकत होते पण प्राप्त परिस्थिती, हॉस्पिटलचे नियम, शांतता अधिक महत्त्वाची होती. ते फक्त डॉक्टर भानुशालींना भेटत व अरुणच्या प्रकृतीचा रोजचा अहवाल समजून घ्यायचे. डॉक्टरांनाही या मुल्हेरकरी वर्तणुकीचा राग यायचा पण पप्पा त्यांना म्हणत, ” ते सर्व जाऊद्या! तुम्ही तुमचे उपाय चालू ठेवा. पैशाचा विचार करू नका. ”
अत्यंत वाईट, दाहक मनस्थितीतून आमचं कुटुंब चालले होते. बाकी सगळे मनातले दूर करून आम्ही फक्त अरुण बरा व्हावा” म्हणूनच प्रार्थना करत होतो ज्या आजीनं आम्हाला कायम मायेचं पांघरूण पांघरलं तीच आजी नातीच्या बाबतीत कशी काय “करणी कवटाळ” असू शकते. काळजाच्या चिंध्या झाल्या होत्या. ओठात केवळ संस्कारांमुळे अपशब्द अडकून बसले होते.
आजारी अरुणला ताईने भेटायचेही नाही हा तिच्यावर होणारा अन्याय, एक प्रकारचा मानसिक अत्याचार ती कसा सहन करू शकेल? ती तिच्याच घरी याच साऱ्या माणसांसोबत त्यांची उष्टी खरकटी काढत लहानग्या तुषारला सांभाळत मनात काय विचार करत असेल? एक दिवस डोक्यात निश्चित विचार घेऊन मीच ताईच्या घरी गेले आणि उंबरठ्यातच ताईला म्हणाले, ” बस झालं आता! बॅग भर, तुषारला घे आणि चल आपल्या घरी. ”
ताईचे सासरे जेवत होते. ते जेवण टाकून उठले. त्यांनी माझ्या हातून तुषारला घेण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्या मोठ्या डोळ्यांनी त्यावेळी मला साथ दिली. ते घराबाहेर गेले. ताईने मला घट्ट मिठी मारली आणि ती हमसाहमशी रडली. मी तिला रडू दिले. एक लोंढा वाहू दिला. शांत झाल्यावर तिला म्हटले, ” चल आता. सगळं ठीक होईल. बघूया.”
ताई आणि तुषारला घेऊन मी घरी आले. हा संपूर्ण निर्णय माझा होता आणि आमचं संपूर्ण कुटुंब त्यानंतर ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं!
दोन अडीच महिन्यांनी अरुणला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. तिथून त्याला त्याच्या ठाण्यातल्याच मावशीकडे नेलं. त्यानंतर एक दोनदा ताईने मावशीच्या घरी जाऊन अरुणची विरोधी वातावरणातही भेट घेतली होती. नंतर अरुणच्या परिवाराने अरुणला लोणावळ्याला घेऊन जाण्याचे ठरवले. त्यावेळी अरुणने “तूही लोणावळ्याला यावेस” असे ताईला सुचवले पण ताईने स्पष्ट नकार दिला. म्हणाली, ” आपण आपल्याच घरी जाऊ. मी तुझी संपूर्ण काळजी घेईन याची खात्री बाळग” नाईलाजाने तिने तो हॉस्पिटलमध्ये असताना काय काय घडले याची हकीकत सांगितली आणि या कुटुंबीयांवरचा तिचा विश्वास ढळल्याचेही सांगितले. अरुणने ऐकून घेतले पण तरीही लोणावळ्याला जाण्याचा बेत कायम राहिला. समस्त कुटुंब लोणावळ्याला रवाना झाल्यावर ताईने एक दिवस गांगल बिल्डिंग मधल्या तिच्या घरी जाऊन घर आवरून त्यास कुलूप घातले आणि ती कायमची आमच्या घरी राहायला आली.
ताईच्या वैवाहिक जीवनातल्या कष्टप्रद अध्यायाने आणखी एक निराळे वळण घेतले.
एक दिवस अरुणचे पत्र आले. अरुणच्या पत्राने ताई अतिशय आनंदित झाली. तिने पत्र फोडले आणि क्षणात तिचा हर्ष मावळला. अरुणने पत्रात लिहिले होते, ” तुझे माझे नाते सरले असेच समज.. ”
पत्रात मायना नव्हता. खाली केलेल्या सहीत निर्जीवपणा, कोरडेपणा होता. “सखी सरले आपले नाते” या गीत रामायणातल्या ओळीच जणू काही हृदयात थरथरल्या पण या वेळेस ताई खंबीर होती. ती अजिबात कोलमडली नाही, ढासळली नाही, मोडली पण वाकली नाही. तिने डोळे पुसले, ढळणारे मन आवरले आणि जीवनातलं कठिणातलं कठीण पाऊल उचलण्याचा तिने निर्धार केला.
संकटं परवानगी घेऊन घरात शिरत नाहीत पण ती आली ना की त्यांच्या सोबतीनं राहून त्यांना टक्कर देण्यासाठी मानसिक बळ वाढवावं लागतं.
शिवाय यात ताईचा दोषच काय होता? खरं म्हणजे तिचा स्वाभिमान दुखावला होता. तिच्या अत्यंत मायेच्या माणसांना अपमानित केलेलं होतं. त्यांच्या भावनांना, वैचारिकतेला पायदळी तुडवलेलं होतं. NOW OR NEVER च्या रेषेवर ताई उभी होती आणि ती अजिबात डळमळलेली नव्हती. नातं खरं असेल तर तुटणार नाही आणि तुटलं तर ते नातच नव्हतं या विचारापाशी येऊन ती थांबली. आयुष्याच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी जणू तिने शूर सैनिकाचं बळ गोळा केलं आणि या तिच्या लढाईत आमचं कुटुंब तिच्या मागे भक्कमपणे उभं होतं. पिळलेल्या मनातही सकारात्मक उर्जा होती.
काही काळ जावा लागला पण अखेर हा संग्राम संपण्याची चाहूल लागली. या साऱ्या घटनांच्या दरम्यान प्रकाश दादाने (ताईच्या दिराने) अनेकदा सामंजस्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. हे त्यांनी अगदी मनापासून केले. त्याच्या कुटुंबीयांनी ताईच्या बाबतीत किती चुका केल्या आहेत याची जाणीव ठेवून केले पण तरीही ताईने माघार घेतली नाही. तिच्या स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा, अस्तित्वाचा, स्वयंप्रेरणेचा स्त्रोत तिला विझू द्यायचा नव्हता. प्रचंड मानसिक ताकदीने ती स्थिर राहिली.
एक दिवस अरुण स्वत: आमच्या घरी आला. त्याचे ते एकेकाळचे राजबिंडे, राजस रूप पार लयाला गेले होते. दुखण्याने त्याला पार पोखरून टाकलं होतं. त्याच्या या स्थितीला फक्त एक शारीरिक व्याधी इतकंच कारण नव्हतं तर विकृत वृत्तींच्या कड्यांमध्ये त्याचं जीवन अडकलं होतं त्यामुळे त्याची अशी स्थिती झाली होती. जीजीने त्याला प्रेमाने जवळ घेतले. त्याचे मुके घेतले. अरुणने जवळच उभ्या असलेल्या ताईला म्हटले, “अरु झालं गेलं विसरूया. आपण नव्याने पुन्हा सुरुवात करूया. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ”
ताईने त्याला घट्ट आलिंगन दिले. त्या एका मिठीत त्यांच्या आयुष्यातले सगळे कडु विरघळून गेले.
इतके दिवस ठाण मांडून बसलेली आमच्या घरातली अमावस्या अखेर संपली आणि प्रेमाची पौर्णिमा पुन्हा एकदा अवतरली.
त्यानंतर माझ्या मनात सहज आले, अरुण फक्त घरी आला होता. तो जुळवायला की भांडायला हे ठरायचं होतं. त्याआधीच जिजी कशी काय इतकी हळवी झाली? मी जेव्हा नंतर जिजीला हे विचारलं तेव्हा ती म्हणाली, “भांडायला येणारा माणूस तेव्हाच कळतो. अरुणच्या चेहऱ्यावर ते भावच नव्हते. ”
माणसं ओळखण्यात जिजी नेहमीच तरबेज होती.
“फरगेट अँड फरगिव्ह” हेच आमच्या कुटुंबाचं ब्रीदवाक्य होतं.
शिवाय जीजी नेहमी म्हणायची, ” सत्याचा वाली परमेश्वर असतो. एक ना एक दिवस सत्याचा विजय होतो. ”
त्यानंतर ताई आणि अरुणचा संसार अत्यंत सुखाने सुरू झाला. वाटेत अनेक खाचखळगे, काळज्या होत्याच. अजून काट्यांचीच बिछायत होती पण आता ती दोघं आणि त्यांच्यातलं घट्ट प्रेम या सर्वांवर मात करण्यासाठी समर्थ होतं. बिघडलेली सगळी नाती कालांतराने आपोआपच सुधारत गेली इतकी की भूतकाळात असं काही घडलं होतं याची आठवणही मागे राहिली नाही. ढगे आणि मुल्हेरकर कुटुंबाचा स्नेह त्यानंतर कधीही तुटला नाही. सगळे गैरसमज दूर झाले आणि प्रेमाची नाती जुळली गेली कायमस्वरुपी. ही केवळ कृष्णकृपा.
आज जेव्हा मी या सर्व भूतकाळातल्या वेदनादायी घटना आठवते तेव्हा वाटतं युद्धे काय फक्त भौगोलिक असतात का? भौगोलिक युद्धात फक्त हार किंवा जीत असते पण मानसिक, कौटुंबिक अथवा सामाजिक युद्धात केवळ हार -जीत नसते तर एक परिवर्तन असते आणि परिवर्तन म्हणजे नव्या समाजाचा पाया असतो. यात साऱ्या नकारात्मक विरोधी रेषांचे विलनीकरण झालेले असते आणि जागेपणातली किंवा जागृत झालेली ही मने शुचिर्भूत असतात याचा सुंदर अनुभव आम्ही घेतला. तेव्हाही आणि त्यानंतरच्या काळातही. खरं म्हणजे आम्हाला कुणालाच ताईचं आणि अरुणचं नातं तुटावं असं वाटत नव्हतं पण ते रडतखडत, लाचारीने, कृतीशून्य असमर्थतेत, खोट्या समाधानात टिकावं असंही वाटत नव्हतं. कुठलाही अवास्तव अहंकार नसला तरी “स्वाभिमान हा महत्त्वाचा” हेच सूत्र त्यामागे होतं त्यामुळे त्यादिवशी समारंभात भेटलेल्या माझ्या बालमैत्रिणीने विचारलेल्या, ” इतक्या खोलवर झालेले घावही बुझू शकतात का?” या प्रश्नाला मी उत्तर दिले, “ हो! तुमची पायाभूत मनोधारणा चांगली असेल तर खड्डे बुझतात नव्हे ते बुझवावे लागतात.”
रोज वेळ मिळेल तेव्हा नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणीं आणि अनोळखी वाचक यांच्याशी फोनवर मस्त गप्पा मारण्यात एक वेगळीच मजा येते. आणि मी ती नेहमीच एन्जॉय करतो.
आज सकाळी कॉन्व्हेंट मधून शिकलेल्या आणि माझ्याबरोबर कॉलेजमध्ये असलेल्या मैत्रिणीशी गप्पा मारताना, मैत्रीण (नाव छाया) म्हणाली –
छाया : मी रोज सकाळी एक श्लोक म्हणून देवाची प्रार्थना करते. पण श्लोकाचा अर्थ काहीच समजत नसतो आणि बऱ्याच शब्दांचे उच्चार पण नीट करता येत नाहीत. त्यामुळे प्रार्थना म्हणण्यात मनापासून मजा येत नाही. इंग्रजीमध्ये देवाची काय प्रार्थना करता येईल ?
तुझं चौफेर लिखाण असल्यामुळे तू नक्कीच इंग्रजी मधली सोपी प्रार्थना सांगू शकशील. मला रोज इंग्रजी मध्ये प्रार्थना म्हणायला नक्कीच आवडेल. आणि प्रार्थना सोपी असेल तर मी सकाळ, संध्याकाळ आणि वेळ मिळेल तेव्हा म्हणत जाईन. मला प्रार्थना म्हणायला खूप आवडतं.
इंग्रजीमध्ये प्रार्थना सूचवणं आणि ते पण मी, हे जरा अवघडच होतं. मी थोडा विचार केला, वर बघितलं, म्हणजे देवाकडे बघितलं, आणि मला एक छान आणि अगदी सोपी प्रार्थना क्लिक झाली. आणि गंमत म्हणजे मला स्वतःला पण ती मनानी तयार केलेली प्रार्थना खूप आवडली.
मी म्हटलं : एकदम सोपी प्रार्थना सांगतो. इंग्रजीमधे आहे. तुझ्यासारख्या इंग्लिश मीडियम वाल्यांना तर एकदमच सोपी. आणि देवाने जर तुझी ही प्रार्थना ऐकली तर जगामधले सगळेच जण आयुष्य एन्जॉय करतील.
प्रार्थना अशी आहे –
Hey God, let my mind and all parts of my body always remain and grow as per your original design for human body.
And let this logic apply to everyone on the earth.
छाया एकदम खुश झाली. म्हणाली, अरे एकदम सोपी आहे आणि अर्थपूर्ण तर आहेच आहे. पाठांतर पण करायला नको. आणि तिनी मला ही प्रार्थना लगेचच तिच्या इंग्लिश स्टाईल मध्ये म्हणून पण दाखवली. तिची बोलण्याची स्टाईल जरा इंग्लिश असल्यामुळे ऐकताना मजा आली.
असं म्हणतात देवाला प्रार्थना आपण कुठल्या भाषेत करतो ते महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं की प्रार्थना मनापासून आहे की नाही. आणि प्रार्थना नीट म्हणता आली आणि प्रार्थनेचा अर्थ जर समजला, तरच ती मनापासून होऊ शकते. आणि मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच एक वेगळाच आनंद देते आणि चेहऱ्यावर प्रसन्नता आणते.
(फोटो ओळ : ‘संजीवन’ शाळेत अनोखे उपक्रम राबवले जातात. सोबतच्या फोटोमध्ये मुली झाडाला राखी बांधत असल्याचा संग्रहित फोटो. फोटोत शशीताई ठकार, अनघादेवी, प्राचार्य धनंजय शिरूर आदी.)
☆ “जगावेगळी ‘संजीवन’ शाळा” ☆ श्री संदीप काळे ☆
विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आय. पी. एस. अधिकारी मनोजकुमार शर्माजी यांची वाट बघत थांबलो होतो. गेटच्या समोर असणाऱ्या गाडीकडे माझी सहज नजर गेली. पाहतो तर काय ? माझ्या समोरच्या गाडीमध्ये सन्माननीय मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले महाराज एकटेच कुणाची तरी वाट पाहत थांबले होते. महाराजांचे लक्ष मोबाईलमध्ये होते. मी जाऊन जोरात ‘नमस्कार महाराज’ म्हणेपर्यंत महाराज मोबाईलमध्येच पाहत होते. आमच्या गप्पा झाल्यावर मी महाराजांना नम्रपणे म्हणालो, ‘महाराज, तुम्हाला व्हॉटसॲप पाहायला वेळ मिळतो का ?’
त्यावर महाराज हसून म्हणाले, ‘नाही, अजिबात नाही. आता एक आमदार माझ्यासोबत येत आहेत. त्यांची वाट बघत थांबलो होतो. व्हॉटसॲपमध्ये काही ग्रूप आहेत, ते मी पाहतो. त्यात मी शिकलेल्या पाचगणीच्या संजीवन शाळेचाही एक ग्रूप आहे, त्या ग्रूपमध्ये गेलो की, शाळेची आठवण येते. नवीन माहिती, फोटो मी पाहत असतो. ‘
महाराज अधिक उत्साहाने मला संजीवन शाळेविषयी सांगत होते, ‘मी ज्या संजीवन शाळेत शिकलो, त्या शाळेच्या खूप आठवणी आहेत. ‘ महाराज एक-एक करून त्या शाळेच्या आठवणी सांगत होते आणि मी ऐकत होतो. महाराजांकडून पाचगणीच्या संजीवन शाळेचे कौतुक सुरू होते. महाराज ज्यांची वाट पाहत थांबले होते, ते आमदार आले आणि महाराज निघून गेले. शर्माजी आले, त्यांची भेट झाली, तेही निघून गेले.
त्या दिवशी विधान भवनामध्ये अनेकांच्या भेटी झाल्या. अनेकांशी बोलणे झाले, पण त्या सर्वांमध्ये बोलण्याची आठवण राहिली ती महाराजांच्या संजीवनी शाळेच्या प्रेमाविषयी.
मी माझ्या नरिमन पॉईंट येथील आंबेसी सेंटर मधील कार्यालयात पोहोचलो. कार्यालयात गेल्यावर पहिल्यांदा पाचगणीची संजीवन शाळा नेमकी आहे तरी कशी, हे गुगलवर सर्च केले. शाळेची माहिती मिळाल्यावर त्याच दिवशी मनोमन ठरवले की, शक्य तितक्या लवकर संजीवन शाळेला भेट देण्यासाठी जायचे.
पुढच्या आठवड्यात त्या शाळेला भेट देण्याचा दिवस उजाडला. पाचगणीमध्ये प्रवेश केल्यावर महाबळेश्वर रोडवर भीमनगरमध्ये संजीवन चौक आहे, तिथेच संजीवन विद्यालय ट्रस्टची संजीवन शाळा आहे. पाचगणी आणि संजीवन शाळेभोवती असणारे नैसर्गिक सौंदर्य जगाच्या पाठीवर फार कमी ठिकाणी असेल.
मी शाळेत पोहोचलो. ‘संजीवन’चे प्राचार्य धनंजय शिरूर सर यांच्याशी माझे आधीच फोनवर बोलणे झाले होते. त्यांना भेटण्यासाठी मी शाळेतल्या शिपायाला निरोप दिला. शिपाई मला म्हणाला, ‘सरांची बैठक सुरू आहे. आपण थोडा वेळ बसा. ‘ मी ‘हो’ म्हणून बाहेर बसलो.
माझ्या लक्षात आले, शिरूर सर यांना वेळ लागणार आहे, म्हणून मी फेरफटका मारावा या उद्देशाने बाहेर पडलो. शाळेच्या परिसरात जे सौंदर्य होते, ते फारच मोहक होते. मला माहित होते की, याच भागात ‘तारे जमींन पर’ हा चित्रपट तयार झाला होता.
एका मोठ्या वडाच्या झाडाखाली, शाळेतल्या काही मुली एका ज्येष्ठ महिलेसोबत कसली तरी तयारी करत होत्या. एक मोठा केक आणला होता. टाळ्यांच्या गजरात तो केक कापला गेला. त्या मुली अगदी भावूक होऊन तो केक त्या महिलेला भरवत होत्या. त्या महिला तिथे असणाऱ्या मुलींना म्हणत होत्या, ‘काय गं, घरी गेल्यावर मला विसरणार तर नाही ना.. ?’ काही बोलण्याच्या आधी त्या मुली भावनिक होऊन त्या महिलेच्या गळ्यात पडल्या. ते सारे भावनिक चित्र मन हेलावून सोडणारे होते.
माझ्या बाजूला बसून संगणक गेम खेळणाऱ्या मुलाला मी विचारले, ‘या महिला कोण आहेत?’
त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘त्या आमच्या शशी मॅम आहेत. ‘
मी पुन्हा त्यांना विचारले, ‘तुमच्या शिक्षिका आहेत काय ?’
त्याने कपाळावर हात मारत मला सांगितले, ‘अहो, या शाळेच्या प्रमुख आहेत. ‘
मी म्हणालो, ‘अरे, मला नव्हते माहीत. ‘
मी त्यांच्या जवळ जाऊन माझा परिचय देत त्यांना वाकून नमस्कार केला. आमचे बोलणे सुरू झाले आणि गप्पांमधून त्या मॅमनी त्या शाळेविषयी मला जे काही सांगितले, त्यातून मी अवाक् तर झालोच, शिवाय शशी मॅमची शाळा अवघ्या ‘जगात’ वेगळी कशी आहे हेही मी पाहिले. जे मंत्री महोदयांनी मला विधान भवनाच्या गेटवर सांगितले होते, ते माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर होते.
मूळचे बडोदा येथील असणारे कृष्णराव पंडित आणि रावसाहेब पंडित या दोघांनी १९२२ ला भारतीय संस्कृती जपणारी शाळा उभी करायची, असे स्वप्न पाहिले होते. पाचगणी आणि परिसरात ख्रिश्चन धर्माशी निगडित अनेक शाळा सुरू झाल्या होत्या. हिंदू संस्कृती प्रामुख्याने जपली जावी, खेळाला प्राधान्य देऊन प्रशासकीय सेवेतील अधिकारी घडावेत, या हेतूने संजीवन संस्थेची निर्मिती झाली.
पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली शाळा आज शशी मॅम ज्या मुलींना निरोप देत होत्या, त्या मुली पन्नास हजारावा आकडा पार करीत होत्या. प्रगतीचे हे शिखर गाठत असताना या संस्थेने मागे वळून कधी पाहिलेच नाही.
प्राचार्य धनंजय शिरूर सर (7798881662) हे संजीवनचे ११ वे प्राचार्य आहेत. शिरूर सर आधीपासून याच संजीवन शाळेत शिक्षक होते. मग ते व्यवस्थापनाच्या भूमिकेत आले, आणि नंतर प्राचार्य झाले. २००३पासून आजपर्यंत शिरूर सर यांनी शाळेसाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे.
मी शशीताई यांच्याकडून जे काही शाळेविषयी ऐकत होतो, ते सारे काही अद्भुत असेच होते. पण मी जेव्हा शशीताईकडून शाळेशी संबंधित असलेला विषय ऐकला, तेव्हा मी शशीताई यांच्यापुढे अधिकच नतमस्तक झालो.
शशीताई ठकार शिक्षणासाठी ८वीला असताना ग्वालियरमधून पाचगणीला आल्या. सर्व विषयांत त्या अतिशय हुशार. राज्य आणि देशपातळीवर त्यांनी खेळात शाळेचे नाव केले. एखाद्या तरुणाच्या प्रेमात पडायच्या वयात शशीताई संजीवन शाळेच्या प्रेमात पडल्या. शशीताई संजीवनमध्ये शिक्षक झाल्या, प्राचार्य झाल्या, संचालक झाल्या आणि आता त्या शाळेच्या चेअरमन आहेत. वय वर्ष ९३च्या शशीताई आजही या वयात शाळेसाठी सर्व कामे अगदी नेटाने करतात. संजीवन शाळा, कॉलेजचे रूपांतर स्किल आणि स्पोर्ट विद्यापीठात करायचे खूप मोठे स्वप्न शशीताईंनी उराशी बाळगले आहे.
शशीताई यांनी ना लग्न केले, ना कुणासोबत संसार, ना कुण्या नातेवाईकांसोबत नाते ठेवले. शाळा हेच त्यांच्यासाठी ‘जग’ ठरले आणि त्या शाळेला जागतिक असा अमूल्य दागिना बनवण्याचे काम शशीताईनी केले. शाळेच्या भिंती आणि मोठे मस्टर लिहिण्यासाठी कमी पडतील इतके मोठे विद्यार्थी घडवण्याचे काम झाले आहे. फोर्स मोटर्सचे सीईओ प्रसन्न फिरोदिया, संगीतकार ललित पंडित, मृण्मयी लागू, अमित देशमुख, रीतेश देशमुख, विद्यमान मंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराज अशी कितीतरी नावे घेता येतील. किती आयपीएस झाले, किती आयएएस झाले, किती वैज्ञानिक झाले, कित्येकांनी मोठ्या पदांवर जात सामाजिक कीर्ती मिळवली, याचा आकडा फार मोठा होता. ही शाळा नाही तर उज्ज्वल इतिहास घडवणारे चालते बोलते विद्यापीठ आहे.
मी शशीताईंना विचारले, ‘जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटते?’
शशीताई शांतपणे म्हणाल्या, ‘मी आयुष्यभर पिढ्या घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अजून पुढे करतच राहणार. ‘ थोड्या काळजीच्या स्वरात ताई म्हणाल्या, ‘कोविडमुळे आम्ही खूप अडचणीत सापडलो. आमच्या शाळेविषयी शासन स्तरावर सतत अनास्था असते. पूर्वी मदत करणारी माणसे खूप होती, पण आता फारसे लोक पुढे येत नाहीत. त्यामुळे हा एवढा मोठा जगन्नाथाचा रथ ओढायचा कसा, हा प्रश्न आहे. ‘
आमचे बोलणे चालू होते, तेव्हढ्यात मला शोधत प्राचार्य शिरूर सर तिथे आले. शशीताई म्हणाल्या, ‘तुम्ही संपूर्ण शाळा फिरून या. मी तुमची घरी वाट पहाते. ‘ ताई निघाल्या. रस्त्याने जाताना प्रत्येक मुलगा ताईला जणू त्या त्यांच्या आईच आहेत, असेच बोलत होत्या.
मी शिरूर सर यांना म्हणालो, ‘या वयात काय उत्साह! काय काम करण्याची ताकद! बापरे! किती कमाल आहे! ‘
शिरूर सर म्हणाले, ‘ताई म्हणजे अजब आणि अद्भुत रसायन आहेत. वय वर्ष ४० असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची त्यांना नावे तोंडपाठ आहेत. शिरूर सर जे जे बोलत होते, ते सारेच कमालीचे होते. शिरूर सरांनी मला त्या शाळेत जे जे दाखवले ते सारे शिक्षण आणि सामाजिकता दृढ करणारे होते. सर्व प्रकारचे खेळ, संगीत, चित्रकला, सर्व प्रकारच्या अकादमींची पूर्व तयारी, या सर्व क्षेत्रांत जागतिक पातळीपर्यंत सहभागी झालेली मुले तिथे होती. पहिली ते बारावीपर्यंत कुणालाच नव्वद टक्केच्या खाली मार्क्स वाले कुणी आहेत का ? नाही, असा प्रश्न मला त्या शाळेच्या यशाचा आलेख पाहून बघायला मिळत होता. स्कीलिंगवर संस्थेचा खूप भर होता. केवळ नोकरी नाही तर स्कीलिंगच्या माध्यमातून मुले उभी राहिली पाहिजे, स्वत:चा व्यवसाय त्यांनी सुरू केला पाहिजे, यासाठी वीसपेक्षा जास्त स्कीलिंगचे कोर्स येथे चालवले जातात.
शिरूर सर म्हणाले, ‘संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. आसपासच्या सर्व गावांत मोबाईल वाचनालय सुरू केले आहेत. पाच हजारांहून अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. अनेक भागांतून गरिबांची मुले शासनाच्या माध्यमातून येथे मोफत शिकण्यासाठी येतात. ही शाळा म्हणजे दुसरं घर आहे. शैक्षणिक जडणघडणी सोबत मानसिक आधार, जीवनाची पायाभरणी हे इथले वैशिष्ट्य आहे.
मुलांकडून इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळणे, सतत फास्ट फूड खाणे टाळणे, बेशिस्तपणा दूर करणे, आयुष्याकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन थांबवणे. आमच्या शाळेत या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. म्हणून भारत भरातून आमच्याकडे प्रवेश असतात. आमच्याकडच्या माजी विद्यार्थांनी अनेक गरीब विद्यार्थी येथे घडावेत यासाठी त्यांच्याकडून शिष्यवृत्ती देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून अनेक विद्यार्थी शिकतात. ‘
शिरूर सर जे जे सांगत होते त्याचा डेमोही दाखवत होते. एकीकडे आमचे बोलणे सुरू होते, तर दुसरीकडे वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक मुलाला शिरूर सर काहीतरी सांगत होते. कुणी पोहत होते, कुणी क्रिकेट खेळत होते, तर कुणी अनेक वैज्ञानिक प्रयोग करीत होते. जसे ‘तारे जमींन पर’, ‘थ्री इडियट’ या चित्रपटांत लहान मुले जे जे प्रयोग करीत होते, ते ते सारे प्रयोग या ‘जगा’वेगळ्या संजीवन शाळेत मी माझ्या डोळ्याने पाहत होतो.
खेळाच्या एका शिक्षकाची ओळख करून देताना शिरूर सर म्हणाले, “हे सचिन कांबळे सर, सर्व देशी, विदेशी खेळात विशेषतः क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये यांनी संजीवन शाळेचे नाव सातासमुद्रापार नेले आहे”.
हसतमुख, अत्यंत उत्साही कांबळे सर यांच्याशी खेळाचे सारे यश समजून घेताना कधी वेळ गेला ते कळलेच नाही. आख्खा दिवस त्या शाळेत गेला.
मला निघायचे होते. आम्ही शशीताईंकडे गेलो. त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले जेवण वाढले होते. जेवल्यावर त्यांनी स्वतः तयार केलेले ग्रीटिंग मला दिले. त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या कन्या, संस्थेच्या संचालक अनघा देवी (9049919912) यांची मला त्यांनी ओळख करून दिली. तेव्हढ्या मोठाल्या पायऱ्या उतरून ताई मला निरोप देण्यासाठी खाली आल्या. ताईंच्या पायावर डोके ठेवून मी गाडीत बसलो.
आपल्या राज्यात शाळा या विषयाला घेऊन असाही प्रयोग होऊ शकतो, यावर माझा विश्वास बसत नव्हता. गाडी बरीच पुढे गेल्यावर मी मागे नजर टाकली. शशीताईंचा हात अनघादेवी ताईंच्या हातात होता. अनघादेवी ताईंच्या मागे प्राचार्य शिरूर सर जात होते, आणि शिरूर सरांच्या मागे सचिन कांबळे सर होते. शशी ताईने पुढे शाळेचा कारभार सुवर्ण अक्षराने लिहिण्यासाठी कार्यक्षम माणसे तयार केली होती. शाळेच्या भविष्याला पुढे नेणारी दुसरी पिढी शशी ताईंनी तयार केली होती.
मला या शाळेला भेट देऊन आल्यावर अवघे ‘जग’ फिरून आलो असे वाटत होते. आज याच ‘जगात’ वेगळ्या असणाऱ्या ‘संजीवन’ आणि तुमच्या आसपास असणाऱ्या त्या प्रत्येक चांगल्या शाळेला तुमची गरज आहे, ती तुमच्या आमच्या मदतीची. या शाळा टिकल्या तर आमची संस्कृती, आमचा भारत देश टिकेल ? बरोबर ना. करणार मग अशा शाळेला मदत ? नक्कीकरा.
☆ गाडीचे गिअर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆
गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअरबरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.
गाडी सुरू झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण ‘फर्स्ट गिअर’ टाकतो. हा ‘फर्स्ट गिअर’ म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई, बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र. हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता ‘पुढे’ जात राहिली पाहिजे हा पहिला ‘संस्कार’ फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला निर्व्याज्य प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी ‘बंद पडणार नाही’ याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी ‘पळण्यासाठी’ इतका कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो. इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं. शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला… बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं. समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.
गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडालत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग, सणासुदीला नवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला-मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअरमध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.
आपण आता ‘फोर्थ गिअर’ टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, आकर्षक लेटेस्ट मोबाईल, एक बि. एच. के. मधून दोन बि. एच. के., लॅपटाॅप, ह्याऊ नि त्याऊ. या वेगाची नशाच काही और.
गंमत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही. आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार… लाख… कोटी… खर्व… निखर्व… रुपये नाहीत, गरजा.. हा ‘वेग’खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कुणी येऊ नये, ‘लाल’सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं आणि… आणि…. आणि…. ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो. गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो.
पाच.. चार.. तीन.. दोन… एक…. खाट खाट
गिअर मागे टाकत आपण आता न्यूट्रलवर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो. पाचव्या गिअरमध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअरदेखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती.. आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं. गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे. मला सांगा कुठला गिअर टाकाल ?
सुसाट वेगाचा पाचवा गिअर ? की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा ‘फर्स्ट गिअर’ ?
आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ ? कुणी दिला होता आधार ? आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने ? इ. एम. आय. भरत विकत घेतलेल्या क्लासिक बेडरूमने ? नव्या कोऱ्या गाडीने ? ‘ यू आर प्रमोटेड’ असं लिहिलेल्या कागदाने ? मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने.
आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, ‘होईल सगळं व्यवस्थित’ म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी ‘बायको’ नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, ‘त्या’ काळात आपल्या नैराश्यावरचा ‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे ‘जिवाभावाचे मित्र’ हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते कां ?
माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवू या. त्याचा आनंद ही उपभोगू या. फक्त त्यावेळी आपल्या ‘फर्स्ट गिअर्स’ चं स्मरण ठेवू या. आयुष्याचा वेग मधून मधून थोऽऽऽडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.
जिंदगी हसीन है.
☆ ☆ ☆ ☆
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अविस्मरणीय यात्रा संस्मरण – ‘चमत्कारी गेट और अपनी पाप-मुक्ति‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
(25 अप्रैल 2025 को परम आदरणीय डॉ कुंदन सिंह परिहार जी ने अपने सफल, स्वस्थ एवं सादगीपूर्ण जीवन के 86 वर्ष पूर्ण किये। आपका आशीर्वाद हम सबको, हमारी एवं आने वाली पीढ़ियों को सदैव मिलता रहे ईश्वर से यही कामना है। ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से आपके स्वस्थ जीवन के लिए हार्दिक शुभकामनाएं 💐🙏)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 286 ☆
☆ यात्रा-संस्मरण ☆ चमत्कारी गेट और अपनी पाप-मुक्ति ☆
हाल ही में सिक्किम यात्रा का अवसर मिला। ट्रेन से दिल्ली पहुंच कर 22 मार्च को बागडोगरा की फ्लाइट पकड़ी। हमारे परिवार के नौ लोग थे। बागडोगरा पहुंचने पर रोलेप ट्राइबल होमस्टे के संचालक श्री रोशन राय ने हमारी ज़िम्मेदारी संभाल ली। पहला गंतव्य मानखिम। उसके बाद लुंचोक, रोलेप, ज़ुलुक, गंगटोक और रावोंगला। 30 मार्च तक घूमना-फिरना, रुकना- टिकना, खाना-पीना सब रोशन जी के ज़िम्मे। होमस्टे का अलग ही अनुभव था। रोशन जी अभी युवा हैं, बहुत सरल, विनोदी स्वभाव के। वैसी ही उनकी पूरी टीम है। सब कुछ घर जैसा, पूरी तरह अनौपचारिक। मेरी बेटियां और बहू उनकी टीम को रसोई में मदद देने में जुट जाती थीं।
रोलेप में हम ऊंची, मुश्किल जगहों में पैदल चढ़े। तब इत्मीनान हुआ कि उम्र बहुत हो जाने पर भी काठी अभी ठीक-ठाक है। अपने ऊपर भरोसा पैदा हुआ। ऊपर चढ़ने में मेरी फिक्र मुझसे ज़्यादा रोशन जी के लड़कों को रहती थी। हम 12000 फुट की ऊंचाई पर स्थित ज़ुलुक में भी एक रात ठहरे, जो बेहद ठंडी जगह है।
लौटते वक्त गंगटोक में हमारी भेंट रोशन जी की पत्नी और उनकी बहुत प्यारी बेटी से हुई। उनके साथ भोजन हुआ। दूसरे दिन रोशन जी ने हमें रास्ते में रोक कर हम सब के गले में पीला उत्तरीय डालकर हमें विदा किया। उनके व्यवहार के कारण हमारी यात्रा सचमुच यादगार बन गयी।
रोशन जी की टीम में जो लड़के हैं वे गांव-देहात के लड़कों जैसे हैं। होटलों में कार्यरत, ट्रेन्ड, ‘गुड मॉर्निंग, गुड ईवनिंग सर’ वाले सेवकों जैसे नहीं। आपके बगल में चलते-चलते वे आपके साथ कोई मज़ाक करके हंसते-हंसते दुहरे हो जाएंगे। रोशन जी ने बताया ये सब ऐसे लड़के थे जिनके घर में खाने-पहनने की भी तंगी थी। रोशन जी उन पर नज़र रखते थे कि पैसा मिलने पर कोई ग़लत शौक न पाल लें।
गंगटोक से चलकर हम नाथूला पास पर कुछ देर रुकते हुए रावोंगला पहुंचे, जो बागडोगरा वापस पहुंचने से पहले हमारा आखिरी मुकाम था। यहां ‘सेविन मिरर लेक’ नामक होमस्टे पर हम दो दिन रुके। सुन्दर स्थान है। सिक्किम में हर जगह तरह-तरह के फूलों की बहार दिखी। प्राकृतिक, प्रदूषण-मुक्त वातावरण में फूलों के दमकते रंग आंखों को चौंधयाते हैं।
इस होमस्टे से कुछ दूरी पर बुद्ध पार्क है। यहां गौतम बुद्ध की विशाल प्रतिमा, संग्रहालय और पुस्तकालय हैं। पार्क बड़े क्षेत्र में फैला है। वहां पर्यटकों की अच्छी भीड़ दिखी।
होमस्टे की सीढ़ियों पर बने द्वार के बगल में लगी सफेद पत्थर की एक पट्टिका ने ध्यान खींचा। उस पर कुछ अंकित था। उत्सुकतावश पढ़ा तो चमत्कृत हो गया। पट्टिका पर लिखा था कि वह द्वार अनेक ‘ज़ुंग’ अर्थात मंत्रों से अभिषिक्त था और उसके नीचे से निकलने वाला अपने सभी पिछले पापों से मुक्त हो जाएगा। (फोटो दे रहा हूं)
अंधा क्या चाहे, दो आंखें। मैं 86 की उम्र पार करने के बाद भी अभी तक संगम पहुंचकर अपने पाप नहीं धो पाया, इसलिए इस द्वार की लिखावट पढ़कर लगा अंधे के हाथ बटेर लग गयी। मैं तुरन्त दो तीन बार उस द्वार के नीचे से गुज़रा । मन हल्का हो गया, सब पापों का बोझ उतर गया। 86 पार की उम्र में नये पापों का पराक्रम करने की गुंजाइश बहुत कम है, इसलिए मुझे अब स्वर्ग की दमकती हुई रोशनियां साफ-साफ दिखायी पड़ने लगी हैं। मित्रगण भरोसा रख सकते हैं कि दुनिया से रुख़सत होने पर मुझे स्वर्ग में बिना ख़ास जांच- पड़ताल के ‘एंट्री’ मिल जाएगी। परलोक की चिन्ता से मुक्त हुआ।
(ई-अभिव्यक्ति द्वारा डॉ कुंदन सिंह परिहार जी के 85 वें जन्मदिवस के अवसर पर स्मृतिशेष भाई जय प्रकाश पाण्डेय जी द्वारा संपादित 85 पार – साहित्य के कुंदन आपके अवलोकनार्थ)
इस प्रकार सौ टका पुण्यवान होकर 31 मार्च को दिल्ली से ट्रेन पकड़कर 1 अप्रैल की सुबह पंछी पुनि जहाज पर पहुंच गया।