मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

२ ) विविधा — ( लेख श्री. पंडित पाठवणार आहेत. )

“ तो आणि मी.. “ – भाग ३८ लेखक : अरविंद लिमये

तो आणि मी

 ——-(अरविंद लिमये, सांगली)

 (क्रमश:-दर गुरुवारी)

 भाग-३८

 ————————–

(पूर्वसूत्र- तो प्रसंग लिलाताईच्या दत्तगुरुंवरील श्रध्देची कसोटी पहाणारा ठरला होता आणि माझ्या बाबांकडून तिच्या विचारांना अकल्पित मिळालेल्या योग्य दिशेमुळे ती त्या कसोटीला उतरलीही!

तो दिवस आणि ती घटना दोन्हीही माझ्या मनातील लिलाताईच्या संदर्भातील आठवणींचा अविभाज्य भाग बनून गेलेले आहेत!)

आदल्या दिवशीच्या रात्री घडलेली ती घटना! त्या कॉलनीतली आमची घरं म्हणजे मधे भिंत असलेली दोन जोडघरेच होती.

त्या रात्री निजानीज होऊन बराच वेळ झाल्यानंतर अचानक मी पलिकडून येणाऱ्या जोरजोरात बोलण्याच्या आवाजाने दचकून जागा झालो. पाहिलं तर आई-बाबाही उठून बसलेले. हलक्या आवाजात एकमेकाशी कांहीतरी बोलत होते. इतर भावंडेही झोप चाळवल्याने माझ्या आधीच जागी झाली होती. रडत, मोठ्या आवाजात बोलण्याचा पलीकडून येणारा तो आवाज लिलाताईचा होता! ती तिच्या वडलांना दुखावलेल्या, चिडलेल्या आवाजात ताडताड बोलत होती. बाकी सर्वजण गप्प राहून ऐकत असणार कारण बाकी कुणाचाच आवाज येत नव्हता.

बाबांनी दटावून आम्हाला झोपण्यास सांगितले. ते दोघे मात्र नंतर बराच वेळ जागे असणार नक्कीच.

सकाळी उठलो तसं मी हे सगळं विसरूनही गेलो होतो. पण ते तात्पुरतंच. कारण बाबांनी पादुकांची पूजा आवरली तसं नेहमीप्रमाणे तीर्थप्रसाद घेण्यासाठी बाहेर आलेल्या

लीलाताईने हात पुढे केला तेव्हा तिला प्रसाद न देताच बाबा आत निघून आले आणि त्यामुळे दुखावलेली लिलाताई रात्री घडलेल्या प्रसंगाची पुन्हा आठवण करुन द्यायला आल्यासारखी बाबांच्या पाठोपाठ खाली मान घालून आमच्या घरात आली!

“काका, कां हो असं? आज मला तीर्थ न् प्रसाद कां बरं नाही दिलात?.. ”

” का नसेल दिला?” बाबांनी तिच्याकडे रोखून पहात तिलाच विचारलं. मान खाली घालून तिथेच अभ्यास करीत बसलेल्या मी दचकून बाबांकडे पाहिलं.

“कां? कांही चुकलं का माझं?” तिने विचारलं.

“ते मीच सांगायला हवं कां? सांगतो. ही आत चहा टाकतेय. तूही घे घोटभर. जा. मी आलोच. ”

ती कांही न बोलता खालमानेनं आमच्या

स्वयंपाकघरांत गेली. आई चुलीवर चहाचं आधण ठेवत होती. लिलाताईला पहाताच आईने तिला भिंतीजवळचा पाट घ्यायला सांगितलं. “बैस” म्हणाली. तोवर बाबाही आत आले.

“चहा घे आणि बाहेर जाऊन पादुकांना रोजच्यासारखा एकाग्रतेने मनापासून नमस्कार करून ये. मघाशी तू स्वस्थचित्त नसावीस बहुतेक. त्यामुळेच असेल, आरती होताच तू

नेहमीसारखा देवाला नमस्कार न करताच तीर्थ घ्यायला हात पुढं केला होतास. आठवतंय?म्हणून तुला तीर्थ दिलं नव्हतं. ” बाबा शांतपणे म्हणाले.

तिचे डोळे भरून आले.

“गप. रडू नको. डोळे पूस बरं. ” आई म्हणाली.

“तुम्हा दोघांनाही माझंच चुकलंय असंच वाटतंय माहितीय मला. ” ती नाराजीने म्हणाली.

“तसं नाहीये” बाबा म्हणाले. “आपण चूक की बरोबर हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं. तुझं काही चुकलंय कां हे आम्ही कोण ठरवणार? तो निवाडा काल रात्री तू स्वत:च तर करुन टाकलायस आणि तुझ्या दृष्टीने जो चूक, त्याला त्याची पूरेपूर शिक्षाही देऊन टाकलीयस. ”

“म्हणजे माझ्या बाबांना. असंच ना? मी त्यांना जे बोलले त्यातला एक शब्द तरी खोटा होता कां सांगा ना ” ती कळवळून म्हणाली.

“खोटं काहीच नसतं. पण संपूर्ण खरंही काहीच नसतं. आणि खरं असेल तेही कसं बोलावं किंवा बोलावं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं. तू जे आणि जसं बोललीस त्यात तुझं काही चुकलं नाही असं तुला वाटत असेल तर तू अस्वस्थ कां आहेस याचा विचार कर. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझं तुलाच मिळेल. ”

“हो. बाबांना काल बोलले मी खूप. काय चुकलं माझं?मला खूप रागच नव्हता आला त्यांचा तर दुखावलेही गेले होते मी. अजूनही शांत नाहीये मन माझं. मीच सगळं कां सहन करायचं सांगा ना?” आवाज भरून आला तसं ती थांबली. घुसमटत रडत राहिली.

“तू शांत हो बरं आधी. असा त्रागा करुन तुलाच त्रास होईल ना बाळा?” आई म्हणाली.

“तुम्ही आज ओळखता कां काकू मला? तुम्हाला इथं

येऊन चार वर्षं होऊन गेलीयत. इतक्या वर्षात मला एकदा तरी असा इतका त्रागा केलेलं पाहिलंयत कां तुम्ही सांगा बघू…. ” ती बोलू लागली. जखमेला धक्का लागताच ती भळभळून वहात रहावी तसं बोलत राहिली. तिचा प्रत्येक शब्द ऐकणाऱ्यालाही अस्वस्थ करणारा होता. आईचे डोळेही भरुन आले होते तसे बाबाही चलबिचल झाले.

तिची कशाचबद्दल कधीच कांही तक्रार नसायची. जे तिनंच करायला हवं ते कुणी न सांगता तोवर निमूटपणे करतच तर आलेली होती. तिची आई, वडील, सगळी भावंडं ही सगळी आपलीच तर आहेत हीच तिची भावना असायची. आजपर्यंत तिने घरबसल्या स्वकष्टाने मिळवलेल्या पैशातली एक दमडीही कधी स्वत:साठी खर्च केलेली नव्हती. जे केलं ते सर्वांसाठीच तर केलं होतं. स्वत:चं कर्तव्य तोंडातून चकार शब्द न काढता जर ती पार पाडत आली होती तर तिच्या बाबतीतलं त्यांचं कर्तव्यही बाबांनीही कां नाही पार पाडायचं हा तिचा प्रश्न होता! काल रात्री हेच ती आपल्या वडलांना पुन:पुन्हा विचारत राहिली होती. खरं तर असा विचार तोपर्यंत तिच्या मनात खरंच कधीच डोकावलाही नव्हता,… पण काल… ?

काल तिच्या पाठच्या बहिणीसाठी, बेबीताईसाठी सांगून आलेल्या स्थळाला होकार कळवून तिचे बाबा मोकळे झाले होते त्यामुळे ही दुखावली गेली आणि आज तेच सगळं आठवून तिचे डोळे पाझरत राहिले होते..

“माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षानं लहान असलेली माझी बहीण आहे ती. तिचं कांही चांगलं होत असेल तर मी कां वाईट वाटून घेऊ सांगा ना?फक्त बहिणीच नाही तर दोन मैत्रिणींसारख्याच आम्ही लहानाच्या मोठ्या झालोयत. तिचं लग्न होतंय, ती मार्गाला लागतेय याचा आनंदच आहे मला. त्यासाठी चिडेन कां मी? पण हा निर्णय घेताना माझ्या वडलांनी मला गृहीत कां धरायचं? मला विश्वासात घेऊन त्यांनी आधी हे कां नाही सांगायचं? खूप शिकायचं, खूप मोठ्ठं व्हायचं असं स्वप्न होतं हो माझं. पण दोघांचे फॉर्म भरायला पुरेशा पैशाची सोय झाली नाही म्हणून एकाचाच फॉर्म भरायची वेळ आली तेव्हाही मला असंच गृहितच तर धरलं होतं त्यांनी. तेव्हाही प्राधान्य कुणाला दिलं तर आण्णाला. तो हुशार नव्हता, पुढं फारसा शिकणार नव्हता तरीही प्राधान्य त्याला. कां तर तो मुलगा म्हणून. म्हणजे मी… मी मुलगी आहे हाच माझा गुन्हा होता कां?तसं असेल तर मी हुशार असून उपयोग काय त्याचा? तेव्हाही आतल्या आत सगळं गिळून तोंडातून ‘ब्र’ही न काढता मी गप्प बसलेच होते ना हो?असंच कां आणि किती दिवस गप्प बसायचं ?

मला संताप अनावर झाला त्याला हे निमित्त झालं फक्त. पण मला राग यायचं कारण वेगळंच आहे. या स्थळाकडून विचारणा आल्यापासून मला विश्वासात घेऊन एका शब्दानेही कांही सांगावं, विचारावं असं त्यांना वाटलंच नाहीय याचा राग आलाय मला. ‘हिला काय विचारायचं? हिला काय सांगायचं? ही थोडीच नाही, नको म्हणणाराय?’ असं त्यांनी गृहितच धरलं याचा राग आला मला. मीही माणूसच आहे ना हो काका? मलाही मन आहे, भावना आहेत हे जन्मदात्या वडलांनी तरी समजून घ्यायला नको कां? हे सगळं स्वतःच स्वत:च्या तोंडानं ठणकावून सांगताना कालही आनंद नव्हताच झाला हो मला. पण न बोलता होणारी घुसमटही सहन होत नव्हती… “

आवाज भरून आला तशी ती बोलायची थांबली.

अस्वस्थपणे येरझारा घालणाऱ्या बाबांनी चमकून तिच्याकडे पाहिलं.

“हे बघ, तू हुशार आहेस. मनानं चांगली आहेस. मी सांगेन ते समजून घेशील असं वाटतंय म्हणून सांगणाराय. ऐकशील?” ते म्हणाले.

तिने डोळे पुसत होकारार्थी मान हलवली.

“हे बघ. आता या सगळ्याचा तू त्यांच्या दृष्टीकोनातून विचार करुन बघ. बेबीसाठी जे स्थळ आलंय ते बिजवराचं आहे. पहिली तीन वर्षांची एक मुलगी आहे त्याला. तो शिकलेला, सुखवस्तू आहे, तरीही कमी शिकलेली मुलगी स्वीकारायला तो तयार होता कारण पहिल्या मुलीचं सगळं प्रेमानं करणारी मुलगी त्याला हवी होती. याबाबतीत काय निर्णय घ्यावा याचं दडपण आपल्या वडलांच्या मनावर असणाराय याचा विचार स्वतःबद्दलच्या एकांगी विचारांच्या गर्दीत तुझ्या मनात डोकावला होता कां? नव्हता. हो ना? खरंतर तुझ्या आधाराची खरी गरज त्या क्षणी त्यांना होती. इतकी वर्षं मी पहातोय एकही दिवस तो माणूस स्वतःसाठी जगलेला नाहीय. राबतोय, कष्ट करतोय, दिवसभर आणि रात्रपाळ्या असताना आठ आठ तास रात्रीही मशीनसमोर उभं राहून दमून भागून घरी आल्यानंतर समोर येईल तेवढा घोटभर चहा आणि शिळंपाकंही गोड मानून तो राबतोय. तरीही राग, संताप, त्रागा, आरडाओरडा यांचा लवलेश तरी आहे कां त्याच्यात? त्या माणसाची स्वत:च्या मुलीनेच केलेली निर्भत्सना निमूट ऐकून घेऊनही शांत रहाताना त्याच्या मनाची आतल्याआत किती घालमेल झाली असेल याचा विचार कर आणि मग मला सांग. शांतपणे विचार करुन सांग. कारणं कांहीही असोत पण आज तो हतबल आहे हे तुझ्यासारख्या समंजस मुलीने समजून घ्यायचं नाही तर कुणी? आणि लग्नाचं काय गं ?तू काय किंवा बेबी काय तुमची लग्नं ठरवायचा निर्णय घेणारे तुझे वडील कोण? ते तर निमित्त आहेत फक्त. या गाठी बांधणारा ‘तो’ त्या तिथे बाहेर औदुंबराखाली बसलाय हे विसरु नकोस. जा. ऊठ. त्याला नेहमीसारखा मनापासून नमस्कार कर फक्त. कांहीही मागू नकोस. जे त्याला द्यावंसं वाटेल ते तो न मागता देत असतो हे लक्षात ठेव. जा. नमस्कार करुन ये आणि मघाशी राहिलेला तीर्थ न् प्रसाद घेऊन जा” बाबा म्हणाले.

त्यांच्याकडून तीर्थ घेण्यासाठी तिने हात पुढे केला तेव्हाही तिचे डोळे पाझरतंच होते.

“शांत हो. काळजी नको करू. सगळं व्यवस्थित होईल. बेबीचं तर होईलच तसंच तुझंही होईल. येत्या चार दिवसात तुला दत्त महाराजांनी ठरवलेल्या स्थळाकडूनच मागणी येईल. बघशील तू “

बाबा गंमतीने हसत म्हणाले. काहीच न समजल्यासारखी ती त्यांच्याकडे पहातच राहिली…!

हा सगळाच प्रसंग माझ्या कायमचा लक्षात राहिलाय ते बाबांना लाभलेल्या वाचासिद्धीची यावेळीही पुन्हा एकदा प्रचिती आली म्हणूनच नव्हे फक्त तर या सगळ्या प्रसंगाचे धागेदोरे माझ्याशीही जोडले जाणार आहेत हे यथावकाश माझ्या अनुभवाला आल्यामुळेच!!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ब्रेकअप…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “ब्रेकअप…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

“हॅलो… हॅलो… बाबा, मी संजय ! झोपला होतात का?”

लंडनवरून संजयचा आबांना फोन. “नाही, आत्ताच डोळा लागला होता पुस्तक वाचताना. बोल तू. आत्ता कसा काय फोन केलास? तुझ्याकडे रात्र असेल ना?”, आबा मनगटावरील घड्याळात बघत म्हणाले. “आबा, अहो तुम्ही परत विसरलात. मी आता अमेरिकेत नाही, लंडनला आहे. इथे सकाळचे ११. ३० वाजलेत. तुमच्याकडे साधारण चार वाजले असतील बघा”, संजयचं स्पष्टीकरण.

“अरे हो की. बरं बोल, आणि फोन केलास तर जरा थोड्या वेळाने तरी करायचास. तुला माहिती आहे ना की आई रोज तीन ते पाचमध्ये पेटीच्या क्लासला आणि मग भजनाला जाते ते. उगाच डबल डबल फोन कशाला करता? पैसे वाया जातात”…

आबांचा टिपिकल मध्यमवर्गीय कोकणस्थीपणा मध्येमध्ये उचल खायचा. ब्याऐंशी वर्षांच्या आबांना खरंतर पैशाची काही ददात नव्हती. वडिलोपार्जित घराच्या जागी आता एव्हाना मोठी बिल्डिंग झाली होती. त्यात पूर्ण मजलाभर प्रशस्त फ्लॅट त्यांच्याच नावावर होता. त्यातही सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे चांगलं भरभक्कम पेन्शन होतं. पण हे सगळं ज्यांनी उपभोगायचं ती त्यांची मुलं देशाबाहेर. धाकटा कनिष्क कुटुंबासहित ऑस्ट्रेलियात आणि संजय बायको-मुलांसहीत लंडनला. एवढा मोठा फ्लॅट अंगावर यायचा. कधी कधी ते जुनं घरंच बरं वाटायचं. निदान तिथे आजूबाजूला बोलायला भाडेकरू तरी होते. नाही म्हटलं तरी वर्दळ असायची. अगदी कुणाकडेही पाहुणे आले तरी ओटीवर एकत्र बसून गप्पागोष्टी होत. आता त्यातलं काही राहिलं नाही. भाडेकरूंनाही स्वतःचे फ्लॅट मिळाल्यामुळे त्यांच्या घरांची दारं पण आताशा बंद राहू लागली होती…

“आबा, अहो पैशांचं काय घेऊन बसलात? आणि मी तुमचीच चौकशी करायला फोन केलाय. कशी तब्येत आहे?”, संजयने विचारलं.

“मला काय धाड भरली आहे? मी ठणठणीत. रोज सकाळ-संध्याकाळ फिरायला जातो. मालतीच्या प्रकृतीची जरा कुरकुर चालू असते. पण ऐकणार कोण नव-याचं? फिरायला चल म्हंटलं तर येत नाही. जाऊ दे, चालायचंच. बरं तू कधी येतो आहेस?”, आबांचा प्रश्न.

“आबा, अहो आत्ताच सहा महिन्यांपूर्वी नाही का येऊन गेलो? विसरलात? आता लगेच सुट्टी नाही मिळायची”, संजयचं उत्तर.

“बरं, बरं. बघा जमलं तर यायला. कनिष्कलाही दोन वर्षं झाली येऊन. मालती फार आठवण काढते त्याची… “, आबांचा स्वर जडावला होता. “बरं, संजया, बेल वाजते आहे. तू मालती आली की फोन कर रात्री. ठेवतो आत्ता फोन”,

आबांनी घाईघाईत निरोप घेतला आणि दार उघडायला उठले. की-होल मधून त्यांनी पाहिले, मधुकररावांचा नातू अक्षय दार वाजवत होता. मधुकरराव हे पूर्वीच्या भाडेकरूंपैकीच, आता कुटुंबासह वरच्या मजल्यावर रहायला गेले होते. त्यांचा मुलगा, अक्षयचे वडील इन्शुरन्स कंपनीत होते. आबांनी दार उघडलं… “बोला अक्षयकुमार! आज आमची आठवण कशी काय आली?”, आबांनी हसत हसत विचारलं.

“काही नाही, मालती आजींच्या काही एफ. डी. मॅच्युअर होताहेत, तर बाबांनी त्याची आणि इन्शुरन्सच्या कामाची कागदपत्रं.. “, त्याचं वाक्य अर्धवट ऐकतच आबा वळून आत गेले. त्याला घरात जाणं भाग होतं आता. जराश्या नाखुषीनंच तो आत शिरला.

“अरे ये ये. जरा बसून बोल. दारात उभं राहून बोलणं आवडत नाही मला”, आबांनी त्याला जरा बळंच बसायला लावलं होतं. तो परत काही बोलणार इतक्यात आबाच म्हणाले, “बरं अक्षयकुमार तू चहा घेणार का ? मालतीआजी आता येईलच थोड्या वेळात. आमच्यासाठी करणारच आहे, तू घेणार असशील तर तुझ्यासाठी पण टाकतो. थांबच ! माझ्या हातचा चहा पिऊनच जा कसा?”, अक्षयला जराही बोलण्याची संधी न देता आबा चहा करायला उठले.

अक्षयचा नाईलाज झाला. काही न बोलता तो टेबलाजवळ खुर्ची ओढून बसला. अक्षय इंजिनिअरींगच्या तिस-या वर्षाला होता. गेले काही दिवस तो जरा अस्वस्थ होता. त्याचा आणि मयुरीचा तीन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला होता. अक्षय फार दुखावला होता त्यामुळे. या सेमिस्टरची परिक्षा पण त्याने दिली नव्हती. राहून राहून त्याला मयुरीची आठवण यायची की मग तो असा घुम्यासारखा वागायचा.

“अक्षयकुमार, अहो कसल्या विचारात गढला आहात? होईल सर्व ठीक. प्रेमभंगाचा विचार जितका जास्त कराल तितकं दुःख जास्ती होतं”, आबा बोलून गेले.

‘आयला, म्हातारा बेरकी आहे. एरवी या म्हाता-याला काल काय घडलं आठवत नाही.. माझं प्रेमप्रकरण बरं लक्षात राहिलं’.. अक्षय या विचाराने सटपटला. “नाही आबा, तसं काही नाही. मी ठीक आहे”, अक्षयने मनातले विचार लपवत म्हंटले.

आबा धूर्तपणे हसले. “कसं आहे ना अक्षय की काही काही गोष्टी माझ्या नेमक्या स्मरणात राहतात. आणि मी तिला पाहिलंय तुझ्याबरोबर अनेक वेळा. अरे आमचा पेन्शनर कट्टयाचा मार्ग तुमच्या त्या अड्डयावरूनच तर पुढे जातो. प्रेमात पडलेले सगळेजण मांजरासारखे असतात बघ. डोळे मिटून दूध पिणारे. त्यांना वाटतं त्यांना कुणी बघतच नाही”, आबा बोलत होते. अक्षयला तिथून कधी एकदा सुटतोय असं झालं होतं. “आणि बरं का अक्षयराव, प्रेमात असं हरायचं नसतं. एकदा फेल झालं तर परत परत प्रयत्न करायचा. आणि त्यातून प्रेभभंग झालाच तरी त्यापायी आपलं आयुष्य वाया नसतं घालवायचं”, आबा समजावणीच्या सुरात म्हणाले.

खूप दिवसांनी अक्षयशी बोलताना कुणीतरी थेट विषयाला हात घातला होता. त्याला न ओरडता, आकांडतांडव न करता कुणीतरी मित्रासारखं त्याच्याशी बोलत होतं. आबांनी त्याच्या समोर चहाचा कप ठेवला. “अरे कधी कधी काही वाईट गोष्टी घडतात ना आपल्या आयुष्यात त्या तेव्हा जरी क्लेशकारक वाटल्या तरी पुढे जाऊन अनेकवेळा फायदेशीर ठरल्याचा अनुभव येतो. तुझा बाप एवढा इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटमधला, तुझ्याशी काही बोलत नाही वाटतं?”, आबांनी जरा खोचकपणे विचारलं.

अक्षय गडबडला या प्रश्नाने. “म्हणजे? मला समजलं नाही आबा”, अक्षय.

“अरे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट नेहमी अशा माणसांत आणि नात्यांत करावी जी पुढे जाऊन तुमचा इन्शुरन्स बनतील. अशी माणसं आणि नाती काय उपयोगाची की जी मॅच्युरिटीच्या आधीच भांडवल काढून घेतील? मान्य की माणसांची पारख एकदम नाही करता येत. पण म्हणून सहा महिन्यांचं प्रेम सर्वस्व मानून त्यापायी आपल्या आयुष्याची, जवळच्या लोकांची आणि मुख्य म्हणजे करिअरची फरफट करायची नसते. आयुष्य हे या चहासारखं आहे बघ ! अति गोड कराल तरी बेचव, अगोड तरी बेचवच ! चहावरून आठवलं, रिटायर झाल्यादिवशीच मी सांगितलं मालतीला की आता सकाळ, संध्याकाळचा चहा मी करणार. गेली जवळपास चोवीस वर्षं हा नेम मोडला नाहीये, आहेस कुठे? आता मालती येत असेल. आली की लगेच गरमागरम चाय समोर हजर! बरं ते तू कागदपत्रांचं काय बाबा म्हणत होतास? गप्पा झाल्या, चहा झाला तरी मुख्य काम विसरायला नको”, आबा हसत हसत म्हणाले.

चहाचा कप ठेवत अक्षय उठला. “आबा, खूप दिवसांनी कुणीतरी छान बोललंय माझ्याशी. थँक यू! मी लक्षात ठेवीन तुमचा सल्ला… इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स… माणसं… नाती… आणि हो कागदपत्रांचं बाबा संजय दादाशी बोलतील नंतर. आता येतो”, म्हणून अक्षय उठला आणि दाराबाहेर पडला.

…. मालती आजी सहा महिन्यांपूर्वीच वारली, ती कधीच परत येणार नाही हे फिरून आबांना सांगावं वाटलं त्याला. ज्या आभासी, कल्पित जगाच्या भिंती त्यांनी उभ्या केल्या होत्या, त्या पाडून त्यातून त्यांना बाहेर काढावं असं देखील वाटून गेलं क्षणभर… पण पुढच्याच क्षणी विचार आला की सहा-आठ महिन्यांच्या अफेअरचं ब्रेकअप झालं तर एवढा त्रास होतोय आपल्याला… साठ वर्षांचं सहजीवन जिथे अचानक संपलं तो धक्का पचवायला वेळ लागेलच ना… आपल्या पाठीमागे दरवाजा ओढून अक्षय निघून गेला, एक नवी उमेद घेऊन!

की-होल मधून अक्षयला गेलेलं पाहून आबा मागे वळले…

बेडरूममध्ये जाऊन उशीखालचा मालती आजींचा फोटो समोर ठेवला आणि स्वतःशीच बोलू लागले, “मालती… आपली इन्व्हेस्टमेंट चुकली का गं पोरांमधली ? पैशाचा इन्शुरन्स नको आहे या वयात… माणसांचा हवाय… आपल्याशी बोलणारी माणसं, आपली विचारपूस करणारी माणसं, प्रत्यक्षात भेटून काय हवं नको विचारणारी माणसं… लोकांना वाटतं म्हातारा वेडा झालायं… बायकोच्या जाण्याचा धक्का सहन न होऊन ती आहे असं मानून जगतोय… जाता येता एकटाच बडबड करतोय… पण तसं करतो म्हणून तरी चार लोक चौकशी करतात. बाप विसरभोळा झालायं… न जाणो, उद्या पोरं आहेत हेच विसरला तर इस्टेटीमध्ये वाटा मिळणार नाही या भावनेतून का होईना रोज फोन करून चौकशी करतात. असो, त्यांना काय कळणार म्हणा या वयात एकटं पडण्याचं दुःख? चल, मी चहा ओततो… आज गॅलरीत झोपाळ्यावर बसून सूर्यास्त पाहत चहा पिऊ…

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नौटंकी… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ नौटंकी… ☆ श्री मंगेश मधुकर

रविवारी घराघरात असते तशीच निवांत सकाळ, सर्व काही अस्ते कदम चाललेलं असताना मोबाईल वाजला. अनोळखी नंबर असल्यानं दुर्लक्ष केलं. काही वेळानं पुन्हा त्याच नंबरवरुन फोन आला तेव्हा घेतला हॅलो, संडे डिश का?”

“हो, बोला सर”

“दर रविवारी वाचतो”

“अरे वा !!, धन्यवाद”

“धन्यवाद कशाला?घरबसल्या मिळतं म्हणून वाचतो. ”अनपेक्षित प्रतिक्रियेनं मला ठसका लागला.

“मी लिहिलयं म्हणून आभार मानले. ”

“आजकाल लिहिणारे सतराशे साठ आहेत. लिहिण्याचं कौतुक सांगू नका. ” काकांचा अजून एक तडाखा.

“नाही सांगत. ”

“आणि चार ओळी खरडल्या म्हणून स्वतःला लेखक समजू नका. ”

“अजिबात नाही”.

“सध्या लिहिणारे जास्त अन वाचणारे कमी झालेत. ” 

“शंभर टक्के बरोबर. “

“उगीच हवेत उडू नका”.

“मी होतो तसाच आहे तरीही.. ” 

“त्याच्याशी मला काही देणंघेणं नाही. तुमचं संडे डिश हे लिखाण मला ‘नौटंकी’ वाटते ” काकांनी मूळ मुद्द्याला हात घातला.

“डायरेक्ट नौटंकी.. ” आलेला संताप आवरत शक्य तितक्या मृदु आवाजात म्हणालो.

“स्पष्ट बोलण्याचा राग आला का?”

“वाचक देवो भव:”

“फुकट शब्दांची कारंजी उडवू नका. ”

“बरं !!. तुम्ही बोला, मी ऐकतो. ”

“खरंच तुम्ही लेखक आहात की डमी.. ”.. काकांच्या या बोलण्यानं चिडचिड वाढली.

“थोड्या वेळापूर्वी म्हणालात की स्वतःला लेखक समजू नका म्हणून आणि आता तुम्हीच.. ”

“शब्दांचे खेळ करून चुका काढू नका. ”

“राहिलं. उत्सुकता म्हणून विचारतो ‘संडे डिश’ वर एवढा राग?”

“कशाला रागावू. माझा काय संबंध !! कुणीही ‘वाच’ म्हणून बळजबरी, आग्रह केलेला नाही”

“तरीही वाचता” 

“हो”

“चला, म्हणजे चांगलं नसेल पण ‘बरं’ लिखाण माझ्या हातून नक्कीच होतंय. करेक्ट ना !!” काय उत्तर द्यावं हे लक्षात न आल्यानं काकांचा गोंधळ उडाला.

“त्यापेक्षा सरळ सांगा की माझ्या तोंडून कौतुक ऐकायचयं. त्याचीच सवय असेल ना”

“असं काही नाही”

“असंच आहे”

“दर रविवारी लेखनाचा रतीब का घालता”

“समाधान आणि आनंद मिळतो म्हणून.. ”

“माईकवरून द्यायला हे उत्तर ठिक आहे. काही पैसे वगैरे मिळतात की नाही”

“त्यादृष्टिनं कधी विचार केला नाही आणि अपेक्षाही नाही. ”

“एवढं लिहून दोन पैशे हाती येत नसेल तर काय उपयोग !! सगळं लिखाण कवडीमोल”

“पसंद अपनी अपनी आणि प्रत्येक गोष्टीला पैशाचं मोजमाप लावायचं नसतं. ” चढया आवाजात मी उत्तर दिलं.

“राग आला वाटतं” 

“का येऊ नये. इतका वेळ तोंडाला येईल ते बोलताय. ”

“ एक सल्ला देतो ”.. माझ्या चिडण्याचा काकांवर काहीही परिणाम झाला नाही.

“अजून आहेच का?मला वाटलं इतकं बोलल्यावर संपलं असेल. ”

“कसंय, तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत. त्याच अनुभवावर सांगतो. कौतुक सर्वांना आवडतं पण टीका नाही. आजकाल तर माणसं वागताना-बोलताना सुद्धा ‘नौटंकी’ करतात. ”

“संडे डिश मध्ये तुम्हांला काय नौटंकी वाटली”

“कथेतली बहुतेक पात्र इमोशनल असतात. भावनिक होऊन निर्णय घेतात. आजच्या जगात जिथं व्यवहार या एकाच गोष्टीला महत्व आहे तिथे असं लिखाण पटत नाही. ”

“अजून काय वाचता ? “

“व्हॉटसपवर येणारं सगळं !!. ”

“म्हणजे तुम्ही व्हाट्सअप विद्यापीठाचे स्कॉलर”

“टोमणा आवडला. एक आगाऊ सल्ला आता रविवारचा रतीब बंद करा. ” काकांचा बॉम्ब.

“आता स्पष्टच सांगतो. लिखाण चालू ठेवायचं की बंद करायचं हे वाचक ठरवतील आणि आता लिहू नका सांगणारे तुम्ही पहिलेच नाहीत. माझे काही हितचिंतकसुद्धा तेच म्हणतात. जेव्हा बहुसंख्य वाचक सांगतील तेव्हाच ठरवू. ” …. अजून बरंच बोलायचं होतं पण उगीचच तोंडातून वेडावाकडा शब्द जायला नको म्हणून फोन कट केला. डोकं भणभणत होतं. संताप अनावर झालेला. वाचकांचे फोन, मेसेजेस नेहमी येतात पण आज आलेला काकांचा फोन वेगळा, अस्वस्थ करणारा, विस्फोटक होता.

— 

संध्याकाळी पुन्हा त्याच नंबरवरून फोन. मुद्दाम घेतला नाही. चार पाच वेळा रिंग वाजली. दहा मिनिटांनी पुन्हा फोन आल्यावर तेव्हा नाईलाजानं घेतला. “अजून काही राहिलयं का?”

“सॉरी !! रागावू नका. सकाळी मुद्दाम तुम्हांला चिडवलं. खरं सांगायचं तर संडे डिश आवडीनं वाचतो. ”काकांचा एकदम वेगळा सुर.

“सकाळी तर वेगळंच बोलत होता”

“ते मुद्दामच. मुलांच्या कृपेने पंधरा दिवसापूर्वी वृद्धाश्रमी बदली झाली. आता इथंच कायमचा मुक्काम. आयुष्यभर शिकवण्याचं काम केल्यामुळे बोलायची फार आवड आणि इथ कोणीच बोलत नाही. नातेवाईकांना, घरच्यांना फोन केला तर थातुर-मातुर कारणं देऊन फोन कट करतात. नेमकं काल म्हातारपणावरची ‘रिकामेपण’ ही संडे डिश वाचली अन तुमच्याशी बोलावसं वाटलं म्हणून फोन केला आणि ठरवून तिरकस बोललो. त्यामुळेच तर चक्क चौदा मिनिटं आपल्यात बोलणं झालं. नाहीतर माझ्याशी कोणी मिनिटभरसुद्धा बोलत नाही. म्हणून मीच नौटंकी केली ” …. काकांचं बोलणं ऐकून धक्का बसला. खूप अपराध्यासारखं वाटायला लागलं.

“काका, सकाळी चुकीचं बोललो असेल तर माफ करा. ”

“तुमच्या जागी मी असतो तर तेच केलं असतं. जे झालं ते झालं. आजकाल संपर्क साधणं खूप सोप्पंयं पण माणसचं एकमेकांशी बोलणं टाळतात. ”

“पुन्हा एकदा सॉरी !!आपण फोनवर भेटत राहू. ”

“क्या बात है. जियो !! संडे डिश छान असतात. असच लिहीत रहा. हाच आशीर्वाद !!आणि ऐकून घेतलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद !! “ 

काकांनी फोन कट केला तरी बराच वेळ फोनकडे पाहत होतो. कधी कधी वस्तुस्थिती आपण समजतो त्यापेक्षा फार वेगळी असते.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आईपण…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “आईपण…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आई जाऊन आता ४ वर्षे होऊन गेली. पण आईची आठवण झाली नाही असा एकही दिवस जात नाही. कधी कधी भावूक होऊन आईच्या आठवणीने कासाविस झाले तर बाकीचे म्हणतात, ‘ काय लहान असल्यासारखे करतेस? तुला स्वीकारायला हवं ना? ‘ मग अशाने जास्तच व्यथित व्हायला होते.

अशी अवस्था कितीतरी जणांची होत असेल. पण मग विचार करताना आईभोवती मन पिंगा घालू लागले. आईविषयीचे कितीतरी विचार डोक्यात येऊन गेले.

…. प्रत्येक ठिकाणी देवाला जाता येणे शक्य नसल्याने देवाने आई निर्माण केली.

… स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

… आईची किंमत जो करत नाही त्याला जगाशी लढण्याची हिंमत होत नाही.

… तसेच आईचा महिमा सांगणार्‍या कितीतरी कविता आठवल्या … गदिमा, म भा चव्हाण, यशवंत अशा कितीतरी कवींसोबत अलिकडेच कवी अनिल दिक्षीत, उद्धव कानडे आदि कविंच्या भावपूर्ण कविता मन हेलावून टाकतात.

मग वाटले खरच जगात कुठेही गेले तरी आईला किती महत्व आहे ना? मुलांना जन्म देण्याचे सामर्थ्य एका आईतच असते. तसेच त्यांना वाढवणे संस्कार करणे हे काम जबाबदारी न वाटता फूल उमलते तसं, सकाळी दव पडते तसं, सहज नकळत करण्याचे कसब हे एका आईठायीच असते.

वात्सल्य, प्रेम, ममता तिच्या अंगी ठासून भरलेली असते. आणि मग आई ही कोणी व्यक्ती नसून वृत्ती आहे असे वाचल्याचे आठवले. ती एक वृत्ती म्हणजे भावना असल्याने ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राची तर विठ्ठल हे जगत माऊली झाले. अनेक पुरुष संत हे गुरूमाऊली बनले.

…. म्हणजेच आईपण ही वृत्ती खूप अवघड असूनही ती वृत्ती जो धारण करू शकतो तो आई होऊ शकतो.

सगळ्यांच्या आवडी निवडी सांभाळणे, सगळ्यांवर सारखे प्रेम करणे, चुका पोटात घेणे, शी-शू मनात कोणतीही घृणा न ठेवता आनंदाने काढणे, मुलांना हृदयाशी धरणे, चांगल्या-वाईट गोष्टिंचे ज्ञान देऊन चांगल्या गोष्टी मनावर बिंबवणे, सतत काहीतरी मुलांसाठी करत रहाणे, स्वत्व विसरून फक्त देत रहाणे, जिच्या सान्निध्यात आल्यावर सुरक्षित वाटते, लढण्याचे बळ येते असा भक्कम आधार होणे, अशी लाखो कारणे देता येतील जी वरवर अगदी सामान्य वाटतील पण करायला गेले तर किती अवघड आहे हे समजते.

मग ज्या लेकरांची आई लवकर देवाघरी गेली त्या लेकरांना आई बापाचे प्रेम एकट्या पुरुषाने दिले अशी कितीतरी उदाहरणेही पहातो.. म्हणजेच तो पुरूष त्याच्या अंगी असलेले आईपण जागृत करून मुले घडवतो. किंवा मुलांसाठी दुसरी आई आणतो. पण अशावेळी ती आई सावत्र बनते. का? तिच्या अंगी आईपण नसते का? असते तिच्या अंगीही आईपण असतेच पण मनात कुठेतरी दुजाभाव असतो म्हणून स्वत: जन्माला घातलेल्या मुलांवर ती मुद्दाम अधिक प्रेम आदर देते. मग अशावेळी ती नवर्‍याच्या मुलाची आई होऊच शकत नाही कारण आईपण असणार्‍या व्याख्येला ती कुठेतरी छेद देत असते.

.. फार कशाला कैकयीने सावत्र पणा जागृत ठेऊन रामाला वनवासात पाठवले हे उदाहरण सगळ्यांना माहित आहेच.

.. तसेच कृष्णाचा सांभाळ करणारी यशोदा, कर्णाला वाढवणारी राधा या खर्‍या अर्थाने आई झाल्या अशी उदाहरणे पण सर्वश्रृत आहेतच की !!

मग आई, आईपण याचे मोठेपण शब्दातीत असल्याची जाणिव होते. प्रत्येक घरात एक आई असते. तुमची आमची सेम असते पण आमच्या आईसारखी दुसरी कोणीच नाही असे सारखे वाटत रहाते.

तरी देखील दुसर्‍यांच्या आईत आपली आई म्हणजे त्या आईतील आईपण जाणून तिच्या चरणीही नतमस्तक होते.

ज्ञानेश्वर विठ्ठल इतर गुरू माऊली यांच्यातील आईपणा पाहून ‘ प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ‘ या उक्तीप्रमाणे त्यांनी किती प्रयत्नामधून हे आईपण आपल्या ठायी आणले असेल ते वाटून त्यांचा हेवा वाटतो.

स्वत: आई होऊनही काही गुण स्वभावत:च अंगी आले तरी आपल्या आईसारखे नाहीच जमत असे वाटून तिचे श्रेष्ठत्व मनातच जाणून तिच्यासारखे होण्याचा मन प्रयत्न करते.

…… असे मातृत्व अर्थात ‘ आईपण ‘ जर सगळ्यांच्या हृदयी आले तर ?

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्थितप्रज्ञ’ अवस्था – लेखक : श्री गिरीश ओक ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

‘स्थितप्रज्ञ’ अवस्था – लेखक : श्री गिरीश ओक ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

संध्याकाळी घरी देवासमोर दिवा लावणे हे आईचे संस्कार, लावलेले वळण, म्हणून आईला घरी जाऊन आवरून येतो असे सांगून, नर्सताईंना किती वेळाने परतेन ही कल्पना देऊन रस्त्याने भराभर चालत हॉस्पिटलमधून घरी पोहचलो. हातपाय धुवून देवा समोर दिवा लावला व तास दीड तासात घरातील आवरले. स्वतःशीच म्हणालो आता जरा निवांत बसू व मग पुन्हा हॉस्पिटलला आईकडे जाऊ. जेमतेम १५ मिनिटे झाली असतील तर दाराची बेल वाजली, समोर पाहतो तर साहेबराव.

आत ये म्हणून त्यास खुणावले तसे तो म्हणाला ” सिक्युरिटीने सांगितले तुम्ही घरी आला असे, म्हणून आईंची तब्येत कशी आहे ते जाणून घ्यायला इकडेच वळलो. ” मी त्याला खाली बसण्यास खुणावले. त्यास म्हणालो “आईची तब्येत स्थिर आहे. श्री गुरुमाऊली, डॉक्टर व देवमाणसे आहेत सोबतीला मग त्यांच्यावर विश्वास ठेवायचा व आपले प्रयत्न सुरु ठेवायचे, नसती चिंता करून काय साधणार”.

साहेबरावाने माझे उत्तर ऐकून सरळ मुद्दयाला हात घातला, “दादा तुमचं बोलणं कधी कधी उलगडतच नाही. अहो आईंची तब्येत सिरीयस आहे माहित आहे मला, पण मला समाधी अवस्थेबद्दल सांगताना तुम्ही सांगितलेले, तसे काहीसे बोलताना शांत वाटता व आम्ही कोड्यात पडतो”.

मी म्हणालो “साहेबा, अरे मी इतका मोठा निश्चित नाही, बस श्री गुरुसेवक आहे हेच काय ते पुरेसे आहे. अरे बाबा ती पातळी गाठणे फार कर्मकठीण, दुर्लभ अवस्था आहे. पराकोटीच्या श्री गुरुदेवसेवेनंतर श्री गुरुराव कृपेनेच लाभते त्याला ‘स्थितप्रज्ञ’ अवस्था म्हणतात”.

साहेबराव तो काय मला सोडणार नव्हता, “दादा मी सोडतो तुम्हाला हॉस्पिटलला, पण वेळ असेल जवळ तर सांगता का जरा काही स्थितप्रज्ञ अवस्थेबाबत”. मला देखील साहेबरावाच्या विचारण्याचे कौतुक वाटले, परमार्थाच्या वाटेवर, अर्थ जाणून घेण्यास आपण जर उत्साह, आतुरता दाखवली नाही तर आपल पाऊल पुढे पडत नाही.

तासभर अवधी हातात होता त्यामुळे म्हणालो…..

“जेवढे मला आजवर उलगडले ते सांगतो, पहा तूला किती समजते, कारण हा विषय अतिशय खोल आहे. साहेबा अरे समजा एखादया जागी जिथे वारा वाहात नाही अशा ठिकाणी तेवत असलेली समईची ज्योत जशी निश्चल असते, तसेच श्री गुरुदेव मार्गदर्शनानुसार प्रामाणिक साधना करणाऱ्या व्यक्तीचे मन हे स्थितप्रज्ञ म्हणजे निश्चल, स्थिर, ताब्यात, नियंत्रणात असते. अशा गुरुसेवकाचे मन चंचल नसते, त्याची मनःस्थिति डळमळीत, अस्थिर, दोलायमान नसते. आयुष्यात अडचणीच्या, संकटाच्या, अटीतटीच्या, संघर्षप्रसंगी माणसाचे मन जर स्थितप्रज्ञ म्हणजे निश्चल असेल तर तो कोणत्याही बिकट प्रसंगावर श्री गुरुकृपेने मात करू शकतो. ”

“ साहेबा आपण सामान्य माणसे असल्या प्रसंगी फार गोंधळतो, काय करावे ते सुचत नाही, बावरतो, मायेच्या मोहात वेढले जातो. अगदी पुरते भावविवश होतो. परिणामी स्वधर्म, म्हणजे प्रसंगानुरूप कसे वागायला हवे ह्याचा आपणास विसर पडतो. ज्ञान, बुद्धीचे दरवाजे स्वतःच बंद करून, स्वतःस कोंडून घेतो व बुद्धिभ्रंश झाल्याप्रमाणे वागू, बोलू लागतो. ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की तो माणूस आत्मघात, आत्मविनाशाकडे कधी कसा वळला हे त्याचे त्यालाच कळत नाही. ”

“ वास्तविक पाहता प्राणीमात्रात माणूस हा अत्यंत बुद्धिमान प्राणी पण बहुतेक वेळा स्थितप्रज्ञता.. म्हणजे निश्चलतेच्या अभावामुळे जनावरापेक्षा अधिक बहिर्मुख होतो. अति सुखात श्री गुरुरायांनी दर्शविलेला मार्ग विसरतो. यशाच्या धुंदीत बेधुंद होतो, हुरळून जातो. मग कधी कधी आनंदाच्या उकळ्या, तर कधी कधी तो चिडतो, अकारण संतापतो. सत्य मात्र इतकेच की कधी अति आनंदाने तर कधी घोर निराशेने त्याचे मन, त्याची बुद्धी, वादळात सापडलेल्या होडीसारखी हेलकावे खात असते. ह्या सगळ्याचा सर्वात वाईट परिणाम काय तर जणू रात्रीच्या अंधाराने सूर्यप्रकाशास गिळंकृत करावे तसे चंचल माणसाचा बुद्धिभ्रंश अंतरातील ईश्वरास झाकोळून टाकतो. त्या माणसास श्री गुरुदेव दत्त ह्यांचे तसेच त्यांच्या वचनांचे, शिकवणीचे विस्मरण होते. “

“साहेबराव अरे स्थितप्रज्ञ किंवा निश्चल माणसाचे वागणे अगदी ह्याच्या विरुद्ध असते. तो श्री गुरुवचन अनुसरणारा असतो, पूर्णतः अंतर्मुख होऊन विचार करणारा, वागणारा, बोलणारा असतो. प्रारब्धाने, श्री गुरुकृपेने लाभलेल्या भौतिक सुखाने तो हुरळून जात नाही आणि अडचणीत, दुःखात हतबलही होत नाही. सदैव आत्मानंदाच्या नदीत डुंबत असतो, स्वस्थचित्त, शांत, ज्ञानाने परिपूर्ण असतो. त्यास सुख किंवा दुःख ह्या भावना स्पर्शत नाहीत. ”

“स्थितप्रज्ञ किंवा निश्चल मनाच्या व्यक्तीचे मोठे लक्षण म्हणजे तो अहंकारी नसतो. त्याने अहंकार, अहंभाव, घमेंड श्री गुरुचरणी गुरुसेवामार्गे नियंत्रणात राखलेली असते, हेच कारण म्हणून स्थितप्रज्ञ माणसास सर्व जीवाबद्दल आत्मीयता असते, प्रेम असते, जिव्हाळा असतो. तो सदैव श्री गुरुसेवेची संधी मानून दुसऱ्यांना साह्य करण्यासाठी तयार असतो. तो कोणाचे भले करू शकला नाही, तरी त्याच्या मनात कोणाबद्दलही कधीच वाईट येत नाही, अथवा तो कोणाचे वाईट करू अथवा चिंतू शकत नाही. ‘हे विश्वची माझे घर’ ह्या भावनेने प्रेरित होऊन तो सूर्यप्रकाशासारखा उजळून निघालेला असतो. ह्याचे मूळ कारण श्री गुरुकृपेने लाभलेले ज्ञान, सदाचारी वर्तणूक, सद्वर्तन व संयम ह्या अंगी विकसित केलेल्या सद्गुणांमुळे त्याच्या मनावर त्याने ताबा, नियंत्रण मिळवलेले असते. ”

“साहेबा अशी व्यक्ती म्हणजे देवमाणूसच. ज्यांचे अंतरी श्री गुरुदेव अनुभवावे. अखंड श्री गुरुसेवेत रमणारी व सर्वाना शक्य ती मदत सदैव करणारी. अरे ह्या देवमाणसांना माझ्या मते स्वतः श्री गुरुमाऊलीच घडवतात, जागोजागी भक्त रक्षणार्थ योजतात. आज आईचे उपचार शक्य झाले ते ह्यांचे कृपेनेच. अरे श्री गुरुमाऊली स्वस्वरूपात येऊन नाही तर ह्या देवमाणसांच्या हस्ते आपणास साह्य करीत असतात. अशी व्यक्ती आयुष्यात भेटलीच तर त्या क्षणीच विनम्र नमस्कारावे.

अशा व्यक्तीला कशाचाही व कोणाबद्दल राग, लोभ, मत्सर आणि द्वेष नसतो, अशी व्यक्ती सदैव प्रसन्न चित्त असते. एका भांड्यातील पाणी दुसऱ्या भांड्यातील पाण्यात ओत, पाणी पाण्यास काय बुडवणार, ते फक्त मिसळते, पूर्वावस्था कायम असते.. तसेच शरीरधर्मानुसार जरी स्थितप्रज्ञ व्यक्तीचा चेहरा उदास, मलूल किंवा शारीरिक मरगळ आपणास जाणवली तरी ह्यांच्या अंतरंगाची प्रफुल्लित अवस्था, मानसिक प्रसन्नता अखंड कायम स्वरूपी असते. ”

“साहेबा एकदा का आपली बुद्धी अंतरंगातील भगवंताचे ठायी केंद्रित झाली की चित्त, अंतःकरण, मन केव्हाही किंचित देखील सैरभैर, अस्थिर, विचलीत होत नाही. खरच ज्यास असे व्हावे असे वाटते त्यासाठी साधा सरळ सोपा मार्ग म्हणजे म्हणजे नित्य श्री गुरुस्मरण, माझे श्री गुरुदेव दत्त निरंतर माझ्यासोबत आहेत, असा भाव मनात दृढ खोलवर रुजवणे. अरे साहेबा हे तितके सोपे पण नाही आणि मनात दृढ निश्चय केल्यास कठीण देखील नाही. मात्र दृढ श्रद्धा, एकाग्रता, निष्ठा, मनाचा निग्रह आवश्यक आहे. अंतरातील श्री गुरुमूर्तीचा अनुभव, आपण ओठी श्री गुरुस्मरण करीत घ्यायचा आहे. तेव्हा कुठे तुझा अंतरात्मा आणि भगवंत श्री गुरुदेव दत्त भिन्न, वेगळे नाहीत अशी श्री गुरुनाम व श्री गुरुरूपाच्या समरसतेची अंतरंगास अनुभूती येते. ”

“स्थितप्रज्ञ माणसाचे मन हे समुद्रासारखे अक्षुब्ध, क्षोभरहित, दु:खरहित असते. अशी माणसे समाजात कितीही, कशीही, कुठेही वावरली, मिसळली तरी त्यांची मानसिक स्थिती स्थिर, त्यांची प्रज्ञा म्हणजे बुद्धी स्थिर असते. कितीही नद्यांचे पाणी येऊन समुद्रात मिसळले तरी समुद्र पातळी स्थिर असते, नद्यांच्या प्रवाहाच्या मिसळण्याने समुद्रास महापूर आला असे ऐकलेले आठवते का कधी तुला साहेबा ? उन्हाळ्यात जरी सर्व नद्या आटल्या आणि त्यांचे पाणी समुद्रात मिसळले नाही तरी समुद्र पातळी कायम असते, तो कधी आटत नाही. ”

“ज्याचे उभे आयुष्य श्री गुरुदेव दत्त ह्यांचे कृपेने, शिकवणीने उजळून निघाले आहे, तो सूर्यप्रकाशासमक्ष पणती कशी लावेल आणि पणती लावली नाही म्हणून अंधारात सूर्यप्रकाशास कोंडणे जितके अशक्य तितकेच स्थितप्रज्ञ व्यक्तीची मानसिकता विचलीत होणे केवळ असंभव आहे. स्थितप्रज्ञ व्यक्तीच्या समोर सर्व प्रलोभने पुसट ठरतात कारण श्री गुरुदेव दत्त कृपेने लाभलेल्या आत्मज्ञानाने ही व्यक्ती इतकी ऐश्वर्य संपन्न झालेली असते की ह्यांना जगातील कोणतेही इतर ऐश्वर्य कवडीमोल वाटते. सत्यच आहे ज्याचे जवळ श्री गुरुदेव दत्त माउली त्यास कशाची कमतरता जाणवणार. ”

“स्थितप्रज्ञ व्यक्ती आत्मसंधान साधण्यात मग्न असते. अंतरिक परमोच्च सुखाच्या आनंदाने तृप्त असते. श्री गुरुदेव दत्त कृपेने लाभलेल्या अंतर्ज्ञानाने संतुष्ट असते. ज्याचे मनी साक्षात श्री गुरुदेव दत्त अखंड त्याचे सोबत आहेत असा भाव पूर्णतः विकसित झाला आहे अशी स्थितप्रज्ञ व्यक्ती श्री गुरुमाऊली कृपेने परमानंदाने पुष्ट असते, मात्र स्थितप्रज्ञ व्यक्ती कधीच आत्मकेंद्री, स्वार्थी नसते तर त्यांच्या मनात ….

 ॐ सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे सन्तु निरामयाः ।

सर्वे भद्राणि पश्यन्तु

मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥ 

…. हीच सर्वांबाबत सद्भावना.. साह्य करण्याची भावना आरूढ झालेली असते. “

“काय साहेबराव, ह्याला म्हणतात स्थितप्रज्ञ अवस्था व अशी असते स्थितप्रज्ञ किंवा निश्चल, स्थिर, न डगमगणारी मानसिकता असलेली व्यक्ती. काय उलगडला का काही अर्थ ? चला आता बाईक काढा आणि सोड मला हॉस्पिटलला आईकडे, चल निघूया “.

साहेबरावाच्या चेहरा समाधानी वाटत होता, बऱ्यापैकी अर्थ लागला होता बहुतेक त्याला, जाणवत होते आणि आम्ही हॉस्पिटलच्या दिशेने निघालो.

*******

लेखक : श्री गिरीश ओक

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जातीचं काय घेऊन बसलात राव ? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

 ☆ जातीचं काय घेऊन बसलात राव ? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर ☆

अरे जात म्हणजे काय.. ? 

माहित तरी आहे का.. ?

 

अरे कपडे शिवणारा शिंपी.. !

तेल काढणारा तेली.. !

केस कापणारा न्हावी.. !

लाकुड़ तोडणारा सुतार.. !

दूध टाकणारा गवळी.. !

गावोगावी भटकणारा बंजारा.. ! 

भांडी बनविणारा कासार, दागिने बनविणारा सोनार, मूर्ती मातीची भांडी बनविणारा कुंभार,

रानात मेंढी-बकरी वळणारा धनगर.. !

पुजा-अर्चा, पौरोहित्य करणारा ब्राह्मण.. !

बूट चप्पल शिवणारा चांभार.. ! 

बागायती शेती करणारा 

वृक्ष लावणारा माळी. !

आणि लढाई लढणारा क्षत्रिय.. !

 

आलं का काही डोस्क्यात.. ?

आरं काम म्हणजे जात.

आणि सर्वात महत्त्वाचे वरील प्रमाणे कामे आता कुठल्याही जातीचीच व जातीसाठी राहिली नाहीत.

आता शिक्षणाने व्यवसाय प्रत्येकाचे बदलले आहेत.

आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला.

आता इंजीनीयर ही नवी जात.

कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात.

“सी. ए” ही पण जात.

तर 

“एम. बी. ए” ही नवी जात.

डॉक्टर ही पण जात.

तर वकीलही जातच.

तर “शिक्षण” व “माणुसकी” हाच खरा धर्म.

 

बदला की राव कवाचं तेच धरुन बसलात.. !

घरीच दाढी करता नवं.. ? 

तेव्हा तुम्ही न्हावी होता.

बुटाला पालीश करता नव्हं.. ?

तेव्हा तुम्ही चांभार होता.

गैलरी टेरेस वर झाडे लावता ना.. !बगीचा करता तेव्हा तुम्ही माळी होता.

घरच्या घरीच पुजा-अर्चा करता नव्ह.. !तेव्हा ब्राम्हण होता.

आरं कामानं मोठं व्हा जातीनं न्हाय.. !

आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला,

हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय.. ?

मंग कशाला उगीचच बोंभाटा करता राव.. ?

तुम्ही शहरात/खेडेगावात राहत असाल तुम्ही आजारी पडल्यावर/अडीअडचणीला मदतीला सगळ्यात आधी धावून येतो तो तुमचा शेजारी/मित्र आणि तो तुमच्या वरीलप्रमाणे जुन्या जातीचा नसतोच हे मान्य कराल की नाही.. ?

 

सगळ्याला आता आधुनिक पद्धतीने काम हाय.. !

सगळ्याला शिक्षण खुले हाय.. !

खूप शिकायचं कामं करायचे.. ! 

माता पित्याचे-गावाचे-जिल्हय़ाचे-राज्याचे-देशाचे नाव लौकिक करायचे… !!

 

“जात फक्त राजकारणी लोकांनी स्वार्थासाठी जिवंत ठेवली आहे”

 ☆

लेखक : अज्ञात 

संग्राहक : संजय जोगळेकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ संध्याकाळ… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? संध्याकाळ… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

पैलतीर दिसे

संध्या समयी

ऐकू येते बघ

मंजूळ सनई…

*

थकला भास्कर

जाई अस्तास विसावया

आपुले बिंब पाहूनी

लागला हसावया…

*

सुख दु:खाच्या

लाटांवरी जणू

सैरभैर मन

पैलतीराची ओढ जणू…

*

निरव शांतता

चलचित्र आठवांचा

साद घाली पैलतीर

शाश्वत आनंदाचा…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #262 – कविता – ☆ भ्रम में हैं हम, रचते हैं कविताओं को… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

 

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी द्वारा गीत-नवगीत, बाल कविता, दोहे, हाइकु, लघुकथा आदि विधाओं में सतत लेखन। प्रकाशित कृतियाँ – एक लोकभाषा निमाड़ी काव्य संग्रह 3 हिंदी गीत संग्रह, 2 बाल कविता संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 कारगिल शहीद राजेन्द्र यादव पर खंडकाव्य, तथा 1 दोहा संग्रह सहित 9 साहित्यिक पुस्तकें प्रकाशित। प्रकाशनार्थ पांडुलिपि – गीत व हाइकु संग्रह। विभिन्न साझा संग्रहों सहित पत्र पत्रिकाओं में रचना तथा आकाशवाणी / दूरदर्शन भोपाल से हिंदी एवं लोकभाषा निमाड़ी में प्रकाशन-प्रसारण, संवेदना (पथिकृत मानव सेवा संघ की पत्रिका का संपादन), साहित्य संपादक- रंग संस्कृति त्रैमासिक, भोपाल, 3 वर्ष पूर्व तक साहित्य संपादक- रुचिर संस्कार मासिक, जबलपुर, विशेष—  सन 2017 से महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9th की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में एक लघुकथा ” रात का चौकीदार” सम्मिलित। सम्मान : विद्या वाचस्पति सम्मान, कादम्बिनी सम्मान, कादम्बरी सम्मान, निमाड़ी लोक साहित्य सम्मान एवं लघुकथा यश अर्चन, दोहा रत्न अलंकरण, प्रज्ञा रत्न सम्मान, पद्य कृति पवैया सम्मान, साहित्य भूषण सहित अर्ध शताधिक सम्मान। संप्रति : भारत हैवी इलेक्ट्रिकल्स प्रतिष्ठान भोपाल के नगर प्रशासन विभाग से जनवरी 2010 में सेवा निवृत्ति। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता भ्रम में हैं हम, रचते हैं कविताओं को…” ।)

☆ तन्मय साहित्य  #262 ☆

☆ भ्रम में हैं हम, रचते हैं कविताओं को… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

भ्रम में हैं हम, रचते हैं कविताओं को

सच तो यह है, रचती रही हमें कविताएँ।

*

सदा प्रयोजन रख समक्ष संयोजन किया अक्षरों का

भाव जगत से शब्द लिए, फिर बुनते रहे बुनकरों सा

देखा-सीखा-लिखा लगी जुड़ने

 फिर सँग में कईं विधाएँ

सच तो यह है, रचती रही हमें कविताएँ।

*

जीना सिखा दिया सँग में, जिज्ञासा के वरदान मिले

प्रश्न खड़े करती कविता, उत्तर भी तो इससे ही मिले

सुख-दुख हर्षोल्लास विषाद,

विषमता,जन-मन की विपदाएँ

सच तो यह है, रचती रही हमें कविताएँ।

*

एक नई पहचान इसी से मिली अमूल्य सुनहरी सी

मिली सोच को नई उड़ानें सम्बल बन कर प्रहरी सी

विविध भाव धाराएँ बन कर

 बहती रहती दाएँ-बाएँ

सच तो यह है, रचती रही हमें कविताएँ।

*

खड़े धरातल पर यथार्थ से, परिचय होने रोज लगा

नित्य-अनित्य झूठ-सच, कौन पराया अपना कौन सगा

समताबोध मिला अनुभव से

कैसे सुखमय जीवन पाएँ

सच तो यह है, रचती रही हमें कविताएँ।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 86 ☆ नहीं आए तुम… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “नहीं आए तुम…” ।

✍ जय प्रकाश के नवगीत # 86 ☆ नहीं आए तुम… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

तुम्हारी राह में

आँखें हुईं पत्थर

फिर भी नहीं आए तुम ।

 

तुम्हे मन में

नयन में

बसाया हमने

ढाल शब्दों में

तुमको गीत

सा गाया हमने

 

हृदय की कामनाएँ

रह गईं अक्सर

ख़ाली भर न पाए तुम ।

 

सदा उन्मुक्त हो

नभ में

उड़े बनकर के पाखी

क्षितिज के पार

घर की चाह

लेकर जिए एकाकी

 

हवा पर तैरते

निकले ज़रा छूकर

घटा से छा गए तुम ।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – सपना… ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – सपना.. ? ?

..सपने देखने की एक उम्र होती है। तुम्हारी तो उम्र ही सपने देखने में बीत गई। कब छूटेगा सपनों से तुम्हारा वास्ता?

..सपने हैं तो मैं हूँ। सपने जिया हूँ, सपना साथ लिये मरूँगा भी। दुनिया छोड़ूँगा तब भी मेरी खुली आँखों में एक सपना तैरता मिलेगा तुम्हें।

…सुनो, सपना देखने की कोई उम्र नहीं होती और हाँ, सपने की भी कोई उम्र नहीं होती। वह खंड-खंड अखंड बना रहता है।

..यूँ समझ लो कि सपना हूँ मैं!

?

© संजय भारद्वाज  

प्रात: 4:34 बजे, 31.5.2021

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 मकर संक्रांति मंगलवार 14 जनवरी 2025 से शिव पुराण का पारायण महाशिवरात्रि तदनुसार बुधवार 26 फरवरी को सम्पन्न होगा 💥

 🕉️ इस वृहद ग्रंथ के लगभग 18 से 20 पृष्ठ दैनिक पढ़ने का क्रम रखें 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares